इतिहास

माहीत‌ अस‌लेले ज‌गात‌ले प‌हिले 'शून्य‌'.

प्रचलित गणनापद्धति, १ ते ९ हे अंक, ० हा अंक आणि स्थानाप्रमाणे अंकाने दर्शविलेले मूल्य असणे ह्या सर्व बाबी अज्ञात अशा प्राचीन हिंदु गणितज्ञांची विश्वाला देणगी आहे हे आता सर्वमान्य झाल्यामध्ये जमा आहे. रोमन, ग्रीक किंवा तत्पूर्वीच्या बाबिलोनियन इत्यादि पद्धतींमध्ये नसलेले गणनाकौशल्य ह्या पद्धतीने जगाला दिले आणि भौतिक शास्त्रांची पुढील सर्व प्रगति ह्या गणनापद्धतीच्या पायावर उभी आहे ह्याविषयी दुमत नाही. आकडा कितीहि मोठा असू दे, ह्या पद्धतीमुळे तो सुतासारखा सरळ होते आणि बेरीज-वजाबाकी-गुणाकार-भागाकर असे संस्कार स्वत:वर निमूटपणे करून घेतो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

स्पेन महासत्ता का नाही ?

खफवर २० तारखेच्या आसपास ज्या गप्पा झाल्या, त्याबद्दल अधिक बोलण्यासाठी चिंजंनी धागा काढायला सांगितलं. तो हा धागा.
.

खफवरच्या माझ्या शंका --
शंका क्र१
भारतात समुद्री व्यापार- वसाहतीसाठी पोर्तुगीज डच इंग्रज फ्रेंच असे सगळे लोक आले (अगदि व्हेनिशिअन व्यापारीही येउन गेले चौलच्या युद्धाच्या वेळी.) पण मग स्पेन ह्या बर्‍यापैकी मजबूत मध्ययुगीन सत्तेला भारतात का येता अलं नाही ? ते येण्यात इंट्रेस्टेड नव्हते का ?
.
शंका क्र२
दक्षिण अमेरिकी देशच्या देश बेचिराख झाले; उजाड झाले म्हणे, युरोपिअन तिथे पोचल्यावर.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

आइशमन इन जेरुसलेम : सामान्यांचा दुष्टपणा


एडॉल्फ आइशमन/आईशमन (जर्मन) एस.एस.चा सदस्य होता. त्याचं काम होतं, ज्यू आणि समलैंगिक, जिप्सी लोकांच्या 'प्रवासा'ची तजवीज करायची. हा प्रवास म्हणजे त्यांच्या राहत्या शहर/गावांतून परदेशात हकालपट्टी किंवा कोणत्याशा यातनातळाकडे रवानगी. यातनातळात नक्की काय होत असे, ह्याच्याशी त्याच्या कामाचा संबंध नव्हता.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

भारतीय गणितातील संकल्पनांचा इतिहास

नुकतीच फेसबुकावर एक चर्चा झाली त्यात कोणीतरी एक लेख सादर केला होता - त्यात लेखकाने 'भारतात अतिशय पुरातन काळापासून कोटी, शंकू इतकंच काय तर १ वर ५० शून्य असलेल्या संख्येलाही नाव होतं. यावरून गणित किती पुढारलेलं होतं पाहा.' असं काहीसं म्हटलं होतं. संख्येला नाव आहे म्हणजे ती संख्या वापरात होती असं नाही; आणि मोठ्ठ्या संख्यांना नावं असणं म्हणजे गणिताची प्रगती असंही नाही.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

सोम (Somme) लढाईच्या शताब्दी निमित्ताने : पहिले महायुद्ध आणि मराठी साहित्य

शंभर वर्षांपूर्वी आजच्या दिवशी, जुलै १ १९१६, पहिल्या महायुद्धातील सोमच्या (Somme) लढाईला सुरवात झाली. ही लढाई म्हणजे मानवी इतिहासातील एक काळाकुट्ट दिवस आहे.

ही लढाई आपल्याला वाटते त्यापेक्षा फार जवळची आहे कारण त्यात कित्येक मराठी बोलणाऱ्या माणसांनी जीव गमावला आहे. १२ लाख भारतीय जवानांनी पहिल्या महायुद्धात भाग घेतला आणि त्यातील ७४,००० जणांनी प्राणांची आहुती दिली. (दुसर्या महायुद्धात ८७,०००; १९७१च्या युद्धात ३,९००; १९६२च्या ३,०००; १९६५च्या ५,३०० जवान शहीद झाले होते. सर्व आकडे विकिपेडिया वर आधारित.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

मायकेल हेर- 'डिसप्याचेस' आणि 'अपोकलिप्स नाउ' वाले- वारले

'डिसप्याचेस', १९७७ या व्हिएतनाम युद्धावरील प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक मायकेल हेर जुन २३ २०१६ ला वारले. 'अपोकलिप्स नाउ', १९७९ या अत्यन्त गाजलेल्या सिनेमाच्या जडणघडणीत सुद्धा त्यान्चा हात होता.

'डिसप्याचेस' मधील माझ्या अन्गावर आलेली काही वाक्ये:

“ I went to cover the war and the war covered me; an old story, unless of course you’ve never heard of it.”

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

गोव्यातील इन्क्विझिशन

’इन्क्विझिशन’ ही रोमन चर्चमधील एक संस्था कॅथलिक चर्चचे पावित्र्य अबाधित ठेवण्याच्या हेतूने ९व्या ग्रेगरी - पोप असण्याचा काल १२२७ ते १२४१ - ह्या पोपने सुरू केली. पाखंड शोधून त्याचा नाश करणे हा त्याचा हेतु होता. त्या काळामध्ये युरोपात बहुतेक सर्व देशांमध्ये कॅथलिक चर्चचेच आदेश पाळले जात. प्रत्येक राजाने आपापल्या सत्तेच्या भागात इन्क्विझिटर नावाचे खास अधिकारी नेमून चौकशी करून शिक्षा देण्याचे विशेष अधिकार त्यांना द्यावेत आणि त्यांच्यासाठी विशेष सोयी निर्माण कराव्यात असा पोपचा आदेश होत. तदनुसार ’होली रोमन एम्परर’ दुसरा फ़्रेडेरिक आणि फ्रान्सचा राजा ९वा लुई ह्यांनी इन्क्विझिटर्स नेमले आणि संशयित पाखंडी व्यक्तींना पकडून अमर्याद काळापर्यंत तुरुंगात डांबून, तसेच त्यांना शारीरिक यातना देऊन त्यांच्याकडून पाखंड कबूल करवून घेण्याची अमर्याद सत्ता अशा इन्क्विझिटर्स कोर्टांना बहाल केली. पाखंड सिद्ध झाल्यास मृत्युदंड द्यायचे अधिकारहि त्यांना होते आणि राजसत्ता त्यांच्या कारभारात कसलाहि हस्तक्षेप न करण्यास बांधलेली होती.

लवकरच इन्क्विझिटर्स कोर्टांची ’न भूतो न भविष्यति’ अशी दहशत सर्व युरोपात पसरली. कबुली मिळेपर्यंत संशयिताचा छळ करणे, सांगोवांगीवरून किंवा कोणाच्या तक्रारीवरून संशयिताला ताब्यात घेणे असे प्रकार फैलावले. कोणाच्या पाखंडाची माहिती असतांनाहि ती कोर्टापुढे न आणणे हाहि गुन्हा ठरला आणि त्यामुळे स्वत:च्या सुरक्षिततेच्या भीतीमधून दुसर्‍यावर आरोप करणे असले प्रकार बळावले आणि इन्क्विझिटर्स कोर्टांची सत्ता आणि दहशत अमर्याद झाली.

ज्यू धर्म हा येशूच्या मारेकर्‍यांचा धर्म म्हणून आणि मुस्लिम धर्म ख्रिश्चनांची पवित्र स्थाने ताब्यात ठेवणारा प्रतिस्पर्धी धर्म म्हणून इन्क्विझिशनचे विशेष लक्ष्य ठरले. तसेच ख्रिश्चन धर्मविरोधी वर्तन, समलिंगी आणि अनैसर्गिक प्रकारचे लैंगिक वर्तन, एकाहून अधिक बायका असणे अशी गुन्ह्यांची संख्या वाढू लागली.

पश्चिम युरोपात, विशेषत: स्पेनमध्ये, मूरिश अरबांची सत्ता सुमारे ४०० वर्षे टिकून होती. फ्रान्सच्या सीमेपर्यंत त्यांचा प्रसार झाला होता. चार्ल्स मार्टेलने ७३२ मध्ये तूरच्या लढाईत अरबांचा फ्रान्समधील प्रसार थोपवला होता पण सर्व स्पेन अरबांच्या कमीअधिक ताब्यात होते. कास्तिलची राणी इझाबेला आणि आरगॉनचा राजा फर्डिनंड ह्याच्या विवाहानंतर स्पेनमधील ख्रिश्चन पक्षातील दुफळी मिटून आधुनिक स्पेनचा उदय होण्यास सुरुवात झाली - १५व्या शतकाचा दुसरा अर्धभाग - आणि त्यांच्या सत्तेच्या काळात इन्क्विझिशनला आणखीनच बळ मिळाले. अरब सत्तेचा शेवट करायला प्रारम्भ तर त्यांनी केलाच पण त्या बरोबरच सर्व ज्यू- धर्मियांची आपल्या देशातून त्यांनी हकालपट्टी केली. त्यांच्या ह्या कॅथलिक निष्ठेमुळे Their Most Catholic Majesties असे स्वत:ला म्हणवून घ्यायची मुभा पोपने त्यांना दिली होती.

वर वर्णिलेल्या पाखंडाला आणखी एक जोड ज्यू हकालपट्टीबरोबर मिळाली. ती म्हणजे relapsed christians असण्याचा आरोप. पुष्कळ ज्यू लोकांनी देश सोडण्याऐवजी धर्म बदलून कॅथलिक होणे पसंत केले होते. असे बाटगे हे धर्माशी खरेखुरे एकनिष्ठ नाहीत अशी शंका उपस्थित करून ज्यू लोकांना relapsed christians म्हणून त्रास देण्याचा नवा प्रकार सुरू झाला. कोणी असा ख्रिश्चन डुकराचे मांस खात नाही अशी शंका घेऊन त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची प्रथा पडली. (Goya's Ghosts नावाचा चित्रपट यूट्यूबर उपलब्ध आहे. गोया ह्या प्रख्यात स्पॅनिश चित्रकाराची मैत्रीण इनेस ही डुकराचे मांस खात नाही ह्या आरोपावरून इन्क्विझिशनने तिल्या ताब्यात घेतले. दरबारामध्ये आणि चर्चमध्ये असलेले आपले वजन वापरून तिची सुटका घडवण्याचे गोयाचे प्रयत्न हा ह्या चित्रपटाचा विषय आहे.

इन्क्विझिशनचे काम मोठ्या गंभीरपणे चालत असे. आरोपींची शारीरिक छळ, बनावट साक्षी असे सर्व मार्ग वापरून चौकशी झाल्यावर काही सुदैवी सुटून बाहेर येत पण गुन्हा सिद्ध झालेल्यांना मालमत्ता जप्तीपासून जळून मारण्यापर्यंत अनेक शिक्षा होऊ शकत. वर्षामधून एक किंवा दोन वेळा अशा शिक्षांची सार्वजनिक अमलबजावणी होत असे. माद्रिद शहरामध्ये Plaza Mayor हा शहरातील प्रमुख चौक ही तेथील इन्क्विझिशनची जागा आजचे महत्त्वाचे टूरिस्ट डेस्टिनेशन झाले आहे. गावातील प्रमुख चौकामध्ये चारी बाजूंनी प्रेक्षकांची बसायची सोय करून उच्चासनावर इन्क्विझिटर न्यायालय बसत असे आणि दंडित आरोपी तेथे समारंभाने आणले जात. त्यांच्या शिक्षा येथे त्यांना वाचून दाखवल्या जात पण आपापल्या शिक्षा दुर्दैवी दंडितांना आधीच ठाऊक असत कारण शिक्षेच्या वेळी त्यांनी वापरायचे कपडे त्या त्या शिक्षेनुसार ठरलेले असत. जाळून मारण्याची - burning at stake - san benito नावाची पिवळी उंच निमुळती टोपी घातलेली असे आणि त्यांच्या अंगावरच्या पिवळ्या लांब कपड्यावर क्रूस, विस्तवाच्या ज्वाला आणि सैतानाच्या दूतांच्या चित्रांनी वेढलेले त्याचे स्वत:चे चित्र असे. हाच वेष पण क्रूसाशिवाय असा वेष केलेले म्हणजे गुन्हा सिद्ध झालेले आणि तरीहि माफी मिळालेले. स्वत:च्याच कपड्यात आलेले म्हणजे दंड भरून सुटका करण्यायोग्य गुन्हेगार अशा त्यांच्या दर्जाप्रमाणे शिक्षा असत. शिक्षा वाचून दाखविल्यानंतर धार्मिक अधिकारी दंडिताचा आत्मा जीजसच्या काळजीवर सोपवला आहे असे जाहीर करून दंडितांना राजाच्या हवाली करत आणि राजाचे यमदूत तेथेच आधी उभ्या केलेल्या शेकोट्यांवर दंडितांना बांधून जागीच शिक्षेची अंमलबजावणी करत असत. अशा ह्या मोठया नाटकी आणि गंभीर देखाव्याला auto da fe - act of faith असे नाव होते. (किंचित् अवान्तर. औरंगजेबाने संभाजीराजाला हालहाल करून ठार मारण्याची शिक्षा सुनावली. तेव्हाचे जे वर्णन आहे त्यामध्ये उंटावर बसवून आणि दोक्यावर विदूषकाची उंच टोपी घालून त्यांची मुघल छावणीभर मिरवणूक काढण्यात आली असे वाचले आहे. तशीच ही उंच टोपी दिसते.)

पोर्च्युगाल आणि स्पेनने अशिया-अमेरिकेमध्ये पाय पसरायला सुरुवात केल्यावर इन्क्विझिशन राजसत्तेपाठोपाठ ह्या नव्या प्रदेशांमध्येहि पोहोचले

नव्याने ताब्यात आलेल्या मेक्सिकोमध्ये असे auto da fe होत असत. मेक्सिको शहरातील नॅशनल पॅलेसमध्ये दिएगो गार्सिया ह्या प्रख्यात म्यूरलिस्टने रंगविलेली आणि मेक्सिकोचा सर्व इतिहास चित्ररूपाने दाखविणारी एक म्यूरल चित्रांची मालिका उंच जिन्याच्या दोहो बाजूस रंगविलेली आहेत. त्यातील auto da fe चे चित्र येथे खाली पहा. उंच टोपीतील दंडित आगीत जळण्याची वाट पाहात तेथे दिसतात.

Inquisition in Mexico

असेच इन्क्विझिशन गोव्यातहि येऊन पोहोचले आणि जुन्या गोव्यात आदिलशहाच्या पूर्वकालीन वाड्यामध्ये त्याची जागा होती. डेलॉन - M Dellon - नावाचा एक फ्रेंच डॉक्टर दमणमध्ये असतांना इन्क्विझिशनमध्ये सापडला. पवित्र कुमारी मेरीच्या चित्राला त्याने पुरेसा आदर दाखविला नाही अशा आरोपावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. दमणमधील एका ख्रिश्चन बाईबरोबर त्याचे मैत्रीचे संबंध स्थापन होत होते ते दुसर्‍या एका प्रतिष्ठिताला आवडले नाही आणि त्याने डेलॉनला खोट्या आरोपात गोवले होते. आधी दमणमध्ये काही दिवस आणि नंतर सुमारे दोन वर्षे गोव्यामध्ये इन्क्विझिशनच्या कैदेत कष्टात काढल्यानंतर मोठ्या मुष्किलीने त्याची सुटका झाली आणि मोझांबिक-ब्राझील-पोर्च्युगालमार्गे तो अखेर मायदेशी म्हणजे फ्रान्सला पोहोचला. तेथे आपल्या गोव्यातील अनुभवावर एक पुस्तक लिहून १६८० साली प्रसिद्ध केले. ते आता भाषान्तररूपात उपलब्ध आहे. अनंत काकबा प्रियोळकरांनी गोवा इन्क्विझिशनच्या विषयावर जे पुस्तक लिहिले आहे त्यात डेलॉनचे अनेक संदर्भ मिळतात असे वाटते. (प्रियोळकरांचे पुस्तक मी पाहिलेले नाही.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

जे.रॉबर्ट ओपेनहाइमर, अ‍ॅटम बॉंब आणि भगवद्गीता.

जे.रॉबर्ट ओपेनहाइमर ह्या पदार्थविज्ञानशास्त्राच्या प्रख्यात प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली न्यू मेक्सिको राज्यातील लॉस अलामोस येथील ’मॅनहॅटन प्रॉजेक्ट’मध्ये पहिला अ‍ॅटम बॉंब बनविण्यात येऊन न्यू मेक्सिकोमधीलच अलामोगोर्डो-स्थित ट्रिनिटी चाचणी केन्द्रामध्ये त्याची यशस्वी चाचणी १६ जुलै १९४५ ह्या दिवशी करण्यात आली. ह्या पहिल्या बॉंबबरोबरच Little Boy आणि Fat Man अशी सांकेतिक नावे दिलेले दोन बॉंब बनविण्यात आले होते. पैकी Little Boy चा स्फोट हिरोशिमा शहरावर ६ ऑगस्ट १९४५ ह्या दिवशी टाकण्यात आला. त्यानंतर तीन दिवसांनी ९ ऑगस्टला Fat Man नागासाकी शहरावर टाकण्यात आला. दोन्ही स्फोटांमध्ये अपरिमित हानि झाली. परिणामत: शरणागति पत्करण्याशिवाय जपानजवळ अन्य मार्ग उरला नाही आणि दुसरे महायुद्ध अखेर संपले. हा इतिहास आपणा सर्वांच्या परिचयाचा आहे.

चाचणीच्या वेळी जी प्रचंड ऊर्जा निर्माण झाली आणि सहस्र सूर्यांचे तेज प्रकट झाले (दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता। यदि भा: सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मन:॥ गीता ११.१२) ती पाहताच ओपेनहाइमर ह्यांना डोळ्यासमोर उभे राहिले ते म्हणजे गीतेतील कृष्णाने अर्जुनाला दिलेला उपदेश, दाखविलेले विश्वरूपदर्शनाचे चित्र आणि कृष्णाचे शब्द - Now I have become Death, the Destroyer of worlds. (कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्ध: लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्त: - गीता ११.३२) (ओपेनहाइमर ह्यांच्या स्वत:च्या शब्दांमध्ये हे वर्णन येथे पहा.)

असे विनाशकारी शस्त्र बनविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतांना त्यांची मन:स्थिति कशी होती, त्यांच्या मनामध्ये कोणते द्वन्द्व चालू होते आणि भगवद्गीतेने त्यातून त्यांना मार्ग कसा दाखविला हे पुढील लेखनामधून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

’मॅनहॅटन प्रॉजेक्ट’चे प्रमुख शास्त्रीय मार्गदर्शक (Scientific Director) असलेल्या ओपेनहाइमर ह्यांना ह्या प्रयत्नाला यश मिळायला हवे होतेच पण त्याचबरोबरच त्यांच्या मनामध्ये दोन परस्परविरोधी विचार उभे रहात होते. प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून अंगीकृत प्रयत्न अयशस्वी ठरू नये अशी त्यांची साहजिक इच्छा होतीच पण त्या प्रयत्नाच्या यशामधून पुढे जी परिस्थिति निर्माण होईल तिच्या उत्तरदायित्वाचीहि भीति त्यांना वाटत होती. ह्या प्रयत्नाच्या यशातून मानवाच्या हातामध्ये पूर्ण मानवजातीच्या संहाराचे साधन आपण सोपवत आहोत असे त्यांना वाटत होते. चालू युद्ध संपले तरी त्यानंतरहि अणुशक्तीचा वापर संहारक कार्यासाठी करण्याचे प्रयत्न चालूच राहतील आणि त्यांना वाढते यश मिळत जाईल ही भीति त्यांना अस्वस्थ करीत होती.

त्यांचे पूर्वायुष्य ’मॅनहॅटन प्रॉजेक्ट’मध्ये प्रमुख शास्त्रज्ञ ह्या त्यांच्या उत्तरायुष्याच्या उलट वाटावे असे होते. त्यांचा जन्म एका सधन ज्यू घरामध्ये १९०४ साली झाला. त्यांचे वडील ज्यूलिअस ओपेनहाइमर आणि आई एला हे वंशाने ज्यू असले तरी यहुदी धर्माचे कट्टर पुरस्कर्ते नव्हते. त्याऐवजी फेलिक्स अ‍ॅडलर ह्यांच्या Society for Ethical Culture ह्या धर्मतत्त्वांपेक्षा मानवी मूल्यांवर आणि परस्परकल्याणावर भर देणार्‍या चळवळीशी ते दोघेहि संबंधित होते आणि त्यामुळे त्या चळवळीच्या शाळेमध्ये जे.रॉबर्ट ओपेनहाइमर ह्यांचे शालेय शिक्षण झाले आणि त्या शिकवणुकीचे बाळकडू त्यांना शालेय काळामध्ये मिळाले. नंतर हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेत असतांना इंग्रजी भाषान्तरांमधून वाचनात आलेल्या हिंदु विचारांचा मागोवा घेण्यामध्येहि त्यांना रुचि निर्माण झाली.

गॉटिंगेन विद्यापीठामधून पदार्थविज्ञानशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवून परतल्यावर कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कली आणि कॅल्टेक येथे १९२९ साली पदार्थविज्ञानशास्त्र विभागात शिक्षकाचे काम त्यांना मिळाले. तेथेच त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले आणि पहिल्या रांगेतील शास्त्रज्ञ अशी त्यांची ख्याति होऊ लागली. पुढे १९३६ साली त्याच विद्यापीठांमध्ये प्राध्यापकाचे स्थानहि त्यांना मिळाले. ह्याच वेळेत बर्कलीमध्ये आर्थर रायडर हे संस्कृत भाषेचे एक गाजलेले विद्वान पौर्वात्यविद्या विभागामध्ये प्राध्यापक होते. त्यांच्याशी परिचय होऊन ओपेनहाइमर ह्यांनी आपल्या विस्तृत विचारविश्वाचा भाग म्हणून रायडर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मूळ संस्कृतमधून गीता वाचली आणि ह्या वाचनाचा त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला. अन्य संस्कृत वाङ्मयहि त्यांनी वाचले असे दिसते कारण नंतर पुढे १९६३ साली Christian Century ह्या मासिकाला मुलाखत देतांना गीता आणि भर्तृहरीची शतकत्रयी ह्या दोन पुस्तकांचा आपल्या मनावर सखोल परिणाम झाला आहे असे त्यांनीच सांगितले होते आणि आपल्यावर सर्वाधिक परिणाम करणार्‍या दहा पुस्तकांमध्ये त्या दोन पुस्तकांना त्यांनी पहिले आणि दुसरे स्थान दिले होते. त्याच मुलाखतीमध्ये गीता आणि शतकत्रयीबरोबरच त्यानी टी.एस. ईलियट ह्यांच्या The Waste Land ह्या दीर्घ कवितेचा उल्लेख केला होता आणि ही कविताहि भारतीय उपनिषदांचे ऋण मानते. तिची अखेर ’दत्त दयध्वं दम्यत’ आणि ’शान्ति: शान्ति: शान्ति:’ ह्या औपनिषदिक शब्दांनी झाली आहे. ओपेनहाइमर ह्यांच्या कार्यालयात जवळच सहज हाती येईल अशा पद्धतीने गीतेचे पुस्तक दिसे असे त्यांच्या परिचितांनी नोंदवले आहे. ह्या सर्वावरून असे दिसते की ओपेनहाइमर ह्यांच्या विचारांच्या जडणघडणीमध्ये भारतीय तत्त्वज्ञान आणि विशेषत: गीतेची शिकवण ह्यांचा मोठा प्रभाव होता.

१९२५ साली केंब्रिजमध्ये शिकत असतांना युद्धविरोधी Pacifist चळवळीच्या सभांमध्ये त्यांची उपस्थिति असे. मॅनहॅटन प्रॉजेक्टच्या यशस्वी कार्यानंतर आणि हिरोशिमा आणि नागासाकी स्फोटांनंतर अणुशस्त्रे आणि अणुयुद्ध ह्या दोन्हींच्या विरोधकांमध्ये ते प्रमुख होते. त्यांची ही विरोधातील भूमिका माहीत असल्यानेच नंतरच्या काळात १९५४ साली Atomic Energy Commission समोर त्यांना चौकशीला तोंड द्यावे लागले आणि चौकशीचा परिणाम म्हणजे त्यांची गुप्तता पातळी - Security Clearance - काढून घेण्यात येऊन गोपनीय कार्यांमध्ये त्यांना भाग घेता येणार नाही असा निर्णय झाला. अशा रीतीने स्वभावत: शान्तिप्रेमी आणि अणुशस्त्रविरोधी अशी ही व्यक्ति बॉंबनिर्मितीच्या कामामध्ये महत्त्वाची भूमिका निभावू शकली हा मोठाच परस्परविरोध आहे. ह्या विरोधातून मार्ग काढतांना ओपेनहाइमर ह्यांना गीतेचे मार्गदर्शन कसे मिळाले असेल?

कुरुक्षेत्रावर युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वी कृष्णाने अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा केला. आपल्या विरोधात आपलेच पितामह, गुरु, बंधु आणि अन्य आप्त उभे आहेत हे पाहिल्यावर युद्ध करण्याची अर्जुनाची इच्छा नष्ट होऊन त्याची जागा नैराश्याने, क्लैब्याने आणि वैराग्याने घेतली. तो म्हणाला:

दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् ॥ १-२८॥
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥ १-२९॥
गाण्डीवं स्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते ।
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ॥ १-३०॥
निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥ १-३१॥
न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।
किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ॥ १-३२॥
येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च ।
त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥ १-३३॥
आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामह: ।
मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा ॥ १-३४॥
एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ॥ १-३५॥
निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन ।
पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः ॥ १-३६॥
तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्स्वबान्धवान् ।
स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥ १-३७॥

असे निराशेचे उद्गार काढून धनुष्यबाण टाकून देऊन दु:खी अर्जुनाने रथातच बसकण मारली.

एवमुक्त्वार्जुनः सङ्ख्ये रथोपस्थ उपाविशत् ।
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥ १-४७॥

त्याची ही शोकमग्न आणि भ्रान्त वृत्ति पाहून कृष्णाने त्याला केलेला उपदेश आणि त्याच्या संशयाचे निराकरण थोडक्या शब्दांमध्ये असे. हा उपदेश देतांना कृष्ण कर्तव्य, नियति आणि श्रद्धा ह्या तीन गोष्टींचे विवरण करतो.

१) कर्तव्य - ’क्षत्रियत्व’ हा तुझा धर्म आहे आणि हा धर्म तुला समाजस्थितीमधून मिळालेला आहे. तस्मात् युद्ध करणे हे तुझे कर्तव्य आहे.

स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि ।
धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥ २-३१॥
यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् ।
सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् ॥ २-३२॥
अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ।
ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ॥ २-३३॥
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥ ३-३५॥
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॥ १८-४७॥
सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् ।
सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः ॥ १८-४८॥

२) कर्तव्यावर पूर्ण विश्वास - एकदा नियत कर्तव्य ठरले की त्याच्या प्राप्तीसाठी नि:शंक मनाने कार्य करावे, तसे करतांना काही पापकृत्य घडले तरी त्यातून पापाचा दोष लागत नाही असे गीता सांगते.

अपि चेदसि सर्वेभ्य: पापेभ्य: पापकृत्तम:।
सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि॥ ४.३६॥
अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक्।
साधुरेव स मन्तव्य: सम्यग्व्यवसितो हि स:॥ ९.३०॥
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच;॥ १८.६६॥

३) नियति - युद्धामध्ये आपल्या विरोधकांची आपल्या हातून हत्या झाली तर तो दोष आपल्याला लागेल ह्या अर्जुनाच्या भीतीचे निराकरण करण्यासाठी कृष्ण त्याला सांगतो की प्रत्येकाचे - तुझे आणि तुझ्या प्रतिपक्षाचे - भविष्य ठरलेले आहे. मारणारा तू नाहीस, मीच आहे. त्यांचे मरण जर यायचे असेल तर ते तुझ्यामुळे येणार आहे हा तुझा भ्रम आहे. त्यांच्या अटल मृत्यूचे तू केवळ निमित्त असशील.

कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः ।
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥ ११-३२॥
तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् ।
मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥ ११-३३॥

इतकेच नाही तर दोन्ही बाजूचे योद्धे आधीच आपल्या विनाशाच्या मार्गावर निघालेले आहेत हेहि अर्जुनाला दाखविले जाते कारण अर्जुन म्हणतो:

अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसङ्घैः ।
भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः ॥ ११-२६॥
वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि ।
केचिद्विलग्ना दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः ॥ ११-२७॥

जो संहार व्हायचा आहे तो अगोदरच निश्चित आहे, तो तुझ्या कर्माचे फल नाही म्हणून तुझे नियत कर्म तू करत राहिले पाहिजेस आणि फलाविषयी चिन्तित राहू नकोस हे कृष्ण अर्जुनाला पुन:पुन: बजावतो.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ २-४७॥
त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः ।
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित्करोति सः ॥ ४-२०॥
युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् ।
अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते ॥ ५-१२॥

कर्मफल कसे असेल, ते कसे मिळेल वा मिळणार नाही अशा चिन्ता व्यर्थ आहेत हा संदेश भर्तृहरीनेहि नीतिशतकामधून पुढील श्लोकाद्वारे दिला आहे. तो म्हणतो:

मज्जत्वम्भसि यातु मेरुशिखरं शत्रूञ्जयत्वाहवे
वाणिज्यं कृषिसेवनादिसकला विद्याः कलाः शिक्षतु |
आकाशं विपुलं प्रयातु खगवत्कृत्वा प्रयत्नं परम्
नाभाव्यं भवतीह कर्मवशतो भाव्यस्य नाशः कुतः ॥ ४८॥

(मनुष्याने पाण्यामध्ये बुडी मारली, मेरुपर्वतावर आरोहण केले, युद्धामध्ये शत्रूंना जिंकले, वाणिज्य, कृषि, सेवाभाव अशा नाना विद्या आणि कला आत्मसात् केल्या, मोठा प्रयत्न करून आकाशामध्ये उड्डाण केले. असे काहीही केले तरी कर्मवशतेमुळे जे न होणारे आहे ते होणार नाही आणि जे होणारे आहे ते टळणार नाही. यदभावि न तद्भावि भावि चेन्न तदन्यथा!)

मनुष्याच्या हातून केल्या जाणार्‍या कार्याच्या फलावर जर त्याचा कसलाच ताबा नसेल आणि त्याच्या कार्याचा परिपाक आधीच ठरलेला असेल तर त्याने निहित कार्याकडे तटस्थतेने आणि संन्यस्त दृष्टीने पाहावे अशी गीतेची शिकवण आहे.

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥ २-३८॥
काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः ।
सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः ॥ १८-२॥

एकीकडे शास्त्रज्ञ म्हणून पार पाडायचे कर्तव्य आणि दुसरीकडे हे कर्तव्य पार पाडले तर त्यातून निर्माण होणार्‍या भावी घटनांची आणि संहाराची भीति ह्या अन्तर्द्वन्दामधून गीतेची ही तीनपेडी शिकवण ओपेनहाइमरना मार्गदर्शक ठरते. शालेय जीवनामध्ये फेलिक्स अ‍ॅडलर ह्यांच्या Society for Ethical Culture ह्या धर्मतत्त्वांऐवजी मानवी मूल्यांवर आणि परस्परकल्याणावर भर देणार्‍या चळवळीचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. त्या संस्कारांच्या पूर्णपणे विरुद्ध अशा अणुशस्त्रासारख्या गोष्टीची निर्मिति हे शास्त्रज्ञ म्हणून त्यांचे कर्तव्य ठरले होते. हे कर्तव्य शान्तिप्रियतेच्या त्यांच्या श्रद्धांनाहि छेद देणारे होते. येथे गीतेने त्यांना सांगितले की तुझे शास्त्रज्ञ म्हणून नियत कर्तव्य अणुशस्त्रनिर्मिति हेच आहे. त्या अणुशस्त्रांचा पुढे कसा सदुपयोग वा दुरुपयोग होईल हे ठरविण्याचे कर्तव्य हे तुझ्या शासकीय वरिष्ठांचे आणि राजकारणी पुरुषांचे आहे, त्या क्षेत्रामध्ये तुझा काही अधिकार नाही. तेव्हा त्याचा विचार न करता तू तुझे नियत कर्तव्य निर्मम बुद्धीने करावेस. त्याच्या परिणामांची चिन्ता करण्याचे तुला कारण नाही.

गीतेची शिकवणूक अशा पद्धतीने कामी आणून आपले शास्त्रज्ञाचे नियत कर्तव्य पार पाडल्यानंतर ओपेनहाइमर ह्यांचा अणुशस्त्रविरोध पुन: डोके वर काढू लागला. त्यांच्या मित्रांच्या सांगण्यावरून असे दिसते की अणुशस्त्रनिर्मितीमधील सहभागामुळे नंतरच्या वर्षांत त्यांना खंत वाटू लागली होती. हायड्रोजन बॉंबनिर्मितीच्या विषयामध्ये त्यांचे मत विचारले गेले असता त्यांनी आपल्या चिंतेला उघड वाच्यता दिली.

शास्त्रज्ञ ओपेनहाइमर गीतेचे मार्गदर्शन घेऊन बॉंब बनविण्याच्या कार्यात मग्न असतांना हार्वर्ड विद्यापीठाचा एक अन्य स्नातक, टी.एस. ईलियट, गीतेचेच शब्द वापरून लिहीत होता:

And do not think of the fruit of action.
Fare forward.
...
...
So Krishna, as when he admonished Arjuna
On the field of battle.
Not fare well,
But fare forward, voyagers.

(Four Quartets, Quartet No. 3, The Dry Salvages.)

('The Gita of J. Robert Openheimer' by James A. Hijiya ह्या निबंधावर आधारित.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

शिवराज्याचा राज्यव्यवहारकोश - भाग १.

कित्येक शतके लुप्त झालेला प्राचीन हिंदु पद्धतीमधील राज्याभिषेक समारंभ शिवाजीमहाराजांनी पुनरुज्जीवित केला आणि परकीय मूळ असलेल्या राजकीय वर्चस्वाला आह्वान दिले. सांस्कृतिक पातळीवर असेच करण्यासाठी परक्या शासकांबरोबर आलेल्या फारसी-उर्दू भाषांचे मराठीवरील आक्रमण थांबवून पुन: ह्या देशातील मूळच्या अशा मराठी भाषेला राज्यकारभारात योग्य स्थान देण्याचे त्यांनी ठरविले.

राज्याभिषेककालापर्यंत खरोखरच येथील जनतेची स्वत:ची मराठी भाषा फारसी-उर्दूच्या आक्रमणाखाली गुदमरून गेल्यासारखी दिसत होती. १४व्या शतकाच्या प्रारंभाला देवगिरीचे यादवांचे राज्य नष्ट झाले आणि खिलजी सल्तनतीचे अंमल सुरू झाला. शासक आपली भाषाहि आपल्याबरोबर आणतो ह्या नियमास धरून फरसी-अरबी शब्दांचे मराठीवरील आक्रमण तेव्हापासून सुरू झाले. १७व्या शतकापर्यंत प्रामुख्याने गद्य लेखनामध्ये हे आक्रमण जाणवण्या-खुपण्याइतपत वाढले होते. पद्य लेखनामध्ये ते त्यामानाने कमी दृग्गोचर होते कारण तत्कालीन पद्यलेखन हे सर्व धार्मिक-आध्यात्मिक स्वरूपाचे असल्याने त्याची परंपरा ही प्राचीन भारतीय दर्शने, पुराणे आणि रामायण-महाभारतासारख्या काव्यामधून आलेली होती. गद्य लेखन हे सरकारी कामकाज, महसूल गोळा करणे अशा हेतूने होत असल्याने शासकांच्या भाषेचा प्रभाव तेथे अधिक लक्षात येण्याजोगा होता. हा परकीय प्रभाव पुढील दोन उतार्‍यांच्या तुलनेतून स्पष्ट दिसतो. पहिला उतारा महानुभावांच्या ’लीळाचरित्र’ ह्या ग्रन्थातून घेतला आहे. ह्याचा काल १३व्या शतकाचा मध्य.

Lilacharitra
Lilacaritra

दुसरा उतारा इ.स. १७०० च्या पुढेमागे परशुरामपंत प्रतिनिधीने गोव्याच्या ’विजरई’ ला -Viceroy - पाठविलेल्या एका पत्रामधून घेतला आहे. पत्रामध्ये गोवेकरांच्या एका वर्तणुकीबद्दल नापसंती दर्शविली आहे. उतार्‍यातील वाक्यरचना आणि विभक्तिप्रत्यय वगळता येथे मराठी अभावानेच दिसते आहे.

Farsi

ही परिस्थिति बदलण्यासाठी आणि मराठीला तिचे नैसर्गिक स्वरूप मिळवून देण्यासाठी आणि राज्यकारभारातील फारसीचा अतोनात प्रसार ताब्यात आणण्याच्या दृष्टीने पाऊल म्हणून शिवाजीराजांनी आपला दक्षिण प्रान्तातील अधिकारी आणि तंजावरनिवासी रघुनाथ नारायण हणमंते ह्यांना फारसीच्या जागी देशी शब्द सुचविणारा ’राज्यव्यवहारकोश’ रचण्यास सांगितले. लगोलग कामाला लागून रघुनाथपंतांनी असा कोश रचून तो राजापुढे १६७८ च्या सुमारास सादर केला . ह्या साठी संस्कृत भाषेचा आधार घेण्यात आला आणि फारसी शब्दांच्या जागी समानार्थी संस्कृत शब्द सुचविण्यात आले.

१७व्या शतकात राजाचे कुटुंब, राज्यकारभार कसा चालत असे, राजसभेमध्ये शिष्टाचार कसा असे, राज्यातील शासकीय आणि सैनिकी अधिकारी कोण होते येथेपासून सुरुवात करून वापरातील शस्त्रे, अंगावरचे दागिने, राज्याचा अर्थव्यवहार, महसूल आकारणी, नाणी, व्यापार-उदीम, कापडचोपड आणि कपडे, मादक पेये, धूम्रपान, तांबूलद्रव्ये, सुगंधी तेले अशा आर्थिक आणि सामाजिक विचाराच्या दृष्टीने मनोरंजक आणि उद्बोधक वाटतील अशा वस्तूंचे उल्लेख येथे मूळ फारसी/उर्दू शब्द आणि त्यांच्यासाठी सुचविलेला संस्कृत शब्द ह्या मार्गाने मिळतात. असे सुमारे १३८० शब्द १० गटांमध्ये - अमरकोशाची भाषा उचलून त्यांना ’वर्ग’ असे नाव दिले आहे- आपणास येथे दिसतात.

ह्या कोशाच्या एकमेकापासून कमीअधिक प्रमाणात भिन्न अशा अनेक प्रती महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मिळाल्या आहेत. त्यापैकी कोल्हापूरहून का.ना. साने ह्यांनी मिळालेली प्रत १९२५ साली भारत इतिहास संशोधक मंडळाने प्रकाशित केलेल्या ’शिवचरित्रप्रदीप’ ह्या ग्रंथामध्ये छापलेली आहे. ह्या प्रतीचे वैशिष्टय असे की मुख्य कोशापलीकडे तिच्यामध्ये ८४ संस्कृत श्लोकांचा उपोद्घात आणि अखेरीस ५ श्लोकांचा उपसंहार आहे, जो अन्य प्रतींमध्ये नाही. उपसंहारामध्ये कोशाच्या निर्मितीविषयी अधिक माहिती आहे. पुढील लेखन ह्या प्रतीवर आधारलेले आहे.

कोशातच अनेक ठिकाणी म्हटल्याप्रमाणे त्याची निर्मिति ही रघुनाथपंतांनी केली आहे. उपोद्घातामध्ये पुढील श्लोक दिसतात.

कृते म्लेच्छोच्छेदे भुवि निरवशेषं रविकुला-
वतंसेनात्यर्थं यवनवचनैर्लुप्तसरणीम्।
नृपव्याहारार्थं स तु विबुधभाषां वितनितुम्।
नियुक्तोऽभूद्विद्वान्नृपवर शिवच्छत्रपतिना ॥८१॥
सोऽयं शिवच्छत्रपतेरनुज्ञां मूर्धाभिषिक्तस्य निधाय मूर्ध्नि।
अमात्यवर्यो रघुनाथनामा करोति राज्यव्यवहारकोशम् ॥८२॥

सूर्यवंशाचा जणू तुराच अशा राजश्रेष्ठ शिवछत्रपतीने पृथ्वीवर म्लेच्छांचा समूळ उच्छेद केल्यानंतर यवनोक्तींनी झाकोळलेल्या देवभाषेला राज्यव्यवहारासाठी वाढविण्याच्या हेतूने एका विद्वानाला नियुक्त केले. ८१.
तो मी अमात्य रघुनाथ शिवछत्रपतीची आज्ञा मस्तकी धारण करून राज्यव्यवहारकोश करीत आहे. ८२.

प्रत्येक वर्गाच्या अखेरीस पुढील प्रकारचा समारोप आहे:

इति श्रीशिवच्छत्रपतिप्रियामात्येन नारायणाध्वरिसूनुना रघुनाथपण्डितेन शिवराजनियोगत: कृते राजव्यवहारकोशे पण्यवर्गो दशम: समाप्त:॥
(शिवछत्रपतीचा प्रिय अमात्य, नारायणाचा पुत्र अशा रघुनाथपंडिताने शिवाजीराजाच्या आदेशावरून केलेल्या राजव्यवहारकोशामध्ये पण्यवर्ग हा दहावा वर्ग समाप्त झाला.)

ह्याउलट उपसंहारामध्ये पुढील दोन श्लोकांमध्ये असे लिहिले आहे:

व्यासान्वयाब्धिचन्द्रेण लक्ष्मणव्याससूनुना।
कोशोऽयं ढुंढिराजेन रघुनाथमुदे कृत:॥१॥
यथामति विचार्यैव नामान्यर्थानुसारत:।
विहितानि मयाकार्यमार्यैरत्र मनो मनाक्॥२॥

(व्यासकुल हा सागर, त्यातून उत्पन्न झालेल्या चन्द्रासारखा असलेल्या, लक्ष्मण व्यासाचा पुत्र, अशा ढुंढिराजाने रघुनाथाच्या संतोषासाठी हा कोश केला. १.
बुद्धीने विचार करून अर्थानुसारी शब्द मी येथे योजिले आहेत. आर्य विद्वानांनी ह्याकडे थोडे लक्ष द्यावे. २.)

हे सर्व श्लोक एकत्रितपणे विचारात घेतले तर असे म्हणता येते की रघुनाथपंडिताला हे कार्य मिळाले. तो स्वत: तंजावरचा निवासी असून त्याच्याकडे शिवराज्यापैकी दक्षिणभागाचे शासन हे प्रमुख कार्य होते. पूर्ण कोश स्वत: करणे त्याला शक्य नसणार म्हणून त्याने ढुंढिराज नावाच्या परिचित विद्वानाला हे कार्य सोपविले. कोशनिर्मितीमध्ये असा दोघांचाहि काही वाटा आहे. ढुंढिराजाने शब्द गोळा करणे असे पहिले काम केले आणि दोघांनी मिळून त्याला हे अखेरचे स्वरूप दिले. (प्रख्यात पंडितकवि रघुनाथपंडित, नलदमयंतीस्वयंवराचा कवि आणि रघुनाथपंत अमात्य हे एक का दोन, ढुंढिराज व्यास कोण होता असे बरेच काही लिहिण्याजोगे आहे पण विस्तारभयास्तव ते येथे न लिहिता त्याचा नुसता उल्लेख करतो.)

ह्यापुढे प्रत्यक्ष कोशाचा धावता आढावा घेऊ. संस्कृत पंडितप्रथेला धरून शिवजन्मामागे ईश्वरी प्रेरणा आहे असे सुचविणारे, कोशकार्याची आवश्यकता काय आणि ते करण्यास रघुनाथपंडित कसा सर्वथैव पात्र आहे ह्याचे वर्णन करणारे आणि अतिशयोक्तीने भरलेले ८४ श्लोक उपोद्घातामध्ये आहेत. त्यांचा सारांश असा:

यवनाक्रान्त आणि त्यामुळे त्रस्त अशी पृथ्वी ब्रह्मदेवाकडे ’माझी यवनांपासून सोडवणूक कर’ असे सांगण्यासाठी गेली. हे कार्य करण्यास विष्णु अधिक योग्य आहे असे सांगून ब्रह्मदेव तिला बरोबर घेऊन विष्णूकडे गेला. आपल्यापेक्षाहि शंकराने हे कार्य केल्यास उत्तम होईल असे म्हणून सर्वजण कैलासावर शंकराकडे गेले. तेथे शंकर ’परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥’ असे तूच पूर्वी सांगितले होतेस अशी विष्णूला आठवण करून देतो आणि म्हणतो:

निहता भवता हरे पुरा ये पौलस्त्यमुखा: सुखाय भूमे:।
अहितान्पुनरेव जन्मभाजो जहि तान्प्राप्तनराकृतिस्त्वमेव॥४६॥
येषां कलौ दुर्नयमेव सोढुं बुद्धावतार: कलितो मयाऽभूत्।
तेषां विनाशं स्फुटमेव कर्तुमसाम्प्रतं मे मनुषे यदीत्थम्॥४७॥
उपायमप्यत्र वदामि भूमिमवाप्य मन्नामनिगूढभाव:।
साहाय्यमंशेन पुनर्भवान्या लब्ध्वापि त्तानाशु सुखेन हन्या:॥४८॥

हे हरे, पूर्वी भूतलावर सुख आणण्यासाठी तू रावणादींचा वध केलास. आता पुन: जन्म घेतलेल्या त्या शत्रूंना मनुष्यरूपाने तू नष्ट कर. ४६.
’ज्यांचा दुष्टपणा सहन करण्यासाठी मी कलियुगामध्ये बुद्धावतार धारण केला होता त्यांचा विनाश करण्यासाठी मी मनुष्यरूप धारण करणे अयोग्य आहे’ असे जर तुला वाटत असेल...४७.
...तर त्यावर मी उपाय सांगतो. गुप्तपणे माझे नाव धारण करून तू धरणीवर अवतीर्ण हो आणि सहजपणे त्यांचे हनन कर. ह्यामध्ये भवानीचेहि साहाय्य अंशत: तुला मिळेल. ४८.

विष्णूस असा आदेश दिल्यावर शंकर पुढे सांगतो...

अस्ति प्रशस्तविभवो भुवि भानुवंशे विख्यातभोसलकुलामृतसिन्धुचन्द्र:।
श्रीशाहवर्मनृपतिर्विधिपार्वतीशश्रीशा हवि: क्रतुषु नित्यमदन्ति यस्य ॥४९॥
तस्य प्रिया भूपतिभर्तुरार्या रूपेण संतर्जितकामभार्या।
साध्वी जिजूर्नाम सुलक्षणास्ते पत्नी दिलीपस्य सुदक्षिणेव॥५०॥
त्वं शाहपृथ्वीपतिवीरपत्न्यामस्यां समासाद्य मनुष्यजन्म।
म्लेच्छापहत्या सुखमाचरय्य भूमे: पुन: स्थापय वर्णधर्मान्॥५१॥
पार्थं प्रति प्राक्तव धर्महानौ सृजेयमात्मानमिति प्रतिज्ञा।
जगत्सु गीतैव तदत्र कार्षी: कार्येऽधुना माधव मा विचारम्॥ ५२॥

अर्थ - विख्यात भोसले कुलरूपी सागरातून वर आलेला चन्द्रच जणू असा शाहाजी नावाचा कीर्तिमान् राजा आहे ज्याचा यज्ञातील हवि ब्रह्मदेव, शिव आणि विष्णु नित्य ग्रहण करतात. त्याची प्रिय आणि दिलीपाची सुदक्षिणा असावी अशी जिजू नावाची सुलक्षणा रूपवती भार्या आहे. ४९-५०.
तिच्यापासून मनुष्यरूपाने जन्म घेऊन तू म्लेच्छविनाश करून पृथ्वीवर पुन: सुखसमाधान आण आणि वर्णाश्रमधर्माची पुन:स्थापना कर. ५१.
धर्महानि झाली असता मी पुन: जन्म घेऊन उतरेन असे तूच पूर्वी गीतेमध्ये सांगितले आहेस. तेव्हा आता अधिक विचार न करता तू हे कार्य अंगावर घे. ५२.

आदेशाप्रमाणे स्वत: श्रीविष्णूने ’शिव’ ह्या नावाने पृथ्वीवर जन्म घेतला आणि भवानीचा अंश असलेल्या जिजाबाईच्या पाठिंब्याने म्लेच्छांचा संहार केला.

क्रमेण जित्वा स दिशश्चतस्रो राजा शिवच्छत्रपति: प्रतापात्।
नि:शेषयन्म्लेच्छगणं समस्तं पाति स्म पृथ्वीं परिपूर्णकाम:॥६५॥

सर्व म्लेच्छगणांचा आपल्या पराक्रमाने नि:शेष करणारा परिपूर्णकाम राजा शिवछत्रपति चारी दिशा क्रमाने जिंकून सर्व पृथ्वीचे रक्षण करू लागला.

तदनंतर...

कृते म्लेच्छोच्छेदे भुवि निरवशेषं रविकुला-
वतंसेनात्यर्थंयवनवचनैर्लुप्तसरणीम्।
नृपव्याहारार्थं स तु विबुधभाषां वितनितुम्।
नियुक्तोऽभूद्विद्वान्नृपवर शिवच्छत्रपतिना ॥८१॥
सोऽयं शिवच्छत्रपतेरनुज्ञां मूर्धाभिषिक्तस्य निधाय मूर्ध्नि।
अमात्यवर्यो रघुनाथनामा करोति राजव्यवहारकोषम् ॥८२॥

अर्थ - सूर्यवंशाचा जणू तुराच अशा राजश्रेष्ठ शिवछत्रपतीने पृथ्वीवर म्लेच्छांचा समूळ उच्छेद केल्यानंतर यवनोक्तींनी झाकोळलेल्या देवभाषेला राज्यव्यवहारासाठी वाढविण्याच्या हेतूने एका विद्वानाला नियुक्त केले. ८१.
तो मी अमात्य रघुनाथ शिवछत्रपतीची आज्ञा मस्तकी धारण करून राज्यव्यवहारकोष करीत आहे. ८२.

आपल्या ह्या कोशकार्याची कुचेष्टाहि होऊ शकेल असे वाटून रघुनाथपंडित उपोद्घाताच्या अखेरीस सांगतो:

विपश्चित्संमतस्यास्य किं स्यादज्ञविडम्बनै:।
रोचते किं क्रमेलाय मधुरं कदलीफलम् ॥८४॥

विद्वन्मान्य अशा ह्या कार्याची अडाण्यांनी कुचेष्टा केली म्हणून काय बिघडते? उंटाला गोड केळ्याची चव कोठे कळते? ८४.

ह्यापुढे १० वर्गांमध्ये मिळून १३८० फारसी-उर्दू शब्दांना संस्कृत भाषेतील शब्द समानार्थी शब्द सुचविण्यात आलेले आहेत. कोशाचे १० वर्ग असे: १) राज्यवर्ग २) कार्यस्थानवर्ग ३) भोग्यवर्ग ४) शस्त्रवर्ग ५) चतुरंगवर्ग ६) सामन्तवर्ग ७) दुर्गवर्ग ८) लेखनवर्ग ९) जनपदवर्ग १०) पण्यवर्ग . ह्यापुढे ह्या लेखामध्ये कोशामधील कोणताहि शब्द दाखवितांना प्रथम राज्यव्यवहारकोशाने सुचविलेला पर्याय आणि नंतर कंसात मूळ फारसी शब्द अशी रचना ठेवली आहे.

हा राज्यव्यवहार पुष्कळसा पूर्वीच्या मुस्लिम पद्धतीमधून घेतला आहे. राज्याच्या कारभाराचे १८ कारखानेआणि १२ महाल असे विभाजन तेथूनच घेतले आहे, मात्र ते जसेच्या तसे ह्या कोशामध्ये उतरलेले नाही. कसे ते लवकरच दिसून येईल.

राज्याच्या १८ कारखान्यांची मुस्लिम राजवटीतील नावे आणि त्यांच्या कामाचे विषय असे- i) खजिना - कोशागार ii) जवाहिरखाना - रत्ने, दागिने iii) अंबरखाना - धान्यसाठा iv) शर्बतखाना - औषधे v) तोफखाना - तोफा, बंदुका इत्यादि vi) दफ्तरखाना - राज्यविषयक कागदपत्रे vii) जामदारखाना - वस्त्रप्रावरणे ह्यांची व्यवस्था viii) जिरातखाना - शस्त्रे, चिलखत, टोप इत्यादि ix) मुतबकखाना - पाकसाधना, रसोई इत्यादि, x) फीलखाना -हत्ती आणि त्यांचे सामान xi) उष्टारखाना - उंट आणि त्यांचे सामान xii) नगारखाना - नौबत, ढोल, शिंगे इत्यादि xiii) तालिमखाना - मल्लशाळा, xiv) फरासखाना तंबू, राहुटया, जाजमे इत्यादींची व्यवस्था, xv) आबदारखाना - पाणी अन्य पेयांची व्यवस्था xvi) शिकारखाना - पाळीव प्राणी (वाघ, सिंह इत्यादि) xvii) दारू खाना - तोफा-बंदुकांसाठी दारूगोळा xviii) शहदखाना - सफाई खाते.

१२ महाल असे: i) पोते - व्यय, ii) सौदागर - व्यापार उदीम, iii) पालखी, iv) कोठी, v) इमारत, vi) वहिली - रथशाळा, vii) पागा - अश्वदल, viii) सेरी - सुखसोयी, ix) दरुनी - अन्त:पुर, x) थट्टी - गाईम्हशींचा तबेला, xi) टांकसाळ, xii) सबीना - संरक्षक.

ह्या कारखाना आणि महालांपैकी कशाकशाची नोंद राज्यव्यवहारकोशामध्ये घेतली गेली आहे ते आता पाहू.

कारखान्यांपैकी कोशागार (खजिना), रत्नशाला (जवाहिरखाना) आणि वसनागार (जामदारखाना) ह्यांमधील वस्तु आणि तेथील अधिकार्‍यांची नावे ही क्रमाने वर्ग २ - कार्यस्थानवर्ग येथे मिळतात. पाकालय (मुतबकखाना). जलस्थान (आबदारखाना), सुधास्थान (शरबतखाना), पक्षिशाला (शिकारखाना), आस्तरणक (फरासखाना) हे कारखाने वर्ग ३-भोग्यवर्ग येथे आहेत. शस्त्रागार (जिरातखाना), अग्निचूर्णक (दारूखाना) आणि मल्लशाला (तालिमखाना) हे वर्ग ४ - शस्त्रवर्ग येथे आहेत. गजशाला (फीलखाना, ह्यामध्येच मन्दुरा - घोड्यांची पागा ह्या महालाचाहि समावेश केला आहे), रथशाला (वहिलीमहाल), उष्ट्रशाला (शुतुर्खाना म्हणजेच उष्टारखाना), वाद्यशाला (आलंखाना म्हणजेच नगारखाना) इतक्यांचा समावेश वर्ग ५ - चतुरंगवर्ग केला आहे. वर्ग ६ - सामन्तवर्गामध्ये सैनिकांचे प्रकार, अधिकार्‍यांची नावे. सैन्याची हालचाल आणि मुक्काम अशा सैन्याशी संबंधित शब्द आहेत. वर्ग ७ - दुर्गवर्गामध्ये प्रथम दुर्ग-किल्ले ह्यांच्याशी संबंधित परिभाषा दर्शवून त्यानंतर संभारगृह (अंबारखाना) हा कारखाना, इमारत हा महाल आणि अखेरीस मलस्थान (तारतखाना किंवा शहदखाना ह्यांच्याशी संबंधित श्ब्द दर्शविले आहेत. कोशातील सर्वात मोठा वर्ग म्हणजे वर्ग ८ - लेखनवर्ग. ह्यामध्ये लेख्यशाला (दफ्तरखाना) हा कारखाना, व्यय (वेतनादि खर्च) हा महाल आणि त्यानंतर पत्रव्यवहारात, वाटाघाटींमध्ये, राजसभेमध्ये, शिष्टव्यवहारामध्ये, कर्जव्यवहार आणि दोन पक्षांमधील आर्थिक विवादामध्ये वापरायचे अनेक फारसी शब्द आणि त्यांना प्रतिशब्द दिले आहेत. वर्ग ९ - जनपदवर्ग ह्यामध्ये नाना देशविभाग, त्यांचे अधिकारी, जमिनीचे महसूलासाठी प्रकार, महसूलाशी संबंधित शब्द, वजनेमापे, अशा गोष्टी दिसतात. अखेर वर्ग १० - पण्यवर्ग येथे उत्पादनाच्या आणि विक्रीच्या वस्तु आणि ते निर्माण करणारे ह्यांची नावे दिसतात.

(क्रमश:. पुढील भागामध्ये काही रंजक आणि लक्षणीय शब्द.)

आधार:
१) राज्यव्यवहारकोश - सं. का.ना.साने, शिवचरित्र प्रदीप, पृ.१३७ पासून पुढे.
२) Administrative System of the Marathas by Surendranath Sen पृ. ५९-६१

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

आर्यभटाची पृथ्वी, भास्कराचार्यांचे पाटण...

मी 'उपक्रम' आणि 'ऐसी' येथे वेळोवेळी केलेल्या लेखनातील काही लेखांचा संग्रह bookganga.com येथे ह्या URLने प्रकाशित झाला आहे. संग्रहाचे नाव 'आर्यभटाची पृथ्वी, भास्कराचार्यांचे पाटण आणि अन्य लेख' असे असून सुरुवातीच्या प्रास्ताविक निवेदनामध्ये हे लेख 'उपक्रम' आणि 'ऐसी' आलेले आहेत असेहि नोंदवले आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - इतिहास