Skip to main content

ही बातमी समजली का? - ४२

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढण्यात येईल.

=======

या वर्षीचे नोबेल पुरस्कार जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. वैद्यकातला नोबेल मेंदूवर संशोधन करणाऱ्या तीन शास्त्रज्ञांना जाहीर झाला आहे.
Nobel Prize for medicine goes to discoverers of brain’s 'inner GPS'

मणिकर्णिका Mon, 06/10/2014 - 23:51

४-८ ऑक्टोबर या कालावधीमध्ये एनसीपीएच्या लिटील थेटरमध्ये ’नवे वळण’ हा मराठी चित्रपट महोत्सव सुरू आहे. सद्य वर्ष हे या महोत्सवाचे ६वे वर्ष होते.

गेल्या तीन दिवसांमध्ये आजोबा, अनवट, पोस्टकार्ड, दुसरी गोष्ट हे चित्रपट दाखवण्यात आले. उद्या संध्याकाळी ६:३० वाजता श्रीहरी साठेचा बहुचर्चित ’एक हजाराची नोट’ हा चित्रपट दाखवला जाणार आहे. इच्छुकांनी जरूर लाभ घ्यावा. प्रवेश मोफ़त आहे.

प्रत्येक स्क्रिनिंगनंतर होणा-या ’चौराहा’मध्ये चित्रपटातल्या कलाकार मंडळींना आणि दिग्दर्शकाला प्रश्न विचारण्याची संधी मिळेल. परवा नागराज मंजुळेचा ’फ़ॅंड्री’ दाखवला जाईल. हा चित्रपट न पाहिलेल्यांनी वेळ असल्यास जरूर पाहावा.

महोत्सवाच्या या पर्वामध्ये मराठी चित्रपटामध्ये इंग्रजी सबटायटल्स दाखवली जाणार आहेत. त्यामुळे आपल्या अमराठी मित्रांना घेऊन जाता आल्यास उत्तम.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 07/10/2014 - 08:25

वेंडी डॉनिजर आणि 'स्मगलिंग'

“In the Indian tradition, there was no idea of censure, of people saying, ‘You can’t say what you believe,’” Doniger said. “There are no precedents for that historically.”

She added, “Catholics, sure, they burned books…Indians never burned books. This is a bad, new thing for India.”

गब्बर सिंग Tue, 07/10/2014 - 14:58

http://timesofindia.indiatimes.com/maharashtra-news/Narendra-Modi-and-h…

मोदी व त्यांचे मंत्रिमंडल म्हंजे अफजल खानाची सेना.

पण महाराष्ट्राचे विभाजन दोन राज्यांत झाले तर नेमकी काय समस्या आहे ???????

मन Tue, 07/10/2014 - 15:04

In reply to by गब्बर सिंग

लोकसंख्येच्या रेशोमध्ये सरकारचा आकार वाढतो ना भो.
इतरांना नाही; पण तुला तरी समस्या असायला हवी ना ह्यात.
सरकारवर किती खर्च करणार तो

मन Wed, 08/10/2014 - 12:13

In reply to by गब्बर सिंग

असेलही.
विकेंद्रीकरणात तुला काय काय अपेक्षित आहे ते ठौक नै.
पण इन जनरल ती विकेंद्रीकरणाच्या जवळ जाणारीच संकल्पना आहे.
.
.
पण त्याबदल्यात तुलनेने सरकारचा आकार वाढणे हे तुला मंजूर आहे का ?
सरकारला थेट व्हिजिबिलिटी जास्त येते; ते अधिक नियंत्रण ठेवू पाहते.

गब्बर सिंग Wed, 08/10/2014 - 12:34

In reply to by मन

पण त्याबदल्यात तुलनेने सरकारचा आकार वाढणे हे तुला मंजूर आहे का ?

राज्य विभाजन म्हंजे रेव्हेन्यु विभाजन. एक्स्पेंडिच्युअर विभाजन. यू लूज सिनर्जीज. - तुझा मुद्दा मान्य.

पण - राज्य विभाजन म्हंजे क्रॉस सबसिडायझेशन च्या संधी कमी, फोकस्ड काम करण्याची सरकारवर जबाबदारी जास्त.

राज्य मोठे राखणे हे राज्यकर्त्यांच्या हिताचे जास्त असते. त्यांना एम्पायर बिल्डिंग ची संधी जास्त.

मन Tue, 14/10/2014 - 18:16

In reply to by गब्बर सिंग

हां, हा ष्ट्यांड consistent वाटतो तुझ्या एकूण भूमिकेशी.
क्रॉस सबसिडायझेशन ही समस्या आहे हे ही मान्य.
(माझ्या समजुतीनुसार ढोबळ मानानं क्रॉस सबसिडायझेशन म्हणजे काय तर
नागपूरने आसपसच्या विभागातला कर/महसूल गोळा करायचा, मुंबैला पाठवायचा;
मराटह्वाडा एरियातला महसूल औरंगाबादहून मुंबैला पोचणार, तसच उत्तर महारआश्ट्र,
दक्षिण महाराश्ट्र इथेही कर व महसूल जमा करुन मुंबैला पाठवायचा.
सगळं जे गोळा झालय; त्याचं मुंबैहून पुनर्वाटप होणार.
म्हणजे एखाद्या विभागानं एक हजार पाटह्वले, दुसर्‍अयनं पाच हजार, आणि तिसर्‍यानं पंधरा हजार जरी पाठवले
तरी पुनर्वाटपाच्या प्रक्रियेनंतर त्यांना त्याच प्रमाणात्/त्याच रेशोमध्ये पैसे मिळणार नाहित.
तुम्ही कमी पैसे पाठवले पण राजकियदृष्ट्या दांडागे असाल तर अधिक पैसे चापू शकता.
( किम्वा विविध योजनांचं डिसप्रपोर्शनेट लोणी ओढू शकता.)
.
.
हा अर्थ आहे असं मानतो.
मग तुझा मुद्दा तार्किक आहे; जिथला पैसा तिथेच वापरला गेला पाहिजे.
.
.
मान्यही करावा वआततो.
पण शंका एकच.
.
.
जर हे असच आहे, तर जागतिक इतिहासात व्यापार, समृद्धी नेहमी एखाद्या शक्तीशाली साम्राज्याच्या आश्रायानच का झाली ?
तेव्हाही हे राजधानीमध्ये संपत्तीचं केम्द्रिकरण नि मग पुनर्वाटप होतच होतं ना ?
.
भूमध्य समुद्राचं उदाह्रण घे इस पूर्व तीनेक शतकपूर्वीचं.
अनेकानेक सत्ता तिथं होत्या.
उत्तर आफ्रिकेत कार्थेजचे राज्य होते. समुद्रापलीकडील इटालीत रोमन राज्य/रिपब्लिक होते (अजून साम्राज्य व्हायचे होते.)
कार्थेजच्या पूर्वेला अनेकानेक अजून लहान राज्ये होती. टर्की मध्ये स्वतंत्र काही टोळ्या होत्या.
व ह्या सर्वांच्या पूर्वेला पर्शिया हे तेवढे साम्राज्य म्हणता यवे असे होते.
.
.
पण पुढील एखाद दोन शतकातच रोमन साम्राज्याने जवळजवळ आजचा आख्खा पश्चिम युरोप व मध्य युरोपचा काही भाग, पूर्व युरोपचा काही भाग,
आख्खी उत्तर आफ्रिका, पश्चिम आशियाचा बराच भाग (आजच्या अरब जगताचा) टाचेखाली आणला.
एकसलग सत्ता इतक्या मोठ्या भागात आली. व त्यानंतर व्यापार उदीम फळफळला.
.
.
हे असेच उदाहरण एकछत्री चायनीज साम्राज्याचे (विशेषतः तांग राज्वट वगैरे) व नंतर अफ्फाट पसरलेल्या मंगोलियन साम्राज्य
व सुरुवातीच्या अकळातले इस्लामी साम्राज्ये (उमय्यद व अब्बासिद) देता यावे.
ह्या सर्वांच्या काळात व्यापाराची भरभराट झाली.
.
.
तेव्हा क्रॉस सबसिडायझेशन झालं नसावं का ?
की समृद्धीच्या रस्त्यात आलं नसावं ?

वामा१००-वाचनमा… Tue, 07/10/2014 - 17:26

In reply to by गब्बर सिंग

पण महाराष्ट्राचे विभाजन दोन राज्यांत झाले तर नेमकी काय समस्या आहे ???????

कशाला हवीये दुफळी न २ राज्यं? तुला काहीच कसं वाटत नाही असे प्रश्न विचारताना? :(

मन Tue, 07/10/2014 - 17:27

In reply to by वामा१००-वाचनमा…

मेक्सिको-कोलंबिया-क्यूबा वगैरेही अमेरिकेत सामील करुन एकच देश बनवून टाका.
ठेवायचेत कशाला वेगवेगळे देश ?

बॅटमॅन Tue, 07/10/2014 - 17:34

In reply to by मन

महाराष्ट्राचं विभाजन होऊद्या म्हणतानाही लोकांना काही वाटत नाही...

अरे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा??????????????????????????????

नितिन थत्ते Wed, 08/10/2014 - 06:09

In reply to by बॅटमॅन

वेगळा विदर्भ हे भाजपच्या अजेंड्यावर गेली कित्येक वर्षे आहे.
मोदी आता महाराष्ट्राचे विभाजन होणार नाही असे म्हणतायत.

बॅटमॅन Wed, 08/10/2014 - 10:02

In reply to by नितिन थत्ते

दुसरे वाक्य न्यूजमध्ये ऐकून माहिती आहे. पण पहिले वाक्य मी आजच ऐकतोय. रादर या आधी कधी ऐकण्यात-वाचनात आले नाही.

नितिन थत्ते Wed, 08/10/2014 - 11:18

In reply to by बॅटमॅन

http://www.asianage.com/mumbai/devendra-fadnavis-contradicts-pm-modi-vi…

http://indiatoday.intoday.in/story/bjp-and-shiv-sena-split-over-vidarbh…

http://www.mumbaimirror.com/mumbai/others/BJP-stirs-Vidarbha-pot-raises…

http://timesofindia.indiatimes.com/news/Gadkari-releases-own-manifesto-…

आधी कधी वाचण्यात ऐकण्यात आले नाही हे रोचक आहे.

http://bjpelectionmanifesto.com/pdf/manifesto1998.pdf

येथे पृष्ठ क्र. ५ वर पॉईंट नं ३ पहा

ता. क. : विदर्भ किंवा कोणताही प्रदेश वेगळे राज्य मागत असेल तर द्यायला माझा विरोध नाही.

मन Wed, 08/10/2014 - 10:22

In reply to by बॅटमॅन

पहिल्या वाक्याबद्दल :-
वेगळा विदर्भच हवा असे नाही; एकूणातच भाजपची पक्ष म्हणून जी पॉलिसी आहे ती लहान व मध्यम राज्ये अस्तित्वात आणण्याबद्दल आहे.
अवांतर :-
मला स्वतःला त्यात फारसे काही चूक वाटत नाही प्रशासकीय दृष्टीकोनातून.
"आख्खा महाराश्ट्र एक ठेवला पाहिजे" ही भावना "आख्ख्या महाराष्ट्रात" असेल तर एक ठेवा.
"काही भागात" वेगळे राज्य हवे असेल व व्यवहार्य असेल तर काही भाग वेगळा राज्य करा.
.
.
मूळचा उत्तरप्रदेश हा स्वतंत्र देश म्हणून गणला तर तो जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या मानान आठवा नववा देश असेल (एकूण १९० देशांतील १८० देशांहून अधिक लोकसंख्येचा).
मग प्रशासनावर ताण येतोच.(विशेषतः प्रामाणिकपणेकाम करु पाहणार्‍यास काम आवाक्याबाहेरचे आहे असे लक्षात येते; गैरमार्गास मग माणसे उद्युक्त होतात वगैरे.असो.)
पर्रिकर काय किंवा इतर नेते काय ह्यांच्या मुलाखती पाहिल्या तर भाजपचा कल हा लहान राज्ये करण्यावर आहे हे त्यांनी उघड सांगितले आहे.
अर्थात लहान म्हणजे अगदिच गोवा वगैरेइतकी लहान नकोत; साधारणतः एक ढोबळ आकडाच द्यायचा तर दोन ते पाच कोटी वगैरे लोकसंख्या एका राज्यात व्यवस्थित
म्यानेज करता येते असे ही माणसे म्हणतात.(छत्त्तीसगड वगैरे ठाकठीक आकाराची राज्ये आअहेत त्यांच्या अपेक्षेनुसार. फार लहानही नाहित्;फार मोठीही नाहित.)
त्याहून जितके अधिक होइल तितके ते जड होते.
.
.
.
अगदि काश्मीरच्या त्रिभाजनाचा विचारही वाजपेयींच्या काळात केला गेला होता. नंतर काही कारणानं गुंडाळून ठेवला.
छत्तीसगड, पूर्वीचे वनांचल (आताचे झारखंड), पूर्वीचे उत्तरांचल (आताचे उत्तराखंड) ही राज्ये वाजपेयी काळातच प्रत्यक्षात आली.
(त्यांच्या संकल्पना पूर्वीपासूनच होत्या ; मागणी वगैरे होती; असे म्हटले जाउ शकतो.
पण वाजपेयी सरकारनं फार काही अडवून न धरता ते सुरळीतपणे वेगळे काढून दिले ही फ्याक्ट राहतेच.
मुख्य म्हंजे त्या प्रश्नांचा तेलंगण केला नाही ; हे फारच बरे झाले.
)
.
.
.
संघ विरोधकांचा आरोप आहे की लहान राज्यात संघाला तळागाळात अधिक पकड बनवणे सोपे जाते.
हे संघ खरच करतो का ठाउक नाही. हे लहान राज्यातच सोपे का पडत असावे ह्याचीही कल्पना नाही.
संघ हे लहान राज्यांचे काम भाजपच्या हस्ते करवून घेतो वगैरे आरोप.
.
.

'न'वी बाजू Sat, 11/10/2014 - 22:41

In reply to by बॅटमॅन

महाराष्ट्राचं विभाजन होऊद्या म्हणतानाही लोकांना काही वाटत नाही...

अरे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा??????????????????????????????

रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन झाले. (रत्नागिरी + सिंधुदुर्ग.) चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन झाले. (चंद्रपूर + गडचिरोली.) औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन झाले. (औरंगाबाद + जालना.) उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन झाले. (उस्मानाबाद + लातूर.) फार कशाला, परवापरवा ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन आमच्या पालींसाठी पालघर जिल्हा अलग झाला.

नेमके कोणाचे काय बिघडले?

फार कशाला, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, झालेच तर बिहारचेही विभाजन झालेच की. काय बिघडले?

गब्बर सिंग Sun, 12/10/2014 - 13:46

In reply to by बॅटमॅन

राज्यांतर्गत काही होणे अन राज्याचे तुकडे होणे यात फरक आहे इतके बोलून खाली बसतो.

खाली बसला आहेस हे ठीक आहे.

पण परत ऊठ व हे सांग - की जो काही फरक आहे तो विदर्भास व उर्वरित महाराष्ट्रास पृथक पृथक नुकसानकारक (किंवा फायदेजनक) कसा आहे.

१) What are the estimated dis-synergies of the split-off?
२) वेगळ्या शब्दात - HP, Ebay, Symantec - all of them are splitting themselves (into two). Why not Maharashtra ?
(आता लगेच महाराष्ट्र म्हंजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नैय्ये - असा जबरदस्त युक्तिवाद अपेक्षित.)

बॅटमॅन Sun, 12/10/2014 - 15:17

In reply to by गब्बर सिंग

छोटी राज्ये झाली की फायदे होतात याचे नक्की किती पुरावे आहेत एक उत्तराखंड सोडून? झारखंड काय नि छत्तीसगड काय. ते एकुणात खरं दिसत नाही, सबब राज्याचे तुकडे होणे नको असे वाटते.

गब्बर सिंग Wed, 08/10/2014 - 08:24

http://timesofindia.indiatimes.com/india/With-Narendra-Modi-in-drivers-…

मोदींच्या अमेरिका दौर्‍याची मस्त बाजू.

हे मला लई आवडले -

Less noticed was Modi's meeting with 13 leaders of the American Jewish community representing seven organizations. The India-US relationship has traditionally received strong support from the powerful Jewish community in the US. By meeting Israeli Prime Minister Benjamin Netanyahu in New York, Modi discarded with the secretive nature of the India-Israel relationship. It brought the Jewish leaders more securely on to India's corner of the game.

ऋषिकेश Wed, 08/10/2014 - 09:14

In reply to by गब्बर सिंग

हा वार्तांकनातील दोष आहे.
राव सरकारने इस्रायल बरोबर संबंध प्रस्थापित केले. वाजपेयींनी उघड भेटी सुरू केल्या. वाजपेयींपासून कोणत्याही पंतप्रधानांची "सिक्रेटिव्ह" नेचर ठेवलेलं नाही. इस्रायल आता भारताचा दुसरा मोठा डिफेन्स पार्टनर आहे. मोदी आल्याच्या ४ महिन्यात हे नक्कीच झालेलं नाही नै का?

उगाच काय कसलंही क्रेडीट द्यायचं ते!

गब्बर सिंग Wed, 08/10/2014 - 09:30

In reply to by ऋषिकेश

मुद्दा एकदम मान्य.

वाजपेयींच्या कालात तर अ‍ॅवॅक्स सारख्या फोर्स मल्टिप्लायर चे डील झाले होते ... इस्रायल बरोबर.

--

एरियल शरॉन आज इस्रायलचे पंतप्रधान असते तर आणखी मजा आली असती.

गब्बर सिंग Wed, 08/10/2014 - 09:40

http://www.pewforum.org/2013/04/30/the-worlds-muslims-religion-politics…

Overwhelming percentages of Muslims in many countries want Islamic law (sharia) to be the official law of the land, according to a worldwide survey by the Pew Research Center. But many supporters of sharia say it should apply only to their country’s Muslim population.

पण शारिया कायदा इतका वादग्रस्त का आहे ? त्यात नेमक्या अशा काय तरतूदी आहेत की ज्या खटकणार्‍या किंवा अँटी मॉडर्न आहेत ???

मन Wed, 08/10/2014 - 09:44

In reply to by गब्बर सिंग

प्रश्न उचकावणारा वाटला.
शरियाबद्दल विपुल माहिती गूगलबाबावर सहज उपलब्ध आहे.
शिवाय गब्बरल शरियाबद्दल फारसे माहित नसावे ह्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.
शरियाबद्दल हिंट --
शरिया म्हणजे इस्लामच्या राजवटीतले कायदे. हे कायदे बनवले गेले तेव्हा मध्ययुग सुरु होतं.
तेव्हाच्या आणि आताच्या संकल्पना; ह्यातली साम्ये-फरक ह्याबद्दल तुम्हाला आयडिया असेलच.

गब्बर सिंग Wed, 08/10/2014 - 11:08

In reply to by मन

शिवाय गब्बरल शरियाबद्दल फारसे माहित नसावे ह्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

हा विचार तुझ्या मनात येणार आहे हे गब्बर ला माहीती होतेच की.

बॅटमॅन Wed, 08/10/2014 - 12:14

औटडेटेड जाहलेले जवळपास ३०० कायदे आता केंद्र बदलणार.

http://ibnlive.in.com/news/centre-to-repeal-nearly-300-outdated-laws/50…

हा आकडा कुठे ३६, कुठे १००, तर कुठे ३०० आणि एके ठिकाणी ९८७ असा आहे. कमीतकमी फिगर ३६ मानली तरी इलेक्षन प्रॉमिसला अनुसरून यांची पूर्तता केली जातेय हे एक स्वागतार्ह पाऊल मानावयास हरकत नाही.

बॅटमॅन Wed, 08/10/2014 - 15:12

In reply to by ऋषिकेश

नै म्हंजे निव्वळ ट्यार्पी द्यायचा नाही या कारणाकरिता जर महत्त्वाच्या बातम्यांवर मत व्यक्त करायचे नसेल तर हे अनिष्ट आहे.

ऋषिकेश Thu, 09/10/2014 - 16:27

शादी.कॉम वर फ्सवणूक
याबातमीतील पुढिल परिच्छेद लक्षवेधक वाटला

संकेतस्थळावर टाकल्या जाणाऱ्या प्रोफाइलची विश्वासार्हता जपण्याची जबाबदारी संबंधित संकेतस्थळानेच घेतली पाहिजे, असे स्पष्ट करीत नोटीस बजावली जाणार आहे.

हे कितपत योग्य + फिजिबल असावे असे वाटते?
नी हा नियम सर्व सोशल नेटवर्किंगला लावायची सक्ती होऊ शकेल असे वाटते का? आणि व्हावी का?

मी Thu, 09/10/2014 - 17:48

In reply to by ऋषिकेश

असे होऊ नये, परिणाम भोगण्याची तयारी चुक करणार्‍याची असावी, संस्थळाने पुरेसे श्रेयअव्हेर पुरवावे.

अवांतर - ते काय का असेना - मी कट्ट्याचे आश्वासन कोणालाही दिलेले नाही, उगाच ससेमिरा नको मागे.

वामा१००-वाचनमा… Thu, 09/10/2014 - 17:50

In reply to by मी

आँ लब्बॉड "मी", कोण मागे लागलय हो तुमच्या की कट्ट्याला याच याच म्हणून??? नाव तरी कळू देत ;)

मी Thu, 09/10/2014 - 18:22

In reply to by वामा१००-वाचनमा…

हॅहॅ, तुम्ही स्वतःला लब्बॉड म्हणवुन घेता? उद्या कुठलाही कट्टकरी म्हंटला की ब्वा गैरसोय झाली कारण मी आलाच नाय तर काय घ्या ;)

गब्बर सिंग Thu, 09/10/2014 - 19:06

In reply to by ऋषिकेश

सायबर सेलने किरणला अटक केली असली तरी असे बनावट प्रोफाइल टाकू देणाऱ्या 'शादी डॉट कॉम'वरही कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. संकेतस्थळावर टाकल्या जाणाऱ्या प्रोफाइलची विश्वासार्हता जपण्याची जबाबदारी संबंधित संकेतस्थळानेच घेतली पाहिजे, असे स्पष्ट करीत नोटीस बजावली जाणार आहे.

ही नोटिस बजावणे अति-अवास्तव आहे.

While it is in the interest of the website to make provisions for generating confidence - Shadi.com is not a background verification services provider company and nor do they claim to be so.

नंदन Thu, 09/10/2014 - 17:52

फ्रेंच लेखक पॅट्रिक मोडियानो यांना जाहीर - http://www.npr.org/blogs/thetwo-way/2014/10/09/354790819/literature-nob…

लेखातला काही भागः

Only six of Modiano's more than 40 works have made their way into English. Night Rounds — his second novel, and the first in English — A Trace of Malice and Missing Person are among the few that have been translated. In these novels, as in much of his work, the troublesome questions of memory and Jewish identity are thrust to the fore — a fact that has drawn occasional comparisons between Modiano and another great French novelist, Marcel Proust.

The Telegraph reports that "Modiano was born in a west Paris suburb two months after World War II ended in Europe in July 1945. His father was of Jewish Italian origins and met his Belgian actress mother during the occupation of Paris — and his beginnings have strongly influenced his writing." Modiano still lives in Paris, and the city continues to play a central role in his fiction.

वामा१००-वाचनमा… Thu, 09/10/2014 - 17:54

नायजेरीया ने "देशव्यापी आणीबाणी" जाहीर करुन, यशस्वीरीत्या इबोला आटोक्यात आणला. ऑगस्ट पासून आतापर्यंत एकही केस आढळली नाही.

http://www.usatoday.com/story/news/world/2014/10/08/ebola-nigeria-lagos…

ऋषिकेश Fri, 10/10/2014 - 08:45

In reply to by वामा१००-वाचनमा…

अभिनंदनीय बातमी आहे.
प्रोव्हायडेड त्या आणिबाणीच्या निमित्ताने रोगाला संबंधित नसलेली बंधनेही नागरीकांवर लादली गेली नसतील किंवा दूरगामी परिणाम करणारे/नागरीकांचे मुलभूत हक्क डावलणारे बदल कायद्यात झाले नसतील!

मन Fri, 10/10/2014 - 09:58

In reply to by गब्बर सिंग

अवांतर (ह्याचा बातमीशी फारसा संबंध नाही) :-
तुम्हाला ह्युमान्झी हा प्रकार ठाउकय का ?
सोविएत युनियनला शक्तीशाली मानवाची जमात बनवायची होती उद्याचे उत्तम असे जग घडवण्यासाठी.
त्यासाठी त्यांनी ह्युमन + चिम्पान्झी ह्यांच्या संकराच्या प्रयोगाचे काही प्रयत्न केले असे म्हणतात.
असे असल्यास खरे तर चिम्पान्झींना मानवतुल्य मानण्याचे प्रथम महत्कार्य हे सोवियत युनियनने केले असे म्हणावे लागेल.
शिवाय संधी मिळाली असती तर नाझींनीही ह्या धर्तीवर काही केले असते असे वाटते.
( अति अति अवांतर :- ज्यू वगैरे मंडळींचे डोळे निळे करण्यासाठी डोळ्यात निळ्या रंगांचे इंजेक्शन वगैरे टोचून त्यांनी पाहिलेच होते.
मानवतावादाच्या ह्या स्पर्धेत ते सोवियतांपेक्षा मागे पडले नसते असे वाटते.
)

हारुन शेख Fri, 10/10/2014 - 11:08

११ वर्षांच्या मुलाला सेनेतल्या लोकांनी जाळून मारण्याची घटना हैदराबादच्या मेहदिपट्ट्णमध्ये घडलीय. ही ती बातमी. त्याला रॉकेल टाकून पेटवण्यात आले होते. ९०% भाजलेल्या अवस्थेत दवाखान्यात दाखल केले गेले. मरतांना त्या मुलाने मॅजिस्ट्रेटसमोर सेनेतल्या लोकांनी त्याला जाळल्याची जबानी दिलीय. हे खरं असेल तर अतिशय धक्कादायक आहे.

मन Fri, 10/10/2014 - 11:24

In reply to by हारुन शेख

क्काय?!
*मला जी शक्यता/अंदाज आणि भीती वाटते आहे ती खोटी ठरो.
चौकशी सुरु असल्याने अधिक बोलवत नाही.
*

बॅटमॅन Fri, 10/10/2014 - 22:30

In reply to by हारुन शेख

मिल्ट्री म्हंजे अबोव सस्पिशियन असा एक जण्रल विचारप्रवाह इंड्यन जन्तेत लै असतो. हे मिल्ट्रीवाले कैक ठिकाणी आपली लायकी दाखवून देतात.

हारुन शेख Fri, 10/10/2014 - 11:32

प्रशासनास जाग आणण्यासाठी गुजरातमध्ये १२ जनांनी नर्मदा कालव्यात उडी मारून जीव दिला आहे. ही बातमी. अधिक शोधले तरी अजून कुठल्याही मुख्य वर्तमानपत्रात ही बातमी मिळाली नाही. दबावतंत्र वापरून बातमी दाबली जातेय का ? की बातमीच खोटी आहे ? काहीच कळत नाहीये.

वांग मराठवाडी धरण प्रकल्पग्रस्तांसाठी लढा देणाऱ्या काशिनाथभाऊ मोहिते यांनीही आत्महत्या (?) केली आहे. आत्महत्याच आहे की खून हे समजण्यास मार्ग नाही. ही बातमी. मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झालाय. ह्या घटनेचीही पुरेशी दखल घेतली जात नाहीय. अशावेळी चौकशीची मागणी मिडीयाने लावून नको का धरायला. काळ तर मोठा कठीण आलाय.

रुची Fri, 10/10/2014 - 20:04

In reply to by हारुन शेख

धक्कादायक आहे खरेच पण कोणत्याच मुख्य प्रवाहातल्या (हिंदूसहित) किंवा सोशल मेडियातही याबद्दल चर्चा नाही हे अधिक बुचकळ्यात पाडणारे आहे.

हारुन शेख Fri, 10/10/2014 - 20:49

In reply to by रुची

वाचवलंय त्यांना. १२ जणांनी उडया मारलेल्या कालव्यात जीव देण्यासाठी पण नंतर पोलिसांनी बाहेर काढलं पाण्यातून. धरणग्रस्तांसाठी असलेल्या राज्य पुनर्वसन प्रकल्पात पाठवलंय आता त्यांना. पण असं टोकाचं पाऊल उचलल्याखेरीज त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं हे दुर्दैवी आहे.

चिंतातुर जंतू Fri, 10/10/2014 - 15:05

मुलांच्या हक्कांसाठी लढणारे भारतीय कैलाश सत्यर्थी आणि शिक्षणासाठी तालिबान्यांविरोधात उभ्या ठाकलेल्या पाकच्या मलाला युसुफजई या दोघांना नोबेल शांतता पुरस्कार जाहीर.

गब्बर सिंग Sat, 11/10/2014 - 02:00

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आर्टिकल मधे विशद केलेली परिस्थिती असत्य आहे असे कोणीच म्हणणार नाही (काही "लोक" सोडल्यास).

प्रश्न हे आहेत -

१) ही परिस्थिती "समस्या" आहे का ? व असल्यास समस्या का आहे ?
२) कोणाची समस्या आहे ? (Whose problem is it ?)
३) ही समस्या सोडवण्याची जबाबदारी कोणाची असायला हवी.

वामा१००-वाचनमा… Sat, 11/10/2014 - 02:21

In reply to by गब्बर सिंग

समस्या सर्वांची आहे. स्त्रीचं अर्थार्जन कमी म्हणजे दर कुटुंबामागे कमी इन्कम. सर्वांची आहे ही समस्या.
__________
" हॅव्ह फेथ इन सिस्टीम" - यापेक्षा लेम सल्ला ऐकण्यात आलेला नाही.

नगरीनिरंजन Sun, 12/10/2014 - 20:03

In reply to by वामा१००-वाचनमा…

यात समस्या काय आहे ते मला कृपया समजावून सांगा. अमेरिकन स्त्रीपेक्षा तेच काम करणार्‍या एशियन पुरुषाला कमी पगार मिळतो.
यात समस्या आहे हे माहित नव्हते. असल्यास आंदोलन/चळवळ वगैरे करण्याचा विचार करता येईल. अर्थात फेमिनिष्टांएवढा आक्रस्ताळेपणा एशियन पुरुषांना जमेल की नाही शंका आहेच. पण पुढचं पुढं, आधी समस्या समजून घेणे महत्त्वाचे आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 12/10/2014 - 21:47

In reply to by नगरीनिरंजन

सगळे एकच काम करतात असं गृहीत धरून, आशियाई पुरुषांना अमेरिकन स्त्रियांपेक्षा कमी पगार मिळतो म्हणून अमेरिकन स्त्रियांना अमेरिकन पुरुषांपेक्षा कमी पगार मिळणं रास्त ठरतं का? ("तिच्यावर तर बलात्कार झाला. तुझ्या परवानगीशिवाय फक्त तुझ्या शरीराला हातच लावला. ती गप्प आहे तर तू का गं आरडाओरडा करतेस," असा काहीतरी संवाद डोक्यात आला, शिंक आल्यासारखा.)

समस्या समजून घेण्याचा विचार मांडताना एकीकडे स्त्रीवाद्यांना आक्रस्ताळं ठरवून मोकळं होणं ... सध्याच्या फॅशननुसार ... गंमतीशीर आहे.

बॅटमॅन Sun, 12/10/2014 - 23:14

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्त्रीवादाच्या नावाखाली आक्रस्ताळेपणा हाच ज्यांचा यू एस पी असतो त्यांना आक्रस्ताळे न म्हणणं हेच गंमतीशीर वगैरे आहे.

नगरीनिरंजन Mon, 13/10/2014 - 05:05

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एकदा लेबर मार्केटात रिसोर्स म्हणून विक्रीला उभं राहिल्यावर अमुक इतकीच किंमत मिळाली पाहिजे असं म्हणणे बालिश वाटते. तसा हट्ट असल्यास विक्री न होण्याचीही तयारी असली पाहिजे. तसंही कंपन्यांमध्ये एकाच टीममधल्या एकाच पातळीवरच्या दोन माणसांच्या पगारात बरीच तफावत असते, म्हणून तर कॉन्फिडेन्शियलिटीचं इतकं स्तोम असतं.
विशेष म्हणजे या कंपन्या, बाजार, एकमेकांतली स्पर्धा आणि एकूणच आहे तसे चालू ठेवण्याला सगळ्यात जास्त समर्थन स्त्रियाच देतात असं एक निरीक्षण आहे.
बाकी कोणताही मुद्दा असला की बलात्कारापर्यंत नेऊन सोडायचा हा आक्रस्ताळेपणाचा एक प्रकार सोदाहरण दाखवल्याबद्दल आभार.

नितिन थत्ते Mon, 13/10/2014 - 07:10

In reply to by नगरीनिरंजन

>>बाकी कोणताही मुद्दा असला की बलात्कारापर्यंत नेऊन सोडायचा हा आक्रस्ताळेपणाचा एक प्रकार सोदाहरण दाखवल्याबद्दल आभार.

+१
इतर विषयाच्या चर्चेत सुद्धा हा अनुभव नुकताच आला. [संबंधित प्रतिसादकाने नंतर सॉरी म्हटल्याने तिथे तो वाद संपला].

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 13/10/2014 - 07:43

In reply to by नगरीनिरंजन

१. क्ष गोष्ट अन्याय्य आहे असं समजल्यास, ठराविक गटाला २ क्ष एवढा अन्याय सहन करावा लागतो, मग १.५ क्ष एवढा अन्याय ज्यांच्यावर होतो, त्यांनी तो सहन करावा का याचं उत्तर मिळालं नाही.
२. लेबर मार्केटात रिसोर्स म्हणून विक्रीला उभी राहणारे लोक त्यापलिकडे समाज वगैरेंचा भाग असतात, तिथून त्यांनी काही दडपण आणल्यास, टीका केल्यास ती सहन करण्याची तयारीही ठेवावी.

बुद्धीवर बलात्कार, कंप्यूटरचा रेप वगैरे शब्दप्रयोग कधी कानावर आले नाहीत का?
बलात्कार हा स्त्रियांवर होणारा सगळ्यात मोठा अन्याय, स्त्रियांप्रती होणारा सगळ्यात मोठा अपराध आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे त्याबद्दल बोलणं मला आक्रस्ताळेपणाचं वाटत नाही. उलट बलात्कार हा स्त्रियांवर होणारा सगळ्यात मोठा अन्याय हे मला पुरुषप्रधानतेचं लक्षण वाटतं. पण या आरोपाआरोपीतून, मतमतांतरांतून कसलाही मुद्दा सिद्ध होत नाही.

उपाशी बोका Mon, 13/10/2014 - 08:17

In reply to by नगरीनिरंजन

एकदा लेबर मार्केटात रिसोर्स म्हणून विक्रीला उभं राहिल्यावर अमुक इतकीच किंमत मिळाली पाहिजे असं म्हणणे बालिश वाटते.

सहमत आहे. खूप पूर्वी एकदा बॉसला म्हणालो होतो, तसे बघितले तर माझ्यात आणि वेश्येत फारसा फरक नाही. फरक इतकाच की ती शरीर विकते आणि मी माझी बुद्धी; आणि जास्त अनुभव मिळाला की तिची किंमत कमी होते आणि माझी वाढते. बस्स, इतकाच फरक.

चिंतातुर जंतू Mon, 13/10/2014 - 14:35

In reply to by उपाशी बोका

>> जास्त अनुभव मिळाला की तिची किंमत कमी होते आणि माझी वाढते. बस्स, इतकाच फरक.

अनुभवी वेश्या नीश एरियात कुशल होतात; ग्राहकांना पुन्हापुन्हा आपल्याकडे वळवण्यात यशस्वी होतात; त्यांची किंमत वाढते. तुमचंही तसंच होत असावं; फक्त वेश्यांविषयीचा अनुभव कमी पडत असावा ;-)

बॅटमॅन Mon, 13/10/2014 - 13:01

In reply to by नगरीनिरंजन

बाकी कोणताही मुद्दा असला की बलात्कारापर्यंत नेऊन सोडायचा हा आक्रस्ताळेपणाचा एक प्रकार सोदाहरण दाखवल्याबद्दल आभार.

+१०१०१०!

मुद्दे नसले की असे केविलवाणे प्रयत्न सुरू होतात ओ. ज्याची त्याची समज वगैरे.

गब्बर सिंग Mon, 13/10/2014 - 09:11

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सगळे एकच काम करतात असं गृहीत धरून, आशियाई पुरुषांना अमेरिकन स्त्रियांपेक्षा कमी पगार मिळतो म्हणून अमेरिकन स्त्रियांना अमेरिकन पुरुषांपेक्षा कमी पगार मिळणं रास्त ठरतं का?

दोन व्यक्ती (कुठल्याही रेस्/जेंडर च्या असोत) एकच काम करतात व त्यांची प्रॉडक्टीव्हिटी एकच आहे - असे असले तरीही - मी त्यांची नोकरभरती (माझ्या हाताखाली) करताना जे एम्प्लॉयमेंट काँट्रॅक्ट बनवतो त्यात असा क्लॉज घातला की एकाला रु. १०० प्रतिघंटा व दुसर्‍यास रु. ८० प्रतिघंटा दिले जावेत - तरीही त्यात अयोग्य काहीही नाही.

कोणत्याही आधारावर भेदभाव करणे हा माझा जन्मसिद्ध विकल्प असायला हवा. व तसा तो तुमचा ही असायला हवा. (या विकल्पाचे ट्रेडिंग करता यावे. प्रत्येकास.)

मन Mon, 13/10/2014 - 09:19

In reply to by गब्बर सिंग

किंमत कामची मोजतो की काम करणार्‍याची ?
तुम्हाला जर उत्तम हॅण्डीक्राफ्ट उप्लब्ध असेल एक कमी किमतीचे व दुसरे अधिक किमतीचे, तर तुम्ही कोणते निवडाल ?
दोन्हीत फरक म्हणालात तर इतकाच आहे की एक गोर्‍याने बनवला आहे; दुसरा नॉन्-गोर्‍याने (ब्राउन, ब्लेक , यलो,रेड वगैरे वगैरे जे कोण अस्तील त्यांनी).
वस्तू सारखीच आहे.
बोला . कय कराल ?

गब्बर सिंग Mon, 13/10/2014 - 09:36

In reply to by मन

किंमत कामची मोजतो की काम करणार्‍याची ?

काही विषयांच्या बाबतीत ती कामाची असते. व काहींच्या बाबतीत कामाची + काम करणार्‍यांची.

काही चित्रपटांमधे एकच रोल अमिताभ ने केला व दुसर्‍याने केला - यात फरक असतो की नाही ? व तो फरक मॅटर करतो की नाही ? (आता यावर excessively basic objection घेऊन लगेच तलवार काढून येऊ नका.)

---

तुम्हाला जर उत्तम हॅण्डीक्राफ्ट उप्लब्ध असेल एक कमी किमतीचे व दुसरे अधिक किमतीचे, तर तुम्ही कोणते निवडाल ?

प्रश्न मस्त आहे. कारण हा प्रश्न मला माझा मुद्दा वेगळ्या शब्दात पेश करण्याची संधी देतो.

माझा मुद्दा हा आहे - की जे अधिक किंमतीचे आहे ते केवळ गोर्‍याने बनवलेले आहे म्हणून मी जर विकत घेतले तरी - माझी ही कृति योग्य किंवा अयोग्य नाही. कारण - in this particular case I value the work (quality) as well as who made it.

ते गोर्‍याने बनवलेले मला हवे आहे - म्हणून मी अधिक किंमत (प्रिमियम) देतो.

--

उदा. दोन एक्झॅक्ट सेम हँडिक्राफ्ट्स आहेत. एकाची किंमत $५०० आहे व दुसर्‍याची $१००.

$५०० हे गोर्‍याने बनवलेले आहे
$१०० हे ब्राऊन ने बनवलेले आहे.

मी जर $५०० चे विकत घेतले तर त्याचा अर्थ असा होतो की मी गोर्‍याने बनवलेल्या हँडिक्राफ्ट वर मी $४०० चा प्रिमियम द्यायला तयार आहे/होतो म्हणून मी ते खरेदी केले. बस्स. यात अयोग्य व/वा सुयोग्य काहीही नाही.

$४०० = $५०० - $१००

मेघना भुस्कुटे Mon, 13/10/2014 - 14:26

In reply to by गब्बर सिंग

बाकी कोणताही मुद्दा नसला की स्त्रीवाद्यांच्या आक्रस्ताळेपणाकडे चर्चा वळवलेली चालते. पण स्त्रीवाद्यांनी उदाहरणादाखलसुद्धा असल्या क्लृप्त्या वापरता नयेत! वाह!

बॅटमॅन Mon, 13/10/2014 - 14:33

In reply to by मेघना भुस्कुटे

पण स्त्रीवाद्यांनी उदाहरणादाखलसुद्धा असल्या क्लृप्त्या वापरता नयेत! वाह!

मग अन्य लोक्स अन स्त्रीवादी यांत फरक तो काय राहिला, नै का? यूएसपी गेला की पेडेष्टलही गेलेच. अन पेडेष्टल गेले की मग...हॅ हॅ हॅ.

गब्बर सिंग Mon, 13/10/2014 - 14:34

In reply to by मेघना भुस्कुटे

बाकी कोणताही मुद्दा नसला की स्त्रीवाद्यांच्या आक्रस्ताळेपणाकडे चर्चा वळवलेली चालते. पण स्त्रीवाद्यांनी उदाहरणादाखलसुद्धा असल्या क्लृप्त्या वापरता नयेत! वाह!

हा प्रश्न / प्रतिसाद माझ्या प्रतिसादास का आहे ?

मेघना भुस्कुटे Mon, 13/10/2014 - 14:40

In reply to by गब्बर सिंग

नाही, नाही बहुतेक. पण नक्की कोण काय म्हणालंय ते तपासून चिरेबंदी जागा हुडकायचा कंटाळा आला. म्हणून साधारण तळाशी दिलं डकवून! तू नको मनावर घेऊस. :प

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 11/10/2014 - 02:43

In reply to by गब्बर सिंग

सध्या मला दहावी-बारावी-पदवी-पदविका असं कोणतंही प्रमाणपत्र मिळवण्याची इच्छा नसल्यामुळे ही प्रश्नपत्रिका सोडवण्यात मला काही रस नाही.

'न'वी बाजू Sat, 11/10/2014 - 22:10

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

...त्यापेक्षासुद्धा, प्रमाणपत्र (मिळवायचेच असेल, तर) नेमके कोणाकडून मिळवायचे, हा प्रश्न मला अधिक महत्त्वाचा वाटतो.

असो. बाकी चालू द्या.

गब्बर सिंग Mon, 13/10/2014 - 09:12

In reply to by 'न'वी बाजू

त्यापेक्षासुद्धा, प्रमाणपत्र (मिळवायचेच असेल, तर) नेमके कोणाकडून मिळवायचे, हा प्रश्न मला अधिक महत्त्वाचा वाटतो.

The most basic question is not what is best, but who shall decide what is best _____ Thomas Sowell

मन Mon, 13/10/2014 - 09:24

In reply to by गब्बर सिंग

The most basic question is not what is best, but who shall decide what is best _____ Thomas Sowell

बरोब्बर.
आता ह्या वाक्याचा अंडारटोन काय ? ज्याच्यासआठी जे ब्येष्ट आहे ते त्याचं त्याला ठरवू द्या.
सेंट्रल प्लानिंगला आग लावा.
कुणीतरी चार शहाण्यांनी ठरवू नये इतर हजारभर लोकांनी काय करायचय ते.
बरोबर ?
पण ह्याच्याच अगदि १८० अंश उलट दिशेने साहेब तुमचेच आर्ग्युमेंट्स असतात.
"चार बुकं जास्त शिकलास म्हणून फार जास्त अक्कल आली का असं म्हण्ण्याची सध्या
फ्याशन आहे. (ह्याचा गर्भितार्थ :- हो. आम्ही चार बुकं शिकलोत म्हणजे आम्हाला अधिक अक्कल आहे. )"
आता इथं कुणाला अधिक अक्कल आहे ते सर्टिफाय झालेलं आहे.
म्हणजे सेंट्रल प्लानिंगमध्ले चार शहाणे कोण ते ही सर्टिफाय झालेलं आहे.
मग शहाण्यांनी प्लानिंग करण्यात चूक काय ?
(आता काढा झोडून अ‍ॅम्स्बिशिअसली बेसिक प्रतिसाद म्हणत)

अनुप ढेरे Tue, 14/10/2014 - 08:37

In reply to by गब्बर सिंग

गब्बरचे प्रश्न रास्तं आहेत. विषेतः २ आणि ३. जर स्त्रीयांना पगार कमी मिळत असेल तर त्यात इतर समजाचाही तोटा आहे असं जर सिद्ध झालं तर इतर लोक यात लक्ष घालतील.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 11/10/2014 - 03:15

फेसबुकाच्या कृपेने सध्या ही चित्रं (माझ्या भारतीय मित्रमंडळात) फिरत आहेत.
Paintings That Will Make You Question Everything Wrong in This World

हे चित्र विशेष आवडलं -

सुनील Sat, 11/10/2014 - 09:41

In reply to by नितिन थत्ते

अशा बातम्या वाचून हल्ली लोकांना आनंदाच्या उकळ्या कशा काय फुटत नायत? पूर्वी फुटत असत बॉ! ;)

असो, अशा स्वतःच्या अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन केलेल्या टिपण्या (पूर्वीप्रमाणेच) हे सरकारदेखिल 'योग्य' त्या ठिकाणी मारत असेल तर उत्तमच!

बॅटमॅन Sat, 11/10/2014 - 11:36

In reply to by सुनील

अशा बातम्या वाचून हल्ली लोकांना आनंदाच्या उकळ्या कशा काय फुटत नायत? पूर्वी फुटत असत बॉ!

असेच म्हणतो. ;)

ऋषिकेश Sat, 11/10/2014 - 17:06

In reply to by सुनील

अशा बातम्या वाचून हल्ली लोकांना आनंदाच्या उकळ्या कशा काय फुटत नायत? पूर्वी फुटत असत बॉ!

=))
गेल्या सरकारवर असे ताशेरे ओढले की फुटलेल्या उकळ्या दाखवणे दे देशप्रेम, व्यवस्थेवरील राग, निकम्मे सरकार वगैरे सारे काही होते, आता तशा उकळ्या फुटणारे व ते तसे सांगणारे हे थेट देशद्रोही तरी असतात नाहीतर एका मोठ्ठ्या पदावरील व्यक्तीचे वैट्ट वैट्ट दुऽऽऽष्ट द्वेष्टे!

--
मुळ बातमीवर जेव्हा २जी च्या निकालात न्यायालायाने लायसन्स रद्द करण्यासोबतच जेव्हा सरकारने ऑक्शनच करावे असा आदेश दिला तेव्हा त्यावेळी आम्ही कोर्टाने मर्यादा उल्लंघल्याचे म्हटले होते. तेव्हा आमच्यावर काँग्रेसधार्जिणे असल्याचा आरोप अनेकांनी केला होता.

बाकी सरकारच्या कार्यक्षेत्रात लुडबूड करण्यापेक्षा, त्याच्यापुढे निव्वळ ताशेरे ओढणे, मत नोंदवणे (कोणताही आदेश न देता) ही कोर्टाची जुनी परंपरा आहे व त्यात काहीही गैर वाटत नाही व नव्हते! जर सामान्य व्यक्ती सरकारवर ताशेरे ओढु शक्तो तर कोर्ट का नाही?

मन Sat, 11/10/2014 - 23:06

In reply to by ऋषिकेश

कोर्ट सरकारवर येता जाता ताशेरे वगैरे ओढते.
सरकारने (किंवा गरिब बिच्चार्‍या सामान्य माणसाने (किंवा फॉर द्याट म्याटर कुणीही)) कोर्टावर असेच ताशेरे ओढले तर चालतात का ?
.
.
.
न्यायसंस्था खालील धर्तीचे "ताशेरे" ओढताना दिसते.
सरकार कुंभकर्ण आहे.
अमुकजण निरो आहे.
सरकारला लाखो करोडो जीवांची पर्वा नसून सरकार त्यांच्या तोंडात अन्न पोचवण्याऐवजी क्रूरपणे ते सडवित आहे.
सरकारला yz का म्हणण्यात येउ नये ?
.
.
शेकडो हजारो नव्हे तर शब्धशः लाखो(!) केसेस विलंबित आहेत म्हणे सध्या निर्णयाशिवाय.
हा आकडा इतका मोठा आहे की लोकांनी पूर्णतः आशा सोडल्यासारखीच आहे केसेस कधीकाळी सुटतील ह्याची.
ह्यामुळे नेमके सज्जन लोक दब्कून वावरतात. कोर्टाची पायरी चढायला, हक्काचा न्याय मागायला/मिळवायला घाबरतात.
ऐंशी टक्क्याच्या आसपास कैदी हे कच्चे कैदी आहेत म्हणे(ऐकिव माहिती). कच्चे कैदी म्हणजे ज्यांचे गुन्हे अजून शाबित झालेले नाहित.
म्हणजेच ज्यांनी खरोखर गुन्हा केलेला नाही पण आकसापोटी त्यांना ह्यात गुंतवण्यात आलय असेही लोक मोठ्या संख्येने ह्यात असण्याची शक्यता आहे.
ते प्रशासनाशी दोन हात करु शकत नाहित, दुर्ब़ळ आहेत म्हणून क्रौर्यानं त्यांना सडवण्यात येतय अशीही शक्यता आहे.
खटले वेळेत निकाली निघाले तर अशा विविध पीडितांना न्याय मिळेल. पण सध्या ते होत नाहिये.
मग --
ह्याबद्दलही केवळ सरकारवरच ताशेरे ओढायचे का ?
सरकार ही पंचिंग बॅग आहे का ?
(की सरकारनं गेंड्याची कातडी पांघरुन रहावं. अधिकाधिक निगरगट्ट बनावं अशी अपेक्षा आहे?
सरकारकडे, कोणत्याही instituionकडे पुरेशी संवेदनशीलता असावी असं मला वाटतं.
संस्था ह्या नियमांनी चालतात. त्यांना माणसेच चालवत असली तरी चालवनारी माणसे नियमांनी बद्ध व पूर्वग्रह्,वातावरण्,संस्कार ह्यामुळे अंध असतात.
परिनामी संस्थांना मानवी भावभावना नसतात. त्या आधीच निष्ठूर असतात.
त्यांना अजूनच निश्ठूर का बनवा ?
)

चिंतातुर जंतू Sat, 11/10/2014 - 16:11

In reply to by नितिन थत्ते

>> पण पंतप्रधान जिथे उतरतात तिथे त्यांना बिल भरावं लागतं? का?

भरवं लागत नसेलही; पण ते स्वच्छ चारित्र्याचे असल्यामुळे भरत असतील कदाचित.

बॅटमॅन Sat, 11/10/2014 - 17:53

In reply to by चिंतातुर जंतू

ही बातमी मोदींच्या बाजूची आहे की विरोधातली आहे?

तुम्हांला लय काळजी? रोचक आणि उद्बोधक विशेषणे कमी पडली क्की क्कॉय?

चिंतातुर जंतू Sat, 11/10/2014 - 14:52

गुन्हा : सिनेमागृहात राष्ट्रगीत चालू असताना उभं राहायला नकार.
आरोप : राष्ट्रद्रोह (सेडिशन).
मी मुस्लिम आहे; नास्तिक आहे; अ‍ॅनार्किस्ट आहे.

मेघना भुस्कुटे Sat, 11/10/2014 - 15:56

In reply to by चिंतातुर जंतू

ही प्रतिक्रिया बातमीच्या निमित्तामुळे आहे. बातमीशी संबंधित असेलच असं नाही.

सिनेमागृहात (आणि हल्ली नाट्यगृहातही) दरेक खेळाआधी राष्ट्रगीत वाजवणं (आणि प्रत्येकानं स्तब्ध उभं राहून आपली राष्ट्रभक्ती सिद्ध करावी हा आग्रह धरणं) आचरटपणाचं आहे. आपल्याला करमणुकीच्या कार्यक्रमांबद्दलच एक अपराधीपणाची भावना असते आणि प्रायश्तित्तादाखल प्रार्थनासदृश (इथे राष्ट्रगीत!) काहीतरी म्हणून आपण तिचं निराकरण करण्याचा दयनीय आणि हास्यास्पद प्रयत्न करत असतो, अशी काहीतरी भावना मला त्या कर्मकांडामुळे कायमच होते. त्त्यामुळे उचकून मुद्दामहून बसून राहणं, उभं राहिल्यास निर्विकारपणे वळून इतरांचं निरीक्षण करणं, आपल्याला काहीच पडलेली नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करत काहीतरी बडबडणं, असे प्रकार माझ्याकडून बरेचदा होतात. हे पोरकट आहे, हे मला मान्य आहे. पण मुळात असलं काहीतरी कर्मकांड पाळणंच किती पोरकट आहे!

त्या पार्श्वभूमीवर ही बातमी धक्कादायक आणि संतापजनक वाटली.

बॅटमॅन Sat, 11/10/2014 - 17:28

In reply to by चिंतातुर जंतू

बेसिकली थेट्रात राष्ट्रगीत लावणे हा एक वायझेडपणा आहे.

पण लावलं तर अट्टाहासाने बसून राहणे हाही तितकाच वायझेडपणा आहे.

ऋषिकेश Sat, 11/10/2014 - 17:33

In reply to by बॅटमॅन

+१

एक अवांतर प्रश्नः
मुळात राष्ट्रगीत हा प्रकार किती जुना आहे? आपल्या पूर्वीच्या राजांची होती का राष्ट्रगीते?

(हे गुगल करूनही समजेल. पण मला इथेच विचारायचंय. लगेच मी सहज गुगलून मला हे मिळाले वगैरे नको ;)

वामा१००-वाचनमा… Sat, 11/10/2014 - 17:36

In reply to by ऋषिकेश

(हे गुगल करूनही समजेल. पण मला इथेच विचारायचंय. लगेच मी सहज गुगलून मला हे मिळाले वगैरे नको (डोळा मारत)

=))

'न'वी बाजू Sat, 11/10/2014 - 20:10

In reply to by बॅटमॅन

नक्की खात्री नाही, परंतु मंत्रपुष्पांजलि हा तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रगीतासारखा प्रकार मानता यावा का?

(का, ते विचारू नका, ऐकीव माहितीवरून, वगैरे वगैरे... पण, मंत्रपुष्पांजलीचा अन्वयार्थ इथे पृष्ठ क्र. १७वर वाचावयास मिळेल. (इन्ष्टण्ट गूगलशोध.))

'न'वी बाजू Sat, 11/10/2014 - 21:15

In reply to by बॅटमॅन

१९७०च्या दशकाच्या पूर्वार्धापर्यंत चित्रपटगृहांत राष्ट्रगीत (पडद्यावरील फडकत्या तिरंग्यासह) लावण्याची प्रथा होती, असे अंधुकसे आठवते.

मात्र, तेव्हा ते चित्रपट संपल्यावर वाजविण्यात येत असे. आणि पब्लिक, 'पिच्चर संपला' एवढाच बोध त्यातून घेऊन उठून चालू लागत असे. (राष्ट्रगीत चालू असतानाच.) त्यामुळे, पब्लिकच्या उत्साहाच्या आणि भावनांच्या आदरार्थ ही प्रथा पुढे (माझ्या मते अत्यंत समंजसपणे) बंद पडली. (लोकशाहीचा - की मार्केटचा, कोण जाणे, पण - विजय असो.)

आता ही प्रथा सुधारित आवृत्तीत (बोले तो, चित्रपटाअखेरीऐवजी चित्रपटाअगोदर; जातात कुठे लेकाचे!) पुनःप्रस्थापित होऊ पाहत असावा, असे दिसते. राष्ट्रभावनेच्या सामूहिक प्रदर्शनाकरिता क्याप्टिव पार्टिशिपेटरी आड्यन्ससारखा आड्यन्स नसावा बहुधा.

एवढे म्हटल्यावर, राष्ट्रगीत लावल्यावर अट्टाहासाने बसून राहणे हे तितकेसे वायझेडपणाचे, का कोण जाणे, पण, नाही वाटत मला. बोले तो, मी नाही बसून राहणार कदाचित, कारण तसे करायला प्रचंड धैर्य लागते, आणि मी बेशिकली डरपोक आहे; पण कोणी स्वतःला पटत नाही म्हणून जर करत असेल, तर त्याच्या/तिच्या धैर्याला आपला (दुरूनच का होईना, पण) प्रणाम.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

अतिअवांतर: गांधींचे बरेच काहीकाही न पटूनसुद्धा गांधींबद्दल प्रचंड आदर नेमक्या याच कारणाकरिता वाटतो.

मन Sat, 11/10/2014 - 23:13

In reply to by 'न'वी बाजू

राष्ट्रगीत लावणे वायझेडपणा वाटतो +१
लावलेच आहे; तरी मुद्दम बसून राहणे हाही वाय झेदपना वाटतो +१
इतके असून बसून राहणे धैर्याचे वाटते ह्यालाही +१
.
.
गांधींचे बरेच काहीकाही न पटूनसुद्धा गांधींबद्दल प्रचंड आदर नेमक्या याच कारणाकरिता वाटतो.

+१ ह्यालाही!

कान्होजी पार्थसारथी Sun, 12/10/2014 - 00:08

In reply to by 'न'वी बाजू

पूर्वी पंचायत समिती गावोगाव जाऊन चित्रपट दाखवी. (सांगत्ये ऐका चा काळ बहुदा) तेव्हाही हा प्रघात पाळला जात नसे. बहुतांश सिंगल स्क्रीन वाले हे तंतोतंत पाळत नसावेत.लहरी कारभार.

केरळ मध्येही हा प्रकार देशद्रोहाचा गुन्हा होइतो गंभीर घेत असावेत असे वाटत नाही. जुना वचपा, गावठी राजकारण, उचकेगिरी असल्या प्रकारांचा बली वाटतो तो.

मुस्लीम एकवेळ काफिरी खपवतिल पण नास्तिकी हा जास्त गंभीर गुन्हा आहे. मला हे अनेकपदरी प्रकरण वाटतेय. राष्ट्रगीत फ़क्त निमित्त आहे.

'न'वी बाजू Sat, 11/10/2014 - 20:43

In reply to by चिंतातुर जंतू

झाला प्रकार (किंवा त्यापेक्षासुद्धा त्यातून प्रस्थापित होऊ पाहणारा अनिष्ट प्रघात) धक्कादायक आणि गंभीर आहे.

मात्र, एक गोष्ट कळली नाही.

मी मुस्लिम आहे; नास्तिक आहे;

एखादी व्यक्ती या दोन्ही गोष्टी एकसमयावच्छेदेकरून कशी असू शकते?

('मुस्लिम आईबापांच्या पोटी मुस्लिम परिवारात जन्माला आलेली व्यक्ती' या मर्यादित लौकिक / सांस्कृतिक अर्थाने 'मुस्लिम' हा शब्द प्रस्तुत व्यक्ती प्रस्तुत ठिकाणी वापरत नसावी, असे वाटते, म्हणून ही शंका. चूभूद्याघ्या.)

mahindra Sat, 11/10/2014 - 21:01

In reply to by 'न'वी बाजू

मुस्लिम आईबापांच्या पोटी मुस्लिम परिवारात जन्माला आलेली व्यक्ती' या मर्यादित लौकिक / सांस्कृतिक अर्थाने 'मुस्लिम'
++++++
होय मर्यादित अर्थानेच म्हणत असावी. जी व्यक्ति नास्तिक आणि
रेशनेलिस्ट मधे फरक करत असेल ती व्यक्ति मुस्लीम आणि नस्तिक यामध्ला पैराडॉक्स सम्जु शकत असेल म्हणून तो मर्यादित अर्थ असावा आणि केवल मुस्लिम बैकग्राउंड आहे म्हणून जो स्टेरियोटाईप आरोप होतो तो प्रखर दिसावा म्हणून तसे ठासून्ही म्हंटले असेल

बॅटमॅन Sat, 11/10/2014 - 23:25

In reply to by 'न'वी बाजू

अगदी अगदी. मुसलमान आणि नास्तिक हे दोन परस्परविरोधी शब्द आहेत.

शिवाय, मारे काही मोठा पराक्रम केल्याच्या थाटात, मुस्लिम आणि नास्तिक आहोत हे डंका पिटून सांगण्याची काय गरज होती? मुस्लिम असणे वा नसणे म्हणजे काही मोठे कर्तृत्व नाही. तीच गोष्ट नास्तिकपणाबद्दल. मात्र, मी मुस्लिम आणि नास्तिक आहे म्हणून लोक मला छळतात, वँऽऽऽऽ!!!! वगैरे करून लक्ष वेधायचे असेल तर समजू शकतो. नपेक्षा राष्ट्रगीतासाठी बसून राहणे ही गोष्ट इन इटसेल्फ गौरतलब इनफ नाही काय?

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 12/10/2014 - 07:55

In reply to by 'न'वी बाजू

>> मी मुस्लिम आहे; नास्तिक आहे;

एखादी व्यक्ती या दोन्ही गोष्टी एकसमयावच्छेदेकरून कशी असू शकते?
('मुस्लिम आईबापांच्या पोटी मुस्लिम परिवारात जन्माला आलेली व्यक्ती' या मर्यादित लौकिक / सांस्कृतिक अर्थाने 'मुस्लिम' हा शब्द प्रस्तुत व्यक्ती प्रस्तुत ठिकाणी वापरत नसावी, असे वाटते, म्हणून ही शंका. चूभूद्याघ्या.)

देव न मानणे आणि सेक्यूलर देशात (एखादा/कोणताही) धर्म न मानणे याचा अर्थ एकच आहे असं म्हणता येईल का? आपापल्या पद्धतीने धर्माचा अर्थ लावण्याची मुभा सेक्यूलर असल्यामुळे मिळालेली नाही का?

अनुप ढेरे Sun, 12/10/2014 - 08:19

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आपापल्या पद्धतीने धर्माचा अर्थ लावण्याची मुभा सेक्यूलर असल्यामुळे मिळालेली नाही का?

परवाच एक लेख वाचनात आला.
http://kafila.org/2014/10/08/a-response-to-uniform-civil-code-the-women…

त्यातली आर्ग्युमेंट. ठळकीकरण माझे.

Secondly, I would argue that religious family laws actually violate freedom of religion. If we have learned anything from the various attempts to reform personal laws, it is that the same religion is interpreted in widely divergent and even contradictory ways by the people who practise it. In enacting religious personal laws, the state takes sides in theological disputes and forces those who disagree to submit to its interpretation.

हे नक्कीच विचार करण्यासारखं आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 12/10/2014 - 10:11

In reply to by अनुप ढेरे

नास्तिकांच्या घरांत, कुटुंबात पैसे अथवा घटस्फोटांबद्दल तक्रारी झाल्याशिवाय कायद्याकडे जाण्याचं कारण नाही.
'स्पेशल मॅरेज अॅक्ट'खाली लग्न रजिस्टर केलं असता मालमत्तेची विभागणी कशी होते हे मला माहीत नाही.
नास्तिकांच्या सोयीसाठी समानतावादी समान नागरी कायदा केला तर फार बरं होईल.

नितिन थत्ते Sun, 12/10/2014 - 10:39

In reply to by अनुप ढेरे

हिंदू कायदा हा भारतात राहणार्‍या गैर-मुस्लिम/ख्रिश्चन/पारशी लोकांच्या रूढी परंपरांवरून आला आहे. भारतात राहणारे लोक कुठल्याही धर्माला मानत असले (जैन/बौद्ध/शीख) तरी त्यांचे वारस/मालमत्ता/विवाहविषयक समाजनियम सारखेच* असत. त्यामुळे त्या सर्वांना हिंदू कायद्याखाली कोंबले गेले. Personal Law is actually not about religious affiliation.

हे कायदे हिंदू (किंवा मुसलमान/ख्रिश्चन/पारशी) म्हणून राहणार्‍या/वागणार्‍या सर्वसामान्यांसाठी लागू आहेत. असे कायदे केल्यामुळे प्रत्येक व्यवहारासाठी करार करायची आवश्यकता भासत नाही.

ज्यांना पर्टिक्युलरली या रूढी पाळायच्या नसतील त्यांना त्यातून बाहेर पडायचा मार्ग मोकळा असतोच. पण तो संपूर्णपणे अंमलात आणायला हवा. माझ्या आजोबांची जमीन हिंदू कायद्यानुसार स्वतःकडे घेऊन नंतर मला हिंदू वारसा कायदा मान्य नाही असा स्टॅण्ड घेता येणार नाही.

*सारखेच याचा अर्थ एक्झॅक्टली सारखे असा नाही. म्हणून कायदा जरी कोडिफाय झाला तरी स्थानिक पद्धतींना** वाव ठेवण्यात आला.

**जेव्हा जेव्हा असे कोडिफिकेशन झाले तेव्हातेव्हा हा वाव ठेवावाच लागला. अगदी स्मृतींमध्ये सुद्धा "शास्त्राद्रूढिर्बलीयसी" असे म्हटलेले आहे.

१३१ वर्षाच्या मलाचा प्रलय एवढा असेल असे म्हणायचे असेल त्यांना.

बॅटमॅन Sat, 11/10/2014 - 17:47

In reply to by चिंतातुर जंतू

ही बातमी अंमळ जुनी होती असे वाटते.

असो, रिगार्डलेस, टिप्पणी करावे असे या बातमीत काही नाही. या विधानावर त्यांना पब्लिकमध्ये छेडले पाहिजे मात्र.

चिंतातुर जंतू Sat, 11/10/2014 - 18:00

In reply to by बॅटमॅन

>> ही बातमी अंमळ जुनी होती असे वाटते.

बातमी १७ सप्टेंबरची आहे. केंद्रीय मंत्र्याच्या अश्या वक्तव्याला सनसनाटी मूल्य असूनही त्याची जितकी व्हायला हवी होती तितकी पब्लिसिटी झाली नाही हे बाकी गंमतीशीर आहे.

>> टिप्पणी करावे असे या बातमीत काही नाही.

असो.

चिंतातुर जंतू Sat, 11/10/2014 - 18:42

In reply to by मेघना भुस्कुटे

>> गंमतीशीर या नव्या विशेषणाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.

रोचक उद्बोधक वगैरे आमची विशेषणं आमचे चाहते वापरून वापरून गुळगुळीत करून टाकतात; मग नवनिर्मिती आवश्यक ठरते ;-)

गब्बर सिंग Sat, 11/10/2014 - 20:53

http://beautypageants.indiatimes.com/miss-world/archives/Priyanka-excit…

बाजीराव मस्तानी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु.

चित्रीकरण सुरु झाले ... पण अजुन एखादा वाद / विवाद कसाकाय निर्माण झाला नाहिये ?

बॅटमॅन Sat, 11/10/2014 - 23:43

In reply to by गब्बर सिंग

अहो पेशव्यांवरचा पिच्चर आहे तो. शिवाजी-संभाजी इ. बद्दल असता तर वाद झाला असता. पेशव्यांकडे वादनिर्मितीचे कसलेच पोटेन्शिअल नाही. राज्यकारभारास नालायक, जातीचा अहंकार बाळगणारे, स्त्रैण आणि अजून बरीच विशेषणे त्यांच्या खात्यावर आलरेडी जमा आहेत. ती ब्रिगेडींनी दिल्यामुळे सत्यच असावीत. तस्मात ना रहेगा वाद, ना मिलेगी प्रसिद्धी!

बॅटमॅन Sat, 11/10/2014 - 23:39

राष्ट्रगीतावेळी बसून राहण्याचा महापराक्रम करणार्‍या गाझी सलमानचा "मुस्लिम तरीही नास्तिक" असणे हा दृष्टिकोन रोचक वाटला. शिवाय, रॅशनॅलिस्ट म्हणजे इस्लामोफोब हीदेखील नवीन व्याख्या कळाली. नास्तिकपणा म्हणजे रॅशनॅलिझम नव्हे हेही एक विशेष रोचक कोरिलेशन कळाले. एकूणात, जिथे विचारांच्या स्पष्टतेतच अ‍ॅनार्की आहे तिथे ती अन्य ठिकाणीदेखील दृष्टोत्पत्तीस यावी यात नवल ते काय?