Skip to main content

ही बातमी समजली का? - ५४

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.

अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १०० च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा/जाईल.

===========

अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे परंतू.......

"We have to accept that newspapers, magazines can publish things that are offensive to some as long as it's within the law," he said.

घ्या. पुन्हा तेच. पोप जे म्हणाले व कॅमेरून जे म्हणतायत .... यात नेमका फरक काय ???

.
.
.

गब्बर सिंग Tue, 20/01/2015 - 04:48

http://www.dailymail.co.uk/news/article-2915093/Airliners-class-passeng…

Planes carrying more first class passengers may soon be given landing priority over other flights in a move that would radically overhaul the current 'first come, first served' rule, it has been claimed. As more advanced technology becomes available to air traffic controllers, airlines will be able to designate specific flights within their own fleets to jump the queues. This would be beneficial for flights carrying large numbers of business or first class passengers, or planes with customers connecting to other flights.

गवि Tue, 20/01/2015 - 11:08

In reply to by नगरीनिरंजन

पैश्याला प्राधान्य हे ठीक आहे पण यात फ्लाईट सेफ्टीला दूरान्वयानेही कोणताही पोटेन्शियल इम्पॅक्ट होणार नाही याची खात्री कशी दिली जातेय ते पहावे लागेल.
शिवाय त्याच एअरलाईनला स्वतःच्या फ्लाईट्समधे प्राधान्य देण्याचा वाव दिला जात आहे. इतर एअरलाईन्सच्या त्याच वेळी रांगेत असलेल्या (क्रमांकानुसार अधेमधे कुठेही) विमानांचे काय करणार हा प्रश्न प्रथमदर्शनी पडला आहे.

गब्बर सिंग Tue, 20/01/2015 - 11:13

In reply to by गवि

पैश्याला प्राधान्य हे ठीक आहे पण यात फ्लाईट सेफ्टीला दूरान्वयानेही कोणताही पोटेन्शियल इम्पॅक्ट होणार नाही याची खात्री कशी दिली जातेय ते पहावे लागेल.

हे विचारणीय आहे.

पण ज्या फ्लाईट मधे जास्त फर्स्ट क्लास वाले प्रवाशी आहेत त्या फ्लाईट ची सुरक्षा जास्त महत्वाची मानली जावी. व हे करण्यासाठी ज्या फ्लाईट मधे शून्य फर्स्ट क्लास वाले आहेत त्या फ्लाईट ची सुरक्षा काँम्प्रोमाईझ केली तरी चालेल.

गवि Tue, 20/01/2015 - 11:31

In reply to by गब्बर सिंग

पण ज्या फ्लाईट मधे जास्त फर्स्ट क्लास वाले प्रवाशी आहेत त्या फ्लाईट ची सुरक्षा जास्त महत्वाची मानली जावी. व हे करण्यासाठी ज्या फ्लाईट मधे शून्य फर्स्ट क्लास वाले आहेत त्या फ्लाईट ची सुरक्षा काँम्प्रोमाईझ केली तरी चालेल.

लँडिंग सीक्वेन्समधे बहुतांश केसेसमधे फ्लाईटची सुरक्षा त्या विमानाचे लँडिंग योग्य क्रमाने होण्यावर अवलंबून असते. सीक्वेन्स जंप करुन आगोदर/लवकर उतरण्यावर किंवा त्यात कोण बसले आहे यावर नव्हे. ऑबवियस लॉजिकच्या विपरीत जाऊन क्रम उलटसुलट केल्याने कधीनाकधी पूर्ण मॅन्युअल मोडवर स्विच होण्याची इमर्जन्सी आलीच तर अनर्थ होऊ शकतो.

तरी बरे.. विमानातल्या बिझनेस क्लास खुर्च्याही इकॉनॉमी क्लासच्या खुर्च्यांसोबत त्याच विमानात एकत्र लँडिंग करतात हे अजून स्वीकारले जातेय.

अर्धवट Tue, 20/01/2015 - 12:22

In reply to by गब्बर सिंग

>>ज्या फ्लाईट मधे शून्य फर्स्ट क्लास वाले आहेत त्या फ्लाईट ची सुरक्षा काँम्प्रोमाईझ केली तरी चालेल.

अगदी बरोबर गब्बर, फक्त अशा फ्लाईटची तिकिटे विकताना, या फ्लाईटच्या सुरक्षेची काळजी घेतली जाणार नाही अशी स्पष्ट सुचना द्यावी तसेच, रेग्युलेटर लाही तसे स्पष्ट सांगावे म्हणजे झाले.
आणि ज्या फ्लाईट मधे फर्स्टक्लासच्या १० सीट आहेत ती तिकिटे विकताना, २० फर्स्टक्लास तिकिटे असलेल्या फ्लाईटपेक्षा तुमची सुरक्षा आम्हाला कमी महत्वाची आहे असेही सांगावे म्हणजे तुझ्याच भाषेत "करार होताना तुमचा जीव आम्हाला कमी/जास्त/खूप/लैच/शून्य महत्वाचा आहे असा क्लॉज असला की झाले" आणी त्याबरोबरच "तुमची शेफ्टी इज ऑफ अटमोस्ट इंपोर्टन्स टू अस" ह्या घोषणा अर्थातच करार मोडणार्या ठरतीलच ना... ते कंफर्म करा एकदा...

गब्बर सिंग Tue, 20/01/2015 - 12:39

In reply to by अर्धवट

अगदी.

तो रेग्युलेटरच रद्द करायला हवा मुळात.

सगळ्यांना इक्वल सुरक्षा पुरवणे चूक आहे. ज्यांना अधिक सुरक्षा हवी आहे त्यांनी अधिक पेमेंट करावे. ज्यांना कमी सुरक्षा हवी आहे त्यांनी कमी. रेग्युलेटर स्थापित करून त्याच्याद्वारे सगळ्यांना एकसमान सुरक्षा पुरवली जावी असा फोर्स करणे हे चूक एवढ्यासाठी आहे की त्याद्वारे जे कमी पेमेंट करू शकतात्/इच्छितात त्यांच्या सुरक्षेसाठी लागणारा खर्चाचा बोजा - जे जास्त पेमेंट करू शकतात्/इच्छितात त्यांच्यावर पडतो. It transfers costs from one set of passengers to another set.

गवि Tue, 20/01/2015 - 12:44

In reply to by गब्बर सिंग

सर्वकाही मान्य आहे, पण "सुरक्षितता" अथवा सेफ्टी या विषयाला हे घाऊकपणे लागू करणे इथेच गल्ली चुकलेली आहे इतकेच मत मांडतो. स्वार्थ परमार्थ वगैरे बाजूलाच राहू देत. फिल्ड चुकले.

सगळीकडे नाही रे चालत गब्बर..!! ;)

गवि Tue, 20/01/2015 - 12:48

In reply to by गवि

ता.क. यावर उपाय आहे.

जास्त पैसे देऊन जास्त सुरक्षितता हवी असलेल्या लोकांचे विमान, रुट आणि विमानतळ असे तिन्ही पूर्ण वेगळे (प्यारेलल) बनवले पाहिजे. मग घ्या वेगळी जास्तीची सुरक्षितता. त्यांची विमाने दोनदा सर्विसिंगला पाठवू आणि त्यांच्यात्यांच्यात सर्व लेव्हल्स एकसमान ठेवण्याचे पाहू.

तरीही जास्त पैसे देणारे कितीजण आहेत याचा अंदाज आल्यास बरे पडेल. एका व्यक्तीला एक विमान दिल्यास जास्तीतजास्त हेतू साध्य होईल. नाहीतर तीन उद्योगपती अन दोन राष्ट्रप्रमुख अधिकाधिक बोली लावत आले तर नेमके कोणाला एकाच विमानात कोंबायचे आणि त्यातल्यात्यात आधी वाचवायचे याची गोची होईल.

अतिशहाणा Tue, 20/01/2015 - 19:48

In reply to by गवि

कमी संख्येने असलेल्या जास्त पैसेवाल्यांच्या सुरक्षेचे फंडिंग आजकाल जास्त संख्येने असलेल्या कमी पैसेवाल्यांच्या पैशांवर होत आहे. जास्त पैसेवाल्यांसाठी वेगळी विमाने, वेगळे विमानतळ आणि रुट असणे अत्यंत आवश्यक आहे. कमी पैशेवाल्यांनी केवळ संख्या जास्त आहे म्हणून जास्त पैसेवाल्यांच्या सुरक्षेचा भुर्दंड उचलू नये.

वामा१००-वाचनमा… Tue, 20/01/2015 - 19:53

In reply to by अतिशहाणा

कमी पैशेवाल्यांनी केवळ

असं कसं म्हणता तुम्ही. पैसा हा सर्वेसर्वा असतो. प्रत्येक ट्रँन्झॅक्शनचा तोच एकमेव निकष आहे ;)
कुठेतरी वाचलेलं - Demystify money & give yourself a gift = पैशाभोवती जे अनावश्यक मोहमयी (glamorous) वलय आहे ते दूर करा. स्वतःवर उपकार कराल.

अतिशहाणा Tue, 20/01/2015 - 20:00

In reply to by वामा१००-वाचनमा…

हो तेच म्हणतोय. कमी पैशेवाल्यांनी जास्त पैशेवाल्यांची सुरक्षा सबसिडाईज करायची गरज नाही. जास्त पैशेवाल्यांनी पैशाभोवतीचे मोहमयी वलय दूर करावे. जास्त पैेशेवाले स्वतःच्या सुरक्षेचा भार उचलण्यास समर्थ आहेत. बोंबलत १०-११ फर्स्टक्लासवाल्यांसाठी उरलेल्या ३००-३५० जणांना भुर्दंड कशाला. निदान कमी पैशेवाल्यांची तिकीटे तरी स्वस्त होतील.

वामा१००-वाचनमा… Tue, 20/01/2015 - 19:47

In reply to by गब्बर सिंग

मला एक कळले नाही मी मारे सुरक्षिततेच्या उद्देश्याने, फर्स्ट क्लासचे तिकीट घेतले पण फर्स्ट क्लास वाले आम्ही १२ च जण आहोत अन दुसर्‍या विमानात १३-१५ जण आहेत. तरे मग त्यांना प्राधान्य दिल्याने, माझ्यावर अन्याय नाही होत का? :(

अतिशहाणा Tue, 20/01/2015 - 20:12

In reply to by वामा१००-वाचनमा…

त्यामुळेच लेडिज स्पेशल लोकल असते तसे फर्स्ट क्लास स्पेशल असे विमान असणे अत्यंत आवश्यक आहे. हे सर्व विचित्र प्रश्न पडणार नाहीत. सर्वच जण फर्स्ट क्लास वाले असल्याने सुविधा प्रायॉरिटीने देता येतील. मुळात २०-२२ जणांनाच फर्स्ट क्लास परवडत असल्याने त्यांना हे स्वतंत्र विमान परवडणार नाही हे उघड आहे. त्यांना कमी पैशेवाल्यांच्या मेहेरबानीवरच अवलंबून राहून एकंदर उड्डाण सबसिडाईज करुन घ्यावेच लागते.
खरे पैशेवाले स्वतःचे चार्टर विमान घेऊनच उडतात. त्यांना कमी पैशेवाल्यांची मेहेरबानी लागतही नाही.

गवि Tue, 20/01/2015 - 12:42

In reply to by अर्धवट

मुळात विमानाच्या बाबतीत अमुक वर्गाला जास्त सुरक्षा अन तमुकला कमी सुरक्षा असे मार्जिन फार कमी आहे. यासाठी विमान हा प्रकार मला फार आवडतो.
विमानाच्या बाबतीत सुरक्षितता ही अमुकला पैले अन लवकर लँडिंग करवण्यात किंवा अमुकला आधी उतरवण्यात नसून एकूण विमान अखंड राहणे आणि नियमानुसार उतरणे यावर अवलंबून असते. तेजायला पुष्कळदा इमर्जन्सी झालेल्या विमानाला केवळ इंधन इजेक्ट करण्यासाठी किंवा जाळून संपवण्यासाठी वेळ काढत मार्गापासून बाजूला जाऊन उशीर करवावा लागतो किंवा जमिनीवरच्या इतरांच्या सुरक्षिततेसाठी पाण्यात नेऊन डिच करावे लागते.

प्रथम लँडींग हा हास्यास्पद मुद्दा आहे.

जास्त पैशांनी बर्‍याचश्या गोष्टी मिळतात आणि जरुर मिळाव्यात, पण "सारासार विवेक" आणि "किमान पातळीवर स्वतःला एका कॉमन ग्राउंडवर इतर फालतू लोकांसोबत नाक दाबून का होईना पण आणू शकण्याची क्षमता" या दोन गोष्टींमधे पैसेवाल्यांना ढकलून कोंबलेले पाहताना आनंद होतो.

अजो१२३ Wed, 21/01/2015 - 23:27

In reply to by गब्बर सिंग

पण ज्या फ्लाईट मधे जास्त फर्स्ट क्लास वाले प्रवाशी आहेत त्या फ्लाईट ची सुरक्षा जास्त महत्वाची मानली जावी. व हे करण्यासाठी ज्या फ्लाईट मधे शून्य फर्स्ट क्लास वाले आहेत त्या फ्लाईट ची सुरक्षा काँम्प्रोमाईझ केली तरी चालेल.

कमित कमी १०० श्रीमंताना मारून मरावे म्हणतो. ते जितके जास्त मरतील तितका आमचा जगायचा चान्स जास्त आहे हे सरळ दिसतंय.

गब्बरचा प्रतिसाद अक्कलशून्य आहे. विमानप्रवास सुरक्षा, अंतर, खुर्चीची जागा, डिजाईन, अन्न यापैकी "सगळंच्या सगळं" वेगवेगळं विकत नाहीत. बेसिक पॅकॅज सगळ्यांना समान असतं. बिझनेस क्लासला जागा नि आराम जास्त असतो. सुरक्षा नव्हे.
उद्या जर दिल्लीला दिवस्भर सगळी फर्स्टक्लास वालीच विमाने आली आणि माझे विमान कॅटल क्लास वाल्यांचे आहे म्हणून दिवस्भर लटकाऊन संध्या़काळी कोसळू दिले तर त्याला काय अर्थ आहे?

गब्बर सिंग Wed, 21/01/2015 - 23:44

In reply to by अजो१२३

गब्बरचा प्रतिसाद अक्कलशून्य आहे. विमानप्रवास सुरक्षा, अंतर, खुर्चीची जागा, डिजाईन, अन्न यापैकी "सगळंच्या सगळं" वेगवेगळं विकत नाहीत. बेसिक पॅकॅज सगळ्यांना समान असतं. बिझनेस क्लासला जागा नि आराम जास्त असतो. सुरक्षा नव्हे.

अधोरेखित भागाच्या नेमकी विरुद्ध भूमिका माझी आहे. These should be trade-able. (व अधोरेखित सलेला भाग जास्त अ‍ॅप्ट आहे कारण माझ्या बायकोचे सुद्धा माझ्याबद्दल साधारण असेच मत आहे.)

तुम्हाला हे आवडणार, पटणार व रुचणार नाही हे माहीती आहे. पण तरीही लिहितो -

खालील लिंका मूळ मुद्दा अ‍ॅड्रेस करीत नाहीत पण यू गेट अ‍ॅन आयडिया. पटलं नाही तर सोडून द्या.

१) Link 1

२) Link 2

३) Link 3

अर्थातच गब्बर फक्त लिंका देतो - असा आक्षेप येणारच आहे.

वामा१००-वाचनमा… Thu, 22/01/2015 - 00:46

In reply to by गब्बर सिंग

दुवे आवडलेले आहेत.
____
मला हे कळले की reclining space = scarce commodity
तिच्या scarcity मुळे conflict निर्माण झाला = externality
अन काही लोक(खरं तर हुषार) सौदा करु बघू लागले.
.
.
पण या सगळ्याचा विमानाच्या सुरक्षेशी काय संबंध?
हे देखील मान्य की सुरक्षा, प्रवाशांचा वेळ = scarce commodity
पण conflict/externality निर्माण झाली आहे का?

हा प्रश्न गब्बरकरता आहे. त्याच्या डोक्यात काहीतरी coase theorem चे सुरक्षेशी, समीकरण/connection आहे, पण आम्हाला ते कसे कळावे. तेव्हा त्याने यावर प्रकाश टाकावा ही इनंती ;)

अजो१२३ Thu, 22/01/2015 - 00:12

In reply to by गब्बर सिंग

अधोरेखित भागाच्या नेमकी विरुद्ध भूमिका माझी आहे. These should be trade-able.

काय काय ट्रेडेबल असावं याला काही मर्यादा आहे ? दुकानदाराच्या शेजारी त्याची न्याहारी घेऊन आलेली बायको थांबलेली असली तर ती ही ट्रेडेबल? व्हेर डू यू स्टॉप?

गब्बर सिंग Thu, 22/01/2015 - 00:16

In reply to by अजो१२३

व्हेर डू यू स्टॉप?

व्हेअर-एव्हर द दुकानदार अँड हिज वाईफ वाँट टू स्टॉप. मी त्यांच्यावर थांबण्याची व न थांबण्याची जबरदस्ती करणार नाही. त्यांना खुलेपणा मिळावा. Let them decide what to trade and what not to trade.

अजो१२३ Thu, 22/01/2015 - 00:20

In reply to by गब्बर सिंग

वेल, दुकानदाराच्या बायकोचा खून करू द्यायचे दुकानदाराने किती पैसे घ्यावे? तिघांना सगळे खुलेपणे करू देउ.

मन Thu, 22/01/2015 - 09:24

In reply to by गब्बर सिंग

व्हेअर-एव्हर द दुकानदार अँड हिज वाईफ वाँट टू स्टॉप.
"घरोंदा " हा चित्रपट आठवला. चित्रपटात अमोल पालेकर, श्रीराम लागू व ( माझ्या आवडत्या) झरिना वहाब आहेत.
दो दिवाने शहर में रात में या दोपहर में
आबुदाना ढूंढते है | ढूंढते है एक आबुदाना...
हे फेमस गाणं ह्याच पिच्च्चरातलं.

एक किंचित दु:खी पण खास गुलजार टच असलेलं :-
एक अकेला इस शहर में |रात में और दोपहर में |
आबुदाना ढूंढता है | आशियाना ढूंढता है ||
हे सुद्धा ह्याच पिच्चरातलं गाणं. ( खूपशा ऐसीकरांचंही हे फेव्हरिट गाणं असावं असा अंदाज.)
.
.
असो.
तर सांगायचं म्हणजे श्रीराम लागूंनी जे पात्र रंगवलय त्याचा एकूण ष्ट्यांड काहिसा ह्याच धर्तीवरचा असतो.
तो नायिकेच्या कुटुंबाला लै लै उपकृत करत असतो. आणि गरजवंत फ्यामिली त्याचे उपकारही घेत असते.
त्याच्या मनात नायिकेला मागणी घालण्याचा विचार आहे; हे दिसत असूनही कुटुंब ती मदत घेत असते.
आणि ह्यावर नायिकेनं आक्षेप घेतल्यावर तो साधारणतः असलच काहीतरी अत्यंत विनयशील व शांत स्वरात उत्तर देतो.
( "राजीखुशीचा मामला आहे. तुम्हाला मदत म्हणून मी करतो आहे. शिवाय मला तुमच्याकडून काही हवय हे ही खरय.
पण त्यासाठी मी काही जबरदस्ती वगैरे करतोय का")
अगदि अगदि त्या प्रसंगाची आठवण झाली गब्बर्-अजो ह्यांच्या दुकानदारीणीच्या संदर्भातल्या गप्पांत.
.
.
माझं रेकमंडेशन :-
गब्बरनं आजवर पाहिला नसल्यास हा पिच्चर अवश्य पहावा.त्याला विविध कारणांनी आवडण्याची बरीच शक्यता आहे.
मलाही हे असे thought experiment करायला भाग पाडणारे पिच्चर आवडतात.
काहीतरी आव्हानात्मक विधान/प्रश्न ते तुमच्यासमोर करत असतात.

नंदन Wed, 21/01/2015 - 10:27

In reply to by नगरीनिरंजन

या चर्चेवरून या आठवड्याच्या न्यू यॉर्करमधलं हे व्यंगचित्र आठवलं:


“Before we start, have you folks considered upgrading to Platinum Élite membership?”

गवि Tue, 20/01/2015 - 12:49

In reply to by अनुप ढेरे

पौराणिक काळ फार पुरातन आहे. त्यावेळी लँडिंगची गरज होती हेच मुळात तुमचे एक गृहीतक आहे.

गब्बर सिंग Tue, 20/01/2015 - 12:11

India gave quadratic equation to world: Rajnath Singh

LUCKNOW: Hailing India's contribution to astronomy, science and mathematics, Union home minister Rajnath Singh on Monday said the quadratic equation was formulated in the country and the neighbourhood pandit could give more accurate astronomical predictions than scientists and astronomers sitting in observatories in the US.

जय हो.

फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन ला संस्कृतात काय म्हणतात ते तेवढं सांगा. राजनाथ सिंग हे एमेस्सी फिजिक्स आहेत असे ऐकून आहे. मुरलीमनोहर जोशींप्रमाणे हे सुद्धा फिजिसिस्ट आहेत.

अनु राव Tue, 20/01/2015 - 12:51

In reply to by गब्बर सिंग

मुरली मनोहर जोशी हा माणुस एकेकाळी फिजिक्स शिकवायचा हे कळल्यावर पण मला फार्फार आश्च्यर्य वाटले होते.

भारतात शिक्षणाचा काय खेळ खंडोबा झाला आहे त्याची ही ठसठशीत उदाहरणे आहेत.

गब्बर सिंग Tue, 20/01/2015 - 13:08

In reply to by अनु राव

मुमजो हे तर - भारत हा इतका "हटके" आहे की आजच्या जगाच्या सगळ्या समस्या भारतीयांनी मागेच (म्हंजे आमच्या संस्कृतीतच) सोडवल्या होत्या - असे मानून चालतात. त्यांनी भौतिकशास्त्रात पहड केलेली आहे. पण म्यानेजमेंट सायन्स पण भारतातच उगवले असा दावा करून राहिलेले आहेत.

चिंतातुर जंतू Tue, 20/01/2015 - 12:51

In reply to by गब्बर सिंग

आणखी काय बडबडले माननीय गृहमंत्री -
अमेरिकेची वेधशाळा जे सांगते, ते पंडितही सांगेल - राजनाथ सिंह

कुठलाही देश आपल्याकडील ज्ञानाशी बरोबरी करू शकत नाही. विश्वस्थितीबाबत (कॉस्मॉलॉजी) आपले आकलन आधुनिक वैज्ञानिक आकलनाशी तंतोतंत जुळणारे आहे, असेही गृहमंत्री म्हणाले.

गब्बर सिंग Tue, 20/01/2015 - 13:14

In reply to by चिंतातुर जंतू

विश्वस्थिती याबद्दल त्यांचे जे काही ग्रह आहेत ते ऐकल्यावर मला असे वाटते की त्यांना ग्रहमंत्री म्हणावे हे उत्तम. गृहमंत्री म्हणण्यापेक्षा.

बॅटमॅन Tue, 20/01/2015 - 14:28

In reply to by चिंतातुर जंतू

स्वदेस पिच्चरमधील मोहन भार्गव आणि चरणपूरची पंचमंडळी यांच्यातील संवाद आठवला.

"का बनाती है कंपनी?"
"सॅटेलाईट".
"ई का होत है?"
"सॅटेलाईट चांद के तरह धरती का चक्कर लगाते है. और कहां बारिश होगी, कहां धूप, इ. ये सब बताते हैं."
"अरी ई काम तो हमारा सहदेव भी करत है! ए सहदेव!!!!!! आजा इधर औ' बता दे इनको!"
"(ठार मोकळ्या आकाशाकडे पाहून) आसमान साफ है. दो दिनतक बारिश नही होगी!"
"हांऽऽ!!!"
"जी...मैं भी यही काम करता हूँ."

बॅटमॅन Tue, 20/01/2015 - 14:46

In reply to by गब्बर सिंग

राजनाथ सिंगाचं म्हणणं चुकलंय अंमळ. पण देअर इज़ अ ग्रेन ऑफ ट्रुथ इन व्हॉट ही सेज़.२-व्हेरिएबल क्वाड्रॅटिक समीकरणाची उकल करण्याचे सूत्र पहिल्यांदा ब्रह्मगुप्ताने इ.स. ६०० च्या आसपास शोधून काढले होते. युरोपात ते रीडिस्कव्हर झाले १७ व्या शतकाच्या सुमारास.

अधिक माहितीकरिता इथे पहा.

http://en.wikipedia.org/wiki/Brahmagupta#Pell.27s_equation

या प्रकारची समीकरणे सोडवणे युरोपात १७व्या शतकाच्या आधी कुणालाही जमले नव्हते. प्राचीन ग्रीसमध्ये व भारतात याच्या काही सिम्पल केसेसमध्ये ट्रायल & एरर करून उत्तरे मिळालेली होती, परंतु ब्रह्मगुप्ताची 'आयडेंटिटी' हा एक लँडमार्क शोध होता.

कुट्टक नामक सोल्यूशन मेथड ही लिनिअर आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठीही वापरली जात असे. हिचा उद्गाता होता आर्यभट.

http://cs.annauniv.edu/insight/Reading%20Materials/maths/algebra/indet/…

नंतर आला ब्रह्मगुप्त. त्याने ती खतरनाक आयडेंटिटी शोधली. पण त्याहीपेक्षा डॉन म्हणजे भास्कराचार्य. त्याने चक्रवाल नामक पद्धती शोधून मोस्ट जनरल केस ऑफ २ व्हेरिएबल क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी इंटिजर सोल्यूशन्स कशी काढावीत हे दाखवून दिले.

http://en.wikipedia.org/wiki/Chakravala_method

कंटिन्यूड फ्रॅक्शन नामक टेक्निक वापरून अशी समीकरणे सोडवणे हे मात्र युरोपात १७व्या शतकातच झाले. त्याअगोदर कुणालाही जमले नव्हते.

त्यामुळे क्वाड्रॅटिक इक्वेशनशी संबंधित बरीच अ‍ॅडव्हान्स्ड टेक्निक्स ही 'मेड इन इंडिया' आहेत हे विधान सुयोग्यच आहे.

शिवाय

ax2 + bx + c = 0

x = [ -b +/- sqrt(b2 - 4ac) ] / 2a

हा फॉर्म्युला स्पष्टपणे मांडणाराही ब्रह्मगुप्तच असे विकी सांगतो.

http://en.wikipedia.org/wiki/Quadratic_equation#History

अल-ख्वारिझ्मी या अरब गणितज्ञाने ब्रह्मगुप्ताचे काम अभ्यासले होते व त्याच्या आधारे काही सूत्रे डिव्हेलप केली. त्याच्या कामावरून इन्स्पायर होऊन युरोपातल्या इतर गणितींनी त्याची सूत्रे कॉपी केली व काही स्वतः शोधूनही काढली. या सर्वांच्या मागे अंतिमतः ब्रह्मगुप्त आहे.

चिंतातुर जंतू Tue, 20/01/2015 - 14:52

In reply to by बॅटमॅन

अडचण सद्य परिस्थितीच्या आकलनाविषयी आहे -

कुठलाही देश आपल्याकडील ज्ञानाशी बरोबरी करू शकत नाही. विश्वस्थितीबाबत (कॉस्मॉलॉजी) आपले आकलन आधुनिक वैज्ञानिक आकलनाशी तंतोतंत जुळणारे आहे, असेही गृहमंत्री म्हणाले.

बॅटमॅन Tue, 20/01/2015 - 15:01

In reply to by चिंतातुर जंतू

कुठलाही देश आपल्याकडील ज्ञानाशी बरोबरी करू शकत नाही.

इतर कुठल्याही देशाचे ज्ञान हे भारतापेक्षा एकतर कमी असेल नैतर जास्त असेल. सबब 'बरोबरी' अशक्यच आहे.

विश्वस्थितीबाबत (कॉस्मॉलॉजी) आपले आकलन आधुनिक वैज्ञानिक आकलनाशी तंतोतंत जुळणारे आहे,

आयुका आणि इतर खंडीभर संस्थांमधून आधुनिक विज्ञानच शिकवले जाते (१६ मे नंतरसुद्धा) असे मला वाटते. त्यामुळे 'आपले' आकलन आधुनिक वैज्ञानिक आकलनाशी जुळणे यातही काही चूक दिसत नाही.

बाकी मूळ सुराबद्दल इतकेच म्हणायचे आहे की ज्याला जी गोष्ट महत्त्वाची वाटते ती तो पाहणारच. भारतात खरेच काय होते हे पाहण्याची तसदी घेण्यापेक्षा कुणा पोलिटिशियनच्या चार अंदाधुंद बेशिस्त वाक्यांकडे निर्देश करून हसण्यातच कुणाला मजा वाटत असेल तर त्याला तसे करण्याची मुभा (आश्चर्यकारकरीत्या १६ मे नंतरही) संविधानाने दिलेली आहे.

चिंतातुर जंतू Tue, 20/01/2015 - 15:13

In reply to by बॅटमॅन

माननीय गृहमंत्र्यांना बोलायचं ते बोलू देत. त्यांचं समर्थन करण्याची जबाबदारी इतक्या हिरीरीनंही आपल्या अंगावर घेऊ नका.

बॅटमॅन Tue, 20/01/2015 - 15:16

In reply to by चिंतातुर जंतू

माननीय गृहमंत्र्यांना बोलायचं ते बोलू देत. १६ मे बद्दल येनकेनप्रकारेण गरळ ओकायची जबाबदारी इतक्या हिरीरीनंही आपल्या अंगावर घेऊ नका.

चिंतातुर जंतू Tue, 20/01/2015 - 15:56

In reply to by बॅटमॅन

>> १६ मे बद्दल येनकेनप्रकारेण गरळ ओकायची जबाबदारी इतक्या हिरीरीनंही आपल्या अंगावर घेऊ नका.

गरळ ओकतील ते नतद्रष्ट. एवढी चांगली करमणूक करणारी सर्कस गावात आलेली आहे. आम्ही तर खूश आहोत बुवा.

बॅटमॅन Tue, 20/01/2015 - 16:02

In reply to by चिंतातुर जंतू

एवढी चांगली करमणूक करणारी सर्कस गावात आलेली आहे. आम्ही तर खूश आहोत बुवा.

=)) तसं दिसत नाही. करमणुकीच्या आडची जळजळ स्पष्टच आहे. स्वतःला पायजे त्याच्या विरुद्ध कौल जनतेने दिल्यामुळे जी जळजळ होते ती अशा खवचटपणाआड लपवायचे हे केविलवाणे प्रयत्न आहेत. इतर लोक उघड शिव्या घालतात तर त्यापेक्षा अंमळ वेगळा प्रच्छन्न शिवीगाळीचा ब्रँड बिल्ड करण्यापलीकडे यात काहीच नाही. :)

चिंतातुर जंतू Tue, 20/01/2015 - 16:07

In reply to by बॅटमॅन

>> करमणुकीच्या आडची जळजळ स्पष्टच आहे. स्वतःला पायजे त्याच्या विरुद्ध कौल जनतेने दिल्यामुळे जी जळजळ होते ती अशा खवचटपणाआड जपायचे हे केविलवाणे प्रयत्न आहेत. इतर लोक उघड शिव्या घालतात तर त्यापेक्षा अंमळ वेगळा प्रच्छन्न शिवीगाळीचा ब्रँड बिल्ड करण्यापलीकडे यात काहीच नाही.

असेच तर्क लढवायचे, तर देशाच्या गृहमंत्र्यापासून राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत अनेकांच्या वक्तव्यांपाठीही आमचीच जळजळ कारणीभूत आहे असं उद्या म्हटलंत, तरी आश्चर्य वाटणार नाही. :-)

बॅटमॅन Tue, 20/01/2015 - 16:27

In reply to by चिंतातुर जंतू

कुणाला कशाने आश्चर्य वाटेल वा वाटणार नाही याचे भविष्य वर्तवण्याइतपत आमची प्रगती अजून झालेली नाही. पण एक सामान्य निरीक्षण मांडले. ते किती लावून घ्यायचे हे प्रत्येकावर अवलंबून आहे. :)

नितिन थत्ते Tue, 20/01/2015 - 16:21

In reply to by बॅटमॅन

भारतीयांच्या गणिती प्रगतीबाबत जे काही आपण लिहिले आहे ते मान्यच आहे.

अवांतर: त्यात लिहिलेले इस ६०० हा वैदिक काळ नाही हे ही उघड आहे.

अति अवांतर- सगळे ज्ञान वेदांमध्ये आहे आणि वेद अपौरुषेय आहेत असे म्हटल्यावर सुश्रुत/आर्यभट/भास्कराचार्य मोडीत निघतात हे आणखी वेगळेच.

बॅटमॅन Tue, 20/01/2015 - 16:28

In reply to by नितिन थत्ते

अवांतर आणि अतिअवांतर या दोहोंशी सहमत आहे. फक्त एक प्रश्नः गृहमंत्र्यांनी क्वाड्रॅटिक इक्वेषन हे वेदांत उल्लेखिलेले आहे असे विधान केलेय का?

नितिन थत्ते Tue, 20/01/2015 - 17:02

In reply to by बॅटमॅन

>>गृहमंत्र्यांनी क्वाड्रॅटिक इक्वेषन हे वेदांत उल्लेखिलेले आहे असे विधान केलेय का?

हा अंबळ तांत्रिक बचाव झाला....

बॅटमॅन Tue, 20/01/2015 - 17:04

In reply to by नितिन थत्ते

उगीच बचाव करायची मला इच्छाच नाहीये. मी विचारलं कारण तुमचा प्रतिसाद तशा धर्तीच्या प्रश्नाला अनुसरून आहे असं दिसतंय इतकंच.

सुनील Tue, 20/01/2015 - 19:46

In reply to by गब्बर सिंग

आताच वॉट्सपवर वाचले - (अनेकांनी वाचले असेल एव्हाना...तरीही देतो..मजेशीर आहे)

श्रीमद् भगवतगीतेत पार्थ म्हणून ज्या अर्जूनाचा उल्लेख केला, त्या पार्थाचा गौरवर्णिय यवनीपासून झालेला पुत्र म्हणजेच पार्थागोरस..!!
हा पुत्र यवनीच्या पोटी जन्मला असल्याने त्यास सर्वजन विदेशी म्हणून हिणवू लागले.
तेव्हा अर्जूनाचा सहोदर बंधु कुंतीपुत्र कर्ण याने त्यास आश्रय दिला, कारण तोही कुंतीपुत्र असूनही उपेक्षित वर्गातील होता. " पार्थागोरस, तू आणि मी पांडव असूनही एकाच उपेक्षित वर्गातील आहोत , तुझा नि माझा वर्ग एकच आहे " कर्णाच्या वाक्याने 'कर्ण' आणि 'वर्ग' हे दोन शब्द , पायथागोरस च्या मनावर लहानपणीच कोरले गेले . त्यामुळेच कर्णाच्या या कृतीने उपकृत होवून पायथागोरस ने कर्ण हा ईतरांपेक्षा मोठा असा सिद्धांत मांडला.
त्यातूनच पुढे कर्ण वर्ग हा इतर दोन
भुजांच्या वर्गाबरोबर असतो असे मत मान्य झाले .
त्याच्या या सिद्धांताचे विचार वर्तुळ व्यास मुनीनी पुर्ण केल्यामुळे, वर्तुळाचा व्यास हा वर्तुळास दोन समान भागात विभागतो असा गणितीय सिद्धांत पुढे प्रसृत झाला.
कंस हा तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचा मामा.
तो मोठा गणितात कच्चा होता,
देविकीच्या मुलांना मारताना त्याचे गणित चुकले आणि कृष्ण जन्म होउन मृत्यू अटळ बनला.
कृष्णाच्या हातून मोक्षप्राप्ती होत
असताना कंसाची ईच्छा प्रकट केली होती की,
गणितात माझ्या नावाने कांहीतरी असावे म्हणून, कंसाच्या वधानंतर त्याचे स्मऱण असावे म्हणून गणितात कंस वापरतात. यावरून प्राचीन भारतात गणित आणि भुमिती किती प्रगत होती, हे सिद्ध होते.
टीप - आमच्याकडे वेदांतील विमाने, अंतराळयाने, वैदिक अणुबॉम्ब (म्हणजेच ब्रम्हास्त्रे), आईनस्टाईन (उर्फ अनंत जोग), नील आर्मस्त्रोंग (उर्फ निळू भुजबळ) यांच्याविषयीच्या अनेक सुरस कथा मूळ श्लोकांसाहित उपलब्ध आहेत. वाचकांनी संपर्क साधावा...
(ग्रंथासोबत एक लिटर गोमुत्र मोफत दिले जाईल)…!!

बॅटमॅन Wed, 21/01/2015 - 12:52

In reply to by सुनील

या थेरीत जरा प्रॉब्लेम आहे. जर हे खरे मानले तर महाभारताचा काळ इसपू ६००-७०० पर्यंत आणावा लागेल किंवा पार्थागोरसला २५०० वर्षांचे आयुष्य तरी द्यावे लागेल. तेही चालेल म्हणा. पण एक अल्टरनेटिव्ह थेरी अशी, की पायथागोरस हे एका तमिऴ हिंदू नावाचे ग्रीकीकरण आहे. तो मूळचा तमिळनाडूचा. संत 'पित्थागोरा' या नावाने ओळखला जायचा. पुढे काही जहाजांबरोबर ग्रीसला गेला तेव्हा त्याचा पायथागोरस झाला. तो काय बोलतोय ते ग्रीक लोकांना समजत नसे. ते कन्फर्म करावे म्हणून तो आपले बोलणे झाले की पुढे विचारत असे- 'तेरियमा?' ("कळालं का?" इन तमिळ). त्यावरून तेरियमा-तेरिमा-थेरिमा-थेरमा-थेरम असा प्रवास होऊन ते स्टेटमेंट पायथागोरस थेरम म्हणून पुढे विख्यात झाले.

Nile Tue, 20/01/2015 - 23:12

In reply to by मिहिर

अमेरीकेत "टीच फॉर अमेरीका" च्या धर्तीवर पण तज्ञांच्या मदतीने हा प्रकल्प राबवणार असे दिसते. हे कसे करणार हा एक मोठाच प्रश्न आहे, त्यामुळे कुतूहल. अशा गोष्टींमध्ये सहभाग घेण्याची इच्छा असुनही ते शक्य होत नाही, त्यामुळे या प्रकल्पाकडून आशा. इच्छुकांकरता, भारतातही टीच फॉर इंडीया आहे.

चिंतातुर जंतू Tue, 20/01/2015 - 14:45

मुख्यमंत्र्यांनीही जनतेला दिले आपले ज्ञान....

आपल्याकडील विज्ञाननिष्ठ परंपरेमुळे आपल्याला इतर देशांतून ज्ञान व विचारांची आयात करण्याची गरज नाही. परंतु, प्रत्येकाने आपल्याकडील ज्ञान मात्र समाजापर्यंत पोहोचवण्याची गर‌ज आहे. देशी गाय ही दूध देण्याबरोबर आपल्याला सतत देत राहणारी आहे. त्यामुळे आम्ही राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू करणार आहोत

गवि Tue, 20/01/2015 - 15:15

In reply to by चिंतातुर जंतू

गोवंशहत्याबंदी या कायद्यामागे धार्मिकखेरीज काही हेतू आहे का?

गोवंशहत्याबंदी याची व्यापकता फक्त हत्येपुरती की बीफ प्रॉड्कट्स विक्री अन सेवनावरही बंदी अशी ?

बाकी छापील लोकसत्तेतल्या बातमीत उत्साहाच्या अतिभरात किंवा उत्साहाच्या अतिअभावामुळे "गोवंशबंदी" असा शब्द एके ठिकाणी छापला गेला आहे. :)

गब्बर सिंग Tue, 20/01/2015 - 23:43

In reply to by गवि

गोवंशहत्याबंदी या कायद्यामागे धार्मिकखेरीज काही हेतू आहे का?

गोवंशहत्याबंदी केल्यामुळे गाईचे चामडे कमी प्रॉडक्शन होईल. त्या चामड्या पासून चपला बनवणार्‍यांच्या रॉ मटेरिअल कॉस्ट्स वाढतील. त्यामुळे चपला बनवणार्‍यांपैकी काहींना (अनेकांना) तोटा होईल. त्यातले काही (अनेक) जण धंद्यातून बाहेर फेकले जातील. एतद्देशीय चपलांचे उत्पादन कमी होईल. मल्टिनॅशनल कंपन्यांचे (उदा. नाईके, रीबॉक) फावेल कारण (माझ्या मर्यादित माहीती नुसार) त्यांनी बनवलेल्या पादत्राणांत चामड्याचे परसेंटेज कमी असते (कंपेअर्ड टू - एतद्देशीय चपला बनवणारे very small businesses जी पादत्राणे बनवतात ती).

वामा१००-वाचनमा… Wed, 21/01/2015 - 23:38

In reply to by अजो१२३

हळदकुंकू-मुंज-श्राद्ध काय वैज्ञानिक आधार आहे या परंपरांना? "फील गुड" - आधार?
जर फक्त "फील-गुड" हा निकष असेल आहेत या परंपरा वैज्ञानिक आहेत.

अजो१२३ Thu, 22/01/2015 - 15:16

In reply to by वामा१००-वाचनमा…

गेट टूगेदर, शाळेत घालणे, मोठमोठ्या लोकांच्या पुण्यस्मृत्या आठवणे (अनुक्रमे) याला वैज्ञानिक आधार काय आहे?

बॅटमॅन Thu, 22/01/2015 - 15:28

In reply to by अजो१२३

झालंच तर ३१ डिसेंबरास फटाके फोडणे आणि लोकांची झोपमोड करणे यालाही वैज्ञानिक आधार काय आहे?

सिकुलरपणालाही वैज्ञानिक आधार काय आहे?

गवि Thu, 22/01/2015 - 15:25

In reply to by वामा१००-वाचनमा…

हळदकुंकू-मुंज-श्राद्ध काय वैज्ञानिक आधार आहे या परंपरांना?

खेद वाटला.

हळदकुंकू - कुंकू बनवण्याची केमिकल प्रोसेस बघा आणि मग प्रश्न विचारा. हळद.. औषधी गुण.. त्यात अल्कली मिसळतात.. ते कपाळाला ज्या ठिकाणी लावतात ते ठिकाणही आधुनिक वैद्यकात महत्वाचं मानलं गेलं आहे.. पूर्वज मूर्ख नव्हते. सायंटिफिक आहे ते.

मुंज- ठराविक वयात त्वचेचा अधिक भाग उघडा होऊन सूर्यप्रकाशापासून मिळणारी ड आदि जीवनसत्वे अधिक प्रमाणात मिळावीत अश्या उद्देशाने डोक्यावरचे केस काढले जात. शिवाय यामुळे खवडे, लिखा, कोंडा, चाई असे त्वचाविकार नाहीसे होत असत. सायन्स आहे.

श्राद्ध - पेनिसिल्विनियामधील शास्त्रज्ञ सध्या यावर संशोधन करत आहेत, त्यांचे रिपोर्ट्स वाचा जरा.. जगात किमान १५ देशांत यावर संशोधन चालू आहे. अभ्यास वाढवा...

अजो१२३ Thu, 22/01/2015 - 16:21

In reply to by गवि

हळदकूंकू - टॅटू बनवणं किती वैज्यानिक आहे ते बघा. नाहीतरी कूंकू लावले कि बाई विशेष असुंदर दिसू लागते.
मुंज - डीग्री घेताना काळे डगले आणि पतंगी कॅप्स घातल्या कि गॅमा -रे ज पासून संरक्षण होते. त्यावेळी अगदी राष्ट्रपती देखिल अशी डीग्री देणार असले तर त्यांना असे संरक्षण गरजेचे असते. मुंज म्हणून पोराला टकले करणे गॅमा रेंनी मारणे
श्राद्ध - ऐसीवरचे पहिल्या पानावरचे ते पुण्यतिथ्यांचे उल्लेख फार कामाचे. त्या दिवशी त्या माणसाचे नाव नाही घेतले तर जग बुडणार. त्यांचे संशोधन परत अंधारात जाणार. सख्खे पूर्वज कोण? त्यांची आठवण का करायची? आपण स्मृतीत येऊ तेव्हा आपलं काही चांगलं लोकांना आठवावं असं लोकांना का प्रेरित करायचं?
-------------------------
परंपरा या भावनिक मूल्यांसाठी असतात. जीवनातली प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक नसते. ती वैज्ञानिक नाही म्हणून ती त्यागणारे एक मूर्ख आणि ती वैज्ञानिक आहे "म्हणून" त्यागू नये असे म्हणणारे दुसरे मूर्ख.

अस्वल Fri, 23/01/2015 - 00:57

In reply to by अजो१२३

अहो मुद्दा काय आणि तुमचं विमान जातंय कुठे?
गजिनी झालाय तुमचा... भारतातली प्रत्येक परंपरा विज्ञाननिष्ठ आहे असं वर तुम्हीच म्हणालात आणि आता स्वतःच म्हणताय की परंपरा भावनिक मूल्यांसाठी असतात, त्याला विज्ञानाची जोड देऊ नये.
नक्की तुम्हीच वापरता ना हा आयडी?

वामा१००-वाचनमा… Fri, 23/01/2015 - 01:05

In reply to by अस्वल

जाने दो ना अस्वलजी, आप भी बात से बात क्यो बढाते हो ? तुम्हाला माहीत आहे यावर आता स्पष्टीकरण मग परत आरोप-प्रत्यारोप, मेगाबायटी प्रतिसादांची उतरंड लागणार :(

अजो१२३ Sat, 24/01/2015 - 12:11

In reply to by अस्वल

अहो हे अख्खं ब्रह्मांडच विज्ञाननिष्ठ आहे. जे होतं ते विज्ञानाचे नियम पाळूनच होतं. विज्ञानाचे नियम असे कोणाला तोडता येतात का? ते अपरिहार्य असतात. म्हणून सगळ्या भारतीय परंपरा विज्ञाननिष्ठ नै का झाल्या? ;) ;)

अतिशहाणा Fri, 23/01/2015 - 01:41

In reply to by अजो१२३

ओबामांच्या भेटीच्या अनुषंगाने सुरक्षेसाठी सीसीटीवी वगैरे पाश्चात्य परंपरा वापरण्यापेक्षा लिंबूमिरची आणि ताईत असे खास स्वदेशी विज्ञाननिष्ठ उपाय वापरावेत असा संदेश आजच वाचला. त्यासंदर्भात तुम्ही बोलताय का?

नितिन थत्ते Tue, 20/01/2015 - 20:23

In reply to by सव्यसाची

काही दिवसांपूर्वी "मोदींची जादू" अशा हेडिंगखाली रेल्वेने प्रसारित केलेल्याकाही सेंट्रलाइज्ड्/युनिफॉर्म फोन नंबर्सची यादी व्हॉट्स अ‍ॅपवर पहायला मिळाली.

नितिन थत्ते Tue, 20/01/2015 - 21:05

In reply to by सव्यसाची

रेल्वेने चौकशी, सूचना, तक्रारी, वैद्यकीय मदत वगैरेंसाठी सिंगल फोन नंबर (कोठूनही फोन केल्यास तोच नंबर) जारी केले आहेत.

ही "मोदी मॅजिक" आहे असे तो मेसेज म्हणत होता.

[पुढे "हा मेसेज अमुक जणांना फॉरवर्ड केला तर तमुक रुपयांचा टॉकटाइम मोफत मिळेल" असेही लिहिले होते].

सव्यसाची Tue, 20/01/2015 - 22:50

In reply to by नितिन थत्ते

सगळे झाले ते बीजेपी सरकारमुळे झाले असे मानणारे खूप आणि काहीच झाले नाही असे मानणारे पण खूप.असो!
पण तुम्ही PMJDY च्या माझ्या प्रतिसादाला हा उपप्रतिसाद दिला म्हणून मी विचारले कि संदर्भ काय रेल्वेच्या मेसेजचा या गिनीज बुक रेकॉर्डशी?

नितिन थत्ते Tue, 20/01/2015 - 23:14

In reply to by सव्यसाची

असे नंबर (१३५, १३७ वगैरे) माझ्या लहानपणापासून असतात. पण इथे ते मोदीच्या नावावर खपवले जातायत. शिवाय मोदी मॅजिकचा अधिक प्रचार व्हावा म्हणून फुकट टॉकटाइमचं आमिष पण आहे.

सव्यसाची Tue, 20/01/2015 - 23:25

In reply to by नितिन थत्ते

असे नंबर (१३५, १३७ वगैरे) माझ्या लहानपणापासून असतात.

अगदी मान्य. असे नंबर मी देखील पाहिले आहेत. परंतु, माझा प्रश्न एवढाच आहे की जन धन योजने ला गिनिज मिळाले आणि रेल्वेचे नंबर खपवले यात नक्की साधर्म्य काय आहे कळेना झाले आहे.

अजो१२३ Wed, 21/01/2015 - 23:38

In reply to by नितिन थत्ते

असे नंबर (१३५, १३७ वगैरे) माझ्या लहानपणापासून असतात. पण इथे ते मोदीच्या नावावर खपवले जातायत. शिवाय मोदी मॅजिकचा अधिक प्रचार व्हावा म्हणून फुकट टॉकटाइमचं आमिष पण आहे.

या विधानाचे बरेच अर्थ निघतात. पैकी ठळक ते असे -
१. भारतातले लोक महामूर्ख आहेत.
२. त्यांना ३ आकडी कामाचे नंबर माहित नाहीत.
३. हे नंबर मोदीने चालू केले असे मोदी सांगतोय.
-----------------------
म्हणायचंय काय?

नितिन थत्ते Thu, 22/01/2015 - 08:32

In reply to by अजो१२३

मला काही म्हणण्यापेक्षा तो मेसेज काय सांगू पहात आहे?

१३५/१३७ वगैरे नंबर- पक्षी असे युनिफॉर्म नंबर कदाचित ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असतील. पण मेसेज असे दर्शवू पाहतो आहे की मोदी या एकमेव माणसाला प्रवाशांच्या सोयीसाठी असे युनिफॉर्म नंबर ठेवण्याची कल्पना सुचली आणि त्याने मे २०१४ मध्ये सत्तेवर येताच त्या दिशेने कारवाई करून "प्रथमच" असे नंबर निर्माण केले.

शिवाय ही मोदी मॅजिक आहे या प्रचारासाठी फ्री टॉकटाइमचे आमिष आहे.

माहिती प्रसारित करण्याबाबत मला काही आक्षेप नाही. रेल्वेचे हे नंबर प्रसारित करणे चांगलेच आहे. ज्या गोष्टी फार पूर्वीपासून अस्तित्वात आहेत त्याचे श्रेय घेण्यावर आक्षेप आहे.

मध्यंतरी असाच एक मेसेज युनिक प्रॉव्हिडंट फंड अकाउंटविषयी आला होता आणि तो फ्रॉम नरेंद्र मोदी अशा सिग्नेचरने आला होता. युनिक प्रॉव्हिडंट फंड अकाउंटची स्कीम जाने २०१४ मध्येच सुरू झाली होती.

अजो१२३ Thu, 22/01/2015 - 15:24

In reply to by नितिन थत्ते

http://thenih0n.in/sutpp/skin/pdf/event_38.pdf
सरकारने प्रवासविषयक माहिती जनतेला देण्यासाठी प्रचंड इनिशिअटीव घेतला आहे. अख्खी सिस्टिम नवी आहे.

नितिन थत्ते Thu, 22/01/2015 - 15:29

In reply to by अजो१२३

प्रॉव्हिडंट फंड तर आधीपासून होता आणि त्याचा युनिक नंबरही जाने २०१५ मध्येच चालू झाला होता. त्याचे श्रेय क्या घ्यावे?

चिंतातुर जंतू Tue, 20/01/2015 - 19:43

हरियाणाच्या शिक्षणमंत्र्यांनीही काही ज्ञानकण उधळले आहेत.

डिसक्लेमर : इतर राज्यांची जोमाने होणारी प्रगती पाहून माझी जळजळ होते आहे. त्यामुळे कदाचित काहींना हरियाणावरची माझी स्तुतिसुमने अतिरंजित वाटली, तर त्यात तथ्य आहे. ;-)

अजो१२३ Wed, 21/01/2015 - 23:41

In reply to by चिंतातुर जंतू

ज्ञानकण हा शब्द उपरोधाने गीतेतलं काहीही न कळणारा न्यूनगंडी सेक्यूलरच वापरेल.
----------------------

अजो१२३ Thu, 22/01/2015 - 00:17

In reply to by चिंतातुर जंतू

बाय द वे, चिंतातूरजी, शाळेतली मुळी माझ्या महान भारत देशाचा, तिथल्या लोकशाहीचा, संस्कृतीचा मला अभिमान आहे असे म्हणतात तेव्हा ते ज्ञानकण टाळत टाळत तुम्ही वाट काढत का? कारण एका अर्थाने भारत आणि महान हे शब्द विरोधार्थी आहेत.

गब्बर सिंग Wed, 21/01/2015 - 05:31

यादव बाबा ज्युनियर यांचे लॉजिक

When I see Kiranji on stage with BJP, I can't help feel why is my former colleague on that side, on the side of the powerful? Why isn't she fighting with those taking on the powerful?"

Does he feel betrayed? "Betrayed is too strong a word. I feel very bad."

१) जेव्हा तुम्ही (४८ दिवस) सत्तेत होतात तेव्हा तुम्हाला तिच्याबद्दल काय वाटले ?? जर तुम्हाला एवढे वाईट वाटत होते तर तुम्ही सत्तेत होतात तेव्हा तिला सत्तेत समविष्ट का करून घेतले नाहीत ??

-----

२) आणि हा मजेशीर डायलॉग कुठुन शिकलात ->>>>> Why isn't she fighting with those taking on the powerful?

केवळ भाजपाकडे मिडिया, कॉर्पोरेट व पैसा आला की भाजपाकडे पॉवर आली ???????
प्रजातंत्रात खरी सत्ता (पॉवर) ही जनतेच्या हातात असते. Will you take on Janataa because Janataa is powerful ????

-----

३) शाझिया यांच्या सेक्युलर क्रेडेन्शियल्स वर लगेच प्रश्नचिन्ह ??? त्यांचा सेक्युलरिझम तकलादू ???? - हे म्हंजे विहिंप/शिवसेनेचे चे लोक बोंबा मारतात ना की - व्हॅलेंटाईन डे मुळे संस्कृती धोक्यात आली आहे. - तसेच आहे. संस्कृती महान व पुरातन कालापासून चालत आलेली असेल व जनतेचा तिच्यावर प्रगाढ विश्वास असेल तर ती धोक्यात कशी येते लगेच ??

नितिन थत्ते Wed, 21/01/2015 - 08:03

In reply to by गब्बर सिंग

>>) जेव्हा तुम्ही (४८ दिवस) सत्तेत होतात तेव्हा तुम्हाला तिच्याबद्दल काय वाटले ?? जर तुम्हाला एवढे वाईट वाटत होते तर तुम्ही सत्तेत होतात तेव्हा तिला सत्तेत समविष्ट का करून घेतले नाहीत ??

तेव्हा त्या "राजकारणात येणारच्च नाहीच्च" असं म्हणत होत्या. केजरीवाल यांनी राजकारणात पडून चूक केली असे त्यांचे मत होते. तेव्हा त्या वेळी त्यांना सत्तेत घ्यायचा प्रश्न आला नसावा.

बाकीचे यादव यांचे म्हणणे तद्दन राजकीय आहे.

गब्बर सिंग Wed, 21/01/2015 - 08:47

In reply to by नितिन थत्ते

तेव्हा त्या "राजकारणात येणारच्च नाहीच्च" असं म्हणत होत्या. केजरीवाल यांनी राजकारणात पडून चूक केली असे त्यांचे मत होते. तेव्हा त्या वेळी त्यांना सत्तेत घ्यायचा प्रश्न आला नसावा.

तेव्हा आप च्या सरकारला काँग्रेस चा पाठिंबा होता. बेदी राजकारणात (आप तर्फे) असत्या तर काँग्रेस चा पाठिंबा मिळालाच नसता कदाचित. किंवा जर बेदी सरकारमधे असत्या तर काँग्रेस ने त्यांना ह्युमिलिएट करायची संधी बघितली असती.

ऋषिकेश Wed, 21/01/2015 - 09:03

In reply to by नितिन थत्ते

+१
बेदी, आण्णा हे एका बाजुला राजकारण कसे वैट्ट आहे, त्या चिखलात शिरायला नको, केजरीवाल यांच्या सुप्त (?) राजकीय इच्छेसाठी त्यांनी "टीम आण्णा"ला यात गोवले व त्यांचा वापर करून घेतला वगैरेही ऐकले आहे.

बहुदा याच मुद्द्यावरून टीम अण्णात फूट पडली होती.

आता बेदींच्या राजकारण प्रवेशानंतर अण्णा एकटेच एका बाजुला राहिले म्हणायचे (जस्टिस हेगडे खूपच आधी वेगळे झाले होते त्यांना टीम अण्णामध्ये धरत नाहिये)

अनु राव Wed, 21/01/2015 - 12:27

In reply to by ऋषिकेश

ही बेदी बाई भाजपची मुख्यमंत्री होणार असेल तर मला अरविंद केजरीवालला ७०% बहुमत मिळावे असे वाटतय.

तसेही आप ला दिल्लीत पूर्ण सत्ता मिळावी असे मागल्यावेळेस ही वाटत होते आणि आत्ताही वाटते. त्यांच्या बर्‍याच कल्पना तद्दन मूर्ख पणाच्या असल्यातरी लोक बरी आहेत कुठल्याही पक्षा पेक्षा.

ऋषिकेश Wed, 21/01/2015 - 13:08

In reply to by अनु राव

भाजपाने - रादर अध्यक्ष अमित शहा यांनी - बेदी यांना भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. यावर राष्ट्रीय कार्यकारिणीत एकमत झाले नसल्याने अध्यक्षांनी निर्णय घेतल्याचेही वाचले आहे.

चिंतातुर जंतू Wed, 21/01/2015 - 17:14

सेन्सॉर बोर्डावरच्या नव्या नियुक्त्यांबद्दल एनडीटीव्हीनं केलेल्या कार्यक्रमानं चांगली करमणूक केली. गावात दाखल झालेल्या नव्या सर्कशीतले कलाकार चांगले कसरतपटू आणि मनोरंजन करणारे आहेत. त्यामुळे मजा येते आहे. विशेषतः नवनियुक्त अध्यक्षांनी जे गीत आळवलं (की आवळलं?) आहे ते तर सर्कशीला चार चाँदच लावतं.

हारुन शेख Wed, 21/01/2015 - 18:40

In reply to by चिंतातुर जंतू

जफर सरेशवाला यांची मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाच्या (MANUU) कुलगुरुपदी नेमणूक. हे ओंगळवाणे आहे. केवळ स्तुतिपाठक असणे हीच पात्रता उरलीय का ? मग काँग्रेस आणि भाजप यांच्यात फरक कुठे राहिला ? असेच चालले तर सलीम खान किंवा गेलाबाजार सलमान खान यांना AMU च्या कुलगुरूपदी बसवतील हे लोक ? :)

अनु राव Wed, 21/01/2015 - 18:49

In reply to by हारुन शेख

सलीम खान सारखा बॅलंस्ड आणि रोखठोक विचार करणारा माणुस फार कमी असतो.
मी त्याची मोठी मुलाखत ऐकली आहे, इतका मुद्देसुत बोलत होता की खुष झाले. ( तो चोर जावेद अख्तर ( आणि त्याची बायको ) अजिबात आवडत नाही ). त्यामुळे त्याला कुलगुरु नेमले तर चांगलेच होइल. तो शिकलेला आहे व्यवस्थित.

त्यामुळे सलीम खान ला तरी असे एकदम आल्तू फाल्तु करुन टाकु नका.

हारुन शेख Thu, 22/01/2015 - 11:05

In reply to by अनु राव

माफ करा पण 'आपला तो बाब्या' छाप आर्ग्युमेंट वाटले. तुमच्या मते बॅलंस्ड आणि रोखठोक विचार करणारा माणूस स्वतःच्या मुलाने दारू पिऊन लोकांच्या अंगावर गाड्या घालू नये इतकेही संस्कार करायला विसरला आहे. एक पटकथाकार / कलावंत म्हणून त्यांचा अधिकार मला मान्य आहे. मुद्देसुदही बोलत असतील पण मग बाकी लोकं चोर हेपण ऊगाचचं 'आल्तू फाल्तु'करण वाटतं.

अनु राव Thu, 22/01/2015 - 12:12

In reply to by हारुन शेख

बरोबर आहे, माझे आर्ग्युमेंट 'आपला तो बाब्या' छापच होते. कारण तुमचे पहीले आर्ग्युमेंट "आपला तो बाब्या" छाप होते.
तसेच जावेद अख्तर आणि त्याच्या बायको मला आवडत नाही हे खरेच आहे. आता नाही आवडत, काय करणार? कोण आवडेल सांगता थोडेच येते. मला तो माणुस फार्फार खोटा वाटतो. आत एक आणि बाहेर एक असा आणि पाँपस. आता असा का वाटतो, तर वाटतो मला त्याला बघितले की.

सलीम खान च्या मुलाला काँग्रेस सरकारने गेल्या १५ वर्षात का तुरुंग दाखवला नाही. बरे राज्य आणि केंद्र दोन्ही सरकार काँग्रेस् ची होती. त्यामुळे तुम्ही मौनीबाबांना हा प्रश्न विचारला पाहीजे. ( मॅडम ना विचारुन सांगतो असे ते म्हणतील ती गोष्ट वेगळी )

ऋषिकेश Thu, 22/01/2015 - 12:15

In reply to by अनु राव

त्यामुळे तुम्ही मौनीबाबांना हा प्रश्न विचारला पाहीजे

म्हणजे कोण?!मनमोहन सिंग की नरेंद्र मोदी?

अनु राव Thu, 22/01/2015 - 12:19

In reply to by ऋषिकेश

सलीम खान च्या मुलाला काँग्रेस सरकारने गेल्या १५ वर्षात का तुरुंग दाखवला नाही. बरे राज्य आणि केंद्र दोन्ही सरकार काँग्रेस् ची होती. त्यामुळे तुम्ही मौनीबाबांना हा प्रश्न विचारला पाहीजे. ( मॅडम ना विचारुन सांगतो असे ते म्हणतील ती गोष्ट वेगळी )

ऋषिकेश, तुमचा आयडी हॅक झाला आहे काय? पहील्या वाक्यातल्या संदर्भा वरुन आणि कंसातल्या वाक्यावरुन मौनीबाबा म्हणजे कोण अपेक्षात आहे हे कळत नसेल तर तुमच्या आय्डी नी नक्कीच कोणीतरी दुसरे लिहीते आहे.

अजो१२३ Thu, 22/01/2015 - 12:38

In reply to by अनु राव

ऋषिकेश आपण कसे संतुलित आहोत हे दाखवण्यासाठी हद्द करतो. इथे कोणाच्याही मनात नमो येणार नाही.

ऋषिकेश Thu, 22/01/2015 - 14:00

In reply to by अजो१२३

हे हल्ली माझ्याच नाही अनेकांच्या डोक्यात येऊ लागले आहे. नुसते डोक्यात नाही तर लोक त्यावर लिहू सुद्धा लागले आहेत
TOI ब्लॉग उदा १

अशियन एजः उदा २

इंडीया टुडे: उदा ३

काँग्रेसची प्रतिक्रीया इंडियन एक्सप्रेसमध्ये: उदा ४

अजूनही प्रत्येक वृत्तपत्रात व च्यानेलवरची लिंक देता येईल. (पटकन चाळले तर रेडीफ, एन्डीटीव्ही, फर्स्टपोस्ट (होय होय रिलायन्सने जे TV18 विकत घेतले त्या ग्रुपमधील) सर्वत्र यावर टिकात्मक लेख आहेत)

मोदींच्या मौनावरही मनमोहनसिंगांप्रमाणे भरपूर टिका झाली आहे. तेव्हा मनात अशी शंका न येणे मला सध्या काय चाललंय याची जाण/जाणीव नसल्याचे लक्षण वाटते.

नितिन थत्ते Thu, 22/01/2015 - 14:06

In reply to by ऋषिकेश

तुम्ही नवे मौनीबाबा असं म्हणायला हवं होतं.

तुम्ही दिलेल्या दुव्यापैकी पहिला केजरीवालचा आहे. त्यामुळे तो बाय डिफॉल्ट खारिज होतो. :)

अनु राव Thu, 22/01/2015 - 14:11

In reply to by ऋषिकेश

तुम्ही म्हणता तसे ऋषिकेश, मोदी सीलेक्टीव्हली मौन पाळत असतील, पण बाकी ९० टक्के विषयांवर ते बोलतच असतात ( त्यात अगदी गणपतीच्या प्लॅस्टिक सर्जरी पण आली ).

मौनीबाबा म्हणल्यावर मोदी समोर यावेत हे काही पटण्यासारखे नाही. उलट मधे तर Over Communication होतय म्हणुन ओरडाओरड चालली होती.

चिंतातुर जंतू Thu, 22/01/2015 - 14:15

In reply to by ऋषिकेश

इतकेच नव्हे, तर पंप्रना दहापैकी नऊ मार्क देणारे त्यांचे खंदे समर्थक जगदीश भगवतीसुद्धा म्हणताहेत की त्यांनी आपलं तोंड उचकटायला हवं -

प्रश्न : मोदींनी काय ठणकावून सांगावे, असे तुम्हाला वाटते?

भगवती : हिंदू धर्म हा इतरांचे बळजबरीने धर्मांतर घडवून आणत नाही. तो सर्वसमावेशक आहे. तुम्ही ख्रिश्चन किंवा मुस्लिम असला तरी आमचेच आहात, असे हिंदू धर्म सांगतो. धर्मांतर करण्याची संकल्पनाच मुळी संपूर्ण परकीय आहे. ती भारतीय नाही. हे त्यांनी संघाला सांगितले पाहिजे. ते जेव्हा अशा अर्थाचे बोलतील, तेव्हा त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न एवढाच आहे, की पंतप्रधान असे कधी बोलतील. सध्या अनेक गोष्टी चुकीच्या मार्गाने चालल्या आहेत.

नितिन थत्ते Thu, 22/01/2015 - 14:43

In reply to by चिंतातुर जंतू

काय राव ? बास का?

ती मुलाखत सागरिका घोष यांनी घेतली म्हटल्यावर त्यातला मजकूर पुन्हा बाय डिफॉल्ट खारिज होणार ना?

अनु राव Thu, 22/01/2015 - 14:54

In reply to by चिंतातुर जंतू

भगवतींना जे वाटते ते मोदींनी सांगावे असा हट्ट का? नसेल वाटत मोदींना तसे.

भगवतींनी हे समजुन घेतले पाहीजे की ज्यानी आपल्याला उचलुन वर ठेवले आहे त्याला वर बसुन खडे मारु नयेत. पुन्हा प्रोफेसरकी करायला लागेल. भाट म्हणुन ठेवलय, भाट म्हणुनच रहा.

सेन साहेबांचे काय झाले ते दिसत नाही का? आता "मोदी भारी" , "मोदी भारी" म्हणुन गाणी गातायत पण बुंद से गई वो हौद से नही आती.

अजो१२३ Thu, 22/01/2015 - 15:06

In reply to by अनु राव

अमर्त्या सेन सुधारला? लिंक द्या ना.
-------------
निवडणूकीच्या काळात संताप आला होता या स्वतःला शहाणा म्हणणार्‍या महागाढवांनी. ते अनंतमूर्ती का कृष्णमूर्ती म्हणे देश सोडून जाणार होते.
----------------------
चिंजीय प्रवृत्तीच्या लोकांनी सेक्यूलरीक्झमच्या नावाखाली या देशाच्या संस्कृतीचं ऑप्रेशन केले होतं. ते उलथाउन टाकून मेन स्ट्रीम संस्कृतीला पुन्हा आदरस्थान देण्याची बर्‍याच भारतीयांची मनीषा होती. त्याचं फलित म्हणून उजव्या विचारसरणीचं सरकार आलं. आजही ज्या देशात गीतेला लोकांच्या हृद्यात प्रचंड स्थान आहे तिथे चिंजिय प्रवृत्तीचे लोक तिचा आणि भारतीय शिक्षणाचा संबंध येणाची खिल्ली उडवतात. त्यांना त्यांची जागा दाखवून देणे गरजेचे होते. विकासाबरोबर हे डेस्परेशन देखिल मोदी सरकार येण्यासाठी कारणीभूत आहे.
तुम्ही मोप अधार्मिक, नास्तिक, सेक्यूलर, पुरोगामी, स्वतःचा सोडून दुसर्‍याचा धर्म जास्त समजून घेणारे, कामापेक्षा जास्त सहिष्णू, अहिंसावादी इ इ असाल, पण म्हणून त्याचा अर्थ सामान्य लोकांनी आपल्या अस्मिता मातीत गाडाव्या असे होत नाही. केवळ मुसलमान मुलांना सरस्वतीवंदना आवडत नाही म्हणून शाळेत सरस्वतीचे नाव पण घ्यायचे नाही हा कुठला आलाय सेल्यूलरीझम. आणि कोणी मुस्लिम शिक्षणाची देवता (किंवा अजून काय) असेल तर तिचाही एक धडा घाला अभ्यासक्रमात. कोणी काही म्हणणार नाही. पण आम्हला अमान्य ते सगळं सिस्टिमच्या बाहेर काढा (उदा. बस स्टँडच्या सरकारी म्यूझिक सिस्टिमवर वैष्णव जन तो हे गाणे वाजवू शकत नाही.) असा आडमुठा स्टँड गाढव मुसलमानांनी घेतला आणि महागाढव हिंदू सेक्यूलरांनी उचलून धरला. त्यामुळे देशाचं सांस्कृतिक कॅरॅक्टरच नष्ट होण्यावर बेतलेलं. आणि त्याला हे सेन, अनंतमूर्ती, याँ, त्याँ लोक फूस घालू लागले. जगात धार्मिकता प्रबल झाली कि महायुद्धे होतातच, महा नरसंहार होतोच असा काहीतरी जावईशोध यांना लागलेला. हिंदु धर्माचं एकही मेरिट मान्य करायला तयार नाहीत अन मग प्रगल्भतेच्या बाबतीत भारतीय इस्लाम तर यांचे मते सरळ गाढवाच्या .....

अनु राव Thu, 22/01/2015 - 15:11

In reply to by अजो१२३

माझ्या कडे पुरावे नसतात, पण ऐकलेल्या, वाचलेल्या, बघितलेल्या खास गोष्टी बरोबर लक्षात रहातात.

http://www.firstpost.com/business/economy/look-maa-amartya-sen-just-pra…

http://indianexpress.com/article/india/india-others/modi-has-brought-ho…

बॅटमॅन Thu, 22/01/2015 - 15:13

In reply to by अजो१२३

जगात धार्मिकता प्रबल झाली कि महायुद्धे होतातच, महा नरसंहार होतोच असा काहीतरी जावईशोध यांना लागलेला.

आजवरच्या इतिहासातली सर्वांत भीषण महायुद्धे अर्थात पहिले व दुसरे महायुद्ध- ही धर्माधारित कारणांसाठी झाली हा एक नवीन शोध लागलाय यांना.

तदुपरि सेकुलरांना त्यांची जागा दाखवली हे लै झाक झाले. पण ते अजून सुधरत नाहीत याचे कारण अ‍ॅकॅडेमिया अजून अशाच लोकांनी भरलेला आहे. ही अडगळ तिथून चालती होईल तो सुदिन.

अजो१२३ Thu, 22/01/2015 - 14:41

In reply to by ऋषिकेश

आरेसेसमध्ये कोणा मॅडमना घेतच नैत ना!

खाली तुम्ही ऋषिकेशीय प्रवृत्ती म्हणजे काय नि चिंजीय प्रवृत्ती म्हणजे काय ते विचारले आहे.

- आरेसेस मधे फक्त पुरुष असतात हेच तुम्हाला चूक वाटते. संतुलनाचा अत्याग्रह म्हणजे ऋषिकेशीय प्रवृत्ती. फक्त पुरुषांचे संघटन असण्यात कायदेशीर रित्या वा नैतिक रित्या काय चूक आहे? आरेसेस बायकांच्या जगात असण्याच्या विरोधात आहे का? "हिंदू पुरुषांना" एकत्र एवून काय झक मारायची ती मारू देत ना. ऐसीवर नाही का फक्त पुरोगामी लोक डॉमिनेट करत? तिथेही संतुलनाचा आग्रह का नाही धरत?

दुटप्पीपण तुम्हाला अधिकृतरित्या माफ हवा आहे? ते 'बोले तैसा...पाउले. माय फूट' चं तत्त्वज्ञान अजून ताजं आहे. आरेसेसची महिला केंद्रित इतकी संघटनं आहेत, तेव्हा असं काही वाटायला नको. शिवाय ते संजय जोशी सोडले तर (त्यांचंही लफडं होतं. बलात्कार नव्हता.) खास बायकांविरोधी धोरणे वा कार्यक्रम आरेसेस्ने केल्याचे स्मरत नाही. मग आरेसेस नि बायका एक्मेकांना का भिडवता? आकसापोटी एकूणात संतुलन पाहायचं नाही आणि नको तिथे संतुलनाचा आग्रह धरायचा, शिवाय दुटप्पीपणा रिकमेंड करायचा म्हणजे ऋषिकेशीय प्रवृत्ती.

नितिन थत्ते Thu, 22/01/2015 - 14:45

In reply to by अजो१२३

>>आरेसेसची महिला केंद्रित इतकी संघटनं आहेत, तेव्हा असं काही वाटायला नको.

हो हो.... असा ष्टॅण्ड घ्यायचा असतो तेव्हा राष्ट्रसेविका समिती ही संघाची संस्था असते. अन्यथा तिचा संघाशी काही संबंध नसतो.

नितिन थत्ते Thu, 22/01/2015 - 14:54

In reply to by अजो१२३

राष्ट्रसेविका समितीचा रा स्व संघाशी काही संबंध नाही असा खुलासा लोकसत्ता मध्ये वाचला आहे. म्हणून म्हटले (एरवी पण भाजप, विहिंप, रास्वसंघ या एकमेकांशी संबंधित नसलेल्या स्वतंत्र संघटना आहेत- भले तीच माणसे तीनही ठिकाणी दिसली तरी).

बॅटमॅन Thu, 22/01/2015 - 14:53

In reply to by अजो१२३

आता यावर "फक्त दुसर्‍यांकडून संतुलनाची अपेक्षा करून स्वतः वायझेडपणा करण्यात चूक काय आहे" अशा छापाचे प्रतिसादही येतीलच.

(दुखर्‍या श्रेणीदात्यांनो, प्रतिसाद इज़ ऑल युवर्स.)

घाटावरचे भट Thu, 22/01/2015 - 16:05

In reply to by बॅटमॅन

आता यावर "फक्त दुसर्‍यांकडून संतुलनाची अपेक्षा करून स्वतः वायझेडपणा करण्यात चूक काय आहे" अशा छापाचे प्रतिसादही येतीलच.

बॅटमॅन साहब, इसकोच बोल्ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य!!

चिंतातुर जंतू Thu, 22/01/2015 - 14:59

In reply to by अजो१२३

>> ऐसीवर नाही का फक्त पुरोगामी लोक डॉमिनेट करत?

रोज येणारे अरुण जोशींचे प्रतिसाद पाहता ऐसीवर अरुण जोशी डॉमिनेट करतात असं माझं प्रांजळ मत आहे. अरुण जोशी तुमच्या मते पुरोगामी आहेत का?

बॅटमॅन Thu, 22/01/2015 - 16:20

In reply to by चिंतातुर जंतू

वैयक्तिक टीकेपर्यंत घसरगुंडी झाल्याचे पाहून मजा वाटली. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

हारुन शेख Thu, 22/01/2015 - 17:59

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेशीय प्रवृत्ती , चिंजीय प्रवृत्ती , सिकुलर जंतू असल्या वैयक्तिक टीकेची सुरुवात अजोंनी केलीय असे निरीक्षण नोंदवतो.

बॅटमॅन Thu, 22/01/2015 - 18:01

In reply to by हारुन शेख

अच्छा..म्हणजे अजोंनी गाय मारली (शांतं पापं!) तर बाकीच्यांनी वासरू मारलं तर काय इशेश असं म्हणायचंय का?

अजो१२३ Thu, 22/01/2015 - 18:42

In reply to by हारुन शेख

माझ्या गावकरी मनाला हे "वैयक्तिक टिकेचं" प्रकरण कधीच उमगलं नाही. टिका ही वैयक्तिकच असणार ना? जी मतं येतं आहेत ती चिंज नावाच्या स्पीकरमधून थोडीच येताहेत? चिंज नावाचा प्राणी एकच असताना (वैयक्तिक टिका टाळण्यासाठी) नक्की कोणती टिका करावी आणि कोणती टाळावी?

अजो१२३ Thu, 22/01/2015 - 18:44

In reply to by हारुन शेख

मी वैयक्तिक टिका करायच्या पक्षाचा आहे. ज्या व्यक्तिने जे मत मांडले आहे त्याला ती जबाबदार असते. मग टिका ही त्या व्यक्तिवरच होणार कारण ते मत, विचार, एक्सप्रेशन निर्जीव असते.
---------------
अयोग्य टिका करू नये हे मला मान्य आहे.

चिंतातुर जंतू Thu, 22/01/2015 - 18:53

In reply to by अजो१२३

गंमत म्हणजे 'ऐसीवर फक्त पुरोगामी लोकच डॉमिनेट करतात' ह्या तुमच्या विधानावर मी फक्त एवढंच म्हटलं, की तुम्ही ऐसीवर जे (संख्येनं आणि आकारानं पुष्कळ असे) प्रतिसाद देता, त्यवरून ऐसीवर तर तुम्ही डॉमिनेट करता असं मला वाटतं. ह्यात मी टीका करत नव्हतो, तर समोर जे दिसतं त्यावरून मला जे वाटतं त्याबद्दल तुमचं मत / इंटरप्रीटेशन मी विचारत होतो. त्यामुळे वरचा व्यक्तिगत टीकेचा मुद्दा मला समजलेलाच नाही.

अजो१२३ Thu, 22/01/2015 - 19:24

In reply to by चिंतातुर जंतू

व्यक्तिगत टिकेचा मुद्दा तुम्हाला किंवा मला लागू नाही. व्यक्तिगत टिका न करणे म्हणजे नक्की काय करणे हे मला कळत नाही असे मी शेखसायबांना म्हणालो.
-------------------------
बाकी संख्येचा आणि आकाराचा मुद्दा पटला. माझ्या कंपनीत देखिल मीच डॉमिनेट करतो. माझा सीइओ माझ्यापेक्षा कमी अक्षरे लिहितो, बोलतो, इ इ.

अनु राव Thu, 22/01/2015 - 19:06

In reply to by अजो१२३

मी वैयक्तिक टिका करायच्या पक्षाचा आहे. ज्या व्यक्तिने जे मत मांडले आहे त्याला ती जबाबदार असते.

पूर्ण सहमत.

अयोग्य टिका करू नये हे मला मान्य आहे.

व्याख्या काय? नियम काय अयोग्य ठरवायचे?

अजो१२३ Thu, 22/01/2015 - 16:23

In reply to by चिंतातुर जंतू

मी केव्हाचा म्हणालो आहे कि पुरोगामीत्व हे कल्याणकारी, मानवी, मंगल, सुसह्य, शाश्वत, इ इ असावे. ऐसीवरचे पुरोगामीत्व असे नाही म्हणून मी स्वयंघोषीत प्रतिगामी आहे.

ऋषिकेश Thu, 22/01/2015 - 16:59

In reply to by अजो१२३

वॉव!

महात्मा गांधी (यांचा गांधीवाद), सावरकरांचा (सावरकरी हिंदूत्त्ववाद) आणि आंबेडकरांचा (आंबेडकरवाद/विचारसरणी) जशी होती तशी आमच्या प्रतिसादांचा/लेखनाचा इतका अभ्यास कोणीतरी करतंय नी त्यावर विचार वैग्रे करून चक्क एकसंध भासावी अशी खास आपल्या नावाची डिफाइन्ड 'प्रवृत्ती' जन्मास आलीये - त्याची डेफिनेन्शही आता आल्यात - हे पाहून अभिमानाने गुदगुल्या झाल्या. आपल्या लेखनाचा इतका अभ्यास कोणी करावा इतके ते महत्त्वाचे असून त्याचा अभ्यास झालाय याचं कित्ती कित्ती अप्रूप वाटतंय म्हणून सांगू! मनःपूर्वक आभार!

याच वेगात हे चालु राहिले तर लवकरच ऋषिकेशीय प्रवृत्ती सामाजिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात लावली जातील अशी स्वप्नेही पडू लागली आहेत.

===

मी सगळंच वरवर नी तेवढ्यापुरतंच वाचत असल्याने (व कदाचित तेवढी (किंवा खरंतर "तशी") समज/बुद्धीमत्ता नसल्याने) मला तर अजोंबद्दल दोन वाक्यही लिहिता यायची नाहीत. :(. क्षमस्व!

अजो१२३ Wed, 21/01/2015 - 23:50

In reply to by हारुन शेख

मग काँग्रेस आणि भाजप यांच्यात फरक कुठे राहिला ?

मागे तुम्ही दगडापेक्षा वीट मऊ (भाजपपेक्षा काँग्रेस बरी) असे म्हणाला होता. आज तुम्हाला भाजप किंचित बरी असायला पाहिजे पण नाही असे वाटतेय. बादवे, प्रत्यक्ष सरकारात काम करण्याचा अनुभव असेल तर कळेल कि सरकार चालवायला निष्पक्ष लोक देशात नाहीतच आणि विरोधी पक्षाचा माणूस प्रचंड महागात पडतो.

शिवाय सगळी पार्श्वभूमी सांगा ना
http://timesofindia.indiatimes.com/home/stoi/deep-focus/Zafar-Sareshwal…
-

Sareshwala's own leap of faith has been a long one — back in 2002, he was among Modi's fiercest critics though the only losses he suffered during the 2002 Gujarat riots were financial. A mechanical engineering graduate and expert in Islamic finance and banking, he was working in England at the time, but Parsoli Corp, an Islamic investment company he had set up in Ahmedabad with his two younger brothers, incurred losses of Rs 3.8 crore. Their industrial valve manufacturing factory was also burnt down, and the wealthy Sareshwalas, once among the largest zakat (charitable tax) donors in the community, found themselves in dire straits.

Back in the UK, Sareshwala joined a group of activists planning a suit against Modi in the UN-affiliated International Court of Justice. He even contemplated moving his family to England. Ironically, it was Modi who made him rethink his plan. "Kya wahan angrezon ki ghulami karte rahoge. (How long will you serve the British) You are needed in India," Modi had said to him during a phone conversation in 2005.

मोदींनी एक अनुयायी बनवला आहे. त्याला वापरलं तर चुकलं काय?

हारुन शेख Thu, 22/01/2015 - 11:12

In reply to by अजो१२३

अजो, जफर सरेशवाला यांच्यापुर्वी कुलगुरू असलेल्या सईदा सय्यदैन हमीद या सर्व दृष्टिने पात्र होत्या असे माझे मत आहे. स्त्रियांसाठी आणि विशेषकरून मुस्लिम स्त्रियांसाठी त्यांनी केलेले सामाजिक काम मोठे आहे. काँग्रेस सरकारच्या काळात त्या कुलगुरू होत्या हे पाहता दगडापेक्षा वीट मऊ (भाजपपेक्षा काँग्रेस बरी) हे मानायला काही हरकत नसावी असे वाटते.

केवळ स्तुतिपाठक असण्यापलीकडे जफर सरेशवाला यांचा कुलगुरुपदी बसण्याचा अधिकार काय? माझा आक्षेप यालाच आहे. ते जर कुलगुरुपदी बसण्यास लायक असते तर मी त्यांच्या स्तुतिपाठक असण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले असते. तसे आहे का ?

अनु राव Thu, 22/01/2015 - 12:06

In reply to by हारुन शेख

सरकार चालवायला निष्पक्ष लोक देशात नाहीतच

सरकार नी निष्पक्ष असावे ही अपेक्षाच चुकीची आहे. काहीतरी वेगळी मते आहेत म्हणुन वेगवेगळे पक्ष आहेत. नाहीतर फक्त नोकरशाही सुद्धा घटना आणि पिनल कोड नी सरकार चालवु शकेल.

अजो१२३ Thu, 22/01/2015 - 12:36

In reply to by अनु राव

सरकार नी निष्पक्ष असावे ही अपेक्षाच चुकीची आहे.

अपेक्षा योग्य आहे. सरकारे बदलतात तेव्हा व्यवस्था एकाच पक्षाच्या बाजूची झाली तर पंचाईत होईल. निष्पक्ष व्यवस्था जे सरकार आहे त्याचे काम करेल.

अनु राव Thu, 22/01/2015 - 12:18

In reply to by हारुन शेख

कोणत्याही सरकार ला एखादे मत, विचार धरुन चालण्याची मुभा आहे. त्या मताला आणि विचाराला प्रपोगेट करणारी लोक नेमणे हे पण सरकारचे काम आहे आणि ते बरोबरच आहे.

अजुन एक, माझ्या मते सेंसॉर बोर्ड, कुलगुरु वगैरे फक्त दिखावू पदे आहेत.
ज्यांनी मोदींच्या वाईट काळात त्यांना साथ दिली, त्यांना जर काही मानाचे पद दिले तर बिघडले कुठे. हा प्रश्न लीला सॅमसन नेमल्या गेल्या तेंव्हा विचारला नाहीत.

असले प्रश्न जर तुम्ही कायमच विचारत असता तर तुम्ही अन्-बायस्ड आहात असे तरी म्हणता आले असते. पण गेल्या ६ महीन्यातच असले प्रश्न पडणे शंकास्पद आहे.

हारुनमियाँ,
समस्या अशी आहे कि खूप चांगले काम करणारे किंवा करू शकणारे मुस्लिम लोक खूप आहेत पण ते सगळे (झाडून म्हणता येईल) मोदीद्वेष्टे आहेत. हे लोक कधीही सरकारचा पचका करू शकतात. अकार्यक्षमतेपेक्षा असा पचका प्रचंड महागात पडतो. सॅमसन बाईंचे उदाहरण घ्या. त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल बीजेपीला बोलायला जागा नाही, पण सरकारचे प्रचंड नुकसान करून गेल्यात. चिंजीय प्रवृतीच्या लोकांना मुद्दे वाटत.

ऋषिकेश Thu, 22/01/2015 - 14:08

In reply to by अजो१२३

चिंजीय प्रवृतीच्या लोकांना मुद्दे वाटत.

अरे वा नवी प्रवृत्ती आली! :)
यात नी ऋषिकेशीय प्रवृत्तीत नेमका फरक काय? :P

हारुन शेख Thu, 22/01/2015 - 18:00

In reply to by नितिन थत्ते

तसे नाहीये असे नम्रपणे सांगू इच्छितो तसे पहिले तर नावात रून / रुण असे साम्य असल्यामुळे खरंतर मी त्यांचा ऋणी आहे पण त्याने काय होतं ? त्यांची शक्ती थोर. मी पामर .