मंगळयान आणि बालाजी
बातमी : इस्रो प्रमुख बालाजीच्या पायाशी दरवेळी साकडं घालतात?
बातमीतला काही भागः
बालाजी चरणी प्रतिकृती
भारताच्या मंगळमोहिमेला आशीर्वाद मिळविण्यासाठी इस्रोचे प्रमुख के. राधाकृष्णन यांनी सोमवारी तिरुपती बालाजीची पूजा केली. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी पदमिनी होती. इस्रोच्या प्रत्येक उड्डाणापूर्वी यानाची प्रतीकृती घेऊन राधकृष्णन हे तिरुपती मंदिरात पूजेसाठी येत असतात. यावेळीही त्यांनी मंगलयानाची प्रतिकृती आणली होती. ती बालाजीपुढे ठेवण्यात आली.
हे माहीत नव्हतं.. सीरियसली??
?
कळले नाही. कोणत्या सांस्कृतीक/पारंपारीक कार्याचा संदर्भ आहे का?
वरील विधान फक्त 'लॉजिक' वर आधारीत आहे.
माझा कर्मकांडांवर विश्वास असेल१ आणि मला पुरोहित नास्तिक आहे२ हे माहित असेल तर मी त्या पुरोहिताला कर्मकांड करावयास बोलावणार नाही. (कारण त्याने केलेल्या कर्मकांडांवर मी विश्वास ठेऊ शकत नाही.) हे विधान सोपं लॉजिक आहे.
१ आणि २ शी छेडछाड करून काय होईल, यात मला रस नाही.
-Nile
आता कळेल
http://www.aisiakshare.com/node/2115
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
मिपाकर अत्रुप्त आत्मा
मिपाकर अत्रुप्त आत्मा ह्यांस संपर्क करा असे सुचवितो
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
जावईशोध
राधाकृष्णन अंधश्रद्धाळू आहेत की कसे हा मुद्दा कधीच नव्हता हे लक्षात न घेणे म्हणजे अभ्यास कमी पडला की सोयीस्कर बगल? ते कसेही असोत, त्याचा कामावर पडणारा फरक हा आणि हाच मुद्दा होता. तारसप्तकात ओरडताना या मुद्द्याचे विस्मरण झालेले दिसते.
अहो शकायला काय काहीही होऊ शकते. कॉन्स्पिरसी थिअरीज अशाच जन्मतात म्हणून विदा मागितला तर विशेषणे पखरावीत? विदा दिल्यावर मग निषेध केलाच की.
टंकनश्रम वाचवल्याबद्दल आभार.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
नीट वाचणे
तो मुद्दा आहे. अंधश्रद्धाळू माणसाच्या हातात आम्ही आमच्या घरातला रिमोटही देत नाही.
असहमत. "काहीही" होऊ शकत नाही.
मी अजून कोणतीही थेअरी मांडलेली नाही. अंधश्रद्धाळू माणसावर महत्त्वाचे निर्णय सोपवताना मी साशंक आहे ही थेअरी नाही.
-Nile
वोक्के
इस्रोवर तुमची वैयक्तिक मालकी नसल्याने या विधानाला अर्थ नै. तुमच्या घरातले काही काम असेल तर गोष्ट वेगळी.
ते अशा अर्थी म्हटले होते की बोलायला काय काहीही बोलू शकतो.
अन तुम्ही थेरी मांडा न मांडा, मुद्दा तो नाही. साधा विदा काय तो मागितल्यावरचे आकांडतांडव पाहिलेच आहे. ही हुकूमशाही वृत्ती आहे. विदा दिल्यावर निषेध केला हेही न पाहिल्यागत केलेय ते पाहिलेच आहे. चालूद्या.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
<<अतिरेकी
<<अतिरेकी अश्रद्ध.....<..अश्रद्ध.. <-५ -४ -३ -२ -१ ० १ २ ३ ४ ५... >.. सश्रद्ध..>अतिरेकी सश्रद्ध>> या ब्रॉड स्केल वरील ० हा बिंदू अर्थातच काल्पनिक व आदर्श आहे स्केल देखील सोयी साठी लिनिअर समजू. डॉ के. राधाकृष्णन हे सश्रद्ध तेच्या जवळपास असू शकतात.ते काही अश्रद्ध व नास्तिक कुटुंबात जन्माला आलेले नसावेत. खर तर हे अबस्ट्रॅक्ट आहे. वैज्ञानिकांनी वा विज्ञानाधिष्ठीत तंत्रज्ञांनी हे कडवे अश्रद्ध व कमालिचे नास्तिक असणे हे लोकांना अभिप्रेत असते. असे असेल तरच ते वैज्ञानिक दृष्टीकोनात बसते असे एक गृहितकच जणु मानलेले असते. तसे नसेल तर तो फाउल पकडला जातो. यामुळे उघड भुमिका घेताना अनेकांची गोची होते. मागे एकदा जयंत नारळीकरांनी न्युटच्या सफरचंदाच्या झाडाचे वंशच असलेले झाड इथे आयुकात आणण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी काही सश्रद्धांनी आता तुमच हे चालत वाटतं? असे वाचकांच्या पत्रात लिहिले होते. म्हणजे स्मृती, प्रतिके, भावना या क्षेत्रात जणु तुम्ही अश्रद्धांनी लुडबूड करु नये असा इशारा दिला होता.
तिरुपती बालाजीची पूजा केली तरच यानाचे उड्डाण यशस्वी होणार आन केली नाही तर अयशस्वी होणार अशा भ्रमात कोणी खुद्द्द राधाकृष्णन नसावे. परंतु ते रोबो नसून माणुसच असल्याने ताणतणावांना त्यांना सामोरे जावे लागणारच. अशा मोहिमांवर आख्या देशाचे लक्ष लागले असते. मग त्या तणावांना सामोरे जाण्यासाठी केवळ वैज्ञानिक दृष्टीकोन हा त्यांना पुरेसा न वाटल्याने त्यांनी श्रद्धा या गोष्टीचा आधार घेतला असणार आहे. हा मुख्यतः मानसशास्त्रीय विश्लेषणाचा भाग आहे. काही लोकांना असे वाटते की आयुष्यात कधीही श्रद्धेचा आधार घ्यावा लागू नये. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात माणसाने मानसिक दृष्ट्या निरोगी तथा खंबीरच असले पाहिजे. तसे एखादेवेळी जरी घडले नाही तरी ते कच्चे मडके असे ध्वनीत होउ लागले. रॅशनल या शब्दाला हल्ली विवेकी असा प्रतिशब्द देतात. पुर्वी बुद्धीप्रामाण्यवादी असे म्हणायचे. पण मग कोणाची बुद्धी प्रमाण मानायची असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला. तेव्हा आपला वाईड रेंज असलेला विवेकी शब्द वापरु लागले.
असो शेवटी भावभावना श्रद्धा अश्रद्धा या मेंदूतील केमिकल लोच्या आहेत. तुमच्या आमच्या॑ मेंदूत त्या कधी व कशा होतील याचा नेम नाही.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
मार्मिक म्हणून समाधान होईना.
मार्मिक म्हणून समाधान होईना. पर्फेक्ट.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
नाही पटले.
केमिकल लोचा होण्याची परवानगी इस्रो शास्त्रज्ञांना नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
परवानगी कोण देणार?
परवानगी कोण देणार?केमिकल लोच्या काय परवानगीची वाट पाहतो काय? पुजा केली म्हणून डॊ राधाकृष्णन यांची इस्रो च्या संचालक पदावरुन उचलबांगडी करण्याची मागणी देखील काही जणांकडून होउ शकते.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
पुजा केली म्हणून डॊ
घासूगुर्जींनी पूजेची पथ्ये सांगितली होती ती आठवली. त्यात अजून एक वाढवायला पाहीजे. यान/रॉकेट ऊडवण्याआधी पूजा करू नये.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
हो ना! पूजेची पथ्ये पाळलीच
हो ना! पूजेची पथ्ये पाळलीच पाहिजे
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
+१
हो.
.
आणि दुसर्या बाजूनं पहायचं तर बालाजीची प्रतिमाही अशी पणास लावण्याचा अधिकार नाही.
म्हणजे कसं ते सांगतो.
.
होउ नये*; पण दुर्दैवाने काही झालेच तर हे नीच, हलकट विज्ञानवादी "बघा, बालाजी समोर डोके टेकवूनही उपयोग झाला नाही" असे बोंबलत सुटतील.
उगाच श्रद्धाळूंच्या भावनांवर (आणि दुकानांवर) परिणाम.
.
भरिला भर म्हणजे "मिशन मार्स", "मंगळ मोहिम" हे यशस्वी झालिच तरी ही मंडळी "हा मानवी परिश्रम, मेहनत, आणि बुद्धीमत्त्ता ह्यांचा विजय आहे" असे म्हणत
बालाजीला डिस्क्रेडिट करतील.
.
म्हंजे मिशन म्येलं, तर बालाजी फेल.
मिशन तगलं तरी बालाजी पास नाहिच!!
है का नै गम्मत.
.
म्हणूनच श्री राधाकृष्णन ह्यांची ही धूर्त विचारपूर्वक केलेली खेळी असून बालाजीला हळूहळू जनमानसातून काढून टाकण्याच्या प्रयत्नात गुंतलेले बुद्धीवादी वाटतात.
नाय तर मिडियाला पत्ता लागेल अशा पद्धतीनं देवाला साकडं घातलच कशाला असतं ?
.
* "होउ नये " ह्या वाक्प्रचाराऐवजी "देव न करो" हा वाक्प्रचार श्रद्धाळूंनी तिथं बसवला तरी हरकत नाही; मुद्दा काय तो पोचल्याशी मतलब. कसें?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मुद्दा क्र १ : डॉ के
मुद्दा क्र १ : डॉ के राधाकृष्णन यांनी ती पूजा वैयक्तिकरित्या करण्याला कुणाचाही विरोध असण्याचं कारण नाही. त्यांनी हे वैयक्तिक स्तरावर केलं असल्यास ते योग्यच आहे. तसंच त्यांनी सर्वांसाठी फर्मानही काढलेलं दिसत नाही. कदाचित त्या दिवशी ते रजा घेऊन, सरकारचा वेळ खर्च न करताही आले असतील. प्रशासनिक पदावरच्या माणसाला नियम माहीत नसतील असं वाटत नाही. मेडीयाने छापलेल्या बातमीबद्दल त्यांना कितपत माहिती आहे याबद्दलही कल्पना नाही.
मुद्दा क्र. २ : सरकार ही संस्था खासगी नसून लोकांच्या (देशाच्या) मालकीची आहे जिचे प्रमुख लोकांचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रपती असतात. सरकारी कर्मचारी, अधिकारी हे राष्ट्रपतींचे पर्यायाने लोकांचे म्हणजेच त्यांनी निवडून दिलेल्या सरकारचे नोकर होत. कामाशी संबंध नसताना प्रत्येक सरकारी कर्मचारी, अधिकारी देखील या देशाचे नागरिक आहेतच कि. ते आपापल्या श्रद्धा बाळगू शकतात. पण प्रत्येक कंपनीचेही कर्मचा-यांसाठी क्ण्डक्ट रुल्स असतात तसे सरकारी कर्मचा-यांना जरा जास्तच असतात. वर थोडक्यात आढावा घेतला आहे. समजा, सरकारी कामकाजाच्या ठिकाणी जर पदावरचा मनुष्य मुस्लिम असेल तर आपला देश धर्माधिष्ठित राज्य नसल्यानं त्याने नमाज पढावा असं फर्मान काढलेलं चालणार नाही. असं फर्मान काढलं नाही तरी मिशन यशस्वी व्हावं म्हणून त्या प्रोजेक्टचा हेड या नात्याने त्याने सरकारी मानमरातबात मशिदीत जाणं किंवा चर्चमधे जाणं या घटनेकडे आपण कसं पाहू ?
मुद्दा क्र. ३ : इस्त्रो सारख्या काही प्रतिष्ठित संस्था आहेत. त्यांचं दैदीप्यमान यश हे जास्त महत्वाचं असल्याने छोट्या छोट्या चुका झाल्या तर तिकडे काणाडोळा करावा असं माझ्याप्रमाणेच अनेकांचं मत असणार. समजा अज्ञानापोटी काही चूक झालीच असेल तर तो काही गंभीर गुन्हा नसेल. त्याचं राजकारण होऊ नये यासाठी मात्र सजग राहणं गरजेचं असतं. मेडीयाची ही आगलावी वृत्ती धोकादायक वाटते. त्यांना लांबून खेळ पहायची सवय नाही असं कोण म्हणेल ?
http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/
क्र.२ मधे लोकप्रतिनिधी पण
क्र.२ मधे लोकप्रतिनिधी पण आहेत ना! मुख्यमंत्री आषाढी एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाची शासकीय महापूजा सपत्निक करतात. तशी महाराष्ट्रात परंपरा आहे. खर तर धर्मनिरपेक्ष देशात असे होउ नये. पण काय चलता है. सरकारी कार्यांलयांमधे सुद्धा सत्यनारायणाची महापूजा घालत असतात. दसर्याला शस्त्रपूजा होते.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
लोकप्रतिनिधी हा शब्द बोलका
लोकप्रतिनिधी हा शब्द बोलका नाही का ?
सरकारी कर्मचा-यांचं कोड ऑफ क्ण्डक्ट त्यांना कसं लागू होईल ? विठ्ठलाची पूजा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग असल्याने लोकांच्या वतीने त्यांनी ती करणं, अगदी मुख्यमंत्री या नात्याने यात चुकीचं काहीच नाही. त्याच वेळी त्यांना हाजीअलीचंही आमंत्रण घेता येईल किंवा माउंट मेरीचंही. पण त्यांनाही सरकारी कर्मचा-यांना उद्देशून सर्वांनी विठ्ठलाची, हाजीअलीची किंवा माउंट मेरीची पूजा करावी असा आदेश काढता येत नाही.
यासंदर्भातले कोड ऑफ कण्डक्ट गुगळल्यावर सहज उपलब्ध होउ शकतात.
http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/
धर्मनिरपेक्ष देशात असे होउ
असले प्रतिसाद वाचायला मिळू नयेत म्हणून भारत क्लिअरकट हिंदू देश असावा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
खालील गोष्टी श्रद्धा कि
खालील गोष्टी श्रद्धा कि बिज्ञान ..
योगासने : विधिवत सूर्य नमस्कार घालणे
आहार : थंड दिवसात उष्ण पदार्थ खाणे संक्रांतीला तिळगुळ खाणे
वैज्ञानिक सश्रद्ध अथवा
वैज्ञानिक सश्रद्ध अथवा अश्रद्ध असल्याचा त्यानी केलेल्या कामावर चांगला/वाईट परिणाम झाल्याचा काही विदा आहे का? अश्रद्ध आहे म्हणून विज्ञान संशोधनास जास्त पात्र असे मला तरी कुठे जाणवलेले नाही- हा फक्त व्यक्तिगत पातळीवरचा अनुभव. अश्रद्ध असल्यास सश्रद्ध-अश्रद्ध वाद नक्कीच उकरून काढतात, सश्रद्ध/बॉर्डरलाईन केस असल्यास या वादात पडायचे टाळतात.
सश्रद्ध अथवा अश्रद्ध असणे हे बालपणी झालेल्या संस्कारांचा परिणाम असतो असे माझे व्यक्तिगत मत आहे- सश्रद्ध विचारात वाढून पुढे अश्रद्ध असणे पटले तरी तसे पूर्णपणे होणे अवघड वाटते. अश्रद्ध म्हणवणार्यांविषयी मला कायम शंका असतेच. तसे मला पूर्ण अश्रद्ध म्हणजे नेमके काय असावे लागते ते कळत नाही. पूजा न करणे, देवाच्या मूर्तींसमोर हात न जोडणे, आपले निर्णय मुहूर्ताची वाट न बघता घेणे म्हणजे झाले का पुरेसे अश्रद्ध ? मग एखाद्याने मनातल्या मनात जप केला तर? तो केल्याचे कुणाला कळले तर तो सश्रद्ध, नाहीतर अश्रद्ध असे आहे का?
आणखीन एक म्हणजे सश्रद्ध अथवा अश्रद्ध असणे प्रत्येक क्षेत्रात बदलू शकते-देवा बाबत सश्रद्ध अथवा अश्रद्ध असणेच फक्त आक्षेपार्ह धरावे की अन्य अगणित बाबींबद्द्ल प्रत्येकाला पडताळत बसावे?
प्रत्येकजण मनात काय श्रद्धा बाळगतो ते कळण्याच्या पलिकडे असताना या पूजेला इतके महत्त्व देण्यात काहीच अर्थ नाही असे वाटते.
गवि, ही बातमी पहा आणि पेढे
गवि, ही बातमी पहा आणि पेढे काढा. बालाजी फेल झाला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
माझा वरचा प्रतिसाद
माझा वरचा प्रतिसाद पुन्हा देतो:-
.
आणि दुसर्या बाजूनं पहायचं तर बालाजीची प्रतिमाही अशी पणास लावण्याचा अधिकार नाही.
म्हणजे कसं ते सांगतो.
.
होउ नये*; पण दुर्दैवाने काही झालेच तर हे नीच, हलकट विज्ञानवादी "बघा, बालाजी समोर डोके टेकवूनही उपयोग झाला नाही" असे बोंबलत सुटतील.
उगाच श्रद्धाळूंच्या भावनांवर (आणि दुकानांवर) परिणाम.
.
भरिला भर म्हणजे "मिशन मार्स", "मंगळ मोहिम" हे यशस्वी झालिच तरी ही मंडळी "हा मानवी परिश्रम, मेहनत, आणि बुद्धीमत्त्ता ह्यांचा विजय आहे" असे म्हणत
बालाजीला डिस्क्रेडिट करतील.
.
म्हंजे मिशन म्येलं, तर बालाजी फेल.
मिशन तगलं तरी बालाजी पास नाहिच!!
है का नै गम्मत.
.
म्हणूनच श्री राधाकृष्णन ह्यांची ही धूर्त विचारपूर्वक केलेली खेळी असून बालाजीला हळूहळू जनमानसातून काढून टाकण्याच्या प्रयत्नात गुंतलेले बुद्धीवादी वाटतात.
नाय तर मिडियाला पत्ता लागेल अशा पद्धतीनं देवाला साकडं घातलच कशाला असतं ?
.
* "होउ नये " ह्या वाक्प्रचाराऐवजी "देव न करो" हा वाक्प्रचार श्रद्धाळूंनी तिथं बसवला तरी हरकत नाही; मुद्दा काय तो पोचल्याशी मतलब. कसें?
.
बादवे, मिशन अजून पूर्ण फेल झालेलं दिसत नाही; फक्त काही अडथळे आलेत म्हणे.
फक्त श्रद्धाळूंचं नाक कापलं जावं म्हणून मिशन फेल व्हावं हे काही पटत नाही.
बालाजी महात्म्य पसरलं तरी चालेल; पण मिशन यशस्वी व्हावं हीच इच्छा आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
नक्की पुजेत काहीतरी विसरलं
नक्की पुजेत काहीतरी विसरलं असणार. आता प्रायश्चित्त म्हणून १००० प्रदक्षिणा घालाव्या लागणार.
अंहं. १००८. कारण १००८ हा आकडा
अंहं.
१००८.
कारण १००८ हा आकडा १००० पेक्षा ३.१४% जास्त पवित्र आहे.
(टणाटण घरात)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तुमचा प्रतिसाद उपक्रमवर
तुमचा प्रतिसाद उपक्रमवर नक्कीच उडाला असता, इथे फक्त खवचट श्रेणीवर भागलयं(मी श्रेणीदाता नाही).
पाने