दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१० मे
जन्मदिवस : संगीतकार, लेखक आणि चित्रकार उपेंद्रकिशोर राय (१८६३), जगातील सर्वात प्राचीन सिनेकंपनीचा जनक लेआँ गोमाँ (१८६४), सिनेसंगीतकार मॅक्स श्टाइनर (१८८८), नर्तक, अभिनेता व गायक फ्रेड अॅस्टेअर (१८९९), सिनेनिर्माता डेव्हिड सेल्त्झनिक (१९०२),संगीतकार, गायक व अभिनेता पंकज मलिक (१९०५), गीतकार जगदीश खेबूडकर (१९३२), कवी ग्रेस उर्फ माणिक गोडघाटे (१९३७), लेखिका नयनतारा सहगल (१९२७)
मृत्युदिवस : चित्रकार होकुसाई (१८४९), संगीतज्ञ जहांगीर खाँ (१९७७), नाटककार पीटर वाइस (१९८२), पत्रकार आणि ‘साधना’ साप्ताहिकाचे माजी संपादक यदुनाथ थत्ते (१९९८), कवी ना. घ. देशपांडे (२०००), कवी, गीतकार, पटकथाकार, संवादलेखक कैफी आजमी (२००२), संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा (२०२२)
--
महाराष्ट्र जलसंधारण दिन.
इ.पू. २८ : सौरडागांचे पहिले ज्ञात निरीक्षण चीनमध्ये नोंदले गेले
१८१८ : तहाद्वारे रायगड इंग्रजांच्या ताब्यात
१७७३ : ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीला अमेरिकन बाजारपेठेची मक्तेदारी देणारा टी अॅक्ट ब्रिटिश पार्लमेंटमध्ये संमत झाला. १६ डिसेंबरची विख्यात 'बॉस्टन टी पार्टी' त्याविरोधात होती
१७७४ : फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान ज्यांची राजवट जनतेने उलथली ते सोळावा लुई व मारी ऑन्त्वानेत फ्रान्समध्ये सिंहासनाधिष्ठित
१८२४ : लंडनमधील जागतिक कीर्तीचे संग्रहालय 'नॅशनल गॅलरी' जनतेला खुले झाले
१८५७ : ब्रिटिशांविरोधात उठावाची पहिली ठिणगी मीरतला पडली
१९३३ : हिटलरच्या राजवटीत ज्यांच्या लिखाणावर बंदी घातली गेली अशा लेखकांची २५,००० पुस्तके नाझींनी बर्लिन येथे सार्वजनिकरीत्या जाळली
१९४० : दुसरे महायुद्ध : विन्स्टन चर्चिलची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती
१९४८ : चीनमध्ये राष्ट्राध्यक्षाला विशेषाधिकार बहाल. ते १९९१पर्यंत टिकले
१९६२ : 'इन्क्रेडिबल हल्क'चे पहिले कॉमिक पुस्तक उपलब्ध
१९६८ : 'नाइट ऑफ द बॅरिकेड्स' - पॅरिसच्या लॅटिन क्वार्टरमध्ये विद्यार्थी व पोलिसदलात रात्रभर चकमकी
१९७५ : सोनीने बेटामॅक्स व्हीसीआर जपानमध्ये बाजारात आणला. ऐंशीच्या दशकात व्हीएचएस फॉर्मॅटने त्यावर बाजी मारली
१९८१ : मुंबईत पहिला विद्युतप्रकाशातला क्रिकेट सामना खेळला गेला
१९९४ : दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या बहुवांशिक विधिमंडळाने प्रचंड बहुमताने नेल्सन मंडेलांना राष्ट्राध्यक्ष निवडले
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- Rajesh188
- चिंतातुर जंतू
प्रतिक्रिया
एका वाक्यात
महंमद रफी हा स्वर्गातील गंधर्व. हेमंत कुमार, मन्ना डे, तलत वगैरे यक्ष, किन्न, इत्यादी.
एका वाक्यात लेखाचा दर्जा ध्यानात आला. पुढचा लेख वाचण्याचे कष्ट घेतले नाहीत.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
धन्यवाद.
धन्यवाद.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
दळ
अशा दळभद्री प्रतिक्रिया देऊ नयेत संजोप्या.
चालायचंच
चालायचंच,
कोणाला श्रीदेवी; जी.एं सारखी वाटते, तर कोणाला रफी गंधर्वांसारखे !
कशाकशाचा दर्जा मोजायचा ?!
किशोरकुमार
आभासकुमार या खर्या नावाऐवजी किशोरकुमार हे नाव का घेतले असावे? श्रद्धांजली आवडली.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
'दु:खी मन मेरे, सुन मेरा
'दु:खी मन मेरे, सुन मेरा कहना' या नंतरची ओळ आहे 'जहां नहीं चैना, वहां नहीं रहना'. तसंच 'दिल आज शायर है, गम आज नगमा है' या गाण्याच्या शेवटी 'लेकिन लगाया है जो दांव हमने, वो जीत कर आयेंगेही' हा दुर्दम्य आशावाद आहे.
ह्यात किशोर कुमारचं योगदान किती? त्याने ही गाणी लिहिलेली आहेत का? नसतील तर मग त्याने फक्तं आवाज दिलाय, आणि संगीतकाराला अपेक्षित असलेलेल भाव गाण्यात उतरवलेत.
बाकी त्याच्या उत्कृष्ठ गायक असण्याबद्दल वाद नाहीच!
-अनामिक
<<ह्यात किशोर कुमारचं योगदान
<<ह्यात किशोर कुमारचं योगदान किती? त्याने ही गाणी लिहिलेली आहेत का? नसतील तर मग त्याने फक्तं आवाज दिलाय, आणि संगीतकाराला अपेक्षित असलेलेल भाव गाण्यात उतरवलेत.>>>
काव्याचे बोल कितीही सुंदर, अर्थपुर्ण असले तरी जोपर्यंत त्याला साजेसा संगीतसाज चढवला जात नाही, जोपर्यंत ते समर्थ गळ्यातून गायले जात नाही तोपर्यंत त्यातली अर्थवाहीपणा जसाच्या तसा, तितक्याच समर्थपणे रसिकांपर्यंत पोहोचवता येत नाही. ते काम किशोरने समर्थपणे केलय त्याच्या गाण्यातून. गाण्यातला तो दुर्दम्य आशावाद आपल्या आवाजातून स्पष्ट आणि सिद्ध केलाय किशोरने.
छान लेख रे मंदार !
अनुमोदन विशाल
अगदी हेच लिहीणार होतो.
थोडी भर घालतो. गायक निवडताना त्या गाण्यांचे शब्द काय असावेत याचाही विचार केला जात असावा (आधी चाल मग शब्द या बाबतीत), किंवा अमुक शब्द असतील तर ते कुठल्या गायकाच्या गळ्यातून ते समर्थपणे पोहोचतील याचाही विचार केला जात असणारच. असो.
किशोर कुमार बद्दल लिहु तितकं
किशोर कुमार बद्दल लिहु तितकं कमीच..
असो.. त्याला श्रद्धांजली काय वहायची, रोजच अवतरत असतो तो!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ठंडी हवा ये चांदनी सुहानी....
"त्याला श्रद्धांजली काय वहायची, रोजच अवतरत असतो तो!....."
~ सुंदर.
'मॉर्टल' असल्याने देह या ग्रहावरून नष्ट झाला तरी किशोरकुमारचा आवाज 'इम्मॉर्टल' असल्याने तो कधीच अस्तंगत होऊ शकणार नाही. सबब श्रद्धांजली ही संज्ञा निदान अशा 'अमर' आवाजाच्याबाबतीत फसवी होऊ शकते. ..... इतकेच काय, पुढे जाऊन असेही म्हणता येईल की ज्याची आठवण श्रद्धांजली अर्पण केल्यामुळे (च) राहाणार असेल तर एका अर्थी आपण त्या गायकाला विसरत चाललो आहोत....किशोरच्याबाबतीत तर हे केवळ अशक्य.
हे लिहित असतानाच शेजारी 'ठंडी हवा हे चांदनी सुहानी....ऐ मेरे दिल सुना कोई कहानी...' उलगडत आहे.....नजरेसमोर आले आहेत... पडद्यावर गाणारा खुद्द किशोर आणि ते गाणे गॅलरीत उभे राहून तन्मयतेने ऐकणारी मधुबाला.
त्याकाळी आजच्या सारखा
हे आणि
हे
यात काही संबंध आहे का? म्हणजे तुम्ही सांगितलेली ही कथाही दंतकथाच असावी वगैरे? एखाद्या व्यवहारी व कंजूष व्यक्तीने एका मित्राच्या मित्राकडून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून मिळत आहेत त्यापेक्षा कमी पैसे का घ्यावेत हे समजले नाही.
संपूर्ण परिच्छेद वाचला आहे का?
अतिशहाणा, तुम्ही संपूर्ण लेख वाचला आहे असे गृहित धरतो. वर सांगितलेली कथा ही लोकसत्तामधे काही वर्षांपुर्वी छापून आलेली आहे. त्यामुळे ही दंतकथा नव्हे. मला ती घटना ऑनलाईन सापडली नाही कारण तेव्हा लोकसत्ताची ऑनलाईन आवृत्ती नसावी. पण ही कथा संपूर्ण सत्य आहे.
<<यात काही संबंध आहे का?>>
तिसरा परिच्छेदात ती घटना आणि मग चौथ्या परिच्छेदात कारणमिमांसा दिलेली आहे. त्यामुळे संबंध अर्थातच आहे. कारण त्या घटनेमुळे किशोरदांविषयी खरे काय ते स्पष्ट होते तर त्यामुळे आश्चर्यचकित झालेल्यांची "बोटे तोंडात का गेली?" या प्रश्नाचे उत्तर किंवा कारणमिमांसा चौथ्या परिच्छेदात दिली आहे. (हुश्श).
दुसरे म्हणजे
<<एखाद्या व्यवहारी व कंजूष व्यक्तीने एका मित्राच्या मित्राकडून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून मिळत आहेत त्यापेक्षा कमी पैसे का घ्यावेत हे समजले नाही.>>
वर श्रद्धांजलीपर लिखाणात अतिशय स्पष्ट लिहीले आहे की मिळत आहेत म्हणून कमी पैसे त्यांनी घेतले नाहीत — तर दिलेले पैसे योग्य मोबदल्यापेक्षा अधिक होते म्हणून जास्तीचे पैसे परत केले. आधी गायलेल्या मराठी गाण्यासाठी जेवढे घेतले होते तेवढेच घेणे त्यांना योग्य वाटले म्हणून बाकीचे जास्तीचे परत केले. (हुश्श).
आता लेख लिहील्यावर कशाचा संबंध कशाशी कसा आहे यावरही लेख लिहावा लागणार की काय?