आजचा सवाल- ''?''

मानव जेंव्हा अदीम अवस्थेतून पुढे सरकला,त्या काळात धर्म कल्पना बाल्यावस्थेत होत्या,पुरुष प्रक्रुती यांच्या मिलनातून स्रुष्टी घडली...हा सामान्यतः भारतीय पौरुषी धर्मांचा पाया आहे.ही कल्पना कमी अधिक फरकानी सगळीकडे आलेली आहे. याच कल्पनेला आधारभूत मानून पुढचा पुरुष/प्रक्रुती यांचा आजचा सवाल-जबाब लिहिला आहे...

पु-मरणं येऊ दे याचे तेंव्हा,काशास चिंता आज करू?
बेधुंदीचा जीवन प्याला,का जहराने उगा भरु?....गं गं गं गं$$ माझे बाइ..!

प्र-धाडस ठायी असेल भारी,सावध चित्ता जरा करा
बेधुंदीही मरण दावीते,तीथे मनाला अवर जरा...रं रं रं रं$$ माझ्या राजा..!

पु-इष्कही आहे काव्यही आहे,स्रुष्टी सारी बेहोषी
का थांबु मी जीवन म्हणते,नाते आहे धुंदीशी...

प्र-सैरभैरही नकोस धाऊ,जात तुझी पाचोळ्याची
वादळ/वारा उधळुन लावी,काय कल्पना साय्राची...

पु-येडी म्हणु की खुळी म्हणू गं$$,ओळख नाही माझी तुला
जीवन मी अन मरणही मी गं,नकोस समजू खुळं मला...

प्र-दमले बाबा तुझ्या समोरी,अक्कल शिकवू कशी तुला?
कल्पनाच त्या साय्रा असती,नकोच झुलवू शब्द झुला...

पु-अगं शब्दांचा हा खेळच सारा,कुठे शब्द अन कुठे झुला?
नाते जडते शब्दांनीही,समजुन घे रे सोनफुला....

प्र-(रागानी) अरे,भूल टाकूनी माझ्यावरती,तुझी हुशारी दाऊ नको..
उत्तर दे मग या प्रश्नाचे,तसाच पळुनी जाउ नको...
प्र- जीवन म्रुत्यु असशील तुही,पहिले यातील काय असे..?
उत्तर दे रे विचार करुनी, ना जमले तरं तुझे हसे....

पु-अंगं मेला$$ जीव नी गेला मातीत,मिसळुन तुझीया कायेशी
तुझ्याच मधुनी संचय पहिला,म्रुत्युच असतो अविनाशी...

०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

चांगलं जमलंय हे प्रकरण.

तुझ्याच मधुनी संचय पहिला,म्रुत्युच असतो अविनाशी...
या वाक्याचा आशय कळला पण अर्थ तितकासा कळला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0