ही बातमी समजली का? - ३१
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी या धाग्याचा वापर करावा
=======
http://www.forbes.com/sites/moiraforbes/2014/07/03/power-woman-indra-no…
हे मान्य करण्याचा प्रांजळपणा पुरुष सी ई ओ देखिल दाखवू शकतील काय?
म्हणजे काय?
>> पुरुषांनी असं म्हटलं की ते प्रतिगामी ठरतात ना.
प्रतिसाद नीटसा कळला नाही. मुळात इंद्रा नूयी ह्यांनी जे म्हटलं आहे ते 'वास्तव असं असतं' ह्या प्रकारचं आहे असं वाटतं. ते तसंच असायला हवं असं त्या काही म्हणाल्या आहेत का? उदा : हा परिच्छेद पाहा :
Just as you’re rising to middle management your kids need you because they’re teenagers, they need you for the teenage years.
And that’s the time your husband becomes a teenager too, so he needs you. They need you too. What do you do? And as you grow even more, your parents need you because they’re aging.
So we’re screwed.
आता इथे 'नवरा नेमक्या त्याच काळात टीनएजरसारखा वागतो आणि त्याला तुमची गरज असते' हे वाक्य तुम्ही कसं घेता? अपरिहार्य वास्तव म्हणून, की ज्यातून धडा घेता येईल आणि जे बदलता येईल असं वास्तव म्हणून?
अर्थनिर्णयन
>> सांगितलेलं म्याटर हे डिस्क्रिप्टिव्ह आहे की प्रिस्क्रिटिव्ह, याचं पर्सेप्शन ते सांगणारं कोण आहे यावर बर्याचदा अवलंबून असतं.
इंद्रा नूयीचा नवरा हे सांगतो आहे असं समजा आणि तो हे वाक्य बोलला असं समजा -
माझी बायको ज्या वेळी मिडल मॅनेजमेंटमध्ये वर चढत होती नेमक्या त्याच वेळी मी टीनएजरसारखं वागू लागलो आणि मला तिची अधिक गरज भासू लागली.
तर तुमचं अर्थनिर्णयन काय असेल?
नाईस ट्राय
समजा मला हे कसंही वाटलं तरी त्याने माझ्या मूळ प्रतिपादनात फरक काय पडेल? हा एक विदाबिंदू घेऊन 'बघा, बघा, इथे दोघांबद्दलही एकच ग्रह आला म्ह. पर्सेप्शन बदलत नाही' असे सांगणे सोपे आहे बट दॅट इज़ अगेन मिसलीडिंग. 'वुमेन कांट हॅव इट ऑल' असे इंद्रा नूयीचा नवरा म्हणाला तर अर्थनिर्णयन काय असेल? त्यावर लोकांची प्रतिक्रिया अशीच येईल का? माझा रोख तशा स्टेटमेंटवर होता. पुरुषाचं डीकन्स्ट्रक्शन केल्यास कूल प्वाइंट्स मिळण्याचे दिवस आहेत, पण अपोझिट इजंट ट्रू अॅटलीस्ट नौ-अ-डेज़.
मी तुमच्या मताशी सहमत होतो पण
मी तुमच्या मताशी सहमत होतो पण वाक्यबदल हवा आहे "मेन कान्ट हॅव इट ऑल", मला वाटले हे अरुण जोशींना अभिप्रेत असावे.
कदाचित. पण तसे म्हटल्यास पेट्रिआर्की आणि युगानुयुगांचे अत्याचार इ. शेपटी जोडल्या जाण्याची आणि त्यामुळे मुद्दा भरकटण्याची शक्यता मोठीच आहे.
"वुमन कान्ट हॅव इट ऑल" असे पुरुषाने 'आयसोलोशन'मधे म्हणण्याची गरज समजत नाही.
असे म्हणण्याची 'गरज' आहे असे मी कधीच प्रतिपादन केलेले नाही. फक्त असे कुणी पुरुष म्हटल्यास प्रतिक्रिया बर्याच वेगळ्या येतील इतकेच म्हणालो.
पण तसे म्हटल्यास पेट्रिआर्की
पण तसे म्हटल्यास पेट्रिआर्की आणि युगानुयुगांचे अत्याचार इ. शेपटी जोडल्या जाण्याची आणि त्यामुळे मुद्दा भरकटण्याची शक्यता मोठीच आहे.
शेपटी जोडली जाणे हेच पुरुषांच्या 'मेन कान्ट हॅव इट ऑल' वक्तव्याचे अर्थनिर्णयन आहे, मुद्दा जेन्डरबायसमुळे भरकटण्याची शक्यता आहेच.
असे म्हणण्याची 'गरज' आहे असे मी कधीच प्रतिपादन केलेले नाही. फक्त असे कुणी पुरुष म्हटल्यास प्रतिक्रिया बर्याच वेगळ्या येतील इतकेच म्हणालो.
पण 'गरज' नसताना असे म्हंटल्यास प्रतिक्रिया वेगळ्या येणारच न?
संदर्भचौकट
>> 'वुमेन कांट हॅव इट ऑल' असे इंद्रा नूयीचा नवरा म्हणाला तर अर्थनिर्णयन काय असेल?
'माझा नवरा असा वागला' असं इंद्रा नूयी सांगते आहे, 'So we’re screwed' असं ती सांगते आहे आणि म्हणून 'Women Can't Have It All' असं म्हणते आहे ह्याचा विसर पडला, तर मुळात इंद्रा नूयीच्या विधानांचं अर्थनिर्णयनच विपरीत होण्याची शक्यता आहे.
'माझा नवरा असा वागला' असं
'माझा नवरा असा वागला' असं इंद्रा नूयी सांगते आहे, 'So we’re screwed' असं ती सांगते आहे आणि म्हणून 'Women Can't Have It All' असं म्हणते आहे ह्याचा विसर पडला, तर मुळात इंद्रा नूयीच्या विधानांचं अर्थनिर्णयनच विपरीत होण्याची शक्यता आहे.
पण, "सुपरवुमन बनण्याचा अट्टाहास हा मूलतः शक्यतेच्या कोटीतला आहे, विथ स्पाउजल हेल्प" या त्यामागच्या गृहीतकाला काही आधार आहे असेही लेखातून दिसत नाही. इथे दोष 'विशिंग टु बाईट मोर दॅन वन कॅन च्यू' कडे न जाता पार्ट'नरा'कडेच जातो. हा एकांगीपणा रोचक वाटला, म्हणून म्हटलं. इथे फक्त डिमांड अॅस्पेक्ट दिसतो आहे, सप्लाय बद्दल गुळणी धरून बसल्या गेले आहे. कुणा पुरुषाने जर इथे सप्लाय साईड अर्ग्युमेंट केले तर धाग्याचे काश्मीर झाले असते एव्हाना.
हाणा..धरून हाणा! आता इथे
हाणा..धरून हाणा! :)
आता इथे 'नवरा नेमक्या त्याच काळात टीनएजरसारखा वागतो आणि त्याला तुमची गरज असते' हे वाक्य तुम्ही कसं घेता? अपरिहार्य वास्तव म्हणून, की ज्यातून धडा घेता येईल आणि जे बदलता येईल असं वास्तव म्हणून?
सुपरवुमन आहोत असे भासवण्याचे ओझे कधी कधी फार जास्त होते त्यामुळे मग कोणता तरी एक पर्याय प्राथमिकता म्हणून ठरवावाच लागतो. लवकरच ती वेळ येणार आहे माझ्यावर असे दिसतेय!
http://www.loksatta.com/lokra
http://www.loksatta.com/lokrang-news/need-of-ncp-free-maharashtra-65289…
लेख वाचला. Compared to what ? हा प्रश्न विचारणे गरजेचे नाही असे लेखकास वाटणे साहजिक आहे. ठीकाय. तो मुद्दा सोडून देतो.
पण या लेखातली अनेक विधाने कसलाही डेटा न देता केलेली आहेत.
Compared to what ? हा प्रश्न
Compared to what ? हा प्रश्न विचारणे गरजेचे नाही असे लेखकास वाटणे साहजिक आहे.
हा हा हा...
पण या लेखातली अनेक विधाने कसलाही डेटा न देता केलेली आहेत.
दुर्दैवाने भावनाप्रधान चिडचिड वैचारिक लेखन म्हणून वावरते. काहीतरी मुद्दे मांडल्याचा अविर्भाव करत 'अमुकतमुकची कसली सोललेली आहे' असं हे लेखन आहे. तुमच्या डेटाविषयीच्या अपेक्षा बदलाव्यात ही सूचना करतो.
तिरकी रेघ
तिरकी रेघमधील एक-दोन लेखांमधला खोचकपणा आवडला होता.
हे ते लेख :-
http://www.loksatta.com/lokrang-news/enjoying-as-ruling-party-372876/
.
.
ह्या लेखातली शैली रोचक वाटली , पटली नाही पण...
वाचण्यासारखं आहे :-
http://www.loksatta.com/lokrang-news/two-perfectionist-and-an-appeal-43…
.
.
.
http://www.loksatta.com/lokrang-news/political-party-members-416122/
.
.
आता ह्या लिखाणांमध्ये विदा दिलेला नाही. पण त्यांनी तो द्यावा असं मला वाटत नाही.
विदा वेगळ्या ठिकाणी द्यावा असं वआततं. मागे सप्तरंग वगैरे मध्ये चितळे समितीचा अहवाल, १९६२ च्या युद्धाचे विश्लेषण वगैरे आले होते;
त्यात विदा असणं/मागणं वेगळं. इथली गोष्ट निराळी आहे. निदान मी तरी ज्या लेखांचा उल्लेख केला आहे; त्यात विदा द्यायला स्कोप नव्हता;
विशेष गरजही नव्हती. त्या लेखकानं त्याचं मत मांडलं इतकं पुरेसं आहे.
(बहुतांश वेळा हा इसम उजव्यांना नि अधून मधून गबर होउ लागलेल्या मध्यमवर्गीयांना झोडपत असतो; ते मला पटत नाही; पण तरी वाचायला आवडतं.)
लेखन तितपतच आहे हे खरेच.पण
लेखन तितपतच आहे हे खरेच.
पण नक्की कोणत्या विधानासाठी विदा हवा होता?
बहुतेक 'लोडेड' विधानं, त्यांची अशी "प्रतिमा" आहे, त्यांची अशी "चाल" आहे, त्यांची अशी अवस्था "दिसते" अश्या स्वरूपाची आहेत. त्यामुळे कशाप्रकारचा विदा अपेक्षित आहे?
मुळात मराठी वृत्तपत्रांतील एकुणच स्तंभलेखनात कितपत विदा दिला जातो? याच लेखाला वेगळं काढण्यामागचे कारण?
डेटा कसला आणि कशासाठी?
>> पण या लेखातली अनेक विधाने कसलाही डेटा न देता केलेली आहेत.
नक्की कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला डेटा हवा आहे? कारण लेखात लिहिलेल्या अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेसमोरच घडलेल्या आहेत.
राजकीय उपहास, प्रहसन, काव्य-शास्त्र-विनोद वगैरे गोष्टींना महाराष्ट्रात मोठी परंपरा आहे. प्रस्तुत सदर हे साधारण त्यात मोडतं. संजय पवार म्हणजे सुहास पळशीकरांसारखे राजकीय विश्लेषक वगैरे आहेत असं कुणी म्हणताना मला तरी दिसत नाही. मग डेटा कसला?
उत्पन्न - तोटा
उपनगरी वाहतुक तोट्यात .....
गेली कित्येक वर्षे उपनगरी रेलवेतून भरपूर नफ़ा होतो आणि तो रेलवेच्या इतरत्र होणार्या तोट्याच्या भरपाईसाठी वापरला जातो असं सांगितलं जाई. आता त्याच्या उलट बातमी आली आहे. बर्याच वर्षांपासून असलेली शंका फिटली आहे.
लवकरच (विधानसभा निवडणुकांनंतर) मुंबईतून इतके हजार कोटी रुपये कर मिळतो आणि इतके हजार गुणिले २ कोटी रुपये मुंबईच्या विकासासाठी सरकारकडून खर्च होतात अशी आकडेवारी पहायला मिळेल असे वाटते.
आश्चर्य
आश्चर्य आहे (लिन्क लोकसत्ता च्या मुख्य पानावर गेली). मीही समजत होतो की ती फायद्यात आहे. त्याचे एक कारण असेही आहे की ज्या प्रमाणा बहुतेक लोकल्स भरून जातात (रात्री बर्यापैकी मोकळ्या जाणार्या ई गृहीत धरूनही), त्यावरून ही सिस्टीम नक्कीच फायद्यात असेल असे वाटायचे. कदाचित एकूण प्रवाशांमधली पास वाल्यांची टक्केवारी खूप जास्त असेल. या नुकत्याच झालेल्या भाडेवाढीपूर्वी ५-६ वेळा वापरण्याएवढ्याच किमतीचा पास होता, म्हणजे एका अर्थाने महिन्यातील किमान २२ दिवस लोक लोकल वापरून प्रत्यक्ष रेल्वेला ६ दिवसांचेच पैसे मिळत होते. त्यामुळेही असेल. प्लस फुकटे प्रवासी हे ही.
अनेक देशांमधे महिन्याच्या पास ची किंमत २०-२२ दिवसांच्या तिकीटाएवढी असूनसुद्धा बहुसंख्य पब्लिक सिस्टीम्स तोट्यात असतात. लोकलच्या गर्दीमुळे ती फायद्यात असेल असे वाटायचे.
मात्र हा तोटा काही "एकावेळच्या" खरेदी (नवीन गाड्यांचे रेक्स वगैरे) सोडून आहे, की त्यामुळे आहे कोणास ठाउक.
शरीयत न्यायालये बेकायदा आहेत
शरीयत न्यायालये बेकायदा आहेत व त्याचे निकाल/फतवे कोणालाही बंधनकारक नाहित हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्वागतार्ह आहेच.
पण पुन्हा या अश्या 'एक्स्ट्रा-कॉन्स्टिट्युशनल' विशेषतः २-३ हजार वर्षे जुन्या व जुनाट नियमांवर आधारीत न्यायदान करणार्या या असल्या संस्थांवर कोर्टाने बंदी का घातली नाही समजत नै.
याला कोर्टाचा सोयीस्कर इनॅक्टीव्हिजम म्हणावे काय?
मान्य.
मात्र, कोर्ट आपल्या अखत्यारीत न येणार्या बाबी करतच नाही असं नाहीये ना!.
फक्त हा "ज्युडिशियल अॅक्टिव्हिजम' किती सिलेक्टिव्ह व सोयीस्कर असतो हे मला रोचक वाटतं (उदा. २जी केस, बाबरी मशीद केस इथे कोर्टाने आपली चौकट मोडलीच ना? मग समलैंगिक संबंध, शरीयत न्यायालये व फतवे वगैरे सेंसिटिव्ह गोष्टींच्यावेळीच बरी त्यांना आपली चौकट आठवते!)
भारतात अशी कैक उदा आहेत,
भारतात अशी कैक उदा आहेत, कित्येक प्रकरणे कोर्टांनी स्युओ-मोटो घेतली आहेत.
काही नजीकची आठवणारी आणखी उदा:
दिल्लीतील रिक्षाड्रायव्हर्सना प्रदुषण कमी करण्यासाठी सीएन्जीवर जायला भाग पाडले, सरकारला नदी जोड प्रकल्प राबवावा हे सांगणे, उच्च शिक्षणासाठी कास्ट बेस्ड ओबीसी कोट्यावर रोख इत्यादी.
भारतीय न्यायसंस्थेला जगातील कित्येक प्रगत देशांतील न्यायसंस्थेहून अधिक उत्तम प्रकारचे अधिकार आहेत. नी न्यायसंस्थेनेही अनेकदा त्याचा वापर केला आहे व त्यावरील लोकांचा विश्वास टिकलेला आहे हे मान्य करूनही, काही बाबतीत हे असे हातचे राखून निकाल देणे (किंबहुना या पाश्वभूमीमुळेच) अधिक खटकते.
हे फक्त इंद्रा नुयींच्या
हे फक्त इंद्रा नुयींच्या नवर्याबाबत आहे की एकंदरीत नवरे जमातीबद्दल आहे?
ते डिस्क्रिप्टिको-प्रिस्क्रिप्टिव्ह आहे बहुधा. ;)
अपि चः नवर्यांची वागणूक त्या काळात सर्वथा टीनेजरछाप असते आणि बायका सर्वकाळ मॅच्युअर असतात हाही नवीनच शोध लागला. बायका बहुधा एलियन जीन बाळगत असाव्यात.
(हेही डिस्क्रिप्टिव्ह आहे, प्रिस्क्रिप्टिव्ह नाही.)
आमचा एक ट्राय
इंदिराला प्रमोशन मिळालं होतं ती आता बॉसच्या बॉसची बॉस(मिडल मॅनेजमेंट हा शब्द वगळला) झाली होती, पण त्याच वेळेस पिंट्या आणि रिंकु वयात आले होते त्यामुळे त्यांच्या त्या घंटा समस्या सोडवण्यासाठी आईविना कोण त्यांना सापडणार होतं, त्यात ग्रँडमदर आणि ग्रँडफादर इल आणि थेरडे झाले असल्याने त्याना पिडायला इंदिराच हवी होती, त्यात नवरोबा जो रिकामटेकडा असल्याने त्याला नेमक्या ह्याच वेळेस बायकोबरोबर डेटवर जायचं होतं म्हणजे ऑलमोस्ट रोज तेही दिवसा कारण रात्री इंदिरा घरी असणारच, ह्या टोणग्याच्या ह्या अॅटिट्यूडला वैतागून इंदिराला वाटलं आपली तर लागली, आपल्याला काय बॉसच्या बॉसच्या बॉसची बॉस आणि बेस्ट आई आणि बेस्ट बायको आणि बेस्ट मुलगी होता येणार नाय. मरा तिचायला. - स्वैर अनुवाद.
नियतीचा काव्यगत न्यायः
नियतीचा काव्यगत न्यायः महात्मा गांधींचा पुतळा ब्रिटीश पार्लमेंट समोर उभारला जाणार.
का कोण जाणे पण वाचून अतिशय आनंद झाला तो नुसता पुतळा उभारण्याबद्दल नक्कीच नाहिये, एक प्रकारची आसुरी आनंदाचीही छटा त्यात आहे. :)
शत्रुच्याही हृदयपरिवर्तनावर
शत्रुच्याही हृदयपरिवर्तनावर विश्वास असणारे गांधीजी जिंकले असे आता पुर्णार्थाने म्हणता यावे काय?
गांधीजींना मानणारे इंग्रज तेव्हाही होते आणि आता तर आहेतच. त्यामुळे चर्चिल मागे काहीही जरी बरळला असला तरी इंग्रजांचे हृदयपरिवर्तन झाले हे पुतळा बसवण्याने सिद्ध होते असे वाटत नाही.
क्यामेरून येडा आहे. उगाच हवेत
क्यामेरून येडा आहे. उगाच हवेत किल्ले बांधतोय.
एकतर २०१५ मध्ये होणार्या निवडणुकींनंतर त्याचंच बूड स्थिर राहील का ही शंका आहे. त्यात त्याच्या डोस्क्याला स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याचा रेफरेंडम वगैरे बरेच त्रास आहेत.
भारतातलं सर्कार नवं. ते या FTAवर लागलीच सह्या ठोकणार का हा प्रश्नच आहे.
त्यातून यूकेशी FTA करणं म्हणजे पर्यायाने आख्ख्या ईयूशी FTA करणं. ईयूचे २८ देश एकमेकांना मोस्ट फेवर्ड नेशन म्हणवतात. कॉमन मार्केट वगैरे. त्यामुळे सायप्रस, लात्विया वगैरे डिस्को सन्यांना टॅरिफची दारं उघडून देणं कितपत योग्य आहे?
२८ पोरांना क्यांपसवर मराठीत
२८ पोरांना क्यांपसवर मराठीत बोलल्याबद्दल छड्या मारल्या गेल्या. आता मराठीवादी पक्षांनी यावर गुळणी का धरली असे विचारण्यापेक्षा या विकृत मनोवृत्तीचा उगम शोधण्याची वेळ आलेली आहे.
http://timesofindia.indiatimes.com/City/Pune/Principal-caned-us-for-tal…
नियम
पोरांना शक्यतो मारहाण रुपातली शिक्षा करु नये असे वाटते.
मराठी न बोलण्याचा नियम शाळेत आहे का ?
तसे असेल तर न्यम मोडला गेलेला आहे. काही ना काही अॅक्शन घेतली जाणं चूक नाही.
बादवे, तसा नियम करण्याचे शाळेला अधिकार (शासनाने वगैरे) दिलेत का ?
शाळेत घालण्यापूर्वी पालकांना हे नियम ठाउक नव्हते का ?
थोडाक्यात :-
अधिक तपशील म्निळाले की बोलुयात; एकदाम मथळा पाहून प्रतिक्रिया नको.
एक तर असा नियम करणे हाच
एक तर असा नियम करणे हाच वेडझवेपणा आहे, पण ते एक असोच.
पण मारहाण म्ह. अतीच झालं. मानवाधिकार आणि चाइल्ड वेल्फेअरच्या नावाखाली असतील नसतील तेवढी कलमं लावून त्यांचे डेरिंग कलम केले पाहिजे.
आणि मथळा पाहून प्रतिक्रिया देण्याबद्दलः किमान पूर्ण बातमी तरी वाचण्याचे कष्ट घेतलेस का रे मनोबा ;)
http://timesofindia.indiatime
http://timesofindia.indiatimes.com/budget-2014/union-budget-2014/Financ…
Seconding Jaitley's caution, Prime Minister Narendra Modi Modi felt the Vodafone retrospective tax case needed careful handling. Any move to bail the telecom giant out of its Rs 22,000 crore tax liability would attract cries of sellout to big business.
सेल आऊट ????? टॅक्स हेवन अनुत्पादक शेतकर्यांना दिला तर ते सुयोग्य पण कॉर्पोरेशन्स ना दिला तर त्याकडे पाहून ना़कं मुरडणार ????
डिस्गस्टिंग.
कशाने उदार तुम्हासी म्हणावे..
मग तुम्हाला 'लोकसत्ता'चा हा अग्रलेख आवडेल. त्यातून उद्धृत -
सुधारणांचा मार्ग जेथून सुरू होतो, तेथपर्यंत जेटली यांचा अर्थसंकल्प जातो. परंतु तो पाऊल मात्र उचलत नाही. हे अघटितच. उदाहरणार्थ उद्योगांवर पूर्वलक्ष्यी प्रभावाने झालेली कर आकारणी. माजी अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय उद्योगविश्वात भारताची चांगलीच नाचक्की झालेली असून परिणामी भारतीय बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ पुरता आटून गेला आहे. ही पूर्वलक्ष्यी करपद्धत अत्यंत मागास असल्याचे खुद्द जेटली मान्य करतात. अशा पद्धतीने कर आकारणी होणार नाही याबाबत आमचे सरकार दक्ष राहील, असेही अभिवचन देतात. परंतु पूर्वलक्ष्यी प्रभावाने आकारण्यात आलेल्या करांचे काय करणार, याचे उत्तर ते सोयीस्करपणे नवी समिती पाहील असे देतात. ही अशी भूमिका वकिली व्यवसायात कौतुकास पात्र ठरते. आर्थिक क्षेत्राचे तसे नाही. तेथे ठोस उत्तर अपेक्षित असते. ते देणे जेटली यांनी टाळले आहे. परिणामी उद्योगविश्वास दिलासा मिळणारा नाही. या अशा पूर्वलक्ष्यी प्रभावाच्या कर आकारणीमुळे २८ कंपन्यांनी सरकारवर दावे दाखल केले असून या आणि अशा अन्य प्रकरणांत तब्बल ४ लाख कोटी रुपये अडकून पडले आहेत. उद्योगांवरील अशी पूर्वलक्ष्यी आकारणी मागे घेत आहोत, या एका घोषणेने जेटली बरेच काही बदल घडवू शकले असते. ते झालेले नाही.
स्वामिनाथन अय्यर
स्वामिनाथन अय्यर ह्यांनी जेटलींच्या बजेटचा घेतलेला आढावा इथे वाचता येईल. वेचक उद्धृत :
Finance Minister Arun Jaitley’s maiden budget repeats so many figures of Chidambaram’s interim February budget that global analysts call it a cut-and-paste job. I call it a Chidambaram budget with saffron lipstick.
हे अजून एक विश्लेषण. एका
हे अजून एक विश्लेषण. एका पॅरॅचे.
http://www.thehindu.com/opinion/lead/the-good-is-in-the-detail/article6…
काही रोचक वाक्य
The paragraph indicates out-of-the-box thinking. Mr. Modi seems to have discovered the secret to growth and social justice — namely providing the lifeline of finance to the most job productive segment of the national economy operated by the disadvantaged sections of Indian people.
आणि
This sector generates OBC, SC and ST entrepreneurs almost like an open air university. In contrast, the elite Indian Institutes of Technology and the Indian Institutes of Management generate job seekers, not entrepreneurs.
Indian Council of Historical Research
Indian Council of Historical Researchच्या नव्या प्रमुखांबदल दोन विचारमौक्तिक...
RSS takeover of top research, cultural bodies
History repeats itself - रोमिला थापर
ऐतिहासिक निर्णय
मला तर फार आनंद झालाय - रामायण महाभारत ह्या कथा नसून ऐतिहासिक सत्यं होती ह्या सुदर्शन रावांच्या अजरामर वक्तव्यामुळे कित्ती तरी अनैतिकता आता भारतीय संस्कृतीत ऐतिहासिकरीत्या समाविष्ट झाल्ये! मोदी सरकाराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा असाच हा निर्णय आहे!!!
अगदी अगदी. अवांतरः नक्की
अगदी अगदी.
अवांतरः नक्की आक्षेप कशाला आहे. संशोधन न करता कसं सांगता येईल की की ती पात्र आणि घटना खर्या आहेत?
या वाक्यबद्दल साशंक आहेच.
In continuing civilisations such as ours, the writing of history cannot depend only on archaeological evidence. We have to depend on folklore too.
पण रावांना काही लेबल लावायला पुरेसं नाही वाटलं.
अमित शहांवरची टीका गायब
अमित शहांच्या नियुक्तीवर टीका करणारा राणा अयूब यांचा एक लेख डीएनएनं प्रकाशित केला, पण नंतर काढून टाकला.
अमित शहांच्या चारित्र्याची चिंता.
मिसलीड?
>> आपण फक्त माहिती देतो आहोत अश्या सुराचे विधान देऊन एक बातमी देणे ऐसीच्या वाचकांना मिसलिड करू शकते.
नक्की काय म्हणायचे - शहाच्या एजंटांनी गुंडगिरीने ती बातमी काढली?
राणा अयूबचा लेख मी डीएनएवर वाचला होता. आला त्या दिवशी तो सोशल मीडिआवर अनेकांनी शेअर केला होता. आता तो लेख तिथे दिसत नाही. डीएनएतून लेख गायब व्हायचा हा पहिला प्रसंग नाही. ह्या आधीच्या एका प्रसंगात गूगल कॅशेमध्ये लेख दिसत होता. तेव्हा कॅशे म्हणजे काय ह्याबद्दल काही उद्बोधक चर्चाही झालेली आठवते. आताच्या ह्या प्रसंगी तर कॅशेमधूनही लेख गायब झालेला आहे असं दिसतंय. आजच्या वातावरणात ह्याबद्दल आवाज उठणं साहजिक आहे आणि तसा तो उठतोही आहे. आता ह्यात नक्की मिसलीडिंग काय बरं आहे?
गैर काहीच नाही. पण ती टिका
गैर काहीच नाही. पण ती टिका शहावर आहे कि डीएनए वर आहे? डीएनए बिकाऊ, लाचार असले तर ते पहिल्यांदा असले लेख का छापत असावे? त्यांच्या मॅनेजमेंट मधे काय इश्श्यू आहे? नि त्यांनी कारण काय दिले आहे. जिथे अन्यत्र मजकूर हटतो तिथे सगळीकडे आवाज उठवतात का? कि अन्यही कारणं असतात?
मीही तेच म्हणतोय, आवाज उठवण्याचं अपिल आपल्या बातमीच्या माहितीत शोधता येतं, पण डिटेल्स नाही.
झीकडून अनधिकृत कबुली
>> त्यांच्या मॅनेजमेंट मधे काय इश्श्यू आहे? नि त्यांनी कारण काय दिले आहे.
डीएनएची मालकी झी समूहाकडे आहे. त्यांच्या डिजिटल कंटेंटच्या प्रमुखांनी आपल्या वैयक्तिक ब्लॉगवर ह्या बाबतीत काय म्हटलं आहे ते सांगणारी बातमी. त्यातच मूळ लेखाचा पर्यायी दुवा सापडेल.
मागे वृत्तपत्रांवर सरकारची
मागे वृत्तपत्रांवर सरकारची नजर असणार त्या बातमीचा आणि या बातमीचा थेट संबंध आहे की नाहि माहिती नाही.
सरकारचा, राज्यकर्त्या पक्षाचा यात हात असो नसो, त्यांच्या विरूद्ध लिहिणे (अगदी आपणहूनही) लोकांना धोकादायक वाटु लागणारे वातावरण निर्माण करणे फारसे भुषणास्पद नाही. हा वृत्तपत्राचा अंटर्गत मुद्दा आहे हे कबूल केले तरी युपीएच्या काळात गांधी आई-मुलांवर बरीच (प्रसंगी अगदी हीन दर्जाची - खरंतर करणार्याची लायकी दाखवणारी पण ते असो- ) टिका होऊनही असे कंटेट हटल्याचे दिसले नाही.
एकुणातच दुर्दैवी प्रकार!
धन्यवाद. एक लि़ंक
धन्यवाद.
एक लि़ंक मिळाली.
http://www.indiaresists.com/a-new-low-in-indian-politics-full-text-of-r…
अयुब राणाने जे अकलेचे तारे
अयुब राणाने जे अकलेचे तारे तोडले आहेत त्याचा जवाब नाही. यूपीए सत्तेत असताना गुजरातचे रेप्यूटेशन नाझी जर्मनीच्यापेक्षा वाइट करण्याचा प्रयत्न झाला. सगळी केंद्रीय सरकारी कुत्री गुजरात भाजपवर सोडण्यात आली. आता त्यांचाच आधार घेऊन "न्यू लो" सिद्ध करण्याचा प्रयत्न होत आहे.
प्रतिसादाबद्दल
१. लेखातले कोणते मुद्दे अयोग्य, अग्राह्य किंवा खोटे आहेत याबद्दल प्रतिसादात काहीही उहापोह नाही.
२. यूपीए सत्तेत असताना काय झालं यात कार्यकारणभावाबद्दल काही विश्लेषण नाही.
३. असांसदीय भाषेचा वापर.
अशा प्रकारचे प्रतिसाद वाचल्यानंतर, न वाचून वेळ वाचवलेला बरा, असं वाटल्याने श्रेणी देऊन "सत्कार" करत आहे.
http://timesofindia.indiatime
http://timesofindia.indiatimes.com/world/middle-east/Israeli-warplanes-…
असं पायजे. निर्दय पणे ठोकून काढणे. मोदीजी इस्रायल कडून हे शिकण्यासारखे आहे. सगळे उपलब्ध मार्ग वापरून असं काही ठोकून काढतात ते की पूछो मत. (बान की मून यांनी हमास्/हिजबोल्लाह यांना कधी आवाहन केल्याचे ऐकिवात नाही .... की "इस्रायल वरील रॉकेट हल्ले थांबवा" म्हणून.)
ह्म्म्म
हे जे काय ठोकून वगैरे काढणे आहे त्याने नक्की कोणता परिणाम साधला जातो ते कळत नाही. मला साधारण कळायला लागल्यापासून हे हल्ले आणि प्रत्युत्तरादाखल ठोकणे वगैरे चालू आहे.
त्या प्रत्युत्तरादाखल ठोकण्याने इस्रायलमधील देशभक्तांना बरे वाटण्याखेरीज त्या ठोकण्याचा जो अपेक्षित परिणाम (काय बिशाद आहे पुन्हा आगळीक करण्याची !!!! ..... वगैरे) व्हायला हवा तो होताना दिसतो का त्याबद्दल नक्की काही सांगणे कठीण आहे
ठोकून न काढण्याने काय परिणाम
ठोकून न काढण्याने काय परिणाम होईल ? हा ही विचार येतो मनात माझ्या. प्रत्युत्तरादाखल बिनशर्त क्षमा करण्याने इस्रायलमधील अहिंसावाद्यांना बरे वाटण्याखेरीज त्या न ठोकण्याचा व्हायला हवा तो होताना दिसला असता का याबद्दल सांगणे सुद्धा कठिण आहे. भारत असे निर्दय पणे ठोकून काढत नाही. याचा परिणाम म्हणून काय साध्य झाले ? भारत क्षमा करतो किंवा we have too much to loose in case of an escalation - असे म्हणून गप्प बसतो. तसेच पाकिस्तान कडे अण्वस्त्रे ही आहेत - which provide significant disincentives for escalation.... not to mention ... the perception that Pakistan has managed to create successfully that they are least likely to be measured/proportionate in their response. भारतीय धोरण हे naive आहे असे माझे म्हणणे नाही. पण They (pakistani people) need to know that this low intensity war is not a free lunch. आणि हे जर त्यांना समजत नसेल तर ते सर्व उपलब्ध मार्ग वापरून त्यांना दाखवून देणे हा एक मार्ग असू शकतो - जो आपण वापरून बघायला पायजे.
भारताच्या किमान ५० पंतप्रधानांनी किमान १०० वेळा पाकिस्तानला उद्देशून - आमचा संयम हा आमचा दुबळे पणा आहे असे समजू नका - असे सांगितले आहे. त्याचा परिणाम काय झाला ?
नेतानयाहू म्हणतात ते विचार करण्याजोगे आहे - Weather it is Germany or Japan - you have to defeat the evil.
गेल्या दहा वर्षांत पाकिस्तान
गेल्या दहा वर्षांत पाकिस्तान पुरस्कृत किती दहशतवादी हल्ले झाले (भारतात) व रिटॅलियेशन म्हणून भारताने पाकिस्तानात किती हल्ले घडवून आणले यांचा विचार करा. हल्ले नुसते घडवून आणले असे म्हणणे एक व ते भारताने घडवून आणले हे दाखवून देणे हा दुसरा भाग. मुद्दा हा आहे की - पाकी जनतेस हे समजणे गरजेचे आहे की हे "low intensity warfare" त्यांना महागात पडू शकते. पाकिस्तानात आज हल्ले होतच आहेत. पण भारत घडवून आणत आहे हे त्यांना समजणे गरजेचे आहे. Violent behavior can be stopped by credibly demonstrating the capability to retaliate. And for the credible deterrent to have its impact ... we have to actually use it sometime.
इस्रायल जे करत आहे ते छुपे नाही. लपून राहिलेले नाही. उघडपणे बाँब हल्ले चालू आहेत.

पुरुषांनी असं म्हटलं की ते
पुरुषांनी असं म्हटलं की ते प्रतिगामी ठरतात ना. कोण पुरुष असली नसती आफत ओढवून घेईल आपल्यावर?