.
.
अनाईस् निन्
'अनाईस् निन्'चे एक वाक्य आठवले -
Each friend represents a world in us, a world not born until they arrive, and it is only by this meeting that a new world is born.
मात्र यातला 'मित्र'विशेष एखादी व्यक्तीच असायला हवी असे नाही. आपल्याला एखादी जोरदार किक् बसायला निमित्त होणारी कुठलीही गोष्ट आयुष्यात फरक करून जाते.
कोल्ह्यावलोकन
आम्ही कसले सिंह? (बाय दी वे, दिवसातले वीस तास झोपून राहातो तो वनराज? आपल्या माद्यांनी आणलेली शिकार खाऊन, जांभया देत, सिंहिणींना गर्भार करत आयुष्य काढतो तो जंगलचा राजा? या पुरुषी आदर्शांचा धिक्कार वगैरे.. असो!)आम्ही तर कोल्हे- तरस. त्यामुळे आमचे मागे वळून पाहाणे हेही तसेच असणार पण 'म्हणोन काय इतरें, पाहोचि नये?' तर प्रस्तुत लेखातले असे मागे बघणे आवडले.
हातात पहिले पुस्तक कधी आले ते आठवत नाही. पण मे महिन्याच्या सुट्टीत पुढच्या वर्षाची पुस्तके निम्म्या किंमतीला विकत घेतल्यानंतर त्यातले मराठीचे पुस्तक वाचून काढायचे हे ठरल्यासारखे होते. शाळेतला प्रवास हा 'चांदोबा', 'किशोर' ('शेतकरी' ही!) असा झाल्यानंतर सुहास शिरवळकर, गुरुनाथ नाईक, बाबुराव अर्नाळकर, एस.एम. काशीकर, चंद्रकांत काकोडकर, बाबा कदम असा घाईघाईत झाला. द. स. काकडे यासारखे काहीतरी नाव असलेल्या आणि शाळकरी वयातल्या मनाला सुखद वगैरे गुदगुल्या करणार्रे चावट लेखन करणार्या लेखकानेही काही काळ भुरळ घातली होती. फडके-खांडेकर, अगदी अत्रेही कधी फारसे आवडले नाहीत. यानंतरचा नैसर्गिक टप्पा असतो तो पु.लं, व.पु.काळे , दळवी, माडगूळकर, मिरासदार यांचा. यातले मिरासदार (काही कथा वगळता) आणि वपु( शून्य कथा वगळता) यांची साथ सुदैवाने सुटली. आण्णा आणि तात्या अजूनही बरोबर आहेत. शशी भागवत आणि नारायण धारप यांच्याबरोबर एक मोठे अफेअर झाले. भागवत अकालीच गेले आणि धारपांची पुनरावृत्ती सुरु झाली. तरीही हे दोघे अधूनमधून डोके वर काढतात. 'कवितांना- ज्यांनी आयुष्यभर साथ दिली' अशी सुनीताबाई देशपांडेंची एक प्रस्तावना आहे. त्या कविता बाकी कॉलेजमधल्या वासरुप्रेमाला नकार देऊन एखाद्या इंजिनिअरशी लग्न करणार्या प्रेयसीसारख्या दुर्लभच राहिल्या. मिलिंद बोकील, आशा बगे, शं.ना.नवरे आले आणि गेले. मग कधीतरी 'गुरुनाथ आबाजी' नावाचे ('निळे, सुगंधी धुके')प्रकरण आयुष्यात आले आणि 'प्रिये, तू भेटल्यानंतर मला मी आतापर्यंत कसा काय जगत होतो याचे नवल वाटले' म्हणणार्या त्या कवीप्रमाणे (कृष्णाकाठच्या कुंडलसारखे) आयुष्य 'पहिले उरले नाही'.
लेख आवडला
दुसरी संधी देण्याचा शहाणपणा
हे खूपच पटलं. अनेक कलानुभवांसाठी हे खरं आहे असं जाणवतं. गाणं असो सिनेमा असो कि पुस्तकं असो. कलानुभव आपल्यात बदल करतात बर्याचदा. पण कधीकधी आपल्यात झालेल्या बदलांमुळे, वयातील बदल असो किंवा विचारातील, आधी न आवडलेला एखादा कलाविष्कार नंतर, दुसर्या संधी मध्ये खूप आनंद देऊन जातो.
तपशील
फर्स्ट हॅण्ड नाही पण सेकण्ड हॅण्ड अनुभव इथे आहे :-
http://www.aisiakshare.com/node/1563
.
बाकीचं कधी फुरसतीत पाहू.
हांगाश्शी
आयुष्यात विशेषत्वाने ज्या स्त्रिया आवडत किंवा निदान ज्यांच्यावर क्रश होता अशातल्या काही नंतर तितक्या आवडत्या राहिल्या नाहित ह्याचा विचार करतानाही बरंच काही शिकता येतं>> मला वाटलंच होतं माझ्या अनुभवापलिकडचे काही अनुभव इतरांकडून वाचायला मिळणार असं. लगे रहो. आन्दो मनोबा, डिट्टेलवार लिवा.
यावरुन आठवलं. हजबंड्स सिक्रेट
यावरुन आठवलं. हजबंड्स सिक्रेट पुस्तकात चाळीशीतली आई आपल्या १२वर्षाच्या मुलीसोबत चाललेली असते. रस्त्यावरच कोणीतरी शिट्टी मारतं. आधी तिला वाटत आपल्यासाठीच मारलीय. मग लक्षात येत की शरीराला नुकतीच गोलाई येणारी मुलगी चेहरा लाल करुन, गाल फुगवुन भरभर चालतेय :-). मग ती विचार करायला लागते 'एक काळ असा होता की हे सगळ खूप मिळायच, म्हणुन नकोस वाटायच. पण परवा पावसात, मागुन स्ट्रीट लाईट येत असताना, स्कर्ट घालुन पळतपळत रस्ता ओलांडत होतो आणि ट्रक ड्रायव्हरने कोल्हाशिट्टी मारली, तरी आपल्याला केवढा आनंद झाला. मिडलाईफ/मेनोपॉज :-('.
शेवटचा १ हा आकडा बघुन व शेवटी
शेवटचा १ हा आकडा बघुन व शेवटी क्रमशः बघुनही सुखावलो!
ज्या कुठल्या मित्राने तुम्हाला हे अवलोकन करायला उचकवलं तो आता कित्येक जणांचे दुवे घेणार आहे :)
मस्तच..
फक्त इतक्या तपशीलात गोष्टी आठवणं आणि स्वतःकडे असं तटस्थपणे बघणं जमणं कठीण असल्याने दाद लेखनासोबत याही गोष्टींना आहे!
कधी कधी वाटतं की दर सहा
कधी कधी वाटतं की दर सहा महिन्याला आपल्या आवडीनिवडी, विचार, कल यांचा एक सर्व्हे नोंदवून आपण गेल्या काही वर्षांत, दशकांत कसे बदलत गेलो यांचा एक आलेख बघायला मजा येईल. आपण सिंहावलोकन करताना मागचीच काही वर्षं स्पष्टपणे दिसतात. कधी अनेक वर्षांपूर्वीचं अंधूक काहीतरी आठवतं आणि वाटतं, अरे, आपण असे होतो तर... कधी बदल चांगले असतात. कधी ते चांगले नसतात. मग वाटतं की ही घसरण सुरू झाली ती तेव्हाच जाणवली असती तर कदाचित थांबवण्यासाठी प्रयत्न करता आले असते.
'लेट मी गिव हिम ए सेकंड
'लेट मी गिव हिम ए सेकंड चान्स' असा विचार मी केला नसता तर...
*
दुसर्या कुणा शास्त्रीय गायकास फर्स्ट चान्स दिला असता.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ऐकायला आवडणे ही बेसिक टेण्डन्सी आहे. तिथपर्यंत प्रवास आपोआप होतो. दरम्यान लागणार्या खाचखळग्या, उचंवट्या डोंगरांमुळे नदी वळणे घेत जाते पण शेवटी सहसा समुद्रापर्यंत पोहोचतेच, तसे काहिसे ते आहे.
>असे, मला, वाटते.
अगदी असाच नाही, पण माझ्या
अगदी असाच नाही, पण माझ्या शास्त्रीय संगीत ऐकण्याची सुरुवात अशीच पं. जसराज (तेच ते 'ओम नमो भगवते...' वाले) प्रभृती गायकांपासून झाली. साधारण नववी-दहावीत वगैरे असेन मी त्यावेळी. त्यावेळी जसराज, संजीव अभ्यंकर, रशीद खान वगैरे मंडळी म्हणजे शास्त्रीय संगीतातली देव वाटायची. त्याच उत्साहात शास्त्रीय संगीत शिकायला लागलो त्याला अजून ४-५ वर्षं जावी लागली. मित्रांचा (प्रत्यक्ष/आंजावरील) प्रभाव वगैरे नसला तरी एकमेकांसोबत झालेल्या चर्चेतून नवनवीन ऐकायला मिळत गेलं. ग्वाल्हेर घराण्याची गायकी शिकत असल्याने त्यातले दिग्गज ऐकले आणि एके दिवशी जुन्या एम्पीथ्र्या आणि क्यासेटा चाळताना लक्षात आलं की आपण प. जसराज, रशीद खान पासून ते डी व्ही पलुसकर, अभिषेकी, मन्सूर, यशवंतबुवा जोशी, उल्हास कशाळकर, मुकुल शिवपुत्र वगैरे पर्यंत येताना आवडीनिवडींचे साचे पूर्णपणे बदलले आहेत. असो.
अवांतर - बादवे रशीद खान हा माझ्या मते क्यासेटवरच ऐकायला चांगला वाटणारा गायक आहे. प्रत्यक्ष ते मैफिलीत रशीदखानी दळण पेशन्सची परीक्षा पाहतं. कितीही तयारी असली तरी अतिशय बेशिस्त गाणं. दळणाचा आक्षेप बर्याच अंशी पं. जसराज यांनाही लागू होतो. अर्थात हे पूर्णपणे माझे वैयक्तिक मत आहे.
लेख
लेख आवडला. प्रत्येकाचा समजून घेण्याचा प्रवास साधारण या प्रकृतीचाच असेल असं वाटतं. तुमची आठवण लख्ख आहे. नेमकं कधी काय घडलं, नेमका कशाचा उलगडा कधी झाला, नेमकी खूणगाठ कधी बसली याचा ताळेबंद अजूनही चोख आहे याचे कौतुक वाटते. असो. कुतुहलाने पुढच्या भागांची वाट पहातो.