Skip to main content

मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग १४

व्यवस्थापकः ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---

नेमका अश्लीलता, नग्नता आणि मादकता यात फरक काय असावा? प्रत्येक व्यक्ती साठी याचा अर्थ वेगळा असू शकतो, ह्या गोष्टी संस्कृती सापेक्ष आहेत ही कारणं सोडून काही मानसशास्त्रीय/ वैज्ञानिक निकष ?
फार दिवसांपुर्वी विंदाची तीर्थाटण नावाची कविता/ देव-डी सिनेमा( माही गिल/पारो ची एंट्री, सिनेमाची सुरुवात) अश्लिल अशी आम्हा मित्र-मैत्रिणींची चर्चा झाली मला दोन्हीमधे काहीच अश्लील वाटलं नाही, पण बर्याच जणांना दोन्ही गोष्टी अश्लिल वाटत होत्या.

तीर्थाटण - विंदा करंदीकर

तीर्थाटण मी करीत पोचलो
नकळत शेवट तव दारी;
अन तुझिया देहात गवसली
सखये मजला तीर्थे सारी

अधरावरती तव वृंदावन
प्रयाग सापडले नेत्री;
भालावरती ते मानसरोवर,
मानेवरती गंगोत्री

गया तुझ्या गालात मिळाली
रामेश्वर खांद्यावरती
मिळे द्वारका कमरेपाशी
अन काशी अवतीभवती

मोक्षाचीही नुरली इच्छा
नको कृपा याहून दुसरी
तीर्थाटण मी करीत पोचलो
नकळत शेवट तव दारी.

मन Fri, 06/06/2014 - 12:01

विंदांचे असच काहीतरी अजून अश्लील म्हणून बोंब झाल्ती म्हणे .
सोंड - गणपती -वासना वगैरे.

मी Fri, 06/06/2014 - 12:48

ह्या गोष्टी संस्कृती सापेक्ष आहेत ही कारणं सोडून काही मानसशास्त्रीय/ वैज्ञानिक निकष ?

बहुदा नाही, अश्लिलता संस्कृती सापेक्षच असावी.

बॅटमॅन Fri, 06/06/2014 - 12:57

च्यायला ही कविता अश्लील असेल तर आमच्या जयदेवाचा अख्खा गीतगोविंद अश्लील म्हणावा लागेल. त्यातही शेवटचा श्लोक उद्धृत करतो तो अगदी अशाच स्टाईलचा आहे. न जाणो विंदांनी तिथूनही प्रेरणा घेतलेली असू शकते..

संदर्भ.

इत्थम् केलिततीर्विहृत्य यमुनाकूले समम् राधया
तद्रोमावलिमौक्तिकावलियुगे वेणीभ्रमम् बिभ्रति।
तत्राह्लादकुचप्रयागफलयोर्लिप्सावतोर्हस्तयोः
व्यापाराः पुरुषोत्तमस्यददतुस्फीताम् मुदाम् सम्पदम्॥

This way while Krishna is pleasure tripping on the riverbanks of yamuna in many a disport with Rādha, once he started to adjust her hairlocks and pearly pendants; but, he suddenly got into a conjuration where those pendants appeared as river streams of River ganga or yamuna, and her bosoms, a pair of large palm-fruits adrift those streams; wishing to rescue those palm-fruits, he offhandedly started to grapple her bosoms, only to her sheepishness; let all bounteously gladdening riches be accord to one and all by them that tend to indulge in such activities, namely the - abhaya hasta - blessing hands of Krishna.

यात "प्रयाग" चा संदर्भ आलेला नाही.

साधा अर्थ असा, की राधेने घातलेली मोत्यांची माळ ही गंगा-यमुनेप्रमाणे वाटते आहे आणि त्या जिथे मिळतात (म्ह. माळ जिथे जाऊन संपते-इन धिस केस नाभी) ते जणू प्रयागतीर्थच असून त्यात उगवलेली फळे म्हणजे "कुचद्वय" इ.इ. तर त्यांच्याशी क्रीडा करणारा कृष्ण सर्वांचे कल्याण करो इ.इ.

संस्कृत तेवढं चालतं कारण कुणाला कळत नाही, मराठी मात्र चालत नाही.

पण हे किमान आधीपासून असंच असतं तरी समजू शकलो असतो की आपला समाज अगोदरपासून असाच आहे इ.इ.

पण रामजोश्यांसारख्यांच्या छेकापन्हुतीवाल्या लावणीतही

"वंशसंभवा अधरचुंबिनी लालसमधुरध्वनि | असावी मुखासी मुख लावुनी ||"

(ती बरी वाटणारी कोण?) "वृषभानूची सुता काय रे, राधा लकुचस्तनी?"

लकुच=फणस. संदर्भ.

असा सरळ सरळ उल्लेख आहे. संदर्भ

इनफॅक्ट ती अख्खी लावणीच तशा उल्लेखांनी भरलेली आहे.

तस्मात, व्हिक्टोरियन काळापासून जे काही फ्रिजिड संस्कार लोकांवर होऊ लागले त्याचा हा नतीजा आहे असेच म्हणावेसे वाटते. याचा अर्थ जुन्या काळी सर्रास सगळीकडे फक्त शृंगारिक कविताच चालायच्या असा नाही-पण आजच्यापेक्षा तशा प्रकारची अभिव्यक्ती बरीच जास्ती स्वीकारार्ह होती. अगदी आध्यात्मिक संकल्पना समजावतानाही शृंगारिक कल्पनांचा वापर करीत असत काहीवेळेस, उदा. आमची जुनी स्वाक्षरी:

"यतिने न वागवावा चित्तांत स्वल्पही मोड कामाचा |
सुरतीं घातक जैसा युवदांपत्यासि मोडका माचा ||"

साधूने आपल्या चित्तात कामविकाराचा अंकुरही येऊ देऊ नये असे सांगायचे आहे. ते मनात नीट ठसावे म्हणून कामविकार आल्यावर कसा घात होतो ते सांगताना रंगात आलेल्या दांपत्यासाठी मोडकी कॉट जशी घातक ठरते तसा तो घातक ठरतो असे सांगितले आहे. याला काय म्हणावे? याचा कवी अज्ञात आहे, काळ मोरोपंतसमकालीन किंवा स्लाईटलि लेटर, अर्थात लेट १८ वे अथवा अर्ली १९ वे शतक इ.स.

त्यामुळे लोकांना हे अश्लील वाटत असेल तर ते विचित्र आहे पण समजण्यासारखेही आहे. असो.

अस्वल Sat, 07/06/2014 - 01:36

In reply to by बॅटमॅन

हे संतफिंत लोकांनी, की ज्यांनी कुणी केलं, त्यांनी मोठा झोल केला आहे.
चांगलीचुंगली शृंगारिक काव्ये, कथा किंवा चित्रे (पहा:होकुसाय!) ह्यांना काही वावच ठेवला नाही.
eroticism हा प्रकारच मराठीत कुठे विशेषसा अस्तित्वात नसल्याने मग हाती लागावा तो सग़ळा बीभत्स गाळ.
जरा कुठे काही वर्णन आलं, की त्याचा context किंवा दर्जा न बघता अश्लील अश्लील असा आरडाओरडा सुरु.
हा कुठल्याही आणि कितीही शृंगारिक वर्णनाला "अध्यात्म" चिकटवण्याचा रोग कधी सुरु झालासे?

बॅटमॅन Sat, 07/06/2014 - 01:53

In reply to by अस्वल

आध्यात्मिक कल्पना शृंगाराच्या आधारे आधीपासून वर्णन करत असतच. अन हा प्रकार फक्त भारतापुरता मर्यादित नसून युरोपियन संतांमध्येही तोच प्रकार रूढ होता. गुरुदेव आर.डी.रानडे यांच्या तुळपुळेकृत चरित्रात याची काही उदाहरणे दिलेली आहेत.

अन मराठीत इरॉटिसिझम नव्हता हे विधान नक्की कशाच्या आधारे केलेले आहे? अध्यात्माचा आधार न घेता, अन बीभत्सही न होता अशी मस्त वर्णने ब्रिटिशपूर्व मराठीत नव्हती हे म्हणायला काय पुरावा आहे? रामजोश्यांच्या लावण्या बीभत्स वाटतात? वामनपंडितांची वर्णने, मुक्तेश्वराची आख्याने, इ. अनेक उदा. सांगता येतील. असे घाऊक निष्कर्ष काढण्याची घाई करू नका अस्वलभौ.

अस्वल Sat, 07/06/2014 - 02:01

In reply to by बॅटमॅन

अध्यात्माचा आधार न घेता, अन बीभत्सही न होता अशी मस्त वर्णने ब्रिटिशपूर्व मराठीत नव्हती हे म्हणायला काय पुरावा आहे? रामजोश्यांच्या लावण्या बीभत्स वाटतात? वामनपंडितांची वर्णने, मुक्तेश्वराची आख्याने, इ. अनेक उदा. सांगता येतील.

ह्म्म, खरंय. चुकलंच जरा, आध्यात्माला मध्ये आणायला नको होतं!

अन मराठीत इरॉटिसिझम नव्हता हे विधान नक्की कशाच्या आधारे केलेले आहे?

मला आधुनिक काळात म्ह्णायचं होतं. उत्तम दर्जाचं erotic साहित्य मराठीत आहे काय? असं काही मला माहीत नाही. असल्यास पुस्तकांची नावं दयावीत!
माझा निष्कर्ष चुकीचा निघाला तर आनंदच आहे :)

बॅटमॅन Sat, 07/06/2014 - 02:20

In reply to by अस्वल

मला आधुनिक काळात म्ह्णायचं होतं. उत्तम दर्जाचं erotic साहित्य मराठीत आहे काय? असं काही मला माहीत नाही. असल्यास पुस्तकांची नावं दयावीत!
माझा निष्कर्ष चुकीचा निघाला तर आनंदच आहे

'मचाक' बद्दल काय मत आहे ;)

बॅटमॅन Sat, 07/06/2014 - 00:05

ऐसीमध्ये व्यनि सेटिंगमध्ये 'सेव्ह फिल्टर' वर अनवधानाने क्लिक केल्याने सर्व व्यनि झाकोळल्या गेले. ते रिकव्हर कसे करावेत काही उपाय?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/06/2014 - 19:29

In reply to by लॉरी टांगटूंगकर

बघायचे असतील तर दिसतात. पण (दुर्दैवाने!) बॅटमॅनचे व्यनि न पाहताच प्रश्न सुटला. असं काही - चुकून फिल्टर सेव्ह झाला - झाल्यास आधी 'विण्डोज पद्धत' वापरावी. लॉगाऊट करून लॉगिन केल्यावर प्रश्न मिटला.

............सा… Sat, 07/06/2014 - 20:05

तांदूळ दूधातच मसाला/गूळ्/साखर्/केशर वगैरे घालून शिजवला तर कच्चट राहतोय. :(
मला वाटलेलं की पाण्यात तांदूळ शिजवला तर शितं टम्म फुगतील पण मग त्याला केशर्/गूळा-दूधाची चव येणार नाही :( म्हणून मी दूधात शिजवला तर हा प्रॉब्लेम.
तांदूळाची खीर कशी करायची?

ॲमी Sat, 07/06/2014 - 20:19

In reply to by ............सा…

तांदूळ धुवायचा, कढईत कोरडा परतायचा. आणि मिक्सीवर थोडा फिरवायचा. तुकडा बासमती आणि कणी बासमतीच्या मधला आकार. आणि मग दूधात शिजवायचा. फक्त दूधात शिजवल्यास फार हेवी होते खीर. म्हणून मी १/३पाणी आणि २/३दूध वापरते.
गरम दूधात गूळ घातल्यास फुटतं ना?

............सा… Sat, 07/06/2014 - 20:25

In reply to by ॲमी

थँक्स अस्मि तू कणीदार खीर करतेस तर. मी आख्खा तांदूळच घातला. ठीक झालीये अजून फुगायला हवी होती.

चिंतातुर जंतू Sat, 07/06/2014 - 20:23

In reply to by ............सा…

>> तांदूळ दूधातच मसाला/गूळ्/साखर्/केशर वगैरे घालून शिजवला तर कच्चट राहतोय.

ह्याला एक साधा उपाय -
दूध घालून तांदूळ वाफेवर शिजवत ठेवायचा (प्रेशरशिवाय). अधूनमधून ढवळत राहायचं. दूध आटत जातं तसतसं आणखी दूध घालत जायचं. जोवर शितं पुरेशी शिजत नाहीत तोवर हे करत राहायचं. मात्र, गूळ आधी घातला तर दूध फाटू शकतं त्यामुळे भात पूर्ण शिजेपर्यंत गूळ घालायचा नाही. नंतर किसून किंवा पूड करून घातला तर गरम दुधात लगेच विरघळतो. ही कृती अर्थातच वेळ खाते आणि तिला अधिक लक्ष द्यावं लागतं. पण अशा मंद आचेवर शिजलेल्या आणि दूध उकळून उकळून आटीव झालेल्या खिरीला चव खूपच चांगली येते. :-)

'न'वी बाजू Sat, 07/06/2014 - 20:47

In reply to by ............सा…

तांदळाची खीर ही 'आपल्या'त फक्त श्राद्धाला करतात, अशी एक ऐकीव (गैर?)समजूत होती.

ज़माना बदल गया है, हम्म्म्म्?

............सा… Sat, 07/06/2014 - 20:54

In reply to by 'न'वी बाजू

श्राद्धालाही करतातच पण अन्य वेळी केली तर काही गैर असू नये. आमच्याघरी आई शेवयांचीच करायची मात्र, तांदूळाची खरच श्राद्धाशिवाय अन्य दिवशी पाहीली नाहीये :(

'न'वी बाजू Sat, 07/06/2014 - 21:52

In reply to by ............सा…

गैर अर्थातच नसावे. आक्षेप घेतलेला नाही. (तसेही, आक्षेप घेणारा मी कोण?)

केवळ ऐकीव माहिती पाजळली, इतकेच.

(अवांतर: तांदळाची खीर खाऊन पाहिलेली आहे. 'आपल्या इथे' अनेकदा इण्डियन रेष्टारण्टांतून बफेला डेझर्ट म्हणून ठेवतात. (स्वस्त पडत असावी बहुधा.) प्रकार अजिबात झेपला नाही. इतका, की एरवी तर सोडाच, पण कधी चुकून कोणाकडे श्राद्धाला जावे लागले - कधी गेलेलो नाही म्हणा - तरी तिथेही तोंड लावणार नाही. असो.)

'न'वी बाजू Sat, 07/06/2014 - 23:02

In reply to by धनंजय

हा दाक्षिणात्यांचा प्रकार आहे ना?

'न'वी बाजू Sat, 07/06/2014 - 22:00

In reply to by नितिन थत्ते

कल्पना आहे.

मात्र, 'आपले' ही संकल्पना तशी संदर्भानुरूप फ्लेक्सिबल (आणि रादर व्हेग) असल्याकारणाने, वरील प्रतिसादापुरते उत्तर भारतीयांना 'आपल्यां'त जमेस धरले नव्हते. असो.

विवेक पटाईत Sat, 07/06/2014 - 21:42

In reply to by ............सा…

आमची सौ करते तशी. आधी तांदूळ धुवावे. नंतर कढईत दोन चमचे साजूक तूप घालून, तांदूळ चांगले रंग बदले पर्यंत (तांदूळ थोडे हलके होतात) किमान ७-१० मिनिटे परतावे.

नंतर थंड करून, पूर्वी खलबत्यात कुटायची आता मिक्सर मध्ये जाड सर कुटून (अर्थात तांदुळाचे लहान तुकडे होत पर्यंत).
दुसऱ्या गॅस वर फुल क्रीम दूध १५-२० मिनिटे उकळावे. नंतर परतून कुटलेले, तांदूळ त्यात घालावे आणि हलक्या आंच वर ५-७ मिनिटे उकळ्यावर त्यात साखर, वेलची पावडर घालून ५-७ मिनिटे आणखीन उकळून घ्यावे. मस्त खीर बनेल.
फ्रीज मध्ये थंड झाल्यावर बारीक कातरलेले बदामाचे काप वर पसरवून काचेच्या किंवा चीनी मातीच्या वाटीत सर्व केल्यास खायला मस्त वाटते.
गरमागरम खीर पूर्वी सोबत खाताना मजा येते.

ॲमी Sun, 08/06/2014 - 09:27

In reply to by विवेक पटाईत

याचाच डाएट अवतार दिलाय मी वर. परतताना नो तूप, दूध लो फ्याट आणि पाणी+दूध.
सारीका दोन्ही पद्धतीने करुन बघ. चव अर्थातच पटाईतांच्या पद्धतीने छान लागणार. पण माझ्या पद्धतीने केल्यास जास्त प्रमाणात खात येते :-D.

ॲमी Mon, 09/06/2014 - 15:42

एखादी व्यक्ती प्रत्यक्षात वेगळी दिसते आणि फोटो, व्हिडीओत वेगळीच. असे का होत असावे? फक्त प्रकाश, क्यामेरा सेटींगज्, फोटोग्राफरचे स्कील अशा बाह्य बाबीच कारण असतात? की फोटोजेनीक अशी खरीच काही क्वालिटी असते? असल्यास ती कशी ठरते?

मी Mon, 09/06/2014 - 16:27

In reply to by ॲमी

एखादी व्यक्ती प्रत्यक्षात वेगळी दिसते आणि फोटो, व्हिडीओत वेगळीच. असे का होत असावे?

ह्यासाठी अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक म्हणजे चेहर्‍याची आकर्षकता चेहर्‍याच्या रचनेवरुन ठरते म्हणजे नाक, डोळे, हास्य, चेहर्‍याच्या हाडांची रचना इ. त्यात ज्यांच्या डोळे सुंदर आहेत त्यांच्या इतर बाबी तेवढ्या व्यवस्थित नसल्यातरी चेहरा आकर्षक वाटू शकतो, किंवा प्रकाशरचनेमुळे व्यक्तीच्या चेहर्‍याच्या हाडांची रचना रुढ(,) आकर्षक चेहर्‍याच्या रचनेशी जुळती-मिळती होते व तो चेहरा सुंदर दिसु लागतो त्यामुळेच काही लोकांचा फोटो केंव्हाही काढला तरी ते फोटोत प्रत्यक्षापेक्षा अधिक आकर्षक दिसतात, त्याचबरोबर प्रत्यक्षात व्यक्तीचा चेहरा फोटोएवढा स्थिर नसतो त्यावरील अ‍ॅनिमेशन(चेहर्‍याची हालचाल, हास्य इ.) जे चेहर्‍याला आकर्षक बनवते ते फोटोत नसते व तोच चेहरा तेवढा आकर्षक वाटत नाही.

ऋषिकेश Mon, 09/06/2014 - 16:41

In reply to by मी

हम्म पटणीय!
म्हणजे मेकप वगैरे न करता, निव्वळ चेहर्‍यावरचे भाव बदलून किंवा प्रकाशयोजना किंवा अँगल बदलून तोच चेहरा फोटोजेनिक बनवता येतो. किंबहुना आपला चेहरा कोणत्यावेळी, कोणत्या प्रकारे, कोणते भाव असताना काढला तर अधिक मोहक/चांगला/आपल्याला आवडेल असा वाटतो हे हळुहळू लक्षात येउ लागते असा स्वानुभव आहे. (अर्थात मला माझा चेहरा जो बरा वाटेल तो माझ्याच बर्‍या न वाटणार्‍या चेहर्‍यांशी कंपेअर करून, त्यामुळे मी इतरांनाही चांगला दिसेनच/वाटेनच असे नाही)

नंदन Fri, 13/06/2014 - 14:50

In reply to by मी

>>> रोचक लेख, डाव्याचे केवढे ते महत्त्व. (डोळा मारत)
--- खरंय, पण त्या व्यक्तीची ती उजवी बाजू. आपल्या दृष्टीने डावी.
(काही स्युडौल जालचर्चा आठवल्या :))

मी Fri, 13/06/2014 - 15:06

In reply to by नंदन

पण त्या व्यक्तीची ती उजवी बाजू. आपल्या दृष्टीने डावी.

वा-मनातले ओळखले तुम्ही.

ॲमी Tue, 10/06/2014 - 18:31

In reply to by ............सा…

यू मिन ग्रहणातला सूर्य डोळ्यावर येत असेल तर? कारण सूर्याकडे बघायच असेल तरच चष्मा लागतो ना? नाहीतर नाही. काही मिनीट सेकंदाचाच प्रश्न असतो. गाडी बाजूला थांबवू शकतात.

नितिन थत्ते Tue, 10/06/2014 - 19:12

In reply to by ............सा…

प्रश्न कळला नाही.

मी सकाळी ठाण्याहून (किंवा कोठूनही) पूर्वेकडे जाऊ लागलो की माझ्या डोळ्यावर सूर्याचे ऊन- ग्लेअर येतेच. त्यावेळी मी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आहे की नाही याने फरक पडत नाही.

पक्षी सूर्याकडे केव्हाही (ग्रहण असताना किंवा नसताना) पहायचे झाल्यास काळा चष्मा घालावाच लागतो.

बॅटमॅन Tue, 10/06/2014 - 19:15

In reply to by नितिन थत्ते

ग्रहण नसताना सूर्याकडे पहायचे झाल्यास काळा चष्मा कशाला? आजवर कैकदा नङ्ग्या डॉळ्यांनी सूर्याकडे पाहिले आहे अन कै झाले नै- अर्थात त्राटक इ. करण्याइतपत कंटिन्युअस नाही.

नितिन थत्ते Tue, 10/06/2014 - 19:17

In reply to by बॅटमॅन

>>आजवर कैकदा नङ्ग्या डॉळ्यांनी सूर्याकडे पाहिले आहे अन कै झाले नै-

मग ग्रहण असताना काळा चष्मा कशाला?

बॅटमॅन Tue, 10/06/2014 - 19:21

In reply to by नितिन थत्ते

काय की बॉ. मिरजेत १९९५-२००० मध्ये कधीतरी एकदा खंडग्रास ग्रहण दिसणारे म्हणून दुकानादुकानांत शेप्रेट काळे चष्मे विकायला आल्ते ते आठवलं. का तर ग्रहणावेळी ते अल्ट्राव्हायोलेट किरण डोळ्यांना पेश्शली बाधण्याचा धोका असतो इ.इ. सांगितल्या गेले होते.

............सा… Tue, 10/06/2014 - 19:22

In reply to by नितिन थत्ते

पण ग्रहणकाळात सूर्याकडे डोळ्यांवर एक विशिष्ट चश्मा घातल्याखेरीज बघू नये म्हणतात ना? त्या काळातील वक्री किरणांमुळे अंधत्व येऊ शकते वगैरे.

नितिन थत्ते Tue, 10/06/2014 - 19:47

In reply to by ............सा…

विशिष्ट चष्मा वगैरे काही नसतो. नॉर्मल गॉगल्स पुरेसे डार्क नसतात म्हणून खूप डार्क असलेल्या फिल्म लावलेले गॉगल विकले जातात. नॉर्मल गॉगलमधून पाहू नये असे सांगतात. मी जुन्या फ्लॉपी डिस्कच्या आतल्या म्याग्नेटिक चकतीतून ग्रहण पाहतो*.

*खूपवेळा ग्रहण पाहून झाले असल्याने हल्ली तितका इंटरेस्ट उरला नाही. तोच सूर्य तोच चंद्र..... :) खग्रास ग्रहण अजून पहायला मिळाले नाही. तसे मिळाले तर इंटरेस्ट वाटेल.

ऋषिकेश Wed, 11/06/2014 - 08:55

In reply to by नितिन थत्ते

खग्रास ग्रहण अजून पहायला मिळाले नाही. तसे मिळाले तर इंटरेस्ट वाटेल.

बहुदा भारताबाहेर जावे लागेल. मागे कुठेसे वाचलेय की भारतात एवढ्यात (बराच मोठा काळ) खग्रास सूर्यग्रहण दिसणार नैय्ये.

ॲमी Tue, 10/06/2014 - 19:50

In reply to by ............सा…

मला वाटत कंटीन्युअस पाहीलं तर अंधत्व येऊ शकते. एखाद दोन सेकंद बघून नजर दुसरीकडे वळवल्यास काही होत नाही.

ॲमी Tue, 10/06/2014 - 20:40

In reply to by नितिन थत्ते

आपण नाय बॉ रिस्क घेतली कधी. टिव्हीवरच पाहीलं ग्रहण. त्यातपण फार काही बघण्यासारखं वाटल नाही. त्यावेळी सूर्याकडे पाहण्यापेक्षा वातावरणातील बदल, गडबडून गेलेले पक्षी वगैरे जास्त रोचक वाटतात. पण आमची एक मैत्रीण सांगत होती हापिसातल्यांबरोबर बेअर डोळ्यांनी ग्रहण पाहिल्याच. अजूनतरी ती व्यवस्थित आहे.

'न'वी बाजू Tue, 10/06/2014 - 22:18

In reply to by ॲमी

पण आमची एक मैत्रीण सांगत होती हापिसातल्यांबरोबर बेअर डोळ्यांनी ग्रहण पाहिल्याच.

वाक्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतोय.

१. तुमची मैत्रीण, २. हापिसातल्यांबरोबर ग्रहण पाहायला गेली होती, ३. तिथे हापिसातल्यांबरोबर एक अस्वलसुद्धा आले, आणि ४. त्या अस्वलाने आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी ग्रहण पाहिले, असे?

अजूनतरी ती व्यवस्थित आहे.

अस्वलाशी गाठ पडूनसुद्धा... सुदैवी आहे!

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

म्हणजे, लहानपणी आम्ही आजूबाजूच्या पोरांबरोबर पूर पाहायला जात असू, तसे.

बोले तो, लकडीपुलाखालून वाहणारी एरवी एवढीशी मुठा, पावसाळ्याच्या दिवसांत क्वचित जेव्हा नारायण पेठेत केळकर रस्त्यापर्यंत आपले गढूळ पाणी आणते, तेव्हा "पूर" म्हणून जो ('आमच्या'त) क्वालिफाय होतो, तो पूर. पानशेत-क्वालिटी नव्हे; जगबुडी तर नव्हेच नव्हे!

वाक्य चुकून उलटे झाले काय? कानांना बरोबर वाटत नाहीये.

नितिन थत्ते Tue, 10/06/2014 - 22:24

In reply to by 'न'वी बाजू

>>बोले तो, लकडीपुलाखालून वाहणारी एरवी एवढीशी मुठा, पावसाळ्याच्या दिवसांत क्वचित जेव्हा नारायण पेठेत केळकर रस्त्यापर्यंत आपले गढूळ पाणी आणते, तेव्हा "पूर" म्हणून जो ('आमच्या'त) क्वालिफाय होतो, तो पूर. पानशेत-क्वालिटी नव्हे; जगबुडी तर नव्हेच नव्हे!३

हे ठीक आहे. आदरवाइज आम्ही तुम्ही मुंबई २ येथे पूर पहायला कोठे जात असावेत या प्रश्नाने हैराण झालो असतो.

'न'वी बाजू Wed, 11/06/2014 - 08:48

In reply to by नितिन थत्ते

मुंबई २ मधील आमच्याबरोबरच्या पोरांमध्ये पूर पाहावयास जाण्याची फ्याशन नव्हती. त्या अड्ड्यातली आमची टिपिकल धाव बोले तो जपानी बाग, क्वचित्प्रसंगी त्यापलीकडली चौपाटी, . अगदी लहानपणी शक्य तोवर चाळीतल्या कोठल्याही प्रौढाच्या कृपेने (आणि पैशाने), किंचित मोठेपणी चाळीतल्या कोठल्याही प्रौढाच्या फक्त पैशाने.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स. का. पाटील उद्यान. गेऽले बिचारे, असे ऐकून आहे.

पूर पाहायला नव्हे.२अ

२अ अरबी (किंवा फॉर द्याट म्याटर कोणत्याही) समुद्राला भरती भले ही येत असेल, पण कधी पूर आल्याचे ऐकलेले नाही.२ब (मग काय उपयोग त्या समुद्राचा?)

२ब अवांतर कुतूहल: पूर हा फक्त नदीलाच येऊ शकतो असे काही कन्व्हेन्शन असावे काय? बोले तो, पावसाळ्यात किमान एकदातरी चारपाच दिवस सतत पाऊस पडून साधारणतः दादर आणि भायखळ्याच्या दरम्यानच्या सखल प्रदेशात जे पाणी साचून रेल्वेवाहतूक ठप्प होते नि मुंबईकर गुडघाभर नाहीतर छातीभर पाण्यातून चालत जातात, तो पूर म्हणून क्वालिफाय होत नाही काय? नि अशा वेळी गटारे ओव्हरफ्लो होऊन जे काही घडते, त्यास 'गटारांचा महापूर' असे का म्हणत नाहीत? (केळकर रस्त्यावरून वाहणारी मुठा नदी त्याहून फार काही वेगळी दिसत नसावी.)

चौपाटीवर एरवी नुसते तर जायचोच. पण आमच्या लहानपणी चौपाटीपाशी एस्कलेटर झाला होता३अ, तेव्हा खास नुसता 'सरकता जिना' पाहायला म्हणून वेगळे गेलो होतो, तेही अंधुकसे आठवते.

३अ अजून आहे काय तो?

समाजवादाच्या फायद्यांची आमची तोंड४अओळख तेव्हापासूनची आहे.४ब

४अ कारण तेव्हापासून आम्ही ते चाखत४अ१ आलेलो आहोत, म्हणून.

४अ१ कधी आइस्क्रीम, कधी भेळपुरी, कधी नुसतेच कागदाच्या नळीतले खारे शेंगदाणे, किंवा उपलब्ध पैशांत चौपाटीवर जे काही चरायला (किंवा प्यायला) मिळू शकेल ते.

४ब आम्ही तसे लहानपणापासूनच भुक्कड फडतूस. असो चालायचेच.

'न'वी बाजू Tue, 10/06/2014 - 22:22

In reply to by ॲमी

ग्रहणात दूरदर्शनवर 'गुड्डी' दाखवण्याची प्रथा अजूनही आहे काय?

(यावरून आठवले: 'आरटीआय... वीमेन्स एम्पॉवरमेंट... वीमेन्स एम्पॉवरमेंट... आरटीआय...')

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/06/2014 - 19:47

In reply to by नितिन थत्ते

मग ग्रहण असताना काळा चष्मा कशाला?

सूर्याकडून आपल्याकडे येणाऱ्या प्रकाशात सगळ्या प्रकारची विद्युत चुंबकीय प्रारणं असतात. त्यातल्या कोणत्याही प्रकारच्या प्रारणांचा ओव्हरडोस झालेला डोळ्यांसाठी, आणि आपल्यासाठीही वाईटच. वातावरणामुळे दृष्य प्रकाश वगळता बाकीचा भाग बहुतांशी गाळला जातो. दृष्य प्रकाशाची तीव्रताही बरीच जास्त असते. त्यामुळे कधीही सूर्याकडे बघायचं असेल तर योग्य ती काळजी घ्यावी हे योग्यच.

ग्रहण नसताना, आपण सूर्याकडे फार वेळ टक लावून बघण्याची शक्यता कमीच आहे. (सूर्योदय-सूर्यास्ताचा अपवाद. पण तेव्हा बरेचदा वातावरणाचे जास्त थर, प्रदूषण यांच्यामुळे तीव्रता कमी जाणवते.) त्यामुळे चटकन पाहिलं आणि नजर दुसरीकडे वळवली हे बरेचदा होतं. ग्रहणाच्या वेळेस काहीतरी निराळं दिसत असल्यामुळे बराच वेळ (> १-२ सेकंद) पाहण्यासाठी योग्य तो चष्मा (=फिल्टर) वापरलेला बरा.

पण नेहेमीचा सूर्यही १-२ सेकंदांपेक्षा जास्त वेळ पहायचा तर फिल्टर वापरलेलाच योग्य. ग्रहणाच्या वेळेस खरंतर चंद्र मध्ये येतो आणि प्रारणं अडवतो. त्यामुळे कमी प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचतो. ग्रहणामुळे काही होत असेल तर सूर्याची तीव्रता तेवढ्यापुरती कमीच जाणवते.

नितिन थत्ते Tue, 10/06/2014 - 19:51

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ब्याटमन म्हणाला मी एरवीच सूर्याकडे नुसता पाहतो म्हणून त्याला उद्देशून ग्रहणात चष्मा कशाला असा प्रश्न होता.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/06/2014 - 20:39

In reply to by नितिन थत्ते

होय. ते "पक्षी सूर्याकडे केव्हाही (ग्रहण असताना किंवा नसताना) पहायचे झाल्यास काळा चष्मा घालावाच लागतो." याचं अधिक स्पष्टीकरण आहे. तेवढंच.

'न'वी बाजू Tue, 10/06/2014 - 20:12

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ग्रहणाच्या काळात 'शिंची ही ग्रहणाची भानगड आहे काय ते पाहू या तरी' म्हणून माणूस त्याकडे रोखूनरोखून टक लावून पाहण्याची शक्यता जास्त. एरवी कोण कशाला सूर्याकडे ढुंकून बघतेय?

थोडक्यात, तो पेश्शल गॉगल हा बहुधा त्या कोणत्याशाशा किरणांपेक्षा मनुष्यस्वभावाकरिता अधिक असावा. (चूभूद्याघ्या.)

ऋषिकेश Wed, 11/06/2014 - 09:02

In reply to by बॅटमॅन

आजवर कैकदा नङ्ग्या डॉळ्यांनी सूर्याकडे पाहिले आहे अन कै झाले नै

किती वेळ पाहिले आहेस?
बराच (>४-५ सेकंद सलग) पाहिले असशील तर मग काळजी घे - चेक करून घे. तसे झाल्यावर कोठलेसे सेल्स मरू लागतात - लगेच मरत/संपत नाहीत
माझ्या आईच्या एका डोळ्यातील ते सेल्स असेच कमी होते गेले आहेत व साधारण ५०शी नंतर त्या डोळ्याने अंधूक आणि आता फक्त पांढरे पुंजके / मोठ्या वस्तुंच्या ढोबळ आकृत्या इतकेच दिसते. त्याचा ताण आता दुसर्‍या निरोगी डोळ्यावरही हळूहळू येऊ लागला आहे.

डॉक्टरांच्या मते हा लहानपणी सूर्याकडे ग्रहणाच्यावेळी वा अदरवाईज पाहिल्याचा परिणाम असु शकतो (नक्की नाही पण असु शकतो)

नितिन थत्ते Wed, 11/06/2014 - 10:43

In reply to by ऋषिकेश

वेल्डिंगच्या प्रात्यक्षिकात काळ्या काचेतून पाहिल्यास काहीच न दिसल्याने वेल्डिंग रॉड जॉबला चिकटत असे. म्हणून डेअरडेव्हिल रीतीने उघड्या डोळ्यांनी वेल्डिंग केले आहे (अर्थात तेव्हाही फक्त आर्क सुरू होण्यापुरतेच पाहून). आणि त्यानंतर दोन दिवस डोळ्यांची जळजळ अनुभवली आहे. त्याचा आता पन्नाशीनंतर परिणाम दिसू लागेल काय?

अनुप ढेरे Wed, 11/06/2014 - 10:48

In reply to by नितिन थत्ते

वेल्डिंगच्या प्रात्यक्षिकात काळ्या काचेतून पाहिल्यास काहीच न दिसल्याने वेल्डिंग रॉड जॉबला चिकटत असे.

अगदी अगदी. लई पब्लिक शिव्या खाई इन्स्ट्रक्टरच्या जॉब सारखा चिकटला तर

मन Wed, 11/06/2014 - 11:11

In reply to by नितिन थत्ते

असा काहिसा पराक्रम आमच्या वर्गमित्राने केला होता अभियांत्रिकीच्या पहिल्याच वर्षी.
ह्या प्रयोगानंतर त्याचे डोळे एकदम सुजले बाहेरुन व आतून एकदम चिकटल्यासारखे झाले.
नंतर इस्पितळात नेउन उपचार केल्यावर आठवडाभरात महाशयांचे डोळे पूर्ण नॉर्मलला आले.

केतकी आकडे Wed, 11/06/2014 - 11:12

In reply to by नितिन थत्ते

हे मी ही केलेले आहे. काहीच दिसत नसे त्या काळ्या काचेतून! मित्रांची बोलणीही खूप खाल्ली आहेत त्यामुळे.

ऋषिकेश Wed, 11/06/2014 - 11:21

In reply to by नितिन थत्ते

मला माहिती नाही.
पुढल्या फेरीत डॉक्टरांकडे गेलो की विचारून पाहतो (पुढिल फेरी ऑक्टोबर मधे आहे)

माझा प्राथमिक अंदाज कदाचित शक्य आहे.

माझ्या एका मैत्रिणीच्या प्रियकराच्या आईला - (तपशील अनावश्यक ;)पण सांगायचा मुद्दा एका माहितीतील व्यक्तीला ) अश्या वेल्डिंग गनकडे बघुन ब्राऊन-हिरव्याचे रंगाधळेपण आले होते असे तिने सांगितल्याचे आठवते आहे.

बॅटमॅन Wed, 11/06/2014 - 11:24

In reply to by नितिन थत्ते

हा हा हा, परफेक्ट =))

८वी ते १०वी टेक्निकल आणि पुढे इंजिनियरिंग फष्ट ईयरला हाच अण्भव घेऊन धन्य जाहलो. ८वी ते १०वीत, पब्लिक वाकून वेल्डिंग करायला 'बसे' तेव्हा चूक झाली की नेमकी पार्श्वभागावर छडी बसत असे. पण भेंडी लयच मजा यायची तेव्हा. तुलनेने सुतारकाम जरा कमी बरे, अन जोडकाम ऊर्फ फिटिंग तर लयच वाईट. कानशीनं किती घासलं तरी जॉब सरळ कै व्हायचा नै अन मग ते ९० अंश आहे की नै ते चेकवायचे तेव्हा मागून अंधार करायचे =)) गुड ओल्ड टेक्निकल डेज़. विद्यामंदिर प्रशाला (आणि कनिष्ठ महाविद्यालय) मिरज जिंदाबाद!

'न'वी बाजू Fri, 19/08/2016 - 23:27

In reply to by नितिन थत्ते

त्यावेळी मी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आहे की नाही याने फरक पडत नाही.

सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी घुसली, की जे ग्रहण घडते, त्यास चंद्रग्रहण म्हणायचे, बरोबर? (बोले तो, सावली चंद्रावर.)

मग सूर्य आणि मी यांच्यामध्ये जर चंद्र कडमडला (बोले तो, सावली माझ्यावर), तर मग त्यास सूर्यग्रहण काय म्हणून म्हणायचे? मीग्रहण का नाही?

साती Fri, 19/08/2016 - 23:34

In reply to by 'न'वी बाजू

२०१४ च्या थत्तेचाचांच्या प्रतिसादावर किती उशीरा शंकलात!
;)

'मी' हा कुणाचे ग्रहं हा ठरविणारा असल्याने 'मी' ग्रहण लागत नाही.
ग्रहण 'मी' ला चंद्र /सूर्य यांचा पूर्ण्/तुकडा भाग दिसणं (दिसणं अपेक्षित असण्याच्या वेळी) बंद झालं की होतं.

पृथ्वी जर ग्रहण कोणाचं ठरवायला लागली आणि तुम्ही पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये कडमडलात तर 'न' वे ग्रहण लागेलही कदाचित!

'न'वी बाजू Sat, 20/08/2016 - 00:07

In reply to by साती

२०१४ च्या थत्तेचाचांच्या प्रतिसादावर किती उशीरा शंकलात!

होते असे कधीकधी.

काय झाले, आम्हीदेखील पूर्वी कधीतरी ज्ञानेश्वरांप्रमाणे भिंत चालविली होती, हे आज (उगाचच) आठवले (होते असेही कधीकधी.), त्याच्या शोधात या धाग्यावर पोहोचलो (गरजूंनी प्रस्तुत धागा स्वतः चाळून पाहावा.), तर हा प्रतिसाद दिसला, नि शंकलो झाले.

तुम्ही पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये कडमडलात तर 'न' वे ग्रहण लागेलही कदाचित!

त्याला आमच्यात 'सावली' म्हणतात.

अच्छा, बोले तो आम्ही ज्याला आमची 'सावली' म्हणतो, त्याला पृथ्वी आम्ही'ग्रहण' म्हणते होय? चुकलो. पृथ्वी त्याला बहुधा 'सूर्यग्रहण' म्हणत असावी.

मग असले ग्रहण तर आम्ही रोजच पाडतो की! त्यात काय विशेष?

- (सूर्यग्रहण पाडण्याची आणि त्याचबरोबर भिंतही चालविण्याची ताकद असलेला योगेश्वर-कृष्ण-प्लस-ज्ञानेश्वर-इन-वन कडमड्या सिद्धपुरुष ) 'न'वी बाजू.

----------
आम्ही पुरुष आहोत हे सिद्ध करण्याची आवश्यकता नसावी बहुधा. (बोले तो, ते सामान्यज्ञान असावे.) चूभूद्याघ्या.

साती Sat, 20/08/2016 - 07:26

In reply to by 'न'वी बाजू

स्वयमपि लिखति स्वयमपि खोडति!
;)

आपल्या आपण 'सावली' लिहून आमचा ज्ञानप्रकाश पाडण्याआधी ग्रहण म्हंजेच सावली हे लक्षात येऊन खोडलेत ते एक बरे केलेत.
भिंत चालवलेली तेव्हाच वाचलेली आहे. पण त्याबद्दल काका तुम्हाला 'मास्तर' आहात का असे म्हणाले होते ते ही लक्षात आहे.

बाकी माझ्या मते तुम्ही पुरुष नाहीतच..... महापुरुष आहात!

(उगाच जुनापुराणा 'डायलॉक' मारून टाकला!)

'न'वी बाजू Sat, 20/08/2016 - 08:19

In reply to by साती

(उगाच जुनापुराणा 'डायलॉक' मारून टाकला!)

हिंदीतल्या 'मार डाला'चा उद्गम आज कळला! असो.

(अतिअवांतर: ती शीर्षकातली अधिकची उद्गारचिन्हे ही केवळ 'तुम ने एक मारा, तो हम तीन मारेंगे!'-तत्त्वावर आहेत; अधिक काही नाही.)

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 31/08/2016 - 19:44

In reply to by 'न'वी बाजू

ज्यांच्यावर सावली पडते त्यांना ग्रहण लागतं. येवडं शिंपल बी समजंना तुमाला! दर रात्री तुम्हाला ग्रहण लागतं, दर रात्री तुमच्यावर पृथ्वीची सावली पडते.

तिरशिंगराव Wed, 31/08/2016 - 20:14

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

दर रात्री तुमच्यावर पृथ्वीची सावली पडते.

दर रात्री बायकोचीही सावली पडते, म्हणजे ते पण ग्रहणच म्हणायचं का ?

अतिशहाणा Wed, 31/08/2016 - 20:21

In reply to by तिरशिंगराव

दर रात्री बायकोचीही सावली पडते, म्हणजे ते पण ग्रहणच म्हणायचं का ?

रात्री लाईट बंद केल्यावर सावली पडणार नाही. ;)

नंदन Thu, 01/09/2016 - 02:09

In reply to by 'न'वी बाजू

"दया! छाया घे निवारुनिया" ह्या गीताचा अर्थ आज उमगल्यासारखा वाटला ;)

अवांतर -
ग्रहण, penumbra इ. वरून आठवलं:
प्रोटो-इंडो-युरोपियन andhoमधून अंध (संस्कृत) आणि umbr-(लॅटिन) आले आहेत; आणि त्यातूनच अंध, अंधार हे आपल्याकडचे शब्द तर penumbra, umbrella, adumbrate (रेखाटन), sombrero (शब्दशः - सावली देणारी हॅट) इ. इंग्लिश/स्पॅनिश शब्द.

लॅटिनोद्भव भाषांत, एक पाऊल पुढे जाऊन लाक्षणिक अर्थाने मनावर पडलेली छाया म्हणूनही umbrage (चिडणे, दुखावले जाणे), somber (sub = under + umbra = छाया) असे शब्द आलेत. अर्थात, आपल्याकडेही मनावर मळभ येणे इत्यादी वाक्प्रचार आहेतच, पण उष्ण कटिबंधाच्या देशात 'देई कृपेची छाया'च अधिक प्रचलित.

अजो१२३ Wed, 11/06/2014 - 17:28

http://www.unesco.org/new/en/communication-and-information/flagship-pro…

स्थानिक घटनांमुळे वारश्याला इजा पोहोचते म्हणून युनेस्को काही ग्रंथ, इ डि़जिटाइज करून जपते असे दिसतेय. या संकेतस्थळावर एक तर फारच कमी भारतीय लिस्टिंग्ज आहेत आणि ऋग्वेद वजा जाता दुसरं काही मी कधी ऐकलं नाही. इतर अनेक गोष्टींच्या मानाने इथल्या बर्‍याच गोष्टींचे महत्त्व कमी असावे. असल्या शिफारशी करणारांचा अभ्यासच प्रश्नार्ह आहे कि सिफारशींमागे राजकारण, इ असावे?

सविता Thu, 12/06/2014 - 13:20

विकीवर सिरियल किलर्स/सायकोपाथ्स यांची यादी चाळली असता त्यातली बहुतांश नावे ही अमेरिका अ युरोप येथील आहेत. भारतातील फार तुरळक आहेत (आता हे नोंदणीच्या अभावाने की खरेच हे प्रकार फारसे नाहीत त्यामुळे, हे माहित नाही - पण माझ्या ऐकण्यात रामन राघव, नोइडा मधले एक हत्याकांड, जोशी- अभ्यंकर हत्याकांड, अंजना गावित इतकेच आहेत).

त्यात सुद्धा जर प्रत्येक सिरियल किलर्स/सायकोपाथ्स ची पार्श्व्भूमी तपासली तर त्यातील बरेचजण हे आई-वडील आर्थिक वा अन्य दॄष्ट्या सबल नसल्याने फॉस्टर होम्स किंवा आजी-आजोबां जवळ वाढलेले होते.

मग माझ्या विचार आला की एक "व्यवस्थित कुटुंब" न मिळणे हे जर अशा प्रकारांना चालना देत असेल का आणि तेच भारतात असे प्रकार कमी असण्याचे कारण असेल का?

बॅटमॅन Thu, 12/06/2014 - 13:22

In reply to by सविता

बाकीचं माहिती नाही पण भारतातल्या गोष्टी विकीवर अंडर/अनरिपोर्टेड असतात हे पाहिले आहे- अन त्यामागे भारतीयांची अनास्था हेच आणि इतकेच कारण आहे.

ऋषिकेश Thu, 12/06/2014 - 14:22

In reply to by सविता

मुळात भारतात काही कुटुंबे एकत्र आहे परदेशातील कुटुंबांपेक्षा ती अधिक वा कमी व्यवस्थित आहेत हे एक मोठे (व धाडसी) गृहितक झाले! :)

दुसरे अव्यवस्थित/तुटलेल्या/पालकविरहीत पाल्यांपैकी किती अपत्ये अश्या मार्गाला लागतात असा विदा असेल तर याबाद्दल काही निष्कर्ष काढता यावा. नाहितर मग, "पकडलेले अनेक दहशतवादी मुसलमान असतात तेव्हा मुसलमान असणे हे दहशतवादाचे मुळ आहे" अश्यासारखे घाईने काढलेली चुकीची निष्कर्षात्मक विधाने ऐकु येतात

आडकित्ता Thu, 12/06/2014 - 13:27

फोटो काढताना फिल्मवर कॅमेर्‍याच्या भिंगाने समोरच्या वस्तूची खूप छोटी प्रतिमा उमटते, तशीच प्रतिमा जेव्हा आपण सूर्य अथवा वेल्डींगचा जाळ बघतो, तेव्हा डोळ्याच्या रेटिना(अतीशय नाजुक पडदा, ज्यात असंख्य फोटोसेन्सिटिव्ह सेन्सर पेशी असतात.)वर उमटते.

भिंग घेऊन कागद जाळण्याचा उद्योग लहानपणी केला असेलच.

वेल्डींग, अथवा डायरेक्ट सूर्य अशा प्रचंड प्रखर प्रकाशस्त्रोतांमुळे तो कागद जसा जळतो, एक्झॅक्टली तसाच रेटिनाचा सर्वात सेन्सिटिव्ह भाग, ज्याला मॅक्युला म्हणतात, तो "जळतो." (हे वर्णन समजायला/पटायला सोपे असल्याने कॉमनली सांगितले जाते. टेक्निकली बोलायचे तर कागद जळण्यासारखे नसून, शिजल्या सारखे म्हणता येईल. ;) अ‍ॅक्चुअल डॅमेज हे फोटोकेमिकल इंज्यूरी, व सेंट्रल सिरस रेटिनोपथी या सदरात मोडते.)

वेल्डिंगमुळे डोळे सुजतात तो प्रकार म्हणजे वेल्डिंग 'लागणे'. हा फोटो-कन्जन्क्टिवायटिस असतो. अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे डोळ्याच्या पांढर्‍या भागावरील श्लेष्मल त्वचेला झालेली इजा.

ग्रहण काळात, अंधार झाल्यावर बाहुली मोठी होते. व डोळ्यात शिरणारी घातक किरणे/रेडिएशन्स, जास्त प्रमाणात आत जातात. खग्रास ग्रहणात पूर्ण ग्रासानंतर जेव्हा चंद्रबिंब सरकते, त्यानंतरच्या निमिषार्धात, बाहुली लहान होण्याच्या आत, प्रचण्ड मोठ्या प्रमाणात ही किरणे डोळ्याच्या आत रेटिनापर्यंत जाऊ शकतात.

तात्पर्य: वेल्डिंग, ग्रहण, कोवळे / निबर / जून सूर्यबिंब नुसत्या डोळ्यांनी अजिबात पाहू नये. (हा फुकट वैद्यकिय सल्ला दिला असे)

मी Thu, 12/06/2014 - 14:08

In reply to by आडकित्ता

ही नविनच (अजब) माहिती आहे, आजपर्यंत अनेकवेळा पाहिले आहे आणि लहान मुलांनाही दाखवले आहे, हे टाळायला हवे. पण डोळ्यांचा विषय निघाला आहे तर एक अजुन फुकटचा सल्ला विचारतो - टिव्ही(कितीही वेळ) पाहिल्याने(योग्य अंतरावरून) डोळे खराब होत नाहीत असे वाचले आहे ते खरे आहे काय?

नितिन थत्ते Fri, 13/06/2014 - 15:17

In reply to by मी

हा प्रश्न मला अनेकदा पडला आहे.

पूर्वी टीव्हीपासून अमूक अंतर वगैरे सोडून बसायला सांगत. नंतर सीआरटी मॉनिटर वाले पीसी आले तेव्हा लोक त्याच्या समोर फुटावर बसून त्याच्याकडे टक लावून पाहू लागले. त्यातसुद्धा सुरुवातीस ठीक आहे की वर्ड्स्टार सारखी सॉफ्टवेअर होती तेव्हा पडदा फारसा प्रकाशमान नसे. पण विंडोज आल्यापासून तर पांढरा ब्राइट पडदा + सीआरटी मॉनिटर + फूटभर अंतर असा मामला असे.

आडकित्ता Mon, 16/06/2014 - 22:09

In reply to by नितिन थत्ते

१. डोळे उघडले की ते पहाण्याचे काम करतात. मग समोर भिंत असो की टीव्ही. 'पहाणे' सुरूच असते.
२. टीव्ही (सीआरटी मॉनिटरवाले देखिल) मधून कोणतीही घातक किरणे बाहेर निघत नाहीत. कॅथोड रे ट्यूबमधून इलेक्ट्रॉन्स येतात पण ते स्क्रीनसमोर स्टॅटिक जाणवते, तितके अंतर पुढे आल्यानंतर अक्षरश: खाली पडतात. (Its not ionizing radiation, not even a dangerous radiation beyond a few inches from the screen.)
३. थेटरात स्क्रीनच्या खूप जवळ बसल्यास बायनॉक्युलर व्हिजनला अडचण येते, हा अनुभव आपल्याला आहेच. नजरेच्या एका आवाक्यात दिसणारे चित्र, अन त्याचे अ‍ॅनालिसिस करण्याची मेंदूची क्षमता, फिक्सेशन-रिफिक्सेशन रिफ्लेक्स इ. यांत अडचणी उद्भवतात. त्यामुळे किमान 'कोवळी नजर' असणार्‍या लहान मुलांनी (प्रीस्कूल एज, ६ वर्षांपेक्षा लहान मुले, या वयापर्यंत नजर 'पिकते' परिपक्व होते.) ३-४ फुटापेक्षा (नजरेच्या एका आवाक्यात दिसेल यापेक्षा जास्त मोठे दिसेल असे हलते चित्र दिसेल असे अंतर, नॉर्मल २१ इन्ची सीआरटी टीव्हीसाठी) जास्त जवळून टीव्ही पहाणे चांगले नाही. तरीही, यामुळे लपलेला तिरळेपणा (Latent squint) उघड होण्यापलिकडे फार काही अडचण उद्भवू नये. थोड्या व्यायामाने यात फरक पडावा.

(*डोळ्याचे व्यायाम, जे डॉक्टर्स सांगतात व बायनॉक्युलर व्हिजनसाठी काही व्यायाम देणारी यंत्रे देखिल आहेत, तरीही, हे सगळे व्यायाम दोन डोळे नामक क्यामेरे एकाच वेळी एकत्र एकाच दिशेला फिरतील याच्याशी -म्हणजेच तिरळेपणाशी- संबंधीत आहेत. 'नजरेच्या' व्यायामाबद्दल अधिक पुढे काही.)

शिवाय, टीव्हीचा वापर बेबिसिटींगसाठी करणे हा आपला मूर्खपणा, कालांतराने मुलांच्या हट्टात अन नंतर त्यांना समजू लागल्यावर अनेक मानसिक निरगाठींत बदलतो, हे लक्षात घेता, केबलचे बिल भरणारे आपण आहोत, हे लक्षात ठेवून, 'हा फार टीव्ही पहातो' ही तक्रार किमान माझ्यासारख्या डॉक्टरकडे करू नये :) . रागे भरल्या जाईल.
४. टीव्ही मुळे चष्म्याचा नंबर कधीच येत नाही. नंबर आहे हे लक्षात येते इतकेच. पण, वर दिलेल्या कारणास्तव टीव्ही कमी पहाणे उत्तम हेच खरे.
*
५. योग व डोळ्याचे "व्यायाम"

हा एक कठीण प्रकार आहे.

डोळा या अवयवात सेन्सरी अन मोटर असे दोन प्रकार आहेत. मोटर ऑर्गन्सचे व्यायाम द्यावे लागतात, पण सूर्य बघण्याने वा तूप पिण्याने डोळ्यास तेज येते, गरागरा डोळे फिरवल्याने चष्मा जातो इ. भ्रामक समजूती आहेत.

आपल्या शरीरात २ प्रकारचे अवयव आहेत.
१. सेन्सरी : पंचेंद्रिये उर्फ पञ्च ज्ञानेंद्रिये. नाक, कान, डोळा, त्वचा व जीभ.
२. मोटर : हात, पाय, फुफ्फुसे, हृदय, इ. (यांतली काही व्हॉलंटरी अर्थात आपल्या सजग नियंत्रणाखालची, फुफ्फुसासारखी अर्धवट नियंत्रणातली अन हृदयासारखी मेंदूकडून आपोआप चालणारी मोटर, पण तिचं बटण आपल्या सजग नियंत्रणाखाली नसते.)

पैकी, 'व्यायाम' करून सर्व 'मोटर' सिस्टीम्स बूस्ट करता येतात. अगदी हृदयही. सेन्सरी नाही. अन हृदय 'स्ट्राँग' बनले, तरी हवे तेव्हा बंद चालू करता येत नाही. अ‍ॅथलेटिक हृदयाचे ठोके कमी पडतात. अती अ‍ॅथलेटिक असलेत तरी ५० पेक्षा खाली मी पाहिले नाहियेत. हे अजून कमी अन तेही मनोव्यवहारे करण्याचे दावे म्हणजे त्राटक.

मला कान हलवता येतात. खरेच येतात. पण कान हलवायचा व्यायाम करून माझी ऐकण्याची शक्ती वाढेल का? किंवा मी जीभ वेगवेगळ्या कोनांतून हलवायचा व्यायाम सांगू लागलो तर माझी चव घेण्याची क्षमता अधिक तीव्र होईल काय? किंवा रोज निखारा चाटणे व बर्फ चाटणे असा उद्योग मी करून पाहिला तर जिभेच्या चव घेण्याच्या क्षमतेत काय फरक पडेल? दुसरे काही नाही तर ड्यामेजच होइल.

हाच प्रकार त्राटक नामक योगप्रकारात आहे. उदा. अनिमिष नेत्रांनी 'कोवळे' सूर्यबिंब न्याहाळणे. कशाला यार? ताजा कोवळा निखारा चाटून पहाणार का? बर्फ चाटल्यावर जनरल आयडिया येईल. ड्राय आईस देऊ?

मोटर ऑर्गन्सना अती व्यायाम दिल्याने त्यांची क्षमता वाढते हे दिसल्यावर, इन्व्हॉलंटरी मसल्स व सेन्सरी ऑर्गन्सवर केलेले अघोरी प्रयोग = त्राटक.

अन याला डिस्क्लेमर = अती सिद्ध साधूंनाच हे जमते. सगळ्यांनी करू नये. असे दिले जाते, व्हिच इन माय ओपिनियन इज प्योर बीएस.

माझा सल्ला : अती सिद्ध साधू हे फिक्षन अस्ते. रामदेवबाबांचा एक डोळा बंद होत नाही. तो बंद होईल त्यादिवशी त्राटकाबद्दल पुढे बोलू.

अनुप ढेरे Mon, 16/06/2014 - 22:37

In reply to by आडकित्ता

माहितीपूर्ण प्रतिसाद!

गरागरा डोळे फिरवल्याने चष्मा जातो

हे अनेक लोकांकडून ऐकले आहे. डोळे मिचकावणे खूप, ज्यायोगे डोळा कोरडा पडत नाही, असाही सल्ला एका डोळ्याच्या डागदरनी दिला आहे

नितिन थत्ते Thu, 19/06/2014 - 10:37

In reply to by आडकित्ता

प्रतिसाद आवडलाच....

पण एक शंका.....
>>२. टीव्ही (सीआरटी मॉनिटरवाले देखिल) मधून कोणतीही घातक किरणे बाहेर निघत नाहीत. कॅथोड रे ट्यूबमधून इलेक्ट्रॉन्स येतात पण ते स्क्रीनसमोर स्टॅटिक जाणवते, तितके अंतर पुढे आल्यानंतर अक्षरश: खाली पडतात. (Its not ionizing radiation, not even a dangerous radiation beyond a few inches from the screen.)

व्हेन फास्ट मूव्हिंग इलेक्ट्रॉन्स आर सडनली स्टॉप्ड, एक्स रेज आर एमिटेड असे वाचले असल्याने शंका येते. आणि विकीवर हे मिळाले.

Ionizing radiation

CRTs can emit a small amount of X-ray radiation as a result of the electron beam's bombardment of the shadow mask/aperture grille and phosphors. The amount of radiation escaping the front of the monitor is widely considered unharmful. The Food and Drug Administration regulations in 21 C.F.R. 1020.10 are used to strictly limit, for instance, television receivers to 0.5 milliroentgens per hour (mR/h) (0.13 µC/(kg·h) or 36 pA/kg) at a distance of 5 cm (2 in) from any external surface; since 2007, most CRTs have emissions that fall well below this limit.[47]

आडकित्ता Fri, 11/07/2014 - 23:38

In reply to by नितिन थत्ते

ते विकीवरील उत्तर वाचलेत, तरी शेवटच्या वाक्यात तेच आहे.
एक्सरे मधे एलेक्ट्राँन्सच असलेत, तरी ते फारा वर्षांपूर्वीच्या EGA वा तत्पूर्व मॉनिटर्सशी निगडीत होते.
माझी कॉमेंट आजच्या टिव्हीबद्दल होती.

एफडीएच्या साईटवर हे दिसेल :
How Safe Are TV Sets Today?

X-radiation emissions from properly operated TV sets and computer monitors containing CRTs are well controlled and do not present a public health hazard. The FDA standard, and today’s technology, such as electronic hold-down safety circuits and regulated power supplies, have effectively eliminated the risk of x-radiation from these products. FDA has not found TVs that violate the standard under normal (home) use conditions.

It is important to note also that flat panel TVs incorporating Liquid Crystal Displays (LCD) or Plasma displays are not capable of emitting x-radiation. As such these products and are not subject to the FDA standard and do not pose a public health hazard.

मन Thu, 12/06/2014 - 14:18

In reply to by आडकित्ता

उपयुक्त माहिती . आभार.
कोवळ्या सूर्याकडे , खरंतर कोवळ्याहून थोडं जास्तीच उजाडल्यावरही पहायची इथे काही योग प्रकार करणार्‍यांत फ्याशन ऐकली आहे.
चर्चेमध्ये बॅट्याने "त्राटक " म्हटले आहे, बहुतेक तेच करतात सूर्याकडे सकाळी अगदि नऊ वाजतासुद्धा एकटक पाहत बसतात काही मंडळी.
सातेक वाजताचय सूर्याच्या मानाने नऊ वाजताचा सूर्य भलताच बराच उजाडलेला असतो भारतात.

मन Fri, 13/06/2014 - 13:44

"माणसाच्या बुद्धीलाही अज्ञात अशा काही गोष्टी असतात " अशी घिसीपीटी लाइन सांगत धार्मिक, अध्यात्मिक लोकं तत्वज्ञान सुरु करतात.
ह्या वाक्यातली खुबी अशी की हे वाक्य दिसते तर बरोबर. पण वाक्याचा अंडरटोन भलतच काहीतरी सूचित करतो.
माणसाच्या बुद्धीला अज्ञात आहेत. ह्याचा सरळ अर्थ "त्या गोष्टी अज्ञात आहेत." असा होतो/व्हावा.
पण म्हणणारा प्रत्यक्षात त्याचा अर्थ "मानवी बुद्धीस अज्ञात असले तरी आमच्या बाबा महाराज्/अमुक शास्त्र्/तमुक सिद्धीस मात्र ते ज्ञात आहे!"
अहो ते तसे ज्ञात असेल, तर मग ते अज्ञात आहे असे म्हणता येउ नये!
पण तरीही धार्मिक आणि अध्यात्मिक लोक हेच सांगत राहतात.
वाक्य दिसायला सरळ दिसतं; त्यामागचा गर्भित अर्थ अत्यंत चुकीचा असतो.
विज्ञानास जमत नसलेली एकतरी गोष्ट बाबामहाराज लोकांनी करुन दाखवावी हे जुनच/घिसपीटं च्यालेंज दिलं;
की मग "त्यांची परीक्षा घ्यायची तुझी रे काय लायकी" हे ऐकून घ्यावं लागतं.
किंवा "आम्ही सध्या तसं करणार नाही. पण अमक्या काळात, तमक्य माणसानं केल्याचं ढमक्यानं पाहिलय" असं ते लोक म्हणतात.
मी त्यांना म्हटलं "तुम्ही स्वतः भिंत चालवू शकता का ? किंआ इतर कुणाला भिंत चालवताना पाहिलय का ? नसेल तर ७००
वर्षापूर्वी एक भिंत चालवली गेली असे सांगत बसू नका.".
उत्तर म्हणून पाठीत धपाटा मिळाला.

त्याच त्या गोष्टींबद्दल दरवेळी तेच मतप्रदर्शन करत बसणं सोयीस्कर वाटत नाही.
ह्या तिढ्याचा अंत तसाही नजीकच्या काळात दृष्टीक्षेपात नाही.
मला वाटतय ते एकदाच थोडक्यात लिहून पाहतो.

विज्ञानास किंवा मानवी बुद्धीस अगम्य अशा गोष्टी आज आहेत; म्हणून काय प्रयत्नच सोडून द्यायचे का ?
की त्या गोष्टी काय आहेत त्याचा शोध घ्यायचा ? जग असा शोध घेतच पुढे जात आहे ना ?
समजा न्यूटनच्याच काळी "हे अंतिम आहे" असे म्हणत बसलो असतो तर आजच्या काळातल्या कित्येक गोष्टी मिळाल्या नसत्या.

"आज मिळालेले नाही, पण न जाणो यत्न सुरु ठेवले तर अजूनही काही हाती लागेल" अशा आशेवर नि निश्चित दिशेवर संशोधन चालत असावे.
आस्तिक नास्तिक हे मला कसे वाटतात ते सांगतो.

दाट अनंत असा अंधार आहे, काळोख आहे. अगणित माणसे त्यात कैद आहेत. ठराविक वेळी त्यांच्यावर अन्नवर्षाव होतो, वासाने ते खातात नि झोपी जातात.काही माणसे कुठेतरी काहीतरी हाताला लागेल म्हणून धडपडताहेत, ठेचकाळताहेत तरी शोधताहेत. ह्या अंधाराला अंत असलाच पाहिजे असा त्यांचा कयास, तो शोधणे, म्हणजे संशोधन.
काही माणसे ह्या धडपड्यांना मूर्ख म्हणत स्वस्थ बसली आहेत, "हा अंधार एका दिव्य शक्तीने केला असून ह्यास अंत नाही हे त्याने आमच्या कानात सांगितले" असा त्यांचा दावा.
स्वस्थ बसलेली माणसे = आस्तिक,
धडपडणारे = नास्तिक
आस्तिक खरे बोलताहेत की खोटे हे मोजायची कुठलीही फूटपट्टी उपलब्ध नाही.

तुम्ही स्वतः भिंत चालवू शकता का ?

होऽऽऽ... आत्ता चालवून दाखवू काय?

नाही म्हणजे, पूर्वी एकदा चालवलेली आहे. आता कितपत आठवेल नि जमेल, माहीत नाही. पण प्रयत्न करून पाहतो.

पूर्वी शाळेत असताना संस्कृताच्या तासाला राम नि माला चालवली होती, आता मराठीतून भिंत चालवायची. आहे काय नि नाही काय?

तर ही घ्या. (जय वाळंबेसर!)

भिंत / भिंती (प्रथमा).
भिंतीस, भिंतीला, भिंतीते / भिंतींस, भिंतींला, भिंतींना, भिंतींते (द्वितीया).
भिंतीने, भिंते, भिंतीशी / भिंतींनी, भिंतींही, भिंतीं, भिंतींशी (तृतीया).
भिंतीस, भिंतीला, भिंतीते / भिंतींस, भिंतींला, भिंतींना, भिंतींते (चतुर्थी).
भिंतीऊन, भिंतीहून / भिंतींऊन, भिंतींहून (पंचमी).
भिंतीचा, भिंतीची, भिंतीचे / भिंतींचे, भिंतींच्या, भिंतींची (षष्ठी).
भिंतीत, भिंती, भिंत्या / भिंतींत, भिंतीं, भिंत्यां (सप्तमी).
(अग) भिंती / (अग) भिंतींनो (संबोधन).

काय, जमले का? की ड्रायविंग लेसन परत घ्यायला हवेत?

--------------------------------------------------------------------------------------------------------

हे रूप व्यवहारात वापरले गेलेले आम्हीं व्यक्तिशः ऐकलेले नाही. कदाचित पुरातनकालीन असावे. केवळ वाळंबेसरांच्या पुण्यस्मृतीचा आदर ठेवून येथे नोंदविलेले आहे.

, ही रूपेदेखील आम्ही व्यक्तिशः ऐकलेली नाहीत; किंबहुना, ती 'भिंती'स लागू होत असण्याबाबत आम्ही साशंक आहोत.२अ मात्र, इतर कोणत्या नामास वा सर्वनामास ती आजही लागू असणे अशक्य नाही. अर्थात, वाळंबेसरांच्या पुण्यस्मृतीचा आदर, इ.इ.

२अ प्रत्यक्ष व्यवहारात भिंतीस चुना, झालेच तर रंगाचा एखाददुसरा हात, याव्यतिरिक्त इतर काहीही लागू होत असल्याचे निदान आम्ही तरी ऐकलेले नाही. परंतु कवींप्रमाणे व्याकरणकारांसदेखील जेथे सूर्याचे तेज पोहोचत नाही अशा ठिकाणीं डोकावण्याचे लायसन असते. असो.

आडकित्ता Mon, 16/06/2014 - 23:27

In reply to by 'न'वी बाजू

अजून विभक्त्या येतात. शामा आहात का?
पंचमीचा अनेकवचनी प्रत्यय 'पासून' राहिला.
उन हून / उन हून पासून.

'न'वी बाजू Mon, 16/06/2014 - 23:32

In reply to by आडकित्ता

अजून विभक्त्या येतात. शामा आहात का?

नाय बॉ. पण शाळेच्या दिवसांत डोक्यात ठोकून ठोकून बसवलेली अडगळ (बरीचशी नष्ट झालेली असली, तरी - कालाय तस्मै नमः आणि थ्यांक गॉड!) उरलीसुरली अधूनमधून बाहेर सांडते, त्याला काय करणार?

पंचमीचा अनेकवचनी प्रत्यय 'पासून' राहिला.
उन हून / उन हून पासून.

तत्त्वतः मान्य. पण आमच्या पाठ्यपुस्तकात तो (का कोण जाणे, पण) नव्हता, असे अंधुकसे स्मरते. असो चालायचेच.

आडकित्ता Mon, 16/06/2014 - 23:38

In reply to by 'न'वी बाजू

अडगळ आमची पण बरीच जमा आहे.
संबोधन एकवचनी प्रत्यय नाही, अनेकवचनी नो असं पाठ केल्याचं आठवतंय.
रच्याकने: आमच्या गुर्जींचं नाव दगा काळू पाटील असे होते. :)

साती Thu, 01/09/2016 - 08:17

In reply to by 'न'वी बाजू

'न' वी बाजू,
हल्लीच केतकी माटेगावकरचे नवे गाणे बघताना तुमच्या या प्रतिसादाची आठवण आली होती.
https://m.youtube.com/watch?v=HCzdV94RBbU

तुम्ही भिंत चालवलीत तशी या गाण्यात पेठेबाईंच्या तोंडून केतकीने प्रियकर चा(ळ)वलाय.
तो ही संस्कृतात.

काश आम्हाला असे छान छान शब्द चालवायला शिकवले असते आठवीत.
आम्हाला आपले देव, माला, भानु शिकवायचे मेले!

माणसाच्या बुद्धीलाही अज्ञात अशा काही गोष्टी असतात " अशी घिसीपीटी लाइन सांगत धार्मिक, अध्यात्मिक लोकं तत्वज्ञान सुरु करतात.
ह्या वाक्यातली खुबी अशी की हे वाक्य दिसते तर बरोबर. पण वाक्याचा अंडरटोन भलतच काहीतरी सूचित करतो.
माणसाच्या बुद्धीला अज्ञात आहेत. ह्याचा सरळ अर्थ "त्या गोष्टी अज्ञात आहेत." असा होतो/व्हावा.
पण म्हणणारा प्रत्यक्षात त्याचा अर्थ "मानवी बुद्धीस अज्ञात असले तरी आमच्या बाबा महाराज्/अमुक शास्त्र्/तमुक सिद्धीस मात्र ते ज्ञात आहे!"

जय हो.

स्वामी अग्निवेश यांनी - नास्तिकांना उद्देशून - Swami Agnivesh cautioned Dawkins and team to guard against arrogance that comes from ego, as not everything that exists can be quantified or measured. (http://timesofindia.indiatimes.com/articleshow/11683629.cms? )

त्यामागची भावना अशीच होती असे मला वाटले ... की तुम्हाला ते मेझर्/क्वांटिफाय करता येत नाही पण मला येते.

Who is really arrogant in this case ?

---

खुलासा - गब्बर निरिश्वरवादी/नास्तिक नाही.

मन Fri, 13/06/2014 - 17:05

रुढार्थाने मांसाहार म्हणतात त्याबद्दल खाणार्‍यांना अपराध गंड -- guilty feel असतो का ?
म्हणजे खाताना काही वाटत नसेलही, पण सदर प्राणी/पक्षी/कीटक्/अवनस्पतीय सजीव जिवंत असतानापासून ते त्याला
शिजवेपर्यंतच्या टप्प्यांमध्ये सामील होण्यास मांसाहार्‍यांना संकोच वाटतो का ?
वाटत असल्यास --
हे इनकन्सिस्टंट नाही का ?

म्हणजे असं की...
मला फळं तोडताना, शेताची कापणी होत असताना काहीही वाटत नाही. मी जमत असेल तर फळे तोडतो आणि खातो.
जे करण्याने अपराध गंड येतो; ते करत नाही.
तुम्हाला कोंबडी, बकरा कापताना पाहणे किंवा स्वतः कापणे अगदिच कसेतरी वाटत असेल तर मग खाताना काहिच कसे वाटत नाही?
हां, कोंबडे कापत असताना काहीही विशेष वाटत नाही; कागद कापावा तितक्या सहजतेने कार्य करता येत असेल तर काहीही म्हणणे नाही.
कोळी लोक जाळे टाकून मासे पकडतात. फडफदित ताजे मासे पाहून त्यांना छान वाटते.
ते तसे मासे कोळी लोक सहजतेने ग्रहणही करतात. ही अशी वागणूक कन्सिस्टंट वाटते.
पण बकरा कापायला कसंतरीच होत असेल तर मग खावे तरी कशाला ?

नितिन थत्ते Fri, 13/06/2014 - 17:51

In reply to by मन

ज्या कंपनीच्या उत्पादनाने कॅन्सर होतो हे ठाऊक असते त्या कंपनीचे शेअर घ्यायला (पक्षी- त्या 'पापातून' मिळवलेल्या पैशात भागीदार व्हायला) गिल्ट येत नाही तसाच.....कोणीतरी कुठेतरी कोंबडा मारला* तो खायला इकडे कुणाला गिल्ट येत नसावी.

*शिवाय जीवन नश्वर आहे हे ठाऊकच असल्याने तो कोंबडा नाहीतरी केव्हा ना केव्हा मरणारच होता असा विचार करून गिल्ट येत नसेल.

मन Fri, 13/06/2014 - 18:15

In reply to by नितिन थत्ते

खायला गिल्ट नाहिच हो. तिथे न येण्याचाच अधिक संभव आहे.
खाणर्‍यांना ते कापताना पाहणे किम्वा स्वत: प्रत्यक्ष कापणे नकोसे वाटते काय , अशी शंका आहे.

'न'वी बाजू Fri, 13/06/2014 - 17:58

In reply to by मन

पण बकरा कापायला कसंतरीच होत असेल तर मग खावे तरी कशाला ?

'आमच्या'त एक म्हण आहे: Those who love sausage and respect the law should not see either one being made.

कदाचित, 'सविनय कायदेभंगा'ची प्रेरणा ही कायदे बनण्याची प्रक्रिया पाहण्यातून आली असावी काय?

आदूबाळ Fri, 13/06/2014 - 18:58

In reply to by मन

माझा मांसाहार चिकनपुरता मर्यादित आहे. मी सुपरमार्केटातल्या गारेगार फ्रीजमधलं चिकन घेतो. "अहिल्यादेवी मटण शॉप"मध्ये जाऊन चिकन आणणं मेरे बस की बात नहीं. तिथले ताज्या मांसाचे वास, एकंदर कुबटपणा, खिळ्याला टांगलेल्या बकर्‍याच्या मांड्या वगैरे गोष्टी भयानक वाटतात.

मासळीबाजारात हिंडायला काही वाटत नाही. उलट मच्छीच्या वटारलेल्या डोळ्यांत डोळे घालून खुन्नस द्यायचा पोरकट खेळ खेळायला मजा येते. पण संधी असूनही गळ घेऊन मासे पकडायला गेलो नाही. जिवंत माशाच्या गळ्यात हूक अडकणार, तो तडफडणार वगैरे कल्पनांनीच कसंसं झालं.

माझ्या मते माझ्या डोक्यात living entity आणि commodity हे स्वतंत्र कप्पे आहेत. कमोडिटी-कप्प्यातल्या गोष्टीला लिव्हिंग एंटिटी कप्प्यात घुसवायचा प्रयत्न सहसा करत नाही.

कॉलेजमध्ये कट्ट्यावर जे तोंडओळख असलेले समांतर ग्रूप बसतात त्यापैकी एक मुलगी व्यसनाधीन होऊन वेश्याव्यवसाय करायला लागली हे कळलं तेव्हा भयंकर अस्वस्थ झालो होतो. पण अ‍ॅम्स्टरडॅमच्या रेड लाईट डिस्ट्रिक्टमध्ये हिंडताना काही अपराधी वाटलं नाही.

विसंगती आहे का? नक्कीच. अशी विसंगती असणं चूक आहे का? माहीत नाही ब्वा! दृष्टीआड सृष्टी या म्हणीचा उगम इथेच असावा.

-------------
१ for want of a better word

अमुक Fri, 13/06/2014 - 19:20

In reply to by आदूबाळ

commodity : for want of a better word
.....इंग्रजीतच अधिक योग्य शब्द हवा आहे की मराठीत ?
मराठीत 'कमोडिटी'साठी 'बाजारवस्तू' / 'विक्रियोग्य वस्तू' हे शब्द सुचतात.

'न'वी बाजू Fri, 13/06/2014 - 19:47

In reply to by आदूबाळ

पण संधी असूनही गळ घेऊन मासे पकडायला गेलो नाही.

एकदा - एकदाच! - तो प्रयोग करून पाहिलेला आहे. यात हत्या जर कशाची होत असेलच, तर ती अपरिमित कालाची होते, एवढेच (अनुभवाअंती) नम्रपणे नमूद करू इच्छितो. (आणि शिजवून खाण्याकरिताच जर मासे हवे असतील, तर शहाण्या माणसाने ते मासळीबाजारातून/कोळ्याकडून/कोळिणीकडूनच आणावेत, असाही एक अनाहूत सल्ला देऊ इच्छितो. कच्चे खाण्यासाठी हवे असल्यास मात्र एखाद्या बर्‍यापैकी सुशी रेष्टारण्टाची वाट धरण्यास हरकत नसावी.)

जिवंत माशाच्या गळ्यात हूक अडकणार, तो तडफडणार वगैरे कल्पनांनीच कसंसं झालं.

No such fear. (Believe me!)

(प्रतिसादातील इतरही अनेक मुद्दे उपप्रतिसादार्ह आहेत, परंतु तूर्तास त्यांची एवढीच पोच देऊन आवरते घेतो. जमल्यास पुन्हा कधीतरी.)

आदूबाळ Fri, 13/06/2014 - 19:52

In reply to by 'न'वी बाजू

सुशी या खाद्यपदार्थाबाबत "ज्या पदार्थात सु आणि शी दोन्ही आहे तो चांगला लागणं शक्यच नाही" असं बहुदा ऐसीवरच वाचलेलं मत चिंत्य आहे.

बॅटमॅन Sun, 15/06/2014 - 02:01

In reply to by आदूबाळ

सु आणि शी यांपैकी दोन्ही कमोडिटीरूपी नामे म्हणून न ट्रीटवता प्रथम चिजेकडे एक विशेषण म्हणूनही पाहिल्यास उपरिनिर्दिष्ट मताचे चिंत्यपण विशेषत्वाने अधोरेखित होईलसे वाटते.

रुची Mon, 16/06/2014 - 23:12

In reply to by 'न'वी बाजू

मार्मिक की विनोदी यापैकी कोणती श्रेणी दयावी हा प्रश्न पडला होता, बहुदा खोडसाळ ही तुमच्यादृष्टीने सर्वश्रेष्ठ श्रेणी द्यायला हवी होती. रम्य तळ्याकाठी फिशिंग लाईनच्या गाठी सोडविण्यात (आणि ती झाडाला अडकली की सोडविण्यात) अपरिमित कालाची हानी करून रिकाम्या हाती परतूनही पुन्हापुन्हा तोच प्रकार करायला जाणार्यांपैकी एक असल्याने प्रतिसाद फारच भिडला. त्यातही 'फ्लाय फिशिंग' नामक प्रकाराच्या वाटेस जायचे असेल तर आधी कोळीणीकडून मासे आणून ठेवावेत आणि मगच असल्या तथाकथित खेळांच्या नादी लागावे असा सल्ला मीही देईन. हवे तर कोळीणीकडून आणलेला मासा आपल्याच गळाला लागला असे भासवून परिचितांकडून शाबासकी मिळवावी...बरेच जण तसेच करतात असे ऐकीवात आहे :-)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 13/06/2014 - 20:01

In reply to by आदूबाळ

माझ्या मते माझ्या डोक्यात living entity आणि commodity हे स्वतंत्र कप्पे आहेत.

commodity या जागी खाद्यपदार्थ हा शब्द चालेल काय?

या चर्चेमुळे 'पाडस' आठवलं.

रुची Tue, 17/06/2014 - 00:15

In reply to by आदूबाळ

माझ्या मते माझ्या डोक्यात living entity आणि commodity१ हे स्वतंत्र कप्पे आहेत. कमोडिटी-कप्प्यातल्या गोष्टीला लिव्हिंग एंटिटी कप्प्यात घुसवायचा प्रयत्न सहसा करत नाही.

हे रोचक निरिक्षण आहे आणि मला वाटते की बाजारीकरणाच्या प्रक्रियेचे हे बायप्रॉडक्ट आहे. विशेषतः आपले अन्न ज्यापद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचते त्यातल्या पहिल्या अनेक टप्प्यांशी आपला काहीच संबंध न उरल्याने अशा प्रकारची विसंगती तयार होते. जगाच्या ज्या भागात कोलंबी मिळत नाही तिथे स्वस्त कोलंबी उपलब्ध झाल्याने ग्राहक सुखावतात पण ती तशी उपलब्ध होण्यामागे नक्की कोणाचे शोषण कसे होते यापासून ते अनभिज्ञ असतात.
हे फक्त अन्न्धान्याबद्दल आणि माझ्यापुरते बोलायचे झाले तर निदान त्याबाबत आपली नैतिकता तपासावी असा प्रयत्न करताना आपल्यात आणि आपल्या अन्नाच्या स्त्रोतात फार मोठे अंतर नसणे मला सोईचे वाटते. मांसाहार करायचा आहे तर मग आपण खातो ते प्राणी कोठे कसे वाढतात, कसे मारले जातात कोणत्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचतात हे समजणे, त्याबद्दल घृणा न वाटणे, त्याबद्दल नैतिक टोचणी न लागणे हे मला महत्वाचे वाटते. कोंबडी स्वतः मारणे शक्य नाही तर ठीक आहे पण ही कोंबडी कुठे कशी पाळली गेली, कशी मारली गेली अशी साफ केली गेली हे समजल्यावर स्वतःला त्याबद्दल घृणा वाटली तर मग ती खाणे ही विसंगती आहे पण नसेल तर ती प्रकृती आहे. शिवाय हे अन्न शक्य तितक्या मूळ स्वरूपात माझ्यापर्यंत यावे याकडे माझा कल असतो, कोंबडी खायची तर ती साफ करण्याचे, कापण्याचे आणि कोणताही भाग वाया न घालवता वेळेवर संपविण्याची जबाबदारी स्वतःवर घेतल्याने आपण एक 'प्राणी' खातो आणि एक 'विकत आणलेला खाद्यप्रदार्थ' खात नाही याचे भान वाढते. हे नेहमी सर्व बाबतीत शक्य होते असे नाही पण त्याची जाणीव असेल तर त्याप्रमाणे निर्णय घेत हळूहळू विसंगती कमी होत जातील अशी शक्यता वाटते.

बॅटमॅन Tue, 17/06/2014 - 00:25

In reply to by रुची

निव्वळ औद्योगिकीकरण याला कारणीभूत असावे काय? मला वाटते नसावे. जुन्या काळीही कैक लोक कमी पायर्‍यांत नॉनव्हेज खातच होते की. त्यांना वाटत नव्हतं काय काही?मला तर वाटतं की ब्राह्मण समाजातले कैक लोक अलीकडे नॉनव्हेज खाऊ लागलेत त्यांसाठी हे जास्त लागू आहे. ते अगोदर खात नव्हते, सबब आधीपासून घरी बघून ठाऊक नसते आणि कुठे बकरं कापताना इ. पाहिलं की तेवढ्यापुरतं वाईट वाटतं, घृणा इ. येते. नॉनव्हेज खायची परंपरा असली तर असे होत नाही शक्यतोवर-याला अपवादही असतील पण कमीच पाहिलेत तसे.

रुची Tue, 17/06/2014 - 01:02

In reply to by बॅटमॅन

मूळ मुद्दा

आपले अन्न ज्यापद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचते त्यातल्या पहिल्या अनेक टप्प्यांशी आपला काहीच संबंध न उरल्याने अशा प्रकारची विसंगती तयार होते

हा आहे आणि औद्योगिकीकरणामुळे केवळ मांसाहाराबद्दलच नव्हे तर शाकाहाराबद्दलही असेच नैतिक मुद्दे (जसे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम) तयार होतात ज्याविषयी स्त्रोतांच्या जवळ गेल्याने अधिक माहिती आणि आस्था तयार होते.

बॅटमॅन Tue, 17/06/2014 - 02:02

In reply to by रुची

मग माझा मूळ मुद्यालाच आक्षेप आहे.

औद्योगिकीकरण परवापरवा २००-३०० वर्षांपूर्वी झाले. सगळीकडे पसरायला विसावे शतक उजाडले. तोपर्यंत सर्व जग स्रोतांच्या जवळ होते. तसे जवळ होते म्हणून आस्था होती हे म्हणायला काही पुरावा आहे का? बरं, आस्था होती म्हंजे नक्की काय होतं? ओव्हरकंझम्प्शन आत्ताच्या इतके नव्हते कारण तसे ते करता येते हे माहितीच नव्हते. ज्यांना शक्य होते ते त्याही काळात, त्याही टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने जमेल तेवढे ओव्हरकंझम्प्शन करतच होते. फक्त ९९% जन्ता ते करत नसल्याने पर्यावरणारवचे परिणाम दिसत नसत इतकेच.

जुन्या काळी तंत्रज्ञान इव्हॉल्व्ह नसले तरी लोक हावरट होतेच, फक्त तंत्रज्ञानाच्या ब्याकवर्डपणामुळे हावरटपणालाही मर्यादा पडायची. तुमच्या प्रतिसादात 'स्रोतांजवळ गेल्याने जागृती & हेन्स लेस कंझम्प्शन' अशी कारणपरंपरा दिसतेय ती पटणेबल नाही. इफ मॅन कॅन कंझ्यूम, ही विल अ‍ॅज मच अ‍ॅज ही कॅन, नो म्याटर व्हॉट गांधी ऑर तत्सम तत्वज्ञाज़ से.

रुची Tue, 17/06/2014 - 03:06

In reply to by बॅटमॅन

इथे प्रश्न नैतिकतेचा आहे, माणूस हावरट आहे पण माणसाला नैतिक मर्यादाही आहेत असे म्हणायला जागा आहे. म्हणजे उदाहरणार्थ अ‍ॅमेझॉनच्या खोरयातल्या काही आदिवासी जमाती स्वतःच्या भुकेसाठी मिळेल तो प्राणी मारून खातात, अगदी माकडही खातात पण असे करताना एखादे माकडाचे पिल्लू अनाथ झाले तर अनेकदा त्या माकडाच्या पिल्लाला पाळून त्याचा सांभाळ करतात. नैतिकता अनेकदा स्वतःच्या फायद्यासाठी तयार झालेली असते, म्हणजे लहान मासे गळाला लागले तर ते सोडून द्यावेत कारण त्यांचे प्रजनन झाले नाही तर आपल्याला नंतर मासे मिळणार नाहीत. नैतिकतेमगचा हा कार्यकारणभाव लक्षात येण्यासाठी या स्त्रोतांशी आपण जवळ असणे आणि त्याचे परस्परसंबंध ज्ञात असणे महत्वाचे असते. केवळ तंत्रज्ञानाच्या अभावामुळे हवरटपणाला मर्यादा पडायची याच्याशी असहमत, त्या हावरटपणाला मर्यादा पडायची ती या स्त्रोतांच्या क्षमतांच्या आकलनामुळे आणि त्याच्या आपल्या आयुष्यावर पडणार्या प्रत्यक्ष परिणामांमुळे. एकदा दृष्टीआड सृष्टी झाली की त्याच्या नैतिकतेचे (पुन्हा अनेकदा स्वतःच्याच फायद्यासाठी निर्माण झालेल्या), भान सुटते. मला थाई वेठबिगारांच्या पिळवणूकीबद्दल कळले तर स्वस्त कोलंबी मिळाली तर ती कोठून आणि कशी आली याचे हे समजल्याने मी ती न विकत घेण्याचे ठरविते पण मला ज्ञानच नसेल तर मी तो निर्णय घेऊच शकत नाही, मी सध्या इथे ओव्हरकंझम्प्शनचा मुद्दा आणलेला नाही.

गब्बर सिंग Tue, 17/06/2014 - 04:25

In reply to by रुची

मला थाई वेठबिगारांच्या पिळवणूकीबद्दल कळले तर स्वस्त कोलंबी मिळाली तर ती कोठून आणि कशी आली याचे हे समजल्याने मी ती न विकत घेण्याचे ठरविते पण मला ज्ञानच नसेल तर मी तो निर्णय घेऊच शकत नाही

हा एक मुद्दा वेगळा धागा काढण्याइतपत बळकट आहे.

प्रश्न - (प्रश्न विचारताना मी अनेक गृहितके करीत आहे) - जे वेठबिगार होते त्यांना उत्पन्नाचा इतर कोणताही मार्ग नसेल व असे इतर कोणतेही कौशल्य नसेल की ज्याच्या जोरावर ते आपला उदरनिर्वाह चालवू शकतील. अशी जर परिस्थिती असेल तर ? तुम्ही त्यांनी प्रोड्युस केलेल्या उत्पादनावर अघोषित बहिष्कार टाकून त्यांच्या समस्यांमधे भर घालत नाही आहात का ?

--

मला नेमके काय म्ह्णायचे आहे - नैतिकता ही पर्व्हेझिव्ह नसते. व नसावी. व्यक्तीगत व लोकल असते. And even after acquiring the knowledge/information individuals will not do the right thing (ethical action). प्लेटो ने सुद्धा हीच मिष्टेक केलेली होती त्याबद्दल थॉमस काहिल ने लिहिलेले आहे.

रुची Tue, 17/06/2014 - 20:10

In reply to by गब्बर सिंग

प्रतिप्रश्न - (वेठबिगारी हा मी स्लेव्हरी साठी पर्यायी शब्द म्हणून वापरला होता.) मी वर लिंक दिलेला लेख तुम्ही वाचला होतात का? जे वेठबिगार (स्लेव्हज टू बी प्रिसाईज) आहेत त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध मोबदला न देता, मारहाण आणि अत्याचार करून काम करायला लावले जाते आहे. त्यांना जनावरांप्रमाणे विकले जाते आहे, त्यांनी शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त कामे करावी म्हणून त्यांना औषधे दिली जात आहेत. या लोकांना उत्पन्नाचा इतर कोणताही मार्ग नसेल व असे इतर कोणतेही कौशल्य नसेल तर मग स्लेव्हरी कायदेशीर करावी का?
त्यांनी प्रोड्युस केलेल्या उत्पादनावर अघोषित बहिष्कार टाकून मी स्लेव्हरीविरुद्ध आवाज करते आहे. जे गरीब होते ते आज स्लेव्हज आहेत त्यामुळे माझ्या अघोषित बहिष्कारामुळे त्यांच्या समस्यांमध्ये भर पडण्याचा संबंधच नाही पण त्यांच्यावर अत्याचार करून नफा कमावणार्या दलालांच्या समस्यांमधे मात्र नक्की भर पडेल. बाकी प्लेटो वगैरे जाऊ द्या हो, एव्हरीथिंग इज एथिकल इन कार्पोरेटायझेशन :-). असो.

गब्बर सिंग Wed, 18/06/2014 - 02:15

In reply to by रुची

रुची, ओह येस. तुमचा लेख मी वाचला होता. व स्लेव्हरी च्या बाजूने माझा मुद्दा नव्हताच. व कधीच असणार नाही. स्लेव्हरी वर संशोधन झालेले आहे. स्लेव्हरी ची कारणे, परिणाम, स्वरूप, इतिहास, व्याप्ती वगैरे. नुकतेच निवर्तलेले रॉबर्ट फॉगेल यांनी यावर संशोधन केलेले व लिखाण केलेले आहे. माझा उद्देश वेगळा होता. मी नैतिकतेच्याच तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्याचा दुसरा पैलू चर्चेस पुढे आणू इच्छित होतो. But you want to keep things simple. I am ok with that.

-----

या लोकांना उत्पन्नाचा इतर कोणताही मार्ग नसेल व असे इतर कोणतेही कौशल्य नसेल तर मग स्लेव्हरी कायदेशीर करावी का?

१) नाही. माझे असे मत कधीही नव्हते व कधीही असणार नाही.
२) माझे मत नेमके उलट आहे. कोणासही तिच्या/त्याच्या इच्छेविरुद्ध कोणतीही कृती करण्यास भाग पाडणे हे चूक.
३) त्या व्यक्तीच्या भल्यासाठी असले तरी ही चूक. (हे अनेकदा शक्य नसते. अवघड असते.).
४) I like to think that I am a defender of liberty.

------------

(उपरोध मोड ऑन)

माझ्यावर "टोकाचा" व्यक्तीस्वातंत्र्यवादी असल्याचे आरोप झालेले होते. आज तुम्ही माझ्यावर कोणताही आरोप केला नाहीत हे खरे आहे पण "स्लेव्हरी कायदेशीर करावी का? " हा प्रश्न विचारून माझ्यावर टोकाचा व्यक्तीस्वातंत्र्यवादी असा आरोप करणार्‍यांना चोख उत्तर दिलेत. धन्यवाद. :-)

(उपरोध मोड ऑफ)

बॅटमॅन Tue, 17/06/2014 - 14:51

In reply to by रुची

थाई-कोलंबी-संबंध तुम्हांला कळाला तर तुम्ही घेणार नाही हे तुमच्यापुरते ठीक आहे. बहुसंख्य जन्ता असेच करते असे म्हणायला आधार आहे का? असेल तर तुमच्याशी सहमत आहे. नै म्हणजे तुमच्यासारखा विचार करणारे बरेच लोक नेटवर दिसतात, पण त्यांची संख्या किती आणि तेवढ्यापुरती टिपे गाळून पुन्हा ये रे माझ्या मागल्या करणारांची संख्या किती?

'न'वी बाजू Tue, 17/06/2014 - 20:58

In reply to by बॅटमॅन

थाई-कोलंबी-संबंध तुम्हांला कळाला तर तुम्ही घेणार नाही हे तुमच्यापुरते ठीक आहे. बहुसंख्य जन्ता असेच करते असे म्हणायला आधार आहे का?

थाई-कोलंबी-संबंध तुम्हांआम्हाला कळल्यावर तरीसुद्धा तुम्हीआम्ही (पक्षी: बहुसंख्य) ती घेऊ किंवा नाही, हा प्रश्न पूर्णपणे अलाहिदा. पण म्हणून ती माहितीच मुळात उपलब्ध होऊ नये काय?

त्या माहितीचा उपयोग थाई उत्पादनांवर बहिष्कार करण्यासाठी करायचा, की थाई वेठबिगारांना इतर कौशल्ये शिकवून त्यांना रोजगाराच्या इतर संधी मिळवून देण्यासाठी करायचा, की 'हमखास स्वस्त कोळंबीसाठी थाई ब्राण्ड शोधावा' असा (कन्झुमेरिष्ट) अर्थबोध घेण्यासाठी करायचा, की थाई रंजल्यांगांजल्यांची सेवा करून त्यांना ख्रिस्ती बनवून त्यांच्या आत्म्यांचा उद्धार करण्यासाठी करायचा, की ही माहिती छापलेल्या कागदाचा रद्दी म्हणून (अथवा, पर्यायाने, सुरनळी करून) सुयोग्य वापर करण्यासाठी करायचा, हा पूर्णपणे वेगळा मुद्दा. पण मुळात, ही माहिती सप्रेस करून काय (किंवा, खरे तर, नेमक्या कोणाचा) फायदा होतो? ग्राहकाला निर्णय घेऊ द्या ना या माहितीचा उपयोग कसा करून घ्यायचा ते!

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(पण, अर्थात, ती माहिती सप्रेस व्हावी असा दावा आपण केलेला नाही. आपला मुद्दा, ती माहिती उपलब्ध असूनसुद्धा लोक त्या माहितीस एका ठराविक 'नैतिक' रीतीनेच रिअ‍ॅक्ट करतीलच, असे नाही, असा काहीसा आहे. तो मी मान्य करू शकतो. शेवटी कितीही झाले, तरी माणूस कमीअधिक प्रमाणात स्वतःचे हितसंबंध प्रथम पाहतो.

दक्षिण आफ्रिकेतील वर्णविद्वेषी राजवटीच्या काळात भारतात दक्षिण आफ्रिकेवर व्यापारबंदी होती. याचा अर्थ, कोपर्‍यावरच्या एखाद्या डाह्याभाई पटेलाने द. आफ्रिकेतल्या भारतीय वंशाच्या जनतेला लागतात, म्हणून कुंकवाच्या टिकल्या द. आफ्रिकेला निर्यात केल्या, तर तो त्याकरिता तुरुंगात जात असे. मात्र, तोच डाह्याभाई पटेल जर सुरतेतला हिर्‍याला पैलू पाडणारा कारागीर असता, तर त्याच्यासाठी भारत सरकार स्वतः (स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशनमार्फत) दक्षिण आफ्रिकेतून कच्चा माल आयात करून देत असे. कारण शेवटी पैलू पाडलेल्या हिर्‍यांची निर्यात हा भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारा एक महत्त्वाचा स्रोत होता, आणि त्याकरिता लागणार्‍या कच्च्या मालाकरिता दक्षिण आफ्रिका हा जगातील एक महत्त्वाचा स्रोत होता.)

बॅटमॅन Tue, 17/06/2014 - 22:55

In reply to by 'न'वी बाजू

पण, अर्थात, ती माहिती सप्रेस व्हावी असा दावा आपण केलेला नाही. आपला मुद्दा, ती माहिती उपलब्ध असूनसुद्धा लोक त्या माहितीस एका ठराविक 'नैतिक' रीतीनेच रिअ‍ॅक्ट करतीलच, असे नाही, असा काहीसा आहे. तो मी मान्य करू शकतो.

धन्यवाद.

बाकी सहमत.

आदूबाळ Tue, 17/06/2014 - 22:44

In reply to by रुची

एका जीवाने आपलं पोट भरण्यासाठी आपल्यापेक्षा दुर्बल जीवांचा फायदा करून घेणे
उदाहरण १: कोंबडी अथवा कोलंबी हस्ते-परहस्ते मारून खाणे
उदाहरण २: थाई वेठबिगारांची पिळवणूक करून आपल्यापर्यंत पोचलेला पदार्थ खाणे

नैतिकता उदाहरण २ मध्ये येते. उदाहरण १ मध्ये का नाही?

उदाहरण २ मध्ये दुर्बल जीव हा माणूस आहे आणि उदाहरण १ मध्ये कोंबडी आहे हा फरक आहे का? तसं असेल तर हे एकप्रकारचं रेसिझम नव्हे का?

बॅटमॅन Tue, 17/06/2014 - 23:02

In reply to by आदूबाळ

उदाहरण २ मध्ये दुर्बल जीव हा माणूस आहे आणि उदाहरण १ मध्ये कोंबडी आहे हा फरक आहे का? तसं असेल तर हे एकप्रकारचं रेसिझम नव्हे का?

होय, पण नीतीनियम हे आपण ज्यांना बरोबरचे मानतो त्यांच्या सर्कलमध्येच पाळावयाचे असतात हा सर्वमान्य संकेत आहे. जुन्या काळी जात-धर्म-प्रदेश-लिंग इ. चे कुंपण होते, ते आता सर्व मानवांसाठी सैद्धांतिकदृष्ट्या तरी विस्तारलेय. पण तत्त्वतः कुठल्याही चौकटीत काऽही फरक नाही. कोंबड्या ऐसीवर येऊन आपला निषेध करण्याइतपत, किंबहुना कत्तलखाने व पोल्ट्र्यांतून सुटण्याइतपत स्वतंत्र आणि सामर्थ्यवान नाहीत म्हणून त्यांबद्दल काहीही बोलले आणि त्यांना कसेही वागवले तरी चालते इतकेच. शेवटी बळी तो कानपिळी हेच एकमेव सत्य आहे. विदिन अ स्पीशी अ‍ॅज़ वेल अ‍ॅज इंटरस्पीशी.

काही कुंपणे ओके तर काही नॉन-ओके असतात इतकेच काय ते. त्याची कारणेही दरवेळेस अनिवार्य असतीलच असेही नाही.

रुची Tue, 17/06/2014 - 23:16

In reply to by आदूबाळ

तुमच्या प्रश्नातील

आपलं पोट भरण्यासाठी

हे जाड ठशातील शब्द महत्वाचे आहेत. नैतिकतेत "आपलं पोट भरण्यासाठी" केलेल्या गोष्टी प्रकृती असाव्यात.

दुसरे असे की, उदाहरण १ मध्ये कोंबडीला न मारून खाण्याचा पर्याय शाकाहार असू शकेल पण मग शाकाहारात आपल्यापेक्षा दुर्बल अशा वनस्पतींची हत्या होतच असते त्यामुळे मनुष्य हा मिश्राहारी प्राणी आहे असे गृहित धरले तर हा नैतीक प्रश्न तयार व्हायला नको.

उदाहरण २ मध्ये थाई वेठबिगारांची पिळवणूक न करता उपलब्ध असणारे अनेक मांसाहाराचे पर्याय उपलब्ध असू शकतात जे तुलनेने महाग असतील कारण त्यात कामगारांना पुरेसा मोबदला मिळालेला असेल. असे पर्याय उपलब्ध असताना केवळ आर्थिक लाभासाठी (पोट भरण्यासाठी नव्हे) पिळवणूकीला प्रोत्साहन मिळेल अशा उद्योगांना समर्थन देणे यात नैतिक तडजोड करावी लागेल.

आदूबाळ Wed, 18/06/2014 - 00:25

In reply to by रुची

पोट भरण्यासाठी म्हणजे मला survival हा अर्थ अभिप्रेत नव्हता.

अजून अमूर्त करतो:

एका जीवाने आपल्याला +१ करण्यासाठी आपल्यापेक्षा दुर्बल जीवांना -१ करणं हे काही वेळा योग्य आणि काही वेळा अयोग्य असं का?

तुमच्याशी कौबक खेळतोय असं कृ समजू नये. बॅटमॅनचा मुद्दा पटलेला आहे. आणि गब्बरभौंचा "नैतिकता pervasive नसते" हाही.