दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१९ एप्रिल
जन्मदिवस : पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक ताराबाई मोडक (१८९२), उद्योगपती पीटर दी नरोन्हा (१८९७), युरेनियमपेक्षा जड १० मूलद्रव्यांचा शोध लावणारा नोबेलविजेता ग्लेन सीबोर्ग (१९१२), गायिका मालती पांडे-बर्वे (१९३०), क्रिकेटपंच डिकी बर्ड (१९३३), अभिनेता अर्शद वारसी (१९६८), टेनिसखेळाडू मारिया शारापोव्हा (१९८७)
मृत्युदिवस : रोमँटिक कवी लॉर्ड बायरन (१८२४), उत्क्रांतिसिद्धांताचा जनक, जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन (१८९२), क्यूरी परिणाम आणि रेडीयमवर संशोधन करणारा नोबेलविजेता पिएर क्यूरी (१९०६), क्रांतिकारक अनंत कान्हेरे कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे (१९१०), पर्यावरणवादी, लेखक जिम कॉर्बेट (१९५५), लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर (२००८), वृत्तपत्रउद्योजक सिवंती आदीतन (२०१३), अॅनिमेशनपट आणि चित्रपटदिग्दर्शक भीमसेन (२०१८), सिनेदिग्दर्शिका सुमित्रा भावे (२०२१)
---
सायकल दिन
UN मँडरीन भाषा दिवस.
१५३६ : बाबरने दिल्लीच्या इब्राहिमखान लोदीचा पराभव करुन मोगल साम्राज्य स्थापन केले.
१८३९ : १८३९चा लंडनचा तह - बेल्जियम स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात.
१९१० : क्रांतिकारक अनंत कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे यांना ठाणे कारागृहात फाशी.
१९१९ : अमेरिकेच्या लेस्ली अर्विनने सर्वप्रथम पॅराशूटच्या सहाय्याने विमानातून उडी मारली.
१९२७ : मे वेस्ट या अमेरिकन अभिनेत्रीला 'सेक्स' नाटकातल्या बीभत्सपणासाठी दहा दिवसांचा कारावास.
१९७१ : पहिले स्पेस स्टेशन 'सॅल्यूट-१' अवकाशात.
१९७५ : 'आर्यभट्ट' हा भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह रश्याच्या साहाय्याने अवकाशात सोडला गेला.
१९८७ : 'द सिंप्सन्स' मालिकेची मर्यादित सुरूवात.
२०११ : ४५ वर्षांनंतर क्यूबाच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीमधून फिडेल कॅस्ट्रोचा राजीनामा.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- गलिव्हर
प्रतिक्रिया
मस्त लेखन गवि. एकदम त्या
मस्त लेखन गवि. एकदम त्या क्षणी तिथे आहोत असे वाटले.
खरच, आपण खूप गोष्टी चालवून घेत असतो. "चलता है" ज्या दिवशी आपल्या आयुष्यातून कमी होईल तो सुदिन.
+१
गवि, इतर ललित लिखाणाबरोबर हे लिखाणही येऊ द्या. एयर-क्रॅश प्रकारातल्या डॉक्यूमेंटरी बघण्याएवढा आनंद(?) तुमचे लेख वाचून मिळतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पर्सनल टच
प्रसंगाशी असलेला तुमचा वैयक्तिक अनुभव जास्त प्रभाव पाडून गेला. (विमानाच्या अपघांतांबद्दल अगोदरच असलेल्या तांत्रिक माहितीमुळे असेल कदाचित)
-Nile
मस्त लेख
मस्त लेख. साध्यासुध्या शब्दांत त्या भयंकर घटनेचं वर्णन केलेलं आहे.
अपघात किंवा दुर्घटना झाल्यानंतर लगेचच भावनांचा कल्लोळ उठतो. त्या गदारोळात नक्की काय झालं हे तपासून पहाण्यापेक्षा असं व्हायला नको या तिडीकीपोटी कोणावर तरी ठपका ठेवण्याचा प्रयत्न होतो. ९११ नंतर वल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती पुरेशा मजबूत होत्या का असा प्रश्न उठला. सर्वच इमारती विमानाचा धक्का सहन करण्याइतक्या मजबूत कराव्यात अशीही मागणी भावनेच्या भरात झाली होती. अर्थातच ते करणं शक्य नाही हे उघड झालंच.
कुठचीही व्यवस्था परिपूर्ण नसते. सुरक्षिततेसाठी थोडी माया ठेवलेली असते, पण वजन इतकं वाढल्यावर धागे उसवतातच.
मी
औरंगाबाद मध्ये पाऊल ठेवण्याच्या एक वर्षे आधीची ही घटना.. नंतर तो रस्ता बंद करुन लांबचा बायपास सुरु ठेवला व अंबाजोगाई एस टी चे भाडे २ रुपये वाढले... ( विद्यार्थी दशेत मोठी चाट होती खिशाला :).. ट्रक आणि विमान अपघात कसा झाला असेल हे पटण्या पलिकडे होते... नंतर बरेच दिवस पोलिस केस आणि तपास वाचत होतो... औरंगाबाद च्या आठवणी जाग्या केल्याबद्द्ल धन्यवाद...
२ टन वजन म्हणजे खरोखरच जास्त
२ टन वजन म्हणजे खरोखरच जास्त होतं. निष्काळजीपणा भोवला सगळ्यांना.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
बापरे!! ५२ लोकं जळुन, होरपळुन
बापरे!! ५२ लोकं जळुन, होरपळुन मेले!! भयंकर!!
दोन टन एवढं जास्त वजन आहे हे पायलटला समजलं नाही का? म्हणजे पायलटला कुठे दिसत नाही का की आपण कीती वजन उचलतोय ते?
जे कोणी सामान भरण्याचा मुख्य होतं त्यांना " चालतंय, विमानाला एवढं सामान म्हणजे कैच नै!! भरा रे!! उरकुन टाका" अशा प्रकारे काम करावंसं वाटलं त्याअर्थी त्यांना त्याविभागाचं ज्ञान नसताना काम दिलं होतं जे संवेदनशील काम आहे अन लोकांचे प्राण जाउ शकतात..
असो..होउन गेलं पण आतातरी लोकं नेमुन दिल्याप्रमाणे कामं करंत असतात का? का भ्रष्टाचार आहेच...(काय तरी प्रश्न विचारलाय मी!! :-S) :sick:
http://shilpasview.blogspot.com
चांगलं आहे रे. अजून येऊंद्या.
चांगलं आहे रे. अजून येऊंद्या.
तुमची गप्पा मारल्यासारखे लिहिण्याची शैली मस्त असते.
ते वांद्रे समुद्रकिनारा इथे का नाही आलं?
तुमचा एअरक्रॅश चा मागचा भाग
तुमचा एअरक्रॅश चा मागचा भाग वाचत असताना या सिरिज मधे औरंगाबाद येईल अशी अपेक्षा होतीच...
या अपघाताचा उल्लेख औरंगाबादमधे आजही अधुन मधुन एकायला मिळतो.
या अपघातानंतर अपघाताच्या कारणांबद्दल अनेक वावड्या उठल्या होत्या. त्यातली एक म्हणजे पायलट आणि को-पायलट यांचात असणारे अफेअर.
आज या बद्दलची अधिक माहिती मिळवत असताना संसदेच्या साईट वर चर्चेची एक लिंक मिळाली
http://parliamentofindia.nic.in/ls/lsdeb/ls10/ses6/13270493.htm
वाचनीय लेख... वैयक्तिक
वाचनीय लेख... वैयक्तिक अनुभवाची पार्श्वभूमी छान कथन केली आहे...
याच अपघातात विडिओकॉनचे उद्योगपती सीनियर "धूत" वारले हे ऐकले होते...
निष्काळजीपणाने झालेला भयंकर अपघात...