Skip to main content

ही बातमी समजली का? - ४१

व्यवस्थापक : अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढण्यात येईल.
=======

जयललिता यांना शिक्षा ठोठावल्यानंतर विविध वृत्तपत्रात आलेले अग्रलेखः
म.टा.
लोकसत्ता

===
बाकी बेफाम, वाचाळा वगैरे विशेषणाचे धनी असणारे सुब्रमह्ण्यम स्वामींनी केलेल्या मोठमोठ्या आरोपमाळेपैकी २जी व आता या प्रकरणात त्यांचे म्हणणे खरे दिसु लागल्याने त्यांच्या बोलण्याकडे तितक्याच हलकेपणाने बघावे का?
जर व्यक्ती बघुन मत ठरवले गेले असते तर त्यांची केस दाखलही केली गेली नसती. सुदैवाने आपली न्यायालये कोण म्हटतंय यापेक्षा काय म्हटलेय याला महत्त्व देतात ;)

गब्बर सिंग Mon, 29/09/2014 - 15:06

http://timesofindia.indiatimes.com/india/Modi-meets-Israeli-PM-Netanyah…

नमो आज नेतानयाहूंना भेटले.

दोघं मिळून पाकिस्तान ला निर्दयपणे कुचलण्याचा प्रोग्राम बनवा म्हणावं. मस्त मजा येईल. आम्ही पण मस्त पाकी जनतेवर झालेली बाँबिंग टीव्ही वर बघू. तिकडे अमेरिकन ड्रोन ठोकतायतच. पण जोडीला भारतीय व इस्रायली विमानांनी सुद्धा भाग घ्यावा. म्हंजे ठुकाई पूर्ण होईल.

अनुप ढेरे Mon, 29/09/2014 - 15:13

बाकी बेफाम, वाचाळा वगैरे विशेषणाचे धनी असणारे सुब्रमह्ण्यम स्वामींनी केलेल्या मोठमोठ्या आरोपमाळेपैकी २जी व आता या प्रकरणात त्यांचे म्हणणे खरे दिसु लागल्याने त्यांच्या बोलण्याकडे तितक्याच हलकेपणाने बघावे का?

+१
त्या नॅशनल हेराल्ड केसचे आरोपदेखील बिनबुडाचे नव्हते बहुदा. त्याचं पुढं काय झालं ते नाही माहित. त्यांनी सोनियाजी आणि आदरणीय राहुलजींवरही अनेक आरोप केलेले आहेत त्यातही तथ्य असावं का?

मन Mon, 29/09/2014 - 15:19

In reply to by अनुप ढेरे

त्यांनी सोनियाजी आणि आदरणीय राहुलजींवरही अनेक आरोप केलेले आहेत त्यातही तथ्य असावं का?
ह्याबद्दल आदरणीय राहुल ह्यांनाच थेट विचारले असता, ते "तसे काही नाहिये. माझे शिक्षण वगैरे सगळे व्यवस्थित आहे." इतकेच सांगतात.
म्हणजेच स्वामींचा दावा खोटा (व अवमानकारक,बदनामीकारक) ठरु शकतो.
उलट राहुलच थेट अब्रू नुकसानीचा दावा ठोकून स्वामींना गजाआड करु शकतात.
( नितीन गडकरींनी असेच अब्रूनुकसान का कोणतेतरी खटले जिंकत केजरीवालांना "अंदर" केले आहे.
अजून कुणावर तरी गडकरींनी केस टाकली, पण त्यानं मुकाट्यानं नमतं घेतलं, औट ऑफ कोर्ट सेटलमेंट झाली;
व त्याला तुरुंगात जायला लागलं नाही.नेमकं कोण ते आठवत नै.
)
.
.
राहुलशेट असं करत नैय्येत. मौन पाळून आहेत म्हणजे असं तर नसावं की ....

ऋषिकेश Mon, 29/09/2014 - 16:16

In reply to by मन

नितीन गडकरींनी असेच अब्रूनुकसान का कोणतेतरी खटले जिंकत केजरीवालांना "अंदर" केले आहे

अं?
अभ्यास वाढवा :)

बाकी राहुल गांधी व सोनिया गांधींविरूद्ध स्वामीसुद्धा फॉर्मल तक्रार करत नाहियेत / खटला दाखल करत नाहियेत याचा अर्थ त्यांच्याकडेही पुरावे नाहितच!
राहुलने आपले शिक्षण लोकसभा उमेदवारीच्यावेळी शपशेवर सांगितले असणार. ते खोटे ठरले तर त्यांच्यावर मोठाच गुन्हा दाखल होऊ शकेल. पण खोटे ठरवणार कसे? पुरावे हवेत. राहुल यांना अब्रुनिकसानी दाखल केली तर पत्ते उघडावे लागतील. त्यामुळे त्यांच्याकडेही लपवण्यासारखे काहि नसेलच याची खात्री देता येत नाही पण तिथेही नक्की काहिच माहिती नाही.

दोघांकडेही फारसे ठोस मट्रीयल नसल्याने किमान या बाबतीत तरी नुसतीच पॉलिटिकल चिखलफेक चालु आहे असे वाटते

अनुप ढेरे Mon, 29/09/2014 - 16:22

In reply to by ऋषिकेश

राहुल यांना अब्रुनिकसानी दाखल केली तर पत्ते उघडावे लागतील.

प़ण आदरणीय राहुलजी असे का करत नसावेत असा प्रश्न पडतो.

ऋषिकेश Mon, 29/09/2014 - 16:25

In reply to by अनुप ढेरे

म्हणून तर पुढे म्हटलंयुअ की "त्यामुळे त्यांच्याकडेही (म्हंजे राहुल यांच्याकडे) लपवण्यासारखे काहि नसेलच याची खात्री देता येत नाही पण तिथेही नक्की काहिच माहिती नाही." :)

अनुप ढेरे Mon, 29/09/2014 - 16:32

In reply to by ऋषिकेश

निवडणूकीआधी अर्णब गोस्वामींनी यावर त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही प्रूफ का देत नाही तुमच्या इंग्लंडातल्या शिक्षणाचं. राहुलजींच उत्तर फार गूढ कायच्या काय होतं. म्हणजे ते उत्तर नव्हतच, त्यांनी अर्नब गोस्वामीला, जो तिथेच, केंब्रिजमध्येच, शिकलेला आहे, त्याला विचारलं की तु कुठल्या होस्टेलला होतास, मी अमुक अमुक होस्टेलला होतो. एव्हढच म्हणाले होते ते.

ऋषिकेश Mon, 29/09/2014 - 16:37

In reply to by अनुप ढेरे

=))
नशीब! केंब्रिजशी संबंधित काहितरी बोलला के किती मोठं श्रेय आहे!
तरी बरं असं नाही म्हणाला:
अगो: तुम्ही प्रुफ का देत नाही शिक्षणाचं
रागा: स्त्रीयांच्या सशक्तीकरणासाठी आमचा पक्ष झटतो आहे. स्त्रियांना, अल्पसंख्यांकांना सशक्त करू वगैरे वगैरे ;)

=))

मन Mon, 29/09/2014 - 16:46

In reply to by ऋषिकेश

"अभ्यास वाढवा " ह्या सल्ल्याचा अर्थ समजला नाही.
"केजरीवाल केलेले दावे सिद्ध करु न शकल्याने गोत्यात आले." किंवा गडकरींनी त्यांना कायद्याचा बडगा वापरुन गोत्यात आणले असे मला म्हणायचे आहे.
सुब्बु स्वामी असलेच बिनडोक्/खोटे दावे राहुलशेटबद्दल करीत असतील तर राहुलशेट त्याला कायद्यच्या बडग्यानं गोत्यात का आणत नसावेत अशी शंका आहे.

ऋषिकेश Mon, 29/09/2014 - 16:54

In reply to by मन

मुळ प्रतिसादात अधोरेखीत शब्दांकडे लक्ष वेधत - गडकरींनी/त्यांच्या खटल्यामुळे/आरोपांमुळे (किंवा कोणताही खटला जिंकून किंवा आरोप सिद्ध करून) केजरींना आत टाकलेले नाहि एवढेच निदर्शनास आणुन देऊन - पुन्हा तेच आवाहन करून खाली बसतो.

विवेक पटाईत Fri, 03/10/2014 - 08:56

In reply to by मन

केजरीवाल आणि स्वामी मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. स्वामीजी आधी पूर्ण माहिती काढतात आणि नंतर केस करतात. केजरीवाल - काही न बोलणे बरे.

ऋषिकेश Wed, 01/10/2014 - 19:02

In reply to by अनुप ढेरे

नॅशनल हेराल्ड केसचे आरोपदेखील बिनबुडाचे नव्हते बहुदा. त्याचं पुढं काय झालं

http://m.timesofindia.com/india/National-Herald-case-HC-to-hear-plea-of…

चिंतातुर जंतू Mon, 29/09/2014 - 17:29

डेटिंग साइटच्या विश्लेषणातून हाती आलेली काही रोचक स्त्री-पुरुषविषयक किंवा वंशविषयक माहिती. कोणत्या प्रश्नांची एकसारखी उत्तरं देणारे लोक एकमेकांसोबत टिकू शकतात ही माहितीदेखील रोचक आहे.

वामा१००-वाचनमा… Tue, 30/09/2014 - 19:43

In reply to by चिंतातुर जंतू

Male HR reps weigh the female applicants’ beauty as they would in a romantic setting – which is either depressing or very, very exciting, if you’re a sexual discrimination lawyer.

हॉरिबल!!! इट इज डिप्रेसिंग!!! परत माझा पूर्वी सांगीतलेला मुद्दाच सिद्ध होतोय - जोवर नोकरीत आहोत तोवर केकलप लावणे भाग आहे.

मन Tue, 30/09/2014 - 22:01

In reply to by वामा१००-वाचनमा…

हे उलट होत नसावं का ?
(स्त्री बॉस पुरुष सहकार्‍याच्या इतर बाबींवर ध्यान देत असणं वगैरे)
बादवे, तो मूळ दुवा वाचणं अजून जमलं नाही.

चिंतातुर जंतू Tue, 30/09/2014 - 15:50

राजदीप सरदेसाईंवरच्या हल्ल्यावर मोदींची काय प्रतिक्रिया होती, ह्यापेक्षा मोदींनी दिलगिरी कुणामार्फत व्यक्त केली हे अधिक रोचक वाटलं.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 30/09/2014 - 23:39

In reply to by चिंतातुर जंतू

राजदीपवर हल्ला केला म्हणून अदानी वगळता बाकी सगळ्या माध्यमांनी मोदींवर बहिष्कार घातल्याची बातमीसुद्धा छापली नाही का?

गब्बर सिंग Tue, 30/09/2014 - 23:54

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला सर्वात रोचक हे वाटलं की राजदीप ने हल्ला केला अन त्याच्या कडे दिलगिरी व्यक्त केली जातेय.

आणि अडाणीं सारख्या उद्योगपतींनी व्यक्त केली यात विशेष काय ? राजदीप हा काही सामान्य पत्रकार नाही. किंवा एखादा रिपोर्टर नाही. तो स्वतः एक बडा पत्रकार आहे. मस्ट बी अर्निंग इन मिलियन्स.

चिंतातुर जंतू Wed, 01/10/2014 - 13:11

In reply to by गब्बर सिंग

>> मला सर्वात रोचक हे वाटलं की राजदीप ने हल्ला केला अन त्याच्या कडे दिलगिरी व्यक्त केली जातेय.

त्या घटनेआधी सरदेसाईंनी अडाणींबद्दल हे ट्वीट केलं होतं हे माहीत आहे असं गृहित धरतो -

Ans to yday question: Gautam Adani is the other VIP guest at Hotel New York Palace. Many of you got it right!

बाकी आपापल्या पद्धतीनं अर्थनिर्णयन चालू द्या.

गब्बर सिंग Wed, 01/10/2014 - 13:54

In reply to by चिंतातुर जंतू

फिजिकल आक्रमण राजदीप ने सुरु केले की नाही हा प्रश्न - त्या स्क्रोल मधल्या लेखात गुलदस्त्यातच ठेवला आहे. बगल दिलेली आहे.

अजो१२३ Thu, 02/10/2014 - 12:59

In reply to by चिंतातुर जंतू

उद्योगपती नेत्याच्या बाजूला थांबला कि नाकाला घाण वास येऊ लागणारे फालतू समाजवादी अजूनही संपायचे उरलेत.
----------------------
त्यातही ते उजव्या नेत्याच्या बाजूला उभे राहिले कि विचारायलाच नको.
--------------
देवा अशा सिक मानसिकतेच्या राजदीपला दुरुस्त कर.

आडकित्ता Thu, 02/10/2014 - 19:35

In reply to by अजो१२३

उद्योगपती नेत्यांच्या सोबत अल्चुरिस्टीक मोटिव्हने उभे रहातात, असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?

अजो१२३ Thu, 02/10/2014 - 21:09

In reply to by आडकित्ता

उद्योगपती उल्ट्रूइस्टिक नसतात हे विनोदी संशोधन आहे.
------------------
कॅपिटलिझम इतका फेमस होण्याचं एक कारण त्यातले अनेक टॉवरींग अल्ट्रूइस्ट होते हे ही आहे. पण असो. आधंळा द्वेष असणारांना ते सांगण्यात अर्थ नाही.

ऋषिकेश Wed, 01/10/2014 - 13:24

In reply to by गब्बर सिंग

अडाणीं सारख्या उद्योगपतींनी व्यक्त केली यात विशेष काय ?

अदाणींनी पंतप्रधानांचा विशेष दूत म्हणून व्यक्त करण्यात काहीच विशेष नाही?

गब्बर सिंग Wed, 01/10/2014 - 13:59

In reply to by ऋषिकेश

अदाणींनी पंतप्रधानांचा विशेष दूत म्हणून व्यक्त करण्यात काहीच विशेष नाही?

हो.

काहीही विशेष नाही.

IS there any bylaw or a statute which prohibits Adani from being one ?

विवेक पटाईत Fri, 03/10/2014 - 09:06

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती ताई, कुठे वाचली ही बातमी, मी तर सर्व चनेल वर मोदी पुराण ऐकून बोर होऊ लागलो होतो. बाकी वीडीओ बघा, सत्य कळून जाईल. बेचारा राजदीप काय करणार, नौकरी गेली, मुफ्त मौज करण्याची सवय, पंत प्रधान कुणालाच बरोबर घेऊन नाही गेले. राजदीप वगळता सर्वाना हाल मध्ये प्रवेश मिळाला. इतकी मान हानी पहिल्यांदाच झाली असेल. आता ज्या उद्देश्याने अमेरिकेत आले होते, ते ही साध्य होत नव्हते. मग कार्य करणार, सामान्य जनतेवर राग काढला.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 05/10/2014 - 02:30

In reply to by विवेक पटाईत

आधी हात कोणी उचलला वगैरे प्रश्न व्हीडीओमुळे सुटलेच. राजदीपवर हात उचलला म्हणून मोदींमार्फत अदानींनी माफी का मागितली हे मला समजलं नाही. पंतप्रधानांच्या कार्यालयातून निघालेलं पत्र माध्यमांपर्यंत पोहोचू शकत नाही का, का राजदीप-मोदी बातमी छापायची असेल तर अदानी मध्ये पाहिजेच असं माध्यमं म्हणतात, का यात काहीतरी दुसरंच राजकारण आहे ... यांसारखे प्रश्न मला पडले (आणि उत्तरं माझ्याकडे नाहीत). म्हणून थोडी तिरकस प्रतिक्रिया दिली.

गब्बर सिंग Sun, 05/10/2014 - 03:31

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Laws of attraction चित्रपटात ज्युलिआन मूर ... तिच्या मातोश्रींना म्हणते ना की - मी पिअर्स ब्रॉस्नन ची माफी मागेन - ते संभाषण जरूर पहा व ऐका. (तुमच्या प्रश्नाचे हे उत्तर नाही. पण ते संभाषण अवश्या पहा व ऐका.)

मन Sun, 05/10/2014 - 13:03

In reply to by गब्बर सिंग

Laws of attraction चित्रपटात ज्युलिआन मूर ... तिच्या मातोश्रींना म्हणते ना की - मी पिअर्स ब्रॉस्नन ची माफी मागेन - ते संभाषण जरूर पहा व ऐका. (तुमच्या प्रश्नाचे हे उत्तर नाही. पण ते संभाषण अवश्या पहा व ऐका.)

म्हणजेच...
तिकडे जा . तमुक पहा. आणि मग बोला.
माझे जे काही म्हण्णे आहे ते तिथेच लिहिले आहे./
मी इथे काहिच लिहिणार नाही.
फक्त पॉइण्टर/रेफरन्स देत राहणार.
बादवे, Laws of attraction चित्रपटात ज्युलिआन मूर जे म्हणजे त्याचा उत्तम प्रतिवाद माहेरची साडी ह्या चित्रपटात अलका कुबलशी बोलताना अजिंक्य देव ह्याने आधीच केलेला आहे. शिवाय " रेश्मा की जवानी ", " हवस के पुजारी" अशा १९८०च्या दश्कातील चिंतनशील चित्रपटात ह्याचा गहनगंभीर मासला तरल मन स्पर्शून जातो.
तर सांगायचं म्हण्जे हे दोन्ही चित्रपट पाहणेचे करावे.

गब्बर सिंग Sun, 05/10/2014 - 14:01

In reply to by मन

शिवाय " रेश्मा की जवानी ", " हवस के पुजारी" अशा १९८०च्या दश्कातील चिंतनशील चित्रपटात ह्याचा गहनगंभीर मासला तरल मन स्पर्शून जातो.
तर सांगायचं म्हण्जे हे दोन्ही चित्रपट पाहणेचे करावे.

छे छे.

चित्रपटांची लिस्ट -

१) पाप को जला कर राख कर दूंगा
२) आग ही आग
३) आग का गोला
४) आतंक ही आतंक
५) इंतेकाम की आग
६) इन्साफ कौन करेगा
७) मर्दानगी
८) आग के शोले
९) खून और पानी
१०) जंग के शोले

वामा१००-वाचनमा… Sun, 05/10/2014 - 17:07

In reply to by मन

तिकडे जा . तमुक पहा. आणि मग बोला.
माझे जे काही म्हण्णे आहे ते तिथेच लिहिले आहे./
मी इथे काहिच लिहिणार नाही.

मनचे हे म्हणणे १००% पटले. गब्बर आधी तरी लिंका, व्हिडीओ तरी देत असे. आता तर म्हणतो अमका सिनेमातला अमका रँडम सीन बघा न मग माझं म्हणणं कळेल. अरे चाललय काय???

अजो१२३ Thu, 02/10/2014 - 21:17

In reply to by चिंतातुर जंतू

बाय द वे, अडानी मोदींचे मित्र आहेत हे कसं नवं आहे हे सांगणं बरंच फालतू वाटतंय. चिंतातुर ते नेहमी नेहमी का करत असावेत? मोदीद्वेष?

मन Thu, 02/10/2014 - 22:48

In reply to by अजो१२३

पण त्यांची ती काहीतरी प्रतिक्रिया " मोदिंचा हा दौरा आपल्याला कोणती नवी घोषणा देइल बरे ?" हा प्रश्न फारच भन्नाट होता.

गब्बर सिंग Thu, 02/10/2014 - 12:33

http://timesofindia.indiatimes.com/world/us/California-passes-law-for-s…

Under the law, signed on Sunday by governor Jerry Brown, partners will have to give "affirmative, conscious, and voluntary agreement to engage in sexual activity" before they do so.

Affirmative consent cannot be given by someone who is asleep, unconscious, or if he or she is "incapacitated due to the influence of drugs, alcohol, or medication," said the text of Bill 967, about sexual assaults on campus.

अजो१२३ Thu, 02/10/2014 - 13:31

In reply to by चिंतातुर जंतू

अण्वस्त्र अपघात नावाची लै भारी टर्म चिंजंची लिंक उघडून वाचायला मिळाली.
----------------------------
अवांतर -
वृत्तपत्रांचे संपादक लोक रोज काय खात असावेत? मला अगदी लहानपणीपासून प्रश्न पडत आलेला आहे कि या लोकांना रोज रोज इतके उपदेश सुचतात कसे? शिवाय ते कोणाचाही अपवाद न ठेवता उपदेश करत असतात. कोणती घटना, कोणता काळ, कोणती संस्था या उपदेशाच्या डोससागरातून सुटलेली नसते. काही वाईट झालं तर पकडून पकडून जबाबदार अशा सगळ्याच संस्थांना, व्यक्तिंना डोस देतात. आणि जनरली कैतरी चांगलं झालंय या इंप्रेशनमधे आपण असलो तरी हे संपादक लोक पुन्हा संबंधित ५-१० जणांना उपदेश करताना दिसतातच.
-----------------------
संपादकांचं कौतुक करावं असं दुसरं लक्षण म्हणजे ते फार एक्झॅक्टिंग असतात. पेपर नेहमी इतकी मोठमोठाली पाने चुका न करता सकाळच्या सकाळी रोज रोज घरी कसा हजर होतो? कारण तो "गैर वाजवी अपेक्षा असलेले लोक" चालवतात. देशात काहीही होवो, कितीही चांगले होवो, हे लोक असंतुष्टच!! एखादा पर्फेक्ट आउटपुट कसा असतो ते त्यांना माहित. 'पण हे असं झालं नाही', ' हे असं असायला हवं होतं' अशा असंतुष्ट चुका रोज अग्रलेख वाचताना चांगल्या चांगल्या घटनांच्या बाबतीत वाचायला हमखास मिळतात. मंगळयान यशस्वी? तुम्ही खुष? थांबा. देशाला परवडतं का ते पहा. बरं, परवडतं म्हणालात तर देशात वैज्ञानिक दृष्टिकोनाची कशी परवड झालेली दिसते त्यावर निबंध ऐका. नको? मग अजून हे १००% यश कसं नाही ते ऐका. नको? मग भारतीय अंतरीक्ष कार्यक्रम फार कै थोर कसा नाही ते ऐका. शेवटी नासात काय चांगलं आहे जे इथे नाही ... संपादक ऑफिसात बॉस नाहीत ते लोक नशीबवानच.
------------------------
बाय द वे, हे लोक कंफ्यूज पण करतात. सिविल न्यूक्लिअर लायाबिलिटी बिल तर पास झालेलं नं भारतात, अमेरिकेला पाहिजे तसं? आत्ता नक्की काय हिशेब उरला होता? आमच्या देशात कोणत्याच लॉची इन्फोर्समेंट नीट होत नाही. मग आय पी लॉचीच कशी करून घ्यायची? असो. असो. जास्त लिहिलं तर याच प्रतिसादाचा सुर संपादकीय व्हायचा.

गब्बर सिंग Thu, 02/10/2014 - 13:48

In reply to by चिंतातुर जंतू

मोदी यांच्या अमेरिकागमनदिनी तेथील काही अर्थतज्ज्ञांनी भारताने आर्थिक सुधारणा केल्याशिवाय गत्यंतर नाही, असे ठोस विधान केले होते. या सुधारणा करण्याची गरज मोदीदेखील अनेक दिवस व्यक्त करीत आहेत. फक्त त्यांची इच्छा अद्याप तरी सत्यात उतरताना दिसत नाही. तेव्हा या वास्तवाच्या चष्म्यातून या दौऱ्याकडे पाहावयास हवे आहे.

हे एक वाक्य असे आहे की जे सॉल्लिड महत्वाचे आहे. इतर अनेक वाक्ये चर्चा करण्याजोगी आहेतच. पण हे महत्वाचे. अधोरेखित भाग अतिशय महत्वाचा.

फक्त मूठभरांच्या हिताचे निर्णय होतात - असा आरडाओरडा करण्यात अरुणा रॉय पासून खंबीरराव कोरडे यांच्यापर्यंत सगळे कंठशोष करीत आले आहेत. हे लोक २००४ - २००९ मधील "डाव्या आघाडीने" तगवलेल्या युपीए च्या सरकारच्या वेळी पण होते व २००९ - २०१४ च्या "सोनिया प्रणित" आम आदमी च्या हिताचे अध्वर्यू असा दावा करणारे युपीए सरकार होते तेव्हा ही होते. त्यांनी पुरस्कृत केलेल्या धोरणांनी काय दिवे लावले ? २०१३ मधे महागाई चा दर ११ टक्क्यावर गेला होता. महागाई इतकी असणे हे आम आदमी ला घातक असते - हे या लोकांना माहीती नाही ??? आज महागाईचा दर जो कमी आलाय (७.८%) ते बव्हंशी क्रेडिट राजन यांचे आहे. (अर्थात त्यांची निवड व नेमणूक करण्याचे श्रेय काँग्रेस ला द्यायला च हवे. खरंतर ममोसिं ना.).

जोडीला - मोदी सप्लाय साईड इकॉनॉमिक पॉलिसीज चे पुरस्कर्ते आहेत असा ही शंखनाद झाला होता. ममोसिं हे डिमांड साईड चे आहेत असे आपण टेक्निकल आर्ग्युमेंट मानूया (उदा. २००९ चे कर्जमुक्ती प्याकेज). आणि आता मोदी हे फक्त कॉर्पोरेट्स चे हितसंबंध जपणारे अशी इमेज निर्माण करण्यात मोदी विरोधक गुंतलेले दिसत आहेत. हे त्याच "सप्लाय साईड चे समर्थक" या आरोपाचे दुसरे रूप आहे.

मोदींनी सुधारणांचे सुतोवाच केलेले आहे. व (बहुतेक) पाऊले सुयोग्य दिशेनेच टाकलेली आहेत. उदाहरणार्थ -

औषध कंपन्यांच्या उत्पादनांचे कमाल दर ठरवण्याचा सरकारचा अधिकार मोदींनी संपुष्टात आणला हे सुयोग्यच आहे. औषधांचे दर गगनास भिडलेले आहेत असा आरडाओरडा करणार्‍यांनी या कडे लक्ष द्यावे की - १) माझ्या प्रॉडक्ट चा दर किती असावा हे ठरवण्याचा मला अधिकार आहे व असायला हवा. कस्टमर ला परवडत नसेल तर मी तोट्याचा हकदार होतो. व परवडले तर मी नफ्याचा हकदार होतो. पण कस्टमर ला परवडत नाही म्हणून मला माझे प्रॉडक्ट कमी किंमतीत विकायला भाग पाडणे हे सर्वथा चूक आहे. व प्रचंड समस्याजनक सुद्धा आहे. २) कस्टमरला परवडत नसेल तर मी स्वतः ते प्रॉडक्ट कमी किंमतीस विकण्यास उद्युक्त होऊ शकतो (प्रत्येक केस मधे नाही), ३) माझ्यावर ते प्रॉडक्ट कमी किंमतीस विकण्यास जबरदस्ती करणे म्हंजे - माझ्या हाताखालचे संशोधक - त्यांना त्यांचे बोनसेस/इन्क्रिमेंट्स कॉम्प्रो करायला लावणे. त्यांची संधी कमी करणे. याचा अर्थ संधीची समानता नष्ट करणे. (याच्यावर अनेक जण माझ्या अंगावर धावून येणारेत हे माहीती आहे. मी जव्वाब द्यायला तयार आहे. तेव्हा या च.), ४) व प्रॉडक्ट च्या दरावर सिलिंग लावणे हे नवीन उद्योगांना (जे प्रस्थापितांना टक्कर देण्यासाठी जन्मास येतात) मारकच असते.

नगरीनिरंजन Fri, 03/10/2014 - 05:13

In reply to by गब्बर सिंग

शेवटच्या परिच्छेदाबद्दल सहमत आहे.
इकॉनॉमिक्समध्ये सगळं कसं एकसमान व सबस्टिट्यूटेबल असतं हे लोकांना समजत नाही हो.
प्रॉडक्ट म्हटलं की प्रॉडक्ट. मग तो जीवनरोधी काँडोम असो की जीवनदायी औषध असो. काही फरक नाही.
म्हणजे पाव मिळत नसेल तर केक खा सारखं सरळ औषध परवडत नसेल तर विष खा असं कोणी म्हणत नाहीत एवढंच.
फडतूस लोकांसाठी उगाच मानवतावादी (ज्याला सिव्हिलाईज्ड असं चुकीने म्हणतात) विचार करुन इकॉनॉमिक नुकसान करुन घेण्यात काय अर्थ? फडतूस लोकांनी मरुन जावं अशी कितीही हिंट दिली तरी त्यांना कळत नाही म्हणून स्पष्टच सांगायला पाहिजे की या सिव्हिलाईज्ड समाजात फडतूस लोकांना काहीही जागा नाही आणि त्यांनी औषध परवडत नसेल तर मरुन जावे पण मरेपर्यंत प्रायव्हेट प्रॉपर्टीचे अधिकार व बळाचा चलन म्हणून वापर न करणे हे सिव्हिलाईज्ड नियम पाळलेच पाहिजेत अन्यथा त्यांना गोळ्या घालून मारावे लागेल.

गब्बर सिंग Fri, 03/10/2014 - 05:27

In reply to by नगरीनिरंजन

तुम्ही कदाचित उपरोधाने लिहिलेले असेल. पण हे योग्य आहे.

.... अन्यथा त्यांना गोळ्या घालून मारावे लागेल. - हे खूपच सॉफ्ट स्टेटमेंट आहे.

वामा१००-वाचनमा… Mon, 06/10/2014 - 17:50

In reply to by गब्बर सिंग

हा गब्बर फार जहाल विधानं करतो बरं का :(
वरती म्हणतोय गोळ्या घालून मारणे सॉफ्ट स्टेटमेन्ट आहे.
______
एकदा म्हणालेला मुलं निर्माण करण्याचे कारखाने तयार व्हायला पाहीजेत :(
_______
याला व्यक्ती ही कमॉडीटी वाटते की काय?
___
च्यायला आम्ही मेंगळट फक्त त्याचं घर उन्हात बांधेपर्यंत आमची मजल. पण कोणीतरी विद्वान्/पंडीतानी त्याचा प्रतिवाद करा. चाललय काय???

मी Mon, 06/10/2014 - 18:01

In reply to by वामा१००-वाचनमा…

च्यायला आम्ही मेंगळट फक्त त्याचं घर उन्हात बांधेपर्यंत आमची मजल. पण कोणीतरी विद्वान्/पंडीतानी त्याचा प्रतिवाद करा. चाललय काय???

ते विद्वान वगैरे माहित नाही, पण मी पुण्यात(वाण नाय पण गुण तरी) असतो त्यामुळे एक प्रयत्न करुन बघतो ;)

मी Mon, 06/10/2014 - 18:05

In reply to by गब्बर सिंग

औषध कंपन्यांच्या उत्पादनांचे कमाल दर ठरवण्याचा सरकारचा अधिकार मोदींनी संपुष्टात आणला हे सुयोग्यच आहे

"सब-प्राईममधे सरकारी हस्तक्षेप पुरेसा नव्हता म्हणून मार्केट कोसळलं आणि मग सरकारने अधिक हस्तक्षेपासाठी सोय केली" हे विधान तुम्हाल पटतं काय?

मन Mon, 06/10/2014 - 18:13

In reply to by मी

आत्ता संदर्भ हाताशी नाहित पण एक केस स्टडी वाचली होती ती अशी :-
१९२९ च्या महामंदीनंतर काही रेग्युलेशन्स अमेरिकन व्यवस्थेत आले.
त्यांनी पुढे बराच काळ मार्केटवर योग्य नियंत्रण ठेवलं होतं.
धाकले बुश जसे सत्तेवर आले तसे त्यांनी ते निर्बंध हटवले.
जे होतय ते होउ देत ( फ्री मार्केटच्या "अदृश्य हाताच्या " संपर्कात ) असा अधिक मोकळा श्ट्यांड त्यांनी घेतला.
परिणामी फुगा बनला; वाढला; एक दिवस मोठ्ठा होउन फाटकन् फुटला.
मग लिमन ब्रदर्स वगैरे सगळ्यांनाच घेउन गाळात गेला.

मी Mon, 06/10/2014 - 18:19

In reply to by मन

त्यांनी पुढे बराच काळ मार्केटवर योग्य नियंत्रण ठेवलं होतं.

ह्यावर गब्बरवादी लोकांच मत विरोधी असु शकतं, योग्य-नियंत्रण प्रगतीसाठी मारक असतं वगैरे.

परिणामी फुगा बनला; वाढला; एक दिवस मोठ्ठा होउन फाटकन् फुटला.

ह्यावर, फुगा फुटण्यातच पुढचा फुगा योग्य फुगण्याचे बिज रोवले जाते, त्यामुळे फुगा फुटणे अयोग्य आहे असे का म्हणावे? फुगा फुगताना त्याची फळे चाखणार्‍यांना तो फुटल्यावर त्याचीही फळे चाखावीच लागणार. - हे भांडवलवादी म्हणतील काय हे मला पहायचे आहे.

सन्जोप राव Thu, 02/10/2014 - 13:12

बाकी मोदी यांच्या दौऱ्याचा अन्य भाग हा मौजमजेचा होता. विस्थापितांत, मग ते स्वखुशीने असो वा अपरिहार्यता म्हणून, राष्ट्रवादी भावनेचे कढ नेहमीच येत असतात. आपल्या दौऱ्यात ते अधिक जोमाने कसे येतील आणि आलेले जगास कसे दिसेल याची काळजी पुरेपूर घेतली. हेच त्यांचे चातुर्य. त्या अर्थाने मोदी यांच्या या दौऱ्याचे वर्णन चातुर्यपश्चिमा असेच करावे लागेल
'पन इंटेंडेड' आहे की नाही हे माहिती नाही, पण हा वाक्प्रयोग आवडला. चातुर्यपश्चिमा हा शब्दही.

नगरीनिरंजन Thu, 02/10/2014 - 17:02

सुमितोमो कॉर्पोरेशनने फ्रॅकिंग मधल्या तोट्यापायी नफ्याचा अंदाज ९६% नी घटवला.
http://www.reuters.com/article/idUST9N0O600U20140930?irpc=932

तेलाचे आणि कोळसा, लोखंड वगैरे कमोडिटीजचे भाव उतरताहेत आणि नेहमीसारखंच मेनस्ट्रीम मिडियात हे भाव उतरण्याचं कारण अधिक पुरवठा हे सांगितलं जातं.
अधिक पुरवठा हे निम्मं खरं असलं तरी निम्मं कारण मागणी वाढत नाहीय हे आहे ते सांगितलं जात नाही.
फ्रॅकिंग किंवा डीप-सी एक्स्प्लोरेशन फायदेशीर ठरण्यासाठी तेलाची किंमत जास्त असावी लागते आणि जास्त किमतीच्या तेलावर (व्याजदर शून्याजवळ ठेवले तरी) अर्थव्यवस्था पूर्वीच्या वेगाने वाढत नाही आणि भाव पडतात आणि भाव पडल्याने तेलाचे उत्पादन वाढणे बंद होते असे जे दुष्टचक्र आहे त्याचे हे दुसरे आवर्तन संपत आले आहे. खुर्चीचा पट्टा बांधायची वेळ पुन्हा आली आहे. २०१५ मध्ये पुन्हा मार्केट्स कोसळण्याची शक्यता आहे आणि यावेळी बेल-आऊट करण्यासाठी कोणते पर्याय आहेत कोण जाणे?

गब्बर सिंग Fri, 03/10/2014 - 00:27

http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/Appointment-…

मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांची नेमणूक अजून तरी झालेली नैय्ये. प्रेशर इज माऊंटिंग.

Last month, Modi closed the Planning Commission, a lingering vestige of India's early attempt to mimic the Soviet command economy.

गब्बर सिंग Fri, 03/10/2014 - 08:29

In reply to by नितिन थत्ते

हे ठीक आहे.

याच्या जोडीला या तिकिटांची दलाली (लोक याला काळाबाजार म्हणतील) करणार्‍यांना सुद्धा परवानगी द्यायला हवी. मी एकदम १०० तिकिटे बुक करून ती हव्या त्या व्यक्तीस तिच्या नावाने विकू शकतो अशी व्यवस्था पण असायला हवी.

नितिन थत्ते Fri, 03/10/2014 - 08:36

In reply to by गब्बर सिंग

का बुवा. तुमची दलाल म्हणून नेमणूक झाली असेल तर ठीक आहे. पण तुम्हाला अदरवाइज १०० तिकिटे बुक करू देता कामा नये.

तिकीट हे प्रवास करणार्‍याच्या नावानेच* बुक व्हायला हवे.

*सध्याच अनेक फेक दलाल अशी तिकीटे एस. यादव, पी. यादव अशा नावांनी बुक करून ठेवतात आणि विकतात.

गब्बर सिंग Fri, 03/10/2014 - 08:43

In reply to by नितिन थत्ते

पण तुम्हाला अदरवाइज १०० तिकिटे बुक करू देता कामा नये.

१०० का १००० तिकिटे बुक करायची सुद्धा मुभा असावी. किंवा १०,००० सुद्धा. फक्त बुक करताना सगळे पैसे घ्यावेत. बस्स.

संभाव्य आक्षेप -

१) हे मोनोपोलायझेशन आहे. प्रवाशांना तिकिटे मिळणार नाहीत. सगळी तिकिटे दलालच घेऊन बसतील. व अव्वाच्यासव्वा किंमतीस प्रवाशांना विकतील. प्रवासी हैराण होतील.
२) गब्बर चे "मौलिक" विचार आचरणात आणले तर देशात अराजक माजेल. गब्बर, सरकारची ही जबाबदारी आहे की - सगळ्यांना बरोबर घेऊन जावे लागते.
३) साठेबाजी विरुद्ध कायदे आहेत ... या देशात. गब्बर, तुला माहीती नाय का ???

मन Fri, 03/10/2014 - 09:02

In reply to by गब्बर सिंग

मोनापोलायझेशन झाले तरी हर्कत नाय म्हण्णार्‍या गब्बरला सरकारने केलेले मोनोपोलायझेशन चालत नै ही गंमतच आहे बुवा.
माझे क्यापिटालिझमवर वगैरे अत्यंत प्रेम आहे. धनदांडग्यांवरतर सर्वाधिक आहे.
सरकार सर्वात मोठी धनदांडगी व्यक्ती आहे.
तिनं स्वतःला धनदांडगे समजणार्‍या फडतुसांची(म्हणजे भुक्कड दलाल लोक,एजन्स्या आणि तत्सम) अश्शीच आर्थिक कत्तल वगैरे केली पाहिजे.
शिवाय गब्बरच्याच तत्वज्ञानाप्रमाणे कमालीचा स्वार्थी आणि नीच असण्यात काहीही चूक नाही.
ह्या देशातील प्रचंड मोठा वर्ग कमालीचा स्वार्थी आणि नीच बनून सरकार ताब्यात ठेवत आहे.
(म्हनजेच एक-दोन च्या वर तिकिटे काढू देत नाही ; दलालांना वगैरे फार फोफावू देत नाही.)
असे करण्यातही काहीही चूक नाही.
गब्बर "अनैतिक" म्हणतो त्या कल्याणकारी राज्यापेक्षाही फडतूस दलालांचे राज्य अधिक अनैतिक आहे भांचुत.
(तसेही एकदा might is right मान्यच केले की नैतिक-अनैतिक काहीही असत नाही.)
सगळ्या दलालांना ग्यास चेम्बरमध्ये घालून.....
जाउ दे. काही नाही.
(बादवे, ताकतच दाकह्वायची तर पैशाचीच का दखवायची ? आमच्याकडे जी ताकत आहे ती आम्ही दाखवतोय.
संख्याबळ ही आमची ताकत आहे. ती आम्ही दाखवतोय. धनदांडगे ऑलरेडी पैशाची ताकत दाकह्वत आहेत.
सगळे सुखासुखी सुरु आहे. तक्रार कशाबद्दल आहे मग? (आम्ही ताक्त दाकह्वतो; तुम्ही दाखवू नका असे म्हण्णे आहे काय ? ) )

नितिन थत्ते Fri, 03/10/2014 - 10:02

In reply to by गब्बर सिंग

आर्ग्युमेंट फ़ालतू आहे.

बुकिंग ओपन झाल्यावर गब्बर सिंग इतर ग्राहकांबरोबर इंटरनेटवरून तिकिटे बुक करू शकेल. जितकी जमतील तितकी. त्यावेळी तुम्ही काहीतरी नावे घालून बुकिंग कराल. मग ती तिकिटे तुम्ही लोकांना विकाल. ती वेगळ्या नावाने असतील तर तो डायरेक्ट फ्रॉड असेल.

तुम्हाला एजंट नेमले असेल तर तुम्ही तुमच्या कोट्याएवढी तिकिटे बुक करून कमिशन घेऊ शकता.

गब्बर सिंग Fri, 03/10/2014 - 10:12

In reply to by नितिन थत्ते

नेमक्या शब्दात -

१) दलाल लोकांना कितीही तिकिटे (दहा, शंभर, हजार... कितीही) व कोणत्याही नावावर / किंवा नाव न देता बुकिंग करायची मुभा असावी.
२) बुकिंग करताना स्टिप्युलेटेड प्राईस (रेल्व्हे ने निर्धारित केलेली) पेक्षा जास्त पैसे (प्रति तिकिट) देऊन बुकिंग करायची सुद्धा मुभा असावी. (ओपन बिडिंग)
३) बुकिंग करताना जेवढी तिकिटे बुकिंग करण्याची आहेत त्यांचे सर्वांचे पूर्ण पैसे भरायला लावावेत. (बिडिंग प्राईस गुणीले जितकी तिकिटे बुकिंग करायची आहेत त्यांची संख्या).
४) नंतर दलाला ने ती कोणासही व कितीही किंमतीस विकावीत. कोणतेही बंधन नाही.

मन Fri, 03/10/2014 - 10:16

In reply to by गब्बर सिंग

१) दलाल लोकांना कितीही तिकिटे (दहा, शंभर, हजार... कितीही) व कोणत्याही नावावर / किंवा नाव न देता बुकिंग करायची मुभा का असावी ?
२) बुकिंग करताना स्टिप्युलेटेड प्राईस (रेल्व्हे ने निर्धारित केलेली) पेक्षा जास्त पैसे (प्रति तिकिट) देऊन बुकिंग करायची सुद्धा मुभा का असावी ?. (ओपन बिडिंग)

४) नंतर दलाला ने ती कोणासही व कितीही किंमतीस विकावीत. कोणतेही बंधन का नाही.

गब्बर सिंग Fri, 03/10/2014 - 10:33

In reply to by मन

१) कारण त्यामुळे एकाधिकारी रेल्वे च्या तिकिट विक्रीचे रुपांतर अनेक दलालांना संधी देण्यात व त्या दलालांच्या मधे स्पर्धा निर्माण करण्यात होते. जर कोणत्याही एका दलालाने अवाच्यासवा बुकिंग केले व जर त्याची बुक्ड तिकिटे खपली नाहीत तर त्यास नुकसान होईल. व तिकिटे जोरदार खपली तर त्यास फायदा होईल. This gives him the incentive to book large enough number of tickets and at the same time the disincentive to book too many tickets. कारण तो तोट्यासही जबाबदार असेल.

२) स्टिप्युलेटेड प्राईस पेक्षा जास्त किंमतीचे बिडिंग केल्यास रेल्वे ला नफा होऊ शकतो. नै का ?

३) एकदा ती तिकिटे दलालास विकली की ती त्याची झाली. आता रेल्वे त्यास सेवा देण्यास बांधिल आहे. मग त्याने जर ती इतरांना विकली तर त्यात त्याचा फायदाच आहे. त्याची फायदा कमवण्याची संधी (बंधने घालून) हिरावून घेऊ नये.

थोडक्यात - Appointing an agent is a incentive compatible system. फक्त कोणी एजंट बनावे व कोणी नाही यावर बंधने नसावीत (No entry barriers). व तिकिटे ही कमोडिटी म्हणून ट्रेडिंग केली जावी.

नितिन थत्ते Fri, 03/10/2014 - 10:38

In reply to by गब्बर सिंग

कायपण ?

या सगळ्या व्यवहारात "तिकीट" ही कमोडिटी नसून "प्रवासाची सेवा" ही विक्रेय कमोडिटी आहे या मूलभूत गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो.

गब्बर सिंग Fri, 03/10/2014 - 10:42

In reply to by नितिन थत्ते

या सगळ्या व्यवहारात "तिकीट" ही कमोडिटी नसून "प्रवासाची सेवा" ही विक्रेय कमोडिटी आहे या मूलभूत गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो.

बरोबर आहे की.

तिकिट हे टोकन च आहे.

प्रवासाची सेवा ही विक्रेय कमोडीटी आहे व तिचा "व्यवहार" करण्यासाठी तिकिट हे टोकन काँट्रॅक्ट आहे. व त्या "टोकन काँट्रॅक्ट" चे ट्रेडिंग मुक्त असल्यास ज्याची गरज जास्त व पेमेंट करण्याची क्षमता जास्त - त्यास ते "टोकन काँट्रॅक्ट" ट्रेडिंग च्या माध्यमातून मिळवता येईल.

नितिन थत्ते Fri, 03/10/2014 - 10:35

In reply to by गब्बर सिंग

पण असे का असावे? याचे काही उत्तर द्या ना.

दलाल हा ग्राहकाची (आणि सेवादात्याची) सोय म्हणून असतो. अन्यथा व्यवहार रेल्वे (किंवा विमान कंपनी किंवा कुठलीही कंपनी) आणि ग्राहक यांच्यातच होऊ शकतो.

दलालाला नफा कमावता यावा म्हणून ग्राहकाची पिळवणूक होईल अशी धोरणे ठरवली जात नसतात. [भारतात न्यायव्यवस्था ही अशी एक व्यवस्था आहे जिथे दलालाला (वकीलाला) ग्राहकापेक्षा जास्त महत्त्व आहे].

मन Fri, 03/10/2014 - 10:45

In reply to by नितिन थत्ते

न्याय ही एक कमोडिटी आहे/असायला हवी.
तिचा जाहिर लिलाव व्हायला हवा.
न्यायालय तसे करु देत नाही हा आमच्या स्वातंत्र्यावर हल्ला आहे.
ट्रेडिंग करा न्यायाचं ट्रेडिंग.

मन Fri, 03/10/2014 - 10:42

In reply to by गब्बर सिंग

स्वतः कोणतीही विक्रीयोग्य सेवा वा उत्पादन समाजाला उपलब्ध करुन देउ न शकणारे बांडगूळ म्हंणजे हे एजंट.
ह्यांना सरकारने परवानगीरुपी दिलेली अप्रत्यक्ष मदत्/सबसिडी हवी कशाला ?
हे म्हणजेच फडतूस लोक.
सरकारच्या सबसिडीवर फुक्कटचे घास गिळणारे बांडगूळ, परजीवी.
शिवाय फडतूसांना जिवंत जाळावे, ग्यास चेम्बरमध्ये घालून मारावे वगैरे गब्बर म्हणतोच.
.
.
.
सरकार ही इतकी घाणेरडी वगैरे व्यवस्था असेल ना, तर सरकारनं चालवलेल्या रेल्वेमधून नफा कशाला घेता बेट्यांनो ?
शिवाय अजून एक गब्बरस्टाइल लॉजिक :-
असे समजा की एज्ण्ट लोकांची सर्व्हिस ही बहुमूल्य आहे. समाजाला अशा सेवेची वगैरे गरज आहे.
मग तिला बंद करुन पहा. तिची खरच गरज असेल तर व्यवस्था कोसळेल.
लोक स्वतःहून तशी मागणी करतील.
आपोआप एज्ण्ट नावाचा व्यवसाय उभा राहिल!
सगळ्म कसं मागणी-पुरवठयानुसार सुरु आहे.
.
.
.
तस्मात्, जोवर लोकांची मागणी वगैरे उभी रहात नाही, चळवळ वगिअरे उभी राहत नाही; तोवर आहे तेच्च ठीक आहे.
जमल्यास सरकारचा आकार ५०००% वाढवावा.

गब्बर सिंग Fri, 03/10/2014 - 10:48

In reply to by मन

स्वतः कोणतीही विक्रीयोग्य सेवा वा उत्पादन समाजाला उपलब्ध करुन देउ न शकणारे बांडगूळ म्हंणजे हे एजंट.

एजंट लोक नेमके काय करतात - They match the demanders with suppliers. एखाद्या नौकरी डॉट कॉम चे जे काम आहे तेच काम एजंट करतो. मॅच मेकिंग.

तुमचा रियल इस्टेट एजंट काय करतो ? तेच करतो ना ?

नितिन थत्ते Fri, 03/10/2014 - 11:11

In reply to by गब्बर सिंग

करेक्ट.

एजंट इज फॅसिलिटेटर अ‍ॅण्ड नॉट द सेंटर ऑफ ट्रान्झॅक्शन. त्याच्यासाठी कुठलीही सोय मुद्दाम करून देऊ नये.

गब्बर सिंग Fri, 03/10/2014 - 11:22

In reply to by नितिन थत्ते

त्याच्यासाठी कुठलीही सोय मुद्दाम करून देऊ नये.

अगदी.

म्हणूनच मी मुद्दा असा मांडलाय की एजंट वर कोणतेही एंट्री बॅरियर नसावेत. व कोणतेही बंधन नसावे. कोणी ही एजंट बनावे व हवे तेव्हा धंद्यातून बाहेर पडावे.

---

एजंट इज फॅसिलिटेटर अ‍ॅण्ड नॉट द सेंटर ऑफ ट्रान्झॅक्शन.

साधु साधु.

ट्रान्झॅक्शन कॉस्ट्स कमी ठेवण्यात एजंट्स हातभार लावतात. नेमकेच बोलायचे तर सर्च & इन्फर्मेशन कॉस्ट्स.

नगरीनिरंजन Fri, 03/10/2014 - 11:17

In reply to by गब्बर सिंग

रियल इस्टेट एजंटने सगळी घरं विकत घेतली आणि नंतर विकली तर आमची ना नाही ब्वॉ. पैसे मात्र लगेच दिले पाहिजेत.

नितिन थत्ते Fri, 03/10/2014 - 11:15

In reply to by गब्बर सिंग

बाय द वे रिझर्वेशन ही कन्सेप्टच फडतूसांना प्रवास करता यावा म्हणून आलेली आहे. अन्यथा रेलवेमध्ये त्यांनाच प्रवास करता यावा ज्यांना स्वत: होऊन गाडीत जागा मिळवता येईल...... जागा रिकाम्या नसतील तर एखाद्या जागेवर बसलेल्या प्रवाशाला बाहेर फेकून देऊन ती जागा बळकावता येईल.

अशी जागा मिळवता न येणार्‍या फडतूसांना प्रवासाचा हक्कच असू नये.

गब्बर सिंग Sun, 05/10/2014 - 14:19

In reply to by नितिन थत्ते

अशी जागा मिळवता न येणार्‍या फडतूसांना प्रवासाचा हक्कच असू नये.

रेल्वे प्रवास हा हक्क कमी व विकल्प जास्त असतो.

रिझर्व्हेशन केले की त्या स्पेसिफिक सीट वर हक्क निर्माण होतो.

पण तो हक्क ट्रेड करता यावा म्हणून ओपन सिस्टिम असावी. कोणत्याही व्यक्तीस रिझर्व्हेशन करून ते वापरण्याचा वा त्या हक्काचे ट्रेडिंग करायचा विकल्प असावा.

बॅटमॅन Fri, 03/10/2014 - 22:25

आशिष नंदी यांनी पंप्र मोदींबद्दल चांगले उद्गार काढल्याचे नमूद करणारा एक रोचक लेख.

http://scroll.in/article/681961/Modi-is-a-'better-politician-than-the-f…

मोदी सत्तेवर आल्यावर केलेल्या दडपशाहीचाच हा परिणाम असावा बहुधा. अन्यथा लिबरल अन सेकुलर जन्तेच्या मुकुटमण्यांपैकी एक असलेल्या नंदीसायबांकडून अशी कमेंट म्हणजे जरा रोचक आणि उद्बोधकच म्हणावयास हवी.

चिंतातुर जंतू Sat, 04/10/2014 - 11:19

In reply to by बॅटमॅन

>> आशिष नंदी यांनी पंप्र मोदींबद्दल चांगले उद्गार काढल्याचे नमूद करणारा एक रोचक लेख.
मोदी सत्तेवर आल्यावर केलेल्या दडपशाहीचाच हा परिणाम असावा बहुधा. अन्यथा लिबरल अन सेकुलर जन्तेच्या मुकुटमण्यांपैकी एक असलेल्या नंदीसायबांकडून अशी कमेंट म्हणजे जरा रोचक आणि उद्बोधकच म्हणावयास हवी.

मुलाखत पूर्ण वाचलीत, की फक्त चटपटीत सरसकटीकरण करणारा मथळा? की नंदींच्या भाषिक आणि वैचारिक मांडणीतल्या गुंतागुंतीची सवय नाही? मुलाखतीतली काही रोचक उद्धृतं -

Image is very important to him, that we shouldn’t be considered second-rate by the white-skin or the yellow-skin ones. This is linked to his feeling of inferiority about India.

But it is also true Modi’s vision is limited. He doesn’t look beyond the simple, obvious political facts.

प्रश्न : Are you saying he doesn’t see the contradiction because industrial pollution is largely invisible?

उत्तर : I don’t know whether or not he is capable of seeing.

He talks like a 19th-century business tycoon.

What will the foreigners think? What will NRIs think? How would they feel when they go to these areas and feel a sense of inferiority about their country? He is brightening the face of the NRIs, as the Bengali saying goes. This is an NRI government. The NRI consciousness dominates this government.

Sabarmati is no longer a river. It is a stinking bloody pond. When it stinks too much, you release the water and bring in new water. It is a hoax to call it a river, it is a con game. You can’t clean rivers like that.

Modi doesn’t know India or his sidekicks don’t know India much. The middle class has lost touch with India, about which they know from newspapers and TV where the coverage is of a different kind.

This effort at cleanliness has nothing to do with the lifestyle of a majority of Indians. Just exhortations will not do. Sloganeering will not do.

He is doing a Gandhi because elections are coming in Maharashtra. He can’t divide people as he used to do earlier. His sidekicks are doing that.

He should have made clear that he has a slightly larger vision, that his idea of cleanliness is not CWG style.

We are moving towards a Savarkarite state. Savarkar chose Hindutva only as a way of civilising Hindus. He had contempt for Hindus as believers. He wanted to make a nationality out of them. You can’t have a nation-state without a nationality. He was looking for a candidate for nationality. Hindus he found to be in the largest number.

He is new, so people are enjoying listening to him. Soon it will pall. Indians are not impressed for too long. They ritualise everything.

All I am saying, we should be grateful for small mercies – Swachh Bharat Abhiyan is a harmless thing, and that he is trying to identify with a Gandhian, rather than an RSS, project.

चिंतातुर जंतू Sun, 05/10/2014 - 10:41

'हैदर पाहू नका, त्यावर बंदी आणा', असे निरोप ट्विटर आणि इतर सोशल मीडिआवर फिरत आहेत. त्या मुद्द्यात तथ्य का नाही, ह्या विषयी एक लेख.

गब्बर सिंग Sun, 05/10/2014 - 11:14

In reply to by चिंतातुर जंतू

In not wanting the film to be seen, our hyper-nationalists seem to be on the same page as the government of Pakistan, which has not allowed the film to be screened in Pakistani cinema halls.

हे वाक्य कळीचे आहे. (अर्थात बाकीची अनेक वाक्ये कळीची असू शकतील.)

कस्टमर सेगमेंट्स कडे लक्ष अवश्य देणे. कस्टमर सेगमेंट्स मधे - काश्मिरी (भारतीय, काश्मिरी (पाकी), नॉन-काश्मिरी (भारतीय, नॉन-काश्मिरी (पाकी), व अनिवासी भारतीय, अनिवासी पाकी - हे येतात. भारतीय नॉन-काश्मिरी मधे रिलिजस ब्लॉक्स हे मोठे ब्लॉक्स असतात. पण संख्या, "willingness to pay" and "ability to pay" च्या दृष्टीने विचार केलात तर अनिवासी भारतीय हा एक मोठा कस्टमर ब्लॉक आहे. व नेटिझेन्स मधे यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे वादंग निर्माण झाले की या ब्लॉक ची उत्सुकता ताणली जाऊन हा ब्लॉक सिनेमा लवकरात लवकर पाहण्यास उद्युक्त होईल. व पहिल्या ४ आठवड्यातच पिक्चर शंभर एक (???) कोटीचा गल्ला जमवेल - अशी अटकळ बांधून .....

अतिशहाणा Sun, 05/10/2014 - 18:21

In reply to by गब्बर सिंग

पण संख्या, "willingness to pay" and "ability to pay" च्या दृष्टीने विचार केलात तर अनिवासी भारतीय हा एक मोठा कस्टमर ब्लॉक आहे

willingness to pay बाबत शंका आहे. जितके अनिवासी भारतीय भेटलेत, त्यातले बहुतेकजण जालावर फुकट मिळणाऱ्या (पायरेटेड) प्रतींचे 'कस्टमर' आहेत.

मेघना भुस्कुटे Wed, 08/10/2014 - 15:04

In reply to by नितिन थत्ते

अतिअवांतर: थत्तेचाच्या, तुमचा अभ्यास कमी पडतोय, असे इथे खेदाने नमूद करण्यावाचून गत्यंतर नाही! ;-)

गब्बर सिंग Mon, 06/10/2014 - 08:47

http://maharashtratimes.indiatimes.com/business/modis-america-visit-suc…

मोदींनी आणली ४१ बिलियन डॉलर्स ची गुंतवणूक. ही प्रपोझलच असावीत असा माझा कयास. आता यातली किती अ‍ॅक्च्युअल होते ते पहायचे.

मन Mon, 06/10/2014 - 10:39

In reply to by गब्बर सिंग

जे प्रॉमिस केले आणि जे प्रत्यक्षात आले त्याचा भारतातला conversion rate हा सात आठ टक्के वगैरे इतका क्षुल्लक/केविलवाणा आहे.
एखाद्या राज्याने तोच दर बारा-चौदा टक्क्यापर्यंत नेले तरी त्याची वाहवा होते.

गब्बर सिंग Mon, 06/10/2014 - 08:50

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Poor-rich-gap-growing-in-…

गरीब-श्रीमंत दरी वाढते आहे!

मटा वाले पण मजेशीर आहेत. दरी वाढण्याची जी कारणे आहेत त्यात एक कारण असे ही आहे - संपत्तीचे कमालीचे केंद्रीकरण. आता बोला ???

म्हंजे संपतीचे विकेंद्रीकरण होत नाही कारण तिचे केंद्रीकरण झालेले आहे. - वाह क्या बात है !!!

मन Mon, 06/10/2014 - 15:18

http://www.bhaskar.com/news-modiart/NAT-modi-us-visit-positive-signs-rs…
हे भाषण.
ह्यात खिल्ली उडवण्यासारखं नक्की काय आहे ?
सचोटिनं वागा, मेहनत घ्या, उन्नती करुन घ्या असा संदेश देण्यात नक्की चूक काय ?
संघप्रमुखांनी म्हटलय म्हणून ते लागलिच चूक वगैरे ठरतं का ?

गब्बर सिंग Mon, 06/10/2014 - 15:43

In reply to by मन

मूळ भाषण ६५ मिनिटांचे आहे. मूळ भाषणाचा दुवा

ही जी लिंक आहे ती फक्त तीस एक ओळींची आहे.

--

जी स्वार्थ हमे सिवाय पतन के और कहीं नहीं ले जा सकता

हे चक्रमादित्य असण्याचे लक्षण आहे. (त्यांनी स्वार्थ हा शब्द वापरलाय. मी स्वहितसंबंध हा शब्द वापरतो.)

World actually runs on individuals pursuing their self-interest and as a result ensure welfare of others.

सबकी भलाई हो और इस काम में सभी एक दूसरे का साथ दें। - असे जेव्हा म्हणतात तेव्हा नेमके काय होते ? एक जण दुसर्‍याचा हितसंबंध जपतो व दुसरा पहिल्याचे हितसंबंध जपतो. म्हंजे स्वार्थास तिलांजली देऊन हे होते का ? व जर दोघे ही एकमेकांचे हितसंबंध जपतात व त्यातून दोघांचा विकास (किंवा भलाई) होतो - तर ते पतन कसे ?

--

आपल्या वैज्ञानिकांनी व खेळाडूंनी आपल्या देशाचा मान व गौरव वाढवलेला आहे.

हे सुयोग्य आहे.

आता आपल्या देशाचा मान व गौरव वाढवणे हे स्वार्थाने प्रेरित नाही - असे खरंच म्हणता येईल ???

देशाचा गौरव वाढवणे - म्हंजे - seeking more respect (for our people) from the world community. - हे स्वार्थप्रेरित नाही ??? खरंच ??????

वामा१००-वाचनमा… Mon, 06/10/2014 - 18:13

In reply to by गब्बर सिंग

"फक्त" स्वार्थ हा हीन दुर्गुणच आहे. जेव्हा आपण अन्य कोणाचे हितसंबंध जपतो तेव्हा आपण अनेकांचे हितसंबंध जपू शकतो. जेव्हा व्यक्ती आत्मकेंद्रित असते तेव्हा संकुचित होते. स्वतःशिवाय अन्य कोणी दिसत नाही. We are reduced - reduced, limited.

जेवढं ऐकलं, (थोडच ऐकलं आहे) छान आहे भाषण. आदर्शवादी आहे. आवडलं.

स्वार्थाने प्रेरीत व्हा पण त्यात वाहून जाऊ नका, अन्य लोकांचेदेखील हित लक्षात घ्या. गब्बर या एका विचारामागे खूप प्रॅक्टिकॅलिटी आहे. अनकॅनी हुषारी आहे.

मन Mon, 06/10/2014 - 18:17

In reply to by वामा१००-वाचनमा…

असे विचार करुन स्वतःचे वाटोळे करुन घेउ नकात.
अहो स्वतःचे वाटोळे केलेत तर तुमच्यात गुंतलेल्या तुमच्या आप्तस्वकीयांनाही त्रास होइल.
असे परोपकाराचे वगैरे विचार करुन आपण स्वतःला लै खड्ड्यात घालत असतो.
प्लीझ. काळजी घ्या स्वतःची .
ह्या विचारांइतकं तुमचं नुकसान तुमचा शत्रूही करु शकणार नाही.

वामा१००-वाचनमा… Mon, 06/10/2014 - 18:20

In reply to by मन

मन, मी स्वार्थ ठेऊ नका म्हणत नाही पण परोपकाराचीही एक जागा आहे. समाजात रहायचं तर आत्मकेंद्रित राहून चालत नाही. पण काय्येनं पाश्चात्यांकडे कसं "इंडिव्हिज्युअ‍ॅलिटी" चं स्तोमच स्तोम माजून राहीलय ते आपणही तसेच होऊ पहातोय - मी, माझं, मला. मग इतर गेले खड्ड्यात.

मन Mon, 06/10/2014 - 18:25

In reply to by वामा१००-वाचनमा…

वरचा प्रतिसाद अर्धवट होता.
आता भर घालून लिहितो आहे :-
असे विचार करुन स्वतःचे वाटोळे करुन घेउ नकात.
अहो स्वतःचे वाटोळे केलेत तर तुमच्यात गुंतलेल्या तुमच्या आप्तस्वकीयांनाही त्रास होइल.
असे परोपकाराचे वगैरे विचार करुन आपण स्वतःला लै खड्ड्यात घालत असतो.
प्लीझ. काळजी घ्या स्वतःची .
ह्या विचारांइतकं तुमचं नुकसान तुमचा शत्रूही करु शकणार नाही.
.
.
"आपण समाजाचं देणं लागतो" वगैरे विचारांचा व्हायरस कधे बुद्धी भ्रष्ट करेल सांगता येत नाही.
शिवाय हा व्हायरस आनुवांशिकही बनू शकतो. (तुमचा रोग आटोक्यात राहिल; पण तुमची पुढची पिढी
समाजसेवा वगैरेच्या नावाने स्वतःच्या आयुष्याचे भलतेच काही करुन घेइल वगैरे)
.
.
अहो, एखादा माणूस भरपूर कमावतो. आणि मस्त मजेत वाइन अन् शॅम्पेन काय असतं ते तुम्हा उच्चभ्रु लोकांचं--
हां "ड्रिंक्स" पितो. तर त्यात काही चूक नाही.
तो दारु पितो म्हणजे दारुवर खर्च केलेला पैसा पुन्हा समाजातच फिरत असतो.
तुम्ही फुकट कुठे काही दान करण्यापेक्षा अशा सेवा-सुविधा-उत्पादनांवर खर्च करा.
ह्या सेवा-सुविधा-उत्पादनांचे निर्माते काय समाजाच्या बाहेरचे लोक आहेत का?
ते काय आभाळातून पडलेत का ?
प्लीझ. ते सुद्धा गरजवंत आहेत. कष्ट करताहेत.
त्यांची भाकरी अशी हिसकावून/"छिनून" घेउ नका.
.
.
चांगळवादी व्हा; ताई...चंगळवादी व्हा.

वामा१००-वाचनमा… Mon, 06/10/2014 - 18:29

In reply to by मन

=)) मी त्या दारुच्या दृष्टीने नव्हते रे विचार करत पण मी दर वर्षी हार्ट-वॉक ला $२५ देते. कारण तेवढीच ऐपत आहे समाजाचं ऋण फेडण्याची. अन हो ५ मैल का काय तो वॉक चालते. उद्या मला हृदयविकाराची समस्या आली, तर मला एक सांग माझ्या निधीतून जो रिसर्च होतो त्याचा मलाच फायदा होणार ना?

अन तसं ही "आल्ट्रुइझम" चे मानसिक फायदे, यावर बरच संशोधन झालय. आपण जेव्हा अन्य कोणास मदत करतो तेव्हा आपल्यालाही फायदा होतोच्च. दवणीय मोड ऑन> ओंजळीतील फुलं, देणार्‍याचेही हात सुगंधी करतात.
___
अरे तू उपरोधीक बोलतोयस होय? :) हां मग मस्त!!!

अजो१२३ Mon, 06/10/2014 - 20:22

In reply to by गब्बर सिंग

World actually runs on individuals pursuing their self-interest and as a result ensure welfare of others.

मूर्ख आईबाप आपल्या लेकरांना मोठे का करत असावेत? पैदा का करत असावेत?
-------------------
सेल्फ इंटरेस्ट पाहणारे गब्बरी विचारसरणीचे लोक जगात जिथे कोठे आहेत ते सगळी पब्लिक प्रॉपर्टी उचलून घरी का आणत नाहीत? शेवटी पोलिस कधी ना कधी झोपायला जातात. किंवा त्यांना लाच देता येते. किंवा हे पोलिसच सरकारला गंडवून सेल्फ इंटरेस्ट साधण्यासाठी पब्लिक आणि प्रायवेट प्रॉपर्टी का लुटत नाहीत?
----------------------
संघप्रमुखांचं "स्वार्थ समाजाला कुठे नेत नाही" हे विधान जर मूर्खशिरोपणीपणाचं असेल तर "प्रत्येकाने पाहिलेला आत्मस्वार्थ हे समाजहित असते" हे विधान मूर्खशिरोमणीपणाचा वर्ग आहे. उदा. मला अण्वस्त्रे उडत जाऊन शहरे उडवतात त्याचे नवनवे विडिओ पाहायला आवडतात. समजा मी फार सबल, सक्षम माणूस आहे नि मी असे करून स्वार्थ (मंजे सेल्फ इंटरेस्ट) साधला तर मज्जा येईल नै का?
-------------------
किचकट सामाजिक संस्था असताना कष्ट करण्याची प्रेरणा स्वार्थ असो वा परमार्थ, पारंपारिक समाजमान्य चौकटीत कष्टाच्या सार्‍या कृती बसतात तोपर्यंत, गब्बरच्या आणि भागवतांच्या म्हणण्यात फरक नाही. गब्बर ही सीमा लांघतात तेव्हा तो एक विनोद बनतो. संघाचे प्रचारक संघकार्यासाठी स्वतःच्या घरच्यांना सडवतात तेव्हादेखिल तो जोकच असतो.

अजो१२३ Mon, 06/10/2014 - 20:36

In reply to by अजो१२३

उदा. मला अण्वस्त्रे उडत जाऊन शहरे उडवतात त्याचे नवनवे विडिओ पाहायला आवडतात. समजा मी फार सबल, सक्षम माणूस आहे नि मी असे करून स्वार्थ (मंजे सेल्फ इंटरेस्ट) साधला तर मज्जा येईल नै का?

काहींना हे उदाहरण तत्क्षणी निरर्थक वाटण्याची शक्यता आहे. सबबः
-------
जनरली आपण ५२ आठवडे काम करतो आणि नंतर २ आठवडे सुट्टी काढून पर्यटनस्थळाचे फोटो फेसबूकवर लावतो. आपल्या रुटीन जीवनाच्या बाहेर आपल्या फार फँटॅसी असतात. पैसे मिळाले तर आपण त्या पूर्ण करणार असतो. मॉस्लोच्या पिरॅमिडमधे यांना वरचे स्थान आहे. लोकांना वॉर गेम्स, फायटिंग गेम्स, मूवीज फार आवडतात. शिवाय जनरली अगदी महालिबरल, महापुरोगामी आणि महाप्रगत लोकांच्या देखिल विरुद्ध अस्मितांचे लोक असतात. त्यामुळं अशा फँटॅसी असणारे सक्षम सेल्फ इंटरेस्टवादी लोक चिकार असतात.

ऋषिकेश Mon, 06/10/2014 - 15:42

In reply to by मन

असे प्रश्न विचारून हे भाषण वाचायला लावण्याचा कट समजत नैये असे नाही ;)
तरी वाचले पण हे वार्तांकन निघाले, मुळ भाषण कुठाय?

गब्बर सिंग Tue, 07/10/2014 - 08:16

In reply to by मन

"हमारे देश का विकास हुआ ऐसा हम तब मानेंगे जब आखरी लाईन मे खडा आखरी व्यक्ती का विकास होगा".

हे नेमके कधी होईल ? किती महीने/वर्षे/दशके लागतील ? (काही माहीती नाही.).

जे लोक हे करण्याचा निर्धार करतात त्यांना हे करण्यात किती दिवस रस असेल ? त्यांना त्याबदल्यात काय मिळेल ? की त्यांनी परफेक्ट त्यागभावनेतूनच हे काम करावे ?

व हे होई पर्यंत ज्या "पहिली लाईन" मधल्या व "दुसरी लाईन" व "तिसरी लाईन" मधल्या लोकांकडे जे दुर्लक्ष होईल - त्याचे काय ? त्यांच्याकडे दुर्लक्ष तर होईलच पण त्यांच्यावर या खर्चाचा बोजा टाकला जाईल त्याचे काय ? त्याबद्दल त्यांना काय मिळणार ?

१९९२ मधे लिबरलायझेशन केल्या नंतर कोट्यावधी लोक त्या शेवटच्या लाईन् मधून उचलून पुढच्या लाईन मधे आणले गेले - त्याचे काय ?

काय वाट्टेल ते झाले तरी चालेल पण मी फक्त विकसितांकडे दुर्लक्ष करून .... विकासाबद्दल कोणतीही कल्पना/इच्छाशक्ती नसलेल्या व्यक्तीकडे लक्ष देणार - व यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल (कारण किंमत यांना मोजावी लागतच नाही ... नैका ?). !!!!

मन Tue, 07/10/2014 - 10:26

In reply to by गब्बर सिंग

नेत्यांना हे बोलावच लागतं. न बोलून सांगतात कुणाला.
तू असं बघ.
सगळेच गट साठमारी करतात्.आपापल्या पद्धतीनं वाटा ओरपतात व्यवस्थेतला.
सगळेच काहीतरी कमावत असले तर कमी काय होतं?
काहिच नै! फार तर नैसर्गिक संसाधनं कमी होतात.
गरिब असो वा श्रीमंत जमेल त्या मार्गानं फायदे उपटतो.
(हे वाक्या तुझ्याच लाडक्या people respond to incentive. they are selfish . their interests are linked
वगैरेच्याच चालीवरचं आहे. तुला पटेल अशी आशा आहे.)
.
.
अरे ह्या गरिबांना शिक्षा करतेच सरकारी यंत्रणा योग्य त्या मार्गानं.
असं बघ. त्यांना काही भारिचे ड्रिंक्स वगैरे परवडात नैत.
मग कित्येक नवसागर वगैरे पदार्थ टाकून विषारी बनलेले, मिथेनॉल वगैरे असलेले हातभट्टी नावाचे कैतरी पितात बघ हे.
हां, तू म्हणतोस तसं ऑफिशिअल धोरण वगैरे काही नाहिये सरकारचं अजून.
पण कृती बघ, नुसती उक्ती नको.
रेशन दुकानावर वगैरे म्हणए सबसिडाइझ्ड धान्य देतात म्हणून तुझा सात्विक संताप वगैरे होतो.
अरे, रिलॅक्स. त्या भोस्डिच्या "फडतूसां"ना काहीही दिले जात नाही.
अंमलबजावणी धड होत नाही.
सरकारच्या अकाउंटमधून रक्कम फडातूसांच्या नावानेच निघते.
पण नॉन्-फडतूसांच्याच खिशात जाते.
जो जितका कमी फडतूस, त्याच्या खिशात तितकाच फडतूस्-बचाव्-निधी जातो.
(
बर्ड फ्लू वगैरेच्या एकदम मोठ्या बातम्या आल्या. अल्प उत्पन्न वगैरे असलेल्या पोल्ट्रीधारकांच्या नावानं काही स्किमा काढल्या सरकारांनी.
ती रक्कम कुठे गेली ठाउकय ? मला अंदाज आहे; पण जाउ दे. बोल्लो तर माझा सतीश शेट्टी* व्हायचा.
सतीश शेट्टी हा rti activist, माहिती अधिकाराचा वापर करणारा सामाजिक कार्यकर्ता.
काही काळापूर्वी त्याचा खून झाला; काही दुष्ट व्रुत्तपत्रवाल्यांनी ह्यात विनाकारण बिल्डर लॉबीवर संशय व्यक्त केला.
असो.
)
.
.
.
तुम्हा व्यक्तीस्वातंत्र्यवादी वगैरे लोकांत प्रामाणिक समाजवादी किंवा कम्युनिस्टांना भाबडं/बिन्डोक म्हणायची फ्याशन असते.
गरिबांच्या नावानं निघालेले चेक्/वस्तू/धान्य्/रक्कम्/कोणतीही मदत खरोखरच गरिबाला मिळते व त्यामुळेच ती थांबवायला हवी.
(किंवा त्यामुळे गरिबांना फटके द्यायला हवे) असं म्हण्ण्यात भाबडेपणा नाही का मित्रा ?
.
.
.
किंवा जागतिक पातळीवर असं बघ की--
तुझ्या लाडक्या ,थोर्थोर ओपन मार्केट अमेरिकेतसुद्धा २००८नंतरच्या काळात आलेल्या recession/slowdown मध्ये लेहमन्/लिमन ब्रदर्स पडू दिली.
पण बाकी कंपन्या सरकारनं सगळं ओझं स्वत्:च्या डोक्यावर घेउन वाचवल्याच ना.
privatise the profits, socialise the losses हे तत्व प्रत्यक्षात आणलं की नै ?
सरकार फडतूसांना वाचवत असेल तर धनदांडग्यांनाही वाचवतेच रे बाबा.
कींवा खरं तर सरकार जेव्हा फडतूसांना वाचवल्यासारखे करते ना; तेव्हा प्रत्यक्षात वाचवत नाहिच; फक्त तसा देखावा करते;
प्रत्यक्षात त्यातून धनदांडग्यांच्या हिताचीच अंमलबजावणी होते.
पण जेव्हा धनदांडग्यांना वाचवायची वेळ असते; तेव्हा मात्र अंमलबजावणीत तेवढी चूक/गॅप वगैरे नसते.
धनदांडाग्यांना प्रत्यक्ष वाचवते; फडतूसांना वाचवल्याचा फक्त देखावा करते.

ऋषिकेश Tue, 07/10/2014 - 10:41

In reply to by मन

गब्बर सेल्फिश असण्याचा अधिकार फक्त भांडवलदारांना देऊ इच्छितो.
गरीबांनी सेल्फिशपणा केल्यास त्याला राग येतो. हे बरोबर नाही.

गरिबांनाही सेल्फिशपणा करायचा तितकाच अधिकार आहे. भांडवलशहांनी फुकटची रड लावू नये. हिंमत असेल तर गरीबांसाठी सरकारला काही करण्यापासून रोखून दाखवावे.
भांडवलदार अजिबात धमक नसलेले, पुचाट नी घाबरट आहेत. गरीबांशी दोन हात करायची वेळ आली की ते शेपूट घालतात नी लहान मुलांसारखे "ते गरीब बघा सगळे फायदे उपटतो" अशी नुसती नी असहाय रडरड करतात (लॉलिपॉप चोखत वगैरे)

नै का?

अजो१२३ Tue, 07/10/2014 - 10:50

In reply to by मन

Ranking Member Sessions and the minority staff of the Senate Budget Committee requested from the nonpartisan Congressional Research Service (CRS) an overview of cumulative means-tested federal welfare spending in the United States in the most recent year for which data is available (fiscal year 2011). The results are staggering. CRS identified 83 overlapping federal welfare programs that together represented the single largest budget item in 2011—more than the nation spends on Social Security, Medicare, or national defense. The total amount spent on these 80-plus federal welfare programs amounts to roughly $1.03 trillion. Importantly, these figures solely refer to means-tested welfare benefits. They exclude entitlement programs to which people contribute (e.g., Social Security and Medicare).
स्रोतः http://www.budget.senate.gov/republican/public/index.cfm/files/serve/?F…

कम्यूनिस्ट देशात थोडा थोडा कॅपिटलिझम चालून जातो.

गब्बर सिंग Tue, 07/10/2014 - 11:46

In reply to by मन

तुझ्या लाडक्या ,थोर्थोर ओपन मार्केट अमेरिकेतसुद्धा

तुझे बाकीचे मुद्दे बाजूला ठेवतो.

मी अमेरिकेचा समर्थक नाही बर्का. Hell... मी आजकाल कॅपिटलिझम चा सुद्धा समर्थक नाही. मी फक्त गरीब विरोधी आहे.

मन Tue, 07/10/2014 - 11:49

In reply to by गब्बर सिंग

बाकिचे मुद्दे बाजूला का ठेवायचे ?
फक्त उक्ती कडे का पहायचं ?
कृतीबद्दल बोला की.
शिवाय वरती स्पश्ट लिहायचा राहून गेलेला मुद्दा :-
श्रीमंतांना बेल आउट केलं जातं; गरिबांनाही केलं जातं.
उगा तक्रार कशाला मग?
शिवाय गरिब - श्रीमंत असं काळं - पांढरं असतं का वगैरे नेहमीचेच मुद्देही आहेतच.

वामा१००-वाचनमा… Wed, 08/10/2014 - 18:44

In reply to by मन

अरे, रिलॅक्स. त्या भोस्डिच्या "फडतूसां"ना काहीही दिले जात नाही.
अंमलबजावणी धड होत नाही.
सरकारच्या अकाउंटमधून रक्कम फडातूसांच्या नावानेच निघते.
पण नॉन्-फडतूसांच्याच खिशात जाते.

:( किती चिडतोयस मन. गब्बरचं मत बदलणारे का? अन दुसरं हे की गब्बरच्या मताने दुनिया झुकनेवाले है क्या? हम सब यहां "बोलबच्चन" है.

वामा१००-वाचनमा… Wed, 08/10/2014 - 18:30

In reply to by गब्बर सिंग

हे नेमके कधी होईल ? किती महीने/वर्षे/दशके लागतील ? (काही माहीती नाही.).

गब्बर नेत्याला एक व्हिजन असावी लागते. मग ही व्हिजन ठेवली तर चुकलं काय. अगदी तिथे पोचता येणार नाही हे सर्वांना ठाऊक असतं पण निदान त्या मार्गाने प्रयत्न केले तर काही एक विकास होतोच की.
असे स्लोगन्स शब्दशः घ्यायचे नसतात तर एक दिशा ठरवण्याकरता त्यांचा उपयोग होतो.