भारत आणखी पाच वर्षांची मोदी राजवट सहन करू शकेल?
टाईम मासिकामधील आतिष तासीर यांच्या लेखातील काही मुद्द्यांशी मी सहमत नसलो तरी या लेखाबद्दल अनेकांना अपार कुतुहल असल्याचे लक्षात येऊन मी त्याचा पूर्ण अनुवाद केला. तो फार सुंदर नसला तरी कामचलाऊ आहे. मोठा लेख आहे. जमलं तर वाचा.
भारत - जगातील सर्वांत मोठी लोकशाही आणखी पाच वर्षांची मोदी राजवट सहन करू शकेल काय?
- आतिष तासीर ९ मे २०१९
तासीर हे कादंबरीकार व पत्रकार असून The Twice-Born: Life and Death on the Ganges हे त्यांचे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झाले आहे.
भारतीय लोकशाही ही लोकानुनय किंवा बहुसंख्यवादाला बळी पडलेली पहिली महान लोकशाही होय.
पश्चिम भारतातील गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रदीर्घ काळ काम केलेले हिंदूराष्ट्रवादी भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी गेल्या तीस वर्षांत कुणालाच मिळाले नव्हते एव्हढे प्रचंड बहुमत मिळवत २०१४ साली सत्तेवर आले. तत्पूर्वी भारतात प्रामुख्याने इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्या काँग्रेस पक्षाचीच सत्ता होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ६७ वर्षांपैकी तब्बल ५४ वर्षे!
आणि आता २०१९ साली पुन्हा मोदी आणि भाजपा यांच्याच हातात आपले भविष्य सोपवायचे की नाही हे ठरवण्यासाठी भारतीय लोक मतदान करत आहेत. हा एकूण सात टप्प्यात दीड महिने चालू राहणारा प्रचंड व्याप आहे. जगातील सर्वात मोठ्या संख्येने जवळपास ९० कोटी मतदार निवडणुकीला सामोरे जात आहेत. मताधिकाराच्या या अवाढव्य अभिव्यक्तीचा - त्यातील नुसत्या राजकीय नव्हे तर अंतर्निहित सांस्कृतिक तड्यांचा - खोलवर अर्थ जाणण्यासाठी आपल्याला या मोदीकहाणीच्या प्रथम पर्वाचा विचार करावा लागेल. त्याशिवाय मोदींचे आगमन ही एकाच वेळी अपरिहार्यता आणि घातक आपत्तीही कशी होती हे आपल्या लक्षात येणार नाही. भारतात आपल्याला बहुसंख्यवादाच्या वैधतेची आणि भ्रामकतेचीही अनन्यसाधारण झलक पहायला मिळते. त्यामुळे या देशात तसेच दूरवरच्या तुर्कस्तान, ब्राझीलमध्ये आणि इंग्लंड-अमेरिकेतही बहुसंख्य समाजाच्या दुखण्यांना बहुसंख्यवादाने कशी वाचा फोडली आहे हे लक्षात घेणे आपल्याला भाग पडते. ही दुखणी इतकी सर्वदूर पसरलेली आहेत की आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.पण त्यामुळे अन्यायी आणि नको वाटावे अशा जगात आपण ढकलले जात आहोत.
या कथेची सुरुवात स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच होते. १९४७ साली ब्रिटिश भारताची दोन शकले झाली. भारतीय मुसलमानांचा आपला स्वतःचा देश म्हणून पाकिस्तानची स्थापना झाली. परंतु केम्ब्रिजशिक्षित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली भारताने मात्र अशा प्रकारे हिंदूंचा देश होणे नाकारले. या देशात मोठ्या प्रमाणात मुस्लिम होते. (त्यावेळी साडेतीन कोटी आज १७ कोटींपेक्षा थोडे जास्त) आणि नेहरूंनी नवस्वतंत्र राष्ट्राला धोरण दिले ते धर्मनिरपेक्षतेचे. ही धर्मनिरपेक्षतेची कल्पना केवळ राज्यसंस्था आणि धर्म वेगवेगळे राखणे इतपतच मर्यादित नव्हती. राज्यसंस्थेने सर्व धर्मांना समान वागणूक देणे हा तिचा भारतीय संदर्भातील अर्थ होता. अर्थात या धोरणाच्या टीकाकारांना वाटे की याचा प्रत्यक्षातील अर्थ ऑर्वेलच्या त्या प्रसिद्ध उक्तीप्रमाणे काही लोक इतरांपेक्षा अधिक समान असाच होणार. भारतीय मुसलमानांना शरियतवर आधारित कौटुंबिक कायदे अबाधित राखण्याची मुभा मिळाली आणि हिंदूंना मात्र देशाचा कायदा लागू करण्यात आला. तीन वेळा 'तलाक' म्हणून आणि किरकोळ भरपाई देऊन नवऱ्याने बायकोला घटस्फोट देण्यासारख्या अन्यायकारक रुढी पाळण्याची मुभा मुस्लिम पुरुषाला मिळाली आणि हिंदूंवर मात्र सुधारित कुटुंबविषयक कायद्यांचे बंधन आले. हिंदूंची अनेक देवळेही सरकारने आपल्या ताब्यात घेतली. (मोदींनी २०१८ साली एका वटहुकुमाने ही झटपट घटस्फोट देणारी तिहेरी तलाक पद्धती शिक्षापात्र ठरवली.)
स्वातंत्र्योत्तर भारतात बहुतेक काळ सत्तेवर असलेल्या नेहरूंच्या राजकीय वारसदारांनी वरवर लोकशाही तत्त्वे आणि कार्यप्रणाली यांचा ढोल बडवत एका वंशपरंपरागत सरंजामशाहीचीच प्रस्थापना केली. त्यांच्या राजवटीतला भारत कंपूबाज, इंग्रजाळलेला आणि प्रवेशद्वारावरील जमावाच्या गलबल्याला घाबरणारा होता. २०१४च्या मे महिन्यात मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने लोकसभेत ५४३पैकी २८२ जागा जिंकून या प्रवेशद्वारांना भगदाडे पाडली. काँग्रेसला केवळ ४४वर रोखण्यात आले. देशातील या सर्वांत जुन्या पक्षाला विरोधी पक्ष म्हणून अधिकृत मान्यताही मिळू नये इतकी ही संख्या लहान होती.
बहुसंख्यवादी दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारचे लोक ज्या लोकांचे प्रतिनिधित्व ते करतात त्यांच्यापैकीच एक असतात. (तुर्कस्तानातील एर्दोगन, ब्राझीलचे बोल्सोनारो) आणि दुसऱ्या प्रकारचे केवळ लोकांच्या तीव्र भावनांचा फायदा घेत असतात पण त्यांच्यातून आलेले नसतात. (शांपेन नवफॅसिस्ट्स : ब्रेक्झिटीअर्स, डोनाल्ड ट्रम्प, पाकिस्तानचा इम्रान) नरेंद्र मोदी अगदी नक्कीच पहिल्या गटात मोडतात. त्यांचे वडील चहाविक्रेते होते आणि त्यांचा निवडणूकविजय हा मतपेटीद्वारा केल्या गेलेल्या वर्गलढ्यासारखाच होता. अमेरिकन इतिहासकार ॲन ॲपलबाम म्हणते त्याप्रमाणे, "आपल्यांत इतके मतभेद आहेत याची पूर्वी जाणीवच नसलेल्या माणसामाणसांमधील मिटवताच येणार नाही अशी दुफळी" या बाबीतून उघड झाली. राजकीय मतभेद अर्थातच पूर्वापार होतेच पण मोदींच्या निवडीने एक सांस्कृतिक दरीच दृग्गोचर झाली. आता हे डावे ते उजवे एव्हढ्यापुरतेच हे सारे मर्यादित नव्हते. यात अधिक मूलभूत, खोलवरचे असे काहीतरी होते.
राज्यसंस्थेचे स्वरूप, राष्ट्रनिर्माते, अल्पसंख्याक, विद्यापीठे, औद्योगिक कंपन्या इथपासून ते माध्यमांपर्यंतच्या संस्थांचे राष्ट्रातील स्थान - राष्ट्राच्या या साऱ्या मूलभूत प्रणालीवरच प्रचंड अविश्वास दर्शवला गेला. धर्मनिरपेक्षता, उदारमतवाद, मुक्त पत्रकारिता यासारख्या स्वतंत्र भारताच्या गौरवास्पद उपलब्धी या जणू एखाद्या मोठ्या कटकारस्थानाचा भाग असाव्यात अशा संशयाने त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. स्वतःची मुळे उखडलेल्या उच्चभ्रू भारतीय हिंदूंचे ख्रिश्चन, मुस्लिम यासारख्या एकेश्वरी धर्मीयांच्या संगनमताने भारतातील बहुसंख्य हिंदूंवर प्रभुत्व गाजवण्याचे कुटिल कटकारस्थान!
मोदींचा विजय ही त्या अविश्वासाची, त्या संशयाची अभिव्यक्ती होती.यापूर्वी ज्यांच्यावर हल्ला करणे अशक्यप्राय भासे त्या नेहरूंसारख्या राष्ट्रनिर्मात्यावर मोदींनी प्रथम हल्ला चढवला आणि नंतर नेहरूप्रणित धर्मनिरपेक्षता, समाजवाद अशा आजवर पूजनीय मानलेल्या राष्ट्रीय आदर्शांना त्यांनी आपले लक्ष्य केले. काँग्रेसमुक्त भारताची भाषा त्यांनी केली. हिंदू आणि मुस्लिम यात बंधुभाव जोपासण्याची तीळमात्र इच्छा त्यांनी कधी प्रदर्शित केली नाही. सर्वात महत्त्वाचे हे की उच्चभ्रू विद्वानांना उदार आणि सर्वसमावेशक वाटणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या दर्शनी अंगाखाली खरे तर धार्मिक राष्ट्रवादाची, मुस्लिमविरोधी भावनेची आणि खोलवर रुजलेल्या जातीय कट्टरतेची एक रटरटती काहील होती ही गोष्ट मोदी सत्तेवर आल्याने जगाच्या निदर्शनास आली. भारताला राजकारणप्रेरित सांप्रदायिक दंगलींचा प्रदीर्घ इतिहास आहे. त्यात १९८४ साली इंदिरा गांधी यांच्या शीखधर्मीय अंगरक्षकाने केलेल्या त्यांच्या हत्येनंतर दिल्लीच्या रस्त्यावर झालेल्या किमान २७३३ शिखांच्या शिरकाणाचाही उल्लेख करावा लागेल. काँग्रेसचे नेतृत्व अगदी निर्दोष म्हणता येत नाही. पण जमावाच्या दुष्कृत्यात आपला सहभाग नव्हता ही गोष्ट धर्मनिरपेक्ष आदर्शांच्या वेळ पडेल तशा केलेल्या उद्घोषाच्या आधारे का होईना ते पटवू शकले. मोदींनी मात्र अलीकडच्या काळात म्हणजे २००२ साली आपल्या गृहराज्यात झालेल्या किमान हजाराहून अधिक बव्हंशी मुस्लिमांच्याच कत्तलीनंतरच्या आपल्या कोडग्या मौनातून आपण हिंसक जमावाचे साहाय्यक असल्याचे सिद्ध केले. या मौनामुळे पूर्वीची ती दांभिकता तर दांभिकता 'येईल कधी परतून?' असे आपल्याला तीव्रतेने वाटू लागले. कारण अल्डस हक्सले म्हणतो त्याप्रमाणे किमान "दांभिक राजकारणी राष्ट्र, पक्ष आणि आर्थिक फायद्यापेक्षा अधिक श्रेष्ठ अशा मूल्यांचे अस्तित्व तरी मान्य करतो." मोदींनी मात्र कोणतेही पर्यायी नैतिक मापक न देता भारताचे जुने आदर्श मोडीत काढले. त्यांनी सारे नैतिक मूल्यमापन वर्ग आणि सांस्कृतिक संग्रामाच्या दावणीला बांधून टाकले. मोदींच्या राजवटीत जुने उच्च आदर्श म्हणजे केवळ प्रस्थापित उच्चभ्रूंचे हट्टी नखरे आहेत असे मानले जाऊ लागले.
मोदींचे २०१९चे ट्विट आहे:
"त्यांच्या दृष्टीने माझा गुन्हा कोणता आहे सांगू? एक गरीब कुटुंबात जन्माला आलेली व्यक्ती त्यांच्या सुलतानशाहीला ललकारत आहे हा तो गुन्हा आहे." हे असे ट्विट करताना त्यांना २०१४चा जोश पुन्हा जागवायचा आहे. क्रांतीचा जोश! 'ते' म्हणजे भारतातील इंग्लिश बोलणारा उच्चभ्रू वर्ग. त्याचे प्रतिनिधित्व काँग्रेस पक्ष करतो. 'सुलतानशाही' हा कळीचा शब्द आहे. कुत्र्यांना प्रशिक्षित करताना घालतात तशी तारस्वरातील शीळ. तो शब्द असे सुचवतो की भारतातील परकीय सत्तेचे सगळे वारस - १८५८ साली ब्रिटिश पूर्ण सत्तेवर येण्यापूर्वी अनेक शतके भारतावर मुस्लिम राज्यकर्ते राज्य करत होते - स्वाभिमानी हिंदू राष्ट्राची निर्मिती थोपवण्यासाठी एकजुटीने कामाला लागले आहेत.
२०१४ साली या सांस्कृतिक संतापाला मोदींनी आर्थिक आश्वासनांचे रूप दिले. ते रोजगार आणि विकासाची भाषा बोलू लागले. समाजवादी राज्याच्या कल्पनेला टोमणा मारत ते म्हणाले, "उद्योग उभारणे हा सरकारचा उद्योग नव्हे!" आता विश्वास ठेवणे कठीण जाईल पण ती निवडणूक ही आशा पल्लवित करणारी निवडणूक होती. १९९२ साली हिंदू राष्ट्रवादी जमावाने हिंदू महाकाव्याचा देवतास्वरुप नायक रामाच्या कथित जन्मस्थानी असलेली १६व्या शतकातील बाबरी मशीद उद्ध्वस्त केली होती. त्यासंदर्भात मोदींच्या मतदारांना पेचात पकडण्यासाठी दिल्लीच्या पत्रकारांनी अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीबद्दल प्रश्न विचारताच ते सारे त्यावेळी ठामपणे म्हणाले, "तुम्ही आम्हाला मंदिराबाबत का विचारत आहात? आम्ही तुम्हाला सांगतोय ना की आम्ही मोदींना मते देत आहोत कारण आम्हाला विकास हवा आहे?" "सब का साथ सब का विकास" ही मोदींची २०१४मधील घोषणा होती.
या महिन्यात भारतात निवडणूक होत असताना त्या घोषणेतील विरोधाभास सर्वांनाच जाणवत आहे. मोदींचा आर्थिक चमत्कार प्रत्यक्षात येऊ शकलेला नाही. इतकेच नव्हे तर देशभर विखारी धार्मिक राष्ट्रवादाची हवा निर्माण करायला मोदी साहाय्यभूत झाले आहेत. त्यांच्या पक्षातील तेजस्वी सूर्या नावाच्या या निवडणुकीतील एका उमेदवाराने मार्च २०१९च्या आपल्या भाषणात हे खूपच उद्धट पद्धतीने मांडले, "तुम्ही मोदींच्या बाजूने असाल तर तुम्ही भारताच्या बाजूने आहात. तुम्ही मोदींच्या बाजूने नसाल तर तुम्ही अराष्ट्रीय शक्ती बळकट करत आहात." लोकसंख्येच्या १४% असलेल्या भारतीय मुसलमानांना एकामागून एक हिंसक प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. या प्रत्येक प्रसंगी हिंदू जमाव रस्त्यारस्त्यांवर उपलब्ध होणारे आपले पवित्र प्रतीक असलेल्या गोमातेच्या नावाखाली सार्वजनिक हत्याकांडांच्या मालिका घडवत आहे. अनेकदा वाटते की सरकारच्या छुप्या पाठिंब्यानेच या हत्या होत आहेत. राष्ट्रातील सामान्य लोकांनी आपल्या स्मार्टफोनवर अशी एखादी घटना चवीने पाहून एखादा महिना उलटतो न उलटतो तोच आणखी एक खवळलेला हिंदू जमाव दुसऱ्या एखाद्या असुरक्षित मुस्लिम व्यक्तीवर तुटून पडतो. २०१७ सालच्या एका छायाचित्रात आपल्याला दिसतो तो रक्ताने माखलेल्या शर्टातला, विस्फारलेले डोळे पांढरे झालेला, मारहाणीने प्राण सोडण्यापूर्वी जमावाकडे प्राणाची भीक मागणारा मोहम्मद नईम हीच मोदींच्या कार्यकाळातील सर्वात जास्त ठाशीव प्रतिमा ठरली आहे. या प्रत्येक वेळी नेतृत्वाचा प्रतिसाद सारखाच असतो - जवळजवळ मौनच!
मूलभूत आदर्श आणि सभ्यता यांचा इतका विचका केला गेला आहे की मोदी आता हिंसेच्या दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. एकदा द्वेषाला मान्यता मिळाली की त्याचे लक्ष्य असलेल्या लोकांना वेगळे पाडणे कठीण नसते. आणि भाजपाला हे खेदाने पहावे लागतेय की मुस्लिमांवर हल्ला करायला आतुर असलेले लोक मागासवर्गीय हिंदूंवर हल्ला करायलाही तेव्हढ्याच उत्साहाने सज्ज आहेत. पक्षाला मागासवर्गीय हिंदूंची मते गमावणे परवडण्यासारखे नाही. पण मोदींच्या गुजरातेत जुलै २०१६ साली उच्चवर्णीय लोकांनी चामडे कमावून पोट भरणाऱ्या चार मागासवर्गीय कारागिरांना नागवे करून लोखंडी सळ्यांनी मारत त्यांची धिंड काढली. त्यांचा गुन्हा? मेलेल्या गायीचे कातडे सोलण्याचा आरोप त्यांच्यावर होता.
स्त्रियांच्या प्रश्नाबाबत मोदींचे रेकॉर्ड डागाळलेले आहे. एका बाजूला स्त्रिया आणि त्यांची सुरक्षितता हा त्यांनी आपला निवडणुकीचा मुद्दा बनवला होता. ( २०१८च्या एका अहवालात स्त्रियांसाठी सर्वांत असुरक्षित देश म्हणून भारताची नोंद झाली होती.) तर दुसऱ्या बाजूला मोदींच्या पक्षबांधवांचा आणि त्यांचा स्वत:चाही दृष्टिकोन अत्यंत पुरुषप्रधान दिसतो. त्यांच्या एका उद्गारामुळे २०१५ साली त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला.बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याबद्दल ते म्हणाले की 'स्त्री असूनही' दहशतवादाविरुद्धची त्यांची कामगिरी वाखाणण्यासारखी आहे! मोदींचे उजवे हात असलेले अमित शहा स्त्रियांना देवीचे स्थान असल्याची भाषा नेहमी करतात. ही भाषा म्हणजे स्त्रियांना देव्हाऱ्यात बसवून मुकाट करण्यातच स्वर्गसुख मानणाऱ्या धर्मवादी पुरुषी अहंकाराचा कायमचा मुखवटा असतो. पण हेही खरे की मोदींनी एका स्त्रीची अत्यंत महत्त्वाच्या संरक्षणमंत्रीपदी नियुक्ती केली.
हे परस्परविरोध पश्चिमी स्वातंत्र्याच्या कल्पना आत्मसात करू पाहणाऱ्या समाजातील अंतर्विरोधाचाच भाग मानायला हवेत असे मानाल तर हेही सांगावे लागते की मोदींच्या राजवटीत उदारमतवादी आणि मागासावर्गीयांपासून ते मुस्लिम ख्रिश्चनांपर्यंत सर्व प्रकारच्या अल्पसंख्याकांवर सतत हल्ले होत आहेत. आपल्या आश्वासनातील सब का विकास बाजूला टाकून मोदींनी देश आता अशा अवस्थेला आणलाय की भारतीय समाजाचे आपापसातील भेद अधोरेखित करण्याचे वेड वाढतच चाललंय. २०१४ साली जनमानसात आशा जागृत करण्यासाठी त्यांनी सामाजिक भेदांचा कौशल्याने वापर करून घेतला. २०१९मध्ये या भेदांनाच जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवून आपली निराशा दडपून टाकण्याचे आवाहन ते लोकांना करत आहेत. आज सत्तेवर असलेले मोदी निवडणुकीत पुन्हा जिंकतीलही. नेहरूंचा वारसा लाभलेल्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील सामान्य वकुबाचा विरोधी काँग्रेस पक्ष गोंधळलेला दिसतोय. त्यात सुधारणा होणे कठीण दिसतेय. जिंकतीलही मोदी. पण २०१४ची अमर्याद स्वप्ने आणि आकांक्षा यांचे प्रतिनिधी ते यापुढे कधीच होऊ शकणार नाहीत. त्यावेळी ते डोळे दिपून जावेत अशी लखलखीत स्वप्ने दाखवणारे एक प्रेषित होते. हिंदुत्वाचे पुनर्जीवन हा या स्वप्नाची एक बाजू होती आणि दुसऱ्या बाजूला होती दक्षिण कोरियासारखी आर्थिक उन्नतीची योजना. आज ते फेरनियुक्तीसाठी प्रेषिताच्या नव्हे तर वचनपूर्ती न करु शकलेल्या एका राजकीय नेत्याच्या भूमिकेत निवडणुकीला सामोरे जात आहेत. आता या निवडणुकीला तुम्ही दुसरे काय वाटेल ते नाव द्या. आशा-आकांक्षा हा विषय आता तिच्या पटलावर राहिलेला नाही.
वाराणसी या तीर्थक्षेत्र असलेल्या शहरातून मी २०१४च्या निवडणुकीचे वार्तांकन केले होते. मोदींनी स्वतःसाठी हा मतदारसंघ निवडला होता. हिंदू मानसिकतेवर या शहराचा जेरुसलेम, रोम किंवा मक्केचा असतो तसा पगडा होता. आपल्या धार्मिक पुनरुज्जीवनाच्या राजकारणासाठी हा पगडा त्यांना वापरायचा होता. या निवडणुकीत मी स्वतःला दोन रूपांत पाहिले. एकीकडे पाकिस्तानी मुस्लिमाचा मुलगा म्हणून माझी पैतृक ओळख मुस्लिम ही असल्याने आणि भारतातील इंग्रजी बोलणाऱ्या उच्चभ्रू व्यक्तींपैकीही मी असल्याने मला याची जाणीव होती की मोदी जो भारत आकाराला आणू इच्छित आहेत त्यात मला काही स्थान असणार नाही. परंतु दुसरीकडे भारतातील सत्तेच्या स्वरूपाविषयीच्या मोदींच्या निदानाविषयी मला आपलेपणा वाटत होता. पाश्चिमात्य देशात उदारमतवाद किंवा डाव्या मतप्रणाली म्हणजे प्रत्यक्षात प्रस्थापित उच्चभ्रूंचीच सत्ता ठरते हा आरोप तुलनेने नवा आहे आणि अजून त्यावर प्रतिवाद होऊ शकतो. भारतात गेली दशकानुदशके डावे किंवा उदारमतवादी असणे याचा अर्थ राक्षसी विशेषाधिकारप्राप्त अल्पसंख्येचा एक भाग असणे असाच होता. इंग्लंडमध्ये न्यू इंग्लंड रिपब्लिकन किंवा पुराणमतवादी टोरी आहेत तसा उजव्या बाजूचा कोणताही विशेषाधिकारप्राप्त गट कालपरवापर्यंत भारतात नव्हता. त्यामुळे डावे असणे हे विशेष हक्क लाभलेल्या, परकीय विद्यापीठात शिकून तिथून नवनवी राजकीय आणि बौद्धिक फॅशन आयात केलेल्या मूठभर लोकांचे क्षेत्र आहे असा समज होणे सहजशक्य होते.
भारतीय उच्चभ्रू लोकांचे सांस्कृतिक वेगळेपण हे राजकीय आहे, 'खऱ्या' भारताला कमी लेखण्यासाठी परकीय प्रभावाखाली केलेले ते एक कारस्थान आहे असे भासवण्यात २०१४ साली मोदींना यश मिळाले होते. देशातील प्रबळ असा हा छोटा घटक इतरांपासून अलिप्त अशा भ्रमविश्वात रहात आहे हे त्यांनी उघडकीस आणले. ही एक परिणामकारक राजकीय खेळी होती. पण हा "खरा" भारतही स्वतःच्या अशाच एका भ्रमविश्वात राहतो आहे हे सत्य त्यामुळे लपले गेले. नेहरूंची भूमिका नेहमीच स्पष्ट होती. भारत अधिकाधिक अस्सल भारतच होत राहिला तर कधीच एक आधुनिक राष्ट्र बनू शकणार नाही. भारताला पश्चिमेची, विज्ञानाची, तंत्रज्ञानाची आवश्यकता होती. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भारताला वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याची आवश्यकता होती. आपल्या परंपरेत मुरलेला गूढवाद आणि जादूटोणा झुगारून देणे भारताला गरजेचे होते. परंतु जाणूनबुजून असेल वा नकळत मोदींनी भारतभर एक गोंधळलेली मानसिकता रुजवली. या मानसिकतेमुळे भारताचा दक्षिण कोरिया होण्याचा मार्ग प्राचीन भारतीय वैभवाच्या गौरवीकरणातून जातो अशी सर्वांची खात्री पटली.
२०१४ साली डॉक्टर आणि इतर वैद्यकीय व्यावसायिकांच्या मुंबईत झालेल्या एका परिषदेत मोदींनी सूचित केले की जेनेटिक सायन्स आणि प्लास्टिक सर्जरी यांची प्राचीन भारतीयांना जाण होती. हिंदू देवता गणपतीबद्दल बोलताना ते म्हणाले, "आपण गणेशाची पूजा करतो. त्या काळात कोणीतरी प्लास्टिक सर्जन असणारच. त्यानेच माणसाच्या धडावर हत्तीचे मुंडके लावून प्लास्टिक सर्जरीचा आरंभ केला असणार."
राजकारण, अर्थकारणापासून ते अगदी इंडोलॉजीसह प्रत्येक क्षेत्रात एखाद्याच्या क्षमतेपेक्षा तो अस्सल आपल्या विचारांचा असण्याला मोदी प्राधान्य देत आले आहेत. त्यामुळे भयानक बुद्धिद्वेष्ट्या मार्गावर भारताची अधोगती होत आहे. गुरुमूर्ती या कट्टर हिंदुराष्ट्रवादी विचारधारेच्या कट्टर पुरस्कर्त्याची रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळावर नियुक्ती केली गेली. कोलंबिया विद्यापीठाचे विश्वविख्यात अर्थशास्त्रज्ञ जगदीश भगवती या गृहस्थाबद्दल म्हणतात, "ते अर्थशास्त्रज्ञ असतील तर मी भरतनाट्यम नर्तक आहे!" २०१६मध्ये काळ्या पैशाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देशातील ८६% नोटा एका रात्रीत रद्दबातल करण्याचा सल्ला ज्यांनी मोदींना दिला तेच हे गुरुमूर्ती! या सल्ल्यामुळे देशभरात माजलेल्या आर्थिक हल्लकल्लोळातून देश अद्याप सावरतोच आहे. मोदी आता वातावरणात राष्ट्रवादाचा ज्वर वाढवून सत्ता राखू पहात आहेत. आता त्यांच्या व्यासपीठावर राष्ट्रीय सुरक्षा हा महत्त्वाचा विषय बनलाय. भारत-पाकिस्तानात नुकत्याच निर्माण झालेल्या तणावाचा फायदा ते घेऊ पाहताहेत. आर्थिक विकास आता बाजूला पडलाय.
२०१७मध्ये उत्तर प्रदेश या लोकसंख्येने आणि मुस्लिमांच्या संख्येनेही देशातील सर्वात मोठ्या राज्याची निवडणूक जिंकल्यानंतर भाजपाने हिंदू राष्ट्रवादाचा रंग असलेली भगवी वस्त्रे परिधान करणाऱ्या आणि द्वेषाचे विष पसरवणाऱ्या एका संन्याशाच्या हाती राज्याचा रथ दिला. योगी आदित्यनाथ काही निवडणूक प्रचारातील मुख्य चेहरा नव्हते. ते लोकांना माहीत असलेच तर ते फक्त कुठे जमावाला एका हिंदूंच्या बदल्यात शंभर मुसलमान मारण्याची चेतावणी देत, कुठे मुस्लिम स्त्रियांना थडग्यातून वर काढून त्यांच्यावर बलात्कार करण्याची भाषा करणाऱ्याबरोबर एका व्यासपीठावर हजर रहात त्यांनी केलेल्या विषारी वाक्ताडनामुळे. विद्यापीठीय विद्वज्जनांवर होत असलेल्या सततच्या हल्ल्याचे नेतृत्व मोदींनी केलेय आणि अपात्र आणि अर्धशिक्षित माणसांना शिक्षणक्षेत्रात आपापली खुजी खोपटी उभारायला त्यांनी उत्तेजन दिले आहे. भारतातील विद्वानांचा आणि संशोधकांचा वर्ग कट्टर डावा होता खरा परंतु शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील राजकीय पर्यावरण बदलायचे सोडून मोदींनी गुणवत्ता, पात्रता या कल्पनेवरच घाला घातला. इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरीकल रिसर्च (ICHR) पासून ते राजकीय नेतृत्व आणि बुद्धिवंतांची मांदियाळी घडवणाऱ्या जे. एन. यू. पर्यंत भारतातील ज्ञानकेंद्रे पोखरली जात आहेत. प्रशासक आणि अधिव्याख्याते यांची निवड त्यांच्या मूलभूत क्षमतेच्या आधारे न होता राजकीय विचारसरणीच्या आधारे होत आहे.
वैश्विक मूल्य प्राप्त करू शकतील अशा सर्व कल्पना आणि तत्वे निव्वळ युरोप अमेरिकेच्या संस्कृतीशी परिचय असणाऱ्यांपुरतीच सीमित रहावीत या हेतूने आधुनिकता म्हणजे केवळ पाश्चात्यीकरण असे मानणाऱ्या इंडियावर मोदी जी टीका करतात ती योग्यच आहे. परंतु कटू सत्य हे आहे की भारताला खरोखर हिंदू धर्मराज्य नव्हे तर महासत्ता बनायचे असेल तर मध्ययुगीन भारताचा अंधश्रद्धा आणि जादूटोणा यांनी भरलेला भूतकाळ विसरला गेला पाहिजे,मागे टाकला पाहिजे. ही गोष्ट मात्र मोदी भारताला एक तर सांगू शकत नाहीत किंवा सांगू इच्छित तरी नाहीत. आपण अगदी आपल्या स्वतःसारखे असणे पुरेसे नाही. श्रीलंकेचे महान इतिहासकार ए. के. कुमारस्वामी म्हणतात, "भारतात असो वा युरोपात, प्राचीन संस्कृतीच्या जुन्यापुराण्या अवशेषांचा त्यागच केला पाहिजे. आम्ही भूतकाळातून घडलो आहोत परंतु आपले घर आपल्याला भविष्यकाळासाठी बांधायचे आहे. हे समजून घेणे, दृढनिश्चयपूर्वक मान्य करणे आणि आपण मागे सोडून आलेल्या गोष्टींवरही प्रेम करत राहणे हाच सबळ होण्याचा पाया आहे." लोक भूतकाळाला चिकटून राहतात हीच गोष्ट मोदींच्या भारतात खोलवर दिसणाऱ्या आततायी नैराश्याला कारणीभूत आहे. या लोकांची आधुनिक जगाला सामोरे जाण्याची तयारी नाही. खऱ्या आत्मविश्वासाऐवजी ते अत्युत्साही देशप्रेम दाखवत आहेत.
खरोखर मूळचे आपले काय आणि बाहेरुन काय काय आलेय याची भारतीय मनाला सतत चिंता लागून राहिलेली असते.
भारतीय भद्र समाजाला गांधीजींच्या शब्दात "आपल्याच देशात परके" करणारी तीच प्रक्रिया कमीअधिक प्रमाणात भारतभर सर्व स्तरावर आणि पाश्चात्य संस्कृती आणि चालीरीतींशी मुळीच संबंध न आलेल्या समूहातही आता पुन्हा चालू होत आहे. अभाविप ही देशातील सर्वात प्रबळ अशी हिंदू राष्ट्रवादी विद्यार्थी - युवक संघटना आहे. तिचा एक तरुण सदस्य वाराणसीत मला म्हणाला, "आमच्या संस्कृतीचा नाश केला जात आहे. माझ्या कुटुंबातील बऱ्याच जणांनी कॉमर्सची पदवी घेतलीय पण मी माझ्या संस्कृतीपासून दूर न जायचं ठरवलं. आमच्या संस्कृतीसारखी महान संस्कृती आमच्यातल्याच लोकांचा आमच्या विरोधी कृत्यात सहभाग असल्याशिवाय दडपता येणार नाही. कोण ते मला सांगता येणार नाही पण कोणीतरी आमचे नियंत्रण करत आहे. आणि विकास आणि विनाश यात तसा एकाच अक्षराचा फरक आहे बघा."
हा तरुण हिंदूराष्ट्रवादी भारताच्या नव्या पिढीचा एक प्रतिनिधी आहे. त्याला वासाहतीकरणाचा स्पर्श झालेला नाही पण जागतिकीकरणाने त्याला सोडलेले नाही. आपल्याला कमी लेखले जात असल्याच्या अपमानजनक भावनेने त्यांचे जीवन व्यापले आहे. त्यांना वाटतेय की त्यांचा धर्म आणि त्यांची संस्कृती हीन मानली जात आहे. हिंदू फोबियासारखी कल्पना त्यांना खरीखुरी वाटते. सिक्युलर्स, लिबटार्ड्स, न्यू यॉर्क टाईम्स असे शब्द ते तिरस्कारपूर्वक वापरतात. असे वाटते की आपली सांस्कृतिक हानी होत असल्याबद्दलचा त्यांचा रागच त्यांच्या राजकीय मतप्रणालीचे रूप घेऊन आलाय. त्यातून त्यांच्या मनात 'दुसऱ्या'बद्दल चीड उफाळून येतेय. हे दुसरे म्हणजे मुस्लिम, मागासवर्गीय आणि ते 'आपल्यातलेच' असलेले पण पिढ्यानपिढ्या पाश्चिमात्य पद्धतीने जगत आलेले उच्चभ्रू लोक! गेल्याच महिन्यात अमित शहांनी मुस्लिम निर्वासितांना वाळवीची उपमा दिली. आणि भाजपाचे अधिकृत ट्विटर हँडल तर असले कुत्र्यांना प्रशिक्षण देणारे शीळ वजा शब्द वापरण्याचीही दक्षता घेत नाही. ते उघडच म्हणतात,"बुद्ध, हिंदू आणि शीख वगळता वेचून वेचून प्रत्येक घुसखोर आम्ही बाहेर काढू."
हे पुरेसे वाईट नाही म्हणून की काय मध्यप्रदेशातील समृद्ध मुस्लिम परंपरा लाभलेल्या, २५% मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भोपाळ शहरात भाजपाची उमेदवार आहे एक भगव्या वस्त्रातील संन्यासिनी. एका मशिदीजवळ सहा बळी घेणाऱ्या बॉम्बस्फोटाची सूत्रधार असल्याचा आरोप या बाईंवर आहे. सध्या प्रज्ञा ठाकूर नावाच्या या बाई जामिनावर मुक्त आहेत. त्यांची उमेदवारी आपल्या अगदी चांगल्या ओळखीचे असलेले वळण आणखीनच स्पष्ट करते. कट्टर राष्ट्रवादाचे भूत आणि गुन्हेगारी या दोन गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या करताच येत हे या वळणावर स्पष्ट होते.
जुनी व्यवस्था संपुष्टात आलीय पण कोणतीच विश्वासार्ह नवी व्यवस्था मात्र प्रस्थापित झालेली नाही हे मोदींच्या भारताचे चित्र आहे. मोदी पूर्वी जिंकलेत आणि कदाचित आताही जिंकतील. पण त्याचा परिणाम काय होणार? खास त्यांच्या पद्धतीचा बहुसंख्यवाद हा भारतीय समाजावरची अगदी ठोस टीका ठरला आहे. या समाजाचे अगदी नेमके प्रतीक काँग्रेस सोडून दुसरे कुठले असेल? आपला वंशपरंपरागत वारसा - म्हणजे नेहरू-गांधी कुटुंबाचा आणखी एक सदस्य वगळता काँग्रेसकडे देशाला देण्यासारखे फारसे काहीच नाही. एक प्रियांका गांधी नावाची बहीण आपल्या भावाच्या मदतीला देण्यापलीकडे देशातील या सर्वात जुन्या पक्षाची राजकीय प्रतिभा झेप घेताना दिसत नाही. हे म्हणजे अमेरिकेत २०२० साली डेमोक्रटिक पक्षाने राष्ट्राध्यक्षपदासाठी हिलरी क्लिंटनलाच पुन्हा उमेदवारी देऊन वर उपराष्ट्राध्यक्षपदासाठी चेल्सीची आकर्षक जोड देण्यासारखेच झाले.
मोदींचा पराभव करणे सोडून दुसरा कोणताही सामायिक कार्यक्रम नसलेला आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील काही पक्षांचे गोधडीस्वरुप गटबंधन असलेला इतका दुबळा विरोधी पक्ष लाभणे हे मोदींचे नशीबच म्हणावे लागेल. तरीही शंका त्यांना खाऊ लागलीय. कारण त्यांना जाणीव असेलच की २०१४ साली दिलेल्या आश्वासनाची आपण मुळीच पूर्तता केलेली नाही. आणि म्हणूनच ते आता 'अंतर्गत शत्रू' शोधू पाहताहेत. इतर बहुसंख्यवादी शासकांप्रमाणेच आपल्या 'व्हाइट हाऊस'मध्ये बसून ते 'त्यांच्या' सुलतानशाहीबद्दलची आपली खुन्नस ट्विट करत आहेत. याक्षणी भारतीय जनता आपल्या मर्यादांचे जणू प्रतीकच असलेल्या या हेकेखोर, सभ्यताहीन प्रादेशिक नेत्याला आणखी एक कार्यकाळ देण्याची तयारी करत असताना हा माणूस आपल्या स्वतःच्या अपयशाचा राग काढण्यासाठी जगाला आणखी कोणकोणती शिक्षा देऊ शकेल या विचाराने आपला थरकाप उडाल्याशिवाय रहात नाही.
अनुवाद: अनंत घोटगाळकर
मूळ लेखाचा दुवा
हिंदी सिनेमांत निर्मात्याने
हिंदी सिनेमांत निर्मात्याने लादलेले हिरो जनता सहन करत नाही का?
उत्तम लेख.
(आणि भाषांतरही आवडलं -
कुत्र्याच्या गळ्यातल्या घंटेची (दारू खाउन वाचलं बहुतेक)-कुत्र्यांना प्रशिक्षण देणारे शीळ वजा शब्द- वाक्यरचना थोडी ओबडधोबड वाटली).----
एकूणात नाईलाजाने सहमत आहे.
सध्या मित्रांशी या विषयावर चर्चा चालू आहे. तेव्हा जाणवलेले काही मुद्दे इथे मांडतो आहे-
१. सबकुछ मोदी म्हणणारे भाजप/रास्वसं सपोर्टर्स आजही तितक्याच (किंबहुना जास्तच) ठामपणे म्हणताहेत - मोदींना पर्याय नाही. देशभक्ती, प्राचीन भारतीय संस्कृतीचं रक्षण ह्यासोबत त्यांनी देशाचा आर्थिक विकासही केला,
स्वच्छ भारत, मेक इन इंडिया अशा नव्या गोष्टी आणल्या. आता आणखी पुढे जाण्यासाठी मोदींना पर्याय नाही. ह्या लोकांच्या अनेक सबकॅटेगरी आहेत -
जुने भक्त, रास्वसंघाचे मेंबर्स.
नवे भक्त - गेल्या काही वर्षातल्या प्रोपोगंडामुळे मोदींकडे आकर्षित झालेले लोक- देशभक्ती आणि राष्ट्रप्रेम हे मुख्य मुद्दे. ५६ इंची छातीच्या प्रेमातले लोक (कृ. भलता अर्थ काढू नये).
नवयुवक आणि नवयुवती- फर्स्श्टाईम वोटर्स. मोदींचं उत्तम वक्तृत्व, भावनिक अपील आणि त्यांनी सतत पुढे केलेलं काँग्रेसचं नाकर्तेपण - जे ह्या लोकांनी अनुभवलं नाही पण सोशल मिडियाच्या मीम्स वाचून त्यांना ते पटलं आहे -
असे सगळे मोदी है तो है म्हणायला तयार आहेत.
२. दुसरा वर्ग ( ह्यात बहुसंख्य मोडावेत) हा मोदींचा कट्टर पुरस्कर्ता अजिबात नाही- पण त्यातल्या त्यात उत्तम म्हणून मोदींना मत देणारा आहे. त्यांना गेल्या ५ वर्षातली धडाडीने राबवलेली (चुकीची का होईना) कामं ही ममोंच्या ५ वर्षातल्या पांगळेपणापेक्षा चांगली वाटतात. मोदींनी जी काही आश्वासनं दिलीत त्यांची पूर्तता झाली नाही हे माहिती असूनही मोदींनाच मत दिलं तर काहीतरी चांगलं होईल ह्या आशेवर हे लोक आहेत.
मोदींना पर्याय म्हणजे १७ पक्षांचं कडबोळं आणि पुन्हा त्यात नेहेमीचेच नासके आंबे -लालू/सपा/मायावती/दीदी इ.इ. ह्या लोकांना पुन्हा मत द्यावं- इतकी वाईट वेळ आली नाही तेव्हा मोदींनाच पुन्हा पंतप्रधान बनवू- असं मत बऱ्याच लोकांचं वाटलं.
राहुल गांधींची भाजपने जाणीवपूर्वक पोरकट केलेली प्रतिमा आणि त्यांची स्वयंभू अपरिपक्वता ह्यांचं मिश्रण - जोडीला राजकारणातलं आजवरचं अपयश - ह्यातल्या कशावर भरोसा ठेवून आम्ही काँग्रेसला मतं द्यावी- असा प्रश्न ह्या वर्गाला पडला आहे.
३. - कट्टर मोदीविरोधक मोदी नको पण कुणीही चालेल वाले लोक - ह्यांना काँग्रेसला अजिबात मत द्यायचं नाहीये, पण मोदींपेक्षा कुणीही चालेल म्हणून ते रामदास आठवलेंनाही मत देतील.
४. काँग्रेस समर्थक - आहेत. हे लोक अजूनही आहेत. आणि ते क्रमांक १ इतक्याच केविलवाण्या पद्धतीने त्यांच्या नेत्याचं समर्थन हर हाल मे करत असतात.
माझ्यामते #२ हा सर्वात मोठा वर्ग आहे.
मागच्या वेळी #१ मधे असलेले अनेक जण आता #२ मधे गेले आहेत.
==============================
==================
भूतकाळातील आस्वल्य.
येस्स्स्स #२ - अगदी बरोबर
येस्स्स्स #२ - अगदी बरोबर विश्लेषण आहे.
माझं वैयक्तिक मत आहे की Modi
माझं वैयक्तिक मत आहे की Modi is a necessary evil.
आजवरच्या राजवटींच्या नाकर्तेपणाचा फायदा घेऊन त्यांनी लोकांना स्वप्नं विकली, आणि त्याबळावर सत्ता मिळवली.
आता रास्वसंघाची बुरसटलेली आणि कमजोर व्हिजन ते हळूहळू राबवतील.
आणखी ५ वर्षांनी संघाचे किती अजेंडे पुस्तकातून प्रत्यक्षात येतील त्यावर बरंच काही अवलंबून असेल.
#दिवास्वप्नं
ते बघून डोळे पांढरे झालेले लोकं थोडे शहाणे होऊन मोदींना -विकासकामापर्यंत ठीक आहे पण ते मंदीर,गोहत्याबंदी,हिंदूमुस्लिम वगैरे आवरा - असं सांगतील.
#दिवास्वप्नसंपलं
==================
भूतकाळातील आस्वल्य.
रास्वसंघाची बुरसटलेली आणि
संघाची व्हिजन सुस्पष्टपणे तुमच्या अकलेबाहेरची दिसतेय.
१. तुम्हाला जर एवढंच पुढे जायची हौस आहे तर मंदिर होऊ द्या ना, असं काय साला अडून बसायचं? सोमनाथचं झालंच ना. ते ही सरकारी पैश्यानं. सरकारी नियोजनानं. असं काय बिघडलं. मंदिर मंदिर म्हणणार मोदी नि संघ मूर्ख मानले तरी तुम्हाला अक्कल आहे ना. तुम्ही द्या ना सोडून. तुम्ही आवरा ना पैले.
२. आणि गो हत्या बंदी घटनेत आहे. The prohibition of cow slaughter is also one of the Directive Principles of State Policy contained in Article 48 of the Constitution.
तुम्ही घटनेत कधीही काहीही घुसडायचं =
१. सोशलिस्ट - आणिबाणि
२. सेक्यूलर - आणिबाणी
३. आर्तीकल ३५ ए - हा तर जोकच आहे. प्रेसिंडची सही घेतली नि कागद घटनेला चिपकावला. म्हणे झाली घटना अमेंड. अरे भाऊ, एवढी मोठी संसद काय झोपायला आहे का?
४. अन्य इन १९७५/७६
==========
तुम्ही असे कोण झंड लागून गेले कि आवरायचं पुढच्यांनीच.
==============
बाय द वे, भारतीय विचार मंचाची भाषणं ऐका आणि तितकी बुरसटलेली भाषणं हार्वर्डमधे आढळली तर मला शेअर करा. हम भी क्या याद रखेंगे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
.
बरं.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
पैले लेखकाला आलेलं सरकार
पैले लेखकाला आलेलं सरकार मान्य करायला सांगा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
आभार.
भाषांतराबद्दल आभार. त्या निमित्तानं बरेच जास्त लोक लेख वाचतील, असं वाटतं.
बाकी सवडीनं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आता रास्वसंघाची बुरसटलेली आणि
आता रास्वसंघाची बुरसटलेली आणि कमजोर व्हिजन ते हळूहळू राबवतील.
- नाही.
..
आचरटबाबा, नाही म्हणजे काय नाही?
==================
भूतकाळातील आस्वल्य.
ज्या देशाने इतके महामुर्ख
ज्या देशाने इतके महामुर्ख पुरोगामी 70 वर्षे सहन केले तो देश काहीही सहन करू शकतो।
उदा. पुरोगामी सुहेल सेठ भारतात बिर्याणी ची संकल्पना येण्यासाठी मुघल राज्य आवश्यक होते असे मानतो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बाय द वे, अतिशी, केजरीवाल ने
बाय द वे, अतिशी, केजरीवाल ने जसा खुल्या पणे गांडीवर लाथ हणून प्रशांत भूषण ला हकलाला, (आणि पक्षासमोर हीच वाक्य रचना केली होती). हीच लाथ जेव्हा तुझ्या गांडीवर पडेल तेव्हा तुला काय सहन करावे काय नाही याची अक्कल येइल।
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
What changed in 5 years?
What changed in 5 years? Circulation of Time. Time also means business. Get the circulation back bloody ceo...
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अरुण जोशी, तुमची पार्टी
अरुण जोशी, तुमची पार्टी दणदणीत जिंकली त्याबद्दल हार्दिक अभिनंदन !!!
बाकी ठीक.
,सुहेल सेठ ला बऱ्याच प्रतिगामी माणसांची भलावण करताना बघितलाय टीव्ही वर. ( पुरावा मागाल तर देता येणार नाही कारण मी कार्यक्रम रेकॉर्ड करत नाही)
पण तुम्ही म्हणता तर असणार तो पुरोगामी . म्हणजे ओघाने उरलेले सर्व .
तसेच एकदा त्या सुश्री तवलीन सिंह या कुठल्या कॅटॅगरीत टाकता तेही सांगून ठेवा. म्हणजे काये की त्या गेली पाच वर्षे मोदी सरकारची भलावण करत होत्या , पण त्यांचे चिरंजीव कोणेत आणि त्यांनी काय लिहिलं हे माहीत असणारच तुम्हाला.
आमचं कन्फ्युजन होतं हो, कोण पुरोगामी आणि कोण नाही ते कळवून घेताना.
म्हणून म्हटलं, एकदा तुमच्याकडून समजून घ्यावं.
बाकी मजेत ना ? भेटला नाहीत बऱ्याच दिवसात ?
प्रिय बापट साहेब,
प्रिय बापट साहेब,
माणसाचं चरित्र असं बायनरी नसतं.
तो कमी फार फरकाने दोन्ही असतो.
संदर्भ म्हणून सुहेलचं नाव लिहायला लागलं, आपला मतलब आशयाशी.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
तुम्हीच मला म्हणायचं ते
तुम्हीच मला म्हणायचं ते म्हणालात तेव्हा ठीकच की.
अस्वल यांच्या कॅटेगरी १ मधील
अस्वल यांच्या कॅटेगरी १ मधील नव्या भक्तांच्या बाबत एक विदाबिंदू-
१९८९ च्या निवडणूकीपासून मतदानाचं किमान वय २१ वरून १८ झालं. तेव्हापासून काँग्रेस एकही निवडणूक बहुमताने जिंकलेली नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सध्या अनेक देशांत उजव्या
सध्या अनेक देशांत उजव्या प्रवाहाकडे लोकं आकर्षित होत आहेत. जागतिक व्यापारातील ताणतणाव, अर्थकारणातील चढ- उतरांमुळे आलेल्या अस्थैर्यामूळे उजवी विचारसरणी जवळची वाटू लागली आहे. मोबाईल संस्कृती आत्मसात केलेल्या तरुण पिढीला भविष्यापेक्षा वर्तमानात रमायला आवडते. कोणतेही साध्य गाठण्यासाठी साधनशुचीता सांभाळली पाहिजे असा विवेकी विचार तो करूच शकत नाही त्यामुळेच नथुराम गोडसेचे गुणगौरव करणारे उमेदवार निवडून येतात. अर्थव्यवस्था व रोजगाराच्या आघाडीवर निराशाजनक कामगिरी असतानाही बहुमताने सत्ताधारी पक्ष निवडून येतो तेव्हा चिंता वाटू लागते.
डावी विचारसरणी
देशफोडू डाव्या फेक्युलर विचारधारेला या विजयामुळे शह मिळाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
नथुराम गोडसेचे गुणगौरव करणारे
नथुराम गोडसेंचा मला प्रचंड अभिमान आहे.
एक थेरडं मेलं तर नथुरामला फाशी दिली पण २० लाख लोक मेले तर एक खटला भरला नाही. त्यांचं रक्त पात्तळ होतं का?
तो नसता तर ह्या नालायकांनी (मंजे गांधी आणि तत्सम महामूर्ख) हा आकडा कोटींच्या वर नेला असता. त्यात माझे स्वत:चे लातुरमधले आजी आजोबा असते.
तुमच्या बापाचं पुण्यात बसून काय जात होतं? आमच्या मराठवाड्यात या. गावागावात हुतात्मा स्मारकं आहेत. पंजाब नंतर आमचाच नंबर होता.
नथुराम होता म्हणून मी भारतात आहे, भारतीय आहे, हिंदू आहे, ब्राह्मण आहे, आणि तुमच्या नाकावर टिच्चून सांगत आहे.
=======
हत्येचा विरोध हा करायचाच असतो. नि म्हणून यातला जीव जाणं हा भाग मलाही आवडत नाही. पण तुम्हा बेअक्कल पुरोगाम्यांचा विरोध हत्येला नाहीच, तो नथुरामच्या फाळणीच्या काळातल्या भुमिकेला आणि भावनांना आहे. तुमच्यातले काही गोंडस अद्न्यानी आहेत, आणि काही सर्वद्न्यानी चांडाळ आहेत.
===========
कामापेक्शा जास्त साधनशुचिता पाळून ज्या नालायकांनी अत्यंत निरागस, निष्पाप, शांतीप्रिय, सहिष्णू इ इ पद्धतीने राहणाऱ्या करोडो लोकांचे जीवन क्शणात स्वत:च्या हट्टापायी, अक्शमतेपायी, आणि व्यवस्थापन कौशल्य नसल्यापायी बर्बाद केले त्या गांधीजींना चिडून कोणी उडवले असेल तर त्याच्या भावना मी समजू शकतो.
===========
आणि नथुराम अतिरेकी नव्हता. कमल हसनच्या गावात किलो किलो नं इस्ट्रोजेन घातलेलं अन्न खात असतील. पण तसला परिणाम झालेला नसेल तर कळतं की नथुराम अतिरेकी नव्हता. त्याला स्वत:ला काही मिळालं नाही. (आम्हाला मिळालं म्हणून आम्ही त्यांचे नाव उचलून धरतो.). त्याच्या विचारसरणीच्या लोकांना नंतर ७० वर्षे सत्ता मिळाली नाही. त्याच्या जातीच्या लोकांची हत्या झाली.
आणि आणि आणि ....
अतिरेकी धाडकन उडवतात. ते गांधीजींचं सत्कर्म , सतत्व आणि लोककार्य यांची वाखाणणी करत नाही. प्रत्यक्श आणि कोर्टात वंदन करत नाही.
==========
गोडसेंचे गुणगौरव करायला लै अक्कल लागते.
तिसऱ्या पिढीत अक्कल संपायच्या जमान्यात तुम्हाला ते सगळं कळणार नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
शत-प्रतिशत भाजप यायला हवे.
हिंदुद्वेषाचा आधार घेऊन राजकारण करणाऱ्या पुरोगाम्यांना वठणीवर आणायला मोदी सरकारच हवे.
गोडसेंचे गुणगौरव करायला लै
गोडसेंचे गुणगौरव करायला लै अक्कल लागते.
करकरेंना शाप देण्यासाठी प्रज्ञा नसली तरी चालू शकते. भविष्यात डोकावण्याची कुवत नसेल तर मढी उकरण्यात रमायला काहींना आवडत असेल तर काय बोलणार?
करकरे हा दिग्विजयसिंगाच्या
करकरे हा दिग्विजयसिंगाच्या हिंदू आंतकवादच्या गेमचा जाणता लाभधारी होता. आणि तो एका पिद्द्याची मौत मेला. जबरदस्ती हिंदू पकडून त्यांना अतिरेकी घोषीत करायला त्यानं पदकं, पैसे खाल्ले. शेवटी स्वत:च त्या प्लॉटचा बळी गेला.
============
तुमच्या मुश्रिफ साहेंबांना विचारा करकरेला आय बी नं का मारलं.
==============
"हेमंत करकरेला कोणी मारले" हे मुंबई पोलिस चिफचे पुस्तक वाचा नि कळेल कि -
१. ब्राह्मण अधिकारी पोलिसात नि लष्करात कसे हिंदुत्ववादी अन्याय करतात.
२. पण करकरे कसा थोर होता.
३. तो या सर्वांना कसा नीट हाताळत होता.
४. म्हणून ब्राह्मण नि मनूवादी आयबी नं त्याला कसा २६ -११ ला मारला.
==========
हे लै भारी सेक्यूलरानं लिहिलेलं पुस्तक आहे. त्यातनं तुम्हाला साध्विनं शाप का दिला (त्याला काही अर्थ नसतो ही गोष्ट असो.) ते कळेल.
==============
भविष्यात आमच्या पुढच्या पिढ्यांची मढी नकोत. हिशेब चुकता झाला असेल तर कशाला मागे पाहायचं? पण तसं नाही ना. तुम्हाला गझवा ए हिंद करायचं आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
तुमच्या नाकावर टिच्चून सांगत
तुमच्या नाकावर टिच्चून सांगत आहे.
माझे आजोबा वय वर्षे ९३ हयात आहे, स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन तुरुंगवास भोगला,परंतू स्वातंत्र्य सैनिकाचे पेन्शन घेत नाहीत. त्यांच्यामुळे मी भारतात आहे ह्याचा मला अभिमान आहे.माझ्याकरता माझे आजोबा जिवंत स्मारक आहे.
पोलिसांनी बऱ्याच पारावर
पोलिसांनी बऱ्याच पारावर गपाट्या मारत बसलेल्या लोकांना धावत्या गर्दीत १-२ दिवस जेलमधे घातले आणि नंतर सरकारने त्या फुकट्यांना पैशासाठी सर्टिफिकेटे वाटली. असे बरेच आहेत.
तुम्हाला स्वत:चे नाव गोडसे असताना तुम्हाला नथुराम बद्दल जे माहीत आहे ते पाहता तुमचे आजोबा त्यांच्यातलेच एक वाटतात.
===========
आजही हरयाणा नि पंजाबच्या गावांत फिर १-२ दिवस. मग कळेल नथुरामचा अभिमान मंजे काय गोष्ट असते ते. ज्यांनी गोष्ट भोगली त्यांना कळतं, पेन्शन खाऊंना कळत नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
फिर... करेक्शन् फिरा.
फिर...
करेक्शन्
फिरा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मोदींनी मात्र अलीकडच्या काळात
हा लेखक टिपिकल लॉजिक माफ असलेला पुरोगामी आहे.
======
एक तर झाट काही मौन नाही.
=========
दुसरं मौन मंजे सहाय तर भारतीय मुसलमान अतिरेक्यांचे सहायक ठरतात रे राजा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सरकारने त्या फुकट्यांना
सरकारने त्या फुकट्यांना पैशासाठी सर्टिफिकेटे वाटली. असे बरेच आहेत
ते पाहता तुमचे आजोबा त्यांच्यातलेच एक वाटतात.
पेन्शन खाऊंना कळत नाही.
नीट वाचा. माझ्या आजोबांनी स्वा. सै. चे पेन्शन घेतले नाही. त्यामुळे तुमचे लॉजिक गंडले आहे.
हेत्वारोप करायचा अधिकार काय
हेत्वारोप करायचा अधिकार काय तुम्हालाच आहे का?
===========
फक्त साध्वीच आणि नथुरामच खोटारडे असतात का? तुमचे आजोबा नसू शकतात का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
त्यामुळे तुमचे लॉजिक गंडले
मग सांगा, तुमच्या तथाकथित स्वातंत्र्यसैनिक आजोबांनी नथुराम गोडसे बद्दल तुम्हाला काय सांगीतलं? तुमचा नथुद्वेष तिकडूनच आला असणार.
- त्याला ७३ हुर्रे पाहिजे होती.
- त्याला पद काय पाहिजे होती?
- तो गांधीजींचा नक्की किती अनादर करायचा?
- तो वेडा होता. आणि दर आठवड्याला एक खून करायचा!
- तो मुसलमानांचा द्वेष करायचा?
==============
यातलं काहीच खरं नाही.
==========
२६ -११ सारख्या घाणेरड्या आरोपीसाठी रात्री जागवणारे तुम्ही, नथुरामला देशभक्त म्हणलं तर काय बिघडलं.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
तुमच्या तथाकथित
तुमच्या तथाकथित स्वातंत्र्यसैनिक आजोबांनी नथुराम गोडसे बद्दल तुम्हाला काय सांगीतलं?
आजोबांचा आणि माझाही भारतीय न्यायपालिकेवर विश्वास असल्यामुळे तिने मृत्युदंडाची शिक्षा केलेल्या व्यक्तीबद्दल त्यांनीही काही सांगितले नाही आणि अधिक जाणून घ्यायची मलाही इच्छा नाही.
गांधी हत्ये नंतर शेजारच्या काकू पदराखाली लपवून पुरणपोळ्या घेऊन आजोबांकडे आल्या होत्या. सणवार नसताना आज पुरणपोळ्या? आजोबांनी काकूंना विचारले. अहो नथुरामाच्या पराक्रमाच्या आहेत त्या , बाहेर वातावरण कसं आहे माहितेय ना? म्हणून लपवून आणल्या आहेत. आजोबा म्हणाले त्याने तर चारचौघात पराक्रम केला तर आपण लपून का साजरा करायचा त्याचा पराक्रम? थोड्या वेळाने आजोबांनी शेजारच्या काकूंचा दरवाजा ठोठावून मोठ्या आवाजात ओ वैxxxxx दरवाजा उघडा ,पुरणपोळ्या घेऊन आलो आहे. दरवाजा उघडला गेला नाही. आजोबा पुरणपोळी खात खात घरात आले. लपून पुरणपोळ्या खाणाऱ्या शेजारच्या काका काकूंच्या केसालाही धक्का लागला नाही. हा किस्सा आजोबा सांगतात नेहमी.
त्यांनीही काही सांगितले नाही
यावरुनच तुमच्या नि तुमच्या तथाकथित पारावरुन धावछाप स्वातंत्र्यसनिक आजोबांच्या बुद्धींच्या परीघांची आणि क्षेत्रफळांची पूर्ण कल्पना येते.
अशी इच्छा नसण्यासाठी एक विशेष निर्बुद्धता लागते. इच्छा नसण्याची निर्बुद्धता असलेले अनेक भारतीय आहेत पण ते गप्प प्रामाणिक आहेत. त्यांपेक्षाही विशेष निर्बुद्ध असलेल्या लोकांमधे आपण मोडता जे जाणतही नाहीत आणि गप्पही बसत नाहीत.
===============
मंजे तुमच्या २० वर्षांच्या स्वातंत्र्यवीर आजोबांनी तिच्यावर उपकार केले का काय?
============
आमचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांनी पेंशन घेतलं नाही
मंजे
"माझं नाव कुठेच मिळणार नाही. माझ्या थापा स्विकारा."
तुमचे आजोबा त्यातले.
त्यांचं पूर्ण नाव, त्यांचे जेल आणि सोबतचे मित्र हे सांगा. मी पेंशन डाटा चेक करतो.
============
किंवा तुम्ही इतके निर्बुद्ध असाल कि "स्वातंत्र्यसैनिक" आणि "गांधीवादी" हे दोन वेगळे शब्द आहेत हे आजोबांना कळत नसेल.
==================
तुमच्या आजोबांच्या मार्गदर्शनाखाली तुमचं फार भेळसांडलेलं संगोपन झालेलं आहे. तुम्ही कृपया नथुराम गोडसेंबद्दल वाचा आणि मग बोला. आमचंही तसंच संगोपन झालेलं पण हरीयाणा दर्शनानं आमचे डोळे उघडले आणि आम्ही नथुराम अभ्यासला थोडा फार. त्याला देशभक्त म्हणायला अजिबात हरकत नसावी.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
जबराट बॅटिंग
अशी इच्छा नसण्यासाठी एक विशेष निर्बुद्धता लागते. इच्छा नसण्याची निर्बुद्धता असलेले अनेक भारतीय आहेत पण ते गप्प प्रामाणिक आहेत. त्यांपेक्षाही विशेष निर्बुद्ध असलेल्या लोकांमधे आपण मोडता जे जाणतही नाहीत आणि गप्पही बसत नाहीत >>>
जबराट बॅटिंग
मी-माझा ,
मी-माझा ,
तुमचा सदस्य कालावधी २ तासाचा दिसतो आहे. त्यामानाने तुम्हीदेखील तर जबराटच बॅटिंग केलेली आहे की.
लोकांनी आपली आयुष्यं घातली.
लोकांनी आपली आयुष्यं घातली. नथुराम म्हणतो माझा यात जीवही जाणार आणि (इथले लोक मूर्ख असल्यामुळं - हे माझ्याक्डून) मला प्रचंड मेल्यावर बदनामी सहन करावी लागणार. तरिही हे योग्य आहे म्हणून मी केले.
==========
त्यापुढे आपण असं बॅटींग इ इ म्हणणं अयोग्य आहे.
========
मी काही इथं माझी साहित्यिक प्रतिभा दाखवायला नाही आलेलो. ती नाही देखील माझ्याकडे. पण असल्या पळपुट्या आजोबांच्या बेअक्कल नातवांकडून ( च्यायला, हाच सीन काँग्रेसमधे पण डिट्टो आहे.) उगाच भंपक विधान आली कि राग येतो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अजो पण नातेवाईकांबद्दल बोलू
अजो पण नातेवाईकांबद्दल बोलू नये कारण ती अन्य लोकांची आदरस्थाने असतात. नथुराम हे तुमचे आदरस्थान असेलही पण तितक्या जवळचे नसेल जितके अन्य लोकांचे आजोबा आदि ...
असो.
प्लीज आवरा. तुमचा पॉइन्ट कळलेला आहे.
अनुरावने एकदा खूप मस्त मुद्दा मांडला होता (ती खरच हुषार होती.) - एखादी गोष्ट सतत ठासवण्यापेक्षा, तिकडे अंगुलीनिर्देश करावा व गप्प बसावे. सूद्न्य लोक काय ते उमगतातच.
नातेवाईकांबद्दल बोलू नये कारण
अगदी अगदी. माणसानं अगदी आदर्शत: कोणाचाच अनादर करु नये.
================
पण काही लोकांच्या आदरस्थानांचा त्यांना इतरांच्या आदरस्थांनांबद्दल आदर करायचा असतो हे कळेपर्यंत अनादर करायचा असतो.
ही चौकीदार चोर म्हणणारी - प्रॉक्यूअरमेंट, कॉस्टींग आणी काँट्रक्ट्सची अजिबात माहीती नसलेली निर्बुद्ध गाढवं आहेत. यांना त्यांचा बाप चोर आहे म्हणेपर्यंत ते खोटं बोलायचं थांबत नाहीत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पण चौकीदार चोर आहे असे रागा
पण चौकीदार चोर आहे असे रागा म्हणाले. इथे लोकंना ते आवडले नसेलही. तुम्ही ॲझ्युम करत आहात की ज्यांचा ज्यांचा कॉन्ग्रेसला सपोर्ट आहे त्यांना त्यांना "चौकीदार चोर" असे वाटते.
________
जर तुमचा बी जे पी ला पाठींबा आहे आणि कोणीतरी त्यावरुन निष्कर्ष काढुन की तुम्हाला महमद अखलखचे जे झाले ते आवडले - असा निष्कर्ष (ॲझ्युम) काढून तुमच्या नातेवाईकांबद्दल अनादर केला तर तुम्हाला कसे वाटल?
ज्यांचा ज्यांचा कॉन्ग्रेसला
राफेल घोटाळा नव्हता म्हणणारे काँग्रेसी संदर्भ द्या मग नक्कीच विचार करेन.
==============
बीजेपी आणि अखलाखचा काय संबंध?
चौकीदार चोर है असं राहुल एल के जी पोरांकडून ए बी सी डि म्हणून घेतात तसं म्हणून घेत होता प्रचाराच्यावेळी. आहात कुठं!
फरकाय हो.
================
बाय द वे, मला व्यक्तिश:हुतात्मा महंमद अखलाखचे जे झाले ते आता ५ वर्षांनंतर आवडू लागले आहे. त्यांच्यामुळे आम्हाला पात्तळ रक्ताचे हिंदू लोक किती अनजान मरतात ते कळाले. बाय द वे, महान हुतात्मा महंमद अखलाख सोडला तर देशात
१. काश्मिरात मेलेल्या एका सैनिकाचे नाव
२. युपित मेलेल्या एका भाजपवाल्याचे
३. केरळात मेलेल्या एका संघ्याचे
नाव तुम्हाला माहीत आहे का?
आम्हाला अखलाखचं नाव माहीत हा त्याच्यावर खूप मोठा उपकार आहे. अर्थातच हा पुरोगाम्यानीच घडवून आणलेला आहे पण तो उपकारच आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
त्याला देशभक्त म्हणायला
त्याला देशभक्त म्हणायला अजिबात हरकत नसावी.
पंतप्रधानांना सांगा, प्रज्ञाला उगाचच टेंशन देत आहेत.
पंतप्रधानांना सांगा,
च्यायला, तुमच्या मतेही मोदी चार चांगल्या (तुमच्या मते चांगल्या हां) गोष्टी करतात तर !!!!!!!!!!!!!!!!!! अगायो.
तुमच्या बुद्धीला काय झालं रात्री १२.०० वाजता? अहो, अजोंना विरोध करायला तुम्ही मोदींची साथ देताय.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
लोकशाही पद्धतीनं नीट निवडून
लोकशाही पद्धतीनं नीट निवडून आलेलं सरकार मान्य नसलेल्या या शंकाखोर औलादी या सरकारला निवडून देणारे किती काळ सहन करणार?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
श्रीलंकेचे महान इतिहासकार ए.
अबे xxये, युरोपात जेव्हा चर्चची सत्ता गेली तेव्हा जगातली सर्वात घाणेरडी दोन महायुद्द झाली. तुला काय ठेवायचं आणि काय त्यागायचं त्याचं ए बी सी कळत नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
कुत्र्यांना प्रशिक्षित करताना
हे जे तुझा लेख उचलून धरताहेत ना, हि खरी कुत्री आहेत. त्यांचा तु प्रशिक्शक. तुझा लेख ती तारस्वरातली शीळ. बॉल ना बोचा, बाई मला टोचा प्रकारातली तुझी सरकारविरोधातली तक्रार.
बेट्ट्या, तुझी कुत्री बाजारातून विकत घेतलेली, फोरेन ब्रीडची, वास्तव माहीत नसलेली, इंग्रजी शीळ जाणणारी, मोदीनं संध्याकाळची फुकटची दारु बंद केलेली आहेत.
१९९८ ला, १९९९ ला, २०१४ ला तु शिळा घातल्या आणि कुत्रेओरड चालू झाली. २०१४ ते २०१९ मध्ये ज्याला तु चोर म्हणून तुझ्या कुत्र्यांना शीळ घालतो त्या कुत्र्यांना अक्कल आली असेल असं वाटलेलं. पण साली ही कुत्रीच नव्हे तर गाढवं पण आहेत. ह्यांना स्वत:च्या अकलीनं चोर साव कळतच नाही. तु शीळ घातली मंजे चोरच असं मानणारी शहरांत जन्मलेली, कॉन्व्हेंटमधे शिकलेली, स्वधर्मत्याग मंजे सर्वधर्मसमभाव मानणारी, राजकारण, समाजकारण, अर्थकारण यांचेशी सुतराम संबंध नसलेली, अगदी व्यवस्थित "गुलामावलेली" कुत्री लाभलेली आहेत.
यांची गुलामी इतकी खोल आहे कि यांच्यात परिवर्तन संभव नाही.
(हे सगळं मूळ लेखकाला आहे.)
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
इथे पकाऊ श्रेणी देणारा तुझा
इथे पकाऊ श्रेणी देणारा तुझा सर्वात निष्ठावान कुत्रा/कुत्री.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सेक्युलर जळफळाट
याची-त्याची जात काढणाऱ्या जातियवादी पुरोगाम्यांपेक्षा देशप्रेमी सरकार परवडले. आतंकवादाला धर्म नसतो म्हणतांनाच हिंदु दहशतवादाचा बागुलबुवा उभा करणाऱ्या पुरोगाम्यांना आपण स्वत:च्याच चक्रात कसे अडकलो, हेच समजले नाही. कोणी यांच्या मताशी असहमत झाल्यावर पुरोगाम्यांचा जळफळाट होतो आणि स्वत:चाच कथित उदारमतवाद विसरतात हे भोंदू फेक्युलर्स.
फालतू टुकार लेख.
लेखकाला भारतातील ग्रामीण भागातील स्त्रिया व मुस्लिम स्त्रिया यांची मते काय ते माहीत नाही. हा सर्वात महत्वाचा वर्ग आतापर्यंत दुर्लक्षित होता आणि मोदींनी या वर्गासाठी शौचालय बांधणी, उज्ज्वला योजना व ट्रिपल तलाक विरोधी विधेयक आणलं.
बाकी जी काही भीती दाखविण्याचा प्रयत्न सुरू आहे तो नवा नाही. या भामट्यांनी 2014 सालीही अशीच भीती दाखविणारी वक्तव्ये केली होती. सामान्य बुद्धीचे लोक या भामट्यांच्या प्रपोगंडयाला लागेच भुलतात. काही भोंदू पुरोगामीही अगदी विद्वत्तेचा आव आणून लिहिते होतात, पण ग्राउंड लेव्हल ला काय चाललंय ते मतदारांना स्पष्ट दिसत असतं. त्याच मतदारांनी मोदींच्या झोळीत भरभरून मते टाकलीत.
मुख्य म्हणजे फुकट्यांची सद्दी जनतेने संपवलीय, त्यामुळे आता पायाभूत सुविधा, संरक्षण सिद्धता, अंतर्गत सुरक्षा व विकासाभिमुख योजना यावर सरकारला खर्च करता येईल.
मोदींना प्रचंड मतांनी जिंकविल्याबद्धल भारतीय जनतेचे शतशः आभार.
शेवटी, फुरोगामीही या देशात हवेत, कॉंग्रेसही या देशात हवी, नाहीतर मोदींची तुलना कुठल्या नालायकांबरोबर करायचं हे जनतेला कळणार नाही.
अजोंनी बॅटिंग केलेली आहे आज.
अजोंनी बॅटिंग केलेली आहे आज.
काल मोदींनी हाणावे नि आज
काल मोदींनी हाणावे नि आज अजोंनी हाणावे यासाठी संस्कृतमधे एक कसलातरी योग म्हणून शब्दप्रयोग आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बोअर करू नका हो.
बोअर करू नका हो.
एकेकाळी तुम्हाला शिरेसली घेत लोक.
तुम्ही आता ऐसीचे दिग्विजयसिंग झाले आहात.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
तुमच्या सिमित अकलेपलिकडे
तुमच्या सिमित अकलेपलिकडे प्रचंड मोठं जग आहे हे जाणवलं. तुम्हाला प्रतिसाद दिला मंजे तुम्हाला अक्कल आहे, तुम्ही गंभिर आहात, तुम्हाला लायकी आहे इ इ होत नाही. तुम्हाला अक्कल यावी यासाठी प्रयत्न करणं आमचं कर्तव्य आहे. सुरुवातीला बोअर होतं थोडसं.
===========
हे दिग्विजयसिंगांचच संस्थळ आहे. आणि दुनिया मिरर हाउस असते म्हणतात.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अरुण राव, तुम्हाला नम्र
अरुण राव, तुम्हाला नम्र विनंती की किमान भाषा सांभाळा. तुम्ही लिहिताय ते तुम्हाला प्रखरपणे वाटत आहे हे दिसत आहेच. ते असो. इतरांना काही वेगळं पण वाटत असू शकते. लोकं तुमच्या लिहिण्याच्या पद्धतीमुळे प्रतिवाद करत नसावेत असा अंदाज.
बाकी इतिहास हा विषय स्वतःच्या सोयीने घेण्याचा. नाही का ?
स्पष्ट लिहिल्याबद्दल क्षमस्व.
बाकी दोस्ती बनी रहे. वगैरे.
इथल्या एकाही महाभागानं मी
इथल्या एकाही महाभागानं मी मांडलेल्या एकाही मुद्द्यावर उत्तर दिलेलं नाही.
--
एकही प्रतिसाद नाही. एकही प्रतिवाद नाही.
--
नुसत्या चांडाळचौकडीच्या ऋण श्रेण्या.
----
कळलं का तुम्हाला मोदी का सहन करावा लागतोय?
कारण त्याच्याविरोधात तुमच्याकडे मुद्दाच नाही.
तो तुमच्या विचारधारेचा नाही इतकेच त्याचे घोर पाप आहे.
----
तुम्हाला कशातलं काही येत नाही, कशातलं काही माहित नाही, पण भविष्यात काय होईल अशा निरर्थक लाखो कुशकांचं जाळं बांधण्यात तुम्ही जो गर्दभमेध यद्न्य चालवला आहे त्याला सगळे हसताहेत बे.
----
२०१४ ला मेघना आणि ऋषिकेश नं मोदी हिटलर सारखे काँसेंट्रेशन कँप काढेल आणि मुसलमानांना मारुन टाकेल म्हणून एक लेखाचा दुवा दिला होता. तेव्हा मी तुम्हाला जाग्यावर आणला. पण कुत्र्याचं शेपुट वाकडं ते वाकडं.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हेच सांगतोय अरुण राव, तुमच्या
हेच सांगतोय अरुण राव, तुमच्या लिहिण्याच्या पद्धतीमुळे कुणी प्रतिसाद देईल अशी शक्यता कमी आहे. मुद्यांमुळे नाही.
तुम्ही म्हणताय त्यात तथ्य असू
तुम्ही म्हणताय त्यात तथ्य असू शकतं.
------------
पण ऐसीवर अत्यंत सभ्यपणे लिहायचा माझा अत्यंत प्रदीर्घ अनुभव आहे. मी जवळजवळ ३-४ वर्षे तरी अत्यंत संतुलित, मैत्रीपुर्ण आणि सभ्य लिखाण इथे केलेलं आहे.
--------
पण इथल्या पुरोगामी मंडळींचा माज अति आहे. फक्त राजेश घासकडवी हा एकच मनुष्य कोण्यात्याही हालतीत सभ्यता सोडत नाही आणि प्रचंड प्रतिवाद देखील करतो.
------------
तुम्ही स्वत: पुरोगामी आहात म्हणून इथे टिकून आहात. गंमत म्हणून एकदा धार्मिक इ बना नि तुम्हाला कळेल ही काय मंडळी आहेत.
------------
बाकी अनेक आय डी चांगले असणारच, पण त्या कौरवांच्या सभेत गप्प बसलेल्या मंत्र्यांसारखे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
+१
हे लिहिल्याबद्दल धन्यवाद अण्णा.
आधी असाच काहीसा एक मोठा प्रतीसाद टाईप करून मग मिटवून टाकला.
जोशी इतका भयानक चेव येऊन लिहितात की -
आधी मी नवा असताना प्रत्युत्तर घ्यावेसे वाटे.
मग करमणूक होई.
आता फक्त बोअर होतं, करमणूकही नाही.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
अख्खं ऐसी जगाचं टाईमपास आहे.
अख्खं ऐसी जगाचं टाईमपास आहे. तुमचं अख्खं जग ऐसी आहे. तुम्ही अस्वलाचा आय डी घेतलेले 'स्वत:वर हसून घेणारे' प्राणी आहात.
अगोदर तुम्ही (मंजे तुम्ही सगळे) सुधराल वाटायचं, आता तुम्ही १. अद्न्यनि गोंडस वा २. सर्वद्न्यानी चांडाळी पैकि एक प्रकारचे पुरोगामी आहात, म्हणून वर्षा सहा महिन्याला चाबूक फटकारुन जायच्या लायकीचे आहात हे पक्कं उमगलं आहे.
------
पौर्णिमेला जसा वेडाचा भार वाढतो तसं मोदीचं काही भलं झालं की तुमच्या अंगातलं भूत धिंगाणा घालायला लागतं. ती स्मशानगंमत बघायला मला मजा येते. तुम्ही भूतं आहेत म्हणून मी घाबरावं, तुमच्या मतांना मान द्यावा वा पळुन जावं असं इथल्या अदिती टाईप प्रतिश्ठित भूतांना वाटतं. जेवढं भूत माजोरडं तेवढा मी जोरात फटका टाकतो. पण मलाही भरपूर टाईमपास मिळतो नि अनेकदा कीवही येते. तुम्ही चेव म्हणता मी पिशाच्चमाजनिर्मूलन म्हणतो.
----
म्हणे नेसेसरी इव्हील, कधी आरशात थोबाड बघीतलंय का स्वत:चं? तुझा पगार किती, बोलतो किती? समज सारे विरोधी पक्षाचे नेते मोदींइतकेच चांगले नि सक्षम असते तरी मोदीच बेस्ट असले असते. कारण? करतोस का डिबेट? मी ईथून पुढे अत्यंत सभ्य नि आर्जवी भाषा वापरायला तयार आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अद्न्यानी गोंडस कोण ते कळलं.
अद्न्यानी गोंडस कोण ते कळलं.
अदितीला व न्य सर्वांना भूत म्हणायला, दर सहा महीन्यानी चाबकाने फटकारवायला तुमच्या प्रॉजेक्टची टीम इथे नाही अजो. किंबहुना तिथेही असा आक्रस्ताळेपणा चालत नसेल. चाबकाने फटकारवायला इथे कुल्ले उघडे करुन कोणीही बसलेले नाही.
चेव/आवेश/आक्रस्ताळेपणा - हेच तुमचे पेटंट आहेत
मोदिंनीही जर ऐसीवर असते तर इतका आवेश दाखवला नसता.
मला अजुन काहीही बोलायचे नाही, यापुढे एकतर्फी चालू द्यात.
गोंडसपणाही कधीकधी बचाव असतो. आपल्यावर चिखलात मारएल्या दगडाने राळ उडू नये म्हणुन घातलेला रेनकोट असतो. पण स्पष्ट भाषेत जर सांगायचे झाले तर. यु हॅव्ह व्हेरी लो एमोशनल कोशंट. इथे तुमचे फॅन फॉलोइंग आहे पण तुम्हीच त्यांचा उपयोग तर करुन घेत नाहीच वर दूर लोटता.
मजा बघणारे दर तासाला फेक आय डी घेउन येणारे तुम्हाला सांगतही असतील - क्या बात है!!! जिंकलस मर्दा!
.
पण सत्य हे आहे की तुम्ही पराभूत आहात. तेव्हा बालिश थयथयाट चालू द्यात. अन्य लोकांचे नातेवाईक उगाच वेठिला धरु नका. किंवा धरा ना, मरु दे तेजायला!!!
_______________________
मोदीभक्तच मोदिंची वाट लावणारेत असे दिसते.
अहो, तुमचे स्वत:चे विचार
अहो, तुमचे स्वत:चे विचार सुयोग्य संतुलित असतील तर माझा एकही शब्द इथे लागू नाही अशा लोकांना.
ही टिका केवळ ज्यांना लेख पटला आहे, ज्यांचे त्याच्यातली प्रक्षोभक मतांना समर्थन आहे, त्यांच्यावर आहे.
आणि ऐसी वर असे बरेच आहेत हे तुम्हाला ही माहीत आहे.
============
लोकांनी मतदात्यांना (ते ही करोडो) आपल्याच समाजातल्या अन्य धर्म बांधवांना मारायला उठलेली कुत्री म्हणावं आणि इथल्या लोकांनी ते कौतुकानं उचलून धरावं याला मर्यादा घालायला चाबूकच हवा.
ना ही हमें मुसलमानों का कोई नुकसान करना है, ना हमें लगता है मोदी करेगा. आपको लगता है मोदी करेगा तो उसको गाली दो (हम थोडासा डिफेंड करेंगे उसको.) लकिन साला ये लोग डायरेक्टली हम को, मतदाताओं को गाली देता है, जब की हम को पता है हमे किसी का नुकसान नही चाहिए.
==========
धर्मपिसाट कुत्री आणि अतिलिबरल असे दोनच वर्ग असतात का समाजात? हिंदू धर्म सत्ता करण्यास सक्षम आहे असं मत असेल लोक काय मुस्लिमद्वेष्टी कुत्री होतात का काय?
मी काही नेता वा लेखक नाही. तेच मत, समांतर मत, भिन्न मत, विरुद्ध मत असे लोक सर्वत्र असतात. हे सर्वच मला प्रिय आहेत. विकृत मत असलेले मात्र दूर गेलेलेच बरे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ओके गॉट इट.
ओके गॉट इट.
अनावृत्त पत्र
हे माझे पत्र अजुनही तितकेच समर्पक आहे. अथवा आता परिस्थिती अधिकच चिघळली आहे. -
http://aisiakshare.com/node/4302
__________ तेव्हा अनेकांनी अजोंना सपोर्ट करुन, माझ्यावर टिका केलेली होती______________
उदय. on बुधवार, 12/08/2015 - 12:19.
अजोंनी या पत्राला उत्तर देण्याच्या फंदात पडू नये, (असे माझे मत आहे).
__________________________________________________________
थत्ते-
+१
पत्र लिहिणारा आयडी वेगळा असता तर पत्र गायडेड आहे असा आरोप मी केला असता.
___________________
गवि -
उदय, थत्तेचाचा यांच्याशी सहमत.
.
शुचिताई, तुमचा हा प्रतिसाद वाचल्यावर (हे मान्य, ते जाऊद्यात, हे बरोबर, हा प्लसपॉईंट, ते अॅग्री) मग मुळात तुम्ही तसे पत्रबित्र लिहिलेतच कशाला असा प्रश्न कोणालाही पडेल.
_________________________
अनामिक-
असेच! शिवाय कोणाला जाहीरपणे जजमेंटल, तसेच हा तुमचा प्लस पॉईंट किंवा मायनस पॉईंट आहे असे म्हणणे हे सौम्य असले तरी वैय्यक्तिक होणे नाही काय?
________________________________________________________________
अजोंनी तेव्हाचे हे सपोर्टर्स ही आताच्या आवेशामुळे गमावले असण्याची शक्यता आहे. असो. याचा अर्थ जराआपले विरोधक, थंडपण बोलून अधिक प्रभावीपणे मुद्दा मांडत असतील तर आपण अधिक शांत-थंड बर्फाप्रमाणे राहून प्रतिवाद करायला नको का?
___________________________________________________________________
दर वेळेला मला अचंबा होतो मिपावरती 'दत्तात्रेय' धाग्यावरती जे ट्रोलिंग झाले, माझ्यावरती अनाठायी हल्ला झाला की मी फार कठोर लिहीले, तो दगड मारणारा जमाव आता का शांत, अजोंच्या कठोर बोलण्याला का नाही प्रत्युत्तर करत. मला विकृत म्हणणारे ते लांडगे आता जालावरुन निवृत्तही झाले असतील. असो.
दर वेळेला तुम्ही वैयक्तिक झालात की मला मिपावरचा माझा वावर आठवतो. तिथे वयक्तिक होणाऱ्यांची पूर्वी कमी नव्हती. आता काय स्थिती आहे माहीत नाही.
पलिकडच्या गल्लीतल्या माणसानं
पलिकडच्या गल्लीतल्या माणसानं तुम्हाला आईवरुन शिवी घातली तर लगेच आईचं सगळं चेक करणारे, तिच्यावर पाळत ठेवणारे हे महान कुटुंबीय.
शिवी = टाईमचा लेख
पलिकडचा माणूस = पाकिस्तानी लेखक
आई = मोदी
कुटुंबीय = भारतीय सेक्यूलर
=============
प्रत्येक सरकार हजार चुका करतं. त्याच्यावर टिका करायला पाच वर्षे पुरतील त्यापेक्षा जास्त जागा आहेत. पण ज्या मूर्खांना निरथक हेत्वारोपांशिवाय काही सुचतच नाही त्यांना काय म्हणावं?
============
तुम्हाला जसं वाटतं कि उद्या मोदी फलानं करेल, ढिमकानं करेल, असं होईल, तसं होईल, तर तसंच मलाही असं वाटायचा अधिकार आहे कि तुम्ही इतके गाढव आहात, तितके गाढव आहात. आधारच नसला तरी चालेल असंच जर असेल तर मग काहीही म्हणा, कशालाही सपोर्ट करा.
=======
फक्त एकट्या अस्वलाला तो कुत्री शब्द खटकला, अन्यथा इथल्या लॉबीला मोदिंचे भारतीय मतदाते मुसलमानांच्या रक्ताला पिपासलेले कुत्रे म्हटलेलं बरोबर वाटत आहे? कुठं दिसले बे तुम्हाला असले लोकं? अरे नालायकांनो, बिहारमधल्या किशनगंज मधे ७५% मतदाते मुस्लिम आहेत. तिथे भाजपचा मित्रपक्ष निवडून आलाय.
https://theprint.in/opinion/muslim-vote/bjp-is-emerging-as-second-most-p...
मोदींच्या काळात मुस्लिमांचं भाजपला सर्वाधिक मतदान आहे. आहात कुठं? ही लिंक कट्टर डाव्या प्रकाशनाची आहे.
======
मनून मंतो, चेव बिव कै नै, मी तुमच्या लै लांब सुतळि टाकलीय, मंडुकांनो बाहेर या.
देशात सुशासन, प्रशासन, धार्मिक ऐक्य, आर्थिक प्रगती, इ इ आपल्या कुवतीप्रमाणे चालू आहे. टिका करा, योग्य ती करा.
आणि भेंxx, पुन्हा मोदींना मत दिलं मंजे आम्ही मुसलमानांच्या जीवावर उठलेले कुत्रे आहोत, इ इ भुंकायला लागलात तर ह्याच शिव्या खायची तुमची लायकी आहे. राहुल जीव गांधी तुम्हाला पंतप्रधान पाहिजे होता ना? त्यानं किती हसतमुखानं, परिपक्वतेनं आपला पराजय मान्य केला, जेत्यांचं वारंवार अभिनंदन केलं, नुसता कल पाहुन खुल्या मनानं अमेठीतली हार मान्य केली, आणि पुढे प्रेमानंच वागेन असा निर्धार जाहिर केला - त्याच्याकडनं १% तरी शिका. तो राजकारणात इतका कच्चा असून त्याला कसा विचार करावा ते कळतं, तुमचा काय प्रोब्लेम आहे?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
फक्त एकट्या अस्वलाला तो
याचे कारण अस्वलांचे मत भाजपालाच आहे अजो. (असे मला तरी त्यांच्या खफवरील खरडीवरुन वाटलेले)
आणि पहा तुम्ही त्यांनाच 'आरशात थोबाड पाहीलस का? पगार किती..." वगैरे वाक्ताडन केलत.
अजो जाणून घ्याना इथेही बी जे पी ची फॅन आहेत. अचरट, मी हे मला माहीत असलेले. अन्य असतीलच की.
__________
अजुन एक कोणी वीषपसरविण्याचा प्रयत्न केला तरी जनता तो हाणून पाडतेच आहे ना.
तुम्ही बीजेपीचे , मोदिंचे जरुर कौतुक रा नव्हे कराच. आहेत ना अजून ५ वार्षं, मोदी परत सिद्ध करतीलच ना. सूर्यावर थुंकले तर ते आपल्यावरच बेतते.
तुम्ही असे का नाही समजत - हाथी चले अपनी चाल.
____________
आगे आगे देखिये होता है क्या! चांगलच होइल. देश भक्कम हातात आहेच.
_____
मोदी येतील जातील, आपला पर्स्पेक्टिव्ह आपण सांभाळायचा. आपली लॉन्ग टर्म हानी कशाला करुन घ्यायची. या, गप्पा मारा, वाद घाला (संयतपणे). मजामजा करु. तुमच्या तत्वांवर ठामच रहा अजो पण इतरांवर आग पाखडुन नव्हे.
जास्त बोलले असेन तर सॉरी. पण इथे षठीसामासी येण्याऐवजी रोज येत जा.
अस्वलांचे मत भाजपालाच आहे
भाजपला मत देणारांवर टिका करु नये का? आणि कोणी भाजपला मत द्यावं असं मत नाही माझं. कोणालाही मत द्या. सगळे वैध पक्ष आहेत. पण अस्थानी टिका करु नका. अयोग्य टिका करु नका. लोकांवर टिका करु नका.
लोकांनी एवढ्या आनंदांनी पुनश्च निवडून दिलेल्या लोकांना आपत्ती म्हटलेलं मला खटकलं. मोदींसमोर जगातला कोणताही नेता उभा केला तरी त्यांना मत देणे हा एक नाईलाज असू शकत नाही. आत्ता भारतात असे नेते नाहीत असं नाहीत. सिक्कीम, ओरिसा, पंजाबात तोडीचे नेते आहेतच की. पण मोदी इतके तोंड वेंगाडत मत द्यावे इतक्या खालच्या पातळीचे नाहीत.
--------
मोदींचे अस्वल मतदाते असतील तर, त्यांतही आपण कसे सरस आहोत, पुरोगामी आहोत हे कळवळून सांगायची गरज नाही. तुमचा नखशिखांत विरोध असेल तर प्रेमाने मत देणारा अन्य मतदात्यांना कमी लेखत आणि त्यांची खिल्ली उडवत बसायची गरज. मतांची गरज मोदीला आहे, मला नाही.
--------
त्यांच्या प्रतिसादात फार सुस्पष्टपणे दिसतं कि भाजपच्या (आमच्यासारख्या खालच्या दर्जाच्या) मतदात्यांचा त्यांना आदर नाही. एका सिनेमात ३-४ दिवस्सात एका रुम मधे अडकलेला हिरो भुकेनं झुरळ खातो तसं ते मत असलं तर असेल. पक्षानं केलेली पक्वांन्नांची योजना त्यांना दिसत नाही, मान्य नाही.
--------
अशा भाजपप्रेमींना पण आरसा दाखवणं गरजेचं आहे. आपलं एक मत थोडं जास्त वजनदार आहे, उपकाराचं आहे, या भ्रमातनं बाहेर काढणं आवश्यक आहे.
जालावरच्या माहीत नसलेल्या लोकांशी माझं काही वितुष्ट नाही. मी याहूनही फार जहरीली टिका जंतूवर करतो पण आम्ही एकत्र मस्त गप्पा मारल्या, दारु पिली, इ इ. हे राजकीय मतांतर आहे. व्यावहारिक जीवनात सगळे आपले दोस्तच आहेत. त्यांना वाईट वाटेल म्हणून कमी टिका करायची नाही, आणि जिथे या मतांचा संबंध नाही अशा ठिकाणी या लोकांचं कर्तृत्व, चांगुलपणा मान्य आणि एंजॉय केल्यावाचून राहायचं नाही!
-------
मला इथे फार काही रस नाही. कारण इथे मतचिकित्सा होण्यापेक्षा व्यक्तिचिकित्साच ९५% होते. पण असं इथे प्रतिनिधीत्व नसलेल्या लोकांना नीच विशेषणं (मुसलमान मारायला पिसाळलेली कुत्री, इ) लागतात तेव्हा एखादा फेरफटका मारायला हरकत नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.