Skip to main content

ब्राह्मण समाजातील उपवर मुलांचा प्रश्न

आजकाल ब्राह्मण समाजातील उपवर मुलांचा प्रश्न अतिशय जटील बनला आहे . सु(?)शिक्षित ब्राह्मण तरुणी या जातीपाती चा विचार न करता सर्रास आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह करत आहेत. व संस्कारांच्या ओझ्याने वाकलेल्या ब्राह्मण तरुणांना लग्नाला मुली मिळत नसल्याने अविवाहित प्रौढ तरुणांची संख्या वाढत चालली आहे।

त्यात या तरुणांनी आंतरजातीय विवाह करायचे ठरवले तर मुली ना अपेक्षित असणारा स्मार्टनेस ब्राह्मण मुलात आढळत नाही . याचे कारण काय असावे ?

प्रेम , मैत्री करणे व निभावणे , प्रेमात झोकून देणे किंबहुना खरे प्रेम करणे यासाठी जे आवश्यक गुण लागतात , ते अशा मुलामध्ये उपजतच कमी असतात किंवा ब्राह्मण समाजात प्रेम कुचेष्टेचा व हेटाळणी चा विषय ठरवला जातो , प्रेम म्हणजे थेरं असे समजले जाते …असे संस्कार होतात ।तेच या मुलांच्या मुळावर येत असावे का?

गवि Wed, 08/01/2014 - 09:43
सु(?)शिक्षित ब्राह्मण तरुणी या जातीपाती चा विचार न करता सर्रास आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह करत आहेत. व संस्कारांच्या ओझ्याने वाकलेल्या ब्राह्मण तरुणांना लग्नाला मुली मिळत नसल्याने अविवाहित प्रौढ तरुणांची संख्या वाढत चालली आहे।

एकाच घरात वाढणार्‍या मुलगा आणि मुलगी यांपैकी मुलगेच नेमके संस्कारांच्या ओझ्याने का वाकले आणि मुली मात्र सर्रास आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह करु लागल्या (हे व्युत्क्रमाने संस्कारहीनतेचं लक्षण आहे असं गृहीत धरुन) असं का होत असेल?? तुम्हाला काय वाटतं??

ऋषिकेश Wed, 08/01/2014 - 10:14

In reply to by नितिन थत्ते

की मुली संस्कारांच्या अतिरेकी दबावाने बंडखोर झाल्या याचाही विचार करावा.

खरे असावे कारण संस्कार का कोणानुसार 'ब्रह्मचर्य हेच जीवन' ना?
आता मुलांनी संस्कारी व्हायचे ठरवल्यावर मुलींपुढे पर्याय राहतो का?

जाऊ दे बोर झालो.. धाग्यावर शेवटचा तिसाद!

Nile Wed, 08/01/2014 - 10:09

आजकाल ब्राह्मण समाजातील उपवर मुलांचा प्रश्न अतिशय जटील बनला आहे

आजकाल वर आक्षेप.
उपवर वर आक्षेप.
"मुलां"वर आक्षेप.

पण भावनेशी सहमत. घोडम्यांची कशाला मुंज घालतात लेकाचे कोणास ठावूक!

सु(?)शिक्षित ब्राह्मण तरुणी या जातीपाती चा विचार न करता सर्रास आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह करत आहेत

'सु(?)शिक्षित ब्राह्मण तरूणी' ही नवी जातपात निर्माण झाल्याचे माहित नव्हते, धन्यवाद.

पण भावनेशी सहमत. देशस्ताची पोरगी कोकणास्थाच्या घरात? कोकणास्थी कर्‍ह्याड्याच्या (अरे कोणीतरी ब्राह्मणाने येऊन हे शुद्धलेखन तपासा रे!) आणि कर्‍हाड्याची देशस्ताच्या? सारस्वत म्हणजे काय आता ब्राह्मण? अरे काय लावलेय काय? ही काय मोगलाई आहे??

व संस्कारांच्या ओझ्याने वाकलेल्या ब्राह्मण तरुणांना लग्नाला मुली मिळत नसल्याने अविवाहित प्रौढ तरुणांची संख्या वाढत चालली आहे।

संस्काराच्या ओझ्यावर आक्षेप.
मुद्दाम 'लग्नाला मुली मिळत नसल्याचे' लिहल्याबद्दल आक्षेप. (म्हणजे काय 'एरवी' मिळतात असे सुचवायचे आहे का काय?)
तरुणांची संख्या वाढत चालली आहे-ला आक्षेप. अहो गेल्या कित्येक दशकांत तीन टक्क्यांच्यावर वर नाय गेली आकडेवारी अजून!

पण भावनेशी सहमत. अहो ओझ्याने तरणी-ताठी (मुलांबद्दल बोलतोय!) वाकायला लागली म्हणूनतर मुंजीत केस कापायचे संस्कार केले जायचे. आजकाल टक्कल वाईट दिसते म्हणून संस्कारांची आहुती (तीच ती, ब्राह्मण यज्ञात घालतात ती!) दिली या लोकांनी!! शिवाय काही हलकट लोक, मुंजीतले ब्रह्मचर्याचे व्रत फारच गांभिर्याने घेतल्याने प्रोढ तरूणांची संख्या वाढते आहे असे आचरट आरोपही करताहेत या कडे लेखकाने लक्ष द्यायला हवे.

त्यात या तरुणांनी आंतरजातीय विवाह करायचे ठरवले तर मुली ना अपेक्षित असणारा स्मार्टनेस ब्राह्मण मुलात आढळत नाही .

ठरवले तर-वर आक्षेप.
अपेक्षित स्मार्टनेस वर आक्षेप.
ब्राह्मण मुलात-वर आक्षेप. (आत्ता तर पौढ होते, इतक्यच मुल कसे झाले?)
फक्त आंतरजातीय वर आक्षेप. (आंतरधर्मीयांचे काय झाले?)

पण भावनेशी सहमत. मुळात ब्राह्मण मुली मिळत नाहीत म्हणून असे ठरवले म्हणून ती मुले स्मार्ट नाही असा बाष्कळ वाद घालतात हो लोक. (आणि त्या ब्राह्मण मुलींनी योग्य ती कोण्त्याही धर्म-जातीची पोरं शोधून लग्नं केली हा त्यांचा गाढवपणा खुश्शाल नजरेआड करतात.)

प्रेम , मैत्री करणे व निभावणे , प्रेमात झोकून देणे किंबहुना खरे प्रेम करणे यासाठी जे आवश्यक गुण लागतात , ते अशा मुलामध्ये उपजतच कमी असतात किंवा ब्राह्मण समाजात प्रेम कुचेष्टेचा व हेटाळणी चा विषय ठरवला जातो , प्रेम म्हणजे थेरं असे समजले जाते …असे संस्कार होतात ।तेच या मुलांच्या मुळावर येत असावे का?

झोकणे वर आक्षेप. (ही काय दरी आहे, लागले झोकायला?)
खरे प्रेम वर आक्षेप. (खोटे असेल तर ते काय प्रेम आहे?)
गुण लागतात वर आक्षेप. (प्रेम म्हणजे काय अरेंज म्यारेजातली कुंडली जुळवण्याचा प्रकार आहे का गुण शोधायला?)
उपजतच वर आक्षेप. (डीएनए-वर जाऊ नका, सांगून ठेवतो!)
ब्राह्मण समाजात-वर आक्षेप.
संस्कार होतात वर आक्षेप.
मुळावर-वर आक्षेप.

पण भावनेशी सहमत. हे असले संस्कार होणाकरता ब्राह्मणांचे मनुप्रेम कारणीभुत आहे असा हलकट आरोपही काही लोक करतात. शिवाय, अरेंज म्यारेजने (आणि काय दोन-चार तोळे सोन्याच्या देवाण-घेवाणीने) एकत्र आलेल्या आपल्या आई-बाप, काका-काकू वगैरे वगैरे लोकांचे प्रेम पाहून ह्या गोष्टीत काय मजा नाही (किंवा ही थेरं आहेत) असले विचार या मुलांच्या मुळात (हे मुळ वेगळे) निर्माण होतात असलीही काहीतरी बाष्कळ विधानं ही लोक करत असतात.

याविषयी काहीतरी केलं पाहिजे असं मला राहून राहून वाटतं!

शहराजाद Wed, 08/01/2014 - 18:51

In reply to by Nile

.... प्रेमात झोकून देणे ...... यासाठी जे आवश्यक गुण लागतात , ते अशा मुलामध्ये उपजतच कमी असतात...तेच या मुलांच्या मुळावर येत असावे का?

झोकणे वर आक्षेप. (ही काय दरी आहे, लागले झोकायला?)

दरी शब्दावर आक्षेप.
त्यांना जे जमत नाही त्याचमुळे हा सगळा प्राब्लेम आहे, हे धागालेखकानेच सांगितले आहे की.
बाकी भावनेशी सहमत.

थोरांचे बोलः
"आपल्या भाषेतली ऑलमोस्ट सगळी क्रियापदे अनवस्था प्रसंग आणू शकण्याचे सामर्थ्य बाळगून आहेत." इति मेघनाताई.
पोरांचे बोलः
'' फक्त क्रियापदेच नाय काय...''

निखिल देशपांडे Wed, 08/01/2014 - 10:50

प्रेम , मैत्री करणे व निभावणे , प्रेमात झोकून देणे किंबहुना खरे प्रेम करणे यासाठी जे आवश्यक गुण लागतात , ते अशा मुलामध्ये उपजतच कमी असतात

चला या वाक्यांचा वापर पुढल्या भांडणाच्या वेळेस करता येईल.
बाकी सकाळी सकाळी बरी करमणुक झाली.

आबा Wed, 08/01/2014 - 10:54

धडाकेबाज सुरूवातीनंतर, दुसर्‍या पॅराग्राफ मध्ये फॉर्म गेला, तिसर्‍यामध्ये परत आला :)
असो
ह. मो. मराठेंची या विषयावरती रोचक मतं आहेत, वाचा जमली तर (किंवा तुम्हीच ह.मो तर नाहीत?!)

उडन खटोला Wed, 08/01/2014 - 10:58

मी गाम्भीर्याने प्रश्न विचारला आहे सरजी .

समस्या खर्या आहेत ,जावे त्याच्या वन्शा तेव्हा कळे

मौजमजा करायची तर करा पण आज समाजात जे धगधगीत वास्तव आहे ते मी माण्डले आहे.

शब्दरचनेत किम्वा सान्गण्याच्या पद्धतीत काही कमीजास्त झाले असेल तर समजुन घ्या भाउ!

अजो१२३ Wed, 08/01/2014 - 11:51

In reply to by उडन खटोला

मी गांभीर्याने विचारत आहे.
जात जपणे इतके आवश्यक आहे का? इतर जातीच्या कोणत्याही मुलींस आवडणार नाहीत अशी ब्राह्मण मुले आहेत असे जे आपण म्हणत आहात त्यात अर्थ नाही. कोणीही कोणासही आवडू शकते. उलट ब्राह्मण मुले सहज स्वीकारली जातील म्हणून त्यांना अ‍ॅडव्हांटेज आहे. (तेच मुलींना देखिल आहे. बामनाची पोर सुन झाली म्हणून कोण कौतुक असते लोकांना!) आंतरजातीय विवाह होणे देशाकरीता (किंवा हिंदू धर्माकरता)श्रेयस्कर नाही का? जातीत लग्न करून आपण आपला निवडसंच किती छोटा करतो!!

आणि आंतरजातीय मुली जितक्या विवाहतात तितकीच मुलेदेखिल, म्हणून जात जपायची देखिल झाली तरी कोणावर अन्याय होत नाही. आपल्या लेखात कितीतरी विरोधाभास आहेत. कदाचित आपण जिथे आहात त्या वर्तुळात अशी स्थिती असेल पण ही सार्वत्रिक स्थिती नाही.

सविता Wed, 08/01/2014 - 14:49

In reply to by उडन खटोला

च्यामारी आम्ही लग्नाळू होतो तेव्हा एकजात सगळी उपवर मुले माजोरडेपणा करायची!

परिस्थिती इतक्या वेगाने बदलली? की आम्हिच स्वतःला समजतो त्यपेक्षा जास्त म्हातारे झालो?

मन Wed, 08/01/2014 - 15:21

In reply to by सविता

माझे लग्न झाले तेव्हाच, फार फार पूर्वी, संस्कृतमध्ये सांगायचं तर "पुरा किल" काळातच परिस्थिती बदलली होती.
आता परिस्थिती किती हाताबाहेर गेली असेल कुणास ठाउक.
.
.
च्यामारी, लग्नाला "पुरा किल"(पुराच्या पुरा kill करुन घेणे) हा शब्द काय चपखल बस्तो ;)

अर्धवट Wed, 08/01/2014 - 11:26

उपाय आहे..

सर्व ब्राम्हण उपवर मुलांनी सामुदायीक जात्यांतर अथवा धर्मांतर करावे, म्हणजे त्या त्या जातीधर्मातल्या मुली मिळतील, आणी तरीही काही प्रश्न शिल्लक राहिलाच तर तो ब्राम्हण मुलांचा प्रश्न नक्कीच राहणार नाही. त्या त्या जातीधर्माचा प्रश्न बनेल. ;)

गवि Wed, 08/01/2014 - 11:31

In reply to by अर्धवट

सर्व ब्राम्हण उपवर मुलांनी सामुदायीक जात्यांतर अथवा धर्मांतर करावे,

अहो पण... नुसते जात्यांतर अथवा धर्मांतर करुन स्मार्टनेस नसण्याचा प्रश्न कसा सुटणार? आँ ?

ऋषिकेश Wed, 08/01/2014 - 11:42

In reply to by गवि

अहो जात्यांतर करणार (मग ते अचानक स्मार्ट होणार) आणि मग सुशिक्षित ब्राह्मण मुली (जातीबाहेर लग्न करू लागल्याने) त्यांच्याकडे आकृष्ट होणार! इतकं शिंपल लाजिक समजन नाय तुम्हा झंटलमन लोकान्ला!

अतिशहाणा Wed, 08/01/2014 - 23:40

In reply to by अर्धवट

हिंदू समाजात जात्यांतर शक्य आहे काय याबाबत शंका वाटते. मात्र धर्मांतराचा पर्याय उपलब्ध आहे.

'न'वी बाजू Thu, 09/01/2014 - 09:38

In reply to by अर्धवट

सर्व ब्राम्हण उपवर मुलांनी सामुदायीक जात्यांतर अथवा धर्मांतर करावे

"जात्यंतर म्हणजे राष्ट्रांतर" हा सावरकरसदृश (किंवा बंगालीबाबूसदृश) बाणा पाळायचा, की "जात्यंतर म्हणजे राष्ट्रांतर नव्हे" हा आंबेडकरसदृश बाणा पाळायचा, यावर सर्व अवलंबून आहे.

प्रश्नांकित उपवर मुले ही (बाय डेफिनिशन ऑफ द प्रॉब्लेम) ब्राह्मण असल्याकारणाने सावरकरमार्ग पत्करण्याची शक्यता अधिक वाटते. सबब, सोल्यूशन चालणार नाही.

=======================================================================================================

बंगालीत "जाति"/"जातीय" हे शब्द "राष्ट्र"/"राष्ट्रीय" या अर्थाने(सुद्धा) वापरले जातात. उदा. जातीय संसद भवन, हजरत शाहजलाल आंतरजातिक विमानबंदर वगैरे वगैरे. किंवा, 'जातीयतावाद' म्हणजे 'न्याशनालिझम', 'जातीयता' म्हणजे 'न्याशनालिटी', 'जातीय पार्टी' म्हणजे 'राष्ट्रीय पक्ष', अँड सो ऑन अँड सो फोर्थ.

ग्रेटथिंकर Thu, 09/01/2014 - 11:16

In reply to by 'न'वी बाजू

मी उपरोक्त निर्दीष्ट केलेले गुणविशेष जात्यांतर करुन ब्राह्मण तरुणांत प्रस्थापीत होणार असतील तरच जात्यंतराची पूर्ती केली जावी.

'न'वी बाजू Thu, 09/01/2014 - 11:27

In reply to by ग्रेटथिंकर

मुळात जात्यंतर करायला नेमके कोण बसलेय इथे?

'जात्यंतराची कल्पना कामी येणार नाही (कारण कोणीही करणार नाही)' हेच तर सांगतोय कधीचा.

बॅटमॅन Wed, 08/01/2014 - 11:50

ब्राह्मण मुलांमध्ये प्रेम करण्याचे गुण कमी असतात आणि या असत्य विधानाबद्दल आधी निषेध!!!!!!!!

बाकीचं पोष्टमॉर्टेम लोकांनी केलेलंच आहे पण ब्राह्मण मुलांना कमी स्मार्ट अन कमी प्रेमवर्दी ठरवून आपलीच आपण मारून घेण्याचे याइतके उत्तम उदाहरण क्वचित सापडावे =))

नंदन Wed, 08/01/2014 - 11:55

In reply to by मेघना भुस्कुटे

"माझा प्रवास : प्रेमवर्दी ते 'सुरा'वर्दी" अशा आधुनिक ब्राह्मणी देवदासाच्या आत्मचरित्राची मराठी साहित्याला वर्दी देण्याची वेळ आली म्हणायची!

विसुनाना Wed, 08/01/2014 - 12:23

In reply to by बॅटमॅन

बरेचसे ब्राह्मण पुरुष जे सुरावर्दी ('सुरा' वर्दी = सुरापान करणारे) नसतात ते स्मार्ट नसतात आणि स्मार्टनेस नसल्याने प्रेमवर्दीही नसतात असे निरीक्षण नोंदवतो. तेव्हा समस्त ब्राह्मण पुरुषांनो प्रथम सुरावर्दी व्हा.;)

बॅटमॅन Wed, 08/01/2014 - 12:24

In reply to by विसुनाना

सोमपानाची उज्ज्वल परंपरा पुढे चालवण्यास सांगताहात हे पाहून भडभडून आले.

तदुपरि, सुरावर्दीनेस = स्मार्टनेस हे समीकरण जातनिरपेक्ष आहे असे निरीक्षण नोंदवतो.

मी Wed, 08/01/2014 - 12:43

In reply to by बॅटमॅन

तदुपरि, सुरावर्दीनेस = स्मार्टनेस हे समीकरण जातनिरपेक्ष आहे असे निरीक्षण नोंदवतो.

मुलींना* अपेक्षीत* स्मार्टनेस* म्हणजे काय हेच मुळात कोडं असल्याने त्यावर भाष्य करण्याचे धाडस पाहून तुमच्या स्मार्टनेसचे कौतुक वाटते.

सुरावर्दीनेस = स्मार्टनेस

सुरासर्द झाल्यावर समस्त मुलांना स्वतः स्मार्ट असल्याचा साक्षात्कार होऊ लागतो ते हेच ते समप्रमाण काय?

*शब्दांच्यामधले वाचा

बॅटमॅन Wed, 08/01/2014 - 12:52

In reply to by मी

धन्यवाद ;)

स्मार्टनेसची व्याख्या काहीपण असो, पण सुरावर्दीपणा हा त्याचा पैलू असल्याचे कैक लोक सांगतात अन सांगणारे सर्व जातींचे लोक असल्याने तसे म्हणालो.

बाकी सुरासर्द हा शब्द काळजाला भिडला. तो स्मार्टनेस तर एक वेगळीच गोष्ट आहे ;)

फक्त लहानसा आक्षेप नोंदवता येईल की ते ब्रँडी की अजून काही पिऊन सर्दी पळते असे म्हंटात इ.इ. शेवटी सांगोवांगीच्याच कथा सर्व, तस्मात आमचे चुकले असणे अगदी शक्य आहे.

बाकी या व्याख्येअंतर्गत आम्ही स्मार्ट नसल्याचे आधीपासून माहिती आहेच =))

विसुनाना Wed, 08/01/2014 - 13:09

In reply to by बॅटमॅन

या व्याख्येअंतर्गत आम्ही स्मार्ट नसल्याचे >>> हा हंत हंत. तर्रीच तुमची विकेट अजून शाबूत आहे. ;)

बरेच अवांतर झाले... धाग्याचा खरडफळा होतोय... आता पुरे!

नंदन Wed, 08/01/2014 - 15:34

In reply to by बॅटमॅन

हम भी प्यासे हैं ये, साकी को बता भी न सके|
सामने जाम था और जाम उठा भी न सके|
काश हम गैरत-ए-सुरावर्द् के न मारे होते||

बॅटमॅन Wed, 08/01/2014 - 16:09

In reply to by नंदन

शुभं स्यात् ते सुरापानं, पुनराचमनाय च =))

पुनराचमनं बाकी जबराट आवडल्या गेले आहे. दुसर्‍या ओळीत वृत्तासाठी मद्यं ऐवजी "सुरां" टाकले की पर्फेक्ट होईल.

बाकी मेघना, असुर लोकही संस्कृतपंडित होते-उदा. रावण.

बॅटमॅन Wed, 08/01/2014 - 16:37

In reply to by मेघना भुस्कुटे

दारू पिण्याची विडंबिक काव्ये सोडून त्यात काही नाही. चार्वाकाच्या एका श्लोकाचं विडंबन आहे आणि बाकी जिलब्या आहेत.

'न'वी बाजू Wed, 08/01/2014 - 17:06

In reply to by बॅटमॅन

बाकी मेघना, असुर लोकही संस्कृतपंडित होते-उदा. रावण.

धाग्याचा विषय लक्षात घेता, हे वाक्य 'असुर लोकही ब्राह्मण होते - उदा. रावण' असेही लिहिता यावे, नाही काय? नाही म्हणजे, रावणाची जात 'लंकस्थ दशग्रंथी ब्राह्मण' की कायशीशी होती, असे ऐकून आहे. (चूभूद्याघ्या.)

(बाकी, रावणास ब्राह्मण असूनसुद्धा असला प्रॉब्लेम कधी आला नाही तो? बोले तो, मंदोदरी होतीच, प्लस वाटले तर सीतेससुद्धा पळवलीनीत. त्या आल्फा मेल की काय म्हणतात तसल्या टेण्डन्सीज़ ब्राह्मण समाजातील असूनही रावणात कुठून आल्या असाव्यात बरे?)

(अतिअवांतर: फाटक्या जीन्समधील रावणाचे चित्र डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय.)

बॅटमॅन Wed, 08/01/2014 - 17:17

In reply to by 'न'वी बाजू

लंकस्थ ब्राह्मणांचा उत्कर्ष उत्तरेकडील क्षत्रियांना बघवेना म्हणून त्यांनी कपटाने ब्राह्मणांचा काटा काढला. दक्षिणीयांवर जळायची ही उत्तरभारतीयांची खोड जुनीच आहे. क्षत्रिय लोकही ब्राह्मण व्हावे म्हणून आटापिटा करीत असत तेव्हा - उदा. विश्वामित्र, राजा हरित.महाभारतातील क्षत्रियांनाही ब्राह्मणांनी पुत्रलाभ करून दिला, वर आचार्य म्हणून चांगला माजही केला. परशुरामाने तर क्षत्रियसंहारच केला. पुढेही अनेक ब्रह्मक्षत्रियांनी बर्‍याच काड्या केलेल्या आहेत. काळापहाड नामक गृहस्थ हे कलाचंद रॉय नामक पूर्वाश्रमीचे ब्राह्मणच होते. अठराव्या शतकात तर या लूजर लोकांनी कोकणातून येऊन छत्रपतींचे राज्यच बळकावले. कसे काय झाले काय माहिती.

फाटक्या जीन्समध्ये रावण चांगला दिसू शकला असता. तशी जीन्स घालून काही हातांत पेप्सी व तत्सम-तद्भव शीतपेये, काहींमध्ये केयफशीच्या चिकन बकेटी, काहींमध्ये पिझ्झा तर काहींमध्ये मंदोदरी असे घेऊन निवांत "यो यो रावण सिंग" म्हणू शकला असता खास.

'न'वी बाजू Wed, 08/01/2014 - 17:23

In reply to by बॅटमॅन

काही हातांत पेप्सी व तत्सम-तद्भव शीतपेये, काहींमध्ये केयफशीच्या चिकन बकेटी, काहींमध्ये पिझ्झा तर काहींमध्ये मंदोदरी असे घेऊन...

१. रावणाला हात नेमके किती होते?

२. मंदोदरीला घ्यायला नेमके किती हात लागतात?

मेघना भुस्कुटे Wed, 08/01/2014 - 17:33

In reply to by अजो१२३

अहो, आपल्या भाषेतली ऑलमोस्ट सगळी क्रियापदे अनवस्था प्रसंग आणू शकण्याचे सामर्थ्य बाळगून आहेत. माणसानं काळजी तरी कुठे कुठे घ्यायची म्हणते मी? त्याहून आपलं म्हणणं ऐकणारे/वाचणारे लोक सभ्य असतील, अशी आशा करणं सोईचं जातं. हां, कधीकधी ही आशा धुळीला मिळते म्हणा, पण चालायचंच! ;-)

मेघना भुस्कुटे Wed, 08/01/2014 - 17:39

In reply to by मन

चक्. सभ्य लोक म्हणजे अनवस्था प्रसंग आणणारी क्रियापदे समजूनही लग्गेच 'तसले' अर्थ दाखवण्यास धावण्याचा मोह आवरणारे लोक.

अजो१२३ Wed, 08/01/2014 - 17:49

In reply to by मेघना भुस्कुटे

घ्या! पुन्हा तेच. अनवस्था प्रसंग!!! अनवस्था प्रसंगाबद्दल काही म्हणणे नाही हो. पण घेणे ही त्याही पलिकडची अवस्था आहे. तेव्हा नवी बाजूंनी नवी बाजू मांडण्यापूर्वी जूनी बाजू समजून घ्यावी नि मग कोणते क्रियापद घ्यायचे ते घ्यावे. जाऊ द्या, सभ्यतेच्या मर्यादा आहेत म्हणून गप्प बसतो.

मेघना भुस्कुटे Wed, 08/01/2014 - 17:57

In reply to by अजो१२३

'तसल्या' अर्थास अनवस्था प्रसंग का म्हणीन मी? एकदा सगळे अर्थ तिकडेच नेऊन भिडवायचे म्हटले की घेणे काय, देणे काय, झोपणे काय नि उठणे काय... हे असले अर्थ दृष्टिपथास आणून दिल्यानंतर जो उद्भवतो तो अनवस्था प्रसंग.

बॅटमॅन Wed, 08/01/2014 - 18:00

In reply to by 'न'वी बाजू

दाही दुनी वीस हात होते.

मंदोदरीस कवेत घ्यावयास गेलाबाजार दोनेक हात पुरेत असे वाटते. चूभू अर्थातच देणे घेणे.

अजो१२३ Wed, 08/01/2014 - 18:28

In reply to by बॅटमॅन

काय हो, हात डोक्यातून निघतात का दहा दोनी वीस करायला? खांद्याकडे दहा उगवायची जागा असते का? मानेवर दहा डोकी उगवायची जागा असते का? (अरे हां, म्यूटेशन झाले असेल. स्वारी विसरलो कि त्या काळीही उत्क्रांती चालूच होती.)

आणि मंदोदरीला दोन हातानी कवेत घेऊन बाकीच्या हातांचे काय इग्लू बनवायचे का तिच्याभोवती?

बॅटमॅन Wed, 08/01/2014 - 18:56

In reply to by 'न'वी बाजू

अहो ती रावणाची चॉइस आहे. मंदोदरीला कवेत घेऊन वेटलिफ्टिंग करेल नैतर इग्लू बांधेल, आपण विचारणारे कोण नै का.

'न'वी बाजू Wed, 08/01/2014 - 19:02

In reply to by बॅटमॅन

म्हणजे, रावण उत्तर ध्रुवावर जरी गेला आणि तिथे उंटावर जरी बसला आणि तिथून शर्ट काढून त्याने शेळ्या जरी हाकल्या, तरी आपल्याला त्याबद्दल आक्षेप असण्याचे काही कारण असू नये. खरे आहे.

बाकी, उत्तर ध्रुवावर उंट आणि शेळ्या यूपीएसने पाठवायच्या, की फेडेक्सने, आणि तिथे शर्ट काढून न्यूमोनियाने मरायचे, की फ्रॉस्टबाइटने, हीदेखील रावणाची खाजगीच बाब आहे.

बॅटमॅन Wed, 08/01/2014 - 19:04

In reply to by 'न'वी बाजू

बाकी, उत्तर ध्रुवावर उंट आणि शेळ्या यूपीएसने पाठवायच्या, की फेडेक्सने, आणि तिथे शर्ट काढून न्यूमोनियाने मरायचे, की फ्रॉस्टबाइटने, हीदेखील रावणाची खाजगीच बाब आहे.

काय राव तुम्ही!!! पुष्पक विमान विसरलात वाट्टं? रामाने चोरण्याअगोदर ते रावणाने कुबेराकडून चोरले होते.

शिवाय थंडीसाठी काही मंत्रतंत्र तर असणारच त्याच्याकडे. रावणाला काय मोठी गोष्ट नै ती.

अजो१२३ Wed, 08/01/2014 - 19:09

In reply to by 'न'वी बाजू

पुन्हा तुम्ही काही बाही लिहिताय-
१. रावण उत्तर ध्रुवावर जाणे (रावणाच्या आईचं चरित्रहनन)
२. ऊंटावर बसणे
३. शर्ट काढून शेळ्या हाकणे
४. फेडेक्सच्या पाकिटात उंट आणि शेळ्या
५. खाजगी बाब.

असो. मी कोण तुम्हाला सुधारणारा?

बॅटमॅन Wed, 08/01/2014 - 19:11

In reply to by अजो१२३

रावण उत्तर ध्रुवावर गेला तर ते त्याच्या आईचं चारित्र्यहनन कसं काय होईल बुवा???

विसुनाना Wed, 08/01/2014 - 18:26

In reply to by 'न'वी बाजू

रावण ब्राह्मण असला तरी शैव असल्याने दहाही तोंडांनी सुरापान (=दशासुर) करीत असे. त्यामु़ळे तो अर्थातच दसपट स्मार्ट होता.

आणि राम हा वैष्णव क्षत्रिय असल्याने सुरापान करत असे व पर्यायाने तोही स्मार्ट होता. ;)

'न'वी बाजू Wed, 08/01/2014 - 18:46

In reply to by विसुनाना

दहाही तोंडांनी सुरापान (=दशासुर)

दाही तोंडांनी सुरा प्यायचा म्हणून दशासुर, की दशा होईपर्यंत सुरा प्यायचा म्हणून?

नंदन Wed, 08/01/2014 - 12:34

In reply to by विसुनाना

तेव्हा समस्त ब्राह्मण पुरुषांनो प्रथम सुरावर्दी व्हा.(डोळा मारत)

सल्ल्याशी सहमत आहे. बाकी असा प्रौढ अविवाहित Old Monk च्या बाटलीकडे "शिंच्यांना सगळी नावं सोडून हेच नाव द्यायचं सुचलं होतं!" अशा हतबुद्ध नजरेने पाहत बारमध्ये बसला आहे; असं एक चित्र डोळ्यासमोर तरळून गेलं. कारुण्यातून निर्माण होणारा विनोद म्हणतात, तो हाच असावा बहुतेक ;)

'न'वी बाजू Wed, 08/01/2014 - 11:52

In reply to by बॅटमॅन

आपलीच आपण मारून घेण्याचे याइतके उत्तम उदाहरण...

जौद्याहो... खरे प्रेम करणे यासाठी जे आवश्यक गुण लागतात, ते उपजतच कमी असल्यावर ते तरी काय करतील बिचारे... समजून घ्याना!

नंदन Wed, 08/01/2014 - 11:59

In reply to by 'न'वी बाजू

जौद्याहो... खरे प्रेम करणे यासाठी जे आवश्यक गुण लागतात, ते उपजतच कमी असल्यावर ते तरी काय करतील बिचारे... समजून घ्याना!

शेवटी आम्ही असेच ;)

आबा Wed, 08/01/2014 - 18:57

In reply to by बॅटमॅन

"आपलीच आपण मारून घेण्याचे याइतके उत्तम उदाहरण क्वचित सापडावे"
तसं नाहीये ते वेनभौ...
तुम्ही रडल्यासारखं करा आम्ही मारल्यासारखं करतो असा प्रकार आहे...
खाली आलेल्या "ग्रेट", संतुलीत (इत्यादी) प्रतीक्रियेवरून कळतंय..
शिवाय, तक्रारकर्त्यानेही तक्रारकरत्याचा गेटअप तारांबळ करीत करीत सांभाळलाय (एकाच धाग्यात "सु" पुढे प्रश्नचिन्ह आणि लगेच पोरांचा श्यामळूपणा काढलाय पहा)
असो
ऐसीच्या एन.एस.ए. ला पक्के सांगता येईलच... :)

पण, तूर्तास तूम्ही फॉक्सला विचारून पहा :)

बॅटमॅन Wed, 08/01/2014 - 19:00

In reply to by आबा

अर्थातच. तसंही आहे पण असे वाक्य घालून रास अल घुलीन कॉज हँपर होतेय हे त्यांना कसं काय काँप्रिहेंडवत नाही कुणास ठौक.

बाकी लुसलुशीत कोल्ह्याला विचारतोच ;)

आबा Wed, 08/01/2014 - 19:05

In reply to by बॅटमॅन

कोणताही विशिष्ठ कॉज न कॉम्प्रिहेण्डवणे म्हणजे जोकरीयन कॉज कॉम्प्रीहेण्ड्वणे
जाउदे, गंडल च्यायचं...

नंदन Wed, 08/01/2014 - 11:52

सु(?)शिक्षित ब्राह्मण तरुणी या जातीपाती चा विचार न करता सर्रास आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह करत आहेत.

कंसातले प्रश्नचिन्ह मला अंमळ हळवे करून गेले. डोळे पाणावले आणि दृष्टी अंधुकावली.

व संस्कारांच्या ओझ्याने वाकलेल्या ब्राह्मण तरुणांना लग्नाला मुली मिळत नसल्याने अविवाहित प्रौढ तरुणांची संख्या वाढत चालली आहे।

उत्तमच की. असेच आजचे हे विनापाश, संस्कारी तरूण उद्या राष्ट्रउभारणीच्या महन्मंगल, विशाल वटवृक्षाच्या शाखा बनतील!
[सायंकाळी एके मेळी, 'द्विज'गण अवघे वृक्षी!!]. राष्ट्राच्या कल्याणा, सं.ओ.वा.ब्रा.तरुणांच्या विभूती!!!

त्यात या तरुणांनी आंतरजातीय विवाह करायचे ठरवले तर मुली ना अपेक्षित असणारा स्मार्टनेस ब्राह्मण मुलात आढळत नाही . याचे कारण काय असावे ?

हम्म, समस्या आहे खरी. प्रदोष(!) शाखेत स्मार्त सूत्रांबरोबर आता स्मार्ट सूत्रेही शिकवायची घटका जवळ येऊन ठेपलेली दिसते :)

ग्रेटथिंकर Wed, 08/01/2014 - 14:38

In reply to by नंदन

ब्रह्मकुलोत्तपन्न मुली आंतरजातीय विवाह करतात याचे कारण त्यांना इतर जातीतल्या मुलांचा रफनेस ,बेदरकारवृत्ती ,अल्फा मेल टेंडन्सी,आवडते.
ढापण लावून इंटीग्रेशन आणि डेरीवेटीव्हची गणित सोडवण्याने, पुचाट वॅगनार,पॅशन घेऊन मायलेज काढत बसण्याने ,न फाटलेली जीन्स घालण्याने, सतत हगवण लागल्यासारखा चेहरा करुन फिरल्याने पोरी पटत नसतात याची उपवर तरुणांनी नोंद घ्यावी...

बॅटमॅन Wed, 08/01/2014 - 15:13

In reply to by ग्रेटथिंकर

=))

जळजळ जळजळ ती किती असावी =))

मागे ऐसीवरच कुणीतरी म्हटले होते तसे, इंटररेशिअल कथांमध्ये गोरी स्त्री काळ्या पुरुषांतील उपरोल्लेखित गुणांवर इतकी आकृष्ट होते की त्यावर स्वतःला झोकून देते अशा प्रकारची वर्णने असतात. त्याचप्रमाणे ग्रेटथिंकर यांच्या फ्यांटसीतील कथांमध्येही अशीच वर्णने असावीत. स्वतःच्या दैन्यावस्थेवर मात करायचा हा फ्यांटसी मार्ग बाकी असतो रोचक-आणि तितकाच केविलवाणा.

फारएण्ड Thu, 09/01/2014 - 13:16

In reply to by ग्रेटथिंकर

इतर जातीतल्या मुलांचा रफनेस ,बेदरकारवृत्ती ,अल्फा मेल टेंडन्सी,आवडते.>>> खेडेकरांच्या जगद्विख्यात अभ्यासपूर्ण ग्रंथाचा दाखला आहे का हा? नाहीतर एकाच जातीचे लोक कसे असतात किंवा नसतात याबद्दल इतके ठाम विधान म्हणजे प्रचंड समाजशास्त्रीय अभ्यास असला पाहिजे त्याकरिता :)

कारण ब्राह्मण मुली फिरताना डॅशिंग पोरांबरोबर फिरतात पण लग्न करताना बरोबर हजबंड-मटेरियल (रीडः ब्राह्मण) पकडतात असाही एक प्रचंड ठाम समाजशास्त्रीय अभ्यास ऐकलेला आहे. नक्की कोणता खरा?

एकूण माझ्या ओळखीत जे ब्राह्मण-ब्राह्मण, ब्राह्मण मुलगा-अब्राह्मण मुलगी वा उलटे असे प्रेमविवाह झाले आहेत त्या सर्वांनी फारच मोठ्या तडजोडी केलेल्या दिसतात.

जोक्स अपार्टः मुलांना "स्थळे" सहज मिळत नाहीत हे अ‍ॅनेक्डोटल पुराव्यावरून खरे असावे. पण त्याची कारणे इतकी अफाट नसावीत. कदाचित गेली २-३ वर्षे लग्नाच्या वयात असलेल्या मुलींच्या संख्या कमी झाली असेल (जन्मदरातील व्हेरिएशन). कदाचित ब्राह्मण समाजात आयटी, मल्टिनॅशनल, बीपीओ मधे नोकर्‍या करणार्‍यांचे प्रमाण जास्त असू शकेल व त्यामुळे या नोकर्‍यांत नसलेल्या मुलांना तुलनेने अवघड जात असेल. कदाचित सासर कसे असावे याबद्दल मुलींना असलेला चॉइस (घरात माणसे किती, स्वतःचे घर आहे का ई. हे प्रश्न विचारणे आजकाल खूप कॉमन आहे. मला त्यात काही चूक वाटत नाही), नावडते स्थळ नाकारण्याचा नकाराधिकार हे ही असू शकेल. हे सगळे केवळ अंदाज. यातील कोणतेही ठाम विधान नाही :)

आदूबाळ Thu, 09/01/2014 - 16:58

In reply to by फारएण्ड

हा "खेडेकरांच्या जगद्विख्यात अभ्यासपूर्ण ग्रंथ" पीडीएफमध्ये आहे का हो? कुठून उतरवून घेता येईल का?

मेघना भुस्कुटे Wed, 08/01/2014 - 12:55

प्रेमवर्दी > सुरावर्दी > सुरासर्द > अंधुकावणे > स्मार्ट सूत्रे....

लोकहो, माझ्याकडून एक बांगड्या खळखळवणारा घरंदाज नमस्कार घ्या...

अंतराआनंद Wed, 08/01/2014 - 14:32

जाउ द्या हो. ते घरकाम करणार्‍या पुरुषांवर विनोद नसतात का . उदा. ’माझी बायको मला फार घाबरते . तिने पाणी गरम करून दिल्याशिवाय मी भांडी घासतच नाही मुळी. ’ वगैरे. त्यासारखा हा अतिशयोक्ती असलेला विनोद आहे. तो समजण्याचा ’स्मार्टनेस ’ आपल्याकडे नाही एवढंच.
बाकी
जात जपणे इतके आवश्यक आहे का? इतर जातीच्या कोणत्याही मुलींस आवडणार नाहीत अशी ब्राह्मण मुले आहेत असे जे आपण म्हणत आहात त्यात अर्थ नाही. कोणीही कोणासही आवडू शकते. उलट ब्राह्मण मुले सहज स्वीकारली जातील म्हणून त्यांना अ‍ॅडव्हांटेज आहे. (तेच मुलींना देखिल आहे. बामनाची पोर सुन झाली म्हणून कोण कौतुक असते लोकांना!) आंतरजातीय विवाह होणे देशाकरीता (किंवा हिंदू धर्माकरता)श्रेयस्कर नाही का? जातीत लग्न करून आपण आपला निवडसंच किती छोटा करतो!!
हा प्रामाणिक प्रतिसाद आवडला.

अतिशहाणा Wed, 08/01/2014 - 23:35

In reply to by आदूबाळ

मी उपवधू मुलगे असे कुठेच वाचले नाही. लग्नाच्या वयाची मुले किंवा मुली हे दोघेही उपवरच असतात.

मोल्सवर्थमधील अर्थ
उपवर (p. 100) [ upavara ] a Of marriageable age or a little beyond it, and yet unmarried--a boy or girl, and esp. a girl.

http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%89%E0%A4…

अतिशहाणा Thu, 09/01/2014 - 00:01

In reply to by बॅटमॅन

Its a long shot guess पण कदाचित केवळ मुलींसाठीच हा उल्लेख असण्याचे कारण मासिकधर्माची सुरुवात व त्या अनुषंगाने (लग्नाच्या) वयात येणे (i.e.उपवर) वगैरे घटना मुलींच्या बाबत ठळकपणाने लक्षात येते. त्यामानाने मुलांच्या आयुष्यात वयात येण्याची घटना (i.e.उपवर) इतक्या ठळक मानली जात नसावी.

अतिशहाणा Thu, 09/01/2014 - 00:12

In reply to by बॅटमॅन

शिवाय 'उपवर'मधील 'वर' हा 'नवऱ्या'शी संबंधित1 नसून 'वरणे' (लग्ना)शी संबंधित (उपवर = वरण्याची जबाबदारी स्वीकारण्यास योग्य तो/ती ) आहे हे लक्षात घेतले तर उपवधू हा शब्द निरर्थक2 आहे हे लक्षात यावे.

1. संबंध नवऱ्या/नवरीशीच असला आणि वर हा शब्द वरणे मधून आला असलातरी 'उपवर'ची उत्पत्ती दाखवण्यासाठी हा संबंध नाही असे तात्पुरते मानावे लागत आहे.
2. अधिक विचार केला असता उपवधू हा शब्द तितकासा निरर्थक वाटत नाही हे खरेच आहे.

अर्थ Wed, 08/01/2014 - 17:56

च्यायल, कालेजात (म्हंजे होस्टेलवाल्यानमध्ये)लोकलाइट नावाने कुप्रसिध्द असणाऱ्या, पोरी घेऊन फिरणाऱ्या पुणेरी बामण पोरांना लग्नाला अडचणी यायला लागल्या तर…

बॅटमॅन Wed, 08/01/2014 - 18:04

In reply to by अर्थ

धागा समस्त अँड्रो-ब्राह्मणांबद्दल आहे असे वाटते पण या प्रतिसादातून त्यातले मर्म उलगडले.

(नॉनपुणेकर असल्याने आनंदलेला) बट्टमण्णाचार्य.

बॅटमॅन Wed, 08/01/2014 - 18:11

In reply to by अर्थ

यो यो ज्येष्ठमध यू मीन =)) पण पुणेकरांना प्राब्ळम आहे म्हणालात म्हणून तर नॉनपुणेरी क्रिडेन्शिअल्सवर खूष आहोत ;)

Nile Wed, 08/01/2014 - 21:48

In reply to by बॅटमॅन

तुम्ही आता झालात की आता पुणेकर...

आणि प्रौढ ही आणि ब्राह्मणही*, तेव्हा हा धागा तुमच्याकरतांच! (इथे इच्छुकांनी, तुझे आहे तुजपाशी मधील 'अतिविशाल महिला मंडळाचे' "तुमच्याकरतांच" आठवावे!)

*सदर माहिती धाग्यातूनच. आम्ही (कोणाही करता) प्रौढ ब्राह्मण मुले 'पाहत' नाही आहोत.

बॅटमॅन Wed, 08/01/2014 - 22:01

In reply to by Nile

सर्वद्वेष्टे म्हणून गाजलेल्या निळोबांची आमच्याप्रतीची ही आत्मीयता पाहून अष्टदवणीय भाव जागृत झाले.

निळोबाला उगीच चिडवणारे बाकीचे (हल्कत) लोकहो, प्वाइंट टु बी नोटेड आहे हा, काय समजलेत!

Nile Thu, 09/01/2014 - 00:54

In reply to by बॅटमॅन

आमच्याप्रतीची ही आत्मीयता पाहून अष्टदवणीय भाव जागृत झाले.

चूकून आमच्याप्रितीची ही आत्मियता असे वाचले! असो. असो.

शेवटी काय, प्रौढ ब्राह्मणीपणाचा प्रॉब्लेम आहे.

तिरशिंगराव Wed, 08/01/2014 - 18:07

आत्ता लक्षांत आलं. आमच्यावेळीही कॉलेजच्या दारात डोळ्यांवर गॉगल, केसांचा कोंबडा, कमरेला जाड पट्टा,अशा वेषात उभं राहिलं तरी सुशिक्षणकांक्षिणी मुलींना आमचा बावळटपणा आणि संस्कारांचे ओझे जाणवत असावे. म्हणूनच कोणी ढुंकूनही बघितलं नाही.
लग्न झालं हेच नशीब समजायचं!

मन Wed, 08/01/2014 - 18:11

In reply to by तिरशिंगराव

"नशीब " नाही; "प्राक्तन" म्हणतात ह्या context मध्ये त्याला.
त्याची कशी कशी भारदस्त पण शोकात्म छटा दिसते पहा.
पाश्चात्त्य ट्राजेडिचे नायक कसे "destiny " शब्द वापरतात त्या स्टाइलवर.

बॅटमॅन Wed, 08/01/2014 - 18:14

In reply to by मन

ट्रॅजेडी हा शब्दच मुळात विनोदी आहे.

प्राचीन अथेन्समध्ये नाटकांच्या स्पर्धा व्हायच्या त्यात बक्षीस म्हणून "ट्रॅगॉस" ऊर्फ बोकड भेट दिला जायचा त्यावरून हा शब्द आलेला आहे.

शाहिर Wed, 08/01/2014 - 18:40

भिकरचोट मते आहेत तुमची ..

असली बुळी मते मांडताना आणि जनरलायझेशन करताना , बौद्ध - मांग काळी असतात ... मुस्लिम दाढीवाले आणि वास मारणारे असतात आणि मराठा अशिक्षित आणि माजोरडे , हिंस्त्र असतात .. असेही लिहायचे ना !

गोरी गोमटी पोरा दिसली की त्यांना स्मार्ट नही म्हणायचा

अपेक्षित असणारा स्मार्टनेस ब्राह्मण मुलात आढळत नाही . याचे कारण काय असावे ?
>> कारण आया बहीणी असतात आणि त्यंची किंमत ठेवणे कळते .. त्या ग्रेट थि़ंकर म्हणाला तशी रफ पोरा बाहेर पोरी फिरवतात आणि स्वतःच्या बहीणी कुठे फिरत असतात तिकडे लक्षच नसते !!

>>प्रेम , मैत्री करणे व निभावणे , प्रेमात झोकून देणे किंबहुना खरे प्रेम करणे यासाठी जे आवश्यक गुण लागतात , ते अशा मुलामध्ये उपजतच कमी असतात

असला वाय्झेड शोध कुठून लावलात ?

तुमच्या सर्कल मधली पोर असतील तशी ! पण सर्वान एकाच तागड्यात तोलू नका .. आणि तुमचा लग्न होत नसेल तर खुशाल आंतर जातीय , आंतर धर्मीय किंवा आंतर लैंगिक जे जमल तसा करा .. फुकट कोणत्याही जातीला बदनाम करु नका

बॅटमॅन Wed, 08/01/2014 - 19:02

बाकी "ब्राह्मण आणि त्यांचे क्षयझ" हा चिरकालीन हिट्ट टॉपिक असल्याचे पुनरेकवार सिद्ध झाले.

"असून असून असणार कोण? साडेतीन टक्केवाल्यांशिवाय आहेच कोण?"

तरी सेंच्युरी मारून धाग्यास बूच मारणेचे करावे ही इणंती.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/01/2014 - 19:30

मागे फेसबुकावर (असं काहीसं) वाचलं होतं:

मैत्रिणी एकमेकींना आपला भाऊ दाखवतात आणि काही जुळवण्याचा प्रयत्न करतात. मित्राने आपल्या बहिणीकडे वाकड्या नजरेने बघू नये म्हणून मुलगे प्रयत्नांची पराकाष्ठा करतात.

त्या पोस्टचा मतितार्थ मुली कसा संस्कृतिभंजक असतात आणि पोरं कशी सभ्य, असा होता. पण आपण आपापल्या कुवतीनुसार लावून टाकू.

साती Wed, 08/01/2014 - 20:49

अदितीबाई, 'वेळात वेळ काढून' वालं फ्लेक्स करायला घ्या.
होऊद्या खर्च! लग्नं आहे ब्राह्मणाघरचं.

प्रकाश घाटपांडे Thu, 09/01/2014 - 09:17

ब्राह्मन समाजातील उपवर मुलांचा प्रष्ण सोडवन्यासाठी त्यांनी जात्यंतर करावे.मंग त्यांची लग्न आपसूक होतीन.

नंदन Thu, 09/01/2014 - 10:17

एकंदर चर्चा वाचून अलीकडेच पाहिलेला हा ट्रेलर आठवला. चर्चा आणि पिक्चर या दोहोंचेही कथानक आणि चपखल शीर्षक यांच्यातला अभेद रोचक आहे :)