Skip to main content

आम आदमी पार्टीतल्या घडामोडीच्या बातम्या

आम आदमी पार्टीत जरा जास्तच डायनामिक पार्टी आहे. एक प्रचंड वेगळा पक्ष म्हणून या पक्षातल्या गतिविधी या धाग्यावर लिंक रुपानी संकलित करण्याचा विचार आहे.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

अजो१२३ Thu, 12/03/2015 - 14:31

आप हा पक्ष शहाण्या दिडशहाण्या व्यक्तिंनी आम्हाला विकला होता. त्याचं तत्त्वज्ञान फार उच्च आहे म्हणून.

http://www.hindustantimes.com/analysis/sting-marks-a-full-circle-for-ke…
---------------------------
काल मेसेजेस, ट्वीट्स (टीवीवर) येत होते - ज्यांनी आपला मत दिले त्यांच्यासाठी दोन मिनिटे स्तब्ध उभे रहा.

लोकसभा निवडणूकीनंतर राजेश गर्ग या एम एल ए ला केजरीवालने काँग्रेसचे ६ आमदार तोड म्हटले. गर्ग म्हणाला आपण हे पब्लिकली करू. केजरीवाल म्हणाले नको. उलटं कर. तोड आणि बाहेरून पाठींबा घे.
-----------------
अरे भाऊ, प्रत्येक गोष्ट जनकौल घेऊन करतो म्हणालेला ना?
सर्वोच्च न्यायालयाला त्याच वेळी विधानसभा भंग करा म्हणत होतात ना?

मला तर मांझी बरे वाटले. ओपन बोलले ते.
http://indianexpress.com/article/india/politics/bihar-crisis-cm-manjhi-…
==========================
असे म्हणाले - त्यातले तीन मुसलमान आहेत, भाजपकडे जाणार नाहीत...धन्य.

अजो१२३ Thu, 12/03/2015 - 14:34

http://www.thehindu.com/news/cities/Delhi/anjali-damania-quits-aap/arti…
अंजली दमानिया यांनी आपचा राजीनामा दिला.
या बाई मी इथे सिद्धांतासाठी आले होते. यांनी काय बकवास लावलाय म्हणाला. शेवटी त्यांना हुंदका फुटला पण त्यांनी आवरला.

अजो१२३ Thu, 12/03/2015 - 14:44

http://www.mid-day.com/articles/arvind-kejriwal-doesnt-read-newspapers-…
हे सगळं होत असताना, म्हणजे पहिल्या पाचातले २ लोक पक्षातून (मोर अ‍ॅक्यूरेटली, पी ए सी मधून) हाकलले, काँग्रेसचे आमदार फोडायची टेप रिलिज झाली, ही टेप सर्वांकडे होती (त्यांच्या पक्षाच्या लोकपालासहित) तेव्हापासून हे सिद्ध झाले, त्या माणसाला तिकिट दिले नाही, ही टेप खरी आहे हे - ही पोलिटिकल रिअलाअईनमेंट आहे, घोडेबाजारी नव्हे - म्हणून सिद्ध केली, शाजिया इल्मी तर केजरीवालने राजीनामा द्यावा म्हणाली ....
मग केजरीवाल , आमचे मुख्यमंत्री काय करत आहेत ?

An all-out war may be raging in his AAP but doctors treating Delhi Chief Minister Arvind Kejriwal here say he does not appear to read newspapers.

"We have not seen him using landline, watching television or reading newspapers when he is in the room," Jindal Naturecure Institute medical director Babaina Nandakumar told IANS here.

Kejriwal has been undergoing naturopathy treatment at the hospital since March 6.

Nandakumar said the treatment regime was continuous, from morning to evening, with 30-minute gap each for breakfast, lunch, afternoon rest and supper.

अनु राव Thu, 12/03/2015 - 15:32

घोडे बाजार हा शब्द चुकीचा आहे. विकत घेतले जात असेल तर बाजार हा शब्द योग्य आहे.

एक निरीक्षण - जालावरच्या शिकल्या सवरल्या लोकांमधे आप मधे चाललेल्या सुंदोपसुंदी मुळे एक प्रकारचा आनंद झालेला दिसतो आहे. हे बघुन वाईट वाटले.

अजो१२३ Thu, 12/03/2015 - 15:49

In reply to by अनु राव

प्रामाणिकपणे मला खूपच आनंद झाला. कारण मी आपचे राजकारण काळजीपूर्वक पाहत आलो आहे.
-------------------
खासकरून अरविंद भाउंच्या थेट मोदींना, थेट शीलाबाईंना भिडण्याच्या सवयीमुळे. दिल्लीत भाजपाचे सरकार केवळ भाकरी तव्यावर पलटायची म्हणून यायला पाहिजे होते. पण स्वतः शीलाबाईंना हरवून राजकारणात वाईट पायंडा पाडला. शीलाबाई प्रचंड चांगल्या मुख्यमंत्री होत्या. गेल्या १५ वर्षांचा त्यांचा कारभार पाहता ज्या नालायकांनी काँग्रेसला शून्य जागा दिल्या त्यांच्या दिडशहाणेपणाला आज ठेच पडताना पाहून मला प्रचंड आनंद होतो.
-------------------
व्हायला काय पाहिजे होतं? देशभरात सर्व राज्यांत सर्व निवडणूकांत आपला १२-१३% मते मिळाली पाहिजे होती. तुरळत विधानसभेच्या (५%) आणि लोकसभेच्या जागा (५% ते १०%). झालं काय? जिथे घाण होती तिथे हे नाहीतच. जिथे एक चांगलं सरकार होतं तिथे सगळी घाण.

ऋषिकेश Thu, 12/03/2015 - 15:55

या बंडाळीच्या वेळी निसर्गोपचार घेणारे केजरीवाल आणि संसद सत्राच्या वेळी सुट्टीवर जाणारे राहुल गांधी यांच्यातील साधर्म्य गमतीशीर आहे! :)

अजो१२३ Thu, 12/03/2015 - 16:06

http://www.thehindu.com/news/national/other-states/aaps-haryana-unit-ac…
हरीयाणामधे पक्षाचे कार्यकारी मंडळ आहे? नाही? बरखास्त केले आहे? नाही?
मग तरीही बैठका झाल्या आणि नेत्यांनी मतदानही केले.
शिवाय मार्च महिन्यात पक्षाला कोणत्याही कार्यकारी मंडळाची गरज दिसत नाही.
---------------------------
नेत्यांमधील हेवेदावे? असूच देत.

अजो१२३ Thu, 12/03/2015 - 16:14

http://ibnlive.in.com/news/delhi-kumar-vishwas-hits-back-at-rajesh-garg…
कुमार विश्वास म्हणतात ही टेप राजेश गर्गने बनविली आणि त्यांना पाठवली. त्यांनी पक्षात सगळ्यांना पाठविली.
१. अशी टेप बनवायला लोकांना तुम्हीच शिकवले. मग तुमची टेप आहे हे लोकांपासून का लपवले?
२. राजकीय रिअलाइनमेंट करायची असे केजरीवाल म्हणत होते म्हणता तर टेप ओन करा. उगाच ती खरी नाही असे का म्हणता?
==========================
ते असू देत.
आपने निवडून सोज्वळ लोक 'सुरुवातीपासून' उभे केलेले ना? मग हे लोक अगदी ब्लॅकमेल कधीपासून करू लागले? हे का आप वाल्यांचे चरित्र?
बरे ब्लॅकमेल केले तर पक्षातून काढले का नाही? असल्या लोकांना पक्षात जागा नको ना?

adam Thu, 12/03/2015 - 16:35

In reply to by अजो१२३

गर्ग किंवा ज्यानं कुणी टेप सरकावलिये पुढे, त्यानं केजरीवालांना 'टेपली' मारली असं म्हणता यावं काय?
आजवर केजरीसमोर बोलायची त्याच्या कार्यकर्त्यांची 'टेप' नव्हती काय ?
.
.
गर्ग किंवा कुमार विश्वास आत्ता मनातल्या मनात 'केजरी भिकारी त्याने माझी "टेपी" घेतली ' असं म्हणत असतील काय ?
.
.
लहानपणी खेळताना पकडले गेल्यावर आपण "टैमप्लीझ" घेतो ; तसं केजरीनं हास्पिटलात जाउन 'टेपप्लीझ' घेतली असावी काय ?
.
.
इतके दिवस टेप रिलिज न करणार्‍याचं 'टेपरामेंट' नि टायमिंग भारीच असलं पायजे की नै
.
.
ही घटना म्हणजे 'आप'च्या वाटचालीतला महत्वाचा 'टेप्पा' ठरेल काय ?
.
.
गर्गरुपी धनाजी संताजीच्या घोड्यांच्या 'टेपा' ऐकून मुघली केजरीच्या काळजात धडकी भरली असेल काय ?
.
.
आम आदमी पार्टी फ्रॉम 'टेप' टू बॉटम अशाच लबाडांची असेल काय ?
.
.
राजकारणात नवीन एन्ट्री मारणार्‍यानं केजरीकडून सावधानतेच्या 'टिप्स'/'टेप्स' घ्याव्यात काय ?
.
.
गर्गला केजरीशी दोस्ती करायला पाठवणं ही काँग्रेसचीच आपला 'टेप बाय टेप' खतम करायची चाल असेल काय ?
.
.
केजरीचा कारभार स्वच्छ, टापटिप नसून 'टेपटिप' आहे असं जन्तेला आता वाटेल काय ?
.
.
'टेप्पा टेप्पा चरखा चले' हे गाणं आत्ता कोण म्हणत बसलेलं असावं बुवा ?

अजो१२३ Thu, 12/03/2015 - 16:43

In reply to by adam

राजेश गर्गकडे टेप आहे. त्याला वाईट जागी रिलीज करायची असती तर निवडणूकाआधी केली असती. त्याने म्हटलंय मी टेप रिलिज केली नाही. पण मी कुमार विश्वासला आणि त्या पुढे सर्वांना पाठवली. योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषणला अपमानास्पद रित्या पी ए सी मधून काढले तेव्हापर्यंत सगळं ठिक होतं. पण शिसोदिया + ३ यांनी त्यांना पक्षातूनच काढा, कारवाई करा, इ इ म्हणायला चालू केली तेव्हा टेप रिलिज झाली.

बॅटमॅन Thu, 12/03/2015 - 16:55

In reply to by adam

कोटिमय प्रतिसादाला विनोदी ही श्रेणी दिलेली आहे. मात्र अजोच्या प्रतिसादाला फेसपाम ही श्रेणी देण्याची सोय नसल्याबद्दल संपादक व अ‍ॅडमिन लोकांचा जळजळीत निषेध.

अजो१२३ Thu, 12/03/2015 - 16:58

http://www.firstpost.com/politics/yadav-bhushans-letter-blows-up-in-kej…
योगेंद्र यादव यांचे आपच्या कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र या लिंकमधे आहे.
जातीय तणाव वाढवणारे पोस्टर लावनार्‍या, आणि केजरीवालनी स्वतःच त्यावर कारवाई करा म्हटलेल्या माणसाला पुन्हा प्रभारी बनवले? कम्माल आहे.

अजो१२३ Thu, 12/03/2015 - 17:22

http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/aap-stung-…

या ही माणसाकडे पुरावा आहे म्हणे.
१. आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही. पण मंत्रीपद देऊ.
२. आपल्या गोष्टी गुप्त ठेवा. आमच्या पक्षाच्या काही नेत्यांना काँग्रससोबत सरकार मान्य नाही.

नितिन थत्ते Thu, 12/03/2015 - 18:17

मी नै या धाग्यावर कै लिहिणार.

मी पूर्वी अण्णा-केजरीवालच्या विरोधात लिहायचो तेव्हा मला भ्रष्टाचार्‍यांचे हस्तक म्हणायचे.

अजो१२३ Fri, 13/03/2015 - 10:46

In reply to by नितिन थत्ते

केजरीवाल भ्रष्ट आहे असं म्हणता येत नाही. पण तो भाजपपेक्षा अजिबात वेगळा नाही.
भाजपने सरकार बनवायचा प्रयत्न केला तर ती खरीदफरोख्त. आणि आपने केला तर ती पोलिटिकल रिअलाइनमेंट.
मुसलमान आमदार भाजपला जाऊ नयेत, जात नाहीत आणि जाणार नाहीत याचा फायदा घेऊ असे आपने म्हटले तर राजकीय समीकरण असे आपवाले निर्ल्लज्जपणे टीवीवर सांगत सुटले आहेत. हेच भाजपवाले म्हटले तर ? सगळे डावे देश डोक्यावर घेतात.

केजरीबाबा स्वच्छ असेलही, पण साला तो जगात एकटाच स्वच्छ आहे म्हणतो ते डोक्यात जातं.

तिरशिंगराव Thu, 12/03/2015 - 20:33

लाथाळ्यांमुळे आप सरकार पडले तर तिसर्‍यांदा दिल्लीची निवडणुक होईल का ? आणि झाली तर आप ला किती जागा मिळतील ?

अजो१२३ Fri, 13/03/2015 - 15:47

http://www.firstpost.com/politics/new-aap-sting-alleged-tape-shows-kejr…
काँग्रेस संपली आहे. मुस्लिमांना मोदी रथ थांबवायचा आहे. त्यांना आपला मत दिल्यावाचून गत्यंतर नाही. -केजरीवाल.
हा तर समर्थनाचा कहर -

The AAP has also attempted to defend Kejriwal's stand on the matter by saying that his statements showed that the party was against communal politics of giving seats to Muslims purely because of their religion.

आणि
पक्षात मायनॉरिटी कमिटी आहे. मग तुम्ही सेक्यूलर कसे?

अजो१२३ Fri, 13/03/2015 - 15:51

http://www.financialexpress.com/article/miscellaneous/wont-be-a-rubber-…
चार उमेदवारांच्या पार्श्वभूमीवर प्रश्नचिन्ह असूनही त्यांना उमेदवार केले. आज ते एम एल ए आहेत. निवडणूक जिंकायचीच म्हणून पक्षाची तत्त्वे धूळीस मिळवून उमेदवार निवडले.

विवेक पटाईत Sun, 15/03/2015 - 11:37

अन्ना आंदोलनच्या वेळी जे लोक केजरीवाल सोबत मंचावर बसले होते. आता त्यांनी आपली पत ओळखून, सर्वशक्तिमान केजरीवाल यांच्या सोबत मंचावर न बसता, चरणी बसायला पाहिजे होते. ज्यांना हे करता येणार नाही, त्यांची हाकलपट्टी होणारच. शेवटी एका जंगलात एकच सिंह राजा असतो.

अजो१२३ Mon, 16/03/2015 - 15:46

http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/delhi-cm-a…
मिडिया -फायनली सम गुड न्यूज फॉर आप.
आप - केजरीवाल यांचा खोकला गेला.
बीजेपी -पण याचे श्रेय मोदींना जाते. त्यांनीच केजरीवाल यांना बंगलोरला उपचार घ्या म्हणून पाठवले.
काँग्रेस - आणि मध्यंतरी अमित शहांनी आप फोडली.

अजो१२३ Tue, 17/03/2015 - 15:02

http://indiatoday.intoday.in/story/arvind-kejriwal-yogendra-yadav-defam…

Taking a strong view over his absence in connection with the case, the court in New Delhi's Karkardooma area had asked Kejriwal to appear before it on Tuesday. It also accused the three leaders of having no respect for the law.

अजो१२३ Wed, 18/03/2015 - 19:17

http://www.firstpost.com/politics/arvind-kejriwals-desperate-appointmen…
पक्षांतर्गत बंडाळी टाळण्यासाठी आम आदमी पक्षाच्या कित्तीतरी लोकांना क्वाझि-मंत्री पद? सातच मंत्री असायला पाहिजेत याला फाटा? धन्य!!!

ऋषिकेश Thu, 19/03/2015 - 10:03

In reply to by अजो१२३

एका वकीलांना पक्षातून काढल्यानंतर उरलेले/नवे कायदेशीर सल्लागार पक्षाकडे नाहित का? असा प्रश्न पडला.
अजून पूर्ण केस कळली नाहीये पण कोणीतरी याविरोधात कोर्टात गेले (ते जाईलच बहुधा) तर प्रथमदर्शनी तरी आआप तोंडघशी पडेलसे दिसते.

अजो१२३ Thu, 19/03/2015 - 10:48

http://indiatoday.intoday.in/story/aam-aadmi-party-to-go-national-arvin…
१. योगेंद्र यादव यांनी दिल्लीच्या बाहेर पक्षाचा विस्तार करावा म्हटले म्हणून त्यांना असंतुष्ट इ इ उपाधी देण्यात आली.
२. दिल्लीच्या शपथविधीच्या समारंभात आम्ही दिल्लीवर फोकस करू. लालच चांगली नसते. (मागच्यावेळेसचे) दिल्लीचे निकाल पाहून आमच्यात हाव सुटली होती. म्हणून आम्ही ४०० च्या वर लोकसभेच्या जागा लढवल्या. लोकांनी आम्हाला आमची जागा दाखवली. आता आम्ही असे करणार नाही. इथेच राहू. इथेच चांगले काम करून दाखवू. याँ त्याँ...
---------------
महिना गेला नाही आणि यू टर्न.

ऋषिकेश Thu, 19/03/2015 - 11:38

In reply to by अजो१२३

यु टर्न आहे हे एका दृष्टीकोनातून मान्य. फक्त स्वतः केजरीवाल दिल्ली बाहेरून लढत नाहीत ते स्वतः दिल्लीबाहेर गेले असे म्हणता येणार नाही.
==

मात्र दिल्ली बाहेरही निवडणुका लढवणार आहेत हे स्वागतार्ह आहेत. अंतर्गत धुसफुसींतून मार्ग काढून योगेंद्र यादव व अन्य प्रभृतींची घरवापसि करवली तर हरयाणा, पंजाब वगैरे राज्यांत स्कोप आहे. मुंबई व बँगलोर महापालिका लढवणार आहेत त्याच बरोबर त्यांनी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका लढवावी असेही वाटते

अजो१२३ Thu, 19/03/2015 - 11:52

In reply to by ऋषिकेश

यु टर्न आहे हे एका दृष्टीकोनातून मान्य.

केजरीवालाचे शपथविधीचे भाषण ऐका. त्यातला तो अहंकार शब्द खासकरून.
---------------------
बाय द वे, "मान्य" म्हणजे काय? तुम्ही थोडे थोडे पक्षाचे प्रवक्ते, सहानुभूतीदार आहात का? मग हा धागा अवश्य वाचत रहा.

अजो१२३ Thu, 19/03/2015 - 11:59

In reply to by ऋषिकेश

जो जबरदस्त शॉकिंग आणि कैच्या कै, शिवाय अब्रप्ट, इ इ यू टर्न आहे त्याला "एका दृष्टीने मान्य" म्हणणे ...आवडले नाही.
तुम्ही हा यू टर्न योग्य आहे म्हणा, ते वेगळे! ते योग्य असू शकते. पण हा टर्न आहे कि नाही यावर ...? असो.
------------------------
बाय द वे, सरकार दिल्ली धुळमुक्त करणार आहे म्हणे. सरकारने जर शहर चकाचक केले तर डोळे झाकून मी आजन्म आपला मतदान करेन.

ऋषिकेश Thu, 19/03/2015 - 12:12

In reply to by अजो१२३

एका दृष्टीने यासाठी की

आम्ही दिल्लीवर फोकस करू. लालच चांगली नसते. (मागच्यावेळेसचे) दिल्लीचे निकाल पाहून आमच्यात हाव सुटली होती. म्हणून आम्ही ४०० च्या वर लोकसभेच्या जागा लढवल्या. लोकांनी आम्हाला आमची जागा दाखवली. आता आम्ही असे करणार नाही. इथेच राहू. इथेच चांगले काम करून दाखवू.

यात आम्ही म्हणजे नक्की कोण? हा दृष्टिकोनातील फरकाचा भाग. जोवर केजरीवाल स्वतः दिल्ली बाहेर लढत नाहीत तोवर ते तिथेच राहून काम करत आहेत असे म्हणावे लागेल. गेल्यावेळी केजरीवाल दिल्ली सोडून वाराणासी लढवायला गेले म्हणजे दिल्ली सोडून गेले. आता ते तसे करणार नाहीत असा अर्थ मी त्या भाषणचा घेतला होता.

मात्र तुमच्या दृष्टीने आम्ही म्हणजे एकुणच आआप असेल तर हा युटर्न आहे. माझ्या दृष्टीने दिल्ली विजयाच्याही कितीतरी आधी पक्षाने देशभर कार्यकर्यांची नोंदणी केली आहे, विविध राज्यांच्या समित्या फॉर्म्ड आहेत अशावेळी त्यानंतर आम्ही दिल्ली बाहेर जाणार नाही म्हणजे स्वतः केजरीवाल जाणार नाही असाच अर्थ घ्यायला हवा. पक्ष आधीच दिल्ली बाहेर आहे व त्या भाषणाच्या वेळीही होता.

अजो१२३ Thu, 19/03/2015 - 10:59

http://gulfnews.com/news/asia/india/aap-leader-offers-to-quit-all-party…
प्रशांत भूषण यांनी काही उमेदवारांनी दिल्ली निवडणूकीत उच्चपदस्थ नेत्यांना पैसे दिले आहेत याचा भक्कम पुरावा आपल्याकडे आहे असा आरोप एक नविन पत्र लिहून केला आहे. भूषण साहेब, मतदानाच्या आदल्या दिवशी किंवा उमेदवारांच्या पर्च्या दाखल करण्याच्या दुसर्‍या दिवशी नै का सांगायचं?

अजो१२३ Thu, 19/03/2015 - 11:11

http://aamaadmiparty.org/donation-list
निवडणूकीच्या काळात दरदिवशी आपला साधारण ३० लाख रु मिळायचे. ५०% दिल्लीतून, २५% अन्य भारत आणि २५% विदेशातून. नशीब चांगले असलेल्या दिवशी कोटी कोटी सुद्धा मिळायचे. निवडणूक संपली कि जनरली ओघ कमी होतो. मग दर दिवशी ५-७ पुरे होतात.
पण केजरीवाल यादव भूषण यांचेत राजकीय संघर्ष झाल्यापासून ही रक्कम चक्क १०-२० हजार प्रतिदिन वर आली आहे. लोकांचा भ्रमनिरास कित्ती फास्ट होतो पहा.
-------------------
सगळे आकडे अंदाजे आहेत.

अजो१२३ Thu, 19/03/2015 - 11:27

आम आदमी पार्टीचं सरकार आल्यानंतर पहिलं विजेचं बिल आलं. फार रोचक प्रकार होता. म्हणजे आहे. आतापर्यंत बिल नेहमी एक कॅलेंडर महिन्याचे असायचे.( उदा. १० मार्च ते १० एप्रिल.) यावेळेस बिल आलं १० फेब ते १४ मार्च. युनिट्स ४०६. ४०० युनिट्सपर्यंत बिल माफ आहे. आमचं एक दिवसाचं कंझंप्शन १२-१३ युनिट आहे. बिल ३२ ऐवजी ३० दिवसांचं असतं तर शून्य असतं. आणि फेब २८ दिवसांचा आहे म्हणून २८ दिवसांचं असतं तर पक्कंच शून्य असतं. पण टाटा पावरच्या दुर्देवाने अगदी ३१ वा दिवस संपला तरी आमचं कंझंप्शन ४००च्या खालीच. मग? अजून एक दिवस वाट पहा नी ठोका बिल. चिट साले. बिल माफ म्हटलं आहे बिलिंग पिरियड बद्दल थोडीच काही वचन दिलंय.

नितिन थत्ते Fri, 20/03/2015 - 09:05

In reply to by अजो१२३

तुम्हाला जास्त कालावधीचे बिल दिले असेल आणि त्यानुसार जास्त कन्झम्प्शन झाले आहे असे म्हटले असेल तरी दर लावताना महिन्यातील कन्झम्प्शननुसारच लावले पाहिजे. तुम्ही विद्युत आयोगाकडे दाद मागितली पाहिजे.

आमच्याकडे पूर्वी दोन महिन्यांनी बिल येत असे. तरी मासिक कन्झम्प्शननुसारच बिल (दर) लावले जात असे.

दुसरे म्हणजे टाटाने कुठे कसले आश्वासन दिले आहे?

अजो१२३ Sat, 21/03/2015 - 11:51

In reply to by नितिन थत्ते

केजरीवालांचे अनएडिटेड एलेक्शन प्रॉमिस - सत्तेत आलो तर वीज बिल अर्धे करू.
एडीशन १ - फक्त डोमेस्टिक कंज्यूमरला
एडीशन २ - ४०० युनिटपेक्षा कमी मासिक बिल असेल तर
एडीशन ३ - मासिक म्हणजे बिल टू बिल
एडीशन ४ - बिल पिरियड असा करू कि ४०० च्या आसपास असाल तर दिवस ४-५ इकडे तिकडे करू.
=========================================================================================

विद्युत आयोगाकडे दाद

हे किती सोपं आहे याची कल्पना नाही.

नितिन थत्ते Sat, 21/03/2015 - 21:33

In reply to by अजो१२३

>>एडीशन ४ - बिल पिरियड असा करू कि ४०० च्या आसपास असाल तर दिवस ४-५ इकडे तिकडे करू.

आश्वासनात "केजरीवाल यांनी" बदल केला आहे असे आपले कंजेक्चर/अ‍ॅझम्प्शन आहे. हा चावटपणा टाटाने कशावरून केलेला नाही?

अजो१२३ Sun, 22/03/2015 - 19:33

In reply to by नितिन थत्ते

आश्वासनात "केजरीवाल यांनी" बदल केला आहे असे आपले कंजेक्चर/अ‍ॅझम्प्शन आहे. हा चावटपणा टाटाने कशावरून केलेला नाही?

माझ्या विधानातल्या वाईटपणाबद्दल अगोदरच क्षमा मागून पुढे लिहितो =
उद्या मला ४०० युनिटचे बिल अर्धे न येता पूर्ण बिल आले तरी टाटाने चावटपणा केला नाही कशावरून आणि केजरीवाल यांनी बदल केला आहे असे माझं कंजेक्चर/अ‍ॅझम्प्शन आहे असं म्हणाल काय?

"महिन्याला चारशे युनिटच्या खाली अर्धे बिल"* या संज्ञेचा अर्थ क्लिअर आहे.
======================================
*तसे याला प्रचारात फुकट वीजच म्हणायचे. बीजेपीवाल्यांनी देखिल आपचा निवडणूकनामा वाचला नव्हता वाटतं. असता तर करेक्ट केलं असतं.

नितिन थत्ते Sun, 22/03/2015 - 19:45

In reply to by अजो१२३

कळलं नाही.....

तुम्हाला ३५ किंवा ३६ दिवसाचा वापर ४०० युनिट होऊनही महिना ४०० युनिट असल्यासारखे बिल लावले आहे असा तुमच्या कयास आहे. आणि त्यासाठी टाटाला केजरीवालने हा चावटपणा करण्याची मुभा दिली आहे असा कदाचित 'आरोप' आहे. मला खरे काय ते ठाऊक नाही. मी इतकेच म्हणतो आहे की हे खरे आहे याची शहानिशा करायला हवी आणि त्यासाठी तुम्ही आधी टाटाकडे तक्रार करायला हवी. मग टाटा (चा कर्मचारी) तुम्हाला सांगेल की १. अर्धे बिल लावण्याविषयीची ऑर्डर सरकारने अजून काढली नाही. किंवा २. सरकारने दर महिना ४०० युनिट असे न म्हणता वापर (महिन्याचा, दीड महिन्याचा किंवा कोणत्याही कालावधीचा) ४०० युनिटपेक्षा जास्त असेल तर पूर्ण बिल काढण्याची मुभा दिली आहे. किंवा ३. सरकारने आदेश दिला आहे पण टाटा कंपनी कोर्टात गेली आहे आणि निकाल लागेपर्यंत पूर्वीच्याच दराने आकारणी करण्यास कोर्टाने सांगितले आहे.

१ किंवा २ किंवा ३ पैकी काय आहे हे कळल्याशिवाय काही म्हणणे म्हणजे कल्पनेचे खेळ आहेत.

अजो१२३ Sun, 22/03/2015 - 20:02

In reply to by नितिन थत्ते

पैकी १ आणि ३ व्हॅलिड नाही, कारण ज्यांचे युनिट्स ३०० आहेत, त्यांचे बिल १५० युनिटांचे आहे.
========================
१. सरकारचे अभिवचन "महिन्याचे" आहे. ते पूर्ण झाले नाही. - मी.
२. बिल पिरियड मधे "मायनर" चेंज आहे. हा कंपनीने केला असेल. सरकारचा यात हात नसेल. दाद मागा. न्याय मिळू शकतो - तुम्ही.

जी माहिती नाही तिच्या आधारे आपण दोघे वेग्वेगळ्या पक्षांना दोष देत आहोत. अर्थातच सध्याला दोघेही बरोबर वा दोघेही चूक आहोत.

नितिन थत्ते Sun, 22/03/2015 - 20:28

In reply to by अजो१२३

मी (टाटाला) दोष देत नाही. फक्त तुम्ही केजरीवालला एकतर्फी दोष देण्यापूर्वी माहिती करून घ्या इतकंच म्हणतो आहे.

अजो१२३ Sun, 22/03/2015 - 21:27

http://www.financialexpress.com/article/economy/arvind-kejriwals-aam-aa…
(तुमच्या तुमच्या) केंद्रातल्या जेटलींना भेटा, मी मदत देणार नाही. राज्य सरकारने मनपाला "ग्लोबल स्किम ऑफ टॅक्स" खाली द्यायची मदत नाकारली. मनपांच्या चतुर्थ श्रेणी कामगारांची पगार दोन महिन्यांपासून थकली आहे. आम आदमी कि जय हो!

अजो१२३ Sun, 22/03/2015 - 21:30

http://www.financialexpress.com/article/economy/arvind-kejriwal-led-aam…
२० किलोलिटर प्रतिमास पेक्षा कमी वाल्यांना पाणी फुकट आहे.
पण त्याच्यापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी दर १०% वाढवला.
केजरीबाबा कि जय हो!

अजो१२३ Fri, 27/03/2015 - 12:47

काल टीवीवर प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी दिलेल्या एका साक्षात्कारात -
१ अरविंद केजरीवाल आणि कंपनी खोटे बोलतात.
२. डिक्टेटरशिप करतात
३. अनइथिकल आहेत
असे थेट म्हटले.
इतके किंवा किंचितही थेट यापूर्वी कधीही काहीही बोलले गेले नव्हते.
============================================================
http://zeenews.india.com/news/india/live-bhushan-yadav-should-exit-aap-…
यादव नि भूषण नि आप सन्मानपूर्वक पक्ष सोडावा - कुमार विश्वास.
====================================
http://indianexpress.com/article/cities/delhi/aap-reconciliation-talks-…
पाच मुद्द्यांवर दोन फॅक्शन्स चे एक्मत झाले नाही आणि पक्षात भेग पडली आहे.
यादव यांचे मुद्दे असे -
१. दोन कोटींचा घपला स्पष्ट लोकपालाकडे द्या
२. नव्याने काँग्रेस फोडून, पक्षाला विश्वासात न घेता, सरकार बनवायचा मुद्दा लोकपालाकडे द्या.
३. प्रांतिक निवडणूका प्रांतांना ठरवू द्या
४. सिक्रेट बॅलेट ने पी ए सी ची रिक्त पदे भरा
५. अजून एक कैतरी
======================================================

ऋषिकेश Fri, 27/03/2015 - 15:34

In reply to by अजो१२३

साक्षात्कार का ते माहिती नाही, कदाचित चर्चा करून परिस्थिती बदलता येईल असा विश्वास बाळगून असल्याने बोलले नसतील.

http://www.thehindu.com/news/national/fighting-to-save-the-soul-of-aap-…

इथे यादव व भुषण यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. पक्षात एक मोठी फुट अशा कारणाने पडावी हे दुर्दैवी आहे.

अतिशहाणा Fri, 27/03/2015 - 18:14

In reply to by ऋषिकेश

साक्षात्कार का ते माहिती नाही

साक्षात्कार म्हणजे मुलाखत हो. जोशीसाहेब दिल्लीकर असल्याने हा शब्द वापरला असावा.

अजो१२३ Fri, 27/03/2015 - 12:51

http://www.financialexpress.com/article/economy/aam-aadmi-party-govt-pa…
देशात केवळ मोदींचे सरकार उद्योग फ्रेंडली नाही. आप सरकार ने व्हॅट क्रेडिट पुढच्या वर्षात फॉरवार्ड करायला अलाउ केले आहे. याचा फायदा सामान्य व्यापार्‍यांना होईल अशी हवा केली जात आहे. पण वास्तव मधे अगदी गडगंज एम एन सी ज ना पण याचा प्रचंड फायदा मिळणार आहे. सरकारचा रेवेन्यू कमी होणार.

अजो१२३ Fri, 27/03/2015 - 13:04

http://www.thehindu.com/news/cities/Delhi/no-vips-during-water-crisis-k…
दिल्लीत पाणी टंचाई आली तर दूतावास नि २-३ जागा (मोदींचे घर, मुखेर्जांचे घर) सोडून सगळ्यांना आबाळ सहन करावी लागेल. हमीच अन्सारीची बायको नळावर लाईन लावून थांबलीय वा टँकरची वाट पाहतेय हे कल्पून मजा आली.

अजो१२३ Fri, 27/03/2015 - 13:09

http://www.financialexpress.com/article/economy/aam-aadmi-party-govt-in…
ई-रिक्शा चालवणारांना लिहिता वाचता येत नाही, ते गरीब मागास इ इ असतात म्हणून संगणीकृत काम करणारे दिल्लीचे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट खास त्यांच्यासाठी मौखिक इ परीक्षा घेणार. धन्य. (प्रत्यक्षात हे ड्रायवर लोक शिकलेले आहेत.) ते तीन चाकी मानवी रिक्क्षा पुलर असते तर ठिक होतं.

अजो१२३ Fri, 27/03/2015 - 13:37

http://www.financialexpress.com/article/miscellaneous/fight-against-cor…
केंद्राच्या नोटीफिकेशनला विरोध करणारे रिजोल्यूशन विधानसभेत पास. म्हणजे नक्की काय? आता कोणाला नक्की कोणते अधिकार आहेत, नाहीत?

गब्बर सिंग Mon, 30/03/2015 - 14:57

In reply to by ऋषिकेश

दिल्लीतल्याच जनतेनं त्यांना निवडून दिलं व ते ही ७० पैकी ६७ जागांवर. मोनोपोली निर्माण केली तर ती मोनोपोलाईझ करणारच नाही असं का वाटलं होतं त्यांना ?? मक्तेदारी ही अरेरावीला जन्म देणारच नाही असा होरा कोणत्या भूषणाकडून मिळवला ???

बाय द वे - आप ही एक मस्त केस होऊ शकते पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन/पॉलिटिकल इकॉनॉमी मधली.

अजो१२३ Tue, 31/03/2015 - 10:58

राज्य सरकारचे मनपांशी कर शेअर करण्याचे काहीतरी मेकॅनिझम आहे. केजरीवाल सत्तेवर यायच्या दिवशीच मनपांचा वाटा त्यांना मिळणे बंद झाले. पूर्व दिल्ली मनपा सगळ्यात गरीब आहे, दक्षिण दिल्ली मनपा सर्वात श्रीमंत. तर दक्षिण दिल्लीत कचरा उचलणारांचे पगार चालू आहेत. मात्र पूर्व दिल्लीत बंद आहेत. तिथले कर्मचारी कचरा उचलून सरळ रागाच्या भरात चौकांत व रस्त्यांवर ओतीत आहेत.
केजरीवालने मनपांना (भाजपच्या असल्याने) तुमच्या तुमच्या जेटलींकडून पैसा आणा असा सल्ला दिला आहे. या बाबाला institutional frameworks चा किंचितही सन्मान नाही असे वाटते.

तिरशिंगराव Tue, 31/03/2015 - 11:49

गर्ग ने नवा बाँब टाकला आहे. बीजेपीतर्फे आलेले फोन म्हणे, केजरीवालच्याच माणसाने केले होते. वर केजरीवाल समर्थक म्हणतात, राजकारणात हे सर्व करावंच लागतं.
रोजच्या रोज नवनवीन फोडण्या!

अजो१२३ Thu, 07/05/2015 - 12:35

तर मंडळी, मधल्या काळात आम आदमी पार्टीत जे झालं ते पाहता त्याला कृष्णकाल म्हणता येईल. तर चविष्ठ गोष्टीचा कामापेक्षा मोठा लचका तोडला तर आचका लागतो. झालं गेलं विसरून जाऊ आणि पुढे काय होते आहे ते पाहू.

अशा पाट्या दिल्लीत जागोजाग लागलेल्या आहेत. त्यातलं "मना मत करना" कितींदा वाचलं तरी मला दचकायला होतं. असो.

तर त्याचं पुढे काय होतंय त्यावर ही बातमी.
http://www.financialexpress.com/article/miscellaneous/1-25-lakh-calls-m…
१.२५ फोन आणि २५ तक्रारी दाखल!!!

आणि हो, हे १०३१ वर फोन घेणारे लोक आपचे स्वयंसेवक आहेत.

ऋषिकेश Thu, 07/05/2015 - 13:06

In reply to by अजो१२३

अरे वा!

Executives of the helpline answered 1,10,380 calls in the last one month. Of these, 510 complaints were marked to trained and authorised facilitators.
Of these 510 complaints, 252 were found to be fit for referral to the Anti-Corruption Branch, the official added.

6,000 calls were such that the complaints looked credible but the complainant could not provide proof and the cases were put under surveillance.

हे आकडे सुरूवात म्हणून चांगले आहेत.

अशा प्रकारची हेल्पलाईन इतरही राज्य सरकारांनी व स्थानिक स्वराज्य संस्थांनी सुरू करायला हवी

अजो१२३ Thu, 07/05/2015 - 13:14

In reply to by ऋषिकेश

पण लोकांना याचा जबर्‍या त्रास होतो.
उदा. माझं क्रेडिट कार्ड हरवलं. त्यावर नाव Arun Joshi असं होतं. तर पोलिसात तक्रार करताना पोलिस म्हणतो अगोदर अफेडेविट घेऊन या - अरुण भास्करराव जोशी आणि अरुण जोशी एकच आहेत म्हणून.
मग म्हणतो दुसरं अफेडेविट आणा कि हरवलं.
मग तक्रार नोंदवतो.

ऋषिकेश Thu, 07/05/2015 - 13:34

In reply to by अजो१२३

पण क्रेडीट कार्ड हरवल्याची तक्रार लाचखोरीच्या हेल्पलाईनवर / पोलिसांकडे का करायची?
ती बाब त्वरीत ब्यांकेला सांगायची असते ना? मग बँक ते कार्ड ब्लॉक करून त्वरीत दुसरे पाठवते

अजो१२३ Thu, 07/05/2015 - 13:49

In reply to by ऋषिकेश

A loss of credit card accompanied by a case of misappropriation therefrom needs to reported to the police. आणि इथे लाचखोरीच्या हेल्प्लाईनचा संबंध नाही. पण ती आल्यापासून ते जास्त कायदे दाखवू लागलेत.

अजो१२३ Thu, 07/05/2015 - 14:09

In reply to by ऋषिकेश

असं अ‍ॅफिडेविट कायद्याने लागत नाही. पण पोलिसाने मागितलं तर नाही म्हणता येत नाही. सिस्टिम कशी चालली आहे ते तुम्ही ठरवा.

अजो१२३ Thu, 07/05/2015 - 14:24

In reply to by ऋषिकेश

http://www.firstpost.com/living/why-did-salman-khans-trial-take-so-long…
कायदा मंजे नक्की काय अवघड बाब आहे. सलमानची केस सांगते. तरी त्याची केस अ‍ॅवरेजच्या मानाने लवकर संपली.
===========================================================================
प्रत्यक्ष कायदयाचं टेक्स्ट फार ब्रोड लेवलचं असतं. ऑफिसात असतात त्या प्रोसिजर. त्या केवळ सोयीसाठी असतात. वरच्या केसमधे ते दोन अफेडेविट पाहिजे होतीच का याचे उत्तर (कोर्टाचा निकाल म्हणून) कायद्याचे आणि घटनेचे धुरंधर १०-१५ वर्षे लढून नंतर नीट देऊ शकणार नाहीत.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 09/05/2015 - 01:43

In reply to by अजो१२३

पण तुम्ही मुळात नावात अशी गफलत करता आणि मग ती निस्तरण्यासाठी व्यवस्था आहे तिलाच नावं का ठेवता?

अजो१२३ Sat, 09/05/2015 - 07:07

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ती गफलत मी नाही केली. आमच्या मराठवाड्याच्या संस्कृतीची आहे. माझे नाव - अरुण भास्करराव जोशी असेच आहे. पण कार्डाच्या फॉर्मवर नेम (टू बी डीस्प्लेड मधे सुद्धा) मधे ते तसं लिहिलं तर अरूण भास्कर, इ इ असं कार्ड बनतं. पण ते चूक आहे. त्यापेक्षा अरुण जोशी जास्त अचूक आहे.

इतकंच काय कधी कधी ते फक्त अरूण लिहितात.
=======================================================
ते असो, माझ्याकडे स्टेटमेंट येतं त्यावर पूर्ण नाव असतंच. पोलिस म्हणतो ते नाव आणि कार्डवरचं नाव एकच आहे याचं अफेडेविट द्या.
==========================================
मूळात ज्या व्यवस्थेची बाजू तुम्ही घेताय त्यात बँकांना आमची नावं बदलण्यावर बॅन पाहिजे, नेम टू बी डिस्प्लेड मंजे काय? मी उद्या अरविंद केजरीवाल लिहिन. चालेल?

नितिन थत्ते Sat, 09/05/2015 - 07:30

In reply to by अजो१२३

>>नेम टू बी डिस्प्लेड मंजे काय? मी उद्या अरविंद केजरीवाल लिहिन. चालेल?

मी अ‍ॅफिडॅविट वगैरेचं समर्थन करत नाहीये. पण नेम टु बी डिस्प्लेड चं स्पष्टीकरण....

भारतात प्रत्येक समाजात नाव लिहिण्याची वेगवेगळी पद्धत असते. काही लोकांना आडनाव नसते (उदा. तामीळ). पण त्यातले काही लोक आपल्या जातीचे नाव आडनाव म्हणून लावतात (उदा. अय्यर). स्पिन बोलरच्या रविचंद्रन अश्विन या दोन नावातील त्याचे नाव कोणते हे पटकन कळून येणार नाही. त्यामुळे ते आर अश्विन किंवा ए रविचंद्रन असे लिहिले जाईल. ते नक्की कसे लिहायचे आहे ते त्या माणसाने सांगितले तर बरे असे म्हणून डिस्प्ले नेम विचारले जात असावे. शिवाय भारतात आडनावावरून जात समजते. त्यामुळे कोणाला आपली जात कळू नये असे वाटत असेल तर त्यांना आपले नाव कसे दिसावे हे सांगण्याची मुभा असते. बिहार मधील खूपसे लोक आपले नाव फलाणा कुमार इतकेच लिहितात.