ही बातमी समजली का? - ८०
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
=====
अमर्त्य सेन म्हणतात मला मोदी सरकारने नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरु पदावरून हाकलले
लेख + मुलाखत
बातमी कोणती वाचाल त्यावरून तुमची चौकट ठरेल. मुळात, 'न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स'मध्ये लेख येणार आहे. त्याविषयी मुलाखत टाइम्स गटाला दिलेली आहे. 'इकॉनॉमिक टाइम्स'मध्ये त्याविषयी आलेल्या बातमीनुसार नालंदाचा मुद्दा केवळ उदाहरणादाखल आहे. त्याशिवाय ह्या संस्थांमधल्या नेमणुकांबद्दल सेन बोलले आहेत - TIFR, NBT, ICCR, ICHR, IIT दिल्ली + मुंबई, IIM.
Speaking exclusively to TOI ahead of the publication of the essay, Sen lashed out at what he called the "extraordinarily large" interference by the government in academia. [...] "Nalanda not a one off incident. Nothing in this scale of interference has happened before. Every institution where the government has a formal role is being converted into where the government has a substantive role."
अमर्त्य सेन ह्यांची ही मुलाखत
मिंटला दिलेल्या ह्या मुलाखतीत सेन ह्यांनी सेक्युलरीझमला असलेला धोका वाढला आहे ह्यावर जास्त भर दिल्यासारखा वाटतो आहे. अर्थात शेवटी नालंदाबद्दलच्या प्रश्नांनासुद्धा उत्तरे दिलेली आहेत.
मला स्वतःला अजून 'नालंदा' नावाचं विद्यापीठ परत उभं, सुरू, जबरी करण्याचा प्रयत्न काही समजलेला नाही. आणि सेन ह्यांच्यासारखा माणूस त्यात यावा ह्याचं खरं मला आश्चर्य वाटतं. अर्थात सेन ह्यांचं लिखाण वाचलं कि अनेकदा त्यांची दार्शनिक, चिंतक अशा धाटणीच्या लोकांची असलेली जवळीक जाणवते.
काहीही मूल्य नसलेला हा राडा कशाला असं आहे?
लेबर लॉजमध्ये काही बदल होऊ शकतात असं एक बातमी म्हणते. कामगार कायदे आणि शेती हि भारताची खरी दुखणी आहेत.
सेन यांची आणखी एक मुलाखत
'इंडियन एक्स्प्रेस'मधली सेन यांची मुलाखत. (सनसनाटी मथळ्यावरून जाऊ नका, मुलाखत अनेक विषयांभोवती फिरते.)
कालिदास आणि मृच्छकटिक
संस्कृत साहित्याबद्दलचे त्यांचे वाक्य.
I think Meghdootam is extraordinarily important to understanding Indian culture. But my favourite Kalidasa play is Mricchakatika — and it had a profound influence on my understanding of justice.
विकी:https://en.wikipedia.org/wiki/M%E1%B9%9Bcchakatika
Mṛcchakaṭika (The Little Clay Cart) (Sanskrit: मृच्छकटिका; also spelled Mrcchakatika, Mricchakatika, or Mrichchhakatika), is a ten-act Sanskrit drama attributed to Śūdraka (Sanskrit: शूद्रक), an ancient playwright generally thought to have lived sometime between the second century BC and the fifth century AD whom the prologue identifies as a Kshatriya king and a devotee of Siva who lived for 100 years.
मृच्छकटिक हे कालिदासाने नसुन शुद्रकाने लिहिले आहे हि एक फॅक्ट आहे. त्यांना हे माहिती असावे असे त्यांच्या संस्कृत च्या अभ्यासावरुन वाटले.
ही प्रिंटिंग एरर आहे का? तसे वाटत नाही. कारण मागच्याच ओळीमध्ये 'मेघदूतम' चा उल्लेख आहे.
असो. बाकी त्यांनी सांगितलेल्या बर्याच गोष्टींबद्दल असहमती आहे.
त्या मुलाखतीखालीही कोणीतरी
त्या मुलाखतीखालीही कोणीतरी तासाभरापूर्वी (मी प्रतिक्रिया लिहिण्याच्या तासभर आधी) हेच म्हटलंय -
There is a howler in the Amartya Sen interview. Mrichchakatika was not penned by Kalidasa. Yours etc., Khagen Sharma
न लिहिलेलं वाचण्यातली, तीच चूक अनेक लोकांनी करणं curious (मराठी शब्द?) वाटलं. इंग्लिश लिखाणात शब्दांमधली अक्षरं इकडेतिकडे फिरवली तरी लेखन वाचता येतं, कारण आपण काय शब्द असणार त्याची अपेक्षा ठेवत वाचत असतो, अशा अर्थाचं फॉरवर्ड त्या निमित्ताने आठवलं.
अजिबात गोंधळ होत नाहिये.
अजिबात गोंधळ होत नाहिये. सकाळपासुन काही युपीएससी करणारे मित्रांबरोबर हीच चर्चा सुरु आहे. त्यांना सुद्धा हाच प्रश्न पडला होता.
माझा प्रतिसाद हा ४.५२ वाजताचा आहे. इंडियन एक्स्प्रेसने ती मुलाखत ५.५३ वाजता अपडेट केली आहे. त्याच लेखाच्या सुरुवातीचे डीटेल्स.
Written by Amrita Dutta | New Delhi | Updated: July 8, 2015 5:53 pm
छोट्या निरीक्षणा प्रमाणे ८०%
छोट्या निरीक्षणा प्रमाणे ८०% हुन जास्त लोकांनी ह्या स्टोरी ला डिस्लाइक केले आहे. हे नक्कीच रोचक आहे आणि ते देखिल इं.ए. वाचणार्यां हुच्च भुभुंकडुन म्हणजे तर जास्तच रोचक.
I think he ( पक्षी मोदी ) has a wrong understanding of economic development -
आपल्याला किंमत दिली नाही की त्या व्यक्तीची समज डायरेक्ट चुकीचाच आहे हा निष्कर्ष काढणे हे पण बंगालीबाबांच्या विचारसरणीला अनुसरुनच आहे. हेच जर मोदींनी त्यांना प्लॅनिंग कमिशनवर ठेवले असते तर मोदींचे गोडवे गातागाता गाल फाटले असते.
संस्कृत माझा आवडता विषय आहे असे सांगणार्याने मृच्छ्कटीक कालीदासाचे नाही हे ही विसरुन जावे हे फारच गमतीशीर आहे. आणि कीती फरक आहे कालीदासाच्या आणि मृच्छ्कटीक ( किंवा मुद्राराक्षस ) ह्यांच्या विषयात ....
वाव्वा!
>> आपल्याला किंमत दिली नाही की त्या व्यक्तीची समज डायरेक्ट चुकीचाच आहे हा निष्कर्ष काढणे हे पण बंगालीबाबांच्या विचारसरणीला अनुसरुनच आहे. हेच जर मोदींनी त्यांना प्लॅनिंग कमिशनवर ठेवले असते तर मोदींचे गोडवे गातागाता गाल फाटले असते.
प्रचंड सहमत. पाश्चात्य देशांनी उगीचच नोबेल्बिबेल देऊन त्यांना अवाजवी महत्त्व दिलं आहे. असल्या फडतूस माणसांना त्यांची योग्य जागा कशी दाखवून द्यायची हे मोदींकडून नक्कीच शिकण्यासारखं आहे.
एखादा माणुस शिकलेला किंवा
एखादा माणुस शिकलेला किंवा अगदी पारीतोषिके मिळालेला असला म्हणजे मनानी क्षुद्र असतच नाही असा काही नियम आहे का?
पूर्वीच्या शास्त्रीय संगीतातले कित्येक थोर कलाकारांचे वागणे कधी कधी पार खालच्या स्तरावरचे असायचे. अगदी गालिब नी सुद्धा बहाद्दुरशहाची एखाद्या भाटा सारखी स्तुती केली आहे.
एकुणच इकॉनोमिक्स मधे अनेक परस्पराविरोधी विचार असताना, दुसर्याच्या समजे ला डायरेक्ट चुकीचे समजणे आणि ते देखिल मिडीयात म्हणजे वयानुसार वागायची समज आली नाही असे नाही का वाटत?
तसेही मोदीच्या गेल्या १ वर्षात आणि सोगाच्या आधीच्या १० वर्षामधे धोरणात्मक असा काय विशेष फरक आहे? एकीकडे काँग्रस मोदी आमच्याच स्कीम नावे बदलुन चालवते आहे असा दावा करतीय. मग नक्की प्रॉब्लेम काय आहे?
गरीब-श्रीमंतांमधली दरी वाढण्याबद्दल चिंता
हेच अमर्त्य सेन गेल्या काही काळापर्यंत गरीब-श्रीमंतांमधली दरी वाढण्याबद्दल चिंता व्यक्त करत होते आणि तेव्हा याच काँग्रेसचं राज्य होतं ना?
(प्रच्छन्न मोड बंद) मोदी सरकारचा विरोध म्हणजे काँग्रेसची तळी उचलणं नव्हे हे न समजणाऱ्यांना नक्की कितपत माहिती, आकलन आहे याची चौकशी करण्यासाठी हा प्रतिसाद. (/प्रच्छन्न मोड बंद)
ऑन अ सिरियस नोट - आपण
ऑन अ सिरियस नोट -
आपण सरकारमधे येण्यापूर्वी आपण सरकारमधे येऊ नयेत असे वाटणारे, तशा कृति करणारे लोक हे आपल्या काळात, कितीही कर्तृत्ववान असले तरी सत्तेपासून दूर ठेवले पाहिजेत.
सबब
१. अमर्त्याला इग्नोरणे
२. श्याम बेनेगलला ( रादर मोदी निवडू नकात म्हणणारी, तसे जाहिर पत्र सर्क्यूलेट करून, आपली प्रतिष्ठा त्या विचारामागे लावणारी, ती पूर्ण ७०-८० लोकांची गँग) डावलणे
हे योग्य आहे.
त्या सहीवाल्यांच्या यादीत
त्या सहीवाल्यांच्या यादीत त्याचं नाव नाही. पण तो सिक्यूलर आहे. भारतीय सिनेमा देखिल या लोकांनी बुद्ध्या सेक्यूलर ठेवला आहे नि असे केल्याची ते जाहिरात पण करतात. असो.
पण ते पत्र वादग्रस्त ठरलं तेव्हा त्याचं समर्थन केल्याचं आठवतं (अरुण दुवा देत नाही म्हणायचं असेल तर हे वाक्य खोटं मान).
एक तर एमिनेंट नि वर सिक्यूलर म्हणून त्यांना संसदेत रेड कार्पेट मिळाली होती. त्या निष्ठा बोलणारच.
थोडी गंमत
नोबेल विजेत्यांबद्दल आम्हाला नुकतच एक मार्गदर्शन केलं गेलं होतं.
http://www.aisiakshare.com/node/4173#comment-104305
अगदी नोबेल पुरस्कारविजेता शास्त्रज्ञ असला तरीही त्याच्या पीअर रिव्ह्यूड जर्नल्स वगळता अन्य वक्तव्यांना भाव का देऊ नये (किंवा भाव देताना तारतम्य का बाळगावं) याचं ताजं उदाहरण -
नोबेल प्राईज मिळाले नि तरीही
नोबेल प्राईज मिळाले नि तरीही चूक केली म्हणून बच्चे कि जान लोगे क्या? एखादी माहिती नसणं, चुकीची असणं किंवा अशा गोष्टीचं प्रदर्शन होणं याचा इतका बाऊ का करायचा? त्याच्या मोदीविरोधाचा विरोध करून वट्टा काढायची कोणतीही जागा सोडायची नाही का?
उजव्या चळवळीच्या बुद्धिभ्रष्ट (अशा*) विरोधकांचे मुद्दे खोडणे आवश्यक आहे. पण या स्तराला जायची गरज नाही.
===============================================================================
* सारेच विरोधक बुद्धिभ्रष्ट असतात असे नव्हे. काही योग्य तो विरोध करतात. भाषेचे दौर्बल्य आड येऊ नये म्हणून मुद्दाम 'अशा'.
नमो आणि भक्त
हे फारच मनोरंजक आहे -
ती धार्मिकपेक्षा जास्त करून
ती धार्मिकपेक्षा जास्त करून राजकीय घटना आहे. (असे मला वाटते).
[उच्चवर्णीयांच्या पारंपरिक हितसंबंधांना बाधा निर्माण करणार्या सर्व नव्या युगाच्या इन्स्टिट्यूशन्स- पक्ष, संघटना, विचारधारा- यांचा विरोध करणे आणि पारंपरिक हितसंबंधांना सांभाळेल असे वाटणार्या इन्स्टिट्यूशन्सची पाठराखण असे त्यांचे स्वरूप आहे. ]
याच्या उलट व्याख्या करून इंटरनेट लिबरल असा वर्ग असल्याचे दाखवता येईल. :)
त्यांचे मुकुटमणी तसे असले तरी
त्यांचे मुकुटमणी तसे असले तरी सर्व जन्तेला हे झेपत नाही.
जर हा सगळाच प्रकार अगदी मुद्दाम योजनाबद्धपणे चालतो असे म्हणायचे असेल (मोदी फॉलोवर लोकांना भेटले या एका विदाबिंदूवरून इ.) तर धर्माच्या मुखवट्याखाली चालतो असे म्हणता यावे.
नपेक्षा सामान्य जन्तेचे परंपरागत विचार-शक्यतो सेकुलरिझम् अॅज़ प्रॅक्टिस्ड बाय मीडिया ची रिअॅक्शन म्हणून- असे म्हणणे अजून योग्य.
सर्व नव्या युगाच्या
सर्व नव्या युगाच्या इन्स्टिट्यूशन्स- पक्ष, संघटना, विचारधारा- यांचा विरोध करणे आणि पारंपरिक हितसंबंधांना सांभाळेल असे वाटणार्या इन्स्टिट्यूशन्सची पाठराखण असे त्यांचे स्वरूप आहे.
आरेसेस चे ??
अगदी अगदी.
उदाहरणार्थ - इथे पहा. यात ट्रॅडिशन हा शब्द बावीस वेळा, व कल्चर हा शब्द बत्तीस वेळा आलेला आहे. भारतीय कल्चर या अर्थाने. दुसरा कोणता ??
टेक्नॉलॉजी हा शब्द ३ वेळा फक्त.
बाय द वे individual हा शब्द पंच्याऐशी वेळा.
( आता लगेच - शब्द किती वेळा आले ते सांगितले की मुद्दा सिद्ध होतो असे नाही, गब्बर - असा डायलॉग मारतीलच कोणीतरी. )
block porn sites खर्याची
खर्याची दुनिया राहीलेली नाही हेच खरे.
The petitioner most
The petitioner most respectfully submits that most of the offences committed against women/girls/children are fuelled by pornography. The worrying issue is the severity and gravity of the images are increasing. It is a matter of serious concern that pre-pubescent children are being raped
हे पिटीशनरचं सबमिशन कोर्टाने मान्य केलं की नाही हे समजायला मार्ग नाही!
प्रौढ आहात तर...
Can’t stop an adult from watching porn in his room, says SC
Declining a plea to pass an interim order to block porn websites in India, the Supreme Court on Wednesday said it cannot stop an adult from exercising his fundamental right to personal liberty to watch porn within the privacy of his room.
दांभिकपणाची हद्द
एकिकडे पॉर्न वाईट म्हणणारांना हाणून पाडणारे न्यायालय कित्ती छान!
दुसरीकडे गजेंद्र चौहानने जंगल लव, हवस, असल्या चित्रपटांत काम केले म्हणून त्याची FTII चा प्रमुख बनायची लायकी नाही असं म्हणायचं.
===========================================
काय बोललं जातंय ते महत्त्वाचं नसतं, किती एलिट लोक असं बोलतात ते महत्त्वाचं. एलिट समाजाच्या शेजारी थांबलं कि आपणही एलिट दिसतो.
कै च्या कै लिहिलेय तुम्ही
कै च्या कै लिहिलेय तुम्ही अजो.
पॉर्न पाहणारी व्यक्ती आपल्या घरात पाहत आहे. तिच्या निगेटिव्ह एक्स्टरनॅलिटीज नगण्य आहेत. म्हणून न्यायालयाने भूमिका घेण्यास नकार दिला. पॉर्न पाहणे हे समस्याजनक असलेच तर त्याचे वाईट परिणाम त्या व्यक्तीस मुख्यत्वे भोगावे लागतील. पॉर्न मधे अॅक्टिंग करणार्या व्यक्तीबद्दल वेगळा विवाद केला जाऊ शकतो.
पदावर बसण्यासाठी जी अर्हता आहे त्यात क्रेडिबिलिटी, लीडरशीप ह्या बाबी आहेत. व तिथे नेमके गजेंद्र चौहान ची उमेदवारी कमी पडते. खूप कमी पडते असा दावा आहे. त्यांच्यापेक्षा इतर अनेक लोक असे आहेत की जे त्यांच्या कित्येक पटीने पात्र आहेत. Why would individuals be motivated to follow him ?? What leadership qualities has he demonstrated ?? Where exactly can he exercise his influence ?? Does he have any ? कामाबद्दलची भूमिका, कर्तृत्व, रिझल्ट्स, पद्धती, यात कुठेही त्यांचे स्थान ठळक नाही. असल्यास कुठे ?
Remember competition ?
-----------
काय बोललं जातंय ते महत्त्वाचं नसतं, किती एलिट लोक असं बोलतात ते महत्त्वाचं. एलिट समाजाच्या शेजारी थांबलं कि आपणही एलिट दिसतो.
एलिटिझम च्या अस्तित्वावरच तुम्ही घाला घालताय की काय ?
गजेंद्र चौहान हे एलिट नाहीत म्हणून त्यांना ते पद दिले जाऊ नये असा जर मुद्दा असेल तर तो योग्यच आहे.
आता एलिट बनण्याचे नेमके निकष सांग गब्बर - असा प्रश्न विचारालच तुम्ही.
Merit consciousness
पॉर्न पाहणारी व्यक्ती आपल्या घरात पाहत आहे.
चार दिवारी के अंदर म्हटल्याने कृतीची योग्यायोग्यता कशी ठरते? उद्या तुम्ही चार दिवारी के अंदर चर्चगेट स्टेशन कशे उडवायचे याचा प्लॅन तयार केलात तर ही कृति चार दिवारी के अंदर आहे या निकषावर योग्य ठरेल कि काय?
======================================================================
तिच्या निगेटिव्ह एक्स्टरनॅलिटीज नगण्य आहेत.
हे खोटं आहे. (साधेसुधे) चित्रपट पाहण्याचा समाजावर परिणामच होत नाही म्हटल्यासारखं आहे हे. पॉर्न पाहणारावर तर प्रचंड परिणाम होतोच, त्याच्या स्पाउसवर होतो नि त्याच्या संपर्कात येणार्या प्रत्येक व्यक्तिवर होऊ शकतो. हा गंभीर मामला आहे.
न्यायालयानं रेग्यूलेटरी फ्रेमवर्क बनवावं, सरळ सरसकट सुट देऊ नये.
शिवाय पॉर्न हा मुख्य टायटलखाली जे मुख्य ५०-१०० प्रकार असावेत नि ५०० उपप्रकार असावेत ते देखिल विचारात घ्यावेत अशी विनंती.
==================================================================
गजेंद्र चौहान ची उमेदवारी कमी पडते.
१. गजेंद्र चौहान मुळे संस्थेचे काय नुकसान झाले आहे?
२. उमेदवारीच्या कोणत्या निकषात गजेंद्र बसत नाही? (खमोचा -अध्यक्ष सेक्यूलर नि काँग्रेस धजिर्णा असावा या?
http://indianexpress.com/article/india/india-others/the-ftii-presidenti… -खमोबं)
३. अगोदरच्या अध्यक्षांची कर्तृत्वे कोणती? (प्रसिद्ध असण्याशिवाय)
तरीही...
गजेंद्र पदाला लायक नाही हे आपण मान्य करू.
पण पदाला लायक नसलेला माणूस पदावर असणे आणि पदपात्र असलेले लोक पदावर नसणे असा प्रसंग भारतात पहिल्यांदा होतोय का? मग साला इतके जाज्वल्य "पात्रताप्रेम" नेमके याच केसमधे का उफाळून आलेले आहे? म्हणजे जपानमधे सगळ्याच प्रकारच्या स्रोतांची बोंबाबोंब असताना तो एक आर्थिक नि सामाजिक दृष्ट्या विकसित देश आहे. तिथे कदाचित सगळे "पात्र" लोक पदभार सांभाळत असावेत. भारतात तसे पाहिल्यास कोणत्याच स्रोताची इतकी मारामार नाही. म्हणजे त्यामानाने कमी पात्र लोक पदावर असते तरी अवस्था जपानसारखी चांगली असती. पण आपल्याकडे लगभग सर्वच पदांवर अपात्र लोक आहेत नि स्वातंत्र्यापासून आहेत नि ते आपल्याला चालते. म्हणूनच नै का भारत एक पोटेंशिअल असलेला पण आर्थिक व सामाजिक दोन्ही बाबींत मागास देश आहे. आपल्याकडचे बरीच पदे घ्या नि पदस्थ घ्या. आवश्यक पात्रता नि अॅक्च्यूअल पात्रता पाहा. काय आढळते? समस्या सोडवणे जाऊ द्यात, समस्या जाणवणे, समस्या समजणे हे प्रकार तरी दिसतात का?
I am curious of the special case of the unprecedented "merit consciousness" in Ganjendra's case.
समस्या सोडवणे जाऊ द्यात,
समस्या सोडवणे जाऊ द्यात, समस्या जाणवणे, समस्या समजणे हे प्रकार तरी दिसतात का?
इथे एकाने विनोदी श्रेणी दिली आहे. त्यास माझी एक प्रामाणिक मनन करण्याची विनंती आहे.
--------
पुणे स्टेशनवर कधीच न फ्लश केलेल्या हागंदारीचा वास येतो. हे जाणवायला, समजायला आणि सोडवायला इतक्या दिग्गज पुणेकरांना कठीण आहे का? हे लज्जास्पद प्रकरण नाही का? पुण्याचे रेल्वे व्यवस्थापन असे करतेय हे गेली १५ वर्षे मी पाहतोय. एफ टी आय आय देखिल पुण्यात आहे. रोज लाखो पुणेकरांच्या जीवनाला स्पर्श करणारा रेल्वे स्तेशनच्या स्वच्छतेचा प्रश्न आहे, तो जाणवणारा नि सोडवणारा माणूस (पुणे रेल्वे प्रमुख) एक "पात्र" व्यक्ति नको का? ते एफ टी आय आय पेक्षा कितीतरी पट महत्त्वाचं आहे.
जिथे बेसिक्क लज्जेचा प्रश्न येतो तिथे आपला मेरीट काँशसनेस का मेलेला असतो? आणि एफ टी आय आय सारख्या पेज ३ ठिकाणी इतका वर का असतो?
Since when merit has become so important?
एलिटिझम च्या अस्तित्वावरच
एलिटिझम च्या अस्तित्वावरच तुम्ही घाला घालताय की काय ?
असं करण्याचं "स्वातंत्र्य" नसावं की काय?
================================================
स्पष्टीकरण
गजेंद्र चौहान हे एलिट नाहीत
असं नै म्हणालो मी. न्यायालय एलिट आहे. पोर्न मागास म्हणणारे बूर्झ्वा आहेत. मेघना न्यायालयाच्या बाजूने पॉर्न चालू देत म्हणते.
दुसरीकडे गजेंद्रचा चित्रपटक्षेत्रातला 'तसला' अनुभव गजेंद्रला लायक बनवण्यास पुरेसा नाही असेही मानते.
छे छे! इतका सीधा मामला नसतो
छे छे! इतका सीधा मामला नसतो बाबा मराठी संस्थळांवर. (जालीय वय किती तुझं? ;-)) हे साधंसुधं तर्कशास्त्र आपल्यासारख्या नॉर्मल माणसांना संस्थळबाह्य गोष्टींसाठी वापरता येईल. इथे मराठी संस्थळावर माझ्या प्रतिसादाचे खालीलप्रमाणे अन्वयार्थ होतात:
१) माझ्याशी उकरून काढलेला वाद मी पाहिला आहे. (वाचल्याची नोंद)
२) त्यांच्या म्हणण्याशी मी सहमत नाही. (असहमतीची नोंद)
३) पण मी वाद घालू इच्छित नाही. (अनिच्छेची नोंद)
ते लिहिलं नाही, तर ’पळ काढला’ / ’आता का दडून बसलात’ / ’आता कुठे गेला तुमचा धर्म’ / ’बोला ना बोला’... या आणि अशा प्रकारच्या अनेक वाक्यांना जन्म दिला जातो. (लिहिल्यानंही परिणाम होतातच. पण मला, काही विशिष्ट लोकांच्या बाबतीत तरी, लिहून होणारे (दुष्)परिणाम अधिक स्वीकारार्ह आहेत.) कळले?!
या घोटाळ्यासंबंधी जितके बाहेर
या घोटाळ्यासंबंधी जितके बाहेर येतंय ते धक्कादायक आहे
सहमत.
अशा परिक्षा देऊन जे डॉक्टर वा अन्य पदांवर पोचले आहेत त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी.
नाही. तिथेच तर भिती आहे. या
नाही. तिथेच तर भिती आहे.
या घोटाळ्या द्वारे कोणी दुसर्यानेच परिक्षा दिलेली असु शकते किंवा त्याने पेपरात काहिहि लिहो पास होण्याची ग्यारंटीही मिळाली असु शकते.
अधिक तपशीलवार इथे वाचता येईल
पुस्ती
आपण महाराष्ट्रात किंवा देशात मुंबई, पुणे इ सारखी शहरे सोडून अन्यत्र कुठे परीक्षाकेंद्रावर गेला आहात काय?
१०० परीक्षार्थ्यांपैकी फार तर ५ जणांची ओढून ताणून पास व्हायची लायकी असते.
तरीही निकाल इतका लागतो.
व्यक्तिगत कॉपी, सामूहिक कॉपी, बाहेरून मदत, नविन कठीण प्रश्नांचे उत्तर सर्क्यूलेट होणे, इ इ अन्य ९५% मुले करतात.
=============================================================================================
१० वी च्या वा १२ वी च्या उदगीर वा हेर (तालुक्यातले अजून एक गाव) सारख्या केंद्राचे १००० पेपर काढले, तर एका विशिष्ट प्रश्नाच्या (जसे प्रश्न ४ ब) ९०० जणांच्या उत्तरात एकाही शब्दाचा फरक नसतो!!!!!!!!!!
आपण महाराष्ट्रात किंवा देशात
आपण महाराष्ट्रात किंवा देशात मुंबई, पुणे इ सारखी शहरे सोडून अन्यत्र कुठे परीक्षाकेंद्रावर गेला आहात काय?
१०० परीक्षार्थ्यांपैकी फार तर ५ जणांची ओढून ताणून पास व्हायची लायकी असते.
तरीही निकाल इतका लागतो.
व्यक्तिगत कॉपी, सामूहिक कॉपी, बाहेरून मदत, नविन कठीण प्रश्नांचे उत्तर सर्क्यूलेट होणे, इ इ अन्य ९५% मुले करतात.
पूर्ण सहमत
"We learned our lesson - why
"We learned our lesson - why can't the Greeks learn the same lesson?"
A piece of sarcasm popular on Slovak social media sums up the frustration with Greece: "Adopt a Greek for 500 euros. He'll do everything you don't have the time for: sleep until noon, drink coffee, take a siesta and in the evening he will even go to the bar for you. At last, you'll have the time to work two jobs."
--------------------
EU countries were asked which nation works the hardest
--------------------
बशर नवाज गेल्याची बातमी
बशर नवाज गेल्याची बातमी वाचली..
त्यांच्या आठवणीसाठी त्यांचेच काही:
...........................
जाने क्या देखा था मैंने ख्वाबमें
फंस गया फिर जिस्म के गिर्दाबमें
तेरा क्या, तू तो बरसके खुल गया
मेरा सबकुछ बह गया सैलाबमें
..............................
बहुत था खौफ जिसका फिर वही किस्सा निकल आया
मेरे दुखसे किसी आवाजका रिश्ता निकल आया
सुलगते दिलके आंगनमें हुई ख्वाबोंकी फिर बारिश
कहीं कोपल महक उठ्ठी कहीं पत्ता निकल आया
.................................
अनुपम खेर विरुद्ध गजेंद्र चौहान
चला आजच्या दिवसाची सुरुवात तरी चांगली झाली. अनुपम खेर विरुद्ध गजेंद्र चौहान -
You may look good in a suit standing next to someone like Adoor Gopalakrishnan, but you wont be able to discuss world, regional or Hindi cinema, so you should keep quiet: Anupam Kher to Gajendra Chauhan.
Posted by TIMES NOW on Thursday, July 9, 2015
स्रोत : https://www.facebook.com/Timesnow/videos/vb.218735715310/10155835630615…
Flow Chart : Greece : The The Path to staying in or Leaving EURO
Flow Chart : Greece : The Path to staying in or Leaving EURO
ग्रीस मधे काय होऊ शकते याचा अतिसुलभ फ्लोचार्ट. योगी बेरा चा खालील क्वोट लक्षात ठेवूनच फ्लोचार्ट पाहणे.
Yogi Berra — 'It's tough to make predictions, especially about the future.'
भारतीय मध्यमवर्ग?
ह्या बातमीनुसार भारतात मध्यमवर्ग फक्त २% आहे. पण त्यांची पद्धत योग्य आहे का? जाणकारांनी प्रकाश टाकावा.
Everyone in India thinks they are 'middle class' and almost no one actually is
मुळातच फझी संकल्पना आहे मध्यमवर्ग
शाळेत असताना अभ्यासू मुले माझा अभ्यास झाला असे सांगायला कचरत. नाहीच झाला असे म्हणत. आणि मग मार्क मिळाल्यावर अरे, हे कसं काय असं दाखवत. तसं थोडं 'मध्यमवर्ग' म्हणवून घेणाऱ्यांचं असावं. म्हणजे आता माझ्या आसपास लोक राहतात त्यांच्याकडे वडिलांचा एक, मुलाचा एक असे फ्लॅट आहेत. काही जणांकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून काही आहे. फोर व्हीलर्स आहेत. जर वडील, आई आणि सून-मुलगा पकडले तर त्यांचे मासिक उत्पन्न सहज १ लाखाच्या वर जाते. म्हणजे संपत्ती आणि उत्पन्न अशा दोन्ही बाजूने पाहता. पण हे सगळे स्वतःला मध्यमवर्ग म्हणवतात.
मुळात दोन प्रकारे आपण मध्यमवर्ग आहे असं म्हणू शकतो. एकतर उत्पन्नाच्या रेषा ठरवायच्या, म्हणजे दारिद्र्यरेषा असते तसं आणि त्याप्रमाणे कोण गरीब, कोण मध्यमवर्ग आणि कोण श्रीमंत ते ठरेल. किंवा खालचे २०% आणि वरचे ५% हे दोन गट करायचे (गरीब किंवा श्रीमंत नाही) आणि बाकीचे मधले.
गरिबीला आपण रेषेची व्याख्या लावतो आणि मध्यमवर्गाला दुसरी, त्यामुळे गोंधळ वाढतो.
गोंधळ?
>> जर वडील, आई आणि सून-मुलगा पकडले तर त्यांचे मासिक उत्पन्न सहज १ लाखाच्या वर जाते. म्हणजे संपत्ती आणि उत्पन्न अशा दोन्ही बाजूने पाहता. पण हे सगळे स्वतःला मध्यमवर्ग म्हणवतात.
पण नको ते लोक मध्यमवर्गात गणले जाऊन मध्यमवर्ग फुगतो आहे असा मुद्दा इथे नाहीच आहे. ह्या लेखात दिलेल्या माहितीनुसार जी उत्पन्नरेषा मानली आहे, तिच्याप्रमाणे पाहिलं तर फारच थोडे लोक मध्यमवर्गात गणले जात आहेत हा मुद्दा आहे.
मध्यमवर्गाची व्याख्या जर
मध्यमवर्गाची व्याख्या जर खाण्यापिण्याजेवण्याची, कपड्यांची चणचण नाही असे पण श्रीमंत गणता येणार नाहीत असे लोक असा केला तर मध्यमवर्ग खूप मोठा असणार. (म्हणजे ४०-५० कोटी)
भारतात तर मोठ्या शहरात टूबीएचके फ्लॅट आणि शिवाय जवळच्या छोट्या शहरात आणखी घरे असलेले लोक सुद्धा स्वतःला मध्यमवर्गीय म्हणवतात.
------------------------------
भारतात मोठा मध्यमवर्ग आहे असे कॉर्पोरेट क्षेत्रात म्हटले जाते तेव्हा ते बर्याचदा ओव्हरएस्टिमेट असते. मध्यमवर्गाची त्यांची कल्पना बहुधा आनंदावर* सातत्याने खर्च-उधळपट्टी करणारा वर्ग अशी असते. प्रत्यक्षात अशा प्रकारचा मध्यमवर्ग
५-१० कोटींचाच असू शकेल.
------------------------------
*आनंद (Pleasure) म्हणजे सिनेमा पहाणे, पर्यटन करणे, नवी नवी गॅजेट्स घेणे, कपडे घेणे, हॉटेलात खाणे
मी असं उदाहरण दिलं कारण
अनेक लोक उत्पन्नाच्या सापेक्षतेचा विचार करून स्वतःला मध्यमवर्ग म्हणवतात. पण उत्पन्न रेषांचा विचार करता मध्यमवर्ग म्हणवणाऱ्या लोकांचे उत्पन्न गरिबांच्या उत्पन्नाच्या फारच जास्त पट असते. कारण स्वतःला मध्यमवर्ग म्हणवून घेण्यात अनेकदा गरीब नाही आहोत असं थेट न म्हणणं आणि आहोत वेल ऑफ असंही न म्हणता येणं हा मुद्दा असतो असं वाटलं मला. त्यामुळे मध्यमवर्ग म्हणवून घेणारे जास्त वाटतात पण उत्पन्नाच्या आकडेवारीने ते फार कमी असतात.
गरीब आणि न-गरीब असे दोनच गट हवेत खरंतर. आणि ते उत्पन्न ह्या निकषावर न ठरता 'सुरक्षितता' ह्या निकषावर ठरावेत असं मला वाटतं.
India well prepared to handle
India well prepared to handle Greece crisis: Arvind Panagariya
"Inflation is in check and the current account deficit at its lowest in recent times. At $355 billion, our foreign exchange reserves are at an all-time high. So macro-economically, we are in a sound position and extremely well prepared to handle any situation that may arise," he said.
अहो पनगारिया साहेब - चीन चे इन्फ्लेशन १.४% आहे. भारतापेक्षा कमी आहे. भारतात इन्फ्लेशन ५% च्या आसपास आहे. चीन मधे चालू खात्यातली तूट नाहीच. सरप्लस आहे. चीन कडे परकीय चलनाची भारताच्या किमान ९ पट गंगाजळी आहे. भारताची $355 billion तर चीन ची $३.७३ ट्रिलियन आहे. तरीही चीन मधे क्रायसिस झालेला आहे. तो ग्रीस मुळे नाही हे मान्य. पण प्रश्न असा उपस्थित होतो की ग्रीस चे संकट जर छोटे असेल तर चीन चे प्रचंड संकट कसे निभावणार ???
कायदा अॅमेंडमेंट करून
कायदा अॅमेंडमेंट करून भाड्याचा बाजाराशी संबंध लावण्याचा प्रयत्न स्वागतार्ह आहे.
पण तरीसुद्धा भाडेकरूच्या ऐपतीनुसार भाडे ठरवण्याचा कॅव्हियट ठेवलाच आहे. आणि ८६५ चौ फू पेक्षा जास्त घरांनाच हे लागू असल्याने बहुतांश घरे यातून सुटणार आहेत. फार काही फरक पडेल असे वाटत नाही.
होय पण कमर्शियल जागांना फरक पडेल
खरंतर सर्व घरांनाच सरसकट कायदा लागू व्हायला हवा. वृद्ध किंवा गरीब ह्यांनी कमी भाडं भरावं असं सरकारला वाटत असेल तर सरकारने ती जबाबदारी उचलावी. घरमालकाने भाडेकरूचे वय किंवा उत्पन्न व्हेरिफाय करून भाडेआकारणी करावी हा प्रकारच चुकीचा आहे.
मुळात एकदम महाराष्ट्र सरकारला असा कायदा आणावासा वाटला ह्याच्या मागे काय असावं ह्याचा विचार मी करतो आहे. मला वाटतं असं आहे की अनेक जुन्या इमारतींना क्लस्टर डेव्हलपमेंट नावाच्या जाळ्यात ओढायचा हा बेत असावा. भाडे नियंत्रण कायद्याचे संरक्षण निघते आहे म्हटल्यावर अनेक जुने भाडेकरू रीडेव्हलपमेंटच्या उरलेल्या फायदेशीर रस्त्याला लागतील. आणि मग ह्या सरकारला पाठींबा देणाऱ्या बिल्डरना त्यांच्या पाठिंब्याचा मोबदला देता येईल. अर्थात ही एक थिअरी झाली.
कारण..
करदाते हे कमवते (वृध्द नाहीत असे) असतात आणि वृध्द (सरासरी पाहता) उत्पन्न नसलेले असतात. कुठल्याही देशात सोशल सिक्युरिटी म्हणजे कमावत्या तरुणांनी न कमावत्या वृद्धांना पोसणे असंच असतं. भाड्यातील सबसिडी ही पण एक अशीच सोशल सिक्युरिटी आहे. समजा सरकारने ती दिली नाही पण त्याची तरतूद केली तरीसुद्धा करदातेच ती भरणार आहेत, एकतर घरमालक करदात्यांच्या खिशातून किंवा/आणि एकूणच घरांच्या किंमती वाढल्याने अप्रत्यक्षरित्या. त्यापेक्षा थेट कॅश ट्रान्सफर देणं हे कमीत कमी चुकीचं ठरू शकतं. आणि दुसरा प्रतिवाद म्हणजे वृध्द माणसाच्या नावावर लीज आणि घरात वृध्द आणि त्याचे महिना १.२ लाख कमावणारे मुलगा-सून अशा सीनमध्ये घरमालकाने भांडत बसायचं का? त्यापेक्षा त्या कुटुंबावरच खरं किंवा खोटं वागण्याचा ओनस टाकावं.
वृध्द माणसाच्या मालकीचा फ्लॅट वृध्द माणसास भाड्याने द्यायची केस जरा विशद कराल काय?
करदाते हे कमवते (वृध्द नाहीत
करदाते हे कमवते (वृध्द नाहीत असे) असतात आणि वृध्द (सरासरी पाहता) उत्पन्न नसलेले असतात. कुठल्याही देशात सोशल सिक्युरिटी म्हणजे कमावत्या तरुणांनी न कमावत्या वृद्धांना पोसणे असंच असतं.
सोशल सिक्युरिटी बद्दल आळीमिळी. ग्रीस चा सगळा प्रकार येत्या काही महिन्यात उलगडेल. मग यावर बोलता येईल. तोवर आळीमिळी. ( ग्रीस मधे जे चाल्लंय त्याचा सोशल सिक्युरिटीशी संबंधच नाही असे म्हणण्याचा मोह काहींना होइलच. )
-------
वृध्द माणसाच्या मालकीचा फ्लॅट वृध्द माणसास भाड्याने द्यायची केस जरा विशद कराल काय?
वृद्ध घरमालक हा आपल्या फ्लॅट च्या भाड्यावर जगत असेल तर ?? म्हंजे त्याने आपल्या प्रॉव्हिंडंट फंडातून दोन फ्लॅट विकत घेऊन ते भाड्याने देऊन त्यांच्या रेंट वर गुजराण करायचा प्लॅन असेल तर ? व त्यातला एक भाडेकरू हा वृद्ध असेल ( कारण त्याला गावाकडे राहून कॅन्सर/हृदयविकार/अस्थिरोग च्या उपचारासाठी सारखी शहरात चक्कर मारायला खूप दगदग होत असेल तर ?? ) व त्याने सोय म्हणून उपचारांच्या कालावधीसाठी शहरात भाडेकरू म्हणून रहायचा प्लॅन बनवला असेल तर ??
The erosion of Greece’s
The erosion of Greece’s future
Hundreds of thousands of young Greeks are leaving the country, pushed out by high unemployment and the lack of prospects.
बातमी अत्यंत तुटक आहे. अत्यंत हा अतिशय सौम्य शब्द आहे.
“The most beautiful country in the world,” he said Friday of his native land, before calling it “a sinking ship.”
The exodus of young Greeks — driven by fruitless job searches in Athens, depleting bank accounts and the mass-mailing of applications abroad — marks a massive brain drain that could deprive the country of leading minds for a generation. Regardless of whether the crisis forces Greece from the continent’s single-currency zone, the loss of that talent will cast a shadow over the country.
माझ्या मते हा एक "लेबर ग्लट" आहे ग्रीस च्या शेजारील राष्ट्रांतील उद्योगधंद्यांसाठी.
As a result, Bouras mostly keeps his happy moments in America to himself. He doesn’t share photos of drinking or easy weekends on Facebook. When he met up with 15 Greek friends — mostly recent immigrants — at a rented house in Upstate New York over the Fourth of July weekend, they lounged and ate Bouras’s Greek burgers while Athens was in turmoil over a bailout referendum. Few spoke a word about the weekend to their families.
“Or, look at us right now, drinking a beer at 7:30 p.m.,” Bouras said this week during an interview at a bar near his office. “It’s a little unfair, right?”
He and several Greek friends
He and several Greek friends in New York have recently talked about starting a grassroots group in which they'll set aside part of their paychecks for education and food aid back home.
----------------
Greece entered the euro in 2001, and ex-pat money flooded back into the country.
Greece entered the euro in 2001, and ex-pat money flooded back into the country
कालचे लेख
काल लोकसत्ता मध्ये रुपा रेगेंचा "अडला युरोप, ग्रीसचे पाय धरी!" हा लेख आला होता. त्यांच्या (टीमोथी ली) च्या मते,
आजही हे दिसून येते की, मुक्त व्यापाराचे धोरण असूनही युरोपमधील निरनिराळ्या देशांमधून चालणारा वस्तूंचा व्यापार किंवा भांडवलाची देवाणघेवाण मर्यादितच आहे.
कुठल्याही बेकार ग्रीक नागरिकाला जर्मनीमध्ये किंवा फ्रान्समध्ये नोकरी मिळणे जवळपास अशक्य आहे. याउलट आज अतिशय सहजपणे पेन्सिलाव्हानियात नोकरी गमावलेला एखादा अमेरिकन नागरिक टेक्सासमध्ये जाऊन दुसरी नोकरी पटकावू शकतो.
करन्सी एक्सचेंज रेट रिस्क कमी होते हा एक महत्वाचा फायदा सोडला तर मॉनिटरी युनिअन हा फसलेला मार्ग आहे असं मला काही मतं वाचून वाटते. (ईयु पेक्षा नाफ्ता सारख्या युनियन काय वाईट आहेत?)
काल रुपा रेगेंच्या लेखा खाली संजीव चांदोरकरांचा "कर्जाऊ आरिष्ट" हा लेख पण आवडला होता.
मॉनिटरी युनिअन
नुसतेच मॉनिटरी युनिअन केले ; पण फिस्कल युनियन सोडून दिले; ह्यामुळं घोळ होतो आहे;(वाढतो आहे) असाही एक मतप्रवाह ऐकण्यात आहे.
युरोपिअन युनिअन बनवताना समोर रोल मॉडेल म्हणून अमेरिकेची संयुक्त संस्थाने डोळ्यासमोर होती; काही प्रमाणात भारतही त्या प्रकारात गणता यावा; तोही डोळ्यासमोर असावा; पण गफलत हीच झाली की मॉनिटरी युनिअन केली; सगळ्यांची चलनं सारखीच केली; पण सगळ्यांची सार्वभौम सरकारं आणि अर्थमंत्री मात्र वेगवेगळे ठेवले; त्यामुळे गोंधळ उडाला. अर्थात अर्थसाक्षर नाही; त्यामुळे निव्वळ ऐकिव माहिती टंकतो आहे इतकच.
भारतात एक फायनल असा केंद्र सरकारचा अर्थमंत्री असतो; तो ऑफिशियली किंवा अनऑफिशियली चलन छापणार्या ब्यांकेशी बोलतो. आणी धोरणात सुसूत्रता असते. अर्थमंत्र्याला बर्रेच अधिकार आख्ख्या देशाची पॉलिसी ठरवताना.(अगदि संरक्षणमंत्रालयाला किम्वा गृह मंत्रालयाला वगैरे जरी पैसे लागले तरी त्याबद्दल तो आपली टिप्पणी देउ शकतो.) इ यू इथेच बोंबललं.
सुधीरभाऊ, हे खास
सुधीरभाऊ, हे खास तुमच्यासाठी
पीडीएफ आहे. मी पूर्ण वाचलेला नैय्ये. पण अमेरिका हा "वाटतो तितका" ऑप्टिमम करन्सी एरिया नैय्ये असे लेखकाचे म्हणणे आहे. तुम्ही असे सुद्धा म्हणू शकता की गब्बर "निट पिकिंग" करतोय.
--------
ईयु पेक्षा नाफ्ता सारख्या युनियन काय वाईट आहेत?
नाफ्ता सारखे एफ्टीएज सुद्धा समस्याजनक असतात. अधिक माहीतीसाठी "termites in the trading system" या जगदीश भगवतींच्या पुस्तकाचे तिसरे प्रकरण सुचवतो. एफ्टीए व पीटीए हे भिन्न आहेत. पण ....
केवळ ग्रीसमुळे
केवळ ग्रीसच्या प्रश्नामुळे युरो हा फसलेला प्रयत्न आहे असं म्हणता येईल का? काउंटर फॅक्चुअल काय आहे? मुळात ग्रीसची समस्या हि उत्पादकतेचा अभाव आहे. त्याबद्दल फार काही बोललं जात नाही.
फ्रीडमन हा फ्लोटिंग रेट्सचा समर्थक होता. पण मुंडेल नव्हता. सेन्ट्रल बँकानी कॉर्डीनेट केल्याने अधिक फायदा आहे अशा स्वरूपाचं त्याचं मत होतं, जेवढं मला समजतं आहे.
असं काही आपल्याला पक्कं माहिती नाही कि युरो फसलेला प्रयोग आहे. पण कमोडीटी शिवाय नुसतीच हवेत बनणारी आणि सरप्लस-डेफीसिटची फॉल्ट लाईन अधिक खोल करू शकणारी आंतरराष्ट्रीय चलनव्यवस्था आणि त्यातल्या पॉलिसि हे अजून आपल्याला पूर्ण कळलेलं नाही असं आपण म्हणू शकतो. राजन ह्यांचं हे भाषण.
असे प्रश्न, समस्या निर्माण
असे प्रश्न, समस्या निर्माण होण्यामागे कॉमनसेंस सोडुन काहीतरी कॉम्प्लेक्स विचारानी घेतलेले निर्णय आहेत. ( ह्या विचारांबाबत पण खाली लिहीनच, कारण ह्यात विचारांपेक्षा वैयक्तीक स्वार्थ आहे.). कॉमनसेंस सांगतो तारण असल्या शिवाय कर्ज देवू नका ( आणि दिल्यास विसरुन जा, परत मिळाले तर बोनस ). पण इथे ग्रीस ला कुठलेही तारण न ठेवायला लावता कर्ज वाटली आहेत. हीच गोष्ट भारतात किंगफिशरच्या आणि अनेक चोरांच्या बाबतीत झाली आहे.
आधी ग्रीस ला खाजगी बँका किंवा वित्तीय संस्थांनी कर्ज दिली होती. ते देणारे मूर्ख होते का तारणा शिवाय कर्ज द्यायला? का त्यांचे वैयक्तीक हितसंबंध अशी कर्ज देण्यात गुंतलेले होते? मल्ल्याला कर्ज देताना सरकारी बँकांच्या मंडळींना समजत नव्हते का की कर्जाच्या १० टक्के सुद्धा तारण नाहीये. तो जसा सरळसरळ बॅ़का आणि राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराचा प्रकार होता तसाच ग्रीस चा प्रश्न आहे.
खाजगी बॅ़ंकांच्या काही लोकांनी ही कर्ज पुढे डुबणार हे माहीती असुन ती दिली, त्यात तात्पुरता चांगला दिसणारा ताळेबंद आणि त्यावर मिळणारे बोनस ही कारणे होती तसेच भ्रष्टाचार सुद्धा असणारच. पुन्हा हे ही माहीती होते की जेंव्हा ही खाजगी बँकांची कर्जे बुडीत जातील तेंव्हा सरकार मधे पडुन ती कर्ज आपल्या अंगावर घेइल. हा जर्मन आणि फ्रांस सरकारचा निर्णय सुद्धा कॉमनसेंस सोडुन घेतलेला होता आणि त्यामागची कारणे काळीच असणार.
एकुणातच हे प्रश्न अर्थशास्त्रीय नसुन काही लोकांच्या वैयक्तीक फायदा मिळवण्याच्या लालसेतुन निर्माण झाले आहेत. नंतरची अर्थशास्त्रीय प्रचंड कॉम्प्लेक्स स्पष्टीकरणे आणि भाकीते ही पण वैयक्तीक स्वार्थ आणि स्वताच्या पोटापाण्याच्या सोयी साठी केलेली आहेत.
हे असे सारखे टीपींग पॉईंट आणणे आणि त्या निमीत्ताने मार्केट मधे स्पेक्युलेशन्च्या संधी निर्माण करुन प्रचंड फायदा कमवणे हाही एक छुपा उद्देश आहे. ह्यात बँका, दलाल, राजकारणी, नोकरशहा हे सर्वच गुंतलेले आहेत.
हे असे सारखे टीपींग पॉईंट
हे असे सारखे टीपींग पॉईंट आणणे आणि त्या निमीत्ताने मार्केट मधे स्पेक्युलेशन्च्या संधी निर्माण करुन प्रचंड फायदा कमवणे हाही एक छुपा उद्देश आहे. ह्यात बँका, दलाल, राजकारणी, नोकरशहा हे सर्वच गुंतलेले आहेत.
हे मस्त आहे.
प्रोलेटेरियट ला तिच्या सामाजिक सुरक्षेच्या हव्यासाची जबरदस्त किंमत मोजायला लावणे व त्यातून नफा कमवणे (हे जॉन पॉल्सन ऑफ www.paulsonco.com फेम** करणे) हे शहाणपणाचे.
अनु मॅडम तुमची आवडती वाईन कोणती ??
** पॉल्सन ने ते ह्या ग्रीस च्या प्रकरणात केले असे मला म्हणायचे नाही पण अमेरिकन हाऊसिंग मार्केट मधे मॅक्रो बेट करून केले.
काही इव्हेंट असणार आणि त्या
काही इव्हेंट असणार आणि त्या वर लोक स्पेक्क्युलेशन पण करणारच, त्यात काही चुक नाही.
पण इथे ह्या अश्या इव्हेंट कृत्रीम रीत्या तयार केल्या जात आहेत, एखाद्या थ्रीलर सिनेमासारखे क्लायमेक्स केले जात आहेत.
हे ही एक वेळ चालेल पण मला इथे ह्या इव्हेंट स्टेज करणारीच लोक स्पेक्युलेशन करत असणार असा संशय आहे.
@गब्बर्, इतकी माझी टेस्ट तयार झाली नाहीये ( मोठे मोठेच फरक कळतात ) पण सांगायचेच तर गोड रेड वरमुथ ( वाइन नाही शेरी ) आवडते
हा प्रतिसाद अनु राव यांना
हा प्रतिसाद अनु राव यांना उद्देशून नाही....
>>एकुणातच हे प्रश्न अर्थशास्त्रीय नसुन काही लोकांच्या वैयक्तीक फायदा मिळवण्याच्या लालसेतुन निर्माण झाले आहेत.
जेव्हा समाजवादाची चिरफाड केली जाते तेव्हा फायद्याचे इन्सेण्टिव्ह नसल्याने समाजवाद फेल होईल/होतो असे म्हटले जाते. वैयक्तिक फायदा हवा असणे हा नॅचरल गुण असल्याने त्याचा विचार न करता आणलेली सिस्टिम/तत्त्वज्ञान चूक आहे असे आर्ग्युमेंट असते.
वैयक्तिक फायदा हवा असणे हा गुण नैसर्गिक असल्यावर क्रोनी कॅपिटलिझम निर्माण होणे हे मार्केटाधारित व्यवस्थेत घडणारच आहे आणि त्यामुळे मार्केटाधारित व्यवस्था (वारंवार) फेल होणार म्हणूण ती सिस्टिम/तत्त्वज्ञान चूक असे मात्र म्हटले जात नाही.
डिसक्लेमर: हे समाजवादाचे समर्थन वगैरे नाही. जस्ट पॉइंटिंग आउट द कॉण्ट्राडिक्शन
वैयक्तिक फायदा हवा असणे हा
वैयक्तिक फायदा हवा असणे हा गुण नैसर्गिक असल्यावर क्रोनी कॅपिटलिझम निर्माण होणे हे मार्केटाधारित व्यवस्थेत घडणारच आहे आणि त्यामुळे मार्केटाधारित व्यवस्था (वारंवार) फेल होणार म्हणूण ती सिस्टिम/तत्त्वज्ञान चूक असे मात्र म्हटले जात नाही.
गेल्या २५-३० वर्षात प्रत्येकच बाबतीत चमत्कारीक आणि चुका/गुन्हे करणार्यांना संरक्षण आणि मदत देणारी विचारसरणी निर्माण केली गेली आहे त्याचे हे परिणाम आहेत. मार्केटाधारित व्यवस्था फेल होत नाहीये, रादर जे काही चालले आहे ते मार्केटाधारित व्यवस्थेच्या विपरीत चालू आहे.
वैयक्तिक फायदा आणि अर्थशास्त्र
अॅडम स्मिथ म्हटला तर हेच होता कि प्रत्येकाच्या वैयक्तिक फायद्याच्या इच्छेतून समाजाचा फायदा बनतो ((कु)ख्यात इनव्हिजिबल हँड). त्यामुळे वैयक्तिक फायदा मिळवण्याची लालसा आणि अर्थशास्त्र ह्यांना काही वेगवेगळं करता येत नाही. आजचे प्रश्न आहेत ते आर्थिक आहेत आणि वैयक्तिक लालसेचे तर आहेतच आहेत, केव्हा नसतात?
प्रश्न असा आहे कि अर्थशास्त्र, आज ज्या अवस्थेत आहेत्या अवस्थेत, ह्या प्रश्नांना सोडवायला पुरेसे आहे का आणि/किंवा अर्थशास्त्राला हे प्रश्न पुरेसे समजले आहेत का. टिपिंग पॉईंट ठरवून आणला जातोय असं आहे का? कारण असं असेल तर ह्या कटात सामील असणाऱ्या अनेकांना कटात सामील असलेल्या बाकीच्यांना दगा देऊन अधिक फायदा मिळेल. आणि हे कळण्याएवढे कट करतायेत वाटणारे लोक धूर्त आहेतच.
बेटर स्पष्टीकरण हे देशाभिमान/देशभक्ती/देशहित ह्यांवर आधारित निर्णय आणि जागतिक अर्थव्यवस्थेसाठी कोर्डीनेट होऊन व्हावे लागणारे निर्णय ह्याच्या फरकांमध्ये आहे. रघुराम राजन हे मांडत आहेत.
आणि दुसरी बाजू राहते ती म्हणजे 'पॉवर' नावाच्या प्रकारची माणसाची इच्छा. अर्थशास्त्रात (मार्क्स सोडता) त्याचे फार स्पष्टीकरण नाही. पण जगात जे घडतं त्यात राजकारण, अर्थकारण आणि अजून काही हे सगळंच येतं. इथे कदाचित थोडी मांडणी आहे.
प्रश्न असा आहे कि
प्रश्न असा आहे कि अर्थशास्त्र, आज ज्या अवस्थेत आहेत्या अवस्थेत, ह्या प्रश्नांना सोडवायला पुरेसे आहे का आणि/किंवा अर्थशास्त्राला हे प्रश्न पुरेसे समजले आहेत का. टिपिंग पॉईंट ठरवून आणला जातोय असं आहे का? कारण असं असेल तर ह्या कटात सामील असणाऱ्या अनेकांना कटात सामील असलेल्या बाकीच्यांना दगा देऊन अधिक फायदा मिळेल. आणि हे कळण्याएवढे कट करतायेत वाटणारे लोक धूर्त आहेतच.
म्हणुन तर मी म्हणते, अर्थशास्त्र समस्या ( वाढ, चलनवाढ इत्यादी ... ) सोडवायला काय पण समजुन घ्यायला सुद्धा बर्यापैकी कुचकामी आहे. जास्तीतजास्त पोस्टमार्टेम होऊ शकते.
णुन तर मी म्हणते, अर्थशास्त्र
णुन तर मी म्हणते, अर्थशास्त्र समस्या ( वाढ, चलनवाढ इत्यादी ... ) सोडवायला काय पण समजुन घ्यायला सुद्धा बर्यापैकी कुचकामी आहे. जास्तीतजास्त पोस्टमार्टेम होऊ शकते.
Bourgeois Dignity: Why Economics Can't Explain the Modern World
India: The Stormy Revival of
India: The Stormy Revival of an International University ______ Amartya Sen
न्यु यॉर्क रिव्ह्यु ऑफ बुक्स मधे आलेला प्रा. सेन यांचा लेख.

हा मामला अजुन किती दिवस
हा मामला अजुन किती दिवस चालणार आहे हे कळत नाही. ५-६ महिने झाले नवीन बॉडी बद्दल विचार करुन. आता अजुन हा मुद्दा वरती का आला हे कळायला मार्ग नाही.