Skip to main content

अ‍ॅरेंजमॅरेज... फसवणूक... एक लैंगीक गुन्हा ?

सुनंदाचे लग्न होउन काही महिने उलटले... अतिशय सुरेख जावइ मिळाला म्हणून तिचे कूटुंबिय फार आनंदात होते. तसं दोन्ही स्थळे वेगवेगळ्या जिल्ह्यातील खेडेगावातील असल्याने त्यांनी त्यांच्या पध्दतीने मध्यस्थ गाठणे, बघणे, पसंत करणे, विवाह होणे वगैरे सोपस्कार पार पाडले. पण नियतीनेचे फासे शकुनीप्रमाणे असतात. मुलाची आर्थिक परिस्थीती ही जितकी दाखवली तीतकी चांगली नाही, उदा. अमुक हेकर जमीन आहे सांगीतले पण प्रत्यक्षात त्यात ५ हिस्सेदारात याचा वाटा अतिशय कमी आहे हे मात्र लपवले. मोठेघर पण एकत्र कुटूंब त्यामुळे प्रायवसी (?) कमी, मधली सुन असली तरी सध्या अजुन धाक्ट्या दिराचे लग्न होइ पर्यंत हीलाच सर्व घरकाम करायचे आहे, अन दिर बहुदा शिक्षण अन लग्न शहरातच उरकणार अशीच चिन्हे आहेत.

म्हणजे... काही छोट्या व काही मोठ्या गोष्टी ज्याची सुनंदाला अपेक्षा नाही नेमके तेच आता समोर आलं आहे. घरं, शेतीवाडी तुलनेने छोट्या गोष्टी ती दुर्लक्षीत करेलही पण गंभीर बाबी जसे अमुक उत्पन्न आहे हे खरयं पण... पोर्गा त्यामानाने जास्त उधळ्या आहे त्यांच काय ? तो हिस्सेदारीने मोठे असणार्‍यांसोबत स्पर्धा करतो, चिडचिड करतो अशा काही गोष्टीमुळे सुनंदाला अ‍ॅडजस्ट करणे हळुअ हळु कठीण जात आहे... हे ते स्थळ न्हवे जे तिला दखवलं होतं असं तिचे ठाम मत बनु लागले आहे. ती पुढे काय करेल तीचे तिलाच ठाउक. पण हे स्थळ मात्र दुरुन डोंगर साजरे असाच प्रकार ठरला...

मला ऐसिकरांना हे विचारायचे की मुलाच्या कुटुंबीयांनी, नातेवाइकांनी, मध्यस्थांनी लग्न मोडू नये या कारणास्तव काही गोश्टी वाढवल्या असतील नसतील... जे असेल ते कारण असो. मुलीला सत्य परिस्थीती १००% समोर आली नाहीये. तिला घटस्फोट मिळवणे कदाचीत जड नाही पण माझा विचार हा आहे अशा प्रकारे फसवुन लग्न लावुन देणे हा बलात्काराचा गुन्हा ठरु शकेल काय ? कारण तिच्याशी विवाह झाला आहे पण अनेक बाबी अंधारात ठेवुन. त्यामुळे घटस्फोटापेक्षाही कडक शिक्षा जास्त योग्य वाटते. कायदा काय सांगतो ? असा प्रकार बलात्कार धरला जाउ शकतो काय ?

कृपया नोंद घ्यावी:- फसवणूक करण्याचा प्रोननेस हा विवाह अरेंज्ड आहे कि नाही यावर कदाचित निर्भर असतोच असे नाही तर यात सामावीष्ट घटक बिनडोक, अननुभवी, फसवणूक करण्यात हुशार व इतर घटकांवरही अवलंबुन असते. दुसर्‍याची फसवणूक प्रेमविवाहात होण्याची जास्त संभावना वाटते. सदरील किस्सा अरेंज मॅरेज मधील असल्याने त्यानुशंगाने धागालेखन करण्यात आले आहे.

अतिशहाणा Fri, 20/03/2015 - 17:35

४९८ चा वापर केल्यास मुलगा व त्याचे घरचे कायमचे आयुष्यातून उठू शकतात. बलात्कारापर्यंत जायची गरजच नाही.

रेड बुल Fri, 20/03/2015 - 18:46

In reply to by अतिशहाणा

४९८ चा वापर केल्यास मुलगा व त्याचे घरचे कायमचे आयुष्यातून उठू शकतात. हे खरयं पण मुलगा हुंडा आण वगैरे मागण्या वा शारीरीक बळाचा वापर करत नाही हे कोणीही शपथेवर सांगेल याचा अर्थ मुलीची मानसिक कुचंबणा होत नाही असे नाही, आजुबाजुच्या समाजात जी कामे सुनेनी करायची आहेत तेव्हड्याच तिच्या कौटुंबीक जबाबदार्‍या आहेत. ही आर्थीक फसवणूकच जास्त आहे व शरीसंबंध घडला आहे तर त्यानुशंगानेही काही गुन्हा ठरु शकतो का हे समजणेही वाटाघाटींसाठी उपयुक्त ठरेल असे वाटते. लगेच कोणीच संसार मोडत नाही... आता चार लोक मध्यस्थी करतील व मार्ग काढायचा प्रयत्न करतील.

अतिशहाणा Fri, 20/03/2015 - 18:49

In reply to by रेड बुल

आर्थिक फसवणूक कशी काय आहे हे अजूनही कळलेले नाही. मुलीकडच्यांकडून पैसे उसने घेऊन काही फसवणूक झाली आहे का?

रेड बुल Fri, 20/03/2015 - 19:08

In reply to by अतिशहाणा

मुलाने आपली आर्थीक पत खोटी दाखवणे व त्याधारे लग्न करण्यास भाग पाडणे...

तसेच जर एखाद्याने अविवाहीत आहे असे खोटे सांगुन कलिगला प्रेमात पाडले शरीर संबंध ठेवले व सत्य परिस्थीती समोर आल्यावर कलिगने त्याला कोर्टात खेचल्याचे उदाहरण आपण नुकतेच इथे वाचले आहे. तो जर लैंगीक गुन्हा ठरतो तर हा लैंगीक गुन्हा देखील का ठरु शकतो असा संदेह निर्माण होतो आहे... कारण खोटे आमीश दाखवुनच विवाह करण्यात आला आहे.

अतिशहाणा Fri, 20/03/2015 - 19:09

In reply to by रेड बुल

एखादी व्यक्ती अविवाहित आहे हे सिद्ध करता येते. आर्थिक पत कमी आहे की जास्त हे कसे सिद्ध करणार हे तुम्हीच सांगा.

रेड बुल Fri, 20/03/2015 - 19:23

In reply to by अतिशहाणा

आपले लग्न झाले आहे ? उत्तर हो असेल तर अरेंज झाले काय ?

उत्तर हो असेल तर आपण ती प्रोसेस डेस्क्राइब कराल काय ? मी त्यामधे कशी फसवणुक केली जाते (गेली) हे सोदाहरण स्पष्ट करतो.

अजो१२३ Fri, 20/03/2015 - 20:08

In reply to by रेड बुल

त्यांच्या विवाहात फसवणूक केली गेली असे कृपया म्हणू नकात. त्याचा अर्थ अरेंज लग्न म्हणजे फसवणूक असा निघतोय. ते अनेक अर्थांनी अनिष्ट असू शकते पण थेट फसवणूक का म्हणावं हे कळलं नाही.
------------------------
फसवणूक करण्याचा प्रोननेस हा विवाह अरेंज्ड आहे कि नाही यावर कदाचित निर्भर नसावा. याउलट मुलगा वा मुलगी, पैकी एक, बिनडोक वा अननुभवी असले तर दुसर्‍याची फसवणूक प्रेमविवाहात होण्याची जास्त संभावना वाटते. अरेंज्ड लग्नात फसवणूक करायला लार्ज स्केल स्कीमॅटिक फ्रॉड करावा लागेल, प्रेमविवाहात निव्वळ एका माणसाचे अभिनयसामर्थ्यही कधी कधी पुरेसे असावे फसवायला.

रेड बुल Fri, 20/03/2015 - 20:12

In reply to by अजो१२३

फसवणूक करण्याचा प्रोननेस हा विवाह अरेंज्ड आहे कि नाही यावर कदाचित निर्भर नसावा. याउलट मुलगा वा मुलगी, पैकी एक, बिनडोक वा अननुभवी असले तर दुसर्‍याची फसवणूक प्रेमविवाहात होण्याची जास्त संभावना वाटते. अरेंज्ड लग्नात फसवणूक करायला लार्ज स्केल स्कीमॅटिक फ्रॉड करावा लागेल, प्रेमविवाहात निव्वळ एका माणसाचे अभिनयसामर्थ्यही कधी कधी पुरेसे असावे फसवायला.

हा डिस्क्लेमर टाकतोच.

अनु राव Fri, 20/03/2015 - 17:53

@जॅकी चॅन - कायदाच काय सांगतो हे तुम्हाला पाहीजे असेल तर
१. हा प्रकार अजिबात बलात्कार म्हणुन धरला जाणार नाही. ह्या केस मधे तर लग्न पण झाले असल्यामुळे पोलिस कंप्लेंट पण घेणार नाहीत.
२. ४९८ चा वापर करायचा असेल तर खोट्या तक्रारी करायला लागतील जसे छळ, मारहाण वगैरे. असे खोट्या तक्रारी करणे कीती बरोबर आहे ते ज्याचे त्याने ठरवावे.
३. घटस्फोट पाहीजे तर मिळु शकेत. पण नवर्‍याने तयारी दाखवली नाही तर अनेक वर्ष वाट बघायला लागेल.

आता कायदा सोडुन बोलायचे तर

मुलीच्या आई वडलांचे काय मत आहे? ते घट्स्फोट, ४९८ वगैरे ला तयार आहेत का?
मुलगी स्वताच्या पायावर उभी राहू शकते का? नसेल आणि माहेरचे पण घटस्फोटाला तयार नसतील तर ती काही करू शकाणार नाही, ही वस्तुस्थिती.

रेड बुल Fri, 20/03/2015 - 18:37

In reply to by अनु राव

मुलीचे मनःस्वास्थ्य जरा बिघडले आहे. कदाचीत सावरेलही असह्य झाले तर माहेर आहेच... पण तिच्या हातात फार काही नाही. या प्रकारात फसवणुक ही नक्किच झाली आहे पण ते सिध्द होणे कठीण आहे व एकुणच या प्रकारात सहभागी लोक जसे मध्यस्थ, मुलाचा रिपोर्ट देणारे लोक , त्याचे फॅमीली मेंबर्स वगैरे यांचे वर्तन फसवणुक ठरु शकते का (उद्या कोर्टात साक्ष द्यायची वेळ आली तर) व शिक्षा कशी द्यायची. शरीसंबंधही घडला आहे म्हणून बलात्कार सुधा का ठरु नये ?

आई वडलांचे मत असह्य होत नसेल तर दिल्या घरी सुखी रहा हेच आहे. घट्स्फोट, ४९८ वगैरे नाइलाज म्हणून. पुन्हा समाजाची विशेष भिती असतेच. स्वतःच्या पायावर उभी राहण्या इतपत शिक्षण आहे, पण इछ्चा वा क्षमता वाटत नाही, हा दोष संस्काराचा म्हणूया. म्हणूनच ती काही करू शकाणार नाही, ही वस्तुस्थिती आहेच पण कायदा काही करु शकेल काय ? हे उदाहरण प्रातिनीधीक आहे असे अनेक प्रकार खेड्यात अजुनही नक्किच घडतात. जर कोर्टकचेर्‍या करायच्याच असतिल तर घट्स्फोटासोबतच मुलाकडच्यांना जबरी शिक्षा व्हावी असे मुलीच्या नातेवाइकांचे मत आहे.

अतिशहाणा Fri, 20/03/2015 - 18:47

In reply to by रेड बुल

स्वतःच्या पायावर उभी राहण्या इतपत शिक्षण आहे, पण इछ्चा वा क्षमता वाटत नाही,

??? मुलीची इच्छा व क्षमता नाही हे चालतंय. मुलाकडच्यांना मात्र उत्पन्न असूनही दोषी दाखवायचा प्रयत्न कशासाठी चाललाय? थोडक्यात सासरकडच्यांच्या पैशावर आरामात आयुष्य काढायचे मुलीचे धोरण फसलेले दिसते.

रेड बुल Fri, 20/03/2015 - 19:03

In reply to by अतिशहाणा

सुशीक्षीत असावे हा हेतु ठेउन शिक्षण पुरे झाले आहे. करिअर ओरींएंटेड असावे म्हणून नाही. हा संस्काराचा भाग आहे, आपल्या सारख्या शहरात आयुष्य व्यतीत केलेल्या व्यक्तीना समजणे जरा जड आहे. मुलगी गृहकृत्यदक्ष आहेच.

मुलाकडच्यांना मात्र उत्पन्न असूनही दोषी दाखवायचा प्रयत्न कशासाठी चाललाय?

कसलाही प्रयत्न नाही चालु. जे घडलय ते असं आहे. कुटुंबाची अमुक जमीन आहे ५ हिस्से आहेत सांगणे वेगळे अन प्रत्यक्ष सातबारा, दस्त तपासणे वेगळे. यामधे तफावत नक्किच असु शकते. त्यामुळे कुटुम्बाची पत अन प्रत्यक्ष मुलाचा आर्थीक वाटा यात फरक असु शकतो.

मुलीने तिच्यासाठी जी काही स्थळे आली त्यातील एकाची निवड केली, शक्य आहे हे स्थळ पसंत करताना इतर चांगली स्थळे(होनेस्ट) डावलली गेली. तिने कसे स्थळ हवे हे आधीच स्पष्ट केलेले आहे सासरी येउन मग नखरे सुरु केलेले नाहीत आजही सारसच्यांन तिचा त्रास नाही. असे समजा की कंपनीने एक फेक रिज्युमवाला उमेदवार निवडला जे काही महिन्यांनंतर समोर आले आहे. कंपनी त्यावर अ‍ॅक्षन घेउ शकते पण ... संसाराचे प्रकरण इतके सोपे नसते.

अतिशहाणा Fri, 20/03/2015 - 19:07

In reply to by रेड बुल

त्यामुळे घटस्फोटापेक्षाही कडक शिक्षा जास्त योग्य वाटते.

तुम्ही परिस्थिती सांगून दोषी कोण हे आधीच ठरवले आहे. त्याचबरोबर न्यायनिवाडाही करुन टाकलाय. तुमची पूर्ण कथा वाचली तर असं दिसतंय की, मुलीचे शिक्षण झाले आहे, मात्र तिची नोकरी करुन स्वतः पैसे कमावण्याची इच्छा किंवा क्षमता दिसत नाही. मात्र आरामदायी आयुष्य जगायचंय. (घरातली कामंही नकोशी वाटताहेत) त्यामुळे तिने पैसेवाल्या मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. आता त्याच्याकडे अपेक्षिला होता त्यापेक्षा कमी पैसा आहे त्यामुळे तिचा भ्रमनिरास झालाय. मात्र तरीही स्वतःचे पैसे कमावण्याची इच्छा नाही. त्यापेक्षा फसवणूक करणाऱ्यांना घटस्फोटाची जबरी शिक्षा कशी करता येईल यावर विचारविनिमय सुरु आहे.
संसाराचे प्रकरण असे असते याची मला कल्पना नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 20/03/2015 - 19:11

In reply to by अतिशहाणा

फुकटात बसून ऐष करण्याची हौस असणाऱ्यांची बरीच प्रकरणं अशीच असतात; संसाराचीच कशाला!

मूळ धाग्याबद्दल - मी वकील नाही, वकीली शिक्षण, अनुभव घेतलेला नाही. सबब तुमच्या प्रश्नांबद्दल बोलण्याची माझी पात्रता नाही.

रेड बुल Fri, 20/03/2015 - 19:15

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नुकतीच आपली पल्याडच्या मंद स्त्रियांबाबतची प्रतिक्रीया वाचली होती त्यामुळे हा इनपुट अनपेक्षीत नाही.

अजो१२३ Fri, 20/03/2015 - 20:15

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

फुकटात बसून ऐष करण्याची हौस असणाऱ्यांची बरीच प्रकरणं अशीच असतात; संसाराचीच कशाला!

हा निर्देश बायकोला कष्टवत मजा मारणार्‍या पुरुषांप्रती असावा असा कयास. व्हेरी टिपिकल ऑफ अदिती. पण इथे तितका अस्थानी वाटत नाही. बायकोला सगळे काम देऊन स्वतः देह न झिजवण्याची वृत्ती भारतात खूप आहे तेव्हा एखाद्या ऑड पोरीने तशी अपेक्षा 'तशा परिस्थितीत नसलेल्या घरात'* ठेवली तर जास्त आक्षेप घेत सुटणं अयोग्य असावं.
---------------------
* चांगल्या परिस्थितीतल्या घराच्या स्त्रीया ऐष करतातच. पण परिस्थिती नसलेल्या घरात केली तर भारतात अजून ते इतकं स्वीकार्य नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 21/03/2015 - 17:33

In reply to by अजो१२३

"हा निर्देश बायकोला कष्टवत मजा मारणार्‍या पुरुषांप्रती असावा असा कयास. व्हेरी टिपिकल ऑफ अदिती."

विधानामधल्या खाचाखोचा लक्षात न घेता लावलेला स्वस्त, सोयीस्कर अर्थ. Very typical experience on internet and the real world.

बॅटमॅन Sun, 22/03/2015 - 02:39

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वत:च्याच टॅक्टिक्स इतरांनी स्वतःवर वापरलेलं पाहणं फार सुखदायक नसतं. सिम्पथाईझ & एम्पथाईझ विथ यू.

अजो१२३ Fri, 20/03/2015 - 19:47

एक त्रयस्थ म्हणून मी अतिशहाणा यांच्या ९५% मतांशी सहमत आहे.
------------
पण ...
मध्यस्थांनी फसवले, सासरच्या लोकांनी फसवले, मुद्दाम फसवले व त्यामुळे आपले जीवन बर्बाद झाले अशी मुलीची प्रामाणिक भावना असेल आणि बर्‍यापैकी तीव्र भावना असेल तर
१. विवाहांतर्गत फसवणूकीचा
२. ४९८ का काय ते
३. बलात्काराचा
४. मानसिक छळाचा
खटला अवश्य केला पाहिजे.
यामुळे कोर्ट लग्न करताना
१. ड्यू डिलिजन्स करण्याची जबाबदारी कोणाची आहे.
२. विवाह करण्याच्या अटी म्हणून काय काय अटी घातला येतात
३. या अटींचे, निकषांचे डोक्यूमेंटेशन कसे करावे
४. कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही अटींची पूर्तता झाली आहे काय याचे प्रमाणन कसे करावे
इ इ बद्दल मार्गदर्शक तत्त्वे घालून देईल जी अन्य लोकांसही उपयुक्त असतील.
=================================
सरकारी हस्तक्षेपाने न्याय मिळावा असे वाटत असेल तर सरकारी प्रक्रियेची पूर्तता करण्याची मानसिकता असली पाहिजे.

रेड बुल Fri, 20/03/2015 - 19:58

In reply to by अजो१२३

१. ड्यू डिलिजन्स करण्याची जबाबदारी कोणाची आहे.
२. विवाह करण्याच्या अटी म्हणून काय काय अटी घातला येतात
३. या अटींचे, निकषांचे डोक्यूमेंटेशन कसे करावे
४. कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही अटींची पूर्तता झाली आहे काय याचे प्रमाणन कसे करावे

मला हेच अपेक्षीत आहे. लग्न जर कायदेशीर करार आहे तर त्याच्या पुर्ततेसाठीच्या आहर्ता सुस्पष्टच असाव्यात.

अजो१२३ Fri, 20/03/2015 - 20:22

In reply to by रेड बुल

व्यक्तिशः मला लग्न हा कायदेशीर करार नसावा असे वाटते. प्रत्येक व्यक्तिगत गोष्टीत कायदे, नियम, संकेत, ...
=======================================================
किंवा अजून एक असावं का?
Execept for those circumstance which law identifies as clearly defined and explicit matters of criminal offenses...
लोकांना ऑप्शन असावं ---->
१. मी लग्न करत आहे. सगळे कायदे पाळून. हे पहा कागद. आता एन्फोर्समेंट करा.
२. मी लग्न करत आहे. मला कायद्याचा कोणताही इंतर्फेरन्स नको आहे. बरं वाईट माझ्या जबाबदारीवर.

नगरीनिरंजन Fri, 20/03/2015 - 20:52

In reply to by अजो१२३

मला लग्न हा कायदेशीर करार नसावा असे वाटते

आर्थिक व्यवहारात कायदा हवाच. हा आर्थिक व्यवहार अगदी जनुकांच्या पातळीवर असतो हे तर कळले आहेच. आणि आपण काही स्वेच्छेने विचार करुन त्याप्रमाणे आचरण करु शकणारे प्राणी नाही आहोत. त्यामुळे कायदा आणि करार हा हवाच. प्रेम, साहचर्य किंवा स्वार्थत्याग हे फावला वेळ जास्ती झाल्यानंतरचे शाब्दिक बुडबुडे आहेत. ;-)

शुचि. Fri, 20/03/2015 - 20:58

In reply to by नगरीनिरंजन

हे जे आर्थिक merging होतं ना तेच तोडणं fu**g जड जातं. बाकी शारीरीक अन मानसिक गरज रहात नाहीच, प्रेम आटतं (कधी कधी निर्माणच होत नाही) अन फक्त कायदा-कायदा-कायदा अन आर्थिक merging उरतं.

आडकित्ता Fri, 20/03/2015 - 23:48

माझी एक सिस्टीम आहे.
फार जास्त डोक्यात जाणार्‍या धाग्या/प्रतिसादांना मी उत्तर लिहितो अन मग "प्रकाशित करा" वर क्लिक करायच्या ऐवजी, ते पेजच बंद करतो.

या आयडिच्या मागच्या धाग्यात तेच केलं.

मग शेवटी नाईलाजाने जांभई टाईपली होती.

तेव्हा लिहिलेलं मत इथे लिहितो :

फक्त अन फक्त मेंटल मास्टरबेशन करण्यासाठी धागाकर्त्याने हा अवतार घेतलेला आहे.

पुलेशु.

शुचि. Sat, 21/03/2015 - 00:08

In reply to by बॅटमॅन

:)
मला अतिफटकळ लोकांची भीतीच वाटते. अन जे लोक बिचारे निरुपद्रवी आहेत त्यांच्यावर कशाला फटकळपणा गाजवायचा. जॅकी चॅन यांनी ३ च धागे काढले आहेत. कसं काय कोणी लगेच "मेंटल मास्टरबेशन" म्हणू शकतं काय माहीत.

आडकित्ता Sat, 21/03/2015 - 08:46

In reply to by बॅटमॅन

डोक्यात जात नाहीत, असं अनेकदा होतं.

डोक्यात न जाणारे अनेक धागे असतात, नीट चाललेल्या, पानाच्या एका कोपर्‍यात उगाचच खेचल्या न गेलेल्या उपचर्चाही असतात.

हा धागा व आधीचा हुंडावाला वाचण्यासाठी खर्चलेल्या वेळाबदल्यात नक्की काय मिळाले ते तुमच्या लक्षात आलेच नसावे असे म्ह्णावेसे वाटत नाही.

बॅटमॅन Sat, 21/03/2015 - 12:51

In reply to by आडकित्ता

बर्‍याच प्रतिसादांमध्ये मस्तकप्रवेशाचा उच्चार केलेला आढळला म्हणून प्रश्न विचारला इतकेच.

रेड बुल Sat, 21/03/2015 - 14:51

In reply to by आडकित्ता

पण "मेंटल मास्टरबेशन" अनुभव घेण्यासाठी काढुन टाकत आहे. तेव्हं प्रकाटाआ. (इथे जांभै कल्पावी)

अरविंद कोल्हटकर Sat, 21/03/2015 - 00:29

हिंदु विवाह हा दोन पक्षांतील कायदेशीर करार नसतो कारण 'करार' ह्या संज्ञेत बसण्यासाठी लागणारी कोणतीच बाब हिंदु विवाहामध्ये नाही. (Indian Contract Act 1872 खालचा 'करार' कशामुळे निर्माण होतो हे सुलभ शब्दांमध्ये ह्या विकिपेजवर पहा. मुस्लिम विवाह हा 'करार' असतो कारण तो करण्यासाठी वर 'मेहेर' नावाची रक्कम देऊ करतो आणि वधू काजीसमक्ष ती मेहेर कबूल करते आणि मगच निकाह संपन्न होतो.)

हिंदु विवाह हा 'करार' नसल्याने त्यात 'फसवणूक' - विशेषतः आर्थिक आणि सामाजिक प्रकारची - झाली हे कसे सिद्ध करणार? ह्या मुद्द्यावर कोठलाहि दावा टिकेल असे वाटत नाही.

अंतराआनंद Sat, 21/03/2015 - 09:25

स्वभाव उधळ्या असणे हे कुठेही असू शकते. अजून काही वैयक्तीक आक्षेप असल्यास गोष्ट वेगळी. धडा शिकवण्यात जे श्रम, वेळ आणि पैसा खर्च करावा लागेल त्याच्या तुलनेत या स्वभावाशी जुळवून घेण्यात आणि हळू हळू तो बदलणे हे जास्त श्रेयस्कर नाही का? आपण जे करणार आहोत त्या तुलनेत आपल्याला ठोस काही मिळणार आहे की नुसतंच सूड उगवल्याचं समाधान हा विचार करायला नको का?

तो हिस्सेदारीने मोठे असणार्‍यांसोबत स्पर्धा करतो, चिडचिड करतो

आपण आपली परिस्थिती फुगवून दाखवली आणि त्यामुळे होणारी बायकोची चिडचिड ( ती व्यक्त करण्याची पद्धत) यामुळेही येणार्^या न्युनगंडानेही तो असे करत असेल. ते स्वीकारुन मार्ग काढायची तयारी दाखवली तर कदाचित गोष्टी सुरळीत होतीलही.

हे ते स्थळ न्हवे जे तिला दखवलं होतं असं तिचे ठाम मत बनु लागले आहे.

म्हणजे काय? ह्या मुलाला ती लग्ना आधी भेटली नव्हती का ? की स्थळ म्हणजे फक्त घरची परिस्थितीच?
असं असेल तर तिला सुखी आयुष्याची किल्ली गवसायला फार वेळ लागेल असं खेदाने म्ह्णावसं वाटतं.

अरेंज्ड लग्नात फसवणूक करायला लार्ज स्केल स्कीमॅटिक फ्रॉड करावा लागेल, प्रेमविवाहात निव्वळ एका माणसाचे अभिनयसामर्थ्यही कधी कधी पुरेसे असावे फसवायला.

पण अरेंज्ड लग्नात टेकू ही बरेच असतात म्हणजे लग्न टिकावे यासाठी मनापासून प्रयत्न करणारे असतात. प्रेमविवाहात ही जबाबदारी दोघांचीच असते. थोडकं काही झालं तरी "आम्ही आधीच म्हटलं होतं ना?" हे उद्गार ऐकायला मिळतात.

रेड बुल Sun, 29/03/2015 - 15:12

सुनंदाV2 अतिशय देखणी. अगदी पंचक्रोशीतही तिच्या रुपाचे गुणगाण गायले जायचे म्हटले तर काही गैर नाही. छोट्या गावात राहुनही तिने तिचे शिक्षण पुरे केले व नंतरच विवाह् करायला तयार झाली. रुपाने देखणी असल्याने अगदी "करुन घेउ" असे सांगणारी स्थळेही येउ लागली, पोरीचे नशीब फळफळले. अचानक एके दिवशी होंडा सिटीमधुन एक देखणा राजकुमार तिच्या अंगणात आला सुनंदाच्या रुप आणी गुणाची किर्ती त्याच्या कानी गेली होतीच पण तिला प्रत्यक्ष बघता क्षणीच तो अक्षरशः घायाळ झाला म्हटले तरी अतिशयोक्ती नाही.

मुलीच्या कुटींबियांनी पोराचा मुंबैतला(कुलाबा) ३ बिएचके फ्लॅट, व स्वतःच्या मालकीचे पॉश ऑफीस बघीतले अन त्यांना आसमान ठेंगणे झाले. त्यात्च पोरगा फार हालाखीतुन शिकुन सवरुन वर गेला होता. त्यामुळे त्याच्या घरच्यांचा साधेपणा या एकुणच श्रिमंती थाटात अजुनही माणुसकी व साधेपणाचा सुखद अनुभव देत होता. सुनंदाV2 अतिशय खुश झाली गावात प्रत्येकीला तिच्या नशीबाचा हेवा वाटला. सासर असावे तर असे. अशातच काही महीने निघुन गेले...

... एके दिवशी घरी सुनंदाचा फोन आला, तिच्या आवाजात अतिशय भिती व खिन्नता दाटुन आली होती, कापर्‍या आवाजात ती कशीबशी म्हणाली अण्णा घात झाला... आपली फसवणूक झाली. ऑफीस पोराचे नाही त्याच्या मित्राचे आहे तो तिथे फक्त कामाला आहे पण तो साहेबासारखा राहतो. फ्लॅटही त्याच मित्राचा आहे स्वतःचा नाही. आमच्यात यावरुन सुरुवातीला कुरबुरी व नंतर कडाक्याची भांडणे होउ लागली. मन कुठे मोकळे करता येत न्हवते म्हणून गप राहीले. वरुन त्याने मी माझा फ्लॅट आहे ऑफीस आहे असे म्हटलेच न्हवते फक्त मी इथे राहतो व काम करतो असेच म्हटले होते व तुम्ही माझे कर्तुत्वावर विश्वास ठेउन पोरीचा हाथ हाती दिला आहे यात फसवणु नाहीच व मी व्यवस्थीत नांदलेच पाहिजे असा दम देतो आहे. अन्यथा परत सोडायची धमकी देत आहे मी काय करु ?

मित्रांनो काय करता येइल ? मुंबै लांबचे ठीकाण असल्याने मुलीचे घरचे व मामा यांनीच प्रत्यक्ष जाउन फ्लॅट अन ऑफीस् बघीतले होते इतर सक्षीदार नाहीत. मुलाच्या गावाकडे चौकशी केल्यावर त्यने बरीच प्रगती केली आहे त्याचा अभिमान आहे इतकीच मते ऐकायला आली. त्याच्या मालमत्तेच्या विरोधात अथवा बाजुने खोलामधे कोणताच नेमका तपशील उपलब्ध्द झाला नाही. सुनंदा v2ला या ठीकाणीही न्याय हवा आहे. फक्त घटस्फोट नाही. अशी फसवणूक करणार्‍याला क्रुर शिक्षा झाली पाहिजे असेच तिचे मत आहे.. तुम्हाला काय वाटते.

अतिशहाणा Sun, 29/03/2015 - 17:45

In reply to by रेड बुल

स्वतः काडीची जबाबदारी न घेता सुखवस्तू आयुष्य जगायची हौस असलेली ही आणखी दुसरी केस दिसते! सासरच्यांची माणुसकी आणि साधेपणा जाणवूनही फसवणुकीचा आरोप करावासा वाटतोय हे आणखीच उत्तम!!हा हा

गवि Sun, 29/03/2015 - 20:39

In reply to by रेड बुल

मुंबईत तेपण कुलाब्यात तीन बीएचके फ्लॅट आणि posh office..हलाखीतून वर आलेल्या पोराकडे लग्नाच्या वयापर्यंत आलरेडी अचिव्ह्ड?

इतक्यानेही रेड फ्लॅग मनात उभा न राहण्याला काय म्हणावे? गावातले लोक असले तरी किती वेळात मूळ हलाखीतला मनुष्य किती वर पोचतो याचा वेग जरासा माहीत असायला हरकत नसावी.

रेड बुल Sun, 29/03/2015 - 20:58

In reply to by गवि

कहर तर पुढेच आहे... फक्त वाचकांच्या प्रतिक्रीया काय येतात हे बघायला उत्तरार्ध उघड केला न्हवता. हा भामटातर उघड उघड लखोबा लोखंडे आहे. सदरील भामट्याने मुलीला विकुन टाकायचाही प्लान केला होता असे समोर आले. या आधी त्याने दोनदा असा प्रकार केल्याचेही नंतर कानावर आले. मुलगी वेळीच माहेरी परतल्याने पुढील दुर्दैव टळले. हा भामटा आधी ट्रावल एजंट/ड्रायवर बनुन छोट्या गावांमधे सावज हुडकत फिरत असे. तसेही मुळातच आर्थीक कमाइच विषेश नसेल तर घटस्फोटानंतर मुलीला पोटीगीही मिळत नाही. जे वाटोळे व्हायचे ते झालेच :( पण चर्चा मला दोष/लोभ कोणाचा आहे यावर केंद्रीत करायची नसुन काही कारणाने फसवणुक झालेल्या व्यक्तीना जास्ती जास्त कायदेशीर सपोर्ट कोणता मिळु शकतो याची अपेक्षीत आहे.

हेमन्त वाघे Mon, 30/03/2015 - 12:11

In reply to by गवि

कुलाब्यात ३ BHK ?? कोठे ??
साध्या भागात ६ करोड आणि कफ परेड मध्ये ९ ते १२ करोड . ( माझे मित्र दोन्ही भागात आहेत )
हाभाग असा आहे ( दक्षिण मुंबई ) कि बोलीवूड स्टार्स ला परवडत नाही
आणि वर तिकडेच posh ऑफिस - अजून ४ ते १० करोड ..

आणि गाडी फक्त होंडा सिटी ???

जेवा जवळपास १५ करोड चा नेत वर्थ असतो ( EMI असले तरी ३-४ करोड तरी स्वताचे टाकावे लागतील)

असा माणूस शक्य्त्तो Mercedes , BMW , Audi अगदीच् गेला बाजार टोयोटा LandCruizer मधूओन्फ़िरेल असे मला वाटते.

If it's too good to be true, then it probably is.

Due Dilligene Issues

रेड बुल Mon, 30/03/2015 - 12:33

In reply to by हेमन्त वाघे

कोण काय दाखवेल फसवणुकीसाठी आणी त्याला कसं फसायच नाही यावर एक वेगळा धागा काढणारच आहे त्यावर या सर्व केस स्टडीजवर डिटेल चर्चा अवश्य करुया.

रेड बुल Sun, 29/03/2015 - 21:24

सुनंदाv३ सर्वात ५ भावंडात धाकटी अन अविवाहीत. कर्नाटकातल्या मोठ्या शहरात उच्चशिक्षीत कुटुंबात जन्मली, मोठी झाली. उच्चशिक्षीत बनली आर्थीक स्थिती घरची उत्तम असल्याने उदर्निर्वाह वगैरे प्रश्नच न्हवता. काही कारणाने तिचा विवाह मात्र ठरत न्हवता. वय ३५ उलटले... भवांची लग्ने होउन गेली. शेवटी तिच्या नशीबने तिला एक एनाराय स्थळ सांगुन आले. जवळपास प्रत्येक नातेवाइकाने धोक्याचा इशारा दिला पण कुठेच काही जमत नसल्याचे एक दडपण मनात होते म्हणा किंवा फसवले जाणे जणू प्रारब्ध्द असते की अतिशहाणे लोकही घोडचुक करुन बसतात म्हणा... यांनी विवाह ठरवला. उत्तम रित्या पार पडला. १ आठवड्याने मुलगा जो अमेरीएला गेलाय तो अजुन ३ वर्षे झाली परतला नाही. ही इकडे घटस्फोटासाठी झिजते आहे कारण त्या शिवाय दुसरे लग्नही करता येत नाही. मुलाला काही करणाने विवाहीत असणे आवश्य होते या एकमेव कारणासाठी त्याने विवाह केला होता म्हणे असे काही कानावर आले जास्त डिटेल्स माहीत नाही. हि मात्र अधांतरीच.. आगितुन फुफाट्यात.

गवि Mon, 30/03/2015 - 10:03

In reply to by रेड बुल

मुलाला काही करणाने विवाहीत असणे आवश्य होते या एकमेव कारणासाठी

यावरुन एक वेगळाच प्रश्न (मूळ समस्येशी संबंधित नसलेला).

अमेरिकेत किंवा अन्य देशांत असं कोणतं कारण अथवा फायदा असू शकतो की ज्यासाठी विवाहित असणं आवश्यक आहे? बर्‍याच हिंदी मराठी विनोदी चित्रपटांच्या प्लॉटमधे कथेची सोय म्हणून अशा पाचरअटी घालून भाड्याचे घर अथवा नोकरी देणारे लोक असतात. पण अमेरिकेत ?

रेड बुल Mon, 30/03/2015 - 11:43

In reply to by गवि

मला नेमके डिटेल्स उघड नाहीत. पण मुलाने अंगठीला आधार या एकमेव कारणास्तव लग्न केले अन निघुन गेला. पण आता हे डिटेल्स विचारुन अवश्य अपडेट करतो.

अंतराआनंद Tue, 31/03/2015 - 10:45

In reply to by रेड बुल

जवळपास प्रत्येक नातेवाइकाने धोक्याचा इशारा दिला

असे असताना फसवणूक झालीय असं म्हणण्यापेक्षा आपल्या लोभीपणापायी आपण मूर्ख ठरलोय हे का कबूल करु नये?

अर्धवट Mon, 30/03/2015 - 09:52

अरेरे, सहानुभूती आहे, फक्त अधिकचे काही प्रश्न पडले, त्यांची उत्तरे मिळाल्यास काही स्पष्ट मत देता येईल.

लग्न करण्याआधी, सरकारला इन्वॉल्व्ह केले होते काय? म्हणजे साडेबात्तेचाळीस लाख नगद संपत्ती असेल तरच हा विवाह ग्राह्य धरला जाईल अशी काही अट, कागद, करार केला होता काय?
अरेंज्ड मैरेज असेल तर, याद्या वगैरे करायच्या वेळेला "तुमच्याकडे बत्तावन्न लाख रुपयाची मालमत्ता आहे म्हणून आम्ही या लग्नाला तयार आहोत बरे" असे मध्यास्थांसमोर बजावले होते काय?
मोठे घर आहे, एकत्र कुटुंब आहे वगैरे लग्नाआधी मुलाने लपवून ठेवले होते काय?
पोरगा उधळा आहे हा मुख्य प्रश्न आहे हे समजले, पण बायकोने त्याचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करणे याची काही शक्यता आहे काय?
दाखवलेलं स्थळ आणि लग्न झालेलं स्थळ हे दोन्ही वेगळे आहेत असा संशय कशामुळे आला नक्की ?

काही हायपोथेटिकल प्रश्न -
भरपूर जमीन असलेल्या घरात विवाह केला असता आणि नंतर जमीन अधिग्रहण कायद्याखाली ती जमीन संपादित झाली असती तर काय केले असते?
भरपूर जमीन आहे पण ती बापाच्या नावावर आहे, लग्नानंतर सुनेचा स्वभाव आवडला नाही म्हणून बापाने सून आणि मुलगा यांना संपत्तीतून बेदखल केले असते तर काय पवित्रा घेतला असता?

रेड बुल Mon, 30/03/2015 - 11:54

In reply to by अर्धवट

हे रोज घडतय. आपल्या आजुबाजुला घडतय. आपल्य कल्पनेपेक्षा कमालीच्या प्रचंड संखेने घडतय. कधी अज्ञानाचा फायदा घेउन तर कधी लोभीपणाचा. पण यातुन जास्त उध्वस्त होतात त्या स्त्रियाच. हे ड्रग्स सारखे आहे ओढणारा स्वेछ्चेनेच ओढुन आयुष्यची माती करुन घेत असेलही तरीही समाजानेच त्यांच्या हिताचा विचार करायचा असतो... बघतील त्यांचे ते, भोगतील फळे कर्माची म्हणून सोडुन देणं अवघड हे. कदाचीत हा प्रश्न स्त्रिपुरुष समानतेचा नसेलही(परीणामी आत्मकेंद्रीत अल्याभट्ट बचाव समर्थकांची सहानुभुती मिळणे अशक्यच) पण फसवणुक स्त्रियांची हा त्यापेक्षा जास्त दाहक प्रश्न आहे याची अंजावर जागृती होउ लगली तरी पुरे आहे. बाकी प्रश्नांना उत्तर देण्यास मी असमर्थ आहे (पण लोकांनी अवश्य द्यावीत), कारण बरच काही समजुन घ्यायचाच प्रयत्न चालु आहे...

नगरीनिरंजन Mon, 30/03/2015 - 12:40

In reply to by रेड बुल

कमालीच्या प्रचंड संखेने घडतय

मला वाटतं मुलींच्या अपेक्षा फार वाढल्याने फसवल्याची भावना येत असेल. जेवढं मिळालंय ते कमीच वाटत असेल तर बाकीचे कोण काय करणार? मुळात जोवर प्रत्यक्ष आर्थिक लुबाडणूक झाली नसेल तर लग्न ही फसवणूक होत नाही त्यामुळे या सुनंदांसाठीही मेंटल मास्टरबेशन बंद करायला हरकत नाही.

रेड बुल Mon, 30/03/2015 - 15:25

In reply to by नगरीनिरंजन

मला वाटतं मुलींच्या अपेक्षा फार वाढल्याने फसवल्याची भावना येत असेल.

असं असतच असं नही.

जेवढं मिळालंय ते कमीच वाटत असेल तर बाकीचे कोण काय करणार?

स्त्रियांमधे खरच ही प्रवृती असते ?

मुळात जोवर प्रत्यक्ष आर्थिक लुबाडणूक झाली नसेल तर लग्न ही फसवणूक होत नाही

विवाहास भाग पाडणे ही फसवणुकच. आर्थीकबाबतीत धुळफेक करणे हीसुधा फसवणुकच. प्रश्न हे कायद्याने सिध्द कसे करायचे हा आहे कारण साताबाराचे उतारे, सॅलरीस्लिप वगैरे बघितल्या जातातच असे न्हवे.

त्यामुळे या सुनंदांसाठीही मेंटल मास्टरबेशन बंद करायला हरकत नाही.

अजुन सुरु कुठं केलय ? बळचं खुश होताय व्हयं ?

अवांतरः- बाकी पुरुष स्त्रियांना लग्नामधे फसवतात म्हणुन यापुढे स्त्रियंची लग्ने पुरुषांसोबत लावलीच जाउन नयेत असा आल्याभट्ट बचाव समर्थकांनी निष्कर्श काढला नाही याबद्दल्मानवे तेव्हडे आभार कमीच ;)

अर्धवट Mon, 30/03/2015 - 12:47

In reply to by रेड बुल

>>हे रोज घडतय. आपल्या आजुबाजुला घडतय

याला आक्षेप नाहीच, घडतंच आहे पण आपण कारणांची चर्चा करतोय ना?

>> ओढणारा स्वेछ्चेनेच ओढुन आयुष्यची माती करुन घेत असेलही तरीही समाजानेच त्यांच्या हिताचा विचार करायचा असतो
हेपण मान्यच.

तुम्ही उल्लेखलेल्या केस मधे फसवणूक नक्की आहे की नाही हे नक्की कळाले नाही म्हणून अधिकचे प्रश्न विचारले

त्यातले हे खालील प्रश्न केस स्पेसिफिक असल्याने तुम्हीच उत्तरे देऊ शकाल अथवा अंदाज तरी वर्तवू शकाल असं वाटतं. आपल्याला केसस्टडी म्हणूनच बघायचे आहे म्हणल्यावर अंदाज चालू शकेल.

लग्न करण्याआधी, सरकारला इन्वॉल्व्ह केले होते काय? म्हणजे साडेबात्तेचाळीस लाख नगद संपत्ती असेल तरच हा विवाह ग्राह्य धरला जाईल अशी काही अट, कागद, करार केला होता काय?
अरेंज्ड मैरेज असेल तर, याद्या वगैरे करायच्या वेळेला "तुमच्याकडे बत्तावन्न लाख रुपयाची मालमत्ता आहे म्हणून आम्ही या लग्नाला तयार आहोत बरे" असे मध्यास्थांसमोर बजावले होते काय?
मोठे घर आहे, एकत्र कुटुंब आहे वगैरे लग्नाआधी मुलाने लपवून ठेवले होते काय?
पोरगा उधळा आहे हा मुख्य प्रश्न आहे हे समजले, पण बायकोने त्याचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करणे याची काही शक्यता आहे काय?
दाखवलेलं स्थळ आणि लग्न झालेलं स्थळ हे दोन्ही वेगळे आहेत असा संशय कशामुळे आला नक्की ?

रेड बुल Mon, 30/03/2015 - 15:54

In reply to by अर्धवट

लग्न करण्याआधी, सरकारला इन्वॉल्व्ह केले होते काय? म्हणजे साडेबात्तेचाळीस लाख नगद संपत्ती असेल तरच हा विवाह ग्राह्य धरला जाईल अशी काही अट, कागद, करार केला होता काय?
अरेंज्ड मैरेज असेल तर, याद्या वगैरे करायच्या वेळेला "तुमच्याकडे बत्तावन्न लाख रुपयाची मालमत्ता आहे म्हणून आम्ही या लग्नाला तयार आहोत बरे" असे मध्यास्थांसमोर बजावले होते काय?

नाही. अवांतर :- नुकतचं मी स्वतः मुली बघायच्या फंदात पडलो असल्याने ठरवुन भेटलेल्या मुली मी महिन्याला इतके कमावते इतका खर्च करते. तुझ्या काय फिगर्स आहेत असं स्पष्ट विचारत होत्या. त्यामुळे असे विचाराण्याबाबत माझीही भिड चेपली. हे असंच केलं पाहिजे. शक्यतो लेखीच. मेडीकल सर्टीफीकेट जसे अनिवार्य आहे तसेच.

मोठे घर आहे, एकत्र कुटुंब आहे वगैरे लग्नाआधी मुलाने लपवून ठेवले होते काय?

एकत्र कुटुंब मोठे घर या बाबी लपवल्या न्हवत्या पण समजा कूंटुंबाची एकत्रीत १०० एकर जमीन आहे व खातेफोड करताना ५ समान वाटे होणार असे अप्रत्यक्ष भासवले. प्रत्यक्षात मुलाने काही कारणास्तव पैसे उचल घेतले होते व त्याबदल्यात हिस्सा कमी केला होता हे नंतर कळाले. आता ज्याची आर्थीक पत कमी त्याच्या कुटुंबाला कष्ट जरा जास्तच... प्रत्यक्ष दस्त वा सातबारा लग्न व्यवहारात कोणीच बघत नसल्याने हे वेळेत समोर येणे अवघड...

पोरगा उधळा आहे हा मुख्य प्रश्न आहे हे समजले, पण बायकोने त्याचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करणे याची काही शक्यता आहे काय?

होय प्रयत्न (दोन्हीकडे) चालु आहेत. विषेश्तः मुलीकडील लोक जावयाला कुवतीनुसार आर्थीक पाठबळही देउ इछ्चीतात पण पालथ्या घड्यावर पाणी नको व्हायला अथवा याची जावयाला सवयच लागली तर काय या प्रश्नामुळे एकुणच ते जरा साशंक मनस्थितीमधे आहेत.

अवांतरः- एक नक्कि मला स्वतःलाच आता एचार सर्वीसेस प्रमाणे लग्न व्यवहारही बॅक्चेक करु द्यायचा उद्योग स्थापन करावा असे प्रकर्षाने वाटु लागले आहे. जिथे स्थळे शारीरीक, मानसिक व आर्थीक बाबींवर गोपनीय व तठस्थपणे सर्टीफाय केली जाइल. विषेशतः लांबचे स्थळ बघताना याची अतिशय आवश्यकता वाटत आहे. स्थळांना निरर्थक, भडकाउ, विनोदी, मार्मीक, रोचक अशा श्रेण्यांमधे चांदण्यांचे रेटींग द्यावे काय ?

अतिशहाणा Mon, 30/03/2015 - 17:18

In reply to by रेड बुल

क्र. १च्या सुनंदाने फ्लॅट-गाडी-ऑफिस नवऱ्याच्या नावावरच असेल तर लग्न करणार असे निक्षून सांगितले होते का? तसे नसेल तर मुलाचे कर्तृत्व आणि त्याच्या घरच्यांचा साधा स्वभाव आवडतो ह्याचे नाटक करुन लग्न केल्याच्या नावाखाली सुनंदानेच फसवणूक केली असे का म्हणू नये.

नितिन थत्ते Mon, 30/03/2015 - 20:33

In reply to by रेड बुल

>>एकत्र कुटुंब मोठे घर या बाबी लपवल्या न्हवत्या पण समजा कूंटुंबाची एकत्रीत १०० एकर जमीन आहे व खातेफोड करताना ५ समान वाटे होणार असे अप्रत्यक्ष भासवले. प्रत्यक्षात मुलाने काही कारणास्तव पैसे उचल घेतले होते व त्याबदल्यात हिस्सा कमी केला होता हे नंतर कळाले.

लग्न मुलाशी केले होते की त्याच्या इष्टेटीशी?

बॅटमॅन Tue, 31/03/2015 - 10:12

In reply to by नितिन थत्ते

असंच काही नाही. शेवटी स्वतःला चैनीत राहता आल्याशी कारण, मग त्यासाठी कपॅबिलिटी कुणाची का असेना.

रेड बुल Tue, 31/03/2015 - 12:02

In reply to by नितिन थत्ते

लग्न मुलाशी केले होते की त्याच्या इष्टेटीशी?

अरेंज मॅरेज मधे लग्न ठरवले जाते. यामधे वय, रंग, रुप, जात, शिक्षण, पैसा, उंची व मेरीटॉल स्टॅटुस या घटकांचा विचार होत असतो... बाकी आपण सुज्ञ असा यापैकी एका वा अनेक घटकात फसवणुक केल्या गेल्या असेल तर. :)

ॲमी Tue, 31/03/2015 - 06:57

अवांतरः- एक नक्कि मला स्वतःलाच आता एचार सर्वीसेस प्रमाणे लग्न व्यवहारही बॅक्चेक करु द्यायचा उद्योग स्थापन करावा असे प्रकर्षाने वाटु लागले आहे. जिथे स्थळे शारीरीक, मानसिक व आर्थीक बाबींवर गोपनीय व तठस्थपणे सर्टीफाय केली जाइल. विषेशतः लांबचे स्थळ बघताना याची अतिशय आवश्यकता वाटत आहे. >> अशा डिटेक्टीव एजन्सी अस्तिवात आहेत कित्येक वर्षांपासून.

तुम्ही आतापर्यंत जी काही उदा. दिली आहेत त्यांना Quid pro quo प्रकारचे गुन्हे म्हणता येइल. पण सध्याच्या विवाहकायद्यांत याबद्दल काही तरतूद नाही. त्यामुळे प्रिनप अॅग्रिमेंट हा एक पर्याय होऊ शकतो.

बादवे घटस्फोट न घेतादेखील दुसरे लग्न करता येते. कारण दुसर्या लग्नावर आक्षेप 'फक्त' पहिला नवरा/बायको किंवा बायकोचे जवळचे पुरुष नातेवाइक वडिल, काका, मामा, भाऊ इ घेऊ शकतात. इतर कोणीच अडथळा आणू शकत नाही. पण दुसर्या लग्नानंतर अजून काही व्यवहारीक अडचणी आल्या तर त्या कशा निस्तरायच्या याबद्दल थोडं काँप्लिकेशन होऊ शकतं.

अर्धवट Tue, 31/03/2015 - 10:37

माझ्या बहुतेक प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळाली तर आवडले असते पण असो,
आता त्यावर माझे किंचित मतप्रदर्शन करतो.

लग्न करण्याआधी, सरकारला इन्वॉल्व्ह केले होते काय? म्हणजे साडेबात्तेचाळीस लाख नगद संपत्ती असेल तरच हा विवाह ग्राह्य धरला जाईल अशी काही अट, कागद, करार केला होता काय?

असा काही कागद करार केला नसेल तर फसवणूक झाली असे लिगली म्हणता येणार नाही.

अरेंज्ड मैरेज असेल तर, याद्या वगैरे करायच्या वेळेला "तुमच्याकडे बत्तावन्न लाख रुपयाची मालमत्ता आहे म्हणून आम्ही या लग्नाला तयार आहोत बरे" असे मध्यास्थांसमोर बजावले होते काय?

हे जर केले नसेल तर आता उगाचच बोंब मारण्यात येत आहे असा निष्कर्ष काढावा लागेल, मी तुमच्याकडे किती मालमत्ता आहे हे बघून तुझाशी लग्न करत आहे याची स्पष्ट कल्पना आधीच दिली असती तर मुलाने ती मालमत्ता टिकवण्यासाठी वा वाढवण्यासाठी (बायको टिकावी या प्रलोभनापोटी) प्रयत्न केला असता.

मोठे घर आहे, एकत्र कुटुंब आहे वगैरे लग्नाआधी मुलाने लपवून ठेवले होते काय?

मोठे घर, एकत्र कुटुंब यामध्ये कदाचित आपण गफलत करून त्यात १०० एकर मिळकतीचा मुद्दा आणला आहे, समजा पाच भाग होऊन, आणि त्यातूनही आणखी कमी करून १० एकर जरी शेती राहिली तरी विभक्त होऊन त्यात सन्मानाने जगता येईलच असा अंदाज आहे (जमिनीचा पोत आणी इतर घटकही लक्षात घ्यावे लागतील)

पोरगा उधळा आहे हा मुख्य प्रश्न आहे हे समजले, पण बायकोने त्याचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करणे याची काही शक्यता आहे काय?

लग्न टिकवायचेच असा आग्रह असल्यास केवळ हाच मार्ग सर्वोत्तम म्हणता येईल. त्या मुलाशी समोर बसून नीट बोलणे "मी तुझ्याकडे एवढी संपत्ती आहे असे समजून लग्न केले होते, आता तेवढी संपत्ती नाहीये तेव्हा तुला अमुक सवयी बदलाव्या लागतील" असा काही संवाद होऊ शकेल.

दाखवलेलं स्थळ आणि लग्न झालेलं स्थळ हे दोन्ही वेगळे आहेत असा संशय कशामुळे आला नक्की ?

याचे उत्तर मिळाले नाही.

अवांतर -
मुलाचा अथवा मुलीचा स्वभाव, विचार व कर्तुत्व न पाहता, संपत्ती, जात, घराणे, प्रतिष्ठा इत्यादी पाहून लग्न करून नंतर "फसलो की हो" म्हणून गळा काढणे हि वृत्ती अजूनही अगदी सर्रास दिसून येते.
अरेंज्ड मैरेज वा स्कील्फुली अरेंज्ड मैरेज दोन्हीकडे हि वृत्ती मी पाहिलेली आहे.
लग्न हा व्यवहार म्हणून करायचा असेल तरीही हरकत नाही पण मग व्यवहारातल्या फायद्याबरोबरच तोट्यातहि हिस्सा भरावा लागला तर उगाच बोंब मारू नये.

गवि Tue, 31/03/2015 - 11:21

चित्र जे काही दिसतंय त्यावरुन

दिलेल्या सर्व केसेसमधे फसवणूक खचितच झालेली आहे. ती फसवणूक मुलीची मुलाकडून झालेली आहे.

मुलीला स्वतःला श्रीमंतीचा, आयत्या पैशाचा, आरामात बिनश्रमाचे आयुष्य काढण्याच्या कल्पनेचा वगैरे किती सोस आहे किंवा ती किती स्वार्थी आहे या कशावरही तिची फसवणूक झाल्याचं खापर फोडता येणार नाही. फसवणूक ही फसवणूकच आहे. चुकीची माहिती देणे ही ती फसवणूक आहे. ती खालील वेगवेगळ्या प्रकारची आहे:

अ. चुकीची / असत्य माहिती पुरवणे
ब. मटेरियल फॅक्ट्स दडवणे
क. उपरोक्त दोन्ही दडवणुका लग्नास मुलीकडून होकार यावा अशा उद्देशाने करणे (लग्न होऊन पत्नी मिळणे हा लाभाचा भाग आहे हे स्पष्ट असल्यानेच लग्नाची इच्छा केलेली असल्याने)

म्हणजेच एखादा उद्देश पार पडावा म्हणून समोरच्या संबंधित व्यक्तीला खोटी माहिती देणे अथवा खरी माहिती विचारलेली असून / लपवणे योग्य नसूनही लपवणे हा फसवणुकीचा प्रकारच आहे.

ही फसवणूक कायद्याच्या चिमटीत पकडण्यासारखी नाही. विवाहापूर्वी लिखित करार किंवा प्रतिज्ञापत्र नसल्याने प्रत्यक्ष संपत्ती किती होती किंवा ती किती असल्याचं सांगितलं गेलं या सर्व गोष्टींना कायद्याच्या कोर्टात उभा राहणारा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे दुर्दैवाने अशा बाबतीत कायद्याने भरपाई मिळेल असं वाटत नाही.

समजा, मुलगी कितीही पैशासाठी हपापलेली असली, ती फक्त पैशाकडे पाहून लग्न करत असली तरीही तिला पैशाविषयी चुकीची माहिती देणे आणि अंधारात ठेवणे इतकीच कृती फसवणुकीचा आरोप सिद्ध होण्यास पुरेशी आहे.

एखाद्याचे घर फोडून आतला माल पळवणे ही चोरी असते. ते घर कोणाचे आहे, त्या घरातला मालही मुळातच चोरीचा आहे का? तो माल अन्यायाने कमावलेला आहे का? त्या घराच्या सुरक्षिततेची पुरेशी काळजी घेतली गेली आहे का? चोराला चोरीची किती निकड आहे .. यापैकी कशावरही चोराचे समर्थन होऊ शकत नाही.

वरील केसेसमधे आता मुलगी जर मूळ फसवणुकीवर कायदेशीर भरपाई मिळत नाही म्हणून अस्तित्वात नसलेला एखादा गुन्हा सासरच्यांवर घालेल (अन्य मार्गाने वसुलीकरता.. उदा. छळ, हुंडामागणी वगैरे) तर तिच्याकडूनही फसवणूकच होईल. ती कोर्टात उभी राहून कदाचित फसवणूक करुनही तिला भरपाई मिळेल. कारण कायदा बायस्ड आहे.

दॅट इज दॅट.

अर्धवट Tue, 31/03/2015 - 15:14

In reply to by गवि

गवि, तुमचा मुद्दा टेक्निकली योग्यच आहे पण तसा टेक्निकलीही योग्य नाहीच,

सगळ्या मुद्द्यांचा विचार करता, संपत्तीच्या संदर्भातला कुठलाही करार लेखी अथवा तोंडी झालेला नसल्याने, दिलेली (खरी अथवा खोटी) माहिती त्या करारासाठी दिलेली माहिती आहे असे म्हणता येत नाही.
तस्मात खोटी माहिती दिली हे मान्य पण त्या खोट्या माहितीमुळे फसवणूक झाली असे म्हणता येईलच असे नाही.

यापलीकडे एक शक्यता नोंदवतो ,
अशा केसमध्ये माहिती शक्यतो तोंडावर विचारली जात नाही, ती इतर मार्गाने जमा करण्याचा प्रघात असतो. जर ती माहिती थेट दिली गेली नसेल तर अजूनच रोचक ठरेल. म्हणजे नक्की किती संपत्तीत कुणाचा अधिकार आहे हे नक्की माहिती नसताना (त्या अमक्याच्या घरी ना, बख्खळ जमीनजुमला आहे की, मालदार आहे पार्टी) असे ओळखीच्या लोकांनी वा मध्यस्थांनी सांगणे. आणि हीच माहिती कंफर्म मानून पुढे पाउल टाकणे असे बऱ्याचदा घडते, असे घडले असेलच असे नाही.
कदाचित, ती माहिती तोंडावर विचारली गेली असती तर नक्की संपत्ती व हिस्सेदार समोर आलेही असते, ती समोरासमोर प्रत्यक्ष विचारूनही १०० एकर जमीन आहे पण ती वडिलोपार्जित आहे, (म्हणजे एकापेक्षा जास्त हिस्सेदार आहेत ) हे सांगण्यात आले नसेल तर हे नक्कीच फसवणूक करण्याच्या उद्देशाने खोटी माहिती देणे आहे.

अर्थातच तुम्हीच म्हणल्याप्रमाणे, यापैकी काहीही कोर्टात स्टॅंड होईलच असे नाही, कारणे अनेक आहेत.

गवि Tue, 31/03/2015 - 15:38

In reply to by अर्धवट

हो..

सगळ्या मुद्द्यांचा विचार करता, संपत्तीच्या संदर्भातला कुठलाही करार लेखी अथवा तोंडी झालेला नसल्याने, दिलेली (खरी अथवा खोटी) माहिती त्या करारासाठी दिलेली माहिती आहे असे म्हणता येत नाही. तस्मात खोटी माहिती दिली हे मान्य पण त्या खोट्या माहितीमुळे फसवणूक झाली असे म्हणता येईलच असे नाही.

तात्विक, नैतिक (इफ देअर इज एनीथिंग लाईक दॅट) प्रकारची फसवणूक. कायदेशीर नव्हे.

म्हणजे नक्की किती संपत्तीत कुणाचा अधिकार आहे हे नक्की माहिती नसताना (त्या अमक्याच्या घरी ना, बख्खळ जमीनजुमला आहे की, मालदार आहे पार्टी) असे ओळखीच्या लोकांनी वा मध्यस्थांनी सांगणे. आणि हीच माहिती कंफर्म मानून पुढे पाउल टाकणे असे बऱ्याचदा घडते, असे घडले असेलच असे नाही.

माहिती प्रत्यक्ष वराने / वराच्या कुटुंबियांनी दिली नसेल आणि त्रयस्थ सोर्सेसकडून गोळा केलेली असेल तर फसवणूक झालेली नाही असं म्हणता येईल. पण खर्‍या परिस्थितीची (जी प्रत्यक्षात आहे) तिची माहिती वरपक्षाने दिली असती तर त्रयस्थ सोर्सेसची माहिती चुकीची, अतिशयोक्तीपूर्ण आहे हे वधूपक्षाला कळलं असतं. वरपक्षाची सांपत्तिक स्थिती ही मटेरियल फॅक्ट आहे आणि ती खोटी सांगणे किंवा ती सांगण्याचं टाळणे हे दोन्ही फसवणूक या सदरातच पडतात. हेच वधूपक्षालाही लागू. लग्न करताना सांपत्तिक स्थिती कशी का असेना, ती समोरच्या पक्षाला माहीत होऊ न देणं हीदेखील फसवणूकच आहे.

कदाचित, ती माहिती तोंडावर विचारली गेली असती तर नक्की संपत्ती व हिस्सेदार समोर आलेही असते, ती समोरासमोर प्रत्यक्ष विचारूनही १०० एकर जमीन आहे पण ती वडिलोपार्जित आहे, (म्हणजे एकापेक्षा जास्त हिस्सेदार आहेत ) हे सांगण्यात आले नसेल तर हे नक्कीच फसवणूक करण्याच्या उद्देशाने खोटी माहिती देणे आहे.

तोंडावर विचारुनही फर्स्टहँड चुकीची माहिती देणं याला सरळसोट फसवणूक म्हणता येईल.

इन एनी केस, आधी दडवलेली माहिती किंवा चुकीची दिलेली माहिती नंतर सत्य समोर आल्यावर बदल घडवणारी असणे म्हणजे फसवणूक.

अतिशहाणा Tue, 31/03/2015 - 16:07

In reply to by गवि

गवि, खरी परिस्थिती सांगायची म्हणजे काय ते कळले नाही. वरील कुठल्याही उदाहरणात वरपक्षाने स्वतःहून खोटे सांगितले आहे असे दिसले नाही. सुनंदापक्षाने वरपक्षाच्या आर्थिक परिस्थितीाबाबत स्वतःची विशिष्ट समजूत करुन घेतली आहे असे दिसते.

मी जॅकी चॅन यांना यासंदर्भातच प्रश्न विचारला होता. सुनंदापक्षाने मी संपत्तीसाठी लग्न करते आहे हे स्पष्ट सांगितले होते का? ज्याअर्थी संपत्तीच्या कारणावरुन लग्न मोडले जात आहे त्याअर्थी सुनंदापक्षाचा उद्देश पैशासाठी लग्न करणे हा होता. ही मटेरिअल फॅक्ट लग्न ठरवताना लपवली होती की नाही?

एनआरआय उदाहरणात नक्कीच फसवणूक झाली आहे.

अप्पा जोगळेकर Fri, 03/04/2015 - 00:04

काही मुली विशिष्ट प्रकारची अंतर्वस्त्रे वापरुन स्वतःच्या शरीराबद्दल खोटा आभास निर्माण करतात. अशा पद्धतीने मुलगी पसंत झाल्यास ती फसवणूक या सदरात मोडते का ?

रेड बुल Fri, 03/04/2015 - 00:19

In reply to by अप्पा जोगळेकर

काही मुली विशिष्ट प्रकारची अंतर्वस्त्रे वापरुन स्वतःच्या शरीराबद्दल खोटा आभास निर्माण करतात. अशा पद्धतीने मुलगी पसंत झाल्यास ती फसवणूक या सदरात मोडते का ?

ब्रॉथेलचा अनुभव नसल्याने आपला पास :)

रेड बुल Fri, 03/04/2015 - 13:59

In reply to by अतिशहाणा

मला अनुभव नाही से स्पष्ट केले आहेच.. इन केस कोणी गेले असेल तर म्हणून विचार मांडला.

अप्पा जोगळेकर Fri, 03/04/2015 - 00:27

In reply to by रेड बुल

जे गिर्हाईक जास्त मालदार त्याच्याकडे पाहून शुक शुक करणे आणि जो मुलगा जास्त मालदार त्याला होकार देणे या व्रूत्तीत साम्य आहे असे तुम्हास वाटते काय ? या वृत्तीला ब्रॉथेली प्रवृत्ती म्हणावे काय ?

रेड बुल Fri, 03/04/2015 - 14:05

In reply to by अप्पा जोगळेकर

मला अजुन आपले विचार स्पश्टपणे ऐकायचे आहेत, फारच रोचक. मोघम बोलु नका. बाकी माझं मत असे आहे की मला ते ब्रॉथेली वाटत नाही. स्त्रियांनाही स्वयंवराचा हक्क सर्वमान्य आहे. त्यामधे पुरुष जेंव्हा स्वतःला प्रदर्शीत करतात तेंव्हा मी पुरुषांनाही ब्रॉथेली वस्तु म्हणत नाही मग इतर बाबतीत काही ब्रॉथेली कसे ठरेल ?

अप्पा आपण एक नवीन धागा काढावा. फार महत्वाची चर्चा होते आहे.

अजो१२३ Mon, 06/04/2015 - 15:35

In reply to by अप्पा जोगळेकर

जे गिर्हाईक जास्त मालदार त्याच्याकडे पाहून शुक शुक करणे आणि जो मुलगा जास्त मालदार त्याला होकार देणे या व्रूत्तीत साम्य आहे असे तुम्हास वाटते काय ?

प्रकरण जर इतके शुष्क असेल तर साम्य वाटते असे म्हणेन.
-----------------------
परंतु सामान्यतः भारतात दहापट श्रीमंत असलेला मुलगा एकपट श्रीमंत असलेल्या मुलासमोर श्रीमंताच्या केवळ काही दुर्गुणांमुळे टाळणार्‍या मुलीच खूप प्रमाणात आहेत. शिवाय भारतात पैसा हा भोग्य म्हणून नव्हे तर पार्श्वभूमी, संस्कार, शिक्षण, कष्टण्याची वृत्ती इ इ चे एक रफ बॅरोमीटर आहे. मंजे लूजली रिलेटेड. "मला फक्त ऐश करायची आहे. फुकटचा पैसा पाहिजे." अशी वृत्ती अगदी श्रीमंत भारतीय मुलींत दिसत नाही. म्हणजे अतिश्रीमंत बापाच्या मुली "शिकलेला" म्हणून निवडलेल्या मिडलक्लास नवर्‍यासोबत अतिशय आदराने आणि प्रेमाने वागतात. माहेरीच मानापमान झाले तर सहन करतात. तेच श्रीमंत मुलांचं आहे. श्रीमंती गेली तरी नवर्‍यासोबत राहीन अशी मुलींची लग्नावेळेसची मानसिकता असते असे जनरल निरीक्षण आहे. पण गाडी, घर, शिक्षण इ इ मधे मुलींच्या आईबापांचे जे कुत्रेहाल त्यांच्या स्वतःच्या जीवनात होतात ते पाहून ते आपली मुलगी या पुढच्या लेवलच्या घरात जावी असे इच्छितात. या सर्व इच्छा मुलीच्या आहेत असा आरोप होतो. ते तितकेसे खरे नसावे.
अर्थातच याला अपवाद चिकार आहेत. वाढत आहेत. पण मुली अजूनही 'किमान घर चालवण्यास पात्र' च्या आसपास निकष ठेवतात.

अनु राव Mon, 06/04/2015 - 15:54

In reply to by अजो१२३

अजो - तुम्ही कीतीही क्षमा वगैरे मागायची नाटके करुन सध्या तुम्ही कसे बदलला आहात असा दाखवायचा प्रयत्न केलात तरी अश्या प्रतिसादांवरुन दिसते की तुम्ही अजुनही पुष्पक विमानात बसुन ऊडता आहात.

अजो१२३ Mon, 06/04/2015 - 16:49

In reply to by अनु राव

तुम्ही कीतीही क्षमा वगैरे मागायची नाटके करुन सध्या तुम्ही कसे बदलला आहात असा दाखवायचा प्रयत्न केलात तरी ...

नाटके वैगेरे नाही ... रोज रोज पंगा घेणे माझ्या क्षमतेच्या बाहेरचे आहे. म्हणून मी माझे विचार हळूहळू बदलून घेत आहे. नैतरी ऐसीवरचे भूमिकात्मक विचार आणि लहानपणीचा सिलॅबस यांना जीवनात सारखेच महत्त्व आहे. बदलले तर फार फरक पडत नाही.
--------------
विचार बदलले असं स्ट्रीक्टली म्हणता येणार नाही, पण नो अँटानोनिझम. आय डोन्ट हॅव कॅपॅसिटी टू हँडल इट, म्हणून.

ऋषिकेश Mon, 06/04/2015 - 16:00

In reply to by अप्पा जोगळेकर

"जो मुलगा जास्त मालदार त्याला होकार देणे" हे वाचून लाडक्या प्राइड अ‍ॅण्ड प्रेज्युडिसमधील ओपनिंग करणारे ब्रिटिश खवचट्टपणाचा अस्सल नमुना असलेले अतिप्रिय वाक्य आठवले:

It is a truth universally acknowledged, that a single man in possession of a good fortune, must be in want of a wife

बॅटमॅन Mon, 06/04/2015 - 17:24

In reply to by ऋषिकेश

हे वाक्य नक्की खवचट आहे का? ती कादंबरी थोडी वाचली (पूर्ण वाचवली नाही, खोटे कशाला बोला?) त्यावरून तसा ग्रह झाला नाही.

ॲमी Mon, 06/04/2015 - 17:42

In reply to by बॅटमॅन

पूर्ण वाचवली नाही, खोटे कशाला बोला? >>
ह्ये ह्ये मलापण फार बोर झालेलं ती कादंबरी वाचताना. ऋने अतिशय कौतुक केल्याने BBC सिरीज पाहिली. ती फार आवडली. म्हणून मग परत कादंबरी वाचली. तर ती परत बोरच झाली :-D.
बाकी वरचे वाक्य आणि अजून एक वाक्य आहे ज्यात लिझ मोठ्या बहिणीला सांगते की "डार्सीची इस्टेट बघीतल्यावर मी त्याच्याबद्दल पॉझिटीव विचार करायला चालू केला" ही दोन्ही वाक्य मलादेखील खवचट न वाटता म्याटर ऑफ फ्याक्ट स्टेटमेंट वाटलेली.

बॅटमॅन Mon, 06/04/2015 - 17:58

In reply to by ॲमी

बाकी वरचे वाक्य आणि अजून एक वाक्य आहे ज्यात लिझ मोठ्या बहिणीला सांगते की "डार्सीची इस्टेट बघीतल्यावर मी त्याच्याबद्दल पॉझिटीव विचार करायला चालू केला" ही दोन्ही वाक्य मलादेखील खवचट न वाटता म्याटर ऑफ फ्याक्ट स्टेटमेंट वाटलेली.

क्या बात है. हे तर अगदी उत्क्रांतीला धरूनच आहे की. असे असताना मग तो तथाकथित ब्रिटिश खवचटपणा कुठून आला ते कळलं नाही.

I smell some hurt fans. It's okay, truth does hurt.

अजो१२३ Thu, 09/04/2015 - 11:13

In reply to by बॅटमॅन

चल बॅट्या, आपण ऐसीच्या परंपरेनुसार आता (आता म्हणजे ही नवरा ठरवायची पद्धत आणि ती दुसर्‍या धाग्यावरची लेकरांना बांडगूळ म्हणायची पद्धत) टिंकूची काळजी वाटून घ्यायला चालू करू. =)) =)) =)) =)) =)) =))
----------------------------
या चिंतातुर जंतू बंधुने खरोखरीच ऐसीवरची संस्कृती चिंतासंस्कृती बनवून टाकली आहे. =)) =)) =))

ऋषिकेश Thu, 09/04/2015 - 11:06

In reply to by ॲमी

दुसरे वाक्य मलाही खवचट वाटत नाही. किंबहुना ती जेव्हा बोलते तेव्हा काहिसा मिश्कील अंडरटोन मला जाणवतो.

ॲमी Thu, 09/04/2015 - 17:20

In reply to by ऋषिकेश

सिरीज बघीतलीतर ती किंचीत स्माइल देत ते वाक्य म्हणते आणि दोघी बहिणी फिदीफिदी हसतात ना? हो मिश्कीलही असू शकते. पण पुस्तक वाचताना टोन वगैरे काय आपल्याला जो वाटेल तोच.

ऋषिकेश Thu, 09/04/2015 - 11:04

In reply to by बॅटमॅन

खवचट वाक्ये सत्य नसतात असे काही नाही
किंबहुना एक्स्प्लिसिटली स्पष्ट न बोलली जाणारी सत्ये एखाद्या खुमासदार वाक्याद्वारे बर्‍यापैकी स्पष्ट - तरीही एका खास लहेज्यात - ऐकवली जातात तेव्हा वाक्याची नी सत्याची खुमारी वाढते. खवचटपणा हा भाषेचा एक अलंकारच आहे! (ऐसीवरही ती पॉसिटिव्ह श्रेणी आहे)

==

बाकी कादंबरी (किंवा काहीही) आवडणे - नावडणे हे अगदीच सापेक्ष आहे. त्यात काय दुखावून घ्यायचे!

अजो१२३ Thu, 09/04/2015 - 11:08

In reply to by ऋषिकेश

ऐसीवर खवचटपणा एक श्रेणी म्हणून सदलंकार आहे परंतु मी प्रतिसादात जेव्हा भयंकर खवचट मटेरियल लिहितो तेव्हा ऐसीवरची पुरोगामी लॉबी मला दणादण निरर्थक, भडकाऊ, खोडसाळ, इ इ ऋणालंकार श्रेण्या देतात.

शुचि. Mon, 06/04/2015 - 16:15

In reply to by अप्पा जोगळेकर

पैशाकरता लग्न is simply NOT WORTH it. हे मुलींना कळत नाही कारण आया....आयांना श्रीमंत जावई हवा असतो. त्यांचं हे मत असतं की श्रीमंती = कमी कष्ट = अधिक आनंद.
अन आईचा प्रभाव मुलीवर खूप असतो.
____
खरं तर चांगल्या मैत्रीतूनच विवाह व्हायला पाहीजे.

अप्पा जोगळेकर Fri, 03/04/2015 - 00:16

स्वतंत्र घर, स्वतःच्या नावावरचे घर, आई-वडील घरात असावेत की असू नयेत, अवयवांची मापे, स्टॅमिना, स्थावर जंगम, घरात किती कामे करावी लागतील या सर्व गोष्टींबद्दल करार करुन घेतला असेल तरच अशा तक्रारींना अर्थ असतो. सदर प्रकरणात मुलीकडच्यांची चिडचिड होताना दिसते कारण घटस्फोट मिळण्याची शक्यता नाही त्यामुळे पोटगी मिळण्याची शक्यता नाही.

नगरीनिरंजन Mon, 06/04/2015 - 19:44

"A person who can take revenge but chooses to forgive." हे सुनंदाच्या व्हाॅट्सॅपवरचं तिने स्वतःचं केलेलं वर्णन. सुनंदा बिचारी दु:खात आहे.
सुनंदाचं लग्न दहा वर्षांपूर्वी झालं तेव्हा तिचा नवरा लंडनमध्ये कामाला होता. लग्न करून अनेक स्वप्ने उराशी बाळगून सुनंदा लंडनला गेली. पहिलं वर्ष आनंदात निघून गेलं, पण दुसऱ्या वर्षी नवऱ्याने दुष्टपणा करून त्याच्या आईला व मोठ्या बहिणीला लंडन पाहायला महिनाभर बोलावून घेतलं. दोघींनी आल्या आल्या सुनंदाचा छळ सुरू केला. केवळ सुनंदा पूर्वीच्या स्त्रियांसारखी कमजोर नसल्याने ती या संकटाचा सामना करू शकली. त्या गेल्यावर मात्र अशा दुष्ट नवऱ्यावर अवलंबून राहिल्यास आपले भविष्य धोक्यात आहे आणि घरी बसल्यास असा त्रास वारंवार सहन करावा लागेल असा सूज्ञ विचार करून तिने एका भारतीय बॅंकेत कारकुनाची कंत्राटी नोकरी पकडली. वर्षभराने कंत्राट संपता-संपता ती प्रेग्नंट राहिली व त्यात तिचे एक वर्ष वाया गेले. मूल सहा-आठ महिन्याचे झाल्यावर तिने पुन्हा नोकरी करण्याची इच्छा प्रदर्शित केली तर नवऱ्याने दुष्टपणे संधी साधून पुन्हा त्याच्या आईला सहा महिने बोलावून घेतले. मूल एक-दीड वर्षाचे झाल्याशिवाय पाळणाघरात ठेवायचे नाही असे फालतू कारण त्याने पुढे केले. सहा महिन्यात अपेक्षेप्रमाणे सासूने तिचा भरपूर छळ केला आणि तिच्याशी भरपूर भांडणेही केली. सासू एकदाची परत गेली आणि सुनंदाचे जीवन एकदाचे पुन्हा थोडे सुसह्य झाले. भारतातून तिचा भाऊ उच्च शिक्षणासाठी तिच्या घरी येऊन राहिला आणि तिला थोडातरी आधार मिळाला.
अशी पाच-सहा वर्षे गेली आणि नवऱ्याने पुन्हा एकदा घात केला. आई-वडिलांच्या तब्ब्येतीचं कारण देऊन त्याने भारतात परत जायचा प्रस्ताव मांडला. सुनंदाने प्राणपणे विरोध केला, रडली पण त्या दुष्टाने नोकरी सोडलीच.
भारतात आल्यावर पुण्यातल्या त्यांच्या दोन फ्लॅट्सपैकी एका फ्लॅटमध्ये ते त्याच्या आईवडिलांसोबत राहू लागले. तिला पुन्हा नोकरी मिळण्यासाठी सॅपचा कोर्स करावा लागला. तिची नोकरी चालू झाली पण घरात सासूचा त्रास वाढतच होता. कामवाल्या बायांनी भांडी घासली की नाहीत, कपडे वाळत घातले की नाही हे सासू असूनही तिलाच बघावं लागायचं, सासूला साधा डिशवाॅशर लावता येत नव्हता. सकाळी ट्रेडमिलवर घालवायचा तिचा वेळ भलतीकडेच जाऊ लागला. हे सगळं असह्य झाल्यावर ती मुलाला घेऊन एक दिवस माहेरी निघून गेली. नातेवाईकांनी मध्यस्थी करून नवऱ्याच्या आईबापाला गावी परत पाठवायचे कबूल केल्यावर ती मोठ्या मनाने परत आली.
नवऱ्याचा दुष्टपणा माफ करण्याचा प्रयत्न करून सुनंदा आता एक स्वावलंबी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहे. मुलाला स्विमिंगच्या क्लासला नेता यावं म्हणून तिने नवऱ्याकडून फक्त ५० हजार रुपये घेऊन बाकी स्वतः:चे साठलेले पैसे टाकून एक सेकंडहॅंड कार घेतली. नवऱ्याच्या कारवर तिला आता अवलंबून राहावे लागणार नाही. हळूहळू सुनंदा तिच्यावर झालेल्या अत्याचारांतून बाहेर पडेल आणि एक मुक्त व संपन्न आयुष्य जगू लागेल अशी आशा करू. फसवणूक करणाऱ्या नवऱ्याला व छळ करणाऱ्या सासूला माफ करण्याच्या तिच्या औदार्याला सलाम!

अतिशहाणा Mon, 06/04/2015 - 19:50

In reply to by नगरीनिरंजन

सुनंदाची अवस्था वाचून वाईट वाटले. सुनंदाच्या धैर्याचे कौतुक करावे तितके थोडेच.

बॅटमॅन Mon, 06/04/2015 - 19:59

In reply to by अतिशहाणा

अगदी असेच म्हणतो. उत्क्रांतीला अनुसरूनच वागली बिचारी. तरी २ ऐवजी अजून जास्त फ्लॅट असलेला मुलगा मिळाला असता तर बरे झाले असते, नै? म्हणजे नवर्‍याघरच्या अडगळीलाही जागा मिळाली असती तिथेच कुठेतरी.

ऋषिकेश Thu, 09/04/2015 - 11:13

In reply to by नगरीनिरंजन

आमची प्रचंड लाडकी खवचट श्रेणी दिली आहे.

विनोद कसा दाढी केल्यासारखा असावा. दाढी तर साफ झाली पाहिजे मात्र ज्याची दाढी केलीये त्याला जखम मात्र होता कामा नये - आमचे लाडके पु.लं.

वरची कथा वाचून हेच वाक्य आठवले. मान गये उस्ताद!

ऋषिकेश Thu, 09/04/2015 - 13:34

In reply to by नगरीनिरंजन

आजच मी एका प्रतिसादात म्हटल्यानुसार अनेकदा खवचटपणा हा एका सत्याचा एक मोहक पद्धतीने केलेला अविष्कार असतो. :)

त्यात सत्यांश नसेल तर त्याचा 'खवट'पणा होतो.

ऋषिकेश Thu, 09/04/2015 - 16:24

In reply to by अजो१२३

तुम्हाला माझ्यातर्फे (खरंतर "है शाबास!" अशी श्रेणि द्यायची होती पण ती नसल्याने ) एक रोचक देत आहे