अकलके लड्डू बाटना चाहिये|

To err is human.

माणसाच्या हातून चुका होतात यात वावगे काही नाही. परंतु त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा होत असल्यास चुका करणार्‍या माणसाला मूर्खांच्या यादीत समाविष्ट करावे असे वाटल्यास नवल नाही. माणूस प्राणी उत्क्रांत होत होत एक समजूतदार, बुद्धीमान प्राणी असे स्वत:ला म्हणवून घेत आहे. आणि त्याच्या बुद्धीच्या क्षमतेत वाढ होण्यासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती आजची आहे. सकस आहार, सुदीर्घ आरोग्य, शिक्षणाच्या सुविधा, माहिती तंत्रज्ञानाची झेप, आव्हानात्मक गुंतागुतीच्या समस्या, बिनधोक काम इत्यादीमुळे माणूस आणखी जास्त बुद्धीमान, प्रतिभावान, सर्जनशील व्हायला हवा होता. परंतु परिस्थिती अगदीच उलट असून माणसं जास्तीत जास्त प्रमाणात मूर्खपणाचे प्रदर्शन करत आहेत. समाजाला कलाटणी देऊ शकणारी, ध्येय - धोरणं ठरविणारी उच्च पदस्थ माणसच चुका करू लागल्यास समाजाला फार मोठी किंमत द्यावी लागते. त्यांची एखादी क्षुल्लक चूक संपूर्ण समाजाला वेठीस धरू शकते. त्यामुळे माणसांच्या हातून अजिबात चूक होऊ नये याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. चुकीचे मूळ मूर्खपणात दडलेले असल्यामुळे हा मूर्खपणा आता व यानंतर न परवडण्यासारखा झालेला आहे.

चुका (पुन्हा) होता कामा नये असे अपराधीपणाच्या भावनेतून वाटत असल्यास कित्येक शहाणे म्हणवून घेणार्‍यानीसुद्धा घोडचुका केल्या आहेत हे लक्षात घ्यायला हवे. खरे पाहता ज्याप्रमाणे मानवी बुद्धीमत्तेचा विकास कसा होत गेला याचा अभ्यास केला जातो त्याचप्रमाणे माणसं मूर्खासारखे का वागतात याचाही अभ्यास करायला हवा. परंतु मानवी बुद्धीमत्तेच्या दुसऱ्या टोकाला असणार्‍या मूर्खपणावरील अभ्यास म्हणजे वेळेचा निव्वळ अपव्यय असेच वाटत असावे. कारण आपल्या हातून होणाऱ्या चुका त्या विशिष्ट क्षणी व त्या परिस्थितीत उद्भवलेल्या मूर्खपणाची उत्पत्ती असते. व ते तेवढे गंभीरपणाने घेण्याचा विषय होऊ शकत नाही. आपण सामान्यपणे आइन्स्टाइन, मोझार्ट, बर्ट्रांड रसेल, हॉकिंगसारख्यांच्या शोधात असतो. मूर्ख काय कुठेही हजारोनी सापडतील. परंतु प्रतिभावंताचे तसे नाही. बुद्धी नसणारे म्हणजे प्रयोगशाळेत वापरात येणाऱ्या उंदिरासारखे. असले काय नी नसले काय! दोन्ही सारखेच!

परंतु ही मूर्खपणाची जुनाट समस्या वरचेवर डोके काढत आहे व त्याचे काही नवीन कंगोरे सापडत आहेत. यानंतरच्या काळात मूर्खपणाला क्षमा नाही! मूर्खपणाचा अभ्यास आता शास्त्र बनू पाहत आहे. या जगाची धुरा संभाळणाऱ्यांच्यात जास्त बुद्धीमत्ता असते, हे समाजानी मान्य केले आहे. बुद्धीमत्ता जास्त असलेल्यांच्या हातातच सत्ता एकवटल्यामुळे त्यांची साधी चूकसुद्धा जीवघेणी ठरत आहे. त्यांच्या मूर्खपणातून घडणारी क्षुल्लक चूकसुद्धा आपल्या व्यवहारावर दीर्घकालीन दुष्परिणाम करण्याची शक्यता आहे. सत्ताधार्‍यांची चूक - हवे तर मूर्खपणा म्हणू या - वेळीच लक्षात आणून देण्याची गरज भासत आहे.

एक मात्र खरे की अव्यावहारिक, विसंगत वा तद्दन मूर्ख कल्पना एखाद्याच्या डोक्यात येणे म्हणजे त्याची बुद्धिमत्ता फारच कमी, हा एक गैरसमज आहे. मुळात बुद्धिमत्ता व विवेक वा तर्कशुद्ध विचार यांचा एकमेकाशी काही संबंध नाही. तुम्हाला एखाद्या विषयात जास्त गुण मिळाले किंवा एखाद्या विषयात तुमची mastery आहे याचा अर्थ दुसर्‍या वा इतर सर्व विषयातही तुम्ही तितकेच हुशार आहात असे होत नाही. महत्वाचे म्हणजे मूर्ख वा अविवेकी विचारापासून कुणालाही सुटका नाही. परंतु मेंदूला विचारांती कृती करण्याची सवय लागल्यास व त्याप्रमाणे मेंदू प्रशिक्षित होत गेल्यास कमीत कमी चुका होण्याची शक्यता वाढते. परंतु आपण विवेकी विचार करण्याच्या सवयी ऐवजी जास्तीत जास्त डिग्र्या मिळवण्याच्या मागे लागतो. परीक्षेतील जास्त गुण वा स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण वा अत्युच्च पदवी म्हणजेच जास्त प्रतिभावंत, शहाणा, ही मनोधारणा सर्वसामान्यात रुजलेली असल्यामुळे स्वत:ला शहाणे समजणारे कुठल्याही विषयावर भाष्य करण्यास मोकळे असतात. यामुळे समाजाची फार मोठी हानी होऊ शकते. वैयक्तिकरित्यासुद्धा हे धोकादायक ठरू शकेल. बुद्धिमत्ता जास्त असो वा नसो तर्कशुद्ध विचार न करणारे गोत्यात आल्याची अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील. (फक्त त्यांचा गाजावाजा होत नसल्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची!)

मोठ्या व/वा जबाबदारीच्या पदावर असलेल्यांचा मूर्खपणा तर जास्त धोकादायक ठरतो. बँकिंग व्यवहारातील उच्चपदस्थांकडून तर्कशुद्ध विचार व कृती करण्याची अपेक्षा असते. परंतु हेच तज्ञ तारतम्य न बाळगता उत्स्फूर्तपणे नको तेथे गुंतवणूक करत गेल्यास बँक बुडायला (व त्यामुळे लाखो खातेदारांना फटका बसायला) वेळ लागणार नाही. हेच विधान सत्तेवर असलेल्या राजकीय नेत्यांनासुद्धा लागू होऊ शकते. राजकारण्यांनी (तथाकथित) विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयामुळे किती नुकसान होऊ शकते याची अनेक प्रत्यक्ष उदाहरणं आपल्या अवती भोवती हजारोनी सापडतील. त्यामुळे बुद्धिवंत म्हणवून घेणार्‍यानी व सत्तेची धुरा संभाळणाऱ्यानी विनम्रपणे आपल्या चुका कबूल कराव्यात व सत्तेपासून चार कोस लांब रहावे. यातच समाजाचे व देशाचे हित आहे. पुढच्यानी अशा चुकावर मात करण्यासाठी काही उपाय योजना शोधाव्यात. निर्णयप्रक्रिया बिनचूक होण्यासाठी एखादी सक्षम यंत्रणा उभी करावी. गंमत म्हणजे आजकाल एखादीच व्यक्ती महत्वाचे निर्णय घेत नाही. निर्णय प्रक्रियेत अनेक तज्ञ सामील होत असतात. तज्ञांच्या सल्ल्यातून व चर्चेतून निघालेल्या निष्कर्षावरून निर्णय घेतले जातात. तरीही चूक कशी काय कुणाच्याही लक्षात येत नाही हे एक न सुटणारे कोडे आहे. म्हणूनच ऑस्कर वाइल्डला मूर्खपणा व्यतिरिक्त दुसरे कुठलेही पाप (sin) नाही असे म्हणावेसे वाटले असेल.

गुस्टाव्ह फ्लॉबर्ट या १९व्या शतकातील साहित्यिकाने आपण वास्तव्य करत असलेल्या जगाला काही मर्यादा आहेत. परंतु मूर्खपणाला कुठलेही मर्यादा नाहीत अशी परिस्थिती आहे. असे विधान केले आहे. व या लेखकाने पुराव्यानिशी हे विधान केले आहे हे विशेष! गावातील चावडीवरील गप्पा असोत वा विशेषज्ञांचे अभ्यासपूर्वक केलेले भाषण असो, त्याला नेहमीच मूर्खपणाच्या खुणा सापडत होत्या. या मूर्खपणाच्या गोष्टींचा शोध घेत घेत आयुष्यभर खपून त्यानी मूर्खपणाच्या उदाहरणांचा कोष तयार केला. (Encyclopedia of Stupidity). कोष छापून प्रसिद्ध होण्यापूर्वीच वयाच्या 58 व्या वर्षी त्याचा अकाली मृत्यु झाला. त्याचे हे काम अर्धवट राहिले. कदाचित इतरांच्या मूर्खपणाच्या वैविध्यपूर्ण नमुन्यामुळेसुद्धा त्याचा जीव गेला असावा!

मुळात माणसांच्या मूर्खपणाच्या मर्यादा व बलस्थान शोधणे हाच एक मूर्खपणा असल्यामुळे बुद्धिमत्तेच्या पंक्तीच्या (intelligence spectrum) दुसर्‍या टोकाला असलेल्या या विषयाचा अभ्यास कदाचित कुणीही केला नसेल. बुद्धिमत्ता नेहमीच चर्चेचा, अभ्यासाचा विषय होऊ शकतो. मूर्खपणा नव्हे. परंतु बुद्धिमत्तेच्या या स्पेक्ट्रमने काही प्रश्न उभे केले आहेत. मानव प्राणी homo sapiens म्हणून उत्क्रांत होत असताना मेंदू मोठा होत गेला व मानव प्राणी बुद्धिमान झाला, हेच खरे असल्यास एव्हाना हा संपूर्ण प्राणीवंश बुद्धिमान का झाला नाही? सर्वच्या सर्व माणसं प्रतिभावान का झाले नाहीत? शहाणी-सुरती माणसं मूर्खपणाचे प्रदर्शन का करतात? बुद्धिमत्तेचे समान वाटप का झाला नाही? अल्पमती असलेल्यांचासुद्धा मानवी अस्तित्वासाठी हातभार लागला असावा की काय? कमी बुद्धी असलेल्यानी शहाण्यांच्यावर मात तर केली नसेल ना? ... वगैरे, वगैरे. अशा प्रकारच्या प्रश्नांची यादी नक्कीच वाढवता येईल.

खरे पाहता आपल्यातील बुद्धिमत्ता मोजण्याचे विश्वासार्ह असे कोणतेही मापन आपल्याकडे उपलब्ध नाही. 50 - 60 वर्षापूर्वीपासून बुद्धी गुणांकावरून (IQ – Intelligence Quotient) बुद्धिमत्ता मोजण्यात येत आहे. त्या मापनात अनेक उणिवा असले तरी त्याचाच वापर अजूनही होत आहे. सामान्यपणे सरासरी बुद्धी गुणांक 70 ते 130 च्या दरम्यान असते असे समजले जाते. वयाच्या 16 व्या वर्षी सर्वात जास्त बुद्धी गुणांक असतो. बुद्धी गुणांकात जनुकाचा फार मोठा वाटा आहे असे समजले जाते. तरीसुद्धा बुद्धी गुणांकांचा आणि आपल्या अविवेकी वर्तनाचा, अविचाराचा वा अतार्किक कृतीचा एकमेकाशी काही संबंध नाही, असे तज्ञ मानतात. तुम्ही काही बाबतीत फार बुद्धिमान व इतर काही बाबतीत एकदम बुद्धू असण्याची शक्यता जास्त आहे. शहाण्यांच्या मूर्खपणातून घडलेल्या चुकांचा आढावा घेतल्यास या समाजाला एवढ्या मोठ्या आपत्तीतून का जावे लागत आहे याची नक्कीच कल्पना येईल. 2008 सालचे आर्थिक अरिष्ट हे एक अलीकडील मासलेवाइक उदाहरण ठरू शकेल. म्हणूनच मूर्खपणाचा स्वतंत्ररित्या अभ्यास केल्यास काही तरी हाती लागेल असे अभ्यासकांचे मत आहे.

बुद्धिमत्ता व मूर्खपणा या एकमेकाच्या विरोधात व दोन टोकाला आहेत ही कल्पना अगदी अलीकडची आहे. 15 -16 व्या शतकातील रिनेसान्सच्या कालखंडापर्यंत मूर्खपणाचे स्वतंत्र अस्तित्व होते व मूर्खपणा ही दैवी देणगी आहे, हा समज दृढ होता. काहीना त्यात गर्व, हट्टीपणा, अट्टाहास व नक्कल यांची झाक दिसत होती. 18व्या शतकाच्या मध्यकाळात मूर्खपणाची बरोबरी सुमार बुद्धिमत्तेशी करण्यात आली. पिढ्यान पिढ्या सत्ता भोगणार्‍या ऐवजी हा काळ बूर्ज्वांच्या हातातील सत्तेचा काळ होता. आणि तर्क - विवेक यांना या प्रबोधनकाळात उच्चस्थान मिळू लागले. प्रत्येकाला आपले नशीब आजमावण्याची संधी प्राप्त झाली.

आधुनिक काळात माणसाची क्षमता बुद्धिमत्तेशी व पर्यायाने बुद्धी गुणांकाशी जोडली जात आहे. अमूर्त वा अफलातून, आउट ऑफ दि बॉक्स विचार करण्याच्या क्षमतेसाठीसुद्धा हाच परिमाण वापरला जात आहे. 'तुमचा बुद्धी गुणांक 120 च्या जवळपास असल्यास कॅल्क्युलस सोडवण्यात तुम्हाला फार कष्ट पडणार नाहीत; 100 असल्यास तुम्ही ते थोडेसे श्रम घेऊन शिकू शकता; 70 असल्यास बापजन्मी तुम्हाला कॅल्क्युलस येणार नाही' ही मानसिकता रूढ असून हीच मोजपट्टी सर्व क्षेत्रात सर्रासपणे वापरली जात आहे.

इंटेलिजेन्स स्पेक्ट्रमवर काटा कुठे आहे यास अनेक घटक कारणीभूत आहेत. आपण जेथे वाढलो ते वातावरण, आपण घेतलेले शिक्षण, आपला आहार हेही घटक बुद्धी गुणांकाच्या कमी जास्तपणाला कारणीभूत ठरू शकतात. एकाच घरात वाढलेल्या दोन व्यक्तींच्या बुद्धी गुणांकातील फरकाचा मूळ शोधल्यास त्यांच्यातील जनुकीय गुणविशेषाकडे बोट दाखवता येईल. आणि हा फरक 40 टक्क्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे. जनुकीय वा परिस्थितीजन्य फरक आपल्या मेंदूच्या वाढीवर परिणाम करू शकतात. मेंदूतील वायरिंग बदलू शकतात. चाणाक्ष मेंदूतील न्यूरॉन्सच्या वैशिष्ट्यपूर्ण जोडणीमुळे त्याचे नेटवर्किंग जास्त क्षमतेने कार्य करू शकते. अशा व्यक्तींची वर्किंग मेमरी जास्त तीक्ष्ण असू शकते. समस्यांना उत्तरं शोधण्यासाठी लागणाऱ्या डावपेचांना ते उत्तम प्रकारे हाताळू शकतात. मेंदूतील न्यूरल कनेक्शन्समुळे मेंदूची जैविक रचना कार्यक्षमपणे, तल्लखपणे काम करत असते.

परंतु या कार्यक्षम मेंदूच्या उत्कृष्ट रचनेसाठी जबरदस्त किंमत द्यावी लागलेली असणार. अन्यथा आपण सर्वच जण बुद्धीवंतांच्या पंक्तीत जाऊन बसलो असतो! जास्त बुद्धीवंत विषण्णतेचे बळी असण्याची शक्यता असते. आत्महत्या करण्याकडे त्यांचा कल असतो. मात्र यासंबंधात अजूनही तितका अभ्यास झालेला नाही. याबद्दल फारच तुटपुंजी माहिती उपलब्ध आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धात जास्त बुद्धीमान असलेले सैनिक व अधिकारी यांचे मृत्युचे प्रमाण तुलनेने इतरांपेक्षा जास्त होते. कदाचित इतर अनेक घटकही यास कारणीभूत ठरत असाव्यात.

त्याचप्रमाणे माणसामाणसागणिक बुद्धीतील फरकाला मेंदू उत्क्रांत होत असताना त्या काळच्या आव्हांनाना तोंड देण्यासाठी होत गेलेल्या जनुकीय ड्रिफ्टसुद्धा कारणीभूत ठरली असावी. आपल्यातील बुद्धिमत्तेला सुमारे 2000 ते 5000 सततपणे उत्परिवर्तित (Mutation) होत असलेले जनुक कारणीभूत असतात. ज्यांच्या जनुकांचे नीटपणे उत्परिवर्तन हळू हळू होत गेले ती जनुकं पुढच्या पिढीत उतरल्या नसल्यामुळे त्यांच्या बुध्दीमत्तेत कमतरता आली असावी, परंतु एकसंध समाज बांधणीत या कमी बुद्धिमत्तेच्या वर्गाचासुद्धा चांगलाच सहभाग असावा. शिवाय उच्च बुद्धिवंतांच्या जिवावर या लोकांनी चांगलीच चैन केली असावी. जनुकांचे अस्तित्व टिकवणे व पुनरुत्पादन या मूलभूत अपेक्षांना या मंद बुद्धीच्या गटांनी चांगलीच साथ दिली असावी!

एक मात्र खरे की आपल्या पूर्वजांची बुद्धिमत्ता किती होती, कशी होती याचा अंदाज घेणेही शक्य होणार नाही. मात्र सरासरी बुद्धिमत्ता वाढतच आहे याबद्दल दुमत नसावे. मुळात मेंदूच्या उत्क्रांतीबद्दल विधान करताना अलिकडे होत असलेल्या या विषयातील संशोधनांचाही विचार करावा लागेल. माणसाच्या वैचारिक क्षमतेचे अनेक आयाम असून वाचन दोष (dyslexia), शिक्षण वा संस्कृतीमुळे बुद्धी गुणांकात फार मोठा फरक जाणवू शकतो. शंभर-दोनशे वर्षापूर्वीच्या बौद्धिक चाचणीत आपण कदाचित नापास होऊ. 70-80 बुद्धी गुणांक असलेल्या व्यक्तीचे चार-पाच भाषेवर प्रभुत्व असू शकेल. अगदी सामान्य कुवतीची व्यक्तीसुध्दा हजारो लोकांची लाखो रूपये लूट करू शकेल. त्यामुळे जास्त बुद्धी गुणांक असलेले विवेकीपणाने वा तर्कशुध्दपणे वागतीलच याची कुणीही खात्री देऊ शाकणार नाही. अनेक वैज्ञानिकानां हवामान बदलाचे दुष्परिणाम खोटे वाटतात. यामुळेच आयक्यू हे बुद्धिमत्तेचे ढोबळ मापक आहे असे म्हणता येईल.

मूर्खपणाच्या पुराव्यांचा वैज्ञानिकरित्या विश्लेषण करता येत नसल्यामुळे फ्लॉबर्ट निराश झाला असावा. वैज्ञानिकांच्या मते मूर्खपणा हे एक अवैज्ञानिक पद आहे व त्याविषयी जास्त विचार करण्याची गरज नाही.. परंतु फ्लॉबर्ट यानी पुराव्यासकट मूर्खपणामुळे किती नुकसान होऊ शकते याची जंत्रीच प्रस्तुत केल्यामुळे वैज्ञानिकांना मूर्खपणा म्हणजे नेमके काय याचा शोध घ्यावासा वाटला. शहाण्या व्यक्तीतील काही जणांच्या मूर्खपणामुळे समाजात उलथा-पालथ होऊ शकते, समाजाचे नुकसान होऊ शकते हे फ्लॉबर्ट यांनी ठासून सांगितल्यामुळे अभ्यासक या विषयाकडे लक्ष देऊ लागले. भावना व बुद्धिमत्ता यांचा अभ्यास करणा-या एका तज्ञाने कित्येक बुद्धिवंत तद्दन मूर्ख असतात असे विधान केले आहे, हे खरे वाटू लागते.

या विरोधाभासाचे नेमके काय कारण असावे? एका तज्ञांच्या मते माणूस हा रॅशनल प्राणी आहे हेच मुळात चुकीचे विधान आहे. आपला मेंदू जेव्हा एखाद्या माहितीवर प्रक्रिया करत असतो तेव्हा दोन वेगवेगळ्या पध्दती कार्यरत होतात. बुद्धी गुणांक चाचण्या यातील विश्लेषक बुध्दिमत्तेचे मापक आहे. आपली जाणीव कशा प्रकारे समस्यावर उत्तर शोधते, या संबधीचे काही आडाखे एका पद्धतीत अंतर्भूत असतात. परंतु दुसरी पध्दत पूर्णपणे बुद्धीला वर्ज्य करून उत्स्फूर्ततेला उच्च स्थान देते.

खरे पाहता ही उत्स्फूर्तताच मानवी उत्क्रांतीत भरपूर फायदेशीर ठरत गेली. माहितीच्या डोंगराखाली दबलेल्या या प्राण्याला उत्स्फूर्ततेतून शॉर्ट कट्स मिळू लागल्या आणि समस्यांच्या व आपत्तीच्या जंजाळातून तो सहिसलामत सुटू लागला. गट् फीलिंग्समधून निर्णय घेत गेल्यामुळे हे करू की ते किंवा ते उत्कृष्ट की हे असे हॅम्लेटच्या नाटकातील भुतासारखे प्रश्नांच्या तावडीत न सापडता अत्युत्कृष्ट नसले तरी चालेल, परंतु कठिण प्रसंगातून बाहेर पडता यायला हवे एवढ्यावरून तो कृतीशील झाला व ही गट् फीलिंग त्याला बहुतेक वेळा फलदायी ठरली.

परंतु गट् फीलिग दर वेळी कामी येईलच याची खात्री कुणी देऊ शकणार नाही. काही प्रसंगात ते ठीक आहे असे वाटत असले तरी त्याची चिकित्सा न केल्यास त्या तुमच्या योग्य निर्णयापासून दूर नेऊ शकते. व ही चिकित्सा न करणे किंवा करता न येणे यातूनच मूर्खपणाची सुरुवात होते. मी रुळलेल्या वाटेवरून जात असून ही पारंपरिक कृती मला योग्य ठिकाणी पोचवते असे निर्देश करणारा एखादा स्विच आपल्या मेंदूत नाही. त्यामुळे आपल्या मेंदूंना चिकित्सकपणे विचार करण्यात प्रशिक्षित करावेच लागेल. मेंदूतील न्यूरॉन्सना ट्रेनिंग देऊन तरबेज करावेच लागेल.

मुख्य म्हणजे यात बुद्धी गुणांकाचा कुठेही संबंध येत नाही. व कदाचित बुद्धी गुणांकाचा या कामी उपयोगही होणार नाही. मानवी मूर्खपणा समजून घेण्यासाठी व हा मूर्खपणा कशा प्रकारे, कुठे प्रकट होतो व याला प्रतिबंध करण्यासाठी नेमके काय करायला हवे यासाठी आता आपल्याला वेगळी व्यवस्था करावी लागेल. एखादे नवीन मापन शोधावे लागेल.

विवेक गुणांक - RQ
कॅनडास्थित काही तज्ञांचा गट बुद्धिमत्तेला छेद देणार्‍या गोष्टींचा अभ्यास करत असून हा गट Rationality Quotient (विवेक गुणांक - RQ) या एका नवीन मापनाचा अभ्यास करत आहे. त्यांच्या मते मनात उभारणार्‍या संदिग्धतेचे हे मापन होऊ शकते. उदाहरणार्थ, राहूल स्मिताकडे बघत आहे. परंतु स्मिता त्याच्याकडे न बघता ती प्रकाशकडे बघत आहे. राहुल विवाहित आहे व प्रकाश व स्मिता अविवाहित आहेत. विवाहित व्यक्ती अविवाहित व्यक्तीकडे बघावे का? कदाचित या प्रश्नाचे उत्तर हो, किंवा नाही किंवा काही सांगता येत नाही असे मिळेल. बहुतांश जण मात्र सांगता येत नाही हेच उत्तर देण्याच्या पावित्र्यात असतात. कारण डोक्याला काही ताण न देता चटकन देता येणारे तेच एकमेव उत्तर असू शकेल. परंतु थोड्याशा विचारानंतर नेमके उत्तर नक्कीच देता येईल. विचार करण्याची तसदी घेण्यास सहजपणे कुणीही तयार होत नाहीत.

समस्येला योग्य उत्तर शोधताना बुद्धीचा वापर करत समस्येचा विश्लेषण करण्या बरोबरच विवेक गुणांक कृतीशील होताना किती धोका पत्करावा याचीसुद्धा जाणीव देत असतो. काही प्रसंगात कितपत धोका पत्करावा हे उपलब्ध असलेल्या माहितीवरूनसुद्धा कळू शकते. जुगार खेळताना आपण(च) जिंकणार याच्यावर आपला पूर्ण भरवसा असतो. परंतु अशा प्रकारची खात्री वैवाहिक जीवनात वा घटस्फोटच्या प्रसंगी देता येत नाही. RQ कमी असल्यास तुमचे सर्व हिशोब चुकतच जातील. धोक्याची कल्पना येत नसल्यामुळे घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात व आपण गोत्यात येतो.

हा विवेक गुणांक (वा नीरक्षीर विवेक बुद्धी) किती आहे याचा अंदाज घेता येईल का? IQ प्रमाणे RQ उपजत आलेल्या जनुकातून वा तुम्ही वाढलेल्या वातावरणातून वा तुमच्या वर झालेल्या संस्कारातून येत नसतो. इतर कुठल्याही घटकांपेक्षा तुम्ही संपादन केलेले ज्ञान, ज्ञानाच्या सहाय्याने केलेले प्राप्त परिस्थितीचे विश्लेषण, विश्लेषणाच्या निष्कर्षातून बांधलेले कृतीचे आडाखे व या कृतीशीलतेला कारणीभूत ठरणारी जाणीवच तुमच्यात नैसर्गिकरित्या किती RQ आहे हे सांगू शकेल. जास्त RQ असणारे जाणीवपूर्वक कृती करतात व ही कृती करण्यासाठी त्यांच्याकडे अनेक पर्यायी मार्गांचा साठा असतो. तुमच्यातील उत्स्फूर्तेला प्रश्न विचारण्याची सोय यात असते. त्यावरून योग्य निर्णय घेणे शक्य होते. त्यामुळे तुम्हाला काय माहित आहे, काय माहित नाही वा कितपत माहित आहे या गोष्टीवरून तुम्ही निष्कर्ष काढू शकता व कृती करू शकता.

परंतु ही जास्त RQ सुद्धा, तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर असलेल्या प्रसंगातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी उपयुक्त ठरेल की नाही याबद्दल शंका आहेत. काही कठिण प्रसंगात तुमच्या एकट्याचीच तयारी असून उपयोगी ठरत नाही. अवती भोवतीची परिस्थितीसुद्धा थोडी फार अनुकूल असावी लागते. सर्वात महत्वाचे म्हणजे भावनेचा अतिरेक योग्य निर्णय घेण्यास अडसर ठरतो. भयगंड, दु:ख, वेदना, चिंतातुरता तुमच्या वर्किंग मेमरीला गुंतागुंतीचे करून टाकतात. नवीन काही सुचू देत नाहीत. त्यामुळे समस्याचा विचार करण्यास मर्यादा येतात. अशा वेळी आपला मेंदू short cut म्हणून रुळलेल्या वाटेवर जाण्याचा प्रयत्न करू लागतो. व ही रुळलेली वाट तितकी आशादायक नसल्यास माणूस फसतो. व नंतर पश्चात्ताप करून घेण्याची वेळ येते. बहुतेकांची स्थिती हीच असते.

काही अभ्यासकांच्या मते मूर्खपणाला उत्तेजन देण्यासाठी आर्थिक व्यवहार करणार्‍या व्यापारी संस्था सदैव तयारीत असतात. अशा प्रकारच्या व्यापारी संस्था जास्त बुद्धिमत्ता असलेल्यांचा कशा प्रकारे वापर करतात यावर प्रबंध लिहिणार्‍या संशोधकांना आपापले प्रबंध फाडून टाकावे लागले. कारण ज्या क्षेत्रातून ही बुध्दीमान व्यक्ती आलेले असतात, त्या क्षेत्राशी व त्यांच्या प्रत्यक्ष कामकाजाशी काहीही संबंध नसतो. कार्यात्मक मूर्खपणा (Functional Stupidity) म्हणून हेटाळणी करत त्यांच्याकडून कुठले तरी भलतेच काम करून घेतले जात असते. कार्पोरेटचा दबाव, धोका पत्करण्यास वाव नसणे व रुळलेल्या मार्गावरूनच जाण्याचे बंधन त्यामुळे अनेक संशयास्पद व्यवहार होतात व त्यातूनच डोलारा कोसळू लागतो. सर्व संबधित अत्यंत (smart) असूनसुध्दा व्यवहारातील धोका स्पष्टपणे सांगण्यास एकजणही पुढे येत नाही. एखादा - दुसरा आलातरी काहीबाही सांगून त्याला गप्प बसवले जाते. ज्याच्यापाशी सत्ता आहे त्याची अरेरावी चालते. त्यामुळे शहाणेसुद्धा तार्किकतेला बाजूला सारून मूर्खपणाला साथ देतात. आर्थिक घोटाळ्याचे चटके सामान्य माणसाला बसत असल्यामुळे या मूर्खपणाला क्षमा नाही, असेच म्हणावे लागते. मुळात या कार्पोरेट मध्ये भरती करताना त्यांचा RQ मोजण्याचे कुठलेही मापन नाही. चाचण्या कशा घ्याव्यात याचे एकही निकष नाही. त्यामुळे येथे मनमानी होत आहे. निदान त्यासाठी तरी 'मूर्खपणाचा' अभ्यास करणे गरजेचे ठरेल.

हा अभ्यास आपल्या सारख्या सामान्य लोकांनासुध्दा काही मार्ग दाखवू शकेल. निदान धंदेवाईकपणे फसवणूक करणार्‍यांचे आपण बळी पडू नये, इतपत झाले तरी या अभ्यासाचा फायदा होईल.

संदर्भ 1. न्यू सायंटिस्ट, 2 एप्रिल 2013 व 2.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

लेख आवडला. वाचनीय व मननीय आहे. वाचता वाचता, आयुष्याभरांत, मी केलेल्या मूर्खपणाच्या असंख्य गोष्टी आठवल्या. बाकी काही नाही तरी, याची पोतडी अगदी ओसंडुन वाहील, अशी आहे माझ्याकडे.

मीराबाईच्या ओळी आठवल्या.

मूरखको तुम राज दियत हो
पंडित फिरत भिकारी |

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मीरा की सूरदास? शांताबाई शेळक्यांनी 'हे बंध रेशमाचे' नाटकासाठी या गीताचा अनुवाद केला आहे, तो इथे. यात शेवटचे कडवे असे आहे.

मूर्ख भोगितो राजवैभवा
पंडित फिरत भिकारी
सूरदास विनवितो प्रभूला
क्षणक्षण हो जडभारी !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

तिसरे कडवे ऐकावे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

शांताबाईंनी यातीलच दोन कडव्यांचा अनुवाद केलेला दिसतो आहे. पण मग यात सूरदास कुठून आणला देव जाणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

लेख आवडला.
थोडक्यात सत्तेपुढे शहाणपण चालत नाही ते मुर्खपणामुळेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला.

परंतु एकसंध समाज बांधणीत या कमी बुद्धिमत्तेच्या वर्गाचासुद्धा
चांगलाच सहभाग असावा. शिवाय उच्च बुद्धिवंतांच्या जिवावर या लोकांनी चांगलीच चैन केली असावी. जनुकांचे अस्तित्व टिकवणे व पुनरुत्पादन
या मूलभूत अपेक्षांना या मंद बुद्धीच्या गटांनी चांगलीच साथ दिली असावी! >> Biggrin फार पटलं.

Encyclopedia of stupidity मधली काही उदाहरणे दिली असती तर अधीक रंजक झाला असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख चांगला वाटला, पण एकदम विस्कळित वाटला, नक्की नेमकं काय सांगायचं आहे, ते कळलं नाही.
Behavioral Economics and Psychology (मानसशास्त्र) साठी एक सुंदर पुस्तक सुचवावेसे वाटते.
Thinking Fast & Slow by Daniel Kahneman.
पुढेमागे जमले तर नक्की या विषयी एखादा लेख लिहीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख सवडीने वाचतो. तूर्त मूर्खपणा विरुद्ध बुद्धिमत्ता हे समीकरण फारसे पटले नाही. मूर्खपणा विरुद्ध शहाणपणा असे हेवे, नाही का? बुद्धी ही सर्वस्वी वेगळी मिती आहे. बुद्धीमान लोकही मूर्खपणा करताना दिसतातच. असो, यावर अधिक नंतर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

मुर्ख कुणाला म्हणावे? सोप उत्तर; जो आपल्या विचारांशी सहमत नाही त्याला. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/