मनातील छोटे मोठे प्रश्न -भाग ३९
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
_______________
मला एक शंका आहे. ४०१ क / ५२९ मध्ये पैसे टाकताना, खालील अनेक विकल्प असतात. तेव्हा एखादा विकल्प ऋणमध्ये गेलेला असतो (त्याच्या शेअर्स चा भाव पडलेला असतो वाटतं) तर एखादा धन असतो.
तेव्हा गुंतवणूक करताना, ऋण विकल्प निवडावा का? त्यामुळे तेव्हा जास्त शेअर्स मिळतात का? अन मग तो विकल्प धन श्रेणीत गेला की फायदा होत असावा.
माझ्या मैत्रिणीने उलटे सांगीतले होते. मला ते illogical वाटले.

होय विखुरणे बद्दल मी लेख
धन्यवाद ननि. खरच.
होय विखुरणे बद्दल मी लेख वाचले. अन अति-विखुरणे बरे नाही असे मत दिसले. स्टॉक अन बॉन्ड बॅलन्स ठेवणे बरे, इन केस, स्टॉक मार्केट बुडले तर म्हणून - असे वाटते.
________
हे मत आहे - Most investment professionals agree that, although it does not guarantee against loss, diversification is the most important component of reaching long-range financial goals while minimizing risk.
पण "The Dangers Of Over-Diversifying Your Portfolio" बद्दलही हा लेख आहे - http://www.investopedia.com/articles/01/051601.asp
बहुदा
४०१/५२९ वगैरेबाबत मला फारशी माहिती नाही. मात्र केवळ किंमत कमी आहे म्हणून एखादी इन्वेस्टमेंट करण्यात काहीही अर्थ नाही. वरील पर्याय (एफआयडी= फिडेलिटी, वीएएनजी=वॅनगार्ड असे फंड्स) असतील तर एक्स्पेन्स रेशो, अॅसेट मॅनेजमेंट फी, अॅसेट अॅलोकेशन, भूतकाळातील फायदे वगैरे निकष लावून गुंतवणुकीचा पर्याय निवडावा. अमेरिकन बाजार खूपच म्याच्युअर आहे. तिथे अॅक्टिव फंड मॅनेजमेंट करणारे फिडेलिटी, जेपीएम वगैरेंपेक्षा वॅनगार्डसारखे पॅसिव फंड चांगले आहेत.
शेअर बाजाराशी संबंधित कोणतीही गुंतवणूक दीर्घकाळासाठीच करणे चांगले. किमान दोन-तीन इकॉनॉमिक सायकल्समध्ये गुंतवणूक बाजारात ठेवावी.
एक्स्पेन्स रेशो, अॅसेट
एक्स्पेन्स रेशो, अॅसेट मॅनेजमेंट फी, अॅसेट अॅलोकेशन, भूतकाळातील फायदे वगैरे निकष लावून गुंतवणुकीचा पर्याय निवडावा.
बापरे किती व्यामिश्र आहे. पण वाचत असते मी थोडंफार. आपल्या प्रतिक्रियेबद्दल अनेक धन्यवाद अतिशहाणा जी.
मध्यंतरी सारखे विकल्प बदलत होते. मग इलेक्ट्रॉनिक-ताकीद मिळाली. :D
तुम्ही शरणागती पत्कराल की जीव द्याल ?
http://en.wikipedia.org/wiki/Amir_Abdullah_Khan_Niazi
.
.
जनरल नियाझी ह्यानं १९७१च्या युद्धात ढाक्यातील ९०,००० पाकिस्तानी सैन्यासह शरणागती पत्करली.
प्रत्यक्ष लढाउ सैन्य ९०,००० नव्हे तर ३५,००० होतं, उरलेला नॉन लढाउ स्टाफ होता म्हणे.
हा पस्तीस हजाराचा आकडा जरी गृहित धरला तरी शरणागती पत्करण्याचं काय कारण असावं ?
शरणागती पत्करल्यावर जेव्हा जनरल नियाझी परत त्याच्या देशात --पाकिस्तानात गेला असेल;
तेव्हा "शरणागती पत्करलेला सेनापती" म्हणून त्याची काय किंमत राहिली असेल ?
त्यापेक्षा त्यानं मरेस्तोवर प्रतिकार करण्याचा प्रयत्न का केला नसावा ?
( "शेवटच्या गोळीपर्यंत लढण्याचा निर्धार " का केला नसावा ? १९६२ ला भारतीय सैन्याबाबत हे शेवटच्या गोळी व शेवटच्या सैनिकापर्यंत लढणे
शब्दशः खरे ठरलेले आहे. त्या अरुणाचल प्रदेशातल्या पोस्टचे नाव विसरलो, तिथे एक जागा दाखवतात पन्नासेक सैनिक त्या चौकीवर मृत आढळले म्हणून.
त्यातल्या प्रत्येकाच्या बंदुकीतली गोळी संपली होती; प्रत्येक जण मारला गेला होता. म्हणजे ती मंडळी "शेवटची गोळी व शेवटच्या माणसापर्यंत "
शब्दशः लढली होती.)
बरे मरेस्तोवर प्रतिकार करणे शक्य नाही वगिअरे दिसत असेल तर शरणागती पत्करण्यापेक्षा आत्महत्या करणेही शक्य असावे ना ?
तेही का केले नसावे ? अपमानास्पद जीवनाला तोंड देण्याइतकी हिंमत त्याच्यात कुठून आली असावी ?
सैनिकानं किंवा सेनापतीनं शरणागती द्यावी का ?
बुडत्या जहाजाच्या कप्तानानं स्वतःचा जीव वाचवावा का ?
(सहसा बुडत्या जहाजाचा कप्तान स्वतःचा जीव समर्पित करतो; असे ऐकले आहे.)
.
.
अधिक संदर्भासाठी हा 'प्रधानमंत्री' ह्या माहितीपटाचा/डॉक्युमेंट्रीचा एपिसोड पाहू शकता :-
https://www.youtube.com/watch?v=4yEIOU5-g-w
.
.
जगायचं
जिवंत राहणं हेच ध्येय ठेवायचं असेल तर लष्करात का जावं ?
ऐन युद्धात "लढायचं की जिवंत रहायचं" ह्या प्रश्नात "जगायचं" हा पर्याय निवडत असाल तर लढाल कसे ?
मग लष्करात जावच का मुळी ?
एक लक्षात घ्या; जीव वाचवूच नये असे म्हणत नाहिये.
दुसर्या महायुद्धातली ब्रिटिशांची फेमस "डंकर्कची यशस्वी माघार" ऐकली असेलच.
कीम्वा युद्ध हरायला लागल्यावर रशियन्स मोठ्या भूभागाचा वापर एखाद्या शस्त्रासारखा करत;
दग्धभू धोरण स्वीकारत. ( म्हणजे स्वतःची भूमी नष्ट करत सुटायचे; म्हणजे आपल्या पिच्छावर असणार्या सैन्याला नाकीनऊ यावेत.)
.
.
ह्याशिवाय अजून एक मुद्दा आहे तो प्रॅक्टिकल दृष्टीकोनाबाबत.
पराभवानंतरचं सेनापतीचं आयुष्य काय असेल ह्याची कल्पना करुन पहा.
"शरणागती पत्करणारा हाच तो " असा शिक्का डोक्यावर घेउन फिरणं मरत मरत लढण्यापेक्षा किंवा जीव देण्यापेक्षा शेकडोपट अवघड वाटतं.
.
.
जीवच वाचवायचा असेल तर माघार घेणं हा एक उपाय असू शकतो; त्यात तुम्ही वाचताही आणि लढाईसुद्धा सुरु ठेवू शकता.
शरणागती हाच मार्ग का वापरला असावा ?
शिवाय कित्येक महिन्यांपासून , वर्षांपासून त्या भूमीवर पाकिस्तानी सैन्य होते; भारतीय सैन्याहून स्थानिक परिस्थितीला ते जास्त सरावलेले असावेत.
जसा जमेल तसा प्रतिकार करत राहणं हे ही शक्य नव्हतं का ?
आणि फार काही काळ लढायचंही नव्हतं. अमेरिकन युद्धपोत/लढाउ जहाज बंगालच्या उपसागापर्यंत पोचलेही होते.
.
.
तुम्ही लष्करात जात आहात म्हणजेच तुम्ही वेळप्रसंगी जीव द्यावयास कचरणार नाही;आणि त्याबदल्यात सरकार्/देश्/state तुम्हाला बक्कळ पैसे वगैरे देइल;
ह्या अर्थाचे कॉण्टॅक्ट असते अशी माझी समजूत आहे. कॉण्ट्रॅक्ट पूर्ण करुन बहादुरी सिद्ध करण्याची ह्याहून भारी संधी पुन्हा मिळणे दुर्मिळ.
.
.
दुसर्या महायुद्धात शेवटच्या वर्षभराचा काळ आल्यावर जपानचा पराभव निश्चित होता. त्यांचे स्रोत कधीचेच संपले होते.
अमेरिकेकडे भरपूर रिसोर्सेस; बक्कळ मनुष्यबळ; धनसंपत्ती, तंत्रज्ञान, सुस्थितीतले उद्योग जगत असं सगळं होतं.
पण जपाननं शरणागतीऐवजी शेवटच्या काळात विषम लढाईतही जबरदस्त टक्कर दिलेली होती.
आपण एका बेटावर कोंडलो गेलो आहोत; दारुगोळाही खूपकाळ चालणार नाही; हे लक्षात आल्यावर जपान्यांनी थेट आत्मघाती हल्ले सुरु केली.
एकेक फायटर विमान तुफ्फान बॉम्बफेक करत अमेरिकन तळांवर, जहाजांवर धडकू लागले.
"नेउन आख्खे विमानच आपटायचे" ह्या मरायच्या इराद्यानेच आलेल्या जपान्यांना त्यामुळे थोपवणे अमेरिकनांना जमेना.
ह्याला कामिकाझे तंत्र म्हणतात. ह्यामुळे अमेरिकेच्या पोटात गोळा आला. आणि परंपरिक पद्धतीने युद्ध जिंकलो तरी त्याची किंमत आपल्याला परवडणार नाही;
ह्याची जाणीव त्यांना झाली. अणुबॉम्ब त्यामुळेच वापरला गेला. तो तसा अमेरिकेकडे नसता तर कदाचित जपानला बिनशर्त शरणागती पत्करण्याऐवजी
तह/सीझफायर होउन सुटका करुन घेता आली असती.
.
.
तीस चाळीस हजार संघटित , well trained लष्कर प्रतिकार करु शकत नाही; हे कसे शक्य आहे ?
जीवाचे भय असेल तर लष्करात जावेच का ? ह्यांना जपानस्टाइल काही करणे शक्य नव्हते का ?
पराभवापेक्षा "मरो और मारो" हेच अधिक गौरवपूर्ण नै का ?
आणी पराभवानंतर तुम्ही जिवंत असलात तरी ते जीवन काय फार सुखावह असेल का ?
.
.
व्हिएतनाम मध्येही अमेरिका विरुद्ध व्हिएतनाम अशी विषम लढाई होती. पण त्यांनी जबरदस्त चिवट झुंज दिली.
१९३०-१९४० च्या दशकात फिनलॅण्ड बलाढ्य USSR ला लै सतावले. त्यावेळी त्यांच्याकडे रशियाच्या एक टक्के सुद्धा तोफा,रणगाडे नव्हते.
तरी ते लढले.
फक्त समोरच्याची ताकत अधिक आहे म्हणून शरण होणार असाल तर मग लष्कराचे प्रयोजन काय आहे ?
लष्कर नसतानाही तुम्ही शरणागती पत्करु शकता; निदान पैसा तरी वाचेल.
बरोबरे तुमचं! लष्करात आहात
:)
बरोबरे तुमचं!
लष्करात आहात ना? मग मरा नैतर मारा! तुम्हाला सारासार विचार वगैरे करता येताच कामा नये! फक्त लढत रहायचं!
सारासार विचार वगैरे करून ३५एक हजार लोकांचे जीव व त्यातील काहि कुटुंबीयांचा आधार वगैरे जपणारी ही गैरलष्करी लोकांची थेरं कुठली.. मुर्खच्चे साला!
नवीन
लष्करात आहात ना? मग मरा नैतर मारा! फक्त लढत रहायचं!
हो. लष्कर हे खास लढण्यासाठीच असतं अशी माझी समजूत आहे.
.
.
तुम्हाला सारासार विचार वगैरे करता येताच कामा नये
असं मात्र मी म्हणत नाहिये.
.
.
बाकी अजून नवीन मुद्दे नाहित माझ्याकडे. होते तेवढे लिहून झालेत. (माघार घेउन लढत राहणे ह्या पर्यायातही जिवंत राहणे शक्य असावे.
उदा:- चीनच्या प्रभावाखाली असलेल्या शेजारच्या म्यानमारमध्ये आश्रय घ्यायचा. किंवा प्रत्यक्ष चीन किंवा अमेरिका असं कुणीतरी येइपर्यंत तग धरणे वगैरे.
)
दखल घेतलित; प्रतिसाद दिलात त्याबद्दल आभार.
नाही शरणागती घेतली तर ३५०००
नाही शरणागती घेतली तर ३५००० लोक मरतील याची खात्री असतानाही (तशी खात्री असल्याशिवाय युद्धपरिस्थितीत असा निर्णय घेतला जाईलसे वाटत नाही) फक्त आपले नंतरचे आयुष्य कित्ती कित्ती अपमानजनक असेल असा विचार करून त्यांना मरू देण्यापेक्षा योग्य तिथे माघार घेऊन इतके जीव वाचवणे मला तरी अधिक थोर व धाडसी वाटते.
"शेवटची गोळी नी शेवटचा माणूस" शिल्लक असेपर्यंत लढून नक्की काय मिळवले जाते? जे शौर्य गाजवून/ न गाजवता मरतात त्यांना स्वाभिमान वाटण्यासाठी ते जिवंत नसतात. इतरांना/तुम्हाला मला केवळ त्यांचा अभिमान वाटावा त्यासाठी त्यांनी मरायचे?
फक्त समोरच्याची ताकत अधिक आहे
फक्त समोरच्याची ताकत अधिक आहे म्हणून शरण होणार असाल तर मग लष्कराचे प्रयोजन काय आहे ? लष्कर नसतानाही तुम्ही शरणागती पत्करु शकता; निदान पैसा तरी वाचेल.
१९७१ मधे लोंजेवाला मधे आपल्या लोकांनी पाकिस्तान च्या टँक रेजिमेंट ला अशीच जोरदार टक्कर दिलेली होती. १२० वि. टँक रेजिमेंट. बॉर्डर पिक्चर लंडन मधे रिलिज झाल्यानंतर लंडन मधल्या पाकी मंडळींनी वैतागून थेटरात राडे केले होते.
प्रत्येक प्रॅक्टिकल व्यक्तीला
प्रत्येक प्रॅक्टिकल व्यक्तीला हुच्चभ्रु म्हणायचे असल्याने
ही कुणाची व्याख्या आहे? आम्हांला माहिती असलेले हुच्चभ्रू म्हणजे तुच्छतावादी आयव्हरी टॉवरनशीन विचारजंत आहेत.
अरे श्रेणीदात्यांनो, प्रतिसाद दाबायचाच तर खोडसाळ अन निरर्थक श्रेण्या काय श्रावणी करावयास गेल्या होत्या? भडकाऊ श्रेणी पाहून ऑनलैन हिंसा करणारे विचारजंत कल्पिल्या गेले अन हसू आले.
विनंतीस मान दिल्याबद्दल धन्यवाद बरंका.
वेस्ट इंडिज
वेस्ट इंडिज म्हणजे अमेरिका खंडातील कॅरिबियन बेटांचा द्वीपसमूह. म्हणजे मध्ययुगात ज्ञात असलेल्या जगाच्या मानाने हे new world.
तोवर युरोप-आशिया-आफ्रिका ह्यांना एकमेकांचे अस्तित्व काय ते ठाउक होते; पण ऑस्ट्रेलिया-अमेरिका ह्यांचे अस्तित्व मध्ययुगातील बराच काळ ह्यांना ठाउक नव्हते.
त्यामुळे हे new world.
.
.
new world सापडल्यावर प्रचंड वेगाने तिथं वस्ती व वसाहतीकरण करु लागले ते युरोपीय्/गोरे/whites.
ह्यांनी सोबतीला कश्टकरी म्हणून आफ्रिकन्/काळे/कृष्णवर्णीय लोकही मजूर म्हणून नेले.
त्यापाठोपाठ व्यापार निमित्ताने व क्वचित शारिरीक कष्टांसाठीही भारतीय्/सावळे/brown लोक ह्या new world मध्ये जाउ लागले.
म्हणजे अशा new world मध्ये बाय डिफॉल्ट अस्तित्व कुणाचे आवश्यक ठरते ?
एक तर त्या त्या भूमीवरील जे स्थानिक मूलनिवासी / अॅबोरिजनल्स (म्हणजे रेड इंडियन्स, माया, इंका,अॅझ्टेक व तत्सम लोकसमूह;युरोपिअन संपर्क येण्यापूर्वीपासून तिथे असलेले लोक) व युरोपिअन. हे दोघे हे बेसिक घटक ; आणि त्या अनुषंगाने भारतीय (आशियायी) व आफ्रिकन हे ही घटक असणे शक्य.
.
.
पण एखाद्या ठिकाणी भारतीय्/ब्राउन्/आशियायी आहेत; आफ्रिकनही आहेत; पण गोरेच नाहित; हे कसे शक्य आहे ?
ते ही अमेरिका खंडात ?
तिथे गोरे नाहियेत तर आफ्रिकनांना कुणी नेले ?(आफ्रिकन स्वतः गेलेले नसून गुलाम्/कश्टकरी म्हणून युरोपिअनांनी नेलेत अशी माझी माहिती आहे.)
भारतीय कसे गेले ?
वेस्ट इंदिज खेळाडू बाय डिफॉल्ट काळे आफ्रिकन वंशीय असतात नाहीतर सावळे/ब्राउन भारतीय.
गोरे तिथे दिसतच नाहित. ही काय भानगड आहे ?
.
.
ऑस्ट्रेलियात कसे मूल निवासी दिसतात; युरोप वंशीय दिसतात, आशियायीही दिसतात.
साउथ आफ्रिकेत वसाहत करणारे गोरे दिसतात; तिथले स्थानिक आफ्रिकन्स दिसतात; व्यापारासाठी गेलेल्या भारतीयांचे वंशजही दिसतात(हाशिम आमला वगैरे)
वेस्ट इंडिजमध्येच हे असं वेगळं का असावं ?
घर-वापसी?
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतीय उपखंडास स्वातंत्र्य देऊन बहुसंख्य ब्रिटिश परत आपल्या मायभूमीला परतले. फारच थोडे इथे राहिले.
तसेच काहीसे वेस्ट इंडीज बेटांबाबत घडले असावे. बहुतेक सगळे ब्रिटिश परत गेले आणि उरले ते काळे आणि सावळे!
आम्रविकेत आणि ऑस्ट्रेलिया-न्यू झीलंडातून ब्रिटिश (गोरे) काही परत गेले नाहीत. तिथेच घर करून राहिले. म्हणून तिथे गोरे दिसतात.
+१ एका फ्लॅशमन पुस्तकात याचा
+१
एका फ्लॅशमन पुस्तकात याचा बराच उहापोह होता. गुलामगिरीविरोधी कायदे कडक होते, पण New Orleans सारख्या ठिकाणांहून गुलामांना मागणी होती. म्हणून कायदयातून पळवाटा काढणे सर्रास चाले.
अशीच एक पळवाट म्हणजे indentured labour. भारतातून करार करून मजूर आणायचे. (त्यांना "गिरमिटिया" म्हणत - agreement --> गिरमीट --> गिरमिटिया) आयटी कंपन्या फ्रेशर्सकडून जो बॉण्ड लिहून घेतात त्याचा जुना अवतार. बॉण्ड संपेपर्यन्त राबायचं, नंतर तिथेच स्थायिक व्हायचं, जमीनबिमीन घ्यायची.
त्यायोगे फार गमतीशीर संस्कृतीसंकर झालेला दिसतो.
- शिवनारायण चंदरपॉल वगैरे नावं तर असतातच.
- त्याबरोबरच त्रिनिदादचं "चटनी म्यूजिक" - वासेपूरमधल्या "आया ऍम अ हंटर" गाण्याची प्रेरणा चटनी म्यूजिकमधली आहे.
- सुरिनामची पाककला थेट उत्तर प्रदेशातून आलेली आहे. सतूच्या रोट्या, मसालेदार मोहोरीच्या फोडण्या वगैरे.
या चर्चेमुळे प्रश्न
या चर्चेमुळे प्रश्न पडला.
मराठीत मास्टर्स आणि जॉन्सन यांनी लिहिलेल्या पुस्तकांची भाषांतरं किंवा त्यांना समकक्ष काही लेखन आहे का? ही पुस्तकं किती लोकप्रिय आहेत? मास्टर्स आणि जॉन्सन यांच्या पुस्तकांत लैंगिक क्रिया, भावना, संभोग, मास्टरबेशन इत्यादींबद्दल 'समजलं तसं' (as a matter of fact) प्रकारे माहिती लिहून मोकळं होण्यापेक्षाही 'भलत्या नैतिकतेमध्ये नैसर्गिक भावना अडकवू नका' प्रकारची सुरूवात करून देऊन पुढे त्यात वैज्ञानिक माहिती मांडलेली आहे. लहान मुलांची, अर्भकांची लैंगिकता या विषयावरही त्यात (बहुदा) काही लेखन आहे. निदान लहान मुलांना लैंगिक अत्याचारांबद्दल काय सांगावं, अशा प्रकारचीही माहिती आहे.
एकेकाळी (आमच्या काळी, साल १९९८) बारावीत मानवी पुनरुत्पादन याबद्दल दोन धडे जीवशास्त्राच्या पुस्तकांत होते. आता हे अभ्यासक्रमात असतं का? बारावी म्हणजे १८-१९ वर्षं हे वय या शिक्षणासाठी थोडा उशीरच आहे; शिवाय त्यात मास्टरबेशन वगैरे प्रकार शिकवले नव्हते. पण न पेक्षा ते ही बरंच म्हणायचं.
बारावीतला विज्ञानाशी माझा
बारावीतला विज्ञानाशी माझा काही संबंध न आल्यामुळे ते मला माहीत नाही. पण डॉ. विठ्ठल प्रभू यांची बरीच पुस्तकं आहेत या विषयावर मराठीत. ती अंमळ ’शास्त्रीय’ भाषेतली आणि धाटणीची आहेत, वाचकाभिमुख (reader-friendly?) भाषा वा आशय नाही, असं तेव्हा वाटल्याचं आठवतं. आता पुन्हा चाळून पाहिली पाहिजेत.
लीना मोहाडीकर
लीना मोहाडीकरांची काही पुस्तकं मी बाजारात पाहिली आहेत. त्या लैंगिक समुपदेशक आहेत आणि वृत्तपत्रांमध्ये वगैरेही लिहितात बहुतेक. त्यांच्याकडे समुपदेशनासाठी आलेल्या लोकांचे अनुभव आणि त्याद्वारे भारतीय समाजात काय प्रकारचं लैंगिक समुपदेशन लागतं ह्यावर त्या लिहितात. त्यामुळे ते पटकन समजेल असं असावं असा अंदाज आहे.
आम्हाला आठवीच्या/नववीच्या
आम्हाला आठवीच्या/नववीच्या गाळलेल्या (आउट ऑफ सिलॅबस केलेल्या) - आणि त्यामुळेच सर्वाधिक चर्चिलेल्या ;) - धड्यांमध्ये जैविक प्रक्रीया होती म्हणजे स्पर्म आणि अंड्याचं मिलन झाल्यानंतर काय काय होतं ते (ते माणासांमध्ये किंवा इतर सस्तन प्राण्यांमध्ये कसं होतं वगैरे काही नाही.). पण ते ही शिकवायला शिक्षकांना भांबावायला होत असावं. धडे सिलॅबसमधून वगळलेले होते.
कुतूहलः धड्यातील माहिती
कुतूहलः धड्यातील माहिती लैंगिक अवयव आणि मग थेट पुनरुत्पादनाची प्रोसेस अशी आहे की प्रत्यक्ष संभोग क्रीयेविषयी, लैंगिक भावनांविषयी सुद्धा माहिती आहे. तसे असेल तर हे नक्कीच स्तुत्य आहे.
(आमच्यावेळी ९वीत फक्त मुलींना एक समुपदेशनाचा कार्यक्रम झाला होता. त्यात त्यांना त्यांचे अवयव, गर्भाशय, पाळी येणे वगैरे विषयांबद्दल तपशीलवारमाहिती दिली होती. मात्र प्रत्यक्ष संभोग, पुरूषांबद्दल आकर्षण वगैरेबद्दल चकार नव्हता असे कळले होते.)
आम्हाला तर सामुदायिक शिक्षण
आम्हाला तर सामुदायिक शिक्षण नावाचा एक विषय असे
कसे ग्रीट करावे, काय बोलावे, कसे वागावे (वर्तणूक) याविषयी बरेच सांगितले जायचे
बाकी भावभावना, तिरस्कार, प्रेम वगैरेंबद्दल शिकवायला असे नाही पण त्याबद्दल गप्पा, मानसोपचार तज्ज्ञाशी अनौपचारीक संवाद वगैरे प्रकार हवेत असे वाटते. शाळेत यासाठी की तिथे अनेक मुले असतात. काही धीट मुले आपले प्रश्न खुलेपणाने मांडतात त्यामुळे इतर अबोल मुलांनाही तीच शंका असेल तर त्याचे निराकरण होते.
+१
+१ होय.
तेच म्हणतोय.
"लैंगिक शिक्षण म्हणजे फक्त संभोग शिक्षण नव्हे" हे वाक्य नेहमी ऐकतो.
पण म्हणजे संभोग वगळून बाकीची सर्व माहिती द्यायची; असं करणं तरी शहाणपणाचं आहे का ?
संभोगाला असं इग्नोर का मारायचं ?
सगळं इकडचं तिकडचं बोलायचं आणी कटावायचं हेच आमच्यावेळीही चाले.
हा निव्वळ de jure हेतू असून
हा निव्वळ de jure हेतू असून de facto हेतू मात्र वर उल्लेखिल्याप्रमाणेच असावा असे वाटते. सांगताना सांगायचं, "अरे उगीच चुकीच्या कल्पना बाळगू नका, हे असं आणि ते तसं इ.इ.". उद्देश मात्र " शाळाकॉलेजच्या वयात झवायचे धंदे पाहिजेत कशाला नको ते?" हाच असतो. त्यात फार कै चूक आहे असे मला व्यक्तिशः वाटत नाही.
अभ्यासक्रमात आहे
१० वीच्या विज्ञानाच्या अभ्यासक्रमात मानवी पुनरुत्पादन प्रक्रिया, त्यात समाविष्ट असलेले स्त्री-पुरुष दोघांचे अवयव आणि त्यांचे कार्य, मुलींची मासीक पाळी याबद्दल शास्त्रीय माहिती १/२ धड्यांमधे दिलेली आहे. शिक्षकांनी न लाजता शिकवलं तर बरीच उपयुक्त माहिती आहे ही त्या वयासाठी.
कारण मास्टरबेशन ही मेंटल
कारण मास्टरबेशन ही मेंटल क्रिया आहे का समलिंगी का भिन्नलिंगी क्रिया आहे ? ती मेंटल क्रिया आहे तर शारीरीक रिस्पाँन्स का येतो व जर शारीरीक आहे तर समलिंगी(गुन्हा) का ठरु नये ? असे प्रश्न जर मनोबा लेगसीकडुन आले असते तर उत्तर द्यायची जाणकारंची पंचाइत झाली असती ;)
काही कारणं -
न पेक्षा ते ही बरंच याची काही कारणं -
१. बारावीत असताना माझ्या बरोबरच्या बहुतेक मुलींना पुनरूत्पादन संस्था स्त्रियांची आणि पुरुषांचीही, कशी असते याची काहीही कल्पना नव्हती. (माझी माहितीही यथातथाच.)
२. पर्यायाने आपण कुठून आलो, कसे आलो याचीही माहिती नव्हती.
३. पाळी या विषयाबद्दल आपल्या समाजात प्रचंड अज्ञान आहे, खूप लपवाछपवी चालते. माझ्या बरोबरीच्या बऱ्याच मुलींना, त्या वयात हे सगळे टॅबू, अडाणी माहिती, अंधश्रद्धा खऱ्या वाटत. या शिक्षणामुळे निदान हे सगळं नॉर्मल आहे, आरोग्य शाबूत असण्याची खूण आहे वगैरे गोष्टी समजल्या. पटल्या किती ते माहीत नाही.
अलिकडेच ट्विंकल खन्नाने याबद्दल लिहिलेलं ब्लॉगपोस्ट मला आवडलं.
४. मुलं कशी होतात याचं आकलन झाल्यामुळे निदान काही प्रमाणात तरी असुरक्षित संभोग केला नसेल अशी आशा आहे, पक्की माहिती नाही. वर्गात शिक्षिकेने बहुदा एड्स आणि संभोगातून पसरणाऱ्या इतर आजारांबद्दल आपण होऊन माहिती दिली होती. या अभ्यासक्रमाशिवाय या गोष्टी बोलल्याच गेल्या नसत्या असं वाटतं.
व्यक्तिशः, स्त्रियांची पुनरुत्पादन संस्था कशी चालते हे रीतसर, अभ्यासक्रमात शिकल्यामुळे मला पाळीबद्दल वाटणारा संकोच, किळस हा प्रकार गेलाच. घरातून संकोच, किळस शब्दांतून सांगितले नसले तरीही याबद्दल बोलताना वडील आणि भाऊ समोर नसताना आई बोलायची. सुरूवातीचं बोलणं झालं तेव्हा चक्क दार बंद करून आम्ही दोघीच तिथे असू याची खात्री केली होती. रीतसर, अभ्यासक्रमात शिकवल्यामुळे हा विषय मुलांसमोरही बोलता येतो, असं आकलन व्हायला सुरूवात झाली.
मी शाळेत असताना 'महाराष्ट्र
मी शाळेत असताना 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये नंदिनी आत्मसिद्ध यांचं एक सदर येत असे. स्त्रीपुरुष समानता हा त्या सदराचा मुख्य विषय होता. त्याच्या काठानं लैंगिक बाबी, सामाजिक बाबी... यांची चर्चा असे. ते वाचताना मी मधेच कुतूहलानं आईला प्रश्न विचारल्याचे आठवतात. कसलीही शस्त्रक्रिया न करता मूल बाहेर येतं कुठून या प्रश्नानं मी बराच काळ संभ्रमित होते. ते सदर वाचताना कधीतरी धडामदिशी आईला त्याबद्दल विचारलं आणि तिनं दिलेलं प्रांजळ उत्तर ऐकून अजूनच अवाक झाले!
मग मी विठ्ठल प्रभूंची पुस्तकं मिळवून वाचली. ती वाचल्यानंतर काही दिवस कोणतीही व्यक्ती पाहिली तरी डोक्यात आधी 'ते'च येण्याचा अनुभव येऊन हैराणी आली होती.
आईवडिलांशी या बाबतीत मोकळा संवादबिंवाद झाला असेल तर तो इतपतच. पाळीबद्दल बोलताना आईनं पुनरुत्पादनाबद्दल काही सांगितलं नव्हतं. हे प्रकरण दर महिन्याला असणार नि ते सांभाळायचं, यानंच धास्तावून जायला झालं होतं.
या बाबतीतला सांगण्यासारखा अजून एक किस्सा:
कॉलेजात असताना कधीतरी एकदा पाळी बरीच लांबली. आईला सांगितलं, तेव्हा तिनं आधी तारखाबिरखांच्या चौकश्या केल्या. मग म्हणाली, "कुणासोबत काही.... किंवा कुणी तुझ्यासोबत..." तोवर मी वाचनातून लैंगिक शिक्षण कमावलेलं असल्यामुळे तिच्या घुटमळण्याला आणि चौकश्यांनाही दात काढून हसले. पण ती न हसता गंभीर झाली. "असं नव्हे. सगळं स्वच्छ विचारलेलं बरं." असं वर म्हणाली. मग फॅमिली डॉक्टरांशी बोलतानाही "तसं काही झालेलं नसावं. मी बोललेय तिच्याशी. पण पाळीला उशीर झाला आहे." असं स्वच्छ सांगितलं. त्यावर डॉक्टर आणि मी दोघेही पुन्हा दात काढून हसलो, हा भाग निराळा. पण कोणताही आडपडदा न ठेवता, फुका तमाशे न करता शांतपणे आईचं विचारणं लक्षात राहिलं. माझे संकोच कमी होण्यात या शांतपणाचा पुष्कळ मोठा वाटा असावा, असा माझा अंदाज आहे.
मेघना, तुझ्या आईचं कौतुक आहे.
मेघना, तुझ्या आईचं कौतुक आहे. नको तिथे भीड न ठेवता संवाद करण हे किती महत्वाचं आहे हे तिला माहीत होतं.
लहानपणापासूनच मुलांशी असलेलं नातं बिन आडपडद्याचं असलं की कसं सांगावं असा प्रश्न येणारच नाही. मुलांना कसं सांगावं हा प्रश्न मुळात ऑकवर्डनेस असल्यावर येतो. पोराला प्रथम प्रश्न पडतील तेव्हा किंवा संधी साधून जे आहे ते आणि जसं आहे तसं त्या शब्दात त्याला सांगण्याने आपण पालक म्हणून त्याच्या नजरेत कमी ठरत नाही. पण पालक म्हणजे कोणीतरी पडद्यापलीकडले नॉन-ह्युमन अशी समजूत असली तर संवाद अवघड होऊन बसतो.
मुलांनी वेदनेच्या वेळी ठो ठो रडावं असा माझा आग्रह असतो. मी स्वतः पुढच्या पिढीसमोर वेळप्रसंगी नि:संकोच ढसाढसा रडतो. रडणारी व्यक्ती दुबळी असते, बाबा रडत नाहीत "म्हणून माय डॅडी स्ट्राँगेस्ट" अशा चुकीच्या कल्पना पोरांच्या मनात नकोत. मी मुलांसमोर कोणतीही चूक टाळत नाही. फक्त ती झाल्यावर ती चूक होती हे आवर्जून सांगतो. बाप हा अगदी लंगोटीयार वाटला नाही तरी किमान तो एक साधासुधा, महात्मा नसलेला, चुका करणारा आणि काहीही बोलता येईल असा मनुष्य तरी वाटावा असा माझा प्रयत्न असतो.
शारिरीक अवयव, त्यांचे उपयोग, त्याच्याशी संबंधित काळजी, वर्गातल्या मुली (मुलं इन अपोझिट केस) या सर्वांविषयी कोणतीही प्रतीकात्मक किंवा सूचक भाषा न वापरता सरळ बोलत राहणं हा साधा सरळ उपाय आहे, पण सर्वसामान्यपणे तो लोकांना पटत अथवा पचत नाही. लैंगिक अवयव, लैंगिक संबंध, मूल होणे या सर्व फॅक्ट्स आहेत. पूर्वीच्या हिंदी सिनेमात हिरो एकटा दहा जणांना लोळवतो, किंवा रजनीकांत पिस्तुलाची गोळी दातात पकडतो ती मनोरंजनासाठी केलेली अतिशयोक्ती असते, तद्वतच ब्लू फिल्म्समधे दाखवलेले परफॉर्मन्सेस, त्यांची लांबी (सर्वार्थाने) ;) हे सर्व मनोरंजनात्मक एक्झॅगरेशन आहे हे पोरांच्या आणि सर्वांच्याच लक्षात येणे आवश्यक आहे. कारण प्रत्यक्ष आयुष्यात दहा जणांना फाईट देणे किंवा गोळी दातात पकडणे असे प्रसंग येणार नाहीयेत, पण सेक्सचे प्रसंग येणार, आणि त्यावेळांसाठी स्वतःकडून अन जोडीदाराकडून किमान एक्स्पेक्टेशन्स सेट केलेली चांगली.
आपण हस्तवापर करतो हे अत्यंत गिल्ट मनात ठेवून कुचमत राहणारी किमान दहा मुलं मी माझ्या कॉलेज लाईफमधे पाहिली आहेत. त्यांना "अरे खुशाल कर हे. त्यात काही वाईट, विकृत किंवा जगावेगळं नाही" इतका साधा रिअॅश्युरन्स देणारे वडील भेटले असते तर त्यांची वर्षानुवर्षांची मानसिक गिल्ट-अट्रॅक्शन-गिल्ट सायकलची घाण टळली असती. त्यासाठी याहून जास्त शब्द वापरण्याचीही गरज नव्हती.
आईबाप सांगत होते ते सर्व खोटं, चूक, पूर्ण दिशाभूल करणारं आणि लहानपणी अवली खोटारडा वाटणारा मित्र जे सांगायचा ते अल्टिमेटली सत्याच्या आसपासचं निघणं हा मोठा पॅरेडॉक्स बहुतांश मुलं झेलत असतात.
प्लेटो पुरस्कृत फिलॉसॉफर किंग
प्लेटो पुरस्कृत फिलॉसॉफर किंग चे उदाहरण म्हणून युधिष्ठिर कसा वाटतो ??? ( http://en.wikipedia.org/wiki/Philosopher_king )
नाही का? http://delhi.gov.in
नाही का?
http://delhi.gov.in वर काही उल्लेख नाही. शिवाय मागे कधी देखिल ऐकल्याचे स्मरत नाहीये असे आता लक्षात आले आहे. पण तरीही...आय डन्नो.
दणदणीत! म्याडम ब्याक इन
दणदणीत!
म्याडम ब्याक इन बिजनेस वाट्टं - पोराने पक्षाची अजून वाट लावायच्या आत स्वतः राजकारण करू लागल्यात पुन्हा.
बिहारची निवडणून, प. बंगालची निवडणूक लक्षात घेता भाजपाला "अँटी शेतकरी" ही इमेज/पर्सेप्शन परवडणारे नाही.
अगदी. कोअलिशन, आघाडी वगैरे
अगदी. कोअलिशन, आघाडी वगैरे सगळं फक्त राजकीय पक्षांना. बहुपक्षीय लोकशाहीत पक्ष हे एकमेकांचे शत्र् असोत वा स्पर्धक. त्यांनी कशीही प्रदेशवार वाटणी, कोल्युजन केले तरी चालते. कंपन्या जेव्हा स्पर्धक असतात तेव्हा त्या एकत्र येऊन निर्णय घेऊ शकत नाहीत पण़ पक्ष मात्र एकत्र येऊ शकतात व कोल्युजन करू शकतात. कंपन्यांना मात्र काँपीटीशन कमीशन ऑफ इंडिया च्या तरतूदी लागू. राजकीय पक्षांना मात्र नाही.
मुद्द्याची बात म्हणजे ही
मुद्द्याची बात म्हणजे ही कोअॅलिशन्स काँग्रेस विरुद्ध इतर अशी त्याकाळी होत असत. आता कदाचित भाजप विरुद्ध इतर अशी होतील.
भाजपा व शिवसेना एका बाजूला व काँग्रेस व राष्ट्रवादी दुसर्या बाजूला (जातीयवादी शक्तींना सत्तेबाहेर ठेवणे गरजेचे आहे असे म्हणून) व्हायचेच.
---
पूर्वी लोक म्हणायचे की काँग्रेस हेच वेगवेगळ्या इंटरेस्ट ग्रुप्सचं एक ग्रॅण्ड कोअॅलिशन आहे.
ओह येस. काँग्लोमरेट मॉडेल आहेच की. टाटा, बिर्ला, गोदरेज वगैरे. तसंच कोरियन "चेबल्स" "शेबल्स" मधे पण सॅमसंग आहे.
------
AAP Should be Brought Under RTI
पक्षाचा कारभार हा माहीतीच्या अधिकाराखाली आणावा का ? राजकीय पक्ष ही प्रायव्हेट कंपनी आहे की सरकारी ?? की निमसरकारी ?? (ऋषिकेश, नितिनदा, तुमचे मत काय ?)
अमेरिकेत व्याजदर वाढवायचं
अमेरिकेत व्याजदर वाढवायचं घाटतंय. अर्थव्यवस्था सुरळीत व्हायला लागली आहे, तेलाच्या किंमती पडल्याने लोकांकडे इतर गोष्टींवर खर्च करण्यासाठी पैसा आहे, रोजगार महिन्याला २५०००० या प्रमाणात वाढतोय असं म्हणतात. पण त्याचवेळी अशाही बातम्या वाचायला मिळतातः
http://money.cnn.com/2015/01/22/news/economy/oil-boomtown-layoffs/
http://www.gallup.com/opinion/chairman/181469/big-lie-unemployment.aspx
http://www.forbes.com/sites/michaellingenheld/2015/01/28/the-next-subprime-crisis-auto-loans/
http://fuelfix.com/blog/2015/03/17/oil-production-falling-in-three-big-shale-plays-eia-says/
म्हणजे सरकार सगळं उत्तम असल्याचा आभास निर्माण करतंय की हे पत्रकार ब्लॉगर्स फिअर-माँगरिंग करताहेत? जर व्याजदर वाढले नाहीत तर सरकार आणि फेड खोटं बोलतात असं समजायचं का?
.दिल की लगी आणि दिल्लगी या
.दिल की लगी आणि दिल्लगी या दोन वेगळ्या टर्म्स आहेत.
.असं माझं मत नसून ते सांगणारी गाणी आहेत.
..
.चाहने जब लगे दिल किसीकी खुशी, दिल्लगी नही ये है दिल की लगी.
....-----
.किंवा..
.लगी लगी ये है दिल की लगी न समझो इसे दिल्लगी..
----
. दिल्लगी आणि दिल की लगी मधे फरक काय?..जास्त उच्च काय?
यावरून आठवले...
"मुहब्बत ही न जो समझे, वह ज़ालिम प्यार क्या जाने"...
'मुहब्बत' आणि 'प्यार' यांच्यात नक्की फरक काय?
की वरील गीतपंक्तीची फोड 'ज़ालिम प्यार' अशी करायची? बोले तो, साधीसुधी मिळमिळीत कढीवरणभातटैप्स मुहब्बतसुद्धा ज्याला कळत नाही, त्याला ज़ालिम झणझणीत प्यार काय कळणार कपाळ, अशा अर्थी?
प्यार, इश्क और मुहब्बत
'मुहब्बत' आणि 'प्यार' यांच्यात नक्की फरक काय?
मला वाटतं, हिंदीत हे शब्द जवळजवळ समानार्थी असले तरी मुहब्बतच्या मूळ अर्थाची छटा जरा निराळी आहे.
अरेबिकमध्ये क्रियापदांचे 'नाम'करण होत असताना बर्याचदा 'मु' हा प्रिफिक्स जोडला जातो. '(ये)हेब' हा मूळ धातू. अर्थ आवडणे. (अना बेहेब/ओहेब अल-मूसिका = मला संगीत आवडतं). हबीब (प्रिय), हबीबी (मत्प्रिय), मुहब्बत हे त्यातूनच निर्माण झालेले शब्द. {हमीद (प्रशंसनीय)-मुहम्मद (प्रशंसित); बरक-बरकत-मुबारक; मुम्मारिज (=नर्स); (ये)क्तब (लिहिणे)-किताब-मक्तब(=टेबल/ऑफिस), मक्तूब१; इश्क-माशुक-माशुका ही अजून काही उदाहरणं.} थोडक्यात अरेबिकमध्ये (आणि तुर्कीत) मुहब्बतचा अर्थ जिव्हाळा, आपलेपणा, ममता यांच्या जवळ जातो.
'इश्क' हा अधिक जोरकस भावना दर्शवणारा शब्द असला, तरी त्यातही प्लेटॉनिक आणि धार्मिक छटांचे त्रांगडे आहेच (पहा: http://en.wikipedia.org/wiki/Ishq#As_an_Islamic_concept).
१. 'काजळमाया'त हेच 'अल मख्तूब मख्तूब' होऊन येते, ते मक्तूब हवे. (विधि)लिखित अटळ आहे, या अर्थी.
प्यार मुहब्बत इश्क वफा कैसी
प्यार मुहब्बत इश्क वफा
कैसी बाते करते हो
कागज के एक पुर्जे पर
क्या क्या लिखते रहते हो
दुनिया क्या सब पढती है ?
दुनिया को क्या समझे हो !!!
(सुलेमान की कायतरी नाव आहे शायराचं. आता नीटसं आठवत नैय्ये. नंदनभाई, माझ्या रूम मधे तुझ्यासारखाच एक इंटेलेक्च्युअल व टेलिकॉम सेक्टर मधे काम करणारा मुलगा रहायचा त्याने ही पूर्ण कवीता ऐकवली होती. एक जमाना बीत गया ... पर यादें फिर भी कायम है .... खाना तो कबका खा चुके ... जायका अब भी कायम है.)
आजच्या NPR च्या बातम्या
आजच्या NPR च्या बातम्यां मध्ये स्तन कर्करोगा विषयी काही रुग्णांचे अनुभव सांगत होते. त्यामध्ये आजारातुन जवळजवळ पूर्ण बर्या झालेल्या रुग्णांचे जरा वेगळे प्रश्न आज ऐकले.
Mastectomy नावाची प्रोसिजर झाल्यावर स्तन पूर्णपणे काढुन टाकले होते, त्यानंतर त्यांची Reconstructive सर्जरी करताना (अर्थात रुग्णाची तशी इच्छा असल्यास) मांडीचे मांस काढुन त्याचे ब्रेस्ट ईंप्लाट्स केले होते. इथपर्यंत सगळ्ं ठीकच होतं. एकतर आपण ह्या मोठ्या जीवघेण्या आजारातुन सहीसलामत वाचलो ह्याचा आनंद अफाट होता,पण एका गोष्टीचं शल्य वाटतं होतं की, नव्याने ईप्लांट केलेले स्तन 'बार्बी'डॉल सारखे दिसतात्...स्तनाग्र नसलेले. म्हणुन त्यासाठी बरेच प्रयोग करुन सध्याच्या लेटेस्ट तंत्रज्ञानात ३ डी प्रिंटीग टेक्निकने स्तनांवर स्तनाग्र प्रिंट करता येउ शकतात.आणि काही रुग्णांनी ते करुन ही घेतलेत, त्या महिलांची मुलाखत अश्या स्वरुपाचा कार्यक्रम होता. ( सकाळी ऑफीसला जाताना एवढीच बातमी ऐकायला मिळाली)
पण बातमी ऐकुन सर्वात प्रथम 'काय गरज आहे' पासुन 'काय हरकत आहे' इथपर्यंत विचारप्रक्रिया येउन थांबली. हे ही नसे थोडके.
--मयुरा.
निगेटीव्ह जाणारा नुकताच
:-)
निगेटीव्ह जाणारा नुकताच निगेटीव्ह जायला सुरुवात झालेली असेल,
किंवा
पॉझिटीव्ह असणारा पॉझिटीव्हच्या पीकवर असेल आणि यानंतर निगेटीव्ह जाणार असेल.
अगदीच सिम्प्लीफाय करायचं तर जास्तीत जास्त विखरुन पैसे टाका. वेगवेगळ्या प्रकारच्या अॅसेट्समध्ये.