मवाळ मुसल्मानांवरील नैतिक जबाबदारी: एक गद्य कविता
माझे दोन मुसल्मान मित्र आहेत एक बिन-दाढीवाला तुर्क पेट्रोल भरतो दुसरा दाढीवाला अरब मुन्सिपाल्टीत कारकून आहे त्याला दाढी असली तरी तो कविता वगैरे लिहितो म्हणजे तो मवाळच तर मी त्या दोघांस सज्जड दम भरला की आयसीस ने शिरच्छेद केलेल्या जाळलेल्या बोको हरामने गोळ्या घातलेल्या अल शबाब ने ठार केलेल्या सर्व विशेषतः गैर-मुसलमानांच्या हत्त्यांचा सतत निषेध करण्याची नैतिक जबाबदारी तुमची आहे यावर ते वाकून म्हणाले होय साहेब व न्यूयॉर्क मधल्या मोठ्या मशिदीसमोर उभे राहून हे चूक आहे हे चूक आहे असे म्हणू लागले त्यामुळे मुसलमान समाजाची धर्माची गरज नष्ट झाली तसेच मुसल्मान्नांमधील गरिबी , उपासमारी, बेकारी, रोगराई तसेच पश्चिमी राष्ट्रांचा त्यांच्यावरील साम्राज्यवादी वरचष्मा हे सर्व नष्ट झाले व सर्व मुसलमान आता अमेरिकी, जपानी अधिपत्याखालील सुंदर फाक्ट्र्यांमध्ये दिवस्भर सपाटून मेहनत करतात व रात्री हलकेफुलके हॉलीवूड - बॉलीवूड चे सिनेमे बघतात असे कळते .
प्रतिक्रिया
मार्मिक
मार्मिक
जळजळीत आहे हो.
जळजळीत आहे हो.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
आमची पण गद्य कविता
आमची पण गद्य कविता.
आता मुसलमान लोक असं म्हणत नाहीत की "We are tired of apologizing". आता मुसलमान असं म्हणतात की मुसलमानांना परकेपणाने वागवले जाते. मुसलमानांना बदनाम केले जात आहे. मुसलमान नीतीवानच आहेत ओ. पण तरीही त्यांना बदनाम केले जातेय. (मुस्लिमेतरांचे) असहिष्णु असणे गौरवास्पद मानले जातेय ही खरी समस्या आहे. मुस्लिम हा असहिष्णु असण्याची शक्यता नसतेच. विश्वाच्या इतिहासात मुसलमानांनी एकदा सुद्धा असहिष्णु वर्तन केलेले नाही. आजही गरिबी, उपासमारी, बेकारी, रोगराई ह्या मुस्लिम जगातलया समस्या फक्त मुस्लिमेतरांनीच निर्माण केलेल्या आहेत. खरा इस्लाम असता तर या समस्या अस्तित्वातच आल्या नसत्या.
निरर्थक अशी श्रेणी दिली
निरर्थक अशी श्रेणी दिली आहे.
इतर बाबतींत लॉजिकल विचार करणारे श्री. गब्बरसिंग हिंदू-मुसलमान, किंबहुना मुस्लिम द्वेष, या एका बाबतीत इतका इल्लॉजिकल विचार का करताना दिसतात?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
विनोदी अशी श्रेणी दिलेली
विनोदी अशी श्रेणी दिलेली आहे.
-
नाय ओ.
मुसलमानांनी आपल्यातल्या समस्यांसाठी फक्त इतरांना जबाबदार धरणं सोडावं असं मला म्हणायचं आहे. गरीबी, बेरोजगारी, उपासमारी या व अशासारख्या समस्या इतर धर्मियांमधे आहेतच की. मग इतर धर्मियांना सुद्धा टार्गेट केले जाते की काय ? इतर धर्मियांची (शफाअत खान म्हणाले तशी) पद्धतशीर बदनामी केली जाते की काय ? सिस्टिम च्या अपयशांसाठी नेहमी सिस्टिम बाहेरचे लोकच कसे जबाबदार ठरवले जाऊ शकतात ? ज्या धाडसाने खान सायबांनी मुस्लिमेतरांकडे बोट दाखवले तेच धाडस आपल्याच (मुस्लिम) समाजाला कानपिचक्या दिल्या नाहीत. मुस्लिमेतरांना दुसरा उद्योग नाहिये का मुस्लिमांची बदनामी करण्याशिवाय ? मुस्लिमांपेक्षा जास्त अल्पसंख्य ज्यु लोक आहेत भारतात. त्यांना परकं वाटतं का ? का वाटत नाही ? पारश्यांचे काय ? ते सूद्धा अल्पसंख्यच आहेत की. मुस्लिमांनाच परकं का वाटावं ?
एका बाजूला असं म्हणायचं की - भारतातील बव्हंशी जनता सेक्युलर आहे आणि हिंदु-मुस्लिम हा भेदभाव फक्त राजकारणी आपल्या मतांच्या डावपेचासाठी करतात. आणि दुसर्या बाजूला असं म्हणायचं की "मुस्लिमांना परकेपणाची भावना येत आहे". जी जनता सेक्युलर असते ती एका ठराविक धर्मगटालाच भेदभावाची, परकेपणाची जाणीव कशी करून देईल ?
आणि मुस्लिमांची बाजू घेणार्या मंडळींची दर वेळची ही तक्रार असते की "मुस्लिमांच्यावर पुरेशी टीका होत नाही म्हणून त्यांच्यावर टीका करायला हवी - असा आग्रह धरणे चूक आहे". पण हा मुद्दा व्यर्थ आहे. अतर्क्य आहे.
बरोबर आहे. कोणी बुरखासक्ती,
बरोबर आहे. कोणी बुरखासक्ती, तोंडी तलाक वगैरे गोष्टींच्या विरुद्ध काही बोललं की या मवाळमुसलमानांची कुईकुई बघायची.
बुरखा आणि हिजाब कसे वेगवेगळे आहेत आणि तलाकमध्ये कशी बायकोची सगळी सोय लावावी लागते वगैरे सांगतात. बुरखा आणि इन्स्टंट तलाक हा विपर्यास असून अनइस्लामिक आहे म्हणतात. म्हणजे इस्लाममधून उद्भवलेल्या वाईट गोष्टी अनइस्लामिक ठरवून शी फ्लश केल्यासारख्या स्वत:च्या विचारपरिघातून फ्लश केल्या की झाले हे पाक आणि इस्लामच्या बदनामीबद्दल गळे काढायला मोकळे.
खालील प्रश्न/विधानेही विनोदीच असावीत बहुदा.
१. ख्रिश्चनांना इथे आपलंसं वाटतं का?
२. नक्की कोणत्या मुसलमानांना परकं वाटतं? त्यांना खरंच परकं वाटतं, की तसं तुमच्यासारखे हिंदुत्ववादी म्हणतात, म्हणून मान्य करायचं?
३. इतर धर्मांची बदनामी, व पर्यायाने बागुलबुवा उभा करून, देशातील लोकांचे धर्माधारित विघटन करून सध्याचे सरकार निवडून आले आहे, हे असत्य आहे काय?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
देशातील लोकांचे धर्माधारित
सध्याचे सरकार विकासाच्या अजेंड्यावर निवडून आले आहे.
धर्माधारित विघटन हा minor अजेंडा आहेच,पण याला काँग्रेसच्या तुष्टीकरणाचे राजकारण जबाबदार आहे.
कुणाच्या बुडाखाली किती अंधार हाय,त्ये समद्या तालुक्याला माहित्ये.
>>सध्याचे सरकार विकासाच्या
>>सध्याचे सरकार विकासाच्या अजेंड्यावर निवडून आले आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हास्य करत लोळणारी स्मायली
हास्य करत लोळणारी स्मायली टाकल्यास मार्मिक श्रेणी मिळते हे माहित नव्हतं.
बाकि,सद्याचं सरकार हे केवळ विकासाच्या अजेंड्यावर निवडून आलेलं आहे.
तुमची उद्विग्नता मी समजू शकतो.
कुणाच्या बुडाखाली किती अंधार हाय,त्ये समद्या तालुक्याला माहित्ये.
सहमत आहे. खूप लोकांनी त्यांना
सहमत आहे. खूप लोकांनी त्यांना आर्थिक विकासासाठी मतं दिली आहेत हे थत्तेचाचांना काही केल्या पटत नाही. त्यांना वाटतं की देशातल्या ३१% जनतेला 'त्यांचं' शिरकाण करायचं आहे म्हणून मोदींना मत दिली.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
३१ टक्के हा आकडा मिसलिडींग
३१ टक्के हा आकडा मिसलिडींग आहे. बेसिकली भाजपचा मतांचा सेट हा १००% नसुन ८० टक्के आहे. उरलेल्या २० टक्क्यातले एक पण मत मिळणे शक्य नाही. म्हण्जे भाजप्ला ८० मधली ३१ मते मिळाली आहेत म्हणजे ३८.५%.
१. ख्रिश्चनांना इथे आपलंसं
तसा कोणताही डेटा उपलब्ध नाही. निर्णय कसा घेणार ? (आता तुम्हाला हा प्रश्न असेल की - मग मुसलमानांना परकं वाटतं हे कोण म्हणतंय ? - त्याचे उत्तर खाली आहे.)
-
(अ) मुस्लिमांना परकं वाटतं असं शफाअत खान म्हणत आहेत.
(ब) मी हिंदुत्ववादी नाही. ( पण माझ्यावर हिंदुत्ववादी असल्याचे लेबल लावलेत ते मात्र खूप आवडले.)
-
हो. हे असत्य आहे.
गब्बरा,
तुम्ही दिलंय ते
नसून निरुत्तर आहे, हे तुमच्या ध्यानी आलंय ना?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
नसून निरुत्तर आहे, हे तुमच्या
अं ... हं.
ज्याबद्दल डेटा आहे त्याबद्दल बोलतोय. व ज्याबद्दल डेटा नाही त्याबद्दल बोलत नाही. ( ख्रिश्चनांबद्दल डेटा नाही. त्याबद्दल बोलत नैय्ये मी. )
शफाअत खान म्हणतात की मुसलमानांना परकेपणाने वागवले जातेय. आम्ही म्हणतोय की "मुसलमान हे त्यास मुख्यत्वे कारणीभूत नाहीत हे कशावरून ?"
( जाताजाता : भारतात मुसलमान सुमारे पंधरावीस कोटी. मुस्लिमेतर सुमारे ९५ कोटी. आम्ही म्हणतोय की शफाअत खान हे प्रचंड जनरलायझेशन करीत आहेत. म्हंजे हिंदुत्ववादी करतात त्यापेक्षा सुद्धा मोठे जनरलायझेशन शफाअत खान करत आहेत. शफाअत खान हे ९५ कोटी लोकांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करत आहेत. )
ज्याबद्दल डेटा आहे त्याबद्दल
शफाअत खान म्हणतात तो डेटा आहे असे म्हणायचे का?
भारतातील पारशी व ज्यू लोकांबद्दलचा डेटा कुठे आहे?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
शफाअत खान म्हणतात तो डेटा आहे
- त्यांनी मुस्लिमेतरांवर अप्रत्यक्ष आरोप तरी केलाय ना. मग त्यातला फोलपणा नको का दाखवायला.
- अगदी बरोबर. ते लोक कधी ट्यावट्याव करतात ? ऐकलं नाही कधी. मग मुसलमानांच्या म्होरक्यांनी तरी ट्यावट्याव का करावी ? आणि आम्ही ती ऐकून का घ्यावी. वास्तविक माझा मूळ मुद्दा हा आहे की - एकीकडे जनता सेक्युलर आहे असं म्हणायचं आणि दुसरीकडे मुसलमानांप्रति असहिष्णु, परके अशी भावना ठेवली जाते (जनतेकडून) असा ही आरडाओरडा करायचा आणि वर आपण (जनरलायझेशन करतच नाही आहोत अशा आविर्भावात) सर्वधर्मसमभावीपणाची झूल पांघरायची हे कधीपर्यंत** चालणार ??
** "कधीपर्यंत" म्हंजे मला नेमकं काय म्हणायचंय ? - मुस्लिमांना हिंदूसमवेत राहता येणार नाही या आधारावरच देशाची फाळणी करण्यात आली. त्यावेळी हिंदूंनी असं सांगितलं नव्हतं की आम्हाला मुसलमान नकोत इथे म्हणून. तेव्हापासून आजतागायत मुसलमानांची ही ट्यावट्याव चालू आहे. एकीकडे देश विभाजन करून घेतलं आणि विभाजन झाल्यावर सुद्धा वेगळा कायदा. (ते एक दुसरे within the country partition). आता तुम्हाला वेगळा कायदा असेल तर तुम्ही वेगळ्या सिव्हिक इन्स्टिट्युशन्स चे पाईक होणार यात अनैसर्गिक/आश्चर्य ते काय आहे ? मग असं झालं तर मग परकेपणाची भावना निर्माण झालिये असा आरडाओरडा का करता ? ( जोडीला अधुनमधुन मुसलमानांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी निधी दिला जातोच.)
--
वास्तविक मी समान नागरी कायद्याचा अजिबात फॅन नाही. People should be able to choose the rules they are governed by. पण एकदा रूल्स तुम्ही तुमचे निवडलेत की मग आरडाओरडा नाय करायचा की आम्हाला वेगळं वागवलं जातं म्हणून.
एका बाजूला असं म्हणायचं की -
बव्हंशी जनता सेक्युलर आहे हो.
सत्ता बळकावलेल्या हिंदुत्ववादी अचरटांचं काय?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
सत्ता बळकावलेल्या
तुम्ही फक्त २०१४ नंतरचं बोलताय. त्यापूर्वीचं काय ? जेव्हा जनसंघ व भाजपा अस्तित्वात सुद्धा नव्हती तेव्हा फाळणी झाली. त्यामागे इस्लाम धर्माव्यक्तिरिक्त असं काय महान तत्वज्ञान होतं ?
जर बह्वंशी जनता सेक्युलर असेल
जर बह्वंशी जनता सेक्युलर असेल तर हिंदुत्ववादी आचरटांना कसे काय निवडून दिले बरे? म्हणजे जनता सेक्युलर तरी नाही किंवा हिंदुत्ववादी आचरट हे जनतेला येडे बनवण्यात तरी यशस्वी ठरले म्हणजे जनता मूर्ख तरी आहे. सो इतकी वर्षे जनता शहाणी होती का?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
यक्झॅक्ट्ली माय पॉइंट.
यक्झॅक्ट्ली माय पॉइंट.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
मी वर ऑप्शन्स दिलेत त्यांपैकी
मी वर ऑप्शन्स दिलेत त्यांपैकी नेमका काय पॉइंट आहे ते तर कुठेच सांगितले नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ब्याटोबा,हिंदुत्ववाद्यांनी
ब्याटोबा,हिंदुत्ववाद्यांनी फिरस्त्या मोदीला पुढं करुन लोकांना येडं बनवलं हे त्यांना म्हणायचं असावं.
™ ग्रेटथिंकर™
ब्याटोबा,हिंदुत्ववाद्यांनी
ब्याटोबा,हिंदुत्ववाद्यांनी फिरस्त्या मोदीला पुढं करुन लोकांना येडं बनवलं हे त्यांना म्हणायचं असावं.
™ ग्रेटथिंकर™
हम्म
इतके बहुजन लोक येडे कसेकाय बनले नै.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
जसे ते ६५ वर्ष काँग्र्सला
जसे ते ६५ वर्ष काँग्र्सला निवडून द्यायचे म्हणुन वेडे होते ही तुमचीच हिंदुत्ववाद्यांची व्याख्या २०१४ नंतर तुम्हाला लागू होत नाही काय
™ ग्रेटथिंकर™
ते त्या आडकित्त्याला विचार.
ते त्या आडकित्त्याला विचार. मोदीला निवडून दिल्यामुळे जनता मूर्ख आहे असे त्याचे मत असावे. माझे नाही.
बाकी फक्त ३.५% मतांमुळे मोदी पंतप्रधान होऊ शकत नाही, तुझ्या लाडक्या बहुजनांनीच त्याला मते दिलेली आहेत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
त्या आडकित्त्याला विचार.
त्या आडकित्त्याला विचार. मोदीला निवडून दिल्यामुळे
जनता मूर्ख आहे असे त्याचे मत असावे. माझे नाही.>>>>>>> म्ह्नजे कॉग्रेसला निवडुण देणारी जनता हुशारच होती म्हणा कि, मग तेव्हा का नावे ठेवत होतात जनतेला ????. की समस्त भारतभूला २०१४ ला अक्कल आली असा तुमचा कयास आहे काय बॅटम्यानजी....??
™ ग्रेटथिंकर™
शेंगा-टरफले
मी कयास मांडला नाही, फक्त तुम्हां लोकांच्या अर्ग्युमेंटचा अर्थ काढून दाखवला.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
इतर बाबतींत लॉजिकल विचार
जर गब्बु इतर बाबतीत लॉजिकल विचार करत असेल तर ह्या मुस्लिम द्वेष बाबतीत पण लॉजिकलच विचार करत असण्याची शक्यता मला तरी खूप जास्त वाटतीय.
धर्माच्या बाबतीत मुसलमान किती
धर्माच्या बाबतीत मुसलमान किती कट्टर असतात हे नव्याने सांगायची गरज नाही,हे तर जळजळीत सत्य आहेच.
आणि आपण ज्यांना मवाळ किंवा पुरोगामी मुसलमान म्हणतो ते ही धर्माचा विषय असला कि कसे पोपटासारखे बोलू लागतात हे पाहण्यासारखे असते.
यापाठीमागची सायकाॅलाॅजी समजून घेणे आवश्यक आहे,
ख्रिश्चन असोत किंवा हिंदू यामधील बहुतांश लोकांनी धर्माला बासनात गुंडाळून ठेवलं आहे,म्हणजे नास्तिकवादाकडे वाटचाल सुरू आहे,पण इस्लाममध्ये याचं प्रमाण अतिशय अल्प आहे.ते लोग काही केल्या धर्माला/कट्टरतेला सोडत नाहीत किंवा धर्माची चिकित्सा करण्याचा प्रयत्नही करत नाहीत.
काय कारण असेल यामागच्या सायकाॅलाॅजीचा अभ्यास करायला हवा.
जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी
ख्रिश्चन असोत किंवा हिंदू
+१ खरच कुतूहल वाटते.
अल्पसंख्य
कुठल्याही अल्पसंख्य समाजाला वेगळेपणाची भावना वाटत असेल तर त्याला कारण तेच आहेत. प्रत्येक बाबतीत त्यांनी धर्म आडवा आणला नाही तर लोकांना त्यांचे वेगळेपण जाणवणारच नाही. पर्शियन जेंव्हा गुजरातच्या किनार्यावर आले तेंव्हा त्यांनी तिथल्या राजाला, दुधांत जशी साखर मिसळते तसे आम्ही मिळून मिसळून राहू, असे सांगितले होते. आणि ते वचन त्यांनी पाळले म्हणूनच ते आपल्या समाजाशी एकरुप होऊ शकले.
आमचा त्यांच्या वेगळेपणाला
आमचा त्यांच्या वेगळेपणाला सुद्धा विरोध नाही. शीख लोक नाहीत का वेगळी केशभूषा बाळगत ? ते थेट वेगळे दिसतेच की. पण they do not always complain that they have been victimized. आणि महत्वाचे म्हंजे इतरांना व्हिक्टिम बनवू नका. बेरोजगारी, गरीबी, उपासमारी, अंधश्रद्धा, मागासलेपण, अशिक्षा ह्या समस्या सगळ्यांच्यात कमीअधिक प्रमाणावर आहेत. पण म्हणून काही प्रत्येक समाजातले लोक "आमच्या समाजातले लोक बहुसंख्य शांततामय आहेत म्हणून आमच्यावर आरोप करू नका आणि आम्हाला असहिष्णु वागणूक दिली जात्ये अन आम्हाला परकं वागवलं जातंय" असा आरडाओरडा करत नाहीत.
आरडा ओरडा त्यांचाही चालू
आरडा ओरडा त्यांचाही चालू असतो,सरदारजींवर जोक बंद करा असे फतवे शिख धर्मगुरु काढत असतात,स्वतंत्र खलिस्तान हा ही आरडओरडा न्हवता काय?
आज महाराष्ट्रात मराठा ब्रिगेडच्या माध्यमातून भटांना शिव्या घालत आहेत,व भटे आंतरजालावर " ब्राह्मण असणे गुन्हा आहे काय" वगैरे खरडत आहेत
आरडाओरडा सगळ्यांचाच चालू आहे फक्त मुस्लिमांना त्यातून वेगळे काढण्यामागे गब्बरसिंग यांचा हेतू स्पष्ट दिसून येतो.
गब्बरसिंग हे छुपे हिंदुत्ववादी आहेत हा आमचा स्पष्ट आरोप आहे.
™ ग्रेटथिंकर™
छुपे का बुवा? आम्हाला तर ते
छुपे का बुवा? आम्हाला तर ते उघड हिंदुत्ववादी वाटतात.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
ह्म्म्म आरडाओरड सगळ्यांचाच
ह्म्म्म आरडाओरड सगळ्यांचाच चालु असतो हे खरेच!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
गब्बरसिंग हे छुपे
मी श्रीमंतवादी आहे.
हेतूंच्या विशुद्धतेवर जग चालतं काय ?
माझा हेतू हाच आहे. की इस्लाम हा सर्व टीकेच्या वर आहे असा भ्रम नाय पायजे . आपल्या देशात तर मुसलमान हा असा गट आहे की ज्यांच्यावर कोणतीही टीका कोणीही करू धजावत नाही. लगेच इस्लामोफोबिया, जनरलायझेशन, कम्युनल असले शब्द वापरून मुद्दा अस्तित्वातच नैय्ये असं भासवलं जातं.
पण इस्लामच धर्मच अशा टोकाच्या
पण इस्लामच धर्मच अशा टोकाच्या प्रतिक्रिया का incite करतो? अगदी गळ्यात गळा घालून बोटचेपेपणे उदोउदो किंवा मग तुमच्यासारखा कडवा विरोध. याचे कारण मला वाटतं त्या धर्मा
नेमधील अतिरेकी लोकांनी (पॉलिटिकली करेक्ट रहाते) उभ्या केलेल्या भीतीमध्ये आहे. उदा - चार्लेस हेब्दो.म्ला तर ना सायकॉलॉजिकली वाटतं हे जे अतिरेकी दाढीच्या दाढी वाढवुन, बंदुका घेऊन स्वतःला उग्र रुपात दाखवतात ना त्यातही हे भीतीचे मूळ आहे.
दाढ्या आधी शेव्ह करा यांच्या मग पहा कोण घाबरतं ते. हे सटल्/सूक्ष्म पॅरॅमीटर्स सायकॉलॉजिकली परिणाम करत असावेत ....................... (थांबा या थिअरीस पाठींबा देणारे काही मटीरीअल मिळते का ते पाहू देत)
________
https://newrepublic.com/article/116472/psychologists-bearded-men-look-ol... - Want to Look Older and More Aggressive? Grow a Beard (Dixson and Vasey then showed the “angry” pictures to over 200 men from Samoa or New Zealand, and had them guess how physically aggressive the men were. Men of both cultures judged the bearded men as significantly more aggressive than their clean-shaven counterparts.)
पाठिंबा देणारे मट्रेयल
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
आवरा!!
आवरा!!
>>हे सटल्/सूक्ष्म पॅरॅमीटर्स
>>हे सटल्/सूक्ष्म पॅरॅमीटर्स सायकॉलॉजिकली परिणाम करत असावेत
+१. म्हणजे घाबरण्याविषयी नाही पण जेव्हा मी गोल टोपी घातलेला आणि मिशीविना दाढी वाढवलेला मुसलमान पाहतो तेव्हा "याला मुद्दाम अशी दाढी वाढवण्याची आणि ती टोपी घालून फिरण्याची काय गरज आहे?" असा विचार मनात येतो. असाच विचार बोटभर शेंडी ठेवणारे लोक ऑफिसांतून दिसतात तेव्हाही येतो.
विशेष म्हणजे शीख व्यक्तीबाबत असा विचार कधीच येत नाही. (का ते ठाऊक नाही). उलट यांना हे किती त्रासाचं आहे (दाढी सांभाळणे, फेटा सतत बांधणे) असा दयार्द्र विचार मनात येतो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
विशेष म्हणजे शीख व्यक्तीबाबत
याचाच अर्थ असा की हा कॉग्निटिव्ह बायस आहे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
बायस
बायस हा प्रकार फार विचित्र आहे. मनात बायस असू नये म्हणणे सोपे आहे; पण बायस कोणी स्वतःहून मनात तयार करत नाही. आयुष्यात घडलेल्या घटनांचा, प्रसंगांचा तो परिपाक असतो असे म्हणता येईल. बर्याचवेळा बायस इंड्यूससुद्धा केला जातो मनात. बायस इंड्यूस करण्याची सुरुवात वेगळेपणा जपण्यातून होते. स्वतःच्या वेगळ्या भावना व श्रद्धा असणे ह्याला कोणीच वाईट म्हणत नाही पण जेव्हा त्या भावना/श्रद्धा/आवडीनिवडींची जपणूक करताना स्पेशल वागणूक दिल्याची भावना इतरांना झाली आणि असे लोक दुसर्यांसाठी थोडेही आणि तात्पुरतेही कशालाच मुरड घालत नसतील तर संताप येतोच.
अशा स्वतःचा वेगळेपणा जपण्याची एक स्पेशल वृत्ती असते. ह्या लोकांच्या मनात आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत अशी भावना आहे की काय अशी शंका यावी अशी त्यांची वागणूक असते. उदा. बुरखा घालणार्या बायांना चातित्र्यवान म्हटलं की बुरखा न घालणार्या बायांना चारित्र्यहीन म्हणायची गरजच पडत नाही. नुसता एक तुच्छ दृष्टीक्षेप पुरतो. फेसबुकवर न्या. काट्जूंची शरीया कायदा आणि बुरखा वगैरेच्या विरोधातली एक पोस्ट पाहिली. उत्सुकता म्हणून काही कॉमेंट्स पाहिल्या. अपेक्षेप्रमाणे बहुतेक मुसलमानांच्या म्हणण्याचा सारांश असा की बुरखा वाईट तर मग काय बिकीनी चांगली का? बुरखा किंवा हिजाब स्त्रियांच्या मॉडेस्टीसाठी आहे.
म्हणजे बिकीनी घालणारी बाई चारित्र्यहीन व बुरखा न घालणार्या मॉडेस्ट नाहीत हा बायस त्यांच्या डोक्यात पक्का आहे. शाकाहारी लोकांसारखच. ते नुसते वेगळे नाहीत तर दुसरे वाईट आहेत म्हणून ते वेगळे आहेत असं दाखवल्याची चीड येते.
आता लेटेस्ट म्हणजे स्वित्झर्लंडमधली हँडशेकची केस. हस्तांदोलन करण्यातसुद्धा जर हे नाटकं करणार असतील आणि तेही मुसलमान पुरुष आणि मुस्लिमेतर स्त्री असं असताना तर बायस नसलेल्या समानतावाद्याचंही टाळकं सरकेल. किंबहुना समानतावाद्याचं टाळकं जास्त सरकेल.
बाकी सेक्शुअल सप्रेशन आणि त्याचे परिणाम ह्यावर नंतर कधीतरी. अमेरिकेतले बहुतेक मासशूटर्स सेक्शुअली फ्रस्ट्रेटेड असतात. जिथे बाईचं नखही दिसत नाही तिथे ७२ अप्सरांच्या अमिषाने खूनखराबा करणारे पैशाला पासरीभर असणे ह्यात आश्चर्य काहीच नाही.
न्या. काट्जूंची शरीया कायदा
पर्दा नही जब कोई खुदासे, बंदो से पर्दा करना क्या?
...
आपला प्रतिसाद आपल्याच प्रतिसादाच्या प्रकाशात वाचून पाहिला. मजा आली.
..........
(अतिअवांतर: लोकांना दोन भयंकर वाईट सवयी असतात: आत्मस्तुती, आणि परनिंदा. आपल्याला (बोले तो, मला) मात्र या दोन्ही सवयी नाहीत ब्वॉ!)
अतिअवांतर: लोकांना दोन भयंकर
सॉलिड!!
तरी अजून सोवळे-ओवळे आणि
तरी अजून सोवळे-ओवळे आणि शिवाशिव पाळणार्या लोकांबद्दल किंवा अजूनही स्वतःला घोडे आणि मागासवर्गीयांना गाढवं समजणार्यांबद्दल लिहीलं नाहीय अन्यथा आणखी मजा आली असती.
पैसा, सत्ता, बायका यासाठी हपापलेल्या गुंडांच्या टोळ्या
आयसीस , बोको हराम , अल शबाब या मुख्यतः पैसा, सत्ता, बायका यासाठी हपापलेल्या गुंडांच्या टोळ्या असून त्यांनी ठार मारलेले निदान ९५% लोक मुसलमानच आहेत. या लोकांचा "निषेध" वगैरे करून काही होणार नाही तर सैन्य घुसवून त्यांना नष्टच करावे लागेल एव्हढाच माझ्या पोस्टेड कवितेचा मुद्दा होता. सैन्य घुसवायला अमेरिका, पाश्चिमात्य राष्ट्रे आणि स्थानिक मुसलमान राष्ट्रे यांची इतकी का फाटते आहे हा एका वेगळा लेखाचा मुद्दा होईल.
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
पाने