Skip to main content

अपर्णा रामतीर्थकर

मन यांनी "सो बॅड दॅट इटस गुड" वर्गातील अपर्णा तीर्थकर यांचा युट्यूब वरील १ तासाचा १ व्हिडीओ पाहीला.काही गोष्टी पटल्या तर काही नाही. स्त्रियांनी स्त्रियांना समजावून घावे/ सन्मान द्यावा/सासूशी आपुलकीने वागावे हे मुद्दे पटण्यासारखे वाटले.
अंगभर कपडे घालावे/रांगोळी यावी/मुलींनी उंच स्वरात बोलू नये - हे काही मुद्दे वाद होण्यासारखे आहेत म्हणजे काहींना पटतील तर काहींना नाही.
पुरषाचा घरात धाक असावा ही बाब मला आक्षेपार्ह वाटली नाही. नवरा घरातून पळून गेलेल्या अमेरीकन स्त्रिया पहाण्यात आहेत. बेबंद (हवे ते खा/ल्या/वागा) असे जीवन जगणार्‍या या स्त्रिआयांच्या आयुष्याला विशेष वळण पाहीले नाही. कोणी विचारेल हवे तसे खा/ल्या/वागा यात वावगे काय? तर मला नक्की सांगता येणार नाही. पण एकमेकांवर अंकुश महत्त्वाचा असतो या विचारांची मी आहे. तेव्हा मला त्यात वावगे वाटते.

बाकी अपर्णाताईंच्या कथनानुसार त्या घेत असलेली वृद्धांची काळजी, कुटंबव्यवस्था ढासळू नये म्हणून त्या घेत असलेले अथक परीश्रम हे मला कौतुकास्पद वाटतात. लिव्ह इन का काय ते ग्लॅमरस वाटत असले तरी सिंगल पेरेंटींग किंवा म्हातारपणी एकाकीपण तितकेसे ग्लॅमरस नसावे असा कयास आहे.

मुलीच्या संसारातील, मुलीच्या आईचा अनाठाई हस्तक्षेप या विषयावरचे त्यांचे मत अतिशय अत्यंत पटण्यासारखे आहे. खरच अशा मुली पाहीलेल्या आहेत ज्यांची आई सकाळी ६ वाजल्यापासून ते १० पर्यंत फोनाफोनी करुन, नको ते सल्ले देऊन, संसाराची वाट लावते. समोरचे ताट द्यावे पण बसायचा पाट देऊ नये हा (अर्थात म्रुत्यूपत्र करा पण जीवंत असेपर्यंत मुलाना इस्टेट देऊन टाकू नका) वृद्धांना दिलेला सल्लाही तसाच पटण्यासारखाच आहे.

अस्वल यांच्या धाग्यावर अपर्णाताईंवर माफक टीका झालेली आहे. ती येथे सांगोपांग येऊ द्या. मला तरी माझी मते तपासून पहाण्याची संधी मिळेल. का प्रतिगामी शिक्का मारुन उगाच एखाद्याला(अपर्णाताई) झोडायचे? कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी झटण्यात, प्रवाहाविरुद्ध पोहण्यात आक्षेपार्ह काय आहे ते कळले तर बरे होईल.

अर्थात वर सांगीतल्याप्रमाने, मी एकच व्हिडीओ पाहीला आहे. अन्य अजून पहायचे आहेत.

मिसळपाव Mon, 02/06/2014 - 21:28

मी दोन मिनीटांचा भाग पाहिला त्यातल्या एका व्हिडीओमधला. त्यावरून माझा कयास आहे की "Its not just that what you say is important but how you say it is too" याचं उदाहरण म्हणून त्यातला एखादा व्हिडीओ देता येईल. मुद्दे बरोबर असले तरी देहबोली अशी काहि आहे....! जास्ती भाग पाहिल्यावर / पाहिला तर अजून टंकेन.

आदूबाळ Mon, 02/06/2014 - 21:45

आमच्या मित्रांच्या कट्ट्यावरची संज्ञा वापरायची तर या बै "पेंगा" कुळातल्या आहेत. पेंटर गाडगीळ - स्वतःची रंगवणारे लोक. मी पाहिलेल्या व्हीडियोत त्या नव्वद टक्के वेळ स्वतःबद्दल बोलत होत्या. पाचशे चौतीस दिवस प्रवास केला, बिस्लेरी वापरत नाही -प्रत्येक गावचं पाणी पिते, वकील असून वकिली केली नाही नाहीतर कोट्यावधी रुपये कमावले असते, सोलापुरात समाजसेवा करते, वगैरे वगैरे वगैरे. या आदर्शवादी होलियर दॅन दाऊ आणि समोरच्याला चू समजून पेट्रनाईज करणार्‍या लोकांचा अपार वैताग येतो.

अस्वल Mon, 02/06/2014 - 23:22

In reply to by आदूबाळ

काही गोष्टी -
१. ह्या बाई बरेचदा "बाबारे... तुला काहीच कळत नाही. मी सांगते" अशा सुरातच बोलतात.
२. आवेश जबरदस्त असतो-अगदी साध्या साध्या वाक्यांनाही. जे अगदीच विचित्र वाटतं. म्हणजे "मी-हे-केलं" ह्यासारख्या नगण्य गोष्टीतले जाणीवपूर्वक घेतलेले पॉजेस असह्य होतात.
३. बोलण्याचा content तर लोलवणारा आहेच, पण तो सोडून दिला, तरी त्यांची बोलण्याची शैलीच महालोलवणारी आहे.

Nile Mon, 02/06/2014 - 21:59

या बाईंना जे आई म्हणतात ते सगळे गाढव आहेत. बाईंनी सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीचं अनुकरण करणारे शतमूर्ख आहेत.

............सा… Mon, 02/06/2014 - 22:15

In reply to by Nile

मताचा आदर आहे. ताईंची प्रखर / टोकाची ब्राह्मण्यभक्ती, आंतरजातीय विवाहविरोध अन ब्राह्मण वकीलच गाठा व "आपले" पैसे "आपल्यातच" ठेवा वगैरे काही मते न पटण्यासारखी व काही च्या काहीच आहेत पण काही मते व्यावहारीक तसेच कुटुंबव्यवस्था पूरक आहेत. अशी व्यावहारीक मते पटतात. म्हणजे अगदी टाकाऊ व गाढव/शतमूर्ख आदि विशेषणे लावण्यासारखे काही त्या बोलत नाहीत असे वाटते.

'न'वी बाजू Wed, 04/06/2014 - 03:51

In reply to by ............सा…

ब्राह्मण वकीलच गाठा"आपले" पैसे "आपल्यातच" ठेवा वगैरे काही मते...

हा सल्ला त्या फक्त ब्राह्मणांनाच देतात का? पक्षी, त्यांचा एकूण आड्यन्स हा ब्राह्मणांपुरताच मर्यादित आहे का?

तसे असल्यास, आधीच ब्राह्मण साडेतीन टक्के (ग्रामीण भागात बहुधा त्याहूनही कमी), त्यातले किमान एक तृतीयांश जरी या बाईंना 'हुडूत्!' म्हणतात असे जर गृहीत धरले, तर यांचा नेट आड्यन्स जेमतेम दोन-सव्वादोन टक्के. हात्तिच्या!

आणि, अशा परिस्थितीत, ब्राह्मणेतरसुद्धा (ऑफ ऑल ष्ट्रैप्स) त्यांच्या असल्या या व्याख्यानांना आड्यन्स म्हणून जर हजेरी लावत असतील (व्हेन द लेक्चर्स आर क्लियरली नॉट टार्गेटेड टुवर्ड्ज़ देम), तर (१) त्यांच्याकडे उधळायला फावला वेळ पुष्कळ आहे (नाहीतर आपल्याला उद्देशून नसलेल्या व्याख्यानांना कोण कशाला झक मारायला जाईल?), आणि (२) त्यांच्यासारखे महामूर्ख तेच (फॉर प्रेटी मच द सेम रीझन). अशा परिस्थितीत, त्याबद्दलचा दोष बाईंना देता येईल काय?

('ते हिंदू पहा कसे पापी आहेत, ते येशूला मानत नाहीत नि भरपूर सारे खोटे देव मानतात' असली प्रवचने देणार्‍या / अशी पत्रके वाटणार्‍या एखाद्या समारंभास आपण एक हिंदू म्हणून - आपण आपली अक्कल गहाण टाकली नसल्यास - मनोभावे उपस्थित राहाल काय? हे काल्पनिक उदाहरण नाही. भर दिवाळीत 'आज दिवाळी, हिंदूंचा दिव्याचा सण! पण इतके दिवे उजळत असूनसुद्धा त्यांच्या अंतःकरणात मात्र अंध:कारच आहे. त्यांच्या अंतःकरणात प्रकाश पडो, अशी आपण प्रार्थना करू या!' अशी पत्रके, मुसलमानांच्या एखाद्या सणाला त्यांच्याबद्दलही अशीच काहीबाही पत्रके, ज्यूंच्या सणादिवशी त्यांना सटली अपमानास्पद काहीबाही पत्रके वगैरे काढून खाजगीमध्ये आपापसात वाटणे, असले उपद्व्याप एका मोठ्या ख्रिस्ती पंथाकडून आमच्या अटलांटात एके काळी सर्रास घडत असत. याविरुद्ध बोंबाबोंबही होत असे. त्यात त्यात्या धर्माच्या संघटना आणि स्थानिक प्रिंटमीडियातले लिबरल्स आघाडीवर असत - गो लिबरल्स!)

मी Mon, 02/06/2014 - 22:18

कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी

त्या सांगतात तशी कुटुंबव्यवस्था टिकावी का? माझ्यामते त्यांनी सांगितलेल्या कुटुंबव्यवस्थेत स्त्रीचे शोषण होण्याची शक्यता अधिक असल्याने नको. त्यामुळे त्यांच्या मूळ उद्देश्याशीच फारकत असल्याने त्यांचे इतर मुद्दे पटणे कठीण आहे.

............सा… Mon, 02/06/2014 - 22:24

In reply to by मी

कुटुंबव्यवस्था टिकावी या मताची मी असल्याने त्यांच्या कार्याशी (एका विशिष्ठ समाजापुरता का होईना) सहमत आहे. कुटुंबव्यवस्था १००% फुलप्रूफ नाहीच. कुटुंबव्यवस्थेत काही % स्त्रीयांचे शोषण होऊ शकते पण जास्त प्रमाणात ते टळते असे वाटते. अर्थात लिव्ह इन चे फायदे-तोटे पहायला किमान एक पीढी जावी लागेल.

नितिन थत्ते Thu, 05/06/2014 - 09:23

In reply to by ............सा…

कुटुंबव्यवस्था टिकावी हे ठीक. पण बैंना अपेक्षित असलेल्या 'असल्या प्रकारच्या' कुटुंबसंस्थेच्या ठिकर्‍या ठिकर्‍याच झाल्या तर बरं.....

घनु Thu, 05/06/2014 - 12:14

In reply to by ............सा…

आपली लग्नाआधी काही प्रेमप्रकरण(णं) असेल तर ते नवर्‍याला सांगू नका, म्हणजे अगदी त्यांच्या शैलीत त्या अगदी आवर्जून (सां गा य चं नाही) हे टाळाच असं सांगतात. कबूल आहे की हे सांगितल्याने नवर्‍याच्या डोक्यात संशयाचं भूत जाईल पण त्याला ते इतरांकडून कळालं तर ही गोष्ट कुटूंब टिकायला मदत करेल का?
त्या स्वतः म्हणतात मी कोर्टात वकील आहे (होते), पण एकदा घरी पोहचले की कोट आणि डोकं दोन्ही काढून ठेवते. म्हणजे कुटुंबव्यवस्था टिकावी म्हणून स्त्रीने जास्त डोकंच लावू नये काय? मी फार टोकाचा अर्थ काढतही असेन त्यांच्या बोलण्याचा पण त्यांना म्हणायचं काय आहे की नवरा म्हणेल तसं वागा. खरं-खोटं, चुक-बरोबर, इगो-राग सगळं सगळं गुंडाळून ठेवा आणि बिंडोक पणे घरात वावरा. हे असं वागलं तर नवरा बायकोचं काय पण कुठलं ही नातं टिकून राहिलच ना. पण ते वरवर टीकलेलं दिसेल, हे सगळं निमूटपणे सहन करणार्‍याची (पक्षी करणारीची) खरंतर फरफटच होणारे - पण ते क्षूल्ल्क आहे त्यांच्यादृष्टीने, महत्त्वाचं काय तर कुटुंबव्यवस्था टिकणे by hook or crook.

त्यांनी योग्य, सर्वांना पटेल, आजच्या काळात पण ते अंगीकारल्याने ज्याचा त्रास होणार नाही असे उपाय सांगावे कुटुंबव्यवस्था टिकण्यासाठी, मग भारतीयच काय इतर देशातले लोक पण ते अवलंबतील. कुटुंबव्यवस्था टिकून रहावी हे कोणाला वाटत नाही. पण त्यासाठी हा काय अघोरीपणा/मागासलेपणा.

ह्या खालच्या गोष्टी ऐकल्या की संताप होतो :
१. मासिक पाळी हे स्त्रीला निसर्गाने दिलेलं दुबळेपण आहे.
२. स्त्रीला पुरुषाचा धाक असायलाच हवा.
३. लग्ना नंतर स्त्रीला मित्र हवेतच कशाला.
४. नवर्‍यासमोर फोन वर जास्त बोलायचंच नाही, त्याला संशय येतो (केवळ फोन वर जास्त बोलून नवर्‍याला असे तसे संशय येत असतील मुळात तसं काही नसतांना तर अश्या चिप-माईंडेड नवर्‍या बरोबर बाईने रहावंच का?)
५. लहान मुलांना दुसर्‍या बेडरूम मधे झोपवणारे पालक म्हणजे काहीतरी घाणेरडे नी बेजबाबदार.
६. बाईने कमीपणा घेतला (भले नवरा चुकीचा असला तरी) तर नवरा जास्त प्रेम करतो.
७. मेक-अप करणार्‍या आणि फॅशनेबल ब्लाऊज, तंग लेगींग घालणार्‍या "आया" म्हणजे चिप असतात. त्यांना काय नट्या व्हायचं असतं का?

ही बाई स्वतः का नऊवारी साडी घालत नाही आपल्या परंपरेप्रमाणे, का गळाबंद नी संपूर्ण भायांचे ब्लाउज घालत नाही जर फॅशनेबल ब्लाऊज हीला चिप वाटतात तर. स्वतः काळाप्रमाणे नी सोयीप्रमाणे बदलणार, पण इतर बायांनी तसे बदल, पुढारलेपणा केला तर त्यांच्या दृष्टिने त्या चिप्/बेजबाबदार, कुटूंबद्रोही ठरतात.

त्या जसं म्हणतात, घरात जातांना मी डोकं काढून ठेवते त्या प्रमाणे मला तरी वाटतं की त्या अश्या प्रवचनांना जातांना पुन्हा डोकं घालायचं विसरतात म्हणून ही अशी बडबड बाहेर पडत असावी.

गब्बर सिंग Thu, 05/06/2014 - 12:34

In reply to by घनु

सहमत आहे.

यातले २ व ६ एकत्र केलेत तर स्त्री चे अनन्वित शोषण होते. प्रेम सोडाच ... पण सहानुभूती सुद्धा मिळत नाही.

ग्रेटथिंकर Thu, 05/06/2014 - 22:00

In reply to by घनु

अपर्णा रामतीर्थकर यांचे एकच म्हणणे आहे, वास्तवात येऊन विचार करा.
बायकांनी कीतीही प्रयत्न केला तरी त्या पुरुषांशी प्रत्येक बाबतीत बरोबरी करु शकत नाहीत असे त्यांना सांगायचे आहे.
आजकालच्या स्त्रीयांना मुळात आपण स्त्री आहोत याचाच सबकॉन्शियसली इन्फेरीअर कॉम्पलेक्स असतो असे माझे वैयक्तीत मत आहे .
पुरषांसारखी हेअर स्टाइल, त्यांच्याप्रमाणे पेहराव करण्याकडे बायकांचा जास्त कल असतो, याचे कारण कुठेतरी आपण 'पुरुष' नाही याची त्यांना 'खंत' असते.
पुरुष जे जे करतात तेच आपण केले की आपण स्त्रीवादी झालो असा त्यांचा अजब तर्क असतो
वास्तवात स्त्रीत्वाचा प्रचंड तिटकारा, पुरुषत्वाचा सुप्त हेवा वाटणार्या बायकाच स्त्रीवादी असतात.
पुरषांचे अनुकरण करणे हेच मुळात पुरुष आपल्यापेक्षा श्रेष्ट आहेत असे मानने होय , त्यामुळे आपले डोमेन प्रत्येकाने सांभाळावे, वेगळे डोमेन क्रिएट करावे अनुकरणाने फक्त वाद वाढेल.

अस्वल Thu, 05/06/2014 - 22:58

In reply to by ग्रेटथिंकर

आजकालच्या स्त्रीयांना मुळात आपण स्त्री आहोत याचाच सबकॉन्शियसली इन्फेरीअर कॉम्पलेक्स असतो असे माझे वैयक्तीत मत आहे

आपण स्त्री आहात का?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 05/06/2014 - 23:15

In reply to by अस्वल

बायका असतात स्वार्थी व फाटक्या तोंडाच्या. हे बघा सर्व्हे. ते सरसकटीकरण तसंच पुढे वाढवायचं असेल तर काय निष्कर्ष निघतो हे वेगळं सांगत नाही; कसें?

आणखी एक विदाबिंदू -
प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत बेअक्कलपणे बोलणे वागणे हा बायकांचा गुणधर्म अतिस्वातंत्रण्याने वाढीस लागतो.

अवांतर - Self-proclaimed profesies बनवायला किती वेळ लागतो पहा!

अतिशहाणा Thu, 05/06/2014 - 23:20

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्त्रीलिंगी नावांची वादळेही पुल्लिंगी नावांच्या वादळांपेक्षा जास्त हानीकारक असतात

http://www.washingtonpost.com/blogs/capital-weather-gang/wp/2014/06/02/…

Nile Fri, 06/06/2014 - 00:52

In reply to by अतिशहाणा

स्त्रीयांची नावे दिल्याने पुरूष त्या वादळांना फारसे महत्त्व देत नाहीत म्हणून जास्त हानी होते. हे पुरूष वर्चस्ववादी बरोबर विद्याचा उलटा अर्थ काढून शतकानुशतके समाजाची फसवणूक करत आहेत!

गब्बर सिंग Fri, 06/06/2014 - 06:04

In reply to by ग्रेटथिंकर

पुरषांसारखी हेअर स्टाइल, त्यांच्याप्रमाणे पेहराव करण्याकडे बायकांचा जास्त कल असतो, याचे कारण कुठेतरी आपण 'पुरुष' नाही याची त्यांना 'खंत' असते.

तुमचे वैयक्तिक मत कोणत्या आधारावर बनवलेले आहे ते जाणून घेऊ इच्छितो. मी हे विचारतोय याचे कारण हे - की - पुरुषांचे अनुकरण करणे हा स्त्रियांचा कल इतर बाबतीत सुद्धा दिसावा. म्हंजे -

१) साड्यांची बाजारातील मागणी कमी कमी होत जाऊन ... शर्ट, पँट ची मागणी वाढत जावी. (याचा अर्थ - पानेरी, लाजरी, कजरी, रंगोली सारख्या रानडे रोडवरच्या दुकानांनी दिवाळखोरी जाहीर करावी - असे नाही. पण त्यांच्या मालाला पुरेसा उठाव नाही अशी परिस्थिती निर्माण व्हावी.).

२) चुडीदार ची मागणी कमी होऊन शर्ट, पँट ची मागणी वाढत जावी.

३) या तो - कॉस्मेटिक्स (लिप्स्टिक, pedicure / manicure ) यांचे मार्केट कोलमडून पडावे. (या फिर - लिपस्टिक, टिकल्या/बिंदी, नेल पॉलिश यांच्या दुकानात पुरुष व स्त्रिया दोघेही जवळपास सारख्याच संख्येने दिसावेत.)

___________________________________________________________________

ज्यात त्यात इकॉनॉमिक्स घुसडण्याची आमची घाणेरडी सवय आहे त्याबद्दल हमका माफी दैदो.

राजेश घासकडवी Fri, 06/06/2014 - 10:27

In reply to by गब्बर सिंग

तुमचे वैयक्तिक मत कोणत्या आधारावर बनवलेले आहे ते जाणून घेऊ इच्छितो.

मला वाटतं ते फ्रॉइडच्या 'पीनस एन्व्ही थियरी' बद्दल बोलत असावेत. स्त्रियांना पुरुषांबद्दल आकर्षण का वाटतं याची कारणपरंपरा फ्रॉइड खालीलप्रमाणे देतो.
- मुलींना सर्वात प्रथम लैंगिक आकर्षण आईविषयी वाटतं.
- मुलींना कळतं की आपल्याला ते 'अंग' नाही. त्यामुळे त्यांना स्वतःविषयी न्यूनगंड होतो. आणि आईबरोबर लैंगिक संबंध ठेवता येणार नाहीत हे लक्षात येतं.
- त्या ते मिळवण्याचा प्रयत्न करतात, म्हणून बापाकडे आपलं आकर्षण वळवतात.
- आपलं ते अंग कापून टाकल्याबद्दल त्या आपल्या आईवर चिडतात. आईने ते कापून टाकण्याचं कारण मुळात आपलं बापाबद्दलच आकर्षण अशी धारणा त्या करून घेतात.
- वडिलांबद्दल असलेल्या लैंगिक आकर्षणामुळे त्या आईला नाहीसं करून तिची जागा घेण्याचा प्रयत्न करतात.
- त्या आईसारखंच वागतात कारण तिची जागा घ्यायची असते.
- या लैंगिक आकर्षणापोटी शिक्षा होईल अशी त्यांना भीती असते.
- म्हणून त्या विस्थापन हा डिफेन्स मेकॅनिझम वापरून वडिलांऐवजी सर्वसाधारण पुरुषांकडे आपलं आकर्षण वळवतात.

ग्रेटथिंकर Fri, 06/06/2014 - 11:13

In reply to by राजेश घासकडवी

अगदी फ्रॉइडीयन सायकोलॉजी नाही पण त्या सदृश्य, पाश्चात्य संस्कृतीविषयी जे सुप्त आकर्षण आणि हेवा भारतीयांत असतो तसे आकर्षण बायकांना पुरुषत्वाविषयी असते.

राजेश घासकडवी Fri, 06/06/2014 - 12:07

In reply to by ग्रेटथिंकर

बायकांना पुरुषत्वाविषयी असलेलं आकर्षण - हे फक्त भारतीय बायकांनाच असतं की पाश्चात्य बायकांनाही असतं?

घनु Fri, 06/06/2014 - 09:15

In reply to by ग्रेटथिंकर

पुरषांसारखी हेअर स्टाइल, त्यांच्याप्रमाणे पेहराव करण्याकडे बायकांचा जास्त कल असतो, याचे कारण कुठेतरी आपण 'पुरुष' नाही याची त्यांना 'खंत' असते.

खुपच वरवर आणि ढोबळ पणे केलेलं निरीक्षण आणि त्याचा एवढा गहन निष्कर्ष अगदी सहज काढलात तुम्ही हे खेदाने म्हणावं वाटतं.

तुलनेने (पूर्वीपेक्षा) आजकालचे पुरुष मोठे केस ठेवतात, पोनी ठेवतात, केस रंगवतात, कान टोचून घेतात, लेगिंग सारख्या जिन्स पँट घालतात, फेशियल/क्लिनझनींग करतात, बरेच कॉस्मेटीक्स वापरतात (आजकाल तर खास पुरुषांसाठी असे क्रिम-पावडर असतात) फँन्सी ब्रेसलेट घालण्याचं पण प्रमाण वाढलय, वरवर पाहिलं तर बर्‍याच मुलांचा पाककला हा छंद होऊ लागला आहे. आणि बरंच काही. तर मग तुमचं वैयक्तिक मत पटवून घ्यायचं झालं तर मला माझं वैयक्तिक मत असं मांडावं लागेल की "आजकालच्या पुरुषांना मुळात आपण पुरुष आहोत याचाच सबकॉन्शियसली इन्फेरीअर कॉम्पलेक्स असतो " ह्या विधानाला तुमची काही हरकत नसावी.

ग्रेटथिंकर Fri, 06/06/2014 - 10:36

In reply to by घनु

जीन्स शर्ट तर बायका चढत्या दराने वापरतातच आहेत ,त्याबरोबरच साडी,चुडीदारचे/पंजाबीचे प्रस्थ कमी होऊन 'टॉप' नावाचा एक शर्टचाच(सदराटाईप) प्रकार सर्वत्र दिसायला लागला आहे ,( इथेही पुरुषी कपडेसदृश्य पेहराव करुन पुरषांचेच अनुकरण)
आजकालच्या मुली बांगड्या घालत नाहीत... तर तर... त्या पुरुषी दिसायला पाहिजे की नै
एकंदरच काय प्रत्येक गोष्ट पुरुषी स्टाईलमध्ये बसवायची व स्त्रीवादी व्हायचं.
भविष्यात एखादे असे औषध इंजेक्शन टॅबलेट आली जी स्त्रीचे संपुर्ण पुरुषात रुपांतर करेल तर जगातल्या समद्या बाया लगेचच पुरुष व्हायला जातील.

ग्रेटथिंकर Fri, 06/06/2014 - 11:05

In reply to by सविता

वेगळे मत मांडले की ट्रोल ,छान....
ऐसीचा हाच प्रॉब्लेम आहे, वेगळे मत मांडले की निरर्थक श्रेणी ,हुजरेगिरी केली कि मार्मिक श्रेणी.

नितिन थत्ते Fri, 06/06/2014 - 13:51

In reply to by ग्रेटथिंकर

या दोन चित्रांवरून तुम्हाला काय वाटते? स्त्रीने पुरुषासारखा पोषाख केला आहे की पुरुषाने स्त्रीसारखा?

बॅटमॅन Fri, 06/06/2014 - 14:25

In reply to by नितिन थत्ते

मला तो काळा पठाणी कुर्ता घातलेला पुरुषच फक्त दिसतोय. दुसरे चित्र दिसत नाही. त्याबद्दल बोलायचे तर हा पारंपरिक पोषाख आहे तिथला, परवापरवाचा नाहीये..

मी Fri, 06/06/2014 - 15:33

In reply to by नितिन थत्ते

स्त्रीने पुरुषासारखा पोषाख केला की ते उदारमत ठरते पण ह्या उलट पुरुषाने स्त्रीसारखा पोषाख केला तर ते क्रॉस ड्रेसिंग ठरते, हे संस्कृतीसापेक्ष असले तरी त्यात पुरुषप्रधानसंस्कृतीची झाकच अढळते.

बॅटमॅन Fri, 06/06/2014 - 15:35

In reply to by मी

अर्थातच.

पण याला उपाय काय? त्या उदारमताचा निषेध की अजून काही ;)

नितिन थत्ते Fri, 06/06/2014 - 15:40

In reply to by मी

वरच्या उदाहरणात / चित्रांत दोघांनीही क्रॉस ड्रेसिंग केलेले नाही.

मी Fri, 06/06/2014 - 16:18

In reply to by नितिन थत्ते

इथल्या मुलींना विचारू,

@ऐसीच्या तमाम सदस्य मुलींनो - मुलीचे टॉप तसेच्या तसे मुलांना किंवा उलट क्रिया करणे शक्य आहे काय? असे केले आहे काय?

बॅटमॅन Fri, 06/06/2014 - 16:39

In reply to by सविता

च्यायला..१५० तरी करा की.

अन मुळात हा प्रष्ण इच्यारून तुम्हीही ट्यार्पी वाढवलाच किनै?

अन त्याहीपेक्षा मुळात, १०० पेक्षा जास्त प्रतिसाद असले तर लोक धागा सोडून प्रतिसादच वाचतात अन वाढवतात हे तुम्हांला ठौक असू नये? जालकर आहात का कोण ;)

मन Fri, 06/06/2014 - 16:42

In reply to by बॅटमॅन

+१
कुठे फेडाल ही पापे सविताताइ? (की सविता-आई? कारण आईला कुणी नाही म्हणू शकत नाही!)

ह्या अशाच पापांची शिक्षा यूट्यूबरुपाने मिळते.

नितिन थत्ते Fri, 06/06/2014 - 17:26

In reply to by बॅटमॅन

>>अन मुळात हा प्रष्ण इच्यारून तुम्हीही ट्यार्पी वाढवलाच किनै?

मुळात सवितातैंनी प्रश्न वि चा रा वा च क शा ला ?

............सा… Fri, 06/06/2014 - 17:33

In reply to by सविता

त्या बाई वर्थ नसतील पण त्यायोगे होणारी विचारांची देवाणघेवाण वर्थ आहे, त्यायोगे कोणाकोणाची (दोन्ही गटातील) मते, पहाण्याचा दृष्टीकोन बदलला तर वर्थ आहे. निदान मते बदलण्याची प्रोसेस सुरु झाली तरी वर्थ आहे. अन प्रिसाईझली याच कारणाकरता काहीजण इथे येत असण्याची शक्यतादेखील आहे (वाचनमात्र अथवा सदस्य कसेही)

नितिन थत्ते Fri, 06/06/2014 - 10:59

In reply to by ग्रेटथिंकर

>>पुरषांसारखी हेअर स्टाइल, त्यांच्याप्रमाणे पेहराव करण्याकडे बायकांचा जास्त कल असतो,

तुमचे निरीक्षण कच्चे आहे असे नमूद करतो.

तुम्ही ज्याला पुरुषांसारखी स्त्रियांची हेअरस्टाइल म्हणता तशी हेअरस्टाइल पुरुष करत नाहीत. उदा. स्त्रियांच्या ज्या हेअरस्टाइलला बॉयकट म्हटले जाते ती पुरुषांसारखी हेअरस्टाइल नाही.

तुम्ही ज्याला पुरुषांसारखा स्त्रियांचा पेहराव म्हणता तसा पेहराव पुरुष करत नाहीत. उदा. शर्टसदृश जे स्त्रिया घालतात त्याची बटणे डाव्या बाजूस आणि काजे उजव्या बाजूस असतात. पुरुषांच्या शर्टला त्याच्या उलट असते.

मन Fri, 06/06/2014 - 11:59

In reply to by नितिन थत्ते

अवांतर शंका.
हे असे का असते?
म्हणजे उजवे - डावे संकेत रूढ करण्यामागे काही विशेष उद्देश आहे का ?
की सहज म्हणून तसे पाळले जातात.

राधिका Fri, 06/06/2014 - 20:28

In reply to by नितिन थत्ते

तुम्ही ज्याला पुरुषांसारखा स्त्रियांचा पेहराव म्हणता तसा पेहराव पुरुष करत नाहीत.

इतकेच नव्हे, तर स्त्रियांचे शर्ट्स आणि झब्बासदृश कुडते हे स्त्रियांचा बांधा अधोरेखित करणारे असतात. पुरुषांचे शर्ट्स/झब्बे आयताकृती असतात.

अरविंद कोल्हटकर Tue, 03/06/2014 - 03:25

बाईंचे प्रवचन थोडे ऐकले आणि 'ते कसे गं ते कसे? देव्हार्‍यातिल देव जसे' ह्या जुन्या गाण्याची आठवण झाली. त्या गाण्यातले वातावरण ज्यांना शक्य आणि आदर्श वाटत असेल त्यांना प्रवचन पटेल. मला तरी ते घडयाळाचे काटे उलटे फिरवण्याचा वांझ प्रयत्न आहे असे वाटले. ह्या बाई अद्यापि मनुस्मृतीतून बाहेर पडल्या नाहीत असे दिसते.

(अवान्तर - आपल्या नेहमीच्या 'रणरागिण्या' अजून तलवारी परजत बाहेर कशा नाही पडल्या? त्यांची आतुरतेने वाट पहात आहे...)

Nile Tue, 03/06/2014 - 04:02

In reply to by अरविंद कोल्हटकर

फेसबूकापासून अनेक ठिकाणी गेल्या आठवडाभरात यांच बाईंवर परजल्याने धार गेली असेल तलवारींची. धार लावून झाली येतील परत!

'न'वी बाजू Tue, 03/06/2014 - 04:55

In reply to by Nile

'रानडुकरे झाडाच्या बुंध्यावर सुळ्यांना धार लावतात' असे लहानपणी कोठे बरे वाचले होते? बहुधा इसापनीतीतल्या कोठल्याशा गोष्टीत? त्याची आज का कोण जाणे, पण आठवण आली.

'न'वी बाजू Tue, 03/06/2014 - 16:10

In reply to by ॲमी

त्या गोष्टीत कोल्हा ('फॉक्स') होता, रानडुक्कर होते, फॉक्सचा 'टॉकिंग पॉइंट' 'शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ' असा कायसासा होता, तर रानडुकराचा मोटो 'एव्हर रेडी', असा काहीतरी फंडा होता, एवढेच अंधुकसे आठवते.

=======================================================================================================================

'फॉक्स' आणि 'टॉकिंग पॉइंट'वरून विनोद करण्याचा अतिक्षीण, 'पाणीदार' प्रयत्न. समजला, आणि जमले, तर हसा. अन्यथा आग्रह नाही.

बॅटमॅन Tue, 03/06/2014 - 17:21

In reply to by ॲमी

अतिअवांतरः इसापनीतीचे मराठी भाषांतर पहिल्यांदा तंजावर येथे सर्फोजीराजे दुसरे यांनी काढलेल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये छापण्यात आले-काळ इ.स. १८०७ ते १८१४.

त्याआधी इ.स. १८०५ साली मिरजेच्या पटवर्धन संस्थानिकांनी प्रिंट करवलेले गीतेचे एक पुस्तक उपलब्ध आहे. कवणाही एतद्देशीय सत्तेने छापलेले हे पहिले मराठी पुस्तक ठरावे. पण तो एक आयसोलेटेड & अबॉर्टिव्ह अटेम्प्ट होता.

गब्बर सिंग Tue, 03/06/2014 - 05:23

रामतीर्थकर बाईंचा मुद्दा परंपरा, कुटुंबव्यवस्था, धर्म, संस्कृती, पतीपत्नी संबंध, आई चा व पत्नीचा रोल (भूमिका) या भोवती फिरतो. त्यांनी स्त्रियांना अनेक प्रिस्क्रिप्शन्स केलेली आहेत.
.
---

.

नरेंद्र मोदींच्या पत्नीने काय करायचे नेमके - या प्रश्नाचे उत्तर अपर्णाबाईंनी द्यावे अशी त्यांच्या "मंगलचरणी" प्रार्थना. (हो "मंगलचरणी" हा शब्दप्रयोग - मी उपरोधानेच म्हणतोय.)

नरेंद्र मोदी हे काँझर्व्हेटिव्ह आहेत असे म्हणायला प्रचंड जागा आहे. काँझर्व्हेटिव्ह म्हंजे परंपरांना जपणे व त्यांचे पालन करणे - हा महत्वाचा भाग(***). जसोदाबेन या त्यांच्या आजही पत्नी आहेत. ते स्वतः जसोदाबेन ना जाहीररित्या पत्नी मानतात व जसोदाबेन ह्या नरेंद्र मोदींना पती मानतात. कायदेशीर घटस्फोट झालेला नाही. लग्न केले व नंतर कसलीही जबाबदारी न घेता सोडून दिले. जसोदाबेन यांच्याकडे उदरनिर्वाहाचे साधन आहे हे ठीक आहे. पण फक्त तोच एकमेव मुद्दा (कारण) असता तर लग्न केलेच का असते ? त्या स्वतः जन्मभर अविवाहित राहिल्या असत्या. माणूस लग्न का करतो ???? आज केवळ निवडणूकीच्या आवेदनपत्रावर असत्य बोलायला लागू नये - म्हणून पत्नी म्हणून जाहीर केले. पण मग जर असे आहे तर मोदी हे कुटुंबव्यवस्थेचे तारक की मारक ? जसोदाबेन ह्या कुटुंबव्यवस्था वाचवणार्‍या की कुटुंबव्यवस्थेच्या "व्हिक्टिम" ?

---

संभाव्य आक्षेप -

१) आता कुणी म्हणेल की ३०+ वर्षे ते दोघे विभक्त राहिलेले आहेत. मग जसोदाबेन ना पंतप्रधान पत्नीचे स्थान का मिळावे ? (प्रश्न ठीक आहे). पण मुद्दा हा आहे की - Even if Jasodaben is willing to perform the duties (as prescribed to her by Aparnabai) .... जसोदाबेन यांना त्या जबाबदार्‍या पार पाडता येतील अशी परिस्थिती आहे का ?

२) दुसरा आक्षेप हा असू शकतो की - गब्बर, हा वाद जसोदाबेन व नरेंद्रभाई यांच्यातला आहे. बाहेरच्यांनी प्रश्न उपस्थित का करावा ? (हा ही आक्षेप रास्त आहे). पण उपस्थित केलाच तर उत्तर देईन.

-------

(***) - मोदींना विचारले की तुम्ही मुस्लिमांची टोपी का घालत नाही ? - त्यावर मोदींचे उत्तर - मी फक्त माझ्या परंपरांचे पालन करणार व इतरांच्या परंपरांचा आदर करणार. इथपर्यंत ठीक आहे. पण मग असे जर आहे तर किमान तुमच्या परंपरांचे पालन तरी करा. आपल्या देशातील परंपरांविषयक ज्ञानाचा मुख्य (एकमेव नव्हे) स्त्रोत महाभारत व रामायण. महाभारतात सुद्धा - श्रीकृष्णाने युधिष्ठीरास - पत्नीस जुगारात डावावर लावायचा तुला अधिकार नाही. पत्नी ही वस्तू नसते. जीवनाची भागीदारीणी असते. असे सुनावले होते. भागीदारीणीला (जसोदाबेन यांना) मोदींनी स्वतःस हवे तेव्हा Dump करणे कुठल्या परंपरेत बसते? पण मोदींनी रामाचा कित्ता गिरवून (स्वतःच्या सोयीसाठी ??? ... व/वा देशसेवेसाठी) बायकोला Dump केले. जसोदाबेन ना चॉइस होता का - असे म्हणण्याचा की - "पतिदेव", मला युनिलॅटरली त्यागण्याचा तुम्हास अधिकार नाही. भाजपावाले उठसुट त्या शाहबानो चे उदाहरण देतात (स्युडो-सेक्युलर या शब्दाचा जन्मच मुळी यातून झालेला आहे) ... पण आज (घटस्फोट झालेला असेल तर) मोदींनी जसोदाबेन ला पोटगी द्यावी की नाही ? व घटस्फोट झालेला नसेल तर जसोदाबेनला सन्मानाने पंतप्रधानांची पत्नी म्हणून वागवले जावे की नाही ? मोदींच्या मातेला पंतप्रधानांची माता म्हणून सगळा सन्मान मिळाला हे सुयोग्य आहे. पण विवेकपूर्ण चयन केल्यावर सुद्धा - अ) पत्नीला सोडून देणे व ब) पंतप्रधानांची पत्नी म्हणून सन्मान नाकारणे - कितपत योग्य आहे ?

.
व परंपरांबद्दलचा आणखी एक मुद्दा - स्वतः श्रीकृष्णाने "तरीही वरीतो सहस्त्र सोळा कन्या मी अबला(&&)" असे म्हणून नरकासुराच्या तावडीतून सोडवलेल्या १६ सहस्त्र मुलींशी विवाह केला होता. (हा मुद्दा प्रचंड वाद निर्माण करणारा आहे पण....) इथे श्रीकृष्णाने रामाच्या नेमके उलट वर्तन केलेले आहे. श्रीकृष्णाचे वर्तन हे जास्त setting-good-example टाईप आहे असे म्हणायला जागा आहे. मग ही परंपरा पालन करण्यास योग्य का नाही ?

.

(&&) - मनोहर कवीश्वर यांनी लिहिलेले व बाबूजींनी गायलेले - माना मानव वा परमेश्वर - ह्या गीतातून साभार.
.

-----
.
भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ - चा बकवास लहानपणापासून आपल्याला शिकवला जातो. डाबर जनमघुंटी सारखा. पण कर्तव्य ही भावना नसते का ? मोदींनी जसोदाबेन यांच्याशी जे काही केले ते भावना की कर्तव्य की आणखी काही ?
.
-----

मला नेमके काय म्हणायचे आहे ते सांगतो -

१) (सांस्कृतिक) परंपरा ह्या कॉस्टलेस नसतात. (कॉस्ट हा फक्त अर्थशास्त्रीय शब्द नाही.)
२) अनेकदा त्यांच्या कॉस्ट्स समाजातल्या एका सेक्शन ला (स्त्रियांना) Dis-proportionately भोगाव्या लागतात.
३) व बेनिफिट्स मात्र पुरुषांना Dis-proportionately मिळतात.
४) परंपरा जेवढ्या जास्त तेवढी समस्या जास्त उत्पन्न होते.
५) परंपरा ह्या "अनौपचारिक सरकार" असतात.
६) परंपरा असाव्यात पण कमीतकमी (ऑप्टिमल) असाव्यात.
७) हा वाद जसोदाबेन व नरेंद्रभाई यांच्यातला आहे. बाहेरच्यांनी त्यात बोलू नये - हा आक्षेप लेजिटिमेट असेलही पण तो ज्या तत्वामुळे लेजिटिमेट असतो तेच कन्सिस्टंटली लावले तर - परंपरांवर अति भर देणे हेच तितकेसे संयुक्तीक नाही - हे च सिद्ध होत नाही का ?
८) परंपरांवर अवलंबून राहणे - हे debt मेंटॅलिटी आहे. व प्रगती क्रण्यासाठी debt असावे पण कमी असावे असे माझे मत आहे.

शहराजाद Tue, 03/06/2014 - 16:15

रामतिर्थकर बाइंची बरीच मते सुटी पाहिली तर पटण्यासारखी वाटतात. उदाहरणार्थः स्वयंपाक आला पाहिजे. दुसर्याच्या आनंदात सहभागी होत आले पाहिजे. घरातील म्हातार्या माणसाची काळजी घ्यावी. इ. ह्या सर्वात वाईट असे काहीच नाही. मुलगा- मुलगी दोघांनाही आपल्या पोटापुरता स्वयंपाक आला पाहिजे. हेच आनंदात सहभागी होण्याचे. घरचेच काय, आपल्या मित्रमंडळींच्या आनंदातही सहभागी होता यायला हवे.
मात्र, स्त्री- पुरुष दोघांतही हे गुण असावेत असे रामतीर्थकरबाई सांगत नाहीत. त्यांचा रोख केवळ स्त्रियांवर असतो. म्हणजे, कुटुबव्यवस्था कोलमडणे, चांगले संस्कार नष्ट होणे इ इ सारे का होते, तर फक्त स्त्रिया वरीलप्रमाणे वागत नाहीत म्हणून होते ,असे मत त्या मांडतात.
अशा प्रकारची विधाने करणार्‍या अनेकांची ही चलाखी असते. वरवर पाहिले तर कोणालाही लागू पडेल अशी गोष्ट घ्यायची; पण उपदेशात आणि व्यवहारात ,आचरणाची अपेक्षा केवळ स्त्रियांकडून.

त्यांचा उपदेश-'धाक नसेल तर स्त्रिया स्वैराचारी होतात आणि सगळ्याचे अकल्याण होते. तसे होऊ नये म्हणून पतीने पत्नीला, भावांनी बहिणीला धाकात ठेवावे'. बर्‍याच लोकांना यामध्ये वरवर फारसे काही वाईट दिसत नाही. कुटूबसंस्था जोपासणे, नैतिक अधःपतन रोखणे इ साठी वरकरणी हा सोपा उपाय भासतो. पण कुटुंबातील पुरुषवर्गाने ताळतंत्र सोडून वागणे, बाहेर शेण खाणे इ मुळे कुटुंबाला पोहोचणार्या हानिचा उल्लेख त्या सोयिस्करपणे टळतात.

ह्यांच्या मते, आईबापांनी मुलींना फार शिकवत बसू नये. त्याचा संसाराला काडीचा उपयोग नाही. आपल्या मताच्या पुष्टीखातर आपल्या आईचे मत त्या कौतुकाने सांगतात - 'शाळा कशाला शिकावी मुलींनी? संसार करायला शाळेची गरजच नसते. ' पण वडिलांनी शाळेत घातल्यामुळे बाईंना शिकता आले.
त्यांच्या मते आईवडिलांनी मुलीची लग्ने अठराव्या वर्षीच लावून द्यावी, आणि पुढे सासरच्यानी सुनेला शिकवावे. कायदा नसता तर त्यांनी कदाचित बालविवाह्च उपदेशिला असता असा अंदाज, कारण अठराव्या वर्षीही मुलीना थोडी स्वतंत्र विचारशक्ती आलेली असते. आणि हया बाईंच्या मते तर लग्नानंतर बायकानी ''आपल्याला डोके आहे हे विसरून जायचे.''
या बाईचया भाषणांतला 'मी-मी' भागही विसंगतीविरहित नाही. मनोरंजनासाठी जरूर ऐकून बघावा.

............सा… Tue, 03/06/2014 - 23:18

In reply to by शहराजाद

होय खरे आहे. ब्राह्मण पुरुष उलट अति अति तडजोड करतात अन ब्राह्मण पुरषांनी तडजोड थोडी कमी करावी असेच हास्यास्पद मत मांडलेले आहे. काही विधाने खूप मनुस्मृतीवादी आहेत खरी.

अन नंदन म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या अशा वादग्रस्त विधानांतून सुविचार शोधणे म्हणजे भांगेच्या पिंपात सब्जा की खसखशीचे बी शोधण्यासारखे आहे खरे.मान्य आहे.

ऋषिकेश Tue, 03/06/2014 - 09:01

कारणे अनेक आहेत, त्याची चर्चा करता येईलच.
त्याआधी, मला उत्सुकता आहे की ज्या गोष्टी बायकांनी कराव्यात असे त्या बै म्हणतात त्या "फक्त आणि नेहमी बायकांनीच कराव्यात" हे त्यांचे म्हणणे तुम्हाला पटते का?

बाकी, एकुणात "मी" यांच्याशी सहमत आहे.

............सा… Tue, 03/06/2014 - 23:24

In reply to by ऋषिकेश

त्या ताई कुटुंबपद्धत रहावी याकरता प्रयत्नशील आहेत ही गोष्ट मला कौतुकास्पद वाटली. पण ती व्यवस्था टिकविण्यासाठी त्यांनी बायकांवर जी अतिरीक्त (पुरषांपेक्षा खूपच जास्त) बंधने घातली आहेत त्याच्याशी असहमतीच आहे. १००% असहमती आहे.

'न'वी बाजू Tue, 03/06/2014 - 23:53

In reply to by ............सा…

त्या ताई कुटुंबपद्धत रहावी याकरता प्रयत्नशील आहेत ही गोष्ट मला कौतुकास्पद वाटली.

आणि अन्यथा कुटुंबपद्धतीस नेमका कोणता धोका उद्भवला आहे बरे?

'न'वी बाजू Wed, 04/06/2014 - 02:12

In reply to by ............सा…

ज्यांना कुटुंबपद्धतीत राहायचे आहे, त्यांना तसे राहावयास नेमकी कोणती अडचण निर्माण झाली आहे बरे?

'क्ष' आणि 'य' या दोन व्यक्ती जर समजा लिव्ह-इनमध्ये राहिल्या, तर त्यामुळे तुमचे, माझे किंवा आणखी कोणाचे (रिस्पेक्टिव) लग्न मोडकळीस येते काय?

बाकी, 'खतरे में हैऽऽऽ' म्हणून बोंब ठोकणे ही बहुधा एकाच धर्माची मक्तेदारी नसावी. बोंब ठोकण्यासाठी उभे राहण्याच्या जागा निराळ्या, इतकेच.

............सा… Wed, 04/06/2014 - 02:15

In reply to by 'न'वी बाजू

बोंब कोणी ठोकत नाहीये. फक्त चर्चा चालली आहे कुटुंबपद्धती वि लिव्ह इन.
ज्यांना लिव्ह इन हवय त्यांचे ही कोणी हात बांधलेले नाहीत पण समाजाचा एकंदर ट्रेन्ड/प्रवाह दिसतो आहे की "लिव्ह इन" कडे काहीजण आकर्षित होताहेत.

राजेश घासकडवी Tue, 03/06/2014 - 09:25

अनेकांनी रामतीर्थकर बाई त्यांच्या 'होलियर दॅन दाउ' अॅटिट्यूडमुळे किंवा त्यांच्या 'मीच श हा णी' असं सांगण्याच्या पद्धतीमुळे डोक्यात जातात असं म्हटलं आहे. पण हे आक्षेप खरे असले तरी त्यांच्यावर टीका करण्यासाठी पुरेसे नाहीत. (अनेक विचारजंती लोकही त्यांच्या अॅटिट्यूडमुळे डोक्यात जातात असं म्हणून रामतीर्थकरबाईंना विचारजंती कल्पून बघितलं... जमलं नाही...)

आक्षेपांच्या बाबतीत शहराजाद यांच्याशी सहमत. विशेषतः

त्यांचा उपदेश-'धाक नसेल तर स्त्रिया स्वैराचारी होतात आणि सगळ्याचे अकल्याण होते. तसे होऊ नये म्हणून पतीने पत्नीला, भावांनी बहिणीला धाकात ठेवावे'.

जेव्हा रामतीर्थकरबाई हे सांगतात तेव्हा ज्ञानेश्वरांनी जशी भगवद्गीता जनसामान्यांना समजावी म्हणून रसाळ बोली भाषेत लेखन केलं, त्याप्रमाणे मनुस्मृती जनसामान्यांना समजावी म्हणून रसाळ (?) भाषेत त्या व्याख्यान देत आहेत हे उघड होतं. आता जेव्हा मनुस्मृती योग्य असं कोणी म्हणतो तेव्हा त्यांच्यावर जे आक्षेप घ्यायचे ते कुरुंदकरांनी इतक्या सुंदरपणे घेतलेले आहेत, की ते पुन्हा मांडण्याची गरज पडत नाही. फक्त चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी जे विचार खोडून काढले ते आता डोकं वर काढत आहेत हे पाहून वाईट वाटतं.

मन Tue, 03/06/2014 - 09:31

In reply to by राजेश घासकडवी

एकूण स्केल पाहिली तर "असे विचार डोकं वर काढताहेत " वगैरे भीती वाटत नाही.
तुमच्या ष्टायलीत टक्केवारी काढून बघा; टेन्शन खलास होइल. (आख्ख्या महाराश्ट्रात बायका असतील सहाएक कोटी.
त्यातल्या ह्या बाईंचा प्रभाव असलेल्या(पेश्शल कल्ट फॉलोइंग असणार्‍या) काही शे; किंवा फार्फार तर एक हजार.)
दर साठ हजारामागे फक्त एक! म्हणजे काहिच नाही.
आणि ती जी एक व्यक्ती आहे तीही जागतिकीकरनाच्या रेट्यानं म्हणा किंवा आर्थिक दट्ट्यानं म्हणा,
मुख्य प्रवाहात येतेच.

नितिन थत्ते Tue, 03/06/2014 - 09:58

In reply to by मन

अ‍ॅक्चुअली या बै महिलांना उपदेश करत असल्या आणि तो उपदेश पटणार्‍या समजा सहा कोटीतल्या १ लाख महिला असतील (हा आकडा फार कंझर्वेटिव्ह आहे कारण सहा कोटी महिलांपैकी ज्या सासवा असतील त्यातल्या बर्‍याच जणींना हे उपदेश पटतील. :) ). तरी हा उपदेश सहा कोटी पुरुषांना पटू शकतो ;( .

आता सहा कोटी पुरुष + काही लाख महिला म्हंजे मेजॉरिटी झाली का नै ?

ॲमी Tue, 03/06/2014 - 11:28

In reply to by मन

मी बाईंच एकही प्रवचन ऐकलं नाहीय. ऐकायची इच्छाही नाही. पण खालील मुद्द्यावरून राजेश आणि मन दोघांशीही असहमत.

"असे विचार डोकं वर काढताहेत " वगैरे भीती >> ?? अशा विचारांच डोकं खाली गेलंच कधी होतं?
बाईंचा कल्ट फॉलो न करताही असे विचार करणारे बरेच आहेत. किंबहुना माझ्या लिमीटेड जनसंपर्कात हेच विचार आणि वागणे बाय डिफॉल्ट आहे.

आणि ती जी एक व्यक्ती आहे तीही जागतिकीकरनाच्या रेट्यानं म्हणा किंवा आर्थिक दट्ट्यानं म्हणा, मुख्य प्रवाहात येतेच. >> असे होत असेलच तर त्याचा वेग फारच कमी आहे.

राजेश घासकडवी Tue, 03/06/2014 - 19:14

In reply to by मन

एकूण स्केल पाहिली तर "असे विचार डोकं वर काढताहेत " वगैरे भीती वाटत नाही.

ही मोजमाप करणं महाकठीण काम आहे. डोकं वर काढणं हा वाक्प्रयोग माझ्या व्यक्तिगत निरीक्षणांमधला आहे. या बाईंनी त्यांच्या विचारांचं तीर्थवाटप केलं तेव्हा काही आमदार/खासदार मंडळी आणि अण्णा हजारे स्टेजवर होते असं नुकतंच वाचलं. अण्णांचे डोळे पाणावले, आणि त्यांना वेळोवेळी हसू आलं हेही वाचलं. हिंदुत्ववादी पार्टी निवडून आल्यापासून अशा पारंपारिक मनुवादी विचारांना मोठी व्यासपीठं मिळतील असा माझा अंदाज होता. एक डेटापॉइंट तरी त्याबाजूने सापडला. पुढे काय होतंय पाहू.

तुमच्या ष्टायलीत टक्केवारी काढून बघा; टेन्शन खलास होइल.

यातून एक सुंदर, तरल तिरकसपणा जाणवला, त्याला दाद द्यायलाच हवी. सुधारणांचा विचार करताना 'दर क्षणाला प्रत्येक गोष्ट सुधारत असल्यामुळे टेन्शन घेण्याचं कोणालाच काहीच कारण नाही' असा माझा युक्तिवाद नसतो. स्टॉक मार्केट दररोज थोडं वर थोडं खाली जात असतंच. या वर खाली जाण्यातून साधारण शतकभरात ते वरच जातं. प्रत्येक वेळी ते पाव टक्क्याने घसरल्यावर 'पहा कशी अधोगती चालू आहे' हे म्हणणं योग्य नव्हे. तसंच मंदीचे वारे वाहत असतील तर त्यांकडेही दुर्लक्ष करू नये.

तीर्थकरबाईंच्या विचारामुळे टेन्शनपेक्षा 'ही नोंद घेण्यासारखी गोष्ट' असं म्हणून प्रगतीच्या जमाखर्चात तोट्याच्या बाजूला टाकण्याची गोष्ट आहे इतकंच. जमेच्या बाजूला अनेक मुलींना शिक्षण मिळतंय, नोकऱ्या मिळत आहेत, त्या अधिकाधिक प्रमाणात स्वतंत्रपणे राहत आहेत, आणि बऱ्याच प्रमाणात - आधी बापाने पोसावं, आणि नंतर नवऱ्याने - या व्यवस्थेला फाट्यावर मारत आहेत. तेव्हा टेन्शन आहे ते रेट ऑफ इंम्प्रूव्हमेंट किंचित कमी झाल्याचंच. असे विचार जर पाठ्यपुस्तकांतून यायला लागले तर मात्र चिंता वाटेल.

अतिशहाणा Tue, 03/06/2014 - 20:12

In reply to by राजेश घासकडवी

एक डेटापॉइंट तरी त्याबाजूने सापडला. पुढे काय होतंय पाहू.

कुठंय डेटापॉईंट? यूट्यूब (आणि सनातन प्रभात) आधीही होतेच की.

मन Wed, 04/06/2014 - 09:40

In reply to by राजेश घासकडवी

ओके.
बरोबर आहे.
ते वाक्य ह्यावेळी तिरकस म्हणून वापरलं नव्हतं.
खरोखरच आकडेमोड करुन पहावी काय असं मला वाटलं होतं प्रतिसाद लिहिताना.
बाकी मुद्दे मान्य.

बॅटमॅन Tue, 03/06/2014 - 14:00

In reply to by राजेश घासकडवी

विचारजंती लोक त्यांच्या अ‍ॅटिट्यूडमुळे डोक्यात जातात.

पण

अ‍ॅटिट्यूडमुळे डोक्यात जाणारे सगळेच लोक विचारजंत नसतात.

तदुपरि, "नवर्‍याला घाबरलंच्च पाहिजे" इ. ऐकून, त्या बै स्वतःच्या नवर्‍याला "मी तुला घाबरतेय. मला धाकात ठेव, नैतर मार खाशील" असं काहीसं बोलत असल्याचं चित्र डॉळ्यासमोर उभं राहिलं.

ग्रेटथिंकर Tue, 03/06/2014 - 12:28

बायकांना जास्त मोकळीक दिली तर त्या स्वैराचारी वृत्तीच्या व स्वार्थी होतात या त्यांच्या मताशी सहमत. मुलभूत हक्क द्यावेत, पण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत बेअक्कलपणे बोलणे वागणे हा बायकांचा गुणधर्म अतिस्वातंत्रण्याने वाढीस लागतो.

बॅटमॅन Tue, 03/06/2014 - 12:40

In reply to by ग्रेटथिंकर

बायकांना जास्त मोकळीक दिली तर त्या स्वैराचारी वृत्तीच्या व स्वार्थी होतात

बायकाच का, पुरुष किंवा अजून कुठल्याही गटाला वाजवीपेक्षा जास्त फ्री-वे विथौट फीअर ऑफ ब्याकलॅश ऑर विथौट मच रिस्पॉन्सिबिलिटी मिळाला की हेच होणार.

(सिलेक्टिव्ह रीडिंग करून स्त्रीद्वेष्टेपणाचा आरोप करणार्‍यांनो, प्रतिसाद इज़ ऑल युवर्स).

घनु Tue, 03/06/2014 - 13:36

In reply to by बॅटमॅन

बायकाच का, पुरुष किंवा अजून कुठल्याही गटाला वाजवीपेक्षा जास्त फ्री-वे विथौट फीअर ऑफ ब्याकलॅश ऑर विथौट मच रिस्पॉन्सिबिलिटी मिळाला की हेच होणार.

स ह म त

............सा… Wed, 04/06/2014 - 01:28

In reply to by ग्रेटथिंकर

पुरषाचा धाक नसलेल्या एका कुटुंबाचे उदाहरण ताजे पाहीले आहे. या बाई स्वतः अफाट आहेतच पण त्यांची मुलगी घोडनवरी आहे पण ओबीस असल्याने लग्न ठरत नाही मग हिचा नवरा/तिचा नवरा असा काहीही विधीनिषेध ती पाळत नाही. मुलाला एडस की हेपेटायटीस बी आहे.

ता क - सगळ्या वयाने वाढलेल्या फूट्-लूझ / फँन्सी फ्री बायका तशा वागतीलच असे नाही अन सगळ्या लग्न झालेल्या बायका धुतल्या तांदळासारख्याचारीत्र्याच्या असतीलच असेही नाही.
हे फक्त एक उदाहरणादाखल दिले आहे. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या सल्यास क्षमस्व.

मन Wed, 04/06/2014 - 09:43

In reply to by ............सा…

तुमचा प्रतिसाद फक्त स्त्री ऐवजी पुरुष व पुरुष ऐवजी स्त्री वापरुन लिहून पहात आहे :-
(मूळ संकल्पना :- धनंजय ह्यांच्या मिपा व उपक्रम येथील लिखाणावरून साभार. )

स्त्रीचा धाक नसलेल्या एका कुटुंबाचे उदाहरण ताजे पाहीले आहे. हे बुवा स्वतः अफाट आहेतच पण त्यांचा मुलगा घोडनवरा आहे पण ओबीस असल्याने लग्न ठरत नाही मग हिचा नवरी/तिचा नवरी असा काहीही विधीनिषेध तो पाळत नाही. मुलीला एडस की हेपेटायटीस बी आहे.

ता क - सगळे वयाने वाढलेल्या फूट्-लूझ / फँन्सी फ्री पुरुष तशा वागतीलच असे नाही अन सगळ्या लग्न झालेल्या पुरुष धुतल्या तांदळासारख्याचारीत्र्याच्या असतीलच असेही नाही.
हे फक्त एक उदाहरणादाखल दिले आहे. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या सल्यास क्षमस्व.

'न'वी बाजू Tue, 03/06/2014 - 18:18

In reply to by बॅटमॅन

ब्रह्म्यांनी एक ष्टोरी बनवून लिहिली ती काय, तिला ब्रह्मवाक्य मानणे हाच मुळी बेसिक घोटाळा आहे.

ॲमी Tue, 03/06/2014 - 18:41

In reply to by बॅटमॅन

अरे समजून घे. आपल्याला फक्त गुलाबी पत्रांवर समाधान मानावे लागतेय म्हणुन जेलसलेत ते ;-)
उगी उगी हं 'न'वी बाजू :-) आज नाही तर उद्या तुमच्याकडेपण लुना असेल आणि खिशात चारच काय पाचपाच हजार रुपये रोख असतील. पण जरा जपून हां बायका फार्फार स्वार्थी असतात हो.

बॅटमॅन Tue, 03/06/2014 - 18:47

In reply to by ॲमी

जर अख्खी 'लुना' असेल तर डबलसीटची गरजच नै पडणार ओ. कुणी जवळ येऊ पाहतंय असं वाटलं की मारायची उडी न जायचं पळून!

नंदन Tue, 03/06/2014 - 15:29

का प्रतिगामी शिक्का मारुन उगाच एखाद्याला(अपर्णाताई) झोडायचे? कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी झटण्यात, प्रवाहाविरुद्ध पोहण्यात आक्षेपार्ह काय आहे ते कळले तर बरे होईल.

अरांचे प्रतिगामीत्व पुरेसे स्पष्ट असावे. मात्र अशा भाषणातही काही चांगले, मननीय विचार जरूर असू शकतात (शहराजाद यांनी म्हटल्याप्रमाणे - रामतिर्थकर बाइंची बरीच मते सुटी पाहिली तर पटण्यासारखी वाटतात). पण हा भांगेच्या पिंपात एखादं सबजा बी शोधण्यातला प्रकार झाला (भांगेत तुळस इ.) - किंवा हेल्दी खायचं म्हणून मुद्दाम वाट वाकडी करून मॅक्डॉनल्ड्सला जायचं आणि तिथल्या ढीगभर मेनूतून ती मलूल सॅलड्स निवडायची असला तरी :).

'आ नो भद्रा क्रतवो यन्तु विश्वतः' - म्हणजे चांगले विचार आमच्यापर्यंत चहूकडून येवोत हे ऋग्वेदातलं तत्त्व अर्थातच मननीय आहे. पण उत्तम विचार निवडण्यासाठी अनेक स्रोत उपलब्ध असताना अशा दूषित फाऊन्टनहेडच्या पर्यायाला प्राधान्य द्यावं किंवा त्यातलं चांगलं शोधण्याचा यत्न करावा - हे तितकंसं लाभदायक वाटत नाही. (नीरक्षीरविवेक म्हणणार होतो - पण 'तीर्था'तल्या अजब मिश्रणाचे दूध का दूध, पानी का पानी करण्याचे सामर्थ्य सामान्य जनांकडे कुठून यायचे? :))

मन Tue, 03/06/2014 - 15:57

In reply to by नंदन

उत्तम विचार निवडण्यासाठी अनेक स्रोत उपलब्ध असताना अशा दूषित फाऊन्टनहेडच्या पर्यायाला

पन इण्टेंडेड असावा काय ?
गब्बरशेठचं काय मत?

नंदन Tue, 03/06/2014 - 16:18

In reply to by मन

पन इण्टेंडेड असावा काय ?

ayn't it? ;)

अवांतर - उपक्रमावर काही वर्षांपूर्वी दवण्यांच्या 'सूर्य पेरणारा माणूस' या पुस्तकाचा परिचय आला होता. पुस्तक शब्दबंबाळ, 'सो बॅड द्याट इट्स गुड' मोडणारे खरेच; पण या 'कमिशन्ड्' पुस्तकातून एरवी नैतिकतेवर व्याख्याने झोडणार्‍या प्रा. दवण्यांचा दुटप्पीपणाही सहज दिसून येत होता. पण असं असूनही या सार्‍या बाबींकडे दुर्लक्ष करून उद्योजकतेची प्रेरणा वाचकाने शोधावी, असं धागालेखकाचं म्हणणं होतं. त्या प्रतिक्रियेची या संदर्भात आठवण झाली.

............सा… Tue, 03/06/2014 - 23:23

In reply to by नंदन

चांगले विचार आमच्यापर्यंत चहूकडून येवोत हे ऋग्वेदातलं तत्त्व अर्थातच मननीय आहे. पण उत्तम विचार निवडण्यासाठी अनेक स्रोत उपलब्ध असताना अशा दूषित फाऊन्टनहेडच्या पर्यायाला प्राधान्य द्यावं किंवा त्यातलं चांगलं शोधण्याचा यत्न करावा - हे तितकंसं लाभदायक वाटत नाही.

ह्म्म!! विचार करण्याजोगी गोष्ट आहे.

त्या ताई कुटुंबपद्धत रहावी याकरता प्रयत्नशील आहेत ही गोष्ट मला कौतुकास्पद वाटली. पण ती व्यवस्था टिकविण्यासाठी त्यांनी बायकांवर जी अतिरीक्त (पुरषांपेक्षा खूपच जास्त) बंधने घातली आहेत त्याच्याशी असहमतीच आहे. १००% असहमती आहे.

सविता Tue, 03/06/2014 - 16:42

समाज, कुटुंब व्यवस्था येत्या दहा वर्षात तळागाळात जाणार आहे वगैरे संदर्भहीन वाक्ये ऐकली तेव्हा "काय" विकलं जातंय या पेक्षा "कोण" आणि "कसं" विकतंय यावर विक्री अवलंबून आहे हे पटले.

बाईंकडे संभाषणकौशल्ये, निदान "भाषणकौशल्ये" आहेत हे मान्य करायला हवे.

हे असे बोलणारे लोक अणि अशा विचारांनी वागणारे लोक बघितले की मी विचार करते - ही जुनी खोडं आहेत, यांना बदलण्याचा प्रयत्न करण्यात वेळ आणि शक्ती घालवण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा भावी पिढीवर लक्ष केंद्रित करा आणि त्यांची विचारसरणी कशी संतुलित होईल हे त्यांच्या पालक आणि शिक्षकांनी बघावे. जसजसे संतुलित विचार करणार्‍या लोकांचे प्रमाण समाजात वाढत जाईल असले मनुस्मॄतीय विचार मागे पडत जातात.

मन Tue, 03/06/2014 - 17:20

In reply to by सविता

मनुस्मॄतीय विचार मागे पडत जातात
तेच तर धोकादायक आहे.
तुम्हा पुढारलेल्या आणि शेफारलेल्या पोरिंना तेच तर समजत नाही.
लै लागून गेल्यात शाण्या.

घनु Tue, 03/06/2014 - 17:28

In reply to by मन

मनोबा रामतीर्थकर :D

(तुच रे तुच अपर्णाताईंचा वारसा पुढे चालवणार.....सॉरी मला असं म्हणायचं आहे "तु पॉज> अपर्णाताईंचा वारसा पॉज> पुढे चालवायलाच हवा")

'न'वी बाजू Tue, 03/06/2014 - 20:55

In reply to by सविता

ही जुनी खोडं आहेत, यांना बदलण्याचा प्रयत्न करण्यात वेळ आणि शक्ती घालवण्यात अर्थ नाही.

Hellrung's Law:

If you wait, it will go away.

Shevelson's Extension:

... having done its damage.

Grelb's Addition:

... if it was bad, it will be back.

(साभार: दुवा.)

असो. ही 'जुनी खोंडे' असली, तरी इतक्या लवकर 'जाणार' नाहीयेत. सबब, बेसिक प्रेमाइस चुकलेले आहे, एवढेच अतिनम्रपणे सूचित करून खाली बसतो.

बाकी चालू द्या.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 04/06/2014 - 19:25

In reply to by सविता

ही जुनी खोडं आहेत, यांना बदलण्याचा प्रयत्न करण्यात वेळ आणि शक्ती घालवण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा भावी पिढीवर लक्ष केंद्रित करा

मेलो मेलो मेलो मेलो मेलो ड्रामा सुरू> तुम्ही या बाईंच्या मरणाची वाट पाहत आहात हे अतिशय असंवेदनशील आहे. मी गेले ६ वर्ष मराठी आंजावर आहे, पण कोणी असा दुष्ट विचार केलेला पहिल्यांदाच पाहते आहे. केवढे हे क्रौर्य! मेलो मेलो मेलो मेलो मेलो ड्रामा संपला>

'न'वी बाजू Wed, 04/06/2014 - 19:59

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

फार पूर्वी कधीतरी एक शेरावली ऐकली होती, 'लग्न ठरण्यापूर्वी आणि लग्नानंतर' छापाची. आता नेमके शब्द आठवत नाहीत, पण लग्न ठरण्यापूर्वी 'प्रेमासाठी ताजमहाल बांधला असता, पण काय करू? कंबख्त मुमताज मिळत नाही' असे असते, तर लग्नानंतर 'प्रे. ता. बां. अ., पण का. क.? कंबख्त मुमताज मरत नाही' असे, असा कायसासा आशय होतासे पुसटसे स्मरते.

असो. बाकी चालू द्या.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 04/06/2014 - 01:55

या बाई फेका मारतात असं कुणाला वाटलं नाही का? मी त्यांचं जे काही भाषण ऐकलं आहे त्यात बाई असं काही म्हणत होत्या की, १७ संस्थांचं काम करते, ४००+ दिवस सतत लाल डब्ब्याने प्रवास करते आहे, इत्यादि. एका वर्षात १७ संस्थांचं काम करायचं असेल तर एका संस्थेला एका महिन्यापेक्षा कमी काळ मिळणार. त्यात एवढा प्रवास करायचा. म्हणजे नक्की किती आणि काय काम करतात या बाई? एक दिवस घरातली कामं करून "माझ्यामुळे घर चालतं" असला आव आणणाऱ्या बाईवर किती विश्वास ठेवायचा? नक्की कोणाला, किती मदत करतात याची जी काही वर्णनं सांगतात ती पण खोटी आणि/किंवा बढा-चढा-के असणार याबद्दल मला काहीही संशय नाही.

त्यामुळेच 'मुलींच्या आया मुलींच्या संसारात फार नाक खुपसतात' हे पण कुठेतरी दोन ठिकाणी पाहून त्याचं सोयीस्कर सरसकटीकरण करत असणार असा संशय येतो.

त्यांची बडबड फारच हास्यास्पद आहे, काळाची चाकं मागे फिरवणारी आहे आणि त्यामुळे हे प्रकरण टिकणारं नाही याबद्दल मला फार संशय नाही. पण असा विचार करणारे आपण बहुतेकसे शहरी भागातले भारतीय. या बाई ग्रामीण, निमशहरी भागात जाऊन हे असलं जहर पसरवतात. विद्या बाळ यांना व्याख्यानानंतर काही मुलींनी, "तुम्ही असं म्हणता, पण त्या रामतीर्थकर बाई काही वेगळंच सांगत होत्या" असं म्हणाल्याचं ऐकलं आहे. काळाची चाकं मागे फिरणार नाहीत याबद्दल खात्री आहे, पण निदान काही मुलींना, काही काळापुरतं मागे ढकलण्यात या यशस्वी होत असणार असा संशय येतो. त्यामुळे त्यांच्याकडे जे काही घेण्यासारखं असेल तर ते ही त्यांनी स्वतःकडेच ठेवलं तर बरं. या ब्रेनवॉश होणाऱ्या कमी प्रमाणातल्या का होईना, पण काही मुलींचं आयुष्यही जरा बरं होईल या बाईंना व्यासपीठ मिळालं नाही तर!

............सा… Wed, 04/06/2014 - 02:05

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती एकच सांग "लिव्ह इन " म्हणजे मुलींना बरं आयुष्य अन विवाह म्हणजे "मागे ढकलणे" का? त्यांचे काही विचार टोकाचे अन अत्यंत प्रतिगामी आहेत पण मुलीला घरकाम आले पाहीजे, फक्त इंजिनीअर्/डॉक्टर होणे म्हणजे सगळं झालं असं नसून अन्य जीवनावश्यक सॉफ्ट स्किल्स/ स्किल्स त्यांना त्यांच्या "आई"नी शिकवली पाहीजेत यात फार जहरी काही वाटत नाही.
त्यांचं सगळं घेऊ नका पण काहीतरी घेता येईल. अन मग नंदन म्हणतात तसच जर जास्त टाकाऊ असेल अन अतिशय कमी घेण्यासारखे असेल तर व्यासपीठ मिळू नये हेच श्रेयस्कर.

'न'वी बाजू Wed, 04/06/2014 - 02:26

In reply to by ............सा…

अदिती एकच सांग "लिव्ह इन " म्हणजे मुलींना बरं आयुष्य अन विवाह म्हणजे "मागे ढकलणे" का?

असा दावा नेमका कोणी आणि कधी केला बरे?

फक्त इंजिनीअर्/डॉक्टर होणे म्हणजे सगळं झालं असं नसून...

असा दावा नेमका कोणी आणि कधी केला बरे?

अन्य जीवनावश्यक सॉफ्ट स्किल्स/ स्किल्स त्यांना त्यांच्या "आई"नी शिकवली पाहीजेत

काहीही गरज नाही. गरज पडली, तर सगळे शिकतो माणूस. अन्यथा, नाही आले, तरी काहीही बिघडत नाही.

उलट मी म्हणतो, धक्के मारून हॉस्टेलवर पाठवावे मुलींना. (आणि मुलांनासुद्धा.) स्वतंत्र होऊन आपल्या पायावर उभे राहायला लावावे. फार लाडावून ठेवलेले असते एकेकां(कीं)ना!

पब्लिकचे चारदोन फटके खाल्ले, की 'सॉफ्ट स्किल्स' झक मारत, आपसूक येतात. ते आईवडिलांनी पढविण्याची गरज नसते. आईवडिलांनी पढविले, की मुले झापडबंद बनतात. असलीच पुचाट संस्कृती रुजवायची आहे काय भारतवर्षात?

नितिन थत्ते Wed, 04/06/2014 - 11:01

In reply to by 'न'वी बाजू

>>उलट मी म्हणतो, धक्के मारून हॉस्टेलवर पाठवावे मुलींना. (आणि मुलांनासुद्धा.) स्वतंत्र होऊन आपल्या पायावर उभे राहायला लावावे.

हाष्टेलात जाऊन असं झालं तर कुटुंब व्यवस्थेचं काय होईल ?

'न'वी बाजू Wed, 04/06/2014 - 17:20

In reply to by नितिन थत्ते

हाष्टेलात जाऊन असं झालं तर कुटुंब व्यवस्थेचं काय होईल ?

कुटुंबव्यवस्था माणसांत येईल.

(सीरियसली, आजवर इतकी वर्षे लोक हॉष्टेलवर जात आहेत - लोकमान्य टिळक डेक्कन कालिजात असताना कुठे राहात असावेत बरे? झालेच तर, पूर्वी मुले गुरुगृही जात, वगैरे वगैरे. गुरुगृहे म्हणजे तत्कालीन हॉष्टेलेच नव्हेत काय?

आता मला सांगा, यांच्यामुळे देशाचे, आपल्या महान संस्कृतीचे, झालेच तर कुटुंबव्यवस्थेचे काही वाकडे झालेय?)

......................................................................

यांनी म्हणे कालिजात असताना 'शरीर कमावण्या'च्या नावाखाली एक वर्ष ड्रॉप घेतला होता. लेक्चरे बंक मारण्यासाठी कुछ भी करेगा!

ती 'भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासा'तली रंगीबेरंगी उदाहरणेसुद्धा आमच्या मते एक तर गुरुगृहातील एखाद्या छात्राच्या सुपीक डोक्यातून उद्भवली असावीत, नाहीतर गुरुगृहांतून चोरून फिरणार्‍या हलक्या प्रतीच्या भूर्जपत्रांवरील पिवळ्या पुस्तकांतून आली असावीत. इतिहासाचार्यांनी उगाचच गंभीरपणे घेतले.

यांना तसेही दुसरे उद्योग काय असावेत बरे?

'आमच्या वेळचे' छात्र अशाच प्रकारच्या 'हिंदी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा/कविता' रामायणात, नाहीतर शंकराच्या गोष्टींत घुसडत.

'आमच्या वेळी' हॉष्टेलांहॉष्टेलांतून चोरून फिरणार्‍या पुस्तकांतील कथासुद्धा नेमक्या सुरस नव्हेत, तरीही 'भा.वि. इतिहासा'तील कोणत्याही कथेच्या तोंडात मारतील, अशा चमत्कारिक असत. (पण म्हणून त्या खर्‍या असाव्यात - किंवा समकालीन सामाजिक रीतिरिवाजांच्या निदर्शक असाव्यात - असल्या मूर्ख निष्कर्षापर्यंत आम्ही कधीही पोहोचलो नाही.)

यांनासुद्धा तसेही दुसरे उद्योग काय असावेत बरे?

बॅटमॅन Wed, 04/06/2014 - 17:24

In reply to by 'न'वी बाजू

ती 'भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासा'तली रंगीबेरंगी उदाहरणेसुद्धा आमच्या मते एक तर गुरुगृहातील एखाद्या छात्राच्या३ सुपीक डोक्यातून उद्भवली असावीत४, नाहीतर गुरुगृहांतून चोरून फिरणार्‍या हलक्या प्रतीच्या भूर्जपत्रांवरील पिवळ्या पुस्तकांतून आली असावीत.५ इतिहासाचार्यांनी६ उगाचच गंभीरपणे घेतले.

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

धन्य _/\_

तदुपरि पिवळ्या पुस्तकांचा पिवळेपणा हा जुन्या भूर्जपत्रांवर चोरून घाईघाईने लिहिलेल्या मजकुरामुळे चिकटला असावासे वाटते आहे.

'न'वी बाजू Wed, 04/06/2014 - 17:35

In reply to by बॅटमॅन

तदुपरि पिवळ्या पुस्तकांचा पिवळेपणा हा जुन्या भूर्जपत्रांवर चोरून घाईघाईने लिहिलेल्या मजकुरामुळे चिकटला असावासे वाटते आहे.

शक्यता रोचक आहे. किंबहुना, पुस्तकांच्या पिवळेपणाची परंपरा ही जुन्या भूर्जपत्रांच्या पिवळेपणातून आली असावी, असा काहीसा आमचाही कयास होताच. तदुपरि, ठाम निष्कर्षाप्रत येण्यापूर्वी तूर्तास अधिक पुराव्याची वाट पाहात आहोत.

बॅटमॅन Wed, 04/06/2014 - 17:41

In reply to by 'न'वी बाजू

या विषयावर एकदा चर्चा करून इथे मांडायची आहे.

(सार्वजनिक जालकर) बॅटमॅन.

'न'वी बाजू Wed, 04/06/2014 - 17:48

In reply to by बॅटमॅन

Never postpone until tomorrow what you can postpone until the day after. शुभस्य शीघ्रम|

बॅटमॅन Wed, 04/06/2014 - 17:55

In reply to by 'न'वी बाजू

शुभस्य शीघ्रम|

पडोसन नामक आद्य 'फेभारिट' पिच्चरमधील इपॉनिमस(?व्यक्तिनिर्देश नसलेला पण हाच तो असे सांगायचे असल्यास शब्द काय?) ड्वायलॉक आठवला.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 04/06/2014 - 03:02

In reply to by ............सा…

... यात फार जहरी काही वाटत नाही.

प्रश्न सुट्या भागांबद्दल नाही. एकून प्रॉडक्ट म्हणून जे काही येतं ते वाईट आहे. मुलींना घरकाम यावं हे म्हणण्यामागचा हेतू दुष्ट आहे. घरकाम करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर, अगदी अलिकडपर्यंत, इतर पर्याय न देता ढकलली जात असे त्या मुलीच होत्या. ज्या भागांत जाऊन त्या जहर ओकतात तिथल्या मुलींना घरकाम येत नाही असा काही दावा, दुवा, विदा आहे का? तसं असेल तर या बडबडीला अर्थ आहे. नाहीतर ते "एवढी वर्ष आम्ही घरकाम केलं आता तुमची कशी काय घरकामातून थोडी सुटका होते," या जळजळीपलिकडे त्यांच्या सल्ल्याला काही अर्थ नाही.

वर त्याच म्हणतात "आई"ने हे शिकवायला पाहिजे. याचा अर्थ वडलांची - पुरुषांची - हे शिकवण्याची पत नाही. म्हणजे पुरुषांना या गोष्टी शिकवण्याची गरज आहे. हे बाईंच्याच बडबडीतून समजलेलं. निदान मुलामुलींना हे शिकवा असं म्हणाल्या असत्या तरी ठीक. पण ते ही नसल्यामुळे ही बडबडही जहर असण्याबद्दल मला काहीही संशय नाही.

तरीही, कुठेतरी एकदा माणूस कुत्र्याला चावला असेल तर "माणसांनी कुत्र्याला चावू नये" अशा प्रकारचा बकवास करण्यात काय हशील आहे?

'न'वी बाजू Wed, 04/06/2014 - 03:56

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तरीही, कुठेतरी एकदा माणूस कुत्र्याला चावला असेल तर "माणसांनी कुत्र्याला चावू नये" अशा प्रकारचा बकवास करण्यात काय हशील आहे?

तसेही, कुत्रा आणि माणूस यांपैकी दोघांनाही आक्षेप नसेल, तर तिर्‍हाइतास यात नाक खुपसण्याचा नेमका काय अधिकार आहे? (अवांतर: कुत्र्यांमधील एज ऑफ कन्सेण्ट काय असावे?)

शहराजाद Wed, 04/06/2014 - 05:20

In reply to by ............सा…

"लिव्ह इन " म्हणजे मुलींना बरं आयुष्य अन विवाह म्हणजे "मागे ढकलणे" का?

अदिती ' विवाह म्हणजे मागे ढकलणे ' असे म्हणत नाही आहेत. फक्त लिव्ह इन म्हणजेदेखील मागे ढकलणे नाही असे मला वाटते. प्रत्येक व्यक्तीनुसार दोन्ही चांगले असू शकते.

त्यांचे काही विचार टोकाचे अन अत्यंत प्रतिगामी आहेत

चला इथे आपले एकमत झाले.

पण मुलीला घरकाम आले पाहीजे, फक्त इंजिनीअर्/डॉक्टर होणे म्हणजे सगळं झालं असं नसून अन्य जीवनावश्यक सॉफ्ट स्किल्स/ स्किल्स त्यांना त्यांच्या "आई"नी शिकवली पाहीजेत यात फार जहरी काही वाटत नाही.

नुसत्या यात जहरी काही नाही हो, पण त्या काय म्हणताहेत ते नीट बघा- १) स्वयंपाक, घरकाम, घरातल्या लोकांशी मिळूनमिसळून राहणे, पड खाणे इ जीवनावश्यक सोफ्ट स्किल्स फक्त स्त्रियांचेच काम आहे , पुरुषांचे नाही२) त्यामुळे स्वयंपाक, घरकाम, घरातल्या लोकांशी मिळूनमिसळून राहणे इ जीवनावश्यक सोफ्ट स्किल्स शिकवणे फक्त आईचेच काम , बापाचे नाही. २) साहजिकच आईनेही ही कौशल्ये फक्त मुलींनाच शिकवणे गरजीचे आहे. ( मुलाला मिळूनमिसळून राहण्याची, पड खाण्याची, स्वतःच्या घरात कामे करण्याची काय गरज? त्याच्यासाठी डॉक्टर/ इंजिनिअर होणे म्हणजे सगळे झाले. )
या उपदेशात जहरी असेल तर तो 'फक्त' ने सूचित भाग.

या बाईंच्या व्याख्यानातली त्यांच्या 'आदर्श' संस्काराच्या कुटुंबाची उदाहरणे बघा. त्या सांगतात, त्यांची आई कधीही पोटभर जेवली नाही. घरच्यांना पोटभर खाऊ घालून त्यांची आई कायम अर्धपोटी राहिल्याचे त्या अगदी असे काही रंगवून सांगतात की त्यागाचे थोर वळण असावे तर हे असे! त्यागाचा आनंद असावा तर असा!
त्या माऊलीने तो त्याग केला याबद्दल माझा आक्षेप नाहीच. पण स्वतःला, बाकीच्यांना पोटभर मिळेल इतके अन्न असताना त्यांच्या वडिलांनी हे 'कायम ' कसे चालू दिले? घरातल्या पुरुषांचे वळण ह्या 'आदर्श' संस्कारांच्या कुटुंबात हे असे होते.

बाईंच्या दाखल्यात जोडीदाराच्या या मूलभूत गरजांची काळजी घेण्याचे सॉफ्ट स्किल यांच्या जीवनपद्धतीत पुरुषांना मुळीच गरजेचे नाही, पण स्त्रीला अनिवार्य आहे. त्यांच्या भाषणांतही निराळे आही असत नाही.
याला माझा आक्षेप आहे.

कुटूबसंस्था, ब्राम्हण्य खतरे में है असा लोकांना भिडेलसा नारा दऊन त्यामागची कारणे देतात ती एक तर साफ चुकीची आहेत. त्यासा~ठीचे उपाय गंडलेले आहेत.

यांचं सगळं घेऊ नका पण काहीतरी घेता येईल.

काही लोक म्हणयात, मनुस्मृतीतील वाईट सोडा, पण चांगले तरी घेता येईल. याला उत्तर असे: नियम/ निर्बंध / दंड प्रत्येकच वेळी जातीप्रमाणे निरनिराळे होतात तेव्हा ते नेहमीच काही समाजाला अन्याय्य ठरतात. तसेच या बाईंच्या नियमांचे आहे.

Nile Wed, 04/06/2014 - 04:58

In reply to by ............सा…

अदिती एकच सांग "लिव्ह इन " म्हणजे मुलींना बरं आयुष्य अन विवाह म्हणजे "मागे ढकलणे" का?

सगळं जग करतं म्हणून कळपातल्या मेंढ्यांप्रमाणे विवाह करणे हे स्वतः निर्णय घेऊन लिव्ह इन करणार्‍यांपेक्षा मागे राहणेच. प्रतिगामीच. १८व्या शतकातून बाहेर या, म्हणजे पटेल.

अतिशहाणा Fri, 06/06/2014 - 21:52

In reply to by 'न'वी बाजू

टू मेनी अझम्प्शन्स.

सहमत.

किंबहुना-

वैयक्तिक 'निरीक्षणांवरून' लोक काय काय चर्चा करतात अन काय काय निष्कर्ष काढतात हे पाहून अचंबा वाटतो! आधी तुमची निरीक्षणं बरोबर आहेत का याची खात्री तर करून घ्या.

बॅटमॅन Wed, 04/06/2014 - 14:21

In reply to by Nile

सगळं स्वयंघोषित लिबरल जग करतं म्हणून त्यांच्या मागे कळपातल्या मेंढ्यांप्रमाणे जाऊन लिव्ह इन करणं हे बहुतेक पुरोगामी असावं, नै?

Nile Fri, 06/06/2014 - 20:06

In reply to by बॅटमॅन

नुसते शब्द बदलले म्हणजे वाक्य खरं होईल असं नाही. आधी आपण काय लिहतोय ते वाचा तरी.

१. किती टक्के लिबरल लोक लिव्ह इन करतात वि. किती टक्के भारतीय लोक अरेंज्ड मॅरेज करतात?
२. लिव्ह इन हे दोन व्यक्तींनी ठरवून केलेली अरेंजमेंट असते. पालकांनी पत्रिका, कूळं, गोत्रं, सोनं नाणं देण्याची क्षमता, वडलांचा व्यवसाय वगैरे गोष्टी पाहून (अन मूलाची फक्त 'रूपाला" संमती घेऊन) ठरवलेलं कंत्राट नाही.

असो, डोळ्यांवर पट्टी लावून फिरलं की असं व्हायचंच.

अतिशहाणा Fri, 06/06/2014 - 20:12

In reply to by Nile

. पालकांनी पत्रिका, कूळं, गोत्रं, सोनं नाणं देण्याची क्षमता, वडलांचा व्यवसाय वगैरे गोष्टी पाहून (अन मूलाची फक्त 'रूपाला" संमती घेऊन) ठरवलेलं कंत्राट नाही.

हे कंत्राट कशासंदर्भात म्हटले आहे?

Nile Fri, 06/06/2014 - 20:36

In reply to by अतिशहाणा

कशासंदर्भात म्हणलंय ते स्पष्ट आहे. तस्मात, प्रश्न कळला नाही.

अतिशहाणा Fri, 06/06/2014 - 20:44

In reply to by Nile

लग्न करणार्‍या सर्वांना मी कधी लेबल लावलं? चष्मे काढा, म्हणजे काय लिहलंय ते कळेल.

तुमच्या खालील प्रतिसादावरुन असे दिसते की वरील प्रतिसाद लग्नासंदर्भात नाही. त्यामुळे तुम्ही नक्की हे कशासंदर्भात म्हटलंय हे कळलं नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/06/2014 - 20:53

In reply to by Nile

"सगळं जग करतं म्हणून कळपातल्या मेंढ्यांप्रमाणे विवाह करणे" आणि प्रतिसादात स्पष्टपणे व्यक्त न केलेली, परंतु मोडीतही न काढलेली शक्यता - आपल्याला करायचं आहे म्हणून विवाह करणे - यांच्यातला फरक मला (between the lines) वाचता आला. मी त्या दुसऱ्या प्रकारातली आहे म्हणूनही असेल पण " सगळं जग करतं म्हणून कळपातल्या मेंढ्यांप्रमाणे विवाह करणे" हे मला स्वतःचं वर्णन वाटलं नाही.

अतिशहाणा Fri, 06/06/2014 - 21:00

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सगळं जग करतं म्हणून कळपातल्या मेंढ्यांप्रमाणे विवाह करणे

सगळं जग जगतं म्हणून फक्त जगण्यासाठी कळपातल्या मेंढ्यांप्रमाणे बहुसंख्य लोक जगतच आहेत. त्यामानाने त्याच स्वरुपाचा विवाह करणाऱ्यांस मात्र बोल लावणे थोडे आश्चर्याचे वाटते.

Nile Fri, 06/06/2014 - 21:24

In reply to by अतिशहाणा

इथे विषयानुरूप बोल लावले जातात. जिथे मेंढ्यांप्रमाणे जगण्याचा विषय चालू असेल तिथे त्यांना बोल लावले जातीलच. पण इथे त्यांना बोल लावले नाहीत म्हणजे त्या जगण्याचे समर्थन आहे असा निष्कर्ष काढणे रोचक वाटले.

अतिशहाणा Fri, 06/06/2014 - 21:34

In reply to by Nile

सगळं जग करतं म्हणून कळपातल्या मेंढ्यांप्रमाणे विवाह करणे

विवाह करणारे सगळं जग करतं म्हणून विवाह करतात हा निष्कर्ष कोणत्या विद्याच्या आधारे काढला आहे? (आणि लिव-इनवाले प्रो-ज आणि कॉन्ज कसे इव्हॅल्युएट करतात) निदान गुर्जींसारखा एखादा आलेख वगैरे दाखवा की.

Nile Fri, 06/06/2014 - 21:54

In reply to by अतिशहाणा

जे मी लिहलेलं नाही ते वाचण्याचे तुमचे कसब कमाल आहे.

सगळ जग करतं म्हणून.... विवाह करणे हे.. अशी वाक्य रचना आहे. याचा अर्थ असा होतो की जे 'सगळं जग..' म्हणून 'विवाह करतात..' ते. यापेक्षा जास्त समजावून देऊ शकत नाही. क्षमस्व.

अतिशहाणा Fri, 06/06/2014 - 21:58

In reply to by Nile

सगळं जग करतं म्हणून कळपातल्या मेंढ्यांप्रमाणे विवाह करणे हे स्वतः निर्णय घेऊन लिव्ह इन करणार्‍यांपेक्षा मागे राहणेच

हो पण विवाह करणाऱ्यांपैकी नक्की किती जण असे करतात हे तरी सांगा. की फक्त अॅनेक्डोटल निरीक्षणेच आहेत? विवाहासारख्या बहुतांशी फायदेशीर सामाजिक संस्थेवर निव्वळ ताशेरे मारण्याने चर्चा पुढे जाणार नाही.

Nile Fri, 06/06/2014 - 22:03

In reply to by अतिशहाणा

मी लिहलेल्या प्रतिसादातील मुद्दा काय आहे हे लक्षात घेण्याचा प्रयत्न केलात तर माझा मुद्दा समजेल. अमुक इतके लोक करतात हा दावा मी केलेला नाही. "मेंढ्याप्रमाणे" विवाह करण्यापेक्षा स्वतः निर्णय घेऊन लिव्ह इन राहणे हा निर्णय निर्विवाद योग्य आहे असे मी म्हणलेले आहे. त्याला तुमचा आक्षेप असेल तर त्यावर चर्चा करू शकतो. इतर शाब्दिक खेळ खेळण्याइतकी सवड मला नाही.

बॅटमॅन Fri, 06/06/2014 - 22:13

In reply to by Nile

मग नक्की कशाप्रमाणे विवाह करणे योग्य आहे?

की विवाह करणे हेच अयोग्य आहे?

फालतूची धार काढून मुद्दे अगोदरच एक्स्प्लिकेट केले असतेत तर बरे झाले असते, पण ते कै होणे नाही...

Nile Fri, 06/06/2014 - 22:38

In reply to by बॅटमॅन

मग नक्की कशाप्रमाणे विवाह करणे योग्य आहे?

सूरुवात करण्याआधी सोडवावा असा प्रश्न आहे. शुभेच्छा.

फालतूची धार काढून मुद्दे अगोदरच एक्स्प्लिकेट केले असतेत तर बरे झाले असते, पण ते कै होणे नाही.

सॉरी, स्पून फिडींग करायची सवय नाही.

ॲमी Fri, 06/06/2014 - 22:12

In reply to by अतिशहाणा

ताशेरे मारल्यास एवढं थ्रेटनिंग का वाटत प्रोलग्नवाल्यांना?
तिकडे माझ्या विवाहविषयीचे कायदे धाग्यावरपण, आहे तेच कायदे ब्लंट शब्दात लिहीले तर, 'आम्हाला रिड्यीक्यूल केल' अशी समजूत करुन घेऊन 'भावनेचा त्सुनामी' आणला... :-D

बॅटमॅन Fri, 06/06/2014 - 22:14

In reply to by ॲमी

हे बरंय..अँटिलग्नवाल्यांनी काही बोललं तरी प्रोलग्नवाल्यांनी गप्प रहावं आणि व्हाईस व्हर्सा मात्र नको?? का????

ॲमी Fri, 06/06/2014 - 22:05

In reply to by Nile

sigh. चूकीचा अर्थ काढला जातोय Nile च्या प्रतिसादाचा.
विवाह करणार्यांपैकी जे फारसा विचार न करता, सगळे जग करते म्हणून आपणही केले पाहिजे किंवा it is must part of life अशा समजूतीने लग्न करतात, ती कळपातल्या मेंढराप्रमाणे मुकी बिचारी हाका कोणीही लोकं असतात. अशा लोकांपेक्षा स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन, त्याचे जे काही धन ऋण परीणाम होतील ते भोगायला तयार असणारी लिव्ह इनवाली लोकं जास्त उच्च पातळीवर असतात.
मी सहमत आहे या विचारांशी.

अतिशहाणा Fri, 06/06/2014 - 22:11

In reply to by ॲमी

विवाह करणार्यांपैकी जे फारसा विचार न करता, सगळे जग करते म्हणून आपणही केले पाहिजे किंवा it is must part of life अशा समजूतीने लग्न करतात, ती कळपातल्या मेंढराप्रमाणे मुकी बिचारी हाका कोणीही लोकं असतात.

आणि त्यांचे नक्की काय चुकते बॉ? लग्न करून मुलाबाळांना जन्म देतात. शक्य तितके चांगले आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात. लग्न जीवनाचा एक भाग आहे हा विचार करणारे लग्न हा जीवनाचा महत्त्वाचा भाग नाही यांच्यापेक्षा नीच पातळीवर कसे काय पोचतात?

समांतर उदाहरणः रोज ( मेंढरांप्रमाणे वचावचा ) जेवण करणाऱ्यांपैकी मी एक आहे. फारसा विचार न करता इतर लोक जेवतात म्हणून मी जेवतो. अनेकदा माझ्या जेवणाचा निर्णय बायकोच घेते. जेवण हवे की नको याउप्पर काय खायचे यात मला निर्णयस्वातंत्र्य नाही. आता जगरहाटी पाळून गुमान गिळणाऱ्या माझ्यापेक्षा स्वतःचा निर्णय घेऊन मॅकडोनल्डमध्ये बर्गर खाणारे (मॅकडोनल्डच्या ओबेसिटी व इतर ऋण परिणामांस भोगायला तयार असणारे) नक्की कोणत्या पातळीवर श्रेष्ठ ठरतात?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/06/2014 - 23:26

In reply to by अतिशहाणा

लग्न ही माणसाची मूलभूत गरज नाही, जेवण ही आहे.

चारचौघींसारखे मी पण (डोक्यावरचे) केस नियमितपणे कापते. त्यात फार विचार न करता, जे काही ठराविक कट्स लोक करतात त्यातलेच काही निवडते. (टक्कल करण्याची थोडी खाज असली तरी अजूनही डोकं पूर्ण भादरलेलं नाही. त्या अर्थी मी पण प्रवाहाच्या दिशेनेच जाते.) पण प्रवाहाच्या दिशेने जायचं हा निर्णय माझा मी घेतलेला आहे. किंवा मला ठराविक विषयाबद्दल फार विचार करायचा नाही, तेवढं त्याचं महत्त्व नाही असं समजून मग विचार न करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

तुम्ही काय जेवायचं, कोणाच्या हातचं जेवायचं याबद्दल फार विचार न करण्याचा निर्णय घेऊन असं करत असण्याचीही शक्यता आहे. आणि त्याबद्दल आक्षेप घेण्याचं कारण मला तरी दिसत नाही.

नितिन थत्ते Fri, 06/06/2014 - 22:35

In reply to by ॲमी

>>विवाह करणार्यांपैकी जे फारसा विचार न करता, सगळे जग करते म्हणून आपणही केले पाहिजे किंवा it is must part of life अशा समजूतीने लग्न करतात, ती कळपातल्या मेंढराप्रमाणे मुकी बिचारी हाका कोणीही लोकं असतात. अशा लोकांपेक्षा स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन, त्याचे जे काही धन ऋण परीणाम होतील ते भोगायला तयार असणारी लिव्ह इनवाली लोकं जास्त उच्च पातळीवर असतात.

लिव्ह इन जितके लोक करतात तितके तरी किमान लोक लग्न या प्रकरणाचा डोळसपणे विचार करून मग लग्नाच्या मार्गाला जातात हे नमूद करू इच्छितो. तेवढे तरी लग्न करणारे लिव्ह-इन करणार्‍यांच्या पातळीचे मानता येतील का? की ते लग्न करतात म्हणजे बाय डिफॉल्ट खालच्याच पातळीचे?

बॅटमॅन Fri, 06/06/2014 - 22:00

In reply to by अतिशहाणा

अहो पण विदा मिळत नसला तरी थेर्‍या पुटप करायला बंदी घातलीये कोणी? सेल्फराइचसपणा दाखवायची याहून उत्तम संधी मिळणार कुठे? लग्ने केली की बाय डिफॉल्ट तुम्ही गतानुगतिकच होणार. साला लग्न पण काय करायची चीज आहे? लिव्ह-इन करा लिव्ह-इन. फक्त लेबलेच वेगळी द्या, पण द्या. प्रत्यक्ष जीवनापेक्षा त्याच्या लेबलात स्वारस्य असणे हाच खरा लिबरलपणा.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/06/2014 - 23:19

In reply to by अतिशहाणा

माझ्या आकलनानुसार, इथे प्रश्न स्वरूपाबद्दल नसून हेतूबद्दल आहे. सगळे करतात म्हणून ठराविक गोष्ट केली आणि मला हवी म्हणून मी ठराविक गोष्ट केली, असे दोन प्रकार आहेत. यात दुसऱ्या प्रकारात स्वतःची आवडनिवड, विचार आहे. व्यक्तिगत आवडीनिवडीबद्दल आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही. आक्षेप असा नाहीच (घेणारी मी कोण "छप्पन टिकली"!)

विचार न करता घेतलेल्या - म्हणून प्रवाहपतित असणाऱ्या - निर्णयापेक्षा विचार करून घेतलेला, उलट दिशेचा निर्णय अधिक योग्य वाटतो, यात आक्षेपार्ह काय असावं हे खरंच समजलं नाही. (विचार करून, ठरवून, प्रवाहाच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेणाऱ्यांबद्दल काही भूमिका घेतल्याचं मला तरी दिसलं नाही.)

अतिशहाणा Sat, 07/06/2014 - 01:24

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विचार न करता घेतलेल्या - म्हणून प्रवाहपतित असणाऱ्या - निर्णयापेक्षा विचार करून घेतलेला, उलट दिशेचा निर्णय अधिक योग्य वाटतो,

प्रवाहपतित असण्याचा निर्णय विचार न करताच घेतलेला असतो हा फार मोठा गैरसमज आहे. प्रवाहपतित असण्याचे अनेक फायदे असतात. सर्वजण करतात त्यामागे (कदाचित) समूहाचा शहाणपणा असू शकल्याने तोच मार्ग स्वीकारल्यास यश मिळण्याची शक्यता वाढू शकते असा विचार (मुकी-बिचारी कुणीही हाका प्रकारची) जनता करत नसावी की काय?

शिवाय विचारांती घेतलेल्या उलट निर्णयाची योग्यायोग्यता कोणत्या निकषावर तपासून पाहिली आहे की तो आपोआप योग्य ठरतो? प्रवाहपतित न होण्याचा विचारांती घेतलेला निर्णय अयोग्य असूही शकतो. (लिव-इनमध्ये (जे काही निकष असतील त्यांनुसार) अपयश येत नाही काय?) प्रवाहापतिताच्या विरोधातील निर्णय आक्षेपार्ह नाहीच. तसा दावाही केलेला नाही. मात्र प्रवाहपतितांचा निर्णय आक्षेपार्ह आहे हे अध्याहृत चुकीचे आहे इतकेच दाखवायचे आहे.

अवांतरः अनंत फंदींचा फटका तुम्हाला अभ्यासक्रमात होता काय?

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 07/06/2014 - 03:31

In reply to by अतिशहाणा

विचार करून, निर्णय घेऊन उलटं पोहोताना कोणी बुडलं तरीही निदान विचार केला, इतपत श्रेय देता येतं.
विचार न करतात प्रवाहपतित होणं निराळं. ठरवून प्रवाहाच्या दिशेने जाणं निराळं. तिथे निर्णय न घेण्याचाही निर्णय घेतलेला असतो. ते पतन नाही, फारतर पाण्यात उडी मारून प्रवाहाच्या दिशेने जाताना हातपाय न मारणं आहे. विचार करण्याचं श्रेय याही परिस्थितीत देता येतं. नाईल याचं वाक्य मला जसं समजलं तसं मी लिहीलं. याबाबतीत आपले मतभेद आहेत असं दिसतं. त्याबद्दल तक्रार/आक्षेप नाही.

मुळात लग्न करणं- न करणं, लिव्हीनमध्ये राहणं-न राहणं यालाच स्वतंत्ररीत्या मूल्याचा दर्जा देता येणार नाही. त्यामुळे रामतीर्थकर बाईंच्या (हास्यास्पद) बडबडीचा संदर्भ नसेल तर ही चर्चा व्यर्थ आहे.