पंचतारांकित अध्यात्म
भारतात संत गाडगेमहाराज, तुकडोजी महाराज ह्या सारखे महान संत होवून गेले. जनसेवा हीच ईश्वरसेवा असे मानणारे हे महान संत होते.संत गाडगे महाराजांनी आपल्या प्रवचनातून जन जागृती केली. परंतु आता काळानुसार संतांचे प्रकार बदलले आहेत आताचे तथाकथित संत हे पंचतारांकित झाले आहेत.
मोठमोठ्या शामियान्यात त्यांचा सत्संग चालतो. सध्याच्या काळात बुवा बनणे हा किफायतशीर व्यवसाय झाला आहे. मोठमोठ्या सेलिब्रिटी ह्या बाबांचे भक्त असतात. बाबांच्या सेवेला सेवकांचा ताफा, प्रवासासाठी आलिशान गाड्यांचा ताफा,कोट्यावधींचे आश्रम असे बाबांचे स्वरूप असते.सेलिब्रिटी लोकांचा समाजावर प्रभाव असतो त्यांचे अनुकरण म्हणूनही बरेच जण अशा बाबांची भक्ती करतात. बाबांच्या चमत्काराच्या सुरस कहाण्या एकूण आपण २१ व्या शतकात राहतोय कि १० व्या शतकात असा प्रश्न पडतो.
विज्ञान, शास्त्र जसजशी प्रगती करत आहे तस तसे अंधश्रद्धेचे स्वरूपही बदलत चालले आहे. अंधश्रद्धाही आता अत्याधुनिक बनत चालल्या आहेत.देशातील भोळ्या भाबडी जनता सोडाच समाजात उच्च पदावर असणारे व्यक्ती ज्यांच्याकडून समाजाला एका आदर्शाची गरज असते तेही अशा बाबा बुवांच्या कच्छपी लागलेले बघून त्यांची कीव येवू लागते.
'झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये' .हे वाक्य सत्यात उतरवणारे सध्याच्या काळात जण कोणी असेल तर हे सध्याचे पंचतारांकित साधू नि संत ह्यात शंकाच नाही. पूर्वीचे भावपूर्ण अध्यात्म हे लयास जावून हे नवेच पंचतारांकित अध्यात्म उदयास आले आहे आणि त्यालाही भरपूर मागणी आहे . एखादा शिकलेला असेल तर आपण त्याला सुशिक्षित म्हणून ओळखतो. पण पुस्तकी ज्ञान असले तरी ती व्यक्ती सुशिक्षित असेलच असे नाही हे ह्या बाबांच्या भक्तांकडे पाहून पटते.
ह्या भोवतालच्या अंधश्रद्धा पाहून पद्मश्री नरेंद्र दाभोलकर सर ह्यांच्या कार्याची किती आवशक्यता आहे ह्याची जाणीव होते.पुरोगामी महाराष्ट्रातून अंधश्रद्धेचा कलंक पुसून टाकण्यासाठी चालविलेली दाभोळ्करांची चळवळ प्रतिगाम्यांच्या उरात धडकी भरवून गेली..
आजच्या काळात जर समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी खरोखरच एखाद्या गुरूची आवशक्यता असेल तर तो गुरु गाडगे महाराजांसारखा असावा..
आसाराम १० हजार कोटींचे धनी
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/asaram-bapu/articleshow/29...
सचिनजी लेख आवडला. पण गाडगे
सचिनजी लेख आवडला. पण गाडगे महाराजांच्या, तुकडोजी महाराजांच्या सामाजिक कार्याबद्दल अधिक वाचायला असते. क्षणभर मनात आलेला विचार उत्तमरित्या मांडला आहे. इतकेच.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पंचतारांकित अध्यात्म. छान
पंचतारांकित अध्यात्म. छान वाटला लेख.
सचिनजी लेख आवडला
सचिनजी लेख आवडला