ही बातमी समजली का? - १२६
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं. अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
____
कालच्या लोकसत्तेच्या लोकरंग पुरवणीत साहित्यिक चळवळी, नियतकालिकं, अनियतकालिकं ह्यांच्याबद्दल लेखन आलं आहे. त्यात अवधूत डोंगरे ह्यांच्या लेखात ऐसीचा उल्लेख आहे. हा लेख आणि त्या संदर्भातले इतर दोन लेख -
संस्कृतीसंघर्ष.. गिरगाव विरुद्ध गिरणगाव - सतीश काळसेकर
ठिणग्या खूपच कमी उडाल्या? - राजीव काळे
कोणाची पिढी नि कसली बंडखोरी? - अवधूत डोंगरे
डोंगरेंच्या लेखातलं ग्राफिक म्हणजे ऐसीचं मुखपृष्ठ आहे.
"सत्यकथा" या नियतकालिकाच्या
"सत्यकथा" या नियतकालिकाच्या अंकाची होळी का करण्यात आलेली होती ते कळले नाही. जालावर शोधले असता सापडले नाही. पण "कंपूशाहीविरुद्धच्या" बंडखोरीशी संबंधित आहे असा संदर्भ सापडला. एकंदर साहित्यिक वर्तुळात आता बंडखोरी (प्रतिकात्मक अथवा अन्य) का होत नाही? - या मुद्द्यावरती काळसेकर, काळे व डोंगरे यांचे लेख दिसत आहेत.
___
बंडखोरीचे आयुष्यात एक वय असते पण मुख्य तो स्वभावही असतो. बंडखोरी करण्यास "योग्य" मुद्दा न सापडल्यास ती उर्जा (अतिरिक्त वाफ) अन्यत्र भांडखोरपणा, बाचाबाची, फुकाचे वाद यामध्ये वाया जाऊ शकते. अशी उदाहरणे पहाण्यात आहेत.
Hindu community has made
Hindu community has made ‘fantastic’ contributions to US, world: Donald Trump
ट्रंप हा अमेरिकेतल्या विविध धार्मिक गटांना सर्टिफिकेट देण्याचा (व त्याद्वारे गट/तट पाडण्याचा) उद्योग करत आहे असा काहीतरी डायलॉग हिलरी किंवा दिग्विजय सिंग इत्यादी प्रभृतिंकडून अपेक्षित आहे.
दिग्विजय सिंग?
दिग्विजय सिंगचा काय संबंध ब्वॉ?
दिग्विजय सिंगचा काय संबंध
आजकाल ते लाईमलाईट मधे नाहीत. तेव्हा त्यांना लाईमलाईट मधे येण्यासाठी उत्तम मौका है, दस्तूर भी है और फितरत तो पहले से ही थी ... म्हणून.
चांगल्या सर्टिफिकेट देण्याला कोणी नावे ठेवत नाही हो
साध्या, चांगल्या, सर्टिफिकेट देण्याला कोणी नावे ठेवत नाही हो. ऑब्जेक्शन दूषित पूर्वग्रहाला असते. This is elementary!
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
काळसेकरांच्या लेखातूनया
प्रकाटाआ. माय ब्याड.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
Women launch more than half
Women launch more than half of all new Internet companies in China.
--
Govt to shut down 15 loss-making PSUs
वावावा. क्या ब्बात है.
नो वे!!! रोलर कोस्टर च्या
नो वे!!! रोलर कोस्टर च्या राईर्डसमुळे किडनी स्टोन्स बाहेर फेकले जातात.
अरे वा! ही तर भारीच थेरपी आहे
अरे वा! ही तर भारीच थेरपी आहे म्हणायची. विना तोडफोड इलाजामध्ये याही उपायाची भर पडली हे बेष्टच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हा हा
बद्धकोष्ठ
बद्धकोष्ठ घालवण्यासाठी कुठली ' राईड' घ्यावी ?
संगीतप्रेमींसाठी : First
संगीतप्रेमींसाठी : First recording of computer-generated music – created by Alan Turing – restored
ह्यात ती संगणकाद्वारे निर्मिलेली ऑडिओ क्लिप आहे. त्यात अनेक तुकडे आहेत. अनु राव ला या ऑडिओ-क्लिप चा पहिला तुकडा आवडेल (आणि बॅटू ला अर्थातच आवडणार नाही.).
---
इतर घटकांना धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय त्वरीत घ्या - असं साहेब म्हणतात. हे जमणार कसं ? ५०% पेक्षा जास्त आरक्षण होऊ शकत नाही. आणि .......
निर्णय
>>इतर घटकांना धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय त्वरीत घ्या
आरक्षण न देणे हा ही "निर्णय" असू शकतो. त्याबद्दलच ते म्हणत असतील.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
आरक्षण बहिष्कृत जातींना द्यायचे , राज्यकर्त्या जातींना नव्हे!
आरक्षण हे तिरस्कृत , बहिष्कृत जातींना द्यायचे असते , राज्यकर्त्या जातींना नव्हे. केवळ "मराठा" आहे म्हणून ("अपवित्र" असल्यामुळे) नोकरी नाकारली असे कधी घडले आहे काय? आता जुना ब्राम्हण-मराठा वाद, किंवा मालक परप्रांतीय असल्यामुळे , व त्यांच्याच जातीचे लोक घेत असल्यामुळे-जे मुंबईत सर्रास चालते- यामुळेही हे घडू शकते, पण त्यात ही अपवित्रता वगैरे भानगड नसते.
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
Hate standing in line? Japan
Hate standing in line? Japan now has self-driving chairs
गोऱ्या रंगामागची भारतीय जातीयता
The Indian Hatred for Dark Skin Comes From Caste Bias
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नवीन पिच्चरचं प्रमोशन....
नवीन पिच्चरचं प्रमोशन....
--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life
जोक न आवडणे आणि जोक
जोक न आवडणे आणि जोक आक्षेपार्ह असणे ह्यात फरक आहे.
१) हिला जर एखाद्या प्रकारचे जोक आक्षेपार्ह वाटतात तर तिने "रोस्ट" मध्ये जाऊ नये. कुणी तिच्यावर जबरदस्ती केली नव्हती.
२) जर हिला रंगावरून जोक नाही आवडला तर तिने पहिल्याच जोकला तसे स्पष्ट करावे.
पण एकूण प्रकारावरून पिच्चर बद्दल गांगावा करायचा उद्देश दिसतो.
मी तो शो बघत नाही पण मला त्या शोचं एकूण स्वरूप माहितीय. पण एकूणच विनीद करणे हे फार अवघड काम आहे. कुठला विनोद चालेल कुठला नाही हे लेखकाला माहित नसतं. वर आजकाल साधे जोक चालत नाहीत, नवीन काहीतरी दाखवायला लागतं. त्यामुळे मर्यादा ओलांडल्या जातात.
--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life
राजकीय भूमिका
नवीन चित्रपटाची जाहिरात होती म्हणूनच ती त्या कार्यक्रमाला गेली असावी; असा समज तिच्या लेखनावरूनच झाला. हा प्रकार थोडा एकमेकांची पाठ खाजवण्याचा होता; मालिकेतल्या भागात लिहिण्यासाठी काही संदर्भ मिळाला आणि बदल्यात चित्रपटाची जाहिरात झाली.
तिचा आक्षेप असा की व्यक्ती म्हणून तिच्याबद्दल किंवा चित्रपटातचा ट्रेलर बघून त्याबद्दल (किंवा कदाचित प्रिमीयर बघून चित्रपटावरून) विनोद करण्याऐवजी फक्त तिच्या वर्णावरून शेरेबाजी होत होती. रोस्टमध्ये सामान्य मर्यादा ओलांडणं अपेक्षितच होतं; कदाचित दिग्दर्शिका, अन्य सहकलाकार ह्यांच्याबरोबर तिचे काय प्रकारचे संबंध आहेत, चित्रपट फार आर्ट्सी-फार्टसी वाटतो, किंवा असल्या छापाचे विनोद केले नाहीत. माणूस, त्यातही बाई म्हणजे फक्त तिचा वर्ण, तो वर्णसुद्धा समाजात हीन प्रतीचा मानला गेलेला असणं, ह्यात लेखकांच्या बुद्धीची मर्यादा दिसते. विनोद करणं हे काम सोपं नाहीच; बुद्धीहीन माणसांनी विनोद केले तर ते अंगावर उलटण्याची शक्यता बरीच असते.
आपण पोकळीत राहत नाही. भारतीय लोकांना गोरा वर्ण आवडतो; गोऱ्या वर्णाच्या लोकांना समाजात उगाच जरा जास्त सन्मान मिळतो; फेअर अँड लव्हली/हँडसमच्या जाहिरातींमध्ये सावळ्या-काळ्या लोकांना हिणवलं जातं, ह्या गोष्टी समाजामध्ये घडत आहेत. जाहिरातींमधून एकेकाळी फक्त स्त्रियांनाच हिणवत होते आणि सरसकट सगळ्यांना हिणवण्यात समानता आलेली आहे. वर्ण आणि जातींचा तिने लावलेला संबंधही योग्यच आहे. डोळे उघडे ठेवले असता, अशा प्रकारचं वर्तन पदोपदी दिसतं.
काळ्या-सावळ्या (किंवा गोऱ्या, पांढऱ्या) वर्णांवरून माणूस काय हे जोखू नका, व्यक्ती वर्णापेक्षा बरीच अधिक असते, ही तिची राजकीय भूमिका मला ग्राह्य वाटते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
वर्ण आणि जातींचा तिने लावलेला
हे इतके स्वयंस्पष्ट आहे का? लेखात स्पृश्य = गोरे व अस्पृश्य = काळे असे समीकरण मांडले आहे. माझ्या मर्यादित अनुभवात काही अपवाद (कोब्रा, काही तमिळ ब्राम्हण वगैरे) वगळता असे फारसे आढळले नाही.देशस्थ ब्राम्हण तर काळ्या रंगासाठी प्रसिद्ध आहेत ना?
गोरा वर्ण
देशस्थ ब्राह्मणांमध्येही 'गोरी म्हणजे सुंदर' असं मानणारे बरेच लोक आहेत. हे फक्त सौंदर्यापुरतं मर्यादित नाही. आणि गोऱ्या वर्णातही बरंच 'नॉर्मलायझेशन' होतं. भारतीय गोरा हा गौरवर्णीय लोकांसारखा गोरा नसतोच. सर्वसाधारण, भारतीय गोरा वर्ण म्हणजेही एक शेड नाही.
आमच्याकडे (ठाण्याच्या घरी) स्वयंपाकाला एक काकू येतात; गेली बरीच वर्षं आहेत. त्या गोऱ्यापान आहेत१. सुरुवातीला त्यांचं आडनाव ऐकून बऱ्याच लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. त्या आमच्या जातीच्या नाहीत, पण आमच्या जातीतल्या असल्यासारख्या दिसतात, म्हणून आम्हाला त्यांच्या हातचं खायला आवडतं, अशा थिअऱ्याही सुरुवातीला होत्या. त्याच सुमारास इमारतीतल्या आमच्या इतर 'जातभगिनींनी' त्यांना, आमच्याकडेही काम कराल का, असं विचारलं होतं. ह्या काकूंच्या आधी आमच्याकडे स्वयंपाकाला येणाऱ्या इतर कोणालाही विचारलं नाही पण ह्यांना विचारलं, ह्याचं कारण फक्त वर्ण होता हे सरसकटीकरण होईल. पण त्या गोऱ्या नसत्या तर त्यांचं आडनाव आणि जात ह्यांसंदर्भात कसून चौकशा झाल्या असत्या ह्याबद्दल मला शंका नाही.
१. म्हणून त्या स्वच्छ, चांगल्या सवयी असणारे असंही मानत असतील.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
"हा प्रकार थोडा एकमेकांची पाठ
"हा प्रकार थोडा एकमेकांची पाठ खाजवण्याचा होता" - हेच.
शो वाल्यांनी हे मुद्दाम केलं आणि ती मुद्दाम चिडली असं ही असू शकतं. कारण शो पण कोण बघत नसावं. आता निदान चार टकळी बघतील तरी.
गोरा वर्ण अमेरिकेत ही सगळ्यांना आवडतो. presidential debate मध्ये पण हा मुद्दा होता. पण इथे वर्ण वरून standup होतंच असतं. तिथं कोण बोंबा मारत नाही? का? कारण इथे विनोद आणि सत्य यात फरक आहे आणि लोकं तो बर्या पैकी समजतात. भारतात आजकाल वाईट वाटून आक्षेप घ्यायची प्रथाच झालीय.
वीर दास चे दोन tweet -
https://twitter.com/thevirdas/status/781352912651812864
https://twitter.com/thevirdas/status/781190884788346880
--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life
Let’s not allow debate about
Let’s not allow debate about what it means to be Indian to be held hostage to jingoists and bigots.
मोदीं सरकारने नुकताच The Insolvency and Bankruptcy Code, 2016 पारित करून घेतलेला आहे. परंतु त्यात "intellectual bankruptcy" ची तरतूद नाही.
रामचंद्र गुहा यांनी सत्वर "intellectual bankruptcy" फाईल करावी.
लोक Intellectual Bankruptcy
लोक Intellectual Bankruptcy साठी फाईल करायला लागले तर मोदी, जेटली, स्वराज, राहुल गांधी यांचे अर्ज प्रायोरिटीवर भरून सुनावणीला घ्यावे लागतील.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
होय होय , पण आमच्या बाणेदार
होय होय , पण आमच्या बाणेदार माजी hrd मिनिष्टरना का विसरलात बरे ?
लोक Intellectual Bankruptcy
नेहरूंचा अर्ज तर इतरांना सबमिट करावा लागेल व तो सुद्धा किमान ३० वर्षे पास्ट ड्यू असेल.
तो आता टाइम बार झाला.
तो आता टाइम बार झाला.
नेहरूंनी जे काय (अॅलेज्डली) केलं ते १९९१ साली नलिफाय झालं त्यामुळे तो अर्ज १९९१ मध्ये टाइमबार झाला.
-------------------------------------
आता खरंतर परिस्थिती वैट्ट असण्याला २०१४ पूर्वीचं कारण देणे हे सुद्धा टाइम बार व्हायला पायजे !!!
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
नेहरूंनी जे काय (अॅलेज्डली)
मग मार्क्स आणि एन्गल्स ची intellectual bankruptcy कधी फाईल करायची ?
बाहेरच्या लोकांचं आपल्याला
बाहेरच्या लोकांचं आपल्याला काय ठौक नाय !!
पण शक्यतो गब्बर सिंगच्या नंतर !! (सॉरी फॉर बीइंग पर्सनल)
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
बाहेरच्या लोकांचं आपल्याला
वृंदा करात यांनी तर अवश्य करावी - काय म्हणता ?
निफ्टी २ टक्के खाली The
निफ्टी २ टक्के खाली
The Indian Army has conducted surgical strikes crossing the Line of Control (LoC) into Pakistan Occupied Kashmir inflicting significant damage to the terrorist infrastructure across the border.
The operation took place on Wednesday night and is now over, Director General of Military Operations (DGMO) Lt General Ranbir Singh told media in New Delhi.
The operation was undertaken after Indian Army received credible intelligence that a group of terrorists were waiting along LoC to cross over to India to launch terror attacks in Kashmir and other major Indian cities.
The surgical strikes destroyed the launch pads used for infiltration and has resulted in significant casualties.
छान !!
छान !!
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हुश्श
आता अख्खा इंडिया पंप्रंवर खूश होऊन आपापलं दैनंदिन आयुष्य जगायला पुन्हा एकदा मोकळा आणि सगळे सिनिकल मोदीद्वेष्टे 'मागील पानावरून पुढे चालू' म्हणायला पुन्हा एकदा मोकळे. थोडक्यात, सगळे सुखानं नांदू लागायला मोकळे झाले.
उपसंहार : आताच एका मित्राशी वाद झाला. मी त्याला म्हटलं की strikes surgical होते हे आर्मीच सांगणार, launch pads होती आणि ती नष्ट झाली हे आर्मीच सांगणार, infiltration होत होतं हे आर्मीच सांगणार आणि significant casualties झाल्या हेसुद्धा आर्मीच सांगणार. ही आर्मी म्हणजे कोण, तर ज्यांना उरीमध्ये नुकतंच तोंडावर पडायला झालं होतं. आपली आर्मी सांगेल ते सगळं खरंच आणि पाकिस्तानी आर्मी सांगेल तो सगळा कांगावाच? हे खूप इर्रॅशनल होतंय. ह्यावर तो मला देशद्रोही म्हणाला. मी ते माझी स्तुती म्हणून घेतलं वाद संपवून परतलो, तर हे दिसलं :
इथून साभार -
असेच इर्रॅशनल लोक ऐसीवर आहेत हे दिसतं आहे
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
:-)
प्रशंसेबद्दल आभार.
आपली, π प्रेमी
३.१४
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मलाही असंच वाटतं. असं
मलाही असंच वाटतं. असं झाल्याला काहीच पुरावा दिला जात नाही. उत्तर कोरियाचा किमबाळ मध्येच त्याने न्युक्लिअर टेस्ट केली असं बोल्ला आणि सगळं जग ख्या ख्या हसलं.
अपडेट :
डॉन वृत्तपत्र चाळलं असता पाकने एका महाराष्ट्रीय २२वर्षिय जवानाला धरल्याचं जाहिर केलंय. चंदू बाबुलाल चोहान.
लोकसत्तेत मात्र हे अपडेट होऊ नये याचं आश्चर्य वाटतं.
भारतीय जवान पाकिस्तानच्या ताब्यात, ‘सर्जिकल स्ट्राईक’शी जवानाचा संबंध नाही
जवानाचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अपडेट :
लोकसत्तेने चंदू बाबुलाल चव्हाण याच्या धरपकडीमुळे त्याची आजी धक्कयाने वारली अशी बातमी दिली आहे. चंदूचं काय होईल हे देव जाणे, आजीसाठी श्रद्धांजली.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
जाड्या मुलाची चेष्टा करु नका.
जाड्या मुलाची चेष्टा करु नका. एक दिवशी सगळे जग उडवुन देइल तो चिडला तर..
ग्रेट !!
ग्रेट !!
What we know we don't know
खटाखट निरर्थक श्रेण्या देणाऱ्या ज्ञानी लोकांना जंतूकडून नम्र वगैरे विनंती की त्यांनी बीबीसी हिंदीवरची ही बातमीसुद्धा वाचावी :
सर्जिकल स्ट्राइकः हमें क्या नहीं पता
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
जंतू , अहो त्रागा करू नका .
जंतू , अहो त्रागा करू नका . rationals हे नेहमीच मायनॉरिटी मध्ये असतात . ( त्यात तुम्ही उच्च्भ्रू रॅशनल , : ) म्हणजे मायनॉरिटी मधली अजून मायनॉरिटी ) तरी तुम्ही ऐसीवर आहेत म्हणून निरर्थक वर भागलंय. लढवा जंतू , बिनधास्त लढवा तुमचा मुद्दा , हम तुम्हारे साथ है !!!! ( येउद्या ह्यालाही निरर्थक श्रेणी )
ओके
आता अख्खा जंत समुदाय पाकिस्तानवर खूश होऊन भारतावर दुगाण्या झाडायला पुन्हा एकदा मोकळा आणि सगळे सिनिकल मोदीप्रेमी 'मागील पानावरून पुढे चालू' म्हणायला पुन्हा एकदा मोकळे. थोडक्यात, सगळे सुखानं नांदू लागायला मोकळे झाले.
उपसंहार : आताच एका मित्राशी वाद झाला. मी त्याला म्हटलं की surgical strikes नव्हते हे जंतूच सांगणार, launch pads होती आणि ती नष्ट झाली हे खोटे आहे हे जंतूच सांगणार, infiltration वगैरे खोट आहे हे पण जंतूच सांगणार आणि पाकिस्तानी प्रवक्ता सांगतो तितक्याच casualties झाल्या हेसुद्धा जंतूच सांगणार. हे जंतू म्हणजे कोण, तर ज्यांना उरीमध्ये हल्ल्यामुळे आनंद झाला होता आणि surgical strikes च्या प्र्तिहल्ल्यामुळे नुकतंच तोंडावर पडायला झालं होतं ते. पाकिस्तानी पंप्र सांगेल ते सगळं खरंच आणि भारतीय आर्मी सांगेल तो सगळा कांगावाच? हे खूप इर्रॅश नल होतंय. ह्यावर तो भक्त भक्त म्हणून ओरडत सुटला. मी ते माझी स्तुती म्हणून घेतलं (स्माईल) वाद संपवून परतलो, तर पाकड्या पंप्र आणि प्रवक्त्याच विरोधाभासी वागण दिसलं.
इथून साभार.
Pakistani officials dismissed India’s claims, saying India had simply targeted military positions. Lt. Gen. Asim Saleem Bajwa, a Pakistani army spokesman, called the reports “an illusion” and “a fabrication of the truth.”
Nevertheless, Prime Minister Nawaz Sharif announced a series of high-level meetings, suggesting that Islamabad is contemplating how to respond.
असेच इर्रॅशनल लोक ऐसीवर आहेत हे दिसत
अप्पा - मधे कोणीतरी एक विदा
अप्पा - मधे कोणीतरी एक विदा शोधुन काढला होता त्याप्रमाणे ऐसी आणि पाकीस्तानी डॉन वृत्तपत्राचे बरेच वाचक् कॉमन आहेत.
हं
काही लोक "ब्रिटीश" बीबीसी सुद्धा वाचतात आणि निष्पक्ष निष्कर्ष काढायचा अल्पसा प्रयत्न करतात.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
चांगला प्रयत्न
विनोदाचा प्रयत्न चांगला आहे. त्यातच, 'सर्जिकल स्ट्राइक्स होतेच' ह्या विधानावर शंका उपस्थित करणं म्हणजे 'सर्जिकल स्ट्राइक्स नव्हते' असं सांगण्याचा अधिकार स्वतःकडे घेणं असं ज्यांना वाटत असेल, त्यांच्याविषयी आणखी काही बोलणं योग्य ठरणार नाही. बाकी ते निरर्थक वगैरे चालू द्या.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हं
विनोद करणं कठीण असतं खरं! पुढच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मूर्ख मोदी
आमच्या आजच्या मिटींगचा हा फोटो
आयला! अजून भारतातच आहात? मला
आयला! अजून भारतातच आहात? मला वाटलं कुठे पापस्थानात तर गेला नाहीत ना?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मै एक सोच हूं. एक समयपर अनेक
मै एक सोच हूं. एक समयपर अनेक जगहोंपर रहता हूं.
शी! ब्वॉ असले फोटो टाकू नका,
शी! ब्वॉ असले फोटो टाकू नका, ऑफीसातून मग ऐसी उघडताना पंचाईत होते.
शी! ब्वॉ असले फोटो टाकू नका,
मिटिंग मध्ये स्क्रीन शेअर करताना उघडलात कि काय...
--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life
हाहाहा नाहीपण आज माझा
हाहाहा नाही
पण आज माझा डेस्क्टॉप शेअर करत होते एकाबरोबर आणि ऐसीचं पान उघडलं चुकुन
पण त्यावर काही नव्हते म्हणजे आक्षेपार्ह
Let this be the beginning of
Let this be the beginning of the end of ....
भारताने CWC (केमिकल वेपन्स कन्व्हेन्शन) मधून बाहेर पडावे व पाकिस्तानवर रासायनिक अस्त्रांचा मारा करावा आणि क्रौर्य हे अत्यंत सुंदर व चिरंतन मूल्य आहे हे जगाला दाखवून द्यावे.
भारतीयांनी पाकिस्तानच्या बाबतीत बोलता-वागताना Jingoism ला नॅशनॅलिझम च्या डिबेट च्या केंद्रस्थानी नेऊन ठेवावे.
मुख्य म्हंजे दरवेळी विकास, शेतकरी, संडास, पाणी, आरोग्य हे मुद्दे मधे आणून भारतीय राजनीतीतील निर्णायकतेला पायात पाय घालून पाडण्याचा उपद्व्याप करणार्या रामचंद्र गुहांसारख्या अकलेच्या खंदकांना बाजूला सारून समस्या सोडवण्याच्या दिशेने सत्वर मार्गक्रमणा व्हावी.
क्रौर्य हे अत्यंत सुंदर व चिरंतन मूल्य आहे
This level of idiocy is amazing (I know it has classical and modern "aesthetic" support too. )! Do join the ISIS (The recently killed people by dipping them alive in acid!)! Please take this with the same level of seriousness as you take your own statements!
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
Please take this with the
म्हणूनच मूल्य हा शब्द वापरला.
--
ये जो घांव है सीने पे ... ये घांव नही .. फूलोंके गुच्छे है
हमे पागल ही रहने दो ... हम पागल ही अच्छे है ____ (रामप्रसाद बिस्मिल)
My bad!
This level of idiocy is amazing
Sorry! Un-parliamentary use! My bad!
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
Sorry! Un-parliamentary use!
मी तर परवापासून ३ एक प्रतिसादांना मागे घेतलय. आणि उरलेल्या प्रतिसादांविषयी मनातल्या मनात पश्चात्ताप करते आहे. असं अचानक का होतय कळत नाहीये. पण (माझी) अत्यंत चूकीची विधाने होतायत.
पण तुम्ही ते विधान मागे घेतलत हे बरे झाले. आदर दुणावला.
आभार.
वादाच्या भरात व्यक्तिगत स्वरूपाची विधानं होतात; त्याबद्दल खेद व्यक्त केलात हे उत्तम.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
Sorry! Un-parliamentary use!
नाय नाय.
मला अजिबात वाईट वगैरे वाटलं नव्हतं बर्का. सिरियसली.
नमस्ते ट्रोलिन्दराव
तुमचा सपोर्ट असलेल्या ऑर्गनायझेशनचा असा प्रचार पाहून भडभडून आले.
-ट्रोलमॅन.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
"आम्हीच " आयसिस निर्माण केली !
अर्थातच ! आधी असाद चा, मग इराणचा, मग सौदी अरेबियाचाही पाडाव करण्यासाठी "आम्हीच " आयसिस निर्माण केली !
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
वा वा वा
मौलवीपेक्षाही अधिक जोराने ओरडणार्या नवप्रविष्टाची आठवण झाली.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
+१
तुमच्यातला छुपा फडतूसवादी आणि गुहासमर्थक असं उपरोधाने म्हणतोय असं वाटतं गब्बरभाऊ!
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
+१
तुमच्यातला छुपा फडतूसवादी आणि गुहासमर्थक असं उपरोधाने म्हणतोय असं वाटतं गब्बरभाऊ!
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
Humour: Facebook wall of
Humour: Facebook wall of Nawaz Sharif after Indian army's surgical strikes in Pakistan
मस्त.
--
हा NBC News मधला लेख वाचनीय, लक्षणीय आहे
--
Indian Surgical Strikes Against Terrorists in Pakistan: What We Know, What We Don’t Know - हा लेख पण लक्षणीय आहे.
Brilliant brinkmanship by Modi!
Brilliant brinkmanship by Modi. Pakistan cannot use its nuclear weapons until it feels an "existential threat" by India. And China will never allow such a threat by India to develop. So "pinprick" attacks from the Indian side can also take place.
Pakistan can also be killed by a thousand small strokes, like their plan for India.
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
Pakistan cannot use its
हे कुठून आलं?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
मला वाटतं मिलिंद यांना
मला वाटतं मिलिंद यांना म्हणायचय की कॉमन सेन्स आहे की existential threat असल्याखेरीज कोणीही न्युक्लिअर वेपन वापरु नये.
.
पण पाकिस्तानचा आणि कॉमन सेन्स चा काय संबंध ते कळलं नाही
पाकिस्तानचा आणि कॉमन सेन्स चा काय संबंध ते कळलं नाही
Joke well-taken. On a serious note: हा संबंध असा की आण्विक युद्धात पाकिस्तानचे एक-सव्वा कोटी लोक मरतील (भारताचेही तितकेच), आणि किरणोत्सर्गामुळे नंतर शेकडो वर्षे पाकिस्तानात मानवी आयुष्य अशक्य होईल हे सर्व दोन्ही बाजूच्या संरक्षण-विषयक नियतकालिकात मांडले गेले आहे .
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
हे कुठून आलं? तुमच्या
तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतोय असं नाही.
पण इथे जरा नजर टाकलीत तर ... दिशा मिळू शकेल.
"a few loonies on your own side!"
See, "Short, gaunt and tweedy" people agree with brinkmanship. Great link!
People used to say about Chenney -Rumsfeldt that you need "a few loonies on your own side!". India has now shown that it has Modi and Dowal.
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही बॉम्ब बनवायला घेतले
तशा अर्थाने पाहायला गेले तर पाकिस्तानला भारताची कायमच भीती वाटत आली आहे, आणि बांगलादेश निर्मितीनंतर ती वाढली आहे. त्यामुळे ते निम्मे-अधिक सैन्य भारताच्या बाजूला ठेवतात (आणि मग अफगाण/पाक तालिबानबरोबर "पुरेसे" न लढल्यामुळे अमेरिकेचा रोष ओढवून घेतात ). भारताच्या "अखंड भारतवाद्यांच्या" विधानांमुळे याला पुष्टीही मिळत राहते. पण भारताने सर्व सैन्य एकवटून जर हल्ला केला तर एक-दोन दिवसात संबंध पाकिस्तान भारत जिंकून घेऊ शकतो . असा हल्ला होणे म्हंणजे 'अस्तित्वालाच धोका" असा (खरा) अर्थ असू शकतो . भारताने अणुस्फोट केल्यावर लगेच त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही बॉम्ब बनवायला घेतले तेंव्हा त्या कार्यक्रमाला अमेरिकेच्या आक्षेपांना पाकिस्तानने हे उत्तर दिले होते.
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
"एक दिवस सिंह म्हणून
खाली पहा.
-
असे केल्यास भविष्यातील सर्व दिवस भारत सिंह म्हणून जगू शकतो.
brinkmanship ला मराठी शब्द काय?
मोठमोठे गुर्जी लोक? Anyone?
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
भाईबाजी?
भाईबाजी?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
मुसलमान आपले कसे ?? -
मुसलमान आपले कसे ?? - शिवसेनेचा मोदींना सवाल.
बाळासाहेबांना 'जात्यंध
बाळासाहेबांना 'जात्यंध मुसलमान' असा भेद करायचं भान होतं.
शिवसेनेचं सद्यनेतृत्व काहीही अचाच्यापच्या बोलतं....
साबीरदादा शेख कोण होता, आपला की परका?
आम्हालातरी तो 'आपला' होता...
How did these Ancient Roman
How did these Ancient Roman coins get to JAPAN? Artefacts are found thousands of miles from where they were made
बॅटू, ऐकतोयस ना रे !!!
.
.
ऐला बघतोच थांब गब्बर.
ऐला बघतोच थांब गब्बर. (गब्बु?)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सोपे उत्तर!
ही ओरिजिनल थियरीच तथ्याच्या अधिक जवळ असण्याची शक्यता अजूनही वाटत नाही काय?
बोले तो...
...एखाद्या हौशी अमेरिकन सोल्जराने समजा ईबेवरून ती नाणी विकत घेतली. (ईबेवर आजकाल काय वाट्टेल ते मिळते!) नंतर ती त्याच्या खिशात तशीच राहिली. मग पुन्हा कधीतरी तो क्यासलावर हिंडावयास गेला असता, त्याचा खिसा फाटका असल्याकारणाने (कोण म्हणतो अमेरिकन सोल्जर अत्यंत हँडी असतात, त्यांना शर्टाच्या बटणांपासून विजारीच्या फाटक्या खिशापर्यंत काय वाट्टेल ते शिवता येते, म्हणून? गेऽले ते दिवस!) त्याच्या खिशातून ती पडतपडत इतस्ततः विखुरली, आणि याच्या ते लक्षातही आले नाही.
किंवा, थोडेसे कॉन्स्पिरसी थियरीत शिरायचे तर: त्याची 'ब्याक होम' राहिलेली बायको आर्कियॉलॉजिष्ट असून, तिच्यावरील खुनशीपायी, दुनियेतील तमाम आर्कियॉलॉजिष्टांचा वचपा काढण्यासाठी त्यानेच ती स्वतः होऊन इतस्ततः विखुरली. (किंबहुना, त्यासाठीच ईबेवरून विकत घेतली होती!)
list of academic and
list of academic and intellectual Trump supporters.
-
Wall Street ला ट्रंप बद्दल काय वाटते ? - एका शब्दात सांगायचं तर : भीती.
( हॅ, यात काय नवीन आहे ? )
--
ट्रंप ने आज कळस गाठलेला आहे : Trump Admits He Found 12-Year-Old Paris Hilton Attractive
Google Science Fair 2016
https://www.googlesciencefair.com/en/
_____
सर्वच प्रकल्प रोचक आहेत पण खालील तीन्ही प्रकल्प मला जास्त आवडले.
____
मेंदू आणि पॅरॅलिसिस शी संबंधित पुढील प्रकल्प आवडला-
ExoHeal: Utilizing neuroplasticity to provide rehabilitation to stroke patients and cure hand paralysis.
https://www.googlesciencefair.com/projects/en/2016/de9d8ce2661f353bbeb0d...
___
फुफ्फुसाच्या कर्करोगाशी संबंधित हा देखील - https://www.googlesciencefair.com/projects/en/2016/3d61667652086ad724b4b...
____
सॅनिटरी नॅपकिन्स शी संबंधित-
https://www.googlesciencefair.com/projects/en/2016/f928983e761e6d3c10b2b...
पाकिस्तानचा सूर थोडा बदलतोय
पाकिस्तानचा सूर थोडा बदलतोय..वाचा त्यातल्या त्यात सेंसिबल असलेल्या द डॉन चे हे आजचे संपादकीय.
शेवटी कबूल केलं:
पाकिस्तानी लोक सशस्त्र संघर्षाला इतके का घाबरतायत?:
अवांतर: अखलाख, रोहित वेमुला,असहिष्णुता आदींवर मेगाबायटी प्र्तिसादांची घनगंभीर महापूरी चर्चा करणारे धागे ऐसीचे भूषण असताना ,'सर्जिकल स्ट्राईक'च्या घटनेवर मात्र एकही स्वतंत्र धागा दिसला नाही हे अंमळ रोचक वाटले (माझ्या नजरेतून सुटला असल्यास माफी असावी). म्हणजे ही घटना किरकोळ आहे की बोलणार्यांची बोलती बंद झाली आहे हे या अज्ञास न कळे.
येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक
अहो सर, सर्जीकल स्ट्राईक
अहो सर, सर्जीकल स्ट्राईक झालंच नाही तेव्हा चर्चा कशी आणि कशाची करणार?
-अनामिक
हे माहीतच नव्हतं !
हे माहीतच नव्हतं !
पण चर्चा करण्यास काय हरकत आहे? अहो, सूट नक्की किती लाखाचा होता यावर चर्चा करता येते, अखलाखच्या घरात नक्की बीफ होतं की नव्हतं हे माहीत नसताना त्याचा खून होतो, रोहित वेमुला नक्की दलित होता की नव्हता याबद्दल संशय असताना दलितदमनाच्या चर्चा करता येतात मग आमच्या 'सर्जिकल स्ट्राईक'च्याच नशिबी हा पुरोगामी उपेक्षेचा अंध:कार का?
पर्सेप्शन महत्वाचं पर्सेप्शन !
येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक
ए ए वाघमारे यांना (किंवा
ए ए वाघमारे यांना (किंवा इतरही कोणाला) सर्जिकल स्ट्राइकवर धागा काढण्यास ऐसीवर बंदी घातली आहे असं ऐकलं नाही.
ऐसीच्या धोरणातपण तसं काय दिसत नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
बरं..
बरं..
कार्यबाहुल्यामुळे सध्या वेळ नाही.संधी मिळताच धागा काढेन.
अवांतर: तसंही मी आजकाल सामाजिक-राजकीय विषयांवर लिहिण्याचे टाळतो.त्यामुळे माझ्या इतर ललित लेखनावर परिणाम होतो असं निरीक्षण आहे.
बाकी अवांतरवरुन आठवलं,मुख्य विषय सोडून अवांतरवरच चर्चा चाललीय. आपणही टीव्ही डीबेटच्या दिशेने जात आहोत काय?
येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक
काय सर, तुम्हांला विचारजंती
काय सर, तुम्हांला विचारजंती अल्गोरिदम माहीत नाहीसं दिसतं.
हिंदू धर्म, भारतीय राष्ट्र आणि आजकाल मोदी यांची शक्य तितकी टवाळी करायची, श्रेय देतानाही असे कुरकुरत द्यायचे की न दिल्यापैकीच. शबरीमलाबद्दल गदारोळ उठवायचा पण हाजी अलीबद्दल गुळणी धरायची, फारच हटकले तर "हो, त्या आंदोलनालाही आमचा सपोर्ट आहे" असे तोंडदेखले एक वाक्य फेकायचे. बलुचिस्तानमध्ये भारताची इन्व्हॉल्व्हमेंट होती असं सुचवायचं (तो फार मोठा अपराध असल्याच्या थाटात) आणि उघड काही केले (उदा. हा सर्जिकल स्ट्राईक) की ते नाकारायचे. भारतीय आर्मीपेक्षा पाकी आर्मीवर जास्त विश्वास ठेवायचा. त्यांना असलेला मानवतेचा पुळका हा भारतीय आर्मी आणि काश्मीर सोडून उरलेल्या भारतीयांकरिता अस्तित्वातच नसतो. उद्या दिल्लीवर हल्ला झाला तरी सेलिब्रेट करू शकतील ही मंडळी- "पाकिस्तानला इतकं डिवचलं तर असंच होणार" छाप. अफजल गुरूच्या फाशीला झालेला विरोध हे त्याचेच उदा. व्हेअरअॅज़ आतंकवाद्यांना मारताना मात्र मानवता आठवते.
तर अशा अल्गोरिदमची झलक इथे दिसते, मग यात आश्चर्य ते काय? शिवाय इथे शब्दात कुणी अडकणार नाही. "कोण बंदी घातलीये" असं विचारून उपेक्षेने मारतील.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बॅटमॅन , तू प्रखर आणि स्पष्ट
बॅटमॅन , तू प्रखर आणि स्पष्ट शब्दात जो अल्गोरिथम मांडला आहेस, तो अस्तित्वात आहेच. सांप्रतकाळी हा अल्गोरिथम लोकप्रिय आहे का याच्या बरोब्बर उलटा अल्गोरिथम ? (लोकप्रियता हि साधारणपणे पेपरातून येणारे लेख ( बातम्या नाही), tv वर चालणाऱ्या चर्चा , व्हाट्स अँप वर येणारे फॉर्वर्डस यातून मी मोजतो .) त्यात मला वेगळे चित्र दिसते काय वाटतं तुला ?( मी यांच्यात बरोबर का चूक या चर्चेत पडत नाहीये , त्यावर वेगळी sarcasm , खवचट पणा बाजूला ठेवून चर्चा होऊ शकते)p s खवचट पणा , sarcasm हे तुला उद्देशून नाहीये. गैरसमज नसावेत.
CPIM leader Sitaram Yechury
CPIM leader Sitaram Yechury said, "We think that there should be no further escalation (between India and Pakistan)."
ब्याटू, तुझ्या अल्गोरिथम प्रमाणेच आहे असं दिसतंय ...
क्या बात.
क्या बात.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बाकी असो, पण...
कृपया भारतीय आर्मीवर अविश्वास = पाकी आर्मीवर (ऑपॉप) विश्वास या गृहीतकामागील आधार समजू शकेल काय?
किंबहुना, विथ रेफरन्स टू डिफरंट काँटेक्ष्ट्स, पाकी आर्मी ही (१) एक विनोद, (२) देशद्रोही (होय, अगदी पाकिस्तानाससुद्धा!), (३) स्वार्थी, (४) अविश्वासार्ह, (५) अमानुष, (६) घातकी, (७) एकंदरीतच हरामखोर, (८) दुश्मनाससुद्धा लखलाभ होण्याची दुरिच्छा न करण्यालायक आणि (९) आपल्याला हवे ते आणखीही एखादे (कोणतेही) कुविशेषण (इन्क्लूडिंग 'वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, दुष्ष्ष्ष्ट!!!!!!') लागू करण्यालायक आहे, हे सर्व आगाऊ मान्य आहे. (किंबहुना, आपण भारतीय लोक नालायक आहोत, आपले राजकारणी एकजात नालायक आहेत, तस्मात आपल्याला लोकशाही नकोच, मिलिट्री रूलच आपल्या देशासाठी बरा, असा विचार मांडणारा एक बर्यापैकी मोठा काँटिंजण्ट आपल्या देशबांधवांत - बहुधा उजव्या विचारसरणीकडे झुकणार्या गोटांत - आढळतो, त्यांच्याकरिता बोटे दाखवण्याकरिता आम्हांस पाकी आर्मी ही अतिशय उपयुक्त ठरते, की बाबांनो, मिलिट्री रूलची एक भली मोठी सक्सेस ष्टोरी आपल्या शेजारी नांदते आहे; वारंवार मिलिट्री हस्तक्षेपाने त्या देशाचा जो काही एक - तमाम स्त्रियांची आणि स्त्रीवाद्यांची शब्दयोजनेकरिता आगाऊ क्षमा मागून - भला मोठा योनिमार्ग झालेला आहे, तसला योनिमार्ग आपल्या भारतमातेचा बनवायचा आहे काय? मग त्यापेक्षा जावा की पाकिस्तानात! आमची लोकशाही जी काही ओबडधोबड, अकार्यक्षम, अगदी भ्रष्टसुद्धा आहे, ती त्यापेक्षा बरीच बरी आहे, आणि इव्हॉल्व्हिंग आहे, (आजचे सरकार नॉटविथष्ट्यांडिंग - आणि हा शब्दप्रयोग कालनिरपेक्षतः लागू व्हावा!) आज ना उद्या ना परवा म्याच्युअर होईल, होते आहे. वगैरे वगैरे. परंतु हे विषयांतर झाले. असो.) पण म्हणून भारतीय (किंवा फॉर द्याट म्याटर कोठल्याच) आर्मीवर डोळे झाकून शंभर टक्के विश्वास ठेवलाच पाहिजे काय? आणि त्यांची सर्वच वक्तव्ये (आणि भारतीय आर्मी ही सिव्हिलियन सरकाराच्या पूर्णपणे अधीन आहे ही बाब लक्षात घेता - विच, बायदवे, इज़ अॅन एसेन्शियली गुड थिंग! - पर्यायाने भारतीय सरकारची (किंवा, फॉर द्याट म्याटर, कोणत्याही सरकारची) सर्वच वक्तव्ये) ही लवणस्फटिकन्याय न लावता घेताच येऊ नयेत काय?
बलुचिस्तानात जर भारताची इन्व्हॉल्व्हमेंट असेल, तर त्यात नेमके वाईट काय आहे? किंबहुना, अन्यथा रॉवाल्यांना भारतीय करदाते जे पोसतात (चूभूद्याघ्या१), ते नेमके कशासाठी? ती काय शोभेची संघटना / पांढरा हत्ती आहे काय?
किंबहुना, बलुचिस्तानात जर रॉचा हात खरोखर असेलच, तर ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. (रॉ कार्यक्षम असण्याचेच ते द्योतक आहे.) फक्त, हे (तूर्तास तरी) (उघड का होईना, पण) गुपितच असणे इष्ट असावे. (कोणतीही गुप्तचरसंघटना "आम्ही हे असे असे करतो बुवा" असे - लोहा गर्म असताना तरी - उघडपणे मान्य करेलसे वाटत नाही. प्लॉझिबल डिनायेबिलिटीस बाधा आणणे इष्टकार्याच्या सिद्धीकरिता इष्ट नसावे. पुढेमागे अनेक वर्षे उलटून गेल्यानंतर प्रकरण डीक्लासिफाय झाल्यानंतर गोष्ट वेगळी.)
परंतु ते असो. बलुचिस्तानात भारताची इन्वॉल्व्हमेंट आहे असे सुचविण्यामागे एसेन्शियली अॅझम्प्शन ऑफ गिल्टचीच भावना असते, या गृहीतकामागील आधार समजू शकेल काय?
भारताने खरोखरच सर्जिकल स्ट्राइक केला असेल, तर ते उत्तमच आहे.
मात्र, केवळ भारतीय आर्मी (किंवा भारत सरकार) घोषित करते, म्हणजे सर्जिकल स्ट्राइक प्रत्यक्षात घडलाच, असेही निदान मी तरी ऑपॉप मानणार नाही. (पाकी आर्मी 'असे काही घडलेच नाही' म्हणते, म्हणून ते घडलेच नाही, असेही ऑपॉप मानणार नाही. त्यांना ते नाकारण्यासाठी काही ऑबव्हियस किंवा कदाचित नॉट-सो-ऑबव्हियससुद्धा कारणे असू शकतात. ऑन द अदर ह्यांड, सर्जिकल स्ट्राइक न करतासुद्धा ते केले म्हणून घोषित करण्यामागे भारतीय आर्मीस किंवा सरकाराससुद्धा काही लेजिटिमेट स्ट्रॅटेजिक कारणे असूही शकतात. आय मे नेव्हर नो अँड आय नीड नॉट नो.) फक्त, भारतीय आर्मी आणि सरकारने मिळून जे काही योग्य ते केले असेल, एवढा विश्वास आहे, एवढेच म्हणू शकतो.
मानवता बी ड्याम्ड. व्हॉटेव्हर इज़ गोइंग ऑन जष्ट डझण्ट मेक गुड ऑप्टिक्स. आणि वर शत्रुपक्षास आपण होऊन प्रॉपगांडा मटीरियल पुरविल्यासारखे होते. स्वतःच्या पायावर स्वतःच्याच हाताने धोंडा पाडून घेतल्यासारखे होते.
लाइक इट ऑर नॉट, पण भारताचा कश्मीरबद्दल काहीही ष्ट्यांड असला तरी - आणि हौएव्हर जष्टिफाइड द्याट ष्ट्यांड मे ऑर मे नॉट बी, आणि हौएव्हर डिसइण्टरेष्टेड द रेष्ट ऑफ द वर्ल्ड विथ द एक्सेप्शन ऑफ पाकिस्तान अँड परहॅप्स चायना (औट ऑफ व्हेष्टेड इंटरेष्ट्स) मे बी इन द म्याटर ऑन द होल - जेव्हा जमावावरील छर्र्यांच्या गोळीबारात जमावाचे डोळे फुटतात, आणि त्याची चित्रे जगजाहीर होतात, तेव्हा बाहेरच्या जगाला फक्त भारतीय सैन्य हे अॅट बेष्ट ऑक्युपाइड जनतेवर आणि अॅट वर्ष्ट आपल्याच जनतेवर अत्याचार करताना दिसते. व्हॉटेव्हर द प्रोव्होकेशन, जमावावर - आणि त्यातही आपल्याच देशाचा भाग ज्याला आपण मानतो, त्याच्या रहिवाश्यांवर, पर्यायाने बाय अवर ओन अॅडमिशन आपल्याच सहनागरिकांवर - गोळ्या (अगदी छर्र्याच्यासुद्धा) घालणे हे योग्य की अयोग्य - वन क्यानॉट कंडेम डायर ऑर ईव्हन मोरारजी व्हाइल कंडोनिंग धिस - वगैरे 'आमचे' 'लेफ्टिष्ट' 'मानवतावादी' मुद्दे वगैरे तूर्तास सोडून देऊ. परंतु बाहेरच्यांच्या दृष्टिकोनातून हे फारच आणि उघडउघडपणे वाईट दिसते. आणि, माइंड यू, minding one's own business may not be an Indian virtue, but nor is it considered to be such in international politics. आणि, कश्मीरमध्ये भारताची पोझिशन तशीही प्रिकेरियस असताना (बोले तो, धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, आणि मुळात सोडायचेही नाहीये आणि कशासाठी सोडायचे?), ही आणखीची विकतची कटकट कोणास नि कशासाठी हवीय?
लक्षात घ्या. इस्राएलच्या मागणीचा नि हिटलरने केलेल्या ज्यूंच्या छळाचा नि हत्याकांडाचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. ती मागणी त्याच्या खूप आधीची, जवळपास पहिल्या महायुद्धाच्या आजूबाजूची तरी आहे. परंतु त्या मागणीस जगात कोणीही फारशी भीक घालत नव्हते. (किंबहुना, पॅलेस्टाइनमध्ये येनकेनप्रकारेण ज्यूइश राष्ट्र स्थापन करायचे, अशी कल्पना डोक्यात असलेल्या काही युरोपीय ज्यूइश टोळ्यांनी दोन महायुद्धांमधील काळात ब्रिटिशांच्या म्याण्डेटाखाली असलेल्या पॅलेस्टाइनमध्ये शिरून पॅलेस्टाइनमध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट वगैरे करणे आणि एकंदरीतच ब्रिटिशांचे पॅलेस्टाइनमधून उच्चाटन करायचा प्रयत्न करणे वगैरे उद्योग चालवले होते. आणि, माइंड यू, हिटलर युरोपातून ज्यूंना हुसकावून लावतोय - तोपर्यंत हत्याकांडास सुरुवात झालेली नव्हती - म्हणजे त्याला फक्त जर्मनीत किंवा युरोपात ज्यू नको आहेत, आणि तो इंग्रजांच्या विरोधात आहे, म्हणजे तो पॅलेस्टाइनमधून इंग्रजांना हुसकावून लावण्याच्या आणि तेथे ज्यूइश राष्ट्र स्थापन करण्याच्या आपल्या योजनेस अनुकूल असेल, कारण युरोपातील ज्यूंना निघून जाण्याकरिता एक स्थान मिळाल्याकारणाने ते युरोपातून आपसूक निघून जाऊन तसेच इंग्रजांच्या हातून पॅलेस्टाइन गेल्याने इंग्रजांचे - पर्यायाने हिटलरच्या शत्रूचे - नुकसान होऊन हिटलरची दोन उद्दिष्टे एकहाती साध्य होऊन त्याचा दुहेरी फायदा होईल, अशा काहीतरी खुळचट कल्पनेखाली त्यांनी हिटलरची - आ ला बोस - मदतसुद्धा मागितली होती. हिटलरने त्यांना भीक घातली नाही ही बाब अलाहिदा. परंतु ते एक असो. सांगण्याचा मुद्दा, पॅलेस्टाइनमध्ये जे स्थानिक ज्यू थोडेफार होते, (१) त्यांच्या डोक्यात पॅलेस्टाइनमध्ये ज्यूंचे राष्ट्र स्थापन करण्याबाबत विचार नव्हते, किंबहुना त्याबद्दल त्यांना काही देणेघेणेही नव्हते, आणि (२) इन्सिडेंटली, त्यांचे स्थानिक अरबांशी संबंधही वाईट नव्हते. ही सगळी या युरोपातून येऊन उद्योग करणार्या बाहेरच्या मंडळींची - युरोपीय ज्यूंची - करामत. गरजूंनी स्टर्न ग्यांग, किंग डेव्हिड हॉटेल बॉम्बिंग आदि गुगलून पाहावे. तर तेही एक असो.) परंतु हिटलरच्या उद्योगांमुळे या 'कॉज़'ला अचानक जागतिक सहानुभूती आणि पाठिंबा मिळून इस्राएलची स्थापना होणे शक्य झाले. (या नात्याने हिटलरला इस्राएलचा राष्ट्रपिता घोषित करून इस्राएली सरकार त्याच्या सन्मानार्थ गेला बाजार एखादे पोष्टाचे तिकीट काढण्याचा गंभीरपणे विचार करेल काय?)
असो.
----------
१ बोले तो, रॉचे फंडिंग नेमके कोठून येते, याबाबत मला खात्रीशीर माहिती नाही. परंतु, रॉवाले गर्लस्कौटकुक्या विकून आपल्या संघटनेचा खर्च आणि आपापला उदरनिर्वाह निभावत असावेत, यावर निदान माझा तरी विश्वास नाही. परंतु माझे एक असो.
श्रीगुरुजी या आय डी ने खूप
श्रीगुरुजी या आय डी ने खूप लॉजिकल आणि मस्त उत्तरे देऊन चौफेर दांडपट्टा फिरवुन सर्वांना इथे गारद केलेले होते. शेवटी शेवटी लोक चूक मान्य न करता वैयक्तिक होऊ लागलेले मला आठवते.
शेवटी शेवटी लोक चूक मान्य न
तोही अल्गोरिदमचाच भाग बरं!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
काय सर, तुम्हांला विचारजंती
काय सर, तुम्हांला विचारजंती अल्गोरिदम माहीत नाहीसं दिसतं
अगदी अगदी.
एकंदरीत विचारजंती 'राजा भिकारी, माझी टोपी घेतली' ता गोष्टीतल्या उंदराच्या भूमिकेत आहेत असे वाटते.
निव्वळ उपद्रव मूल्य मिरवणारे लोक असेही म्हणता येईल.
>>आमच्या 'सर्जिकल
>>आमच्या 'सर्जिकल स्ट्राईक'च्याच नशिबी हा पुरोगामी उपेक्षेचा अंध:कार का?
पर्सेप्शन महत्वाचं पर्सेप्शन !
आता अनु राव तर नक्कीच पुरोगामी विचारजंत नाहीत.
पण त्यांच्या या विषयाच्या प्रतिसादाचं पहिलं वाक्य निफ्टी कोसळला असं सांगणारं !!!
आणि मी त्या प्रतिसादाला छान असा प्रतिसाद दिलाय त्याला खवचट अशी श्रेणी दिली आहे कोणीतरी.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
येस थत्ते चाचा. माझ्या साठी
येस थत्ते चाचा. माझ्या साठी पहिली बातमी आनंदाची होती. रादर निफ्टी का अचानक पडला म्हणुन बघायला गेले तर ही बातमी दिसली. दुसरी बातमी अगदीच सो सो होती.
दोन्ही लगेच शेअर केल्या.
-------
मोदींनी सर्वच फ्रंटवर निराशा केली आहे हे मी अनेक वेळेला लिहीले आहे. असल्या छूट-पुट कारवाईने काही फरक पडणार नाही.
पण
महत्वाचे म्हणजे जेंव्हा मत द्यायची वेळ येइल तेंव्हा मोदींना दुसरा पर्याय दिसत नाही. प्लिज नोट २०१४ मधे मी केजरीवालांच्या आप ला मत दिले होते संसदे साठी. पण आता तो चॉइस पण उरला नाहीये.
काहीही झाले तरी मी कार्तीचा बाप चिदु आणि सिब्बल पुन्हा सत्तेवर येतील असे मतदान करणार नाही.
चिदू वॉज व्हेरी गुड फायनान्स
चिदू वॉज व्हेरी गुड फायनान्स मिनिस्टर (अॅण्ड बॅड होम मिनिस्टर).
त्यांच्या पहिल्या टेन्युअरमध्ये (देवेगौडा-गुजराल) टॅक्स रेट एकदम खाली आणण्यात आले.
http://forbesindia.com/article/independence-day-special/economic-milesto...
As part of a slew of measures, the FM reduced personal income tax rates from 40 percent to 30 percent and cut corporate tax rates, including doing away with surcharge and bringing down royalty rates. He increased the limit of FII investment and laid the ground for the first round of disinvestment in PSUs. Import duty on many products saw a steep cut as well.
त्याचप्रमाणे यूपीए१ मध्ये त्यांचा परफॉर्मन्स उत्तम होता. यूपीए२ मध्ये राष्ट्रपती होईपर्यंत ओल्ड स्कूलवाले प्रणव मुखर्जी अर्थमंत्री होते. त्यानंतर चिदंबरम पुन्हा अर्थमंत्री झाले. त्यांनी अर्थव्यवस्था बरीच रुळावर आणली होती. पण एकूण यूपीएविरोधातल्या गदारोळात हे लपून गेले.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
चिदू वॉज व्हेरी गुड फायनान्स
हे तुमचे मत झाले थत्तेचाचा. माझ्या मते चिदु हा अतिशय भ्रष्ट, नीच, स्वार्थासाठी काहीही करु शकणारा अनैतिक माणुस आहे. हुच्चभुभुंसारखा शिकलेला असल्यामुळे मोठेमोठे पण अतिनिरर्थक बोलतो.
>>माझ्या मते चिदु हा अतिशय
>>माझ्या मते चिदु हा अतिशय भ्रष्ट, नीच, स्वार्थासाठी काहीही करु शकणारा अनैतिक माणुस आहे.
सुब्बु ट्राइड हिज बेस्ट टु फ्रेम हिम......
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
कार्ती चिदंबरमवर चालू आहे
कार्ती चिदंबरमवर चालू आहे खटला अजून.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
(No subject)
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अहो सर, सर्जीकल स्ट्राईक
(१) सर्जिकल स्ट्राईक झालाच नसेल आणि मोदींनी थाप मारली असेल तरी ते मोदींच्या फॉरिन/सिक्युरिटी पॉलिसीचे यश म्हणावे लागेल. खरी मजा इथे आहे.. पाकिस्तान सरकारला त्यांच्या व आंतरराष्ट्रीय मिडियाला एलओसी वर घेऊन घेऊन जावे लागले. व सिद्ध करायचा यत्न करावा लागला. पाकिस्तान बॅकफूट वर आला. यापुढे पाकिस्तानला मिडियाच्या लोकांना धमकावणे हे पाकिस्तान ला कितपत परवडेल ?? यापुढे एलोसी च्या आत भारतीय सैन्न्याने कोव्हर्ट/ओव्हर्ट कारवाया केल्या तर काय होईल ?
(२) आता यापुढे भविष्यात भारतीय सेनेने पाकी हद्दीमधे घुसुन हल्ला केला व आम्ही हल्ला केलाच नाही असं सांगितलं (आणि पाक ने प्रत्युत्तर म्हणून हल्ला केला) तर काय होईल याचा विचार करा. पाकिस्तानने भारतीय हल्ला झाला म्हणून आम्ही त्यांच्यावर हल्ला केला असं पाक ने सांगितलं तर त्यांना ते सिद्ध करावे लागेल.
(३) हा सगळा उपद्व्याप कशासाठी ?? कारण एकच - पाकिस्तान हे अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे व त्यांची अण्वस्त्र धोरणं uncertain and unpredictable आहेत म्हणून. (वेगळ्या शब्दात - पाकिस्तान हे Irrational धोरणे राबवणारे राष्ट्र आहे म्हणून.)
--
This isn't a blockade. This is President Kennedy communicating with Secretary Krushchev. This is a new language, the light of which the world has never seen. _____ Robert McNamara (During Cuban Missile Crisis (Oct 1962))
कदाचित सैन्याकडून केली जाणारी
कदाचित सैन्याकडून केली जाणारी "रूटीन कारवाई" म्हणून धागा काढला नसेल.
अखलाक (किंवा अन्य कोणाला) बीफच्या संशयाने ठार मारणे ही त्यावेळपर्यंततरी "रूटीन घटना" नव्हती. आता कदाचित ती रूटीन घटना असेल.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
वाघमारे यांचे नीरीक्षण पटले.
वाघमारे यांचे नीरीक्षण पटले. गेल्या वेळेस रेड बुल यांनी सेम नीरीक्षण नोंदवले होते. पण मला तेव्हा कॉन्टेक्स्ट नीट कळला नव्हता.
राष्ट्रप्रेम किती प्रामाणिक?
असल्या आक्षेपांना उत्तरं देण्याची आवश्यकता वाटणं थोडं मजेशीर वाटतं; ते ही स्वप्न, बॅटमॅन ह्यांना. (कारण त्यांचा ऐसीवर चिकार वावर असतो.) नितिन थत्ते आणि 'न'वी बाजू ह्यांनी पुरेशी उत्तरं दिलेली आहेतच. पण तरीही पुन्हा एकदा, असे धागे काढायला कोणालाही मनाई नाही, तरीही आपण स्वत: धागा न काढता इतरांना नावं ठेवणं, ह्यात ट्रोलिंग वगळता अन्य काही हेतू दिसत नाही.
त्यातही एरवी उजवी, राष्ट्रवादी विचारसरणीचा पुरस्कार करणार्यांनी सैन्याच्या कारवाईबद्दल आनंद व्यक्त करण्याऐवजी इतरांवर (किंवा 'इतरां'वर) चिखलफेक करणे आणि/किंवा नावं ठेवणे हेच कार्यक्रम पाहता त्यांच्या राष्ट्रप्रेमाच्या, विचारसरणीबद्दल असलेल्या प्रामाणिकपणाबद्दल शंका येते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मंडळी जरा ऐका
आज गांधी जयंती आहे म्हणून हे लिहीत नाहीये
मी ऐसीवर नवीन आहे तसा , तरीही थोडे स्वातंत्र्य घेतोय ( आज सकाळीच मार खाल्लाय ऑफ ऑल द पीपल , शुचि मामी कडून )
पण असं म्हणा नवीन आहे म्हणूनच मला जे दिसतंय ते जुन्यांना दिसतंय का ? बहुधा नाही .
बरोबर चूक जरा बाजूला ठेवा जरा .
इथे दोन वैचारिक बाजू आहेत . काही अपवाद वगळता ,दोन्हीकडची मंडळी व्यासंगी आहेत . पण आपापल्या भूमिकेवर नको इतकी घट्ट आहेत . जालावर पूर्वी म्हणजे anbapat पूर्व काळात बरीच वैचारिक मारामारी होऊन मंडळींनी आपापले स्टॅन्ड घट्ट घेतलेले दिसत आहेत . आणि आता आपल्या किंवा दुसऱ्यांच्या स्टॅन्ड मध्ये फरक होणार नाहीये अश्या खात्रीने दोनही बाजू दुसऱ्या विचारसरणीबद्दल लिहिताना कडवट पणाने , उपहासाने , खवचटपणाने , बॅकहँडेड असे जास्त लिहिताना दिसताहेत . कन्टेन्ट पेक्षा दुसऱ्याच्या वैचारिक प्रामाणिक पणावर शंका ... नव्हे नव्हे वैचारिक अप्रामाणिकपणा बद्दल खात्री असल्यासारखे डायलॉग .
विचारजंत किंवा कोणी अडवलंय तुम्हाला छाप संवाद कुठे जातो का ?
मंडळी ,वयाने इथल्या काहींपेक्षा मोठा असलो इथल्या बऱ्याच लोकांपेक्षा ज्युनिअर आहे मी इथे ...
मला असे वाटते कि आपापले अभिनिवेश बाजूला ठेऊन तारतम्याने काही चर्चा झाली काही घटना आणि किंवा मुद्द्यावर तर ती जास्त चांगली होईल . पण या करता जरुरी आहे कि प्रत्येकाने उपहास , खवचट , बॅक हँडेड कॉमेंट्स न करता मुद्याचे बोलावे . माझ्यासारख्या काही मंडळींना खऱ्या चर्चेत इंटरेस्ट असतो असे गृहीत धरून बोलतोय . (उदाहरणार्थ : मागे एका कुठल्यातरी धाग्यात उत्पल यांनी चांगयला पध्धतीने चर्चा आणि मतभेद मांडलेले वाचले . तसे काहीसे )
हि विनंती समजा ....
मी ओबडधोबड भाषेत लिहिलंय , आचरट बाबानी जास्त चांगलं मांडलं असतं .
बघा विचार करून ..
ता. क . १. माझ्यावर कधी "खवचट पणा सोडा" असं कोणाला सांगण्याची नामुष्कीची वेळ येईल असे वाटले नव्हते. (हे म्हणजे गांधी वाद्याने अहिंसा सोडा .वगैरे सांगण्यासारखे ..पण असो .. )
मुद्दा मान्यच.
मुद्दा मान्यच आहे. पण राष्ट्रप्रेम खरं किती आणि बेगडी किती हा प्रश्न खरंच पडला आहे. किंवा आपल्याला ज्याचा आनंद झाला ते म्हणायचं ते सोडून लोकांकडे बोटं दाखवण्याची सेडीस्ट वृत्ती जालावर/ऐसीवर आहे का?
का प्रकरण एवढं वाईट नाही आणि ही नेहेमीचीच लॉजिकल फॅलसी, स्त्रीवादाबद्दल१ बोलता तर राष्ट्रवादाबद्दलही१ बोललंच पाहिजे, नाही तर गप्प बसा; असा पॅसिव्ह अग्रेसिवपणा?
१. हे दोन्ही प्लेसहोल्डर
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
माझी पोस्ट हि तुमच्या पोस्ट
माझी पोस्ट हि तुमच्या पोस्ट ला प्रतिक्रिया नव्हती. हा सर्व वाद किंवा चर्चा ज्या पध्धतीने चालली होती त्याला होती. माझी पोस्ट कुठे हलवावी म्हणजे असा गैरसमज टळेल ?
माफीनामा
मी फक्त प्रतिसादांचं विश्लेषण करत्ये, ही गोष्ट खरीच आहे. कारण मूळ घटना खरोखर घडली का, भारतीय माध्यमांत झालेली प्रसिद्धी वास्तववादी होती का, तो निर्णय योग्य होता का, त्याबद्दल माझ्यासारख्या (पॅसिफिस्ट) लोकांनी आनंद मानावा का, त्या घटनेचे आणि/किंवा प्रसिद्धीचे दूरगामी परिणाम काय होणार इत्यादींबद्दल बोलण्याएवढा माझा अभ्यास नाही. माझ्या माहितीत (जाल आणि प्रत्यक्षात) कोणीही व्यक्ती नाही ज्यांचा एवढा अभ्यास आहे१. दुसर्या बाजूने, फक्त आनंद व्यक्त करावा एवढी निरागसता माझ्याकडे (आता आंजा कृपेने) उरली नाही.
ही कारणं म्हटली (कोणाला सबबी वाटू शकतात) तरीही तुम्ही केलेला आरोप किंवा दाखवलेली चूक माझ्याकडून होत आहे. त्याला फारसा इलाज नाही. तुमची उच्च नैतिक भूमिका पटूनही त्याबद्दल काही कृती करणं मला शक्य नाही. ह्याची किमान जाणीव आहे, म्हणून प्रतिसाद.
१. इतर काही विषयांचा अभ्यास करणारे लोक दिसले तेव्हा त्यांना ऐसीवर लिहिण्याचं आमंत्रण मी दिलेलं आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हे काय चालले आहे. तुमच्या
हे काय चालले आहे. तुमच्या पोस्ट वर प्रतिक्रिया नव्हती हे दोनदा सांगूनही का लिहिताय असं ? बरं कसली डोमलाची उच्चं नैतिक भूमिका आणि कसला आरोप ? अहो मी ( सगळ्यांना) फक्त दमानी घ्यायला सांगतोय। ........... काय दिवस आहे राव , सकाळी शुचि मामी तुडवताहेत आणि संध्याकाळी आदितीतै माफीनामा देताहेत . महात्मा गांधींचा महिमा खरच थोर आहे.
आता प्रतिक्रिया देण्यापासून अडवून दाखवाच!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तुडवताहेत अहो मी मुंगीही
अहो मी मुंगीही नाही तुडवत हो
काहीतरीच खूप हसले.
दुसर्या बाजूने, फक्त आनंद
हाण्ण!!!
चील!
हा संदेशही अनेकदा अनेकांनी अनेकवेळा देऊन झालेला आहे. असे करू नका तसे करू नका असे सांगणे हे एकाप्रकारे स्वतःशी प्रतारणा करा असे सांगणे नव्हे काय? (उदाहरणार्थ. शुचि काकूंना नविन आयडी घेणे थांबवा असे सांगणे. किंवा उगाच उठसूठ कशालाही वाटेल तशा श्रेण्या देणे थांबवा असे सांगणे.) तेव्हा, रविवारी लंच बफेला गेल्यावर जसं हवं तेच आपण ताटात घेतो तसंच संस्थळावर वावरावं. आवडत नसेल म्हणून हाटेल मालकाला अरे पनीरच्या ऐवजी तोफू का घालतोस रे वगैरे सांगून काहीही फायदा होत नाही. असो ,असो.
-Nile
मी कोणालाही काहीही करायला
मी कोणालाही काहीही करायला किंवा न करायला सांगत नाहीये. चर्चा चालू राहावी असे वाटत होते . या पध्धतीने चालू राहणार नाही असे वाटल्याने लिहिले .
थोडं थंड घ्या !!! अनेकांची
थोडं थंड घ्या !!!
अनेकांची मतं काही मुद्द्यांवर घट्ट आहेत. परंतु ती सर्व बाबतीत एका गटात नाहीत. एक साधं उदाहरण देतो.
या सरकारने प्लॅनिंग कमिशन बंद केलं आणि नीती आयोग सुरू केला. याचा गब्बर सिंग ला आनंद झाला. मला नाही झाला. कारण नीती आयोग हे प्लॅनिंग कमिशन या शब्दाचं शब्दश: भाषांतर आहे. आणि प्लॅनिंग कमिशन जे करत होतं ते सोडून नीती आयोग वेगळं काय करणार आहे ते ठाऊक नाही. तर गब्बर या बाबतीत सरकारच्या बाजूने आहे आणि मी बाजूने नाही.
दुसरीकडे सरकारने माझी परवानगी न घेता माझा बँकेतील व्यवहारांचा डेटा गोळा केला तर गब्बरसिंग (लिबर्टेरिअन) म्हणून त्याला विरोध करेल मी करणार नाही. इथे ऋषिकेश, गब्बर आणि चिंतातूर जंतू एका बाजूस असतील.
मी स्त्रीस्वातंत्र्यवादी आहे म्हणजे अपर्णा रामतीर्थकर बैं सांगतात त्याचं इथे कोणी समर्थन करू लागला तर मी त्याच्यावर तुटून पडेन. पण प्रत्येकच गोष्ट पुरुषांनी स्त्रियांवर केलेला अन्याय म्हणून पहायला मी विरोध करतो. त्यावर मी छुपा पुरुषवादी आहे असं कुणाला वाटू शकेल. (माझ्या सहीचं उगमस्थान हे आहे).
अरुण जोशींची कोणतीच मतं सहसा मला पटत नाहीत पण.....
जाउद्या.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
कारण नीती आयोग हे प्लॅनिंग
थत्ते चाचा, बाकी तुम्ही काहीही लिहीले असले तरी ह्या वरचे वाक्य चुक आहे. निती वेगळी आणि प्लॅनिंग वेगळे.
मुल होऊ द्यायचे की नाही हे ठरवणे म्हणजे "नीती"
मुल कधी आणि आणी कीती होऊन द्यायची हे ठरवणे म्हणजे "प्लॅनिंग"
किती होऊ द्यायची ही पण पॉलिसी
किती होऊ द्यायची ही पण पॉलिसी
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
प्लॅनिंग कमिशन जे करत होतं ते
केंद्राने कुठल्या राज्याला किती पैसा द्यायचा हे काम प्लानिंग कमिशन करत असे. आता ते काम अर्थ मंत्रालय करतं. यासंबंधित कंसिस्टंट बदल म्हणजे केंद्राने स्वतः चालवलेल्या काही स्कीम्स बंद केलेल्या आहेत आणि केंद्राकडे येणार्या पैशापैकी राज्यांना आता बराच पैसा आता थेट वाटला जातो. तो कशावर खर्च करायचा याचं स्वातंत्र्य राज्यांकडे आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
केंद्राने कुठल्या राज्याला
बाराव्या (कृपया शब्द नीट वाचणे) पंचवार्षिक योजनेचा कालावधी २०१२ ते २०१७ आहे. २०१७ जवळ आलं तरीही तेराव्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा वगैरे काहीही बोलबाला नाही. तेरावी पंचवार्षिक योजना सुरु व्हायच्या आधीच पंचवार्षिक योजनांचा तेरावं घातलं जावं यासारखा योगायोग नसेल.
प्लॅनिंग कमिशन चे शब्दशः भाषांतर "नियोजन आयोग" आहे.
नीती आयोग हे National Institution for Transforming India चे संक्षिप्तरूप आहे. मला ह्या आयोगाचे अस्तित्व सुद्धा मान्य नाही. नियोजनाचे केंद्रीकरण कोणत्याही नावाखाली व्यक्तीच्या विरोधात काम करते. the more the state “plans,” the more difficult planning becomes for the individual ___ असं हायेक म्हणाला होता ते समजणं कठिण अनेकांना कठिण असतं त्याचं कारणच हे आहे की लोकांचं ब्रेनवॉशिंग इतकं झालंय (समाजवादामुळं) की ते (व्यक्तीवाद, भांडवलवाद, व "स्वातंत्र्यवाद") समजावून सांगणं अतिकठिण होऊन बसलेलं आहे. व त्यातूनच स्वातंत्र्यविरोधी मतं ही इष्ट व आदरणीय होत जातात. स्लिपरी स्लोप (ही कितीही लॉजिकल फॉलसी वाटली तरी) ची सुरुवात होते. म्हणूनच हायेक ने पुस्तकाचे नाव "रोड टू सर्फडम" असं दिलं होतं.
( बाकी नेहमीचे आक्षेप आहेतच - अॅकॅडेमिक, हस्तिदंती मनोरा, थियरी वि प्रॅक्टिकल, अंधभक्त, कालानुरुप बदल व्हायला हवेत, कॉर्पोरेशन्स प्लॅनिंग करतात मग देशाने का करू नये ? ... वगैरे वगैरे वगैरे )
अदिती मला वाघमारे यांचा
अदिती मला वाघमारे यांचा मुद्दा पटला कारण "उरी व सर्जिकल स्ट्राइक" बद्दल वाचायला आवडले असते. राष्ट्रवादी मंडळी आहेत थोडीफार पण सहसा हे लोक धागे खरच काढत नाहीत त्यामुळे त्यांच्याकडुन अपेक्षा नव्हती, किंवा अचानक अपेक्षा करणेही योग्य नव्हते. मला धागा काढला की कॉन्शस व्हायला होते, इन्टेलेक्च्युअल, वैचारीक, पॉलिटिक्स वगैरे टाइप मला या जन्मी जमेलसे वाटत नाही. पण मग वाटत राहीले अरे कोणीतरी काढा धाग. एक वेगळीच घटना घडतेय. आपण रिटॅलिएट करतोय. उरीची घटनाही दुर्दैवी होतीच त्याबद्दलही कोणीतरी चीड व्यक्त करावी.
.
हे असे आपण इतरांकडुन अपेक्षा करु शकत नाही हे खरे. पण मग फ्रस्ट्रेशन असे प्रत्युत्तर, सहमतीतून निघाले.
राष्ट्रवादी मंडळी आहेत
शुचि, ह्या वाक्यात कीती छुपे अर्थ दडले आहेत.
१. राष्ट्रद्रोही मंडळी खुप आहेत.
२. जे लोक धागे काढतात ते राष्ट्रद्रोही आहेत.
क्षमस्व
माझ्या 'त्या' छोट्याश्या 'अवांतर'वर इतकं घमासान होत असल्याचं पाहून नवल वाटलं.ही कथित घटनाच मुळी इतकी इन-सिग्निफिकंट असताना त्यावरच्या पासिंग कमेंटवर लोक इतके का भडकावेत काही कळलं नाही.
थोडा शांततेने विचार केला तर गप्प राहणं,मत व्यक्त न करणं (पर्यायाने उपेक्षा करणं) हेही एक प्रकारे मत व्यक्त करणंच असतं हे पटेल. तसं नसतं तर 'सर्जिकल स्ट्राईकवर धागा नाही' या माझ्या बारीकशा निरीक्षणावर लोक इतके चवताळले नसते. उदा. नुकत्याच यवतमाळ येथे दर्डांच्या शाळेत घडलेल्या शालेय मुलींच्या शोषणकांडावर इतका होहल्ला होऊनही 'लोकमत' साधी हार्ड न्यूजही देण्याचं टाळतो,तेव्हा ते त्याचं (कुठल्याही दबावाखाली का असेना) असलेलं मतच असतं.किंवा 'मेक इन इंडिया'सारखी मोठी इव्हेंट चालू असताना किंवा पंतप्रधान सुफी मुस्लिमांच्या संमेलनात तास-दीड तासाचं भाषण देत असताना त्याचं किमान कव्हरेज राष्ट्र्रिय वाहिनी असलेल्या एनडीटीव्हीने न करणं हे त्यांचं संपादकीय धोरण म्हणजे त्यांचं मतच असतं. त्याच वेळेला कर्नल पुरोहितला कोर्टाने पुन्हा जामीन नाकारण्याची बातमी 'तरुण भारत' आतल्या पानावर उरकल्यासारखं त्रोटकस्वरुपात छापून त्याबाबत संपादकीय पानावर काही लिहायचं टाळतो तेव्हा तेही त्यांचं मतच असतं.हे सामान्य लोकांना जाणवतं पण विचारवंताना नाही हा भाग वेगळा.
उपेक्षेने मारणे, गप्प राहणे किंवा न-प्रतिसादाचं धोरण हे अत्यंत धारदार शस्त्र आहे. भारतीय राजकारणात-विचारकारणात दोन्ही बाजूंच्या लोकांनी ते अतिशय कौशल्याने ते आजवर वापरलं आहे.पूर्वीच्या काळात (आणि आजही) कॉंग्रेसने लो.टिळक, सुभाषचंद्र बोस,वल्लभभाई पटेल, नरसिंह राव इ. स्वत:च्याच नेत्यांना उपेक्षेने मारलं, इतर विचारसारणीच्या लोकांची तर गोष्टच सोडा. याचंच दुसर्या बाजूचं ताजं उदाहरण सध्या ०७,लोककल्याण मार्ग,नवी दिल्ली येथे पाहायला मिळेल. २००२ दंगलींनंतर नंतरचा थोडा काळ सोडला तर मोदींनी या विषयावर त्यांच्यावर होणार्या विखारी टीकेवर थेट बोलायचं टाळलं (त्यांचे समर्थक लाख बोलत असतील) व टीकाकारांच्या मोदीद्वेषी प्रचाराचा स्वत:च्या प्रतिमासंवर्धनात खुबीने वापर करुन घेतला आहे.याबाबतीत मोदी सगळ्यात जास्ती गांधीवादी आहेत असं माझं मत आहे.असो.
बाकी या विषयावरच्या कमेंटस व विशेषत:
या टिप्पणीवरुन काही गोष्टींचं वाईट वाटलं,काही गोष्टींबाबत बरं वाटलं तर काही गोष्टींची पुन्हा खात्री पटली.
कुंपणाच्या दुसर्या बाजूला सेन्सिबल,रॅशनल विचार करणारे लोक नसूच शकतात या समजुती कुंपणाच्या त्या बाजूला असलेल्या लोकांच्या मनात अजूनही घट्ट आहेत याची खात्री पटली.पुरोगामी दहशतवाद हा फक्त एक जुमला असावा असं मला वाटायचं.पण गेल्या काही काळातल्या स्वानुभवारुन हा एक वास्तविक फिनॉमिनॉ असावा असं वाटतंय.
तथाकथित पुरोगामी विचारक अजून स्वत:च्याच वैचारिक कूपात व एका विशिष्ट विचारसारणीबद्दल खोलवर रुजलेल्या द्वेषातच अडकून पडले आहेत याचं बरं वाटलं.
आणि आपले ऐसीवरचे दिवस कदाचित भरत आले असावेत याचं वाईटही वाटलं.
माझा धागा लिहून तयार आहे. पण आता टाकणार नाही...
या विषयावरची ही माझी शेवटची प्रतिक्रिया. क्षमस्व.
येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक
४ मार्मिक
सध्या या प्रतिसादाला ४ मार्मिक अशी श्रेणीसंख्या दिसत आहे. आता ती बदलून (-१ निरर्थक) असं किती वेळात दिसेल तेवढंच बघायचं आहे. एनी बेट्स?
भटोबा, हे असे वेळेच्या आधीच
भटोबा, हे असे वेळेच्या आधीच बोलुन तुम्ही ऐसीवरच्या हुच्चभुभुंना जाम पेचात टाकले आहे.
प्रतिसाद पटला - विशेषतः न्यूज
प्रतिसाद पटला - विशेषतः न्यूज एजन्सीज कुठच्या बातम्यांना महत्त्व देतात आणि कुठच्यांना अनुल्लेखाने मारतात यावरून त्यांची विचारसरणी दिसते हे बरोबरच. मात्र ऐसी अक्षरे ही न्यज एजन्सी नाही. ऐसीवर येणारं लिखाण हे संपादक मंडळाने केंद्रीय नियोजन करून दाखवलेलं लिखाण नसतं. त्यामुळे 'ऐसीवर धागा आला नाही' हे जणू काही संपादकांचा दोष असल्यासारखं मांडणं योग्य नाही. इथे अशी तक्रार करण्यापेक्षा स्वतः धागा काढणं, किंवा ही बातमी ऐकली का या धाग्यावर ते मांडणं, किंवा काहीही न करणं हे पर्याय सर्वच सदस्यांना असतात. म्हणजे महत्त्व द्यायचं की दुर्लक्षाने मारायचं हा केंद्रीय निर्णय नसून तमाम सदस्यांचा निर्णय ठरतो. या पार्श्वभूमीवर
हे विधान दुर्दैवी वाटतं. कोणीच लिहिलं नाही म्हणून मीसुद्धा लिहिणार नाही - असं जर प्रत्येक जण म्हणाला तर ती सेल्फफुलफिलिंग प्रॉफेसी होईल. म्हणून तुम्हाला मी तो लेख ऐसीवर टाकण्याची विनंती करतो.
असलं काही म्हणू नका हो. राहा इथे, गप्पा मारा, लेखन करा - ऐसीची प्रकृती वेगवेगळ्या विचारांमुळे अधिक समृद्ध होईल.
>>त्यामुळे 'ऐसीवर धागा आला
>>त्यामुळे 'ऐसीवर धागा आला नाही' हे जणू काही संपादकांचा दोष असल्यासारखं मांडणं योग्य नाही.
असं नाही म्हणत आहेत ते !!
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
त्यांनी लोकमत, एनडीटीव्ही,
त्यांनी लोकमत, एनडीटीव्ही, तरुणभारत या न्यूजमीडियाची आणि कॉंग्रेस पक्षाची उदाहरणं दिली. या सर्व ठिकाणी कशाला महत्त्व दिलं जावं आणि कशाला अनुल्लेखाने मारलं जावं हा कुठल्यातरी लहानशा मंडळाचा धोरणात्मक निर्णय असतो. असं कुठचंतरी मंडळ असे निर्णय घेतं असं सुचवण्यात काही अर्थ नाही कारण ऐसीवर अमुकला बंदी, तमुकच चालेल अशी धोरणं नाहीत. लिहिणारा, छापणारा यांचा उदरनिर्वाह ते काय लिहितात यावर चालत नाही. त्यामुळे ऐसीवर अमुक येत नाही अशी तक्रार करण्यात फार अर्थ नाही. ती तक्रार करायला जितका वेळ लागतो त्यापेक्षा थोडासाच वेळ जास्त खर्च करून नवीन धागा काढता येतो. म्हणून जबाबदारी सगळ्यांचीच आहे, इतकंच म्हणायचं होतं.
धागा टाकायला ते घाबरले
धागा टाकायला ते घाबरले असण्याची पण शक्यता आहे ना. असा काहीतरी धागा टाकला आणि एकदम टोळधाड आली असती तर मग?
त्या त्या फोरम मधे ते ते विषय शोभुन दिसतात असे काहीतरी वाटले असेल त्यांना.
इथे असे धागे शोभुन दिसतात
"मंगोलियन सिनेमावर जब्बर पटेलांचा प्रभाव"
"खाऊजा धोरणामुळे धोंडेवाडीतल्या डुकराची झालेली उपासमार"
किंवा सर्वात अॅप्ट म्हणजे
"वाळवंटातली वाढती सहिष्णुता आणि भारतातली वाढती असहिष्णुता यांचा तौलनिक अभ्यास"
मुक्ताफळकलिके ;)
तुला भीती नाही वाटत का गं?
"वाळवंटातली वाढती सहिष्णुता
त्यातही १६ मे, २०१४ नंतरची भारतातली भगवी हिंदुत्ववादी असहिष्णुता असे शब्द वापरले तर एकदम बहारच येईल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
टोळधाड? धाग्यातल्या कंटेंटवर
टोळधाड? धाग्यातल्या कंटेंटवर प्रश्न उपस्थित करणं म्हणजे पीक नष्ट करणं? असो. जर कोणाला ऐसीवर धागा काढायला इतकी जिवाची भीती वाटत असेल तर त्यांनी तो कंटेंट माझ्याकडे द्यावा. मी तो माझ्या नावाने किंवा 'कोणीतरी अज्ञात' अशा आयडीने जरूर प्रसिद्ध करेन.
मुद्दा असा आहे की ऐसी सर्वांचं बनलेलं आहे. त्यामुळे असा धागा यावा असं मनापासून वाटत असेल तर कोणालाही ते करण्याची मुभा आहे. हे स्वातंत्र्य न वापरता ऐसीवर असा धागा आला नाही बरंका, असं म्हणण्यातून तक्रारीपलिकडे काहीच साध्य होत नाही. सकारात्मक काही करायचं की नकारात्मक हा प्रत्येकाचा निर्णय आहे.
असं आहे बघा गुर्जी. इथे "हलके
असं आहे बघा गुर्जी. इथे "हलके घ्या" असे बोल्ड करुन लिहीले नाही तर हलके घेतलेच जात नाही.
सकारात्मक टिका आहे असे समजा ( कुठल्यातरी धाग्यावर आहे ना हा शब्द )
मज्जानू आंजा
वाघमारे तक्रार करतात की ऐसीवर ठरावीक विषयांची उपेक्षा होते (हेतूतः व्यवस्थापक असं करतात, करायला सांगतात, न करणाऱ्यांना काही शिक्षा होते किंवा आणखी काही). आणि अनुराव म्हणतात, "असा काहीतरी धागा टाकला आणि एकदम टोळधाड आली असती तर मग?" दोन्ही प्रकारच्या प्रतिसादांचं वर्गीकरण 'मार्मिक'.
मज्जानू आंजा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
प्रतिसाद आवडला
प्रतिसाद आवडला. एकदम गुर्जीटाईप समजूत काढलेली आहे.
Want to go to college? Prove
Want to go to college? Prove you are virgin: Egyptian lawmaker to women - "क्षणी या दुभंगुनिया घेई"....
--
US lawmakers support India's surgical strikes across LoC
----------
क्रिस्तिन फेअर यांनी पाकिस्तानवर थेट हल्ल्याचे समर्थन केलेले आहे.
.
.
http://www.huffingtonpost.com
http://www.huffingtonpost.com/c-christine-fair/pakistans-war-on-scholars...
त्यांचा पाकिस्तानवर जुना राग दिसतोय.
आणि तसेही अन्य कोणी समर्थन केले म्हणुन आपली भूमिका समर्थनिय, बलवान ठरत नाही अनलेस ती व्यक्ती "वॉर & पीस" किंवा तत्सम विषयाची सब्जेक्ट मॅटर एक्स्पर्ट असेल.
फेअर यांनी समर्थन केले म्हणुन आपला हल्ला समर्थनिय होतो असे तुम्ही (गब्बर सिंग) म्हणत आहात - असे मला म्हणायचे नाही.
एवढेच सांगायचे आहे की बाईंचा जुना राग आहे. पाहुण्याच्या काठीने साप किंवा विरुद्ध बोलून माफक सूडाचा प्रयत्न एवढेच महत्त्व आहे.
.
अधिक महत्व असल्यास प्लीज सांगणे करावे.
____
हां मात्र एक पुस्तक आहे त्यांनी लिहीलेले ते याच विषयावर आहे.
त्यांचा पाकिस्तानवर जुना राग
किमान गूगल तरी करा ओ !!
(१) ही व्यक्ती खरोखर सिक्युरिटी स्टडीज ची एक्सपर्ट आहे. व ते सुद्धा साऊथ एशिया ह्या भूभागातील सिक्युरिटी स्टडीज ची.
(२) ह्या व्यक्तीला ३ भारतीय/पाकी भाषा सुद्धा येतात
(३) ही व्यक्ती पाकिस्तानात नेमक्या ह्याच विषयाच्या अभ्यासासाठी अनेकदा गेलेली होती
(४) ह्या व्यक्तीने नेमक्या ह्याच विषयावर पुस्तके लिहिलेली आहेत.
(५) ह्या विषयावर अमेरिकेत अनेक विशेषज्ञ आहेत त्यापैकी ती एक मानली जाते
(६) ह्या विषयाच्या अभ्यासासाठीच ही व्यक्ती जॉर्जटाऊन विद्यापीठात नोकरी करते
(७) विकिपेडिया - पेक्षा जास्त क्रेडिबल दुवा. http://explore.georgetown.edu/people/ccf33/
गुगल केले होते लगेच. पण त्या
गुगल केले होते लगेच. पण त्या बाई मला अति अॅकेडेमिक वाटल्या. आणि एखादी युनिव्हर्सिटी अमेरीकन आहे म्हणजे तिथले अॅकेडेमिशिअन्स हे दखलपात्र आहेतच म्हणजे असा समज करुनही घ्यावासा वाटला नाही.
माझं काहीतरी चुकत असेल पण मला त्याबाईंनी पुस्तक लिहीणे, संशोधन करणे, पदवी मिळवणे, काम करणे हे सर्व हॉलो वाटले म्हणजे त्याचे स्कॉलरली मूल्य असेलही पण व्यवहारात मत किती ग्राह्य धरायचे ते क्वेश्चनेबल वाटले.
.
मग नक्की कोणी समर्थन केले की पुरेसे हायसे वाटएल तर त्याचे उत्तर माझ्याकडे नाही. पण आधीच पाकिस्तानवरती राग असलेल्या व्यक्तीने केलेले समर्थन नक्कीच पुरेसे वाटले नाही.
.
ओके थोडक्यात एकदा बाईंचा राग आहे कळलं आणि मग त्यांची दृष्टी पीत वाटू लागली.
.
अजुन एक बायस -
गोर्यापरदेशी व्यक्तीला टाळ्या पीटायला काय जातय वॉर झाली तर भोगायची भारतियांना (आम्हाला) आहे हच विचार पहीला आला. मे बी दॅट ओव्हरपॉवर्ड ऑल अदर थिंकिंग.या व्यक्तीला पाकी आयएसआय ने
या व्यक्तीला पाकी आयएसआय ने धमकी दिली होती. (व्हिडिओ आहे). धमकीचे डिटेल्स नक्की पहा. व्हिडिओ मधे.
--
युद्धविषयक धोरणात्मक निर्णय हे केवळ अॅकॅडेमिक एक्सपर्ट च्या मतांवर आधारित नसतात कारण अॅकॅडेमिक एक्स्पर्ट्स हे "मंडे मॉर्निंग क्वार्टरबॅक" प्रमाणे असतात. अनेकांची मतं विचारात घेतली जातात व त्यात गुप्तहेर, राजकीय नेते, नोकरशहा, व लष्करी तज्ञ यांची सुद्धा योगदानं असतात (This is the excessively basic part.).
निर्णय हा राजकीय नेतृत्वाचाच असतो व तसाच असायला हवा. प्रजातंत्रात तर तसंच इष्ट आहे. व ही बाई सुद्धा अशाच विचारसरणीची समर्थक आहे. व भारतीय लष्कर सुद्धा अशाच विचारसरणीवर चालते. तिचे भारतीय लष्कराबद्दल सुद्द्धा हेच मत आहे. Strict Civilian Control of Military असं त्या विचारसरणीस म्हणतात. व म्हणून तिची मतं ग्राह्य मानावीत. तिची मतं ग्राह्य मानणे म्हंजे विरोधी मतं झिडकारणे असं नसतं.
This is the excessively basic
पण छान आहे तो उतारा.
हे बरोबर आहे.
अमेरीकेत बरेच आफ्रिकन-अमेरिकन
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
India to ratify Paris
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
H4 व्हिसा, शाप आणि भारतीय स्त्रीया
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !