Skip to main content

ही बातमी समजली का? - ११

भाग | | | | | | | | | १०

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.

तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

---

बातमी: 'हिनीयस' गुन्ह्यांपुरते सज्ञानतेचे वय १६ करण्यास कॅबिनेट तयार
याचे काय परिणाम होतील, हे सांगणे कठीण आहे.
अजून "हिनीयस"ची डेफिनेशन माहित नाही. पण तरीही त्यापुरते का होईना बालगुन्हेगारांना इतर सज्ञान गुन्हेगांइतकीच शिक्षा देणे किती योग्य आहे यावर तुमचे मत काय?

सन्जोप राव Mon, 02/12/2013 - 12:19

असे एक खळबळजमक विधान नीरजा यांनी केले आहे.
यावरुन आठवले: किल्लारीच्या भूकंपानंतर केलेल्या एका सर्वेक्षणात आढळले की ज्या पुरुषांच्या बायका या भूकंपात मृत्यूमुखी पडल्या होत्या, त्यातल्या बहुतांश पुरुषांनी नंतर एकदोन वर्षांतच दुसरे लग्न केले. पण ज्या बायकांचे नवरे या भूकंपात मरण पावले होते, त्यातल्या बायकांचा स्वतःच दुसरे लग्न करण्याला विरोध होता. बायकांच्या पुनर्विवाहात असणार्‍या अडचणी वगैरे बाबी सोडून द्या, पण या बायकांना पुन्हा कोणत्याही पुरुषाबरोबर आयुष्य घालवणे नको होते.
नीरजा यांचे विधान सरसकट 'स्वीपिंग स्टेटमेंट' असले तरी त्यात अगदीच तथ्य नाही असे नाही. दारु, मारहाण, छळ हे सर्वश्रुत मुद्दे आहेत. बायकोवर (बहुदा मुलगा व्हावा या हट्टाखातर) तिच्या शारिरीक अवस्थेचा, मनाचा विचार न करता गर्भारपण लादणे हा अत्यंत घृणास्पद प्रकार मी स्वतः अनेक ठिकाणी पाहिला आहे. त्यातून जन्माला येणार्‍या मुलींच्या वाटेलाही तसलेच आयुष्य आलेलेही पाहिले आहे. अशा बायकांना 'नवरा मेला तर बरे' असे वाटले तर त्यात नवल नाही.

ॲमी Mon, 02/12/2013 - 14:39

In reply to by सन्जोप राव

कोण नीरजा? बातमीची लिँक कुठे मिळेल?
अशा बायकांना 'नवरा मेला तर बरे' असे वाटले तर त्यात नवल नाही. >> खरंय.

अजो१२३ Thu, 05/12/2013 - 17:47

In reply to by सन्जोप राव

हे धांदात असत्य आहे. किल्लारीच्या शेजारीच (५-१० किमी) माझे वडील ग्रामसेवक होते व तिथे मी अनेकदा गेलो आहे.
भूकंपापूर्वी असे काही नव्हते.

मन Mon, 02/12/2013 - 12:32

बातमी: 'हिनीयस' गुन्ह्यांपुरते सज्ञानतेचे वय १६ करण्यास कॅबिनेट तयार
याचे काय परिणाम होतील, हे सांगणे कठीण आहे.
अजून "हिनीयस"ची डेफिनेशन माहित नाही. पण तरीही त्यापुरते का होईना बालगुन्हेगारांना इतर सज्ञान गुन्हेगांइतकीच शिक्षा देणे किती योग्य आहे यावर तुमचे मत काय?

आता मत विचारलेच आहे तर सांगतो.
(तुला कायद्यातलं काय क्ळतं, कायदे बनवणारे कुणी यडे आहेत का, आहे त्या काद्यामागं काहीतरी लॉजिकच असेल ना,
आलाय मोठा शहाणा दुरुस्त्या सुचवायला वगैरे वगैरे आक्षेप येतील हे अपेक्षित आहे.)
if you are matured enough to perform rape, you are matured enough to get punished.
if you are matured enough to perform cruel rape, you are.....
.
.
बाकी कायदा, कायदानिर्मिती, संविदानातील तरतुदी, मानवीहक्क, कायद्याची अंमलबजावणी वगैरे वगैरे अडचणी कीम्वा सोयी किम्वा नियम नित्याच्याच.

ॲमी Mon, 02/12/2013 - 13:18

In reply to by मन

+१ गेल्या वर्षाभरात शाळकरी मुलांनी ५- वयाच्यांवर बलात्कार, सोडोमी वगैरे केल्याच्या बातम्या वाचल्यात. अगदी फाशी द्या नाही म्हणणार कोण पण आयसोलेट नक्की करा.

ऋषिकेश Mon, 02/12/2013 - 13:26

In reply to by मन

if you are matured enough to perform rape, you are matured enough to get punished.

रेप करण्यासाठी मॅच्युअर्ड का व्हावे लागते? किंबहुना तेवढी मॅच्युरिटि नसल्यानेच रेप होतो/करायची इच्छा होते नाही का?
तुम्हाला बहुदा "अ‍ॅडल्ट्" इनफ किंवा ओल्ड इनफ म्हणायचे असावे असे वाटते.

बाकी, बालगुन्हेगार कोणताही गुन्हा करताना त्या गुन्ह्याचा परिणाम, त्याचे गांभिर्य, कायदेशीर तरतुदी वगैरेंच्या बाबतीत अनभिज्ञ असतात (अर्थातच सज्ञान नसतात) असे गृहितक असावे असा माझा अंदाज/समज आहे. मग फक्त हिनीयस क्राईम्सच्या बाबतीत हे गृहितक बाजुला ठेवण्यामागचा तर्क समजत नाही.

अर्थात ही केवळ तरतूद आहे, प्रत्येक केसमध्ये त्याला अ‍ॅडल्ट समजलेच जाईल असे नव्हे वगैरे मान्य आहेच.

मी Mon, 02/12/2013 - 12:58

अजून "हिनीयस"ची डेफिनेशन माहित नाही. पण तरीही त्यापुरते का होईना बालगुन्हेगारांना इतर सज्ञान गुन्हेगांइतकीच शिक्षा देणे किती योग्य आहे यावर तुमचे मत काय?

बातमीतला खालिल मुद्दा महत्त्वाचा -

A Cabinet note to give effect to the proposal has been finalized. The women and child development (WCD) ministry's proposal is likely to leave the decision on whether the crime should be treated under IPC provisions to the Juvenile Justice Board which will be expected to evaluate evidence, heinousness of the crime and other parameters like previous behaviour and socio-economic and psychological condition of the accused.

त्यानुसार हिनीयस साठी शिक्षा झाल्यास योग्यच.

............सा… Mon, 02/12/2013 - 13:33

पौगंडावस्थेत "रीझनींग स्किल्स" करणार्‍या मेंदूच्या भागाची वाढ पूर्ण झालेली नसते. जी टीनएज मुलं रेप आदि भयावह व घृणास्पद गुन्हे करतात ती मुले स्वतः "ब्रोकन" असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात मग जर कुसंगत लाभली तर पहायलाच नको.

अशा मुलांना एक संधी मिळणे व त्यांचे पुनर्वसन (औषधोपचार + काऊन्सिलींग) होणे फार अत्यावश्यक आहे असे मी मानते.भावनेच्या भरात कायदे होत नसतीलच/नसावेत. कायदयाचे २ हेतू असतात हे मलाही मान्य आहे - (१) पीडीतास न्याय (२) संभाव्य गुन्ह्यांस आळा. पण बहुधा हे जे कायदे होतात त्या पंनलवर एखादी व्यक्ती बालमानसशास्त्राचा अभ्यास केलेली असावी. व या व्यक्तींकडे पुरेसा विदा उपलब्ध असावा असे गृहीतक आहे.

............सा… Mon, 02/12/2013 - 13:54

In reply to by ऋषिकेश

धन्यवाद. माझ्या प्रतिसादानंतर , तुमचा मन यांना रेझोनेटींग प्रतिसाद आल्याआल्या कळलं मला. शिवाय बालसंगोपन या विषयाबद्दलची तुमची आस्था व विचार मी वाचते. :)

असो. धन्यवाद.

अजो१२३ Thu, 05/12/2013 - 18:00

In reply to by ............सा…

मार्मिक!
कधी कधी वाटते कि या कलमाखाली या परिस्थितीत या गुन्ह्याला ही सजा हे जे आजचे फ्रेमवर्क आहे तीत परिस्थितीबद्दल फारशी चर्चा नाही. परिस्थितीनज्य न्यायव्यवस्थेला चालना द्यावी म्हटले तर न्याय व्यवस्थेचे फावणार, नंतर ती गडबड करणार. (जर मूल्येच ढासळली असली, किंवा) कोणावरच नीट विश्वास नसताना नीट चालणारी व्यवस्था 'कागदोपत्री' तयार करायची आणि राबवायची हे काम कठीण आहे. अशी फूलप्रूफ व्यवस्था अशक्य आहे असे वाटते.

आणि व्यवस्था नेहमीच प्रचंड प्रमाणात बदलत असू नये. उद्या १४-१८ वर्षाच्या मुलांना सजा व्हायला लागल्या तर ६०-७० वर्षे जे मोकाट सुटले त्यांचे काय? नक्की काय योग्य आहे हे पटकन न ठरवता (न्या. वर्मांचे उदाहरण) त्याला हवा तितका वेळ देऊन ठरवलेले बरे.

ऋषिकेश Tue, 03/12/2013 - 11:18

भारताने आता पश्चिम आशियायी राजकारण अधिक लक्ष घातले आहे अशी गेल्या चार-सहा महिन्यात आलेल्या बातम्यांवरून वाटत होते. आज तर भारताने सिरीयाला रासायनिक शस्त्रांची विल्हेवाट लावायला मदत करायची ऑफर देऊन एका धगधगत्या आंतरराष्ट्रीय प्रश्नात हात घातला आहे.

अशी एक जबाबदार व कंस्ट्रक्टिव्ह मदत करणारा देश म्हणून आपली प्रतिमा उंचावण्याचा फायदा आपल्याला अनेकदा मिळातो

मन Wed, 04/12/2013 - 07:27

In reply to by बॅटमॅन

दरवेळी कुणीतरी पाकिस्तानात जाउन आले की ह्या गोष्टींचा उल्लेख होतो.
द्वारकनाथ संझ्गिरी १९८७ मध्ये पाकिस्त्नाच्या दौर्यावर गेले होते क्रिकेट टीम सोबत.
तो दौरा व इतर काही दौरे ह्यातील प्रवासाबदल त्यांनी लिहिलय.
अगदि त्यापुस्तकतही ह्याचा उल्लेख आहे.
मागे उर्मिला मातोंडकर पाकिस्तानात गेल्ती.
इतरही अनेकानेक मंडळी जाउन आली.
लाहोर सारख्या प्रमुख शह्रात आजही चौकांना "लक्ष्मी चौक" वगैरे नावे आहेत . म्हणून पाकिस्तानी कित्ती कित्ती चांगली आहेत.
(कारण त्यांनी ह्या पाहुण्यांन चांगले वागविले, हॉटेल्वाले, दुकानदार ह्यांनी "मेहमान"कडून पैसे घेतले नाहित म्हणून)
दोन्ही देशातील "अवाम" ला "अमन" कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न होतो.

बॅटमॅन Wed, 04/12/2013 - 12:32

In reply to by मन

असेलही, मला व्यक्तिशः पहिल्यांदाच हे वाचावयास मिळाले. याचा उल्लेख अन्यत्र अगोदरही झालेला आहे हे माहिती नव्हते, रोचक आहे.

मटाच्या बातमीतही "पाकी कित्ती चांगले" छाप सूर आहेच.

अवांतरः साला एकदा तरी तिकडे जायची (आणि अर्थातच हातीपायी सुखरूम धड परत येण्याची) इच्छा आहे बॉ. पेशावर-अटक-लाहोर-हडप्पा-कराची-मोहेंजोदडो ही पाच ठिकाणे पाहण्याची लै इच्छा आहे. इन्शागणपती, योग येईलही.....

ऋषिकेश Wed, 04/12/2013 - 12:59

In reply to by बॅटमॅन

माझीही इच्छा आहे किमान लाहोर-कराची-हडप्पा-मोहेंजोदडो बघायची.

तिथे पर्यटनासाठी म्हणून भारतीयांना विजा मिळातो का?

बॅटमॅन Wed, 04/12/2013 - 14:18

In reply to by ऋषिकेश

भौतेक नै मिळत. नैतर बरेच लोक तिथे गेले असते, गेलाबाजार मुक्तपीठ नैतर मआंजावर एखादे "आमची पाक सफर" छाप प्रवासवर्णन वाचावयास नक्की मिळाले असते.

ॲमी Wed, 04/12/2013 - 13:13

परवा ती बातमी वाचलेली का कोणी? मनुष्य हा चिँपाझी वानरीण आणि डुक्कराच क्रॉस ब्रीड असण्याची शक्यता आहे :-D

ॲमी Thu, 05/12/2013 - 09:13

In reply to by बॅटमॅन

त्यातला 'मनुष्याची पुनरुत्पादन क्षमता खूप कमी आहे' हा भाग मला फार रोचक वाटलेला. वेगवेगळ्या प्राण्यांच्या क्षमतेचा तक्ता कुठे पहायला मिळेल शोधतेय.

मन Thu, 05/12/2013 - 11:23

In reply to by ॲमी

एकावेळी एकच पिलू होत असलेले सस्तन किती?
इतर सस्तन प्राण्यांना एकाच वेळी अनेक पिल्ले होतात.
त्यासंदर्भात ते असेल का?

ॲमी Thu, 05/12/2013 - 13:48

In reply to by मन

ते आहेच. परत एक मुल जन्मायला घालण्यात साधारण १ ते १.५वर्ष गेल (कंसीव्ह व्हायला लागणारा वेळ, गरोदर, परत मुल पित असताना पाळी येते/नाही) आणि ते मुलदेखील स्वतःच अन्न मिळवू शकेल एवढं मोठ व्हायला कमीतकमी १०वर्ष जातात. तरीही माणुस एवढी वर्ष टिकला आणि लोकसंख्या विस्फोटापर्यँत गेला म्हणुन (उगाच) अभिमान वाटला :-D

ऋषिकेश Thu, 05/12/2013 - 13:53

In reply to by मन

माझ्या अंदाजानुसार बर्‍याच मोठ्या आकाराच्या सस्तन प्राण्यांना - त्यातही पोटात बराच काळ पिलांचा सांभाळ करणार्‍या सस्तन प्राण्याना - शक्यतो एकच अपत्य होत असावे.

मन Thu, 05/12/2013 - 13:59

In reply to by ऋषिकेश

गाय, हत्ती हे माणसासारखेच एकावेळी एक पिलू वाले प्राणी आहेत.
उंदीर्,मांजर्,वाघ, सिंह्,कुत्री,दुकरे हे बहुपिलेवादी.
शेळी,घोडा, मेंढ्या ह्यांच्याबद्दल कल्पना नाही.

अजो१२३ Thu, 05/12/2013 - 18:09

In reply to by ॲमी

गेल्या किती एक(शे) वर्षांपासून शास्त्रज्ञ निसर्गाचं निरीक्षण करताहेत. अजून कोणतीकोनती क्रॉसिंग नैसर्गिकरित्या या काळात झाली आहेत?

मन Fri, 06/12/2013 - 07:27

In reply to by अजो१२३

सिंह आणि वाघीण ह्यांच्या रत होण्यातून एक मिश्र संतती जन्मते .
परवाच त्या पिलांचे फोटो वगरिए टीव्हीवर दाखवत होते.
पण अर्थातच, ही पिले फार काळ जगत नाहित.
जी जगतात, ती पुनरुत्पादन करण्यास अक्षम असतात.
खेचर हे असेच घोडा-गाधव ह्यांची मिश्र संततई असल्याचे ऐकले आहे.

अजो१२३ Fri, 06/12/2013 - 16:24

In reply to by मन

माणसाने केलेली नाही हो, प्राण्यांनी स्वतःहून केलेली. अरेरे, मला जी सांगायची गोष्ट आहे ती मला कधीच नीट का नाही सांगता येत? नेहमीच मला वाटते कि जे लिहिले आहे त्यात मला जे म्हणायचे आहे तो अर्थ येतोच. पण लोक नेहमीच वेगळे अर्थ काढतात.

नितिन थत्ते Fri, 06/12/2013 - 17:55

In reply to by अजो१२३

एका नॅट जिओसदृश कार्यक्रमात मेंढपाळांचे शिकारी कुत्रे लांडग्यांच्या माद्यांशी रत होतात पण त्यातून निर्मिती होत नाही असे पाहिल्याचे स्मरते.

मन Wed, 04/12/2013 - 14:55

बातमी गंभीर आणि सगळ्यांशी संबंधित वाटली.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/-/articleshow…
मोबाइल तंत्रज्ञान निर्धोकच!
मोबाइल वापर व रेडिएशनबाबत विविध पातळ्यांवर आजवर जगभरात झालेल्या संशोधनात मानवाला या तंत्रज्ञानापासून कसलाही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे , असा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेचे माजी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स प्रोजेक्ट को - ऑर्डिनेटर प्रा . मायकेल रेपाचोली यांनी दिला . रेडिएशनच्या दुष्परिणामांबाबत उच्चरवात चर्चा करणारे आंदोलक कुठल्याही शास्त्रीय आधाराविनाच अपप्रचार करत असल्याची टिप्पणीही त्यांनी केली .

हर - आनंद पब्लिकेशनच्या ' मोबाइल फोन्स अॅन्ड पब्लिक हेल्थ - मिथ अॅन्ड रिअॅलिटी ' या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले . १९९१मध्ये मोबाइच्या दुष्परिणामाबाबत अमेरिकेत दाखल झालेल्या पहिल्या दाव्यानंतर आजवर जगभरात मोबाइल , टॉवर , रेडिएशन व त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम याविषयी चर्चा होत आहे . परंतु , आजवर विविध पातळ्यांवर संशोधन होऊनही कुठेही कॅन्सर किंवा तत्सम विकार उद्भवत असल्याचे समोर आलेले नाही , असे त्यांनी स्पष्ट केले . भारतातील रेडिएशन पातळी आंतरराष्ट्रीय निकषांच्या एक दशांश असल्याचे ते म्हणाले .

मोबाइल फोनवर सहा म ‌ िनिटांपेक्षा जास्त काळ बोलल्यानंतर मेंदूचे तापमान ० . १ अंश सेल्सिअस वाढते , पण ते काही काळासाठीच असते , त्यानंतर रक्तप्रवाहाच्या माध्यमातून हे तापमान ‌ नियंत्र ‌ ित होते , असे पुस्तकाचे संपादक रवी व्ही . एस . प्रसाद म्हणाले . एफएम , टीव्ही यांच्यामुळे आपण रेडिएशनच्या संपर्कात येत असतो , त्याची तरंगलांबी मोबाइलपेक्षा जास्त असते , पण त्याचा मानवी शरीरावर काहीच परिणाम होत नसून याविषयाची निकोप चर्चा होण्यासाठीच या पुस्तकाची निर्मिती केल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट केले .

' तिथेही ' मोबाइल टॉवर

संपूर्ण जगाच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्यालयावर तीन मोबाइल टॉवर आहेत . या तंत्रज्ञानाबाबत तेथील संशोधकांच्या मनात शंका असती , तर इतकी ' घोडचूक ' त्यांनी का केली असती , असा टोला प्रा . रेपाचोली यांनी लगावला .

संशोधनातील काही निष्कर्ष

> मानवी शरीर अतिशय कमी तरंगलांबी असलेले एफएम रेडिओ , टीव्हीचे रेडिएशन पाचपट अधिक प्रमाणात शोषते , मोबाइलची तरंगलांबी मोठी असते .

> १३ देशांत झालेल्या संशोधनाअंती रोज दहा तास मोबाइल वापरणाऱ्या व्यक्तींवर कुठलाही दुष्परिणाम झाल्याची लक्षणे आढळली नाही .
> रेडिएशनमुळे निर्माण होणारी उष्णता पॉपकॉर्न किंवा अंडे शिजण्याइतकी जास्त असते , हा दावा खोटा .

> पेट्रोलपंपावर मोबाइल वापरल्याने स्फोट होत नाहीत .

> मोबाइल अ ‌ थवा रेडिएशनमुळे वादळात वीज आकर्षित होत नाही .
.
.
.
मोबाइल लहरी वाईट वगैरे वगैरे अंधश्रद्धा आहेत, हे सरळ मान्य केले ह्या अभ्यास्-सर्व्हेच्या रेट्याने तरी
पेट्रोलपंपावर मोबाइल वापरल्याने स्फोट होत नाहीत ह्याचा अर्थ काय घ्यायचा?
आजवर अंधश्रद्धा पलण्यास भाग पाडले जात होते काय?
पेट्रोल पंपावर स्फोट झाल्याचे काही विडियोसुद्धा जालावर फिरत होते इत्कए दिवस.
ते बनावट होते काय?
शिवाय रिपोर्ट्स हे पेड रिपोर्ट्स आहेत अशी अजून तक्रार कशी आली नाही ह्याचे आश्चर्य वाटते.

नितिन थत्ते Wed, 04/12/2013 - 15:24

In reply to by मन

>>एफएम रेडिओ , टीव्हीचे रेडिएशन पाचपट अधिक प्रमाणात शोषते , मोबाइलची तरंगलांबी मोठी असते .

इथे शंका आहे. एफ एम रेडिओ १०० मेगा हर्ट्झ च्या आसपास असतात. मोबाईल ९००/१८०० मेगा हर्ट्झ असतात. म्हणजे मोबाईलची तरंगलांबी कमी असते.

>>पेट्रोलपंपावर मोबाइल वापरल्याने स्फोट होत नाहीत ह्याचा अर्थ काय घ्यायचा?

मोबाईल पेट्रोलपंपावर वापरण्याने कधीही स्फोट होऊ शकणार नाही.
पेट्रोलपंपावर मोबाईल उघडून त्याची ब्याटरी काढली तर कदाचित ती काढताना कॉण्टॅक्टवर स्पार्क पडल्यास आग लागू शकेल. ती ही शक्यता कमीच आहे.

मन Wed, 04/12/2013 - 15:46

In reply to by नितिन थत्ते

मग पेट्रोल पंपावर मोबाइल बंद ठेवा वगैरे वगैरे का लिहितात?
मोबाइल स्विच ऑफ करा का म्हणतात?

सुनील Thu, 05/12/2013 - 08:35

In reply to by ऋषिकेश

अशा बातम्या येतात नी जातात, त्याचे परिणाम दिसू नयेत हीच इच्छा!

+१

अवांतर - बातमीचे शीर्षक "अतिशय घातक किरणोत्सर्ग होऊ शकणार्‍या पदार्थाची मेक्सिकोतून चोरी" असे असायला हवे असे वाटते. सध्याच्या शीर्षकातून असे सूचीत होते की, सदर पदार्थातून किरणोत्सर्ग फक्त मेक्सिकोतूनच होतो की काय? ;)

ऋषिकेश Thu, 05/12/2013 - 11:04

दिल्लीच्या निवडणूकांसाठी रेडीफने एक अत्यंत रोचक खेळणे दिले आहे.
इथे बघा

आम आदमी पार्टि कोणाची व किती मते खाते त्यावर बदलणारे रिझल्ट्स प्रचंड आहेत. उगाच नै विविध इग्झिट प्ल्समध्ये इतका मोठा फरक आहे!

मी Thu, 05/12/2013 - 14:20

न्युयॉर्करच्या लेखात निम्न आर्थिक परिस्थितितील मध्यमवर्गीयांच्या अवस्थेचे रोचक विश्लेषण दिले आहे. निम्न आर्थिक स्तरातील लोकांना सरकारकडुन मिळणार्‍या फायद्यांमुळे घर चालविण्याच्या निर्णयांवर परिणाम होत आहे व त्यामुळे ह्या वर्गाची कुचंबणा होत आहे. युपिए सरकारने राबविलेल्या अन्नसुरक्षा विधेयकाप्रमाणेच तिकडे SNAP(for Supplemental Nutrition Assistance Program) कार्यक्रम ह्या वर्गातील लोकांसाठी एक वरदानच आहे असे आकडे सांगतात. पोपच्या ह्या विधानाचा उल्लेख करुन ओबामा आर्थिक विषमता दुर करण्यासाठी किमान राष्ट्रिय पगाराची रक्कम वाढविणे गरजेचे आहे असे म्हणतात.

अमेरिकेच्या गरिबीची हि सांख्यकी मात्र अमेरीकेच्या रुढ प्रतिमेला छेद देणारी वाटते. तसेच मुळ लेखात एकत्र रहाणारी जोडपी(लग्न केलेली?) त्यामानाने विभक्त जोडप्यांपेक्षा सुखवस्तु संसार करु शकत आहेत हेही नोंदवले आहे.

रोचक परिच्छेद-

This matters for a couple of reasons. It reframes how we think about the people who access government benefits. Many of them, it turns out, are married, college educated, and working—that is, people whose choices reflect traditional values and whose plight should inspire sympathy from both the political left and right. And it highlights the structural problems that make it difficult for lower-middle-class families to make ends meet and to rise into a higher income bracket. If you’re a married, stay-at-home mom who wants to work, for instance, you face a dilemma: if your husband’s salary is low enough to qualify your family for government benefits, getting a job could actually cost your family more in taxes and lost benefits than staying out of the workforce:

तळटिपा -
पोपच्या हा भावनिक आव्हानात(exhortation)पान ४४वर ५२ नंबरचा मुद्दा. हे आव्हान पोपचे ऑफिशिअल स्टेटमेंट आहे व ते २२३ पानांचे असुन ते कारण एका वेगळ्याच चर्चेचा मुद्दा असु शकतो. मी सगळेच आव्हान वाचले नाही त्यामुळे त्या संदर्भातील टिप्पणी वगळण्यास हरकत नसावी( असली तरी हु केअर्स?), अशा तळटिपा लिहिण्यावर कोणाचा क्रिएटिव्ह हक्क नसावा असल्यास कळवावे. :)

मन Fri, 06/12/2013 - 17:51

फरुख अब्दुल्ला काय चुकीचं बोल्ले?
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Farooq-Abdullah-apologize…

महिलांबद्दल बोलून अब्दुल्ला फसले

सध्याची परिस्थिती इतकी नाजुक आहे की, महिलांशी बोलायलाही भीती वाटते, हे वक्तव्य केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला यांना जरा महागातच पडलंय. कारण, या विधानाबद्दल त्यांना काही तासांतच तमाम महिलावर्गाची माफी मागावी लागली आहे.

त्याचं झालं असं की, सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती ए के गांगुली यांच्यावर होत असलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाबद्दल पत्रकारांनी अब्दुल्लांना प्रतिक्रिया विचारली. तेव्हा, आपल्या मनातील महिलांबद्दलची भीती त्यांनी व्यक्त केली. आजच्या परिस्थितीत, मला महिलांशी बोलायलाही भीती वाटते. इतकंच नव्हे तर, महिला सेक्रेटरी ठेवायचीही मला इच्छा नाही. कोण जाणे, उद्या ती माझ्याबद्दल तक्रार करायची आणि माझ्यावर जेलमध्ये जायची वेळ यायची, अशा भावना त्यांनी प्रकट केल्या.

अर्थात, आपण महिलांना दोष देत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. बलात्काराची प्रकरणं थांबायलाच हवीत, असंही अब्दुल्ला यांनी नमूद केलं होतं. परंतु, त्यांच्या आधीच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. एका केंद्रीय मंत्र्याच्या अशा प्रकारच्या बोलण्यानं महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलू शकतो, अशी टीका भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी केली. अब्दुल्लांसारख्या ज्येष्ठ नेत्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नसल्याची टिप्पणी काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांनी केली.

त्यांचा हा पवित्रा पाहून फारुख अब्दुल्ला यांना माफी मागणं भाग पडलं. महिलांचा अपमान करायचा माझा अजिबात उद्देश नव्हता. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ निघत असल्यास मी क्षमा मागतो, असं त्यांनी प्रांजळपणे सांगितलं. त्यानंतर हा वाद निवळला आहे.

.
.
फरुख अब्दुल्ला किंवा फॉर द्यात म्याटर कुणालाही असं वाटलं तर "तुला अशी भीती वाटलीच कशी" असं विचारणं चूक आहे.
निदान मला कशाची भीती वाटावी ह्यावर तरी माझा हक्क राहू द्या हो.
.
.
जोक्स अपार्‍त, मूळ दुखणं वेगळं आहे. ते जगजाहिरही आहे. आणि सगळ्यांना ठाउअखी आहे.
भारतात खरोखरीच महिलांची स्थिती चांगली नाहीए. सुरक्षितता अजून वाढविणयची गरज आहे. कायदेशीर प्रक्रियेतून खरोखर ठराविक न्याय मिळायला हवा.
घिसंपीटं वाटेल, पण पुन्हा तेचः- समजाचा महिलांबद्दलचा दृष्टीकोन ....
आणि महिलांचा महिलांबद्दलचा दृष्टीकोनही बदलायला हवा.
मिडियानं एखाद्याचं नाव एखाद्या घोटाळ्यात टाकलं की पब्लिक तो गुन्हेगारच आहे हे धरुन चालते.
न्यायालयात अशा बिग शॉटला खरोखर शिक्षा झाल्याचं उदाह्रण ना के बराबर आहे .
हे दोन्ही बदलायला हवं. अन्यथा मिडियावरील बातमीनं लोक मत बनवू लागले(केस विसम्रणात जाण्यापूर्वी न्यायव्यवस्थेनं प्रक्रिया पूर्ण करुन मिडियावर
मतांसाठी अवलंबून राह्ण्याची पब्लिकची गरजच संपवली आणि दरम्यान पब्लिकही मॅच्युअरपण वागली ; असं घडलं नाही तर ) तर फरुख सारखी इतर मंडळीही अशीच घाबरणार.
.
महिला कार्यकर्त्यांनो मूळ रोगावर इलाज करा. त्याबद्दल बोंब ठोका ना. लक्षणाबद्दल कशाला बोंब?

बॅटमॅन Fri, 06/12/2013 - 17:54

In reply to by मन

फारुख अब्दुल्ला बरोबरच बोलले. बोंबा ठोकणार्‍यांकडे या केसमध्ये लक्ष देण्याचे वट्ट कारण नाही. कुणी याविरुद्ध कै बोलणार असेल तर फाट्यावर मारणेच उत्तम.

चिंतातुर जंतू Fri, 06/12/2013 - 18:37

In reply to by मन

>> मिडियानं एखाद्याचं नाव एखाद्या घोटाळ्यात टाकलं की पब्लिक तो गुन्हेगारच आहे हे धरुन चालते.

हे ठीक आहे, पण जेव्हा एखादी व्यक्ती 'आजच्या परिस्थितीत, मला महिलांशी बोलायलाही भीती वाटते. इतकंच नव्हे तर, महिला सेक्रेटरी ठेवायचीही मला इच्छा नाही. कोण जाणे, उद्या ती माझ्याबद्दल तक्रार करायची आणि माझ्यावर जेलमध्ये जायची वेळ यायची' अशी वक्तव्यं करते तेव्हा त्याचा अर्थ असा होत नाही का, की बहुसंख्य बायका पुरुषांच्या वर्तणुकीतून चुकीचे अर्थ काढतात किंवा कायद्यातल्या तरतुदींचा गैरफायदा घेतात? कारण तसं नसतं (म्हणजे बहुसंख्य बायका गैरफायदा घेत नसत्या किंवा चुकीचे अर्थ घेत नसत्या) तर भीती अनाठायी ठरते. म्हणजे अशी वक्तव्यं एक प्रकारे बायकांना सरसकट दोषी धरत आहेत आणि वास्तवाचा विपर्यास करत आहेत. नाही का? मंत्र्यासारख्या जबाबदार व्यक्तीकडून देशाची धोरणं ठरवली जातात. तिच्याकडून तरी अशी बेजबाबदार वक्तव्यं अपेक्षित नाहीत असं म्हणण्यात काय चूक आहे? वरच्या उद्धृत विधानात जशी जबाबदारी माध्यमांकडून अपेक्षित आहे तसंच हे नाही का?

>> निदान मला कशाची भीती वाटावी ह्यावर तरी माझा हक्क राहू द्या हो.

हेदेखील ठीक आहे, पण उद्या देशाचा मंत्री म्हणाला की मला माझ्याच घरातल्या काळोखी खोलीत एकटं जायची भीती वाटते, तर त्याची चेष्टा तर होणारच ना? ;-)

सन्जोप राव Sat, 07/12/2013 - 06:20

In reply to by चिंतातुर जंतू

हे ठीक आहे, पण जेव्हा एखादी व्यक्ती 'आजच्या परिस्थितीत, मला महिलांशी बोलायलाही भीती वाटते. इतकंच नव्हे तर, महिला सेक्रेटरी ठेवायचीही मला इच्छा नाही. कोण जाणे, उद्या ती माझ्याबद्दल तक्रार करायची आणि माझ्यावर जेलमध्ये जायची वेळ यायची' अशी वक्तव्यं करते तेव्हा त्याचा अर्थ असा होत नाही का, की बहुसंख्य बायका पुरुषांच्या वर्तणुकीतून चुकीचे अर्थ काढतात किंवा कायद्यातल्या तरतुदींचा गैरफायदा घेतात?

मला वाटते या वाक्याचा एक अर्थ असाही निघतो की असे घडण्याची शक्यता आहे. किंबहुना असले काहीतरी हली फारच ऐकायला मिळते बोवा.बहुसंख्य बायका असे वागतात असा अर्थ यातून (काढायचा म्हटला तर निघेलही) सहजी निघत नाही असे मला वाटते.
'तुमच्या पुण्यात भामटे फार बुवा. पुण्यात आता एकट्यादुकट्याने फिरायचीही भीती वाटते' या वाक्याचा अर्थ पुण्यात बहुसंख्य भामटे आहेत, असा होईल का?

बॅटमॅन Sat, 07/12/2013 - 13:43

In reply to by सन्जोप राव

मला वाटते या वाक्याचा एक अर्थ असाही निघतो की असे घडण्याची शक्यता आहे. किंबहुना असले काहीतरी हली फारच ऐकायला मिळते बोवा.बहुसंख्य बायका असे वागतात असा अर्थ यातून (काढायचा म्हटला तर निघेलही) सहजी निघत नाही असे मला वाटते.

नेमके!!! शिवाय लोकशाही सबलीकरणाचे हे अजून एक उदाहरण म्हणता येईलच नंदी-एस्क चष्म्यातून =))

गवि Wed, 11/12/2013 - 14:10

In reply to by बॅटमॅन

एकूण चर्चेला हा प्रतिसाद आहे. वरील एका प्रतिसादाला नव्हे.

जनरली स्त्रिया स्वतःच्या अब्रूला सर्वाधिक महत्व देत असल्याने त्यांच्याकडून अशा कायद्यांचा सुडासाठी किंवा अन्य दुरुपयोग केला जाईल अशी भीती अनाठायी आहे ही समजूत हलवून सैल करणारी बातमी. अश्या स्पेसिफिक विदा देणार्‍या वार्ता अधिक येऊ लागल्या तर मात्र पुरुषांच्या बाजूने काहीतरी संरक्षक कलमे कायद्यात असावी अशी इच्छा होऊ लागेल आणि खरेच फारुख अब्दुल्लांच्या वक्तव्यात तथ्य आहे असं म्हणावं लागेल.

मुंबई विद्यापीठाच्या 'महिला तक्रार निवारण समिती'नेच ही निरीक्षणं नोंदवल्याने जेन्युईन नसल्याचा दावा करता येणार नाही. आणि तीही माहिती दहा वर्षांतल्या केसेसवरुन दिलीय म्हणजे कालावधीही प्रदीर्घ आहे.

लोकसत्तातील रिपोर्टः

http://www.loksatta.com/mumbai-news/women-making-false-allegations-of-s…

काही भाग:

'एखादे प्राध्यापक चांगले शिकवत नाही, अपघात झाल्यानंतर संस्थेने नुकसानभरपाई दिली नाही, प्राध्यापक पती-पत्नीमध्ये 'तिसऱ्या' व्यक्तीवरून उद्भवणारी भांडणे, मागास जातीतल्या प्राचार्याविरोधातील आकस..' ही कारणे एरवी व्यक्तिगत भांडणासाठी असू शकतात. मात्र काही बुद्धिजिवी, उच्चशिक्षित महिला आपली ही भांडणे सोडविण्यासाठी 'कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविरोधातील कायद्या'चा वापर करीत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. मुंबई विद्यापीठाच्या 'महिला तक्रार निवारण समिती'ला गेल्या १० वर्षांतील तक्रारींचा अभ्यास करताना हे 'अवास्तव' वास्तव दिसून आले आहे.

बॅटमॅन Wed, 11/12/2013 - 14:14

In reply to by गवि

यावर " काही झाले तरी पुरुषांकडून स्त्रियांवर होणार्‍या अत्याचारांच्या तुलनेत शेवटी हे नगण्यच हो. त्यामुळे इकडे तादृश लक्ष देण्याचे कारण नाही" छाप अर्ग्युमेंटे लौकरच वाचायला मिळतील अशी आशा आहे.

अजो१२३ Sat, 07/12/2013 - 14:39

In reply to by सन्जोप राव

भामट्याचे उदाहरण आणि फारुकजींचे वक्तव्य एकत्र पाहिल्यास, कोणताही नियम समाजाला लावताना त्याचे दोन्ही बाजूने अर्थ कसे निघतात हे कळते.
एकतर लोक फारुकजींनी सर्व स्त्रीयांचा अपमान केला म्हणताहेत आणि कदाचित त्यांनी ते विधान भामट्यासमान स्त्रीयांना केले असावे.

अजो१२३ Fri, 06/12/2013 - 18:46

In reply to by मन

फारुखजी, प्रत्येक गोष्टीतून स्त्री विरुद्ध पुरुष असा संग्राम उभा करू नका. कायदे एकांगी आहेत, त्यांत सुधारणी हवी, कसली हवी, इ इ बोला.

............सा… Fri, 06/12/2013 - 23:36

In reply to by मन

निदान मला कशाची भीती वाटावी ह्यावर तरी माझा हक्क राहू द्या हो.

होय तुमचा हक्क आहे पण प्रसिद्ध खुर्चीवरुन (पदावरुन) असली पॅरॅनॉईड जाहीर वक्तव्ये करु नका. सर्वांनाच सुखानी जगू द्या.

गब्बर सिंग Sat, 07/12/2013 - 16:02

In reply to by मन

एका केंद्रीय मंत्र्याच्या अशा प्रकारच्या बोलण्यानं महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलू शकतो, अशी टीका भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी केली.

स्मृती इराणींचा बकवास.

कोणत्याही एका केंद्रीय मंत्र्याचा एवढा प्रभाव असता ... तर कशाला पाहिजे होते ???

लॉरी टांगटूंगकर Wed, 11/12/2013 - 13:05

नीलेकर्णी काँग्रेसचे पीएमपदाचे उमेदवार?
सकाळ, मटा, झी न्यूज आणि टाइम्समध्ये बातमी दिसते आहे. अजून एक शिक्का बघायला मला तरी आवडणार नाही.

अतिशहाणा Wed, 11/12/2013 - 20:24

In reply to by लॉरी टांगटूंगकर

नंदन नीलकेणी पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याची अफवा खरी निघाली तर नारायणमूर्ती यांची अवस्था काय होईल याची कल्पना करवत नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी काही वर्तमानपत्रांमधून हळूच त्यांचे नाव सुचवले जाणे किंवा वारंवार राज्यपातळीवरील/देशपातळीवरील राजकीय पक्षांबाबत प्रतिकूल टिप्पण्या करणे यातून नारायणमूर्ती यांना काही तरी राजकीय आकांक्षा असावी असे मला नेहमी वाटत आले आहे. शिवाय नेहमीच ते एका तत्त्वज्ञाची झूल पांघरुन सर्व जगाला नैतिकतेचे धडे देत असले तरी स्वतःच्या कंपनीतील घराणेशाही (कंपनीच्या संस्थापकांनीच - क्षमता असो वा नसो - मुख्य कार्यकारी अधिकारी व्हावे, किंवा निवृत्त झाल्यानंतरही कंपनीला पुन्हा उभे करण्यासाठी परतताना स्वतःच्या मुलाला उच्चपदस्थ सल्लागार म्हणून नेमावे वगैरे), जबाबदारीचा अभाव (व्हिसाविषयक खटल्यात इन्फोसिसचे व पर्यायाने भारतीय उद्योगाच्या विश्वसनीयतेला मोठा तडा गेला असला तरी यासाठी जबाबदार म्हणून कोणा अधिकारी व्यक्तीवर अद्याप इन्फोसिसने कारवाई केल्याचे कुठे वाचले नाही). फणीश मूर्ती इन्फोसिसमध्ये असताना स्त्री कर्मचाऱ्यावर झालेला अन्याय ती स्त्री परदेशी व्यक्ती असल्यानेच उघडकीला आला असावा असे वाटते... मात्र भारतीय स्त्री कर्मचारी असती तर इन्फोसिसने हा प्रकार नक्कीच दाबून टाकला असता. ) याकडे त्यांनी नेहमीच सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे असे दिसते.

असो काँग्रेसकडे सध्या नीलकेणी हे एक पंतप्रधानपदाचे सुयोग्य उमेदवार आहेत असे वाटते. (कोण नीलकेणी अशा स्वरुपाचे प्रश्न काही बिहारी नेत्यांनी विचारल्याचे ऐकूनही गंमत वाटली.)

मन Wed, 11/12/2013 - 20:35

In reply to by अतिशहाणा

नीलकेणी समजा पंतप्रधानपदासाठी योग्य व्यक्ती आहेत.
फाइन. पण इतकी वर्षे अस्तित्वात असलेला पक्ष, कालपर्यंत इतकी सारी राज्ये ताब्यात असलेला
सत्ताधारी पक्ष बाहेरुन एक पंतप्रधान अपॉइण्ट का करतोय हे समजत नाही.
काँग्रेस ह्या पक्षात मुरलेले -वाढलेले नेते आणि कार्यकर्ते शिल्लक नाहित का?
त्यांचं इन्स्टिट्युशनल स्ट्रक्चर इतकं दुबळं झालय का?
चिदु, प्रणव मुखर्जी (आता हे स्वतःच बाहेर झाले, दुसरे पद स्वीकारुन) किंवा अगदि शरद पवार
ह्यांना राजकारण्- प्रशासकीय अधिकारी ,धोरणे ह्यांच्याशी नक्की डील कसं करायचं ह्याची आयडिया
असतानाही बाहेरचा माणूस शोधावा लागतोय का? नक्की चाललय काय?
.
राजकारण ह्या विषयावर गप्प बसावं म्हणतो, पण रहावत नाही.

अतिशहाणा Wed, 11/12/2013 - 21:58

In reply to by मन

बाहेरचा माणूस आतला कधी होतो याचे काही निकष आहेत काय? चिदु सुद्धा त्यांच्या स्वतःच्या तामिळ मनिला काँग्रेसमध्ये होतेच की. मग ते नक्की केव्हा 'आतले' झाले? मुळात पक्षात मुरलेल्या आणि वाढलेल्या लोकांवर सामान्यांचा तितकासा विश्वास राहिलेला नसल्याने एखादा फ्रेश चेहरा पुढे आणण्याचा जुगार यशस्वी ठरु शकतो.

नितिन थत्ते Wed, 11/12/2013 - 22:41

In reply to by अतिशहाणा

चिदंबरम हे काँग्रेसमधून फुटून त्यांनी तमीळ मनिला काँग्रेस हा पक्ष जी के मूपनार यांच्याबरोबर स्थापन केला होता. तत्कालीन अध्यक्ष सीताराम केसरी यांच्याशी अण्णा द्रमुकशी युतीकेल्याबद्दल बिनसले होते म्हणून.

नंतर केसरी पायउतार झाल्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले.

टेक्नोक्रॅट पंतप्रधान होऊ नये असे माझे मत आहे. तेक्नोक्रॅट्सनी कामे करावीत. पॉलिसी ठरवणे राजकीय व्यक्तींनीच [निवडून आलेल्या] करावे. ज्या लोकांना हे पटत नाही त्यांच्या समाधानासाठी वाटल्यास एक टेक्नोक्रॅट पुतळा बसवावा पण निर्णय राजकीय व्यक्तींच्याच हाती असावेत.

मी Wed, 11/12/2013 - 22:43

In reply to by नितिन थत्ते

टेक्नोक्रॅट पंतप्रधान होऊ नये असे माझे मत आहे. तेक्नोक्रॅट्सनी कामे करावीत. पॉलिसी ठरवणे राजकीय व्यक्तींनीच [निवडून आलेल्या] करावे. ज्या लोकांना हे पटत नाही त्यांच्या समाधानासाठी वाटल्यास एक टेक्नोक्रॅट पुतळा बसवावा पण निर्णय राजकीय व्यक्तींच्याच हाती असावेत.

सहमत.

अतिशहाणा Wed, 11/12/2013 - 23:00

In reply to by नितिन थत्ते

सध्याचे पंतप्रधान मनमोहनसिंग हे रूढ अर्थाने राजकारणी नाहीत तर ब्यूरोक्रॅट आहेत. ते मागल्या दाराने (राज्यसभेतून) निवडून आले आहेत (थेट लोकांमधून नाही.) त्यांनी यूपीए - १ मध्ये देश ठीकठाकच चालवला होता. सध्या पेपरांत येणाऱ्या बातम्यांनुसार नीलकेणी हे दक्षिण बंगळूरमधून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे ते निवडून आल्यास केवळ एक माजी टेक्नोक्रॅट म्हणून पंतप्रधान होण्याची संधी देऊ नये असे वाटत नाही. शिवाय पॉलिसी ठरवण्याचे काम एकटा पंतप्रधान निश्चितच करत नाही.

देश चालवणे हे कंपनी चालवण्यापेक्षा वेगळे का असावे?

नितिन थत्ते Thu, 12/12/2013 - 10:13

In reply to by अतिशहाणा

>>नीलकेणी हे दक्षिण बंगळूरमधून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे ते निवडून आल्यास केवळ एक माजी टेक्नोक्रॅट म्हणून पंतप्रधान होण्याची संधी देऊ नये असे वाटत नाही.

निवडून आल्यास प्रश्नच नाही. मग ते राजकारणीच (पक्षी जनतेचे प्रतिनिधी) होतील. सध्याच्या पंतप्रधानांनासुद्धा मागील दाराने आणले असल्याने ते सुद्धा फारसे योग्य नाही.

>>देश चालवणे हे कंपनी चालवण्यापेक्षा वेगळे का असावे?
स्टेक होल्डर्सचा इंटरेस्ट. कंपनी चालवताना स्टेक होल्डर्सना त्यांचा फायदा हवा असतो. (कायद्याच्या चौकटीत बसल्यास) तो फायदा कोणत्या मार्गान होतो याबाबतीत ते इन्डिफरंट असतात. देश चालवणार्‍याकडून असे अपेक्षित नसते.

अतिशहाणा Thu, 12/12/2013 - 22:15

In reply to by नितिन थत्ते

स्टेक होल्डर्सचा इंटरेस्ट. कंपनी चालवताना स्टेक होल्डर्सना त्यांचा फायदा हवा असतो. (कायद्याच्या चौकटीत बसल्यास) तो फायदा कोणत्या मार्गान होतो याबाबतीत ते इन्डिफरंट असतात. देश चालवणार्‍याकडून असे अपेक्षित नसते.

सहमत आहे. पण कंपनी चालवणे यामागे कॉर्पोरेट गवर्नन्स स्वरुपाची शिस्त मला अपेक्षित होती. सरकार असो किंवा कंपनी फायद्यात कशी राहील याचा विचार करुन निर्णय घेणे. हे फुकट-ते फुकट अशा सबसीड्या काळजीपूर्वक वाटणे. मंत्र्यांनी केलेला भ्रष्टाचार हा सरकारच्या (कंपनीच्या) पैशाचे नुकसान मानून शिक्षा कशी होईल याबाबत पुढाकार घेणे वगैरे अपेक्षित होते.

सध्या राजकारणी म्हटले की लालूप्रसाद यादव किंवा जीतेंद्र आव्हाड टाईप कॅरिकेचर्स समोर येतात. नीलकेणी यांच्यासारखे (केजरीवाल टाईप बोलघेवडे नसलेले) लोक स्वतः राजकारणात उतरले तर निदान राजकीय शुद्धीकरणाची सुरुवात होईल असे वाटते.

फारएण्ड Wed, 11/12/2013 - 22:14

In reply to by मन

बाहेरचा माणूस शोधावा लागतोय का? नक्की चाललय काय?>>> कंपन्यांमधे "आतले" लोक असतानाही बाहेरून एकदम सीईओ आणतात तसे असावे. कंपन्यांतील लोकांची एकमेकांना पूरक असलेली नेटवर्क्स, त्यांचे राजकारण, एकमेकांच्या हिताला बाधा न येउ देणारे निर्णय घेणे हे "ब्रेक" करायला असे बरे पडते. तसे काहीतरी असेल तर खरोखरच स्मार्ट मूव्ह आहे.

विसुनाना Fri, 13/12/2013 - 11:38

भारताच्या अमेरिकेतील उपवाणिज्यदूत देवयानी खोब्रागडे यांना प्रवेशानुमतीपत्र (विसा) घोटाळ्यात हात असल्याच्या संशयावरून अमेरिकेत अटक -
http://www.firstpost.com/world/indias-deputy-consul-general-to-us-gets-…

व्यवस्थेतलं कुणीतरी दुखावलं की एअरवी सुरलीत चाललेली कामं अशी चव्हाट्यावर येतात.

हा प्रित भरारा 'रजत गुप्ता' फेम केसमधला आहे. आता ह्या देवयानीला शुक्राचार्यच वाचवु जाणे.

इंडियन एक्सप्रेसमधील बातमीमध्ये बरेच विस्तृत वर्णन आहे. या बाईंचा आदर्श घोटाळा इमारतीत एक फ्लॅट असल्याचेही गूगल मध्ये शोधल्यास दिसते.

http://www.indianexpress.com/news/furious-at-diplomats-arrest-over-visa…

चिंतातुर जंतू Fri, 13/12/2013 - 17:29

>> according to fakers.statuspeople.com, 69 per cent of @narendramodi followers and 65 per cent of @ShashiTharoor followers are fake.

आय टी कंपन्यांकडून राजकीय नेत्यांना सोशल मीडिआवर लोकप्रियता दाखवण्यासाठी मदत कशी केली जाते ह्या कोब्रापोस्टच्या स्टिंगबद्दल 'आउटलुक'मध्ये आलेला लेख.

सन्जोप राव Sat, 14/12/2013 - 06:55

In reply to by अतिशहाणा

हृतिक रोशन आणि सुसान रोशन घटस्फोट घेणार असल्याचे वाचले. असो..
ही काय बातमी आहे? तसे असेल तर 'संजय दत्तला जेलमध्ये पोलीस दारु पुरवतात - विनोद तावडे यांचा आरोप' ही बातमीही या धाग्यात टाकायला हरकत नसावी...

अतिशहाणा Sat, 14/12/2013 - 18:57

In reply to by सन्जोप राव

बॉलीवूडी 'खाना'वळीपेक्षा जरा वेगळा चेहरा, सुसंस्कृत कलाकार म्हणून चांगला वाटत होता. शिवाय १७ वर्षे वगैरे एकत्र असल्याने ही बातमी अनपेक्षित वाटली इतकेच.

अतिशहाणा Sat, 14/12/2013 - 18:55

इति हिंदूधर्मसंरक्षक, यवननिर्दालक, म्लेंच्छशत्रू, संस्कृतीसंवर्धक श्री.श्री. राजनाथ सिंग यांचे प्रतिपादन.

समलैंगिकता अनैसर्गिक असल्याने पाठिंबा देणे शक्य नाही
http://news.outlookindia.com/items.aspx?artid=820899

सन्जोप राव Tue, 24/12/2013 - 14:09

गुरुपुनर्वसू योगावर सोनेखरेदी
२० डिसेंबरला सकाळी ६ वा. ५९ मिनिटे ते ७ वा. ८ मिनिटे असा केवळ नऊ मिनिटे गुरुपुष्यामृत योग होता. त्या काळात कोणी सोने खरीदण्याचा संभव नाही. म्हणून १९ डिसेंबरच्या गुरुवारी सर्व सुवर्णखरेदी गुरुपुनर्वसू योगावर झाली हे निश्चित. अर्थात मुहूर्त ही एक निरर्थक कल्पना आहे. सोने कधीही घेतले तरी सारखेच. पण कधीच न घेतले तर मात्र फार उत्तम. सराफी दुकानांत काचेआडच्या निर्जीव, निर्बुद्ध पुतळ्यांवर सुवर्णालंकार शोभतात. सजीव, बुद्धीमान व्यक्तीच्या अंगावर ते ओंगळवाणे दिसतात. स्वबुद्धीने विचार करावा.
य.ना.वालावलकर
महाराष्ट्र टाईम्स, २४.१२.१३

बॅटमॅन Tue, 24/12/2013 - 14:19

In reply to by सन्जोप राव

मुहूर्त निरर्थक असो किंवा कसेही, यनावाला महाशयांस स्वबुद्धी खरेच आहे की नाही हे तपासावयाला पाहिजे खरेच.

सराफी दुकानांत काचेआडच्या निर्जीव, निर्बुद्ध पुतळ्यांवर सुवर्णालंकार शोभतात. सजीव, बुद्धीमान व्यक्तीच्या अंगावर ते ओंगळवाणे दिसतात. स्वबुद्धीने विचार करावा.

रिव्हर्स दवणीय म्हणून हे वाक्य खपावे काय?

शिवाय कुणी गुंतवणूक किंवा गोल्डमनगिरी म्हणूनही सोने खरेदी करीत असेल तर त्यास जज्जवणारे हे टिकोजीराव तरी कोण?

प्रकाश घाटपांडे Tue, 24/12/2013 - 14:48

In reply to by बॅटमॅन

रिव्हर्स दवणीय म्हणून हे वाक्य खपावे काय?

:)

शिवाय कुणी गुंतवणूक किंवा गोल्डमनगिरी म्हणूनही सोने खरेदी करीत असेल तर त्यास जज्जवणारे हे टिकोजीराव तरी कोण?

त्यांचा आक्षेप / टीका हा/ही सोने खरेदीवर नसून मुहुर्तावर सोने खरेदी करण्याच्या मानसिकतेवर आहे. मत मांडण्याचा अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. अर्थात ते मत अमान्य करण्याचा अधिकारही इतरांना आहेच.

बॅटमॅन Tue, 24/12/2013 - 15:14

In reply to by प्रकाश घाटपांडे

मान्य, पण मुहूर्त सोडल्यासदेखील सोने खरेदीच्या मानसिकतेवरचा हल्ला अस्थानी आहे. "सुबुद्ध माणसाच्या शरीरावर दागिने वैट्ट दिस्तात" वैग्रे बिनडोक मुक्ताफळे उधळण्याचा हक्क त्यांना आहेच, पण त्यात काही अर्थ नाही. संजोपरावांनी जे उद्धृत केले त्यात मुहूर्त सोडल्यासही जण्रल दागिनेखरेदीवर हल्ला चढवला आहे. ते मूर्खपणाचं आहे कारण त्यात तथ्य काही नाही.

सन्जोप राव Wed, 25/12/2013 - 06:03

In reply to by बॅटमॅन

मुहूर्त निरर्थक असो किंवा कसेही, यनावाला महाशयांस स्वबुद्धी खरेच आहे की नाही हे तपासावयाला पाहिजे खरेच.

सराफी दुकानांत काचेआडच्या निर्जीव, निर्बुद्ध पुतळ्यांवर सुवर्णालंकार शोभतात. सजीव, बुद्धीमान व्यक्तीच्या अंगावर ते ओंगळवाणे दिसतात. स्वबुद्धीने विचार करावा.

रिव्हर्स दवणीय म्हणून हे वाक्य खपावे काय?

शिवाय कुणी गुंतवणूक किंवा गोल्डमनगिरी म्हणूनही सोने खरेदी करीत असेल तर त्यास जज्जवणारे हे टिकोजीराव तरी कोण?
मराठी संकेतस्थळांवर जरा मार्मिक प्रतिसाद देणारे वगैरे म्हणून नाव झाले (तसे ते आभासीच नाव, त्याला काही अर्थ नाही) की माणूस विचारातले आणि भाषेच्या वापरातले तारतम्य कसे हरवून बसतो याचे उत्तम उदाहरण.
'शांतेचं कार्टं..' मध्ये एक पालुपद होतं,'अरे, तुझा पगार किती? तू बोलतोस किती?' 'दिल चाहता है' मध्ये डिंपल म्हणते तसे 'तुम्हारी जनरेशन की यही प्रॉब्लेम है. तुम्हें लगता है की सबकुछ चलता है'. सदरहू महाशयांस गोरे होण्यासाठी आंतरजालावरची तथाकथित लोकप्रियता हे अर्धे हळकुंडही पुरलेले दिसते.

मेघना भुस्कुटे Wed, 25/12/2013 - 19:25

In reply to by सन्जोप राव

सोन्याच्या दागिन्यांत पैसे घालवणे बरे नाही (स्त्रियांनी सुंदर दिसावे, दागिने घालून स्त्रिया सुंदर दिसतात, सोन्याचे दागिने म्हणजे विवाहितेची नि घराण्याची अब्रू, ते विकायला निघणे म्हणजे घोर संकट इत्यादी समज; त्या समजांतून उद्भवणारे ताणतणाव, अन्याय; आणि मुहूर्तासारख्या गोष्टींमागची अंधश्रद्धा अशा तिन्ही गोष्टींना विरोध असल्यामुळे 'सोन्याच्या दागिन्यांत पैसे घालवू नये' असे यनावालांनी म्हटले असावे) हे पटण्यासारखे आहे.

अशा साध्यासरळ वाक्याचा इतका कडवट प्रतिवाद नक्की कशासाठी हा एक प्रश्न पडला. बरं, कुणी केलाच प्रतिवाद, तर लग्गेच त्यावरून 'तुमच्या जनरेशनला अक्कल ती काय', 'मार्मिक श्रेण्या मिळाल्या तर लगेच तारतम्य हरवून बसलात' 'आभासी नाव हे शेवटी आभासीच' वगैरे भलतीच तणतण कशासाठी, असा दुसरा प्रश्न. नि मग मराठी संस्थळांचं विश्व ते केवढं, त्यावर मिळणार्‍या श्रेण्या नि प्रसिद्धी नि लोकप्रियतेला आपण टोमणे मारण्याइतकं महत्त्व द्यायला लागलो आहोत का... वगैरे प्रश्न.

असो. जालावरचा वेळ कमी करायची गरज आहे. हे खरं.

बॅटमॅन Wed, 25/12/2013 - 21:35

In reply to by मेघना भुस्कुटे

सोन्याच्या दागिन्यांत पैसे घालवणे बरे नाही (स्त्रियांनी सुंदर दिसावे, दागिने घालून स्त्रिया सुंदर दिसतात, सोन्याचे दागिने म्हणजे विवाहितेची नि घराण्याची अब्रू, ते विकायला निघणे म्हणजे घोर संकट इत्यादी समज; त्या समजांतून उद्भवणारे ताणतणाव, अन्याय; आणि मुहूर्तासारख्या गोष्टींमागची अंधश्रद्धा अशा तिन्ही गोष्टींना विरोध असल्यामुळे 'सोन्याच्या दागिन्यांत पैसे घालवू नये' असे यनावालांनी म्हटले असावे) हे पटण्यासारखे आहे.

बाकीची कारणपरंपरा ठीके हो, पण निव्वळ गुंतवणूक म्हणूनही सोने घेतात की लोक. नक्की प्रॉब्लेम कशाला आहे, सोने खरेदीला की मुहूर्तावरच्या सोनेखरेदीला? याबद्दलच्या मांडणीत लेखक प्वाइंट हुकल्यागत वाटले अन वर विनाकारण टोचर्‍या भाषेमुळे तसाच प्रतिवाद करावा वाटले.

बाकी रिअ‍ॅक्शन ज्याचीत्याची, त्याला किती सीर्यसली घ्यायचे हाही ज्याचात्याचा प्रश्न.

अन

जालावरचा वेळ कमी करायची गरज आहे. हे खरं.

विशेषतः मआंजाबद्दल तर प्रचंड सहमत.

सन्जोप राव Thu, 26/12/2013 - 05:19

In reply to by मेघना भुस्कुटे

सोन्याच्या दागिन्यांत पैसे घालवणे बरे नाही (स्त्रियांनी सुंदर दिसावे, दागिने घालून स्त्रिया सुंदर दिसतात, सोन्याचे दागिने म्हणजे विवाहितेची नि घराण्याची अब्रू, ते विकायला निघणे म्हणजे घोर संकट इत्यादी समज; त्या समजांतून उद्भवणारे ताणतणाव, अन्याय; आणि मुहूर्तासारख्या गोष्टींमागची अंधश्रद्धा अशा तिन्ही गोष्टींना विरोध असल्यामुळे 'सोन्याच्या दागिन्यांत पैसे घालवू नये' असे यनावालांनी म्हटले असावे) हे पटण्यासारखे आहे.
हे इतके सोपे नाही याविषयी खात्रीच आहे. रामायणाला 'एका खुळ्या बाईने केलेल्या चोळीच्या हट्टाची कथा' असे म्हटले तर चालेल का? पण असो. मूळ प्रस्तावातील आत्माच हरवल्यामुळे ते मढे आता तात्काळ दहन करुन टाकले तर बरे.
जालावरचा वेळ कमी करायची गरज आहे. हे खरं.
बावनकशी. पेन्शनची सोय असती तर निवृत्तीच घेतली असती.

मेघना भुस्कुटे Thu, 26/12/2013 - 14:11

In reply to by सन्जोप राव

याहून अवघड काय कारणे आहेत? अर्थव्यवस्थेला होणारी अडचण हाच एक मुद्दा मला दिसतो आहे. त्याहून जास्त काय कारणे आहेत, मला कळले नाही. उलगडून सांगाल का?

अजो१२३ Thu, 26/12/2013 - 15:16

In reply to by सन्जोप राव

इथे स्त्रीयांनी सुंदर दिसू नये असे ही संजोपरावांना सुचवायचे आहे असे वाटते. सुंदर स्त्रीया आम्हाला आकर्षक वाटतात म्हणजे आमच्यात काहीतरी केमिकल लोचा आहे असे वाटले.

मन Sat, 04/01/2014 - 15:31

In reply to by सन्जोप राव

राम्गोपाल वर्माचे शिवा, सत्या हे चित्रपट अगदि भन्नाट; झकास, प्रभावी आहेत.
पण तोच रामगोपाल वर्मा "रामगोपाल वर्मा की आग" म्हणजेच शोले चा एक दळभद्री रिमेक काढू शकतो ह्यावर विश्वास बसणे कठीण आहे.
तसेच "दौड" ह्या बकवास पिच्चरचे.
हे चित्रपट इतके भिकारचोट आहेत की खुद्द रामूलाही एकसलग बगह्वले गेले नव्हते म्हणतात !
तस्मात् , माध्यम प्रचंड प्रभावी पद्धतीने वापरु शकणारा रामू फडतूस चित्रपट काढतो तेव्हा त्याचे एकूणात कौतुक करावे की फालतू पिच्चरसाठी शिव्या घालाव्यात हे समजत नाही.
अशावेळी त्या फाल्तू गोष्टी मी सोडून देतो.(न सोडून देउन सांगतो कोणाला.)
.
.
सन्जोप राव ह्या जालिय व्यक्तित्वाचे एकूणच त्याच्या विचारशीलतेबद्दल, मार्मिक टिप्पण्यांबद्दल ; व्यासंगाबद्दल व विशेषतः एखादी मोठी चर्चा सुरु असताना थेट एका लायनीत , एखाद्या वन लायनर quote प्रमाणे किंवा एखाद्या प्रसिद्ध काव्य-गीतातलली एखादीच पंच लाइन अचूक देउन नस पकडण्याबद्दल अप्रूप्/कौतुक वाटते, आदर वाटतो.
पण मग तेच व्यक्तिव अचानक "सदर महाशय, ...पिवळे हळकुंड" असा एकदम मुद्द्याला सोडून वैयक्तिक वार करुन लचके तोडू पहाते तेव्हा खेद होतो.
फार म्हणजे फारच खराब वाटते.
उपक्रमावरही एकदा चक्क योगप्रभू नामक आय डी ला "तुमच्या नावात प्रभू असल्यानं तुम्ही राम शास्त्री प्रभुण्यांचं गौरवीकरण करत आहात" असं अगदि एखाद्याची जात काढावी तसं त्याच्या आयडीवरून घराण्याचा अंदाज घेत बोचकारलं गेलं होतं.
इतरवेळी विचारपूर्वक , सखोल व मार्मिक प्रतिसाद देणारं हेच काय ते व्यक्तिवं ? असा प्रश्न पडला.
आताही पुन्हा तेच. मुद्दा पटला नाही तर समोरच्याला "मुद्दा बेसलेस/बिनबुडाचा आहे" असं थेट म्हणण्याऐवजी "अर्ध्या हळकुंडानं पिवळा झालास (भोसडिच्या)*" असं एखाद्या टग्यानं, माजोरड्यानं म्हणणं खपूनही गेलं असतं. ह्या आयडीकदून ते पाहून दु:ख होतं.
.
.अर्थात, चालायचच. बासमतीच्या लांबसड्क तांदलातून बनलेल्या भातात एखाद दोन खडे येतात, म्हणून तो अगदिच आख्खा टाकाउ होत नाही. खडे तर सोसायलाच हवेत.
.
.
कंसातील शब्द हा अध्याहृत आहे. संपूर्ण प्रतिसादाचा टोन सरळ तिकडेच झुकतो; स्पष्ट असा तो शब्द लिहिला नसला तरी.

ऋषिकेश Tue, 24/12/2013 - 15:28

In reply to by सन्जोप राव

ठळक केलेले वाक्य आणि त्यानंतरचा प्रतिसाद भरकटलेला आहे.
बाकीच्या सम्यक प्रतिसादावर स्वतःच बोळा फिरवला आहे.

अजो१२३ Tue, 24/12/2013 - 16:07

In reply to by सन्जोप राव

मूहूर्त पाहणे महामू(हू)र्ख पणाचे आहेच खरे. पण तसेच काटेकोरपणे असले तर २५ डिसेंबरलाच आनंदाला बहार येणे, १४ फेबलाच पोरी/राला प्रपोज करणे, हे ही तितकेच मूर्खपणाचे. अगदी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताकाचा आनंद जास्त प्रमाणात व्यक्त करणे मूर्खपणाचे. अगदी तत्त्व म्हणून शहाणपणानेच जगायचे असेल तर तत्कालीनात तत्कालात ठेउन काही नैमित्तिक नाही केले पाहिजे. राष्ट्रपतींनी ते चमकणारे तारे वैगेरे नाही घातले पाहिजेत.
पण टिका करायला कोणाला निवडायचं यात एक खुबी असते. पारंपारिक, ब्राह्मणी काही दिसलं कि त्यावर टिका करावी, ते जास्त पुरोगामी दिसतं हा सोपा फॉर्म्यूला आहे. अहो, टिका करायचीच झाली तर जे मोडीत निघतयं त्यावर थोडी करा, पण ज्याला राजाश्रय / राज्याभय आहे त्याच्यावर कडाडून करा.
अर्थात याचा अर्थ यनावाला दांभिक आहेत असा होत नाहीत. ते त्यांचं रेप्यूटेशन नसावं. पण अंध मात्र आहेत.

सन्जोप राव Wed, 25/12/2013 - 06:08

In reply to by अजो१२३

या चर्चेत ब्राह्मणीपणा आणणार्‍यांची कीव करावीशी वाटते. विचारांचा कोतेपणा 'टिका' या अशुद्धलेखनाइतकाच खुपला. आपल्याला जे माहिती नाही / जे आपल्याला कळत नाही त्याबाबतीत गप्प राहावे हे लोकांना इतके जड का जात असावे?
'सोने अजिबात खरेदी केले नाही तर फारच उत्तम' याचा अर्थ सदरहू भद्रपुरुषांस कळाला नाही यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. पण झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे कसे करणार?

अजो१२३ Wed, 25/12/2013 - 13:30

In reply to by सन्जोप राव

या चर्चेत ब्राह्मणीपणा आणणार्‍यांची कीव करावीशी वाटते.

काही खोटे पुरोगामी असतात. काही खरे असतात. पैकी यनावाला खरे आहेत असे वाटते. अगदी खरे पुरोगामी देखिल जे फक्त जुने आहे त्यावरच टिका/टीका करतात. विद्यमान अंधश्रद्धांवर करत नाही. खर्‍या पुरोगाम्यास समदॄष्टी असावी अपेक्षा आहे.

विचारांचा कोतेपणा 'टिका' या अशुद्धलेखनाइतकाच खुपला.

आमचे पुरोगामीत्वाबद्दलचे विचार मी एक वेगळा धागा काढून व्यक्त केले होते. त्यात कोते असे काही नव्हते. 'फक्त ब्राह्मणी परंपरावर टिका करू नका.' असे म्हटल्याने कोणी कोता होत नसावा.

बाय द वे अशुद्धलेखनाइतकाच हा एक शब्द आहे कि दोन आहेत? आम्ही, नि नंतर मेघनाजींनी भाषेवर इतका मोठा धागा काढला तेव्हा भाषेबद्दलची आमची frustations सांगीतली. टिका हा शब्द वापरताना मी उच्चारप्रामाण्य, सौंदर्यप्रामाण्य, टंकनसुलभताप्रामाण्य पाळले आहे.

आपल्याला जे माहिती नाही / जे आपल्याला कळत नाही त्याबाबतीत गप्प राहावे हे लोकांना इतके जड का जात असावे?

तत्त्वतः या वाक्याशी सहमत आहे.

'सोने अजिबात खरेदी केले नाही तर फारच उत्तम' याचा अर्थ सदरहू भद्रपुरुषांस कळाला नाही यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. पण झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे कसे करणार?

आमचा प्रतिसाद शांतपणे वाचाल तर अगदी हेच समजून उमजून यनावालांवर टिका केली आहे. सोने खरीदणे जसे मूर्खपणाचे तसे राष्ट्रपतींनी ब्लेझरवर तारे (emblems?) लावणे मूर्खपणाचे आहे असे मी म्हणालो आहे. वृत्तपत्रात यनावालांनी त्यावरही टिका करावी. आणि विद्यमान व्यवस्थांच्या अशा १०० मूर्खपणांवर देखिल टिका करावी. त्यांना सुचत नसल्या तर मी लिहून द्यायला तयार आहे. उदा. संपूर्ण राष्ट्राने एकच गाणे राष्ट्रगीत म्हणून आदराने गावे हा मूर्खपणा आहे. काय गरज आहे अशा कोणत्या गीताची?
व्यवस्थेतल्या शासनप्रणित मूर्खपणांवर टिका करायचीच नाही आणि केवळ परंपरांना झोडपायचे हे योग्य नाही. हाच सल्ला यनावालांना आहे. तरीही मी त्यांनी झोपेचे सोंग घेतलेले नाही असे म्हणतोय. मी यनावाला दांभिक नाहीत असे म्हणालो आहे, त्यांना कुठे कुठे टिका करायची याची जाणिव (being standing by fashion)नाही असे म्हणतोय.
बाकी आपली भाषा सन्मान्य संवादाची वाटली नाही.

सन्जोप राव Wed, 25/12/2013 - 15:15

In reply to by अजो१२३

आपल्या विचारांबद्दल आदर आहे. असो.

मी Tue, 24/12/2013 - 16:16

In reply to by सन्जोप राव

मुळ मुद्दा योग्यच, मुहुर्ताच्या नावाखाली सामान्य(बावळट)लोकांच्या पैशांशी खेळणार्‍या सराफांना अंधश्रद्धा-निर्मुलन कायद्याखाली अटक करवावी असे मत आहे.

सामान्य आणि मुर्ख असण्याचे स्वातंत्र्य मला मान्य आहे.

टोचरी भाषा वापरणे यनांचा/नास्तिकांचा कॉपिराईट आहे, ते फाट्यावर मारता येते, नास्तिकांना शिकण्यासाठी असलेल्या अनेक जागांपैकी ती एक आहे.

बॅटमॅन Tue, 24/12/2013 - 16:40

In reply to by मी

टोचरी भाषा वापरली तर खपून जाते पण जर मूळ मुद्यात दम असेल तरच. मुहूर्ताला विरोध आहे की सोनेखरेदीला या मांडणीतच लेखक गंडलेला असल्याने ती भाषाही हास्यास्पदच वाटते.

प्रकाश घाटपांडे Tue, 24/12/2013 - 16:46

In reply to by मी

मुहुर्ताच्या नावाखाली सामान्य(बावळट)लोकांच्या पैशांशी खेळणार्‍या सराफांना अंधश्रद्धा-निर्मुलन कायद्याखाली अटक करवावी असे मत आहे.

एक तर असे तांत्रिकदृष्ट्या देखील करता येणार नाही. आणि गुरुपुष्य मुहुर्तच कशाला सणाचा मुहुर्त नावाखाली देखिल अन्य प्रॉडक्टच्या जाहिराती प्रचंड असतात. तसे पाहिले तर जाहिराती हे प्रकरणच मानवी मेंदुचा ताबा घेत. अनावश्यक वस्तू गळ्यात मारणे हे तर जाहिरातदारांचे कौशल्य. बायकांच्या खरेद्या पाहिल्या तर मला हे जाहिरातदार यशस्वी झाल्यासारखे वाटतात. जो अशा खरेद्या करत नाही तो तद्दन बावळट मुर्ख व जगण्यास नालायक असे भाव त्यांच्या मनी असतात. खरेदीची अक्षरशः नशा असते. असो..

मी Tue, 24/12/2013 - 16:52

In reply to by प्रकाश घाटपांडे

इतर प्रकारांमधे 'लाभण्याचे' दैवी संकेत नसतात व तसेही बावळट असण्याचे स्वातंत्र्य मान्य करायलाच हवे.

बायकांबद्दल मात्र मी कुठल्याहीप्रकारचे सरसकट व्यक्तव्य टाळू इच्छितो.

बॅटमॅन Tue, 24/12/2013 - 16:57

In reply to by मी

बर्‍याच बायकांना खरेदीची नशा असते या विधानात चूक काय हे कळत नाही.

बर्‍याच पुरुषांनाही नशा असते असे विधान वदवून घेतल्याखेरीज वरील वाक्य उच्चारता येऊ नये अशी अलीकडे स्थिती आहे खरी. पण पुरुषांबद्दल काही बोलल्याने बायकांबद्दलच्या वाक्याची सत्यता कमी होते असे मला वाटत नाही. आपापल्या ठिकाणी दोन्ही वाक्ये ठीकच आहेत. त्याला कोणी स्त्रीद्वेष्टेपणाचे सरसकट लेबल लावणार असेल तर त्यांनी ते टाळण्याची अपेक्षा मात्र सध्या करवत नाही ;)

सन्जोप राव Wed, 25/12/2013 - 06:11

In reply to by मी

टोचरी भाषा वापरणे यनांचा/नास्तिकांचा कॉपिराईट आहे, ते फाट्यावर मारता येते
या प्रतिसादातली टोचरी भाषा आवडली. सदर प्रतिसाद फाट्यावर मारण्यात आला आहे.

............सा… Wed, 25/12/2013 - 19:21

संजोप राव,
Batman वर "अर्ध्या हळकुंडाने गोर होण्याचा" आरोप अनाठाई व वयक्तिक वाटला. त्याने यनावलांच्या विचारांचा विरोध केला होता. त्यात वयक्तिक मुद्दा आणला नव्हता. जरी मला तो मुद्दा (गुंतवणूक + गोल्ड़मनगिरी) पटला नसला, तरी त्याच्या व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर उगाचाचा आपण हल्ला चढविलात असे वाटले.
जनरली मी "आपण बरे व आपले बरे" अशा विचाराने गप्प बसते पण Batya असल्याने रहावले नाही.
आपले विचार पहाता, "यनावलांची आंधळी व्यक्तिपूजा" आपल्यालादेखील मान्य नसावी असे वाटते अन तरीही फ़क्त पगार+वय (रहेटोरीकली) श्रेष्ठ असलेल्या व्यक्तीनेच यानावालांच्या विचारांवर हल्ला चढवावा असा काहीसा आग्रह आपल्या प्रतिवादातून जाणवला.

प्रकाश घाटपांडे Wed, 25/12/2013 - 20:15

चला मंडळी मूळ मुद्द्यावर येउ. एकूण चर्चा पहाता यनावालांच्या मुहुर्तावर सुवर्ण खरेदीच्या मुद्द्याला त्यांचे मत ( मग ते पटो वा न पटो) म्हणुन आदर व मान्यता आहे. आक्षेप आहे तो खालील वाक्याबद्दल
>>सराफी दुकानांत काचेआडच्या निर्जीव, निर्बुद्ध पुतळ्यांवर सुवर्णालंकार शोभतात. सजीव, बुद्धीमान व्यक्तीच्या अंगावर ते ओंगळवाणे दिसतात. स्वबुद्धीने विचार करावा.
यनावालांची भाषा बोचरी आहे हे खरे. पण ते त्यांच्या आचार विचारांशी सुसंगत आहे. असतो एखाद्याचा पिंड तसा.पण त्यांचा त्यामागील हेतु हा चांगला आहे. त्यांना अस वाटत की जरा बोचरी भाषा वापरली तर चिडुन का होईना पण लोक विचार करायला प्रवृत्त होतील. लहान मुलाला कस आपण समजावताना वा एखाद्या गोष्टीपासून परावृत्त करताना म्हणतो," ती वेडी आन बावळट मुल असतात ना ते अस करतात. तू शहाणा आहेस की नाही?" मग तो मुलगा ही विचार करतो कि असे केले कि आपण बावळट व मूर्ख ठरु. मग जराशा अनिच्छेनेच तो ते करत नाही.
मला स्वतःला अंधश्रद्धांची कीव करणे फारसे पटत नाही. त्याचा परिणाम उलटा होउ शकतो. मी त्याविषयी इथे मत व्यक्त केले आहे
डिस्क्लेमर- ही लिंक मी दुसर्‍यांदा दिली आहे. ज्यांना मी विषयाच्या ओघात अशा लिंका देतो ते आवडत नाही ( काही प्रतिसादातुन मला तसे जाणवले आहे) त्यांनी दुर्लक्ष करावे

बॅटमॅन Wed, 25/12/2013 - 21:40

In reply to by प्रकाश घाटपांडे

मला स्वतःला अंधश्रद्धांची कीव करणे फारसे पटत नाही. त्याचा परिणाम उलटा होउ शकतो. मी त्याविषयी इथे मत व्यक्त केले आहे

घाटपांडेकाकांशी पूर्ण सहमत. त्या लिंकेतल्या प्रतिसादाशी तर प्रचंड सहमत आहे. हस्तिदंती मनोर्‍यात बसून कीव करणे लै सोपे आहे. तिथे भाषाही पाहिजे तशी वापरता येते. पण प्रत्यक्ष राउंडात उतरून काम करणे अवघड आहे. तारतम्याच्या व्याख्येसाठी बालिशपणे अडून बसणे हा मूर्खपणाच आहे. असो. होता होईल तोवर निरुपद्रवी अंधश्रद्धांकडे दुर्लक्ष करणे हा फंडा मला वैयक्तिकरीत्या बेष्ट वाटतो.

चिंतातुर जंतू Thu, 26/12/2013 - 11:02

In reply to by प्रकाश घाटपांडे

>> सजीव, बुद्धीमान व्यक्तीच्या अंगावर ते ओंगळवाणे दिसतात. स्वबुद्धीने विचार करावा.

ह्या वाक्यामध्ये सौंदर्याविषयी एक व्यापक तुच्छता मला जाणवते. म्हणजे 'ज्याच्यापाशी बुद्धी असेल तो माणूस सुंदर दिसण्याचा प्रयत्न करणार नाही, आणि जो सुंदर दिसण्याचा प्रयत्न करेल तो बुद्धिमान नाही' असं काहीसं म्हणायचं आहे असं वाटतं. व्यक्तिशः मला हे मत पटत नाही. माणसाच्या साँदर्यासक्तीतून मानवी संस्कृतीनं अनेक अद्भुत गोष्टी जन्माला घातल्या - अगदी हिरव्यागार केळीच्या पानावर शुभ्र भाताच्या मुदीवर वाढलेलं पिवळंधम्मक वरण हेसुद्धा त्यात आलं. मानवी मनाला निखळ आनंद देतात अशा गोष्टींना असं कस्पटासमान मानणं बुद्धिवाद्यांना शोभत नाही असं वाटतं. प्रखर बुद्धिवादी असूनही उत्तम सौंदर्यदृष्टी असणारी राम बापटांसारखी किंवा अशोक केळकरांसारखी माणसं इथे आठवतात. ह्या दोन्ही गोष्टींचं महत्त्व जाणणारी ही माणसं महाराष्ट्रातल्या इतर बुद्धिवंतांपेक्षा सरस ठरतात त्यामागे हेदेखील एक कारण आहे असं मला वाटतं.

बॅटमॅन Thu, 26/12/2013 - 12:19

In reply to by चिंतातुर जंतू

सौंदर्यासक्ती अन बुद्धिवाद जणू ऑर्थोगोनल असल्यागत जे मतप्रदर्शन होते त्याला हे मस्त उत्तर आहे. म्हणजे अमूर्त प्रकारची सौंदर्यासक्ती चालेल पण मूर्त नै असा काहीसा छुपा अमूर्तवाद असतो असं जाणवतं.

सन्जोप राव Thu, 26/12/2013 - 12:24

In reply to by चिंतातुर जंतू

ह्या वाक्यामध्ये सौंदर्याविषयी एक व्यापक तुच्छता मला जाणवते. म्हणजे 'ज्याच्यापाशी बुद्धी असेल तो माणूस सुंदर दिसण्याचा प्रयत्न करणार नाही, आणि जो सुंदर दिसण्याचा प्रयत्न करेल तो बुद्धिमान नाही'
या वाक्यामागे 'अंगावर सोने घातल्याने माणूस सुंदर दिसतो' हे गृहितक आहे. हा तर्क वालावलकरांच्या कोणत्या वक्तव्यामुळे आला ते कळाले नाही. 'सराफी दुकानांत काचेआडच्या निर्जीव, निर्बुद्ध पुतळ्यांवर सुवर्णालंकार शोभतात. सजीव, बुद्धीमान व्यक्तीच्या अंगावर ते ओंगळवाणे दिसतात. स्वबुद्धीने विचार करावा.' अशी ती मूळ वाक्ये आहेत. याचा अगदी काढायचा झालाच तर अर्थ असा निघेल की बुद्धीमान माणसाने अंगावर सोने घालू नये. याचा अर्थ बुद्धीमान माणसाने सुंदर दिसण्याचा प्रयत्न करु नये असा काढणे हे म्हणजे वडाची साल पिंपळाला लावणे आहे.
ह्या दोन्ही गोष्टींचं महत्त्व जाणणारी ही माणसं महाराष्ट्रातल्या इतर बुद्धिवंतांपेक्षा सरस ठरतात त्यामागे हेदेखील एक कारण आहे असं मला वाटतं.
ही माणसं म्हणजे प्रखर बुद्धिवादी असूनही उत्तम सौंदर्यदृष्टी असणारी माणसं, पण इतर बुद्धिवंत म्हणजे कोण? तर्कच करायचा झाला तर प्रखर बुद्धिवंत असूनही उत्तम सौंदर्यदॄष्टी नसणारी माणसं असं गृहित धरु. तर या माणसांची उदाहरणे कोणती? आणि अशा माणसांपेक्षा बापट-केळकरादि माणसे 'सरस' ठरतात म्हणजे काय? कोणत्या निकषावर 'सरस' ठरतात? हे कोणी ठरवले? याला विदा काय? नाही, वाक्य टाळीला म्हणून ठीक आहे, पण त्याची विश्वासार्हता काय आणि किती?
बाकी अगदी हिरव्यागार केळीच्या पानावर शुभ्र भाताच्या मुदीवर वाढलेलं पिवळंधम्मक वरण - अगदी. बालकांचे निरागस हास्य, धरतीला आपल्या तेजोमय किरणांनी न्हाऊ घालणारा उगवतीचा सूर्यनारायण, गवताच्या पात्यावर पडलेले दवबिंदू, टाळ-मॄदंगाच्या साथीने 'साहवळ्या इट्टला'चे अभंग म्हणणारे भाबडे वारकरी वगैरे. पण मला वाटते दवण्यांचा उल्लेख वर आलाच आहे.

मी Thu, 26/12/2013 - 12:56

राव संस्थळावरच्या चर्चेला वैतागलेले असावेत, अन्यथा नेहमी आब राखुन असणारे असे प्रतिसाद का देत आहेत असा प्रश्न पडला.

सजीव, बुद्धीमान व्यक्तीच्या अंगावर ते ओंगळवाणे दिसतात

स्वबुद्धीने(सौंदर्याबद्दल) विचार करायला लावणे म्हणजे दागिने घालणारास बुद्धी कमी आहे हे सुचविण्याचाच प्रकार वाटतो.

नास्तिकांचा(घाटपांडे काका अपवाद) कडवटपणा ह्यानिमित्ताने सिद्ध होण्याबद्दल खेद वाटतो, रावांना यनावालांचे समर्थन अंधश्रद्धेने करावयाचे असल्यास ते मान्य आहेच व माझ्या मताबद्दल त्यांनी दाखवलेला आदर किंवा अनुल्लेखही मान्य आहे.

सन्जोप राव Fri, 27/12/2013 - 06:29

सौंदर्यपूर्ण चा विरुद्धार्थी शब्द ओंगळवाणा हा शब्द आहे या गृहितकाला विरोध नोंदवून लेखनसीमा.

मेघना भुस्कुटे Fri, 27/12/2013 - 09:05

In reply to by सन्जोप राव

तुम्ही चक्क 'सौंदर्यपूर्ण'चा असं न लिहिता 'सौंदर्यपूर्ण चा' असं लिहिलंत? तुमची ती पेटी मलाही धाडता का? :प

'न'वी बाजू Fri, 27/12/2013 - 09:50

In reply to by सन्जोप राव

...या गृहितकाला विरोध...

गृहीतक.

बाकी चालू द्या.

सन्जोप राव Fri, 27/12/2013 - 10:05

In reply to by 'न'वी बाजू

गृहीतक हे बरोबर आणि गृहितकाला हेही बरोबर असा माझा समज आहे.
बाकी चालू द्या....

'न'वी बाजू Fri, 27/12/2013 - 10:21

In reply to by सन्जोप राव

याबाबत साशंक आहे; नव्हे, 'गृहितकाला' चूक असण्याबाबत जवळजवळ खात्री आहे.

नक्की नियम सादर करू शकणार नाही, याबद्दल आगाऊ क्षमस्व, परंतु पुढील समांतर उदाहरणे मला वाटते बहुधा मेथड इन द म्याडनेस दर्शविण्याकरिता चालू शकावीत:

"नको विसरू संकेत मीलनाचा" ("मिलनाचा" नव्हे).
"जीवनाचा परिमळ तोचि" ("जिवनाचा" नव्हे.)
==============================================================
समांतर अवांतर (शंका): "पीठ"पासून "पिठाचे" वगैरे, हे ठीकच. (उदा. "पिठाचे पोते", वगैरे.)

"विद्यापीठ" वरून "विद्यापिठाचे आवार", की "विद्यापीठाचे"?
==============================================================
(मला वाटते, यामागील नियमात तत्सम-तद्भवची काहीतरी भानगड असावी. चूभूद्याघ्या.)
==============================================================
बाकी चालू द्या.

मिहिर Fri, 27/12/2013 - 10:37

In reply to by 'न'वी बाजू

ऱ्हस्व-दीर्घाचे बदल हे सामान्यरूप होताना अन्त्य आणि उपान्त्य असणाऱ्या अक्षरांसाठीच होतात असे वाटते. बाकी पीठ-पिठाचे, विद्यापीठ-विद्यापीठाचे हे बरोबर असावे. इथे नियम ८.१ पाहा.

'न'वी बाजू Fri, 27/12/2013 - 11:06

In reply to by मिहिर

(बाकी, अन्त्य आणि उपान्त्य नसलेल्या अक्षरांच्या बाबतीत, अशा शब्दांची - उदा. 'गृहीतका'ची - विल्हेवाट नेमक्या कोणत्या नियमाने लावता यावी बरे? वेगवेगळी उदाहरणेही चटकन आठवत नाहीयेत.)

रमा Sat, 28/12/2013 - 02:43

http://leelajacinto.blogs.france24.com/article/2013/12/20/tale-two-indi…

ह्या ब्लॉग मध्ये म्हंटल्याप्रमाणे ही बातमी मेन्स्ट्रीम मिडियाने कव्हर केलेलि नाहि.त्याची आपल्यासर्वांना माहिती असणारी कारणच ह्या लीला जासिंटो, अनिवासी भारतिय पत्रकार(उच्चार कदाचित चुकिचा असु शकेल) ह्यांनी दिलेली आहेत. ती कदाचीत खरी किंवा खोटिहि असतील (म्हणजे मुळ बातमीच खोटिहि असु शकेल) पण एकंदर परिस्थिति पाहता खरी असण्याची शक्यता ज्यास्त वाटतेय. अर्थातच मेनस्ट्रीम मिडिया ने कव्हर केलेली बातमी नसल्याने पडताळुन पहाणे अशक्य आहे. कृपया कुणाला अधिक माहिती असल्यास इथे द्याल का?

बातमी पहिल्या दिवशी वाचली होती त्यात 'कार ओन्ड बाय रिलायन्स' असे स्पष्ट लिहिले होते.

ब्लॉगमधील आरोपांबद्दल काय म्हणावे ते कळत नाही. म्हणजे तशी बस्तुस्थिती 'असू शकते' हे तर खरेच आहे. पण ती तशीच आहे असे गृहीत धरून ती मीडियामध्ये आली नाही म्हणून खेद व्यक्त करावा की नाही याबद्दल साशंक आहे.

अवांतरः ज्या गाड्यांना धडक दिली त्याही अतिश्रीमंतांच्याच गाड्या असल्याने मीडियाला ष्टोरीत विंटरेस्ट वाटला नसेल (म्हणजे धनदांडग्यांकडून गरीबांना धडक/चिरडणे वगैरे हेडलाइन बनत नाही ना !!!).

बन्सिलाल जोशी यांनी स्वतःहून पोलिसांकडे आपणच त्या अपघाताच्यावेळी गाडी चालवीत होतो असे कबूल होते. परंतु, अपघातग्रस्त ऑडी गाडीच्या श्रीमती फोरम रुपारेल यांनी, गाडीचालक हा एक तरुण मुलगा होता असे सांगत, जोशी यांचा दावा फेटाळला होता.

नुकतीच श्रीमती रुपारेल यांनी पदरचे ४५ लाख घालून नवी ऑडी घेतली आणि त्यांना गाडीचालक बन्सीलाल जोशीच होते याचा साक्षात्कार झाला!

बॅटमॅन Sun, 29/12/2013 - 01:04

मौर्यकालीन अवशेष अगोदरच कमी आहेत, त्यात परत इंडियन म्यूझियमच्या अडाणचोट कारभारामुळे एका "लायन कॅपिटल" वरील सिंहाचा पुतळा मोडला आहे.

इंडियन म्युझियमचे सध्या रिनोव्हेशन चालू आहे. त्यामुळे हा लायन कॅपिटल अन्यत्र हलवताना तुटला. इतकेच नव्हे, काही मूर्खांनी त्याला पेंटिंग करावयास सुरुवातही केली आहे. मौर्यन अवशेषांचे सरफेस फिनिश इतके फाईन असते की दगडी अवशेष सुद्धा पाहताना धातूचा असल्यागत वाटतो. तसल्या फिनिशवर या मूर्खांची ही मलमपट्टी काय कामाची? २०११ मध्ये मी तिकडे गेलो असताना फ्रंट लॉबीमध्ये हा पुतळा ओपनलि ठेवलेला पाहिलाय. तेव्हा हाताळलाही होता-तसे करण्यास बॅन नव्हता जो पाहिजे खरे तर. वाचून संताप संताप झाला. बरं हे आलतूफालतू म्युझियम नाहीये, "नॅशनल" म्युझियम आहे. या नालायकांना इतकीही अक्कल नको?

बातमी.