ही बातमी समजली का? - ६३
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
==
जुलै-डिसेंबर २०१४ ह्या काळात फेसबुककडे कंटेंट ब्लॉक करण्यासाठी आलेल्या विनंत्यांपैकी सर्वाधिक विनंत्या भारत सरकारकडून आल्या.
India Leads The World In Facebook Requests To Block Online Content
बातमीतल्या पहिल्याच वाक्यात
बातमीतल्या पहिल्याच वाक्यात "...including anti-religious matter and hate speeches.." असं आलंय, म्हणजे 'सजग'तेमुळे कंटेट ब्लॉक केला गेला असं म्हणण्यास वाव आहे. आज भारतातला फेसबूकचा युजरबेस सुमारे १०९ मिलीयन आहे, त्या मानाने ५,८३२ बातम्या ब्लॉक करणे (१ युजरची १ बातमी घरूनही) अत्यंत नगण्य नाही का?
चीनच्या गुगलला बॅन करण्यामागचे कारण माहित आहे का? अख्या गुगलला ब्लॉक करणे आणि फेसबूकसारख्या साईटवरचा काही कंटेंट ब्लॉक करणे हे सारखेच आहे का?
अजो म्हणताहेत ते युजरबेस व
अजो म्हणताहेत ते युजरबेस व ब्लॉक्स यांच्यातील टक्केवारी बघायला हवी याच्याशी सहमती आहेच.
मात्र ब्लॉक करणे म्हणजे 'सजगता' हे काही पटत नाही.
बाकी including anti-religious matter and hate speeches.." असं आलंय म्हणजे या व्यतिरिक्तही काही आहे जे बॅन केलंय. यात सद्य सरकार आहेच शिवाय आधीचे युपीएही आलं. त्यांनीही मनमोहन, सोनिया वगैरेंवरील कार्टून्स फेसबुकला काढायला सांगितले होते.
---
समांतरः
तसेही सदर सरकार "बॅन्ड इट" म्हणून प्रसिद्ध होऊ लागलेले आहे. युट्युबवर "बॅन चोद" नावाचे गाणेही काल व्हायरल झालेले पाहिले.
(प्रत्यक्षात मोदी सरकारने यातील किती गोष्टी बॅन केल्या आहेत ते तथ्य आणि उभी राहत असलेली प्रतिमा यात अंतर आहेच. पण हे अंतर खूप वाढले तर सरकारला ते धोकादायक आहे. शेवटी पुन्हा पॉलिटिक्स इज गेम ऑफ पर्सेप्शन्स)
फेसबूकवरचा कंटेंट ब्लॉक
फेसबूकवरचा कंटेंट ब्लॉक करण्याचं पर्सेंटेज अगदीच नगण्यं असलं तरी, ६ महिन्यात जवळ जवळ सहा हजार बातम्या, म्हणजे दर दिवशी अंदाजे तीस बातम्या ब्लॉक करण्याच्या विनंत्या! सरकारने हस्तंक्षेप करून ह्या बातम्या ब्लॉक करण्याची खंरंच गरज आहे का? की हा वेळेचा अपव्यय म्हणावा? नाही म्हणजे ह्यातल्या किती बातम्या खंरंच विस्फोटक होत्या म्हणून ब्लॉक करण्यात आल्या असाव्यात?
पहलाज निहलानींच्या हकालपट्टीचे संकेत
केंद्रीय माहिती-प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सेन्सॉर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष पहलाज निहलानींच्या हकालपट्टीचे संकेत दिले.
बहुतांशतः स्वागतार्ह
हकालपट्टीपेक्षा त्या निमित्ताने दिलेले वक्तव्य
सेन्सॉर बोर्डावर पुढील काळात मर्यादा घालण्यात येणार आहे. बोर्डाला फक्त चित्रपटांचा दर्जा ठरवण्याचे आणि प्रमाणपत्र देण्याचे अधिकार असतील. बोर्डाला सेन्सॉरशिपचा हक्क राहणार नाही
अंशतः (बहुतांशत:) स्वागतार्ह आहे.
सदर हक्क बोर्डाकडे रहाणार नाही हे चांगले आहे मात्र तो सरकार आपल्या हातात घेणार आहे का? असा सवाल या वक्तव्यातून उद्भवतो.
द हिंदूने कम्यूनल शब्दाची व्याख्या बदलली.
http://www.thehindu.com/news/national/uproar-in-lok-sabha-over-communal…
इथे तीन बातम्या आहेत.
पैकी केवळ हरयाणामधली बातमी कम्यूनल इंसिडेन्ट आहे.
आता मोदी सरकार आले आहे तेव्हा आपण कम्यूनालिझम वाढेल असे केलेले भाकित सिद्ध करायला कोणतीही पातळी गाठणार का?
कुणाच्या खांद्यावर?
Mr. Salim stressed that communal incidents was not confined to one state or one religion, hitting out at the BJP, the ruling party, accusing it of “creating a communal situation in the country.”
>> द हिंदूने कम्यूनल शब्दाची व्याख्या बदलली.
निरोप पोचवणाऱ्याला मारताय का?
ही अँटी टेकओव्हर स्ट्रॅटेजी
ही अँटी टेकओव्हर स्ट्रॅटेजी आहे. एम अॅण्ड ए च्या भाषेत याला काहीतरी शब्द आहे. आठवला की लिहितो.
ही स्ट्रॅटेजी अशी काहीतरी आहे:
- फ्लिपकार्टमध्ये आधीच प्रायवेट ईक्विटी (पीई) गुंतवणूक झाली आहे.
- प्रमोटर्स + पीई इन्वेस्टर यांना आपापलं शेअरहोल्डिंग % टिकवायचं आहे.
- पण दोघांनाही भीती वाटते आहे, की दुसरा फितूर झाला तर तो आपला हिस्सा विकेल, आणि येणारा शेअरहोल्डर कदाचित नवीन शेअर्स काढून आपला % हिस्सा कमी करेल (ईक्विटी डायल्यूजन)
- हे टाळावं म्हणून दोघेही एकत्र येऊन आपापला थोडा हिस्सा एक्स्चेंजवर लिस्ट करतात. हा हिस्सा मायनॉरिटी इंट्रेस्टची व्याख्या पूर्ण करण्याइतका असतो. म्हणजे लिस्टेड शेअरहोल्डर्सपैकी [९५%] लोकांना पटवल्याशिवाय नवे शेअर काढता येत नाहीत. पर्यायाने फितुरी-डायल्यूजन हा होस्टाईल टेकओवरचा मार्ग दुष्कर होतो.
याचा दुसरा पैलू शेअर व्हॅल्यूएशनमध्ये असतो. अनलिस्टेड कंपनीचं शेअर व्हॅल्यूएशन काहीही होऊ शकतं. पुरेशा शेअरहोल्डर्सचा पाठिंबा असेल तर श्रीमंत प्रायवेट कंपनीही अक्षरशः कवडीमोलात घेता येते. पण शेअर्स लिस्टेड असतील तर आपोआप एक मार्केट बेंचमार्क मिळतो.
काय की! पैसे काढून घ्यायची
काय की!
पैसे काढून घ्यायची इच्छा असती तर जिथे हवा आहे तिथल्या (पक्षी: भारत) स्टॉक एक्स्चेंजात लिस्ट केलं असतं. (बुक प्रॉफिट दाखवून. माझ्या माहितीप्रमाणे फ्लिपकार्टला कॅश प्रॉफिट आहे, पण बुक लॉस आहे.)
नॅसडॅकवर लिस्ट करणा खतरेसे खाली नहीं है. चला तो चांदतक नहीं तो शामतक हे नॅसडॅकवरच्या आयपीओजसाठी लागू पडतं. फेसबुकच्या आयपीओची काशी नॅस्डॅकने कढवल्यावर ट्विटर, लिंक्डइन यांनी न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजला पसंती दिली.
या प्रकरणाचं पुढे काय होतंय याची लईच उत्सुकता आहे. यशस्वी झालं तर बुकलॉस करणार्या होतकरू टेक कंपन्यांसाठी हा पायंडा पडेल. बोंबललं तर वॉ.स्ट्री.ज./इ.टा. मधले टायवाले पंडित "मैने पहलेही बोला था" असं म्हणायला मोकळे!
अजित नाझरे COEPचा
>> अजित नाझरे COEP चा आहे काय?
http://www.dnaindia.com/india
http://www.dnaindia.com/india/report-sharad-yadav-s-remark-on-women-exp…
शरद यादव वारंवार म्हणत आहेत कि सांस्कॄतिक बायसेस मुळे गोरा रंग कसा फेवर केला जातो ते मला अधोरेखित करायचे आहे. पण नग्न दृश्यांत, चित्रांत अभिजात कला आणि अभिव्यक्ति पाहणारे लोक शरद यादव यांचेवर झोडून टिका करताना दिसत आहेत. यादव यांना समजून घेण्यात मिडियाची आणि लोकांची चूक होते आहे असे वाटते.
क्षमस्व - पण जसे माझ्या मूळ
क्षमस्व - पण जसे माझ्या मूळ प्रश्नाचे आपण जे केले आहे ते त्याचे जिवंत उदाहरण आहे.)
अजो - तुमचा प्रश्न नव्हताच, विधान होते. त्यात तुम्ही ठामपणे शरद यादव ला बाकीच्यांनी समजुन घेतले नाही असे म्हणले होते. इथे इतरांना काय वाटते हे पण विचारले नव्हते. :-)
शरद यादव बद्दल पूर्वग्रह असल्यामुळे तो काहीही बोलला तरी माझ्या साठी चुक च.
राष्ट्रीय ऐक्य
>> नग्न दृश्यांत, चित्रांत अभिजात कला आणि अभिव्यक्ति पाहणारे लोक शरद यादव यांचेवर झोडून टिका करताना दिसत आहेत. यादव यांना समजून घेण्यात मिडियाची आणि लोकांची चूक होते आहे असे वाटते.
यादवांच्या निमित्तानं कधी नव्हे ते मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी, टेलिकॉम घोटाळ्यातल्या कनिमोळी, भाजपचे मंत्री रवी शंकर प्रसाद वगैरे लोक आणि हे तुमचे आवडते 'नग्न दृश्यांत, चित्रांत अभिजात कला आणि अभिव्यक्ति पाहणारे लोक' एकमेकांशी भांडण्याऐवजी एकाच बाजूला आले आहेत. देशातल्या दोन धृवांत ऐक्य झालेलं तुम्हाला पाहावत नाही वाटतं.
कसं काय ?
इन अ वे स्मृती इरानी या हीन प्रकारच्या महिला आहेत असं सुचवलं ना यादव यांनी?
हे स्पष्टीकरण कुठून आलं याची जामच उत्सुकता आहे.
जेव्हां इराणी यादवना म्हणाल्या कृपया कोणाच्याही बाबत रंगभेदी कमेंट करु नका ("I appeal to you to not pass any comment on anyone's skin colour.)
त्यावर यादव मला माहित आहे तुम्ही काय/कशा आहात ("I know what you are.")
यादव मला माहित आहे तुम्ही कशा प्रकारच्या महिला आहात असं ते अजिबात म्हणाले नाहीत
मग "हिनता" आलीच कुठे ?
त्यांनी फक्त स्मृती इरानी ह्या रंगभेदी महिला आहेत असंच प्रत्युत्तर केलयं.
काही वर्षांपूर्वी "मी इथे विष
काही वर्षांपूर्वी "मी इथे विष खाऊन आत्महत्या करेन पण महिला आरक्षण विधेयक संमत होऊ देणार नाही" असे जाज्ज्वल्ल्य उद्गार काढणारे श्री यादव महिलांबद्दल काहीही बोलु लागले की फारच गंमतीशीर वाटते.
The body of women from south is as good as beautiful they are. They (women) in our region are not that good as those (in south) know dancing,
हे त्यांचे पर्सनल मत आहे, निरीक्षण आहे, आवाहन आहे की तक्रार/कुरबूर? हे समजत नैये :P
बाकी मलाही इतका गहजब होण्यासारखे ते नक्की काय बोलले हे या बातमीत दिसले नाही. वरील वाक्य त्यांचे मत आहे व त्यांना दाक्षिणात्य महिला अधिक सुंदर वाटतात इथवर कळले. यात रंग कुठे आला? नी त्यात नक्की आक्षेपार्ह काय आहे?
दुसरे असे की he said, "I know what you are." याचा नक्की अर्थ काय? स्मृती इराणी काय आहेत? याचे साधे उत्तर खासदार आहेत किंवा मनुष्यबळ विकास मंत्री आहेत याहून वेगळे काय असु शकते? कोणी सांगेल काय?
===
श्री यादव हे काही स्त्रीवादी नाहीत. मात्र त्यांच्या ज्या वक्तव्यावर गदारोळ चालु आहे ते कोणते असा प्रश्न पडला आहे.
+१ हेच्च
बाकी मलाही इतका गहजब होण्यासारखे ते नक्की काय बोलले हे या बातमीत दिसले नाही.
शतशः सहमत. अगदी हेच्च म्हणायचं आहे. महिला आरक्षण नसावे हे देखिल एक राजकीय मत आहे, ते चूक का असेना. राजनेते आपली मते ड्राईव अक्रॉस व्हावीत म्हणून मरण्याची इ इ रुपके वापरतात. नॉट बिग डिल. त्यात किंवा ते एकूणच जे बोलतात, त्यात यादवांना बडवायसारखं काय आहे?
==============================================================================================================
ऑन अ लायटर नोट -
एवढी लांब निर्भया डॉक्यूमेंटरी पाहिली*, पाहावी लागली पिअर प्रेशर मधे तिचा कै उपेग नको का? डॉक्यूमेंटरी पाहिल्यापासून कुणाचा तरी मुकेश सिंग करायची प्रबळ इच्छा उफाळून येऊ लागली पण कोणी मिळेचना. फ्रस्टेशन निकालनेका किधर? म्हणून एक सिंपल फॉर्म्यूला... किसी ने जरा भी हलचल कि तो ... .आणि बिच्चारे यादव नेहमीच्या खाजेच्या वेळी हलचल करताना सापडले.
---------------
* मी (म्हणजे मी स्वतः) नै पाहिली. जनरल कमेंट आहे.
>>इस्रायलचा कोणी ही असा जो
>>इस्रायलचा कोणी ही असा जो पॅलेस्टाईन लोकांना थंडपणे, निर्दयपणे व क्रूरपणे तुडवेल तो मला आवडतो.
का बुवा? पॅलेस्टाइनचे लोक* नेसेसरीली तुडवण्यायोग्य असतात असं म्हणणं आहे का?
*गब्बर सिंग यांनी लोक असा शब्द वापरला आहे. "दहशतवाद्यांना, त्यांच्या म्होरक्यांना त्यांच्यातल्या फडतूसांना तुडवेल तो आवडतो"असे शब्द वापरले नाहीत.
इस्रायलमधल्या फडतूसांचं काय? की इस्रायलमध्ये नेसेसरीली कोणी फडतूस नसतातच?
गब्बर सिंग यांच्या नेहमीच्या श्रीमंत-फडतूस द्वैतातल्या फडतूसांना तुडवणारा चांगला असे गब्बर सिंग यांना न वाटता सरसकट पॅलेस्टाइनी लोकांना तुडवणारा चांगला असे का वाटले असावे?
पॅलेस्टाईन चे लोक तुडवून
पॅलेस्टाईन चे लोक तुडवून मारायच्या योग्य आहेत कारण - १) त्यांना दिलेल्या प्रचंड जनरस ऑफर्स ते नाकारतात, २) बाहेरून प्रचंड सपोर्ट असूनही शांततेच्या दिशेने काहीही प्रगती नाही व अशांततेला प्रचंड पाठिंबा, ३) वर्किंग लोकशाही सुद्धा राबवता येत नाही (आर्थिक व राजकीय पाठिंबा प्रचंड असूनही), ४) डबल वॉर क्राईम्स करणे व त्यास थेट सपोर्ट.
(यावर आणखी विवाद करू इच्छित नाही. तेव्हा तुम्हास माझे मत पटले नाही तर मनोबा म्हणतो तसे "गब्बर निरुत्तर आहे" असे समजावे. किंवा "गब्बर कडे काही मुद्दा नाही नुसतीच आक्रस्ताळी भाषा." असे समजावे.)
काहीही
मुळात मध्यपूर्वेतला नैसर्गिक वारसा नष्ट होण्यामागे पॅलेस्टायनी प्रवृत्तींचा किती वाटा आहे आणि अमेरिका-ब्रिटन-फ्रान्स यांच्या युद्धखोरीचा किती वाटा आहे हे नीट पाहिले पाहिजे.
दुसरं असं की उत्तर-दक्षिण अमेरिकेच्या विस्तीर्ण खंडातील मूलनिवासींचा संस्कृतीसकट वंशविच्छेद करणाऱ्यांच्या नेतृत्त्वाकडूनच आता दुसरे नैसर्गिक वारसा कसे नष्ट करताहेत याची लेक्चरे ऐकावी लागतात हे एक नवलच.
दुसरं असं की उत्तर-दक्षिण
दुसरं असं की उत्तर-दक्षिण अमेरिकेच्या विस्तीर्ण खंडातील मूलनिवासींचा संस्कृतीसकट वंशविच्छेद करणाऱ्यांच्या नेतृत्त्वाकडूनच आता दुसरे नैसर्गिक वारसा कसे नष्ट करताहेत याची लेक्चरे ऐकावी लागतात हे एक नवलच.
हे बाकी खरंच आहे. यांचीच तळी उचलून धरणार्यांचा ऐसीवर सुकाळ आहे.
बाकी माझी कमेंट अँटिपॅलेस्टाईन होती, प्रोब्रिटिश नव्हती.
ते आहे
पण पॅलेस्टाईनला मादागास्करमध्ये हलवल्यावर ते लगेच नैसर्गिक वारसा नष्ट करायला लागतील यामागे
१. सर्व पॅलेस्टायनी मंडळी आयसिस-तालिबानी आहेत
२. नैसर्गिक वारसा नष्ट करणे हे फक्त आयसिस-तालिबानींचेच व्यवच्छेदक लक्षण आहे
अशी गृहितके असल्याचा वास आला.
मला वाटतं काही वर्षांपूर्वी (आयसिसपूर्व काळात) लेबनॉन मध्ये बशर अल असादला हाकलण्यासाठी प्रोअमेरिकन फौजांनी जोरदार हल्ले करुन तिथल्या अनेक ऐतिहासिक इमारतींचे कायमचे नुकसान केले होते. लेबनॉन वगैरे भाग हा मध्यपूर्वेचा सांस्कृतिक मानबिंदू समजला जायचा. त्यावर काही वर्तमानपत्रांत लेख आले होते. मात्र त्यावरुन सर्व अमेरिकन/ब्रिटिश मंडळी नैसर्गिक वारसा नष्ट करतात असा निष्कर्ष कुणी काढल्याचे आठवत नाही.
लोक हो फार विचार करु
लोक हो फार विचार करु नका.
त्या पॅलेस्टनी लोकांना आणि त्यांच्या बांधवांना कुठेतरी दुर नेवून ठेवा असे म्हणायचे होते.
मादागास्कर चे नाव सुचायचे कारण म्हणजे, मादागास्कर बेट आहे म्हणजे ती लोक पुन्हा मानव वस्तीच्या आसपास सहजा सहजी येऊ शकणार नाहीत. पुन्हा आकाराने चांगले मोठे आहे. त्यामुळे आनंदानी मावतील.
वाटले तर बाकीच्या जगाने गव्हा/तांदुळाची पोती हवाई मार्गानी टाकावीत. खावून पिवुन मजेत रहा पण मादागास्कर मधेच रहा.
तसेही नैसर्गीक वारश्याबद्दल कौतुक वगैरे नाही. निसर्ग बदलतच असतो, वारसा वगैरे असे काही नसते.
फक्त पॅलेस्टीनला हलवले तर
फक्त पॅलेस्टीनला हलवले तर सीरिया, जॉर्डन, इजिप्त या सगळ्यांचं दुखणं तसंच राहील. (हे सगळे लोक कुठंतरी हलवण्यासाठी खूपच जागा लागेल)
फक्त पॅलेस्टीनी असे मी म्हणलेच नाही. पॅलेस्टीनी आणी त्यांचे बांधव.
जागा खुप लागणार नाही. फक्त रहाण्यासाठीच जागा लागेल. त्यासाठी मादागास्कर खुप मोठे आहे.
बाकीचे जग खंडणी म्हणुन अन्नधान्य देइल ना, अजुन पण काही पाहीजे असेल तर देइल. फक्त मादागास्कर सोडु नका.
इस्त्राईल गेली फक्त ६५ वर्ष आहे. त्या आधी १३०० वर्ष कुठे होता. तरी बाकीच्या जगाला त्रास होताच ना.
पुरणार नाही
मादागास्करची जागा पुरणार नाही. पॅलेस्टीन आणि त्यांचे दहाबारा अरब देशातले बांधव. पाकिस्तान-इंडोनेशियासारख्या नॉन अरब मुस्लिम देशातले भाऊबंद. या सगळ्यांना कशाला हलवत बसायचं. इट इज नॉट एफशियंट. इस्त्रायल आपला चिमुकला देश आहे. मादागास्कर काय अगदी मालदीवमध्येही मावेल.
अहो इथे एफिशियंट काय आहे हे
अहो इथे एफिशियंट काय आहे हे महत्वाचे नाहीये.
इस्त्राइल हलवला तर अरब लोक अरब्स्तान आणि पॅलेस्टाईन सोडुन कुठे बाहेर जाणार नाहीत ह्याची हमी कुठे?
ती हवी असली तर कुठल्या तरी बेटा चा शोध घ्यायला लागेल ना.
तुम्हाला मादागास्कर बद्दल प्रेम असेल किंवा जागा कमी वाटत असेल तर ऑस्ट्रेलिया ला हलवा. काही हरकत नाही.
काहिही
दुसरं असं की उत्तर-दक्षिण अमेरिकेच्या विस्तीर्ण खंडातील मूलनिवासींचा संस्कृतीसकट वंशविच्छेद करणाऱ्यांच्या नेतृत्त्वाकडूनच आता दुसरे नैसर्गिक वारसा कसे नष्ट करताहेत याची लेक्चरे ऐकावी लागतात हे एक नवलच.
पटलं नाही.
आत्ताच्याच लोकांनी रेड इंडियन्सना संपवलं का? हे म्हणजे मुसलमानांनी ५०० वर्षांपूर्वी लय देवळं फोडली आता काय सांस्कृतिक वारसा, धार्मिक सलोखा वगैरे म्हणताय असं किंवा ब्राह्मणांनी जातीय अत्याचारांविरुद्ध काही बोललं की तुम्ही २०० वर्षांपूर्वी हेच केलंत आता का बोलताय असं म्हणण्यासारखं आहे.
ओके, इन दॅट केस- ज्यांनी
ओके, इन दॅट केस- ज्यांनी शेकडो वर्षांपूर्वी मूलनिवाशांना संपवलं, ज्यांनी अख्ख्या जगातील लोकांना साम्राज्याच्या नरकात पिचवलं आणि जे आजही मिडल ईस्टमध्ये बोंबलत युद्धे करायला जातात अन जे आजही जपानला मिल्ट्री ठेवणे अलाऊ करत नाहीत त्यांच्याकडून लेक्चरे ऐकून घ्यावी लागणे म्हणजे उदाहरणार्थ रोचक आहे.
गैरलागू नाही
गैरलागू नाही. आयसिस-तालिबानकडे चर्चा गेली की त्यांची परंपरा कशी हिंसक आहे (भाऊ भावाला मारतो. मुलगा बापाला मारतो इ.) याची थेट पैगंबरपूर्व अरबी टोळ्यांपासून उलटतपासणी सुरु होते. मात्र प्रत्येकाच्याच पायाखाली असं काहीतरी जळत असतं ते दाखवून दिलं की ते मात्र पटत नाही.
दुरुस्ती
अवांतर :-
मुस्लिम अभिप्रेत असले तर विशिष्ट अल्पसंख्याकांना ऐवजी "विशिष्ट लोकसमूहांना" असं म्हटलं चालून जाइल ना ?
भारतातही " muslims are minority" असं का म्हणतात ते कळत नै.
muslims are second largest majority हे जास्त योग्य ठरणार नै का ?
आणि जगभरातील लोकसंख्येबद्दल बोलायचं तरी हेच लागू पडणार नै का ?
.
.
भारतामध्ये ख्रिश्चन, ज्यू किम्वा अनेकानेक इतर लहान समूहांना अल्प्संख्य म्हटलं तर समजू शकतो. मुस्लिम अॅज अ व्होल अल्पसंख्य कसे काय होउ शकतात ?
सगळीकडे असंच असतं
थोरला भाऊ-धाकटा भाऊ ही तुलना सगळीकडेच चालते. धाकटा भाऊ ६० वर्षाचा झाला तरी तो धाकटा कसाकाय असं म्हणता येत नाही. अमेरिकेत अगदी प्रेसिडेंट झाला तरी ओबामाची कम्युनिटी ही मायनॉरिटीच आहे असा उल्लेख केला जातो. ते फक्त भारतातल्या विचारजंतांचं व्यवच्छेदक लक्षण नाही.
नाही
त्यांची परंपरा कशी हिंसक आहे (भाऊ भावाला मारतो. मुलगा बापाला मारतो इ.) याची थेट पैगंबरपूर्व अरबी टोळ्यांपासून उलटतपासणी सुरु होते.
असं होत नाही. मला तरी आत्ता तालिबान/आयसिस कसे वागतायत त्यावरच चर्चा दिसते. ते आत्ता काय अत्याचार करतायत त्याबद्दल हळहळ व्यक्त केलेली दिसते.
थुत
गब्बरचच लॉजिक एक्स्टेंड केल्यावर हे असं दिसतं :-
थुत त्या ज्यूंच्या.
त्यांना हाल हाल करुन मारलं नाझींनी.
ते मारले जाउ शकण्याइतपत दुबळे म्हणजेच फडतूस होते.
ठेवायची कशाला ही जमात.
ह्यातील एकेकाला वेचून वेचून मारलं पाहिजे.
त्यांच्या एकेका फ्यानचे नखं वगैरे.....
.
.
बादवे, गब्बर महत्वाच्या मुद्द्यांवर सहज निरुत्तर होतो आणि मग प्रतिसादांकडे दुर्लक्ष करुन तेच भुक्कड मुद्दे पुन्हा दुसर्या एखाद्या बातमीच्या संदर्भात जशाला तसे वापरतो असं दिसतं. त्यानं ह्या प्रतिसादाकडे दुर्लक्ष केल्यास ही बाब अधोरेखित होइल पुन्हा एकदा.
बादवे, गब्बर महत्वाच्या
बादवे, गब्बर महत्वाच्या मुद्द्यांवर सहज निरुत्तर होतो आणि मग प्रतिसादांकडे दुर्लक्ष करुन
तेच भुक्कड मुद्दे पुन्हा दुसर्या एखाद्या बातमीच्या संदर्भात जशाला तसे वापरतोअसं दिसतं. त्यानं ह्या प्रतिसादाकडे दुर्लक्ष केल्यास ही बाब अधोरेखित होइल पुन्हा एकदा.
असं मनोबा म्हणाला आहे ते ही मनावर घ्या.
'न्यू यॉर्क टाइम्स'चं संपादकीय
>> With nearly all votes counted, Benjamin Netanyahu's Lkud party is set to emerge as the election's big winner with 29 seats.
जमीन अधिग्रहण आणि खेडं
http://www.thehindu.com/opinion/lead/shaking-up-our-village-culture/art…
मला प्रचंड आवडला हा लेख. गावं ओस टाकून शहरीकरण झालचं पाहिजे या मताला पुष्टी देणारा लेख. आवर्जून वाचा.
कॉलिंग गब्बर...
जागा राखून ठेवीत आहे.
B.R. Ambedkar strongly disagreed with Gandhi’s celebration of village life and morals. He considered the idea of a village republic as one based on undemocratic values. He said, “What is a village — a sink of localism, a den of ignorance, narrow mindedness and communalism”.
मला वाटतं आंबेडकरांनी मांडलेल्या अनेक अत्यंत उपयुक्त विचारांमधे हा एक आहे. १) बहुपक्षीय लोकशाही, २) समाजवादास विरोध, ३) खेड्यांच्या उदोउदो वर केलेली ही टीका. (इतर बाबी सुद्धा आहेत - उदा. त्यांना आवडलेले (बुद्ध) तत्वज्ञान त्यांनी लोकांवर लादले नाही.).
खेडं हे रिग्रेसिव्ह्, रिस्क अव्हर्स, स्वतःच्याच नैतिक श्रेष्ठतेचा टेंभा मिरवणारे, तंत्रज्ञानाकडे कपाळाला आठ्या घालून पाहणारे असे एक युनिट आहे. (आता लगेच - गब्बर, तू किती दिवस खेड्यात राहिलेला आहेस ?). खेडं हे प्रचंड प्रमाणावर काँझर्व्हेटिव्ह (दुवा) चे मूर्त रूप आहे.
---------
Land in present times has turned out to be a major economic resource — it gives access to institutional credit, subsidies on fertilizers, power, farm equipment and almost institutionalised, decadal loan waivers. Some numerically powerful landowning castes also enrol themselves as Below Poverty Line (BPL) families. Land, thus, is a key form of private property that yields persistent rent, which is not necessarily based on its actual merit and which is, of course, not taxed.
मुद्दा ठीकठाक आहे. शेवटचा मुद्दा - टॅक्स चा उचित आहे.
ज्यांच्याकडे काहीही नाही त्यांनी "काहीही नसल्याच्या जोरावर" रेंट सीकींग केलेले चालते. उदा वेलफेअर बेनिफिट्स फॉर दोज व्हू आर अॅब्जेक्ट पूअर. पण ज्यांच्याकडे लँड आहे त्यांनी मात्र रेंट सीकींग करायचे नाही. असं का ???
-------
The illiberal aspects of rural society are changing slowly due to market pressures.
स्पर्धा प्रक्रिया ही जाती आधारीतच काय तर इतर कोणत्याही आधारावर केल्या जाणार्या भेदभावास (ज्या कनोटेशन ने तो शब्द वापरला जातो त्या अर्थाने) मारक असते -- हे या वाक्याचे भाषांतर आहे. भेदभाव हा भेदभाव करणार्याचा चॉइस च असतो. पण ज्याच्या विरुद्ध भेदभाव केला जाऊ शकतो त्याला खुल्या स्पर्धा प्रक्रियेत जे हत्यार उपलब्ध असते (भेदभाव करणार्यास शिक्षा करण्याचे) ते हत्यार खेड्यात उपलब्ध नसण्याची शक्यता जास्त असते. खूप कमी प्रमाणावर उपलब्ध असते.
खरंतर या वाक्याने सुरु होणारा तो सगळा परिच्छेदच लक्षणीय आहे. शेवटचे वाक्य सोडून.
--------
While Anna’s protest may be more about the right to private property of the farmers, Gandhi had a moral vision that was larger and beyond just the risk of farmers losing their land. Gandhi saw village life as the ideal form of intimate sacrifice and high culture, where an anarchy based on self-sacrificing morals would sustain itself far from the mess of modern industrial life and interest-driven politics.
कोणीतरी मला सांगा रे की - Gandhi had a moral vision that was larger and beyond just the risk of farmers losing their land - याचा नेमका अर्थ काय ?? मागे माझ्या एका मित्राने "मालमत्ता हा संकुचित विचार आहे" असा अविचार मांडला होता. मोरल व्हिजन म्हंजे नेमके काय व त्यात लार्जर व बियाँड (व्यापक) असे नेमके काय आहे/होते/असते ???
लेस्ली उडविन मुलाखत
'इंडियाज डॉटर' चित्रपटाच्या दिग्दर्शिका लेस्ली उडविनची एक मुलाखत प्रकाशित झाली आहे. बलात्कारित मुलीचा मित्र आणि प्रकरणाचा एकमेव जिवंत साक्षीदार अवनींद्र पांडे ह्याला हा माहितीपटावर टीका करावीशी का वाटली असेल, आणि तो ह्या माहितीपटात का नाही त्याचं स्पष्टीकरण त्यात आहे -
I tried for over a year to get Avanindra to come on the documentary, to give us the interview. Avanindra wanted money to give his interview and I refused point blank. I have paid no one on this documentary, nor would have paid.
[...]
Finally, my co-producer Dibang phoned Avanindra and said to him, we have a recording of Mukesh Singh, who drove the bus, saying that you hid behind the seats. We beg you Avanindra to come on and tell your version of what happened that night so that you can set the record straight if there is a record to be set straight here. We thought he would respond to that. Still he didn’t. At that point his answer was, “I can’t, I can’t. I’m in trouble, I’m in trouble.”
फॉरेन्सिक पुरावा
>> पण मग तसे बचाव पक्षाच्या वकिलांनी सिद्ध करायचा मोठा नी निकराचा प्रयत्न केला असता (असायला हवा).
प्रत्यक्षदर्शीच जर मानसिक दृष्ट्या स्थिर नाही हे सिद्ध झाले असते तर कदाचित केसच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असती.
प्रस्तुत खटल्यात डीएनए वगैरे फॉरेन्सिक पुरावा भक्कम आहे, त्यामुळे साक्षीदाराच्या मानसिक स्थितीवर खटल्याचा निकाल अवलंबून नसावा.
महोदया, भारतात बलात्कार
महोदया, भारतात बलात्कार करणारांची संघटीत लॉबी आहे असे म्हणायचे आहे काय? आणि कोण्या एका विशिष्ट केसमधे कोण्या विशिष्ट आरोपींना शिक्षा देण्यासाठी कोणी साक्षी दिली तरी त्याच्याविरुद्ध हे संघटन चिडून उठते आणि त्यांना ठार करते असे आहे का?
---------------
नोट दॅट मूळात ही केस एक जस्ट अनादर केस राहिली असती. पण या माणसाने खूप फाइट मारली आणि माध्यमांत निर्भयाला न्याय मिळावा म्हणून तो खंबीरपणे उभा राहिला. आपण लोक त्यात फार नंतर जुडलो. त्याने टीवी आजपावेतो (- आणि ही केस अति फेमस होण्यापूर्वी देखिल) एकूण किती साक्षात्कार दिले आहेत याची कल्पना आहे काय? या व्यक्तिने कोर्टाला संपूर्ण सहकार्य केले. सहकार्य केले म्हणणे देखिल चूक वाक्यरचना आहे - आपल्या मैत्रिणीला न्याय कोर्टात मिळालाच पाहिजे अशी त्याची भूमिका नि वर्तन होते.
------------------------
राहता राहिला प्रश्न आरोपींच्या संबंधितांकडून असलेल्या धोक्याचा. तो आत्ताच आहे का? आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी त्याने जितके प्रयत्न केले तितके पुरेसे आहेत अशा शत्रुत्वासाठी. बीबीसीला एक अजून मुलाखत दिल्याने असा किती फरक पडतो?
=============================
जाता जाता -
मी माझ्या मैत्रिणीला वाचवू शकलो नाही याचं शल्य घेऊन हा माणूस जगतो. त्याच्या आत्तापर्यंतच्या वागण्यात काहीही खटकण्यासारखं नाही. अजिबात काहीच नाही. सजग नागरीक म्हणून आम्ही दिल्लीकर भावनात्मकरित्या "विथ देम" होतो, आहोत. आता काही लोकांकडे पाहून प्रकर्षाने जाणवतं कि एखाद्या घटनेचे प्रत्येक अंग, उपांग जाणून घेणे, फॉलो करणे लांबलचक, कंटाळवाणे आणि कष्टाचे आहे. त्यापेक्षा ब्रँड बीबीसी हा शॉर्टकट सोपा आहे.
I am really horrified to see that a strong brand (like BBC) can bring disrepute to almost anyone if it wished so. असं म्हणायचं कारण कि जी दिल्ली या अविंद्रला इतका प्रचंड मानसिक सपोर्ट देत होती ती आज बीबीसीने त्याने मुलाखतीसाठी पैसे मागीतले म्हटले तेव्हा "शांत" आहे, इतकेच नव्हे बीबीसीवरच विश्वास ठेवत आहे. आणि रक्कम? करोडो? नो !!!
बीबीसी?
>> I am really horrified to see that a strong brand (like BBC) can bring disrepute to almost anyone if it wished so. असं म्हणायचं कारण कि जी दिल्ली या अविंद्रला इतका प्रचंड मानसिक सपोर्ट देत होती ती आज बीबीसीने त्याने मुलाखतीसाठी पैसे मागीतले म्हटले तेव्हा "शांत" आहे, इतकेच नव्हे बीबीसीवरच विश्वास ठेवत आहे.
तर्कात अंमळ गोंधळ वाटतो. कारण (माझ्या माहितीनुसार, चूभूद्याघ्या) -
- अवनींद्र माहितीपटात का नाही, ह्यावर बीबीसीनं काही म्हटलं नव्हतं.
- अवनींद्रनं आधी मीडियात येऊन माहितीपटावर टीका केली.
- तरीही बीबीसीनं त्यावर काही म्हटलं नव्हतं.
- मग लेस्ली उडविनला प्रश्नकर्तीनं त्याबद्दल टोकदार प्रश्न विचारला.
- त्याचं तिनं उत्तर दिलं. वर हेही सांगितलं - "Now I did not cast the first stone, I need to tell you. Had you not asked this question, I would not be telling you these things because I don’t go around deflecting from the issue with smear campaigns. It’s immoral, it’s incorrect."
- लेस्ली उडविन बीबीसीची प्रतिनिधी नाही.
I am really horrified to see
I am really horrified to see that a strong brand (like BBC) can bring disrepute to almost anyone if it wished so. असं म्हणायचं कारण कि जी दिल्ली या अविंद्रला इतका प्रचंड मानसिक सपोर्ट देत होती ती आज बीबीसीने त्याने मुलाखतीसाठी पैसे मागीतले म्हटले तेव्हा "शांत" आहे, इतकेच नव्हे बीबीसीवरच विश्वास ठेवत आहे. आणि रक्कम? करोडो? नो !!!
अजो - ह्यातुन काहीही कळत नाहीये. तुमचा BBC ( आणि सर्व विकसित राष्ट्र आणि त्यांच्या कंपन्या/संस्था ) ह्यावर इतका राग का ?)
आणि समजा त्याने पैसे मागितले असतील तर त्यात काही चुक नाही आणि लाजण्यासारखे पण नाही. बरेसचे विक्टीम आपल्या गोष्टी विकतात.
मी देशाचा ‘पोशिंदा’१)
१) एकीकडे निसर्ग माझ्यावर सूड उगवतोय, दुसऱ्या बाजूनं माय-बाप सरकार (तेही म्हणायलाच) माझ्यावर आसूड ओढतंय. निसर्गाचं अन् माझं जन्मोजन्मीचं नातं. तो नेहमीच माझ्यावर भारी पडत आलाय. पण माय-बाप सरकारचं मी काय घोडं मारलंय कुणास ठाऊक! ज्यांनी मला सावरण्याऐवजी पॅकेजची सवय लावली ते आता पॅकेजलाही नाही म्हणू लागलेत.
२) कधी मातीत पाय न ठेवलेला माणूस बी मला शेती शिकवू लागला आहे. उपदेशाचे डोस पाजू लागला आहे. बरं, त्याबद्दलही माझी काही तक्रार नाही.
----------------------
संत, महात्मे, राजकारण्यांच्या स्मारकांचा सुकाळ
एरवी "स्वातंत्र्योत्तर कालात सावरकरांवर अन्याय झाला" अशी बोंबाबोंब करण्यात पुढे असलेल्या संघ-भाजपावाल्यांना आज सावरकर का आठवत नाहीत ??
यूझरबेसचे प्रमाण आणि
यूझरबेसचे प्रमाण आणि विनंत्यांचे प्रमाण दोन्ही एकत्र पाहायला पाहिजे.
-------------
त्यातही भारतच वाईट ठरला तर भारत सरकार कोणत्याही माध्यमात काय प्रसारीत व्हावे काय नाही याबाबत सर्वात सजग आहे असे मानायला हवे.