संसद सदस्य आणि सभापतींच्या जबाबदार्या
बजेट सत्रात वित्तमंत्र्यांचे भाषण चालु असताना अनेक वेळा इतर संसद सदस्यांनी बराच गोंधळ घातला. पण मॅडम स्पीकर (सभापती ????), सुमित्रा महाजन हया गोंधळाला कंट्रोल करण्याऐवजी स्वतः हसून गोंधळाचा आस्वाद घेताना दिसल्या. त्यानिमित्तने पुढील काही प्रश्न मनात आले.
१. सभापतींच्या सदनातील जबाबदार्यांबद्दल काही मार्गदर्शक तत्वे (गाईडलाईन्स) आहेत का ?
२. सभापतींच्या सदनातील असंवेदनशील / बेजबाबदार वर्तनाबद्दल सभापतींवर काही कारवाई केली जाउ शकते का ?
३. सदनातील सदस्यांवर वचक ठेवणे आणि सदनाचे कामकाज सुरळीत चालू ठेवणे ही सभापतींची मुख्य जबाबदारी समजल्यास, सभापती वारंवार (रिपीटेडली) सदस्यांच्या बेबंद वर्तनाला लगाम घालण्यात अयशस्वी ठरत असल्यास सभापतींवर काही कारवाई केली जाउ शकते का ?
४. सभापती संसद सदस्यांवर कारवाई (निलंबन ई.), करु शकतात, सदनाचे कामकाज स्थगीत करु शकतात. तसेच काही अधिकार संसद सदस्यांना (ईंडिव्हिज्युअली / कलेक्टिव्हली) असतात का ?
५. बर्याच वेळा सदस्यांच्या बेबंद वर्तनामुळे / अशक्य अशा गोंधळामुळे सदनाचे कामकाज तहकूब करावे लागते. अशा वेळेस सभापतींनी आपल्या अधिकारांचा योग्य वापर सदनाचे कामकाज सुरळीत चालू ठेवण्यासाठी केला आहे किंवा नाही याबद्दल कोणी सभापतींना जबाबदार धरु शकते का?
६. सभापती कोणास जबाबदार (आन्सरेबल) असतात ?
(वि.सू. - वरील विषय कुठल्या लेखनप्रकारात मांडावा याविषयी थोडा संभ्रम आहे. तरी व्यवस्थापकांना योग्य वाटेल त्याप्रमाणे त्यांनी धागा इतरत्र हलवावा)
बजेटच वेबकास्ट
बजेटच वेबकास्ट http://budgetlive.nic.in/ या दुव्यावर मिळाला मी ते लाईव पाहीलेल नाही. मी राष्ट्रपतींच्या भाषणावरच्या चर्चेचा भाग पाहीला होता. (मीतभाषी असल्यामुळे ?) नको, नाही आणि नो कॉमेंटस हे व्यक्त करण्यासाठी केवळ स्मीत देणे त्यांच्या शैलीचा भाग असावा. धागा लेखक त्यांच्या शैलीचा वेगळा अर्थ तर लावत नसतीना अशी शंका वाटते.
धागा लेखक त्यांच्या शैलीचा
धागा लेखक त्यांच्या शैलीचा वेगळा अर्थ तर लावत नसतीना अशी शंका वाटते.
बजेट सत्रात अनेक वेळा सभापती ज्या पद्धतीने स्मित देताना आढळल्या, ते पाहता "नको, नाही आणि नो कॉमेंटस" हे व्यक्त करण्यासाठीची त्यांची ती शैली असेल असे वाटत नाही. अर्थात हा जर त्यांच्या शैलीचा भाग असेल तर त्याचा (गैर)/ अतिवापर होणार नाही अशी काळजी घेण्याची गरज आहे असे म्हणावे लागेल. तसेच "नको, नाही आणि नो कॉमेंटस" कितीवेळ / कितीवेळा म्हणायचे याचाही काही विचार सभापतींनी करणे उचित ठरेल.
हम्म..
थोडक्यात सांगावयाचेतर संसदीय सभागृहे ही केवळ स्वतःलाच जबाबदार असतात.
१) संसदसदस्यांच्या संसदेतील भाषण स्वांतत्र्यावर संबंधीत सभागृहाने स्वतः ठरवलेल्या संकेतांशिवाय इतर कोणतेही बाह्य नियमन स्विकारले जाऊ शकत नाही. शासन अथवा न्यायालयांनी त्यात हस्त़क्षेप करणे अभिप्रेत नसतेच. सभागृहाच्या बाहेरून सदस्यांच्या सभागृहातील भाषण आणि इतर काही महत्वांच्या अधिकारांचा अधिक्षेप झाला तर अशी व्यक्ती सभागृहांपुढे बोलावून दंडीत केली जाऊ शकते.
२) राज्यसभेत उपराष्ट्रापतीं पदसिद्ध अध्यक्ष असतात त्यांना दूर करण्यासाठी संसदेतील दोन्ही सभागृहाचा बहूमताचा निर्णय लागतो (राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची प्रक्रीया मात्र या पेक्षा जटील असते). लोकसभेचे सभापती पद हे बहुमताने निवडून आलेले असते पण राष्ट्रपतींप्रमाणेच एकदा निवडून आल्या नंतर निष्पक्ष समजले जाते (पण प्रत्यक्षात तेवढे निष्पक्ष असतेच असे नाही ) लोकसभेतील साध्या बहूमताने लोकसभेचे सभापती पद बदलले जाऊ शकते पण यास किमान सदस्यांची नोटीस नोटीस पिरियड आणि त्या नोटीसची सभागृहा बाहेर वाच्यता टाळणे अशा काही प्रथा असतात.
३) सभापती आणि अध्यक्ष सहसा त्यांच्या पूर्वासूरींनी (माजी सभापती/अध्यक्षांनी) दिलेल्या निर्णय आणि प्रथांचे सहसा पालन करतात. नियमावलीत काही बदल हवे असतील तर संबंधीत सभागृह बहुमताने निर्णय घेत असते.
(चुभूदेघे)
मी कितीतरी ग्रूप डिस्कशन्स
मी कितीतरी ग्रूप डिस्कशन्स मधे भाग घेतला आहे. जी मंडळी कधीच एकही शब्द, शंका, वा प्रश्न उद्गारायला तयार नसतात ती तिथे इतकी चवताळतात कि केवळ 'असभ्य' आहेत म्हणून त्यांना हाकलून लावावे. ज्या आय आय एम च्या नावाने इतका दिंडोरा पिटला जातो, तिथे देखिल ही मुले जी डी त कशी बोलतात ते पाहावे. व्हिडिओ पाहिलात तर उलटी येईल. यांच्यापेक्षा राजकारनी बरे असे वाटेल. मग तीच कार्टी बाहेर येऊन राजकारण्यांवर असभ्यतेबद्दल टिका करतात.
संसद (समजूतदारपणे एकत्र बसणे) यासाठी संस्कार लागतात. जगातल्या कोणत्याही संसदेत सभ्यता नावाचा प्रकार नाही.
संसदीय पद्धत फार सभ्य
संसदीय पद्धत फार सभ्य समाजासाठी असते. फु़कटात आजच्या समाजाला सभ्य समजून ती पद्धत लादली आहे.
कुठल्याही समाजाच्या सभ्यतेच्या (आणि असभ्य वागण्याच्या) संकल्पना ह्या कालपरत्वे बदलत जातात. शंभर वर्षापूर्वी असभ्य समजली जाणारी एखादी गोष्ट आज तितकीच असभ्य / त्याज्य मानली जाईल असे खात्रीशीर सांगता येत नाही. तसेच एका समाजात सभ्य (आणि असभ्य) समजली जाणारी वर्तणूक दुसर्या समाजात तशीच समजली जाईल असे म्ह्णता येत नाही. संसदीय पद्धत मात्र तिच्या मूळ स्वरूपाला फारसा धक्का न लावता आजही चालू आहे. कालपरत्वे संसदीय पद्धतीत अनेक सुधारणा / बदल झाले आहेत पण त्यामुळे मूळ स्वरूपात फारसा फरक पडलेला नाही.
संसदीय पद्धत जेव्हा अस्तित्वात आली तेव्हाचा समाज सभ्य होता आणि तेव्हपासून ते आत्तापर्यंत समाजाचा प्रवास असभ्यतेकडे झाला आहे असं म्हणायचं आहे का ? असे असल्यास शंभर वर्षापूर्वीची सभ्यतेची (आणि असभ्यतेची) संकल्पना आजही तशीच टिकून आहे आणि अर्थातच संसदीय पद्धत वापरणारा कुठलाच समाज परिवर्तनशील नाही असं म्हणावं लागेल. समाजशास्त्राच्या नियमात हे बसेल का?
समाजशास्त्राच्या नियमात हे
समाजशास्त्राच्या नियमात हे बसेल का?
समाजशास्त्र काय असतं?
धन्यवाद.
अजोमोड ऑनः
भाषिक दौर्बल्याने लडबडलेल्या शास्त्राला शास्त्र म्हणणे हीच मूर्खपणाची परमावधी आहे. जुन्या काळी (आणि उदगीरलाही) शास्त्रबिस्त्र काही नव्हतं म्हणून लोक सुखी होते. हर हर तो काळ गेला आणि लाईफ खल्लास झालं.
अजोमोड ऑफ.
कुठल्याही समाजाच्या
कुठल्याही समाजाच्या सभ्यतेच्या (आणि असभ्य वागण्याच्या) संकल्पना ह्या कालपरत्वे बदलत जातात.
माझा प्रतिसाद मानवी सभ्यतांचे स्थैर्य या विषयावर नव्हता. लेखाच्या संदर्भात मानवी संवादाच्या सभ्यतेच्या कोणत्या संकल्पना गेल्या १०० वर्षांत बदलल्या आहेत. नि विशेषकरून कोणत्या नव्या राजकीय संवादाच्या सभ्यता जुन्या सभ्यतांच्या जागी आल्या आहेत? असं बरंच काही झालं असेल तर आपलं म्हणणं नक्कीच सयुक्तिक आहे.
१. सभापतींच्या सदनातील
१. सभापतींच्या सदनातील जबाबदार्यांबद्दल काही मार्गदर्शक तत्वे (गाईडलाईन्स) आहेत का ?
सदनांच्या काही रिती आहेत, सभापतींसाठी गाईडलान्सही असाव्यात शोधाव्या लागतील. सदस्यांसाठी नक्की आहेत.
२. सभापतींच्या सदनातील असंवेदनशील / बेजबाबदार वर्तनाबद्दल सभापतींवर काही कारवाई केली जाउ शकते का ?
४. सभापती संसद सदस्यांवर कारवाई (निलंबन ई.), करु शकतात, सदनाचे कामकाज स्थगीत करु शकतात. तसेच काही अधिकार संसद सदस्यांना (ईंडिव्हिज्युअली / कलेक्टिव्हली) असतात का ?
सभापतींवर सभागृह इंपिचमेंट मोशन आणू शकतो. (बहुदा) प्रिव्हिलेज मोशनही आणू शकतो.
३. सदनातील सदस्यांवर वचक ठेवणे आणि सदनाचे कामकाज सुरळीत चालू ठेवणे ही सभापतींची मुख्य जबाबदारी समजल्यास, सभापती वारंवार (रिपीटेडली) सदस्यांच्या बेबंद वर्तनाला लगाम घालण्यात अयशस्वी ठरत असल्यास सभापतींवर काही कारवाई केली जाउ शकते का ?
५. बर्याच वेळा सदस्यांच्या बेबंद वर्तनामुळे / अशक्य अशा गोंधळामुळे सदनाचे कामकाज तहकूब करावे लागते. अशा वेळेस सभापतींनी आपल्या अधिकारांचा योग्य वापर सदनाचे कामकाज सुरळीत चालू ठेवण्यासाठी केला आहे किंवा नाही याबद्दल कोणी सभापतींना जबाबदार धरु शकते का?
सभागृहाची इच्छा (सभापतींच्या विरूद्ध बहुदा २/३ बहुमत) असल्यास याच काय कोणत्याही कारणावरून कारवाई होऊ शकते.
६. सभापती कोणास जबाबदार (आन्सरेबल) असतात ?
सभागृहाला
खरे आहे?
हे खरे आहे? मी प्रत्यक्ष वा चित्रीकरण पाहिले नाही पण खरे असेल तर ते धक्कादायक म्हणावे लागेल.