समाज

ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट: अर्थात आपल्या परसातील पक्ष्यांची मोजणी

येत्या १४ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी या दरम्यान जगभरात 'ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट' होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही थोर करायचं नाहिये तर या चार दिवसांत तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला जे जे पक्षी दिसले त्या त्या पक्षांची नोंद करून ती तुम्ही www.ebird.org वर करायची आहे.

५) Are you out of your sense? Yes ! It's Sensory Integration Disorder.

आपण शाळेत असल्यापासून शिकत आलो आहोत, मानवाला पंचेंद्रीये असतात. स्पर्श, स्वाद, गंध, आवाज व दृश्य.( sight, smell, taste, touch, sound).
पण मी तुम्हाला सांगितले कि ती माहिती चुकीची आहे तर?

हो, आपल्याला वर नमूद केलेल्या पाच इंद्रियांच्याखेरीज अजून दोन लपलेले(हिडन) सेन्सेस असतात.


धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

माधवराव आणि वरदा.

माधव जूलिअन् म्हणजे माधवराव हे फारसी विषयामध्ये एम्.ए.ची पदवी एल्फिन्स्टन कॉलेजातून मिळवून वयाच्या २५ व्या वर्षी पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सेवेत शिरले. ह्यापूर्वीचे त्यांचे आयुष्य आणि शिक्षण आपल्या बडोदा ह्या जन्मगावी झाले होते.

तुटपुंज्या उत्पन्नाच्या आणि सोवळ्या आणि जुन्या चालीरीति आणि विचार ह्यांना चिकटून राहू पाहणार्‍या कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांच्या सुधारकी विचारांना सहानुभूति न मिळाल्यामुळे शाळेच्या शेवटच्या वर्षांमध्ये कुटुंबाशी त्यांचे संबंध कोरडेच झाले होते. पण मंचरशा वाडिया ह्या त्यांच्या मुख्याध्यापकांचा हाताखाली Palgrave च्या Golden Treasury सारख्या पुस्तकाचा आणि रोमॅंटिक इंग्लिश कवींच्या वाचनाने आणि त्याच वेळी समवयस्क आणि कवितांचे तसेच नादी वि.द. घाटे ह्यांच्यासारखे मित्र मिळाल्यामुळे त्यांना कविता लिहिणे आणि वाचणे ह्यांमध्ये मोठी रुचि निर्माण झाली होती. बडोद्यातच राहणारे जुन्या पिढीतील कवि चंद्रशेखर ह्यांचे माधवराव भक्त होते. काशीबाई हेर्लेकर ह्या सुविद्य बाई बडोद्यात मिस मेरी भोर (’वाहवा वाहवा चेंडू हा’ ख्यात) ह्यांच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये शिक्षिका होत्या. स्वत:चे स्वतन्त्र लेखनहि त्या करीत असत. अशा ह्या सुसंस्कृत बाईंशी आणि त्यांच्या मुलींशी शेजारपणामुळे वयाच्या १२-१३ वर्षापासूनच माधवरावांचा चांगला घरोबा निर्माण झाला होता. काशीबाईंची थोरली मुलगी शान्ता - नंतरच्या शान्ताबाई कशाळकर - माधवरावांहून चारेक वर्षाने मोठी होती. तच्या रसिक सहवासात माधवराव आल्याने ते तिच्याकडे ओढले गेले. पौगंडावस्थेतील माधवराव तिच्याकडे आई-बहीण-मैत्रीण-प्रेयसी अशा अनेक नात्यांतून पाहू लागले आणि एकदा धीर करून तिच्याशी विवाह करण्याची इच्छाहि त्यांनी बोलून दाखवली. वय, आर्थिक स्थिति, पोटजात हे लक्षात घेऊन असे होऊ शकणार नाही असे शांताबाईंनीच त्यांना सांगितले. माधवरावांच्या मनातील शान्ताबाई मात्र शेवटपर्यंत तशाच राहिल्या आणि त्यांनीच दिलेले ’जूलिअन्’ हे टोपणनाव माधवराव कवि म्हणून अखेरपर्यंत वापरत राहिले. ( मेरी कॉरेलीच्या 'God's Good Man' ह्या कादंबरीत Julian Adderley नावाची व्यक्तिरेखा आहे. तेच नाव शान्ताबाईंनी माधवरावांना दिले.)

ह्या सर्व वातावरणाचा प्रभाव म्हणजे विशीतले माधवराव सामाजिक विचार, स्त्रीपुरुष मैत्री अशा बाबतीत हळवे आणि प्रागतिक झालेले होते. महाराष्ट्रातील तत्कालीन मध्यमवर्गाचा स्त्रीपुरुषसंबंधांकडे पाहण्याचा संकुचित दृष्टिकोण माधवरावांना मान्य नव्हता आणि असे संबंध नैसर्गिक लैंगिकतेच्या पलीकडे शुद्ध मैत्रीचे, खेळीमेळीचे असावेत अशी त्यांची धारणा झाली होती. आपल्या काव्यातूनहि ते असेच विचार मांडत असत आणि त्यामुळे तकालीन विख्यात टीकाकार बा.अ.भिडे ह्यांच्याकडून त्यांना ’प्रणयपंढरीचे वारकरी’ असे एकाच वेळी खोचक आणि तरीहि समर्पक असे अभिधानहि प्राप्त झाले होते.

माधवराव तरुणपणाकडे वाटचाल करीत होते तेव्हाच अनेक यशापयशांमधून गेल्यामुळे आपल्या आयुष्याचे आपण नक्की काय करायचे असे विचार त्यांच्या मनामध्ये उठत होते. हळव्या प्रेमामागे लागून आयुष्याची एकदोन वर्षे वाया गेली हे त्यांना जाणवले होते. चरितार्थासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे हे त्यांनी ओळखले होते आणि म्हणून १९१६ साली बी.ए. आणि १९१८ साली एम.ए. ह्या पदव्या त्यांनी मिळविल्या. परीक्षांसाठी त्यांचा विषय फारसी हा होता. फारसीबाबत त्यांना काही विशेष प्रेम होते असे नाही कारण सुरुवातीस संस्कृत आणि नंतर इंग्लिश ह्यांकडेहि त्यांचा ओढा होता पण नोकरी मिळवायला चांगला विषय असा वडिलांचा आग्रह पडल्यामुळे काहीशा नाइलाजानेच त्यांनी फारसीची निवड केली आणि त्या भाषेवर चांगले प्रभुत्व मिळविले.

एम,ए.पदवी मिळविल्यानंतर त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे नोकरीसाठी अर्ज टाकला आणि जून १९१८ पासून न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसन कॉलेजात इंग्लिश आणि फारसी शिकवण्याचे काम त्यांना मिळाले. अशा प्रतिष्ठित संस्थेत नोकरी मिळाल्यामुळे हे काम आपल्या बाजूने उत्कृष्ट करून आपला ठसा उमटावयाचा असा निर्धार त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाला. १९१९ साली संस्थेचे आजीव सदस्यत्वहि त्यांना देण्यात आले. (कॉलेजातील त्यांच्या वर्गात असणार्‍या विद्यार्थिनींमध्ये शकुंतला परांजपे आणि इरावती करमरकर - नंतरच्या कर्वे - ह्याहि होत्या.)

माधवरावांमध्ये जो टोकाचा सामाजिक प्रागतिकतावाद होता त्याची एक चुणूक १९१९ साली पाहायला मिळाली. चिरोल खटल्यासंबंधीच्या आपल्या विलायत दौर्‍यावरून टिळक परत आल्यावर १९१९ च्या डिसेंबर महिन्यात पुण्याच्या मंडईतील मोठया सभेत त्यांना नागरिकांतर्फे मानपत्र देण्याचा संमारंभ झाला. तत्कालीन अस्पृश्य समाजातील काहीजण, तसेच रॅंग्लर परांजपे ह्यांच्यासारखे सुशिक्षित प्रागतिक ह्या मानपत्राला विरोध करणार्‍यांमध्ये होते. प्रत्यक्ष सभेमध्ये ह्यांपैकी कोणीच उपस्थित राहिले नाहीत. केवळ एका अस्पृश्य मुलाने ’टिळक आमच्या सहभोजनामध्ये भाग घेणार असले तर आमचा मानपत्राला विरोध नाही’ अशा अर्थाचे भाषण केले आणि तो सभेतून निघून गेला. सभेच्या शेवटी मानपत्र देण्याचा ठराव सभेपुढे मतदानासाठी मांडला गेल्यावर एक व्यक्ति वगळता बाकी सर्वांनी ठरावाला अनुमोदन दिले. विरोधाचा एकुलता एक आवाज होता माधवरावांचा. टिळकांचा लोकप्रियता शिगेला पोहोचली असतांना पुण्यात सार्वजनिक सभेत त्याविरुद्ध आवाज उठविण्याचे धैर्य माधवरावांमध्ये होते. त्या दिवशी संतप्त जमावाकडून माधवरावांना चांगलाच मार पडला असता. सभेच्या आयोजकांनी संरक्षण दिल्यामुळे ते बचावले.

१९२१ साली श्री.बा.रानडे, त्यांच्या पत्नी मनोरमाबाई, यशवंत पेंढारकर (यशवंत), शंकर केशव कानेटकर (गिरीश), ग.त्र्यं.माडखोलकर अशा समशील आणि समविचारी, तसेच कविताप्रेमी मंडळींच्या सहवासात माधवराव येऊन पोहोचले आणि त्यातूनच रविकिरण मंडळाची स्थापना झाली. (मंडळात रवि एकच, माधवराव. बाकीची नुसती किरणेच! -अत्र्यांचा ’झेंडूची फुले’च्या प्रस्तावनेतील शेरा!) आपल्या सामाजिक विचारांमुळे आणि काव्यामुळे माधवराव नवविचारांच्या तरुण वर्गामध्ये लोकप्रिय होऊ लागले होते. त्याचबरोबरच ह्या नव्या विचाराच्या काव्याला जुन्या मडळींकडून विरोधहि होऊ लागला होता. रविकिरण मंडळाचे पहिले प्रकाशन ’किरण’ ह्याच्यावरच्या बा.अ. भिडे ह्यांच्या 'विविधज्ञानविस्तारा'तील अभिप्रायात अशी शंका व्यक्त करण्यात आली होती की १९व्या शतकाच्या आरंभात रावबाजीच्या चैनबाजीच्या दिवसांत जसे अनंतफंदी, प्रभाकरासारखे तमासगीर पुढे आले त्यांचेच सुधारलेले अवतार आता निर्माण होऊ लागले आहेत आणि पुढील छकडा-लावण्यांच्या उदयाचा हा काळ आहे. ’चटोरपणात माधव जूलिअन् धाडसी आहेत हे निभ्रान्त कबूल केले पाहिजे’ अशा निष्कर्षाला बा.अ.भिडे येऊन पोहोचले.

ह्याच वेळेस डे.ए.सोसायटीच्या आजीव सदस्यांमध्येहि दोन गट होते. त्यांच्यातील प्रमुख व्यक्ति के.रा.कानिटकर आणि वि.ब.नाईक ह्यांच्यावरून त्यांना कानिटकर गट आणि नाईक गट अशी नावे होती. कानिटकर गट सामाजिक विचारांच्या बाबतीत पुढारलेला होता आणि नाईक गट अधिक रूढिप्रिय होता. माधवराव खरे तर कानिटकर गटात पडायला हवे होते पण सोसायटीच्या सभांमधून अनेकदा आपल्या स्पष्ट बोलण्यामधून त्यांना ह्या वर्गाचे शत्रुत्वच मिळाले होते. माधवरावांच्या कविता आणि सामाजिक बाबतीतील त्यांची आग्रही मते ह्या गटाला अतिरेकी वाटत असत. ह्यानंतरच्या माधवरावांच्या अडचणी निर्माण करण्यात कानिटकर गटाचा हात होता आणि सनातनी मानल्या जाणार्‍या नाईक गटाकडूनच त्यांना पठिंबा मिळाला.

रविकिरण मंडळाच्या सदस्यांभोवती जे तेजोवलय निर्माण होत होते त्यामुळे समविचाराचे नवतरुण-तरुणी त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले होते आणि त्याच्या सदस्यांच्या काव्यगायन, काव्यचर्चा, सहली आणि सहभोजने ह्यांमध्ये असे नवतरुण-तरुणी भाग घेऊ लागले. नेमकी हीच लोकप्रियता आणि आपल्या मनाला पटेल ते उघड बोलण्याची माधवरावांची सवय त्यांना एक अनपेक्षित आघात देऊन गेली.

ह्या नवतरुणांमध्ये वरदा नायडू नावाची आंध्रातील हनमकोंडा गावाची एक तरुणीहि होती. तिच्या वडिलांनी शिक्षणासाठी तिला फर्ग्युसन कॉलेजच्या वसतिगृहामध्ये ठेवले होते. माधवराव आणि वरदा ह्यांच्यामध्ये मर्यादेपलीकडे घसट आहे अशा वावडया पुण्यामध्ये उठू लागल्या. पूर्वनियोजनाशिवाय आणि केवळ अपघातानेच घडलेल्या काही घटनांमुळे - जसे की एकत्र सहली, अन्य पोक्त स्त्रियांच्या संगतीत पण माधवराव जेथे होते अशा घरात रात्र काढणे - ह्या वावडयांना खतपाणी मिळाले. अन्य तीन पुरुष प्राध्यापक आणि माधवराव ह्या तरुणीबरोबर कॉलेजच्या कोर्टावर टेनिस खेळले ह्याचा मोठा बागुलबुवा करण्यात आला. लकडी पुलावर आणि कॉलेजच्या मागील टेकडीवरील ‘कविकातळा‘वर त्यांची नावे एकत्र लिहून ठेवण्याचा खोडसाळपणाहि केला गेला.

माधवरावांच्या विरोधी गटाला ह्या गोष्टींनी आयतेच भांडवल पुरविले. अविवाहित आजीव सदस्याने वसतिगृहातील मुलीबरोबर मैत्रीचे संबंध ठेवणे सोसायटीच्या इभ्रतीला शोभेसे नाही आणि अशा वर्तणुकीच्या सदस्याबरोबर आम्हांस काम करणे प्रशस्त वाटत नाही अशा अर्थाच्या तक्रारी सोसायटीकडे आल्या. स्वत: माधवराव, त्यांचे पाठिराखा नाईक गट अशांनी लेखी निवेदने दिली. घडलेल्या घटना अशा का घडल्या ह्याचे पूर्ण स्पष्टीकरण माधवरावांनी दिले. स्वत: वरदाने माधवरावांनी आपल्याला कसलेहि वचन दिले नाही वा फसविण्याचा प्रयत्न केला नाही असे पत्र लिहिले. बरीच भवति न भवति होऊन आणि ठराव-प्रतिठरावांचे राजकारण होऊन अखेर असा समझोता झाला की माधवरावांनी २० जून १९२४ पासून दोन वर्षांसाठी बिनपगारी रजेवर जावे, रजेच्या काळात त्यांना अन्य नोकरी करण्याची मुभा आहे. ह्या दोन वर्षांच्या काळात आपण त्या मुलीला भेटणार नाही वा तिच्याशी पत्रव्यवहार करणार नाही अशी अटहि माधवरावांकडून कबूल करून घेण्यात आली.

ह्यानंतर अमळनेरच्या प्रताप हायस्कूलमध्ये नोकरी मिळाल्यामुळे माधवराव तिकडे रवाना झाले.

ह्या घटनाचक्राचा दुसरा अंक येथून पुढे सुरू झाला आणि त्याला कारणीभूत होते श्रीधरपंत आणि मनोरमाबाई रानडे ह्यांसारखे माधवरावांचे हितचिंतक. श्री.के.क्षीरसागर हेहि माधवरावांचे निकटवर्ती असल्याने त्यांनी ह्याचे मोठे मार्मिक विश्लेषण केले आहे. माधवरावांचे स्त्रीपूजन हे केवळ ध्येयवादी होते. लैंगिक संबंधांना आणि विवाहाच्या आकांक्षांना त्यामध्ये स्थान नव्हते. पण श्रीधरपंतांसारख्या ‘कर्त्या‘ प्रागतिकांना हे पटण्याजोगे नव्हते. स्त्रीपुरुष मैत्रीचा शेवट विवाहातच व्हावा अशी त्यांची अपेक्षा होती. वरदाकडूनहि ह्या अपेक्षेला पाठबळ मिळेल असे वर्तन घडले. तिने रानडे दांपत्याला पत्र लिहून ‘माधवरावांशी विवाह जुळवून द्यावा‘ अशी विनंति केली. तदनुसार मुंबईत रानडे ह्यांच्या घरी भेट ठरली. वरदा तेथे उपस्थित असेल ह्याची काहीहि कल्पना माधवरावांना न देता त्यांनाहि रानडयांच्या घरी बोलावण्यात आले. व्ररदाला तेथे पाहून माधवराव चकित झाले. माधवरावांनी रजेवर जातांना सोसायटीला काय संगितले होते ह्याची रानडे दांपत्याला जाणीव नव्हती पण माधवरावांना साहाय्य करण्याच्या त्यांच्या हेतूमधून माधवरावांना नुकसानच पत्करावे लागले. रानडयांच्याच सूचनेवरून माधवराव, वरदा आणि बरोबर द.ल.गोखले असे तिघेजण जुहूला गेले पण त्या बेटीतून निष्पन्न झाले इतकेच की माधवरावांनी लग्नास नकार दिला.

माधवराव आणि वरदा ह्यांची मुंबईत भेट झाली ही वार्ता पुण्यास पोहोचली आणि परिणामत: माधवरावांचे हितचिंतकहि त्यांच्यापासून दूर झाले. त्यांची बाजू ह्यापुढे आपण समर्थपणे मांडू शकणार नाही असे त्यांना वाटून माधवरावांनी आपणहून राजीनामा द्यावा असे त्यांनी सुचविले. ११ ऑक्टोबर १९२५ ह्या दिवशी माधवरावांनीच राजीनामा दिल्याने ह्या प्रकरणावर पडदा पडला.

हा सर्व घटनाक्रम आजच्या दिवसात हास्यास्पद वाटतो. इतक्या किरकोळ बाबीचे इतके मोठे पर्यवसान कसे होऊ शकते असा प्रश्न आजच्या वाचकाला पडेल. त्याला उत्तर असे की जे घडले हे त्या काळाची मानसिक घडण, सामाजिक विचार आणि सामाजिक बंधने मानण्याची तयारी दर्शवणारा आरसा आहे. आजच्या विचाराने त्याला तोलता येणार नाही.

माधवराव आणि वरदा ह्यांचे संबंध अखेरपर्यंत स्नेहाचे राहिले. वर वर्णिलेल्या घटनांचा त्यांवर काहीच परिणाम झाला नाही. माधवरावांनी १९२९ च्या मे महिन्यात गंगूताई गरुड (लीलाबाई पटवर्धन) ह्यांच्याबरोबर विवाह केला. वरदाचाहि विवाह झाला्. मधल्या काळात माधवरावांनीच तिच्यासाठी एक स्थळ सुचविले होते पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही.

(प्रा.शं.के.कानिटकरलिखित ‘स्वप्नभूमि;, गं.दे.खानोलकरलिखित ‘माधव जूलिअन‘, लीलाबाई पटवर्धनलिखित ‘आमची अकरा वर्षे‘ ह्या पुस्तकांमधून संकलित).

धाग्याचा प्रकार निवडा: : 

पुणे कट्टा: शनिवार १८ जानेवारी

एक कट्टा तो बनता है! अशी मेघनाने आरोळी दिली आणि मग चर्चांच्या आवर्तनांतून पुढिल प्लॅन ठरला आहे:

रुपरेषा:

  • दुपारी १२:३० वाजेपर्यंत शिवाजीनगर येथील 'साउथ इंडीज' या हॉटेलमध्ये भेटणे. (विकांताच्या दरानुसार माणशी खर्च रु.५५०+tax)
  • आरामात दोनेक तास चरून मग दुपारी युनिव्हर्सिटी किंवा इतर सर्वानुमते योग्य ठिकाणी गप्पाष्टक जमवणे
  • ज्या पुण्याबाहेरच्या मंडळींना त्याच दिवशी परतायचे आहे त्यांनी आपापल्या सोयीच्या वेळी निघणे
धाग्याचा प्रकार निवडा: : 

समलैंगिकता

ऐसीवर मराठी विकीपीडियावर चढवण्यासाठी लेख तयार करणं या उद्देशाने 'विकीपानांसाठी' हा नवा विभाग सुरू केलेला आहे. विकीसाठी लेख तयार करणं हे दोन प्रकारे करता येईल एक म्हणजे इतर भाषांत अस्तित्वात असलेल्या पानांचं भाषांतर/रूपांतर करणं. दुसरं म्हणजे नवीन पानच सुरू करणं. या दोन्ही प्रकारांसाठी हा विभाग वापरता येईल.

भाषांतर/रूपांतर करणं हे मोठं ओझं वाटू शकतं. एखाद्या व्यक्तीला आख्ख्या लेखाच्या भाषांतरासाठी वेळ मिळेलच असं नाही. काही तांत्रिक शब्दांच्या भाषांतरावर अडून रहायला देखील होईल. त्यामुळे हे ओझं सगळ्यांनी वाटून घेतलं तर हलकं होईल. हे करण्यासाठी आम्हाला एक मार्ग सुचलेला आहे. तो असा.

Taxonomy upgrade extras: 

मुंबईतील काही रस्त्यांची आणि जागांची नावे - भाग १

सॅम्युएल टी. शेपर्ड नावाच्या इंग्रज लेखकाने लिहिलेले 'Bombay Place Names and Street Names’ अशा नावाचे आणि आणि १९१७ मध्ये छापलेले एक पुस्तक माझ्यासमोर आले. मुंबईच्या रस्त्यांची आणि जागांची २०व्या शतकाच्या दुसर्‍या दशकात काय नावे होती आणि त्या नावांमागे काय इतिहास दडलेला आहे अशी बरीच मनोरंजक माहिती त्यामध्ये आहे. बहुतेक माहिती दक्षिण मुंबई आणि जवळचे भायखळ्यासारखे भाग येथील रस्त्यांबाबत आहे कारण पुस्तकाच्या इंग्रज लेखकाचे राहणे-फिरणे ह्याच भागात होत असणार. ह्या माहितीपैकी बारीकसारीक गल्ल्याबोळ सोडून सर्वसामान्यत: कोणाहि वाचकास परिचित वाटतील अशा माहितीचे संकलन करून एक लेखमालिका लिहिण्याचा विचार आहे आणि त्यातील पुढील लेख पहिला असून इंग्रजी आद्याक्षरे अ आणि ब इतकी त्याची व्याप्ति आहे. लेखाची तयारी करतांना संदर्भासंदर्भाने अन्य पुस्तके, विशेषत: डॉ.जे.गर्सन दा कुन्हा ह्यांचे Origin of Bombay, एस.एम.एडवर्ड ह्यांचे The Rise of Bombay ही दोन पुस्तक आणि जालावरील समोर आलेली माहिती ह्यांचाहि उपयोग येथे करण्यात आला आहे.

शेपर्ड ह्यांनी आपल्या पुस्तकामध्ये अनेक ठिकाणी रावबहादुर पी.बी.जोशी आणि आणि आर.पी.करकारिया अशा दोन माहितगार हिंदुस्तानी व्यक्तींच्या माहितीचा हवाला दिला आहे. ह्यांपैकी रावबहादुर पी.बी.जोशी ह्यांच्याविषयक त्रोटक उल्लेखांशिवाय काहीच माहिती गूगलशोधात मिळाली नाही परंतु सिद्धेश्वरशास्त्री चित्राव ह्यांनी संकलित केलेल्या अर्वाचीन चरित्रकोशाच्या खंड २, पान २९९ येथे ह्यांच्याबाबत थोडीफार माहिती मिळते. पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी (१८५६-१९३०) हे मुंबईमधील एक अभ्यासू इतिहाससंशोधक गृहस्थ आणि मराठी लेखक होते. बर्‍याच अन्य संशोधकांनी त्यांच्याकडून मिळालेल्या साहाय्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केल्याचे आढळते. ह्यांना एशिऍटिक सोसायटीने ’कॅंबेल मेडल’ देऊन गौरविले होते. ह्यांची स्वत:ची राहण्याची जागा ’बनाम हॉल लेन’ मध्ये होती असा उल्लेख शेपर्ड ह्यांनी त्या लेनच्या संदर्भात केलेला आहे हे पुढे ’बनाम हॉल लेन’शी संबंधित भागामध्ये येईलच. रुस्तुमजी पेस्तनजी करकारिया हे असेच एक पारशी माहितगार गृहस्थ. ह्यांचीहि विशेष माहिती मिळत नाही पण ह्यांनी लिहिल्या बर्‍याच पुस्तकांचे त्रोटक उल्लेख गूगलशोधात दिसतात. स्वत: शेपर्ड ह्यांनी लिहिलेल्या 'The Byculla Club 1833-1916' आणि 'Bombay' अशा नावांच्या अन्य दोन पुस्तकांचा उल्लेख गूगलशोधामध्ये दिसला.

पुस्तकातील माहिती येथे संकलित करतांना मी दोन चाळण्या लावलेल्या आहेत. ब्रिटिश सत्तेखालील मुंबईतील हॉर्नबी, मेडोज, फ्रेअर अशी रस्त्यांची नावे स्वातन्त्र्योत्तर काळात बहुतेक बदलली गेली आहेत आणि त्या जुन्या नावांचा उल्लेख आताच्या वाचकाला बुचकळ्यात टाकतो. रस्त्यांना नावे देणारे हे पूर्वकालीन प्रतिष्ठित कोण होते ह्याची माहितीहि शोधू पाहणार्‍यास सहज जालावर सापडते. ह्या कारणांसाठी अशा रस्यांची नावे येथे वगळली आहेत. जुन्या किल्ल्याच्या उत्तर भागातील भुलेश्वर-भायखळा-परळ अशा भागातील लहानसहान रस्ते त्या परिसराशी परिचय असणार्‍यांनाच माहीत असतात, इतरांना त्या त्या नावांवरून काहीच बोध होत नाही. अशी नावेहि येथे वगळण्यात आली आहेत. आजहि वापरात असलेल्या आणि मुंबईची सर्वसामान्य ओळख असणार्‍या व्यक्तीस माहीत असू शकतील अशाच स्थानांच्या वा रस्त्यांच्या नावांना ह्या संकलनात जागा दिली आहे. मुंबईचे माहितगार वाचक ह्यामध्ये अजून भर घालू शकतील.

१) अल्टामॉंट वा अल्टामाउंट रोड आणि ऍन्स्टी रोड- खंबाला हिलवरील उच्चभ्रू वस्तीच्या अल्टामॉंट वा अल्टामाउंट रोड ह्या रस्त्याचे नाव त्यावर एकेकाळी असलेल्या ’अल्टामॉंट’ नावाच्या बंगल्यावरून पडलेले आहे. हा बंगला कोणी बांधला, तेथे कोण राहत असे, बंगल्याचे पुढे काय झाले अशी काही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही पण १८६५ पर्यंत तो जागेवर होता. जेम्स डग्लसलिखित Glimpses of Old Bombay ह्या पुस्तकात पान ४७ वर हा बंगला १८६५ साली रु.१००० भाडयाने दिला गेल्याचा उल्लेख आहे.

मुंबईतील जुने प्रख्यात वकील टी.ई.ऍन्स्टी (१८१६-७३) ह्यांचे नाव ऍन्स्टी रोड ह्या रस्त्यास मिळाले आहे.

२) अलेक्झॅंड्रा, लॅबर्नम आणि सिरस (Cirrus) मार्ग - ह्या तिनांपैकी लॅबर्नम रोड प्रसिद्ध आहे आणि शेजारच्या चित्रात दिसत आहे. त्याच्याच जोडीला अलेक्झॅंड्रा आणि सिरस अशा नावाचे त्याला समान्तर असे दोन रस्ते होते. हे तिन्ही रस्ते बॉंबे इंप्रूवमेंट ट्रस्टने ह्या भागाची नव्याने आखणी करतांना निर्माण केले आणि त्यांना तीन फुलझाडांची नावे दिली. पैकी अलेक्झॅंड्रा आणि सिरस ही नावे कोठल्या फुलझाडांसाठी आहेत हे लवकरच विसरले गेले कारण ही फुलझाडे इतकी प्रसिद्धहि नव्हती. स्वातन्त्र्यानंतरच्या नावे बदलण्याच्या लाटेत ह्या दोन रस्त्यांना वाच्छागांधी आणि काशीबाई नवरंगे ह्यांची नावे मिळाली. (काशीबाई पं. रमाबाईंसारख्याच ख्रिश्चन शैक्षणिक चळवळीत होत्या आणि तो भाग ह्या कार्यासाठी आजहि प्रसिद्ध आहे.) तिसर्‍याचेहि नाव बदलले जायचे पण लॅबर्नम म्हणजे अमलतास अथवा बहावा. हे नाव कोठल्या साहेबाचे नाव नसून एका फुलाचे आहे हे वेळीच लक्षात आल्यामुळे तेवढे मात्र वाचले!

३) अपोलो गेट/बंदर - मुंबईच्या किल्ल्याच्या दक्षिणेस असलेल्या गेट आणि बंदराला हे नाव का पडले असावे ह्याबाबत अनेक तर्कवितर्क आहेत. Bombay City Gazetteer Vol I मधल्या अंदाजानुसार जुन्या काळात ’पाल-पालव’ नावाच्या देशी नौका तेथे नांगरलेल्या असत त्यावरून हे नाव पडले असावे. गर्सन दा कुन्हा ह्यांनाहि हाच अर्थ जाणवतो.

४) ऍंटॉप हिल - ह्या नावाच्या उगमाबद्दल मतमतान्तरे आहेत. रा.ब. जोशींच्या मते ’अंतोबा’ हे नाव मुंबईच्या जुन्या रहिवाशांमध्ये लोकप्रिय होते आणि ह्या टेकडीचा भाग कोणा अंतोबाच्या मालकीचा असावा. नंतर पोर्तुगीज काळात हे सूत्र विस्मरणात जाऊन नावाचा कालान्तराने ’ऍंटॉप हिल’ असा अपभ्रंश झाला.

५) ऍश लेन, ओक लेन आणि टॅमरिंड लेन - तीन झाडांची नावे ह्या तीन छोटया रस्त्यांना मिळाली आहेत. त्यांपैकी ओक लेन नक्की कोठे होती हे आता गूगलला समजत नाही, जरी त्या भागाच्या पोस्टमनांना ते माहीत असावे कारण अनेक जागांच्या पत्त्यांमध्ये अजूनहि तिचा उल्लेख गूगलशोधामध्ये दिसतो. बाकीचे दोन रस्ते शेजारच्या चित्रात दिसत आहेत.

त्यांपैकी ऍश लेन ह्या नावाचे कोडेच आहे कारण त्या भागात कधीकाळी एखादे ऍशचे झाड असल्याचा उल्लेख नाही. तसेच ऍश हे झाड मुंबईच्या दमट हवेत वाढू शकेल काय ह्याचीहि खात्री नाही. टॅमरिंड लेन ह्या नावाला मात्र निश्चित कूळकथा आहे.लेनच्या थोडया उत्तरेला असलेल्या सेंट थॉमस कॅथीड्रल आणि बॉंबे ग्रीन ह्यांच्या मध्यावर एक चिंचेचे झाड होते. तेथे आधी चिंचेची बरीच झाडे होती पण अखेर एकच उरले होते आणि त्याच्या सावलीत सार्वजनिक लिलाव चालत असत. भाडयाने गाडया चालवणार्‍यांच्या शब्दात त्या जागेला ’आमली आगळ - चिंचेसमोरची जागा’ असे नाव होते. (’आमली आगळ’चा ह्याच अर्थाने उल्लेख गर्सन दा कुन्हा ह्यांच्या Origin of Bombay ह्या पुस्तकाच्या पान ५९ वरहि मिळतो.) हे शेवटचे झाड नोवेंबर १८४६ मध्ये तोडले गेले. त्याची आठवण आता केवळ रस्त्याच्या नावात उरली आहे.

६) बॅरक रोड/स्ट्रीट २९ आणि मरीन लाइन्स ९८. शेपर्ड ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार बॅरक स्ट्रीट नावाचा रस्ता बझार गेट स्ट्रीटपासून मिंट रोडच्या मध्ये होता. ईस्ट इंडिया कंपनीकडे स्वत:चे नेटिवांतून भरती केलेले सैनिक होतेच पण ब्रिटनमधील राजाचे गोरे सैनिकहि त्यांचा खर्च देऊन कंपनी आपल्याकडे ठेवत असे. अशा सैनिकांच्या राहण्याच्या जागेला ’King's Barracks' असे म्हणत असत आणि ही जागा किल्ल्याच्या भिंतीभाहेर एस्प्लनेड मैदानाच्या उत्तर अंगाला होती. त्यांचे नाव ह्या रस्त्यास मिळाले आहे. सध्याच्या गूगलमधील नकाशात एक बॅरक रोड दिसत आहे पण तो बझार गेट स्ट्रीटच्या जवळपास कोठेच नाही. अशी शक्यता वाटते की कंपनीच्या स्वत:च्या चाकरीत असलेल्या नेटिव सैनिकांच्या बॅरक्स येथे असू शकतील.

१८३० सालापर्यंत कंपनीची ’बॉंबे मरीन्स’ नावाची लढाऊ नौसेना होती आणि नंतर तिचेच वेळोवेळी इंडियन नेवी, रॉयल इंडियन नेवी असे नाव बदलत गेले. ह्या नौसैनिकांच्या बॅरक्सवरून त्या भागाला मरीन लाइन्स हे नाव पडले आहे.

७) बॅंक स्ट्रीट - हॉर्निमन सर्कल (जुने एल्फिन्स्टन सर्कल) येथून दक्षिणेकडे निघणारा रस्ता. १८६५ च्या कापूस घोटाळ्यात जुनी बॅंक ऑफ बॉंबे बुडाली. पुनर्रचित बॅंक ऑफ बॉंबे आपल्या नव्या इमारतीत १८६६ साली गेली. ती इमारत ह्या रस्त्यावर होती आणि रस्त्याला ’बॅंक स्ट्रीट’ हे नाव मिळाले. १९२१ साली नव्या इंपीरियल बॅंकेत ही बॅंक १९२१ मध्ये विलीन झाली. इंपीरियल बॅंकेचा पुढचा अवतार म्हणजे सध्याची स्टेट बॅंक ऑफ इंडिया होय.

८) बाबुला टॅंक, बाबुला टॅंक रोड आणि डोंगरी जेल - बाबुला टॅंक नावाची जागा अजूनहि खाली दाखविलेल्या गूगल मॅपच्या तुकडयामध्ये भुलेश्वर-उमरखाडी भागात दिसत आहे पण तेथे सध्या कोठलाच तलाव नाही. शेजारच्या १८८२ सालच्या सर्वे नकाशात मात्र तलाव दिसत आहे आणि तलावाजवळ एक जेल आणि जेल रोडहि दिसत आहे. त्यापैकी जेल आता तेथे नाही कारण त्याच्या जागी ’आशा सदन’ ही स्त्रियांसाठीचे आसराघर दिसत आहे. कोल्हापूरचे कारभारी माधवराव बर्वे ह्यांनी गुदरलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात निकाल विरुद्ध जाऊन मराठा आणि केसरीचे मुखत्यार अनुक्रमे आगरकर आणि टिळक ह्यांना १८८२ साली जेथे १०१ दिवस तुरुंगवासात काढावे लागले तेच हे डोंगरी जेल. टिळकांची १९०८ साली मंडालेला पाठवणी झाली तेव्हाहि तेव्हाहि त्यांना पुण्याहून आणून येथेच ठेवले होते. हा भाग थोडा उंचवटयाचा असल्याकारणाने त्यास डोंगरी म्हणत असत.

बाबुला टॅंक हा तलाव कोणा उदार व्यक्तीने १८४९ साली मुंबईकर रहिवाशांना पाणी पु्रवण्यासाठी खोदला आणि १९०७ पर्यंत तो तेथे होता. १९०७ साली तो बुजवण्यात आला आणि आता त्याचे नावच काय ते उरले आहे. त्या भागात एकेकाळी असलेल्या बाभळीच्या झाडांवरून त्या तलावास हे नाव पडले असे दिसते. १८८२ च्या नकाशात बाबुला टॅंक रोडहि दिसत आहे त्याचे आता रामचंद्र भट मार्ग असे नामकरण झाले आहे असे दिसते.

९) बाबुलनाथ मंदिर आणि बाबुलनाथ मार्ग - बाबुलनाथ मंदिराला ते नाव का पडले ह्याबद्दल आर.पी. करकारिया ह्यांचे मत असे की बाबुल नावाच्या एका सुताराने येथे शिवलिंगाची स्थापना केली आणि त्यावरून देवळाचे नाव बाबुलनाथ असे पडले. मंदिराच्या पुजार्‍यांचा ह्याला पाठिंबा आहे. उलटपक्षी रा.ब. जोशी म्हणतात की बाबलजी हिरानाथ नामक सोमवंशी क्षत्रिय ज्ञातीतील गृहस्थाने हे देऊळ निर्माण केले आणि त्याच्या नावावरून देवळास बाबुलनाथ म्हणतात. मूळचे देऊळ १७८० चे असून सध्याचे देऊळ तेथेचे १९०० साली बांधण्यात आले आहे. देवळावरून जाणारा बाबुलनाथ रस्ता इंप्रूवमेंट ट्रस्टने १९०१ साली बांधून कॉर्पोरेशनच्या ताब्यात दिला.

१०) बापू खोटे स्ट्रीट आणि किका स्ट्रीट - बापू खोटे हे नाव हिंदु माणसाचे वाटते पण ह्या रस्त्याचे बापू खोटे हे त्या भागातील बर्‍याच मालमत्तांचे मालक असलेल्या एका कोंकणी मुसलमान व्यक्तीवरून पडले आहे. ते प्रसिद्ध हकीमहि होते अशी समजूत आहे. जगजीवन किका ह्यांच्याबद्दल नावापलीकडे काही अन्य माहिती उपलब्ध नाही.

११) बलराम रोड आणि बॅप्टी रोड - बलराम रोडचे नाव रा.ब. येल्लप्पा बलराम (१८५०-१९१४) ह्या तेलुगु व्यक्तीवरून वरून पडले आहे. त्यांचे राहते घर ह्या रस्त्यावर होते. मुंबई-पुणे-कराची येथील इंग्रज सैन्याला घाऊक प्रमाणावर दूध पुरवण्याच्या व्यवसायातून ह्यांचे आजोबा आणि वडील मुंबई-पुण्याकडे आले. येल्लप्पा ह्यांनी दुधाचा व्यवसाय बंद करून बांधकाम कंत्राटे घेण्यास सुरुवात केली. १८५६-६० ह्या काळात विहार तलाव बांधल्यानंतर मुंबईला पाणी पुरविण्यासाठी शहरातील उंच ठिकाणांवर साठवणीचे तलाव बांधून तेथपर्यंत विहारचे पाणी पंपाने पोहोचविण्याची सोय करण्यात आली. त्यांपैकी एक तलाव माझगाव भागातील भंडारवाडा टेकडीवर निर्माण करण्यात आला. त्याचे बांधकाम हे येल्लप्पा बलराम ह्यांचे विशेष काम मानले जाते. (ह्या तलावाच्या जागी आता जोसेफ बॅप्टिस्टा उद्यान उभे आहे.)

बॅप्टी रोडचे नाव जेम्स बॅप्टी ह्यांच्यावरून पडले आहे. ह्या भागात त्यांची पिठाची गिरणी आणि केकसाठी प्रसिद्ध असलेली बेकरी होती.

१२) बनाम हॉल लेन - रा.ब.जोशींचे राहते घर ह्या गल्लीतच होते. तिच्या नावाबाबत त्यांनी पुरविलेली मनोरंजक माहिती अशी. ह्या जागी प्रथम असलेल्या नारळांच्या वाडीमध्ये एक घर होते आणि त्याला ’वन महाल’ अथवा ’बन महाल’ असे ओळखत असत आणि त्या घरावरून गल्लीला बन महाल लेन असे ओळखत असत. मुंबईचे कमिशनर ऍकवर्थ (१८९०-९५) हे रजेवर इंग्लंडला गेले होते आणि ते माल्वर्न गावात आपल्या ’बेनहम हॉल’ नावाच्या घरात राहात होते. तेव्हा त्यांच्याकडे मुंबईहून काही पत्रे आली ज्यावर ह्यावर ह्या गल्लीचा पत्ता होता. गल्लीच्या आणि त्यांच्या घराच्या नावातील साम्यामुळे त्यांना असे वाटले की ह्या गल्लीचे नाव बेनहम हॉलवरून ठेवावे. त्यांची सूचना अर्थातच (!) मंजूर होऊन गल्ली ’बेनहम हॉल लेन’ झाली आणि त्याच नावाचे रूपान्तर देशी लोकांच्या बोलण्यात ’बनाम हॉल लेन’ असे झाले.

गूगल मॅप्सला ही गल्ली दिसत नाही पण बर्‍याच जागांच्या पत्त्यांमध्ये हिचा उल्लेख सापडतो म्हणजे पोस्टमनांना ती निश्चित माहिती आहे. गिरगावातील डी.डी. साठे मार्गाच्या आसपास ती असावी असे वाटते.

१३) बझार गेट स्ट्रीट, गनबो स्ट्रीट, अग्यारी लेन, बोरा बझार स्ट्रीट - १८६२ साली किल्ल्याची भिंत पाडण्याच्या वेळी जमीनदोस्त झालेल्या दरवाज्याच्या नावावरून बझार गेट स्ट्रीट हे नाव पडले आहे. किल्ल्याच्या उत्तर सीमेपलीकडे नेटिवांची वस्ती, म्हणजेच ’बझार’ (Black Town) आणि भिंतीमध्ये बझार गेट नावाचे दार - खरे तर तीन दारे, एक मोठे व दोन लहान, नेटिव त्याला ’तीन दरवाजा’ म्हणत असत - होते.

गनबो स्ट्रीटबाबत दोन गोष्टी उपलब्ध आहेत. एकीनुसार जगन्नाथ शंकरशेट ह्यांचे एक पूर्वज गणबा ह्यांच्या मालकीची जमीन ह्या भागात होती आणि त्याचे नाव ह्या रस्त्यास मिळाले आहे. दुसरीनुसार गनबावा नावाच्या मुस्लिम फकिराच्या नावाची विहीर ह्या परिसरात होती. गनबावाच्या नावावरून रस्त्याला हे नाव मिळाले आहे. गनबावाची विहीर नंतर केव्हातरी बुजविण्यात आली पण आपण ती पाहिली असल्याचे दिनशा वाच्छा ह्यांनी आपल्या मुंबईच्या आठवणींमध्ये नोंदवले आहे.

अग्यारी लेन हे नाव माणकजी नौरोजी सेठ ह्यांनी १७३३ साली तेथे बांधलेल्या अग्यारीवरून आलेले आहे. मुंबईच्या पूर्व किनार्‍याकडील ’नौरोजी हिल’ ह्या नावाने ओळखली जाणारी आणि ’डोंगरी’ अशा मूळच्या नावाची उंचवटयाची जागा ह्यांच्याच मालकीची होती. अग्यारीची पुनर्बांधणी १८९१ मध्ये करण्यात आली.

बोरा बझार स्ट्रीट हे नाव मुळात बोहरा बझार स्ट्रीट असे आहे आणि त्या भागात मोठया प्रमाणात राहणार्‍या बोहरा जमातीवरून ते नाव पडलेले आहे.

१४) बोरी बंदर - जी.आय.पी रेल्वे रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हा ह्या भागातील समुद्रातील खडक आणि वाळूचे उथळ भाग काढून टाकून रेल्वेच्या कामासाठी इंग्लंडहून येणारे जड लोखंडी सामान उतरवून घेण्यासाठी एक बंदर १८५२ साली तयार करण्यात आले आणि ह्या जागी मूळच्या असलेल्या रानवट बोरीच्या जंगलावरून त्याला बोरीबंदर असे नाव पडले. नंतर ह्याच जागी रेल्वे गाडया सुटण्याचे जे स्टेशन तयार झाला त्यालाहि तेच नाव चालू राहिले. नंतर येथेच एक नवी भव्य इमारत उभारून १८८७ साली ती वापरात आणण्यात आली आणि विक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाच्या ५०व्या वर्षाच्या प्रसंगाने तिला विक्टोरिया टर्मिनस - VT - हे प्रसिद्ध नाव मिळाले. तत्पूर्वी वापरात असलेल्या मूळच्या बोरीबंदर स्टेशनाचे चित्र येथे दर्शवीत आहे.

१५) बॉंबे - मुंबई - ह्या शब्दाच्या उगमाबाबत आता फारसा वाद उरलेला नाही असे वाटते. मुंबईचे मूळचे रहिवासी कोळी ह्यांची देवी मुंबा अथवा मुंबाई हिच्या नावावरून १६व्या शतकापासून उपलब्ध युरोपीय भाषांमधील उल्लेखांमध्ये ह्या गावाचे नाव Bombaim अथवा त्याचीच रूपान्तरे Mombayn (1525), Bombay (1538), Bombain (1552), Bombaym (1552), Monbaym (1554), Mombaim (1563), Mombaym (1644), Bambaye (1666), Bombaiim (1666), Bombeye (1676), Boon Bay (1690) असे उल्लेखिलेले सापडते. (संदर्भ विकिपीडिया http://en.wikipedia.org/wiki/Mumbai)

ह्या Bombaim शब्दाच्या उगमाबाबत दोन परस्परविरोधी मते आढळतात. पहिले मत म्हणजे हा शब्द ’मुंबाई’ ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. दुसरे मत म्हणजे ब्रिटिशांपूर्वी ह्या बेटांवर अधिकार असलेले पोर्तुगीज ह्या जागेस Bom Bahia (Bombahia) (Good Bay) असे म्हणत असत आणि त्याचे अपभ्रष्ट रूप म्हणजे ’मुंबई’. १९व्या शतकातील एक अधिकारी अभ्यासक डॉ. जे. गर्सन दा कुन्हा ह्यांनी ह्या दोन मतांची विस्तृत चर्चा आपल्या Words and Places in and about Bombay (Indian Antiquary, Vol III, 1874, p. 248) ह्या लेखामध्ये केली आहे आणि शब्दाचा उगम ’मुंबाई’कडे लावला आहे. Bombahia विरुद्ध त्यांचा प्रमुख आक्षेप असा आहे की Bom हे विशेषण पुल्लिंगी असून Bahia हे नाम स्त्रीलिंगी आहे आणि त्यामुळे Bombahia हे व्याकरणात बसणारे रूप नाही. ते Boabahia असे असावयास हवे होते पण तसा उपयोग कोठेच आढळत नाही.

मुंबादेवी मंदिर चित्र.

१६) ब्रीच कॅंडी, हॉर्नबी वेलार्ड आणि लव ग्रोव - १७७१ ते १७८४ ह्या काळात मुंबईचे गवर्नर असलेल्या विल्यम हॉर्नबी ह्यांनी लव ग्रोव ते महालक्ष्मी ह्या भागातून आत घुसणारे समुद्राचे पाणी थांबविण्यासाठी बांधलेल्या बांधास हॉर्नबी वेलार्ड असे नाव होते. बांध अशा अर्थाच्या vallado ह्या पोर्तुगीज शब्दाचे हे इंग्रजी रूप आहे. सध्या ह्याचे नाव लाला लजपतराय मार्ग असे आहे. हा बांध घालण्याच्या पूर्वी भरतीचे पाणी आत शिरून पूर्वेकडील उमरखाडीपर्यंत खारी दलदल निर्माण करीत असे. तिच्या जागी पक्की जमीन करण्याच्या विचाराने हॉर्नबी ह्यांना हा बांध घालावयाचा होता पण लंडनमधील कंपनीचे डिरेक्टर बोर्ड त्या खर्चाला तयार नव्हते. आपल्या मुदतीच्या अखेरच्या दिवसात हॉर्नबी ह्यांनी हे काम सुरू केले आणि बोर्डाकडून त्याला मिळालेली नामंजुरी मुंबईत पोहोचण्यापूर्वीच ते पूर्णहि केले.

ह्याच्या उत्तरेला असलेला लव ग्रोव भाग तेव्हा मुंबईपासून दूर आणि एकान्ताचा असल्याने प्रेमी जोडप्यांना तेथे जाऊन निवान्तपणे प्रेमालाप करता येत असत ह्यावरून त्या भागास लव ग्रोव हे नाव पडले. नंतर सांडपाण्याच्या शुद्धीकरणासाठी तीच जागा योग्य म्हणून निवडली गेल्याने तिच्या जुन्या रोमॅंटिक संदर्भाला काही अर्थ उरलेला नाही.

ब्रीच कॅंडी ह्या नावाच्या उगमाविषयी निश्चित असे काही सांगता येत नाही पण महालक्ष्मीच्या देवळाबाहेरील समुद्र खडकाळ असल्याने त्या भागात समुद्रकिनारा तुटल्यासारखा होता म्हणून त्यास ’ब्रीच’ म्हणू लागले अशी उपपत्ति बहुतेक ठिकाणी दिलेली आढळते. ’कॅंडी’चा संबंध ’खिंड’ ह्या मराठी शब्दाशी जोडला जातो.

१७) भायखळा - ह्या नावाचे दोन अर्थ सुचविण्यात आले आहेत. अन्य लेखकांच्या आधारे गर्सन दा कुन्हा ह्या नावाचा उगम बहावा - बावा (कुणबी भाषेत) - भाया (कोळी अपभ्रंश) आणि खळे (जागा) असा दाखवतात. बहावा म्हणजे अमलतास, Cassia fistula. येथे असलेल्या बहाव्याच्या झाडांवरून भायखळे हे नाव पडले असावे. रा.ब.जोशी हा अर्थ अमान्य करीत नाहीत पण ’भाया नावाच्या व्यक्तीच्या मालकीची जागा’ असा अन्य अर्थ सुचवितात. ह्या झाडाचे चित्र खाली दर्शवीत आहेत.

मुंबईची वाढ होऊ लागल्यानंतर तेथील प्रतिष्ठित उच्चपदस्थांची घरे भायखळ्यात उभी राहू लागली. भायखळ्याला एक प्रशस्त स्टेशनहि बांधण्यात आले खाली चित्र येथे दाखविले आहे. Byculla Club हा इंग्रजांसाठी राखीव क्लब १९१६ साली बंद पडेपर्यंत येथेच होता.

१८) भेंडी बझार - ह्या भागात एकेकाळी मोठया संख्येने असलेल्या भेंडीच्या झाडांवरून ह्या भागाला भेंडी बझार हे नाव निर्माण झाले आहे. भेंडीच्या झाडाचे वनस्पतिशास्त्रीय नाव Thespesia populnea असे आहे. ते समुद्र जवळ असलेल्या जागी चांगले वाढते आणि एक शोभेचे झाड मानले जाते. त्याला मोठी पिवळी फुले येतात. Indian Tulip, Portia, पारस पिंपळ ही त्याची अन्य काही नावे. (खायची भेंडी ही नव्हे.) पुढे भेंडी बझार रस्त्याचे एक जुने चित्र आणि भेंडीच्या झाडाचे एक चित्र अशी दोन चित्रे दर्शविली आहेत.

(चित्रश्रेय - येथील रंगीत चित्रे विकिपीडियावरून घेण्यात आली आहेत आणि नकाशे गूगल मॅप्सवरून. उर्वरित चित्रे प्रताधिकारमुक्त जुन्या पुस्तकांमधून मिळवलेली आहेत.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 

विकीपंडीत किंवा गूगलपंडीत ?

सध्याच्या इंटरनेटप्रणित युगात, इंटरनेट हे माहितीचे मायाजाल न राहता माहितीचा अफाट स्रोत झाले आहे. त्याचा वापर करून कोणीही कुठल्याही विषयाची माहिती मिळवून, त्या माहितीचा यथायोग्य वापर करून, त्या माहितीचा मानवजातीसाठी योग्य उपयोग करू शकतो. जसे विज्ञान हे शाप किंवा वरदान होऊ शकते त्याचप्रमाणे इंटरनेटवरच्या अफाट माहितीचा हा सागर त्याचा वापर कसा करू त्याप्रमाणे उपयोगी किंवा दुरुपयोगी ठरू शकतो. ते प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अबलंबून आहे. कोणाला अर्धा भरलेला ग्लास 'अर्धा रिकामा' असा दिसू शकतो किंवा 'अर्धा भरलेला' दिसू शकतो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

एस्पेरांतोः सोपी, साधी परंतु अस्तंगत होत असलेली जागतिक भाषा

आपल्यातील बहुतेक एस्पेरांतो हे नाव प्रथमच ऐकत असतील. कदाचित ही भाषा ओळखणारे वा बोलणारे आपल्यापैकी कुणीही नसतील. परंतु एस्पेरांतो ही एक जागतिक भाषा आहे व त्याचा जन्म 130 वर्षापूर्वी झाला.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

वांग मराठवाडी... आता परीक्षा सरकारची!

साधारण वर्षभरापूर्वी वांग मराठवाडी धरणग्रस्तांच्या संघर्षाबद्दल लिहिले होते. त्या नंतर बरंच काही घडून गेलं आहे. आणि अजूनही काही ना काही घडत आहे. गेल्या वर्षभरात बर्‍याच मित्रमैत्रिणींनी, हितचिंतकांनी नेहमीच या बाबतीत चौकशी केली, 'आता काय परिस्थिती आहे?' अशी विचारणा केली. म्हणून, हा स्टेटस अपडेट...

मूळ लेखन, 'आंदोलन शाश्वत विकासासाठी' या मासिकाच्या जुलै'२०१३ च्या अंकात प्रसिद्ध झाले असून, ते सुनिती सु. र. यांनी लिहिले आहे. त्यांच्या पूर्वपरवानगीने व त्यात काही भर घालून, ते येथे देत आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

पाने

Subscribe to RSS - समाज