Skip to main content

शिवाजी महाराजांविषयी

खरडफळ्यावर झालेली शिवाजी महाराजांविषयीची प्रश्नोत्तरे वेगळ्या धाग्यात टाकली आहेत. पुढची चर्चा इथे करावी ही विनंती.

-प्रणव- Fri, 10/03/2017 - 13:48

शिवाजी महाराज कोणत्या भाषेत बोलायचे?
पुस्तकी मराठी "आम्ही गेलो होतो" टाइप का "म्या गेलो व्हतो" टाईप (i.e. गावठी)?

ऋषिकेश Fri, 10/03/2017 - 13:51

पत्रांवरून अंदाज बांधायचा तर या दोन्ही बोली फोल असाव्यात
सोलापूर/मराठवाडा भागातील बोली+फारसी असे मिश्रण असावे असा (उग्गाच्याउगाच केलेला) अंदाज

-प्रणव- Fri, 10/03/2017 - 13:52

पण लेखी भाषेवरून तोंडी भाषा समजू शिकते का?
आणि पत्र डिक्टेट करत असतील तर? म्हणजे ते बोली भाषेत पत्र सांगत असतील आणि लिहिणारा "पॉलिश्ड" भाषेत मजकूर लिहीत असेल तर?

अनुप ढेरे Fri, 10/03/2017 - 13:53

बाट्या, शिवाजीराजांनी अ‍ॅक्चुअल लढाया किती लढल्या असतील? आणि खूप फ्रिक्वेंटली लढायचे का?

मन Fri, 10/03/2017 - 13:54

My guess -- Shivraay had fought considerable battles on the ground, grass roots ; as he was a millitary commander himself. The first dynasty rulers are usually good commanders. May it be Nulious Caesar, Napoleon, Hyder Ali or Shivraay. They all established their prominence thrpugh actual fights.

नंदन Fri, 10/03/2017 - 14:05

एक मासला (सुनील तांबे यांच्या फेसबुक वॉलवर सापडला):
शिवाजीराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी येथील मंदिरास इनाम जमीन दिली त्यासंबंधीच्या दिनांक २५ ऑक्टोबर १६७१ च्या पत्रातील अंश
अजव रतरवाने राजश्री शिवाजीराजे साहेब दामदौलय हू. हाजर बज्यानेव कारकून हाल व इस्तकवाल व देशमुखानी व देशपांडे यांनी व मोकदमानी व रयानी प्रांत चाकण सु इसने सबैन अलफ श्री याचे इनाम मौजे आळंदी प्रगणे यासी सालाबाद जि मुजेरी सेत १४= || येक खंडी अडीच मण देवाचे देवास दिधले असे. कुलाबा व कुलाकानू दुमाले केले असे. दुमाला करणे. यासी काडीची तोसीस न लावणे. थलकरी अगर कोणी इस्कील न करणे. सदरहू थलबद देणे. देवाचे देवास चालवणे. साल दरसाल चालवीत जाणे. ताजा खुर्दखताचा उजूर न करणे. हिंदू होऊन इस्कील करील त्यास गाईची आण असे. मुसलमान होऊन इस्कील करील त्यास सोराची आण असे.

नंदन Fri, 10/03/2017 - 14:23

>>> पण लेखी भाषेवरून तोंडी भाषा समजू शिकते का?

--- संत तुकाराम हे शिवाजी महाराजांचे समकालीन होते. मला वाटतं, त्यांच्या अभंगांतली भाषा ही तत्कालीन बोलीभाषेच्या अधिक जवळची असावी. लेखी भाषेवर फारसीचा अधिक प्रभाव असणं साहजिक आहे.

मन Fri, 10/03/2017 - 14:23

सुरुवातीच्या काळात तोरणा- पुरंदर वगैरे घेतले, त्यात तर स्वतः राजा होताच. नंतर फेम्मस अफझल- शहिस्ता प्रकरणातली कामगिरी. ही राजानं स्वतः जातिनिशी केलेली. अफझल वधानंतर वाई-मिरज-कोल्हापूर्-गदग- उत्तर कर्नाटक ते अगदि विजापूर शहाराच्या वेशीपर्यंत मोठीच मोहिम नेताजी पालकर आणि शिवराय ह्यांनी उघडली. ह्या दरम्यान राजे स्वतः स्वारीवर होते.
नंतर जयसिंगाशी तह केल्यानंतर मुघल + मराठे अशांनी मिळून आदिल्याच्या पन्हाळगडाअवर हल्ला केला तेव्हा राजे स्वतः तिथं होते. (दुर्दैवानं हल्ला फसला; नेतोजी ऐनवेळी आला नाही.)
नंतर सुरत लुटीहून परत येतान वणी-दिंडोरी ही खुल्या मैदानात लढाई झाली. त्यातही महाराज स्वतः लढलेले आहेत. मराठ्यंनी जिंकलेलं ते मिनि-पानिपत म्हणता यावं. त्यावेळी गनिमी कावा वाअपरलेला नाही,आमने-सामने लढाई.

हे चटकन आथवलेलं लिहिलय. मराठ्यांनी कल्याण्-चौल- कोंकण इथल्या ज्या मोहिमा कआढल्या त्यातही राजे कोणकोणत्या लडहईत स्वतः होते पहायला हवं. झालच तर उंबरखिंडीच्या लडहईतही ते होते.
बागलाण्-नगर वगैरेवर धाडी घालून मराठ्यांनी मुघलांना लुटलं त्यातही राजे असावेत असा अंदाज आहे.

राज्याभिषेकानंतर... दक्षिण दिग्विजयाच्या वेळीही बराच प्रांत राजांनी जिंकला, त्यावेळी ते त्या मोहिमेवर गेले होते म्हणजे लढाया लढले असावेत स्वतः आय गेस.

अर्थात बॅट्या आणि इतर मंडळी अधिक अचूक, नेमकी माहिती देउ शकतील

ऋषिकेश Fri, 10/03/2017 - 14:27

स्वतः लढले की नाही हे गौण आहे.
लढाई आवश्यक आहे की नाही इथपासून स्वतः कधी लढायचं आणि लढायचं नाही याचं गणित त्यांचं पक्कं असावं
ही वॉज ब्रिलियंट स्ट्रॅटेजिस्ट!
म्हाराज राजकारण किंवा लढवैय्ये म्हणून किती ओव्हररेडेड/अंडररेटेड आहेत माहित नाही पण मला ते अंडररेटेड इकोनॉमिस्ट वाटतात. कारण शेवटी सगळी काही पैशांशी येऊन थांबतं. ती समज मजबुत असल्याशिवाय बाकी रा़ज्याचा पिसारा फुलवणे कठीण

आणि मला कुतुहल आहे त्यांच्या वक्तृत्त्वाबद्दल.
त्यांनी केलेलं भाशण वगैरे डॉक्युमेंटेड नसावं (तशी पद्धत असेल तेव्हा) पण त्याबद्दल कोणि लिहून ठेवलंय का?

मन Fri, 10/03/2017 - 14:28

...पण मला ते अंडररेटेड इकोनॉमिस्ट वाटतात. कारण शेवटी सगळी काही पैशांशी येऊन थांबतं. ती समज मजबुत असल्याशिवाय बाकी रा़ज्याचा पिसारा फुलवणे कठीण

+१ बॅट्या ह्याच धर्तीचं कायतरी म्हणाला होता मागे; काही संदर्भही त्यानं दिले होते.

बॅटमॅन Fri, 10/03/2017 - 14:29

मनोबाने यादी दिलेलीच आहे. त्यात बसरूरची १६६५ सालची आरमारी स्वारी अ‍ॅडवायची राहिली. ती स्वारी खरेतर नव्हतीच कारण बसरूरच्या सुभेदाराने गप मुकाट्याने पैसे आणून दिले.
एक करेक्शन- अफजलवधानंतरच्या स्वारीत महाराज किंवा त्यांचे कुणी सरदार विजापूरच्या इतक्या जवळ गेले नव्हते. समकालीन डच पत्रांत तसे दिलेय पण ते चूक आहे असे अन्य साधनांवरून दिसते.
१६६४ च्या सेकंड हाफमध्ये वेंगुर्ल्याच्या जवळपासचा मुलूख राजांनी जातीने ताब्यात घेतला. तेव्हा खवासखान नामक आदिलशाही सरदाराशी लढाया झाल्या.
१६५४ साली जावळीच्या कॅप्चरमध्येही ते जातीने हजर होते.
उंबरखिंडचा उल्लेख तर आहेच. शिवाय ती पन्हाळगड ते विशाळगडवाली मिनीलढाई- एक लढाई बाजीप्रभू वगैरेंसोबत झाली. आणि विशाळगड ताब्यात घेताना दुसरी लढाई महाराजांनी तिथल्या सरदारांसोबत (वेढा घालून बसलेल्या) केली- सुर्वे आणि पालवणकर अशी त्यांची नावे होती बहुतेक.
सुरत लूट तर झालीच. शिवाय दक्षिणेत गेले असताना जवळपास एक वर्षभर त्यांनी बर्‍याच मोहिमा तिकडे केल्या. एक सरदार जिंजीवर पाठवला अन पुढे स्वतः रीइन्फोर्समेंट्स घेऊन आले. जिंजी महिन्याभरातच पडली. वेलोर मात्र दीडेक वर्षानंतर पडले कारण तिथला सिद्दी किल्लेदार अब्दुल्लाखान खूप चिवट होता. पुढे महाराज स्वतः पार अरियलूरपर्यंत शेरखानाच्या पाठलागात होते.
विदर्भ मराठवाड्यातही काही लुटालूट केली तिथेही महाराज बहुधा जातीने हजर होते.

आणि मला कुतुहल आहे त्यांच्या वक्तृत्त्वाबद्दल.
त्यांनी केलेलं भाशण वगैरे डॉक्युमेंटेड नसावं (तशी पद्धत असेल तेव्हा) पण त्याबद्दल कोणि लिहून ठेवलंय का?

सुदैवाने इंग्रजी पत्रांत याबद्दल थोडी माहिती मिळते ती अशी:
Shivaji seems to smile when he speaks, he speaks very fast and precisely.

बाकी त्यांचे अ‍ॅक्च्युअल शब्द त्यांच्या पत्रांत काही ठिकाणी दिसतात, उदा.
व्यंकोजीस लिहिलेल्या पत्रात "सैन्यात तुरुक असता जये कैसा होतो" असे वाक्य.
"ब्राह्मण म्हणून मुलाहिजा कोण करू पाहतो?"
"मराठा असून ब्राह्मणावरि तरवार उगारली, त्याचा नतीजा तोच पावला"
वगैरे. त्यांची अ‍ॅक्च्युअल वाक्ये पहायची असतील तर त्यांची पत्रे वाचा. "शिवछत्रपतींची पत्रे" खंड १ & २ मध्ये सर्व ज्ञात पत्रे दिलेली आहेत.

बॅटमॅन Fri, 10/03/2017 - 14:31

पण मला ते अंडररेटेड इकोनॉमिस्ट वाटतात. कारण शेवटी सगळी काही पैशांशी येऊन थांबतं. ती समज मजबुत असल्याशिवाय बाकी रा़ज्याचा पिसारा फुलवणे कठीण

शेतकर्‍यांसाठी बिनव्याजी कर्जे
किल्ल्यांच्या मेंटेनन्सकरिता रिझर्व्ह फंड (त्याची किल्लेवार यादीच उपलब्ध आहे)
कॅश ऐवजी काईंड मध्ये व फिक्स्ड रेटने टॅक्स
गुलामखरेदीस बंदी
अधिकार्‍यांना जहागिरीऐवजी रोख पगार
वेळोवेळी अधिकार्‍यांच्या बदल्या
सैनिकांना वेळच्यावेळी पगार देणे
गुप्तहेरांना भरभरून पैसे चारणे
ओव्हरसीज (अरेबिया आणि इंडोनेशिया इथे) व्यापाराचा प्रयत्न (१६६४-१६७४ पर्यंतचे तसे पुरावेच आहेत)
परदेशी व्यापारी उदा. डच यांना सोयीसुविधा देणे
पैसे चारून आपला माणूस परकीय सत्तांमध्ये पेरणे किंवा तसा प्रयत्न करणे (उदा. डच व्यापारी अभ्राम लेफेबरला सालिना १००० होनांची ऑफर देणे सो दॅट डच कंपनीकडून फायदा व्हावा)
परकीय सत्तांकडून पैसे घेणे उदा. दक्षिणदिग्विजयाअगोदरच कुतुबशहा महाराजांना काही वर्षे तरी सालिना लाखभर होन देत असे.
कमी दरात वतन विकत घेऊन ते चढ्या दराने विकणे उदा. एका गावची पाटिलकी २० होनांना विकत घेऊन ८० होनांना विकली.
अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. आपले राज्य छोटे आहे आणि त्यातून रेग्युलर मार्गाने येणारे उत्पन्न हे मोठी फौज पोसायला पुरेसे नाही हे त्यांना अगोदरच कळून चुकले होते. त्यासाठी लुटालूट, व्यापार, व्हीसी फंडिंग, इ. मार्ग त्यांनी मोठ्या कौशल्याने अवलंबले. आणि बायदवे त्यांच्या शासनाचा फायदा डच कंपनीला इतका झाला की १६७७ ते १६८४ या कालावधीत कंपनीच्या कोरोमंडल विभागाचे नेट प्रॉफिट अख्ख्या १७व्या शतकात सर्वांत जास्त झाले.

बॅटमॅन Fri, 10/03/2017 - 14:32

सुरत लूट जी केली तिचा महाराजांना प्रचंड फायदा झाला. पहिल्या लुटीतून १ कोटी रुपये तर दुसर्‍या लुटीतून ६६ लाख रुपये इतक्या किमतीचे सामान मिळाले.
बायदवे राज्याभिषेक समारंभात जो खर्च झाला तो वसूल करायला त्यांनी सरंजामदारांवर "सिंहासनपटी" नावाचा नवीन करही लावला. लै म्हणजे लैच. (लोळून हसत)

मन Fri, 10/03/2017 - 14:35

अधिकार्‍यांना जहागिरीऐवजी रोख पगार

टिपू मध्ययुगीन सामंती पाळेगार सिस्टिम बदलून असच काहीतरी करु बघत होता. त्याचा बदल लोकांना आवडलाही. पण पाळेगारांनी गेम केला.
.

वेळोवेळी अधिकार्‍यांच्या बदल्या

हे अकबर-राजा तोरडमल ह्या दुकलीनं केलं. त्याचा त्यांअन लै लाभ झाला. ते फेमस बारा की बावीस मुघल 'सुभे ' त्याच दरम्यान निर्माण केले गेले.

सैनिकांना वेळच्यावेळी पगार देणे

नेपोलियन व ब्रिटिश ह्याबाबतीत चोख होते. त्यांना ह्याचा लाभ झाला.

उदा. दक्षिणदिग्विजयाअगोदरच कुतुबशहा महाराजांना काही वर्षे तरी सालिना लाखभर होन देत असे.

आँ ? हे काय ? उधार म्हणून की चौथाई/वसुली म्हणून ?
कारण त्याला ऑलरेडी औरंगजेबास द्यावे लागायचेच. त्यात पुन्हा मराठ्यांना देणं कसं झेपेल ?
.

कमी दरात वतन विकत घेऊन ते चढ्या दराने विकणे उदा. एका गावची पाटिलकी २० होनांना विकत घेऊन ८० होनांना विकली.

पण हे रयतेस महागात पडू शकत असेल ना ? ते कसं हॅण्डल करायचे ? जो चढ्या दरानं पाटिलकी घेइल तो वसुलीही अतिरिक्त करेल. मग पब्लिक बोंबा मारेल. (ह्याच कारणानं अकबराच्या काळात काही बंडे झाली होती.)

सरंजामदारांवर "सिंहासनपटी"

दुसर्‍या बाजीरावाची "संतोषपट्टी" ऐकलित काय कधी ?

आणि बायदवे त्यांच्या शासनाचा फायदा डच कंपनीला इतका झाला की १६७७ ते १६८४ या कालावधीत कंपनीच्या कोरोमंडल विभागाचे नेट प्रॉफिट अख्ख्या १७व्या शतकात सर्वांत जास्त झाले.

कोरिलेशन आहे, पण ह्याची कॉज्-इफेक्ट सिद्धता विचारली जाइल पब्लिककडून तयारित रहा. (असशीलच ऑलरेडी.)

अभ्या.. Fri, 10/03/2017 - 17:05

In reply to by मन

एका गावची पाटिलकी २० होनांना विकत घेऊन ८० होनांना विकली.

एक लै मस्त कथा वाचलेली फार पूर्वी. शिवकालीन पत्रांचा व तत्कालीन घटनांचा संदर्भ थोडासा टाकून गोखले (इनिशिअल्स आठवत नाहीत) यांची 'वतनाचा येळकोट' नामक कथा होती. शिवाजी महाराज जहागीर सांभाळायला लागण्याअगोदर टोळधाडीचा दुष्काळ पडलेला. त्यात एक गावचा वतनदार गांजून गेलेला. वतन असते पण शेतीउत्पन्न टोळधाडीने स्गळे फन्ना झालेले. खाण्यास दाणाही नसतो. सर्वांचीच परिस्थिती गंभीर तेंव्हा गावकोतवालाकडे हा इश्श्यु मांडतो. कोतवाल पंचक्रोशीतल्या एका सावकार टाईपाच्या माणसाला हा इश्श्यु सांगतो. सावकाराकडे धनधान्य पैसा असतो पण मान सन्मान नसतो. तो धान्य अन पैसे देउन वतन विकत घेतो. थोड्या वर्षांनी पिढी बदलते, काळ ही बदलतो. जुन्या एक्स वतनदाराची मुले आपल्या बापाने वतन विकले हे डोक्यात घेऊन ते वतन परत मागायला सावकाराकडे येतात. सावकार देत नाही. मग ती मुले हि फिर्याद शहाजी महाराजांच्या आमदानीतल्या किल्लेदारासमोर मांडतात. त्याला लाच चारतात. तो किल्लेदार सावकाराला अरेस्ट करुन जब्बरदस्ती वतन परत करायला सांगतो. सावकार त्यावेळी देतो पण नंतर त्याला जिजाऊ आणि बाळराजेंच्या न्यायाची बातमी कळते. तो त्यांच्यापुढे जाउन ही कथा सांगतो. जिजाऊ एकून घेतात व कुमार शिवाजी राजांना न्याय करायला सांगतात. दोन्ही पार्टीज समोर येतात. किल्लेदाराला पण हजर केले जाते. महाराज एवढेच विचारतात की त्याकाळात कशाबद्दल वतन दिले? मुले सांगतात जगण्यासाठी. महाराज विचारतात जर जगलाच नसतात तर तुम्हीही नसता अन वतनही सरकारजमा झाले असते. कसे करावे? किल्लेदाराकडून त्याची लाचखोरी वदवून शिक्षा होते, सावकाराला वतन परत मिळते. तो ज्या खंडोबाच्या साक्षीने व्यवहार झालेला असतो तेथेच येळकोट गर्जतो.
या कथेतील टोळधाड, त्याने झालेला दुष्काळ, वतनाचे विकणे, राजांचा निवाडा, किल्लेदाराची लाचखोरी ह्या घटना कागदपत्रातून घेऊन त्यावरुन रचलेली अत्यंत सुंदर कथा होती. त्यातील तीन तीन वेगवेगळ्या उपमा देऊन त्रिवार वाक्ये वापरुन चित्र उभे करायची स्टाईल प्रचंड आवडलेली होती.

बॅटमॅन Fri, 10/03/2017 - 18:04

In reply to by अभ्या..

बहुधा तूच ही कथा अगोदर सांगितली होतीस. मी ही कधी वाचल्याचे आठवत नाही पण इंट्रेस्टिंग आहे नक्कीच.

अभ्या.. Fri, 10/03/2017 - 18:37

In reply to by आदूबाळ

सर्वोत्कृष्ट मराठी एतिहासिक कथा म्हणून भाग होते. त्यातल्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या भागात वाचलेले. बोरकरांची एक कथा होती. मिरासदारांची, एक भाव्यांची, दांडेकरांची अन आत्ता आठवले ही कथा चिं. यं. मराठेंची आहे.
न्याय पटणारा नाही हे कागदोपत्री बरोबरे पण एकदा विकलेले वतन जबरदस्ती करुन परत विकायला भाग पाडणे हा भाग न पटल्याने मला न्याय योग्य वाटला.

आदूबाळ Fri, 10/03/2017 - 21:03

In reply to by बॅटमॅन

ते दिलेलं कारण चूक आहे.

इथे दोन ट्रान्झॅक्शन्स झाल्या आहेत.

(१) मूळ वतनदाराने 'जगण्यासाठी' वतन सावकाराला विकणे
(२) सावकाराने ते वतन मूळ मालका(च्या वंशजांना) विकणे

वतन विकता येतं असं गृहित धरू . त्यामुळे प्रश्न ट्रान्झॅक्शन १ च्या व्हॅलिडिटीचा नाही. वतन विकता येतं या गृहितकातच ती व्हॅलिडिटी निर्माण होते.

म्हणजे प्रश्न आहे ट्रान्झॅक्शन २ च्या व्हॅलिडिटीचा. वतन विकलं नसतं तर तुम्ही मेला असता आणि वतन सरकारजमा झालं असतं, या फॅक्टचा ट्रान्झॅक्शन २ शी काय संबंध?

हां - "किल्लेदाराने लाचखोरी करून धाकदपटशा दाखवून सावकाराकडून वतन परत देववलं" हे सिद्ध झालं तर ट्रान्झॅक्शन २ हे contract under duress आहे हे सिद्ध होईल आणि त्यामुळे न्याय बरोबर आहे. पण लॉजिकल रीझनिंगची साखळी मध्येच तुटली आहे.

_______________
वतन (usufruct) ही विक्रीयोग्य वस्तू कशी हे मला बराच विचार करूनही समजलं नाहीये. पण ते जाऊदे.

बॅटमॅन Fri, 10/03/2017 - 21:19

In reply to by आदूबाळ

काँट्रॅक्ट अंडर ड्युरेस आहे हे कथेत सांगितलं आहेच.

बाकी लॉजिकसाखळी अंमळ तुटक वाटते हे मान्य.

वतन विकता येतं. वतन म्हणजे तरी काय? तर त्याचे प्रिविलेजेस आणि डूटीज़. पाटीलकीच्या अंडर मला एक एकर शेत, आणि सोबत दरवर्षी दहा शेर गहू, एक भांडं तूप अन एक किलो आंबे इतकं मिळत असेल आणि मी अर्धी पाटिलकी जर १०० होनांना करारपत्र इ. करून विकली तर मला करारोत्तर अर्धा एकर शेत मिळणार, पाच शेर गहू, अर्धे भांडे तूप अन अर्धा किलो आंबे मिळणार. हे झाले प्रिविलेजेस. झालंच तर कुठल्या निर्णयाला पाटलाची संमती हवी असल्यास मी ज्याला वतन विकेन त्यासोबत माझीही संमती आवश्यक असेल. वगैरे.

बॅटमॅन Fri, 10/03/2017 - 14:39

आँ ? हे काय ? उधार म्हणून की चौथाई/वसुली म्हणून ?
कारण त्याला ऑलरेडी औरंगजेबास द्यावे लागायचेच. त्यात पुन्हा मराठ्यांना देणं कसं झेपेल ?

दुर्दैवाने याबद्दल ओझरते उल्लेख आहेत फक्त. सारांश इतकाच की मुघलांशी लढण्याची फी म्हणून ते फंडिंग होतं. म्हणजे काहीसं असं की आम्ही काय तुम्ही काय अन आदिलशाही काय, ताटातलं वाटीत अन व्हाईसे व्हर्सा. पण हा मुघल सगळ्यांचाच घास घ्यायला बसलाय आणि मी एकटाच त्याच्याशी उघड पंगा घेतोय, सो बघा काय करता ते.

पण हे रयतेस महागात पडू शकत असेल ना ? ते कसं हॅण्डल करायचे ? जो चढ्या दरानं पाटिलकी घेइल तो वसुलीही अतिरिक्त करेल. मग पब्लिक बोंबा मारेल. (ह्याच कारणानं अकबराच्या काळात काही बंडे झाली होती.)

हेच ते अ‍ॅझम्प्शन. असे लगेच तर्काचे पूल नका बांधू. जर तसं काही असतं तर नक्कीच महाराजांनी उचलबांगडी केली असती. टॅक्स द रिच मोर (सॉरी गब्बर) & लीव्ह द जन्ता अलोन असे हे धोरण.

दुसर्‍या बाजीरावाची "संतोषपट्टी" ऐकलित काय कधी ?

नाही. हे काय असतं?

कोरिलेशन आहे, पण ह्याची कॉज्-इफेक्ट सिद्धता विचारली जाइल पब्लिककडून तयारित रहा. (असशीलच ऑलरेडी.)

मनोबा डेटा सायन्स शिकत असल्याचे दिसतेय.
एनीवे- महाराजांनी आणलेल्या पोलिटिकल स्टॅबिलिटीचा हा नतीजा असावा रादर दॅन सम ग्रेट इंडिविजुअल पॉलिसीज़ असे तूर्तास मत आहे. पुन्हा कधी हॉलंडास जाईन तेव्हा संबंधित कागदपत्र बघून ठरवेन काय नक्की कारण आहे ते.

मन Fri, 10/03/2017 - 14:40

नाही. हे काय असतं?

त्यानं लै आचरट उद्योग केलेत. अमुक पट्टी तमुक पट्टी च्या नावाखाली ट्याक्स लावले म्हणे. पब्लिक वैतागली होती. शेवटी तर दुसरा बाजीराव सत्तेवर आहे ह्याचा तुम्हाल संतोष होतो ना ? मग द्या ट्याक्स त्या आनंदात ; असं म्हणत संतोषपट्टी, संतोषकर लावला होता. अधिक संदर्भ अतिशहाण्याकडे आहेत.

बॅटमॅन Fri, 10/03/2017 - 14:41

शिवाजीराजे म्हणजे मास्टर स्ट्रॅटेजिस्ट होते यात कै शंकाच नाही. त्यातही काही गोष्टी मला मास्टरस्ट्रोक वाटतात त्या अशा:
फुलफ्लेज्ड आरमार उभारणे आणि सागरी किल्ले बांधणे
दक्षिणदिग्विजय
सुरत लूट
राज्याभिषेक
यापैकी प्रत्येक गोष्टीचा दूरगामी परिणाम झालेला आहे. दक्षिणदिग्विजय केल्यामुळे पुढे औरंग्या दख्खनमध्ये आल्यावर मराठी राज्य टिकले, नपेक्षा टिकले नसते.

त्यानं लै आचरट उद्योग केलेत. अमुक पट्टी तमुक पट्टी च्या नावाखाली ट्याक्स लावले म्हणे. पब्लिक वैतागली होती. शेवटी तर दुसरा बाजीराव सत्तेवर आहे ह्याचा तुम्हाल संतोष होतो ना ? मग द्या ट्याक्स त्या आनंदात ; असं म्हणत संतोषपट्टी, संतोषकर लावला होता. अधिक संदर्भ अतिशहाण्याकडे आहेत.

हॅ हॅ हॅ, असूही शकेल. काय सांगता येत नाही.

बॅटमॅन Fri, 10/03/2017 - 14:43

रच्याकने- दक्षिणदिग्विजयावेळी महाराजांना भेटायला डच कंपनीचे प्रतिनिधी गेले तेव्हा त्यांची आपसात घमासान चर्चा झालेली की शिवाजीला पुरेशा किमतीच्या भेटवस्तू द्या कारण फ्रेंच कंपनीच्या प्रतिनिधीने पुरेशा किमतीच्या भेटवस्तू न दिल्याने त्याला रहायला तंबूही दिला गेला नाही आणि बिचार्‍याला रात्रभर झाडाखाली काढावी लागली. वगैरे. (लोळून हसत)
त्याहीपेक्षा १६९२ सालचं प्रल्हाद निराजीचं स्टेटमेंट भारी आहे. ते नक्की पहावं लागेल काय आहे ते पण सारांश असा की फ्रेंचांची पाँडिचेरी घ्यायचा प्रयत्न डचांकडून खूप चालला होता. मराठ्यांकडून डचांना सपोर्ट मिळाल्याचे कळताच फ्रेंच लोक्स प्रल्हाद निराजीकडे आले आणि तक्रार करू लागले की आपला अगोदरचा करार होता वगैरे. तो शांतपणे इतकेच म्हणाला की होय, अगोदर करार होता पण आता आम्हांला दुसरी उत्तम ऑफर मिळाली. आणि शिवाजीने त्याचे मोठे साम्राज्य उभे केले ते पद्धतशीर बळकावणी, लूट करून, इतर राज्यांशी केलेले तह मोडून आणि त्यांना फसवूनच. राजारामाला जर राज्य चालवायचं असेल तर त्यालाही हेच करावं लागेल. तेव्हा जर फ्रेंचांना पाँडिचेरी प्यारी असेल तर त्यांनी डचांच्या तोडीची ऑफर आम्हांला दिली पाहिजे.
हे स्टेटमेंट पाँडिचेरीचा चीफ फ्रान्स्वा मार्तँ याच्या डायरीतून घेतलेले आहे. इतकी उघड कबुली विरळाच. बाकी लोकांनी तरी असे काय दिवे लावले म्हणा? बडे बडे देशों में वगैरे.....

मन Fri, 10/03/2017 - 14:44

कारण फ्रेंच कंपनीच्या प्रतिनिधीने पुरेशा किमतीच्या भेटवस्तू न दिल्याने त्याला रहायला तंबूही दिला गेला नाही आणि बिचार्‍याला रात्रभर झाडाखाली काढावी लागली. वगैरे.

अवांतर -- हे गोरे लोक फिरतीवर असताना किंवा अदरवाइजही सकाळी लोटा घेउन जायचे का शौचास? त्या काळी कमोड नसत. मग सगळेच जण आज ज्यला "इंडियन स्टाइल" म्हणतात तसे बसत असवेत ना ?
तसं असेल तर त्या प्रकारास "इंडियन स्टाइल " का म्हणावे ? "डिफॉल्ट पोझिशन" किंवा "ट्रेडिसनल पोझिशन" असं का म्हणत नाहित? ती काय इंडियन लोकांची खासियत आहे का ? की त्याही काळी युरोपियन कही वेगळ्या रचना वापरायचे ?

आनंद यात्री Sat, 11/03/2017 - 01:09

In reply to by मन

>>आज ज्यला "इंडियन स्टाइल" म्हणतात

जगभरात "इंडियन स्टाइल"ने बसणे म्हणजे आपण ज्याला पद्मासनात बसणे म्ह्णतो ते. Lotus position किंवा Cross-legged position यासुद्धा पद्मासनाच्याच अल्टरनेटिव इंग्रजी टर्म.
दोन पायावर उकिडवे बसायच्या टॉयलेटला स्क्वॅट टॉयलेट किंवा स्क्वॅटिंग पॅन टॉयलेट म्हणतात.

बॅटमॅन Fri, 10/03/2017 - 15:21

शिवाजी महाराजांनी ओव्हरसीज व्यापार केला होता ही गोष्ट मला आठवते त्याप्रमाणे पुरंदर्‍यांनीही बहुधा सांगितलेली नाही. १६६४ ते १६७२-७४ पर्यंत अरेबिया साईडला आणि दक्षिणदिग्विजयानंतर इंडोनेशिया साईडला व्यापार सुरू झाला होता. संभाजीराजांचेही एक जहाज मलाक्काच्या सामुद्रधुनीत १६८१ साली पोचल्याची डच कागदपत्रांत नोंद सापडते. हा पुरावा खूप रोचक आणि तितकाच महत्त्वाचा आहे.

adam Fri, 10/03/2017 - 15:55

In reply to by बॅटमॅन

शिवाजी महाराजांनी ओव्हरसीज व्यापार केला होता ही गोष्ट मला आठवते त्याप्रमाणे पुरंदर्‍यांनीही बहुधा सांगितलेली नाही. १६६४ ते १६७२-७४ पर्यंत अरेबिया साईडला आणि दक्षिणदिग्विजयानंतर इंडोनेशिया साईडला व्यापार सुरू झाला होता. संभाजीराजांचेही एक जहाज मलाक्काच्या सामुद्रधुनीत १६८१ साली पोचल्याची डच कागदपत्रांत नोंद सापडते. हा पुरावा खूप रोचक आणि तितकाच महत्त्वाचा आहे.

राजांचा व्यापार म्हंजे नेमका काय ? व्यापारी लोक तर नेहमीच व्यापार करीतच होते ना.
मुघलांच्या अंमलाखालील गुजरातेतले व्यापारी पश्चिमेला अरेबियाकडे व्यापार करीत होते. इन फ्याक्ट मुघलांच्या आधी जो गुजरातचा सुलतान होता (राजपूत कन्व्हर्ट मुस्लिम, बहुतेक महमूदशहा नाव त्याचं) त्याच्याही काळात व्यापार चालतच होता.
बाबर प्रथम भारतात यायच्याही आधी वीस वर्षे चौलचं नाविक युद्ध झालं होतं.
गुजरातचा सुल्तान, इजिप्तचे मामुलुक सुल्तान एका बाजूला आणि पोर्तुगीज दुसर्‍या साइडला अशी ही लढाई भारताच्या पश्चिम किनार्‍यावर.
https://en.wikipedia.org/wiki/Battle_of_Chaul
.
.
तर संगायचा मुदा -- त्या सुल्तानाचेही बाहेर समुद्रापलिकडे कॉण्ट्याक्ट्स होते की. आणि मुघलही पोर्तुगीज ताअफ्यंसमवेत स्वतःचे एखादे शाही गलबत पाथवून देत व्यापार + हज यात्रेकरुवाल्यांसाठी. (आदिलशहाची अम्मी १६५६च्या आसपस हज करुन आली, तीही समुद्र मार्गे करुन आली, तेव्हा सोबतीस व्यापारी ताफाही घेउन गेली असणारसं वाटतं)

हां, मुघल अथवा आदिलशहाचं लढाउ आरमार नव्हतं विशेष.

बॅटमॅन Fri, 10/03/2017 - 16:07

In reply to by adam

दोन गोष्टी आहेत.

१. आपल्या घरआंगणातल्या लढाया सोडून मराठेशाहीत समुद्रापार व्यापारही केला जात होता हे लोकांना अजून बहुतांशी माहितीच नाहीये. तो मुद्दा लोकांच्या मनावर ठसणं आवश्यक आहे कारण मग समुद्रबंदी वगैरेसारख्या कल्पनांचे बिनकामी रोपण जे सध्या होते ते होणार नाही.

२. अगोदरच्या लोकांचाही व्यापार होताच. त्या दृष्टीने शिवाजी महाराजांचा व्यापार नवीन नक्कीच नाही. पण त्यांनी इतर गोष्टींसोबत हेही केलं हे सांगणं अवश्यमेव आहे. शिवाय नावीन्य बघायचे झाले तर दोन गोष्टींत आहे. एक म्हणजे लढाऊ आरमार. सिद्दी वगळता कुणाचेही आरमार नव्हते. केरळात होते पण ते तितपतच. या लढाऊ आरमाराचे पराक्रम इतके जबरदस्त आहेत की गणना करवत नाही. येत्या दशक-दोन दशकांत मराठी इतिहासातील सर्वांत प्रॉमिसिंग एरिया म्हणजे माझ्या मते आरमार हाच असेल.

आणि दुसरे म्हणजे ओमानच्या सुलतानाशी महाराजांचा संपर्क आला होता आणि दोघांनी एकमेकांना मदतही केल्याचे उल्लेख आहेत. फक्त व्यापार सोडून असे परदेशी सत्तांशी राजकीय संधान बांधणे ही गोष्ट दाखवते की शिवाजी महाराजांचे कार्यक्षेत्र भारताबाहेरही पोहोचलेले होते.

थोडक्यात, महाराज आणि मराठी राज्य फक्त चार जिल्ह्यांपुरते मर्यादित होते ही समजूत अजूनही रुजलेली आहे. ती बदलायची तर असे पुरावे ठासून मांडणं आवश्यक आहे. ते हिंदूमुसलमान वगैरे मुद्दे जुने झाले. आता या फ्रंटवर विजयाची नितांत गरज आहे.

ऋषिकेश Fri, 10/03/2017 - 16:19

In reply to by बॅटमॅन

थोडक्यात, महाराज आणि मराठी राज्य फक्त चार जिल्ह्यांपुरते मर्यादित होते ही समजूत अजूनही रुजलेली आहे. ती बदलायची तर असे पुरावे ठासून मांडणं आवश्यक आहे. ते हिंदूमुसलमान वगैरे मुद्दे जुने झाले. आता या फ्रंटवर विजयाची नितांत गरज आहे.

लिवा लिवा एखादी लेखमाला.
सगळे यथाशक्ति यथामति प्रचार/प्रसार करू

पदरचे पैसे घालून वॉलावॉलावर ही लेखमाला पोचवायला मी तयार ए

बॅटमॅन Fri, 10/03/2017 - 16:22

In reply to by ऋषिकेश

धन्यवाद, मात्र हा प्रोजेक्ट खूप मोठा आहे. पंधरावीस वर्षे लागतील. डेफिनिटिव्ह काम व्हायला शिवाजी ते दुसरा बाजीराव हा काळ घेतला पाहिजे. त्या कालावधीत इतके काही घडून गेलेले आहे की कल्पना करवत नाही. खूप वेगवेगळ्या प्रकारचे काम करता येईल. सध्याच्या कामातून ही थीमही अंशतः कव्हर होईल असे वाटते. पाहूच.

ऋषिकेश Fri, 10/03/2017 - 16:51

In reply to by बॅटमॅन

दोन गोष्टी आहेत बॅट्या.
एक म्हणजे माहितीपूर्ण प्रबंध/निबंध/लेखन करणे. याला खुप वेळ लागेल मान्य.
दुसरं हल्लीच्या काळात सहज पसरवता येईल अशा माहितीची गोळीबंद बुलेटस सोडणे. मी दुसरं म्हणतोय. कारण पहिली गोष्ट माहिती देते पण त्याचा प्रचार/प्रसार होणे कथीण असते.

किमान तु तरी त्या 'अ‍ॅकेडेमियन्स' सारखे नको करूस ;) की आपलं काम पर्फेक्ट होइस्तोवर थांबणे.

बाकी प्रत्यक्ष भेटल्यावर बोलू काही कल्पना डोक्यात आहेत.

बॅटमॅन Fri, 10/03/2017 - 16:52

In reply to by ऋषिकेश

मान्य. अशा बुलेट्स नक्की सोडता येतील. पण तेही तात्कालिक ठरते. काही स्थायी आणि अ‍ॅक्सेसिबल रिसोर्सेस बनवायची आयड्या आहे. बोलूच.

बॅटमॅन Fri, 10/03/2017 - 16:50

डच, इंग्रजी आणि फ्रेंच वृत्तपत्रांमधूनही महाराजांबद्दल माहिती मिळते. जगभर घडणार्‍या घटनांची माहिती त्यात असते. भारतातही खूप काही घडत होते मात्र त्यांपैकी महाराजांची बातमी येते यावरून हेच दिसते की युरोपियनांच्या मते त्या बातमीला महत्त्व होतं. जस्ट इमॅजिन- लंडन, पॅरिस आणि अ‍ॅम्स्टरडॅमच्या रस्तोरस्ती विक्रेते "भारतात मुघलांचे सुरत बंदर लुटले, कोणी शिवाजी नामक बंडखोर आहे" असे ओरडत पेपर खपवत असतील. आपल्या हयातीतच शिवाजी महाराजांचे नाव युरोपपर्यंत पोहोचले होते. भारतभर तर होतेच, शिवाय ओमान आणि युरोपातही पोहोचले होते.

महाराजांचे निधन झाले १६८० साली. त्यानंतर फक्त ८ वर्षांनी एका फ्रेंचाने त्यांचे चरित्र लिहिले. त्यापाठोपाठ १५ वर्षांनी एका पोर्तुगीजाने त्यांचे चरित्र लिहिले. अख्खे चरित्र लिहिण्याइतपत या पुरुषास महत्त्व द्यावे असे युरोपियनांना वाटणे हे काय दर्शवते? सुरेंद्रनाथ सेनांनी अशा चरित्रांचे संकलन करून "फॉरिन बायोग्राफीज़ ऑफ शिवाजी" या नावाचे एक पुस्तकच तयार केलेले आहे. सुदैवाने त्याची फ्री पीडीएफ नेटवर उपलब्धही आहे.

http://www.dli.ernet.in/handle/2015/500042

शिवाजी महाराजांच्या एका समकालीन चित्रावर "पोर्तुगीजांशी समुद्रात टक्कर घेणारा" अशा शब्दांत त्यांचे वर्णन आहे. कैकवेळेस त्यांच्याशी कट्टर शत्रुत्व पत्करलेले इंग्रजही त्यांची तुलना सीझर, अलेक्झांडर आणि हॅनिबलशी करतात.

रावसाहेब म्हणत्यात Sat, 11/03/2017 - 01:28

गनिमी कावा war strategy म्हणजे काय? शिवकालीन tactics बद्दल कुठलं ब्लॉग किंवा आर्टिकल आहे का चांगलं authentic असं?

बॅटमॅन Sat, 11/03/2017 - 02:04

In reply to by रावसाहेब म्हणत्यात

गनिमी कावा म्हणजे आपलं सैन्य कमकुवत असताना वापरायची युक्ती. पळून जातो असे दाखवायचे, मग भुलवत भुलवत दूर नेऊन मधूनच हल्ला करायचा. सरळ थोबाडीत मारण्यापेक्षा डासागत चावे घेऊन हैराण करायचे.

मराठ्यांच्या लष्करी व्यवस्थेबद्दल एक अख्खं पुस्तकच सुदैवाने उपलब्ध आहे- मिलिटरी सिस्टिम ऑफ मराठाज़.

https://archive.org/details/in.ernet.dli.2015.281767

एंजॉय.