मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ६८
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----

माझे उत्तर = तुमचे उत्तर -
माझे उत्तर = तुमचे उत्तर - डाव्या कोपऱ्यातला तळाचा भाग.
डाव्या कोपऱ्यातला तळाचा भाग = त्रिकोण ABC - त्रिकोणाचा करडा भाग - वर्तुळाचा AC खालचा काप.
वर्तुळाचा खालचा काप = वर्तुळपाकळी DEC - त्रिकोण DEC.
कोन ECA = tan-1(1/2)
कोन DEC = पाय - 2*tan-1(1/2)
ह्या कोनांवरून पाकळी आणि त्रिकोणाची क्षेत्रफळे काढता येतात.
आपल्याला ADG ह्या भागाचे
आपल्याला ADG ह्या भागाचे क्षेत्रफळ काढायचे आहे.
त्रिकोण ABC = ADG भाग + DFCG भाग + CBG भाग.
त्रिकोण ABC व भाग CGB ह्यांची क्षेत्रफळे माहीत आहेत.
DFCG भाग = DECG वर्तुळपाकळी - त्रिकोण DEC
आता कोन EDF = कोन ECF (समांतरभूज त्रिकोण)
तसेच कोन ECF = कोन FAB (व्युत्क्रम कोन (झेड)) = tan-1(1/2) (कारण BC = 5, AB = 10).
आता काटकोन त्रिकोण EFC मध्ये, कर्ण EC = 5 सेमी.
म्हणून, EF = sqrt(5), FC=2*sqrt(5).
ह्यावरून काटकोन त्रिकोण EFC चे क्षेत्रफळ काढता येते.
तसेच वर्तुळपाकळी DECG चे क्षेत्रफळ = (कोन DEC / pi) * pi*r^2
कोन DEC = pi - कोन ECF - कोन EDF = pi - 2*tan-1(1/2)
आता हे सगळं वर घालायचं आणि ADG ह्या भागाचं क्षेत्रफळ काढायचं.
जमलं एकदाचं
९० - २५ pi (१- (atan (३/४) / ३६0))
~ १९.५
O चे coordinates (०, ०) धरले तर A चे coordinates (-५, -५) , C चे coordinates (0, -५)
B चे coordinates (-३, -४) येतात ----> line AB (x = 2y + 5) आणि वर्तुळाचा (x^2 + y^2 = 25) छेद
X चे coordinates (0, -४)
त्रिकोण ABC = १/२ (५ X |(-५ - (-४))|) = ५/२
त्रिकोण OBC = १/२ (OC X BX) = १/२ (५ X |(-३ - 0)|) = १५/२
कोन BOC = atan (BX/OX) = atan (3/4), वगैरे
इथे सगळे उत्तर बघता येईल
बदल नाही
यंदाच्या लाल किल्ल्यावरील भाषणात सांगण्यासारखे फारसे नसेल - तवलीन सिंग
-------------------------------------
एकीकडे १२० कोटींपैकी फारच थोडे कर भरतात. बरेचसे (व्यावसायिक) लोक करचुकवेगिरी करतात त्यांच्याकडून कर वसूल केला पाहिजे असे सामान्यतः लोकांना वाटते. म्हणजे करवसुली अधिकार्यांनी त्यांच्यामागे लागून कर वसूल करायला हवा असे आपले म्हणणे असते.
दुसरीकडे हे करवसुली अधिकारी बसुलीचा ससेमिरा लावतील तेव्हा आपणच इन्स्पेक्टर राज* आहे असे म्हणू.
*आम्ही रुग्णांवर उपचार करू की कर अधिकार्यांना हव्या असलेल्या कागदपत्रांचे गठ्ठे सांभाळत बसू? असं डॉक्टर विचारतील. इतरही असेच कायकाय म्हणतील.
दोन्हीचा सुवर्णमध्य कोणता?
दोन्हीचा सुवर्णमध्य कोणता? १.
दोन्हीचा सुवर्णमध्य कोणता?
१. प्रत्यक्ष कर बंद करुन, जिथे वसुल होऊ शकतील अश्या टॅक्स पॉईंट वर अप्रत्यक्ष कर लावणे. अधोरेखित शब्द महत्वाचा. उदा - इंधने, स्टील आणि बाकीची मेटल्स, कार, दुचाकी, एसी, टीव्ही, फ्रीझ अश्या गोष्टी जिथे उत्पादकाला कर चुकवणे शक्य नाही. हे कराचे दर थोडे जास्त असतील पण सर्व सुरळीत होइल.
२. सैन्य, शिक्षण आणि वैद्यकीय सेवा वगळता सर्व सरकारी आस्थापनांना कॉस्ट सेंटर पासुन प्रोफीट सेंटर बनवणे. : पोलिस आणि न्याय संस्था गुन्हेगारांकडुन त्यांचा खर्च वसुन करतील. तुरुंग फुकट लेबर पुरवणार्या संस्था बनतील. पासपोर्ट वगैरे महाग करुन विदेश मंत्रालयाचा खर्च काढला पाहिजे. थोडक्यात सरकारी सेवा पे अॅज यु गो अश्या असतील.
राडिया का काय ते
आमच्या ऑफिसकडून radia client automation service नावाचे काहीतरी आम्हाला मिळू शकेल अशी मेल आली आहे. हा काय प्रकार आहे, त्याची त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केला असला तरी मेल वाचून ओ की ठो कळलं नाही. गुगलवर वाचूनही कळलं नाही. ही काय service आहे? ऑफिसच्या काँप्युटरवर किंवा लॅपटॉपवर ती इन्स्टॉल केल्याने काय होईल? पीडीएफ/ वर्ड फाइलींचे वाचन व वर्डमध्ये लिखाण यासाठी काँप्युटरचा मुख्यत्वे वापर करणार्या आम्हा पामरांना या सुविधेचा काही फायदा आहे का?
प्रश्न : windows 10 मधे एका
प्रश्न : windows 10 मधे एका user चे desktop icons गायब झालेत. Desktop वर right click पण होत नाही.
एका Windows Update मुळे सगळ्याच युझर चे Icons गायब झाले होते. तेव्हा तो perticular windows update (KB3159398) uninstall केल्या नंतर Icons परत आले. पण तेही फक्त windows 7 आणि 8 मधेच.
या windows १० मधे तो Update नहिच्चे, त्यामुळे uninstall करण्याचा प्रश्न नाही. System Restore करायचं म्हटलं तर २ दिवसांपुर्वी फक्त Adobe Acrobat update केलं होतं. त्याने काही फरक पडेल असं वाटत नाही.
Event Log मधे १५० च्या वर events आहेत. आणि त्यातही नेमकं कशामुळे असं झालंय ते कळेना. Google बाबा कडुनही काही उत्तर मिळेना. म्हणून हा लेखन प्रपंच.
जाणकारांनी कृपया मदत करावी.
- ITतली बिचारी.
ही महोदय बाई आता बहकल्यासारखे
ही महोदय बाई आता बहकल्यासारखे करायला लागली आहे का?
मला तर हा प्रकार मूर्खपणाचा वाटतो ( दोन्ही बाजुनी ).
http://www.loksatta.com/desh-videsh-news/husband-goes-alone-on-honeymoo…
हल्ली औषधांच्या ट्रायल्स
हल्ली औषधांच्या ट्रायल्स उंदरांवर घेण्यास बंदी आहे असे कळले. त्या ट्रायल्स कंप्युटर सिम्युलेशनद्वारा केल्या जातात.
त्यावरून आलेला प्रश्न -
१. ठार मारून खाण्यासाठी कोंबड्यांची, डुकरांची, बोकडांची पैदास केली जाते आणि त्यांना खाण्यासाठी ठार मारले जाते. मानवी कारणासाठी मुद्दाम पैदास केलेल्या प्राण्यांना मारले जाते. त्यांचे दूध काढले जाते, अंडी खाल्ली जातात.
२. मानवांना पगार देऊन, इतर सुखसोयी सवलती देऊन सुरक्षेच्या कामावर नेमले जाते. युद्ध वगैरे झाल्यास त्यांचा बळी देण्याची अपेक्षा असते. बर्याच मानवांच्या हितासाठी काही मानवांना मरण्यासाठी तयार केले जाते.
त्याचप्रमाणे बर्याच मानवांच्या हितासाठी उंदीर मारण्यास का बंदी असावी?
मत नाही.
माझं ह्या विषयावर काहीही मत नाही.
पण मुद्दा क्र १ बद्दल - खाण्यासाठी मारल्या गेलेल्या प्राण्यांच्या आयुष्यात एकच दिवस खराब असतो; प्रयोगशाळांतल्या उंदीर आणि इतर प्राण्यांचे सगळेच (किंवा बरेच) दिवस वाईट असतात; असं कारण दिलं जातं.
प्रत्यक्षात फ्री-रेंज नसलेल्या कोंबड्या काय प्रकारे खुराड्यांत ठेवल्या जातात हे बघितलं तर बहुदा अंडी खाणं सोडून द्यावं लागेल. मोठ्या प्रमाणावर पाळल्या गेलेल्या कोणत्याही प्राण्यांचे बहुतांश दिवस वाईट असतात हे मान्य आहे.
मुद्दा क्र. २ बद्दल असं काही कारण दिलं जात असेल तर कल्पना नाही.
भारतात बंदी आहे बहुधा. सरसकट
भारतात बंदी आहे बहुधा. सरसकट नाही पण बर्याच रिस्ट्रिक्शन असतात.
--------------------------
कहानी चित्रपटाच्या सुरुवातीस विषारी वायूचा प्रयोग उंदरांवर (गिनिपिग्स) केल्याचे दाखवले आहे. त्या दृष्यापूर्वी No animals were harmed, it is the work of computer simulation अशी कॅप्शन दाखवतात.
प्राण्यांवरचे प्रयोग कमीत कमी करण्याकडे कल जरूर आहे
माझ्या माहितीत अशी बंदी अमेरिकेत तरी नाही. मानवतेच्या भूमिकेतून प्राण्यांवरचे प्रयोग कमीत कमी करण्याकडे कल जरूर आहे, पण तो स्वेच्छेने . भारतात यासंबंधीच्या पूर्वीच्या मंत्री मनेका गांधी या अशा प्रयोगांच्या विरोधात होत्या असे ऐकले (माझ्या एका बायोलॉजिस्ट मित्राशी त्यांची एका बैठकीत खडाजंगीही झाली होती.)
त्याचप्रमाणे बर्याच
त्याचप्रमाणे बर्याच मानवांच्या हितासाठी उंदीर मारण्यास का बंदी असावी?
बंदी अजिबात नसावी. उंदिरांच्या जीवनाचे रक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य अजिबात नसायला हवे. खरंतर एक्सप्लिसिट पणे हे कायद्यात्/संविधानात नमूद केले पाहिजे. उंदिर हे ना मत देतात ना टॅक्स. व त्यांच्या वतीने जे मत व्/वा टॅक्स देऊ शकतात त्यांच्याकडून कर वसूल करण्याची सुद्धा सोय नाही.
रक्षण केले नाही तर अनेक स्पिसीज एक्स्टिंक्ट होतील चा मुद्दा तर अगदीच कैच्याकै आहे. जगातल्या प्रत्येक स्पिसिज ला एक्सटिक्ट होण्यापासून वाचवणे ही सरकारची जबाबदारी झाली तर कुबेर सुद्धा भिकेस लागेल.
हल्ली औषधांच्या ट्रायल्स
हल्ली औषधांच्या ट्रायल्स उंदरांवर घेण्यास बंदी आहे असे कळले.
असत्य
त्या ट्रायल्स कंप्युटर सिम्युलेशनद्वारा केल्या जातात.
केल्या तरी त्या प्रत्यक्ष उंदरांच्या ट्रायल्स इतक्या ग्राह्य समजल्या जात नाहीत.
अवांतरः ट्रायल्स्साठी वापरले जाणारे उंदीर हे त्या कारणासाठीच ब्रीड केले जातात. मुनिशिपालिटले उंदीर पकडून त्यांच्यावर ड्रग ट्रायल्स केल्या जात नाहीत.
बहुत काय लिहिणे? आपले अगत्य असो द्यावे...
:)
चार्वाकवासी
पाखंडी?
सूक्ष्म अर्थच्छटेचा फरक असावा (बोले तो, वृत्ती वि. वचन), परंतु चालून जावे. आभार.
अलीकडेच कुठेतरी मृत बौद्ध व्यक्तींच्या नावामागे आयु. का असेच काहीतरी लावलेले पाहिले.
"आयु." बोले तो?
ह्या न्यायाने नास्तिकांना मेल्यावर बेपत्ता किंवा गायब म्हणायचे का?
त्यापेक्षा, ('भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:'-न्यायाने) 'चार्वाकवासी' म्हटले तर?
अर्थ तोच राहील (पाहा विचार करून १), आणि पैगंबरवासी/ख्रिस्तवासीच्या ट्रेण्डशी मिळतेजुळतेही होईल.
..........
१ बोले तो, चार्वाक पूर्वी कधीतरी मेला असावा अशी आमची समजूत आहे. (चूभूद्याघ्या.) म्हणजे तत्कालीन प्रथेनुसार कोणीतरी त्याचा देह भस्मीभूत केला असणार. समजा नसला, आणि त्याऐवजी दफनित केला असला अथवा तसाच सडण्यासाठी/गिधाडांकरिता सोडून दिला असला, तरीही तो आतापावेतो अस्तित्वात नसणार. आणि जे अस्तित्वातच नाही, तेथे जाणे म्हणजे बेपत्ताच होणे की हो! (पण मग त्या न्यायाने 'स्वर्गवासी'ही चालू शकेल.)
आध्यात्मिक बाबा /गुरूंची मार्केटिंग टेक्निक्स
आध्यत्मिक बाबा /गुरु हि या लोकोत्तर विभूती अत्यंत हुशार आणि एकंदरीतच थोर असतात .
त्यांच्या व्यवसायाला जगभर डिमांड तर भरपूर आणि कायम आहेच पण हे मार्केट तसे tricky आहे. Organised religions हे खरे तर यांचे इंटर्नल established competitors . पण आपला ब्रँड एस्टॅब्लिश कसा करावा , त्यातिल आपले niche मार्केट कसे डेव्हलप करावे , सस्टेन्ड ग्रोथ कशी करावी या बाबतीत कुठल्याही मॅनेजमेंट बाबा /गुरु ला लाजवतील अशी टेक्निक्स हि मंडळी वापरतात . स्वतःच्या व्यवसायाबद्दल अत्यंत ऑब्जेक्टिव्हली आणि रॅशनली विचार करणारी हि मंडळी असावीत . एकेकाळी या व्यावसायिकांच्या वर मी भयंकर चिडून बिडून असायचो (आदूबाळ च्या भाषेत तरुण था मय ) आजकाल मात्र या थोर व्यावसायिकांची मार्केटिंग टेक्निक्स बघून मी थक्क होतो . स्पेक्ट्रम च्या एका बाजूला महाराष्ट्रातील निमग्रामीण आणि निमशहरी भागातील आर्थिक कनिष्ठ वर्गात गेल्या १० -१५ वर्षात प्रचंड एस्टॅब्लिश झालेला ब्रँड नरेंद्र महाराज आणि दुसऱ्या एन्ड ला ओशो ते श्री श्री .... निखळ करमणूक ...... केव्हातरी मी या धाग्यावर मी नरेंद्र महाराजांच्या मार्केटिंग टेक्निक बद्दल लिहीन या धाग्यावर .... कोणाकडे असले काही इनपुट्स असले तर इथे शेअर केल्यास धमाल येईल टीप : यात एस्टॅब्लिश्ड धर्म पकडत नाहीये आणि मी कोणाच्याही श्रध्दा स्थानाच्या धोतराला हात घालायच्या हेतूने हे लिहीत नाहीये ( मी सफाईने टणाटण चे नाव घेतले नाहीये )
नरेंद्र महाराजांचा एक किस्सा
नरेंद्र महाराजांचा एक किस्सा आमच्याकडे सुद्धा आहे. छोटासाच आहे. पण तुम्ही धागा काढलात की आम्ही लिहूच. व रत्नाग्रीबद्दल (एकंदरित कोकणाबद्दल) आम्हालाही अत्यंतिक प्रेम आहे. एक तृतीयांश बालपण चिपळूणात गेले माझे. बेस्ट डेज ऑफ माय लाईफ. एक मामाश्री आजही रत्नाग्रीत राहतात व दुसरे खेड मधे रहायचे. रविंद्र पिंगेंची कोकणमहात्म्यं वाचत होतो एकेकाळी.
( जाताजाता : पावस ला विसरू नका ओ. तिथली प्रसादात मिळणारी शाबुदाण्याची खिचडी लाजवाब असते. )
पावसला मुगडाळतांदुळाची खिचडी
पावसला मुगडाळतांदुळाची खिचडी मि ळते ना?
#महाराज/ मठाच्यामागे काही उद्योगपतीच असतात.वेगळा धागा काढा हवा तर परंतू नाव न घेता लिहिन कारण आरोप होतात.मठात तीन वेगवेगळे गट एकत्र येतात.तिघांचाही हेतू वेगळा असतो.काही एकच मुद्दा पकडून लिहिलं तर दुसय्रांवर अन्याय होतो.आजच्या काळाचा मंत्र "तू तेरा देख." टॅक्स बेनफिट मिळतो आस्थापनांना यात अर्थ आहेच.
Today's Borowitz Report : can't stop laughing!
NEW YORK (The Borowitz Report)—Clarifying his position on a key national-security issue, Donald Trump said on Friday that as President he would be willing to use nuclear weapons, “but only in a sarcastic way.”
“People who are worried about me having the nuclear-launch codes should stop worrying, O.K.?” Trump told CNN’s Wolf Blitzer. “If I ever used nuclear weapons, it would be really obvious that I was just being sarcastic.”
Pressed by Blitzer to explain the difference between a sarcastic and non-sarcastic nuclear attack, Trump responded, “You’d use the weapons and everything, but then you’d say, ‘Just kidding.’ ”
Trump did not specify which nations he would target for a sarcastic nuclear attack. “I can’t say right now,” he said. “But there are a lot of countries that need to lighten up.”
xxx
जादूचं स्पष्टीकरण?
आज सकाळी ही गंमत दिसली.
दुधाच्या बाटल्याचं झाकण आपसूक, नियमितपणे थडथडत होतं. त्याचा आवाजही व्हिडीओत ऐकू येईल.
दूध नासलेलं नाही; निदान तशी चव, वास आणि वर्तन (गरम केल्यास नासणं) नाही. दुधाची एक्स्पायरी २८ ऑगस्ट लिहिलेली व्हिडीओतही दिसत्ये; आज १८ ऑगस्ट. एक गॅलन (~ ३.७५ लिटर) दुधापैकी साधारण ७५% संपलेलं होतं; ते ही व्हिडीओच्या शेवटी दिसेल. आजूबाजूला पंखा, एसी, हीटर असं काहीही सुरू नव्हतं. काही दिवसांपूर्वी, एका रिकाम्या बाटलीचं झाकणही असंच थडथडत होतं. त्या बाटलीत आधी संहत लिंबू सरबत होतं; ते संपवून बाटली घासायला ठेवली होती आणि बूच असंच थडथडलं. लिंबू सरबताचा कोळ कदाचित खराब झाला असेल असं प्यायल्यावर जिभेवर जाणवलं.
लिंबू सरबताच्या बाटलीचं झाकण मी पूर्ण उघडलं आणि बंद केल्यावर थडथडणं (अपेक्षेनुसार) थांबलं. दुधाच्या बाटल्याच्या 'जादू'ची वारंवारिता कमी होत गेली आणि आपोआप थांबली. उद्या सकाळी पुन्हा हा प्रयोग करून, हाच परिणाम दिसतोय का हे बघेन. पण ते झाकण योग्य पद्धतीने ठेवायला जमेल का नाही ह्याबद्दल जरा शंका आहे.
ह्याचं कारण काय असावं?
हा प्रयोग मी लहानपणी साध्या
हा प्रयोग मी लहानपणी साध्या पाण्यानेही केलेला आहे. बाटलीत जी हवा असते ती थंडगार असते. फ्रिजमधून काढून बाहेर आणली की ती उबदार होते आणि प्रसरण पावते. जर झाकण आणि बाटलीचं तोंड यामध्ये कुठच्यातरी द्रवाचा थर असेल तर तो भाग हवाबंद होतो. मग वाढलेल्या दाबापोटी झाकण वर उचललं जातं, आणि पुरेसं उचललं गेलं की हवा बाहेर पडते, आणि हा प्रकार पुन्हा सुरू होतो.
पाण्याच्या रिकाम्या बाटलीनेही हे करून बघता येतं. ती फ्रिजमध्ये ठेवून नुसतीच थंड करायची किंवा त्यात थंड पाणी थोडा वेळ ठेवून ओतून द्यायचं. मग त्या बाटलीचं झाकण बाटलीच्या तोंडावर उलटं ठेवायचं. ते झाकण थोडंसं ओलं केलं की कडांना चिकटतं आणि हवाबंद होतं. मग हे झाकणही टप टप आवाज करतं. त्या बाटलीला आपण हातांनी धरून उष्णता दिली की हा टपटपाट भराभर होतो.
टच
मला वाटते टंच हे इंग्लिश 'टच'चे मराठीकरण असावे. आपण ह्याला 'कस' असे म्हणू शकू. शुद्धता तपासताना जे सोने/दागिना तपासायचा तो एका कठिण दगडावर थोडासा घासतात. त्यातल्या सोन्याची एक पिवळी रेघ त्या दगडावर उमटते. हा पिवळेपणा आणि चकाकी एका आधीच शुद्धता माहीत असलेल्या सोन्याच्या रेघेशी ताडून पाहातात. अनुभवी आणि सराईत नजरांना दोहोतला फरक चटकन कळतो. त्यांना शुद्ध सोने दगडावर घासून त्याची उज्ज्वलता परत परत पाहाण्याचीसुद्धा गरज वाटत नाही. या कठिण दगडाला टच स्टोन म्हणतात. जुन्या पेढ्यांवर हे छोटेसे दगड पूर्वी असायचे. अर्थात हा 'टच' मोजण्याचा प्रश्न सराफांना जुने दागिने विकत घेताना येतो. नवीन ब्रँडेड दुकानात असे जुने सोने (भांगर) विकत घेतले जात नाही. त्यामुळे पेठांतल्या जुन्या पेढ्यांकडेच असे दगड आणि पाट्या दिसू शकतात.
अवांंतर
पानिपत येथे बूआलि कलंदर नामक दर्गा आहे. लोकली नोन अॅज़ 'कलंदरपीर'. तिथे एकाला लागून एक असे दोन खांब एका ओळीत, आणि अशा चार ओळी मिळून एकूण आठ खांब हे अशा कसोटीच्या दगडाचे आहेत असे शेजवलकरांनी पानिपत १७६१ या पुस्तकात नमूद केलेले आहे. १२ जानेवारी २०१३ रोजी मित्रांसोबत तिथे जाणे झाले तेव्हा ते खांबही पाहिले. तसेच एकदम तुळतुळीत, अंमळ ओशट वाटावे अशा पोताचे दगड आहेत. बहुधा अशा दगडाचे पिलर्स अन्यत्र कुठेही नसावेत. तत्रस्थांना विचारून मुद्दाम त्या खांबाचे दोनचार फोटो काढले, रेकॉर्ड राहूदे म्हणून.
रोचक
छान माहिती. पानिपत वाचलेले आहे पण हे आठवले नाही. विकीवर अर्थात टच स्टोन वर बरीच माहिती आहे. मुंबईत भुलेश्वरच्या छोट्या छोट्या दुकानात पाहिले होते. आता मुंबादेवीच्या जव्हेरी बाजारातली दुकाने खूपच मोठी आणि कडेकोट सुरक्षाबंद झाली आहेत. पण काही वर्षांपूर्वी काळबादेवीपर्यंत अशी छोटीछोटी दुकाने होती. तिथे हे काळे दगड किंवा दगडी पट्ट्या असायच्या. रेघेतला फरकही इतरत्र पाहिलेला आहे.
जरुरीपेक्षा अधिक वीज निर्माण : एक नवीन कामगिरी
जरुरीपेक्षा अधिक वीज निर्माण करून भारताने एक नवीन कामगिरी केली आहे हे चांगलेच. पण ही ऊर्जा मुख्यतः अत्यंत प्रदूषणकारी , कमी दर्जाच्या खनिज कोळशापासून निर्माण केली जात आहे . भारतात हवा प्रदूषण इतके वाढले आहे की वर्षाला सुमारे पाच लाख लोक संबंधित रोगांनी मरत आहेत . दिल्लीतील विदेशी दूतावासांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा दिल्ली पोस्टिंगचा काळ कमी केला आहे . इतके सर्व करून परत जे तीस कोटी लोक विजेपासून वंचित होते ते तसेच आहेत. एक सोनेरी कांदा म्हणजे तामिळ नाडूकडे आता 1 गिगावॉट इतकी अतिरिक्त पवन ऊर्जा असून ती त्यांनी विकायला काढली आहे . कार्बन प्रदूषण न करणारे महत्वाचे तंत्रज्ञान म्हणजे अणु-ऊर्जा. त्याचे दोन्ही नवे महत्वाकांक्षी प्रकल्प मात्र राजकीय विरोधामुळे ठप्प झालेले दिसतात -नाहीतर एव्हाना जैतापूर सुरु व्हायला हरकत नव्हती . तिथल्या जमीनधारकांना बाजारभावाच्या कित्येक पट मोबदला कधीच दिला गेला आहे .
http://blogs.scientificamerican.com/plugged-in/india-achieves-historica…
वर्षाला सुमारे पाच लाख लोक
वर्षाला सुमारे पाच लाख लोक संबंधित रोगांनी मरत आहेत
याचा विदा कुठे मिळेल? कारण भारतात काही लाख स्त्रिया स्वयंपाकघरात प्रदूषित हवेमुळे मरतात हे माहीत आहे. हा पाच लाखांचा आकडा त्यापलिकडचा आहे का?
थोडा शोध घेतल्यावर हा लेख सापडला. त्यात पाच ते सहा लाख लोक सुमारे साडेतीन वर्षं आधी मरतात असा निष्कर्ष काढलेला आहे.
पण गंमत अशी की अमेरिकेसारख्या देशात, जिथे प्रदूषण निश्चित कमी आहे, तिथे दरवर्षी २ लाख लोक मरतात असा निष्कर्ष या लेखात आहे. मग भारताची लोकसंख्या तिप्पट असताना तिपटीपेक्षा कमी लोक मरतात? नक्की काय गोंधळ आहे?
थोडक्यात ही आकडेवारी मिठाच्या मोठ्ठ्या खड्याबरोबर घ्यावी.
सिरीया-कुंडली
_________________________
डिस्क्लेमर - अर्धवट ज्ञान आहे हे ध्यानात घेऊन वाचावे. ज्योतिषात रस नसेल तर वाचू नये आणि याउप्परही वाचले व अंधश्रद्धा म्हणुन टीकेची झोड ओठवली तर उत्तराची अपेक्षा ठेऊ नये.
.

.
या लेखामुळे सिरीया ची कुंडली व तीवरील लेख वाचण्याची बुद्धी झाली.
सिरीयाचे लग्न आहे "तूळ" म्हणजे चवथे घर मकरेचे. सध्या मकर राशीत प्लूटो आहे. म्हणजे सिरीयाच्या चवथ्या घरात प्लूटो आहे.
,
हे पूर्वी मी लिहीलेल्या लेखातून
.
चवथ्या घरातील प्लूटोबद्दल भरभरून लिहावंसं वाटतं. अजिबात सुखद तर नाहीच त्याचे वर्णन पण खरं तर क्लेशदायक, अक्राळविक्राळच आहे.
.
भेसूर, भीतीदायक, थंड रक्ताचा, चेहरा लपवलेला खुनी कोणी असेल तर तो प्लूटो. मुळापासून उखडून काढणारा, Transformative , संपूर्ण उलथापालथ करणारा ग्रह कोणता असेल तर प्लूटो. असा अनुभव (ग्रह) खरं तर कुंडलीतील कोणत्याच घरात स्वागतार्ह नाही पण least of all चवथ्या घरात. जे घर कुंडलीचे गर्भाशय मानले जाते , कुंडलीतील सर्वाधिक vulnerable स्थान. लहानपणीचे घरातील वातावरण, घरातली परिस्थिती पोषक होती की अन्य काही ते जे स्थान पाहून कळते ते चवथे घर. खरं तर भावी आयुष्यात subconscious reflexes कसे होणार ते ठरविणारे स्थान.
.
प्लूटो इथे पडला की त्याला विषारी दूध म्हटले जाते. दूध जे अर्भकाच्या पोषणाकरता अत्यावश्यक असते तेच विषारी झाले तर त्या व्यक्तीने पाहायचे कोणाकडे? बालपणीचे abusive , lethal वातावरण - trauma कसा कळणार जगाला. मूक किंचाळी .... silent scream = चवथ्या घरातील प्लूटो. प्रतीकच घ्यायचे झाले तर साप असलेली काळी dark विहिर. जिथे पडलो असता किंचाळले तर ऐकायला कोणी नाही.
प्रत्येकालाच कधी ना कधी स्वप्न पडलेले असते ज्यात काहीतरी दबा धरलेले संकट ऊभे ठाकते , आसपास लोकं असतात, पण तोंडामधुन आवाज फुटत नाही. त्या लोकांपर्यंत कसे पोचायचे ते कळत नाही.
प्रौढत्वातील स्व-रक्षणाचे आपले reflexes कसे होणार आहेत हे चवथे घर ठरविते. बरेचदा प्लूटो चवथ्या घरात पडलेली मुले अकाली प्रौढ तर होतातच पण त्यांच्या स्वसंरक्षणाचे एक callous mechanism तयार होते. स्वतःला वास्तवापासून तोडून टाकून स्वप्नसृष्टीत रममाण होण्याची, अगतिकता, लाचारी, हतबलता.
.
प्लूटो हतबलता जाणवून देणारा अत्यंत dark, omnipotent ग्रह आहे. आणि चवथे घर सर्वाधिक vulnerable घर. हे दोन forces एकत्र येतात तेव्हा खूप क्लेश-यातनादायक अनुभव जरुर येतो.
.
मग तसा तर प्रत्येक तूळ लग्नाच्या व्यक्तीच्या चवथ्या घरात ट्रान्झिटिंग प्लूटो येइल. मग काय प्रत्येक तूळ राशीच्या लग्न जातकास हे अनुभवास येणार का?
ऊत्तर - ज्योतिषांच्या मते ट्रान्झिटिंग आऊटर ग्रह हे पिढ्यांवर परिणाम करतात. त्यांचा परिणाम पिंढ्या व व्यापक प्रमाणावरती पहातात.
.
जालावरील अन्य काही लेखांमधुन -
एक ताणाचा अॅस्ट्रॉलॉजिकल आस्पेक्ट आहे "स्क्वेअर". म्हणजे काटकोनात रस्सीखेच. एका ग्रहाला पूर्वेस जायचे आहे तर अन्य ग्रहास दक्षिणेला किंवा उत्तरेला. यात अतोनात ताण + ग्रोथ पोटेन्शिअल असते.
ट्रान्झिटिंग प्लुटो व युरेनस सध्या स्क्वेअर आहेत. युरेनस म्हणजे "अचानक होणारे बदल" = सडन चेंज, तर प्लूटो म्हणजे मूर्तिमंत पर्जिंग आणि डार्कनेस.
या ताणाचा पर्रिणाम पिढ्यांवरती होतो. Transiting Uranus Square Pluto is a generation transit, so when you feel it, so will everyone else you grew up with at school.
.
देशाच्या कुंडलीचा कलेक्टिव्ह कॉन्शसनेस वरती परिणाम होत असावा असा निष्कर्ष काढता येऊ शकतो
आबा मला ही पद्धत गेल्या काही
आबा मला ही पद्धत गेल्या काही महीन्यांपर्यंत माहीतच नव्हती. मग स्वतःची कुंडली त्या रुपात बघून बघून शिकले. या पद्धतीमध्ये बाह्यवर्तुळात जे ग्रह दाखविले आहेत ना ते ट्रान्झिटिंग ग्रह म्हणजे सध्या प्लूटो कोणत्या राशीतून भ्रमण करतो ते.
.
आतील वर्तुळात जे ग्रह आहेत ते नेटल प्लॅनेटस म्हणजे तुमची कुंडली मांडताना प्लुटो कुठे होता ते.
प्लूटोचा सिंबॉल हा-
हा पहा दोनदा दाखविला आहे. एकदा सिंहेत व आतील वर्तुळात तर एकदा मकरेत व बाह्य वर्तुळात.
कोणताही ग्रह घ्या दोनदा आहे. एकदा बाह्यवर्तुळात एकदा अंतरवर्तुळात.
.
ही नेटल व ट्रान्झिट दोन्हीची स्थिती दर्शविणारी कुंडली मी चौकोनी पद्धतीत पाहीली नाही. तेव्हा हे गोल पद्धतीचे वैशिष्ट्य किंवा बलस्थान म्हणावे लागेल.
सॉरी नेटल म्हणजे जन्मवेळेची
सॉरी नेटल म्हणजे जन्मवेळेची ग्रहस्थिती.
.
Syria proclaimed its independence again in 1941 but it wasn't until 1 January 1944, that it was recognized as an independent republic.
.
तेव्हा सिरीआचा जन्म मानलेला आहे.
जन्मवेळेमुळे लग्नघर व त्यामुळे सर्व घरे बदलतात.
तेव्हा लग्न चूकीचे येऊ शकते म्हणजे सिरीआला दुपारी २ वाजता स्वतःत्र राष्ट्र म्हणुन जाहीर केले तर २ वाजता क्षितीजावर उदित राशी = सिरीआचे लग्न.
पण ग्रहांच्या राशी मात्र दिवसभर साधारण तीच रहाते काही मायनर अंशाने बदलत असेल.
तेव्हा राष्ट्राची कुंडली पहाताना लग्नास महत्त्व न देता फक्त ग्रह व राशी पहायच्या .
वरील कुंडली मी astromatrix.org वरुन १ जानेवारी १९४४ ला, ००:०१ अशी वेळ देऊन काढली.
खालील कुंडली मला अजुन एका साइटवरती मिळाली. आता खालील कुंडलीत पहा घरे दाखवलेलीच नाहीत फक्त ग्रह व राशी आहेत, तेव्हा राष्ट्राची कुंडली पहाताना ग्रह व राशींवर कॉन्सन्ट्रेट करावे.

.
जन्मस्थान = syria capital - Damascus घेतले आहे.
देशांच्या कुंडल्या आणि
देशांच्या कुंडल्या आणि त्यांचे भाकित तितकेसे समजले नाहीये.
अगदी ही कुंडली एखाद्या जातकाची असती तरी नेटलमध्ये चवथ्या घरात काही ग्रह नसावेत हे पटते.दुर्दैवाने कोणाच्या नशिबी येतात आणि फटकाही देतात.चलित ग्रह कुंडली मांडण्याची पद्धत आवडली.पण गोचरी ज्योतिष्यांच्या डोळ्यासमोर चलित कु्ंडली येते आणि ती मांडायला लागत नाही.
शृंगापत्ती!
'तिथे' हा शब्द वाचून कुतुहल जागृत झाले आहे.
श्री अरविंद कोल्हटकर यांनी उपक्रमावर लिहिलेली संस्कृतातून मराठीत रुळलेल्या शब्द- वचनांची मालिका तपासून आले.
त्यातही या शब्दाचा उगम दिसला नाही.
नक्की संदर्भ आठवत नाही पण बहुतेक सांबराला किंवा काळवीटाला शिंगांमूळे सारखं झाडाझुडूपात अडकून पडायला होत असे. आणि त्यामुळे त्याची शिकार होण्याची त्याला भिती वाटत असे.
तर तो देवाला म्हणाला की माझी शिंगे गायब कर.
मग शिंगे गायब झाल्यावर त्या शिंगांच्या भितीने त्याला वचकून रहाणारे प्राणी त्याला घाबरेनासे झाले.
आता सांबराला शिंगे असूनही नुकसान आणि शिंगे नसूनही.
या प्रकारच्या डायलेमाला शृंगापत्ती म्हणतात असं वाचल्याचं आठवतं.
एक्झॅक्ट सुभाषित आत्ता आठवत नाही आहे.
शोधून सांगते.
(मी तो धागा वाचल्यापासून तेच शोधत आहे. तर गुगल मेलं 'शृंगारपट्टी' नावाचा कंबरपट्टा दाखवतंय.)


१००-२५*पाय
मला आंजावर सापडत नाहीये उत्तर.