Skip to main content

नंदी आणि यादवची मुक्ताफळं

भाषण्या रोग निवडणुकीत बोकाळतो. मिरव्या आणि दाव्या हे दोन रोग सध्या भयानक धुमाकुळ घालत आहेत ब्वा ! काळं असू अगर गोरं , सालं तोँड मिडियात झळकलंच पाह्यजे , विचारांचं पाहू बास्ता ! ते नीट पत्रकारावर ढकलता येतंय. मी असं बोललोच नाही, विपर्यास केला काही लोकांनी, वगैरे वगैरे वगैरे ! ही जबरी महत्त्वाकांक्षा राजकारण्या पासून चढत्या, उतरत्या दोन्ही श्रेणीनं लेखक कवी आणि
पत्रकारापर्यँत पोहचलीय .नंदी काय आणि योगेँद्र यादव काय ? भाडे त्यांच्या मानसिक गरजान्वये साधायचं ते साधतात. मिडिया बेड आणि बाजू परिस्थितीनुरुप बदलतो. २४ तासात गरवार होतो. पुढं बाळातीन व्हायचं का पोट पाडायचं ह्याचं धोरण आखणारे वायलेच. आणि डोक्याला शाँट मात्र लागतो आपल्या . मिरव्या रोग राजकारणी, लेखक, कवी, पत्रकार ह्यांचा आणि दाव्या रोग मिडियाचा ! मला कधी कधी खच्चून ओरडावं वाटतं घ्या केळं !!!

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 29/01/2013 - 21:30

याच संदर्भात दुसर्‍या धाग्यावर चर्चा सुरू आहे. जयपूर साहित्य संमेलनात आशिष नंदी यांचे खळबळजनक विधान? तिथे सविस्तर प्रतिसादांमधे नंदी यांच्या वक्तव्याचं अधिक स्पष्टीकरणही आहे.