Skip to main content

ब्रिटिश राज आणि नुकसानभरपाई

http://www.bbc.com/news/world-asia-india-33618621?ocid=fbindia

नुकतेच माजी परदेशमंत्री शशी थरूर यांनी ब्रिटन मध्ये आयोजित एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात ब्रिटन कडून त्यांच्या सत्ताकालात भारतीय जनतेच्या झालेल्या अपरिमित नुकसानीबद्दल ब्रिटन ने भारताची माफी मागून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली . त्याबद्दल संपूर्ण देशात थरूरजी यांचे कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही थरूर यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर आजतागायत कोणी हा मुद्दा उचलून धरला होता का? इथे तर अशी परिस्थिति आहे की ब्रिटीशांनीच भारताचे कल्याण केले ,विकास घडवला , रेल्वे /पोस्ट /तार आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान आणून पुराणकथात रमणार्या भारतीय /हिंदू समाजाचा उद्धार (?) केला अशी मते बाळगणारे आणि व्यक्त करणारे लोकही आज भारतात सापडतात , त्यांना सणसणीत चपराक हाणत शशी थरूर यांनी ब्रिटीशांनी भारताला किती व कसे लुटले? भारतीय सैनिकांचा वापर करून पहिले व दुसरे महायुद्ध जिंकताना भारताच्या हाती मात्र धुपाटणेच कसे आले ?बंगाल मध्ये 1943 साली पाडलेल्या भीषण दुष्काळाच्या वेळी ब्रिटिश सरकारने केलेले अक्षम्य दुर्लक्ष, जालियानवाला बागेत क्रौर्या ची परिसीमा गाठणारे अमानुष हत्याकांड याचा समग्र ऊहापोह थरूर यांनी केला . ब्रिटिश येण्यापूर्वी जगाच्या व्यापारातील भारताचा हिस्सा 24% होता ,परंतु 1947 साली तो हिस्सा फक्त 4% राहिला होता. देशी उद्योगधंद्याना पद्धतशीरपणे मारून टाकायचे, भारतीय कच्चा माल स्वस्त दरात विकत घेवून ब्रिटनमध्ये त्यावर प्रक्रिया करून पुन्हा चढया दराने भारतात आणि जगात विकायचा ,असा अव्यापारेषू व्यापार ब्रिटीशांनी केला . या आणि अशा अनेक "गुन्ह्यांसाठी" ब्रिटन जबाबदार असून त्याची जबाबदारी ब्रिटनला टाळता येणार नाही ! त्याचबरोबर भारतातून “चोरलेला” कोहिनूर हिरा त्वरित भारतास परत करावा आणि ब्रिटिश सत्ताकालात भारतीय जनतेच्या झालेल्या अपरिमित नुकसानीबद्दल ब्रिटन ने भारताची माफी मागून नुकसानभरपाई देण्याची रास्त मागणीही केली .

परखड मत व्यक्त करून खर्या इतिहासाची जाणीव ब्रिटीशांना ,जगाला आणि भारतीयांनादेखील करून दिल्याबद्दल शशी थरूर यांचे (ते कोंग्रेसवासी असूनही ) माझ्याकडून जाहीर आभार व अभिनंदन !

गवि Fri, 24/07/2015 - 16:33

हा प्रश्न मागे एका धाग्यावर मी उपस्थित केला होता की समजा आता अशी भरपाई द्यायची झाली तर ती कोण आणि कशी ठरवणार? कोणत्या न्यायालयात ही केस चालणार? वगैरे.

त्यावरुन नुकसान /लूट कशी मोजतात / मोजावी यावरही रोचक चर्चा झाल्याचं आठवतं. ऑपॉर्च्युनिटी लॉस, प्रत्यक्ष लूट, संचित तोटा इत्यादि इत्यादि.

राजीव साने यांनी दिलेल्या एका उदाहरण कम प्रश्नातः

समजा "ब"ने अमुक वर्षांपूर्वी "अ"च्या दहा गायी चोरुन नेल्या. त्यानंतर आजपर्यंतच्या काळात "ब"ने त्या दहांपासून हजार गायी बनवल्या. पण "अ"ने मात्र त्याच्याकडे उरलेल्या दहा गायींपासून शंभरच गायी उत्पन्न केल्या. आता भरपाई करायची असल्यास "ब"ने "अ"ला किती गायी द्यायच्या? दहा, शंभर की हजार?

साधारणतः शंभर हे उत्तर सर्वांना पटण्यासारखं दिसतं. ज्याने संधी गमावली त्याच्या सिद्ध क्षमतेनुसार ऑपॉर्च्युनिटी लॉस मोजावा.

अर्थात अशी भरपाई मिळणं जवळजवळ अशक्य असल्याने अशी मागणी ही केवळ बाणेदारपणा म्हणूनच कौतुकास्पद आहे इतके मान्य करता येईल..

धागा सापडला तर लिंकवतो.

बॅटमॅन Fri, 24/07/2015 - 16:45

In reply to by गवि

रक्कम किती हा मुद्दा कळीचा नाहीच असं थरूर म्हणतात. मुळात तत्त्वतः ब्रिटन देणे लागते हेही लोकांना धडपणी मान्य करवत नाही. आणि यात फक्त ब्रिटिश लोकच आघाडीवर असते तर ते समजण्यासारखे आहे. पण ते एक असोच. आता ब्रिटिश राज्यामुळेच भारताची किती अन कशी प्रगती झाली आणि भारतावर इंग्रजांचे कसे उपकार आहेत आणि त्यांच्यावर टीका करणारे कसे सगळे प्रतिगामी-हिंदुत्ववादी वगैरे आहेत इ.इ. प्रतिसाद येतील त्यांच्या प्रतीक्षेत.

अनु राव Fri, 24/07/2015 - 17:08

In reply to by बॅटमॅन

बॅट्या - तुला वाटले तसे कीतीही प्रतिसाद द्यावेसे वाटले तरी देणार नाही. हे लेखक महाशय कुठले तरी चावून चोथा झालेले विषय काढत असतो. हे असले विषय कॉलेज मधे असताना किंवा जास्तीत जास्त वयाच्या २५ वर्षापर्यंत चर्चेत असले तर ठीक आहे. अजुनही ह्या विषयावर चर्चा कराविशी वाटत असेल तर कठीण आहे.

बॅटमॅन Fri, 24/07/2015 - 17:31

In reply to by अनु राव

हे असले विषय कॉलेज मधे असताना किंवा जास्तीत जास्त वयाच्या २५ वर्षापर्यंत चर्चेत असले तर ठीक आहे. अजुनही ह्या विषयावर चर्चा कराविशी वाटत असेल तर कठीण आहे.

हो बरोबरे, पुढे पुढे फक्त सासूसुनेच्या कुरबुरी, लहान पोरांची पचनसंस्था, टीव्ही सिरियली अशा ज्वलन्त विषयांबद्दलच बोलले पाहिजे.

अस्वस्थामा Fri, 24/07/2015 - 20:05

In reply to by बॅटमॅन

हो बरोबरे, पुढे पुढे फक्त सासूसुनेच्या कुरबुरी, लहान पोरांची पचनसंस्था, टीव्ही सिरियली अशा ज्वलन्त विषयांबद्दलच बोलले पाहिजे.

अग्गागा.. जबराच हे.. माबोवरचे "मालिकां"बद्दलचे वाहते धागे पाहिले की याची खात्री पटते. ;)

प्रसन्ना१६११ Fri, 24/07/2015 - 17:21

परखड मत व्यक्त करून खर्या इतिहासाची जाणीव ब्रिटीशांना,जगाला आणि भारतीयांनादेखील करून दिल्याबद्दल शशी थरूर यांचे (ते कोंग्रेसवासी असूनही )

हा कळीचा मुद्दा!
आणखी म्हणजे

नुकसानीबद्दल ब्रिटन ने भारताची माफी मागून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली

नुकसानभरपाई जाऊद्या..वॉर क्राईम बद्दल मागतात (किंवा अशी मागणी इतर लोक करतात) तशी माफी मगितली तरी पुरे!

अंतराआनंद Fri, 24/07/2015 - 17:22

थरुर महाशयांचे कौतुक करावे तेवढे थोडे. पण ही आंतरर्देशीय नुकसानभरपाईची मोजणी व्हायला जरा वेळ लागेलच तोवर देशांतर्गत वेगवेगळ्या गटांनी हे असे नुकसानभरपाईचे मुद्दे काढून ती द्यायची, घ्यायची ठरवले तर हो?

बॅटमॅन Fri, 24/07/2015 - 17:37

In reply to by अंतराआनंद

हे इतकेही अकल्पनाख्य वगैरे नाहीये. जर्मनी व खुद्द इंग्लंडनेच काही केसेसमध्ये नुकसानभरपाई दिल्याचे त्या भाषणातच सांगितलेले आहे. त्यामुळे याच्यापुढे काय होईल वगैरे कल्पना करून मुद्दा भरकटवणे याला कै अर्थ नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 24/07/2015 - 18:40

In reply to by अंतराआनंद

म्हणजे अयोध्येतल्या ऐतिहासिक वास्तूची नासधूस करण्याबद्दल भरपाई, रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या राजकीय पक्षा/नेत्यांनी दिलेली भरपाई, बंद-संप पुकारून टायर, बस जाळणाऱ्यांनी दिलेली भरपाई असं का?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 24/07/2015 - 19:06

In reply to by बॅटमॅन

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल असे उद्गार कृपया जाहीर व्यासपीठावर काढू नयेत. संस्थळावर लिहायचं असेल तर ते बंद पडेल अशा कारवाया करून चालणार नाही. संप-बंद पुकारून नासधूस केल्यास संप-बंद पुकारणाऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी लागेल असा न्यायालयाचा निर्णय आहे.

बॅटमॅन Fri, 24/07/2015 - 20:06

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

१. या ठिकाणी मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला उद्देशून बोललो असे कुठे सिद्ध होते?

२. उद्धृत केलेल्या संस्कृत ओळीचा तुमच्या लेखी अर्थ काय?

या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर आभारी असेन. त्यावरून एकूणच आकलनाबद्दल बरेच रोचक अर्थनिर्णयन होईल. :)

ठरवूनच विपर्यास करावयाचा म्हटला की असे प्रतिसाद निघतात. काळजी वाटते हो.

आदूबाळ Fri, 24/07/2015 - 17:40

हम्म. व्यवहार "आर्म्स लेंग्थ" तत्त्वानुसार झाला पाहिजे. म्हणजे ब्रिटिशांनी रेल्वे बांधली, पोस्ट सर्विस उभी केली, चहासारखी नगदी पिकं आणली, याबद्दल त्यांना योग्य मोबदला दिला पाहिजे आणि तो मिळणार्‍या मोबदल्यातून नेट ऑफ झाला पाहिजे.

चौथीत "दिनूचे बिल" नावाचा धडा होता, त्याची आठवण आली.

बॅटमॅन Fri, 24/07/2015 - 17:43

In reply to by आदूबाळ

यू शुअर अबौट द नेट गेन? :)

त्याहीपुढे जाऊन बेसिक प्रश्नः इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ ब्रिटिश रूल ऑन इंडिया याबद्दल काही पुस्तके ठाऊक आहेत पण ती खूप जुनी झाली आता. बर्‍यापैकी नवे आणि मॅक्रो स्ट्रक्चर असलेले एखादे पुस्तक आहे का? म्हणजे काय भानगड आहे साधारणपणे ते कळेल तरी.

आदूबाळ Fri, 24/07/2015 - 18:15

In reply to by बॅटमॅन

आमच्या व्यवसायात थरूरसायबासारख्या आर्ग्युमेंटमध्ये कितपत दम आहे ते तपासण्यासाठी "ऑप्शन्स रियलिस्टिकली अ‍ॅव्हलेबल" नावाचं विश्लेषण करतात. म्हणजे: ज्या घटनेचे परिणाम आपण आकडेबद्ध करायचा प्रयत्न करत आहोत, त्या घटनेमध्ये प्रत्येक पार्टीची बार्गेनिंग पॉवर किती होती, त्यांना कोणकोणते पर्याय उपलब्ध होते, त्यापैकी कोणते पर्याय शक्यतेच्या कोटीतले होते, आणि परिणामतः "सेकंड बेस्ट आल्टरनेटिव्ह" घेतला, तर त्याचा आर्थिक परिणाम काय होऊ शकला असता.

यात अर्थातच अनेक फ्याक्टर असतात, आणि त्यातल्या अनेकांना किंमत/मूल्य/प्रोबेबिलिटी लावता येत नाही. उदा० मराठे पानिपतचं युद्ध जिंकले असते तर? (नारळीकरांची विज्ञानकथा.) किंवा, मराठा कॉन्फेडरसी टिकली असती तर त्यावर ग्रेट डिप्रेशनचा काय परिणाम झाला असता?

त्यामुळे भाषण ठोकायला हा मुद्दा बेस्ट असला, तरी - गवि म्हणतात त्याप्रमाणे - हे क्वांटिफाय करणं निव्वळ अशक्य आहे.

त्याहीपुढे जाऊन बेसिक प्रश्नः इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ ब्रिटिश रूल ऑन इंडिया याबद्दल काही पुस्तके ठाऊक आहेत पण ती खूप जुनी झाली आता. बर्‍यापैकी नवे आणि मॅक्रो स्ट्रक्चर असलेले एखादे पुस्तक आहे का? म्हणजे काय भानगड आहे साधारणपणे ते कळेल तरी.

काय की! गब्बरभौ सांगू शकतील.

बॅटमॅन Fri, 24/07/2015 - 18:24

In reply to by आदूबाळ

रीझनिंग बरोबरे, पण याअगोदर प्रिसिडंट आहे म्हणून म्हणतो की कैतरी लॉजिक लावलं असेलच ना. थरूर स्वतः भाषणातच सांगत नैये का की जर्मनी आणि खुद्द ब्रिटननेच काही केसेसमध्ये भरपाई दिलीये म्हणून? त्यामुळे वाटते की हे अशक्य नसावे- भलेही मेथडॉलॉजी फूलप्रूफ किंवा पापिलवार नसली तरी.

गब्बर सिंग Fri, 24/07/2015 - 23:49

In reply to by आदूबाळ

जेकब व्हायनर यांनी याबद्दल लिखाण केलेले आहे असे मिल्टन फ्रिडमन यांनी म्हंटलेले आहे. हा व्हिडिओ पहा.. ५:४५ ते ६:२० च्या दरम्यान.

"All of the studies show that it cost Britain more to maintain India. Colonialism has always cost the "mother country" more than it has gotten any direct or indirect economic benefit from it."

जेकब व्हायनर यांचे लिखाण मी वाचलेले नाही. व त्याचे rebuttal कुणी लिहिलेले आहे का ते ही माहीती नाही. त्यामुळे माझे असे मत नाही. ( इन्सिडेंटली जगदीश भगवतींनी जेकब व्हायनर यांच्या लिखाणाचे संदर्भ दिलेले आहेत त्यांच्या एका पुस्तकात.)

यात फ्रिडमन साहेब जरा जास्त आक्रमक झालेले आहेत व त्यांनी एक क्लेरिकल मिष्टेक सुद्धा केलेली आहे - १९४७ च्या ऐवजी १९४८ ची.

-----

इतिहासकार नील फर्ग्युसन यांनी "मी कॉलेजात असताना खूप आक्रमक वसाहतवादाबद्दल un-apologitic होतो पण माझे मत नंतर संपूर्ण बदलले." - असे विधान केलेले होते ते आठवले. ते एका पुस्तकात केले होते ते शोधतोय. कारण त्यात त्यांनी डिटेल्स / संदर्भ दिलेले असतील असा कयास आहे.

अनु राव Fri, 24/07/2015 - 18:18

In reply to by बॅटमॅन

ब्रिटीशांनी भरपाईच द्यायची तर जी काय ५००-१००० संस्थाने होती त्यांना द्यायला हवी ना ( त्यांच्या राजांना ). जनरल पब्लिक तर तसेही अभावग्रस्तच होते. कोहीनुर, सोने, हीरे तर राजा महाराजांची होती.

इतक्या तुकड्यांचा एक देश बनवून दिल्याबद्दल ब्रिटीशांना कीती मोबदला द्यायचा?

बॅटमॅन Fri, 24/07/2015 - 18:26

In reply to by अनु राव

कोहिनूर सोडून दुसरे काही जणू घेतलेच नै का ब्रिटिशांनी? टॅक्सेसच्या रूपाने पैसा, महायुद्धात लढायला नेलेले सैनिक, त्यांचे श्रम, शिवाय अनेक कच्चा माल, सप्रेस केलेली इंडस्ट्री, हे काय स्वखुषीने दिलेय बहुधा.

नगरीनिरंजन Sat, 25/07/2015 - 08:57

थरुर यांचे आर्ग्युमेंट पाहिले. बरेच देशभक्त लोक इंग्रजांनी माफी मागितली पाहिजे वगैरे आता म्हणू लागतील.
थरुर यांचे आर्ग्युमेंट जोरदार आहे. ते म्हणतात "यू कॅननॉट ऑप्रेस पीपल फॉर टू हन्ड्रेड यिअर्स ॲन्ड ॲट द एन्ड ऑफ इट सेलिब्रेट दॅट दे आर डेमॉक्रॅटिक"
पण हेच आर्ग्युमेंट जर भारतीय समाजाला लावले तर त्यात जातींच्या नावावर जे २००० वर्षांचे शोषण झाले आहे त्याचा हिशोब कोण देणार? ६०-७० वर्षांच्या आरक्षणाविरुद्ध छाती पिटणारे लोक थरुर यांच्या भाषणाचे समर्थन करताना विचार करतील? मला नाही वाटत.
यू कॅननॉट ऑप्रेस पीपल फॉर २००० यिअर्स ॲन्ड ॲट द एन्ड ऑफ इट सिम्पली डिक्लेअर दॅट ऑल आर इक्वल.

घाटावरचे भट Sat, 25/07/2015 - 09:20

In reply to by नगरीनिरंजन

>>यू कॅननॉट ऑप्रेस पीपल फॉर २००० यिअर्स ॲन्ड ॲट द एन्ड ऑफ इट सिम्पली डिक्लेअर दॅट ऑल आर इक्वल.

या केस मध्ये कोणी कोणाला आणि कुठल्या स्वरूपात नुकसान भरपाई देणे योग्य होईल? आणि २००० वर्षांच्या ऑप्रेशनचं म्हणाल तर त्याचं उट्टं निघतंच आहे या ना त्या प्रकारे आणि यापुढेही निघत राहील.

नगरीनिरंजन Sat, 25/07/2015 - 11:53

In reply to by घाटावरचे भट

नुकसान भरपाईचा प्रश्न नाहीय. प्रश्न ॲकनॉलेजमेंटचा आहे आणि सगळे समान व्हायला अजून बराच काळ जावा लागेल हे समजण्याचा आहे.
मला वाद घालायचा नाहीय; पण उट्टं निघतंय म्हणजे काय होतंय? पूर्वाश्रमीच्या उच्चवर्णियांच्या मुलांना शिक्षण नाकारले जातेय किंवा अमुकच एक व्यवसाय करायची सक्ती होतेय असे होत असल्यास त्याविरुद्ध तातडीने आंदोलन करायला हवे.

बॅटमॅन Mon, 27/07/2015 - 14:40

In reply to by नगरीनिरंजन

उट्टं निघतंय म्हणजे दलितांसाठी आरक्षण आहे, आंतरजातीय विवाह होताहेत, शिवाशीव किमान शहरी भागात तरी ना के बराबर आहे, इत्यादी. उट्टं निघतंय म्हणजे अन्याय दि अदर वे राउंड पाहिजेच असं आवश्यक आहे का?

बॅटमॅन Mon, 27/07/2015 - 18:47

In reply to by अतिशहाणा

उच्चवर्णीयांचे स्तोम पूर्वीपेक्षा कमी होणे आणि दलितांना अजून संधी उपलब्ध होणे हे एकप्रकारे उट्टे निघणे नव्हे काय? परिणामांच्या व्याप्तीबद्दल बोलायचे तर तो वेगळा मुद्दा झाला.

अतिशहाणा Mon, 27/07/2015 - 19:06

In reply to by बॅटमॅन

उट्टे काढणे/निघणे म्हणजे जशास तसे वागवणे. थोडक्यात टर्निंग द टेबल्स. दलित-उच्चवर्णीयांसंदर्भात तशी परिस्थिती नक्कीच नाही.

घाटावरचे भट Mon, 27/07/2015 - 20:47

In reply to by अतिशहाणा

>>उट्टे काढणे/निघणे म्हणजे जशास तसे वागवणे. थोडक्यात टर्निंग द टेबल्स. दलित-उच्चवर्णीयांसंदर्भात तशी परिस्थिती नक्कीच नाही.
तसे झाले म्हणजेच दलितांना न्याय मिळाला असे आपल्याला वाटते काय?

अतिशहाणा Mon, 27/07/2015 - 21:29

In reply to by घाटावरचे भट

उट्टं निघाल्यावरच न्याय मिळेल असं मला वाटत नाही.

आणि २००० वर्षांच्या ऑप्रेशनचं म्हणाल तर त्याचं उट्टं निघतंच आहे या ना त्या प्रकारे आणि यापुढेही निघत राहील.

परंतु वरील वाक्याच्या संदर्भात अगदी उट्टं निघण्याइतकं उच्चवर्णीयांचं काही वाईट चाललेलं नाही असं म्हणायचं होतं.

नितिन थत्ते Sat, 25/07/2015 - 09:40

मला वाटते ब्रिटनमध्ये जी इंडस्ट्रिअल रेव्होल्युशन झाली तिचे फायनान्सिंग विविध ठिकाणच्या कॉलनीजमधून झाली.

विकीवरील औद्योगिक क्रांतीबद्दल पहिले वाक्य.... The Industrial Revolution was the transition to new manufacturing processes in the period from about 1760 to sometime between 1820 and 1840.

टु पुट द कंटेक्स्ट राइट ...... प्लासीची लढाई आणि इंग्रजांची बंगालवर सत्ता- १७५७.
--------------------------------------
ब्रिटिशांनी माफी मागणे आणि नुकसानभरपाई देणे याविषयी माझे काही मत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की बहुतांश भारत ब्रिटिशांनी थेट लढाई न करता जिंकला होता. इथल्या संस्थानिकांनी तो "स्वखुशीने"ब्रिटिशांना "चालवायला" दिला होता.

बॅटमॅन Sat, 25/07/2015 - 10:32

In reply to by नितिन थत्ते

ब्रिटिशांनी माफी मागणे आणि नुकसानभरपाई देणे याविषयी माझे काही मत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की बहुतांश भारत ब्रिटिशांनी थेट लढाई न करता जिंकला होता. इथल्या संस्थानिकांनी तो "स्वखुशीने"ब्रिटिशांना "चालवायला" दिला होता.

मैसूर, मराठा, अफगाण, शीख, इ. अनेक वॉर्स पाहिली तर असे म्हणवत नाही.

नितिन थत्ते Sun, 26/07/2015 - 10:33

In reply to by बॅटमॅन

मराठा वॉरमध्ये सुद्धा बाजीरावाने तैनाती फौज स्वीकारली होतीच. नंतरचे डिस्प्युट बहुधा वारसा हक्कावरून झालेले होते.
दुसर्‍या बाजीरावाला पकडून देणार्‍यास एक लाख रुपयांचे इनाम (इंग्रजांचे सहकारी असलेल्या) होळकरांनी लावले असल्याचा उल्लेख माहेश्वर येथील होळकरांच्या वाड्यात पाहिला आहे.

बॅटमॅन Mon, 27/07/2015 - 14:44

In reply to by नितिन थत्ते

तैनाती फौजही कधी स्वीकारली ते पाहिले पाहिजे. होळकरी दंग्यानंतरच स्वीकारली आहे आय थिंक.

अस्वस्थामा Mon, 27/07/2015 - 15:33

In reply to by बॅटमॅन

इथे नितीन थत्तेंशी अशंतः सहमत. (अशंतः कारण विधान अगदीच सरसकटीकरण केल्यासारखे वाटतेय. )

तरीही जितकी सहमती आहे त्याची काही कारणे:
१. एकतर कोणतीही प्रबळ केंद्रीय सत्ता नव्हती. मराठे प्रबळ होते पण प्रत्येक सरदार सुभेदार हा स्वतंत्र राजा म्हणावा इतका स्वतंत्र कारभार करत असे.
२. अशा वेळी बहुतेक इतर राज्यांना मराठ्यांना भरोसा वाटत नसे. कारण एक की मराठे लुटालुटीसाठी प्रसिद्ध होतेच. त्याच कारणाने मराठा डिच सारखे काम इंग्रजांना दिले गेले. नोट, की बंगाल मध्ये मुस्लीम नवाब आणि इंग्रज यांना लोक "आपले" समजत होते आणि नागपूरच्या भोसल्यांचे बारगीर हे लुटारू म्हणून तिरस्करणीय होते. ही अशी इंग्रजांची सुरुवात झाली.
३. इतर ठिकाणीही तैनाती फौजा आल्या कारण आपल्या देशातल्या लोकांपेक्षा इंग्रज विश्वासू वाटले (वस्तुस्थिती वेगळी निघाली, ते नंतर.).

त्यामुळे 'इथल्या संस्थानिकांनी तो "स्वखुशीने"ब्रिटिशांना "चालवायला" दिला होता.' हे अशंतः सहमत होण्यासारखंच आहे. :)

बॅटमॅन Mon, 27/07/2015 - 15:48

In reply to by अस्वस्थामा

अशा वेळी बहुतेक इतर राज्यांना मराठ्यांना भरोसा वाटत नसे. कारण एक की मराठे लुटालुटीसाठी प्रसिद्ध होतेच. त्याच कारणाने मराठा डिच सारखे काम इंग्रजांना दिले गेले. नोट, की बंगाल मध्ये मुस्लीम नवाब आणि इंग्रज यांना लोक "आपले" समजत होते आणि नागपूरच्या भोसल्यांचे बारगीर हे लुटारू म्हणून तिरस्करणीय होते. ही अशी इंग्रजांची सुरुवात झाली.

नबाबि अमले मुर्शिदाबाद नामक बंगाली पुस्तकाचे लेखक सुशील चौधुरी नामक एक इतिहासकार आहेत - कलकत्ता युनिव्हर्सिटीतले प्रोफेसर आणि अन्य अनेक पुस्तकांचे लेखक. त्यांच्या मते मराठ्यांची लुटालूट सीझनल आणि त्यांच्या ठरलेल्या मार्गाच्या आसपासच होती. शिवाय ही लूट १७४० ते १७५०-५२ इतका काळच झालेली आहे. त्याला ओव्हररेट करण्यात प्वाइंट नाही. महाराष्ट्रपुराण नामक एका ग्रंथात लुटालुटीचे लै भयानक वर्णन आहे म्हणतात, पण सुशील चौधुरी यांच्या मते ते अतिरंजित आहे. तस्मात निव्वळ मराठा डिच बांधला हे कै कारण होऊ शकत नाही.

बाकी तैनाती फौजा दिल्या म्हणजे राज्य चालवायला दिलं हे अ‍ॅनाक्रोनिस्टिक आहे. कारण मिलिटरीत अनेक लोकांचा भरणा करणे हे तत्कालीन मिल्ट्री लेबर मार्केटमध्या सर्रास चालायचं, उदा. गारदी. त्याचा अर्थ असा होत नाही की आपखुषीने राज्याच्या किल्ल्या इंग्रजांकडे दिल्या. बेसिकली दे वेअर जस्ट अनदर क्लास ऑफ मिल्ट्री लेबर सप्लायर्स अ‍ॅज़ फार अ‍ॅज़ दि राजा लोक्स इन इंड्या वेअर कन्सर्न्ड. ते पुढे इतके बळजोर होतील हे त्यांच्या गावीच नव्हतं. याला तुम्ही वेडेपणा अवश्य म्हणा, पण 'आपखुषीने राज्य दिलं' असं म्हणू नका कारण ते तुमचं पर्सेप्शन आहे आणि दोन-अडीचशे वर्षांच्या इतिहासज्ञानामुळे तयार झालेलं आहे. तेव्हाचे नबाब वगैरे असे मानत नव्हते. आणि ज्यांना या गोष्टीचा थोडाफार अंदाज होता त्यांनी इंग्रजांशी युद्धे केलेलीच आहेत. (हेही विधान नेसेसरी असले तरी सफिशियंट असेलच असे नाही, उदा. अफगाण वॉर्स)

नितिन थत्ते Mon, 27/07/2015 - 16:08

In reply to by बॅटमॅन

>>त्याचा अर्थ असा होत नाही की आपखुषीने राज्याच्या किल्ल्या इंग्रजांकडे दिल्या. बेसिकली दे वेअर जस्ट अनदर क्लास ऑफ मिल्ट्री लेबर सप्लायर्स अ‍ॅज़ फार अ‍ॅज़ दि राजा लोक्स इन इंड्या वेअर कन्सर्न्ड. ते पुढे इतके बळजोर होतील हे त्यांच्या गावीच नव्हतं

फसवणुकीची शक्यताही आहेच. पण बेसिकली सैनिकाला एम्प्लॉय करणे आणि सैन्य (विथ कमांडर) आउटसोर्स करणे हे वेगळे आहे. विशेषतः आपले सैन्यच ठेवणार नाही अशी अट मान्य करणे (Forfeiting the right to have own military) ते तर फारच वेगळे.

बॅटमॅन Mon, 27/07/2015 - 16:21

In reply to by नितिन थत्ते

बरोबर. बट द सेम कॅण बी अर्ग्यूड फॉर धिस थिंग अ‍ॅज़ वेल - त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे हे सर्व करार करताना त्या त्या राजाची परिस्थिती काय होती याचाही विचार केला पाहिजे. परिस्थिती ठीकठाक असताना कुणी असे कलम सहजी मान्य करेल हे संभवत नाही. शिवाय आत्ता करार करून टाकू, एकदा सैन्य ताब्यात आले की आपल्याच इशार्‍यावर चालेल असेही वाटत असण्याची शक्यता आहे. पण या सर्व गोष्टींचे डीटेल्स तपासून पाहिले पाहिजेत. कितीही मूर्ख राजा असला तरी तो 'नशापाणी न करता' असे कलम मान्य करेल हे फार विचित्र वाटते. त्यामुळे अशी कलमे मान्य करताना नक्की काय विचारप्रक्रिया होती याबद्दल काही लिखाण झाले असल्यास पाहिले पाहिजे. पाहून सांगतो.

अस्वस्थामा Wed, 29/07/2015 - 16:48

In reply to by बॅटमॅन

या उपचर्चेच्या रोखाने मिपावरचा क्लिंटनचा हा प्रतिसाद रोचक आहे..

बॅट्या वेगळी चर्चा करावी का याची ?

बॅटमॅन Wed, 29/07/2015 - 17:19

In reply to by अस्वस्थामा

प्रतिसाद रोचक असला तरी तेच ते मुद्दे आहेत. याचा तपशीलवार प्रतिवाद केला पाहिजे आणि तो करता येणे शक्य आहे.

गब्बर सिंग Sat, 25/07/2015 - 11:58

In reply to by नितिन थत्ते

मला वाटते ब्रिटनमध्ये जी इंडस्ट्रिअल रेव्होल्युशन झाली तिचे फायनान्सिंग विविध ठिकाणच्या कॉलनीजमधून झाली.

हे म्हंजे अमेरिकेतील कॅपिटलिझम चे यश हे अमेरिकेतील स्लेव्हरी तून निर्माण झालेले आहे - असा जो मुद्दा मांडला जातो त्याप्रमाणे आहे.

नितिन थत्ते Sun, 26/07/2015 - 08:48

In reply to by गब्बर सिंग

टेक्नॉलॉजी आणि सायन्स यातला फरक समजून घ्यायला हवा. आजच्या काळातील थोडे तंत्रज्ञान सोडले तर बहुतांश तंत्रज्ञान हे ट्रायल एरर मेथडने आधी निर्माण होते आणि मग त्याचे विज्ञान निर्माण होते. गनपावडर आणि तोफा आधी निर्माण होतात आणि न्यूटनचा तिसरा नियम नंतर येतो. [शिवाजीमहाराजांच्या आधी तोफा होत्या आणि न्यूटन १६४३ मध्ये जन्मला].

या तंत्रज्ञानाच्या ट्रायल एरर विकासासाठी भरपूर पैसा लागतो. आणि तो युरोपात पूर्वी सहज उपलब्ध नव्हता. वसाहतींमधून पैसा* जाऊ लागल्यावर या ट्रायल एरर करणे अतिसुलभ/स्वस्त** झाले आणि औद्योगिक क्रांतीला गती मिळाली. शिवाय मॅनिप्युलेटेड/कंट्रोल्ड मार्केट्स*** मिळाली ती वेगळीच.
----------------
*पैसा म्हणजे नैसर्गिक संपत्ती, सोने वगैरे
**वसाहतींमधून सोयिस्कर किंमतीत पाहिजे तितके लोखंड, कापूस आणि इतर कच्चा माल उपलब्ध होऊ लागला.
***स्पेनला दक्षिण अमेरिकेत वसाहती स्थापन करूनही जास्त पुढे जाता आले नाही कारण सोने/साधनसंपत्ती मिळाली तरी तिथे आशियाप्रमाणे मार्केट नव्हते. म्हणून आशियात ज्यांना वसाहती स्थापन करता आल्या ते जास्त पुढे जाऊ शकले.

नंदन Thu, 30/07/2015 - 10:06

In reply to by गब्बर सिंग

हे म्हंजे अमेरिकेतील कॅपिटलिझम चे यश हे अमेरिकेतील स्लेव्हरी तून निर्माण झालेले आहे - असा जो मुद्दा मांडला जातो त्याप्रमाणे आहे.

सहमत आहे. स्लेव्हरी हा एकमेव प्रमुख घटक नाही. फुकट मिळालेली संसाधनं (नेटिव्ह अमेरिकनांचा खंड), फुकटची मजुरी (अर्थात स्लेव्हरी) आणि आयती बाजारपेठ (महायुद्धांमुळे पोळलेला युरोप) इ. या तथाकथित एक्सेप्शनलिझमचे आधारस्तंभ आहेत.

गब्बर सिंग Thu, 30/07/2015 - 10:21

In reply to by नंदन

स्लेव्हरी हा एकमेव प्रमुख घटक नाही. फुकट मिळालेली संसाधनं (नेटिव्ह अमेरिकनांचा खंड), फुकटची मजुरी (अर्थात स्लेव्हरी) आणि आयती बाजारपेठ (महायुद्धांमुळे पोळलेला युरोप) इ. या तथाकथित एक्सेप्शनलिझमचे आधारस्तंभ आहेत.

हे तुमचे कंजेक्चर आहे की प्रूव्हन थिसिस आहेत ?

काळासरदार Mon, 27/07/2015 - 10:57

माझं मत असं आहे कि ब्रिटन आणि वसाहती असणारे सगळे देश हे पूर्वी वसाहती असणाऱ्या देशांचे गुन्हेगार आहेत.
माझं असंही मत आहे कि सूड घ्यायचा आनंद हेच ऐतिहासिक पाप-पुण्याची किंवा अपराधांची बेरीज-वजाबाकी करण्याचे कारण आहे. सूडासारखी मजेदार गोष्ट नाही.
ब्रिटीश राणीने जालियानवाला बागेत येऊन मातीत लोळून माफी मागावी आणि लंडनच्या सगळ्या रस्त्यांना बंगाल दुष्काळ रस्ता १, २, अशी नावे द्यावीत. जिथे जिथे ब्रिटीश वखारी होत्या तिथे एलिझाबेथ, व्हिक्टोरिया, जॉर्ज आदि राजे-राण्यांच्या नावाने शौचालये बांधावीत. अशाने मला भारतीय म्हणून सूडाचे प्रचंड समाधान मिळेल.
पण समजा ब्रिटिशांनी माफी मागितली आणि जी काही नुकसान भरपाई मागितली तर ती नेमकी वाटायची कशी? म्हणजे भारतीय सैनिक प्रामुख्याने मेले ते काही भागांतले होते (ब्रिटीशांच्या 'लढाऊ जाती' नावाच्या प्रकाराबद्दल आंबेडकरांच्या 'थॉटस ऑन पाकिस्तान' मध्ये चांगली माहिती आहे.) मग त्यांचा क्लेम जास्त राहिला का? खालोखाल कारागीर, शेतकरी, बंगाल दुष्काळात मेलेल्या लोकांचे वंशज ह्यांचा? जंगलावरील उपजीविका हिरवलेल्या आदिवासींना किती भाग जाईल (बोकीलांचे 'कातकरी')? का त्यांनी बस एक प्रातिनिधिक माफी मागावी महापुरुषांची आणि काही कपालभाती वगैरे कराव्यात कि झालं? खालचे वितरणाचे प्रश्न पुढचे पुढे बघून घेऊ.

'व्हाय नेशन्स फेल' नावाच्या पुस्तकात एकूणच वसाहतींचे शोषण झाले का ह्याचा अपोलेजेटिक रिसर्च उपलब्ध आहे. त्यांचं म्हणणं आहे कि वसाहतखोर देश वाईट नव्हते, तिथल्या संस्था वाईट/चुकीच्या होत्या.

सरकारी नोकरी, पाठांतर/स्मरणशक्ती आधारित, अनेकांना घाऊक नापास करणारी (?) ब्रिटीश शिक्षणव्यवस्था ह्यांतून ज्यांच्या आजे-पणज्यांनी फायदे घेतले तेपण काढायचे का? म्हणजे देशभक्ती आधारित ज्वलंत सूडकथा सुफळ संपूर्ण नको का करायला?

आणि सूडाच्या आणि गुन्ह्याच्या ह्या प्रतिगामी न्यायाने 'इथल्या हिंदू संस्कृतीवर झालेल्या मुसलमान आक्रमणाला' आज दुरुस्त करण्याच्या प्रक्रियेलाही योग्य म्हणायला हवं. त्याची भरपाई आणि माफी कोणी-कोणी द्यायची?

बॅटमॅन Mon, 27/07/2015 - 14:43

In reply to by काळासरदार

मुळात तत्त्वतः मान्य करायलाच इतकी नाखुषी का ते समजत नाही. वायझेड मॅन्स बर्डन असल्यासारखा प्रकार आहे एकूण.

व्हाय नेशन्स फेल' नावाच्या पुस्तकात एकूणच वसाहतींचे शोषण झाले का ह्याचा अपोलेजेटिक रिसर्च उपलब्ध आहे. त्यांचं म्हणणं आहे कि वसाहतखोर देश वाईट नव्हते, तिथल्या संस्था वाईट/चुकीच्या होत्या.

बरोबरे, नाझी वाईट नव्हते तर ज्यूच हरामखोर होते.

नितिन थत्ते Tue, 28/07/2015 - 07:28

In reply to by काळासरदार

>>जिथे जिथे ब्रिटीश वखारी होत्या तिथे एलिझाबेथ, व्हिक्टोरिया, जॉर्ज आदि राजे-राण्यांच्या नावाने शौचालये बांधावीत.

ठ्ठो.... =))

>>पाठांतर/स्मरणशक्ती आधारित, अनेकांना घाऊक नापास करणारी (?) ब्रिटीश शिक्षणव्यवस्था

नाही नाही.... पाठांतर आधारित ही आमची स्वतःची खासियत आहे. आम्ही कोणतीही शिक्षणव्यवस्था पाठांतराधारित बनवून दाखवू शकतो. ऑब्जेक्टिव्ह परीक्षा म्हणजे धड्यातीलच वाक्यातल्या गाळलेल्या जागा भरणे किंवा धड्यातीलच वाक्य एका वाक्यात उत्तराचा प्रश्न म्हणून विचारणे हे इंटरप्रिटेशन खास आमचेच असावे.

आबा Wed, 29/07/2015 - 19:29

In reply to by नितिन थत्ते

अ‍ॅग्रीड!
दहावीच्या अर्थशास्त्राच्या पहिल्या धड्यामध्ये हे वाक्य गाळलेली जागा भरण्यासाठी येत असे,
"राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा नेहमीच --- राहिलेला आहे."
आणि याचं उत्तर "भरीव" असं होतं
"मोठा" किंवा "महत्वाचा" हे शब्द लिहिले की शूण्य मार्क मिळत असंत.

अरविंद कोल्हटकर Sun, 02/08/2015 - 09:18

ह्या वादामध्ये पडावे की तटस्थ राहावे अशा द्विधा मनःस्थितीमध्ये मी आहे कारण हा वाद अनेक वेळा खेळून झालेला आहे आणि त्याला अखेरचे उत्तर नाही हेहि स्पष्ट दिसत आहे. तरीही दुसर्‍या एका चर्चागटात मेकॉलेच्या मिनटच्या निमित्ताने मी जे लिहिले होते ते माझ्यासमोर आत्ता पुनः आले आणि येथेहि त्याचा थोडा संदर्भ आहे असे मला जाणवले. फार टंकनश्रम न करता येथे मला ते चिकटवता येते म्हणून तसे करत आहे. ते सर्व इंग्रजीमध्ये आहे आणि त्याचा मराठी अनुवाद न करता आहे ते जसेच्या तसे येथे चिकटवीत आहे.


I am not denying that there was some kind of education available to the masses. I know, for example, that in Marathi areas there was a kind of a village school, usually held under a tree, and managed by a teacher called in Marathi as 'Pantoji'. He was paid by the local people through voluntary contributions of some money, grain, cloth etc. However, it was not, and could not be, an organized effort. The teacher taught what he knew of the three R's - and that was usually not much, - pupils attended when they felt like - which was not often, because, being children, they had more interesting things to do like playing gulli-danda, parents could not be bothered to ensure attendance because they found the grown-up children more useful working along with them in the field or tending to the cattle. There was no supervision, no regulation, no expectation of the minimum result to be achieved. Yes, this kind of informal education did exist.

The end-products of this system would usually end up knowing some writing, some basic arithmetic and some scattering of religious or moral poetry and little else. Enough for most Indians of those days to carry on with their traditional lives.

This happened because the Indian rulers, Muslim as well as Hindu, never considered that equipping their subjects with education was a part of their responsibility as rulers. As rulers, they were only interested in gathering revenue and using that for their own personal lavish lifestyles, maintaining armies that only fought and decimated each other. Whatever may have been the ideal of a ruler in theory - प्रजानां विनयाधानाद्रक्षणाद्भरणादपि। स पिता पितरस्तासां केवला जन्महेतवः॥
as Kalidasa beautifully puts it - do we know a single ruler of the 17th/18th century who did this?

The British, alien rulers that they were, for the first time in the history of India, and for whatever vile motives, spoke of educating the natives. Did any Mughal emperor or the Peshwas, or the Ranas ever speak in these terms? Education, as a responsibility of the state and as an activity supported by the state, emerged for the first time in India under the British. From there it has now advanced to the stage where, at least in theory, we have compulsory education in India. Who started this trend?

Somebody spoke here in this discussion about the great emperor Ashoka. Now, Indian memory of Ashoka till the end of the 18th century was a single reference in Vishnupurana in a long list of names. There is not even a single mention of the great emperor Ashoka in the vast body of classical Sanskrit literature. He was totally forgotten, as were the imperial Guptas, supposedly patrons of Kalidasa. None of the Brahmans could read Ashoka's inscriptions scattered throughout India. It was James Prinsep and his colleagues in the Asiatic Society of Bengal who, out of their personal curiosity, pieced together the Brahmi script and, as a result, the personalities of Ashoka, Chandragupta Maurya and the whole Gupta dynasty again emerged into daylight. Hundreds of unreadable inscriptions scattered throughout the land could now be read, Old coins, earlier melted down for their metal content, could now be read. The ancient history of this benighted land could, for the first time, be pieced together. The local pundits never knew this and had even less desire to find it out. This was the level of 'education' in India. All were busy dissecting and parsing obscure terminologies in व्याकरण or न्याय and in the चर्वितचर्वण of the surest path to escaping the cycle of rebirth and attaining मोक्ष!

I came across the following passage about the quality and level of education in Orissa at the end of the 18th century. I think that this description is fairly representative of India as a whole. It is from a book called 'Development of Modern Education in India - An Empirical Study of Orissa' by by Bina Sarma. It is available as a preview book at books.google.ca/books?isbn=8185880948. Please see pp 17 and 18 thereof:

"Thus it seems that up to the end of the 18th century there was no well-conceived plan to manage the educational institutions that existed. As has already been observed the educational institutions were managed by voluntary organizations and charitable religious endowments. There was nothing like an integrated system of education under government control, supervision or direction. There were no school buildings, no printed books, no standard syllabi, no qualified teachers. On the whole, education was mechanical and medieval in its nature. As a matter of fact the best and the real aspects of ancient wisdom and sciences were neglected and the superficial aspects of scriptural faith dominated the mind of the people. The vast majority of the common people in Orissa had no learning in the formal sense, but all could do things by memory. Religious songs, popular tales and ballads were widely current in the society and always served to fill the minds of all classes of people with certain amount of ethical and intellectual tastes. In short, at that time emphasis was laid on imparting culture rather making the people literate. As a result, neither individuality nor a rationalist outlook could develop among pupils in schools in pre-British days. The education imparted was to make pupils staunch Hindus or Muslims, uncritical subscribers to their respective religions and social structures sanctioned by those religions.

The reasons for this sad state of affairs are not far to seek. Imparting education to the people was not considered a primary duty of the government during the Muslim and Maratha period (1568 to 1751 AD). The sphere of governments activity was confined mainly to the work of collection of revenue. The little patronage that the rulers provided to the men of letters did not help in any way to spread education in Orissa."

>>

भरपाईची मोजदाद करतांना ह्याचीहि नोंद घेतली जावी इतके म्हणतो.

बॅटमॅन Sun, 02/08/2015 - 15:57

In reply to by अरविंद कोल्हटकर

अगदी बरोबर. ब्रिटिशांचे भारतावर फक्त आणि फक्त उपकारच आहेत. जे अत्याचार झाले ते ब्लडी इंडियन्सच्या अंगभूत दुर्गुणांमुळेच.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 02/08/2015 - 18:02

In reply to by अरविंद कोल्हटकर

प्रतिसाद आवडला.

जातिव्यवस्थेमुळे परंपरागत चालत आलेलं पिढीजात ज्ञान, माहिती यांचा प्रसार आणि (काही स्थानिक धंदे बुडवल्यामुळे) उपयोग ब्रिटीशांमुळेच संपला. तरीही शिक्षण ही राज्यकर्ते, प्रशासनाची जबाबदारी आहे याचं भान ब्रिटीशांनी दिलं. या विरोधाभासाची आता गंमत वाटली. (स्वातंत्र्याला काही दशकं होऊन गेल्यावर जन्माला आल्याचा परिणाम असेल कदाचित.)

अजो१२३ Mon, 03/08/2015 - 17:02

What Mr. Tharoor spoke was nothing more than a right wing spam. His tone and tenor was that of a typical RSS man.
Was there an iota of novelty in the facts he stated? None!!! Was there an iota of novelty in the perspective he put forth? None again!!!

Then why his speech is a rage among the youth, even the anti-congress youth? Well, I think a certain section of society that never wanted to align itself with the right wing men in any way, got an opportunity, probably first one, to express their patriotism.
I feel Mr. Tharoor is really lucky. He must be thankful to his secular credentials, membership of congress, the for the fora he gets to speak at and his western education that he escaped all the antagonism from Indian intelligentsia that Mr Subramanyam Swami would have invited had he had made the same speech.

I think the way the Indian history, especially the economic and cultural one, is written, never allowed one feel proud of India. It is beyond doubt that the British looted India. What happened to Jews in WWII happened to Bengalis in India at the same time. They were deliberately allowed to die in millions, despite offers of assistance from other states and nations. Yes, the British were as cruel as Hitler. If Bengal was well-fed, if INA reaches Dhaka, ...all those calculations were critical!

Ironically, in assessing the performance of Indian democracy over last 6-7 decades, some people use this nadir of 1947 as the reference. What other results one is going to get? Japan, a non-colonized and absolutely resourceless archipelago is so advanced, but we are not yet not ready to believe that had the British not been there, we could still have postal and railway services!

Mr. Tharoor ended his speech by saying that the talk is not about redemption of damages (probably if it is done, the Britons will go paupers) but it is about acknowledgement of insurmountable loss to India and about not cracking disgusting jokes that the current British aid is an adequate retribution.

I think Mr. Tharoor should have continued for two more minutes. Just to mention the percentage of the students who fail in class X only because they cannot not clear English language. The number students who could not pursue as simple higher education as ITI, diploma because it is in English. The number of readers in India who are educated and logical but cannot understand many things about their country because they are documented in English. How we are teaching our population to digest stones.

Now let me say something that I don't expect Mr. Tharoor to say there or anywhere.
Why would the people who wanted to strip one of one's economic wealth would want his/her socio-cultural upheaval? Do thieves and looters want it that way of their victims? Was India a spiritually corrupt, casteist, divided society? Yes, irrefutably yes. But how come the British were on a higher moral ground? They had a proper slave trade, with a value attached to a human being. The lives of these slaves were 100 times worse than those of Indian lower castes. These (Europeans) wiped out the Red Indians from North America, many African and Asian tribes, literally wiped out, under the half-baked understanding of Darwinist philosophy. Relatively Indian scenario was much better. But we think that the Indian social reforms were driven by the "inherited" British values. In fact, the British purely used Indian casteism to their advantage which in turn was beneficial to the lower castes. Looking at the social status of lower castes in 2015, do you think that there was a 300 year old lower caste friendly rule in India?

But one must congratulate the British for their intellect and long-term planning. Generally, wisdom, in whatever raw form and in whatever little quantity, would detest foreign rule. But the Britons have brainwashed their colonies so well that even after so many decades, among the intelligentsia of the colonies, the people who feel their rule was a overall boon for India outnumber those who think otherwise. I might have done many wrongs in my life, but with this kind of sleight? No! That is beyond my capacity!

बॅटमॅन Mon, 03/08/2015 - 17:53

In reply to by अजो१२३

But the Britons have brainwashed their colonies so well that even after so many decades, among the intelligentsia of the colonies, the people who feel their rule was a overall boon for India outnumber those who think otherwise.

बंदूक की गोली.

आता टिपिकल श्रेण्या व काळजीवाहू प्रतिसाद येण्याअगोदर टाळ्या. एकच नंबर.

नितिन थत्ते Mon, 03/08/2015 - 20:46

In reply to by अजो१२३

इंग्रजांचे राज्य हे उपकार समजण्याची धारणा अगदी सुरुवातीच्या काळात एकोणीसाव्या शतकाच्या मध्य-उत्तरार्धात (लोकहितवादी-चिपळूणकर-जोतिबा फुले) होती. परंतु एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस इंग्रजांनी देशाची लूट चालवली आहे (आणि इंग्रज सहजासहजी काही देणार नाहीत) हे देशातील अभिजनांच्या लक्षात आले होते. म्हणूनच हळूहळू स्वातंत्र्यलढा उभा राहू लागला. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून इंग्रजांचे राज्य हे भारतावरचे उपकार ही भावना मुळीच नव्हती.

इंग्रजांमुळे भारतात रेल्वे-पोस्ट-शाळा-कॉलेजे आली असे म्हणणार्‍या लोकांना इंग्रजांचे राज्य आले नसते तर आजही (२०१५ मध्ये) भारतात शाळा नसत्या असे अभिप्रेत असते हा जावई शोध आहे. (>३२ रु खर्च= श्रीमंत या समीकरणासारखा). त्या उशीरा का होईना आल्याच असत्या हे खरे. पण त्याकाळच्या भारतातल्या समाजधुरीणांच्या विचारविश्वात या गोष्टी नव्हत्या हेही खरे. "रूल ऑफ लॉ" ही व्यवस्था तुरळक स्वरूपात (शिवाजीची व्यवस्था आणि पत्रे) अस्तित्वात असेल. पण देशव्यापी स्वरूपात नव्हती.

ओव्हरऑल युरोपियन आणि इंग्रज यांना एकाच मापाने मोजणे बरोबर नाही. अमेरिकेत गेलेले स्पॅनिश आणि पूर्वेस आलेले पोर्तुगीज हे रेनेसाँच्या सुरुवातीच्या काळातले किंवा मध्ययुगाच्या अखेरच्या काळातले/संस्कृतीतले लोक होते. तर भारतात आलेले इंग्रज हे रेनेसाँ मुरल्यानंतरच्या काळात आले. जगभरच्या अमेरिका आफ्रिकेतल्या आदिम जमातींच्या शिरकाणात इंग्रज/फ्रेंचांचा सहभाग किती हे पहायला हवे.

भारतात इंग्रजांचे राज्य आल्यामुळे भारतीयांचा अमुक आणि तमुक गोष्टींबाबतीत फायदा झाला असे म्हणणारे लोक इंग्रजांनी भारताची लूट केली नाही असे मानतात हा गैरसमज आहे. इंग्रजांनी लूट केलीच आहे. मी आधीच्या एका प्रतिसादात म्हटले त्याप्रमाणे औद्योगिक क्रांतीचे फायनान्सिंग वसाहतींतून येणार्‍या संपत्तीच्या ओघामधून झाले.
--------------------------------
व्हाइट मॅन्स बर्डन हे विधान ओव्हरबोर्ड आणि आढ्यताखोर असले तरी प्रजेचे भले करावे असे वाटणारे काही इंग्रज खरोखरच असू शकतील.

अजो१२३ Tue, 04/08/2015 - 17:51

In reply to by नितिन थत्ते

इंग्रजांमुळे भारतात रेल्वे-पोस्ट-शाळा-कॉलेजे आली असे म्हणणार्‍या लोकांना इंग्रजांचे राज्य आले नसते तर आजही (२०१५ मध्ये) भारतात शाळा नसत्या असे अभिप्रेत असते हा जावई शोध आहे. (>३२ रु खर्च= श्रीमंत या समीकरणासारखा). त्या उशीरा का होईना आल्याच असत्या हे खरे.

त्या उशिरा आल्या असत्या हा जावईशोध आहे. इंग्रज नसते तर भारतात आज वास मारणार्‍या रेल्वेंच्या जागी जपानसारख्या बुलेट ट्रेन असत्या. असं न मानणं हा जावईशोध आहे.

पण मूळात न्यूनगंड पराकोटीला गेलेला असला सांभाळून सांभाळून बोलण्याच्या नादात मातृभूमीला फारच कमी लेखायची सवय होते. भारताच्या आणि अन्य जगाच्या लूटीची ढेकर देऊनही युकेने आज मंगळावर यान सोडले आहे का? भारताने हाडे दिसायला आलेली असताना देखिल करून दाखवले ना? जर हे भारताला जमते तर बुलेट ट्रेन्स किस झाड कि पत्ती आहे?

मूळात त्यांनी हे सगळं आणलं, लवकर आणलं, विशुद्ध अवस्थेत आणलं, ते नसते तर फार काहीतरी घाण आलं असतं, उशिरा आलं असतं, आलंच नसतं ही सडकी आणि न्यूनगंडी मनोवृत्ती आहे.
आज प्रायवेट कुरीयरचे आणि ब्रिटिश लेगसी असलेले पोस्ट यांची तुलना काय सांगते?
प्रायवेट कॅरीयर बसेस आणि घाणेरडी लेगसी रेल्वे यांची तुलना काय सांगते? (साला या ब्रिटिशांनी असा एक विचित्र गेज भारतात बसवलाय कि कितीतरी रेल्वे कंपन्यांना त्यांचे ट्रॅक्स आणि रोलिंग स्टॉक्स भारताला निर्यात देखिल करता येत नाहीत.)

वेल, आपण म्हणाल, कि तुलना अस्थानी आहे. मग आपण युरोपीय देशांची कॉलनी नसलेल्या देशांचे काय झाले आहे ते पाहू.
१. जपान - लोक गोरे नसले तरी बर्‍याच काळापासून विकसित म्हणवला गेलेला जगातला एकमात्र देश.
२. कोरीया - सामाजिक, आर्थिक दृष्ट्या प्रगत देश.
३. थायलंड - सामाजिक दृष्ट्या अत्यंत प्रगत. आर्थिक टायगर.
४. इथिओपिआ - सबसहारन आफ्रिकेत असूनही दक्षिण आफ्रिकेपेक्षा जास्त सामाजिक प्रगती. त्या देशांत आर्थिक दृष्ट्या आघाडीवर. सगळे शेजारी अस्थिर असताना स्थिर, मॅच्यूर, कॉस्मो लोकशाही.
५. अमेरिका - (यांच्यावरचे राज्य लवकर संपले म्हणून) -महासत्ता.
६. तुर्कस्थान - एकमेव मुस्लिमबहुल लगभग विकसित सामाजिक, आर्थिक दृष्ट्या प्रगत देश.

बंधुंनो*, जे युरोपीयांपासून सुटले त्यांचा आज ही अवस्था आहे. नि आपल्याला न्यूनगंड सावरता सावरेनाय.

जगभरच्या अमेरिका आफ्रिकेतल्या आदिम जमातींच्या शिरकाणात इंग्रज/फ्रेंचांचा सहभाग किती हे पहायला हवे.

ब्रिटिशांचा सहभाग सगळ्यात जास्त होता.

भारतात इंग्रजांचे राज्य आल्यामुळे भारतीयांचा अमुक आणि तमुक गोष्टींबाबतीत फायदा झाला असे म्हणणारे लोक इंग्रजांनी भारताची लूट केली नाही असे मानतात हा गैरसमज आहे.

मूळात फायदा झाला हेच म्हणणं मूर्खपणाचं आहे.

अजो१२३ Tue, 04/08/2015 - 17:55

In reply to by नितिन थत्ते

व्हाइट मॅन्स बर्डन हे विधान ओव्हरबोर्ड आणि आढ्यताखोर असले तरी प्रजेचे भले करावे असे वाटणारे काही इंग्रज खरोखरच असू शकतील.

दलितांचे, स्त्रीयांचे भले व्हावे असे वाटणारे ब्राह्मण देखिल असू शकतील.
पण एखाद्या विधानाच्या आंशिक सत्यतेने काही ब्राह्मणांना काही प्रमाणात चांगले म्हणावयाचे असल्यास ते मूळ विधान मागे घ्यायची प्रथा आहे.

अरविंद कोल्हटकर Tue, 04/08/2015 - 23:58

अजोंचे म्हणणे ठीकच आहे. येथे वावरणारे काहीजण न्यूनगंडाने पछाडलेले दिसतात. त्यांना अजोंनी सणसणीत जमालगोटा दिला हे उत्तमच झाले.

बहुधा मलाहि त्याच न्यूनगंडाची लागण झाली असणार. ती सुधारण्यासाठी ह्याच संस्थळावरचे 'अहंगंडा'तून लिहिले गेलेले माझे बरेचसे लिखाण मी मागे घ्यावे हेच बरे कारण ते माझ्या मूलभूत 'न्यूनगंडा'शी जुळते नाही. उदाहरणार्थ शुल्बसूत्रांतील भूमितीवरची माझी मालिका, 'वर्गप्रकृति' ह्यावरचा माझा लेख, आर्यभटाची भूभ्रमणाबद्दलची भूमिका असे शुद्ध 'अहंगंड'दर्शक लेख काढूनच टाकावेत म्हणजे अहंगंडाचा थोडकाहि दर्प माझ्यामध्ये उरणार नाही.

अजो१२३ Wed, 05/08/2015 - 11:59

In reply to by अरविंद कोल्हटकर

ब्रिटिशांच्या भारतातील सत्तेचे १. आर्थिक २. सामाजिक ३. मानसिक चांगले आणि वाईट परिणाम झालेले आहेत. यातल्या सर्व परिणामांचा ऑब्जेक्टीवली तुलनात्मक अभ्यास करून एक ऑव्हराऑल मत देता येईल.

मी इथे वावरणार्‍या सदस्यांबद्दल बोलत आहे असा अर्थ काढणे अनावश्यक आहे. तरीही, माझ्या लेखनातून कोण्या सदस्यास त्याचा स्वतःचाच अपमान करायचे आहे असे जाणवले असल्यास मी त्यांची क्षमा प्रार्थितो. शिवाय आपण ऐसीवरचे ज्येष्ठ आणि सन्माननीय सदस्य आहात, आपल्या लेखनाचा, लेखनपद्धतीचा मला खूप आदर राहिला आहे.

================================================================================

मी इथे वावरणार्‍या सदस्यांबद्दल अजिबातच बोलत नाही असे नाही. चिंजंवर कॉमी इतिहासाचा आणि आपण सेक्यूलर आहोत हे अहमहमिकेने सिद्ध करण्याच्या मानसिकतेचा परिणाम आहे असे मी नाव घेऊन म्हणालो आहे. त्यांना रामायण आणि महाभारत हा सत्य इतिहास असू शकतो असे वाटणेच गैर वाटते. तसे सिद्ध होणे न होणे ही पुढची बाब आहे.

अर्थातच आपल्या मानसिकतेबद्दल मला खटकणार्‍या गोष्टी नाहीतच असे नाही. आपल्या वर उल्लेखिलेल्या लेखमालांत एके ठिकाणी शल्बसूत्रकारांनी कोणती तरी एक लॉजिकची, अ‍ॅक्यूरसीची वा अप्रोचची इरर केली होती. त्यावर राजेशजी म्हणाले कि "हे पाहून माझा त्यांचेबद्दलचा आदर सबस्टँशियली उतरला". असं का झालं असावं आणि समजा तो जेन्यूईन मूर्खपणा असला तरी त्यांचेप्रति आदर अबाधित राहावा का नाही याबद्दल आपण शांत राहिलात. शल्बसूत्रकारांचा मामला तर फार किचकट आहे. रोमनांचा आदर उतरावा का? त्यांना तर हे देखिल कळलं नाही कि गणितासाठी, अंकांसाठी तीच अल्फाबेट्स वापरू नयेत! हा तुमच्या खालच्या लिंकचा क्लायमॅक्स ठेवला तर? ३-४ हजार वर्षांपूर्वी गणिताचा वापर कशासाठी होत होता, त्याकाळच्या बेसिक संशोधनाची आज काय कॅपिटल व्हॅल्यू आहे, अशी चूक का झाली असावी आणि सर्वात महत्त्वाचं, संदर्भ पाहता, ही आदर कमीजास्त होण्याची जागा नव्हे, असं कोणतं मत आपण व्यक्त केलं नाहीत. I cannot say you kind of coincided with him, but your silence spoke a lot of the value Shalbsutrakaras' respect carried for you. शल्बसूत्रे, आदरवाचक मानसिकता आणि गणितातल्या चूका यांचं कोरिलेशन नीट न कळल्यानं मी मधे नाक खुपसलं नाही.

========================================================================================

भारतीयांत स्वकीय बाबींबद्दल प्रचंड न्यूनगंड आहे. इतिहासच नव्हे तर तर वर्तमानातल्या अनंत गोष्टींबद्दल आहे. भारतीय संस्कृती, भाषा, साहित्य, माहिती, लोकांची मूल्ये, रुढी, परंपरा, इतिहास, उत्पादने, नगरे, लोकशाह्या, प्रशासनात्मक व्यवस्था, राजकीय तत्वज्ञान, कला, गुन्हेगारी, इ इ ची तुलना होत असताना तो प्रकर्षाने जाणवतो. यात बर्‍याच अंशाने परकीय सत्तेचा मानसिक परिणाम आहे. आणि असं म्हणणं ही व्यक्तिगत टिका नाही हे पुन्हा कळकळीने सांगतो*.

वरच्या उतार्‍याच्या जागी मी १. भारतीय लोकांना आजदेखिल युरोपीय लोकांना रॉयल्टी दिल्याखेरीज शेवया खाववत नाहीत. २. भारतीय लोकांना जिथे जिथे ते "बिटिश इटिकेट्स" हा शब्द वापरतात तिथे तिथे "लखनवी अदब" वापरायला सांगीतले तर ते लाजेने पाणी पाणी होतील, जरी the latter is a better version. इ इ देखिल लिहू शकतो.

काय म्हणायचं आहे आणि काय म्हणायचं नाही त्या सगळ्या सीमा मांडणं असंभव आहे. गुड फेथ शुड प्रिव्हेल.

चिंतातुर जंतू Wed, 05/08/2015 - 12:04

In reply to by अजो१२३

>> त्यांना रामायण आणि महाभारत हा सत्य इतिहास असू शकतो असे वाटणेच गैर वाटते. तसे सिद्ध होणे न होणे ही पुढची बाब आहे.

माझ्याबद्दल मला नव्याने माहिती पुरवल्याबद्दल आभार आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा. बाकी चालू द्या.

अजो१२३ Wed, 05/08/2015 - 12:10

In reply to by चिंतातुर जंतू

सुदर्शन राव, त्यांचे सेलेक्शन होण्याची कारणे, त्यांचे कामी आलेले तत्त्वज्ञान, चिंता, विनोद, दुर्दैव, ... तशा लिंका ...ताजाच इतिहास आहे.

अ‍ॅनि वे, बिगबँगच्या शुभेच्छा.

चिंतातुर जंतू Wed, 05/08/2015 - 12:43

In reply to by अजो१२३

>> असे वाटणेच गैर वाटते. तसे सिद्ध होणे न होणे ही पुढची बाब आहे.

इतिहाससंशोधनविषयक राष्ट्रीय संस्थेच्या प्रमुखाने उपलब्ध पुरावे पुरेसे नसता केवळ इतरांच्या किंवा स्वतःच्या श्रद्धांवरून अनुमान काढणं ह्याविषयी मला आक्षेप आहे. तुम्हीही बहुधा तशीच अनुमानं काढत असल्याचं ह्यावरून स्पष्ट दिसतं आहे. त्यामुळे तुमच्या मतांची सुसंगती लागते. असो. माझ्याकडून लेखनसीमा.

बॅटमॅन Wed, 05/08/2015 - 12:53

In reply to by चिंतातुर जंतू

तुम्हीही बहुधा तशीच अनुमानं काढत असल्याचं ह्यावरून स्पष्ट दिसतं आहे. त्यामुळे तुमच्या मतांची सुसंगती लागते.

तुमच्या वैचारिक अवस्थेबद्दल काळजी वाटते.

अजो१२३ Wed, 05/08/2015 - 13:57

In reply to by चिंतातुर जंतू

इतिहास संशोधन विषयक राष्ट्रीय संस्थेच्या प्रमुखाने कोणतेही अनुमान काढलेले नाही. He has keen interest in proving historicity of Ramayana and Mahabharata. That does not mean he has proven it and recorded it accordingly.

Also, having faith in Rama should not look so odd at in India. What is so wrong in expressing that in public place? टिळक, गांधीजी, पटेल यांनी सत्तेत असताना असे अनेकदा केलेले आहे. त्यांना आपण विनोदी, चिंताजनक आणि दुर्दैवी का म्हणत नाही? काँग्रेसी मुख्यमंत्री विठ्ठलाची पुजा करतात. मोदी ज्या देशात जातात तिथे कोणत्यातरी मंदिरात इ जाऊन पूजा, प्रार्थना करतात. इंदिरा गांधी सुद्धा करत. आता त्यांची श्रद्धा असणारच ना? मग पदावर असताना श्रद्धा व्यक्त अनेक प्रकारे धोक्याचे असू शकते, फक्त इतिहास लिहिण्यातच नाही.

=================================================================================================================

भारत सरकारने रामावर अनेक भाष्ये केली आहेत. उदा. १. राम असल्याचा ऐतिहासिक पुरावा नाही. २. हे विधान आम्ही मागे घेतो. ३. राम सेतू रामाने बांधला. ४. राम सेतू रामाने, काम झाल्यावर, स्वतः पाडला. हे सगळं सरकारनं कोर्टात म्हटलं आहे. युपीएच्या काळात. ते विनोदी, चिंताजनक आणि दुर्दैवी नाही? कि विनोद फक्त एन्डीए सरकार आले कि च सुचतात?

एवढी विद्वत्तापूर्ण विधाने सरकार लिखितमधे आणि न्यायालयासोबत करत असेल तर सुदर्शन रावानेच असे काय घोडे मारलेत?

================================================================================================================

राम, रामायण, रामसेतू क्षणभर विसरू.

पण अयोद्द्येचे राममंदिर खरोखरीच एक विनोदी प्रकार होता. तेव्हा जे इतिहास संशोधन, पुरातत्त्व प्रमुख होते ते खरे जोकर होते. २ मुसलमान, १ हिंदू जजांनी एकाच रिपोर्टमधे तीन वेगवेगळी सत्ये पाहून ३ भिन्न निकाल दिले (सुदैवाने ते पर्स्परांस काटछेद देत नव्हते म्हणे).

त्यावेळी भारतीय न्यायपालिकेची इज्जत गेली. तो जो प्रकार होता, त्यातून सहज दिसून आले कि न्याय हा काही सत्यनिष्ठ, घटनानिष्ठ, मानवतानिष्ठ, इ इ प्रकार नसून एक खेळ आहे. आज याकुबच्या निमित्ताने न्यायपालिकेवर नको नको त्या शंका उठण्याची पाळंमुळं त्या राममंदिराच्या निकालात आहेत. It had sent a very blatant, disgraceful message to the Indian society - that non-judicial considerations work in India and they are even displayed grossly if that display does not matter socially.

म्हणून मला सुदर्शन रावांचं कौतुक आहे. ते थेट म्हणतात - मुस्लिम आक्रमकांनी हिंदू मंदिरे पाडली. Unambiguously and unequivocally. सत्ताधीशांनी बरं वाटेल असं बोलणारा बुद्धिवान इतिहासकार आवडण्यापेक्षा मी वस्तुस्थिती नि:संदिग्ध शब्दांत सांगण्याची धमक असणारा मूर्ख, श्रद्धावंत इतिहासकार पसंद करतो. माझी त्यांचेशी सुसंगती लागते याचा मला अभिमान आहे.

बॅटमॅन Wed, 05/08/2015 - 14:17

In reply to by अजो१२३

मुस्लिम आक्रमकांनी हिंदू मंदिरे पाडली.

"जातपात मानणार्‍या बुरसटलेल्या धर्माची उपासनास्थळे पाडणे (मग पाडणारा कुणीही असो) हे उत्तमच",
"कशावरून त्यांनीच पाडली, हिंदू धर्म एकच एक नाही त्यामुळे अन्यपंथीयांनी पाडली असावीत",
"जुना इतिहास किती उगाळायचा",

इ.इ. प्रतिसादांच्या आणि भडासकाढू श्रेणीच्या प्रतीक्षेत. त्या त्या प्रमाणे श्रेणीदात्याला व प्रतिसादकाला वाढदिवसाच्या अ‍ॅकॉर्डिंगली शुभेच्छा.

बघा, म्हटले नव्हते? आमच्याकडून शुभेच्छा घेण्याची लैच हौस बा श्रेणीदात्याला. उगी उगी!

अरविंद कोल्हटकर Wed, 05/08/2015 - 02:22

In reply to by अस्वल

अतिशय चपखल. सर्व जाज्वल्य देशभक्तांनी अवश्य पाहावे आणि मनसोक्त हसावे. त्यांचेच प्रतिबिंब आहे.

Thick accent मधला डायलॉग समजायला डोक्यावरून जाऊ लागला तर त्याचे शब्द येथे पाहावेत.

गब्बर सिंग Mon, 10/08/2015 - 06:52

Why did the Indian economy stagnate under the colonial rule?

How did the Indian economy fare under the colonial rule? Is the average Indian significantly better off after Independence? This column examines trends in GDP per capita in order to determine the standard of living in India under the British rule. It also explores the possible causes of stagnation in the Indian economy for about two centuries between 1750 and independence.

.
.
.
.
Table 1. Per capita income growth in other countries during 1850-1950
.
.

अजो१२३ Mon, 10/08/2015 - 19:01

In reply to by गब्बर सिंग

4% in not per annum, it is for 100 years.
तुंबलेल्या अर्थव्यवस्थेतील सुबत्ता ही सुबत्ता नसून विषमता असते.

अजो१२३ Mon, 10/08/2015 - 21:42

In reply to by बॅटमॅन

अरे बाबा, घासकडवींचा इथे काय संबंध? त्यांचा प्रतिसाद देखिल नाही.

४% आणि १०० वर्षे हे दोन आकडे वाचणारास, आजचा दरवर्षीचा ५% पेक्षा जास्त आकडा पाहून, ४% प्रतिवर्ष असे वाटण्याची शक्यता आहे. वास्तविक तो ०.०४% प्रतिवर्ष आहे. ब्रिटिश किती परोपकारी होते हे कळण्यासाठी.

अनु राव Tue, 11/08/2015 - 11:23

In reply to by गब्बर सिंग

ह्या १०० वर्षात भारताची लोकसंख्या ५ पट झाली हे तू सांगत नाहीयेस गब्बर. म्हणजे जरी पर कॅपिटा वाढले नसेल तरी जीडीपी ५ पट झाले असणार. कुठल्याही प्रकारचे नविन संशोधन आणि एकुणच विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या बद्दल चा प्रतिगामी अ‍ॅप्रोच असे असुन सुद्धा जीडीपी ५ पट वाढ सुद्धा कौतुकास्पद आहे.

तुलनाच करायची तर कलोनियल रुल च्या आधी वेगवेगळ्या १०० वर्षात काय वाढ होत होती ते बघायला पाहीजे ना.

गब्बर तू हे असले लेख का वाचतोयस?

गब्बर सिंग Tue, 11/08/2015 - 11:32

In reply to by अनु राव

गब्बर तू हे असले लेख का वाचतोयस?

आदमी मजबूर हो जाता है दिल आने के बाद. (अर्थशास्त्र हे माझे फर्स्ट लव्ह आहे. )

जे उपलब्ध आहे ते वाचले जाते.

Actually your points are right. I tried to construct a graph of PCI and then something else came up and I dropped the idea.

अरविंद कोल्हटकर Tue, 11/08/2015 - 04:15

वर दिलेले स्वीडन ते हिंदुस्तान ह्यांच्या १०० वर्षातील वाढीचे आकडे पाहून छाती दडपून जाते. स्वीडनची वाढ सवापाचपट, अमेरिकेची चौपटीहून जास्त, ब्रिटनची जवळजवळ दुप्पट आणि हिंदुस्तान जवळजवळ जैसे थे! बाकीची सर्व बाळे भराभरा वाढली आणि मुडदुशा हिंदुस्तान तसाच काडीपैलवान राहिला!

पण हे आकडे १०० वर्षे चक्रवाढ दराने वाढल्याचे आहेत. ह्याच्या तळाशी दरसाल दरशेकडा सरासरी किती वाढ असायला हवी असा उलटा हिशोब करता येईल. उदाहरणार्थ, स्वीडनचे १८५०चे दरडोई उत्पन्न १०० एकक मानले आणि वाढीचा दरवर्षीचा दर 'र' टक्के मानला तर १९५० सालात स्वीडनच्या खात्यात किती रक्कम असेल हे पुढील समीकरण सांगते:

१०० + ५२६ = १००[१+(र/१००)]^१००.
म्हणजे
(६.२६)^(१/१००) = १+(र/१००)
कॅल्क्युलेटर वापरून
१.०१८५ = १+(र/१००) किंवा र = १.८५

अन्य चार देशांचे दरवर्षीच्या वाढीचे दरशेकडा आकडे - अमेरिका १.६५, ब्रिटन १.०९, जपान १.०४, जर्मनी १.००. मात्र हिंदुस्तान ह्याच काळात सरासरीने दरवर्षी दरशेकडा ०.००३९ इतकाच वाढला.

ही 'वाढ' जवळजवळ नसल्यातच जमा आहे पण इतरांचे आकडेहि आता इतके छाती दडपून टाकणारे वाटत नाहीत. दरवर्षाची एक ते दोन टक्के वाढ १०० वर्षे सातत्याने झाल्याचा तो परिणाम वर दिसत आहे.

अर्थात ब्रिटिशपूर्व देशी शासक काय दिवे लावत होते हेहि मूळ लेखात दिसत आहे. १६०० च्या पूर्वीचे आकडे दिसत नाहीत पण १६०० पासून १८५०पर्यंत दरडोई उत्पन्नात घटच होत गेलेली आहे. ह्यावरून असे म्हणता येईल की ब्रिटिश-पूर्व काळातहि हिंदुस्तानात 'सोन्याचा धूर' वगैरे काही नव्हता, श्मशानाचाच धूर अधिक होता. एकूण जनता भणंग आणि बादशहा/महाराजे/राजे/पेशवे/नबाब/सरदार/खान इत्यादि तुस्त असेच चित्र होते.

हे सारे empirical आणि anecdotal पुराव्यावरून माहिती आहेच पण काहीजणांना ते पटत नाही किंवा दिसत नाही. डाक्क्याच्या मलमलीच्या कपोलकल्पित गोष्टी एकमेकांना सांगण्यात त्यांना स्वारस्य असते.

जातिव्यवस्था, अज्ञान, अंतर्गत सुंदोपसुंद्या, दारिद्र्य अशांनी पोखरलेला हा देश ह्याच्या ना त्याच्या ताब्यात गेलाच असता. गेला नसता तर इथल्याच शासकांनी त्याचे तुकडेतुकडे करून त्याला विकून खाल्ले असते आणि हिंदुस्तानची आफ्रिकाच झाली असती. ब्रिटिशांच्यामुळे हे तरी थांबले हे कमी आहे का?

नितिन थत्ते Tue, 11/08/2015 - 06:58

In reply to by अरविंद कोल्हटकर

>>ब्रिटिश-पूर्व काळातहि हिंदुस्तानात 'सोन्याचा धूर' वगैरे काही नव्हता, श्मशानाचाच धूर अधिक होता.

ब्रिटिशपूर्व काळात नै हो मुस्लिमांच्या आक्रमणापूर्वी...... यवढं कळू नये झंटलमन लोकांला?

अजो१२३ Tue, 11/08/2015 - 11:12

In reply to by अरविंद कोल्हटकर

ही 'वाढ' जवळजवळ नसल्यातच जमा आहे पण इतरांचे आकडेहि आता इतके छाती दडपून टाकणारे वाटत नाहीत. दरवर्षाची एक ते दोन टक्के वाढ १०० वर्षे सातत्याने झाल्याचा तो परिणाम वर दिसत आहे.

हा एक गणिती जोक आहे का?
A very very minor difference of compounded growth rate over a very long period of time makes a huge difference. काळामानाप्रमाणे दर्वर्षी १ ते २ % ची वाढ (म्हणजे २ किंवा ४ वर्षांत ४% वाढ) नि १०० वर्षांत ४% वाढ याने छाती दडपट नाही?
=========================================================
By the way, a rocket is/can be launched from the surface of an deadly size asteroid that is on the collision course to the earth to achieve an extremely small change in the angle of its path. A over a period of 100 years, it saves humanity.

पण १६०० पासून १८५०पर्यंत दरडोई उत्पन्नात घटच होत गेलेली आहे. ह्यावरून असे म्हणता येईल

मला प्लासीच्या लढाइईपासून ब्रिटिशांचे हळूहळू राज्य पसरले असे माहित आहे. १८५७ ला (मंजे १८५० च्या जस्ट आधी) तर त्यांच्याविरोधात बंड झालेले. आम्ही म्हणतोय, प्लासी ते बंड या ब्रिटिश कालखंडात देखिल ०.०३९६% प्रतिवर्ष वाढ झाली. तुम्ही म्हणताय घट झाली.

श्मशानाचाच धूर अधिक होता.

स्मशानाचा धूर नेहमीच युरोपात जास्त होता, युके धरून. सुदैवाने कॉलनोनियल काळात इतकी पृथ्वी आणि नवे रिसोर्स त्यांना मिळाले कि धूर काढायचे दिवस यायला १९१४ उगवले.

एकूण जनता भणंग आणि बादशहा/महाराजे/राजे/पेशवे/नबाब/सरदार/खान इत्यादि तुस्त असेच चित्र होते.

याला अजिबातच काही विदा नाही.
आणि एक सिंपल लॉजिक वापरू. ब्रिटिशपूर्व काळातली जनता आणि ब्रिटिश काळातली जनता यांचे सुख तोलण्यासाठी. १०० वर्षांत जनसंख्या (दरवर्षी १% नि वाढली आहे, म्हणजे अडिचपट पेक्षा जास्त किंवा) २५०% आणि काँस्टंट प्राईस जीडीपी ४% ने वाढला. तर भणंग (मंजे नक्की काय?) पणा वाढला कि कमी झाला?
जे इथल्या इथे सिद्ध करता येतं ते न दिसण्यासाठी न्यूनगंड किती % नी वाढला असावा? ...

अजो१२३ Tue, 11/08/2015 - 11:19

In reply to by अजो१२३

इतके आर्थिक स्टॅग्नेशन असूनही आणि इतकी लोकसंख्या वाढूनही ब्रिटिश काळात भारत जिवंत राहिला, रेड इंडियन्स, पिग्मिज, माओरीज प्रमाणे मेला नाही हीच ब्रिटिशांच्या पूर्वी काळा काळा प्रमाणे भारत एक सुदृढ अर्थव्यवस्था होता याची साक्ष आहे.

अनु राव Tue, 11/08/2015 - 11:42

In reply to by अजो१२३

लोकसंख्या वाढूनही ब्रिटिश काळात भारत जिवंत राहिला, रेड इंडियन्स, पिग्मिज, माओरीज प्रमाणे मेला नाही

जपानी, जर्मन किंवा चीनी आले असते तर? लोकसंख्या वाढायला कारण सुद्धा ब्रिटीशांनी नविन संशोधन केलेली औषधे भारतात वापरुन दिली म्हणुन.

अजो१२३ Tue, 11/08/2015 - 11:57

In reply to by अनु राव

मानवाची जागतिक लोकसंख्या, कोण्या एका अतिप्राचीन काळात, उत्क्रांतीशास्त्रात, काही कारणांमुळे फक्त १५००० राहिली होती. तेथपासून ते आत्तापर्यंत जे काय मानवी जीव वाढले आहेत ते केवळ ब्रिटिशांमुळे.

ब्रिटिश असले तरच काही घडतं नाहीतर काही घडत नाही. संपूर्ण माफी आणि माघार.

अजो१२३ Tue, 11/08/2015 - 11:15

In reply to by अरविंद कोल्हटकर

आज फक्त तीन वर्षे १०००० रु गुंतवणूक करा इ इ स्कीम्स असतात. १० वर्षांनी, ३० वर्षांनी इतका परतावा मिळेल... यात खूप मोठं लॉजिक असतं.

अजो१२३ Tue, 11/08/2015 - 11:27

In reply to by अरविंद कोल्हटकर

जातिव्यवस्था, अज्ञान, अंतर्गत सुंदोपसुंद्या, दारिद्र्य अशांनी पोखरलेला हा देश ह्याच्या ना त्याच्या ताब्यात गेलाच असता. गेला नसता तर इथल्याच शासकांनी त्याचे तुकडेतुकडे करून त्याला विकून खाल्ले असते आणि हिंदुस्तानची आफ्रिकाच झाली असती. ब्रिटिशांच्यामुळे हे तरी थांबले हे कमी आहे का?

पराकोटीच्या न्यूनगंडाची निदर्शक वृत्ती. कोणत्याही विधानाला ना बूड ना शेंडा.

क्लायमॅक्स मंजे "ब्रिटिशांच्यामुळे हे तरी थांबले हे कमी आहे का?".
ते हे थांबवायला आले होते? रियली? त्यांनी बिघडावलं आहे ते लोक निस्तरताहेत.

हिंदू मुस्लिम दंगे ही ब्रिटिशांची भारताला देणगी आहे. जागे व्हा.

वैमानिक हत्ती Tue, 11/08/2015 - 11:41

In reply to by अजो१२३

हिंदू मुस्लिम दंगे ही ब्रिटिशांची भारताला देणगी आहे. जागे व्हा.

बापरे. महंमद बीन कासीम, गझनीचा महंमद, महंमद घोरी, औरंगजेब इत्यादी सगळे ब्रिटिशांमुळेच आले हे माहित नव्हते.

अजो१२३ Tue, 11/08/2015 - 11:52

In reply to by वैमानिक हत्ती

हे दंगेखोर होते? शिवाजीने सुरतेत दंगे केले? मराठ्यांनी अटकेपार दंगा केला? अशोकाने कलिंगात दंगा केला?
राजकीय आक्रमणे, लुटीच्या स्वार्‍या, युद्धे हे वेगळे आणि सामाजिक धार्मिक दंगे वेगळे.

वैमानिक हत्ती Tue, 11/08/2015 - 12:28

In reply to by अजो१२३

राजकीय आक्रमणे, लुटीच्या स्वार्‍या, युद्धे हे वेगळे आणि सामाजिक धार्मिक दंगे वेगळे.

आता तुमची ही व्याख्याच असेल तर काही इलाज नाही. पण अशी सिलेक्टिव्ह व्याख्या करायचे कारण समजले नाही. राजकीय आक्रमणे, लुटीच्या स्वार्‍या, युध्दे यात हिंसा झाली नाही का?

अजो१२३ Tue, 11/08/2015 - 12:41

In reply to by वैमानिक हत्ती

सगळ्या हिंसा हिंसा म्हणता तर ब्रिटिशांनी भारतात हिंसा केली नाही का? त्यांनीच हिंसा न करता सामाजिक सौख्य शिकवले हे त्यांनी इतक्या स्वार्‍या, युद्धे, हत्याकांडे, बंगालचा कृत्रिम अकाल, १८५७, इ इ करूनही म्हणणे दुटप्पीपणा नाही का?
==========================================
माझं असं म्हणण आहे कि १४०० (कि १५००) पासून भारतात इस्लाम आहे. एकही सामाजिक दंगल झाली नाही.
(मुस्लिम राजा, हिंदू सेनापती विरुद्ध हिंदू राजा नि मुस्लिम सेनापती टाईप लढाइला सामाजिक दंगा कसं म्हणता येईल?)
नेमके ब्रिटिश आले तेव्हाच "लोकांत" दंगे कसे चालू झाले?

वैमानिक हत्ती Tue, 11/08/2015 - 13:06

In reply to by अजो१२३

सगळ्या हिंसा हिंसा म्हणता तर ब्रिटिशांनी भारतात हिंसा केली नाही का?

ब्रिटिशांनी भारतात हिंसा केली नाही असे मी कुठे म्हटले आहे? दाखवा बघू.

नेमके ब्रिटिश आले तेव्हाच "लोकांत" दंगे कसे चालू झाले?

हे कसं झालं-- आमच्याच नातेवाईकांनी करणी करून आमच्यात भांडणे लावून दिली असे म्हणण्यासारखे आहे.जर का हिंदू आणि मुसलमान यांच्यात आपापसात विश्वास नसेल तर कधीनाकधी भांडणे आणि दंगे होणे हे क्रमप्राप्त आहे. आणि इस्लाम भारतात आल्यापासून (१४०० की १५०० पासून नाही तर ७१२ पासून) मुसलमान हे भारतात सत्ताधीश म्हणून वावरले. त्यामुळे सत्तेत असल्यामुळे दंगे करायची त्यांना गरज नव्हती.आणि हिंदू मुलखाचे भित्रे (आपला भित्रेपणा आपण सहिष्णूता किंवा सद्गुणविकृती या नावावर खपवतो ही गोष्ट वेगळी) त्यामुळे सर्वसाधारण हिंदू कधीच दंगे करायला गेले नाहीत. ब्रिटिश आल्यानंतर आपले सत्ताधीश हे स्थान गेले म्हणून मुसलमान बिथरले. हे सय्यद अहमद खान यांच्या लेखनातूनही कळेल. म्हणून ते दंगे करायला लागले.

अजो१२३ Tue, 11/08/2015 - 13:30

In reply to by वैमानिक हत्ती

ब्रिटिशांनी मुस्लिमांची सत्ता घेतली तर मुस्लिम हिंदूच्या ऐवजी पहिल्यांदा ब्रिटिशांना झोडपतील. पण ते तर ऐकमेंकाचे फेवरेट होते.

वैमानिक हत्ती Tue, 11/08/2015 - 13:41

In reply to by अजो१२३

१८५७ नंतर ब्रिटिशांनी मुसलमानविरोधी भूमिका घेतली होती.कारण १८५७ मध्ये मुसलमान हे हिंदूंपेक्षा जास्त कडवेपणाने लढले होते. पुढे १८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना झाली आणि त्यात हिंदूंचा सहभाग जास्त होता. नंतरच्या काळात ब्रिटिशांच्या लक्षात आले की आपल्या राज्याविरोधात उठाव हिंदू करायची शक्यता जास्त आहे म्हणून ब्रिटिशांनी हळूहळू मुस्लिमधार्जिणी भूमिका घेतली. मग बंगालची फाळणी, मोर्ले-मिंटो सुधारणा, मुस्लीम लीगची स्थापना आणि त्याला ब्रिटिशांचे आशिर्वाद या गोष्टी घडल्या.

ब्रिटिशांनी मुस्लिमांची सत्ता घेतली तर मुस्लिम हिंदूच्या ऐवजी पहिल्यांदा ब्रिटिशांना झोडपतील.

अगदी २००२ मध्ये अमेरिकेत कोणी जेरी फालवेल म्हणून काहीतरी बरळला. त्यानंतर दंगे अमेरिकेत झाले नाहीत, युरोपात झाले नाहीत तर कुठे झाले? आपल्या सोलापुरात. आणि त्या दंग्यांमध्ये ख्रिश्चनांना नाही तर हिंदूंना टारगेट केले गेले. तशीच विचारसरणी त्या काळातही असेलच. हिंदू नक्कीच सॉफ्ट टारगेट होते-- ब्रिटिशांपेक्षा. म्हणून राग कोणाविरूध्द काढा तर हिंदूंविरूध्द!!

अजो१२३ Tue, 11/08/2015 - 13:33

In reply to by वैमानिक हत्ती

ब्रिटिशांनी भारतात हिंसा केली नाही असे मी कुठे म्हटले आहे? दाखवा बघू.

माझा मुद्दा मिस झाला आहे असं वाटतं. असो.

अजो१२३ Tue, 11/08/2015 - 12:48

In reply to by अरविंद कोल्हटकर

गेला नसता तर इथल्याच शासकांनी त्याचे तुकडेतुकडे करून त्याला विकून खाल्ले असते आणि हिंदुस्तानची आफ्रिकाच झाली असती.

दोन शेजारी आफ्रिकन देशांत, ऐतिहासिक सांस्कृतिक रित्या, काही म्हणजे काहीच समाईक नाही. तिथे नै का ब्रिटिशांपेक्षा उच्चभ्रू असणारा फ्रेंचाचे राज्य होते? ज्याला बूडच नाही त्याला एक्त्र कसे करणार?
--------------------------
आणि समजा हिंदुस्तानचे तुकडे झाले असते तरी फार कै फरक पडला नसला. हिंदुस्थान युरोपसारखा झाला असता. आफ्रिकेची आठवण येणं हे लक्षण ...

वैमानिक हत्ती Tue, 11/08/2015 - 13:15

In reply to by अरविंद कोल्हटकर

जातिव्यवस्था, अज्ञान, अंतर्गत सुंदोपसुंद्या, दारिद्र्य अशांनी पोखरलेला हा देश ह्याच्या ना त्याच्या ताब्यात गेलाच असता. गेला नसता तर इथल्याच शासकांनी त्याचे तुकडेतुकडे करून त्याला विकून खाल्ले असते आणि हिंदुस्तानची आफ्रिकाच झाली असती. ब्रिटिशांच्यामुळे हे तरी थांबले हे कमी आहे का?

अगदी असेच. इंग्रज यायच्या आधी इतका बुजबुजाट झाला होता की this land was up for grabs. कोणीतरी येऊन हा प्रदेश बळकावलाच असता. त्यातल्या त्यात बरे इंग्रज इथे आले हे आपले मोठेच नशीब. गोव्यात पोर्तुगीज होते. तिथे ना कसल्या सुधारणा झाल्या ना विद्यापीठे सुरू झाली. स्वस्त दारू मिळायचे ठिकाण सोडून गोव्याची ओळख झाली नाही. हिंदूंवर तिथे अत्याचार झाले त्याला गणतीच नाही. असे कोणीतरी येण्यापेक्षा इंग्रज आले हे चांगलेच झाले.