Skip to main content

मनातील छोटे मोठे प्रश्न -भाग ४१

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
======
"भटक्या कुत्र्यांना मारु नये " अशी भूमिका का घेतली जाते ? त्यात फक्त "असे करणे क्रूरपणाचे आहे" अशा छापाचा भूतदयावादी दृष्टीकोन असतो की इतरही काही तर्क्/भूमिका त्यामागे आहेत ? "भटक्या कुत्र्यांना मारणे वाईट " वगैरे विचार असेल तर तो अगदिच चमत्कारिक आहे. खाटिकखान्यात कापल्या जाणार्‍या बोकड आदि प्राण्यांबद्दल भूतदया नसेल तर ह्याच प्राण्याबद्दल भूतदया का दाखवावी ? खाटिकखान्यातले प्राणी अन्न म्हणून पूर्वापार चालत आले आहेत; पण कुत्रे काही भारतभरात सर्वत्रच सर्रास खाल्ले जात नाहित; कुत्रेपालन हा काही शेळीपालन, क्कुक्कुटपालन च्या स्टायलितला उद्योग नाही; ही भूमिकाही उचित वाटत नाही. कारण अन्न म्हणून उपयोग नसला, तरी मानवी अस्तित्वास संभाव्य धोका हा भटक्या कुत्र्यांपासून आहेच की. आणि आज जे प्राणी केवळ जंगलात सापडतात; त्यांना आपण आपल्या वस्तीतून केवळ "मानवी अस्तित्वास संभाव्य धोका" ह्याच कारणाने हुसकावलेलं आहे; संपवलेलं आहे. मग भटक्या कुत्र्यांना मारायचं का नाही ?
"कुत्र्यांचं निर्बिजीकरण करुनही संख्या आटोक्यात ठेवता येते. आपण तेच करुयात" असलं काहीतरी 'पेटा' वाले आग्रहाने सांगतात. पण तोच माझा प्रश्न आहे.
निर्बिजीकरण करायचं कशासाठी ? मारुन का टाकायचं नाही ? एक कुत्रा मरणे म्हणजेच प्रत्यक्षात त्याचं निर्बिजीकरण केलं असण्याचा इफेक्ट मिळवणे नव्हे का ?
one dog dead, is one dog made sterile ह्या तर्कात काही चूक आहे का ?
की मग कुत्री मारणं हे कुत्र्यांचं निर्बिजीकरण करण्यापेक्षा अंमलबजावणीमध्ये अवघड आहे ?
नेमका झोल काय आहे ?
.
.
अवांतर :- भूतदयेचच कारण असेल तर ते अत्यंत हास्यास्पद वाटतं. संपर्कात आलेल्या काही मांसाहारीन्बद्दलतरी संधी मिळाल्यास हे मानवाचं मांस आनंदानं मिटक्या मारत खातील; असं वाटलं. हे असं एखाद्याला वाटायला लावण्याइतपत मांसाहारभक्षण चालत असेल; तर कुत्री मारण्यात वाईट वगैरे का वातून घ्यावं तेजायला ?

नितिन थत्ते Sat, 04/04/2015 - 23:32

सिनिकल मोड ऑन....

स्टरिलायझेशन करण्यासाठी पालिकेकडे पुरेशी यंत्रणा नसल्याने के काम पुन्हा (त्याच्या अर्थसहाय्यासह) पेटा सदृश एनजीओजना मिळते.

सिनिकल मोड ऑफ.

अंतराआनंद Sun, 05/04/2015 - 17:37

पेटाची भूतदया ही विक्षिप्तपणाची आहे असं बरेचदा आढळतं त्याचा तुमच्या आमच्या समस्यांशी काही संबध नसतो.
भटके कुत्रे हा बर्‍याच जणांचा दयेचा विषय आहेच. तो का हे खरोखर कळत नाही. सध्या वेगवेगळ्या बातम्यांमुळे हा विषय परत ऐरणीवर आलाय.

ऋषिकेश Mon, 06/04/2015 - 09:24

कुत्रे जर तुम्हाला खायचे नाहीत, इतरही काही उपयोग नाहीत तर का मारावेत? असा दृष्टिकोन असेल.
वाघांनाही मारू नये असाही अनेकांचा आग्रह असतो (आणि गायीला तर खाऊही नये असाही)

adam Mon, 06/04/2015 - 09:54

In reply to by ऋषिकेश

मी मूळ शंका विचारली आहे; त्यातील पुढील दोन ओळी ह्यासंदर्भातच आहेत :-

कारण अन्न म्हणून उपयोग नसला, तरी मानवी अस्तित्वास संभाव्य धोका हा भटक्या कुत्र्यांपासून आहेच की. आणि आज जे प्राणी केवळ जंगलात सापडतात; त्यांना आपण आपल्या वस्तीतून केवळ "मानवी अस्तित्वास संभाव्य धोका" ह्याच कारणाने हुसकावलेलं आहे; संपवलेलं आहे. मग भटक्या कुत्र्यांना मारायचं का नाही ?

ऋषिकेश Mon, 06/04/2015 - 10:02

In reply to by adam

मानवी अस्तित्वास संभाव्य धोका हा भटक्या कुत्र्यांपासून आहेच की.

'संभाव्य' धोकाच म्हणायचे तर तो कोणत्या अन्य भटक्या प्राण्यापासून नाही?
भटक्या गायींमुळे कित्येकदा वाहनांना अपघात होतात, ट्रॅफिक जाम होते. शिवाय त्या वेड्या झाल्या, चालून गेल्या तर जीवही जातात.
भटकी डुकरे कधीही हल्ला करतात. आता मुधोळला गेलो असताना कुत्रे परवडले डुकरे आवरा म्हणायची वेळ आली होई.
भटक्या मांजरी माजावर आल्या की रात्रभर गातात हा तुलनेने सौम्य उच्छाद, पण त्या अनेकदा लहान बाळांचे दुध पितात, घरात उड्या मारून नासधूस करतात, जमिनी खणून ठेवतात.
भटके हत्ती भारतातील अनेक गावांत हल्ले करतात, तिथे शेते उध्वस्त करतात
भटकी वानरे तर अबाबाबाबा! भारतीय भटक्या जनावरांमध्ये सर्वात धोकादायक नी तापदायक जमात असावी

====

मग या सार्‍यांना गोळ्या घालाव्यात काय? विशेषत: गायी व माकडांना?
आणि हा तर्क गब्बरच्या फडतूसांपर्यंत का ताणू नये?

अंतराआनंद Mon, 06/04/2015 - 11:32

In reply to by ऋषिकेश

डुकरे, गायी, कुत्रे , गाढवे ( हो, असतात) आणि मांजरे ह्यापैकी कोणताही प्राणी कुत्र्यांसारखाच उगाचच बाईक, सायकलच्या मागे पळून चावा घेत नाही. "रिक्शात बसलेल्या माणसाच्या पायाला रिक्षापाठीमागे धावणारा कुत्रा चावला." ही दोनेक वर्षामागे आमच्याकडे घडलेली खरी घटना आहे. खरंतर इमारतींचे जंगल, मोकळ्या जागाच नसणे, रस्त्याकडेला पार्क केलेल्या गाड्या ही छोट्या शहरांमधील परिस्थितीही कारणीभूत आहे.

अजून एक आपल्या उरल्या सुरल्या अन्नावर भूतदया जोपासणारयांचाही मोठा हातभार लागत असतो ह्या परिस्थितीला.

भटके हत्ती आणि वानरांच्या बाबतीत मान्य. अभयारण्यांची बेटं बनवली की असं व्हायचच. या मूळ समस्येला हात कोणीच घालणार नाही. ( कोणी घातलाच तर आपणही विरोध करु. कारण ते आपल्या सेकंड होम घेण्याच्या स्वप्नांवर गदा आणणारं ठरेल. )

ऋषिकेश Mon, 06/04/2015 - 12:05

In reply to by अंतराआनंद

मला कुत्र्यांबद्दल समस्या मान्यच आहेत, चर्चा उपायांबद्दल आहे.
कुत्र्यांना मारायचेच असेल तर मारून ते मांस किमान प्राणीसंग्रहालयात पाठवा, जिथे कुत्र्याचे मांस खाल्ले जाते तिथे ते निर्यात करून रोजगार वृद्धी करा. तशी काही योजना असेल तर कुत्र्याला मारायला हरकत नाही.

ज्यांना खायचे नाही व त्यांना मारून माणसाला अन्य उपयोग नाही (जसे चामडे कमावणे, औषधनिर्मिती इत्यादी) त्या प्राण्यांना उगाच ठार मारण्याचा उपाय मला अयोग्य वाटतो.

===

माझ्या विचारातील दुटप्पीपणा: मला विनाकारण डास, झुरळे वगैरे मारण्यात मात्र अजिबातच काही वाटत नाही. रोगराई तर भटके कुत्रेही पसरवू शकतात.

adam Mon, 06/04/2015 - 12:27

In reply to by ऋषिकेश

कुत्र्यांना मारायचेच असेल तर मारून ते मांस किमान प्राणीसंग्रहालयात पाठवा, जिथे कुत्र्याचे मांस खाल्ले जाते तिथे ते निर्यात करून रोजगार वृद्धी करा. तशी काही योजना असेल तर कुत्र्याला मारायला हरकत नाही.

भटक्या कुत्र्याच्या मांसात कुणाल रुची असेल ?
मांसभक्षणासाठी मिनिमम ष्ट्यांडर्डायझेशन लागेल.
तुम्ही जे सांगत आहात ते करुच नये; असे म्हण्णे नाही.
होत असेल तर तेही करा. उलट मी फंडिंग करीन यथाशक्ती.
पण तुम्ही सांगितलेल्या गोष्टी सध्या करता येत नसतील; त्यात जर अनेकानेक जर्-तर असतील;
तर ती योजना प्रत्यक्षात येइपर्यंत का थांबायचं ?
मानवी जीवास एका हल्लेखोर जनावरासोबत रहायला भाग का पाडायचं ?
वस्तीत घुसलेल्या बिबट्याला जो न्याय लावतो; तोच लावून मोकळं व्हावं की भटक्या कुत्र्याला.
मुळात कुत्र्यांना मारा नि मग काय हवे ते करा ; असे मी म्हणतो आहे.
.
.

ज्यांना खायचे नाही व त्यांना मारून माणसाला अन्य उपयोग नाही (जसे चामडे कमावणे, औषधनिर्मिती इत्यादी) त्या प्राण्यांना उगाच ठार मारण्याचा उपाय मला अयोग्य वाटतो.
बिबट्या! वस्तीतला बिबट्या. किंवा रोगकारक जीव जंतूंना मारायला आपण उपाययोजना करतोच की.
मारलेले जीव जंतू काही खायला वापरत नाहित की त्यांचा अजून काही अन्य उपयोग नाही.
मानवास धोका आहे; म्हणून जीवजंतू मारले जातात; परिसर स्वच्छ केला जातो; तसेच करावे.
भटक्या डुकराचाही मारल्यावर बाकी काहिच उपयोग नसावा. तरी त्यास मारावे असे माझे म्हण्णे आहे.
डुकराचे मांस काही लोकांना खावे लागते; ह्याची कल्पना आहे. पण तो प्रकार दुर्दैवी आहे.
खायचं असेल कुणाला तर खाउ देत; पण शक्यतो ती वेळ न येवो अशी प्रार्थना असावी.

ऋषिकेश Mon, 06/04/2015 - 13:51

In reply to by adam

भटक्या कुत्र्याच्या मांसात कुणाल रुची असेल ?

अनेकांना रुची असावी

पण तुम्ही सांगितलेल्या गोष्टी सध्या करता येत नसतील

का? डॉग स्लॉटर हाऊस, पॅकेजिंग, निर्यात वगैरे करण्यात काय अडचण आहे? महापालिकेने हे काम खाजगी कंपन्यांना द्यावे. काही दिवसांत शहरे भटकी कुत्री विरहीत होतील.

adam Mon, 06/04/2015 - 12:17

In reply to by ऋषिकेश

आपण उल्लेख केलेल्या प्राण्यांचे दोन प्रकार आहेत.
त्यातला एक म्हणजे त्यांचा उपद्रव होतो; व बंदोबस्तही केला जातो.
जंगली हत्तींचा वावर त्रासदायक ठरत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याच्या प्रयत्नांच्या बातम्या दिसतात.
हत्तींचा अभयारण्याबाहेर मुक्त संचार तसाही नसतोच्/नसावा; अशीच प्रस्थापित व्यवस्थेची भूमिका आहे; असे मी समजतो.
.
.
दुसरा प्रकार म्हणजे मधे मधे येणारे प्राणी(गाय बैल म्हैस वगैरे)
बहुतांश वेळेला गायी वगैरे 'भटक्या ' नसतात. त्या रस्त्यात भस्सकन् अध्येमध्ये येतात कारण त्यांचा कळप मालक इकडून तिकडे घेउन जात असतो;
किंवा गाय ही भाकड गाय झाली म्हणून मोकळी सोडून दिलेली असते. (म्हणजे मूलतः ती 'भटकी' नसतेच; तिची जबाबदारी कोणीतरी ढकलून देतोय.)
अजून एक गोष्ट म्हणजे गाय बैल मूलतः हिंसक नाहित.
वळू चित्रपटात दाखवल्याप्रमाणे अगदिच एखादं जनावर पिसाळल्यासारखं करु लागलं तर त्याचाही बंदोबस्त केला जातो.
गाय स्वतःहून हल्ले करत नाही. करत असल्यास तिला अवरले जावे.
.
.
डुकरे हल्ले करीत असतील तर मारुन संपवावेत; प्रश्नच नाही. ( फॅण्ड्री मध्ये डुकरांचा बंदोबस्त नागरी वस्ती तर्फे केला जातो;हेच दाखवलय. अर्थात बंदोबस्त करावा; इतकच मी म्हणतोय. त्यामागे जातीपातीचा आधार वगैरे तस्साच ठेवावा असं कोणी म्हण्णार नाही. )
भटक्या कुत्र्यांचा हल्ला ही सर्रास घडणारी घटना आहे.
.
.
वेगळ्या भाषेत विचारायचं तर शहरात बिबट्या मोकाट फिरत असलेला चालत नाही.
मग भटकी कुत्री का चालतात ?(प्लीझ न ओट -- पाळीव कुत्र्यांबद्दल चकार शब्दही मी काढत नाहीये.फक्त भटक्या कुत्र्यांबद्दल बोलत आहे)
.
.
'गाय चालते ना रस्त्यावर फिरलेली, मग कुत्रीही चालवून घ्या ' अशी भूमिका असल्यास त्याला उत्तर म्हणून
'वाघ/बिबट्या/चित्ता/कोल्हे लांडगे चालतात का शहरात ? नाही ना, मग घालवा कुत्र्यांनाही बाहेर ' असं म्हणू इच्छितो.
.
.
थोडक्यात साधसं उत्तर देण्याचा प्रयत्न:-
कुत्री हिंसक आहेत्/असतात; विशेषतः रहदारी कमी असताना (अगदि पहाटे किंच्वा रात्री किंवा सूनसान एरियातत)आणि कुत्री गटा-गटाने फिरत असताना विशेष हिंसक होतात. म्हणून त्यांचा बंदोबस्त करावा. मारणे हे निर्बिजीकरण करण्याहून सोपे आहे; म्हणून त्यांना मारावे.
.
.
भटकी कुत्री जगवायचीत का माणसं ; असं विचारु इच्छितो.
गोहत्येवर बंदी का, वगैरे दिशेला प्रश्न नेउ नयेत प्लीझ.
तिथेही माझं साधंसं उत्तर आहे तार्किकतेने येणारं.

ऋषिकेश Mon, 06/04/2015 - 12:25

In reply to by adam

वाघ/बिबट्या/चित्ता/कोल्हे लांडगे चालतात का शहरात ? नाही ना

हे प्राणी शहरात आल्यास त्यांनाही गोळ्या घालून मारू नये अशीच भुमिका आहे.

मग घालवा कुत्र्यांनाही बाहेर

बाहेर घालवणे आणि मारून टाकणे यात मी फरक करतो.

adam Mon, 06/04/2015 - 12:31

In reply to by ऋषिकेश

हे प्राणी शहरात आल्यास त्यांनाही गोळ्या घालून मारू नये अशीच भुमिका आहे.

व्हॉटेव्हर.
मानवी परिसर वाघमुक्त ठेवायचा प्रयत्न करतो; तसेच श्वानमुक्तही करा की.
कसा करायचा हा अंमलबजावणीचा भाग आहे.
भटक्या कुत्र्यांस मारणे ही इतरांहून अधिक नसली तरी इतरांइतकीच प्रभावी अशी पारंपरिक अंमलबजावणी नाही का ?
सगळ्या कुत्र्यांना अभयारण्यात घालून शहरं सोडवता येत असतील तर ते करा.
ते करता येत नसेल तर मारुन टाका.
मारुन न टाक्ता; "आपण ह्यांचं निर्बिजीकरण करु" अशा गप्पा होतात.
पण प्रत्यक्षात किती दिवसात सारे शहर भटक्या कुत्र्यांपासून मुक्त करायचे उद्दीष्ट आहे हे कोनी सांगत नाही;
किती प्रगती झाली आहे ते समोर दिसतेच आहे,

अंतराआनंद Mon, 06/04/2015 - 12:33

In reply to by ऋषिकेश

मुंबईतल्या भटक्या कुत्र्यांना संजय गांधी उद्यान म्हणजे नॅशनल पार्कात ( खूप आत जिथे माणसांचा वावर नसतो तिथे ) सोडून द्यावे असा प्रस्ताव कोणीतरी मांडल्याचे मागे ऐकले होते त्याचे काय झाले कोणास ठाउक.
नपेक्षा सर्व भूतदयावाद्यांनी रस्त्यावरल्या कुत्र्यांना ईथे तिथे बिस्किटे खाउ घालत फिरण्यापेक्षा त्यांच्यासाठी अलिशान निवारागृहे बांधून आम्हा भटक्या माणसांवर दया करावी. ;)

अनु राव Mon, 06/04/2015 - 13:30

In reply to by अंतराआनंद

हा प्रस्ताव जर अमलात आणला तर नॅशनल पार्कातले जे काही थोडे प्राणिजीवन आहे ते नष्ट होईल.

पकडुन मारुन टाकणे हाच एक उपाय आहे.

बॅटमॅन Mon, 06/04/2015 - 12:25

In reply to by adam

भटकी कुत्री जगवायचीत का माणसं ; असं विचारु इच्छितो.

केस बाय केस याचे उत्तर बदलते. कुत्र्यांपेक्षा माणसाचे उपद्रवमूल्य बरेच जास्त आहे म्हणा तसे. पण कुत्र्यांना ठार मारण्याची कॉस्टही कमी आहे तुलनेने. सबब, लो रिस्क गेन की हाय रिस्क हाय गेन स्ट्रॅटेजी अवलंबावी इतकाच प्रश्न आहे. ;)

फीलिंग सुडो-अर्थशास्त्री.

गब्बर सिंग Mon, 06/04/2015 - 13:34

In reply to by बॅटमॅन

लो रिस्क गेन की हाय रिस्क हाय गेन स्ट्रॅटेजी अवलंबावी इतकाच प्रश्न आहे.

रिस्क, कॉस्ट, गेन हे व्यक्तीनिष्ठ असतात ओ. कॉस्ट टू हुम व गेन्स टू हुम - ही जास्त संयुक्तिक शब्दयोजना आहे.

याचा अर्थ मानवालाच फक्त कॉस्ट असते असे नाही. कॉस्ट, रिस्क, गेन्स हे मानवेतरांनाही असतात. त्या मानवनिर्मित संकल्पना आहेत असे म्हणून त्या मानवेतरांना लागू नाहीतच असे नाही.

----------------------

संभाव्य आक्षेप - विसंगती.

----------------------

बॅटमॅन Mon, 06/04/2015 - 14:09

In reply to by गब्बर सिंग

रिस्क, कॉस्ट, गेन हे व्यक्तीनिष्ठ असतात ओ. कॉस्ट टू हुम व गेन्स टू हुम - ही जास्त संयुक्तिक शब्दयोजना आहे.

याचा अर्थ मानवालाच फक्त कॉस्ट असते असे नाही. कॉस्ट, रिस्क, गेन्स हे मानवेतरांनाही असतात. त्या मानवनिर्मित संकल्पना आहेत असे म्हणून त्या मानवेतरांना लागू नाहीतच असे नाही.

टॅक्सच काय, मानवी समाजाचा एकही नियम न पाळणार्‍या फडतूस प्राण्यांच्या बाजूने गब्बरने बोलणे हे रोचक वाटलं.

ऋषिकेश Mon, 06/04/2015 - 12:34

In reply to by नितिन थत्ते

हो की! त्यांना विसरलोच.

वर म्हटले तसे माझ्या मताच्या विसंगतीत डास, झुरळे इत्यादींसोबत उंदिरही अ‍ॅडवा.
क्बुतरांना मारून टाकावे असे वाटत नाही फक्त त्यांना पोसू न्ये. त्यांचे अन्न त्यांना मिळवू दे!

गब्बर सिंग Mon, 06/04/2015 - 09:34

"अ‍ॅनिमल्स हॅव राईट्स टू" अशा आशयाच्या प्लेटा लावलेल्या असतात गाड्यांच्या मागच्या बाजूला. विचार करणारच नाही असा निर्धार केला की अशा कल्पना सुचतात व लोकांच्या डोक्यावर सरकारच्या माध्यमातून लादल्या जातात. माझ्या वाचीव माहीती नुसार मनेका गांधींनी भटक्या श्वानांना मारण्यास बंदी घालण्याचा विचार प्रथम राबवला. असे वाचल्याचे आठवते की मनेका गांधी कारवाईचा बडगा उचलतील म्हणून महापालिका कर्मचारी सुद्धा या आघाडीवर काही ठोस करायला घाबरायचे.

भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण किंवा थेट गोळी घालणे यात काहीही चूक नाही. निर्बीजीकरण हे खर्चिक व समस्याजनक असल्याने गोळी घालणे ठीक. खरंतर भटक्या श्वानांना गोळी घालणार्‍या अधिकार्‍यास इनाम दिले पाहिजे.

गब्बर सिंग Mon, 06/04/2015 - 09:42

In reply to by ऋषिकेश

मुकर्रर मुकर्रर !!!

पण ह्या "अ‍ॅनिमल्स हॅव राईट्स टू" च्या ५००% बकवासाचे कुठेतरी खंडन केले पाहिजे.

गब्बर सिंग Mon, 06/04/2015 - 10:04

In reply to by ऋषिकेश

अहो, तुमच्यापुरती घोषणा अमेंड करा "अ‍ॅनिमल्स हॅव राईट्स टू अ‍ॅण्ड सो डू हंटर्स"

Animals have rights if and only if someone is PAYING to get those rights enforced.

अधिकार या शब्दाचा इतका कचरा झालेला आहे की कुणीही (e.g. a compassionate politician) कुणाला ही उद्देशून "हा तुमचा अधिकार" आहे असा बकवास करीत असतो. अरे कुठुन आला हा अधिकार ? अधिकार हा एन्फोर्समेंट च्या अनुपस्थितीत अस्तित्वात असेल का ?? इन्फोर्समेंट साठी दमड्या कोण मोजणार आहे ?? Who values the "right to life" of that dog ??

गवि Mon, 06/04/2015 - 13:38

In reply to by गब्बर सिंग

हो. आपापल्या जागी बसून "नागरिकांनी टोल भरणे बंद करावे" असे आदेश देणारे नेते आठवले. टोलनाक्यावर मात्र असंख्य सुरक्षारक्षक, कोलदांडे, बॅरियर्स, बाउन्सर्स वगैरंची फौज तैनात.

गब्बर सिंग Mon, 06/04/2015 - 13:45

In reply to by गवि

In the presence of a credible enforcement mechanism, any right can be enforced. And people will respect it. समस्या ही आहे की ते क्रेडिबल एन्फोर्समेंट मेकॅनिझम कसे निर्माण करायचे व त्यासाठी दमड्या कोण मोजणार ??

नितिन थत्ते Mon, 06/04/2015 - 12:32

In reply to by गब्बर सिंग

>>विचार करणारच नाही असा निर्धार केला की अशा कल्पना सुचतात व लोकांच्या डोक्यावर सरकारच्या माध्यमातून लादल्या जातात. माझ्या वाचीव माहीती नुसार मनेका गांधींनी भटक्या श्वानांना मारण्यास बंदी घालण्याचा विचार प्रथम राबवला.

मनेका गांधींनी राबवला हे खरे आहे. आणि त्याला सुप्रीम कोर्टाने अनुमोदन दिले. मनेका गांधींचा आदेश कदाचित योग्य जागी मारता आला असता. पण सुप्रीम कोर्टाचा आदेश तसा मारता येत नाही. :(

गवि Mon, 06/04/2015 - 13:39

In reply to by नितिन थत्ते

अनेक ठिकाणी मनेका गांधी असा उल्लेख आलेला आहे. त्यांचे नाव मेनका गांधी असेच आहे आणि तसेच सर्वांनी म्हणावे अशी त्यांची इच्छा असते. त्यांनी एका परिसंवादात समोरासमोर झालेल्या चर्चेत खुद्द हे म्हटलेलं ऐकलं-पाहिलं आहे.

अजो१२३ Tue, 07/04/2015 - 10:43

पारदर्शक नावाचा वेगळा रंग म्हणता येईल का? पारदर्शक असणे आणि रंगहिन असणे हे दोन भिन्न प्रकरणे आहेत का? वस्तू पारदर्शक असो वा रंगहिन, ती दिसते (वायू सोडून). मग लाल ते जांभळा पैकी कोणती ना कोणती तरंग तिच्यापासून परावर्तित होत असणार. मग तोच तिचा रंग. आणि जास्त रंग परावर्तित होत असतील तर मिश्ररंगी. पण माणसाच्या डोळ्याला दिसणारा पारदर्शक रंग म्हणजे नक्की कोणता रंग?

गवि Tue, 07/04/2015 - 11:10

In reply to by अजो१२३

पण माणसाच्या डोळ्याला दिसणारा पारदर्शक रंग म्हणजे नक्की कोणता रंग?

रंग नव्हे, कोणत्याही रंगांचा अभाव.

गवि Tue, 07/04/2015 - 11:33

In reply to by ऋषिकेश

पारदर्शक रंग हाही रंगाचा अभावच.

पारदर्शक म्हणजे सर्व प्रकारचे किरण एकसमान प्रमाणात आरपार गेल्याने एका कोणत्याही तरंगलांबीचे किरण वेगळ्या प्रमाणात न गेल्याने कोणताही एक न "भासणे" अशा अर्थाने रंगाचा अभाव.

पण तरीही पारदर्शक वस्तू तिथे आहे असं का जाणवतं? तर त्याच्या घनतेत आजुबाजूच्या वातावरणाच्या घनतेपेक्षा फरक असल्याने तेवढ्या भागात प्रकाशाचे रिफ्रॅक्शन (अपवर्तन का?) जाणवते. म्हणून त्याचं अस्तित्व जाणवतं. तो "रंग" नसतो.

पांढरा रंग म्हणजे सर्व किरण एकसमान प्रमाणात रिफ्लेक्ट झाले (परिवर्तित की परावर्तित?! ) त्यामुळे सर्व रंगांचा मिश्र रंग दिसला.

काळा रंग म्हणजे सर्व किरण समप्रमाणात शोषले गेले आणि काहीच परिवर्तित किंवा आरपार गेले नाही. यामुळे कोणताही विषिष्ट रंग भासला नाही.]

रंग नसतात, ते भासतात हे सर्वांना माहीत असल्याने त्याचे स्पष्टीकरण देत नाही.

अजो१२३ Tue, 07/04/2015 - 11:39

In reply to by गवि

तर त्याच्या घनतेत आजुबाजूच्या वातावरणाच्या घनतेपेक्षा फरक असल्याने तेवढ्या भागात प्रकाशाचे रिफ्रॅक्शन (अपवर्तन का?) जाणवते. म्हणून त्याचं अस्तित्व जाणवतं.

हेच्च मला कोणाकडून तरी लिहून (वदवून म्हणतात तसं) घ्यायचं होतं. प्रकाशाचं रिफ्रॅक्शन होतं, म्हणजे visible range मधल्या electromagnetic radiation चं रिफ्रॅक्शन होतं. इथे व्हिजिबल रेंज शब्द महत्त्वाचा आहे. असं जर असेल तर पदार्थ बिनरंगी कसा? शेवटी तो दृश्य प्रकाश परावर्तीत करत आहे.

गवि Tue, 07/04/2015 - 12:00

In reply to by अजो१२३

हो. म्हणजे तशा अर्थाने एकजिनसी वळण्यामुळे होणार्‍या रेकग्नायझेबल दृश्य फरकाला रंग असं म्हणायचं असेल तर चालू शकावे. पण रंग ही संकल्पना तरंगलांबी बेस्ड विशिष्ट किरणसमूहांवर आधारित आहे. रिफ्रॅक्शन हा वेगळाच व्हिजिबल फेनॉमेनॉन आहे.

ऋषिकेश Tue, 07/04/2015 - 12:04

In reply to by गवि

पारदर्शक रंग हाही रंगाचा अभावच.

नाही, तो कोणतातरी नाव नसलेला रंग असतो. आपल्या डोळ्यांना जाणवणार्‍या तरंगपट्टीवरील कोणत्यातरी फ्रिक्वेन्सीचे तरंग आपल्या डोळ्यात जात असतात, म्हणून ती वस्तु दिसते.

काळा रंग म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्रकाश नसणे. (प्रकाश नाही म्हणून रंग नकाहितत्या फ्रिक्वेन्सीचा प्रकाश आला की डोळ्यांना काहितरी दिसते, तो त्याचा रंग)

किंवा अधिक करेक्ट बोलायचे तर काळा म्हणजे रंगाचा अभाव पेक्षा काळा म्हणजे डोळ्यांना समजणार्‍या तरंगपट्टीतील कोणत्याही फ्रिक्वेन्सीतील प्रकाशाचा अभाव असे म्हणता येईल

घाटावरचे भट Wed, 08/04/2015 - 11:21

In reply to by नितिन थत्ते

रेझिस्टर कलर कोड्स मध्ये टॉलरन्स ब्यांड मधे गोल्ड, सिल्व्हर आणि कलरलेस असे ब्यांड शिकल्याचे आठवते. पैकी गोल्ड म्हणजे १%, सिल्व्हर म्हणजे ५% आणि कलरलेस म्हणजे १०% टॉलरन्स असे असल्याचेही आठवते, पण याबाबत खात्री नाही. टॉलरन्स ब्यांड 'बीबीरॉय' मध्ये येत नसल्याने ते रंग लक्षात राहात नाहीत बहुधा. आणि असेही शिक्षण चालू असताना टॉलरन्सकडे एवढं कोण लक्ष देतो? मी एकदा मास्तरांना 'किती टॉलरन्सचा रेझिस्टर लावू' असे विचारले असता 'काय फरक पडतो? ल्याब मध्ये जो मिळेल तो लाव' असे उत्तर मिळाले होते. एकूण रेझिस्टर टॉलरन्स वगैरे कामाच्या ठिकाणीच जास्त उपयोगी पडले.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 09/04/2015 - 02:53

In reply to by मिहिर

माझ्या आठवणीनुसार चंदेरी (१०%), सोनेरी (५%) आणि काहीच खूण नाही तर (२०%) असं होतं. रंगहीन पट्टा प्रत्यक्षात कसा दिसतो?

गूगलने हेच दाखवलं -

मिहिर Thu, 09/04/2015 - 11:12

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आम्ही 'काहीच खूण नाही'ला रंगहीन पट्टा म्हणत असू. म्हणजे असे गृहीत धरायचे की तिथे रंगहीन पट्टा आहे आणि तो रंगहीन असल्याने तिथे आपल्याला रेझिस्टरचा बेस रंगच दिसतो.

गवि Tue, 07/04/2015 - 12:13

In reply to by ऋषिकेश

काळा रंग म्हणजे सर्व किरण समप्रमाणात शोषले गेले आणि काहीच परिवर्तित किंवा आरपार गेले नाही. यामुळे कोणताही विषिष्ट रंग भासला नाही

काळा रंग म्हणजे प्रकाशाचा अभाव नव्हे तर सर्व दृश्य तरंगलांबींचे सर्व किरण पूर्णपणे (किंवा जवळजवळ पूर्णपणे..कारण देअर इज नो परफेक्ट ब्लॅक बॉडी) शोषले जाणे.

बाकी ट्रान्स्परन्सी आणि दोन वेगवेगळ्या मीडियममधल्या फरकाची जाणीव या दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्या आपण मिक्स केल्या. पारदर्शकता हा रंग नव्हे. पारदर्शकतेसाठी दोन वेगळी मीडियम असलीच पाहिजेत असं नव्हे. "एका माध्यमातून दुसर्‍या माध्यमात जाताना प्रकाशाचं वाकणं" (वेगवेगळ्या कोनातून पाहिल्यास वेगवेगळ्या प्रमाणात)ही वेगळी दृश्य जाणीव आहे. तिला अनामिक रंग म्हणता येईल का याविषयी शंका आहे. पण समजा जे दिसतं त्याला रंग असतो असं मानून अपवर्तनाच्या दृश्यालाही एक रंग म्हणून संबोधलं तरी हरकत नसावी. काही म्हटलं तरी शेवटी मूळ संकल्पना स्पष्ट असणं महत्वाचं.

ऋषिकेश Tue, 07/04/2015 - 13:05

In reply to by गवि

काळा रंग म्हणजे प्रकाशाचा अभाव नव्हे तर सर्व दृश्य तरंगलांबींचे सर्व किरण पूर्णपणे (किंवा जवळजवळ पूर्णपणे..कारण देअर इज नो परफेक्ट ब्लॅक बॉडी) शोषले जाणे.

तेच तर म्हणतोय.
प्रकाशाचा अभाव म्ह्टले मम्हणजे त्या वस्तुवर पडणार्‍या प्रकाशाचा अभाव नव्हे तर आपल्या डोळ्यांपर्यंत पोचणार्‍या प्रकाशाचा अभाव. (वस्तूने प्रकाश पूर्ण शोषल्याने डोळ्यांपर्यंत काहीच पोचत नाही, म्हणून आपल्याला जे दिसते - रादर काहीच दिसत नाही - त्याला आपण "काळा" म्हणतो.. असे काहीसे)

अजो१२३ Tue, 07/04/2015 - 13:16

In reply to by ऋषिकेश

काळ्या रंगाबद्दल एक विचित्र गोष्ट आहे.
१००% काळा हा तसा टेक्निकली कोणताही रंग नसूनही डोळ्याला वा मानवी जैविक संस्थेला अन्य कोणत्याही रंगाप्रमाणेच दिसतो. म्हणजे विज्यान माहित नसलेला माणूस काळ्या व अन्य रंगांत कोणताही विशेष भेद आहे असे जाणवले असे म्हणणार नाही.
दुसरे म्हणजे (१००%?) गडद काळ्या वस्तूचा काळा रंग दिसणे आणि अंधारात व काहीच नसताना डोळे मिटल्यावर (वस्तूच नसताना) काळा रंग दिसणे.
रंगच न दिसणे हे झोपेत असताना, स्वप्न नसताना, इ इ १००% सत्य म्हणावे लागेल.

गवि Tue, 07/04/2015 - 13:26

In reply to by अजो१२३

केवळ रंगच नव्हे तर उंची, खोली वगैरेची जाणीव, आकाराची जाणीव याही गोष्टी डोळ्याच्या सेन्सर्सनी मिळवलेल्या माहितीवरुन मेंदूने सोयीसाठी बनवलेला एक फिक्स भासच असतो. तो डेटा हाही सत्य नव्हे. डेटा मेंदूला जातो म्हणजे "कॉन्शसनेस" नावाच्या घटकाला जातो. त्यावरुन मेंदूने लहानपणापासून कॉईन करुन ठेवलेले भास होतात.

लहान मुलं वस्तू पाडताना, उचलताना, पडताना वगैरे हे भास फिक्स करुन घेत असतात. जन्मतः प्रतिमा फिजिकल लेन्सनुसार उलटीच (इन्व्हर्टेड) प्रेझेंट होत असते. डोळा ते मेंदू या सर्व प्रवासात ती सरळ (सुलट) करुन घेणारी कोणतीही फिजिकल अरेंजमेंट नाही. (डोळ्यासारखी अन्य सुलटकारक लेन्स अथवा इतर काही). लहानपणी हे उलट दिसणारे दृश्य सुलट करुन इंटरप्रीट करायला आपण शिकतो. त्यानंतर उलट अथवा सुलट असा प्रश्न पुन्हा उलटे होईपर्यंत येत नाही. सतत काही दिवस दृश्य इन्व्हर्टेड दिसेल अशी डोळ्याभोवती उपकरणीय रचना केली की मनुष्य पुन्हा एकदा सुलटीकरण शिकून सराईतपणे नॉर्मल वावरु लागतो. नंतर ते उपकरण काढून टाकलं की काही दिवस त्याला नेहमीचं दृश्य उलटं दिसून तो भेलकांडतो. इत्यादि.

स्वप्नात ऑप्टिकल सिग्नलचं इंटरप्रीटेशन नसून थेट कॉन्शसनेस नावाच्या प्राण्याचं कन्क्लुजनच असल्याने त्यात रंग नावाची संकल्पना अप्रस्तुत ठरते.

राही Tue, 07/04/2015 - 17:52

In reply to by गवि

सुंदर आणि नेमके शब्द.
अगदी 'दैदीप्यमान'. छान प्रकाश टाकलाय.
अवांतर. गीतांजलीमध्ये 'प्रकाशाचा प्रकाश' अशी एक शब्दयोजना आहे ते आठवले.

अतिशहाणा Tue, 07/04/2015 - 19:04

In reply to by राही

गविंनी खूपच छान समजावून सांगितले आहे. नेटफ्लिक्सवर ब्रेन गेम्स(?) नावाची एक माईंड ब्लोईंग डॉक्युमेंटरी आहे. त्यात रंगांचे आकलन कसे केले जाते यावर सुंदर विश्लेषण आहे. उदा. प्रत्येक व्यक्तीला दिसणारा 'रंग' हा वेगवेगळा असतो. गविंना दिसणारा 'लाल' रंग हा मला कदाचित 'हिरवा' म्हणून दिसत असावा आणि मी त्यालाच लाल समजत असेन ही प्रचंड मोठी शक्यता नेहमीच असते.

उदा. खालील चित्रात दोन्ही फळ्यांचा रंग हा एकच आहे. मात्र वेगवेगळ्या खोलीमुळे रंगाचे आकलन करुन घेण्यासाठी आपला मेंदू या रंगाच्या शेड्स बदलतो. मधल्या रेघेवर बोट वगैरे ठेवून ती रेघ झाकली की दोन्ही रंग एक असल्याची खात्री पटेल.

शुचि. Tue, 07/04/2015 - 18:43

In reply to by गवि

सतत काही दिवस दृश्य इन्व्हर्टेड दिसेल अशी डोळ्याभोवती उपकरणीय रचना केली की मनुष्य पुन्हा एकदा सुलटीकरण शिकून सराईतपणे नॉर्मल वावरु लागतो. नंतर ते उपकरण काढून टाकलं की काही दिवस त्याला नेहमीचं दृश्य उलटं दिसून तो भेलकांडतो. इत्यादि.

होय या प्रयोगाबद्दल वाचले होते. त्या व्यक्तीने ते उपकरण (उलटे दिसण्याचे) वापरले. अन तो इतका सरावला की सायकलही बिनधास्त चालवू लागला.

अनु राव Wed, 08/04/2015 - 10:58

In reply to by गवि

जन्मतः प्रतिमा फिजिकल लेन्सनुसार उलटीच (इन्व्हर्टेड) प्रेझेंट होत असते. डोळा ते मेंदू या सर्व प्रवासात ती सरळ (सुलट) करुन घेणारी कोणतीही फिजिकल अरेंजमेंट नाही. (डोळ्यासारखी अन्य सुलटकारक लेन्स अथवा इतर काही). लहानपणी हे उलट दिसणारे दृश्य सुलट करुन इंटरप्रीट करायला आपण शिकतो. त्यानंतर उलट अथवा सुलट असा प्रश्न पुन्हा उलटे होईपर्यंत येत नाही. सतत काही दिवस दृश्य इन्व्हर्टेड दिसेल अशी डोळ्याभोवती उपकरणीय रचना केली की मनुष्य पुन्हा एकदा सुलटीकरण शिकून सराईतपणे नॉर्मल वावरु लागतो. नंतर ते उपकरण काढून टाकलं की काही दिवस त्याला नेहमीचं दृश्य उलटं दिसून तो भेलकांडतो. इत्यादि.

हा प्रयोग फार वर्षा पूर्वी डिस्कव्हरी वर बघितला होता. मानवी मेंदू इतका कमालीचा आहे की ७-१० दिवसात उलटी प्रतिमा सुल्टी करुन घ्यायला शिकतो.

गवि Wed, 08/04/2015 - 11:25

In reply to by अनु राव

मानवी मेंदू इतका कमालीचा आहे की ७-१० दिवसात उलटी प्रतिमा सुल्टी करुन घ्यायला शिकतो.

आणि याच गुणामुळे योग्य कंडिशनिंग करणार्‍या मठवातावरणात बहुधा ७-८ दिवसांत कोणत्याही बाबाबापूंना महात्मा किंवा अवतार मानायलाही शिकतो. ;)

अजो१२३ Wed, 08/04/2015 - 11:29

In reply to by गवि

आणि याच गुणामुळे योग्य कंडिशनिंग करणार्‍या मठवातावरणात बहुधा ७-८ दिवसांत कोणत्याही बाबाबापूंना महात्मा किंवा अवतार मानायलाही शिकतो.

तसेच सायंटिफिक डोग्माज चा गुलाम बनतो.

नितिन थत्ते Wed, 08/04/2015 - 12:10

In reply to by अजो१२३

या धाग्यावरच्या तुमच्या प्रश्नांना (गाडीचा ब्रेक, पारदर्शकता) जी उत्तरे मिळाली ती सायंटिफ़िक डॉग्मा होती का?

रेड बुल Tue, 07/04/2015 - 15:45

In reply to by ऋषिकेश

तेच तर म्हणतोय.
प्रकाशाचा अभाव म्ह्टले मम्हणजे त्या वस्तुवर पडणार्‍या प्रकाशाचा अभाव नव्हे तर आपल्या डोळ्यांपर्यंत पोचणार्‍या प्रकाशाचा अभाव. (वस्तूने प्रकाश पूर्ण शोषल्याने डोळ्यांपर्यंत काहीच पोचत नाही, म्हणून आपल्याला जे दिसते - रादर काहीच दिसत नाही - त्याला आपण "काळा" म्हणतो.. असे काहीसे)

तसं वाटत नाही. कारण मुळात एखादी गोष्ट दिसते म्हणजे काय होते तर त्यावस्तुचे रिफ्लेक्शन (प्रकाश किरणरुपी) आपल्या डोळ्याच्या सेन्सरवर (बहुतेक रेटीना ? मला नक्कि शब्द आठवत नाही) आडवले जाते व त्याचे ज्ञान आपल्या मेंदुपर्यंत पोचवल जाते. थोडक्यात जसे पडद्याचा आडथळा आल्याशीवाय प्रोजेक्ट केलेला चित्र(पट) द्रुष्य होत नाही तसेच कोणत्याही वस्तुच्या रिफ्लेक्शनला आपल्या रेटीनाचा अडथळा आल्याशीवाय ती आपल्याला द्रुश्य होत नाही अद्रुष्यच राहते. म्हणून समजा एखाद्या वस्तुने कसलेच प्रकाशकिरण रिफ्लेक्ट केले नाहीत तर ती वस्तु आपल्याला दिसणार नाही. हे तर स्पष्ट्च आहे.

पण ज्य अर्थी ती वस्तु काहीही रिफ्लेक्ट करायला असमर्थ आहे त्या अर्थी ती इतरांची रिफ्लेक्शन वा प्रकाश किरणे आडवायलाही असमर्थ आहे* म्हणूनच त्या वस्तुच्या मागे जी कोणती वस्तु रिफ्लेक्शन करायला समर्थ आहे ती आपल्या डोळ्यांना दिसेल. थोदक्यात आपल्या डोळ्यांपर्यंत जे काही पोचत नाही ते काळे न्हवे पारदर्शक बनते :) असो जाणकारांनी उजेड टाकावा...

*T&C apply.

ऋषिकेश Tue, 07/04/2015 - 16:29

In reply to by रेड बुल

नाही पारदर्शक वस्तु असेल तर त्या वस्तु मागे जे काही अपारदर्शक असेल तिथपर्यंत प्रकाश पोचतो व परावर्तित होऊन पुन्हा पारदर्शक वस्तुमधून आपल्या डोळ्यापर्यंत पोचतो.

तेव्हा काळे वेगळे नी पारदर्शक वेगळे

अजो१२३ Tue, 07/04/2015 - 12:16

In reply to by ऋषिकेश

डोळ्यांना जाणवणार्‍या तरंगपट्टीवरील कोणत्यातरी फ्रिक्वेन्सीचे तरंग आपल्या डोळ्यात जात असतात.

माहितीपूर्ण. धन्यवाद.
Now please don't say that I am trapping you in the words but if a visible electromagnetic frequency is associated with transparency, can I say that 'It is a unnamed colored object.' rather than 'It is a colorless object.' Isn't that technically more correct?

नितिन थत्ते Tue, 07/04/2015 - 13:36

In reply to by ऋषिकेश

नाही. पारदर्शक/अपारदर्शक वस्तूचा रंग असे म्हणताना रंगीत काच मनात होती.

म्हणजे साधी काच असेल तर त्यातून जाणार्‍या प्रकाशाच्या सर्व रंगाच्या किरणांना अतिशय थोडे शोषते. सर्व रंगांचे किरण ऑलमोस्ट सगळे पुढे पाठवते. म्हणून कुठला रंग दिसत नाही. किंवा पलिकडील वस्तूचा जो रंग असतो तोच दिसतो.

ऋषिकेश Tue, 07/04/2015 - 13:45

In reply to by नितिन थत्ते

ऑलमोस्ट

या ऑलमोस्ट मुळेच अतिशय सौम्य असा रंग रहातोच. (त्याला रंग म्हणा वा काही, पण प्रकाशाचा काही भाग परिवर्तीत होऊन आपल्या डोळ्यापर्यंत पोचतो. - बाकी ऑममोस्ट प्रकाश पुढे जातो.) हा जो किंचित भाग पोचतो तो आपल्याला "दिसतो" त्या अर्थी त्याला एक रंग असणार -असतो - त्याला काही नाव नसते.

नितिन थत्ते Tue, 07/04/2015 - 13:53

In reply to by ऋषिकेश

(आयडिअली) साधी काच त्यातून जाणार्‍या प्रकाशाला मॉडिफाय करत नाही. म्हणजे त्यातून लाल दिव्याचा प्रकाश जात असेल तर त्यातला ९८% (जस्ट अ फिगर) लाल प्रकाश पुढे पाठवते. सर्व स्पेक्ट्रम असलेला प्रकाश असेल तर सर्व स्पेक्ट्रमचा प्रकाश ९८% पाठवते. लाल काच असेल तर सर्व स्पेक्ट्रम असलेल्या प्रकाशातले बाकी किरण शोषून घेते आणि लाल किरण पुढे पाठवते.

अंधुक लालसर काच कदाचित पूर्ण स्पेक्ट्रममधल्या लाल रंगाचे किरण ९८% पुढे पाठवते आणि बाकीचे मे बी ९०% पाठवते. म्हणून पलिकडे येणार्‍या प्रकाशात लाल रंगाच्या किरणांचे प्रमाण स्लाइटली जास्त असते म्हणून ती काच अंधुक लालसर दिसते/ त्या काचेतून पलिकडील वस्तू लालसर दिसतात.

अजो१२३ Tue, 07/04/2015 - 14:08

In reply to by नितिन थत्ते

यावरून ... आता पहिल्यांदा १००% वा ०% पेक्षा वेगळे आकडे आले आहेत म्हणून...
----------------------------------
जी वस्तू जास्त प्रकाश परावर्तित करते ती जास्त ब्राइट दिसली पाहिजे. पारदर्शक वस्तू खूपच कमी प्रकाश परावर्तित करतात म्हणून ते अंधुक दिसले पाहिजेत. क्रिकेटचा चेंडू १००% लाल प्रकाश प्लस इतर काही प्रकाश परावर्तित करतो. पाणी जवळजवळ साराच प्रकाश पुढे पाठवते. मग डोळ्यात जे पाण्यावरून येणारे प्रकाशकिरण खुपतात ते नेहमी तळावरून आलेले असतात? या हिशेबाने खोल समुद्राच्या पृष्ठभागावर डोळे चकाकले नाही पाहिजेत.

अजो१२३ Tue, 07/04/2015 - 14:22

In reply to by नितिन थत्ते

वेल, पाण्याच्या पृष्ठभागावरून अख्खेच्या अख्खे किरण असे आलेले असले तर पाणी पारदर्शक कसे? हा प्रश्न तुम्हाला अपेक्षितच होता का?

नितिन थत्ते Tue, 07/04/2015 - 14:34

In reply to by अजो१२३

समजा सूर्याचा प्रकाश पाण्यावर पडला आहे त्यातले २ टक्के किरण परावर्तित झाले तर ते डोळ्यात जातील ना?

पृष्ठभाग अगदी संथ असेल तर ऑलमोस्ट आरशासारखे रिफ्लेक्शन होते.


.
.
.
तुम्ही खुपणारे किरण म्हणताय ते हे असावेत.

अजो१२३ Tue, 07/04/2015 - 11:25

In reply to by Nile

हवेतला पावसाचा थेंब घ्या. हवा पारदर्शक असते. थेंब देखिल असतो. पण थेंब दिसतो. तो रंगहिन असता तर दिसला नसता.

Nile Tue, 07/04/2015 - 11:27

In reply to by अजो१२३

स्विमींग पुलाच्या तळाशी गेल्यावर हवा दिसते पण पाणी दिसत नाही. ते सोडा, हे भौतिकशास्त्र समजायला तुम्हाला शुद्धीत यावं लागेल. आधी तुम्ही सक्काळी काय घेतलंय ते तर सांगा!

ऋषिकेश Tue, 07/04/2015 - 11:26

In reply to by अजो१२३

पारदर्शकता ही त्या वस्तुच्या रिफ्लेक्टिव्ह इंडेक्सवर ठरते. एखादी वस्तु किती प्रकाश आपल्यातून जाऊ देतो त्यावर ती वस्तु उकिती पारदर्शक आहे हे ठरेल. तर रंग हा रिफ्लेक्ट झालेल्या (आपल्यापर्यंत पोचलेल्या) प्रकाशाच्या फ्रिक्वेन्सीवर ठरतो. तीच वस्तु हवेत, पाण्यात वेगळ्या रंगाची दिसते, पारदर्शकता मात्र बदलत नाही

नितिन थत्ते Tue, 07/04/2015 - 12:15

In reply to by ऋषिकेश

१००% पारदर्शक म्हणजे वस्तू प्रकाश शोषत नाही आणि परावर्तित करत नाही.

डोळ्यासमोर काचेची शीट धरली तरत्यातून सर्व १००% प्रकाश आरपार जात नाही. म्हणून ती "दिसते".

पारदर्शक नसलेल्या वस्तू पडलेल्या प्रकाशातील काही तरंगलांबीचा प्रकाश परावर्तित करतात आणि इतर शोषून घेतात म्हणून त्या वस्तू त्या रंगाच्या दिसतात.

तसेच पारदर्शक रंगीत वस्तू पडलेल्या प्रकाशातील काही लांबीचा प्रकाश आरपार जाऊ देतात व इतर शोषतात म्हणून त्या पारदर्शक वस्तूच्या पलिकडील वस्तू त्या रंगाने मॉडिफाय झालेल्या रंगाच्या दिसतात. पांढरा दिवा लावून त्यापुढे एक लाल आणि एक निळी काच पाठोपाठ ठेअल्या तर थिओरेटिकली त्या काचांपलिकडून दिव्याचा प्रकाश दिसणार नाही.

अजो१२३ Tue, 07/04/2015 - 12:22

In reply to by नितिन थत्ते

डोळ्यासमोर काचेची शीट धरली तरत्यातून सर्व १००% प्रकाश आरपार जात नाही. म्हणून ती "दिसते".

१००% शुद्ध पाणी आणि १००% शुद्ध काच हे १००% पारदर्शक (रंगहिन) असावेत असे वाटते. पण १००% पारदर्शक नसले तर त्यांचा जो कोणता रंग आहे त्याला टेक्निकली एक वेगळे नाव असायला हवे.

नितिन थत्ते Tue, 07/04/2015 - 12:30

In reply to by अजो१२३

कुठल्याही (पारदर्शक/अपारदर्शक) वस्तूचा रंग म्हणजे त्यावर पडलेल्या प्रकाशापैकी ज्या तरंगलांबीचा प्रकाश शोषला जात नाही त्या तरंगलांबीशी संबंधित त्या वस्तूचा रंग.

शुचि. Tue, 07/04/2015 - 19:20

काल त्या "मेंदूविषयक" पुस्तकात वाचले की - मूड्ची ही प्रत्येकाची एक बेसलाईन असते. अन मग थोडाफार यहां वहां होऊन नंतर मूड परत त्या बेसलाइनवर येतो. काहीजण त्यामुळेच बहुतेक वेळा आनंदी असतात तर काही कीरकीरे/वैतागलेले किंवा उदास.

रेड बुल Thu, 09/04/2015 - 02:20

In reply to by शुचि.

हे असलं सगळं वाचुन काय मिळतं ? म्हणजे माहिती मिळते हा भाग अलाहिदा पण आता ही जी बेसलाइन आहे प्रत्येकाची ती कशी बदलायची याचे तंत्र त्यात दिले आहे का ?

रेड बुल Thu, 09/04/2015 - 13:27

In reply to by अस्वल

ठीक आहे उरलेलं आपण सांगा फुगडी घालत बसण्यापेक्षा... मला इतकेच म्हणायचे आहे की बेस्लाइन बदलायची कशी याचा उहापोह नसेल तर... स्वभावाला औषध नाही हे समजायला अशा पुस्तकातील माहितीची सामान्यांना गरज नाही.

अस्वल Sat, 11/04/2015 - 00:37

In reply to by रेड बुल

गरज ओवररेटेड आहे आजकाल.
अँग्री बर्ड्स आणि टेंपल रन गरज होऊन राहिली, त्यापेक्षा फुगडी बरी, ऑनलाईन का होईना?
आणि बेसलाईन बदलायची हे समजायला तरी कशाला पुस्तक पाहिजे मग?

गवि Thu, 09/04/2015 - 10:00

In reply to by रेड बुल

त्यांचं म्हणणं ज्योतिषशास्त्र टाईप दिसतंय. बेसलाईन मूड ठरलेलाच आहे आणि तिथे परत यायचेच आहे. ते बदलण्याचे सर्व प्रयत्न म्हणजे ते यहां वहां फिरुन परत येण्याचाच भाग. शेवटी एक फिक्स कायतरी ठरलेलं आहे आणि तेच आपले नशीब आहे. कितनाभी उडो, घूमफिरके वहीं है आना. ;)

रेड बुल Thu, 09/04/2015 - 13:23

In reply to by गवि

माझा रोख जरा गंभीर होता.म्हणजे एखादा लेखक आहे तर तो लेखकच राहणार ? एखादा सुरेख संगीतकार आहे तर तो संगीतकारच राहणार ? समजा एखादी व्यक्ती विक्षीप्त आहे तर ती आयुष्यभर विक्षीप्तच राहणार ? एखाद्याला काही रोग आहे तर तो मानसीक रोगीच राहणार ? तुमची बेसलाइन तुम्हाला डिफाइन करते हे ठीकच आहे पण ती आपण बदलु शकतो का हा प्रश्न मला जास्त महत्वाचा वाटला.

गवि Thu, 09/04/2015 - 13:26

In reply to by रेड बुल

हो.. अहो बॉबॅ, ते मत त्या मूळ पुस्तकवाल्याचं आहे आणि ते ज्योतिषशास्त्र छाप, सर्व काही विधिलिखित आहे अशा धाटणीचं आहे असं मी म्हणतोय.

बदल घडवता येतो असा अंदाज आहे. पण कसा हे सांगता येईल का? आय डाउट.

रेड बुल Thu, 09/04/2015 - 13:35

In reply to by गवि

बदल घडवता येतो असा अंदाज आहे. पण कसा हे सांगता येईल का? आय डाउट.

देन सच पुस्तकाज आर युजलेस. म्हणजे ते वाचुन काय उपयोग हा माझा मुळ प्रश्न (विचारला) होता.

धर्मराजमुटके Thu, 09/04/2015 - 13:44

In reply to by रेड बुल

एखादी व्यक्ती विक्षीप्त आहे तर ती आयुष्यभर विक्षीप्तच राहणार ?

ह्या प्रश्नाचे उत्तर आदिती ताईंना विचारा. त्या जास्त चांगले सांगू शकतील.

गवि Thu, 09/04/2015 - 13:46

In reply to by धर्मराजमुटके

विक्षिप्त राहणारच हे पटते पण तीनचौदांशच राहणार की त्यात काही फरक पाडता येईल हे बक्षीजी विचारताहेत.

धर्मराजमुटके Thu, 09/04/2015 - 13:55

In reply to by गवि

वयाप्रमाणे विक्षिप्तपणा वाढतच जाईल असे आजूबाजूची परिस्थिती बघून वाटते. अर्थात हे पुरुषांबद्दलचे निरिक्षण आहे. बायकांच्या बाबतीत मी काही सांगणे म्हणजे काजव्याने सुर्याला चिडविण्यासारखे होईल.

अनुप ढेरे Wed, 08/04/2015 - 11:57

कुठला उमेरिकन-ऐसीकर जूरी म्हणून राहिला आहे का एखाद्या केसमध्ये? असेल तर अनुभव लिव्हा ना.
(मिपावर एक लेख वाचलेला आठवतो त्या अनुभवावर पण तो अर्धवट होता. (बहुदा डांबिसकाकांचा) )

गब्बर सिंग Thu, 09/04/2015 - 02:02

सुरत पिया की छिन बिसराये - मधल्या खालील अधोरेखित ओळींचा अर्थ काय आहे -

दुवा - http://www.aathavanitli-gani.com/Song/Surat_Piyaki_Na_Chin

.

सुरत पिया की न्‌ छिन्‌ बिसुराये
हर हरदम उनकी याद आये

नैंनन और न कोहू समाये
तडपत हूँ बिलखत रैन निभाये
अखियाँ निर असुवन झर लाये

साजन बिन मोहे कछु ना सुहावे
बिगडी को मेरे कौन आ बनावे
हसनरंग आ सो जी बहलावे

अधोरेखित ओळींपैकी काही शब्द माहीती आहेत व त्यावरून अंदाज लावू शकतो. पण ठोस अर्थ हवा आहे.

-----

.
.

बाकी या गाण्याची इथे राहुल देशपांडेंनी लई मजा आणलेली आहे इथे
.
.

शुचि. Thu, 09/04/2015 - 02:03

In reply to by गब्बर सिंग

मला तुझ्याशिवाय कोणीही आवडत नाही, मला सतत तुझी आठवण येते.
हसनरंग = माहीत नाही हां ते मात्र

अनु राव Thu, 09/04/2015 - 09:43

In reply to by गब्बर सिंग

नैंनन और न कोहू समाये

(तुझ्याशिवाय) डॉळ्यांना काही दिसतच नाही. किंवा काहीही बघितले तरी तुच दिसतेस.

घाटावरचे भट Thu, 09/04/2015 - 11:31

In reply to by गब्बर सिंग

>>नैंनन और न कोहू समाये
'कोहू' (किंवा 'कोऊ')चा अर्थ साध्या हिंदीत 'कोई' किंवा मराठीत 'कोणी' असा असावा. मी शिकलेल्या काही चिजांमध्ये याच अर्थाने हा शब्द आलेला आहे. उदा. 'कोऊ तो कहे आ की मत बिगरी है' म्हणजे कोणी म्हणतं की याची बुद्धी फिरली आहे. पूर्ण वाक्याचा शब्दशः अर्थ 'डोळ्यांत आणिक कोणी समावत नाही' असा असावा. म्हणजेच माझ्या डोळ्यांना (हा जो कोणी) पिया (आहे, त्याच्या) शिवाय आणखी कोणी दिसत नाही.

हसनरंग हे बंदिशकाराचे नाव आहे. अर्थात या ठिकाणी कट्यारमधले खाँसाहेब असावेत.

अजो१२३ Thu, 09/04/2015 - 11:23

जुळे कशे होतात? मंजे स्त्रीयांत एकावेळी दोन एग्ज तयार नसतात. मग? आणि समजा मूळ पहिल्या फर्टिलाईज्ड पेशीचे पहिल्या वा कोणत्या फाळनीनंतर दोन वेगळे जीव बनतात म्हणावे तर त्यांची गुणसूत्रे डिट्टो सेम असायला पाहिजेत. पण जुळ्यांची संपूर्ण शरीर किंवा किमान लिंगे किंवा किमान हाताचे ठसे, रेटिना इ इ वेगळे निघतातच. कि देहरचना ही १००% गुणसूत्रचलित नाही?

नितिन थत्ते Fri, 10/04/2015 - 20:41

In reply to by अजो१२३

कधी एक बीज फुटून दोन होतात आणि दोन शुक्राणुशी संयोग होऊन identical twins होतात तर कधी दोन बीजे आणि दोन शुक्राणु संयोग होऊन वेगळी twins होतात

ॲमी Sat, 11/04/2015 - 05:24

In reply to by नितिन थत्ते

दोन बीज असतात का? शंका आहे. मला वाटतं

एक बीज फुटून दोन होतात आणि मग दोन शुक्राणुशी संयोग होऊन nonidentical twins होतात किंवा

एक बीज एक शुक्राणुशी संयोग होऊन नंतर ते फुटतात आणि identical twins होतात.

अजो१२३ Mon, 13/04/2015 - 14:54

In reply to by ॲमी

एक बीज एक शुक्राणुशी संयोग होऊन नंतर ते फुटतात आणि identical twins होतात.

असे आयडेंटीकल ट्विन्स पर्फेक्टली आयडेंटीकल असायला हवेत. पण असं नसतं.

नगरीनिरंजन Mon, 13/04/2015 - 18:14

In reply to by अजो१२३

का बरं एकसारखे असले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? इतर फिजिकल फॅक्टर्स म्हणजे गर्भाशयातली जागा, अन्नाचा वाटा, आईच्या हालचालीचे परिणाम वेगवेगळे होत असणार ना?
शिवाय सगळ्या पेशी सारख्याच असतात सुरुवातीला त्यातून वेगवेगळ्या पेशी निर्माण होतात त्या कशा, कधी आणि किती होतील ते १००% सारखं कसं असेल?

नितिन थत्ते Mon, 13/04/2015 - 18:21

In reply to by नगरीनिरंजन

+१.

करोडो स्पर्म तयार होतात तेही पेशी विभाजनानेच होतात असे वाटते. पण प्रत्येक विभाजनात थोडा फरक पडतो.

शहराजाद Mon, 13/04/2015 - 19:14

In reply to by नितिन थत्ते

जुळ्या गर्भधारणेत काही वेळा अंडीदेखील दोन असू शकतात. विशेषतः मूल होण्यासठी वैद्यकीय मदत घेत असताना असे होऊ शकते.