Skip to main content

मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७५

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या आसपास आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----

मेट्रो घराजवळून जात असल्यास आवाजाचा कितपत त्रास होतो? कोणाला काही अनुभव?

नितिन थत्ते Thu, 22/12/2016 - 14:43

जेवढा लोकल गाडी गेल्याने होतो तितकाच. मेट्रोचे रूळ काही नॉइजलेस वगैरे नसतात.

पण मेट्रो लोकलएवढ्या वेगाने धावत नाही. त्यामुळे काही प्रमाणात आवाज कमी येत असेल.

चिमणराव Thu, 22/12/2016 - 16:03

रेल्वेचा खडखडाट फार असतो आणि ठराविक ठिकाणी प्रत्येक एंजिनवाला भोंगा मारतो. गाडीतले लोक बाहेर फार निरखतात,अचकट विचकट चाळे करणारेही असतात. तसं मेट्रोचं नसतं. चारपाच डब्याच्या एसी बंद गाड्यात लोक गप्प बसतात. रूळ ओलांडणारे नसल्याने भोंगेही नसतात. छप्पन डब्यांच्या मालगाड्या यावरून जात नाहीत. जरासा उँउँउँउँउँ असा आवाज येतो. काही त्रास नसतो.तिकिटाचा बिल्ला गेटच्या स्क्रीनवर दाखवल्याशिवाय आत प्रवेश नसल्याने लुंगेसुंगे येऊन स्टेशनं घाण करत नाहीत.

चिमणराव Thu, 22/12/2016 - 20:24

In reply to by नितिन थत्ते

आवाज होतोच पण मोठ्या रेल्वेइतका नाही. शिवाय रात्री अकरा ते सहा मेट्रो बंद असतात. एक्स्प्रेसवेच्या बाजूला राहणाय्रांना रात्रीच फार त्रास होतो. रँव राँवराँवराँवराँव.

सामो Sun, 15/01/2017 - 11:54

In reply to by सामो

Because of some glitch, am unable to give a new comment hence , this sub-comment!
.
आत्मा त्वं गिरिजा मतिः सहचराः प्राणाः शरीरं गृहं,\
पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः ।\
सञ्चारः पदयोः प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरः,\
यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम् ॥ \

आज आदि शंकराचार्यालिखित वरील श्लोक वाचला. इतक्या वर्षात बहुतेक १०-१२ व्या वेळेस तरी हा श्लोक वाचनात आला. पण जरी ढोबळमानाने अर्थ कळत असला तरी मनात त्याचा अर्थ पूर्ण उतरला नव्हता. आजही तो संपूर्ण कळला नसावाच. देवाच्या कृपेने परत कधीतरी अंतर्मुख मनास अधिक अर्थ कळेल.
हृदयामध्ये (शिव)लिंगरूपाने जो तेजस्वी पुरुष राहातो. माझे शरीर हेच त्या आत्मारूपी तेजाचे घर आहे, माझी माती ही या ईश्वराची सहचारी आहे, साक्षात शिवांगी आहे, पार्वती आहे.मी प्रत्येक विषयोपभोग घेतो तो म्हणजे याच आत्मारूपी ईश्वराची केलेली पूजा असून रोज निद्रित अवस्थेमध्ये मी त्याच्या समाधीत विलीन होतो. मी रोज जी काही पृथ्वी पादाक्राnत करतो ti या पुरुषास घातलेली PradakshiNa असून,माझी वाचा जे काही भलेबुरे प्रकट करते ते या शंभुचेच स्तोत्र असते. माझ्या कडून घडणारे कर्म हीच त्याची आराधना.
या स्तोत्राचा अर्थ आज जास्त नीट समजला. आपली मती जरा वाईट वासनांनी कुंठित झालेली असेल, मलीन झालेली असेल तर तिच्या सहचाराची शंभो शिवशंकराची सेवा तिच्याकडून घडणारच नाही. विविध विषयरूपी परव्यक्तीकडे तिचा ओढा राहील, आत्म्याच्या सेवेत हयगय होईल. अर्थात ती कर्तव्यच्युत होईल.
इतके दिवस या स्तोत्राच्या ओळी ऐकून जे कळले नव्हते ते मला कळले कारण आधी जवळजवळ तास दीड तास मी अन्य स्तोत्रे मनातल्या मनात वाचत काळ कंठला होता, आपोआप मन अंतर्मुख आणि रिसेप्टिव्ह झालेले होते. यापूर्वी एकदा नाही तर कमीत कमी ३-४ वेळा माझा अनुभव हा होता/आहे की जर हनुमान स्तोत्रे म्हणण्यात काही काळ घालवला व लगेच रामस्तोत्र म्हटले तर जास्त प्रसन्न वाटते. अर्थात मला जाणवलेली ही गोष्ट चमत्कार नसेल. कदाचित कार्तिकस्वामींची स्तोत्रे म्हणून नंतर लगेच रामस्तोत्रे म्हटली तरी हाच अनुभव येत असेल किंवा असा कोणताच अनुभव ९०% लोकांना येणारही नाही. पण म्हणूनच त्याला अनुभूती, किंवा वैयक्तिक अनुभव असे नाव आहे. जे की सायन्सच्या पूर्ण विपरीत आहे - स्थलातीत, कालातीत, व्यक्तिनिरपेक्ष वगैरे नाही.
.
आदि शंकराचार्यानी हा विचार परत देवीच्या एका स्तोत्रातही मांडलेला असल्याचे स्मरते परंतु आता ते आठवत नाहीये. तर एकंदर it was a great day.

नितिन थत्ते Thu, 22/12/2016 - 22:54

In reply to by चिमणराव

>>एक्स्प्रेसवेच्या बाजूला राहणाय्रांना रात्रीच फार त्रास होतो. रँव राँवराँवराँवराँव.

हे बाकी खरं !! आमचं घर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे पासून १०० मीटर तरी आत आहे (शिवाय मध्ये एक मोठी बहुमजली सोसायटीपण आहे). पण रात्रीच्यावेळी फ्लायओव्हरच्या स्लॅबच्या जॉईंटवरून पास होणार्‍या कंटेनर्सचा धडाम असा आवाज रात्रभर आमच्या घरी सुद्धा ऐकू येतो.

अनु राव Fri, 23/12/2016 - 09:19

In reply to by नितिन थत्ते

थत्तेचाचा, रुळाचे जॉइंट वेल्ड करण्याचे काम शहरी भागात ( स्टेशन च्या आजुबाजुला काही किमी ) रेल्वेनी काही ठीकाणी पूर्वीच पूर्ण केले आहे. पूर्वी प्रसरण पावण्यासाठी फट ठेवायचे त्याचे वेल्डींग केल्यामुळे काय झाले ही तांत्रीक माहिती मला नाही.

ट्रेन चा आवाज सांध्यावरुन जाताना खुप होतो.

नितिन थत्ते Fri, 23/12/2016 - 10:12

In reply to by अनु राव

का ते मला माहिती नाही; पण रुळाच्या वेल्डेड जॉईंटवरून चाक जाते तेव्हाही आवाज होतो.

लाकडी स्लीपर जाऊन काँक्रीट स्लीपर आल्यावर आवाज वाढला आहे असे जाणवते.

अभ्या.. Fri, 23/12/2016 - 20:14

In reply to by अनु राव

+११११
आधी निदान नुसते काँक्रीटचे त्तरी स्लीपर होते. नंतर पट्टीपाट्याप्रमाणे त्यात लोखंडी पट्टी आणि दोन टोकाला काँक्रीट ब्लॉक्स असे स्लीपर तर भयाण वाजतात.

चिमणराव Fri, 23/12/2016 - 11:21

In reply to by नितिन थत्ते

तीस मिटरचा रूळ तीस अंश ते सदोतीस अंश ( काही ठिकाणी बेचाळीस+)प्रसरण गुणांकाने गुणून जागा ठेवलेली असते. त्यावर कोकण रेल्वे १२०-१५० च्या टॅाप स्पिडलाही धावते. चाक उघड्या टोकावर आले की डब्याचे ( तीस टन भागिले चार )७ टन वजन एकाच टोकावर येते आणि खालची खडी सरकते. तसं मधल्या भागात होत नाही. वजन साताठ स्लिपरच्यावर पसरते आणि तिकडची खडी एवढी सरकत नाही.वारंवार ती खडी खाली सरकवावी लागते.मेट्रोचा स्पिड काय आणि चार डब्यांचे वजन ते काय!!

नितिन थत्ते Fri, 23/12/2016 - 11:52

In reply to by चिमणराव

जिथे वेल्डेड रूळ नसतात तिथे खालच्या चित्राप्रमाणे झालेलं डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं आहे. इथे चाक जाताना आवाज होणं अपेक्षित आहे
पण वेल्डेड रूळाच्या जॉइंटवर असं होत नाही. तरीही आवाज येतो. त्याचे कार्ण कळत नाही.

.

चिमणराव Fri, 23/12/2016 - 12:40

In reply to by नितिन थत्ते

"वेल्डेड रूळाच्या जॉइंटवर असं होत नाही. तरीही आवाज येतो. त्याचे कारण कळत नाही."
जिथे अखंड रुळाशी आवाज येतो तिथे पाहा तो रुळाचा भाग दबला जात असतो त्यावरून चाक जात असताना. - खडी सरकलेली असते.
( कॅपिटलिझम आणलं तरी तळागाळात खडीच हा शेरा पुढे पडेलच.)

सामो Fri, 23/12/2016 - 19:30

In reply to by अनु राव

थत्तेचाचा, रुळाचे जॉइंट वेल्ड करण्याचे काम शहरी भागात ( स्टेशन च्या आजुबाजुला काही किमी ) रेल्वेनी काही ठीकाणी पूर्वीच पूर्ण केले आहे.

प्रत्येक विषयातील बारीकसरीक माहीती कुठुन मिळालेली असते तुला अनु???

अजयजी Fri, 23/12/2016 - 01:00

In reply to by चिमणराव

>> तिकिटाचा बिल्ला गेटच्या स्क्रीनवर दाखवल्याशिवाय आत प्रवेश नसल्याने लुंगेसुंगे येऊन स्टेशनं घाण करत नाहीत
सगळ्यात मोठा फायदा! फायनली कॅपिटलिझम चा हळूहळू शिरकाव होतोय. उत्तम !!

अजयजी Sat, 24/12/2016 - 01:07

In reply to by नितिन थत्ते

सऱकार जे व्यवसाय चालवते त्यात इतकी कस्टमर्सच्या हक्कांची राखण केली जात नाही. स्पेसीफिकली, 'जैसी कीमत वैसी सर्वीस क्वालीटी' हे आढळत नाही. तुम्ही जे उदाहरण दिले ते विरळा, म्हणून हळूहळू.

अस्वल Sat, 24/12/2016 - 10:49

हा चावून चोथा झालेला विषय असूनही- लोकसत्ताच्या अग्रलेखात मधे यंदाच्या अध्यक्षांची बेक्कार चड्डी खेचली होती, त्यावरून प्रशन पडले.

नेमेचि येतो पावसाळा ह्या नात्याने का होईना, साहित्य संमेलन ह्या अतिशय टुकार गोष्टीला मराठी वृत्तपत्रं आणि मराठी मिडिया इतकं महत्त्व का देतो?
कदाचित त्यापेक्षाही मोठा प्रश्न- निव्वळ "पुस्तक लिहितात/ पुस्तक छापून आलेलं आहे" अशा कुणालाही मराठीत डायरेक्ट साहित्यिक वगैरे म्हणून का महत्त्व दिलं जातं?
आजकाल तर अ‍ॅमेझॉनवर सेल्फ पब्लिश करता येतात पुस्तकं, कुणीही करू शकतो. मग ह्या असल्या टोणग्यांच्या उठाठेवी कशाला कव्हर करायच्या मिडियाने?
उगाच आपली एक चालत आलेली परंपरा म्हणून असले बिनडोक उद्योग कव्हर करण्यापेक्षा लोकसत्ता लाउंज वगैरे प्रोग्रॅम्स कितीतरी पटीने भारी आहेत.

दुसरं एक-
आणि मग ह्या साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षाकडून काहितरी मौलिक विचार वगैरे मांडण्याची अपेक्षा केली जाते. ही काय फालतूगिरी आहे?
मला माहिती नाही "लेखक/कवी/नाटककार" आणि "साहित्यिक" ह्या दोहोंत काय फरक आहे. समजा एखादा उत्तम लेखक असेल तर त्याने वैचारिक, सामाजिक वैश्विक इ.इ. गोष्टींबद्दल बोलायलाच हवं का? नाही त्याला ते सगळं कळत, पण तो सॉलेड लिहितोय ना- ते बघा ना.
उगाच संमेलनाध्यक्ष म्हणून वाट्टेल ते फेकण्यात काय अर्थ आहे? की ही अपेक्षा लोकांनी/मिडियाने लादलीये त्यांच्यावर?

नितिन थत्ते Sat, 24/12/2016 - 11:35

In reply to by अस्वल

पण प्रत्येक साहित्यसंमेलनात बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्याविषयी ठराव मांडले जात असतील तर अध्यक्षांनी राजकीय सामाजिक मत मांडणे ही अपेक्षा येणारच.

अस्वल Sat, 24/12/2016 - 11:46

In reply to by नितिन थत्ते

येस, बेळगाव वगैरे प्रश्न. ते राहिलंच.
गणपतीच्या आरत्यांमधे आपण म्हणतो ना.. "ही घेऊ, ती राहिली" तसा बेळगाव प्र्श्न सगळ्या साहित्य संमेलनात "घेतातच".

मिलिन्द Wed, 28/12/2016 - 00:14

In reply to by अस्वल

हे फारच विनोदी/चुकीचे आहे . मग "मराठी " लोकांचे इतर राजकीय प्रश्नही का नाही "घेत": दुष्काळ , मुंबईतील परप्रांतीय , पुण्याची मेट्रो इ इ ?

जसे तुम्ही फक्त इराक/सिरिया आणि आयसिसचे प्रश्नांवर अश्रू ढाळत बसता तसे त्यांचे कुरण बेळगाव प्रश्न हे आहे.

आदूबाळ Sat, 24/12/2016 - 12:51

In reply to by अस्वल

मला माहिती नाही "लेखक/कवी/नाटककार" आणि "साहित्यिक" ह्या दोहोंत काय फरक आहे. समजा एखादा उत्तम लेखक असेल तर त्याने वैचारिक, सामाजिक वैश्विक इ.इ. गोष्टींबद्दल बोलायलाच हवं का?

ही अपेक्षा ठेवली नसती तर सुहास शिरवळकर अध्यक्ष झाले असते. आवृत्त्याच्या आवृत्त्या विकायच्या, लोकप्रिय पण व्हायचं आणि साहित्य संमेलन अध्यक्षपदही मिळवायचं हे गैर आहे.

अस्वल Sat, 24/12/2016 - 23:28

In reply to by आदूबाळ

सत्य आहे. आय होप सध्याचे विशीतले लोक साहित्य संमेलन वगैरेला जोर्दार लोल म्हणून पुढे जातील आणि संमेलनं आपोआप थांबतील.

नितिन थत्ते Sat, 24/12/2016 - 11:54

अलिकडेच बेडसे आणि वेरूळ लेणी (पुन्हा) पाहिली.

एक प्रश्न मनात आला. या लेण्यांमधील भिंतींवरील शिल्पे अतिशय काटेकोर कोरलेली, खांब परफेक्ट काटकोनात तासलेले-लोरलेले वगैरे आहेत. पण गुंफेची जमीन मात्र ओबडधोबड अनफिनिश्ड असते. म्हणाजे ती कोणे एकेकाळी सपाट-लेव्हलला होती असे वाटत नाही. तसेच ती पावसाच्या वाहत्या पाण्याने किंवा तत्सम कारणाने खराब झाली आहे असेही वाटत नाही. याचे कारण काय असावे?

पैकी बेडसे येथील लेणी तितकीशी पॉलिश्ड नाहीत पण वेरूळची एकदम पॉलिश्ड आहेत. त्यांच्या जमिनी मात्र ओबडधोबड.

पिवळा डांबिस Sat, 24/12/2016 - 12:13

In reply to by नितिन थत्ते

पण गुंफेची जमीन मात्र ओबडधोबड अनफिनिश्ड असते. म्हणाजे ती कोणे एकेकाळी सपाट-लेव्हलला होती असे वाटत नाही. तसेच ती पावसाच्या वाहत्या पाण्याने किंवा तत्सम कारणाने खराब झाली आहे असेही वाटत नाही. याचे कारण काय असावे?

असं बघा, अशी छानशी गुंफा बघून एखादा माणूस जर जमिनीवर सिद्धासन वैग्रे घालून ध्यानाला बसलाच तर ओबडधोबड अनफिनिश्ड जमिनीतून वर आलेल्या दगडाचा त्या माणसाच्या योग्य ठिकाणी दाब येऊन त्याच्या मनात भलतेसलते विचार येऊ नयेत ह्याच कारणासाठी ती जमीन मुद्दाम अनफिनिश्ड ठेवली जात असे!
किंवा मग
ती शिंची शिल्पं आणि खांब बनवून घेतानांच बरेचसे भिक्षू-अवर्स खर्ची पडत असल्याने मग जमीन सपाट करून घेणं आउट ऑफ बजेट पडत असावं!!

युवर चॉईस!!
:)

राही Sun, 25/12/2016 - 00:59

In reply to by नितिन थत्ते

कदाचित, मानवनिर्मित काही प्रगत गुहांमध्ये जसा छताला गिलावा दिसून येतो, तशाच पद्धतीने पायाखालची जमीन समतल करण्यासाठी माती, सारवण, क्ले वगैरे वापरून 'जमीन' बनवली जात होती असेल. पूर्वी मातीच्या जमिनी अशाच बनवाव्या लागायच्या. काळाच्या ओघात हे लिंपण वाहून गेलं असेल आणि त्या खालचा ओबडधोबड तळ उघडा पडला असेल. तसेही भिंतीवर किंवा छतावर चित्रे रंगवायची असल्यास तो पृष्ठभाग एक विशिष्ट लुकण लिंपून रंगानुकूल करण्याची पद्धत होती. पायाखाली कोरीवकाम किंवा रंगकाम करायचे नसल्याने तिथे कामचलाऊ (फारसा टिकाऊ नसलेला आणि ठराविक काळाने पुन्हा लिंपावा लागणारा) भराव वापरत असतील.

चिंतातुर जंतू Sun, 25/12/2016 - 08:33

In reply to by नितिन थत्ते

>> पण गुंफेची जमीन मात्र ओबडधोबड अनफिनिश्ड असते. म्हणाजे ती कोणे एकेकाळी सपाट-लेव्हलला होती असे वाटत नाही. तसेच ती पावसाच्या वाहत्या पाण्याने किंवा तत्सम कारणाने खराब झाली आहे असेही वाटत नाही. याचे कारण काय असावे?

मी ह्यातला जाणकार वगैरे नाही, पण माझं निरीक्षण असं आहे की आपण आज ज्या पॉलिश केलेल्या सपाट फरशीची अपेक्षा ठेवतो ती मुळातच आधुनिक आहे. म्हणजे राजवाड्यांमध्ये संगमरवरी फरशा वगैरे वापरून चालण्यासाठीचा पृष्ठभाग गुळगुळीत करत असतीलही, पण मंदिरं किंवा इतर (सर्वसामान्यांसाठीच्या) सार्वजनिक इमारती, किंवा सर्वसामान्य माणसांची घरं वगैरेंमध्ये चालण्याचा पृष्ठभाग दगडी खडबडीत फरशा किंवा शिळा वापरूनच तयार केला जाई. अगदी आताआतापर्यंत वाडे किंवा जुन्या घरांत वापरलेल्या शहाबादी किंवा तत्सम फरशा आतासारख्या गुळगुळीत पॉलिशच्या नसत. काही प्रमाणात त्यामागचा हेतू घसरून पडू नये असाही असेल. त्यामुळे दगडाचे टवके काढून मुद्दाम खडबडीतही केलं जाई. असे खडबडीत पृष्ठभाग आजही पुण्यातल्या काही जुन्या वाड्यांच्या किंवा देवळांच्या आवारात दिसतात.

नितिन थत्ते Sun, 25/12/2016 - 13:18

In reply to by चिंतातुर जंतू

मी पॉलिश्ड म्हटले तरी माझी अपेक्षा गुळगुळीत अशी नव्हती.

मी "समतल" अशा आणि इतक्या मर्यादित अर्थानेच म्हणत होतो. त्याऐवजी ती तीनचार इंच वरखाली असेलसे वाटते. शिवाय ती वरखाली अशी उखडून झाली असावी असे वाटत नाही.

त्याचवेळी त्याच लेण्यांमध्ये जर कोनाडे असतील तर त्या कोनाड्यांचे तळ मात्र प्रॉपर समतल "कातीव" असतात.

राही म्हणतात तसा कुठल्यातरी प्रकारचा "कोबा" केला असावा असेही चिन्ह (म्हणजे कोपर्‍यांमध्ये तो कोबा राहिला आहे वगैरे) कुठे दिसत नाही.

चिंतातुर जंतू Sun, 25/12/2016 - 13:37

In reply to by नितिन थत्ते

>> मी "समतल" अशा आणि इतक्या मर्यादित अर्थानेच म्हणत होतो. त्याऐवजी ती तीनचार इंच वरखाली असेलसे वाटते. शिवाय ती वरखाली अशी उखडून झाली असावी असे वाटत नाही.

>> त्याचवेळी त्याच लेण्यांमध्ये जर कोनाडे असतील तर त्या कोनाड्यांचे तळ मात्र प्रॉपर समतल "कातीव" असतात.

ओह समजलं. मुळात गुफा समतल नसतात आणि काही ठिकाणी तर त्या समतल करायला खूप कष्ट पडतात. शिवाय, प्रत्यक्ष दृश्य अनुभवात ज्यामुळे फरक पडतो ते कोनाडे 'हाय प्रायॉरिटी' असतात आणि पायाखालची जमीन 'लो प्रायॉरिटी'. आणखी एक गोष्ट म्हणजे कोनाड्यात लोकांनी बसावं अशीही अपेक्षा / सोय काही ठिकाणी असते.

चिमणराव Sat, 24/12/2016 - 13:03

अरुणजोशी, परवाच खरडफळ्यावर लिहिलं होतं- मी आलो आ णि अरुणजोशींचा शेवटचा प्रतिसाद होता जातोय कारण माझ्यामुळे तुम्हा सर्वांना त्रास होतोय वगैरे॥ मी काही तुमची जागा भरून काढू शकलो नाही. नंतर मधल्या काळात अरुणजोशींचा शोध घेता असं कळलं नसल्याने अधिक त्रास होतोय. तर मी आता सुखाने श्वास घ्यायला मोकळा. प्रतिगामींची पिछेहाट थांबवा.

अबापट Sat, 24/12/2016 - 13:11

In reply to by चिमणराव

अच्चू काका , तुम्ही कधी प्रतिगामी झालात ? तुम्ही तर चांगले सेन्टर ऑफ सेन्टर वाटता ... सर्वात संतुलित , आणि हे काय आता नवीनच ?

mayu4u Sun, 25/12/2016 - 00:23

शासन ३६०० कोटी रुपये खर्चून शिवरायान्चे भव्य स्मारक अरबी समुद्रात बान्धणार असल्याची बातमी वाचली. महाराजांचे असामान्य कर्तृत्व वादातीत असल्याने त्यांचे (आणखी एक) स्मारक उभारणे वाईट नाही. मात्र त्यासाठी एवढा निधी (आणि अन्य साधनसम्पत्ती) खर्च करणे योग्य आहे का? विशेषतः राज्यासमोर आणि देशासमोर अनेक प्रश्न असताना? हा निधी अन्य उपयुक्त कामांकरिता वापरला गेला असता तर अधिक चांगले झाले असते का? ऐसीकरांचे मत काय?

'न'वी बाजू Sun, 25/12/2016 - 20:28

In reply to by नितिन थत्ते

एक अतिशय चांगला पायंडा (प्रघात) पडेल.

शिवाय, उद्या पुढेमागे कधी ना कधी आणखी कोणाचे (उदा., मोदींचे?) स्मारक बांधायची वेळ आली, तर त्यावेळेस याच (माझ्या मते अतिशय चांगल्या) नवीन प्रघातास अनुसरुन प्रस्तुत शिवाजी स्मारक विक्रीस काढून निधी जमवता येईल.

मॉन्युमेंट्स मस्ट बी रीसायकल्ड. कसें?
..........

गृहीतक १: मानव मर्त्य आहे. गृहीतक २: मोदी मानव आहेत. एर्गो, मोदी मर्त्य आहेत. बोले तो, भविष्यात कधी ना कधी मरणारच. आता, हे (भविष्यात) जेव्हा केव्हा घडेल, तेव्हा बनवणारे त्यांचेही स्मारक बनवतीलच. नाही का?१अ तेव्हा हा नवप्रघात कामी येईल, इतकेच म्हणणे आहे. अधिक काही नाही.

१अ बनवू नये काय?

नितिन थत्ते Mon, 26/12/2016 - 10:15

In reply to by 'न'वी बाजू

>>मॉन्युमेंट्स मस्ट बी रीसायकल्ड. कसें?

सहमत आहे. इनफॅक्ट जसे आयत्या व्हिक्टोरिया टर्मिनसला छ शि ट छ शि म ट असं नाव देऊन ते आपलेसे करण्याचा स्तुत्य* पायंडा आहेच तर तो राजघाटावरचा ग्रॅनाइटचा चबुतरा उखडून न टाकता त्या चबुतर्‍यावरच शिवाजी महाराजांचा (किंवा अगदीच नाही तर मा**. नथुराम गोडसे यांचा) पुतळा बांधता येईल. शिवाय तिथे "हे राम" अशी कोरलेली अक्षरे आहेत असं टीव्हीवर दिसले आहे. तेवढ "हे" हटवून "जय श्री" अशी अक्षरे कोरून घेतली की काम झाले***.

*पक्षी ते गुलामगिरीचं प्रतीक मानून ते छान स्टेशन पाडून तिथे नवीन स्टेशन बांधण्यापेक्षा हे लाख पटीने बरं.
**हा माननीय या शब्दाचा शॉर्टफॉर्म आहे. इतर काही वाटल्यास मंडळ जबाबदार नाही.
*** श्री. नथुराम गोडसे यांचे स्मारक इतक्या कमी खर्चात करण्यावर आक्षेप**** असेल तर रोज तिथे फटाक्यांची आतशबाजी करण्यात यावी व स्मारकास साजेसा असा खर्च करण्यात यावा.
****भला हमारे आदमीपुरुष का स्मारक उससे सस्ता क्यों?

अजो१२३ Mon, 26/12/2016 - 12:14

In reply to by नितिन थत्ते

माथेफिरू लोकांना लोक विसरून जातात. शवेटी तो माथेफिरूच. त्या हिशेबाने नथूरामला, भो* गांधीवाद्यांनो, विसरून जा. भाव नाही द्यायला पाहिजे. पण या गांधीवाद्यांना नथूरामला मधे ओढायची इतकी खाज का असते? नथूरामाच्या भूमिकेत काहीना का काही योग्य असायचा गंड त्यांना ती अस्वस्थता देतो का?
===================
जे एफ केनेडी ज्या पार्टीचा होता, त्या पार्टीचे लोक त्यांच्या विरोधी पार्टीला, त्या मारेकयाच्या नावाने अमेरिकेत हिणवतात का आजही रोजरोज?
===================
भो* मंजे तो संस्कृतातला.

अजो१२३ Mon, 26/12/2016 - 12:36

In reply to by अनु राव

नथूराम गोडसे.
=====================
मला नथूराम गोडसेला कधी ना कधी न्याय मिळेल अशी आशा आहे. मूर्ख लोक त्याला मुस्लिम द्वेष्टा इ समजतात असे वाटते. वास्तविक त्याच्यापेक्षा गांधीजीच जास्त मुस्लिम द्वेष्टे (किंवा मुस्लिम संभ्रमित) होते असं मानायला हरकत नाही.

अजो१२३ Mon, 26/12/2016 - 12:19

In reply to by नितिन थत्ते

जरूर विकावे. तुम्ही काँग्रेसचे अधिकृत प्रवक्ते असतात तर तत्काळ हकालपट्टी झाली असती. तुम्ही फक्त ऐसीवर अशी भूमिका घेऊ शकता. (राष्ट्रवादी कॉग्रेसी + कॉग्रेसी + राजघाट विका).
=========
नरसिंहरावला (पंतप्रधान आणि काँग्रेसी दोन्ही असून) तिथे जाळायला (का पुरायला, जे काय ते) मना करताना तुम्ही ज्यांचे समर्थन करताना त्यांनी केलेला हंगामा विसरलात का? ते घाट त्यांना आपल्या बापाचे वाटतात.

नितिन थत्ते Mon, 26/12/2016 - 12:24

In reply to by अजो१२३

>>तुम्ही काँग्रेसचे अधिकृत प्रवक्ते असतात तर तत्काळ हकालपट्टी झाली असती.

आम्ही अधिकृत प्रवक्ते नाही हे समजले असेलच. (परंतु लिबरल विचारांचा पक्ष हवा म्हणून आम्ही काँग्रेसला पाठिंबा देतो).

अजो१२३ Mon, 26/12/2016 - 12:31

In reply to by नितिन थत्ते

लिबरल विचारांचा पक्ष? म्हणवतं कसं हो तुम्हाला हे धादांत खोटं? आणि हिंदू धर्म लिबरल नाही? काहीही?
=================
तुम्ही स्वतः त्या पक्षाचे कोणी लागत नाहीत, मतदार आहात हे माहिते. उद्या मत बदलाल इतके अभ्यासू आणि निष्पक्ष आहात हे पण अगोदरपासूनच माहिते. तो विषय नाही.

गब्बर सिंग Sun, 25/12/2016 - 01:12

In reply to by mayu4u

महाराजांना belittle करण्याचा जो प्रयत्न झाला त्याला सडेतोड उत्तर म्हणून उत्तुंग स्मारक बनवले - असं म्हणणं अग्राह्य का आहे ? ( आता -- असा प्रयत्न झालाच नाही, त्या प्रयत्नामागे उद्देश दुसरेच होते वगैरे प्रतिवाद आले तर ते फाट्यावर मारण्यात येतील )

केनेशियन स्टिम्युलस.

जोडीला असा जीआर काढावा की स्मारक बनवणार्‍या कंत्राटदाराने स्मारकाच्या कामात फक्त भूमिपुत्रांना (म्हंजे मराठी माणसांनाच) नोकर्‍या द्याव्यात.

( सोयिस्कर रित्या लिबर्टेरियनिझम ला तिलांजली देऊन लिहिलेला प्रतिसाद )

दुष्काळ वगैरेसारख्या मोठ्या आपत्ती सतत असताना स्मारक हा पैशाचा अपव्यय आहे. महाराजांनी हे केले नसते.

चिमणराव Sun, 25/12/2016 - 04:40

समुद्रातले स्मारक या अर्थाने दक्षिण टोकाला असलेल्या विवेकानंद,तिरुवल्लुवर याचा भौगौलिक आढावा तुलनेसाठी करावा म्हणतो.तिथे पर्यटन सहज शक्य झाले आहे आणि आधारभूत व्यावसायिकांना उत्पन्न झाले आहे.मुंबईत तसं होणे कितीप्रमाणात शक्य होईल? त्यापेक्षा कोकणात जाणाय्रा बोटी पुन्हा सुरू होतील हे पाहिले असते तर बरं झाले असते. त्या मार्गावरच एखाद्या सुयोग्य ठिकाणी स्मारक बनवता आले असते. उदा० कोरलई किल्ला, अलिबाग. इथे तो समुद्रात असल्यासारखा वाटला तरी जमिनीकडूनही वाट आहेच.तिथे स्मारक करणे कमी खर्चाचे होईल.

सामो Sun, 25/12/2016 - 08:43

माझ्या मते ज्ञानेश्वर आदि महान संत हे समाधी लावत तेव्हा clairvoyant असल्याने त्यांना भविष्यात डोकावता येत असावे. आणि मग कशावरुन ज्ञानेश्वर समाधीत तासन तास "गेम ऑफ थ्रोन, "नार्को" आदि सीरीअल्स, सिनेमे यांचे बिंजवॉच करत नसतील????? नाही खरच!! ;)

चिमणराव Sun, 25/12/2016 - 09:13

समाधीला वरती छताला भोक पाडून एक कॅम्रा आत सोडून ते कसे योगमुद्रेत वगैरे बसलेत हे पाहण्यासाठी विचारणा झालेली होती. ती मिळाली नाही.
दिली असती तर -
१) ती स्थिती समजली असती.
२) योगविद्येने मृत्युही आणवता येतो याचा कायमचा पुरावा झाला असता आणि इजिप्शन ममी इतकेच जागतिक कीर्तीचे महत्त्व प्राप्त झाले असते.

तिरशिंगराव Sun, 25/12/2016 - 10:00

मोदी सतत, काळा पैसावाल्यांना बेईमान म्हणत असतात.
पण त्या लोकांचे पैशाशी तरी ईमानच असते. मग ते बेईमान कसे ?

चिंतातुर जंतू Sun, 25/12/2016 - 13:44

In reply to by तिरशिंगराव

>> मोदी सतत, काळा पैसावाल्यांना बेईमान म्हणत असतात.
पण त्या लोकांचे पैशाशी तरी ईमानच असते. मग ते बेईमान कसे ?

मोदींविषयी विशिष्ट मत नाही, पण सद्य परिस्थितीत भारतीय सत्ताधारी अवैध पैशांवर अवलंबून असतात. त्यामुळे त्यांचंही इमान काळ्या पैशांशी असतंच. फक्त चार लोकांमध्ये असं खरं खरं बोलून चालत नाही. त्यामुळे धर्मकर्तव्याचा एक भाग म्हणून सार्वजनिक वक्तव्य 'पॉलिटिकली करेक्ट' ठेवणं त्यांना भाग पडतं एवढंच.

सामो Sun, 25/12/2016 - 13:29

दत्तात्रेयांची माता अनसुया यांच्या स्तोत्रात - विष्णुप्रपौत्री. कर्दमपुत्री म्हटलेले आहे.
पैकी कर्दम हा लक्ष्मी-विष्णु यांचा मुलगा का? मग तसे असेल तर विष्णु हे अनसुयेचे आजोबा. मग विष्णुंनी तीन देवांमधील एक देव या नात्याने तिज अनावृत्त होऊन भिक्षा वाढ असे कसे सांगीतले?

चिमणराव Sun, 25/12/2016 - 13:52

पौराणिक कथा मानवरचित आहेत.यांनी आपल्या मनातील शृंगार व्यभिचारही शालजोडीतून उतरवून छान रूप दिले असणार. मग त्याला मान्यताही मिळवून दिली असेल.गिर्वाणवाणी तिच्या सर्व छंदशास्त्रानिशी कामाला जुंपली असणार. एक ब्रम्हचारी मारुती बनवला पण त्यालाही भुभु:काराची शक्ती दिलीच. वाचतावाचता गडबडा लोळण्याशिवाय काही पर्याय नाही. आमचं लक्ष प्रसादावर

अजो१२३ Sun, 25/12/2016 - 14:51

In reply to by चिमणराव

मूळात व्यभिचाराला सामान्य आचार मानणे हे पुरोगाम्यांचे लक्षण आहे. तेव्हा हे पौराणिक कथाकार जर व्यभिचारांना पावित्र्य देत असतील तर ते तत्कालीन पुरोगामी झाले बरे! तेव्हा त्यांना कधी धर, कधी सोड, कधी झोड महागात पडू शकते.
ते असो, ईश्वर या संकल्पनेला तिलांजली देताना पुरोगामी लॉबीने ज्या कथा रचल्या आहे, त्यांना ज्या प्रकारे 'शास्त्रीय' रुप दिले आहे, मान्यता मिळवून दिली आहे, ती तर आजच डोळ्यांना दिसते आहे. मग आम्ही कॉफी आणि कँन्सर, वा स्तन आणि कँन्सर, वा मेद आणि कँन्सर वा झोप आणि कँन्सर, वा स्ट्रेस आणि कँन्सर वा काहीही फलाणं ढिमकाण आणि कँन्सर अशा परस्परविरोधी दिवसाआड १-२ बातम्या वाचतो तेव्हा गडाबडा लोळायला होतं. Coffee and Cancer - 5 crore items
असो. आमचं लक्ष क्रोसीनवर.

बॅटमॅन Sun, 25/12/2016 - 22:30

In reply to by आडकित्ता

तुलसी पूजन दिन, गुड गव्हर्नन्सं डे, इत्यादि खुसपटांच्या

नाही म्हणजे विशिष्ट धर्माला शिव्याच घालायच्या असतील तर आडून कशाला? सरळच घाला की क्रिसमसच्या मुहूर्तावर.

राजेश घासकडवी Sun, 25/12/2016 - 23:33

In reply to by बॅटमॅन

आडून बोलण्याचा आक्षेप घेताना तुम्हीही 'विशिष्ट धर्म' असं आडूनच बोलताय ना? ज्याबद्दल तक्रार करायची तोच अपराध आपणही करायचा?
निदान त्यांचं नावतरी 'आड'कित्ता आहे. :) तुमचं काय एक्स्क्यूज आहे?

आणि मुळात त्यांनी हिंदूधर्माला शिव्या घालण्याऐवजी मोदींच्या नाटकीपणाला कोपरखळ्या दिल्या आहेत असा माझा समज आहे.

चिमणराव Mon, 26/12/2016 - 06:45

धर्म : समाजाला ताळ्यावर आणण्याचे निरनिराळे प्रकार.
धर्मगुरू:समाजाला आपल्या कह्यात ठेवण्याचे हुकुमी अस्त्र.

अजो१२३ Mon, 26/12/2016 - 11:52

In reply to by चिमणराव

मला श्रेणी द्यायच्या जागी प्रश्नचिन्ह दिसत आहे. पहिले वाक्य = मार्मिक. दुसरे वाक्य पटत नाही.
========================
मंजे
राजकारण : समाजाला ताळ्यावर आणण्याचे निरनिराळे प्रकार.
पंतप्रधान :समाजाला आपल्या कह्यात ठेवण्याचे हुकुमी अस्त्र.
हा सुर इष्ट नव्हे.

अजो१२३ Mon, 26/12/2016 - 12:47

दिल्लीतल्या विज्ञान भवनाला तसेच तिथल्या सामाजिक न्याय मंत्रालयास दाभोळकरांच्या मारेकर्‍याचे नाव देण्यात यावे. अनिंसचे देखिल कुठे कार्यालय असेल तर त्याला देखिल हे नाव द्यावे.
========================
अख्ख्या देशाला एकदमच एकदाच स्टॉकहोम सिंड्रोम ट्रीट करायची काय कॉस्ट पडेल?
========================

अजो१२३ Tue, 27/12/2016 - 19:29

विक फोर्स, स्टाँग फोर्स, ग्रॅविटी नि अजून कोणता तरी एक फोर्स (इलेक्ट्रिक मॅग्नेटीक?) हे मूळ चार फोर्सेस आहेत. उत्क्रांतीचा रेटा नावाचा कोणता मूळ फोर्स नाही, आणि ना ही या चार फोर्सेसचा या रेट्याशी काही संबंध आहे. सबब ही फ्रेज ईश्वरश्रद्धावाचक आहे.

अजो१२३ Thu, 29/12/2016 - 15:47

In reply to by नितिन थत्ते

तेलाचे वजन १ किलो + हायडोजनचे ०.२ किलो = १.२ वनस्पती तूप (डालडा) अशी रासायनिक्क प्रक्रिया असते. (आकडे अस्सेच कैतरी आहेत.)
===============
मंजे काय? हायड्रोजनचा मेद करणे!

चिमणराव Thu, 29/12/2016 - 20:10

In reply to by अजो१२३

याचं एक गंमतिदार उत्तर वेगळ्या पद्धतीने-

मिठाइवाले प्रॅाफिट कसा मोजतात?
महिन्याला साखर किती किलो लागली यावरून.
(३८रु ची साखर ६००रु भावाने गेली)

चिमणराव Thu, 29/12/2016 - 12:53

तेलातले कार्बनचे अणू १६/१७/१८ असतात त्याचंच वजन असतं. हाइड्रोजनच्या बारापट एकेक कार्बन. ती संख्या बदलत नाही. कुठेकुठे हाइड्रोजनचे अणू कमी असतील तिकडे तिथे भरले जातात.असं एक ढोबळ उत्तर आहे.प्रवाहीपणा कमी होतो.गाइच्या तुपात चार सहा कार्बनची साखळी असते त्यामुळे ते अधिक प्रवाही दिसते.वनस्पती तुप(डालडा)हे एकाच तेलाचे नसते. ठराविक प्रमाणात निरनिराळी तेले घेतात.

अजो१२३ Thu, 29/12/2016 - 15:49

In reply to by चिमणराव

अनसॅच्यूरेटेड फॅट्चं सॅच्यूरेटेड फॅट करायला जितका या हायड्रोजन वापरतात तो बदामाच्या भावाने पॉलिथीन पिशवी विकल्याचा प्रकार असतो हे तर नक्कीच. पण याशिवाय डालडा बन्वण्यात काही अन्य हशील आहे का?

चिमणराव Thu, 29/12/2016 - 13:27

उत्तरायण खरंच २१-२२ डिसेंबरला होते का हे १४ तारखेपासून ठराविक वेळेला (७.३०,७.४५ )उभ्या भिंतीच्या कडेची सावली दुसय्रा एका उत्तरेकडच्या भितीवर रेखत गेलो. २२ नंतर उलट जाऊ लागली.
सूर्योदय मात्र त्याची वेळ १४ जानेवारीपर्यंत उशिरा होत होत (७.१७)नंतर पुन्हा लवकर होताना पंचांगात/कॅलिंडर दिलय.
म्हणजे अक्ष जरी २२ डिसेंबर सुर्याच्या विरद्ध दिशेला सर्वाधिक १८० अंशात गेला तरी पृथ्वी अजून क्रांतिवृत्ताच्या सर्वात लांबच्या व्यासाच्या ( मेजर अॅक्सिस इलिप्टिक)टोकाशी पोहोचलेली नाही. १४ जानेवारीपर्यंत दिवस लहानच होणार.

अनु राव Thu, 29/12/2016 - 14:02

In reply to by चिमणराव

अज्ञानातुन आलेला प्रश्न आहे अचरटबाबा.

दिवसाचे छोटे किंवा मोठे पण, पृथ्वी मेजर अॅक्सिस इलिप्टिक पोचली की नाही ह्याच्यावर अवलंबुन का असावे? सरळ मुढमतीनी पटत नाहीये.

सुर्योदय १४ जानेवारी पर्यंत उशीरा होत असेल तर कदाचित सुर्यास्त पण त्याच प्रमाणात उशीरा होत असणार असे मला वाटते.
सर्वात छोटा दिवस हा उत्तरायण सुरु होण्याच्या आदला असायला पाहिजे.

मिहिर Thu, 29/12/2016 - 14:54

In reply to by चिमणराव

सर्वांत लहान दिवस २१ डिसेंबरच. हे बघा. सगळ्यात उशिराचा सूर्योदय त्याच दिवशी का नाही ह्याचे थोडे स्पष्टीकरण.

अजो१२३ Thu, 29/12/2016 - 15:54

In reply to by चिमणराव

इक्विनॉक्स हा टेक्निकली २१ सप्टेंबर्लआ असतो, पण त्याला ७-८ दिवसाचा पुढे - मागे प्रकार होतो. तो वातावरणामुळे!! १४ जानेवारीचा सिग्निफिकन्स समजला नाही. तेच २१ डिसेंबरचे.

अनु राव Thu, 29/12/2016 - 16:14

In reply to by अजो१२३

त्याला ७-८ दिवसाचा पुढे - मागे प्रकार होतो. तो

अजो - असा इक्वीनॉक्स चा दिवस पुढे मागे होतो असे तुम्हाला खरच वाटते का?
म्हणजे सूर्य विषुववृत्त एका वर्षी १८ सप्टेंबरला, पुढच्या वर्षी २५ सप्टेंबरला क्रॉस करतो असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

अजो१२३ Fri, 30/12/2016 - 00:10

In reply to by अनु राव

नाय हो. प्रत्यक्ष मोजमाप केलं तर होतं असं मागे पुढे. ते वातावरण मेलं मधे येतं. नि लॅटीट्यूडचा पण संबंढ असतो.
https://www.timeanddate.com/astronomy/equinox-not-equal.html

चिमणराव Thu, 29/12/2016 - 16:41

हम्म!धन्यवाद!
संक्रातीचा धागा अदितीचा मिपावर येऊन गेला आहेच.उत्तरायणचं थोडं प्रात्यक्षिक केलं.

नितिन थत्ते Sun, 15/01/2017 - 17:03

बॅंक किती कर्ज देऊ शकते ते बॆंकेकडे असलेली रोख रक्कम आणि विविध रेशोनुसार ठरते.

माझ्या खात्यात माझा पगार जमा झाला (तो काही कॅशने जमा झालेला नाही) तर बॅक एसएलआर काढताना तो कॅश डिपॉझिट म्हणून धरते का?

माझ्या क्रेडिट कार्डाचे क्रेडिट लिमिट एक लाख रुपये असेल तर हे एक लाख रुपये एस एल आर मध्ये दिलेले कर्ज म्हणून धरले जाते का?

आदूबाळ Sun, 15/01/2017 - 17:36

In reply to by नितिन थत्ते

तुमचा पगार बँकेला कॅशच्या स्वरूपातच मिळतो. समजा, तुमची बँक आहे महा आणि कंपनीची बँक आहे येस. तर येसने महाला तेवढा बॅलन्स दिला. दिवसाच्या शेवटी येस आणि महा ट्रेझरीतर्फे आपला बॅलन्स सेटल करतात. म्हणजे, महाला कॅश पाहिजे असेल तर ते ट्रेझरीत जाऊन ती मिळवू शकतात.

क्रेडिट कार्डाच्या प्रश्नाचं लॉजिकल उत्तर असं आहे की drawdown balance (वापरलेलं लिमिट) + reasonable expectation of future drawdowns हे एसएलआर मर्यादेत धरत असावेत. पण मी जाणकारांना विचारतो.

अजो१२३ Sun, 15/01/2017 - 19:06

In reply to by नितिन थत्ते

बॅंक किती कर्ज देऊ शकते ते बॆंकेकडे असलेली रोख रक्कम आणि विविध रेशोनुसार ठरते. >>>>>>>>>>>> One may confuse that if a bank has 100 Rs deposit and 10% is CRR, it can lend 90. However, ideally, the banking system ends up lending 1000.
==============
माझ्या खात्यात माझा पगार जमा झाला (तो काही कॅशने जमा झालेला नाही) तर बॅक एसएलआर काढताना तो कॅश डिपॉझिट म्हणून धरते का?>>>>>>> No. However, if your company deposits cash in the bank where you hold salary account, it will held as cash deposit (originally by your company) for the purpose of SLR.
Also if you talking of CRR, then absolutely yes, it will counted as a deposit part of which needs to be diverted to the central bank.
================
माझ्या क्रेडिट कार्डाचे क्रेडिट लिमिट एक लाख रुपये असेल तर हे एक लाख रुपये एस एल आर मध्ये दिलेले कर्ज म्हणून धरले जाते का?>>>>>>>>>> SLR and CRR talk of what to do with deposits. They also talk of how much the system can lend. If you are asking whether your credit limit on the credit card is also held as a eligible lending to compute these ratios, it must have been counted and 100%.

नितिन थत्ते Mon, 16/01/2017 - 10:34

In reply to by अजो१२३

I did not exactly know which ratio.

but suppose it is first day of the bank. Some customers deposit 100 rupees in cash- currency notes- and some customers have deposited cheques worth 100 rupees. If the relevant ratio is 10%, can the bank lend 1000 rupees or 2000 rupees at the end of the day? I think it should be 2000 because if only 1000 can be lent, then cashless economy will prevent banks from lending any money.

Secondly if bank is eligible to lend 10 lakh rupees (based on ratios) and If bank has issued 10 credit cards with credit limit of 1 lakh each., will it be considered that the lending limit is over? Or will lending limit be reduced only to the extent of credit actually availed? Similar is the case of cash credit extended to business (sanctioned is 10 lakhs- utilized is 3 lakhs).

अजो१२३ Mon, 16/01/2017 - 19:34

In reply to by नितिन थत्ते

१. १०० रु कॅश नि १०० रु चेक. १०% crr. २०% slr.
आता बँक २०००-२०० =१८०० रुचे लोन देऊ शकते. (एकूण असेट २०००, १०% रिझर्व्ह).
आता २०% slr. किमान कॅश २०%*२००० =४०० हवी . आहेत फक्त १००. म्हणून on basis of SLR 2000*100/400= ५०० रु .
लेसर ऑफ two = ५००.
=========
Bank can issue a card of any limit, however, if the expenses by the user are more than 500 (assuming that is only loan), the bank shall have to arrange capital from promoters at the end of the day.
=============
In practice, not entire 500 is given by one bank in all countries. Rather it is the banking system that does it together. Banks sell such loans and the realization of this sale works as a deposit. This might be restricted in some countries.
===========
Banks know historic data. Also, the central bank has direct caps on lending for every sector and segment. So even if all credit card holders go wastrels (like in Christmas), it doesn't matter.