ही बातमी समजली का? ३५
ही बातमी वाचली का - ३५
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी या धाग्याचा वापर करावा. १०० च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढण्यात येईल
=========
बनावट नोटा एक अब्ज रुपयांच्या छापायचा उद्योग! :O
भारतीय अर्थिक गंगाजळीच्या नाड्या ढिल्या करणाऱ्या कुटिरोद्योगाच्या दानी मालदारांनी मालदा मुक्कामी एका वर९-९शून्ये इतक्या नोटा छापायचा उद्योग केल्याची बातमी वाचली असेल. :-S इतक्या हिरीरीने विदेशातील नोटाछपाई तज्ज्ञांनी चालवलेला प्रयास व नंतर तो भारतीय चलनाच्या गंगाप्रवाहात हलके हल्के सोडायची कसोशी व अथक कोशिश पाहून मन धन्य पावले. :D
आजकाल अनेक सेवा इतरांच्याकडून किफायती मुल्यात पदरात पाडून घ्यायची सोय वापरली जाते त्या धर्तीवर मॉडेल्स प्रेमी पंतप्रधानांनी १५ ऑगस्ट च्या मुहूर्तावर लाल किल्ल्याच्या प्राचीवरून आपल्या दणकेबाज शैलीत नकली ऐवजी असली नोटा छापून द्याव्यात अशी रीतसर उद्घोषणा केली तर नवल वाटायला नको! :-B
ऐसीकर तर्कतीर्थ ऊर्फ राजीव
ऐसीकर तर्कतीर्थ ऊर्फ राजीव उपाध्ये हे गेले काही महिने गायक-वादकांची काही बोलकी छायाचित्रे घेत आहेत. संगीताचा अभ्यास, जाण आणि आवड याचा त्यांच्या फोटोग्राफीच्या छंदाशी मिलाफ करण्याच्या प्रयत्नांची नोंद घेतली गेली. त्यांच्या लक्षणीय छायाचित्रांबद्दल एका फोटोग्राफी मॅगेझिनतर्फे त्यांची मुलाखत घेतली गेली. ऐसी परिवारातर्फे राजीव उपाध्येंचे अभिनंदन.
ऑब्जेक्टिफिकेशन
सरोगेट आईकडून डाऊन्स सिन्ड्रोम असलेले मूल स्वीकारण्यास ऑस्ट्रेलियन जोडप्याचा नकार. त्याची निरोगी बहिण मात्र बरोबर नेली.
http://www.theguardian.com/society/2014/aug/01/baby-downs-syndrome-abandoned-thailand-australian-donations
ही बातमी वाचून यात कोणाकोणाचं ऑब्जेक्टिफिकेशन झालं असा एक विचार मनात आला.
मूल हवं म्हणून जिचं गर्भाशय भाड्याने घेतलं त्या बाईचं?
झालेलं मूल हव्या त्या दर्जाचं नाही म्हणून ज्याचा अस्विकार केला त्या मुलाचं?
निरोगी आहे म्हणून स्वतःबरोबर घेऊन गेले त्या मुलीचं?
स्वतःचं सुखी आयुष्य एकतरी मूल असल्याशिवाय परिपूर्ण होणार नाही असं वाटून अपत्याचं "पझेशन" हवं असणार्या त्या जोडप्याचं?
खरं तर कोणाचं ऑब्जेक्टिफिकेशन झालं नाही असा प्रश्न विचारला पाहिजे. मुळात ऑब्जेक्टिफिकेशन अनैसर्गिक आणि असामान्य आहे का जगात?
ग्रे एरिया
बातमी वाचून वाईट वाटलं. अलीकडेच वाचलेला हा लेख आठवला. विशेषतः पुढील भाग -
Chinese clients don't just want American surrogates — they also want American eggs. "They all say the same thing: tall, blond, blue-eyed and pretty," Garcia says. She says they see an egg from a tall woman as a way to genetically trade up for stature.
"In Asian culture, they are a bit shorter; they just want really tall children and strong boys," Garcia says. "And they're thinking the Caucasian girl is stronger and taller, therefore they'll have stronger, taller children."
बहुतेक केसेसमध्ये, सरोगसीचे फायदे हे तोट्यांहून कितीतरी अधिक आहेत, असं मला वाटतं. मात्र यासारख्या युजेनिक्सच्या जवळ जाणार्या बातम्या वाचून बरं-वाईट अशी ठळक विभागणी करणं किंवा सार्या पर्यायांना सामावून घेणारे कायदे करणं, हे किती गुंतागुंतीचं आहे हे पुन्हा जाणवलं.
भारतीय न्यायव्यव्यस्थेचा जयजयकार असो
http://www.ndtv.com/article/india/alleging-sexual-harassment-by-high-co…
कायद्याची इतकी जाण असणार्या, न्यायव्यवस्थेत स्वतःच न्यायदात्री असणार्या स्त्रीला, स्त्री म्हणून अन्याय झाल्याने फ्रस्टेट होऊन, राजीनामा द्यायची पाळी आली.
--------------
तिच्या शब्दांत-
"I was left with no option but to resign, so, I resigned on July 15 in compelling, humiliating and disgraceful circumstances to save my dignity, womanhood, self-esteem and career of my daughter," she has written.
मुंबई ते पुणे
http://www.fakingnews.firstpost.com/2014/08/to-promote-his-upcoming-mov…
पिच्चर प्रमोट करायला आमीर खान मुंबई ते पुणे रुळावरून नागडा चालत जाणार!!!
अंतर जरा जास्तच नैये का?
येत्या ३ ते ५ वर्षात,
येत्या ३ ते ५ वर्षात, सेल-फोन, इलेक्ट्रीकल कार वगैरे वाहने, उपकरणे आदिंना लागणारा बॅटरीकाळ, तिप्पट होऊ शकतो. अर्थात बॅटरी तिप्पट अधिक काळ चालू शकतील. प्युअर लिथिअम बॅटरी बाजारात येतेय.
इलेक्ट्रीक कार ३०० माईल्स चालू शकतील यूहू!!!
http://www.usatoday.com/story/money/business/2014/08/02/stanford-batter…
...
इलेक्ट्रीक कार ३०० माईल्स चालू शकतील यूहू!!!
नॉट सो फाष्ट!!!
नाही म्हणजे, एक टप्पा, एक मैलाचा दगड म्हणून हे ठीकच आहे (नव्हे उत्तम आहे), पण...
जोपर्यंत (१) इलेक्ट्रिक कारची किंमत आटोक्यात येत नाही + पेट्रोलची वाढती किंमत धरूनसुद्धा ती पुरेशी कॉष्ट-इफेक्टिव होत नाही, अधिक (२) देशातील चार्जिंग ठेसनांचे जाळे आजच्या पेट्रोलपंपांच्या जाळ्याइतकेच विस्तीर्ण होत नाही, तोवर (एक 'फडतूस' क्याटेगरीतील ग्राहक म्हणून) आमच्या दृष्टीने इलेक्ट्रिक कार हे केवळ 'श्रीमंतां'चे एक महागडे खेळणेच राहणार.
(थोडक्यात, अजून खूप मोठा टप्पा गाठणे बाकी आहे. ते 'अच्छे दिन'सुद्धा येतीलच, पण येतील तेव्हा बघू.)
(बाकीचे तूर्तास राहूच द्या, पण...)
केवढा प्रचंड रिबेट मिळाला. (सरकार + डीलर) दोघांकडून.
एक शंका: रिबेट नक्की कोणाला?
नाही म्हणजे, सरकारी (बोले तो, ट्याक्षपेयरच्या पैशातून दिलेला) रिबेट (बोले तो, सबशिडी) खाणारे१ (फडतूस) बेनेफिशियरी नक्की कोण?
ग्राहक, की उत्पादक?
(बाकी, डीलर रिबेटबद्दल तूर्तास तरी काहीही म्हणणे नाही. एक्षेप्ट द्याट, इन जनरल, इट प्रॉबेब्ली रिफ्लेक्ट्स अपॉन अ प्रॉडक्ट्स ट्रू वर्थ. पण असो.)
बाकी, सफरचंद-सफरचंद (ऑर क्लोज़ इनफ) तुलना करून मुद्दा मांडण्याकरिता आवश्यक तो विदा एकत्रित करून तो मांडत बसण्याच्या कंटाळ्यामुळे, उर्वरित (आणि मुख्य) मुद्द्यावर तूर्तास पास. (जमल्यास - नि वेळ झाल्यास - पुन्हा पाहू. तोवर, आय प्लीड नो कॉण्टेष्ट.)
..........................................................................................
१ 'खाऊन जगणारे' हा शब्दप्रयोग येथे महत्प्रयासाने टाळलेला आहे. कारण येथे मला ग्राहकाच्या (१) आर्थिक स्थितीबद्दल आणि/किंवा (२) आर्थिक इण्टेन्शन्सबद्दल प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणेदेखील कोणतेही ताशेरे ओढायचे नाहीत, अथवा अभावितपणेदेखील तसे काही सुचवायचे नाही. (उत्पादकांबद्दल, अर्थात, आय ह्याव नो सच कंपंक्षन्स.) शिवाय, स्वतःस मध्यमवर्गीय फडतूस मानत असल्याकारणाने, ग्राहकाने चोखंदळपणे उपलब्ध सवलतीसंधींचा लाभ घेण्यात काही गैर आहे, असे मला वाटत नाही. आणि, टू द्याट एक्ष्टेण्ट, मी फडतूस आहे, हे मान्य करायलादेखील काही लाज वाटत नाही. पण... पण... उत्पादकांचे काय, जनाबेअली?
ह्म्म कळलं तुम्ही बी एम
ह्म्म कळलं तुम्ही बी एम डब्ल्यु च्या आय कार्स बद्दल बोलताय, आय-८ २२ माइल्स जाते लिथीअम-आयन बॅटरीवर.
आय-३ १०० माइल्स जाते.
आत्ता दोन्ही कार्स बद्दल वाचलं. आय-८ कसली भारी दिसते . It looks like 4-wheeled stealth fighter.
हो ही असतील श्रीमंतांची महागडी खेळणी!!!
नॉट नेसेसरिली.
बीएमडब्ल्यूच्या इलेक्ट्रिक कार्सच्या अस्तित्वाबद्दल मला कल्पना(सुद्धा) नव्हती. ('कारण शेवटी आम्ही फडतूसच! त्याला काय करणार?' - 'न'.बा.)
माझा रोख रादर निस्सानच्या 'लीफ'कडे होता. (कन्सेप्ट - आणि सुरुवात - म्हणून उत्तम आहे. परंतु माझ्यासारख्याच्या खिशात जेव्हा येऊ लागेल, आणि माझ्यासारख्याच्या रोजच्या कम्यूटच्या गरजा जेव्हा भागवू लागेल, तेव्हाचे तेव्हा पाहू.)
अरभाट शॉर्ट फिल्म क्लब
'अरभाट'च्या चिल्ड्रेन्स फिल्म क्लबबद्दल काही दिवसांपूर्वी ह्या सदरात माहिती दिली होती. त्यांच्यातर्फे पुण्यात शॉर्ट फिल्म क्लबदेखील चालवला जातो. त्यांच्या ह्या वेळच्या सत्रात राष्ट्रीय पुरस्कारविजेते लघुपट दाखवले जाणार आहेत. केरळमधला आंतरराष्ट्रीय माहितीपट आणि लघुचित्रपट महोत्सव भारतात प्रतिष्ठेचा मानला जातो. त्यात ह्या वर्षीचं सर्वोत्कृष्ट माहितीपटाचं पारितोषिक कविता दातीर आणि अमित सोनावणे ह्यांच्या 'बाबई' चित्रपटाला नुकतंच मिळालं. हा चित्रपटही ह्या वेळी दाखवला जाईल आणि ह्या दोघांसोबत चर्चाही असेल.
स्थळ : फिल्म आर्काइव्ह, पुणे
वेळ : ७ ऑगस्ट, सं. ६:३० वाजता
अधिक माहितीसाठी - फेसबुक पान.
'आयुश'ला एआयआयएमएस मध्ये मानाचं स्थान मिळवून देणार
केंद्रिय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांची व्हिजन.
"For the first time since 1947, the government's health policy is going to lay primary emphasis on the Ayurveda Siddhanta. This is in tune with the times as World Health Organisation (WHO) has given considerable importance to Ayurveda in its activities related to traditional medicine.....
The old, allopathy orientation of AIIMS is out of sync with the contemporary trend of integrating indigenous and western forms of cure. That is why I wish to give Yoga, along with Ayurveda, Unani, Siddha and Homoeopathy pride of place in the AIIMS system."
यात मॉडर्न मेडिसिनला खुबीने ओल्ड अॅलोपथी म्हटलं आहे, आणि 'वेस्टर्न मेडिसिन'बरोबर स्थानिक उपचारपद्धती जोडण्याला नवीन म्हटलेलं आहे. औषध नसलेली औषधं देणारी होमिओपथी, शरीरात चार किंवा पाच 'प्रकृती' असतात असं मानणाऱ्या युनानी/आयुर्वेद/सिद्ध यांचा वापर औषधोपचारासाठी करण्याचा निर्धार करणं म्हणजे भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी रोग्यांच्या आयुष्याशी खेळणं होईल अशी भीती वाटते.
डबल ब्लाइंड, रँडमाइझ्ड, प्लासीबो-कंट्रोल्ड क्लिनिकल ट्रायल्स
>> डब्ल्यू एच ओ नेही जर आयुर्वेदावरचा फोकस वाढवला असेल तर अडचण नसावी बहुधा.
डबल ब्लाइंड, रँडमाइझ्ड, प्लासीबो-कंट्रोल्ड क्लिनिकल ट्रायल्स हा कोणत्याही औषधाची परिणामकता शोधण्याचा आधुनिक वैद्यकातला मान्यताप्राप्त मार्ग आहे. आयुर्वेदातल्या संशोधकांनी तो निवडला आणि एखाद्या औषधाची परिणामकता सिद्ध केली तर WHOचा बाऊ करण्याची गरज नाही. मात्र, असं काहीही न करताच WHOकडून ठोस काही हाती लागेल अशी आशा बाळगण्याची वेळ अजून तरी आलेली नसावी.
अर्थातच. उपरोल्लेखित पद्धती
अर्थातच. उपरोल्लेखित पद्धती वापरून आयुर्वेदातली औषधे रद्द किंवा सिद्ध केली तर चांगलेच आहे. ते वाक्य इतक्यासाठी उद्धृत केले की जगातली अॅपेक्स बॉडी काहीतरी करू पाहतेय असे त्यात ध्वनित होते, सबब हे फक्त नवनिर्वाचित सरकारच्या डोक्यातले पिल्लू नसावेसे वाटते. असो.
सापेक्षता
>> आयुर्वेदिक औषधांचा परिणाम व्यक्ति-निरपेक्ष नसतो. आणि बहुदा ऋतू-निरपेक्षही नसतो असं ऐकलं आहे. त्यामुळे डबल ब्लाईंड कितपत अॅप्लिकेबल असेल याबद्दल साशंक आहे.
'विशिष्ट प्रकारच्या व्यक्तींना विशिष्ट ऋतूतच अमुक औषधाचा उपाय होतो' हे सिद्ध करण्यासाठीसुद्धा डबल ब्लाइंड मेथड वापरता यावीच. :-) मुद्दा असा आहे की तुम्ही केलेला प्रयोग पुरेसा पारदर्शक असेल, आणि तुम्हाला मिळालेले परिणाम पुनरुत्पादनीय (reproducible) असल्यामुळे इतरांनाही मिळतील हे तुम्ही सिद्ध केलंत, तर आधुनिक वैद्यकशास्त्राला कशाचंही वावडं नाही. उदा :
थोडी अधिक माहिती.
डबल ब्लाइंड, रँडमाइझ्ड, प्लासीबो-कंट्रोल्ड क्लिनिकल ट्रायल्स हा कोणत्याही औषधाची परिणामकता शोधण्याचा आधुनिक वैद्यकातला मान्यताप्राप्त मार्ग आहे. आयुर्वेदातल्या संशोधकांनी तो निवडला आणि एखाद्या औषधाची परिणामकता सिद्ध केली, तर ते औषध 'अॅलोपथिक' बनते.
"अॅलोपथी" (मॉडर्न मेडीसिनला उद्देशून हा शब्द निरिच्छेने व तात्पुरता वापरतो आहे.) ही कुण्या हनिमानाला मध्यरात्री स्फुरलेली कला नाही, की कुण्या देवाने समुद्रातून काढून दिलेला ग्रंथ नव्हे. आहे त्याच अनुभवसिद्ध औषधोपचारांना शास्त्राच्या कसोटीवर घासून वापरणे = मॉडर्न मेडिसिन. त्यामुळे जर आयुर्वेदात वापरलेले/सांगितलेले अमुक वनस्पती-औषध क्लिनिकल ट्रायल्सना उतरले, त्यातला अॅक्टिव्ह मॉलिक्यूल निश्चित करून, त्याची फार्मॅकोकायनेटीक्स्,फार्म्याकोडायनॅमिक्स, डोस इ. निश्चित केले गेलेत, तर ते औषध मॉडर्न मेडिसिनचे म्हणून वापरले जाते.
तथाकथित आयुर्वेदिक प्रोप्रायटरी मेडिसिन म्हणून मोठ्या कंपन्या मार्केट करीत असलेल्या अनेक भिकारचोट पण लोकप्रिय औषधांच्या पाठी, 'आयुर्वेदिक' औशधांना कोणताही (FDA) क्वालिटी कंट्रोल आवश्यक नसणे, तसेच, ट्याक्स मधून मिळणारी सूट, हे कारणीभूत आहे. प्लस आयुर्वेदिकच्या नावाखाली मिळणारा आंधळा ओटीसी सपोर्ट. त्या रामदेवबाबाच्या दुकानांतून वैदू लोक जी औषधे गल्ली बोळात विकताहेत, ते पाहिले तर आपण आपल्या आरोग्याचे काय करीत आहोत ते समजेल.
'आल्टरनेटिव्ह' मेडिसिनला वेटेज देण्याची WHO पॉलिसी, त्यातले अनुभवसिद्ध उपचार का इफेक्टिव्ह आहेत, याचा अभ्यास करून त्या उपायांना मेनस्ट्रीममधे आणण्याचा इनिशिएटिव्ह आहे. यात, परवा जळगांवला शेण गोमुत्रात नाचलेल्या तथाकथित आयुर्वेदतज्ञांसारखे वागणे अपेक्षित नाही.
केंद्रिय/भाजपेयी आरोग्यमंत्री, शिक्षणमंत्री हे ज्या प्रकारची वक्तव्ये करीत आहेत, व पॉलिसीज बनवायचा प्रयत्न करीत आहेत, एक्झॅक्टली या असल्याच बिनडोकपणामुळे संघाच्या विचारसरणीचे सरकार येऊ नये असे माझे स्पष्ट मत होते, आहे अन राहील.
पण आलिया भोगासी...
आडकित्तासाहेब, तुमच्या या
आडकित्तासाहेब, तुमच्या या चपखल उत्तरासाठी स्शँडिंग ओवेशन आणि टाळ्या.
तळटीपः आटपाटनगरच्या आयुर्वेद भोंदूमंडळातर्फे ह्या श्रीफळाचा स्वीकार करावा. तुम्ही असे आमचे पितळ उघडे पाडले तर पंचाईत होईल ओ. श्रीफळाच्या आयुर्वेदिक गुणांचा तुम्हाला फायदा होवो न होवो, नारळाच्या वड्या मात्र छान होतील.
कॉमा
१. घासकडवीसाहेब, ओल्ड आणि अॅलोपॅथी मधे कॉमा आहे. हर्षवर्धन यांनी एम्सच्या (अॅलोपॅथीच राबवायच्या) प्रवृत्तीला जुनी म्हटले आहे. अॅलोपॅथीलाच नाही.
---------------------
२. अॅलोपॅथीची सुरुवात कोणत्या सालची? त्यापूर्वी कोणावरही कसलाही उपचार होत नसे का?
-------------------
३. बाकी आयुर्वेद, होमिओपॅथीचं तत्त्वज्ञान थोतांड आहेच. पण यू नो, दॅट बिइंग दॅट, थोतांडांच्या साम्राज्यातही चार चांगल्या गोष्टी असू शकतात. मंजे यज्ञ करणे थोतांड असले तर वैदिकांनी त्यानिमित्ताने भूमितीला स्पर्श केला, तसे.
-------------------
४. शिवाय अॅलोपॅथीचं देखिल बरंच तत्त्वज्ञान थोतांड आहे, पण ते एक असो.
असं काय करता? जगातील यच्चयावत
असं काय करता?
जगातील यच्चयावत विषयांवर कोणत्याही विशेष विद्याशिवाय अशा प्रकारची घाऊक विधाने करणे ही त्यांची हातोटी आहे!
आणि त्यावर खवळून कोणी प्रतिवाद करू लागले की मेगाबायटी प्रतिसाद लिहिणे, अजून फाटेफोडू घाऊक विधानांचा पाऊस पाडणे, समोरचा कितीही लॉजिकल बोलला तरी स्वतःच्या पुर्वाग्रहाधारित मतास चिकटून राहणे ही सुद्धा त्यांची नैतिक जबाब्दारी असल्या सारखे ते लिहित असतात इकडे!
गांभीर्य
आपण माझे सारे प्रतिसाद वाचता का? गंभीरपणे वाचता का? मी काय लिहितो नि मला काय म्हणायचं असतं याची आपल्याला खात्री असते का?
जगातील यच्चयावत विषयांवर कोणत्याही विशेष विद्याशिवाय अशा प्रकारची घाऊक विधाने करणे ही त्यांची हातोटी आहे!
आणि त्यावर खवळून कोणी प्रतिवाद करू लागले की मेगाबायटी प्रतिसाद लिहिणे, अजून फाटेफोडू घाऊक विधानांचा पाऊस पाडणे, समोरचा कितीही लॉजिकल बोलला तरी स्वतःच्या पुर्वाग्रहाधारित मतास चिकटून राहणे ही सुद्धा त्यांची नैतिक जबाब्दारी असल्या सारखे ते लिहित असतात इकडे!
तुमच्यासाठी - सहसा माणसाला मतभिन्नतेचा आदर असावा.
माझ्यासाठी - तुमचे सगळे आरोप शिरोधार्य. पण देवानं मला डोकंच कमी दिलं असलं तर मी काय करू?
अवांतर - मोठे प्रतिसाद लिहिणे, विषयाची सारी अंगे चर्चेस आणणे, आपल्या मताचे आग्रहाने प्रतिपादन करणे यांत फारसे काही गैर नसावे.
लोकांना स्वतः विचार न करता,
लोकांना स्वतः विचार न करता, वाचन करता, लोकप्रसिद्ध गोष्टींना थोडेशे तरी प्रश्नचिन्हे लावून विचार करताच येत नसावा का?
नुस्ते प्रश्नचिन्ह उपस्थित करून जणू काही एखाद्या शास्त्राची पोलखोल केल्याचे समाधान मिळते किंवा कसे, हेही पाहण्याजोगे आहे. यातही जो तथाकथित विचार आहे तो कुठल्याही कसोटीवर कितपत टिकणारा आहे ते न पाहता निव्वळ त्याची टिमकी वाजवणे हे योग्य नाही.
म्हणजे नक्की काय?
This is in tune with the times as World Health Organisation (WHO) has given considerable importance to Ayurveda in its activities related to traditional medicine.
यासाठी थोडं गूगलकाम केलं असता हे एक त्रोटक लेखन मिळालं. त्यानुसार आयुर्वेदिक औषधांमध्ये हानीकारक पदार्थ आणि धातू (शिसं, पारा, आर्सनिक - पान क्र २१५) असतात असा उल्लेख आहे. ती औषधं काळजीपूर्वक गोळा केली पाहिजेत आणि काळजीपूर्वक दिली पाहिजेत इतपतच उल्लेख आहेत. (माझ्या कुंडीत लावलेल्या टोमॅटोला फुलं येत आहेत पण फळ का धरत नाहीये याचा गूगल शोध घेतला असता सदर निबंधात आहे त्यापेक्षा जास्त तपशीलवार माहिती मिळाली. उदा - फार गरम किंवा फार थंड हवेत फळ धरत नाही, याशिवाय ४० फॅ च्या खाली आणि ९० फॅ च्या वर तापमान असेल तर फळ धरत नाही असे वस्तुनिष्ठ उल्लेख सहज सापडतात.)
हू (WHO) च्या संस्थळावर दहा वर्षांपूर्वी प्रकाशित केलेलं हे पानही सापडलं - Alternative medicine must get scientific validation for rational use.
चटकन मिळालेली काही पानं वाचता "युनानी/आयुर्वेद/सिद्ध यांचा वापर औषधोपचारासाठी करण्याचा निर्धार करणं म्हणजे भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी रोग्यांच्या आयुष्याशी खेळणं होईल अशी भीती वाटते," याला पाठिंबा. सदस्य मी म्हणतात तसं हे फक्त दाखवायचे दात असतील तरीही हे भीतीदायकच वाटतं. या अशा विधानांमुळे वैदू, बाबा बंगाली आणि भेसळ करणाऱ्यांचं उखळ पांढरं होऊन सामान्यांच्या आरोग्याशी खेळ वाढतील असं वाटतं.
पुंगी
या अशा विधानांमुळे वैदू, बाबा बंगाली आणि भेसळ करणाऱ्यांचं उखळ पांढरं होऊन सामान्यांच्या आरोग्याशी खेळ वाढतील असं वाटतं.
मॉडर्न मेडिसीनचा उदो उदो करणारी फार्मा इंडस्ट्री म्हणजे बाबा बंगाल्यांचं महासंमेलन आहे.
१. http://medicofield.wordpress.com/2012/07/17/unethical-promotion-of-medi…
इथला एक पॅरा असा-
A UK based pharma company, GSK (GlaxoSmithKline) pleaded guilty for criminal offence in USA and charged $3 billion to settle the largest case of healthcare fraud in US history. GSK targeted the antidepressant PAXIT to patient under 18 years when it is approved for adults only. GSK promoted their drug WELLBUTRIN for uses in an unapproved indication like weight loss and in the treatment of sexual dysfunction. Furthermore, GSK failed to give the US FDA safety data about its diabetes drug- AVANDIA. American Pharmaceutical giant Eli Lilly also pleaded guilty and paid $1.45 billion for promoting its drug-ZYPREXA for a non-approved indication by US FDA. Johnson & Johnson has also been fined $2 billion for off-label promotion of another psychotropic drug- RESPERADAL. Merck & Co. has agreed to pay $24 million to State Medicaid Programme of USA to settle the long running civil charges that its charged too much for some of drugs. Pfizer Inc. agreed to pay $2.3 billion to settle its unethical marketed 13 drugs. These pharmaceutical companies are comfortably operating continuous unethical marketing practices in our country in absence of any suitable law.
आता जी एस के, एलि लिलि, जाँसन & जाँसन, फायजर ही छोटी नावं आहेत का? म्हणजे आमचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सभापती, चीफ जस्टीस, लष्कर प्रमुख हे एकाच खोलीत लाच घेताना रंगे हाथ पकडले जाण्यासारखे आहे. पण त्यांना त्या "मॉडर्न" शब्दाचा आधार आहे म्हणून तरून आहेत.
२. http://www.dadychery.org/2012/09/08/children-as-lab-rats/
इथे काय लिहिले आहे पहा -
In response to a Right to Information query filed by Indore-based medical rights activist Anand Rai, the Drug Controller General of India (DGCI) disclosed that 2,031 people have died as a result of serious adverse events (SAEs) during drug trials in the past four years.
2000 लोक 'प्रयोगासाठी' मेले? मुद्दाम ट्रायल्स फक्त गरीब देशांत? जगात या ट्रायल्सनी किती नुकसान झाले आहे हेच मोजायला एक मोठी कंपनी लागेल.
३. खालील वाल्य किती उद्दाम आहे पहा -
ere's what its CEO said on the subject according to a report in Bloomberg Businessweek:
Bayer Chief Executive Officer Marijn Dekkers called the compulsory license "essentially theft."
"We did not develop this medicine for Indians," Dekkers said Dec. 3. "We developed it for western patients who can afford it."
वर आम्ही भारताचे चीप लेबर वापरू पण भारत सरकारची पॉलिसी मानणार नाही अशी मुक्ताफळे उधळलेली. फार्मा कंपन्यांच्या मार्जिन्स काय आहेत ते ही वाचणे रोचक आहे.
४. इथे काय लिहिले आहे ते पहा -
http://www.drugwatch.com/dangerous-drugs.php
नवे नवे ड्रग्ज येत असतात. त्यांचे काही परिणाम अगोदर लपवलेले असतात. नसले तरी काही नंतर कळतात. तोपर्यंत नुकसान होऊन गेलेले असते. मग यू एस मधे ते बॅन होतात. इतर देशात मात्र खपवत राहतात.
५. वर्ल्ड हेल्थ ऑर्गॅनायझेशनचा रिपोर्ट अजूनच डोळे उघडणारा आहे.
archives.who.int/tbs/tbs2007/GGM_2007.ppt
जागतिक आरोग्य बाजार ३ *१०^१२ यू एस डी (२००७). फार्मा इंडस्ट्री ६०० बिलियन. यात करप्शन कमित कमी ६० बिलियन. जास्तीत जास्त १५० बिलियन. नि औषधांची चाचण्याच अशा दोषपूर्ण पद्धतीने होतात कि लोकांना अकारण ३४% किंमत जास्त मोजावी लागते.
------------------
अवांतर १-
मागे टिवीवर अर्णव गोस्वामी रवि शंकर प्रसादांना झोडत होता. कर्नाटकात येदियुरप्पांनी भ्रष्टाचार केला, तुम्हाला काय अधिकार आहे काँग्रेसला बोलायचा, इ इ. बराच वेळ गेला नि तो नेहमीप्रमाणे चर्चा "जिंकत" आला होता. तेव्हा तिथे बराच वेळ शांत बसलेल्या एका पॅनेलिस्टला बोलायला मिळाले तेव्हा तो अर्णवला शांतपणे म्हणाला - "सद्गृहस्था, कॅग म्हणते आहे कि यूपीए ने १० लाख कोटींचा घोटाळा केला. येदियुरप्पाने एका जमिनीच्या तुकड्याचा घोळ केला म्हणून तो जेलमधे गेला. आता तूच ठरव कोणती पुंगी किती वाजवायची."
--------------
अवांतर -२
वस्तुनिष्ठ माहितीसाठी गुगल हा खरोखरच प्रचंड उपयुक्त स्रोत आहे.
आपण रोज इतका भाजीपाला खातो
आपण रोज इतका भाजीपाला खातो ... मंडईतून आणून. IT is never subject to any FDA screening. Why should the medicines be subject to so much screening ?
आणि जी मेडिसिन्स स्क्रीनींग मधे सात ते आठ वर्षे पाइपलाईन मधे असतात त्यांमुळे जे मरीज दगावतात त्याचे काय ?
-----
"We did not develop this medicine for Indians," Dekkers said Dec. 3. "We developed it for western patients who can afford it."
मी ह्या वाक्याचे थेट समर्थन करतो. हेच योग्य आहे.
सरकारने मागच्या वर्षी बेयर चे एक (की २) पेटंट्स अबोलिश करून ती एका भारतीय कंपनीस दिली - बल्क ड्रग्स बनवायला. ताकी वो कंपनी "गरीबोंके लिये" वोही दवाए सस्ते मे बेच सके.
वेस्टर्न हा शब्द मी मुद्दाम स्ट्राईकथ्रु केलेला आहे.
स्क्रीनींग
आपण रोज इतका भाजीपाला खातो ... मंडईतून आणून. IT is never subject to any FDA screening. Why should the medicines be subject to so much screening?
गब्बरजी असं नाय. स्क्रीनींग थांबवणं योग्य नाही. सगळीच स्क्रीनींग थांबवण्यापेक्षा सुरक्षेसाठी जास्त चांगलं म्हणून सगळीच स्क्रीनिंग चालू करू. अगदी भूपृष्ठाची उलथापालथ होऊन जे खंड वर येत असतात त्यांना सुद्धा स्क्रीन करू. नीट नाही आढळले तर वापस मॅग्मामधे दाबून टाकू. शेवटी कालांतराने त्यांना इथे जीवन सपोर्ट करायचं आहे! हाय काय नाय काय!!
वेस्टर्न हा शब्द मी मुद्दाम स्ट्राईकथ्रु केलेला आहे.
कशासाठी? ही स्वातंत्र्याची पायमल्ली नव्हे का? आणि भारतीय लोक अफोर्ड करत नाहीत असे म्हटल्यावर पश्चिमेचे खोडण्यात काय अर्थ?
मी ह्या वाक्याचे थेट समर्थन करतो. हेच योग्य आहे.
ज्या वाक्यात तुमच्या देशाचा अवमान आहे त्याचे तुम्ही समर्थक कसे करता? तुमचे नागरीकत्व कोणते आहे?
नि असे काही नसेल नि केवळ आर्थिक भूमिका असेल तर - ज्या अटींखाली भारतात संशोधन करायचे ठरले आहे त्याला बाध्य राहणे बेयरला आवश्यक नाही का?
पराक्रम
>> मॉडर्न मेडिसीनचा उदो उदो करणारी फार्मा इंडस्ट्री म्हणजे बाबा बंगाल्यांचं महासंमेलन आहे.
फार्मा कंपन्या धुतल्या तांदळासारख्या आहेत असा कुणाचा दावा नसावा, पण आधुनिक वैद्यकामुळे घडलेल्या काही गोष्टी -
- देवी, पोलिओ अशा अनेक रोगांसाठी लशी निर्माण करता आल्या;
- अँटिबायॉटिक्समुळे कित्येक लोकांचे प्राण वाचले;
- दूषित पाण्यामुळे कॉलरा पसरतो; डासांमुळे मलेरिया पसरतो हे ज्ञात झालं;
- आज एड्ससारख्या असाध्य रोगाच्या रोग्यालादेखील योग्य औषधोपचारांनी दीर्घ काळ चांगल्या प्रतीचं आयुष्य जगता येतं;
- हृदयात बायपास, कृत्रिम गुडघे प्रतिरोपण करण्यासारख्या शस्त्रक्रियांमुळे जगभरातल्या वृद्ध लोकांचं आयुष्य अधिक चांगलं जातं.
आधुनिक वैद्यकाचे हे पराक्रम कुणी अमान्य करू नयेत. बाबा बंगाल्यांकडे जगाला दाखवण्यासारखे असे काही पराक्रम असतील तर तेदेखील जरूर सांगावेत. जागतिक आरोग्य संघटना ते आनंदानं ऐकून घेईल असं वाटतं.
यात खोडसाळ काय
यात खोडसाळ काय आहे?
--------------------
एकीकडे जुनी मूल्ये नि जुन्या व्यवस्थांवर मुक्तकंठाने टिका करायची. दुसरीकडे आज आपण स्वतःच ज्या व्यवस्थेचे भाग आहोत ती कितीही वाईट असली तरी गप्प राहायचे. हे दांभिकपणाचे नाही का?
----------------------
अर्थातच आडकित्ता यांनी कोणाच्याही प्रतिक्रियेला उत्तर देणे न देणे सर्वस्वी त्यांची मर्जी आहे. तिचा मला आदर आहे. ते डॉक्टर आहेत म्हणून फार्मा इंडस्ट्रीच्या मालप्रॅक्टीसेसला ते जबाबदार आहेत असे होते का? ते अर्थातच स्वतः सच्चरित्र प्रोफेशनल असणार. किमान मी तरी तसेच आहे असे गृहित धरून चर्चा करायला हवी. मुद्दा तो आहे का? दोन व्यवस्थांची तुलना चालली आहे त्यात मी एक बाजू घेत आहेत नि ते दुसरी घेत आहेत. त्यांच्या बाजूंच्या उणिवांबाबत ते शांत आहेत म्हणून मी स्पष्टीकरण मागीतले आहे.
-----------------
"समजा" तुम्ही ब्राह्मणप्रधान जुन्या समाजपद्धतीचे विरोधक पुरोगामी आहात नि नव्या घटनाप्रधान समाजपद्धतीचे समर्थक आहात. असे असण्यावरच माझी काही हरकत नाही (नाहीतरी हरकत असणारा मी कोण?). पण महिनाभर बामनाने सव्वा रुपया दक्षिणा घेतली म्हणून ठणठणाट करताना कलेक्टरने नोटांच्या किती गड्ड्या ढुंगणाखाली लपवल्या त्यावर काहीच भाष्य नको का? असे विचारण्यात खोडसाळ काय?
रोग्यांच्या आयुष्याशी खेळ
रोग्यांच्या आयुष्याशी खेळ होईल हे पटते पण सामान्यांच्या आरोग्याशी खेळ होऊ शकत नाही कारण आरोग्यवती व्यक्तीला कोणत्याही उपचारांची गरज नसते. बाकी उपचारपद्धती कोणतीही असली तरी पैशांसाठी रोग्याच्या जीवाशी खेळ होतोच; फक्त आता तो खेळ करायला आणि मार्केटच्या "पाय" मध्ये हिस्सा मिळवायला अधिक लोकांना परवानगी मिळेल इतकेच.
ताणलेली गृहितकं
- मी सामान्य मनुष्य आहे. मी कधीमधी आजारी पडते. कधी सामान्य असल्यामुळेच असह्य वेदनाही होतात. त्यात कधीमधी मला औषधांशिवाय बरं वाटणार नाही किंवा दुखणं सहन होणार नाही किंवा दुखणं अंगावर काढू नये असं वाटतं. अशा वेळेस कधीमधी मी शिकलेल्या, तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेते. अशा वेळेस मी सामान्य मनुष्यही असते आणि रुग्णसुद्धा. फक्त असामान्य लोक आजारी पडतात आणि/किंवा त्यांना औषधोपचारांची आवश्यकता भासते असं मला वाटत नाही.
- प्रत्येक वेळेस डॉक्टरकडून, अगदी प्रिस्क्रिप्शन ड्रग्ज घेताना, माझ्या/सामान्य मनुष्याच्या जीवाशी खेळ सुरू असतो असं मला वाटत नाही.
- प्रत्येक वेळेस (प्रिस्क्रिप्शन) ड्रग्ज घेताना मी/सामान्य व्यक्ती आजारी असतेच असंही नाही. उदाहरणार्थ - Lena Dunham Asks Why People Use Birth Control, World Learns Critical Lesson
कालच्या संसदेतील चर्चेत
कालच्या संसदेतील चर्चेत उल्लेखल्या गेलेल्या व आफ्रिका व युरोपमध्ये सध्या धुमाकुळ घालत असलेला "इबोला" आहे तरी काय यासंबंधी वाविप्र
गोविंदाचार्यांची गुगली:
गोविंदाचार्यांची गुगली: केंद्र सरकारला फेसबुक वापरासाठी कोर्टात खेचले.
बातमीतील हा परिच्छेद रोचक आहे:
सरकारी कामासाठी खासगी ईमेलचा जरी वापर केला तरी तो सार्वजनिक नोंदी कायद्याचा भंग ठरतो. केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय कोणतीही कागदपत्रे देशाबाहेर घेऊन जाऊ शकत नाही. या सोशल मीडियाचे सर्व्हर परदेशात आहेत. त्यामुळे देशातील माहिती अन्य देशांना दिली जात आहे. १९ मंत्रालये अधिकृतपणे ट्विटरवर आहेत तर पाच मंत्र्यांनी खासगी ई-मेल आयडी देऊन फेसबुकवर अकाऊंट सुरू केले आहे. पंतप्रधान स्वतः ट्विटर व फेसबुकवर आहेत. बहुतेक मंत्र्यांचे ट्विटर अकाऊंट आहे
फर्स्ट पोस्ट्वरील दोन लेख
फर्स्ट पोस्ट डॉट कॉमवर दोन रोचक लेख वाचले. एक लँड अॅक्विझीशन अॅक्टने निर्माण झालेल्या समस्यांविषयी आहे. त्या लेखात काही मुद्दे मिसींग असले तरी विचारात घेण्या जोगा वाटला. दुसर्या लेखात क्रोनी कॅपिटालीझम करता क्रोनी सोशीआलीझम ही संज्ञा वापरून दाखवलेली दिसली प्रथमदर्शनी तरी विचार करावा वाटला अर्थात दुसर्या लेखात मुख्य उहापोह व्यवसाय क्षेत्रातील मंडळी जेलची हवा खाऊन येण्याच्या प्रमाणात झालेल्या वाढीची दखल घेतली गेली आहे.
१ http://firstbiz.firstpost.com/economy/upas-land-act-may-end-benefiting-…
२ http://firstbiz.firstpost.com/corporate/subrata-roy-to-jignesh-shah-why…
गाठ पडली ठकाठका...
एका नेपाळी मुलाची सोळा वर्षांनंतर आपल्या आईवडिलांशी गाठ घालून दिल्याच्या मोदींच्या दाव्यावर बीबीसीने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. पुराव्यादाखल त्या मुलाच्या फेसबुक पानावरच २०१२सालचे परिवारासोबतचे फोटो आहेत असं म्हटलं आहे.
हट्ट?
हट्ट काय त्यात ?
भारतात हा सांस्कृतिकदृष्ट्या किम्वा अन्य कोणत्याही कारणानं जवळचा/आपुलकीचा देश वाटू शकतो.
किम्वा अन्य काही कारणानं इथं रहावसं वाटू शकतं.
इथे रहायला मिळत नव्हतं म्हणून स्वीडनकडे धाव घेतली असंही असू शकतं.
अर्थात, हे सर्व मी तपशील माहित नसतानाच बोलत आहे;
मथळे पाहून व तर्क लावून.
त्याने फारसा फरक पडू नये
शिवाय भारतात तस्लिमा नसरीन यांना ओळखणारे आणि आदर दाखवणारे अधिक लोक सापडतील. स्वीडनमध्ये कदाचित फारच कमी.
त्याने फारसा फरक पडू नये.
(१) एका मुसलमानबहुल देशात त्यांचे जिणे हराम झाले, आणि (२) एका मुसलमानबहुल देशाने त्यांचे नागरिकत्व (किंवा, किमानपक्षी, त्यांचे पारपत्र) हिरावून घेतले, या दोन बाबींचा गवगवा स्वीडनमध्ये (किंवा एकंदरीतच पश्चिमजगतात) त्यांना आदर मिळवून देण्यास पुरेसा आहे. यात त्यांच्या 'लज्जा' या कादंबरीच्या बरेवाईटपणाचा किंवा यथोचितपणाचा यत्किंचितही संबंध नाही. (ती कादंबरी उत्कृष्ट असू शकेलही, किंवा नसूही शकेल; मला त्याबद्दल काहीच म्हणावयाचे नाही. मी ती कादंबरी वाचलेली नाही, त्यामुळे मला कल्पना नाही. श्रीमती तसलीमा नसरीन यांचेविषयीही बरे किंवा वाईट असे माझे कोणतेच मत नाही.)
(श्री. सलमान रश्दी या अत्यंत थर्डरेट अशा लेखकाच्या 'सॅटनिक व्हर्सेस' या अत्यंत बकवास अशा पुस्तकास (आणि एकंदरीतच श्री. सलमान रश्दी यांस) (१) मुस्लिमजगतात त्याविरोधी झालेल्या निषेध-निदर्शनांमुळे, (२) कदाचित त्याहीअगोदर भारत सरकारने त्यांच्या पुस्तकावर लावलेल्या बंदीमुळे, आणि (३) सरतेशेवटी, श्री अयातुल्लाह खोमेनी यांनी त्यांच्याविरोधी काढलेल्या फतव्यामुळे, अवाच्यासवा नि अवास्तव प्रसिद्धी मिळाली (अन्यथा ते पुस्तक बहुधा दुर्लक्षित राहून आपले नैसर्गिक मरण मरते), आणि श्री. सलमान रश्दी यांची काहीशी लार्जर-द्यान-लाइफ अशी प्रतिमा उगाचच निर्माण झाली, असे माझे प्रामाणिक मत आहे.)
कदाचित स्वीडनमधील त्यांचा पब्लिकशिट्टी-एजंट आपल्या प्रयत्नांत कमी पडला असू शकेल.
--------------------------------------------------------------------------------------------------------
(अतिअवांतर: त्यांना भारतात येऊन राहावेसे वाटणे (कोणत्याही कारणाकरिता किंवा कारणाविना) याबद्दल माझे काहीच म्हणणे नाही. तो सर्वस्वी त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे; सबब, त्याविषयी मला काही म्हणणे असण्याकरिता लोकस स्टॅण्डाय असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मात्र, भारतात राहणे हा त्यांचा मूलभूत हक्क नाही. भारतात राहण्याकरिता त्यांना परवानगी देणे, अथवा (कोणत्याही कारणाकरिता वा कारणाविना) ती नाकारणे, हे पूर्णतः भारत सरकारच्या अखत्यारीत (आणि मर्जीवर अवलंबून) आहे.)
इंडियन सेकुलारिस्ट लोकांना
इंडियन सेकुलारिस्ट लोकांना शिव्या घातल्यामुळेच तिला व्हिसा मिळाला असेही म्हणायला लोक आता मागेपुढे पहायचे नाहीत.
http://www.firstpost.com/india/indian-secularists-are-not-true-seculari…
सामाजिक संवेदनशीलता
आपली सामाजिक संवेदनशीलता तपासून बघावी असे वाटायला लावणार्या या दोन बातम्या
पर्थमध्ये एका प्रवाशाचा पाय वाचवण्यासाठी लोकांनी रेल्वेचा डबा कलता केला
'निर्भया' फोटो शूट
सकृतदर्शनी या दोन बातम्या एकमेकांशी संबंधित नाहीत. तथापि यात लोकांचा सामाजिक संवेदनशीलता हा समान धागा आहे असे मला वाटते. तुम्हाला?
पण बॅटमन जे लोक स्वकीयांना
पण बॅटमन जे लोक स्वकीयांना फडतूस म्हणतात ते आपल्याआपल्यातच चूका दाखवत असतील अन बाहेरच्या जगात, परकीयांसमोर मात्र ब्रेव्ह फसाड घेऊन जर देशाची बाजू घेत असतील तर? आपण आपल्यात गोड गोड मिट्ट बोलत रहायचं का?
पण हां जर परकीयांसमोर आपल्या देशाची अब्रु चव्हाट्यावर आणणारे असतील तर ते अक्षम्य आहे.
परकीयांसमोरही चर्चेत
परकीयांसमोरही
चर्चेत परकीयांचा संबंध कसा आला कळले नाही, पण परकीयांना देशाबद्दलचे सत्य सांगीतल्याने अब्रू कशी जाते. ते सत्य त्या रुपात आहे यानेच अब्रू गेलेली असते, सांगण्या न सांगण्याने फरक काय पडतो? व्यक्तिगत प्रतिमा जपायची म्हणून विदेशी वास्तव्यात सत्ये लपवायची असतील तर तो भाग वेगळा, पण अब्रू असते वा नसते, ती सांगायची असते वा नसते असे नसते.
अभ्यास वाढवा
हेगेलच्या कार्यातून ह्याचा प्रतिवाद कैक शे वर्ष आधीच झालाय .
हे वाचा :- https://www.marxists.org/archive/marx/works/1843/critique-hpr/intro.htm
ते वेगळं. इंटरनेट
ते वेगळं.
इंटरनेट पुरवणार्या कंपन्यांनी चिक्कार बँडविड्थ खाणार्या सायटीकडून पैसे घेणे आणि त्या सायटीने ते पैसे ग्राहकाकडून वसूल करणं समजू शकतो.
इथे ट्रायने (पक्षी: सरकारने) हस्तक्षेप करून व्हॉट्सअॅपकडून पैसे घ्यावेत, त्यातला काही हिस्सा मोबाईल कंपन्यांना द्यावा आणि काही सरकारने ठेवावा अशी बावळट्ट मागणी आहे.
हम्म
सरकारचा हस्तक्षेप असावा ही गोष्ट वगळता मला दोन्ही गोष्टी समान वाटल्या. नवीन टेक्नॉलॉजी कंपनीने (व्हॉट्सअॅप-नेटफ्लिक्स) पारंपरिक उत्पन्नावर गदा आणल्याने (एसेमेस/कॉल्स - केबल टीवी), त्या कंपनीकडून नुकसानीची भरपाई मागायची. (अमेरिकेत नेटफ्लिक्सची बँडविड्थ थ्रॉटल करुन आयएसपीवाल्यांनी ते साध्य केले तर भारतात सरकारी हस्तक्षेप हवा आहे.)
सरकारच्या हस्तक्षेपाऐवजी सर्व मोबाईलकंपन्यांनी व्हॉट्सअॅप सेवा देणे बंद केले तर त्यांना व्हॉट्सअॅप/फेसबुककडून पैसे वसूल करता येतील.
सरकारच्या हस्तक्षेपाऐवजी सर्व
सरकारच्या हस्तक्षेपाऐवजी सर्व मोबाईलकंपन्यांनी व्हॉट्सअॅप सेवा देणे बंद केले तर त्यांना व्हॉट्सअॅप/फेसबुककडून पैसे वसूल करता येतील.
ते करायला हरकत नाही. मग तो 'मारामारीतला सर्वात दांडगा पोरगा कोण' हा विषय होतो.
पण बहुदा ते करणं टेक्निकली शक्य नसल्याने सरकारला मध्ये घालून गळा काढताहेत.
बहुदा यांची असोसिएशन आहे
http://www.coai.com/ यांच्या मार्फत निर्णय घेता येईल.
बातम्या अश्या नाहीत. 'मिळून
बातम्या अश्या नाहीत. 'मिळून साऱ्याजणी'च्या गेल्या अंकातला एक लेख आणि एक कथा वाचनीय वाटले -
झुंजूमुंजू ः सामाजिक न्याय विशेष दलित अत्याचार, लॉंग मार्च आणि खर्डा संसद
अनुवादित कथा - प्रतिध्वनी भूमीचे
नियंत्रणाचा आभास
भारतातील हेल्थकेअर आणि रियल इस्टेट उद्योगांवरील नियंत्रणाच्या गरजांचा एक चांगला आढावा वाचला.
http://www.thehindubusinessline.com/opinion/columns/aarati-krishnan/reg…