दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२७ मे
जन्मदिवस : लोकभाषा अभ्यासक केशव भवाळकर (१८३१), अणुकेंद्रकाच्या विभाजनाच्या संशोधकांपैकी एक नोबेलविजेते जॉन कॉकक्रॉफ्ट (१८९७), पर्यावरणतज्ज्ञ रेशल कार्सन (१९०७), लेखक बाळ सामंत (१९२४), ज्ञानपीठविजेते लेखक भालचंद्र नेमाडे (१९३८), क्रिकेटपटू रवी शास्त्री (१९६२)
मृत्युदिवस : क्षय, कॉलरा, अँथ्रॅक्स इ. होण्याची कारणे शोधणारे नोबेलविजेते, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक (१८४३), स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (१९६४), संगीतसमीक्षक व संस्कृतचे अभ्यासक अरविंद मंगरूळकर (१९८६), एन्झाईम्स, प्रथिने आणि विषाणूंचा अभ्यास करणारा नोबेलविजेता जॉन नॉर्थरॉप (१९८७), इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी शोधणारा नोबेलविजेता अर्न्स्ट रूस्का (१९८८), विचारवंत, संस्कृतपंडित, ‘मराठी विश्वकोशा’चे प्रधान संपादक, साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (१९९४), संसदपटू, अर्थतज्ज्ञ व घटनापंडित मिनू मसानी (१९९८)
---
१९०८ : खिलाफत दिवस.
१९३० : त्या काळची जगातली सगळ्यात उंच असलेली ख्राईस्लर इमारत लोकांसाठी खुली झाली.
१९३९ : डी. सी. कॉमिक्सने बॅटमॅनची पहिली चित्रकथा प्रकाशित केली.
१९५१ : तारापोरवाला मत्स्यालयाचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन.
१९६७ : ऑस्ट्रेलियाने स्थानिक मूलनिवासी लोकांना लोकसंख्यागणनेत मोजण्याचे ठरवले.
१९८६ : 'ड्रॅगन क्वेस्ट' हा पहिला 'रोल-प्लेयिंग' व्हिडीयो गेम प्रकाशित.
१९९४ : वीस वर्षे विजनवासात घालवल्यानंतर ७५ वर्षीय नोबेलविजेता विद्रोही लेखक अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन रशियात परतला.
१९९७ : अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बिल क्लिंटन राष्ट्रध्यक्ष असताना त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा खटला चालवण्याची परवानगी दिली.
१९९९ : आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हेग येथे स्लोबोदान मिलोसेविचवर कोसोवोमध्ये माणुसकीविरुद्ध अत्याचारांबद्दल गुन्हा दाखल केला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
लेखन, विशेषतः या खटाटोपामागचं
लेखन, विशेषतः या खटाटोपामागचं प्रयोजन वाचून, प्रयोग प्रत्यक्ष पहाण्याची इच्छा निर्माण झाली. कधी बघायला मिळेल (का) हे मात्र माहित नाही.
खुलासा आणि शेवटचं अर्ध वाक्य हेच एकत्र जोडून वाचलं. मधलं meaty लेखन स्वतंत्र वाचलं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
समीक्षा
'समीक्षा' आवडली. या प्रयोगाला जाणे शक्य होते, तसे योजलेही होते, पण काही कारणाने जाणे झाले नाही. ते बरे झाले असे आता वाटते.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
प्रयोग बघणार आहे
इतक्या तपशीलवार लेखनाला दाद म्हणून तरी प्रयोग बघणार आहे.
म्हणजे तुम्हाला आवडला नसला तरी प्रयोग बघायची इच्छा याच लेखनाने जागृत केली आहे. त्यातही 'विलोम' नावाच्या प्रयोगासाठी तर बघेनच
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
विलोम आणि मल्लिका, इ.
नाटकाच्या प्रयोगात उभा राहिलेला विलोम (ओम भुतकर) मला हिंदी सिनेमातल्या खलनायकासारखा भडक आणि आक्रस्ताळा वाटला. मोहन राकेश ह्यांना तो तसा अभिप्रेत होता असं मला वाटलं नाही. किंबहुना संहितेतला विलोम पार्श्वभूमी किंवा दुय्यम पात्र नाहीच आहे; तर कालिदासाचा अँटिथीसिस किंवा त्याची सदसद्विवेकबुद्धी आहे. प्रत्येक कसोटीच्या प्रसंगी कालिदास जे निर्णय घेतो त्यामागचे त्याच्या व्यक्तिमत्वातले स्वार्थाचे पैलू विलोमच उघडे पाडतो. मल्लिका जशी स्वप्नाळू आहे तसा कालिदास नाही; उलट तो हिशेबी आहे, हे त्यामुळे पुन्हापुन्हा स्पष्ट होत राहतं. त्यामुळे विलोमला असा दाखवणं मला योग्य वाटलं नाही. संहिता नीट वाचली, तर लक्षात येईल की विलोम सद्वर्तनी आहे, कारण तो इतर पात्रांना आपद्धर्मानुसार वागण्याची संधी देतो, पण त्यांना आपल्या वर्तनाविषयी अंतर्मुख करण्यासाठी समोर आरसा धरतो. इतकंच नव्हे, तर अखेर मल्लिकेला तिच्या विपदेत आधार देतो.
मग प्रश्न असा राहतो, की मल्लिकेनं कालिदासाऐवजी विलोमला निवडलं असतं, तर काय झालं असतं? किंवा असं म्हणता येईल, की मल्लिका कालिदासाची प्रतिभा आहे. आपलं स्वत्व काय आहे हे तिला ठाऊक आहे, आणि ते जपण्यासाठी ती जागरूक आहे. परिस्थितीचे धक्के खाऊनही ती लख्ख राहण्याचा प्रयत्न करते. ह्याउलट, प्रत्येक तडजोडीतून आपण आपल्यातली प्रतिभा हरवतो आहे, हे कालिदासाला कळतच नाही. मग, जर ही गोष्ट त्याला कळली नसेल, किंवा कळूनही प्रलोभनं नाकारण्याची दृष्टी त्याच्यात नसेल, तर असा कालिदास खरा प्रतिभावान की मल्लिका? संहितेतल्या कालिदासाचे पाय मातीचे आहेत, तर मल्लिका अलौकिक आहे. तीच नाटकाची नायक आहे; कालिदास नव्हे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
धन्यवाद.
<<नाटकाच्या प्रयोगात उभा राहिलेला विलोम (ओम भुतकर) मला हिंदी सिनेमातल्या खलनायकासारखा भडक आणि आक्रस्ताळा वाटला. मोहन राकेश ह्यांना तो तसा अभिप्रेत होता असं मला वाटलं नाही. >>
ओम भुतकरच्या विलोमबाबतचे तुमचे मत हे 'तुमचे मत' म्हणून सोडून देतो. लेट्स अग्री टू डिस-अग्री. मोहन राकेश यांना कसा अभिप्रेत होता 'असं मला वाटतं' तो तपशीलाने वर आलेच आहे. आणि तो ओमने यथातथ्य सादर केला हे ही. तेव्हा माझ्यापुढे विसंगतीचा पुढचा प्रश्न नाही.
<<...किंबहुना संहितेतला विलोम पार्श्वभूमी किंवा दुय्यम पात्र नाहीच आहे; तर कालिदासाचा अँटिथीसिस किंवा त्याची सदसद्विवेकबुद्धी आहे. प्रत्येक कसोटीच्या प्रसंगी कालिदास जे निर्णय घेतो त्यामागचे त्याच्या व्यक्तिमत्वातले स्वार्थाचे पैलू विलोमच उघडे पाडतो. ...>>
<<...संहिता नीट वाचली, तर लक्षात येईल की विलोम सद्वर्तनी आहे, कारण तो इतर पात्रांना आपद्धर्मानुसार वागण्याची संधी देतो, पण त्यांना आपल्या वर्तनाविषयी अंतर्मुख करण्यासाठी समोर आरसा धरतो...>>
शब्द कदाचित वेगळे असतील, पण माझे वरचे मूल्यमापन विलोमला साधारणतः याच पातळीवर आणते. अर्थात थेट 'सद्वर्तनी होता' असे काळे-पांढरे मूल्यमापन करण्याचे धाडस मी करणार नाही, माझा तेवढा अधिकार आहे असे मला वाटत नाही.
संहितेचे म्हणाल तर राज्य नाट्य स्पर्धेसाठी विश्वनाथ राजपाठक यांनी अनुवादित केलेली संहिता सुदैवाने मला मिळाली आहे. कदाचित ती वाचण्याची संधी मिळाली म्हणूनच विलोमच्या व्यक्तिमत्त्वाचे हे कंगोरे मी पाहू शकलो असेन.
<<...संहितेतल्या कालिदासाचे पाय मातीचे आहेत...>> सहमत. तिसर्या अंकातील कालिदासाच्या दीर्घ भाषणाचे जे विवेचन वर आले आहे ते साधारणपणे हेच सांगते आहे. पुन्हा एकदा शब्द वेगळे पण मूल्यमापन तेच आहे असा माझा समज आहे.
<<तीच नाटकाची नायक आहे; कालिदास नव्हे>> अगदी सहमत. कालिदास या नाटकाचा नायक आहे असे मी म्हटलेलेही नाही. किंबहुना खालील परिच्छेदातून हेच ध्वनित होते असं मला वाटतं.
मेघदूताच्या माध्यमातून जर कालिदासाने आपल्या प्रियेविना कंठाव्या लागणार्या आयुष्याची कर्मकहाणी आपल्या प्रियेसाठी लिहिली असेल तर त्याने एकाकी स्थिती मागे सोडलेल्या त्याच्या प्रियेची कैफियत कुणी मांडावी, ती तर कायमच मूकपणे त्याला साथ देण्यास कटिबद्ध असते. अंबिकेच्या - आपल्या आईच्या - वात्सल्ययुक्त संतापालाही भीक न घालता. हे नाटक त्या मल्लिकेची जीवनकहाणी मांडून एक वर्तुळ पुरे करते.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
On second thought
लेखाच्या दुसर्या परिच्छेदातून कालिदास हा नायक असल्याचे कदाचित ध्वनित होत असावे. तेव्हा तुमचा निर्देश तिकडे असावा. हे अगदी मान्य. तो परिच्छेद कदाचित जरा वेगळ्या प्रकारे मांडून हे टाळता येणे शक्य होते.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
कर्ती - नाकर्ती मल्लिका
नाटक मल्लिकेची जीवनकहाणी मांडते असं जरी म्हटलेलं असलं, तरी वरच्या लिखाणात मल्लिका ही कर्ती म्हणून फारशी दिसत नाही, तर जिच्यावर प्रसंग गुदरतात अशी, म्हणजे परिस्थितीनं गांजलेली किंवा पॅसिव्ह अशी अधिक दिसते. उदा :
ह्याउलट, विलोम आणि कालिदास काय आहेत किंवा काय करतात ह्यावर लिखाणात पुष्कळ भर जाणवला. म्हणून मला हे स्पष्ट करावंसं वाटलं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
थोडा खुलासा
महत्त्वाचं म्हणजे नाटक काय सांगतं किंवा कसं आहे याचे परिशीलन हा लेखाचा विषय नव्हे. तेव्हा नाटकाचा नायक किंवा नायिका कोण हा प्रश्न दुय्यम आहे. विलोम नि कालिदास यांच्याबद्दल जे काही विवेचन आले आहे ते नाटकाकडून माझ्या अपेक्षा काय नि अपेक्षापूर्ती कुठे होते नि कुठे होत नाही हे सांगण्यासाठी. त्या अर्थाने मुळातच हा लेख ही नाटकाची समीक्षा नव्हे. आणि मुळातच 'न भावणे' हा सर्वस्वी वैयक्तिक अनुभवाचा भाग आहे. मला सादरीकरण न भावणे हे प्रामुख्याने अपेक्षाभंगामुळे हे कबूल करण्यास काहीच प्रत्यवाय नाही. तेव्हा मग अपेक्षा कुठल्या हे सांगणे क्रमप्राप्त आहे. लेखाची मांडणी त्यानुसार आहे. मुख्य अपेक्षापूर्ती नि अपेक्षाभंग या दोन उदाहरणांनी स्पष्ट करण्यासाठी म्हणून या दोन व्यक्तिमत्त्वांचे संहितेतील स्थान नि त्याला अनुसरून सादरीकरणाचे यश/अपयश जोखणे असा हेतू आहे. मूळ नाटकाचे परिशीलन म्हणा समीक्षा म्हणा सर्वस्वी वेगळ्या मार्गाने जायला हवी. तेव्हा आणखी एक सहमती नोंदवून थांबतो.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
मल्लिका मंजे पैलवाणिन का?
मल्लिका मंजे पैलवाणिन का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
गल्ली चुकली
नै कै... मल्लिका म्हण्जे नमोला ह्यापी ब्ड्डे करणारी हिरवीण...
मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.
मल्लिका शेरावत एकिकडे फार
मल्लिका शेरावत एकिकडे फार अल्लड आहे पण दुसरीकडे जेव्हा ती गंभीरपणे बोलते तेव्हा माझे असे निरीक्षण राहिले आहे कि ती फार विद्वत्तापूर्वक बोलते. इतके सुलझे हुए विचार असलेला/ली अभिनयकार/कर्ती पाहिला/ली नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
छान लिहीलय.
छान लिहीलय.
आणखी एक
लेखाचा व्याप आधीच वाढल्यामुळे वगळलेला एक मुद्दा.
वेषभूषेचा विचार केला तर पहिल्या अंकात कालिदास हा संपूर्ण शुभ्रवस्त्रात लपेटलेला. एकच सलग वस्त्र अधरीय नि उत्तरीय म्हणून वापरलेले. याउलट विलोम हा केवळ एका कृष्णवर्णीय अधरीय परिधान करतो. तिसर्या अंकात कालिदास परतून येतो तेव्हा तो दोन स्वतंत्र कृष्णवर्णी अधरीय नि उत्तरीय परिधान करून येतो तर विलोम पुन्हा केवळ अधरीय पण आता श्वेतवस्त्र. वैयक्तिक मत सांगायचे तर ही प्रतीकात्मता जरा ढोबळच वाटली नि थोडी विसंगतही. इथे मी जरा गोंधळात पडलो होतो. तेव्हा हा प्रश्न चिंतूशेटसाठी.
तिसर्या अंकात परतून आलेला कालिदास हा सर्वार्थाने पराभूत झालेला, कर्तव्यच्युत झालेला असा असल्याने तो कृष्णवस्त्रधारि असणे समजू शकले. परंतु विलोमच्या बाबत मात्र ही वस्त्रयोजना थोडी बुचकळ्यात पाडणारी. जर विलोम हा कालिदासाची सदसद्विवेकबुद्धी म्हणून उभा असेल तर पहिल्या अंकात तो कृष्णवस्त्र का धारण करून आहे? बरं ते सोडा पण पहिल्या अंकापासून तिसर्या अंकापर्यंतचा कालिदासाचा प्रवास माणूस म्हणून अधोगामी आहे. पण विलोमच्या व्यक्तिमत्त्वात कोणताही तसा बदल नाही. त्याने मल्लिकेला आधार दिला म्हणून तो माणूस म्हणून किंचित उंच ठरला हे म्हणणे तितकेसे पटणारे नाही. कारण त्याने मल्लिकेला आधार दिला त्या परोपकारापेक्षाही त्याच्या स्वतःच्या तिच्याबद्दलची आसक्तीचा भाग अधिक असावा असा तर्क सहज करता येतो. शिवाय तो ढासळत चालललेल्या मल्लिकेच्याच घरी राहतो आहे (दुसरे घर बांधण्याइतकी त्याची कुवत नसावी), मद्याचे त्याला व्यसनही आहे तेव्हा त्याने मल्लिकेला आधार दिला म्हणण्यापेक्षा मल्लिकेनेच त्याला आधार दिला म्हणणे अधिक सयुक्तिक व्हावे. अशा वेळी तिसर्या अंकात तो श्वेतवस्त्रधारी दाखवला तो कोणत्या हेतूने हे मला उमगले नाही. चिंतूशेट, तुम्ही याचा काही अर्थ कसा लावाल?
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
>> कारण त्याने मल्लिकेला आधार
मला वाटतं की प्रयोगाच्या (आणि अभिनेत्याच्या) ढोबळ मांडणीमुळे विलोम आहे त्यापेक्षा अधिक खलनायकी होतो. त्याला दारूच्या नशेत बरळताना दाखवणंदेखील मला त्यामुळे पटलं नाही. नाटकभर वेळोवेळी तो आपलं इतरांना गैरसोयीचं ठरणारं मत परखडपणे मांडत असला, तरीही प्रत्यक्षात तो कधीही कालिदास-मल्लिकेच्या आड येत नाही. 'कालिदासाच्या नादी लागून तुझं वाटोळं होईल' हे तो मल्लिकेला सांगू पाहतो आणि ते लौकिकार्थानं खरंच ठरतं. शेवटच्या प्रसंगापर्यंत मल्लिकेची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे, तिला वारांगना म्हणून काम करावं लागलेलं आहे. ह्या परिस्थितीत विलोम तिला आर्थिक आधार देतो आणि आपल्या सोबतीनं प्रतिष्ठासुद्धा देतो. तिच्या घरी त्याचं राहणं हा तिच्या इच्छेचा आदर करून, ती जिथे वाढली त्या तिच्या आवडत्या घरात तिला सुरक्षित ठेवण्याचा भाग असू शकतो. मला दिसणारा विलोम तिच्या प्रेमात आहे, आसक्तीत नाही. तिच्यासाठी तो स्वतःकडे कमीपणा घ्यायला तयार आहे. शिवाय, तो व्यवहारी आहे. तो धनाढ्य नसेलही, पण विपन्नावस्थेत असणं मला तरी त्यामुळे शक्य दिसत नाही.
विलोमचं काळं वस्त्र प्रयोगातल्या त्याच्या प्रतिमेला साजेसं आहे, पण मला ते म्हणूनच पटलं नाही. विलोम नाटकात सुरुवातीपासून अखेरपर्यंत आहे तसाच आहे. मला तो किंचित आकर्षक, आपला आब राखून, पण साध्या वेषात असायला हवा होता असं वाटतं. कालिदासाचा प्रवास हा अर्थातच साध्या पण चमकदार खेडवळ तरुणाकडून भरजरी वस्त्र ल्यालेल्या मध्यमवयीन पुरुषाकडे आहे. त्यामुळे सुरुवातीचं साधं पांढरं वस्त्र आणि नंतरचं काहीसं दिमाखदार, सामाजिक पत दाखवणारं वस्त्र ठीक आहे. (अज्ञातवासातल्या माणसाला ते साजेल का, हा प्रश्न मात्र उरतोच.) सुरुवातीला गडद किनार असलेला, साधा पण नजरेत भरेलसा आणि नंतर पूर्ण गडद पण नजरेत न भरेलसा असा मला तो दिसतो.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
आं
तिला वारांगना म्हणून काम करावं लागलेलं आहे. ह्या परिस्थितीत विलोम तिला आर्थिक आधार देतो आणि आपल्या सोबतीनं प्रतिष्ठासुद्धा देतो.>> हे तुम्हाला कुठं दिसलं सायबा?
विलोम आणि मल्लिका अखेरीस सोबत आहेत इतकेच वास्तव संहितेतून सापडते. ती वारांगना आहे किंवा विलोम तिला आर्थिक आधार देतो हे मला तरी कुठे सापडले नाही. मूल रडत असताना मल्लिका 'हा माझा वर्तमान आहे' एवढेच म्हणते. यातून तर्क ताणलाच तर ते मूल विलोमचे आहे इतकेच म्हणता येईल. ती वारांगना असल्याचा निष्कर्ष तुम्ही कसा काढला हे समजून घ्यायला आवडेल.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
वारांगना
मल्लिकेच्या तोंडी स्वगत आहे. 'मी वारांगना आहे' असं ती त्यात म्हणते.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सापड्या
धन्यवाद. सादरीकरणातील मल्लिका इतकी प्रभावहीन होती की हे ध्यानातही आले नाही.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de