दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१६ मे
जन्मदिवस : गणितज्ञ केरो लक्ष्मण छत्रे (१८२४), सिनेदिग्दर्शक केन्जी मिझोगुची (१८९८), अभिनेता हेन्री फोंडा (१९०५), गायिका माणिक वर्मा (१९२६), लेखक अनंत मनोहर (१९३०), सिरॅमिक्समधली अतिवहनशीलता शोधणारा नोबेलविजेता जॉर्ज बेडनॉर्झ (१९५०), अभिनेता पीअर्स ब्रॉझनॅन (१९५३), गायिका जॅनेट जॅक्सन (१९६६), टेनिसपटू गॅब्रिएला साबातिनी (१९७०)
मृत्युदिवस : 'सिंडरेला' आणि इतर कथांचा लेखक शार्ल पेरो (१७०३), गणितज्ज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फूरिए (१८३०), जीवनसत्त्वे शोधणारा नोबेलविजेता फ्रेडरिक हॉपकिन्स (१९४७), समाजसुधारक अण्णासाहेब लठ्ठे (१९५०), गिटारवादक जँगो राईनहार्ड (१९५३), गायक भोलानाथ भट्ट (१९७०), 'मपेट'कार जिम हेन्सन (१९९०), लेखक, समीक्षक माधव मनोहर (१९९४), सिनेदिग्दर्शक फणी मझुमदार (१९९४)
---
१५२७ : फ्लॉरेन्सच्या जनतेने मेदिची घराण्याची राजवट उलथवली व प्रजासत्ताक राजवट लागू केली.
१६४९ : हिंदू राजांना मदत करण्याबद्दल शहाजीराजेंना झालेली कैद समाप्त.
१७०३ : पीटर द ग्रेटने सेंट पीटर्सबर्ग शहराची स्थापना केली. युरोपमध्ये रशियाला स्थान मिळवून देण्याच्या दिशेने हा प्रयत्न होता.
१७१७ : राजाविरोधात व्यंगात्मक काव्य लिहिल्याबद्दल विचारवंत व्होल्तेअरची कुप्रसिद्ध बास्तिय तुरुंगात रवानगी.
१८८८ : निकोला टेस्लाने ए.सी. विद्युतवहनाबद्दल व्याख्यान दिले.
१८९१ : फ्रांकफुर्टमध्ये आंतरराष्ट्रीय विद्युततांत्रिक प्रदर्शनात तीन फेजमधले विद्युतवहन दाखवले गेले.
१९१८ : अमेरिकेत सरकारवर टीका करणे हा तुरुंगवासास पात्र गुन्हा ठरवण्यात आला.
१९२९ : हॉलिवूडमध्ये पहिला 'ऑस्कर'प्रदान समारंभ.
१९६० : पहिल्या दृश्य लेझरचे प्रात्यक्षिक थिओडोर मेमनने दाखवले.
१९६६ : चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने "मे १६ ची नोटिस" प्रकाशित केली; सामाजिक क्रांतीची सुरुवात.
१९६९ : सोव्हिएत संघाचे अंतराळयान व्हेनेरा ५ शुक्रावर उतरले.
१९७५ : जुनको ताबेई ही एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला ठरली.
१९७५ : सार्वमताने सिक्कीमचे भारतात विलीनीकरण.
१९८८ : तंबाखूत असलेल्या निकोटिनचे गुणधर्म हेरॉईन किंवा कोकेन यांच्या मादक गुणधर्मांप्रमाणे आहेत असा अहवाल अमेरिकेच्या सर्जन जनरल यांनी प्रकाशित केला.
१९९६ : अटलबिहारी वाजपेयींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. हे सरकार १३ दिवस टिकले.
२००५ : कुवेतमध्ये स्त्रियांना प्रथमच मतदानाचा हक्क.
२००९ : श्रीलंकेत दीर्घकाळ चाललेल्या यादवीची अखेर; तमिळ वाघ नामोहरम. १९७२पासून या यादवीत सुमारे ७०,००० ठार झाले.
२०१४ : लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर; नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप स्पष्ट बहुमतात.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- मार्मिक गोडसे
प्रतिक्रिया
गुरुजींच्या विनंतीला मान देऊन
क्काय वाट्टेल त्ते??????
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
मला वाटतंय लेखन प्रकार
मला वाटतंय लेखन प्रकार "छोट्यांसाठी" चा अर्थ त्यांनी विनोदी लेखन असा घेतलाय.
ते बीबीशी कुठशीक म्हणाले असं
ते बीबीशी कुठशीक म्हणाले असं ?( चुकून नासा ऐवजी बिबीशी तर लिहिलं नाहीत ना ?)
बेस्ट युनेस्को गुरूझी.
आणि युनेस्कोनं गुरूझींना सगळ्यात बेस्ट गुरूझी असण्याचा पुरस्कार दिला, ते लिहायचं राहिलेलं आहेच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नंबरी. आदर्णीय गोगुंना प्रणाम
नंबरी. आदर्णीय गोगुंना प्रणाम. संघटन्मेंशक्ती हय.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
नमस्कार शुभमजी
शुभमजी
आपला गोळवलवर गुरुजींविषयी चांगला अभ्यास दिसतो. मला काही प्रश्न होते.
१
सर्वप्रथम संघाने गुरुजींचे पुस्तक We Or Nationhood Defined हे मुळ १९३९ ला प्रकाशित झालेले पुस्तक अधिकृतरीत्या का नाकारले याची सविस्तर कारणे देऊ शकाल का ?
२
जे गुरुजींचे पुस्तक संघ अधिकृत मानते ते Bunch of Thoughts जे तुम्ही वाचलेलेच असेल. त्यात Nation and Its problems या दुसऱ्या भागात Internal Threats हे जे प्रकरण आहे. त्यात मुस्लिम्स , ख्रिश्चन्स आणि कम्युनिस्ट या भारताच्या तीन अंतर्गत Threats कशा आहेत. हे तिन्ही किती धोकादायक आहेत याची एक मांडणी गुरुजींनी केलेली आहे. या मांडणीविषयी आपले नेमके मत काय आहे ?
कारण्
मी वाच्ले आहे त्याप्रमाणे हे पुस्तक मुळात सावरकरांनी मराठीत् लिहिलेले होते आणि त्याचे इंग्रजी भाषांतर गोळवलकरांनी केले. फक्त ते भाषांतर करून ते पुस्तक आपल्याच नावावर खपवायचा आणि त्या पुस्तकाचे लेखक आपण आहोत असे खपवायचा गोळवलकरांनी प्रयत्न केला. या कारणामुळे हिंदू महासभा आणि रास्वसंघ यांच्यात वितुष्ट आले. कट्टर हिंदू महासभावाले गोळवलकरांना मानतच नाहीत. यातून बदनामी व्हायला नको म्हओणून संघाने पुस्तक नाकारले.
(लहानपणी संघाच्या शाखेत गेलेला आणि मोठे झाल्यावर संघाचा खरा अवतार लक्षात आल्यावर दुरावलेला आणि सध्याचे वजन ४९०५ किलो असलेला) महाकाय हत्ती
अधिकृत स्वयंसेवकाचे काय म्हणणे आहे ?
https://timesofindia.indiatimes.com/india/RSS-officially-disowns-Golwalk...
मला या पर्टीक्युलर डिनायल मध्ये उत्सुकता आहे. संघाने गुरुजी नंतर बदलले असे म्हटले आहे का ?
In a major ideological shift, RSS has for the first time officially disowned M S Golwalkar's book We or Our Nationhood Defined published in 1939 as "neither representing the views of the grown Guruji nor of the RSS".
आणी मा.गो. वैद्य पण त्याला नाकारण्याला अनुमोदन देताय हे विशेष रोचक वाटले. म्हणून एकुण मॅटर इंटरेस्टींग आहे. सावरकरांच्या मूळ पुस्तकाचे नाव इथे राष्ट्र मीमांसा असे दिलेले आहे. ते कुठे मिळेल ?
Former RSS spokesperson M G Vaidya while approving the removal of We from the Sangh's pantheon of texts, says the book that is central to "us is Golwalkar's Bunch of Thoughts since it consists of his views after he became sarsanghchalak on June 21, 1940".
त्यापुढे जाऊन जे बंच ऑफ थॉट्स संघ आजही अधिकृत मानतो त्यातील विचारांविषयी प्रतिक्रिया हवी आहे.
ZZZ
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
डोनाल्ड उवाच
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
विनोदी लेख्
लेख लहान मुलांसाठी या सदरात ताकला आहे. फार टेन्शन घेऊ नये. विनोदी लेख आहे तो. संघवाल्यांना जवळून बघितलेले आणि डॉक्यात मेंदू शिल्लक असलेले लोक कोणीही संघाला आपले म्हणू शकतील असे वाटत नाही.
ज्यांना खरच प्रश्न असतील
ज्यांना खरच प्रश्न असतील त्यांनी विचारा, लहान मुलांवर संस्कार व्हावेत या हेतूने ते या सदरात टाकले आहे, या पलीकडे जाऊन सर्व खोचक आणि पोचट कमेंट्स मधून कर्त्यांचा बालिश स्वभाव दिसून येतोच आहे, त्यांच्यात असणाऱ्या बौद्धिक दिव्यांगत्वाला त्यांनी जपावे, इकडे येऊन त्याचे प्रदर्शन करू नका .
धन्यवाद !
असो.
जंतूचा निद्रानाशही तुम्ही बरा केलेला दिसतोय. त्या हिशोबात वैद्यकीय सदरातही सदर माहिती पुरवता येईल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
दोन प्रश्न
१.
ह्याची माहिती द्या. अगदीच तटस्थ स्रोतातून मिळणे अपेक्षित.
२.
ह्याबद्दल संदर्भ, काहीतरी कुठेतरी तळटीप वगैरे असेल तर (तटस्थ स्रोतातून) द्या.
३. ह्या सगळ्यातून प्रचारकी आणि अजेंडापूरक संस्कार मुलांवर व्हावेत, त्यांनी तपासून न घेता कशावरही विश्वास ठेवावा असे संस्कार मुलांवर व्हावेत असं तुमचं म्हणणं असेल तर एक तर तुम्ही फारच साधेभोळे आहात, नसल्यास हे आकाशातल्या बापा, ह्यांना माफ कर.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
शुभमजी कृपया रागावु नका ही विनंती
मी ही एक प्रश्नकर्ता आहे म्हणुन माझ्या परीने आपणास खात्रीपुर्वक सांगतो
मला खरोखर उत्सुकता आहे म्हणुन मी प्रश्न विचारलेला आहे.
आपण एक अधिकृत व्यक्ती दिसता संघाचे म्हणून हा प्रश्न मी विचारलेला आहे. आपण आपली संघाची भुमिका विचार काय आहे हे स्पष्ट केल्याने उलट समाजात संघाविषयी जर आपल्या मते काही गैरसमज असतील तर ते दुर होण्यास मदतच होइल असे मला वाटते.
संवादाचा पुल साधणे आपल्याच हातात आहे.
बाकी आपणास जे योग्य वाटते ते ठरवा.
शुभमजी, रागावू नका हे तर खरेच
शुभमजी, रागावू नका हे तर खरेच. पण जे प्रश्न खवचट पद्धतीने विचारले गेले आहेत, ते सरळ विचारले तर तुम्ही उत्तरे द्याल ? नक्की?
सर्व खवचटपणा
सर्व ऐसीकरांना नम्र विनंती की सर्व खवचटपणा बाजूला ठेवा. त्यातून तुमची पूर्वग्रहदूषित नजर दिसून येते.
समोरच्या बोलणाऱ्याला फेअर चान्स दिला पाहिजे.
गांजा अधिकृत करा अशी मागणी
गांजा अधिकृत करा अशी मागणी कोणीतरी करत होतं ऐसीवरच !! इतक्यात झालासुद्धा अधिकृत?
>>अवघ्या सातच दिवसांत संघबंदी मागे घेतली गेली.
४ फेब्रुवारी १९४८ ला संघावर बंदी घालण्यात आली. ११ जुलै १९४९ ला बंदी उठवण्यात आली. एक्सेल मला सांगतंय की हे ५२३ दिवस आहेत. तर कोणत्या कालगणनेनुसार हे सात दिवस मोजले जातात? चांद्रदिवस म्हटले तरी हे १८ चांद्रदिवस होतात.
बाय द वे पटेलांना संघसमर्थक समजणाऱ्यांसाठी..... विकिमाहिती
Following his release in August 1948, Golwalkar wrote to Prime Minister Jawaharlal Nehru to lift the ban on RSS. After Nehru replied that the matter was the responsibility of the Home Minister, Golwalkar consulted Vallabhai Patel regarding the same. Patel then demanded an absolute pre-condition that the RSS adopt a formal written constitution and make it public, where Patel expected RSS to pledge its loyalty to the Constitution of India, accept the Tricolor as the National Flag of India, define the power of the head of the organisation, make the organisation democratic by holding the internal elections, authorisation of their parents before enrolling the pre-adolescents into the movement, and to renounce violence and secrecy.[96][97][98]:42– Golwalkar launched a huge agitation against this demand during which he was imprisoned again. Later, a constitution was drafted for RSS, which, however, initially did not meet any of the Patel's demands. After a failed attempt to agitate again, eventually the RSS's constitution was amended according to Patel's wishes with the exception of procedure for selecting the head of the organisation and the enrollment of pre-adolescents. However, the organisation's internal democracy which was written into its constitution, remained a 'dead letter'.[99]
On 11 July 1949 the Government of India lifted the ban on the RSS by issuing a communique stating that the decision to lift the ban on the RSS had been taken in view of the RSS leader Golwalkar's undertaking to make the group's loyalty towards the Constitution of India and acceptance and respect towards the National Flag of India more explicit in the Constitution of the RSS, which was to be worked out in a democratic manner.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
नाही थत्तेचाचा, मी गांजा
नाही थत्तेचाचा, मी गांजा अधिकृत करा असे म्हटले नव्हते. असे परिणाम असतील तर तर आजिबातच नको.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
काही आक्षेप
गुरुजींच्या विनंतीला मान देऊन काश्मीरच्या राजाने काश्मीर भारतात विलीन करण्याचा निर्णय घेतला, ते बघून पाकिस्तान ने काश्मीरवर हल्ला केला. त्याच वेळी संघाच्या ६०० स्वयंसेवकांनी अहोरात्र ८ दिवस झटून सैन्याच्या विमानांना उतरायला विमानतळ स्वच्छ करून दिले. ( बर्फ हटवला होता)
ह्या विधानामध्ये मला एक प्राथमिक विसंगति जाणवते. ती म्हणजे सगळे काश्मीर प्रकरण २४ ते २८ ऑक्टोबर ह्या काळामध्ये घडले. "६०० सवयंसेवकांनी अहोरात्र ८ दिवस झटून स्वच्छ करण्याइतका बर्फ" ऑक्टोबरामध्ये थंडीसाठी दुष्कीर्त अशा आमच्या टोरांटोमध्येहि पडत नाही तर श्रीनगरात तो कोठून आला? अशा बर्फाचा उल्लेख अन्य कोठेच वाचनात आलेला नाही. ही सगळी बढाचढाके केलेली कपोलकल्पित कहाणी दिसते.
साधी गोष्ट अशी आहे की श्रीनगरात ऑक्टोबरात बर्फ पडतच नाही. त्याला डिसेंबर अखेर उजाडायला लागतो आणि तरीहि "६०० स्वयंसेवकांनी ८ दिवस झटून साफ करण्याइतका" तो नसतोच नसतो.
काश्मीरच्या महाराजांनी भारतात विलीनीकरणाला मान्यता दिली आणि नंतर भारतीय सैन्य श्रीनगरच्या विमानतळावर उतरले ह्या घटनेमागील संपूर्ण घटनाक्रम सरदार पटेलांच्या Ministry of States चे सचिव आणि पटेलांचे उजवे हात वी.पी.मेनन ह्यांचया THE STORY OF THE INTEGRATION OF THE INDIAN STATES ह्या पुस्तकात पान २७२ ते २७५ येथे तपशीलात दिला आहे. मेनन स्बत: ह्या वाटाघाटींमध्ये दिल्ली आणि श्रीनगरमध्ये येजा करीत होते. ह्या घटनांचे त्यांनी जे वर्णन केले आहे त्यात दूरान्वयाने सुद्धा गोळवलकर गुरुजींनी काही महत्त्वाचे योगदान केले होते असा उल्लेख येत नाही. त्यांचे काश्मीरच्या महाराजाकडे काही खास वजन होते असेहि कधी वाचलेले नाही. त्यांनी महाराजांना विनंति केल्यामुळे काश्मीर भारताकडे आले ह्या विधानाला आधार काय? हे विधान पटत नाही आणि संघाशी निष्ठा असलेल्यांची ही काही स्वनिर्मित mythology आहे असे वाटते.
मेनन ह्यांचे घटनाक्रमाचे वर्णन ज्यांना ते जाणण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी पुढे चिकटवत आहे.
संघाची लोकं न घडलेल्या अनेक
संघाची लोकं न घडलेल्या अनेक गोष्टीचे क्रेडिट घेऊन मोकळे होतात हे तर पूर्वापार आहे. पण हल्ली मध्यमवर्ग आणि बहुजनवर्ग त्यावर विश्वास पण ठेवतो हे मात्र नवीन आहे. काल रा रा मोदी यांनी अशीच एक माहिती दिली की आंबेडकर राज्यसभेवर श्यामाप्रसाद मुखर्जींमुळे गेले. कोल्हटकर , तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का ?
मेहेरचंद महाजन आणि व्ही पी
मेहेरचंद महाजन आणि व्ही पी मेनन हे गुरुजींचेच दूत असण्याची शक्यता विचारात घेतली आहे का?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
लेख कुठाय?
लेख कुठाय?
हिरव्या आभाळातल्या भगव्या ताऱ्याने* इतक्यात चंद्रशेखर लिमिट गाठलं?
*श्रेय: अभ्या
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
तो " इदं न मम " झाला.
तो " इदं न मम " झाला.
संघम् सरणम् गच्छामि।
लेखावर युनेस्को पुरस्कृत सगळ्यात खवचट कॉमेंटा आल्यामुळे लेख संघवासी झाला.
-
उघडे टॅब अमर रहे.
श्रीगुरुजी अर्थात माधव सदाशिव गोळवलकर.
मोकळ्या मैदानात लागलेला भगवा ध्वज, आजूबाजूला सुरू असणारे खेळ, शिस्तीचे संचलन या गोष्टी म्हणलं की आठवते ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा! संघाची स्थापना १९२५ साली नागपुरात डॉ हेडगेवार यांनी केली. डॉ हेडगेवार संघाचे पहिले सरसंघचालक होत. १९२५ ते २१ जून १९४० पर्यंत डॉक्टर सरसंघचालक होते. त्यांनी त्यांच्या काळात प्रवास करून भारतभर संघाचा विस्तार केला होता. तृतीय वर्षाच्या संघ शिक्षा वर्गात दिलेल्या आपल्या शेवटच्या बौध्दिकात डॉक्टर म्हणाले होते, मी तुम्हा सर्वांत हिंदुराष्ट्राचे छोटे स्वरूप पाहतो आहे. यानंतर दि २१ जून १९४० रोजी डॉक्टर स्वर्गवासी झाले आणि संघाची सगळी सूत्र माधव सदाशिव गोळवलकर ( श्रीगुरुजी ) यांच्याकडे डॉक्टरांच्या इच्छेनुसार दिली गेली. गुरुजी संघाचे द्वितीय सरसंघचालक झाले.
गुरुजींचा जन्म १९ फेब्रुवारी १९०६ अर्थात माघ कृष्ण एकादशी या दिवशी नागपुरात झाला. गुरुजींनी चंद्रपूर येथुन मॅट्रिक तर बनारस हिंदू विद्यापीठ येथून एम एस्सी पूर्ण केले. व पुढे प्राणिशास्त्र शिकवायला त्याच विद्यापीठात गुरुजी रुजू झाले. त्याच वेळी भैयाजी दाणी यांच्या संपर्कामुळे गुरुजींचा संघाशी संपर्क आला. बनारस ला असलेल्या संघ शाखेवर गुरुजी जाऊ लागले. १९३३ साली संघ विचारांनी प्रभावित होऊन प्राध्यापक पद सोडून गुरुजी डॉक्टरांच्या भेटीसाठी नागपुरात आले. याच काळात गुरुजी स्वामी अखंडानंद यांच्या संपर्कात सुद्धा आले. डॉक्टरांची भेट झाल्यावर स्वामी अखंडानंद यांची सेवा व्हावी या हेतूने गुरुजी काही न सांगता तिकडे गेले. पण, स्वतः अखंडानंद यांनी गुरुजींना राष्ट्र सेवा हीच ईश्वर सेवा असे सांगून नागपूरला परत पाठवले. १९३८ साली गुरुजींनी डॉक्टरांच्या सांगण्यावरून संघ शिक्षा वर्गाची जबाबदारी सांभाळली. त्याच काळात डॉक्टर आजारी होते, म्हणून डॉक्टरांनी गुरुजींना सरकार्यवाह पदी नियुक्त केले. अखेरीस, दि २१ जुन १९४० रोजी डॉक्टर स्वर्गवासी झाले आणि त्यांच्या इच्छेनुसार गुरुजी सरसंघचालक झाले.
* फाळणीच्या काळात गुरुजींची भूमिका -
भारताचे तुकडे होऊन पाकिस्तान निर्माण होणार असे दिसत असताना संघाने मातृभूमीचे विभाजन होऊच शकत नाही अशी भूमिका स्पष्ट केली होती. सन १९४५ पर्यंत काँग्रेसची भूमिका सुद्धा अशीच होती. पण मुस्लिम लीग ने डायरेक्ट ऍक्शन सुरू केल्याने काँगेसने नमते घेतले. या काळात श्रीगुरुजींनी वायव्य भारतात झंझावाती दौरे केले. हिंदूंना दिलासा दिला. जेव्हा फाळणीची घोषणा झाली तेव्हा गुरुजींचा आदेश होता -
" जोपर्यंत त्या भागातील शेवटचा हिंदू मनुष्य भारतात सुखरूप येत नाही, तोपर्यंत कुठल्याही स्वयंसेवकाने इकडे येऊ नये आणि त्यांना सरंक्षण द्यावे. " यात संघाचे अनेक स्वयंसेवक हुतात्मा झाले असतील, ते माहीत देखील नाही. गुरुजींच्या विनंतीला मान देऊन काश्मीरच्या राजाने काश्मीर भारतात विलीन करण्याचा निर्णय घेतला, ते बघून पाकिस्तान ने काश्मीरवर हल्ला केला. त्याच वेळी संघाच्या ६०० स्वयंसेवकांनी अहोरात्र ८ दिवस झटून सैन्याच्या विमानांना उतरायला विमानतळ स्वच्छ करून दिले. ( बर्फ हटवला होता)
* गांधीहत्येचा आरोप व सुटका -
दि ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा खून केला आणि हत्येचा कट संघाने केला असे खोटे आरोप करून गुरुजींना अटकेत टाकले. देशभर संघ कार्यकर्त्यांवर हल्ले झाले, घरं जाळली गेली. गुरुजी सांगत होते, " गांधीहत्या हा अक्षम्य राष्ट्रीय अपराध आहे, निषेधार्ह संघाच्या शाखा १३ दिवस बंद ठेवा आणि शाखांवर श्रद्धांजलीचे कार्येक्रम घ्या. शांत राहा, सहन करा, आपल्याच लोकांवर हात उचलू नका"
गुरुजी सारखे सांगत , " संघ यातून निष्कलंक म्हणून बाहेर पडेल" अवघ्या सातच दिवसांत संघबंदी मागे घेतली गेली. नेहरूंनी तर चक्क धमकी दिली, " सरकार सर्व शक्तीनिशी संघ संपवून टाकेल" (अजून तरी ते जमलं नाही). संघबंदी मागे घेतली असे कळताच गुरुजींनी भारतभर जोरदार दौरे सुरू केले. अत्याचारी काळात सहन केलेल्या कार्यकर्त्यांना जाऊन भेटले, बंदी मागे घेण्यासाठी प्रयत्न केलेल्या व्यक्तींना भेटून आभार मानले. गुरुजींवर सत्कार व शुभेच्छाचा वर्षाव झाला, गुरुजींनी जसा लोकक्षोभ स्वीकारला होता, तसा लोकलोभ सुद्धा स्वीकारला. संघ अधिक तेजाने तळपू लागला. बीबीसी ने तर सांगून दिले, " श्रीगुरुजी म्हणजे भारताच्या क्षितिजावर उगवणारा दैदिप्यमान तारा आहे"
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
फ्रॉइडियन स्लिप?
गुरुजींनीच संघाला निषेधार्ह म्हटले, हे बाकी अंमळ रोचक आहे. संघवाल्यांमध्ये असा प्रामाणिकपणा कमी आहे.
अनुज्ञेच्या जीवनानुभूत साकल्यसमाधानाचा आल्हाददायक पंचनामा
"कथावस्तू आकर्षक आहे. पात्रनिर्मिती विलोभनीय आहे. कथा इस्लामाबाद, नागपुर आणि श्रीनगर या तीन स्थळांत घडते"
बाकी 'लोकलोभ'चे साधलेले यमक (आणि गमक) थोरच!
कथावस्तु ? हे जळजळीत वास्तव आहे
हाच फरक आहे हाच
प्रस्थापित आमच्या भावना समजुन घेत नाहीत्
आम्ही जळजळीत वास्तव आमच्या साहित्यातुन मांडतो मात्र रुपवादींना
त्यात कथा दिसते.
हे गोगुरुजी फक्त संघासाठी
हे गोगुरुजी फक्त संघासाठी आदरणीय स्थान मिळालेले होते की सर्व देशासाठी,कशामुळे?
गारंबिचा बापूही पंचक्रोशित सन्मानिय होता कारण त्याने एवढं करून ठेवलं आहे असं श्रीनापेंडसे कादंब्रीच्या पहिल्याच पानावर जाहिर करतात. तरीही ती वाचली कारण कोकणचं समाजचित्रण आहे.
निद्रानाश ( किंवा दुपारची वामकुक्षीनाश) दूर करणारी आणखी कोणती पुस्तकं आहेत?
लेखाचे पुन:पदार्पण झाल्यास वाचावे.
आता गोगुरुजी म्हटलेच आहेत तर...
...गोब्राह्मणगुरुजीसुद्धा म्हणूनच टाका ना!
.
.
षितुल्य श्री गुरुजींना माझा
षितुल्य श्री गुरुजींना माझा मानाचा मुजरा.
Liberalism is a mental disorder
धागालेखक गायब?
काही प्रतिक्रिया संयत अाहेत तर काही एकदमच रेवडी उडवणार्या. दुसर्या प्रकारच्या प्रतिक्रियांमुळे असे धागालेखक हिरमोड होऊन निघून जातात. अनेक लोक संघाप्रति पूज्य भावना असणारे अाजूबाजूला दिसतात, त्यातलेच धागा लेखक एक असू शकतील. (त्यांचं काय करायचं हे मलातरी अजून समजलं नाही) त्यांना काही वेगळा दृष्टीकोन मिळाला असता, पण ते अाता अालेच नाहीत, तर ती संधी गेली.