Skip to main content

राणीच्या देशातील भारतीयांसाठी कायदे.

http://www.bbc.co.uk/news/uk-politics-22267147

भारतात जातीव्यस्था नष्ट झालेली असताना राणीच्या देशात जातव्यवस्थेशी निगडीत कायदा करण्यात आला. मला वाटते अशा प्रकारे परक्या देशात आपल्या धर्माचे वा देशाचे नाव खराब होइल असले कायदे करण्याची मागणी करणे चुकीचे आहे. त्यामुळे जगभरात राहण्यार्‍या भारतीयांबद्दल चुकीचे मत होइल.

धनंजय Mon, 29/04/2013 - 18:37

हे कायदे ब्रिटनमध्ये स्थायिक लोकांकरिता लागू आहेत. चर्चाप्रस्तावकाने दिलेल्या दुव्यावर हे वाक्य आहे : "Those arguing for action said such discrimination was outlawed in India and should be banned in Britain too."

म्हणजे भारतातील जातिभेदविरोधक कायदे ब्रिटनमधल्या प्रस्तावित कायद्याकरिता स्फूर्ती आहेत.

ब्रिटनमध्ये स्थायिक लोकांच्या सोयीकरिता आणि न्यायाकरिता कुठले कायदे करण्यालायक आहेत, ते ब्रिटिश लोकशाही व्यवस्थेने जरूर ठरवावे. भारतीय कायद्याकडून स्फूर्ती घेऊन त्यांच्या देशात कायदा करावासा वाटला, तर त्यांच्या देशातील व्यक्तींनी त्यांच्या संसदेकडे मागणी करणे ठीक वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 29/04/2013 - 19:24

वरच्या दोन्ही प्रतिसादांच्या आशयाशी सहमत आहे. भारतीय कायद्यांवरून प्रेरणा घेऊन ब्रिटनने कायदा बनवला तर उलट त्यात भारताची प्रशंसाच आहे.

राजेश घासकडवी Mon, 29/04/2013 - 21:34

परक्या देशात आपल्या धर्माचे वा देशाचे नाव खराब होइल असले कायदे करण्याची मागणी करणे चुकीचे आहे.

जातीभेद चालू ठेवण्याऐवजी त्याविरुद्ध कायदा केल्याने नाव खराब कसं होतं हे कळलं नाही. संडास स्वच्छ करण्यासाठी दार उघडलं तर वास येईल अशा प्रकारचा हा युक्तिवाद वाटला.