ही बातमी समजली का? - भाग १५४
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
---
लोकसत्ता 4 ऑगस्ट: अत्यंत खळबळजनक निर्णय!!!
सरकारी पदोन्नती मधले आरक्षण रद्धबातल - मुंबई उच्च न्यायालय।
राज्य शासनाला अत्त्युच्च न्यायालयात अपील करण्यास 3 महिन्यांची मुदत।
घटनात्मक वैधता/अवैधतेचा प्रश्न जरी थोडा वेळ बाजूला ठेवला, तरी कोणत्याही राज्य वा केंद्र सरकाराला हा न परवडणारा निर्णय आहे।
घटनात्मक वैधता/अवैधतेचा
फक्त मतपेटीकरिता न परवडणारा असेच ना?
जर इतकाच निकष लावायचा झाला तर आरक्षणाविरुद्ध जनमत आज आहेच. त्यामुळे कदाचित शक्य होईलही, कुणी सांगावे?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अर्थात ... मतपेटीच्या
अर्थात ... मतपेटीच्या दृष्टीनेच।
पण मतपेटीचा संकुचित अर्थ (अथवा सामर्थ्य) अधोरेखित करण्याऐवजी, हा बहुमताच्या निर्णयाचा सन्मान करणे आहे - ही भूमिका जास्त संयुक्तिक वाटतें।
जरी त्या निर्णयाच्या वैधतेची खात्री असली तरी बहुमताकडे कानाडोळा करणे कोणत्याही शासनाला शक्य होणारे नाही।
मंडल आयोगाचे (नंतरच्या प्रक्षोभाला मागे टाकत) झालेले दूरगामी परिणाम (पक्षी OBC consolidation) हे ह्या संदर्भात उद्बोधक ठरतात।
सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।
पण मतपेटीचा संकुचित अर्थ
सन्मान अपमान बहुमत अल्पमत शेवटी सब मतपेटी का खेळ है.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पुर्वी राष्ट्रीय केमिकल
पुर्वी राष्ट्रीय केमिकल फर्टलाइजरची जाहिरात बरेचदा येत असे अमुक पदासाठी आरक्षणवालाच उमेदवार हवा. तीनवेळा बोलवून कोणी आला नाही की नियमाप्रमाणे नोंद करून पुन्हा सामान्य जाहिरात. केमिस्ट्री गेली ~~~उडत
रेल्वेगाड्यांच्या डब्यांच्या
रेल्वेगाड्यांच्या डब्यांच्या खालच्या बाजस लक्ष गेले तेव्हा १८-२२ डब्यांपैकी सहासात डब्यांच्या टॅाइलट्सना खाली सेफ सेप्टिक टॅन्कस ( बाइओ टॅाइलट्स?) लावले आहेत. घाटातल्या झाडांचे खत गेले ,बोगद्यांत नाक दाबायला नको.
बरे केले!
अगदीच प्रिमिटिव सिस्टिम होती साली!
(मला तर राहून राहून वाटायचे, की विमानांत 'तसली' सिस्टिम नाही ठेवत, हे किती चांगले आहे! अन्यथा 'आकाशात् पतितं तोयं...'ला एक वेगळेच डिमेन्शन लाभले असते. असो.)
Dishonesty and Selection into Public Service: Evidence from Indi
Dishonesty and Selection into Public Service: Evidence from India
.
.
इज ग्लास ट्रेसिंग (जीटी) अ
इज ग्लास ट्रेसिंग (जीटी) अ करप्शन ? इफ इट इज, दोज डुइंग इट डू नॉट लार्जली गो फॉर सरकारी नौकरी.
ॲक्च्युअली सरकारी नोकरी करण्याचे विचार लहान शहरांतून (जिथे औद्योगीकरण फारसे नसते) आलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात असते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
भाजपाचे यशापयश ....
एकीकडे देशांतील तीन सर्वोच्च पदे भाजपा (पक्षी:संघा) कडे हे वृत्त, तर दुसरीकडे ह्याच भाजपा शासनाचे कांही प्रमुख बाबतींतले अपयश, प्रा. प्रणब बर्धन (Economic Professor at UCal, Berkeley) यांनी आपल्यासमोर आणले आहे -(इंडियन एक्सप्रेस 5 ऑगस्ट).
त्या बाबी अश्या:
1) रोजगारनिर्मिती मध्ये ठळक अपयश - 50 लाखांहून अधिक तरुण बेकार।
2) नोटाबंदीचा एकूण लघु उद्योगांवर (हातांत रोकड नसल्याने) झालेला दुष्परिणाम,
तसेच मूळ भूमिकेपासून वारंवार केलेला (किंबहुना करावा लागलेला) बदल, आणि
किती नोटा प्रत्यक्ष जमा झाल्या हे न सांगता येण्याची नामुष्की (RBI सारखी बलाढ्य संस्था अजून नोटा मोजतेच आहे). म्हणजे एकतर चलाख मंडळींनी सर्व काळे धन व्यवस्थित बॅँकांमध्ये जमा केले, किंवा काळे धन मुळांत रोकड रकमेत जास्त नव्हतेच असा निष्कर्ष निघतो।
3) व्यापम आणि ललित मोदी सारख्या भाजपा शासित राज्यातले घोटाळे व्यवस्थित झाकून ठेवले गेले आहेत।
UCal Berkleyच्या अर्थशास्त्राच्या प्राध्यपकाचे ही निरीक्षणे वाचण्याजोगी आहेत।
सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।
एकीकडे देशांतील तीन सर्वोच्च
हॅहॅहॅ. एके काळी देशातली सगळी (म्हंजे केवळ ३ नव्हे) सर्वोच्च पदे डाव्यांकडे होती. काय दिवे लावलेनीत ? इथे डावे म्हंजे लेफ्ट ऑफ़ सेंटर + लेफ्ट.
----
लेखकाने चलाखपणे इन्फ्लेशन ची आकडेवारी लेखातून वगळलेली आहे. इन्फ्लेशन हे मूलभूत निर्देशांक मानले जाते. ज्याला फंडामेंटल्स म्हणतात त्यापैकी एक. जीडीपी ग्रोथ ची आकडेवारी सुद्धा समोर ठेवलेली नाही. एफ्डीआय ची आकडेवारी सुद्धा वगळलेली आहे.
Berkley ज्या देशात आहे आणि
Berkley ज्या देशात आहे आणि युरोप मधे पण रोजगार निर्मीती गेली बरिच वर्षे तोळामासा आहे. ह्याला हा लेख लिहिण्यासाठि जो पैसा मिळाला तो त्याने Berkley मधल्या प्लंबर, फिटर , सुतारांना दिला तर Berkley मधे तरी थोडी रोजगार निर्मीती होइल.
त्याही पेक्षा, ह्याला नोकरी वरुन काढुन त्या वाचलेल्या पैश्यातुन युनी नी खऱ्या काम करणाऱ्या लोकांना ( म्हणजे वरचेच प्लंबर, सुतार, क्लीनर, माळी वगैरे ) ना नोकरीवर ठेवले तर Berkley मधे १० कायमस्वरुपी नोकऱ्या तयार होतील.
UC Berkeley हा डाव्या
UC Berkeley हा डाव्या विचारसरणीच्या लोकांचा बालेकिल्ला मानला जातो.
e.g.
दीडशहाणपणाला उतावळेपणाची जोड असली की शेलिब्रेटीपणा मिळतोच.
आस्तिक नास्तिक लोकांनी एकमेकांच्या परंपरेचा काचून नव्हे पण निदान वरवर आदर करणं महत्वाचं वाटतं. सिंगल लोकांनी कपलचा आदर करण्याचं सौजन्य निदान दाखवावं ह्यात वावगं काही नसतंय.
कुठे काय परिणाम?
>>नोटाबंदीचा एकूण लघु उद्योगांवर (हातांत रोकड नसल्याने) झालेला दुष्परिणाम,
काहीही परिणाम झालेला नाही. हार्वर्डपेक्षा हार्डवर्क महत्त्वाचे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
काय होईल?
२०१९ :
चिंजंनी देव पाण्यात ठेवले आणि भाजप पुन्हा सत्तेवर येऊ शकले नाही.
रागांच्या नेतृत्वाखाली कडबोळं सरकार आलं.
निती आयोग बरखास्त केला गेला आणि नियोजन आयोग पुन्हा आणला गेला/ नवीन राबीआय गवनेराची पोस्ट ओपन झाली
प्रा. प्रणब बर्धन यांची वर्णी लागली!
(दुधात साखर : गिरीश कुबेरांनी अग्रलेखांत अडीच दिवस आधीच्या पदाधिकाऱ्याचे वाभाडे काढले, अर्धा दिवस उर्जित पटेल किंवा संबधित अधिकारी त्यातल्या त्यात बरा होता असा निष्कर्ष काढला आणि पुढचे पाच दिवस प्रा. प्रणब बर्धन यांचं वारेमाप कौतुक करून स्वत:च पंचवार्षिक योजना मांडली.)
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
निती आयोग बरखास्त केला गेला
हा प्रतिसाद अत्यंत रोचक आहे. खरोखर.
प्रा. बर्धन हे (इतर विषयांबरोबर) विकेंद्रीकरण या विषयात जाणकार आहेत त्यामुळे नियोजन आयोग काय अन सेंट्रल बँक (आर्बीआय) काय दोन्हीकडे केंद्रिकरण करून आपला विकेंद्रिकरणाचा व्यासंग पुढे चालवू ठेवता येईल.
हे म्हंजे पुणेरी माणसाने काढलेले दुकान ... नंतर सिंध्याबिंध्याला विकल्यानंतर - मराठी माणूस व्यापारात मागे का ? याची चर्चा करायला आपण रिकामे -- सारखे झाले.
रोजगारनिर्मिती कोण करतो?-
रोजगारनिर्मिती कोण करतो?-
पक्ष नव्हे ,देशातले कारखानदार.
*चलाख मंडळींनी सर्व काळे धन व्यवस्थित बॅँकांमध्ये जमा केले,*
- दरवर्षी रिटर्न फाइल करताना जेवढे दाखवतात त्या प्रमाणात धन जमा केले गेले. नंतरच्या ५०% टॅक्स भरा अन धन पांढरे करा मध्ये एका कुटुंबाने ६८ हजार कोटी घोषिथ केले ते घेतले नाही.
*व्यापम आणि ललित मोदी सारख्या लोकांचे गेरव्यवहार--
केस टाकायला कोण नको म्हणतो?
*लेखकाने चलाखपणे इन्फ्लेशन ची
*लेखकाने चलाखपणे इन्फ्लेशन ची आकडेवारी लेखातून वगळलेली आहे. इन्फ्लेशन हे मूलभूत निर्देशांक मानले जाते. ज्याला फंडामेंटल्स म्हणतात........*
हे सर्व जरी खरे मानले तरी रोजगार निर्मिती मधले अपयश झाकता कसे येईल?
* रोजगारनिर्मिती कोण करतो?-
पक्ष नव्हे ,देशातले कारखानदार.*
ही प्रस्थमिक मुद्दा 2014 च्या मुसळधार प्रचारांत लक्ष्यात आला नव्हता का?
* केस टाकायला कोण नको म्हणतो?*
कळले नाही। म्हणजे 'आमच्या केसेस आम्ही टाकू, तुमच्या तुम्ही बघा -असा काही प्रकार असतो का? भ्रष्टयाचार विरोध हा प्रमुख मुद्दा असतांना हा बचावात्मक पवित्रा शोभा देत नाही।
सर्व प्रतिसाद इतके बचावात्मक का बरे असावेत? 'काय' लिहिले आहे, ह्या ऐवजी 'कोणी' आणि 'कुठून' लिहिले आहे ह्याला का महत्व दिले जाते?
अवांतर: अनुताईंचा प्रतिसाद skew वाटला। असो।
सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।
सर्व प्रतिसाद इतके बचावात्मक
(१) तुमचा मुद्दा एकदम उचित आहे.
(२) रोजगारनिर्मितीत मोदींचे अपयश आहेच. प्रश्नच नाही. मोदींनी २०१४ मधे जरा जास्तच वचने दिली.
(३) परंतु मूळ लेख हा तुम्हाला हवा तसा वस्तुनिष्ठ नाही. इन्फ्लेशन ची आकडेवारी वगळणे हे प्र्थितयश अर्थशास्त्र्यांनी लेख लिहिलेल्या आढावात्मक लेखात अतिच ठळकपणे उठुन दिसते. जीडीपी ग्रोथ ची आकडेवाऱी पण अशीच मारण्यात आलेली आहे. ह्या लेखाचे उपशीर्षक खालील प्रमाणे आहे. त्यावरून तो आढावात्मकच आहे. रोजगार निर्मीती ही गुंतवणूकीचे थेट फलित असते. व (परकीय असो वा एतद्देशीतय) गुंतवणूकदारांना अर्थव्यवस्थेबद्दल् काय वाटते ते गुंतवणूकदार लेख लिहून व्यक्त करीत नाहीत. थेट गुंतवणूक करतात. व ते सरळसरळ दिसत असूनही लेखकाने आपल्या स्वत:च्या पूर्वग्रहदूषीत दृष्टी.......
भारतातील कामगारांसाठी एक
भारतातील कामगारांसाठी एक चांगली बातमी आहे! कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात दुपटीने वाढ करणारा नवा कायदा केंद्र सरकार आणू पाहत आहे. या कायद्यानुसार, कर्मचाऱ्यांचे किमान वेतन महिना १८,००० रुपये इतके होणार आहे. ज्यांचे सर्वाधिक शोषण होते अशा अल्पकालीन कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही हा कायदा लागू होणार आहे. मात्र, असे असले तरी, ही चांगली बातमी श्रमिकांसाठी चांगलीच ठरेल याची खात्री देता येत नाही अशी चर्चा उद्योगक्षेत्रात ऐकू येऊ लागली आहे.
शोषण होते हे गृहितच धरले जाते.
.
.
.
.
-----------------------
.
.
Arun Jaitley on Kerala violence: Had it happened in BJP-ruled states, awards would have been returned
.
नुसतं एवढंच नव्हे तर ... सहिष्णूतेची लेक्चरे झाडली गेली असती. हिंदुस्थानाचे नामकरण लिंचिस्थान व्हावे चा आरडाओरडा झाला असता.
.
बचावात्मक-
बहुमत नसलेले सरकार कोणाचा पाठिंबा घेते आणि थोडी मंत्रिपदं देते. ते मंत्री काय करतात हे माहितच आहे. त्यांचेच सरकार विरोध करत नाही. विरोधी पक्षांनी पुरावे घेऊन केसेस टाकाव्यात आणि वचक ठेवावा.
* सरकारने पुल रस्ते बांधणीचे कंत्राट दिल्यास रोजगार निर्मितीचे श्रेय कुणाला जाते?
* हाइटेक उद्योगांत सामान्यांना रोजगार मिळेल ही अपेक्षा ठेवता येणार नाही.
*शेतीमध्ये शक्य आहे.
* वस्त्रोद्योगांत परभणी औरंगाबाद भागातील रेशीम उद्योगांत काम आहे कारण रेशमाचा भाव व मागणी.
तुती लावणे, पाने गोळा करणे, रेशिम किडे वाढवणे यामध्ये यांत्रिकीकरणाची स्पर्धा नाही. तसे सुती उद्योगात नाही. यंत्रांच्या गती अधिक आहेत.
* इलेक्ट्रानिक्स आणि कार ओटमबिल उद्योगांत प्रशिक्षितांनाच काम मिळते शिवाय परदेशी पार्टस इथे फक्त जोडले जात असतील तर कितीशा नोकय्रा तयार होतील?
भाइसंमं मध्ये पेशवा दफ्तराचे
भाइसंमं मध्ये पेशवा दफ्तराचे जुने काही खंड विकायला काढले आहेत. महादुर्मिळ संधी. परत येणे नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हे असं का करत आहेत ते ?
हे असं का करत आहेत ते ?
उठी उठी गोपाला ....
Congress facing existential crisis, Jairam Ramesh says
चल ऊठ रे मुकुंदा ... झाली पहाट झाली....बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली....
काँग्रेस संपत नाही कारण ती एक
काँग्रेस संपत नाही कारण ती एक वृत्ती आहे, सध्या तिने भाजप नाव घेतलय.
या वाक्याबद्दल तुम्हाला या
या वाक्याबद्दल तुम्हाला या वर्षी पद्म अवॉर्ड देण्यात यावे . रोचक दिलंय हो . ( अनुतै तुम्हाला आजकाल काय झालंय ? )
अहो मी अशीच आहे पहिल्यापासुन
अहो मी अशीच आहे पहिल्यापासुन बापटण्णा. तुम्हाला उगाच मी भाजपाई वाटते. मी मोदी ला मत पण दिले नाहिये. बाकीचा अगदीच विकृत कचरा आहे त्यातल्यात्यात मोदी ( भाजप नाही ) मला माणुस म्हणुन बरा वाटतो.
अनुरावांची ओळख उघड!
हेच राज ठाकरे बोल्लेले अर्णबच्या शोमध्ये.
हॉsssss :O
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
बाकीचा अगदीच विकृत कचरा आहे
एकात्मिक मानवतावादामुळे (आणि
सर्वोदयाच्याअंत्योदय च्या बकवासामुळे) डोस्क्याचा फालुदा झालाय भाजपावाल्यांच्या. मोदी ठिकठाक आहे. अधुनमधुन तोसर्वोदयाच्याअंत्योदय चा मंत्र जपत असतो.नितिन गडकरी म्हणाले होते ....म्हणे आदर्श समाजरचनेसाठी यत्न करणार.
स्त्री पुरुष समानतेचा बकवास चालूच....
Google’s New Diversity Chief Criticizes Employee’s Memo - Memo had ‘incorrect assumptions about gender,’ Danielle Brown says
.
.
स्त्री पुरुष समानतेचा बकवास चालूच....
.
-------------------------------------
.
Cuban ministry stops issuing some business permits
.
.
.
सुंभ जळला तरी....
.
श्रीमती गब्बर सिंग यांच्यासाठी
गूगलच्या बातमीवर माझ्या एका मैत्रिणीची प्रतिक्रिया -
I try not to rant on FB, but this is a bit of a rant. Consider yourselves warned.
This discussion hits a nerve, especially as I had a colleague express a similar opinion as in the manifesto a short while ago. Other colleagues a longer while ago. Fellow students some years ago. And society in general all the time.
"Women are just no good at science." "Women are just more suitable to raising babies and looking after the home". "Women are just not as good as men at tech". "The reason we don't have more women is that they just aren't good enough".
Sometimes followed by "Oh, but we don't mean you. You are different."
So, either I'm no good at my job or I am no good at being a woman.
This post is a bit of a balm. Not a cure, but a balm.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
Rebut this
.
.
समजलं नसेल तर विचारा..
.
.
समजण्यासाठी वाचलं पाहिजे!
छोटी बोटं असणाऱ्यांचा चेहरा चिंताक्रांत दिसत होता.
त्याचं कारण म्हणजे छोट्या बोटांना मागे टाकणाऱ्या स्त्रियांची संख्या दिवसागणिक बेसुमार वाढली होती आणि सांख्यिकीच्या आकृत्या तर केंव्हाच संपून गेल्या होत्या.
खूप विचार केल्यावर मॅनिक्युअर करता करता त्याना उपाय सापडला आणि छोट्या बोटांच्या मालकांच्या चेहर्यावर समाधान पसरले.
आपले प्रतिसाद कुणाचा बाप वाचतोय?
त्याच त्या आकृत्या फिरवुन डकवायच्या.
अश्यातर्हेने छोट्या बोटांच्या पुरुषांच्या संपूर्ण जमातीची नसली, तरी स्वतःपुरती स्त्रियांच्या वाढत्या कर्तबगारीची समस्या त्यांनी सोडवली होती.
(प्रेरणा संदर्भ - दुवा)
संबंधित नाडी कथा -
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तुमची रँट उत्तम आहे. साहित्य
तुमची रँट उत्तम आहे. साहित्य अकादमी कडे पाठवा. एखादे अवॉर्ड मिळेल. व यथावकाश "ॲवॉर्ड वापसी" करण्याची सोय पण होईल.
तुम्ही प्रतिवाद करण्यात अजुन तरी अयशस्वी झालेल्या आहात. प्रतिवाद करा प्रतिवाद.
किंवा प्रश्न वेगळ्या शब्दात विचारतो - (निओक्लासिकल मॉडेल चा आधार घेऊन )
(१) ऑन ॲव्हरेज स्त्रिया या तेवढ्याच प्रॉडक्टिव्ह असतात का की जेवढे पुरुष प्रॉडक्टिव असतात ?
(२) जर स्त्रिया तेवढ्याच प्रॉडक्टिव्ह असतील आणि त्यांना (समजा) २०% कमी पगार (तेवढ्याच प्रॉडक्टिव पुरुषांच्या तुलनेत) मिळत असेल तर - अनेक असे उद्योजक का निर्माण होत नाहीत की जे याच इक्वली प्रॉडक्टिव्ह स्त्रियांची नोकरभरती करतील, मधला २०% नफा खातील व स्त्रीपुरुष वेतनसमता निर्माण करतील ?
(३) हा प्रश्न चेरी ऑन टॉप आईसक्रीम आहे - (२) मधील हे उद्योजक स्त्रिया असणे इष्ट आहे की नाही ?
.
------
फक्त एवढंच करा - हस्तिदंति मनोरे वगैरे डायलॉग मारू नका. प्रतिवाद करा.
मी नै त्यातली!
मिहिर रागावेल, तुम्हाला उत्तर दिलं तर. त्यामुळे मी नै जा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लोल.
लोल.
मिहिरला पदर आहे हे ठाऊक नव्हतं.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हो तर!
ठरावीक काम करण्याची स्त्रियांची क्षमता आणि समान-काम-समान-पगार यांचा काहीही संबंध नसताना तसा संबंध जोडणाऱ्या, भांडवलशहांच्या आंद्रेया ड्वॉर्किन, गब्बरच्या प्रतिसादाला मी गंभीर उत्तर दिलं तर मिहिर चिडेल. त्यामुळे मी नै जा!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आणि तसंही उत्तर दिलं तरी ते
आणि तसंही उत्तर दिलं तरी ते कोणी कधी वाचतं का? वाचत असतं तर पुन्हा पुन्हा तेच प्रश्न आले असते का?
प्रॉडक्टिव्ह
>>ऑन ॲव्हरेज स्त्रिया या तेवढ्याच प्रॉडक्टिव्ह असतात का की जेवढे पुरुष प्रॉडक्टिव असतात ?
बहुधा भांडवलदार स्त्रियांना कामावर ठेवण्याचा किंवा न ठेवण्याचा विचार करताना "प्रॉडक्टिव्हिटी" पेक्षा स्त्रियांच्या इतर जेंडर रोलचा* विचार करत असावेत/असतात.
त्या रोल पायी कामावर ठेवलेली स्त्री कधीही कौटुंबिक अडचणीसाठी, गरोदरपणासाठी नाकारता येणार नाही अशी सुटी घेऊ शकते. त्यामुळे एखाद्या कामाच्या प्लॅनिंगमध्ये स्त्रीकर्मचाऱ्याला गृहीत** धरता येत नाही.
**हा जेंडर रोल परंपरेने एम्प्लॉयरना मान्य असतोच.
*** पुरुष एम्प्लॉयीसुद्धा स्वत: आजारी पडून किंवा कुटुंबात काही अनिष्ट घडल्याने सुटीवर जाऊ शकतोच. परंतु स्त्री कर्मचाऱ्याच्या बाबतीत ही शक्यता + वर सांगितलेली शक्यता अशा दोन शक्यता असतात.
यात एम्प्लॉयरच्या बायसपेक्षा समाजातला बायस जास्त महत्त्वाचा आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ऑन ॲव्हरेज स्त्रिया या
नसतात गब्बु. नॉट ओन्ली प्रॉडक्टीव्हिटी, पण क्रिएटीव्हिटी वगैरे वगैरे अनेक गुणांच्या बाबतित बायका पुरुषांपेक्षा कमी असतात.
माझे वरचे विधान स्टॅटिस्टिकली बघण्याची गरज आहे. जर एखादा गुण "क्ष" अक्षावर घेउन स्त्रीया आणि पुरुषांचा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व्ह काढला तर उजव्या बाजुला पुरुष स्त्रीयांपेक्षा जास्त दिसतील.**
पुरुषांचा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व्ह स्त्रीयांपेक्षा जास्त पसरट असतो.
------
** : तसेच डाव्याबाजुला पण पुरुष जास्त दिसतील. म्हणजे पुरुष स्त्रीयांपेक्षा नॉर्मली जास्त प्रॉडक्टिव्ह पण असतात आणि उलट स्त्रीयांपेक्षा जास्त वाईट पण असतात
----------
पण हे सर्व सोडुन दे, कोणाला कोणाची जास्त गरज असते हे जास्त महत्वाचे.
लोकशाही आहे, मताधिकार आहे.
अनुतै म्हणतात म्हणजे बरोबरच असणार. विदेसारखी फडतूस गोष्ट म्हणजे अनुताईसारख्या महत्त्वाच्या लोकांचं गंभीर मत नव्हे. (कालच जालावर फिरत असणाऱ्या विदेचा दुवा.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तुम्ही विदा दिलेला आहे व तो
तुम्ही विदा दिलेला आहे व तो खरा व बरोबर आहे असं गृहित धरुया. हे मी सिरियसली म्हणतोय. मुली व मुलगे यांना पगार देताना ची तफावत हा मुख्य प्रश्न असेल तर असा विचार करून पहा की - मुली ह्या मुलांइतक्याच प्रॉडक्टिव्ह आहेत असं समजा ... पण जर कंपन्यांची नोकरभरतीची प्रवृत्ती जर भेदभावी असेल व त्या प्रवृत्तीनुसार् कंपन्या पुरुषांना प्राधान्य देत असतील तर त्या प्राधान्यापायी कंपन्यांना पुरुषांना जास्त पेमेंट करावे लागते - असा विचार करुन पहा.
त्याच जॉब साठी एखादी मुलगी त्या पुरुषाइतकीच पात्र व प्रॉडक्टिव्ह असेल व तीला कमी पगार असेल तर त्याचा अर्थ हा होतो की ती कंपनी (गूगल) त्यांच्या पुरुषांप्रति भेदभावी प्रवृत्तीपायी स्वत:चे नुकसान करून घेत आहे कारण स्त्री इतक्याच प्रॉडक्टिव्ह् पुरुषांना ती कंपनी जास्त पगार देत आहे. जास्त पगार देणे म्हंजे लेबर कॉस्ट वाढवणे. कॉस्ट वाढवणे म्हंजे नफा कमी.
वेगळ्या शब्दात - For the same level of productivity if you have a preference for a man than a woman then you have to pay more. That means the company is incurring losses because of their preferences (discriminatory preferences).
यात स्त्रियांचे नुकसान आहेच. पण कंपनीचे खूप जास्त आहे. व कंपन्यांना जर आपल्या नफ्याची चिंता असेल तर त्या याचा विचार अवश्य करतीलच की.
-----
मूळ विषय नेमका काय आहे त्याबद्दल इथे - (गूगल बद्दल च्या बातमीतून साभार) -
गब्बू, विदा आणि सव्हेंचे
गब्बू, विदा आणि सव्हेंचे कौतुक नको. आजच टाटाच्या कुठल्यातरी संस्थेने विदा अभ्यासुन हा निकाल दिला आहे.
१. पुण्यातील दरडोई वीज वापर हा लंडन, दुबई आणि एलए पेक्षा जास्त आहे.
२. पुण्यात दरडोई पेटंट फायलिंग पण लंडन पेक्षा जास्त आहे.
ह्या वरुन तुझ्या लक्षात येइल कि हे विदावाले किती निर्बुद्ध आणि वास्तवापासुन दुर असु शकतात.
गब्बू, विदा आणि सव्हेंचे
विदा जमा करणाऱ्याचे व विश्लेषण करणाऱ्याचे इन्सेंटिव्हज तपासुन पहावे.
दे दान सुटे गिराण
... या सुज्ञवचनाला अनुसरून 'ऐसीसबबसाम्राज्ञी' हा पुरस्कार अनुतै आणि गब्बोबांना विभागून दिला जात आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पटण्यासारखं आहे!
प्प्प्पण्ण्ण्ण्ण, परवडतो ना तो जास्तीचा पगार पुरुषांना द्यायला? मग स्त्रियांना का नाही? ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र नाही मिळालं.
तरीही तुमच्या दुव्यातील उद्धृत वाक्यांवरून दिसतंय की मुळातच हा दावा फोल आहे, जास्त वाद तेव्हाच घालण्यात अर्थ आहे जेव्हा गुगलवर वॉरंट निघेल.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
प्प्प्पण्ण्ण्ण्ण, परवडतो ना
तुमचं आर्ग्युमेंट् कायद्याच्या दिशेने जाते. की अमकं कायद्याने बंधनकारक आहे तेव्हा ते करायलाच हवं आणि न करणाऱ्यावर वॉरंट बजावायला हवं. बस्स.
ते का योग्य आहे ते मात्र तुम्ही सांगत नाही. व माझ्याकडे असलेलं त्याचं उत्तर हे की ते अमकंढमकं जे काही असेल ते योग्य आहे असं कायद्याने म्हंटलं तरी ते योग्य आहे हे सिद्ध होत नाही.
आणि गूगल च्या बाबतीत च बोलायचं तर अमेरिकन केंद्रसरकारच्या कायद्याच्या स्क्रुटिनीच्या कक्षेत मामला येतो त्याचं कारण एकच - अमेरिकन केंद्रसरकारचा कायदा हा आहे की अमेरिकन केंद्रसरकारला सेवा पुरवणाऱ्या प्रत्येक कंपनी ने इक्वल पे फॉर इक्वल वर्क कायदा राबवलाच पाहिजे. जर गूगल अमेरिकन सरकारला सेवा पुरवत नसेल तर हा कायदा लागू पडत नाही.
माझं म्हणणं हे आहे की हा कायदा काऊंटर प्रॉडक्टिव्ह आहे.
--
स्त्रियांना का नाही ?? याचं उत्तर एकच - पर्सनल/इंडिव्हिज्युअल चॉईस/प्रेफरन्स्. अँड चूझर हॅज टू पे फॉर हिज/हर प्रेफरन्सेस्.
काय द्याचं नाहीच बोलत आहे मी
माझं म्हणणं होतं, की अल्फाबेटच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात तफावत दिसून आली नाही, म्हणून तो दावा फोल आहे. असेलच काही तर निघेल वॉरंट, असं.
मग फेमिनिस्ट्स जी टीका करतात तीही मान्य केलीच पाहिजे. दॅट्स अ कंपेन्सेशन ॲज वेल फॉर प्रेफेरेन्सेस.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
धर्मबुडव्यांनो, विश्वास ठेवायला शिका!
Atheists tend to be seen as immoral – even by other atheists: study
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अवांतर
एकदा तंबींची चारोळी लोकसत्तेत वाचल्याची आठवते आहे.
"मी मुलाला म्हटलं, की तुच्छतावादी असू नये बेटा
तो बोलला, बाबा मी सगळ्यांनाच तुच्छ समजतो
त्यात तुच्छतावादीही आलेच."
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
* काँग्रेस संपत नाही कारण....
* काँग्रेस संपत नाही कारण....... अनुताई!
अत्यंत समर्पक।
सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।
विदेश शिक्षित अर्थतज्ञ.....
नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार म्हणतात कीं - बहुश: अजूनही काही NRE's (non resident economists) सरकारी उच्च पदांवरून पायउतार होतील। राजन आणि पानगढिया ह्यांच्यानंतर
अरविंद सुब्रह्मणीयम सोडून, अजून कोण ह्या catagoreet आहेत बरे?
सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।
The "Google’s Ideological
The "Google’s Ideological Echo Chamber" (download PDF File) AKA Anti-Diversity Manifesto is a welcome move in the right direction. The footnotes are even more interesting.
या वाक्याला उभे राहून् टाळ्यांचा कडकडाट.
Google on Monday fired the
Google on Monday fired the employee who wrote an internal memo suggesting men are better suited for tech jobs than women, escalating a debate over free speech at the company.
We respect diversity. But your opinions are too diverse from those of ours. So you are fired.
.
.
घोडा बोलो या चतुर बोलो
सिक्युरिटी घेतली तर देशाचा पैसा वायफळ खर्च होतो. नाही घेतली तर ........
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
शिया वक्फ बोर्डाच्या मते
शिया वक्फ बोर्डाच्या मते "मंदिर वही बनना चाहिये".
http://www.newsstate.com/india-news/shia-waqf-board-tells-sc-ram-temple-...
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मंदिर .....
जो प्रश्न मुळात राजकारण आणि समाजकारण ह्या क्षेत्रांतील धुरीणांनी सोडवायचा आहे, तो प्रश्न आता कोर्टात (पोहोचविला) गेला आहे। वरील कक्षेत्रातील नेतृत्वाच्या अपयशामुळे (अकर्तबगारी पण म्हणता येईल), आता " संन्याश्याच्या ***ने विंचू मारण्या" चा प्रयत्न चालू आहे।
सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।
पण विंचू मरायला नको काय?
पण विंचू मरायला नको काय?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मुद्दा दोन पदरी आहे...
विंचू आमच्या मालमत्तेत घुसला, त्याने काहींना दंश केला. आता तो ठेचलाच पाहिजे. हातोडा, दगड, पाना, कुदळ, फावडं यातलं काहीही चालेल. पण विंचू मारायचाच. पण संन्याशाच्या काठीने मारलात तर वाईटपणा येत नाही .... तो संन्याशाकडे जातो. व संन्याशी हा लोकाभिमुख नसतो. त्याला निवडून यायचे नसते. तेव्हा संन्याशाच्या काठीने मारणे जास्त योग्य.
ब्रिटिशांची फोडा व झोडा ही नीती मोदी वापरत आहेत असं म्हणावंसं वाटतं.
कसं का असेना...विंचू मस्ट डाय
कसं का असेना...विंचू मस्ट डाय. विंचवार मोर्गुलीस.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मंदिर .....
प्रश्न सुटला पाहिजे ही भावना बरोबरच आहे। पण योग्य मार्ग अवलंबिला नाही तर प्रश्न आणखीनच जटिल होऊन बसतो। कोर्टाच्या कोणत्याही निर्णयाने ह्याचा तोडगा निघेल असे तुम्हाला खरेच वाटते का?
सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।
कोर्टाच्या कोणत्याही
कोर्टाच्या निर्णयानेच प्रश्न सुटेल असे आम्हाला वाटते.
कारण सांगतो - हे घडवून आणण्यासाठी भाजपा ला एकतर ब्रूट बहुमत लागेल किंवा नेगोशिएट करावे लागेल. व एवढे करूनही वाईटपणा भाजपाकडे येईल. आमचे म्हणणे हे आहे की संघाने व भाजपाने वाईटपणा मात्र अजिबात् घेऊ नये. कोर्टाकरवीच हा निर्णय घडवून आणावा.
प्रश्नाचे उत्तर एकच आहे - त्याच जागी व भव्यदिव्य. दुसरे म्हंजे - ये तो सिर्फ शुरुवात है .... अभी बाकी है.
सेक्युलरिझम हे समानतेचे अनौरस अपत्य आहे. जी गत् कम्युनिझम ची तीच् सेक्युलरिझम ची सुद्धा....व्हायला हवी.
+१
समभाव व निरपेक्षता ह्या गोष्टी बऱ्याच थोर्थोर लोकांना एकच वाटतात.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
आबा, तुमच्या डोमेन मधला
आबा, तुमच्या डोमेन मधला प्रश्न आहे
आज सेबी ने ३३१ कंपन्यावर एक्स्चेंज वर ट्रेडिंग करण्यास बंदी घातली ( महिन्यात एक दिवस ट्रेडिंग फक्त ) कारण त्या कंपन्या म्हणे "शेल" कंपन्या आहेत.
पण त्यातल्या काही कंपन्याची उत्पादक युनिट्स वगैरे आहेत. नक्की शेल कंपन्यांची डेफिनिशन काय? ( अशी चर्चा आज चालु होती टीव्हीवर )
त्या 311 मध्ये पार्श्वनाथ
त्या 311 मध्ये पार्श्वनाथ डेव्हलपर्स आहेत म्हणून ही चर्चा सुरू झाली ना?
सेबीने 'शेल कंपन्यां'ची व्याख्या कशी केली आहे मला माहीत नाही. पण सामान्यतः शेल, काँड्यूट, आणि बॉक्स हे शब्द साधारणतः समानार्थी म्हणून वापरतात.
जेव्हा कोणीही धंदा करतो, तेव्हा त्यात 'सबस्टन्स' असतो. म्हणजे, एक मौल्यवान आर्थिक घटना घडते, आणि ग्राहक त्या घटनेचं मूल्य देऊन ती आपलीशी करतो. उदा० आपण केस कापण्याच्या बदल्यात न्हाव्याला पैसे देतो. समजा या न्हाव्याने उद्या दुकान स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट केलं, तर त्याला 'केस कापून मिळालेले पैसे' याव्यतिरिक्त 'शेअरविक्रीतून झालेला फायदा' हा एक जास्तीचा स्रोत होईल.
समजा, त्या न्हाव्याने विचार केला, च्यायला, उभं राहून पारोशा लोकांचे केस कापत बसण्यापेक्षा मस्त बसून स्वतःच्या दुकानाच्या शेअरचं ट्रेडिंग केलेलं बरं. मग तो केस कापणं बंद करून फक्त स्वतःचे शेअर विकतो, घेतो, विकतो. त्याच्या धंद्यातला 'सबस्टन्स' संपला आहे, आणि त्याची कंपनी ही आता शेल (फोलपट) / काँड्यूट (नळी) / बॉक्स (खोका) राहिली आहे.
या कंपन्या अनेक आर्थिक गैरप्रकार करण्यासाठी वापरता येतात. उदा० तोट्यात असलेल्या कंपनीला खोटा रेव्हेन्यू दाखवायचा. त्यामुळे शेअर किंमत वाढते. आगोदरच ठाऊक असल्याने किंमत वाढली की आपल्याकडचे शेअर विकून टाकता येतात. मग नंतर मरेना का ती कंपनी. (तो खोटा रेव्हेन्यू ही काळ्याचा पांढरा करायची किंमत समजा.)
म्हणजे, या फोलपट कंपन्या काही मौल्यवान आर्थिक घटना तर घडवत नाहीतच, पण करचुकवेगिरी, मनीची लॉंड्री वगैरे समाजविघातक उद्योग करतात.
आता, सेबीने अशा चोर कंपन्या कोण असाव्यात हे ठरवण्यासाठी काही गणिती आडाखे वापरले असावेत. (उदा० शेअर प्राईसमध्ये स्टँडर्ड डेव्हिएशन य पेक्षा जास्त, वगैरे.) या चाचणीत जे नापास झाले त्यांना ट्रेडिंग ब्यान लावून टाकला. आता यात सुक्याबरोबर थोडं ओलंही जळलं असण्याची शक्यता आहेच. (हे म्हणजे पोलीस लॉजवर छापा घालतात त्यातला प्रकार आहे. वारांगना, जॉनराव आणि मंडळींना पकडणं हा मुख्य उद्देश, पण त्याच लॉजमध्ये साहित्याशी एकनिष्ठ राहणारा गटणेही पकडला जातो.)
पण एक लक्षात घेतलं पाहिजे, की बॅन शेअर ट्रेडिंगवर आहे, धंद्यावर नाही. त्यामुळे या कंपन्या 'आमचा धंदा बंद केला हो' टैप गळे काढत असतील तर त्यांना त्वरित पश्चिम दिशेला लाथ घातली पाहिजे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
जॉनराव म्हंजे काय ?
म्हंजे काय ?
https://www.merriam-webster
https://www.merriam-webster.com/dictionary/john
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
हो पार्श्वनाथ आहेच प्लस जेके
हो पार्श्वनाथ आहेच प्लस जेके इन्फ्रा ( जिने बरेच खरेखुरे फ्लायओव्हर बांधले आहेत ), किंवा प्रकाश इंडस्ट्रीज वगैरे.
म्हणजे खरेखुरे उत्पादक धंदा करुन बाकी चे धंदे केलेतर त्यांना शेल म्हणणे बरोबर आहे का?
गळा कंपन्यांनी काढायच्या आधी त्यांचे शेअर विकत घेणाऱ्यांनी काढला आहे. तसेच त्या कंपन्यांना कर्जे देणारे ( स्टॉक प्लेज ठेउन ) आडकले आहेत.
करदात्यांमधली वाढ?
नोटाबंदी वगैरेंसारख्या उपाययोजनांमुळे आयकर रिटर्न भरणाऱ्यांची संख्या वाढली अशा बातम्या सध्या प्रसृत होत आहेत. त्या आकड्यांमागे नक्की खरं काय, ह्याबद्दल हे वाचलं -
How True is CBDT’s Claim of Record New Tax Filers?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ऑन द फेस सीबीडीटीच्या
ऑन द फेस सीबीडीटीच्या क्लेममध्ये चूक दिसत नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पहिले पाढे पंचावन्न
मुद्दा तो नाही. तर २०१३च्या पातळीला आता आपण पुन्हा येऊन पोहोचलो आहोत असं दिसतं आहे. उदा. हे पाहा -
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अमेरिकन स्त्रिया/मुली एंजिनियरिंग विरुद्ध भेदभाव करतात का ?
.
अमेरिकन स्त्रिया/मुली स्नातक पदवीसाठी आपले क्षेत्र निवडताना ... एंजिनियरिंग च्या विरुद्ध भेदभाव करतात का ?
.
.
.
यात एंजिनियरिंग व एंजिनियरिंग टेक्नॉलॉजिज & रिलेटेड फिल्ड्स असा भाव का केलेला आहे ते माहीती नाही.
Gender Role ....... and it's acceptance
वरील एका प्रतिसादात, थत्तेसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे, असे प्रश्न थेटपणे सामाजिक सर्वसामान्य (सर्वमान्य नाही) धारणांशी भिडतात।
अश्या प्रकारच्या (gender related) निर्णयांमागे महिलांचाही एक सुप्त (कदाचीत, अपरिहार्य सुद्धा) स्वीकार असावा असे वाटते।
ह्या संदर्भात, चूक किंवा बरोबर काय असा मुद्दा नसून, " सद्ययस्थिती काय आहे ", हा मुद्दा प्रबळ दिसतो।
आणि दुसरे असें कीं, जर असा भेदभाव जर महिलांना आपणहोवून करावासा वाटला (preference hyaa arthane) तर मग वादाचा मुद्दा काय राहतो?
सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।
आणि दुसरे असें कीं, जर असा
वादाचा मुद्दा हा की : महिला "स्नातक पदवी चे क्षेत्र निवडताना हा आमचा पर्सनल चॉईस" म्हणत असतील तर हायरिंग म्यानेजर ने किंवा गूगल सारख्या कंपनीने पर्सनल चॉईस म्हणून महिलांना नोकरीवर न घेण्याचा किंवा कमी घेण्याचा निर्णय घेतला तर त्यात आरडाओरडा करण्यासारखं काय आहे ??
कामगार सुद्धा बहुराष्ट्रीय कंपनीत काम करण्यास उत्सुक असू शकतात व एतद्देशीय (उदा मारवाड्याच्या) कंपनीत काम करायला अनुत्सुक असू शकतात. हा भेदभाव नाही काय ?
---
मला नेमकं जे म्हणायचं आहे ते हे ->>>
(१) सर्व प्रकारचा भेदभाव (डिस्क्रिमिनेशन) हा व्यक्तिगत निर्णय असतो आणि जोपर्यंत हिंसा/धाकदपटशा मार्गांचा अवलंब केला जात नसेल तर त्यात चूक काही नसतं.
(२) फक्त सरकारने भेदभाव करायचा नाही.
भेदभाव हा व्यक्तिगत निर्णय
भेदभाव हा व्यक्तिगत निर्णय असतो हे मान्य। पण ...
* गूगल सारख्या कंपनीने पर्सनल चॉईस म्हणून महिलांना नोकरीवर न घेण्याचा किंवा कमी घेण्याचा निर्णय घेतला ...* ह्यात (माझ्यामते) विसंवाद आहे। कोणत्याही कंपनीने एका व्यक्तीला केवळ महिला म्हणून नाकारू नये। कारण, अत्यंत दुर्मिळ असे अपवाद सोडता, नेमणूक ही केवळ job related गुणवैशिष्ट्यावरच केली गेली पाहिजे।
जर एखादी महिला नेमणुकीसाठी eligible असली तर केवळ ती महिला आहे म्हणून नाकारली जाऊ नये। हे मान्य होण्यास आपली हरकत नसावी।
सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।
* गूगल सारख्या कंपनीने पर्सनल
लिबर्टेरियनिझम समजावून घेण्यासाठी हे उत्तम उदाहरण आहे.
(१) नेमणूक ही केवळ job related गुणवैशिष्ट्यावरच केली गेली पाहिजे - हे नीतीमूल्य आहे. व प्रत्येकाने ते आचरणात आणलेच पाहिजे हा अट्टाहास असेल तर तो बलप्रयोगास जन्म देतो. उदा. सरकारने केलेले भेदभाव विरोधी कायदे. हे कायदे बलप्रयोगात्मकच असतात. व नेमका यालाच माझा विरोध आहे कारण ते कायदे कंपन्यांवर विशिष्ठ नीतीमूल्य लादतात.
(२) भेदभाव करणाऱ्याला भेदभाव केल्याची थेट व प्रकट शिक्षा आपोआप मिळत असते. सरकारने भेदभाव विरोधी कायदे करणे ह्याचा परिणाम ती शिक्षा कमी करण्यामधे होतो. विवेकसिंधु, कदाचित तुमचे ही याकडे दुर्लक्ष झालेले असावे. हा मुद्दा पूर्ण समजला नसेल तर या प्रतिसादातील बाकीचे काहीही समजणे हे न समजण्यासारखे आहे.
(३) तेव्हा आमचे म्हणणे हे आहे की सरकारने भेदभावविरोधी कायदे करू नयेत.
(४) वरील ३ चा अर्थ हा की - व्यक्ती भेदभाव करण्यास अथवा न करण्यास स्वतंत्र असावी. सरकारचा किंवा कोणाचाही हिंसात्मक् आग्रह / धाकदपटशा नसावा.
(४) जाताजाता - लग्नाच्या बाजारात अतिमहाप्रचंड भेदभाव चालतो. सरकारने या भेदभावविरोधात कोणतेही फारसे कायदे केलेले नाहीत. व तरीही लग्नाचा बाजार सुरळीत चालू आहे. हे उदाहरण आहे (तुलना नाही). उदाहरण व तुलना यात फरक असतो.
"Congress must always defend
"Congress must always defend the liberty and freedom of individual and institutions. Anguished by assault on freedom; self-appointed vigilantes are a threat to liberty and enemy of pluralism and diversity," Sonia Gandhi said
सोनियाजी लेफ़ट ऑफ सेंटर आहेत असा माझा कयास आहे. पण आता त्या चलाखपणे लिबर्टी हा शब्द वापरताहेत.
अहमद पटेल राज्यसभेत निवडून आले।
अत्यंत प्रतिषठेच्या आणि अटीतटीच्या लढतीत सोनियाजींचे निष्ठावान राजकीय सल्लागार अहमद पटेल हे गुजरात मधून राज्यसभेवर निवडून आले।
सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।
काँग्रेसची दोन फुटलेली आणि
काँग्रेसची दोन फुटलेली आणि भाजपाला समर्थन देणारी मते निवडणूक आयोगाने रद्द बातल ठरविली। हीच दोन रद्द मते पटेल ह्यांना निवडून आणण्यात निर्णायक ठरली।
सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।
.....
नोकरी / श्रमसंधी / वेतन यांबाबत पुरुष आणि स्त्रियांत भेदभाव असण्या अथवा नसण्याची सक्ती असण्याविषयीची उपरोक्त चर्चा वाचून प्रत्यक्ष अनुभवातले सिनारिओ आठवले.
एका टीममधे नवीन ॲनालिस्टची गरज असताना जेव्हा एच आरकडे मागणी केली तेव्हा त्यांनी अनेक उमेदवारांचे सीव्ही जमवले आणि मला विचारलं की "स्त्री कँडिडेट चालेल ना?"
मी विचार करुन "नको" असं म्हणालो.
त्यांनी "का" असं विचारलं. (मग मुळात चॉईस विचारलाच कशाला? पण ते असो)
माझ्याकडे एक कारण होतं ते म्हणजे कामाचं स्वरुप असं होतं की वर्किंग अवर्सची शाश्वती नव्हती. मुली सिन्सियरली काम करतात असं माझं मत आहेच. पण चालू क्षेत्रात सहसा मुली उशिरापर्यंत काम करण्यात सवलती अपेक्षितात असं निरीक्षण (विदा नव्हे) अनेक वर्षं होतं. उशीर झाला तर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेण्याची व्यवस्था कंपनीकडे नव्हती. (ती एच आरनेच आगोदर आणली पाहिजे)
त्यावर एच आरची मुलगी (सर्व मुलीच आहेत) उखडली आणि म्हणाली की त्या सर्वजणी कितीही उशिरापर्यंत थांबून काम करु शकतात. त्याही स्त्रियाच आहेत.
यावर फार काही बोलता आलं नाही कारण या मुली दिवसाही कधी दिसत नाहीत, त्या संध्याकाळनंतर थांबून काम करत् असणं ही एक नुसतीच संकल्पना होती.
त्याखेरीज आणखी एक कारण होतं ते म्हणजे जिथे व्हेकन्सी होती त्या सध्याच्या टीममधे अनेक वर्षं सर्व पुरुषच होते. अशामधे एकच मुलगी आली असती तर टीममधे प्रचंड विसंवाद झाला असता. त्यात त्या मुलीचा दोष नसून मुलांचाच आहे. एकमेकांमधला संवाद पूर्ण थांबून प्रत्येकाचा तो आणि ती असा स्वतंत्र संवादच शिल्लक राहतो. अगदी ग्रुप डिस्कशनमधेही सगळीच मुलं इतरांऐवजी फक्त त्या मुलीकडे बघूनच / तिला उद्देशूनच सगळं मांडत राहतात. तिच्यापुढे असताना बॉसकडून किंवा इतर टीमकडून स्वत:विषयी काहीही निगेटिव्ह मत व्यक्त झालं तर पुरुष मेंबर्स प्रमाणाबाहेर दुखावले जातात. परस्परांत खुन्नस वाढते.
हे यापूर्वी प्रत्येक वेळी घेतलेले थेट अनुभव आहेत. यावर अमेरिकन युनिव्हर्सिटीजमधे झालेल्या संशोधनाचे निष्कर्ष मजकडे नाहीत आणि असते तरी त्यानुसार निर्णय घेण्यापेक्षा आपल्या आसपासचे अनुभव जास्त गृहीत धरावेत हे बरं वाटतं.
अशावेळी मुलगी चालेल पण आकर्षक नको. अशी अट चालेल का?
याउलट रिसेप्शनवर मुलगीच हवी आणि तीही आवर्जून जास्तीतजास्त आकर्षक, सुंदर, कृत्रिम साधनांनी ग्रूमिंग करुन येण्याचं कंपल्शन असलेली इ.इ. असावी ही अपेक्षाही "जॉब स्किल बेस्ड" समजायची का? तिथे एच आर एक मुलगा ठेवून स्टिरिओटाईप मोडताना दिसत नाही.
मुलीही अशी भेदभाव करणारी नोकरी नाकारताना दिसत नाहीत. अगदी एअरहोस्टेस हा जॉब. उंच, सडपातळ, सुंदर, सेक्सी , नितळ त्वचा , इ.इ. प्रत्यक्ष सिलेक्षनमधे बघितले जाणारे आणि डिप्लोमॅटिक भाषेत जेडीमधे लिहिलेले निकष असूनही तिथे कुठेही स्त्रीवर्गाकडून विरोध, बहिष्कार वगैरे दिसत नाही.
मग अमुक टीममधे "मुलगी नको" अशी मागणी ठेवल्यास इतकं अन्यायकारक काय वाटतं?
की फक्त वेतन फरकाचाच लिमिटेड पॉईंट आहे?
>>अगदी एअरहोस्टेस हा जॉब. उंच
>>अगदी एअरहोस्टेस हा जॉब. उंच, सडपातळ, सुंदर, सेक्सी , नितळ त्वचा , इ.इ. प्रत्यक्ष सिलेक्षनमधे बघितले जाणारे आणि डिप्लोमॅटिक भाषेत जेडीमधे लिहिलेले निकष असूनही तिथे कुठेही स्त्रीवर्गाकडून विरोध, बहिष्कार वगैरे दिसत नाही.
मग अमुक टीममधे "मुलगी नको" अशी मागणी ठेवल्यास इतकं अन्यायकारक काय वाटतं?
आमची एअर इंडिया हे निकष फाट्यावर मारून महिला एअर होष्टेस कामावर ठेवते बर्का !!
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
.... मुलीही अशी भेदभाव
.... मुलीही अशी भेदभाव करणारी नोकरी नाकारताना दिसत नाहीत. अगदी एअरहोस्टेस हा जॉब. उंच, सडपातळ, सुंदर, सेक्सी , नितळ त्वचा , इ.इ. प्रत्यक्ष सिलेक्षनमधे बघितले जाणारे आणि डिप्लोमॅटिक भाषेत जेडीमधे लिहिलेले निकष असूनही तिथे कुठेही स्त्रीवर्गाकडून विरोध, बहिष्कार वगैरे दिसत नाही.....
काही काही जॉब्स ला स्पेसिफिक शारीरिक फीचर्स ही गरजेची मानली जातात . जसे एयर होस्टेस* ला तसेच सैन्यदल व पोलीस यांच्या करीता . त्यात स्त्री पुरुष वाद , बहिष्कार वगैरे आणण्याचे कारण लक्षात येत नाही .
( * अर्थात ऐयर होस्टेस जी सेवा पुरवतात त्या करिता उंच, सडपातळ, सुंदर वगैरे कशाला पाहिजे हा मुद्दा आहेच. त्या दृष्टीने एअर इंडिया सर्वात रॅशनल एअर लाईन म्हणावी . ते लिंग , वय वगैरे भेद पाळत नसावेत { शेवटी काय सेवा ' न 'देण्याचाच मुद्दा आहे , मग पुरुष काय आणि स्त्री काय , कोणी हि चालते } )
अडचणीत आणणारे प्रश्न विचारू
अडचणीत आणणारे प्रश्न विचारू नका ओ, फेमिनाझींची दातखीळ बसते अशानं.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बांधेसूद-कम-रांधेसूद-कम
बांधेसूद-कम-रांधेसूद-कम-मुद्देसूद-स्त्रीवादी हा पुरस्कार गेली अनेक वर्षे योग्य उमेदवाराअभावी धूळ खात पडून आहे.
Jawaharlal Nehru Award for International Understanding जसा २०१० पासून उमेदवारा अभावी धूळखात पडून आहे तसा.
बारकी बोटं.
बारक्या बोटाच्या लोकांच्या पुरस्कारांची किंमत किती, हे बायकांच्या लक्षात आलंय ना!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
बारक्या बोटाच्या लोकांच्या
प्रतिवाद करतानाची "प्रॉडक्टिव्हिटी" कमी पडत्ये तुमची.
पांचट डायलॉग्स मारण्यापेक्षा तिकडे लक्ष द्या.
.
Back at you, love!
किंवा पहिले म्हणतो तोच असतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कंपनीत पुर्वी पर्सनेल डिपा
कंपनीत पुर्वी पर्सनेल डिपा होते ते बरे होते. इनमीन तीन माणसे/कर्मचारी. आताचे एचआर शुद्ध भंकसगिरी आणि मत्सर,पोटदुखी वाढवण्यापलिकडे काही करत नसावे. त्यापेक्षा आउटसोर्सिंग एजन्सिज चांगला आणि पूर्वग्रह दूषित नसलेला उमेदवार देतील.
आमचा अनुभव
मी पॉवर प्लॅन्टमध्ये काम करतो. आमच्या येथे ही समस्या हळुहळू उग्र रुप धारण करत आहे.
नवीन भरतीत ३३% आरक्षण आणि जनरल मेरीट लिस्टमधूनही भरपूर महिलांची भरती होत आहे (इंजिनीयर व टेक्निशियन दोन्ही कॅटेगरीत). साहजिकच आमच्या इथे टेबल जॉबची संख्या कमी आहे. बर्याच नवीन मुली पहिल्या दिवसांपासूनच टेबल जॉबची मागणी करतात तर इतर काही आधी काही दिवस फिल्ड जॉब करून मग कंटाळतात व टेबल जॉब मागतात.
घर सांभाळून ऑपरेशनच्या शिफ्ट ड्युटीज बायकांना भारी जातात व मेंटेनंस वाले सेक्शन हेड वर म्हटल्याप्रमाणे पुरुषांच्या गॅन्गमधली कम्फर्ट लेवल जात असल्यामुळे मुलींना घ्यायला नाही म्हणतात. पॉवर प्लॅन्टच्या डिझाईनमुळे प्रत्येक ठिकाणी २४ तास सुरक्षा पुरवणं प्रॅक्टीकली शक्य नसतं. तरीही काही डेरिंगबाज स्त्री इंजिनीयर आमच्या कारखान्यात आहेत हा भाग वेगळा. त्यामुळे महिला टेक्निकल स्टाफचं काय करायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वर परफॉर्मंससाठी त्यांना प्रेशराईज करता येत नाही कारण आपले स्त्रीवादी कायदे.
येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक
प्रत्यक्ष अनुभवातले
गवि, जर प्रत्यक्ष अनुभवाचा विषय असेल, तर ते भौगोलिक आणि क्षेत्रविशिष्ट असण्याची चांगलीच शक्यता आहे. उदा. तुम्ही दिलेल्या मुद्द्यांचा विचार मी जर माझ्या माहितीतल्या (पक्षी : मुंबई-पुण्यातलं काॅर्पोरेट जग, आयटी, मीडिया हाऊसेस वगैरे) संदर्भांशी लावून पाहिला तर -
बाकी अनेक भारतीय खाजगी विमान कंपन्या आता पुरुषांनाही प्रवासादरम्यानच्या सेवेसाठी घेताना दिसतात. अर्थात, हे सर्व पुरुष सडपातळ आणि आकर्षक वगैरे असतात, त्यामुळे वस्तुकरण दोन्ही लिंगांचं/नी होतं असं म्हणता येईलच.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पूर्णत: मान्यच आहे मुळी.
पूर्णत: मान्यच आहे मुळी.
त्या त्या कंपनीत त्या त्या टीमच्या आणि कामाच्या संदर्भात हे निर्णय घेतले पाहिजेत आणि बॉसला नवीन टीम भरतीत स्त्री नको (किंवा पुरुष नको) किंवा स्त्रीच हवी वगैरे निर्णय ॲज अ पार्ट ऑफ जॉब डिस्क्रिप्शन देता यावा , तोही कोणत्याही लिंगदडपणाशिवाय किंवा नियमबंधनाशिवाय. उगीच पंधरा मुलींचा इंटरव्ह्यूला येण्याचा ताप तरी वाचेल. इतकंच.
याबाबत त्याच वातावरणात फार फार वर्षं असूनही अत्यंत वेगळं निरीक्षण आहे. अगदी आजच्या नवीन पिढीबाबतही.
पण तसं सिद्ध करणं अवघड असल्याने लेट्स ॲग्री टु डिसॲग्री इन दॅट पार्ट.
मराठा आरक्षण मोर्चानंतर
मराठा आरक्षण मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांनी सवलती जाहिर केल्यात.
http://www.loksatta.com/mumbai-news/maratha-kranti-muk-morcha-demands-ac...
अवांतर :
---------
आज सकाळी हपिसात जाताना आणि येताना अतिप्रचंड ट्रॅफिक, शिवाजी महाराजांचे झेंडे घेऊन मोटरसायकल वर बिन हेल्मेट वाले लोक वाकडे तिकडे किंचाळत फिरत होते. पोलिस प्रोटेक्षन मध्ये अजून एक रॅली चालली होती, त्यात पण असेच लोक होते.यांच्यावर कुणाचाच कसा धरबंध नाही..
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
तत्वत:, सरसकट पण अटींच्या
तत्वत:, सरसकट पण अटींच्या अधीन मान्य केल्या असतील बघा.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
Hamid Ansari: Feeling of
Hamid Ansari: Feeling of unease among Muslims, ambience of acceptance under threat
वावावा. क्या ब्बात है !!!
फाळणी नंतर आम्हाला तिकडे जायचा विकल्प होता ... पण् आम्ही इथे राहिलो त्याचे उपकार माना आणि आम्हाला छानछान वाटेल असं काहीतरी करा - उदा. आम्हाला राष्ट्रीय मुख्यप्रवाहात आणण्यासाठी ५ हजार कोटी रुपये, आमचा माणूस उपराष्ट्रपती, किंवा आमचे चारपाच राज्यपाल नेमा. मुख्य म्हंजे आमच्यासाठी वेगळे कायदे ठेवा. थोडक्यात काय की आमची चाटा. म्हंजे आम्ही तुम्हाला सेक्युलर असण्याचं सर्टिफिकेट देऊ. मग प्लुरलिस्ट समाजाचे पुनरुत्थान चालूच राहील.
.
जाऊद्या. पकाऊ श्रेणीला निषेध.
कसंहे, उप्राष्ट्रपती असेपर्यंत आम्ही सेक्युलर देशाचे उपराष्ट्रपती, आणि पद सोडलं की मुसलमानांचे कैवारी. व्हायचंच.
शिवाय असहिष्णुता वगैरे शब्द टाकले की 'पॉलिटिकल करेक्टनेस'मध्ये डिस्टींक्षन ग्रेड.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
दे दान सुटे गिराण, पुन्हा एकदा!
This Is No Way to Remember P.M. Bhargava and Yash Pal
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
A Melbourne cafe is charging
A Melbourne cafe is charging an 18 percent ‘man tax’
फेमिनिस्टांसाठी पर्वणी.
.
---------------
.
Curb predatory airfares: Parliament committee to govt
GST मुळे भारताचा इकॉनॉमिक नकाशा बदलेलं काय!
GST अंमलांत आल्यानंतर, एक दूरगामी परिणाम करू शकणारा, विशेष मुद्दा ठळकपणे पुढे येईल।
आत्तापर्यंत, warehousesचे locations, सहसा मोठ्या शहराबाहेर असायचे। त्यायोगे जकातीवरचा खर्च कमी व्हावा (किंवा चुकविलाच जावा), हा भक्कम हेतू।
GST नंतर ह्याची गरजच उरणार नाही।
तसेच factories पण, मागणी जिथे जास्त असेल, त्या केंद्राच्या जवळ उभारल्या जात होत्या। जर एकूण वाहतूक सुलभते मुळे तो खर्च कमी झाला तर factories demand centreच्या जवळ उभारण्यापेक्षा जिथे production cost कमी आहे तेथे उभारल्या जातील। उदा. चीन अमेरिकेपेक्षा इतका लांब असूनही production मोठ्या प्रमाणात चीन मध्ये shift केले गेले। कारण कमी production costs च्या तुलनेत, वाढीव ट्रान्सपोर्ट कॉस्टस कमी प्रभाव टाकतात।
आपल्याकडेही ह्या मुद्द्यांचा प्रभाव पडला तर आपला इकॉनॉमिक नकाशाही मोठ्या प्रमाणात बदलू शकेल।
संदर्भ: Indian Express मधील आजचा (श्री अहमद, बसू आणि कृष्णा यांचा) उत्तम लेख।
सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।
उत्पादन एका ठिकाणाहून
उत्पादन एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यात टॅक्सेचाच मोठा हात असतो. वाहतुकीचा खर्च त्यामानाने फारच कमी असतो.
उदा. एका कंपनीच्या प्रॉडक्टच्या एका पेटीची किंमत सुमारे ३००० रु आहे आणि तिचे वजन १० किलो आहे. ती हजार किमी एक्स्ट्रा वाहतुक करण्यास दहा-पंधरा रु जास्तीचा खर्च येईल आणि त्या ऐवजी फॅक्टरी उत्तराखंड किंवा तत्सम ठिकाणी असल्यास त्यावरची सुमारे २०० रुपये एक्साइज ड्यूटी वाचेल. त्यामुळे उद्योजकाला उत्तराखंडात फॅक्टरी उघडणे खूप फायद्याचे ठरते. (जीएसटी आल्यावर यात फरक पडायला हवा म्हणजे अशा प्रकारच्या सवलती डीफंक्ट व्हायला हव्या. पण एक्साइज ऐवजी जीएसटीवर सूट चालूच राहणार असेल तर फरक पडणार नाही).
त्याचप्रकारे चीनमध्ये उत्पादन केल्यास आणि एक्स्पोर्ट केल्यास चीनी सरकार खास सवलती देते- भारत सरकारही देते.. (कमी लेबर कॉस्ट हा भाग आहेच).
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
BJP slams Hamid Ansari, PM
BJP slams Hamid Ansari, PM Modi says now you are free to follow your core belief
अन्सारी यांना आता खरी संधी आहे. इतकी वर्षे सरकार मधे राहून ... आतून (इन्साईड आऊट) बदल घडवून आणता आला नाही म्हणून काय झालं .... बाहेरून आत बदल घडवून आणता येईल. एखादे महान ऑर्गनायझेशन जॉइन करावे. पाकिस्तानात जाऊ नये. भारतातच अशी अनेक संगठने आहेत. ते लोक अन्सारी यांना बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मधे सहज घेतील.