ही बातमी समजली का? - भाग १४७
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
.
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
.
.
एमेफहुसेनच्या चित्रांचं
एमेफहुसेनच्या चित्रांचं प्रदर्शन - साकेत,दिल्ली,३१जुलैपर्यंत
Shades of a master artist लेख asian age ,sunday
पुतिनविरोध = देशद्रोह
ह्या वर्षीच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये किरिल स्रेब्रेनिकॉव्ह ह्या दिग्दर्शकाच्या 'स्टुडन्ट' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. एका विद्यार्थ्याला हळूहळू धार्मिक मूलतत्त्ववादाच्या आहारी जाताना दाखवणारा हा चित्रपट समकालीन रशियाचं अस्वस्थ करणारं चित्र रंगवतोच, पण आपल्या आसपास आणि इतरही अनेक देशांमध्ये हळूहळू मूलतत्त्ववाद कसा पसरत जाऊ शकतो हेदेखील सूचित करतो. रशियात सरकारविरोधी (पक्षी : पुतिनविरोधी) आवाज क्षीण होत असताना हा दिग्दर्शक आपला सिनेमा आणि नाटक ह्यांच्या माध्यमातून सातत्यानं आवाज उठवत होता. ताज्या बातमीनुसार आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप ठेवून त्याच्या थिएटरवर धाड घालण्यात आली आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे -
Theatre raid raises fresh fear over Putin civil society crackdown
बायकांसाठी 'अच्छे दिन' आये रे भैय्या!
बायकांसाठी 'अच्छे दिन' आये रे भैय्या!
Mr. Modi And Mr. Jaitley, I'm Pretty Sure I Need A Sanitary Napkin More Than Sindoor And Bangles
बातमीतल्या काही गोष्टी अतिशय टोचल्या. साधारण ८८% भारतीय स्त्रियांना सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध नाहीत. सॅनिटरी उत्पादनांवर १२% कर भरावा लागतो.
आणि अजूनही पाळी सुरू असताना स्त्रिया अपवित्र असतात, छापाच्या गोष्टी देवाच्या दलालांकडून पसवरल्या जात असतातच. 'राईट टू ब्लीड'सारखी आंदोलनं भारतीय स्त्रियांना करावी लागतात.
कुंकू बांगड्या याव्यतिरिक्त / याऐवजी हिजाब, बुरखा
१. नावावरून ही बाई हिंदू वाटत नाहीय. आणि तिच्या फोटोवरून तिने कुंकू लावलेलं दिसत नाहीय, मग कुंकू बांगड्या असली हिंदूमधील काही स्त्रियांच्या प्रतीकांची उठाठेव कश्याला?
(ही बाई हिंदूही असू शकते हे माहित आहे.)
२. सार्वजनिक अभिव्यक्ती सर्वसमावेशक असावी असं म्हणतात, म्हणून, कुंकू बांगड्या याव्यतिरिक्त / याऐवजी हिजाब, बुरखा, किंवा अजून काही यांची तुलना सॅनिटरी बरोबर व्हायला नव्हती?
३. हा वाद सुरु करण्यासाठी सॅनिटरी बनवणाऱ्या कुंपन्यांकडून ह्या बाईला किती मोबदला मिळाला असेल?
Union Cabinet approves
Union Cabinet approves abolition of 25-year-old Foreign Investment Promotion Board
Finance Minister Arun Jaitley said there are just 11 sectors left in which government's approval is needed for FDI
FIPB will be replaced by a new mechanism under which the proposals will be approved by the ministries concerned as per the standard operating procedure approved by the Cabinet, he added.
काही कंट्रोल्स अजूनही आहेत असे दिसते. गेल्या काही वर्षांत या एफायपीबी ने कायकाय केले होते व हे एफायपीबी कितपत मॅटर करत होते हा प्रश्न लक्षणीय आहे. जर ते मॅटर करत नव्हते तर बरखास्त केले काय अन न केले काय - फरक काहीच पडत नाही. पण ... ?
बातमीतल्या काही गोष्टी अतिशय
बातमीतल्या काही गोष्टी अतिशय टोचल्या. साधारण ८८% भारतीय स्त्रियांना सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध नाहीत. सॅनिटरी उत्पादनांवर १२% कर भरावा लागतो.
हे तर टोचण्याऐवजी तुमच्या दृष्टीने स्वागतार्ह असायला हवे. आयमिन जर फक्त १२% स्त्रियां सॅनिटरी नॅपकिन वापरत असतील व सॅनिटरी नॅपकिन्स हे महागडे असतील तर त्याचा अर्थ ह्या १२% स्त्रिया ह्या उच्चभ्रू/उच्चमध्यमवर्गीय च्या जवळपास जाणाऱ्या असाव्यात असे म्हणायला जागा आहे. व तुमच्या सारख्या ब्रॉड माईंडेड व्यक्तीने (म्हंजे संकुचित विचारसरणीस विरोध करणाऱ्या व्यक्तीने) १२% च्या ऐवजी २४% टॅक्स चा पुरस्कार करायला ह्वा. म्हंजे त्यातून येणाऱ्या निधीमधून गरीब, वंचित, उपेक्षित, रंजल्यागांजलेल्या, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील स्त्रियांना स्वस्तातले का होईना सॅनिटरी नॅपकिन्स सरकार उपलब्ध करून देऊ शकेल. नैका ? हिंदुस्तान सॅनिटरी प्रॉडक्ट्स लिमिटेड नावाची पब्लिक सेक्टर/सरकारी कंपनी स्थापन करून्.
१२% जीएस्टी कॅन्सल केला तर ८८% पैकी अशा किती स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन्स कडे वळतील ? व ज्या वळतील त्या सुद्धा बहुतेक मध्यमवर्गीयच असतील. नैका ?
म्हंजे त्यातून येणाऱ्या
म्हंजे त्यातून येणाऱ्या निधीमधून गरीब, वंचित, उपेक्षित, रंजल्यागांजलेल्या, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील स्त्रियांना स्वस्तातले का होईना सॅनिटरी नॅपकिन्स सरकार उपलब्ध करून देऊ शकेल
बातमी वाचली का तुम्ही गब्बर, कुंकू अन बांगड्यांवर टॅक्स नाहीये. सरकारला कशाला प्रायॉरिटी (प्राधान्य) द्यायचं याची पोच पाचच नाहिये :(
बातमी वाचली का तुम्ही गब्ब
बातमी वाचली का तुम्ही गब्बर, कुंकू अन बांगड्यांवर टॅक्स नाहीये. सरकारला कशाला प्रायॉरिटी (प्राधान्य) द्यायचं याची पोच पाचच नाहिये
कुंकू, बांगड्या यांच्यावर टॅक्स लावला की तिकडून पण बोंबलतात लोक !!! की ज्या वस्तू गरीब स्त्रिया सारख्या व नेहमी वापरतात त्यांच्यावर ट्याक्स लावला म्हणून.
बघा बरं विचार करून की कुंकू व बांगड्या यांच्यावर ट्याक्स आहे व सॅनिटरी नॅपकिन्स वर ट्याक्स नाही - असा विचार करून पहा बरं. त्या परिस्थितीत काय होईल ?? कोणकोण कायकाय बोंबलेल ते ?
( आता लगेच असं म्हणणार का ... की कोण काय बोंबलतंय याची मोदी सरकारला कुठे फिकीर असते ?? )
---
बाय द वे बातमी इथे पोस्ट केली जायच्या आधीच वाचली होती.
मासिक धर्म हाच खरा धर्म!
कुंकू आणि बांगड्या हा फक्त नट्टाफट्टा नाही; धार्मिक रूढी आहेत. नखरा म्हणून, आवड म्हणून कुंकू-बांगड्यांबद्दल आक्षेप नाही; पण आमच्या शाळेसारख्या, सरकारी अनुदानित शाळांमध्ये कुंकू-बांगड्यांची सक्ती, ते आत्ता धर्माचं सॉफ्ट-मार्केटिंग याबद्दल आक्षेप आहे.
मासिक धर्म हाच खरा धर्म! (चला, होऊन जाऊ द्या.)
जी एस टी च्या आधी काय रेट होता?
जी एस टी च्या आधी काय रेट होता?
बहुधा १४.५% (खात्री नाही, पण १४.५% च होता) तो आता १२% वर आणला आहे,
ह्या प्रॉडक्टवर १२% टॅक्स जर ०% केला तर कंपनी किंमत कमी करेल ह्याची काय शाश्वती आहे? सॅनिटरी नॅपकीन्स प्रकारात ६०%+ P&G आणि बहुधा २५%+ Johnson & Johnson चा मार्केट शेअर आहे. हे लोक १२% खिषात टाकुन किंमत तीच ठेवतील आणि नफा वाढवतील.
विषयाची मला पूर्ण जाण नाही, तरीपण - किंमत (परवडणे ह्या अनुषंगाने) हा "one of the many other factors" असावा की ज्यामुळे ८८% स्त्रीया ह्यापासुन वंचित रहात आहेत्. पण नक्कीच तो सर्वात महत्वाचा फॅक्टर नाहीये.
मला तरी हा प्रकार उगाच गळे काढण्याचा वाटला बुवा
ह्या प्रॉडक्टवर १२% टॅक्स
ह्या प्रॉडक्टवर १२% टॅक्स जर ०% केला तर कंपनी किंमत कमी करेल ह्याची काय शाश्वती आहे? सॅनिटरी नॅपकीन्स प्रकारात ६०%+ P&G आणि बहुधा २५%+ Johnson & Johnson चा मार्केट शेअर आहे. हे लोक १२% खिषात टाकुन किंमत तीच ठेवतील आणि नफा वाढवतील.
बहुत जायज सवाल हय.
त्यांचा कल तुम्ही म्हणता त्याप्रमाणे १२% खिशात टाकण्याकडेच असेल, पण एवढा मीडियामय राडा झाल्यानंतर जॉन्सन, प्रॉक्टर, गॅंबल आणि मंडळी ही रिक्स घेणार नाहीत. (रेप्युटेसनल रिस्क आहे.)
मी जर कमर्शियल म्यानेजर असतो, तर किंमत ६% कमी केली असती, आणि उरलेले ६% "इंप्रूव्हिंग पेनिट्रेशन ऑफ सॅनिटरी प्रॉडक्ट्स इन इंडियन रूरल एरिया" या कार्यक्रमात गुंतवले असते. तशी रीतसर जाहिरात वगैरे केली असती. प्याकवर छापलं असतं. पत्रकार परिषद घेतली असती. कोणातरी प्रसिद्ध बै'ला प्रोजेक्ट मॅस्कॉट केलं असतं.
याचे फायदे म्हणजे "आमची कंपणी बघा किती चांगली" असा ढोल बडवता येईल. सीएसारच्या वर्गणीची सोय होईल. अॅन्युअल रिपोर्टात छापायला मट्रल मिळेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपक्रम अनेक वर्षं नियमित राबवल्यास ग्रामीण भागात मोठं मार्केट तयार होईल. मार्केटचा फायदा सर्वांना.
पण जरी ०% केली तर volume
पण जरी ०% केली तर volume growth कितीने वाढेल्?? २० - ३०%???? का १ - ४%??? (इथे volume growth will be only through new customer acquisition)
हा प्रश्न पॅड्सच्या price elasticityचा आहे की ग्राहकांच्या income elasticityचा हे सांगण्याइतका माझा अभ्यास नाही. पण volume growth will be only through new customer acquisition हे बरोबर वाटतंय. कितीने वाढेल यावर जरा विचार करतो.
..पण यापेक्षा वेगळाही प्रॉब्लेम असू शकतो. डिस्ट्रिब्युशन नेटवर्क नसण्याचा. म्हणजे ग्राहक आहे, पैसे आहेत, पण उपलब्धता नाहीये.
परेश रावल यांचे अकाउंट ट्विटरने बंद केले
परेश रावल यांचे अकाउंट ट्विटरने बंद केले
'लोकांनी मुक्तपणे आली मतं मांडावी आणि भावना व्यक्त कराव्यात. पण धमक्या देणं, गैरवर्तन करणं, कुणाचाही आवाज दाबवण्याचा आणि छळाचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर निर्बंध घालण्यात येतील', असं ट्विटरने स्पष्ट केलं आहे.
तेजस...
तेजस एक्सप्रेस जी की मुंबई-गोवा या मार्गासाठी सुरू केली आहे तब्बल 200 किमी/तास च्या वेगाबरोबर, पहिल्याच खेपेस कायकाय झालं?
सार्वजनिक मालमत्ता फक्त नासधूस करायलाच असतात का? जनशताब्दी काय, एशियाड काय साधी बस जरी पाहिली हे नासधुशे सगळीकडं तोंड (हात) मारताना दिसतात. जितक्या जोरात चालू केली तितक्या जोरात लयाला जाऊ नये एवढिच सदिच्छा!
(सार्वजनिक ची व्याप्ती बरीच मोठी आहे, ऊदाहरणादाखल फक्त सार्वजनिक प्रवास व्यवस्था)
An Indian village addicted to
An Indian village addicted to chess.
---------------
Markets continue to surge as Sensex, Nifty reach all-time highs
याचा अर्थ गुंतवणूकदार पूंजीवादी मंडळींना भारताच्या भावी कालाबद्दल काय वाटतं. कॉंग्रेस म्हणते की भारताचं भविष्य अंधारमय आहे.
=========
The end of the line for Indian outsourcers — or a new beginning? विवेक वाधवा यांचा लेख्. वॉपो मधे.
=========
Flamingos Are More Stable on One Leg Than Two
They’re so steady that you can balance a dead one on a single leg.
====
Surreal Pictures Show Jupiter Is Even Weirder Than We Thought
Early scientific findings from the Juno spacecraft show a world of intricate clouds, intense magnetism, and a potentially eroding core.
.
.
Finance Minister Arun Jaitley pitches for Air India disinvestment
This is the clearest indication yet from the current NDA regime on possible stake sale in Air India, which is staying afloat on taxpayers' money.
Air India's market share today is around 14 per cent while the debt is Rs 50,000 crore while the government has not put in money in private carriers, Jaitley said at Dialogue@DDNews programme. To run Air India, around Rs 50,000 crore have been put in and that money could have been used for promoting education, the minister added. "In this country, if 87 or 86 per cent flying can be handled by the private sector... then they can also do 100 per cent," Jaitley said. According to him, of the total debt, around Rs 20,000- 25,000 crore are related to aircraft valuation. "What to do with the remaining amount... Air India also has some assets," he said even as he emphasised that the civil aviation ministry is making all efforts to explore all the possibilities. Jaitley further said that when he was civil aviation minister for a brief period during 1999-2000, he pitched for disinvestment of Air India arguing that if it was not done, "nothing will be left to disinvest. That was around 18 years ago". Air India, which is surviving on a Rs 30,000-crore bailout package spread over 10 years announced by the Manmohan Singh government in 2012, is working on ways to improve its financial position.
ममोसिंनि हा बेलाऊट दिला होता का खरंच ?
.
.
.
And BJP had almost opposed this idea in 2013
सार्वत्रिक, सर्वकालीन, स
सार्वत्रिक, सर्वकालीन, सर्वपक्षीय अनास्था. नॅशनल आर्काईव्हच्या अध्यक्षपदी मला वाटतं २०११ च्या आसपास काही काळ मुशिरुल हसन हे इतिहासकार होते तो अपवाद वगळता तिकडे खास कै लक्ष दिलेले दिसत नाही. मला हवी असलेली बहुतेक सर्व कागदपत्रे तिथे मायक्रोफिल्मवर असूनही ब्यूरोक्रसीमुळे आणि इतर कनेक्षन्स नसल्यामुळे दिल्लीपेक्षा सरळ हॉलंडात जाणे सोपे पडले हे उदाहरणार्थ अतिशय रोचक वगैरे आहे.
सेन्सॉर बोर्डाचे नवे नृत्य
सार्वजनिक ठिकाणी नेते जे बोलतात ते फूटेज डॉक्युमेंटरीमध्ये वापरण्यासाठी नेत्यांची परवानगी घ्यायला लागावी का?
How a Tiny Insignificant CBFC Is Choking India’s Young Filmmakers
all the footage that’s been used in An Insignificant Man are of public appearances made by politicians, which are regularly documented and broadcast by news channels. “We haven’t done a sting operation or used secret cameras, why would that require an NOC?” questions Khushboo.
लग्न... हुंडा... परंपरा
“मी शीतल व्यंकट वायाळ, अशी चिठ्ठी लिहिते की, माझे वडील मराठा-कुणबी कुटुंबात जन्मले आहेत. शेतात सलग पाच वर्षांच्या नापिकीमुळं आमच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आणि नाजूक झाली आहे. माझ्या दोन बहिणींची लग्नं छोटेखानी पद्धतीनं करण्यात आली. पण माझं लग्न करण्यासाठी दोन वर्षांपासून बापाची दरिद्री संपत नव्हती. कुठल्याही बँकेचं किंवा सावकाराचं कर्ज माझ्या बापाला न मिळाल्यानं दोन वर्षांपासून माझं लग्न खोळंबलं होतं. त्यामुळं मी माझ्या बापावरील वजन कमी करण्यासाठी आणि मराठा समाजातील रूढी, परंपरा, देवाणघेवाण कमी करण्यासाठी स्वखुशीने आत्महत्या करत आहे. मला व माझ्या कुटुंबाला समाजाने कुठलाही दोष देऊ नये.”
लातूर जिल्ह्याच्या भिसे वाघोली येथील शीतल या २१ वर्षीय तरुणीनं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिनं हे पाऊल उचलायला भाग पाडलेल्या दु:खाची करुण कहाणी या चिठ्ठीतून मांडली आहे. तिची ही चिठ्ठी प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणारी आहे. अनेक वर्षं हे दु:ख घेऊन जगत असलेल्या शीतलनं या चिठ्ठीतून एकाच वेळी अनेक मुद्द्यांना वाचा फोडली आहे. निसर्गावर अवलंबून असलेली शेती, वडिलांचं कर्जबाजारीपण, घरातील गरिबी, हुंड्यापायी खोळंबलेलं लग्न, लग्नासाठी कर्ज काढण्यासाठी वडिलांची होत असलेली ससेहोलपट, समाजातील रूढीपरंपरा अन् बरंच काही... शीतलनं अनेक मुद्दे उपस्थित केले असले, तरी या सर्व मुद्द्यांच्या केंद्रस्थानी लग्न आणि लग्नाभोवतीच्या रूढी, प्रथा, परंपरा आहेत. त्यातच शीतलनं चिठ्ठीत मराठा-कुणबी समाजाचा उल्लेख केल्यानं या समाजातच हुंडा, प्रथापरंपरा किती घट्टपणे रुतल्या आहेत, यावर चर्चा होऊ लागली. नुसती चर्चाच नव्हे, तर मराठा समाजालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याइतपत टीका होऊ लागली. मराठा-कुणबी हा समाज मोठ्या प्रमाणात शेती आणि शेतीवर आधारित व्यवसायांत गुंतलेला आहे. मोठ्या प्रमाणात जमीनमालकी या समाजाकडं आहे. राजकीय वाटाही या समाजाकडंच सर्वाधिक एकवटला आहे. त्यामुळे, हुंडा आणि प्रथा परंपरा या समाजात नक्कीच खोलवर रुजल्या आहेत. परंतु, शीतलनं मांडलेल्या दु:खाची झळ ही कोण्या एका समाजापुरती मर्यादित नाही. आज सर्वच समाज या लग्नाच्या रूढी, प्रथा, परंपरांत गुरफटला आहे. हुंडा ही सर्वच समाजाला लागलेली कीड आहे, ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती स्वीकारल्याशिवाय आपल्याला त्याची दाहकता कळणार नाही. या सर्व पोर्शभूमीवर शीतलनं उचललेलं पाऊल चूक की बरोबर, हे सांगणं योग्याअयोग्यतेच्या पलीकडचं आहे. इतकी वर्षं समाजात सर्रासपणे सुरू असलेल्या या प्रथापरंपरेबद्दल उघडपणे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दुर्दैवानं त्यासाठी आणखी एका शीतलचा बळी गेला. परंतु, आता सुरू झालेली चर्चा ही केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता, त्यातून काही तरी ठोस मार्ग निघायला हवा, तरच आपण अशा अनेक शीतलना न्याय देऊ शकू.
प्रथापरंपरेच्या नावाखाली सर्रासपणे सुरू असलेल्या या काही गोष्टी पाहिल्यास शीतलसारख्या वडिलांचे होत असलेले हाल निश्चितपणे समजतील. लग्न हा समारंभ आनंदाचा बनण्यापेक्षा प्रतिष्ठेचा बनत आहे, मुलीच्या वडिलांना मुलीचं लग्न झाल्याचा आनंद देण्यापेक्षा त्याला दु:खाच्या-कर्जबाजारीपणाच्या खाईत लोटलं जात आहे, हे मुलाकडच्यांना कळत नाही, असं नाही... ते त्यांनाही कळतं... सासरी जाणाऱ्या मुलीलाही कळतं... प्रसंगी ही मुलगी हुंडा न घेणार्याशीच लग्न करण्याचा निश्चय करते... पण त्यातून लग्न रेंगाळण्याशिवाय तिच्या पदरी काहीच पडत नाही. म्हणून तिला आणि प्रसंगी वडिलांनाही माघार घ्यावी लागते, हे वास्तव आहे. या बेड्या तोडण्याची जबाबदारी पुरुषांची आहे. एका बाजूला पुरुषसत्ताक थाटाच्या बाजेत वावरणार्या पुरुषांना आपण हुंड्यासारख्या प्रथांना बळकटी देत आपला स्वाभिमान विकत आहोत, याची जाणीव का होत नाही? किमान स्वाभिमान बाळगणाऱ्यांनी तरी याची सुरुवात केल्यास ती नक्कीच दिशादर्शक ठरेल, यात काही शंका नाही.
लग्न आणि भोवतालचे व्यवहार ही कीड काय आहे, हे नीट समजून घ्यावे लागेल. ज्यांची आर्थिक परिस्थिती फार चांगली आहे, त्यांना आपली संपत्ती दाखवण्याचे निमित्त म्हणजे उत्सव! त्यापैकी लग्न हा एक प्रमुख. ग्रामीण समाजात मात्र परिस्थिती तेवढी चांगली नसली, तरी हौस म्हणून किंवा कुणाची तरी बरोबरी म्हणून लग्नाचे न परवडणारे अनेक व्यवहार केले जातात. हे व्यवहार लग्न ठरवण्याच्या विचारापासून असतात. यामध्ये मुळात पुरुषसत्ताक मानसिकता असते. ही मानसिकता फक्त पुरुषातच असते असं नाही, तर ती महिला वर्गातदेखील आहे. त्यात पुरुषी प्रतिष्ठा हा केंद्रबिंदू असतो. आपल्या मुलीला जितकं दिलं आहे, तितकं मुलाच्या लग्नात वसूल व्हायलाच हवं-ही मानसिकता असते. मात्र, या प्रतिष्ठेच्या कल्पनेत परंपरा नावाचं भरीव अज्ञान असतं. सगळ्या मुलींच्या बापांना असं वाटत असतं की, आपली मुलगी चांगल्या घरात द्यायची. पण असं असूनदेखील मग अनेक मुलींचं ग्रामीण भाषेत ‘वाट्टोळे’ का होतं? लग्न ठरवण्याच्या किंवा जोडीदार शोधण्याच्या प्रक्रियेत ज्यांचं लग्न ठरत असतं, त्यांच्यात किती संवाद होऊ दिला जातो? असा संवाद ‘चांगला’ नसतो, अशी समजूत आहे आणि हीच परंपरा आहे.. इथं पहिली गडबड आहे.. अर्थातच लग्नापूर्वी अजिबात संवाद न झालेल्या अनेक जोडप्यांचं आयुष्य देखील चांगलं गेलेलं आहे. पण ते पर्याय नसल्यामुळे... किंवा किमान अंगभूत समजूत असल्याने. त्यामध्ये नातं, त्यातली जबाबदारी या गोष्टींना कितपत स्थान असतं, हा एक संशोधनाचा विषय आहे. त्याला कारणीभूत हाच समाज आहे.
.
.
.
संपूर्ण लेख (लांबलचक असूनही) वाचण्यासारखा आहे. एवढयासाठी की या सगळ्या लेखामधे ज्या मुलीचे कल्याण अपेक्षित आहे त्या मुलींवर कोणतीही जबाबदारी टाकायला लेखक तयार होत नाही. सगळं बील हे एकतर प्रथा/परंपरा/रूढी नाहीतर पुरुषसत्ताक समाजरचनेवर फाडून रिकामा.
===================
ब्रिटन कडून हे शिकण्यासारखे आहे. उगीचच कर्नल सुनील दामलेगिरी कुरवाळत बसण्यापेक्षा.
.
.
.
=============
.
.
.
‘We’re in an even deeper malaise’: Many of Modi’s right-wing liberal supporters are now disappointed
.
.
.
संपूर्ण लेख वाचनीय आहे. लिबर्टेरियन विचारवंत टॉम पामर यांच्या फेबु वॉल वरून याची लिंक मिळाली होती. विविध कॉमेंटेटर्स चे मोदींच्या ३ वर्षांच्या कारकीर्दीबाबत काय मत आहे याचा आढावा - असं शीर्षक देता येईल या लेखाला. गुरुचरण दास, तवलीन सिंग, आतीश तासीर, रूपा सुब्रमण्य यांच्या लेखांमधली स्निप्पेट्स वापरून घेतलेला आढावा यात सापडेल. लेखक शोएब दानिया हे निष्पक्ष लिखाण करतात असा माझा दावा नाही. बहुतेक मोदिंचे अंधद्वेष्टे असावेत असा माझा अंदाज आहे. पण लेख वाचनीय आहे. एवढ्यासाठी की -- लेखक काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देणे सोयिस्कररित्या टाळतो. लेखक अंधद्वेष्टे का असावेत या प्रश्नाचे उत्तर मात्र अत्यंत सोप्पे आहे.
.
.
.
रूपा सुब्रमन्य आणि तासिर
रूपा सुब्रमन्य आणि तासिर यांच्याबद्दल ठाऊक नाही. पण गुरुचरण दास आण तवलीन सिंग यांना मोदीद्वेष्टे म्हणणे अवघड आहे. बाकी लेख वाचून पाहतो.
नाय नाय. या चार लोकांबद्दल माझा कॉमेंट नव्हता.
माझा कॉमेंट शोएब दानिया बद्दल चा होता. दुरुस्ती केलेली आहे.
उलटपक्षी...
त्याची चर्चा करून, त्याचे लेखन एरवी ज्यांनी वाचलेसुद्धा नसते किंवा असे काही कोणी कोठे खरडून ठेवलेले आहे हे अन्यथा ज्यांच्या गावीही नसते, अशांच्या निदर्शनास ते आणून देऊन त्यास (आपणच) फुका (आणि फुकटची) प्रसिद्धी का द्यायची, म्हणतो मी.
(तसेही, शोएब दानियाल, स्क्रोल.इन, झालेच तर अरुंधती रॉय, या काय दखलपात्र गोष्टी आहेत? आय मीन, त्यांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे, ते ठीकच आहे, पण म्हणून त्यांच्या प्रत्येक 'अभिव्यक्ती'ची दखल घेतलीच पाहिजे काय? अशाने अभावितपणे त्यांच्या सर्क्युलेशनला हातभार लावण्यापलीकडे नेमके काय साध्य होते?)
ते तुमचे ते स्क्रोल्ड.इन...
...झालेच तर ते दवायर.इन, या असल्या ठिकाणी हे असलेच (गळत्यात मुतून घेणे-टैप्स) लेख येणार. (आणि 'डॉन'वाले ते इमानेइतबारे पुनच्छापणार. 'डॉन'वाल्यांचे बरोबरच आहे म्हणा; त्यांना शेवटी धंदा करायचाय, नि त्यांच्या ग्राहकवर्गात (खरे असोत वा खोटे असोत, पण) असले लेख सॉलिड खपणार म्हटल्यावर 'मागणी तसा पुरवठा' तत्त्वानुसार 'डॉन'वाले ते पुरवणारच.)
'डॉन'वाल्यांचे सोडा. त्यांची व्यावसायिक मजबूरी-म्हणा-किंवा-गरज-म्हणा-किंवा-स्ट्रॅटेजी-म्हणा, अाहे. तेव्हा त्यांचे जाऊच द्या. पण अन्यथा, स्क्रोल्ड.इन काय किंवा दवायर.इन काय, यांची क्रेडिबिलिटी कितीशी आहे? मग त्यांतील आर्टिकले (चुकून पाहिलीच तर) "जाऊ दे, काहीतरी इंग्रजीतील ऑनलाइन 'संध्यानंद'-छाप मामला आहे" म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी, त्याबद्दल वर्कअप होऊन नि मुख्य म्हणजे त्यावर चर्चा करून त्याला (नसलेली) क्रेडिबिलिटी आपणच बहाल करण्यात काय हशील आहे?
(वस्तुत:, दवायर.इन-वरील उपरोद्धृत लेख पुनरोद्धृत करून त्यास विनाकारण भाव देण्याचे मलाही काही कारण नव्हते. परंतु माझा उद्देश काहीसा निराळा होता - की बाबा तिथे हे असलेही छापले जाते, तेव्हा त्यास कितीसा भाव आणि काय म्हणून द्यायचा, इतकेच दर्शविण्याचा होता. क्यू.ई.डी.)
शोएब दानियाल वैसे भी डोक्याव
शोएब दानियाल वैसे भी डोक्यावर पडलेला आहे.
भारतातल्या डोक्यावर पडलेल्या पत्रकारांबद्दल चर्चा होणे गरजेचे आहे.
उदा. २०१४ पूर्वी इतरांना सेक्युलर व्ह कम्युनल चे सर्टिफिकेट देत फिरणारे आणि आज दिवस फिरले म्हणून "मोदींचे अंधभक्त लोक देशभक्तीचे सर्टिफिकेट वाटत फिरतात" वगैरे कांगावखोर आरडाओरडा करणारे पत्रकार.
40% decline in US visas for
40% decline in US visas for Pakistanis; 28% increase for Indians: Report
Pakistan has had a significant 40 per cent drop in the number of American visas granted to its nationals under the new Trump administration despite not being on the list of the US President's travel ban countries.
एखाद्या देशाच्या कर्जरोख्यांमधे गुंतवणूक करणे हे अनैतिक ?
एखाद्या देशाच्या कर्जरोख्यांमधे (म्हंजे बॉंडस्) गुंतवणूक करणे हे अनैतिक असू शकते का ?
व्हेनेझुएला ची अर्थव्यवस्था बिकट स्थितीत आहे. सोशॅलिझम ची कृपा. दुसरं काय ?
अनेक लोक उपासमारी ला तोंड देत आहेत. "मादुरो डायट" असे त्या उपासमारीला नामाभिदान मिळालेले आहे. राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्या नावाने.
अन्नधान्यांच्या किंमतीवर नियंत्रणे असल्यामुळे साहजीकच पुरवठा कोलमडलेला आहे.
अन्न आयात करण्यासाठी (म्हंजे जे लोक व्हेनेझुएला ला अन्न निर्यात करू शकतील त्यांना देण्यासाठी) अमेरिकन डॉलर्स पायजेत कारण् व्हेनेझुएला च्या करन्सी ची किंमत दिवसेंदिवस घटत् चाललेली आहे.
तिथल्या सरकारने बॉंड्स इश्यु केलेले आहेत. या बॉंड्स मधे गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न्स मिळू शकतील अशी अटकळ गुंतवणूकदारांनी बांधलेली आहे.
आता व्हेनेझुएला च्या सरकारकडे असलेले तुटपुंजे डॉलर्स हे (आंतरराष्ट्रीय्) बॉंडहोल्डर्स ना कुपॉन्स (म्हंजे पिरिऑडिक इंट्रेष्ट) च्या स्वरूपात मिळत आहेत्.
म्हंजे जेवढे डॉलर्स (आंतरराष्ट्रीय्) बॉंडहोल्डर्स कडे जातील तेवढे अन्न आयात करण्यास डॉलर्स कमी पडतील्.
मग ? - व्हेनेझुएला च्या बॉंड्स मधे गुंतवणूक करावी का ? ती करणे हे अनैतिक आहे का ?
.
.
गब्बु, जत गोल्डमन् सॅक्स
गब्बु, जर् गोल्डमन् सॅक्स नी हे बॉंड घेतले असतील तर त्यांचा एकमेव उद्देश तिथल्या राजवटीला खरेदी करण्याचा असणार्. त्यांच्या साठी हे बॉंड चे पैसे म्हणजे छोटी गुंतवणुक आहे. त्यांनी ती करतानाच राइटऑफ केली असेल मनातल्या मनात्. त्यांच्या मनाप्रमाणे झाले तर गोल्डमन् सॅक्स २-४ वर्षात तिथल्या तेला मधुन अनेक पट पैसे मिळवणार्.
प्रश्नच नाही.
प्रश्नच नाही.
त्यांनी ते तसेच करावे असं मला वाटतं. एकेकाळी सोशॅलिस्ट पॉलिसिज चा आग्रह धरणारे व्हेनेझुएलातले फडतूस आता लुटालूट आणि निदर्शनं करत आहेत्. आणि जेरेमी कॉर्बिन सारखे ब्रिटिश फुर्रोगामी (जे चावेझ चे दूध प्यायला तयार होते) मूग गिळून गप्प आहेत. थॅचर बाई म्हणाली होती ना की - 'The trouble with socialism is that eventually you run out of other people's money'. त्याचा प्रत्यय येत आहे. व्हेनेझुएलातल्या फडतूस लोकांना थोबडवले जाणे गरजेचे आहे. सध्या महागाई, भूकमारी आणि इतर समस्या (उदा औषधांचा तुटवडा) आहेतच. पण जोडीला शोषण होणे गरजेचे आहे. व ते गोल्डमन करेल अशी आशा करतो. व्हेनेझुएलातल्या विरोधी पक्षाने या डील ला विरोध केला आहे. म्हणे मादुरो विरुद्ध मानवाधिकारांच्या पायमल्लीचे आरोप आहेत व ह्या डिल द्वारे मादुरो सरकारला आयतं पाठबळ मिळत आहे म्हणे.
जागतिक बॅंक तूसुद्धा! पक्षी : नोटाबंदीचा सामाजिक परिणाम
वर्ल्ड बॅंकेच्या मते नोटाबंदीचा सामाजिक परिणाम आधीच्या अंदाजांहून बराच जास्त असू शकतो.
Social impact of demonetisation may have been greater: World Bank
“While the macro-economic impact of demonetisation has been relatively limited, the distribution of costs is uneven as the informal economy is likely to have been hit especially hard.” [...] although the informal economy may account for only 40 per cent of (India’s) GDP, it employs 90 per centy of India’s workers, and the disproportionate impact of demonetisation on India’s informal sector suggests that it would have affected those workers the most. The poor and vulnerable are more likely to work in informal sectors such as farming small retail and construction, and are less able to move to non-cash payments.
तात्पर्य : जागतिक बॅंक लिबटार्ड सिक्युलर प्रेस्टिट्यूट वगैरे आहे.
चिंज - हे बघा खरे
चिंज - हे बघा खरे प्रेस्टिट्यूट. कैच्याकै छापतात्.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/three-years-of-narendra-modi-g…
देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांचा विचार केल्यास पंतप्रधान मोदींना ६० टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर राहुल गांधी यांना पसंती देणाऱ्यांचे प्रमाण ११ टक्के इतके आहे. तर ३.६४ टक्के लोकांनी अरविंद केजरीवाल यांना पसंती दिली आहे. मोदी देशाचे आतापर्यंतचे सर्वोत्तम पंचप्रधान असल्याचे ३१ टक्के जनतेला वाटते. तर इंदिरा गांधी सर्वोत्कृष्ट पंतप्रधान असे वाटणाऱ्यांची संख्या २३ टक्के वाटते.
मोदी देशाचे आतापर्यंतचे
मोदी देशाचे आतापर्यंतचे सर्वोत्तम पंचप्रधान असल्याचे ३१ टक्के जनतेला वाटते. तर इंदिरा गांधी सर्वोत्कृष्ट पंतप्रधान असे वाटणाऱ्यांची संख्या २३ टक्के वाटते.
(Excessively basic मोड ऑन्)
जनमतचाचणी/सर्वेक्षण चा हा भाग समस्याजनक आहे. कोणाला विचारले ह्यावर ह्याचे उत्तर जरा जास्तच अवलंबून आहे. एखादी व्यक्ती जी आज ३० ते ३५ वर्षांची असेल त्या व्यक्तीला इंदिराबाईंच्या कारकीर्दीतलं काय आठवत असेल ?
(Excessively basic मोड ऑफ्फ्)
काय थत्ते, हाडाचे इंजीनियर
काय ओ थत्ते, हाडाचे इंजीनियर (म्हंजे COEP चे) असूनही खालच्या "Economic Value of the Engineer" वर प्रतिक्रिया देण्यास प्राधान्य् न देता पप्पू च्या मुद्द्याला "वरीयता" देताय म्हंजे अतिच झाले. सगळ्यांनी असं केलं तर कसं व्हायचं ?? अच्छे दिन ... गेले ते दिन गेले असं म्हणावं वाटेल्.
श्री व्लादिमीर पुतिन यांचे भारतीयांना उद्देशून पत्र्
श्री व्लादिमीर पुतिन यांचे भारतीयांना उद्देशून पत्र्
भारत रशिया मैत्रीला ७० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल.
This year, we are celebrating the anniversary of a truly historic event. Seventy years ago – on April 13, 1947 – the governments of the USSR and India announced their decision to establish official missions in Delhi and Moscow.
अधोरेखित भाग लक्षणीय.
==================
.
.
The economic importance of the engineer.
.
.

.
.
.
====
.
.
.
India and Germany are made for each other, says PM Narendra Modi
मोदी साहेब तिकडे गेलेच आहेत तर .... मर्केल बाई बरोबर बार उडवून टाकणार असं दिसतंय्.
.
.
.
अर्णब गोस्वामींना खुलं पत्र
अर्णब गोस्वामींना एका य:कश्चित कम्युनिस्ट नेत्यानं दिलेलं प्रत्युत्तर
अर्णब गोस्वामी बद्दल जे
अर्णब गोस्वामी बद्दल जे काही लिहिलंय त्यातलं बव्हंशी सत्य आहे. अर्णब चे सगळे कार्यक्रम आरडाओरडा युक्त असतात्. तो लोकांना बोलूनच देत नाही.
पण कम्युनिस्ट मंडळी आणि कम्युनिझम हे अथॉरिटेरियन, ऑप्रेस्सिव्ह, दुसऱ्याचा (विशेषत: विरोधकांचा) आवाज दडपण्यात माहीर म्हणुनच प्रसिद्ध आहेत. हे बाय डेफिनिशन च आहे.
भाषा धोरणासंबंधीचा हा लेख
भाषा धोरणासंबंधीचा हा लेख वाचला. बरा आहे. मात्र यातील
“For example, prescribing English as a medium of instruction in subjects of higher education for which only English books are available and which can only be properly taught in English may have a direct bearing and impact on the determination of standards of education. Prescribing the medium of instruction in schools to be mother tongue in the primary school stage in classes I to IV has, however, no direct bearing and impact on the determination of standards of education, and will affect the fundamental rights under Articles 19(1)(a) and 19(1)(g) of the Constitution.”
हे सुप्रिम कोर्टाचे मत आश्चर्यकारक वाटले. याला काही आधार आहे का? विशेषत:: अधोरेखित भाग तर सरळसरळ सरसकटीकरण आणि जागतिक शिक्षणविषयक विचारांच्या विरोधी जाणारे वाटते.
इथे तर सुप्रीम कोर्टाच्या बरोबर विरूद्ध मत आहे..
बाहुबली बाजूला हो
बाहुबलीला कॉम्पीटिशन? ;-)
10 Shining Examples Of Kerala Being Unafraid To Stand Up For What's Right
अरे हे काय चाललंय
न्यायदान नको पण ह्या जडजांना आवरा...
Rajasthan judge who wants cow as national animal has a theory about peacocks
मालकी कोणाची?
How a Supreme Court ruling on printer cartridges changes what it means to buy almost anything
https://www.washingtonpost.com/news/the-switch/wp/2017/05/31/how-a-supr…
Anonymous Pakistan security
ही बातमी खरी असेल तर मला फार आवडली.
In what might turn out to be another twist in the Kulbhushan Jadhav case, Pakistan has written to India seeking information about its former army officer, Lt Col Mohammed Habib Zahir, who went missing from Nepal on April 6. Anonymous Pakistan security officials in the past have been quoted by Pakistan media as saying that India had abducted Habib to secure Jadhav's release but this is the first time Islamabad has officially raised the issue with the Indian mission. While Indian officials said they had no knowledge about Habib, Pakistan government sources said Islamabad was convinced that he was in India's external intelligence agency RAW's custody.
हायपो-थर्मिया वापरा त्याच्यावर.
ही बातमी समजली का?
ही बातमी समजली का?
http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/peacock-is-indias-nat…
India manufacturing PMI slows
India manufacturing PMI slows 51.6 in May
The Nikkei India Manufacturing Purchasing Managers' Index, or PMI, dropped to a three-month low of 51.6 in May from 52.5 in April.
A reading above 50 indicates economic expansion, while one below 50 points toward contraction.
घट मोठी आहे. किरकोळ नाही.
(माझी मुलगी मुंबईतील बोरीवली
(माझी मुलगी मुंबईतील बोरीवली येथील एका शाळेत शिकली. त्या शाळेत तिच्यासोबत गुजराती, मल्याळी, तमीळ, तेलुगू, हिंदी व क्वचित बंगाली अशी विविध भाषिक घरांमधून आलेली मुले होती. पण पहिली ते दहावी या दहा वर्षांच्या काळात एकही मुस्लिम मुलगा किंवा मुलगी तिच्या वर्गात नव्हती. तिच्या वर्गांच्या इतर तुकड्यांमध्येही कोणीही मुस्लिम नव्हते. तिच्या शाळेचे जाडजूड व रंगीत वार्षिक अहवाल प्रसिध्द होतात. विविध स्पर्धा किंवा नाटकाबिटकांमध्ये भाग घेतलेल्या मुलांची नावे-फोटो त्यात प्रसिध्द होतात. पण मला त्यात कधीही मुस्लिम नाव आढळले नाही.)
ईथं मदरशाचा ऊहापोह व्हायला हवा होता.
(या मुलांचे वाचन मर्यादित प्रकारचे आहे. हॅरी पॉटर वगैरे. त्यात मुस्लिम व्यक्तिरेखा येण्याचा प्रश्न येत नाही. माझी मुलगी मराठी वाचते. पण उध्दव शेळके, श्री. दा. पानवलकर, भारत सासणे, हमीद दलवाई या किंवा अशांच्या लेखनातील मुस्लिम पात्रांपर्यंत ती कधीतरी पोचेल की नाही याबाबत मला तरी शंकाच आहे.)
मी अभियांत्रिकी शिक्षक आहे, जेंव्हा एखादी संकल्पना मुलांना पटवून देण्यासाठी काही लेखांचे/लेखकांचे/प्रसंगांचे दाखले देतो, मख्ख चेहरे करुन पाहतात, त्यांना मराठी, इंग्रजी लेखकच जर माहित नसतिल तर एच अन् एम पात्र बित्र तर दूरच. बाकी सैफ, सलमान, शहारुख, अमिर अन् कैक पात्र माहित नाहित म्हणून बोंबला म्हणावं की. त्यांनी गझला, शायर्या पण कध्धीच आवडीनं ऐकल्या नाहीत ह्याचा पण पुरावा द्यावा. अन् आपण मुस्लीम पात्रांपर्यंत पोचायचा हट्ट का? त्यांनापण कितपत माहिती आहे दुसर्यांबाबत ह्याची उकल हवी.
(आपली नाटके, सिनेमे, साहित्य, मालिका इत्यादींमध्ये मुस्लिम या घटकाला आज जवळपास शून्य स्थान आहे. )
हि तर हद्दच झाली, किती मोठी लिस्ट द्यावी म्हणजे खरं वाटेल?
अन् फाटक्याची व्याप्तीतर खूप मोठीय.
उत्तम लेख
शिवाय, लेखाचा हा विषय नाही, पण (टेक्सन) नैसर्गिक वायूमुळे कोळशाच्या खाणकामाच्या नोकऱ्या कमी होत आहेत; ऑटोमेशन आणि रोबॉट्मुळे नोकऱ्या कमी होत आहेत; इत्यादी.
एकंदर ट्रंपुलीबद्दल माझं सध्याचं मत असं होतंय की, त्यानं आकलनाअभावी चिकार मोठमोठी विधानं केली आणि वचनं दिली. प्राप्त परिस्थिती त्यापेक्षा खूपच गंभीर आहे; परिस्थितीचा अंदाज आता ट्रंपुलीला येतोय. मग आपली हार मानण्यापेक्षा, किंवा एकेकाळी आपण फार भोळसट होतो हे मान्य करण्यापेक्षा नोकऱ्यांसंदर्भात पॅरीस करार, दहशतवादासंदर्भात अमेरिकी न्यायाधीश अशा सबबी तयार करायच्या.
आणि निवडणुकांच्या काळात ही धोरणं मतं मिळवण्यासाठी फार उपयोगी पडतील, याबद्दल मला सध्या तरी फार संशय नाही. एक कोणी राक्षस आणि एक कोणी देव अशी विभागणी भल्याभल्यांनाही आवडते; नोकऱ्या गमावणाऱ्या कोळसा खाणकामगारांना आणि १९८०-९० सालांमधले अच्छे दिन बघितलेल्या म्हाताऱ्यांना अशी विभागवार मांडणी आवडेल याबद्दल शंका वाटत नाही.
GST जुलै मध्ये आल्यावर गोंधळ
GST जुलै मध्ये आल्यावर गोंधळ होणार हे नक्कीच आहे . ( कुठलीही सिस्टिम बदलल्यावर थोडाफार होतोच . त्यात हा अर्धवट GST वाटतो ) स्वामी चक्क लॉजिकल बोलले आहेत . हा त्यांचा स्वभाव विशेष नाही . जेटली स्वामींच्या हिट लिस्ट वरती आहेत का ? ( ते GST च्या चपलेने जेटली मारणार दिसतंय )
स्वामी चक्क लॉजिकल बोलले आहेत
स्वामी चक्क लॉजिकल बोलले आहेत
ह्या बाबतीत असहमत्. स्वामी फार क्वचित इल्लॉजिकल बोलतात्.
--------------------
पण ते जाऊ द्या बापटण्णा. जीएसटी च्या मुळे तुमच्यासारख्या उद्योजकाला किती अधिकचा खर्च पडणार आहे? आयटी सिस्टीम बदल, क्न्सल्टंसी घेण्याचा खर्च, ट्रेनिंग वगैरे साठी.
अण्णा, स्वामी धूर्त आहेत. स
अण्णा, स्वामी धूर्त आहेत. संधिसाधु आहेत मेजर. त्यांचे ९९-२०००च्या आसपासचे भाजपा/संघाबद्द्लचे विचार ऐकले तर आजचे स्वामी ते हेच का हा प्रश्न पडतो.
स्वामी हे आधार आणि जिएसटीचे लै आधिपासुनचे विरोधक आहेत. मोदी देखिल होते. पण आता यु-टर्नचा बाप घेतला आहे त्यांनी यावर.
आणि हो स्वामी-जेटली ३६चा आकडा आहे. जेटली सोनिया हस्तक आहेत असा आरोप आहे त्यांचा. जय-इटली असा त्याचा उल्लेख ट्विटरवर अनेकदा करतात स्वामी. सो त्यांची विधानं ही संधिसाधु या त्यांच्या गुणाच्या कंटेक्स्टमध्ये घ्यावीत.
शेअरबाजारातला नेक्स्ट घोटाळा?
अगदी खोलात जाऊन काही पाहिलं नाही, अगदी वरवरंचं मत आहे.
केतन पारिख कोणाला आठवतो का?
त्याच्यावरचा ट्रेडिंग बॅन यावर्षी उठत आहे. हा हर्षद मेहताचा चेला.
२०१४ पासून बाजारात काही मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्क्रिप्टसना सोन्याचे दिवस आलेत. यात प्रामुख्याने दोन कारणं मला दिसतात. प्रमुख कारण म्हणजे तेलाचे भाव खूप खाली आले. दुसरं म्हणजे मोदींचं स्थिर सरकार.
केतन पारिखचे एकेकाळचे वकील सध्याचे अर्थमंत्री आहेत.
पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय असं म्हणवत नाही. जित्याची खोड मेल्याशिवाय जाईल असंही वाटत नाही.
शेअरबाजारातला नेक्स्ट घोटाळा?
शेअरबाजारातला नेक्स्ट घोटाळा?
नुस्ते घोटाळा घोटाळा म्हणुन राळ उठवु नका, नक्की काय घोटाळा? कसला घोटाळा वगैरे नीट सांगा. वर तो तुम्हाला घोटाळा का वाटतो ते पण सांगा.
--------------------------
तुमचे वय काय ते माहिती नाही पण हर्षद मेहताच्या काळात मी कॉलेज मधे होते. तो काळ् वेगळा होता .निरंजन शहाचा घोटाळा वेगळा होता. आणि केतन पारेख नी त्यानंतर ६-८ वर्षानी मजा केली होती.
निरंजन शहा च्या घोटाळ्या नंतर रावसाहेबांनी डीमॅट आणि एनएस्सी सुरु केले, त्यानंतर निरंजन शहा सारखा घोटाळा कोणी करु शकल नाही.
रादर तो आर्थिक घोटाळा वगैरे काही नसुन टिपिकल क्रिमिनल फ्रॉड होता.

Muslim Board calls for social
Muslim Board calls for social boycott of those who resort to triple talaq
हो पण - महाराष्ट्र सरकारच्या कायद्यानुसार् वाळीत टाकणे दखलपात्र गुन्हा आहे ना ??
.
.