कविता आणि वादळ
अनिरुध्द अभ्यंकर
कविता
सगळे शब्द
ओंजळीत घेऊन
तू कागदावर शिंपडतेस...
आणि त्यातले
तुला नको असलेले शब्द
अलगद पुसून टाकतेस...
बाकी उरते
कागदावर
ती
कविता...
वादळ
कालच्या वादळात
बरंच काही उद्ध्वस्त झालं...
तुझी कविता
ती ही पडून फुटली...
आता
घरभर पसरलेले
हे शब्द
गोळा करण्यात
किती काळ जाईल
काय माहीत...
मस्तच!
मनातलं वादळ कवितेत व्यवस्थित उतरलंय!.. मस्तच!